Author: naviarthkranti

  • एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.

    आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.

    आणि त्यांनंतर  एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे. 

    The Importance of Education

    माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. 

    समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला. 

    एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.

    The Importance of Education
  • आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते.

    हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो.

    पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात-

    ★ कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक:

    अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे,

    S M A R T म्हणजेच-

    Specific निश्चित,

    Measurable मोजता येणारे,

    Achievable शक्य असणारे,

    Relevant संबंधित,

    Time-bound विशिष्ट कालमर्यादेत

    असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात-

    ★ आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे:

    प्रत्येकाच्या जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.

    ★ निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं:

    आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते.

    ★ आयकर कायद्याच्या संबंधित चुका:

    अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी.

    ★ आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे:

    गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा.

    ★ महाग कर्जाचा बोजा कमी न करणे:

    गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये.

    ★ जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं:

    आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी)

    आणखी वाचा

  • जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

    जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

    इतिहास काय सांगतो, ‘जे तलवारी चालवतील, ते तलवारीने मरतील, जे डोकं चालवतील, ते जगावर राज्य करतील; तसेच जे तराजू चालवतील, ते संपत्ती कमवतील.’ मित्रहो, आजही तेच दिसतंय. पुस्तकं वाचणारे बुद्धीवादी सरकारमध्ये आहेत, तराजूवाले त्यांना पैसे पुरवतात आणि तलवारीची भाषा करणारे अजून मोर्चे व आंदोलन करत आहेत. यात मराठी माणूस कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तराजूवाले, आज देशातील उद्योग क्षेत्रात मुख्यतः यांचेच वर्चस्व दिसून येते, कारण हे लोक पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात आहेत. स्वतःचा उद्योग कसा यशस्वी करायचा, याचाच विचार ते करतात आणि परिणामी ते यशस्वी होतात. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात येताना दिसतात. हे पिढ्यानपिढ्या चालू राहणार. यात मराठी माणसे आहेत ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.

    आजकाल सोशल मीडियावर आपण शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट टाकून आपण मराठी असल्याचे अभिमानाने सांगतो. स्वतःला त्यांचे वारस समजतो; परंतु शिवरायांनी नुसती तलवार नाही चालवली, तर बुध्दी चालवली. त्यांचे राजकीय डावपेच आणि गनिमी काव्यापुढे त्यांचे सर्व शत्रू हतबल झाले होते हे विसरू नका. केवळ आपली बुध्दी व दूरदृष्टीच्या साहाय्याने त्यांनी इतिहास घडवला. आजही त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधले जाते. हा इतिहासाचा भाग आतातरी मराठी तरुणांना समजेल का? अनेकांच्या व्हॉटसअप प्रोफाईलवर तलवारीचा फोटो असतो, तेव्हा असे वाटते की अजून यांच्या डोक्यात तलवारच आहे. त्यांच्या डोक्यात बुध्दी आणि पैसा यावा हीच शिवरायांचरणी प्रार्थना.

    आज तलवारीपेक्षा पैशाची धार जास्त आहे. ज्याच्याजवळ पैसा त्याचीच जास्त पॉवर. यामध्ये बहुतांशी उद्योजक आहेत. आज मराठी तरुणांनी देखील उद्योग क्षेत्रात उतरणे गरजेचे झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर यश मिळवण्यासाठी केलात, तर तुमचेच भले होईल. आपल्याकडे एक म्हण आहे, “उद्योगीला महापूर, आळश्याला गंगा दूर.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

    फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

    गरुडाचे जीवनमान ७० वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा ४०वर्षांचा होतो, तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडता येत नाही. चोच पुढील बाजूला वळते, ज्यामुळे भोजन करता येत नाही. पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, त्यामुळे गरुडभरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे, अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात. एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडाप्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतःला पुनर्स्थापित करणे!

    १५० दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षेनंतर त्याला मिळते त्याची गरुडभरारी, यानंतर तो 30 वर्षे जगतो, ताकदीने आणि अभिमानाने!

    याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. तेव्हा आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत!

    150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतःला पुनरुज्जीवित करण्यासाठी! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे, ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच! पण त्यानंतर जी उड्डाणं असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील!

    दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहेत, जे स्वतःला परिपूर्ण ओळखता आणि तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • करिअरची झेप अंतराळापर्यंत

    करिअरची झेप अंतराळापर्यंत

    12वी झाली आता पुढे काय करू हा सगळ्या विद्यार्थ्यांचा ठरलेला प्रश्न. पण तुम्हाला जर विज्ञानात रस असेल, तर आजच्या लेखातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.

    आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे माणूस भूगर्भापासून ते अंतराळातील कृष्ण-विवरांपर्यंत प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणि नवीन काहीतरी शोध लावण्यात, संशोधन करण्यात तरबेज झाला आहे. या तंत्रज्ञानामुळेच करिअरचे नव-नवे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे Career In Space Science. तुम्हाला जर अंतराळ विश्वात रमायला आवडत असेल, तर तुम्ही स्पेस सायन्समध्ये उत्तम करिअर करू शकता.

    पूर्वीसारख्या अंतराळ विज्ञानात आता केवळ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळवीर बनणं फक्त एवढ्याच संधी उपलब्ध नाहीत, तर स्पेस इंजिनीअरिंग, स्पेस रिसर्च, स्पेस लॉ, स्पेस टुरिझम, स्पेस टेक्नोलॉजी असे अनेक पर्याय आहेत.


    Astronomers

    खगोलशास्त्रज्ञ: विज्ञानाच्या दृष्टीने अवकाश अजूनही कधीही न सुटणारे कोडे आहे. अनेक देशांचे शास्त्रज्ञ अवकाशाचा शोध घेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खगोलशास्त्रामध्ये सूर्यमाला, तारे, आकाशगंगा, ग्रह इत्यादींचा समावेश होतो. हे शास्त्रज्ञ जमिनीवरून संशोधन करून तिथे घडणाऱ्या विविध घटना जाणून घेत असतात, त्यावर अभ्यास करत असतात.


    Astronauts

    अंतराळवीर : अंतराळवीरांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते, हे असे लोक असतात जे अंतराळात फिरून आपली स्वप्ने पूर्ण करतात. स्पेस स्टेशनवर राहून संशोधन करणे हे त्यांचे काम असते. कल्पना चावला, सुनीता विल्यम असे अंतराळवीर आणि त्याची अभिमानास्पद कार्य आपल्याला माहितीच आहेत. तुम्ही देखील स्पेस सायन्समध्ये करिअर करून अंतराळवीर बनू शकता.


    Space Engineer

    स्पेस इंजिनीअरिंग : आता इंजिनीअर म्हणून तुम्ही केवळ आयटी कंपन्यांमध्येच काम करू शकता असे नाही, तर तुम्ही अंतराळाचा देखील वेध घेऊ शकता. अंतराळ मोहिमेशी संबंधित सर्व उपकरणं डिझाइन करणे हे स्पेस इंजिनिअरचे मुख्य काम असते. एरोस्पेस, रोबोटिक्स, मटेरियल सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग तसेच मेकॅनिकल आणि टेलिकॉम इंजिनीअरिंग अशा अनेक क्षेत्रातील इंजिनीअर्स स्पेसमध्ये काम करु शकतात. 


    Space Technology

    स्पेस टेक्नॉलॉजी: यामध्ये मुख्यतः सॅटेलाइट, स्पेस स्टेशन, स्पेसक्राफ्ट, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, अंतराळ युद्धात गुंतलेली विविध उपकरणे, इक्विपमेंट डिझाईन करण्याचे काम केले जाते. 


    Space Research

    स्पेस रिसर्च: विज्ञान म्हटलं की शोध, संशोधन हे आलेच आणि अंतराळ हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये संशोधकाला वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता येतात. अवकाश संशोधनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असतो. जसे – खगोलभौतिकशास्त्रज्ञ, खगोलजीवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ, जैवभौतिकशास्त्रज्ञ. आणि हे सर्वजण आपापल्या पद्धतीनुसार अंतराळातील गोष्टींवर काम करत असतात.


    Space Law

    स्पेस लॉ: स्पेस लॉ हा अंतराळ अंतर्गत क्षेत्राशी संबंधित कायदा आहे. यामध्ये देश आणि कंपन्यांमधील करार, संधी, अधिवेशनं आणि संघटना यांच्या नियमांची माहिती मिळते. आजच्या काळात अवकाशात माणसाने ज्याप्रकारे विस्तार केला आहे, ते पाहता स्पेस लॉ करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.


    Space Tourism

    स्पेस टुरिझम: कोणाला अवकाशात फिरायला आवडणार नाही. 2030 पर्यंत अंतराळवीरच नाही, तर तुम्ही आम्ही देखील अंतराळ सफर करू शकतो अशी घोषणा ईस्त्रोने केली आहे. त्यामुळे भारत स्पेस टुरिझम मॉडेलवर जोरदार काम करत आहे. यामध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक, ब्लू ओरिजिन, ओरियन, स्पेसएक्स, ओरियन स्पॅन आणि बोईंग यांसारख्या खासगी विदेशी कंपन्या या क्षेत्रात खूप पुढे गेल्या आहेत. त्यामुळे स्पेस टुरिझम क्षेत्र तुमच्या करिअरसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं.

    मग कशी वाटली आजची माहिती? कमेन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा…

  • व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे

    व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे

    कर्ज, आजार व शत्रू याकडे तुम्ही लक्ष नाही दिले व वेळीच उपाय नाही केला, तर तुमचे आयुष्य उध्वस्त करते. आज व्यवसाय, उद्योग करत असताना व सर्वसामान्य जीवन जगत असताना कर्ज हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जास्तीत जास्त कर्ज घेऊन जो अत्यंत चांगल्या पध्दतीने हाताळतो तो प्रगती साधतो. बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना मार्केट कंडिशनमुळे किंवा स्वतःच्या चुकीमुळे नुकसान होते. चढउतार येत असतात व कर्जाचा कमी अधिक डोंगर उभा राहतो. तेव्हा कर्ज हाताळण्याची काही सूत्रं स्वतःला घालून घेतली पाहिजेत.

    दुसरे सूत्र म्हणजे; कर्ज काढण्यापूर्वी व्याजदराचे पर्याय शोधा. केव्हाही बँका किंवा अर्थसंस्थांकडून कर्ज घ्या. खाजगी व्यक्तीकडून कर्ज केव्हाही घेऊ नका. मित्र, नातेवाईकांकडून कर्ज घेणे टाळा. तुमचा उद्योग ही पूर्णतः वेगळी एन्टीटी आहे. तिचा कोणताही मित्र, नातेवाईक व इतर खाजगी व्यक्तीच्या व्यवहारात संबंध येऊ देऊ नका. खाजगी जीवन हे खाजगीच ठेवा व व्यावसायिक जीवन हे व्यावसायिकच ठेवा. कोणतेही आर्थिक संबंध नसल्यावरच मैत्री व नातेवाईकांचे नाते व प्रेम टिकून राहते.

    तिसरे सूत्र म्हणजे; काढलेले कर्ज हे नेहमी व शक्य तितक्या खेळत्या भांडवलासाठी वापरा व त्याद्वारे व्यवसायाची जास्तीतजास्त उलाढाल करा. कर्ज नेहमी उत्पादक बाबींसाठीच वापरा. परतावा न देणाऱ्या कोणत्याही बाबीसाठी कर्ज वापरू नये. बहुसंख्य व्यावसायिक ह्याच कारणामुळे गोत्यात येतात. कर्ज काढले की काही भाग लग्नासाठी वापरतात, घराचे इंटेरिअर करणे, गाडी घेणे इत्यादीसाठी पैसे खर्चून बसतात.

    चौथे सूत्र म्हणजे; कर्ज घेतल्यावर रिलॅक्स होऊ नका. ते तुम्हाला व्याजासहित परत फेडायचे आहे लक्षात ठेवा. ३ वर्षांनी, ५ वर्षांनी फेडायचे आहे म्हणून निवांत राहू नका. फेडण्यासाठी लागणारा भाग प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवा.

    पाचवे सूत्र म्हणजे; कर्जाचा डोंगर उभा राहिला व फिटण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहत नाही असे वाटत असेल, तर पटकन प्रॉपर्टीचा भाग विकून, कर्ज फेडून योग्य वेळी मोकळे व्हा. समाज व लोक काय म्हणतील म्हणून लाजेपोटी गप्प राहू नका. योग्य वेळी व पटापट निर्णय घेतल्यास व्याज व दंडही कमी बसेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मोकळे होऊन व्यवसायातील पुढील निर्णय घेऊ शकाल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे

    व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे

    एक बिल्डर आमच्याकडे आले. त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये ६० फ्लॅट विक्रीविना पडून होते. त्याचा खप लवकर व्हावा म्हणून त्यांनी विविध ठिकाणी केवळ एक महिन्यात १० ते १२ लाख रुपये खर्च केले; पण फ्लॅट काय विकले गेले नाहीत. काय चूक झाली त्यांची? म्हणतात ना, तूप खाल्यावर रूप येत नाही किंवा आज लावलेल्या झाडाला उद्या लगेच फळे लागत नाहीत. किंवा आज मेकअप करून उद्या कोण हिरॉईन होणार नाही, दिल्लीत यूपीएससीचा क्लास लावला म्हणून कोणी आयएएस ऑफिसर होणार नाही. जगात कोणताही रिझल्ट किंवा यश असे सहजासहजी मिळत नाही. बिझनेसचेही तसेच आहे, फक्त पैसा खर्च केल्यानेच काही होत नाही. मार्केटिंगची व ब्रँडिंगची नियोजनबद्ध प्रक्रिया पार पाडावी लागते. त्या त्या गोष्टीला कालावधी घ्यावा लागतो.

    आज १० किलो तूप प्यायल्यावर उद्याच्या उद्या कोण पैलवान होणार नाही. उलट आहे ती तब्येतही ढासळेल. पण त्याऐवजी त्याने रोज ५० ग्रॅम तूप प्यायले व १ तास व्यायाम केला तर त्याची तब्येत नक्कीच सुधारून तो पैलवान होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पुढे जाऊन तो रोज १०० ग्रॅम, २०० ग्रॅम असे तूप पिणे वाढवू शकतो. त्याचबरोबर त्याला व्यायामही वाढवावा लागेल. तसेच कोणत्याही व्यवसायात अचानक जाहिरातबाजी करून फायदा होत नसतो. तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला शास्त्रीय पध्दतीने ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्लॅनिंग करून राबवावे लागते. फ्लॅट खपत नाहीत म्हणून १० लाख जाहिरातींवर घालविले म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे. अगोदरच खप नाही, त्यात १० लाख वाया! व्यवसायात कोणत्याही नियोजनाशिवाय खर्च केलेला पैसा वाया जाऊन नुकसानीस सामोरे जावे लागते. आज जाहिरात केली आणि उद्या प्रॉडक्ट खपला एवढं सोपं नाही.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

    स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

    ध्येयनिश्चिती –

    शिस्त –

    ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती यांच्यामधील पूल म्हणजे शिस्त. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकते. मग तुमच्यामध्ये टॅलेंट असो वा नसो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी अतिशय शिस्तप्रिय असते. या व्यक्ती तिच्या आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे त्यांचे आऊटपुट हे आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्तच असते, कारण त्यांना आज काय करायचे याचा विचार करण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. त्यांचा प्लॅन हा आधीच ठरलेला असतो.

    जोखीम –

    आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजतेने मिळत नाही आणि जर तुमच्या नावाचा उल्लेख यशस्वी लोकांच्या यादीत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासमोर कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्हाला स्वीमर व्हायचे असेल, पण पाण्यात उतरायची भीती वाटते म्हणून तुम्ही पाण्यात उडीच मारली नाही, तर तुम्ही स्विमर बनू शकता का? अर्थातच नाही. म्हणून तुम्ही जे ध्येय निवडले आहे ते पूर्ण करण्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले तरी मागे हटू नका. जोखीम स्वीकारा आणि कार्य पूर्ण करून दाखवा.

    शिकाऊ वृत्ती –

    असं म्हणतात की, माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तो नेहमी कोणाकडून काही ना काही शिकत असतो. मग त्याचे वय 25 असो, 50 असो किंवा 70. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल, तर नेहमी अपडेटेड राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शिकाऊ वृत्ती असणं खुप गरजेचं आहे. जग काळानुसार बदलत असतं आणि या बदलत्या जगानुसार तुम्ही आम्ही देखील बदलणं गरजेच आहे. जर आपण प्रवाहानुसार चाललो तर किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर प्रवाहाबाहेर फेकले जाऊ. त्यामुळे या बदलत्या दुनियेनुसार इतरांकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकून स्वतःला जगावेगळे बनविण्यासाठी सज्ज व्हा.      

    वाचन: 

    प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन यशप्राप्ती करण्यासाठी आपले आयुष्य खुप छोटे आहे, त्यामुळे यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचे धडे घेऊन त्यांच्या अनुभवातून गोष्टी शिकल्या पाहिजे आणि यासाठी वाचन हा एकमेव पर्याय आहे. वॉरेन बफे दररोज न चुकता पुस्तकं वाचतात. कारण त्यांना माहीत आहे की; त्यांची संपत्ती हे त्यांचे सर्वस्व नाही, तर नॉलेज हेच सर्वस्व आहे. तुम्हाला जर त्यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असेल, तर दिवसातून निदान 10 पानं तरी वाचलीच पाहिजे. 

    आणखी वाचा

  • मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?

    मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?

    ) गर्भ व बाल संस्कार :

    लहानपणीच मुलांना श्रीमंतीच्या व यशस्वी उद्योजकांच्या गोष्टी सांगितल्या व दाखवल्या पाहिजेत, जसे जिजाऊंनी शिवबाला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू दिले. ज्यू, मारवाडी, गुजराती, पारशी लोक लहानपणापासूनच मुलांवर व्यवसाय करण्याचे संस्कार करतात. यामुळे मुलांना लहानपणापासून व्यवसायाविषयी आवड निर्माण होईल.

    ) शिक्षण :

    ) प्रयोग करा :

    हायस्कूल जीवनापासूनच छोट्या मोठ्या व्यवसायाचे प्रयत्न सुरू करा. दिवाळीत फटाके, फराळ, उन्हाळ्यात आंबे, लोणचे यांचे स्टॉल लावणे इत्यादी प्रयोग करीत रहा. मुलांना व्यापार म्हणजे काय असतो ते कळेल.

    ) वाचन :

    उद्योजकतेविषयी मासिके, पुस्तके, पेपर, लेख इत्यादी वाचण्यासाठी सतत घरात ठेवा. मोकळ्या वेळेत तुम्हीही वाचा व मुलांनाही वाचण्यास सांगा. वाचल्यामुळे विचार करण्याची पातळी वाढेल व त्यांना जग समजेल.

    ) भेटा :

    सेमिनार, कन्सलटंट, व्याख्याने, उद्योजक इत्यादींना जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मुलांसोबत भेटा. यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येईल, उद्योजक व श्रीमंत लोकही आपल्यासारखेच असतात, आपण जर मेहनत केली, तर आपणही उद्योजक होऊ शकतो असा विश्वास त्यांना येईल.

    ) पहा :

    टीव्ही, सिनेमा, डीव्हीडी, यूट्युबवर अनेक उद्योग व श्रीमंती विषयी कार्यक्रम येत असतात ते न चुकता कुटुंबासमवेत पहा, त्यातून माहिती मिळत जाईल.

    ) पैसे दाखवा :

    मुलांना पैसा काय असतो तो दाखवा. लपवून ठेवू नका. पगार आल्यावर पैशाचे गठ्ठे मुलांना दाखवा. दाखविल्यास पैसा कळेल व कमवण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल.

    ) जबाबदारी टाका :

    अगदी शालेय जीवनापासूनच हळूहळू थोडीथोडी जबाबदारी टाकण्यास सुरू करा. उदा. किराणा माल आणणे, भाजीपाला आणणे, शेतीकडे लक्ष देणे, बँकेचे लहानसहान व्यवहार इत्यादी.

    ) उठ-बस:

    मुलांना लहान समजू नका. कमी वयातच त्यांची मोठ्या व्यक्तीत उठ-बस जाणीवपूर्वक वाढवा. त्यामुळे मुलं लवकर मॅच्युअर (प्रगल्भ) होतील.

    १०) कल्पक :

    क्रिएटिव्हिटी हा जीवनाच्या प्रगतीचा पाया आहे. मुलांना कल्पक विचार करायला शिकवा. आयडियाज तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.

    ११) करिअर कौन्सेलिंग:

    मुलांची आवड, कला, कुवत व पालकांची शिक्षण, करिअरवर खर्च करण्याची तयारी यासर्वांचा विचार करून तज्ज्ञ व्यक्तीकडून करिअर सल्ला घेणे शक्य आहे.

    १२) लाज सोडून मेहनत :

    मेहनत करण्यासाठी लाज वाटता कामा नये, याची सवय तुम्ही मुलांच्यात लहानपणापासून लावली पाहिजे. पडेल ते काम करायची मुलांना सवय लावा. कुठलंही काम छोटं नसतं हे त्यांच्या मनावर बिंबवा. नाहीतर आज सुशिक्षित बेकार मुलं शेतात काम करायला लाजतात.

    १३) पर्सनॅलिटी (व्यक्तिमत्त्व) :

    प्रत्येक यशस्वी व्यक्तीची एक आकर्षक पर्सनॅलिटी असते ती तुमच्या मुलांची जाणून विकसित करा.

    १४) संवाद कौशल्य :

    शिक्षक व व्यवसायिक ठिकाणी प्रत्येक भेटीवेळी, फोनवर व ईमेल वर कसा संवाद साधावा याचे ज्ञान घ्या.

    १५) आर्थिक साक्षरता :

    मुलांचे बँकेत खाते काढा, पॅनकार्ड, शेअर मार्केट, एफ डी, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, व्याज, चक्रवाढ व्याज, व्हेंचर कॅपिटल इत्यादी अनेक बाबीची माहिती त्यांना करून द्या.

    १६) मोठी स्वप्ने जागवा :

    मोठा पैसा, बंगला, कार गाड्या, आलिशान ऑफिस अशा मोठ्या गोष्टींची स्वप्ने मुलांच्यात सतत जागवा. तशा प्रकारची पोस्टर्स, वॉलपेपर्स मुलांच्या खोलीत लावा.

    १७) सेल्समन बना :

    कोणताही यशस्वी उद्योजक व श्रीमंत व्यक्ती हा हाडाचा सेल्समन असतो हे लक्षात ठेवा. आपली वस्तू, सेवा, प्रोजेक्ट, ब्रँड सतत विकता आला पाहिजे. जसे पटेल लोकांबद्दल म्हटलं जातं ना, ‘पटेल्स आर बॉर्न टू सेल’ तेव्हा हाडाचे सेल्समन बना.

    १८) स्मार्ट गोल सेट करा :

    Specific, Measurable, Achievable, Realistic, Timely (SMART) असा प्रत्येक ५ वर्षांचा गोल सेट करा.

    19) संधी ओळखणे :

    संधी ओळखणे व ती व्यवहारात आणणे हा श्रीमंत व यशस्वी व्यक्तीचा गुण आहे तेव्हा मुलांच्यात संधी ओळखायला शिकण्याचे कौशल्य विकसित करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा