Category: स्टार्टअप

  • 2026 मधील Top Business Trends

    2026 मधील Top Business Trends

    AI & Automation

    AI शिवाय Business चालवणं आता कठीण होणार आहे. AI Chatbots मुळे Customer Support जलद होत आहे. Marketing, Design आणि Content AI मुळे सोपं झालं आहे. कमी खर्चात जास्त Productivity मिळते. प्रत्येक Industry मध्ये AI चा वापर वाढत आहे. AI वापरणारे Business भविष्यात अधिक स्पर्धात्मक ठरणार आहेत.

    D2C Brands & Personal Branding

    लोक आता दुकानापेक्षा Brand वर विश्वास ठेवतात. Instagram वरून थेट विक्री वाढत आहे. Personal Brand असलेल्या लोकांची Products जास्त विकली जात आहेत.

    Website + Social Media हे नवीन Business Model बनत आहे. Creator Economy मुळे हजारो नवीन Brands तयार होत आहेत. Premium Indian Products ची मागणी वाढत आहे आणि D2C (Direct-to-Consumer) Brands वेगाने वाढत आहेत. आज प्रत्येक Mobile हा एक Shop बनू शकतो.

    FinTech & Digital Payments

    आजकाल लोक Cash पेक्षा UPI वर जास्त विश्वास ठेवतात.

    • UPI Payments
    • Digital Lending
    • WealthTech
    • InsurTech
    • Business Payment Solutions

    भारतातील Digital Payment Ecosystem सतत विस्तारत असून FinTech मध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत.

    EV & Green Business

    पुढचं दशक Green Economy चं आहे.

    • Electric Vehicles
    • EV Charging Stations
    • Solar Energy
    • Eco-Friendly Products
    • Recycling Business

    सरकार आणि ग्राहक दोघांचाही Green Business कडे कल वाढतोय.

    Health, Wellness & Premium Products

    लोक आता किंमत नाही… Quality पाहून खरेदी करतात.

    • Healthy Food
    • Fitness Industry
    • Organic Products
    • Mental Wellness
    • Premium Indian Brands

    Health आणि Premium Category मध्ये ग्राहक जास्त खर्च करण्यास तयार आहेत.

    एक गोष्ट कायम लक्षात ठेवा…

    Market बदलत आहे… आणि त्याचबरोबर Business करण्याची पद्धतही!

    AI, D2C, FinTech, EV आणि Health Sector पुढील काही वर्षांत सर्वात मोठे Growth Drivers ठरणार आहेत.

    Business मध्ये सर्वात जास्त पैसा उत्पादनात नसतो… तो योग्य Trend वेळेवर ओळखण्यात असतो.

    Comment करा – यापैकी कोणता Trend सर्वात मोठा वाटतो?

  • Home Business Ideas for Women | घरबसल्या सुरू करा ५ भन्नाट व्यवसाय

    Home Business Ideas for Women | घरबसल्या सुरू करा ५ भन्नाट व्यवसाय

    Home Business Ideas: महिलांनो… तुम्ही रोज इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर रील्स स्क्रोल करण्यात किती वेळ घालवता? अर्धा तास, एक तास की दोन तास? विचार करा, जर याच स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही घरबसल्या महिन्याला चांगली कमाई करू शकलात तर?

    कारण आजच्या धावपळीच्या युगात घर सांभाळून ९ ते ५ ची नोकरी करणे अनेकींसाठी कसरत ठरत आहे. बॉसची कटकट, प्रवासाचा त्रास आणि कुटुंबाला वेळ न देता येणे, यामुळे अनेक महिला नोकरी सोडण्याचा विचार करतात. पण आर्थिक स्वावलंबनही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर डिजिटल युगाने तुमच्यासाठी अनेक सुवर्णसंधी आणल्या आहेत. आज आपण अशा ५ सुपरहिट गृहउद्योगांची (Home Businesses) माहिती घेणार आहोत, जे तुम्ही अगदी कमी भांडवलात घरातून सुरू करून महिन्याला उत्तम नफा कमवू शकता.

    १.होममेड आणि कस्टमाइज्ड फूड बिझनेस (Food Business)

    Home Business Ideas: खाद्यपदार्थांचा व्यवसाय हा कधीही मंदी न येणारा सदाबहार उद्योग आहे, कारण अन्नाची गरज कधीच संपत नाही. जर तुमच्या हाताला छान चव असेल, तर तुम्ही घरगुती मसाले, ताजी लोणची, कुरकुरीत पापड, सणासुदीला लागणारे मोदक किंवा मऊसुत पुरणपोळ्या बनवून विकू शकता. आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आणि नोकरी करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना शुद्ध, हायजिनिक आणि घरगुती जेवणाची प्रचंड गरज असते. अशा वेळी तुम्ही ‘हेल्दी टिफिन सर्व्हिस’ सुरू करून आयटी पार्क किंवा ऑफिस एरियातील लोकांना घरगुती डबे पुरवू शकता. याशिवाय वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी कस्टमाइज्ड केक्स आणि होम-बेकिंगलाही मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची गरज नसते, तुम्ही थेट तुमच्या किचनमधूनच अत्यंत कमी भांडवलात याची सुरुवात करू शकता.

    २. Digital Marketing and Social Media Management

    Home Business Ideas: आजच्या आधुनिक युगात अगदी लहान दुकानापासून ते मोठ्या ब्रँड्सपर्यंत प्रत्येकाला आपली ऑनलाईन उपस्थिती (Online Presence) निर्माण करायची असते. जर तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स बनवणे किंवा व्हिडिओ एडिटिंगची चांगली आवड आणि समज असेल, तर हा तुमच्यासाठी एक ‘हाय-पेइंग’ बिझनेस बनू शकतो. या व्यवसायांतर्गत तुम्ही स्थानिक कंपन्या, कपड्यांची दुकाने, ब्युटी पार्लर्स, तसेच डॉक्टर किंवा इंजिनिअर्स यांच्यासाठी सोशल मीडिया पेजेस मॅनेज करू शकता. त्यांच्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी कॅनव्हा (Canva) सारख्या सोप्या अ‍ॅप्सचा वापर करून पोस्ट डिझाईन करणे आणि त्यांचे रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ एडिट करून देणे, असे याचे स्वरूप असते. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसची गरज नसते फक्त एक चांगला स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि तुमची Creativity एवढ्याच गोष्टींच्या जोरावर तुम्ही घरबसल्या मोठी कमाई करू शकता.

    ३.कस्टमाइज्ड गिफ्ट्स आणि हॅँडिक्राफ्ट्स (Handicrafts & Gifts)

    Home Business Ideas: आजकाल बाजारात रेडीमेड किंवा मशीनवर बनवलेल्या वस्तूंपेक्षा हाताने बनवलेल्या, युनिक वस्तूंना (Handmade Products) खूप जास्त मागणी आहे. लोकांना आपल्या प्रिय व्यक्तींना काहीतरी वेगळे आणि खास गिफ्ट द्यायचे असते, ज्यामुळे या व्यवसायाला मोठी संधी मिळाली आहे. तुम्ही घरी बसून Resin Art चे की-चेन्स आणि फोटो फ्रेम्स, हाताने बनवलेली फॅशनेबल ज्वेलरी, सुगंधी मेणबत्त्या (Scented Candles) किंवा सणांनुसार खास कस्टमाइज्ड गिफ्ट हॅम्पर्स तयार करू शकता. हे प्रॉडक्ट्स दिसायला अत्यंत आकर्षक असतात आणि ग्राहकांना आकर्षित करतात. तुम्ही या वस्तूंचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढून तुमच्या इंस्टाग्राम पेजवर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लिस्ट करून थेट संपूर्ण देशभरातील ग्राहकांना विकू शकता आणि घरबसल्या चांगला नफा मिळवू शकता.

    ४.ऑनलाईन ट्युशन्स आणि स्किल्स क्लासेस (Online Tuitions)

    Home Business Ideas: तुमच्याकडे असलेले ज्ञान, शिक्षण किंवा एखादी कला हाच तुमचा सर्वात मोठा बिझनेस बनू शकतो, कारण आजच्या काळात शिक्षण हे केवळ शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादित राहिलेले नाही. जर तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल, तर तुम्ही प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिकवू शकता. शालेय विषयांव्यतिरिक्त इंग्रजी बोलणे (Spoken English), कोडिंग, गाणे, डान्स, चित्रकला किंवा अगदी ब्युटीशियन आणि मेहंदीचा कोर्स यांसारख्या कौशल्यांचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. Zoom किंवा Google Meet सारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही एकाच जागी बसून देश-विदेशातील विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकता. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पैशांची गुंतवणूक शून्य असते आणि नफा १००% असतो, कारण तुम्ही तुमची बुद्धी आणि कौशल्य विकत असता.

    ५. कपड्यांचा आणि फॅशन बुटिक व्यवसाय (Fashion Boutique)

    Home Business Ideas: फॅशन आणि कपड्यांची क्रेझ कधीच कमी होत नाही, त्यामुळे हा महिलांसाठी अत्यंत सुरक्षित आणि हमखास यशस्वी ठरणारा गृहउद्योग मानला जातो. हा बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच खूप मोठी गुंतवणूक करण्याची किंवा दुकान थाटण्याची गरज नसते. तुम्ही सुरत, मुंबई किंवा थेट मॅन्युफॅक्चरर (Manufacturer) कडून होलसेल दरात साड्या, कुर्तीज किंवा लहान मुलांचे कपडे आणू शकता. सुरुवातीला तुम्ही व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) ग्रुप्सच्या माध्यमातून या कपड्यांचे फोटो तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करून ‘रिसेलिंग’ (Reselling) सुरू करू शकता. जर तुम्हाला स्टिचिंग किंवा फॅशन डिझायनिंगची आवड असेल, तर तुम्ही युनिक डिझायनर कपडे शिवून देण्याचे बुटिकही घरी सुरू करू शकता. हळूहळू जसा तुमचा ग्राहकवर्ग आणि विश्वास वाढेल, तसे तुम्ही घरातच एक मोठे स्टोअर किंवा स्वतःची ऑनलाईन वेबसाईट सुरू करून मोठी झेप घेऊ शकता.

    महिलांनो, आजची स्त्री ही फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल युगाच्या या क्रांतीचा फायदा घ्या, तुमच्यातील सुप्त गुणांना ओळखा आणि आजच स्वतःचा एक छोटा गृहउद्योग सुरू करा. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या साम्राज्याची सुरुवात ही एका छोट्या पावलानेच होते. तुम्हाला या पाच व्यवसायांपैकी कोणत्या बिझनेसमध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा?

  • Startup Fail होण्याची ५ मोठी कारणे आणि त्यावरील उपाय

    Startup Fail होण्याची ५ मोठी कारणे आणि त्यावरील उपाय

    Startup: आजकालच्या तरुणाईमध्ये स्टार्टअप्स सुरु करायचा विचार खूप कॉमन झालाय. सध्या भारतात आणि जगभरात स्टार्टअप्सची (Startups) एक मोठी लाट आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एका आकडेवारीनुसार, सुरू होणाऱ्या एकूण स्टार्टअप्सपैकी तब्बल ९०% स्टार्टअप्स पहिल्या ५ वर्षांतच बंद पडतात.

    ऐकून धक्का बसला असेल पण सध्याच्या परिस्थितीत स्टार्टअप्सचे हेच भयाण वास्तव आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील की, कोट्यवधी रुपयांचं फंडिंग मिळवूनही किंवा अत्यंत हुशार डोकी एकत्र येऊनही बिझनेस अपयशी का ठरतात? जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप्स सुरू करण्याचा विचार करत असाल, किंवा तुमचा बिझनेस वाढवू इच्छित असाल, तर हा लेख तुमच्यासाठी गेम-चेंजर ठरू शकतो. आज आपण स्टार्टअप्स अपयशी होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर कशी मात करावी, हे अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

    स्टार्टअप अपयशी होण्याची प्रमुख कारणे

    बिझनेस अपयशी होण्यामागे केवळ नशीब कारणीभूत नसते, तर त्यामागे काही ठराविक चुकाही असतात ज्याकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो. 

    १. मार्केटमध्ये मागणी नसणे (No Market Need)

    अनेकजण मार्केटचा सर्व्हे न करता आयडिया चांगली आहे म्हणून स्टार्टअप्स सुरु करण्याचा विचार करतात आणि हेच स्टार्टअप बुडण्याचं सर्वात मोठं कारण आहे. अनेकदा संस्थापकाला (Founder) स्वतःची आयडिया खूप भारी वाटते. पण मला ही गोष्ट आवडते आणि मार्केटला या गोष्टीची गरज आहे यात खूप मोठा फरक असतो. जर तुम्ही बनवत असलेल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची ग्राहकांना गरजच नसेल, तर ते खरेदी कोण करणार? त्यामुळे सुरुवातीला मार्केटमध्ये ग्राहकांची डिमांड कोणत्या गोष्टीला आहे याचा अभ्यास करा. 

    २.पैशांचे चुकीचे नियोजन (Running Out of Cash)

    बिझनेसमध्ये ‘कॅश फ्लो’ (Cash Flow) हा रक्त्तासारखा असतो. जोपर्यंत पैसा खेळता आहे, तोपर्यंत बिझनेस जिवंत राहतो. अनेक स्टार्टअप्स सुरुवातीला मिळालेला पैसा ऑफिसच्या सजावटीवर, गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरती करण्यावर आणि नको तिथे मार्केटिंगवर उडवतात. परिणामी, जेव्हा खरोखर पैशांची गरज असते, तेव्हा खिसा रिकामा होतो आणि स्टार्टअप्स डबघाईला येतात. 

    ३. अयोग्य टीम (The Wrong Team)

    कोणत्याही बिझनेसचे साम्राज्य फक्त एका व्यक्तीवर टिकून राहू शकत नाही. त्यामुळे स्टार्टअपसाठी योग्य मानसिकतेची टीम लागते. जर टीममधील लोकांचे विचार जुळत नसतील, प्रत्येकाची दिशा वेगळी असेल किंवा त्यांच्यात आवश्यक कौशल्यांची (Skills) कमतरता असेल, तर तो स्टार्टअप पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो.

    ४. ग्राहकांकडे दुर्लक्ष आणि मार्केटिंगचा अभाव 

    तुमचे प्रॉडक्ट जगातील सर्वोत्तम असेल, पण जर ते ग्राहकांपर्यंत पोहोचवताच आले नाही, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगला हलक्यात घेतात. तसेच, सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा फीडबॅक न घेणे ही देखील मोठी चूक ठरते. यामुळे तुमचा बिझनेस लिमिटेड ग्राहकांपुरता मर्यादित राहतो. 

    ५.वेळेचे चुकीचे गणित (Bad Timing)

    तुम्ही मार्केटमध्ये कधी उतरताय याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही खूप आधी किंवा खूप उशिरा प्रॉडक्ट लाँच केले, तर अपयश नक्की असते. उदा. कोरोना काळाच्या आधी ऑनलाईन मिटिंग ॲप्सना इतकी मागणी नव्हती, पण योग्य वेळी म्हणजेच लॉकडाऊनमध्ये झूम Zoom ॲप अत्यंत यशस्वी ठरले. 

    स्टार्टअप्स अपयशी ठरू नये म्हणून काय करावं? 

    सुरुवातीला आपण स्टार्टअप्स अपयशी होतात याची थोडक्यात माहिती घेतली. मात्र आता स्टार्टअप्स फेल होऊ नये म्हणून कोणत्या उपाय योजना राबविल्या पाहिजेत यावर प्रकाश टाकूयात. कोणत्याही बिझनेसमध्ये आव्हाने तर येणारच, पण योग्य रणनीती आखली तर या आव्हानांवर सहज मात करता येते. खालील उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील.

    १. MVP मॉडेलचा वापर करा (Minimum Viable Product)

    सुरुवातीला अतिउत्साहात थेट मोठे प्रॉडक्ट बनवून मार्केटमध्ये उतरवण्याऐवजी आधी त्याचे एक छोटे किंवा कमी खर्चातील मॉडेल (MVP) बनवा. ते काही ठराविक ग्राहकांना वापरायाला द्या. त्यांचा फीडबॅक घ्या. ग्राहकांना ते आवडले किंवा त्याची मार्केटमध्ये डिमांड असेल तरच त्यावर मोठा खर्च करा. यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल.

    २.आर्थिक शिस्त पाळा (Financial Discipline)

    बिझनेसमधून येणारा प्रत्येक रुपया आणि जाणारा प्रत्येक रुपया याचा चोख हिशोब ठेवा. अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळा. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम कसे होईल (Bootstrapping) यावर लक्ष द्या. निदान पुढील ६ ते १२ महिने बिझनेस विनाअडथळा चालेल इतका बॅकअप फंड तुमच्याकडे असायलाच हवा.

    ३. अष्टपैलू आणि एकनिष्ठ टीम बनवा

    कोणताही स्टार्टअप्स सुरु करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे योग्य टीम असणे. कारण सुरुवातीला तुम्हाला अशा लोकांची गरज असते जे एकाच वेळी अनेक कामे सांभाळू शकतात. टीम निवडताना केवळ त्यांची पदवी न बघता, त्यांची काम करण्याची जिद्द आणि मानसिकता (Mindset) पहा. आणि हो टीममधील संवाद हा नेहमी पारदर्शक असला पाहिजे. जेणेकरून टीम बॉन्डींग वाढेल आणि संवाद स्पष्ट राहील. 

    ४. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवा (Customer-Centric Approach)

    एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचा बिझनेस ग्राहकांमुळे चालतो, तुमच्या आयडियामुळे नाही. ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत, हे समजून घ्या. त्यांच्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करा. कारण ग्राहक खूश असेल तरच तो स्वतःहून तुमच्या बिझनेसची ‘माऊथ पब्लिसिटी’ करेल.

    ५. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा (Pivot)

    Startup: बिझनेसमध्ये परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. जर तुमची मूळ आयडिया काम करत नसेल, तर त्यात बदल करायला घाबरू नका. इन्स्टाग्राम हे सुरुवातीला केवळ एक चेक-इन ॲप होते, पण फोटो शेअरिंगची क्रेझ पाहून त्यांनी आपला ट्रॅक बदलला आणि आज ते कुठे आहे हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे स्वतःच्या बिझनेसमध्येही वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. 

    मित्रांनो, स्टार्टअप सुरू करणे म्हणजे ‘रोलर कोस्टर राईड’ सारखे आहे. यात चढ-उतार येणारच. अपयश येणे म्हणजे सर्वकाही संपणे नव्हे, तर कोणती गोष्ट काम करत नाहीये हे शिकण्याची ती एक संधी असते. थोडक्यात सांगायचे तर जर तुमची आयडिया मजबूत असेल, टीम प्रामाणिक असेल, आर्थिक नियोजन चोख असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांच्या समस्येचे तुम्ही निवारण करत असाल, तर जगातील कोणतीही ताकद तुमचा स्टार्टअप यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. 

    तर मग, तुमची आयडिया घेऊन मार्केटमध्ये उतरायला तुम्ही तयार आहात का? लक्षात ठेवा, रिस्क घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही! हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा!

    आणखी वाचा

  • Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय.

    या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुमच्या नवीन व्यवसायाला योग्य मार्गदर्शन देण्यासोबतच आर्थिक पाठबळ देखील देतील.

    १) प्रधानमंत्री मुद्रा योजना

    प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSMEs) आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विशेषत: लहान आणि नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले भांडवल उपलब्ध करून दिले जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये:

    या योजनेत एकूण तीन प्रकारे कर्ज दिले जाते. 

    • शिशु (Shishu):  यात रु. 50,000 पर्यंतचे कर्ज नवीन उद्योजकांसाठी दिले जाते
    • किशोर (Kishore):यात  रु. 50,001 ते रु. 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 
    • तरुण (Tarun): यात  रु. 5 लाख ते रु. 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते

    प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?

    मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

    बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी आवश्यक माहिती विचारतील. या माहितीनुसार, तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाऊ शकते. उद्योगाच्या स्वरूपानुसार, शाखा व्यवस्थापक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासही सांगू शकतात. पीएमएमवाय योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही योजनेची अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता.

    या योजनेत  कर्ज प्राप्त करण्यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, कर्जावरील व्याजदर बँकांच्या धोरणांवर अवलंबून असतो. व्यावसायिक आवश्यकतांसाठी, जसे की मशीन खरेदी, कामगारांचे पगार, सामग्री खरेदी इत्यादीसाठी आपण हे कर्ज घेऊ शकतो. ही योजना लहान उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे, कारण यात कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळवता येते. विविध बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांकडून (NBFCs) आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

    २) पीएम स्वनिधी योजना 

    प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजना १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना (स्ट्रीट व्हेंडर्स) आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, या योजनेसाठी स्ट्रीट वेंडर जवळ महापालिकेने जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र जर स्ट्रीट वेंडर्स नोंदणीकृत नसतील, तर ते सुद्धा स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन तथा ऑफलाईन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज लाभार्थ्यांना एक वर्षाच्या आत सुलभ हप्त्यात किंवा कमी व्याजदरात परतफेड करावे लागते.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    कर्जाची उपलब्धता: या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना सुरुवातीला ₹१०,००० पर्यंतचे विना गॅरंटी कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास पुढील टप्प्याचे जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते.

    सुविधाजनक परतफेड: हे कर्ज १ वर्षाच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये परत करता येते. जर विक्रेत्यांनी हप्ते वेळेत भरले, तर त्यांना व्याजावर ७% सबसिडी मिळते.

    डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन: डिजिटल माध्यमातून व्यवहार केल्यास अतिरिक्त लाभ दिले जातात. UPI, डेबिट कार्ड, QR कोड इत्यादींच्या माध्यमातून व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

    क्रेडिट स्कोर सुधारणा: नियमित हप्ते भरण्यामुळे विक्रेत्यांचा क्रेडिट स्कोर सुधारतो, ज्यामुळे भविष्यात आणखी कर्ज घेणे सुलभ होते.

    रस्त्यावरील विक्रेते, ज्यांनी २४ मार्च २०२० किंवा त्याआधी व्यवसाय सुरू केला असेल, या योजनेसाठी पात्र आहेत. लायसन्सधारक विक्रेत्यांव्यतिरिक्त ओळखपत्र असलेल्या विक्रेत्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो.

    अर्ज कसा कराल ?

    Startup Yojana: पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना नजीकच्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.

    रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःच्या व्यवसायाची पुनर्बांधणी आणि विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. यामुळे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होत आहे. पीएम स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतात आणि आपला व्यवसाय  सुरू करू शकतात.

    ३) स्कील इंडिया डिजिटल हब (SIDH )

    स्कील इंडिया डिजिटल हब योजना ही भारत सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी युवकांना विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश भारतातील युवकांना नव्या डिजिटल युगाच्या मागणीनुसार सक्षम करणे आहे.

    योजनेची उद्दिष्टे

    डिजिटल कौशल्य विकास: युवकांना डिजिटल कौशल्ये शिकवून त्यांना रोजगारक्षम बनवणे.

    स्वयंरोजगाराची संधी: युवकांना विविध डिजिटल व्यावसायिक संधी निर्माण करण्यास प्रेरित करणे.

    कौशल्य प्रशिक्षण: ऑनलाइन माध्यमातून आणि क्लासरूम ट्रेनिंगद्वारे विविध कौशल्यं शिकवणे.

    उद्योगाशी संलग्नता: उद्योगांच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

    अर्ज करण्याची प्रक्रिया:

    यासाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी आवश्यक दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराला योग्यतेनुसार प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. ही योजना युवकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यातील डिजिटल जगात उत्तम संधी मिळतील.

    या योजनेअंर्तगत विविध कौशल्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध असते, तसेच वेगवेगळ्या डिजिटल कौशल्यांवरील ऑनलाईन कोर्सेसची सुविधा उपलब्ध असते.  प्रशिक्षणानंतर उद्योगांमध्ये इंटरशिप किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची संधी मिळते तसेच प्रशिक्षणानंतर सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळते.

    ४) स्टार्टअप इंडिया

    स्टार्टअप इंडिया योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी भारतातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. देशातील उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2016 रोजी या योजनेची घोषणा केली होती.  स्टार्टअप इंडिया योजनेच्या माध्यमातून सरकारने अनेक धोरणात्मक बदल केले, ज्यामुळे स्टार्टअप्सना अनुकूल वातावरण मिळाले. ही योजना देशातील बेरोजगारी कमी करणे, नवकल्पनांना  प्रोत्साहन देणे आणि आर्थिक विकासाला गती देणे या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित आहे.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    करभरण्यातून सूट: स्टार्टअप्सना तीन वर्षांसाठी करातून सूट दिली जाते. त्याचबरोबर, पात्र स्टार्टअप्सना Minimum Alternate Tax मध्ये सूट मिळते.

    स्वतःच्या संकल्पना आणि उत्पादने पेटंट करण्यासाठी सहाय्य: स्टार्टअप्सना जलदगतीने पेटंट अर्ज मंजूर होण्यासाठी सहाय्य दिले जाते. पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या फीमध्ये सवलत मिळते, तसेच सरकारतर्फे आर्थिक सहाय्यही दिले जाते.

    फंडिंग आणि गुंतवणूक सहाय्य: स्टार्टअप्ससाठी सरकारने ₹10,000 कोटींचा ‘फंड ऑफ फंड्स’ स्थापन केला आहे. या फंडाच्या माध्यमातून स्टार्टअप्सना भांडवल मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते. व्हेंचर कॅपिटलिस्ट्स, अँजेल इन्व्हेस्टर्स आणि बँका यांच्याकडून स्टार्टअप्सना गुंतवणूक मिळवण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते.

    मॅन्युफॅक्चरिंग आणि व्यापारातील सवलती: स्टार्टअप्सना सरकारच्या विविध निविदांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि खरेदीसाठी विशेष सवलती मिळतात. यामध्ये स्टार्टअप्सना मागील अनुभवाची किंवा टर्नओव्हरची अट लावली जात नाही.

    उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण: देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये आणि संशोधन केंद्रांमध्ये इनक्यूबेशन सेंटर स्थापन करून नवउद्योजकांना सहाय्य केले जाते. स्टार्टअप्ससाठी योग्य धोरणं तयार करून, यासाठी उद्योजकाना मार्गदर्शन केले जाते. 

    लायसन्सिंग आणि नियमातील सवलती: स्टार्टअप्सना विविध प्रकारची लायसन्स मिळवण्यासाठी कमीत-कमी  कागदपत्रांची आवश्यकता असते, तसेच ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होते. पर्यावरणीय आणि श्रम नियमांमधून काही सवलती दिल्या जातात, ज्यामुळे स्टार्टअप्सना व्यवसाय सुरु करण्यासाठी सहूलियत मिळतं असते.

    स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग: उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये स्टार्टअप कोर्सेस आणि प्रोग्राम्स सुरु करून उद्योजकतेची मानसिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

    योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    Startup Yojana: सर्वप्रथम, स्टार्टअप इंडिया पोर्टलवर स्टार्टअपची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी, PAN कार्ड, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, आणि संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असते. स्टार्टअप्सना डीपीआयआयटी (DPIIT) कडून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळवावी लागते. या मान्यतेसाठी स्टार्टअपने नवीन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या असाव्यात आणि कंपनीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे लागते.

    नोंदणी झाल्यानंतर, स्टार्टअप्स विविध कर लाभ, सवलती, आणि निधी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या ‘फंड ऑफ फंड्स’ आणि विविध वित्तीय संस्थांमधून गुंतवणूक मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. स्टार्टअप्सना इनक्यूबेशन सेंटर आणि इन्व्हेस्टर मॅचमेकिंग सेवांचा लाभ देखील घेता येतो.

    स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशभरातील नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली आहे. या योजनेमुळे उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन रोजगार निर्मिती, उत्पादनक्षमता वाढवणे, आणि जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढवण्यास मदत झाली आहे.

    ५) जागृती यात्रा 

    जागृती सेवा संस्थेने मध्य भारतातील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी जागृती यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेअंतर्गत उद्योजकांना एक अनोखी संधी मिळते. ज्यामुळे त्यांना प्रख्यात उद्योजकांशी भेटण्याची, व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची आणि जागतिक अनुभव मिळवण्याची संधी मिळते.

    यात्रेचे मुख्य उद्दिष्ट:

    जागृती यात्रा (JY): भारतातील टियर 2 (अधिक विकसित जिल्हे परंतु मोठ्या शहरांपेक्षा कमी) . आणि टियर 3 (कमी विकसित, आर्थिक आणि सामाजिक संसाधनांची उपलब्धता कमी असणारे जिल्हे ) जिल्ह्यांमधील उद्योजकांना पाठिंबा देणे.

    सहकार्य वाढवणे: उद्योजकांमध्ये नेटवर्किंग आणि सहकार्य वाढवणे, व्यावसायिक ज्ञान आणि संसाधनांची उपलब्धता.

    शिष्यवृत्ती अर्ज: यात आपल्यालाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. 

    विविध भारतीय प्रदेशांतून प्रवास करून सांस्कृतिक आणि भौगोलिक अनुभव मिळवयाचा असेल तर या यात्रेपेक्षा उत्तम पर्याय नाही. तसेच या ठिकाणी अनेक तज्ज्ञांच्या कार्यशाळा आणि सत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करता येते. व्यावसायिक कौशल्यं आणि नेटवर्किंगच्या संधी मिळवता येतात अनेक उद्योजक आणि सामाजिक बदल घडवणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येतो 

    तर मित्रांनो, हे काही प्रमुख उपक्रम आहेत जे नवउद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतात. या योजनांचा वापर करून, आपण आपल्या कल्पकतेला सकारात्मक दिशा देऊ शकता आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाऊ शकता. नवउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा फायदा करून घेतल्यास त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासास गती नक्कीच  मिळेल.

    आणखी वाचा

  • Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

    Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

    “बोलणाऱ्याचे हुलगेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही.” ही जुनी म्हण आजच्या स्पर्धेच्या युगात अधिकच प्रकर्षाने जाणवते. पूर्वीच्या काळी व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ किंवा टेलिव्हिजन हेच मर्यादित पर्याय होते. परंतु, गेल्या दशकात इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे आणि जगातील प्रत्येक व्यवहार आता डिजिटल स्क्रीनवर येऊन थांबला आहे. या बदलत्या जीवनशैलीतूनच जन्माला आली एक प्रभावी संकल्पना – डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing).

    डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? (What is Digital Marketing?)

    डिजिटल मार्केटिंग, ज्याला आपण ऑनलाइन मार्केटिंग (Online Marketing) म्हणूनही ओळखतो, ही इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची एक प्रगत कला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा (स्मार्टफोन, लॅपटॉप, सोशल मीडिया) वापर करून आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग.

    पारंपारिक मार्केटिंग (Traditional Marketing) मध्ये व्यावसायिक ग्राहकांकडे जात असे, पण डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राहक स्वतः आपल्या गरजांनुसार इंटरनेटवर शोध घेत व्यावसायिकांपर्यंत पोहोचतात. यात वेबसाईट (Website), सर्च इंजिन (Search Engine), सोशल मीडिया (Social Media), ईमेल (Email) आणि मोबाईल ॲप्स (Mobile Apps) यांसारख्या विविध चॅनेलचा वापर केला जातो.

    डिजिटल मार्केटिंगची मुख्य अंगे (Core Elements of Digital Marketing)

    डिजिटल मार्केटिंग हे केवळ फेसबुकवर पोस्ट टाकण्यापुरते मर्यादित नाही. यात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश होतो:

    • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization – SEO): गुगलवर जेव्हा कोणी काही शोधते, तेव्हा तुमची वेबसाईट पहिल्या पानावर दिसण्यासाठी केलेले तांत्रिक बदल म्हणजे SEO.
    • सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing – SMM): फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूबच्या माध्यमातून ब्रँडची जागरूकता (Brand Awareness) निर्माण करणे.
    • पे-पर-क्लिक (Pay-Per-Click – PPC): गुगल किंवा इतर प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवून त्वरित रिझल्ट (Results) मिळवणे.
    • कंटेंट मार्केटिंग (Content Marketing): ब्लॉग, व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करणे.

    आजच्या युगात डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व (Importance of Digital Marketing)

    कोणत्याही व्यवसायाला आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

    १. जागतिक विस्तार (Global Reach):

    पूर्वी एखादा छोटा व्यावसायिक फक्त आपल्या परिसरातील ग्राहकांना सेवा देऊ शकत होता. परंतु, डिजिटल मार्केटिंगमुळे आता कोल्हापुरातील उद्योजक अमेरिकेतील ग्राहकाला आपली उत्पादने सहज विकू शकतो. इंटरनेटने भौगोलिक मर्यादा पूर्णपणे नष्ट केल्या आहेत.

    २. खर्च-प्रभावीता (Cost-Effective):

    टीव्हीवर ३० सेकंदाची जाहिरात देण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत सोशल मीडिया किंवा ईमेल मार्केटिंग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येते. लहान स्टार्टअप्ससाठी (Startups) हे एक वरदान आहे.

    ३. टार्गेटेड मार्केटिंग (Targeted Marketing / Audience Targeting):

    डिजिटल मार्केटिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमची जाहिरात नेमकी कोणाला दाखवायची हे ठरवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा केकचा व्यवसाय असेल, तर तुम्ही तुमची जाहिरात फक्त तुमच्या शहरातील १८ ते ३५ वयोगटातील आणि ‘Foodies’ असलेल्या लोकांनाच दाखवू शकता. यामुळे पैशांचा अपव्यय टाळता येतो.

    ४. रिअल-टाइम रिझल्ट्स (Real-Time Results / Analytics):

    पारंपारिक जाहिरात किती लोकांनी पाहिली हे मोजणे कठीण असते. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला डॅशबोर्डवर लगेच कळते की तुमची जाहिरात किती लोकांनी पाहिली, त्यावर किती जणांनी क्लिक केले आणि किती लोकांनी खरेदी केली. या डेटाच्या (Data Analysis) आधारे तुम्ही तुमची रणनीती बदलू शकता.

    डिजिटल मार्केटिंगचे दूरगामी फायदे (Benefits of Digital Marketing)

    डिजिटल मार्केटिंग केवळ विक्री वाढवण्यासाठी नाही, तर एक ‘ब्रँड’ (Brand) तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

    रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (Return on Investment – ROI): इतर कोणत्याही मार्केटिंग माध्यमाच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवलेल्या पैशांवर मिळणारा परतावा जास्त असतो. कारण येथे आपण केवळ संभाव्य ग्राहकांवरच (Potential Customers) लक्ष केंद्रित करतो.

    ब्रँड जागरूकता (Brand Awareness): सातत्याने सोशल मीडिया वर दिसल्यामुळे लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडबद्दल विश्वास निर्माण होतो. लोक जेव्हा गुगलवर तुमच्या ब्रँडचे नाव शोधतात, तेव्हा तुमची विश्वासार्हता वाढते.

    ऑटोमेशन आणि कार्यक्षमता (Marketing Automation & Efficiency): चॅटबॉट्स (Chatbots) आणि ईमेल ऑटोमेशन (Email Automation) मुळे तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा व्यवसाय ग्राहकांशी संवाद साधू शकतो आणि ऑर्डर घेऊ शकतो. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कार्यक्षमता वाढते.

    थेट संवाद आणि फीडबॅक (Direct Engagement & Feedback): सोशल मीडियाद्वारे ग्राहक थेट आपल्या उत्पादनावर कमेंट किंवा रिव्ह्यू (Reviews) देऊ शकतात. हा फीडबॅक आपल्याला आपली सेवा सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे ग्राहक संबंध अधिक दृढ होतात.

    Digital Marketing आणि Artificial Intelligence (AI) (AI in Digital Marketing)

    आजच्या काळात Digital Marketing आणि Artificial Intelligence (AI) यांचे नाते अतूट झाले आहे. AI मुळे मार्केटिंग आता केवळ जाहिरात न राहता ती वैयक्तिक (Personalized) सेवा बनली आहे. चॅटबॉट्स (Chatbots) ग्राहकांच्या शंकांचे २४/७ निरसन करतात, तर ‘Predictive Analysis’ द्वारे ग्राहकाला भविष्यात काय हवे आहे, याचा अंदाज व्यावसायिक आधीच लावू शकतात. AI मुळे मजकूर लिहिणे (Content Creation), ग्राफिक्स बनवणे आणि मोठ्या डेटाचे विश्लेषण (Data Analysis) करणे सेकंदात शक्य झाले आहे. गुगल आणि फेसबुकचे अल्गोरिदम AI वापरून तुमची जाहिरात योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे जाहिरातीचा खर्च (Ad Spend) कमी होतो आणि ‘Return on Investment’ (ROI) वाढतो. थोडक्यात, डिजिटल मार्केटिंगमध्ये AI चा वापर करणे ही आता काळाची गरज असून, यामुळे व्यवसायाची अचूकता आणि वेग प्रचंड वाढला आहे.

    Digital Marketing आणि Artificial Intelligence AI AI in Digital Marketing

    भविष्यातील व्यवसायाचा आधार (Future of Business)

    डिजिटल मार्केटिंग ही आता एक चैन नसून ती काळाची गरज बनली आहे. लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यवसायाला टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल. तंत्रज्ञानाच्या या प्रवाहात जो व्यावसायिक स्वतःला अपडेट (Update) ठेवेल, तोच या स्पर्धेच्या युगात टिकेल. डिजिटल मार्केटिंग म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही, तर ती ग्राहकांशी नाते जोडण्याची एक नवी डिजिटल पद्धत आहे.

    तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platforms) न्यायचा आहे का? डिजिटल मार्केटिंगच्या या महासागरात स्वतःची नौका कशी वल्हवायची आणि प्रगती कशी साधायची, याबद्दल अधिक सखोल माहिती आणि स्ट्रॅटेजीज (Strategies) मिळवण्यासाठी, व्यवसायातील अशाच तांत्रिक आणि वास्तववादी अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला बुकमार्क (Bookmark) करा आणि पुन्हा नक्की भेट द्या!

  • Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

    Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ Maharashtra Bhushan Puraskar जाहीर केला आहे. यंदाचा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. राम वनजी सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. १९९५ पासून दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आतापर्यंत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, डॉ. रघुनाथ माशेलकर,  आशा भोसले, अशोक सराफ यांसारख्या २० दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.

    डॉ. सुतार यांचा या यादीत समावेश होणे, ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या लेखात आपण त्यांच्या जागतिक शिल्पकलेतील महत्त्वपूर्ण योगदानावर सविस्तर नजर टाकूया.

    शिल्पकलेचा जन्मजात वारसा

    डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्या गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करत असत, त्यामुळे लहानपणापासूनच राम सुतार यांना हस्तकलेची गोडी लागली. वडिलांसोबत शेतीची अवजारे तयार करणं, बैलगाड्या बनवणं, भिंतींवर चित्रं काढणं आणि मातीच्या वस्तूंना आकार देणं यामध्ये त्यांची कलात्मकता विकसित होत गेली.

    गावात शिक्षणाची नीट सोय नसल्यामुळे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नातेवाईकांकडे राहून पूर्ण केलं. लहानपणापासूनच कलेची आवड असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. तिथे शिकताना त्यांची शिल्पकलेची प्रतिभा अधिक खुलत गेली. १९५२ साली पदवी संपादन करताना त्यांनी मेयो सुवर्णपदक मिळवलं. याच संस्थेतील शिक्षणाने त्यांचं कौशल्य अधिक विकसित झालं आणि त्यांच्या कारकिर्दीला नवा आयाम मिळाला.

    शिल्पकलेचा वैश्विक प्रवास

    १९५४ मध्ये डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी छत्रपती संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीला सुरुवात केली. त्यांच्याकडे अजिंठा-वेरूळ येथील प्राचीन शिल्पांची देखभाल आणि पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी प्राचीन भारतीय शिल्पकलेचा सखोल अभ्यास केला, जो त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

    १९६० मध्ये त्यांनी चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळ चंबळ देवीचे भव्य शिल्प साकारलं. या कलाकृतीमुळे त्यांना संपूर्ण देशभरात ओळख मिळाली आणि एक कुशल मूर्तिकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढली. यानंतर त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढू लागली.

    डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. त्यांनी तयार केलेले पुतळे संसद भवन, राष्ट्रपती भवन, विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थळी प्रतिष्ठित आहेत. असंख्य मूर्ती आणि पुतळे  घडवून त्यांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर पोहचवलं आहे.

    स्टॅच्यू ऑफ युनिटी – एक स्वप्नपूर्ती

    डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी साकारलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी ही त्यांच्या शिल्पकलेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कलाकृती आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा आहे, जो जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. या भव्य शिल्पामुळे त्यांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि भारताच्या शिल्पकलेचा गौरव वाढला. हे शिल्प देशाच्या एकतेचं प्रतीक आहे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतं.

    लहानपणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची चित्रं पाहून त्यांच्या मनात अशीच भव्य मूर्ती घडवण्याचं स्वप्न निर्माण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करून त्यांनी हे स्वप्न साकार केलं. या पुतळ्यातील हावभाव आणि बारकावे अत्यंत काळजीपूर्वक घडवले गेले आहेत, ज्यामुळे सरदार पटेल यांचा व्यक्तिमत्त्वाचा भव्यपणा अधिक ठळक झाला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे भारताच्या शिल्पकलेचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.

    महत्त्वाची शिल्पकृती आणि कारकीर्द

    डॉ. राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार असून, त्यांनी आपल्या कलेत नेहमीच गुणवत्ता आणि नावीन्य जपले आहे. त्यांनी कधीही आपल्या कामाशी तडजोड केली नाही. त्यांचा स्टुडिओ आजही अनेक कलाकार, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांची प्रतिभा इतकी अद्वितीय आहे की, त्यांची तुलना जगप्रसिद्ध शिल्पकार मायकेल एंजेलो आणि रोडिन यांच्यासोबत केली जाते.

    त्यांनी ७५ वर्षांच्या कारकीर्दीत जगभर २०० हून अधिक व वेगवेगळ्या शिल्पकृती तयार केल्या आहेत. भारताच्या संसद भवन परिसरात त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, पं. नेहरू, इंदिरा गांधी, भगतसिंग आणि महात्मा फुले यांचे १६ भव्य पुतळे साकारले आहेत.

    डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही आपली कला पोहोचवली आहे. त्यांनी टोकियो येथे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा साकारला. तसेच, फ्रान्स, इटली, इंग्लंड, रशिया, अर्जेंटिना आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही त्यांच्या शिल्पकृती पहायला मिळतात. विशेष म्हणजे, त्यांनी महात्मा गांधींच्या ४५० हून अधिक मूर्ती जगभर उभारल्या आहेत.

    पुरस्कार आणि सन्मान

    डॉ. राम सुतार यांच्या अद्वितीय शिल्पकलेसाठी त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री, २०१६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या कलेची दखल संपूर्ण जगाने घेतली असून, त्यांनी आपल्या शिल्पकृतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.

    याशिवाय, फ्रान्समधील इकोले सुपीरियर रॉबर्ट डी सोरबोन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि कलासाधनेची आणखी एक मोठी पावती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार

    व्यक्तिगत आयुष्य 

    राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार हे देखील प्रसिद्ध मूर्तिकार आणि वास्तुविशारद आहेत. वडिलांच्या मार्गावर चालत त्यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले आहेत. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. आणि राम सुतार फाइन आर्ट्स प्रा. लि. या त्यांच्या कंपन्या आज जगातील सर्वात मोठ्या शिल्पनिर्मिती फर्म्सपैकी एक मानल्या जातात.

    नोएडा आणि गाझियाबाद येथील त्यांच्या अत्याधुनिक स्टुडिओ आणि फाउंड्रीमध्ये जर्मनीतील यांत्रिक रोबोट्स, सीएनसी मशीन यांसारखी आधुनिक साधने वापरून भव्य शिल्पं घडवली जातात. अनिल सुतार यांनी वडिलांसोबत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करून भारतीय शिल्पकलेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे.

    मित्रांनो, डॉ. राम सुतार यांचा जीवनप्रवास हा सातत्य, मेहनत आणि कलेसाठी समर्पणाचा उत्तम आदर्श आहे. वयाच्या शंभराव्या वर्षातही ते आपल्या कार्यात सक्रिय आहेत, हे त्यांच्या जिद्दीचं आणि कलेवरील प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणं, ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना खऱ्या अर्थाने “भारताचे सच्चे शिल्पकार” म्हणता येईल.

    आणखी वाचा:

  • महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

    महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे? 

    महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मात्र, आजही अनेक महिला आर्थिक मदतीअभावी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींना कौशल्य विकसित करून स्वावलंबी व्हायचं असतं. पण यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभाव अनेक महिलांसाठी मोठी अडचण ठरतो.

    याच गोष्टीची दखल घेत केंद्र सरकारने ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे त्या आपल्या कौशल्यांचा विकास करून अर्थपूर्ण उपजीविकेच्या संधी निर्माण करू शकतात. 

    एकीकडे राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक होत असताना, महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी ‘लखपती दीदी’ योजना सुद्धा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? तिचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो? योजनेचे स्वरूप काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेऊया…

    ही योजना नेमकी आहे तरी काय?

    ‘लखपती दीदी’ योजना म्हणजे महिलांसाठी स्वावलंबनाची नवी संधी आहे. ही योजना विशेषतः महिला बचत गटांशी जोडलेल्या महिलांसाठी आहे. सुरुवातीला त्यांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं, जसं की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी, व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधी कशा ओळखायच्या. यामुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं मार्गदर्शन मिळतं.

    प्रशिक्षणानंतर, या महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. याचा उपयोग त्या टेलरिंग, डबे बनवणे, किराणा दुकान, शेतीपूरक उद्योग किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. या कर्जावर कोणतंही व्याज नसल्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न येता  स्वतःचा व्यवसाय उभा करता येतो.

    या योजनेचा उद्देश काय आहे?

    ‘लखपती दीदी’ योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा आहे. केवळ घराची जबाबदारी न निभावता, महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, उत्पन्न वाढवावं आणि आत्मनिर्भर बनावं, असा या योजनेचा हेतू आहे. महिलांनी समाजात आत्मविश्वासाने उभं राहावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, हा या योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश आहे.

    या योजनेद्वारे सरकारने तीन कोटी महिलांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. व्यवसायाच्या माध्यमातून या महिलांनी दरवर्षी किमान एक लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवून यशस्वी उद्योजिका बनावं,असा प्रयत्न आहे. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि त्या आपल्या कुटुंबाच्या तसेच देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

    या योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं?

    जर तुम्ही महिला बचत गटाची सदस्य असाल आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर ‘लखपती दीदी’ योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून प्रथम कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, बाजारपेठेची समज कशी वाढवावी, आणि यशस्वी व्यवसाय कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन केलं जातं.

    प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, महिलांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी एक आराखडा (बिझनेस प्लान) तयार करून सरकारकडे अर्ज करावा लागतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर, सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. यासाठी अर्जदार महिला वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावं, आणि घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसेच, अर्जदार महिला बचत गटाशी जोडलेली असणं आवश्यक आहे.

    Navi Blogs Size 7 1

    अर्ज करताना काय कागदपत्रं लागतात?

    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • बँक पासबुक
    • उत्पन्नाचा दाखला
    • पासपोर्ट साइज फोटो
    • मोबाईल नंबर

    या योजनेत महिलांना कोणतेही व्याज न लागणारं कर्ज मिळतं आणि त्यासोबत मोफत कौशल्य प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे. सरकारची थेट मदत मिळत असल्यामुळे उद्योजिका होण्याचं त्यांचं स्वप्न आता सहज पूर्ण होऊ शकतं.

    आणखी वाचा :

  • अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला. त्याने  हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया. 

    जन्मजात संघर्ष

    श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं  उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.

    Srikanth Bolla Education 2024 05 0eaebd9d52503763ca585db10d960f22

    गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.

    सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे. ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.

    शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात 

    श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला  हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने  पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.

    तरीही, त्याला  विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला. त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि  विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा  पहिला  दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने  विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

    All you need to know about Srikanth Bolla

    भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका

    श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’

    आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.

    श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो  एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.

    असा सुरु केला यशाचा प्रवास 

    वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.

    1008738 srikanth bolla

    2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.

    श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.

    श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.

    आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला. 

    पुरस्कार आणि मानसन्मान 

    श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.

    त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली. श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.

    Srikant Bolla 6

    श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.

    आणखी वाचा

  • ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    इंटरनेटच्या आधारे चालणाऱ्या या माध्यम स्वरूपात काही क्षणांमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुमचा व्यवसाय काय आहे, कोणासाठी आहे, त्याची किंमत काय इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सर्वोत्तम साधन म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवत असताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी पक्की असली पाहिजे असं म्हणतात, मात्र मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊया…

    मार्केटिंग म्हणजे काय?

    एखादा विक्रेता जेव्हा त्याच्याजवळ असलेल्या सेवा आणि उत्पादनांचा प्रचार करतो तेव्हा त्याला मार्केटिंग करणं असं म्हणतात किंवा आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, त्यांची गरज काय आहे हे ओळखून त्यांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करणं याला मार्केटिंग म्हटलं जाऊ शकतं. तुमच्याजवळ असलेली वस्तू ग्राहकांच्या मनात उतरावी, त्यांच्या पसंतीस यावी आणि त्यांना वाटावं की आपली गरज इथेच पूर्ण होऊ शकते आणि त्यांना ती खरेदी करण्याची इच्छा व्हावी म्हणजेच सोप्या शब्दांत मार्केटिंग होय. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जाहिराती पाहिल्याच असतील जिथे डोळ्यांना भावणाऱ्या शब्दांमध्ये प्रॉपर्टीची जाहिरात केली जाते. ती जाहिरात वाचून आपल्या मनात देखील असंच एखादं घर असावं अशी इच्छा निर्माण होते आणि यालाच आपण मार्केटिंगची जीत म्हटली पाहिजे. 

    960x0 1

    व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग हा त्याचा अविभाज्य भाग ठरतो, कारण मार्केटिंगमध्ये एखादा उपक्रम यशस्वी बनवण्याची किंवा मुळापासून उखडून टाकण्याची ताकद असते. यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही वावरत असलेल्या बाजाराचा अभ्यास केला जातो, या अभ्यासामधून ग्राहकांची गरज ओळखायला मदत होते आणि सोबतच आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचं ढोबळ चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हा अभ्यास झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी विकणार आहोत, त्याची किंमत किती असेल, त्याचं पॅकेजिंग कसे असेल, देवाण-घेवाणीमधून आपण जास्तीत जास्त विक्री करून महसूल कसा उभा करू शकतो याची आखणी केली जाते. 

    मार्केटिंगमधल्या 4Ps कोणत्या?

    १) Product: कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग कॅम्पेन सुरु करण्याअगोदर विक्रेत्याला तो विकत असलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दल माहिती असली पाहिजे, कारण संपूर्ण कॅम्पेन याच उत्पादन किंवा सेवांवर अवलंबून असते. आपण विकत असलेल्या वस्तू ग्राहकांना कशाप्रकारे मदत करतील, आपण बाजाराची गरज पूर्ण करणारी वस्तू बाजारात विकत आहोत का याची माहिती विक्रेत्याला असली पाहिजे. 

    २) Price: विक्रेता विकत असलेल्या वस्तूची किंमत म्हणजे प्राईस. यामध्ये युनिटची किंमत, वितरणाचा खर्च, विपणनाचा खर्च इत्यादी घटक ग्राह्य धरले जातात. ग्राहकांकडून त्या वस्तूसाठी किती प्रमाणात मागणी आहे किंवा प्रतिस्पर्धी तीच वस्तू कोणत्या किमतीत विकतोय यांवर वस्तूची किंमत ठरते. 

    ३) Place: विक्रेता उत्पादन किंवा सेवा कशाप्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे याचा विचार देखील विपणनात केला जातो. आधी बऱ्यापैकी वस्तूंची विक्री प्रत्यक्षात व्हायची, मात्र आता सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात ऑनलाईन देखील वस्तू विकल्या जातात. 

    ४) Promotion: विक्रेता विकत असलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे प्रमोशन. जाहिरात, जनसंपर्क, सोशल मीडिया इत्यादींच्या मदतीने वस्तूंचा प्रचार केला जातो. 

    मार्केटिंगचे प्रकार किती आहेत?

    १) ब्लॉग मार्केटिंग: संबंधित ग्राहकांपर्यंत ब्लॉगिंगच्या माध्यमातून आवश्यक माहिती पोहोचवणे म्हणजे ब्लॉग मार्केटिंग होय. यामध्ये विक्रीसाठी निवडलेल्या वस्तूंची विशिष्ट माहिती दिली जाते. 

    २) इंटरनेट मार्केटिंग: आजच्या जगात अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणूनच उत्तमरित्या इंटरनेटचा वापर करून विपणन केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. 

    ३) प्रिंट मार्केटिंग: आपण जरी इंटरनेटच्या युगात वावरत असलो तरीही वर्तमानपत्र आणि मासिकांचा वाचकवर्ग आजही अफाट आहे आणि परिणामी लक्षवेधी छायाचित्रे, दर्जेदार लिखाण केल्यास वाचकांच्या मनात जागा निर्माण करता येते. 

    ४) सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात केला जातो याबद्दल विशेष काही नमूद करण्याची गरज नाही. लाखो, कोट्यवधी लोकं दर दिवशी हातात मोबाईल घेऊन वावरत असतात आणि म्हणूनच तांत्रिक जगात वावरत असताना सोशल मीडिया मार्केटिंग हा पर्याय उपयुक्त ठरतो. Instagram, Facebook, Twitter  यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करतात. 

    ५) व्हिडिओ मार्केटिंग: कदाचित तुम्हाला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या ‘Reels’ बद्दल माहिती असेल. व्हिडीओ मार्केटींगद्वारे अगदी ३० सेकंदांमध्ये अत्यावश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि तांत्रिक घटकांमुळे अधिक आकर्षकदृष्ट्या आपली गोष्ट मांडता येते. 

    ६) SEO मार्केटिंग: Pay-Per-Click या संकल्पनेवर आधारित चालणाऱ्या या उपक्रमात स्पर्धात्मक जगात वावरणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे स्वतःला ठेवण्यासाठी सर्च इंजिनला पैसे दिले जातात. वाचकांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, कंपनीची साईट उघडून बघावी म्हणून SEOची प्रक्रिया वापरली जाते. 

    मार्केटिंगची मदत घेतल्यामुळे तुम्ही कोणती उत्पादने विकत आहात याची सविस्तर माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. जास्तीत-जास्त लीड्स मिळवल्यामुळे दीर्घकाळासाठी ब्रॅण्डची विक्री वाढते. सध्या आपण शर्यतीच्या जगात वावरत आहोत. जिथे मार्केटिंगमधून मिळणाऱ्या मदतीची गरज सर्वाधिक आहे. अनेकवेळा तुम्ही मार्केटिंगच्या मदतीने स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू शकता, ज्यामधून नफा वाढतो.

    आणखीन वाचा:

  • शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

    शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

    आता जर का इतिहासात डोकावून पाहिलं तर पैशांचा शोध लागण्यापूर्वी लोक मालाची/वस्तूंची देवाण-घेवाण करून (Barter System Of Exchange) संसाराची गाडी ओढायचे याचा प्रत्यय येतो, त्यामुळे व्यवसाय हा आपल्या जगण्याचा भाग आधीपासूनच होता असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय उद्योजक विश्वात अनेक नावं जोडली गेली आणि त्यांपैकी गाजणारं आणि अनेक लोकांसाठी प्रेरणा बनलेलं एक नाव म्हणजे नमिता थापर होय… 

    काय आहे शार्क टॅंक इंडिया?

    नमिता थापर हे नाव ऐकलं की सर्वात अगोदर डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमावलेला कार्यक्रम; शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India). तुम्हाला माहिती आहे का? शार्क टॅंक हा काही प्रामुख्याने भारतीय कार्यक्रम नाही. वर्ष 2001 मध्ये जपानमधून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती, पूढे अमेरिकेमधील ABC वाहिनी आणि नंतर भारतात सोनी वाहिनीवरून याचे प्रक्षेपण व्हायला सुरुवात झाली. या कार्यक्रमात उद्योजक बनण्याची किंवा व्यवसाय वाढवण्याची इच्छा मनात घेऊन आलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मदत केली जाते आणि भारतात शार्क टॅंक इंडिया म्हटलं की, “So for that reason, I am OUT!!” म्हणणारी नमिता हमखास सर्वांना आठवते.

    80 81 2 sixteen nine 1

    नमिता थापर: बालपण आणि शिक्षण 

    एम्क्युअर फार्मासुटिकल्सची (Emcure Pharmaceuticals) सर्वेसर्वा आणि शार्क टॅंक या  कार्यक्रमामध्ये सर्वांची ‘Pharm’माँ’ बनलेल्या नमिताचा जन्म पुण्यातला. वर्ष 1977 मध्ये सतीश आणि भावना मेहता यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नमिता यांनी प्राथमिक ते थेट CA पर्यंतचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं आणि पुढे MBA चं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप घेतली, अमेरिकेतील प्रसिद्ध ड्यूक विद्यापीठातून नमिता थापर यांनी सदर पदवी प्राप्त केली असून परदेशातच त्यांच्या हेवा वाटावा अश्या करियरचा श्रीगणेशा झाला होता.

    करियरच्या सुरुवातीला उद्योजिका बनण्याच्या विचार कदाचित नमिता यांच्या मनात नसावा कारण एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा वर्ष त्यांनी अमेरिकेतील गायडंट कॉर्पोरेशनमध्ये कामाचा पक्का अनुभव कमावला आहे. 

    भारतात परतल्यानंतर एम्क्युअर फार्मासुटिकल्स हा त्यांनी निवडलेला दुसरा पर्याय होय. नमिता थापर यांचे वडील म्हणजेच सतीश मेहता हेच सदर कंपनीचे संस्थापक असल्याने नमिता यांच्यावर कोवळ्या वयातच व्यवसायाचे संस्कार झाले होते, आणि आत्ताच्या घडीला त्या कमावत असलेलं नाव हे याच पक्क्या शिकवणीचा परिणाम म्हणावा लागेल. आपण म्हणतोच ना, ‘जे पेरावं, तेच उगवतं’ नमिता थापर देखील याच उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण वाटतात. 

    व्यवसाय आणि शार्क टॅंक

    आपल्यापैकी अनेकजण नमिता थापर यांना ओळखतो ते शार्क टॅंकमुळे, त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात नसलेल्या नमिता या नेमक्या कोणत्या कारणाने व्यवसायाच्या दिशेने वळल्या असतील आणि शार्क टॅंकपर्यंत नेमकी कशी मजल मारली असेल हे प्रश्नचिह्न कायम राहतंच. तर सहा वर्ष अमेरिकेत नोकरी केल्यानंतर नमिता भारतात परतल्या. सतीश मेहता यांनी वर्ष 1981 मध्ये एम्क्युअर फार्मासुटिकल्सची स्थापना केली होती. सुरुवातीला चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) म्हणून व्यवसायात उतरलेल्या नमिता यांनी अथक मेहनत, परिश्रम आणि हुशारीच्या जोरावर फक्त काही काळातच कंपनीच्या एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर (Executive Director) ची धुरा सांभाळायला सुरुवात केली.

    भारताच्या इतिहासाची पानं उलटून पहिली तर घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला दिसतात, मात्र आताच्या घडीला त्याच महिला चूल आणि मुलासोबत स्वतःचे अस्तित्व देखील घडवतात, नव्हे इतरांना प्रोत्साहन देतात. खरोखर आपल्या भारताचं बदलणारं हे चित्र किती मोहक आहे. नमिता थापारच नाही तर त्यांच्यासारख्या अनेक महिलांचा हा प्रवास पहिला कि आपला देश खऱ्या अर्थाने सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे याची जाणीव होते आणि अभिमानाने उर भरून येतो. 

    namita thapar net worth 01

    शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमामुळे भारतीय व्यवसायांना किंवा उद्योगांना खऱ्या अर्थाने नाव आणि दर्जा मिळायला सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमन गुप्ता, अनुपम मित्तल, पियुष बन्सल, विनिता सिंग यांच्यासारखे विविध क्षेत्रातील उद्योजक नवख्या व्यवसायांना आर्थिक मदत तसेच मार्गदर्शनही करतात. नमिता थापर यांना कैकवेळा “ये मेरी एक्सपर्टरीज नाही, so for that reason I am out!” या त्यांच्याच वाक्यासाठी टार्गेट केलं जातं, किंवा सोशल मीडियाच्या जगात त्यांच्यावर अनेक मिम्स देखील बनवले जातात. सोशल मीडियावर अशा चर्चा रंगात असल्या तरीही नमिता थापर सलग तीन वर्ष या कार्यक्राचा भाग बनून राहिल्या आहेत आणि ही बाब नरजेआड करता येत नाही. नमिता यांची चालण्या-बोलण्याची पद्धत असुद्या किंवा व्यवसायातील त्याचा दांडगा अनुभव या सर्व घटकांमुळे नमिता अनेक जणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत एवढं मात्र नक्की. 

    महिला उद्योग आणि नमिता

    वरती म्हटल्याप्रामणे जुन्या भारतात महिलांना घराबाहेर पडत काम करण्याला परवानगी नसायची. जी स्त्री समाजाच्या विरुद्ध जात हे धाडस करू पाहायची तिला वाळीत टाकलं जायचं. महिलांचं काम म्हणजे केवळ घर सांभाळणं एवढ्यापुरतं मर्यादित करण्यात आलं होतं आणि परिणामी इच्छा, आवड आणि कौशल्य असूनही त्या केवळ चार भिंतींच्या आड दडून राहायच्या. शेकडो वर्षांनंतर का होईना पण देश बदलत आहे. नमिता आणि इतर अनेक महिला विविध क्षेत्रांमधून हे बदल घडवून आणत आहेत. 

    शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमानंतर नमिता थापर या नावामुळे भारतातील उद्योजक आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात धूम उडाली आहे. स्वतःच्या व्यवसायाला नवीन उंची देण्यासाठी नमिता यांनी HR, डोमेस्टिक मार्केटिंग (Domestic Marketing) आणि फायनान्स (Finance) या क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कंपनीने आत्तापर्यंत ३००० पेक्षाही अधिक वैद्यकीय प्रतिनिधींच्या द्वारे १ बिलीयन डॉलर्सच्या घरात योगदान दिले आहे. 

    शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून त्यांनी Brandsdaddy, Wakao Foods, Your Foot Doctor, Kabaddi Adda यांसारख्या अनेक स्टार्टअप्सना (Start-Ups) मदत केली. इनक्रेडिबल व्हेंचर्सच्या (Incredible Ventures) अंतर्गत तरुणांच्या मनात व्यवयसायची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुंबई, बंगलोर, पुणे आणि चेन्नई अश्या प्रमुख शहरांमध्ये नमिता मार्गदर्शनपर वर्ग राबवतात. या उपक्रमांमधून नमिता नवनवीन व्यावसायिक कल्पना तरुणांपर्यंत पोहोचवतात. शार्क टॅंकमध्ये त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा जर का तुम्ही आढावा घेतला तर त्या नेहमीच नाविण्याच्या शोधात दिसतात. 

    सोशल मीडियावर जरी आपण नमिता यांच्या “I am Out” या वाक्याची खिल्ली उडवत असलो तरीही यातून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे ती म्हणजे जर का अट्टाहासाने एखादी गोष्ट करूनही त्यातून आपलं नुकसानच होणार असेल तर अशी आव्हानं स्वतःवर ओढवूं घेऊ नये. “ये कचरा नही हैं, It has a lot of Potential” या वाक्याचा देखील नेटकऱ्यांनी चुकीचा अर्थ घेतला होता, मात्र इथे आपण समजून घेतलं पाहिजे कि एखादी गोष्ट जर का इतरांच्या कमी येत नसेल, तर ती कामाची नाही असं होत नाही, आपण स्वतःचे कौशल्य वापरून त्यामधून  नवनिर्मिती नक्कीच घडवून आणू शकतो. नमिता यांच्या सतत हसऱ्या चेहऱ्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जवळपास ६०० कोटी रुपयांची मालकीण असलेल्या नमिता थापर यांना आत्तापर्यंत इकॉनॉमिक टाइम्सच्या (Economic Times) ‘40 under Forty’ Award, Barclays Hurun Next Gen Leader Recognition, Economic Times 2017 Women Ahead List, World Women Leadership Congress Super Achiever Award अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 

    आणखी वाचा: