Author: naviarthkranti

  • अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ

    अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ

    तुम्हाला बिझनेस करायचा व वाढवायचा आहे, मग मोठी कामे मिळविण्यासाठी क्लायंटना कसे पटवायचे हे जमले पाहिजे. समोरचा माणूस  क्लाईंट असो, सप्लायर असो, कर्मचारी असो किंवा खबऱ्या असो, अशांना पटवायचे असेल, तुम्हाला हवी असणारी माहिती पाहिजे असेल, तर त्यांना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायला निमंत्रण द्या. चांगले थ्रीस्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, कॅफे किंवा अशा काही ठिकाणी. चांगलं रुचकर जेवण कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खाण्यासाठी तर कमवितो. जेवणासाठी एकत्र भेटल्याने संवाद चांगला वाढतो, संबध अधिक चांगले प्रस्थापित होतात.

    आज बिझनेस करण्यासाठी तुमच्यामधले व्यवहार कौशल्य, गट्स महत्वाचे आहेत. तुमचे ऑफिस, फॅक्टरी, कंपनी किती मोठी आहे कोणी विचारत नाही. तुम्हाला डील करता आली पाहिजे, मार्केटिंग जमले पाहिजे.  क्लाईंटबरोबर व्यवहार व संबध प्रस्थापित करता आले पाहिजेत. हे बिझनेस तंत्र तुम्हीही शिकून घ्या आणि आजमावून पाहा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?

    व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?

    शिवचरित्रातील एक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मोहिमेवर जाण्यासाठी खजिना कमी होता. छत्रपती असूनसुद्धा ते स्वतः सावकाराकडे गेले व म्हणाले मला २ लाख होनांचे कर्ज हवे आहे.

    सावकार म्हणाला, “कर्जदार म्हणून आलात की महाराज म्हणून?” महाराज म्हणाले, “कर्जदार छत्रपती म्हणून आलोय.”

    सावकाराने प्रश्न केला, “तारण काय ठेवणार? कर्ज द्यायचे म्हणजे तारण काहीतरी ठेवले पाहिजे.”

    त्यावर छत्रपती म्हणाले, “हे स्वराज्य तर रयतेचे आहे, मी काय तारण ठेवणार?”

    सावकार म्हणाला, “तारण तर ठेवावेच लागेल.”

    शिवाजी  महाराजांनी शेजारी पडलेली गवताची काडी उचलली त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं, “ही माझ्या स्वराज्यातील गवताची काडी आहे. ही तारण म्हणून घे आणि मला दोन लाख होनांचं कर्ज दे.”

    सावकाराने दोन लाख होनांचं कर्ज दिलं आणि ती गवताची काडी तारण म्हणून ठेवून घेतली.

    तेव्हा महाराज म्हणाले, “आम्ही गवताची काडी गहाण ठेवली होती, ती परत करा.”

    सावकाराने तिजोरीत ठेवलेली गवताची काडी बाहेर काढली आणि महाराजांच्या हातावर दिली आणि म्हणाला, “ही घ्या तुमची गवताची काडी”.

    त्यावेळी शेजारी उभा असलेला कोंडाजी महाराजांना म्हणाला, “महाराज, गवताची काडी ती, तीची किंमत काय! घेतली काय आणि न घेतली ती काय.” त्यावर महाराज म्हणाले, “कोंडाजी, ह्या स्वराज्यातील गवताची काडीसुध्दा कुणाकडे गहाण पडता कामा नये.”

    छत्रपतींच्या त्या गोष्टीवरुन व्यवहारातील सचोटीपण व ‘गवताची काडीसुध्दा परत घेतली’ हा पराकोटीचा स्वाभिमान आजच्या मराठी माणसाला शिकण्यासारखा आहे. कर्ज काढणे हा व्यवहाराचा भाग आहे, पण ते वेळेत फेडून आपली पत व स्वाभिमान ठेवणे तितकेच महत्त्वाचे, परंतु भ्रष्ट सहकार सम्राटांनी व उद्योगपतींनी जनतेचे व बँकांचेही पैसे बुडवून स्वतःबरोबर इतरांनासुद्धा व्यावसायिक क्षेत्रात बदनाम केले आहे. आपण मात्र सचोटीने आणि प्रामाणिकपणाने व्यवहार करून आपली पत कायम ठेवावी.

  • आकाशी झेप घे रे पाखरा… परदेशी शिक्षण

    आकाशी झेप घे रे पाखरा… परदेशी शिक्षण

    पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडून परदेशगमन करणे हा जणू सध्याचा ट्रेंडच झाला आहे. हे सर्व होत असताना नाण्याची दुसरी बाजूसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे, या आणि अशा ट्रेंडचा फायदा आणि गैरफायदा घेणारेसुद्धा अनेकजण आपल्याला दिसतील त्यासाठी अनेक गोष्टींचा नीट बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.

    सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतातील प्रमाण गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढलेले दिसते. नेमकी अशी काय कारणं आहेत ज्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत आहे. तर याचा थोडा सविस्तर विचार केला असता आपल्या हे लक्षात येईल की भारतातील शिक्षणपद्धती आणि परदेशातील शिक्षणपद्धती यामध्ये असणारा सगळ्यात मोठा फरक. परदेशात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परदेशाबद्दल भारतीय लोकांच्या मनात असलेले आकर्षण. खरंतर फक्त पाठयपुस्तकी ही शिक्षण पद्धत परदेशात मूळातच शिकवली जात नाही.

    संशोधन वृत्तीने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यात आपण आपले मत बनवत ज्ञानार्जन करायचे अशी शिक्षण पद्धत परदेशात पाहायला मिळते. तसेच परदेशात शिक्षण घेत असताना तुम्ही तुम्हाला जो हवा तो कोर्स निवडू शकता आणि त्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला परदेशात मिळते. भारतात अजून अशा प्रकारची स्थिती फार कमी ठिकाणी पाहायला मिळते.

    सर्वसामान्यपणे SAT, MCAT, LSAT, GMAT, GRE, IELTS आणि TOEFL अशा काही प्रवेश परीक्षा आहे ज्या तुम्हाला चांगल्या मार्काने पास करणे गरजेचे आहे. तसेच त्या त्या विद्यापीठाच्या याव्यतिरिक्त जर काही परीक्षा असतील, तर त्या सुद्धा नीट समजून घ्याव्या लागतील. परदेशात शिक्षण म्हणजे पहिला डोळ्यासमोर प्रश्न उभा राहतो तो आर्थिक. अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची ही बाजू आहे. एकदा ठिकाण नक्की झाले की त्या ठिकाणाचे चलन आणि त्याची तुलना भारतीय रुपयासोबत केली असता साधारण अंदाजे खर्च आपण काढू शकतो.

    आर्थिक बाजू फार मोठी वाटत असली, तरी अनेक परदेशी विद्यापीठे यासाठी शिष्यवृत्तीदेखील पुरवतात. हे सर्व करताना आपण मात्र चोखंदळपणे नीट सगळ्याचा अभ्यास करून परदेशी शिक्षणाचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.

    परदेशात शिक्षणासाठी वाढणारी मागणी पाहून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. खूप प्रकारची आमिषं दाखवून फसवणूक केली जाते या सगळ्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. फक्त परदेशात शिक्षण घेणे हा उद्देश न ठेवता त्यासोबतच नोकरीची त्या देशातील संधी पाहणे हे खूप गरजेचे आहे.

    अगदी शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे नक्की करता तेव्हा तुमचे ठिकाण पक्के झाल्यानंतर ज्या देशात आणि ज्या शहरात तुम्ही शिक्षण घेणार आहात, काही वर्षे राहणार आहात; तेव्हा त्या शहराची आणि देशाची संपूर्ण माहिती, कायदे आणि जीवनपद्धतीचा काही प्रमाणात अभ्यास करून जाणे गरजेचे आहे. जेणेकरून तिथे गेल्यानंतर तुम्हाला कमीतकमी अडचणींचा सामना करावा लागेल.

    आणखी वाचा

  • जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई

    जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई

    सध्याच्या जगात फक्त शिक्षण आणि डिग्री याचे जास्त महत्व न राहता, किती स्किल्स आहेत याला जास्त किंमत आहे. एक काळ होता जेव्हा आपण विचार करायचो, एकदा डिग्री मिळाली की नोकरी पक्की. पण मित्रांनो आता काळ बदलला आहे. आता कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्याकडे स्किल्स असणे महत्वाचे आहे. किमान स्किल्स असतील तर एखाद्या क्षेत्रात त्याआधारे इंटर्नशिप करून तुम्ही तुमचा जॉब पक्का करू शकता. तुम्ही जर आधीपासूनच नोकरी करत असाल तर काही एक्स्ट्रा स्किल्समुळे तुम्ही एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. तुम्ही शिक्षण घेत असाल तर अशा स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही पार्ट टाईम काम करून किंवा फ्रीलान्स काम करून पैसे कमवू शकता. 

    मित्रांनो काय करू शकतो हे तर आपण पाहिलं. आता आपण हे पाहणार आहोत यासाठी नेमके मार्ग कोणते कोणते आहेत आणि या सर्व मार्गांचा अवलंब आपण कसा करू शकतो. 

    इंटरनेटच्या या युगात सध्या रिसोर्स मिळवणे काही अवघड नाही आहे. इंटरनेटचा योग्य आणि पुरेपूर वापर करता आला, तर आपण नुसती कमाई नाही तर एक व्यवसाय उभा करू शकतो. एका सामान्य माणसाच्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची एक सर्वसामान्य यादी आपण तयार केली, तर त्यात सकाळी उठल्यापासून हेल्थ केअर, मॉर्निंग रुटीन, ब्रेकफास्ट, व्यायाम, जॉब, इव्हिनिंग रुटीन, रात्रीचे जेवण आणि झोपणे यासोबतच सुट्टीच्या दिवशी पर्यटन आणी मनोरंजन या साऱ्या गोष्टी येतात. या गोष्टींचा विचार केला तर फूड, आरोग्य, पैसा, मनोरंजन, पर्यटन, ई-कॉमर्स या सेक्टरमध्ये काम करून, त्याच्याशी संबंधित स्किल्स डेव्हलप करून आपण कमाई करू शकतो.

    आता या सर्वसामान्य सेक्टरचा विचार करता नेमके कोणते किमान स्किल्स आपण आत्मसात करणे गरजेचे आहे ते पाहूया. सध्याच्या काळात माणसाचे आयुष्य प्रचंड धकाधकीचे आणि व्यस्त होत चालले आहे. माणूस जगतो कमी आणि ट्रॅफिकमध्ये अडकतो जास्त. अशावेळी सर्व प्रकारचे सण समारंभ यासाठी लागणारी सजावट आणि डेकोरेशन, तसेच भेटवस्तू या सर्व गोष्टींचा आपण घरबसल्या व्यवसाय सुरु करू शकतो.

    मित्रांनो तरुण वय हे मोठमोठ्या रिस्क घेण्यासाठीच असते. याच वयात आपण मानसिकरित्या अनेक कौशल्ये विकसित करण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता ठेवत असतो. फक्त कमाईसाठी नाही तर व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी स्किल्स आजमावणे अत्यंत गरजेचे आहे. आपण नेहमी ऐकतो की माणूस आपल्या आयुष्याच्या शेवटर्यंत कायम विद्यार्थी असतो. म्हणूनच सतत शिकत राहणे आणि बदलत्या काळानुसार स्वतःला नेहमी अपडेट ठेवणे ही भविष्याची गरज आहे.

    आणखी वाचा

  • अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

    अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

    प्रिय  गुरुजी,
    
    सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
    नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
    हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
    मात्र त्याला हे देखील शिकवा,
    जगात प्रत्येक बदमाषागणिक      
    असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही
    स्वार्थी राजकारणी असतात जगात,
    तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
     असतात टपलेले वैरी,  तसे जपणारे  मित्रही,
    
    मला माहित आहे !
    सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत......... 
    तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
    घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
    आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
    
    हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा 
    आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला,
    तुमच्यात शक्ती असती तर .........
    
    त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा 
    आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
    गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
    त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
    
    जमेल तेवढं दाखवित चला त्याला,
    ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
    मात्र त्याबरोबरच,
    मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, 
    सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला,
    पाहू दे त्याला, 
    पक्षांची अस्मान भरारी ............
    सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
    आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
    
    शाळेत त्याला हा धडा मिळू दे,
    फसवून  मिळालेल्या यशापेक्षा,
    सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
    आपल्या कल्पना, आपले विचार,
    यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने,
    बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी,
    
    त्याला सांगा ................
    भल्याशी भलाईनं वागावं,
    आणि टग्यांना अद्दल घडवावी .
    माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
    जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
    सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी,
    पुढे हेही सांगा त्याला,
    ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
    पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
    आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
    
    जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
    हसत रहावं उरातल दुःख दाबून,
    आणि म्हणावं त्याला 
    आसवांची लाज वाटू देऊ नको.
    
    त्याला शिकवा .........
    तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला,  
    अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
    त्याला हे पुरेपूर समजवा की,
    करावी कमाल कमाई त्याने, 
    ताकद आणि अक्कल विकून,
    पण कधीही विक्रय करू नये, 
    हृदयाचा आणि आत्म्याचा.
    
    धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
    कानाडोळा करायला शिकवा त्याला.
    आणि ठसवा त्याच्या मनावर,
    जे सत्य आणि न्याय वाटते,
    त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
    त्याला ममतेनं वागवा,
    पण, लाडावून ठेवू नका.
    
    आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय 
    लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
    त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
    अन धरला पाहिजे धीर त्याने,
    जर गाजवायच असेल शौर्य .
    
    आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
    आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
    तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर, 
    
    माफ करा गुरुजी, 
    मी फार बोलतो आहे
    खूप काही मागतो आहे.........
    पण पहा........ 
    जमेल तेवढ अवश्य कराच,
    माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!!
    - अब्राहम लिंकन
    
    
  • १० वी आणि १२ वी नंतर काय?

    १० वी आणि १२ वी नंतर काय?

    करिअर म्हणजे नेमकं काय याच्याशी त्या वयात आपल्यला तसे देणेघेणे नसतेच, पण देणेघेणे असते ते आपल्या पालकांना. हो आपण तर मातीचा गोळा असतो, वाढत्या वयानुसार हा मातीचा गोळा घडत असतो, आपला इंटरेस्ट ठरवत असतो आणि या गोळ्याचे म्हणजेच आपले बारकाईने निरीक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पालकांची असते, जेणेकरून ते आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आकार द्यायला किंवा करिअरसाठी जास्त उपयोगी ठरेल. आयुष्याच्या एका टप्प्यावर करिअर निवडीची वेळ येते, पूर्णवेळ कोणत्या क्षेत्रात राहायचं हे समजण्यासाठी याची खूप मदत होते. याचे आणखी कारण असे आहे की, लहान वयात ग्रास्पिंग क्षमता उत्तम असते. अशा वेळी जे बिंबवले जातं, मुलं त्यानुसार घडत असतात.

    अनेकवेळा अनेक कारणांनी अशा पद्धतीची जडघडण करणं प्रत्येक पालकांना शक्य होत नाही. प्रसंग आणि परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे सगळं जुळून येईलच असे नाही, पण अशात हे काम आपल्या शाळेतील आपले शिक्षक नक्की करू शकतात. किंबहुना त्यांना कोणत्या मुलामध्ये काय क्षमता आहे याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहित असते. पालकांना शाळेनंतर करिअरच्या दृष्टीने त्यांची खूप मदत होऊ शकते.

    पहिल्या टप्प्यातील पालक ठीक आहेत, दुसऱ्या टप्प्यातील पालक तरी बरे म्हणता येतील, पण तिसऱ्या टप्पातील पालकांचा निर्णय म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क किंबहुना आयुष्याची जोखीम असू शकते. मुलांचं भविष्य एकतर उज्ज्वल होऊ शकतं, नाहीतर आयुष्यभर त्यांचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून करिअरची निवड करताना १०वी आणि १२वी च्या टप्प्यावर फार विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.

    मग निर्णय घ्यावा कसा? २१ व्या शतकात संपूर्ण जग एका क्लिकवर तुमच्या हातात आलेले असताना करिअरची अनेक दालनं तुमच्यासमोर आज खुली आहेत. काही वर्षांपूर्वी यासाठी खूप मर्यादा होत्या, पण तो काळ आता नाही राहिला. १०वी आणि १२वी नंतर आपल्या देशातील अलिखित नियमानुसार सर्वजण एकतर पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतात किंवा डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्ससाठी ॲडमिशन घेतात, पण ही मळलेली वाट सोडून काही वेगळं करू पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे. फक्त गरज आहे त्यांना विश्वासात घेण्याची आणि बळ देण्याची.

    आधीच सांगितल्याप्रमाणे कलचाचणी हा एक करिअर निवडीसाठी मदत करणारा पर्याय आहे. मग तुम्ही म्हणाल अहो सगळं समजलं, पण ही रिस्क घेण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या? तर त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण विचार घेतल्या पाहिजेत नक्कीच. त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते, ती त्या मुलाची मानसिक आणि शारीरिक क्षमता आणि इंटरेस्ट काय आहे. दुसरी मूलभूत गोष्ट म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या परिवाराची स्थिती उदा. भविष्यात त्याच्यावर घराची जबाबदारी किती काळात येऊ शकते. तिसरी आणि सगळयात मूलभूत गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती.


    आणखी वाचा

  • भारत ठरला किमयागार, दिला लाखो अमेरिकन लोकांना रोजगार!

    भारत ठरला किमयागार, दिला लाखो अमेरिकन लोकांना रोजगार!

    असे म्हंटले जाते २१ वे शतक हे भारताचे आहे. भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली झेप, स्वदेशीचा मोठ्या प्रमाणात केलेला स्वीकार आणि नवउद्योजकांना भारताने दिलेली चालना या सर्व धोरणांमुळे भारतात आणि भारताबाहेर, भारतीयांची झेप वाढलेली आहे. आजपर्यंत अनेक कारणांसाठी अनेक देशांवर अवलंबून असलेल्या भारताने आता मात्र धाडसी निर्णय घ्यायला सुरवात केली आहे.

    सध्या भारतीय कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपली गुंतवणूक वाढवताना आपल्याला दिसत आहेत आणि भारत सरकार त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करत आहेत. इतकेच नाही नुकतेच भारतात सुरु झालेले ॲपलचे स्टोअर. याआधीच ॲपलने प्रयत्न सुरु केले होते पण भारताच्या बदललेल्या पॉलिसीज ज्यामध्ये भारता बाहेरून भारतात येणाऱ्या कंपन्यांना त्याचे प्रॉडक्टची काही प्रमाणात निर्मिती भारतात करणे बंधनकारक आहे. या पॉलिसीमळे भारतात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे. भारतीय व्यावसायिकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

    भारतातून एक्स्पोर्ट होणाऱ्या वस्तू आणि पदार्थांना आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त प्राधान्य मिळेल. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांमध्ये वाढती मागणी पाहून इतर लहान राष्ट्रांमध्ये भारतीय वस्तूंची मागणी अजून वाढू शकते. भारतात तयार होणाऱ्या कच्च्या मालाचे उत्त्पन्न नक्कीच वाढू शकते. त्यासोबतच तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

    एका अहवालानुसार १६३ मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या कंपन्यांनी सीएसआरवर १८.५ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिकेतील विविध संशोधन आणि विकास प्रकल्पांवरही कंपन्यांनी १ अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. या सगळ्यामुळे अमेरिकेशी भारताचे संबंध अजून जास्त दृढ होणार आहेत. अनेक भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात IT क्षेत्रात काम करत आहेत त्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध अजून मजबूत होणे फायद्याचे ठरणार आहेत.

    एका आकडेवारीनुसार टेक्सास २०,९०६, न्यूयॉर्क १९,१६२, न्यूजर्सी १७,७१३,  वॉशिंग्टन १४,५२५, फ्लोरिडा १४,४१८, कॅलिफोर्निया १४,३३४, जॉर्जिया १३,९४५, ओहायो १२,१८८, मोंटाना ९,६०३, इलिनॉएस ८,४५४ इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झालेली आढळते. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात या अहवालाचे प्रकाशन केले. ज्याला भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

    अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

    एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन एक सायकॉलॉजिस्टला भेटायला गेले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवर्गीय होतं; पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी, व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. त्या सायकॉलॉजिस्टनं त्यांना विचारलं की, ‘इतके वर्ष का नाही आलात भेटायला?’ तर म्हणाले, ‘आम्ही विचार करत होतो जाऊया की नको.’

    ज्यांना कुणाला असा ओव्हर थींकिंगचा प्रॉब्लेम आहे, तो लवकर ओळखा, कारण हा पूर्ण आयुष्य बरबाद करणारा खतरनाक विषाणू आहे. याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीला फाटे फोडणे, इतरांना मत विचारणे व त्यावर पुन्हा विचार करणे, नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करणे. याचे दुष्परिणाम म्हणजे कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत न पोहचणे, त्यामुळे कोणतीही ॲक्शन न घेणे, गोष्टी उगीचच अवघड करणे, सतत भीतीच्या भावनेत राहणे, आत्मविश्वास कमी कमी होत जाणे, डिप्रेशन वाढणे, शारीरिक थकवा वाढणे व हे अती व सतत काही महिने होत राहिल्यास जीवन निरुत्साही होऊन मनोरुग्ण होण्याचीही शक्यता असते.

    ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, त्याने अतिविचाराच्या रोगापासून दूर रहावे. जे काही करायचं आहे, त्याचा थोडा विचार करा, निर्णय घ्या, झटपट कामाला लागा. हातात काम असेल, तर विचार करायला वेळ मिळत नाही. विचार करत बसला की, हाताला काहीही मिळत नाही, मग आयुष्यभर सुशिक्षित बेकार ही पदवी कायम राहते. त्यामुळे अतिविचार करणे टाळा. काय ते लवकर निर्णय घ्या, ठरवा आणि कामाला लागा. स्वत:चे व इतरांचे डोके खाऊ नका. नाहीतर आयुष्यभर बेकारी व अविवाहितपणा तुमच्या नशिबी नक्कीच आहे. म्हणून रतन टाटा म्हणतात, ‘निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे, हे सुध्दा कधीकधी अधिक बरोबर ठरते. मी आधी निर्णय घेतो, मग तो खरा ठरवतो.’

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    पहिलं जीभेवर साखर :

    सतत गोड बोलणे, मृदुभाषा, आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत, चहापान वगैरे इत्यादींमुळे माणसाचे संपर्क वाढतात, संबंध सलोख्याचे बनतात. गोड, मृदु व समजूतदारपणे बोलणार्‍याबरोबर ग्राहकांना व्यवहार करावासा वाटतो. गोड बोलणार्‍या दुकानदाराचे दुकान इतरांपेक्षा निश्चित अधिक चालते. गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी बर्थडे, अभिनंदन असे प्रशंसेचे उद्गार काढण्यास किंवा तसा एखादा व्हॉटसअप मेसेज पाठवण्यास काय तोटा होतो? मग गोड बोलण्याची सवय लावून घ्या ना! सतत उद्धट भाषा, शिवीगाळ, वादविवाद, चिडचिड अशा प्रकारच्या वागण्याने माणूस कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही.

    दुसरी डोक्यावर बर्फ :

    उद्योग तर सोडा, पण आता सर्वसामान्य जीवनसुध्दा प्रचंड तणावाचे झाले आहे. आयुष्यात येणार्‍या ताणतणावाच्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी डोके अतिशय शांत असणे महत्वाचे आहे. मोबाईल तापला की हँग होतो, तसे डोके गरम झाले की बुध्दी चालत नाही आणि बुध्दी चालायची बंद झाली झाली की सगळं संपलं. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवूनच जीवनात व व्यवसायात वावरले पाहिजे, तरच तुमची आयुष्यात प्रगती होत जाईल. तापट स्वभावाच्या माणसाचा काही दिवसात सत्यानाश होऊन तो शेवटी मागे पडून गरिबीच्या खाईत लोटला जातो.

    तिसरी मेंदूत आयडिया :

    आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी केवळ पारंपारिक पध्दतीने जगणे आता कालबाह्य झाले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत नवीन नवीन आयडियांचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रोडक्ट, सेवांमध्ये चांगला फायदा आहे, भविष्यात कोणत्या जागांचे भाव वाढतील, मार्केटिंग करताना काय करावे म्हणजे फायदा वाढेल, कोणत्या व्यक्तीशी संपर्क कुठे व कसा साधावा म्हणजे आपणास फायदा होईल, कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी म्हणजे फायदा होईल, ई-कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून काय करता येईल का? असे मेंदूत सतत आयडियांचे मंथन सुरू पाहिजे.

    चौथी हातात काम :

    श्रीमंत होणार्‍या व प्रचंड यशस्वी होणार्‍या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ६ वाजता उठल्यापासून ते रात्री १२ वाजता झोपेपर्यंत त्यांच्या हाताला काही-ना-काही काम असते. आपला व्यवसाय, व्यवहाराचा व्यापच येवढा पाहिजे, की तुम्हाला सतत काम असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजक एकाच वेळी १० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. हातात काम नसणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे लक्षण आहे. ज्यांच्या हाताला आज काम नाही म्हणजे, तो लवकरच मार्केट बाहेर पडून होऊन मागे पडेल. काम नसेल तर काम शोधून काढले पाहिजे :

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान

    कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान

    एका गावात एक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते. गेली ३ ते ४ वर्ष त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता. रोजचे पेशंट ५० ते ६० वरुन फक्त २० ते २५ वर आले होते. त्यांचे वय ५०च्या पुढे होतं. तसं म्हणावं, तर ते मागच्या पिढीचे डॉक्टर. त्यांच्या आजूबाजूला नवीन डॉक्टरांचे दवाखाने सुरू झाले होते, त्यांचे दवाखाने चालायला लागले, पण यांचा धंदा कमी झाला होता. आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचे क्लिनिक पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती, ती म्हणजे हे महाशय नको तेवढे कंजूष होते. तपासणीचा टेबल, बसण्याचं बाकडं, खुर्च्या त्याच २० ते ३० वर्षापूर्वीच्या. रिसेप्शनिस्टसुध्दा एकदम लो प्रोफाईल. त्यांना धड चांगल्याप्रकारे संवादही साधता येत नव्हता. त्या बऱ्याच वेळी घरच्या कामानिमित्त गैरहजर असत. कमी पगारात काम करते म्हणून त्याच रिसेप्शनिस्टला ठेवलं होतं. क्लिनिकमध्ये पेपर नाही, की पाणी पिण्याची सोय नाही, आरोग्याशी संबंधित माहिती देणारे पोस्टरही नाहीत.

    क्लिनिकमध्ये एखादी एखादी तपासणीची आधुनिक मशीन आणलीत तरी फरक पडतो. साधा ॲप्रन स्वत: व रिसेप्शनिस्टला वापरायला दिला तरी फरक पडतो. औषध ठेवण्याचा चांगला रॅक, बाहेर चांगली पोस्टर्स, चांगले इंटेरिअर करून क्लिनिकला जाणारा डॉक्टर समाजाच्या दृष्टीने हुशार असतो, प्रत्यक्षात कदाचित वेगळंही असू शकतं. पण तो व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे व्यवसायाची जागा अधिक आकर्षक कशी दिसेल याचा विचार करा आणि तसे बदल करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा