Author: naviarthkranti

  • आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    प्रत्येकाला आपल्या जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जावे लागत असतं. मग ते प्रसंग आनंदाचे, दुःखाचे, धैर्याचे, भीतीचे, जबाबदारीचे कोणतेही असू शकतात. या सर्व प्रसंगाचे अस्तित्व म्हणजेच माणसाचे जीवन होय. अपेक्षित यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे निर्णयक्षमता. जरी आपण आत्मविश्वासाला यशाची गुरुकिल्ली म्हटलं, तरी निर्णयक्षमता हेच यशाचं रहस्य असतं. जेव्हा आपण एखादी कृती करण्याचा निर्णय घेऊ तेव्हाच ती पूर्णतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होईल.. नाहीतर जर तुम्ही निर्णयच नसेल घेतला तर यश अपयश लांबच्या गोष्टी.  

    मंडळी, तुम्ही जर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीनुसार काम करत गेला ना, तरंच तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकता. सिद्धार्थने जर आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचाच मार्ग अवलंबला असता, तर तो युगप्रवर्तक गौतम बुद्ध कधीच बनला नसता. आपला एखादा लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जसे महाभारतातील दोन वेगवेगळ्या निर्णयांची आपण अजूनही चर्चा करतो. एक योग्य निर्णय म्हणजे अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षात घेणे आणि दूसरा अयोग्य निर्णय दुर्योधनाने कृष्णाकडे सैन्याची मागणी करणे. एकाच परिस्थितीतील या दोन निर्णयांनी एकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले तर दुसऱ्याचे समृद्ध.

    आणखी वाचा

  • तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

    तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

    We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवतो, त्यापैकी सरासरी पाच लोकांप्रमाणेच आपणही बनतो.

    साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली. तो कुंभार म्हणाला, “महाराज, तुम्हाला हवं असेल, तर चांगलं मडकं घेऊन जा. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?” ते म्हणाले, “देणार असशील तर हेच दे. नाहीतर चाललो मी!” नाईलाजास्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं. त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासाने, संत समागमाने देवकार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायचे तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं.

    आर्थिक परिस्थिती, काही गोष्टीत कमीपणा, संधीचा अभाव जरी असला तरी तुमच्याकडे जे कौशल्य असेल, त्यानुसार मिळेल ती संधी घेऊन चांगल्या लोकांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न करा. जसे परिसाला लोखंड लागले, की त्याचे सोने होते. तसेच तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण किंवा अवगुण तुमच्यात उतरत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.

    संगतीचा परिणाम एकदम थोडक्यात सांगायचा म्हणजे;

    जर तुम्ही ५ हुशार लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे हुशार तुम्ही असाल…

    जर तुम्ही ५ यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल…

    जर तुम्ही ५ करोडपती लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे करोडपती तुम्ही असाल…

    आणि जर तुम्ही ५ टवाळ लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे टवाळखोर तुम्ही असाल…

    आणखी वाचा

  • यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोकं शांत पाहिजे

    यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोकं शांत पाहिजे

    चीनमधील एक प्रसिध्द दंतकथा आहे. एक क्रूर सम्राट राजा चुंग लुई, चीनमधील एका मागून एक लहान राज्यं काबिज करतो. ‘तुम्ही मला शरण या, नाहीतर मरणाला सामोरे जा ‘असा त्याचा आदेश असे. काही छोट्या राजांनी लढून प्राण गमावले, तर काही जीवाच्या भीतीने शरण येऊन गुलाम झाले. जेव्हा चुंग लुईचे आक्रमण मींगझु या राणीच्या राज्याच्या सीमेवर येऊ ठेवलं, तेव्हा राणी मिंगझुला काय करावं सुचेना, इतक्या बलाढ्य राजासमोर आपला टिकाव लागणार नाही, तेव्हा आपल राज्य वाचवायचं कसं याची तिला चिंता लागली.

    राणी नकाशा घेऊन तंबूत आली. तो गोल गुंडाळलेला होता. तिने तो टेबलावर ठेवला आणि हळूहळू उघडू लागली, राजाची उत्सुकता वाढीस लागली, किती खजिना मिळतोय ह्या विचारानं तो आनंदी झाला होता, पण चाणाक्ष राणीने त्या नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती, नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजाच्या ध्यानीमनी नसताना त्याचे शीर धडावेगळे करुन त्याचा वध केला. सगळीकडे हाहाकार माजला, सैन्य पळू लागले. राणीच्या सैन्यांनी हल्ला चढवून लुईचे सैन्य पळवून लावले व अशा रीतीने राणी मींगझुने आपले राज्य वाचवले.

    आज मराठी माणसाकडे मोठे भांडवल नाही, खूप चांगले शिक्षण नाही, अनुभव नाही. उद्योग व व्यवसाय करायचा म्हटलं तर बलाढ्य भांडवलदार यांच्याशी स्पर्धा आहे. तेव्हा आपण आपला उद्योग अशा कल्पक आयडिया शोधून शांत डोक्यानं केला पाहिजे. चाणाक्षपणे गनिमी काव्यानं विजय मिळविण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. डोकं शांत ठेवलं, तरंच ते चालेल आणि आयडिया सुचतील.

    आणखी वाचा

  • ३. शिकण्याच्या पध्दती

    ३. शिकण्याच्या पध्दती

    या दोन शिक्षण पध्दतीतील उपयुक्त शिक्षण पध्दती कोणती? आपल्याला कोणत्या शिक्षणपध्दतीचा फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. पूर्वापार चालत आलेल्या गुरुकूल शिक्षणपध्दतीत जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात टिकून राहण्याची कला प्राप्त होत असे. अनेक जीवनदायी तत्त्वे त्यातून मिळत असत. सामाजिक जीवनातील दुर्बल व्यक्तित्वाचा अभाव नष्ट करुन चांगला माणूस घडवण्याचे काम या गुरुकूल पध्दती मध्ये केले जात असे. चारित्र्यवान किंवा शीलवान नागरिक गुरुकूल शिक्षणपध्दतीचे फलित होत. शतकानुशतके चालत आलेली ही शिक्षणपध्दती इंग्रजांच्या राजवटीत नामशेष झाली. माणसातील जगण्याची उमेद कमी करणारी नवी शिक्षणपध्दती आपण स्वीकारली. त्यातून उत्तम नोकरदार लोक निर्माण होऊ लागले. नेतृत्वक्षमता लोप पावू लागली, उद्योजकतेचा ऱ्हास होत गेला. (एका आकडेवारीवरुन १७ व्या शतकापर्यंत जगातील एकूण व्यापारी उलाढालीत भारतीयांचा वाटा हा २२ टक्के होता. तो आजघडीला २ ते २.५ टक्क्यापर्यंत घसरला आहे.) अलिकडे जे उद्योजक अथवा नेते तयार झाले त्यात त्यांच्या कर्तृत्वाचा वाटा मोठा आहे. शिक्षणपध्दतीचा वाटा तुलनेने लहान आहे. 

    गुरुकूल पध्दती अतिशय चांगली शिक्षण पध्दती होती. तिचे गुणगान करण्याची मानसिकता खूप लोकांमध्ये आहे. मात्र ती आजच्या काळात वापरात आणणे शक्य आहे का? याचा विचार करणे सुध्दा गरजेचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक मिळण्याची शक्यता जास्त आहे. चांगली पध्दती राबवता येणे शक्य नाही. आहे ती शिक्षणपध्दती जीवनसंग्रामाला लायक बनवू शकत नाही. तर यावर तोडगा काय? असा प्रश्न निश्चितच पडतो. या प्रश्नाचे उत्तर प्राप्त झालेच पाहिजे. या लेखमालिकेतून ते दिले जाईल.

    शिकण्याचा कल लक्षात न घेता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना एकाच पध्दतीचे शिक्षण दिले जाते. हा प्रकार म्हणजे वेळ, अंतर, वस्तुमान अशा अनेक गोष्टी एकाच परिमाणात तोलण्यासारखे आहे. वेळ मोजण्यासाठी तास-मिनिटे-सेकंद, अंतर मोजण्यासाठी मीटर-सेमी-फूट-इंच-किमी तर वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम-तोळा-किलो-टन अशी वेगवेगळी परिमाणे वापरणे गरजेचे आहे. तसे विद्यार्थ्याच्या किंवा स्वतःच्या (स्वतःसाठी ही लेखमालिका वाचणाऱ्या वाचकांसाठी) अभ्यासाच्या पध्दती जाणून घेऊन शिकवणे गरजेचे आहे. ज्याच्या अंगी जी उपजत कौशल्य आहेत त्यात प्राविण्य मिळवण्यास संधी देणे त्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

  • कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?

    कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?

    tips-for-increasing-turnover-with-low-capital

    आणखी वाचा

  • कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे बुध्दी चालायची बंद होते. सगळे लोक पैसे मागत असतात व तुम्हाला मालक असूनही तोंड चुकवून पळावे लागते. कर्मचाऱ्यांना पगार वेळेत न दिल्याने कंपनी बुडणार आहे, अशा अफवा पसरतात, कंपनीचे एकूण वातावरण खूप वाईट होते व बरेच चांगले कर्मचारी नोकरी सोडून जातात. चेक बाऊन्स झाल्याने बिझनेस मार्केटमधून उठला, असा समज होतो.

    १. विक्रेत्यांशी चर्चा करा

    तुमच्याकडे किती पैसे आणि कधी येणार आहेत यावर कदाचित तुमचे नियंत्रण नसेल, परंतु तुमच्याकडून जाणाऱ्या पैशांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता. विक्रेत्यांना/पुरवठादारांना काही कालावधीसाठी थांबवता येईल का ते बघा किंवा एकदम सर्व पैसे देण्याऐवजी टप्प्याटप्याने पैसे देणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. बरेच व्यावसायिक आपल्या विक्रेत्यांशी बोलायला कचरतात. त्यांना वाटते की, आपली ‘इज्जत’ कमी होईल किंवा समोरची व्यक्ती कमी पैसे घ्यायला तयारच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. विक्रेते/पुरवठादार सुद्धा तुमच्यासारखेच व्यावसायिक असतात. त्यांनीसुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलेला असतो. त्यामुळे ते तुमची अडचण समजू शकतात.

    तसेच त्यांनासुद्धा आपला ग्राहक (तुम्ही) टिकवायचा असतो. जर तुमच्यासोबतचा त्यांचा अनुभव चांगला असेल तर ते नक्कीच तुमची मदत करतील. जेणेकरून दोघांचा फायदा होईल. त्यामुळे किती पैसे येणार आहेत याचा अंदाज घ्या. एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत? त्यात कुणाला तातडीने द्यावे लागतील? कुणाला काही कालवधीसाठी थांबवू शकतो? त्यांना फोन करा, चर्चा करा. आणि त्यानुसार नियोजन करा.

    २. अनावश्यक खर्च लांबणीवर टाका

    ‘कडकी’ चालू असताना आपला खर्च कुठे होतोय याचा बारीक विचार करा. त्यातील काही खर्च लांबणीवर टाकता येतात का किंवा पूर्णपणे काढून टाकता येतात का ते पाहा. तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही मालाचा आठवड्याला/महिन्याला जो स्टॉक भरून ठेवता तो कमी भरणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. जेवढा खर्च कमी कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याजवळ खर्चासाठी उपलब्ध होतील.

    ३. निरुपयोगी गोष्टी विकून टाका

    समजा एखादे नवीन उत्पादन करण्यासाठी एखादी मशीन दोन वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतली होती. पण तुमचे नियोजन फसले. ती मशीन तुमच्या कार्यालयात तशीच पडून आहे. ती विकू शकता का? कदाचित तुमच्याबाबतीत मशीन नसेल, एखादा कंप्यूटर, गाडी किंवा इतर काहीही असू शकते. जे तुम्ही विकू शकता. अशा गोष्टींचा अंदाज घ्या. त्यांची किंमत ठरवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रीस ठेवा. विकताना जास्त आढेवेढे न घेता व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच पैसा उपलब्ध होईल. 

    ४. पेमेंटवर सूट द्या.

    आपल्याच पैशांसाठी वाट बघत बसणं जिकिरीचं असतं. अशावेळी तुमच्या सर्व ग्राहकांशी संपर्क साधा आणि पेमेंट बाबत विचारा. काहींची मुदत संपायला (नूतनीकरण) अजून वेळ असेल. अशा लोकांना थोडीफार सूट (विशेष लाभ) देऊ शकता. त्यांना परिस्थितीची कल्पना द्या. ‘जर तुम्ही मुदतपूर्तीच्या आधी पेमेंट केलं, तर तुम्हाला सूट मिळेल’ असं सांगून बघा. अर्थात, सूट देताना कमीत कमी द्या. मुख्य उद्दिष्ट आपल्याला लागणारे पैसे उभे करणं हे असावं. अशाच प्रकारे सर्व ग्राहकांशी बोलून घ्या. कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारे परिणाम मिळतील आणि तुमची पैशांची चिंता मिटेल.

    ५. फ्लॅश सेल सुरु करा

    तुमच्याकडे तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस असेलच. त्यांचे फोन नंबर, ईमेल आयडी असतील. कदाचित त्या ग्राहकांनी कोणत्या वस्तू किंवा सेवा आधी वापरल्या आहेत याची सुद्धा माहिती असेल. याच ग्राहकांसाठी तुमच्या सर्वात लोकप्रिय वस्तू/सेवांवर एखादी ऑफर सुरु करा. किंमत आकर्षक ठेवा. फक्त डिस्काउंट देऊ नका. ऑफर अशी असली पाहिजे की, लोकांचं लक्ष आकर्षून घेईल आणि त्यांना खरेदी करायला भाग पाडेल.

    तसेच ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच ठेवा, कदाचित ४८ तास किंवा पुढील ५ दिवस. त्यानंतर ही ऑफर कधीच असणार नाही असं सांगा. ही माहिती देणारा संदेश तुमच्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना बल्क ईमेल/मेसेज करा. फक्त एकच ईमेल पाठवून थांबू नका. अनेक लोक रोज ईमेल बघत नाहीत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे ईमेल/मेसेज पाठवून वेळ संपत चालल्याची आठवण करून दिली पाहिजे. तुमची सेल्स आणि मार्केटिंग टीम सुद्धा व्यक्तिशः फोन करून जास्तीत जास्त बिझनेस मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.  

    ६. वस्तू/सेवांच्या किंमतीवर पुनर्विचार करा

    किंमत वाढवणे हा सुद्धा व्यवसायाचा एक भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तेव्हा या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. अर्थात वस्तूंचे/सेवांचे दर वाढवण्याआधी पूर्ण विचार करा. तुमचा एकूण खर्च किती आहे? त्याबदल्यात तुम्ही किती रक्कम आकारत आहात? तुम्ही दर वाढवून बराच कालावधी झाला आहे का? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता तुमचे दर कसे आहेत? दर वाढवणे हा कॅश क्रंच मधून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. परंतु, नियोजनबद्धपणे वाढवले पाहिजेत. नाहीतर हा पर्याय अंगलट आला तर, आहेत ते ग्राहक सुद्धा तुम्हाला सोडून जातील.    

    ७. कर्मचारी कमी करा, पगार लांबवा

    हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. कनिष्ठ/नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेनं वरिष्ठ/जुने कर्मचारी कंपनीची परिस्थिती समजून घेऊ शकतात. पुढे अडचण येणार आहे, असे लक्षात येताच आपल्या मुख्य सहकाऱ्यांशी चर्चा करा. यातून बाहेर पडण्यासाठी वर दिलेले पर्याय वापरून काय करता येईल याची योजना बनवा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सहकार्य मागा.

    शेवटी, एवढं सगळं करूनही समस्या सुटली नाही, तर सर्वांचे पगार करण्याइतपत पैसे कंपनीजवळ नसतील. त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत पगार मिळू शकणार नाही, असे सांगा. अर्थात कुठल्याही कर्मचाऱ्याला हे आवडणार नाही. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमची साथ देऊ शकतात. अगदीच गरज पडली तर काही कर्मचारी कामावरून कमी करा.

  • तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला  लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

    तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

    वडील वीटभट्टीवर कामाला. घरी एकरभर शेती आणि त्यावर चालणारे कुटुंब. प्रमोद दहावीपर्यंत शिकला, अभ्यासात जेमतेमच हुशार होता. समोर ध्येय काही नव्हते, पण दहावीला चांगले मार्क मिळाले आणि सायन्सला प्रवेश मिळाला. बारावीला मार्क कमी मिळाले, पण नशिबाने सीईटीच्या मार्कांच्या जोरावर प्रमोदने इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरलं. पण त्यासाठी फी भरायला पैसे नव्हते. प्रमोदला डिप्लोमाला टाकले गेले.

    कुटुंबाला मदत होईल म्हणून तो शिकता शिकता पार्ट टाईम जॉब करू लागला. महिना 8000 रुपये पगार त्याला मिळत होता. त्यात फी आणि इतर खर्च भागवून तो घरी देखील पैसे पाठवत होता. तिथे त्याच्या क्रिएटिव्ह आयडियाचा फायदा त्याच्या मॅनेजरला होत होता आणि प्रमोदला मिळत होता, तो तुटपुंजा पगार. मनात खूप वेळा विचार आला, की नोकरी सोडून व्यवसाय चालू करावा, पण घर प्रमोदच्या पगारावर चालायचं. यामुळे तो हे धाडस करू शकत नव्हता. माणूस कशाचेही सोंग आणू शकतो, पण पैशाचे सोंग कधीही आणता येत नाही. शेवटी त्याने निर्णय घेतला, नोकरी करत करत व्यवसाय करायचा.

    मग काय, प्रमोदने स्वस्त किंमतीत काही टायर आणि ड्रम विकत घेतले आणि ड्रिल मशीनसह उर्वरित वस्तू सेकंड हँडच्या दुकानातून मिळवून काम सुरू केले. ऑफिसमधून आल्यावर दररोज चार ते पाच तास फर्निचर बनवू लागला.

    एक ऑर्डर ५० हजार ते एक लाखपर्यंत उत्पन्न देते. आतापर्यंत त्याने २० हुन अधिक हॉटेल्स आणि कॅफेसाठी फर्निचर बनवले आहे. पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सांगली इतकंच नव्हे, तर चेन्नई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली इथपर्यंत प्रमोदच्या ऑर्डर पोचल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये त्याने पहिली इंटरनॅशनल ऑर्डर मिळवली, साऊथ आफ्रिकेहून. तीही तितक्याच सचोटीने पूर्ण केली. आज तो अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील आपला व्यवसाय पसरवण्याची स्वप्न बघत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे.

    हा लेख व्हिडिओमध्ये पहा
  • अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा 

    अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा 

    आम्ही अनेक उद्योजकांबरोबर काम करतो. खूप संकुचित व लहान विचार करून एखादा व्यवसाय, प्रोडक्ट किंवा कंपनी स्थापन केल्यास ती सुरूही होत नाही व झालीच तर ती खूप मोठी होत नाही. एकाच गावातील दोन शेतकऱ्यांची उदाहरणे सांगते  म्हणजे तुम्हाला समजेल. तुकाराम; लहान विचारसरणीचा २ एकर बागायत जमिनीचा मालक. आपल्या ऐपतीनुसार एक जर्सी गाय विकत घेतो, त्याला लागणारा चारा काही जागेत पिकवतो. गाय रोज १५ ते २० लीटर रोज दूध देते, त्याचे त्याला रोज ४०० रुपये मिळतात. चारा, खाद्य, औषधोपचार याचा रोजचा खर्च २०० रुपये, त्याला शिल्लक राहतात केवळ २०० रुपये, म्हणजे दरमहा ६००० रुपये. तसं बघायला गेलं तर ह्यात फायदा काहीच नाही. तुकारामाने आपल्या श्रमाचा मोबदला जर पकडला, तर ६००० रुपयाचे काहीच शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणारा तुकाराम हा तोट्यात व्यवसाय करतो आहे.

    power-of-thinking-big-in-business

    सर्व काम हे यांत्रिक व शास्त्रशुध्द पध्दतीने होत असल्यामुळे कमी मजुरीत व कमी खर्चात काम होते व गायीही जास्त दूध देतात. जास्त दूध असल्याने त्याला १ रुपया जास्त दर मिळतो व खाद्य खरेदी जास्त असल्याने त्याला ५% कमी दराने खाद्य मिळते. एका गायीपासून रोज ५०० रुपयाचे दूध मिळते. १५ गायींचे रोज रुपये ७५००. खाद्य, औषधपाणी, ३ मजूर मिळून रोज ४५०० खर्च होतो. रोज निव्वळ नफा ३००० हजार रुपये. महिना १० ते १२ गाड्या शेणखत निघते. ते रुपये ४ हजार प्रती गाडी याप्रमाणे खपते, त्याचे महिना ३० ते ४० हजार मिळतात. एकूण महिना फायदा रुपये १२,५००० पर्यंत मिळतो.

    आता मला सांगा, तुम्हाला कोणती म्हण मान्य आहे, “अंथरूण पाहून पाय पसरावे” की “आधी भरपूर पाय पसरा, मग अंथरूण गोळा करा?” तेव्हा जुने बुरसटलेले विचार भंगारात घाला, आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करा.

    आणखी वाचा

  • होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

    होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

    एका लोहाराचा मुलगा ते होंडा मोटर्सचा मालक होण्यासाठी केलेला संघर्ष

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा.

    सोइचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपान मधील शिजूओका भागातील कोमयो गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांचे वडील गिहेई होंडा लोहार होते, तसंच त्यांचं एक सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. लहान सोइचिरो आपल्या वडिलांना कामात मदत करायचे. लहान लहान यंत्रांवर प्रेम करणाऱ्या सोइचिरोंचं अभ्यासात काय मन लागेना. त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि टोकियो गाठलं. तिथं ते ‘आर्ट शोकाई’नावाच्या कंपनीत मेकॅनिक म्हणून रुजू झाले, पण ते वयाने सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांना मेकॅनिकचं काम सोडून इतर छोटीमोठी कामं द्यायचे. यावर सोइचिरोंनी मालकाला विनंती केली आणि मेकॅनिकचं काम द्यायला लावलं. त्यांचं मशीनवरच प्रेम पाहून मालकानं सोइचिरोंना दुसऱ्या शाखेत पाठवलं. त्या शाखेत रेसिंग कार तयार केल्या जात होत्या. सोइचिरो तिथं मन लावून काम करु लागले. शोकाई कंपनीनं जपान कार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत अगदी अनपेक्षितरित्या कंपनीची कार पहिली आली. सोइचिरो त्या पहिल्या आलेल्या कारचे मेकॅनिक होते. यामुळे खुश होऊन कंपनीने एका शाखेची जबाबदारी या २१ वर्षीय पोराच्या खांद्यावर दिली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आलं होतं; परंतु रंगांधळेपणामुळे त्यांना डावलण्यात आलं.

    The Story of Soichiro Honda

    सोइचिरो रेसिंग स्पर्धेतसुद्धा भाग घ्यायचे. ७ जून १९३६ रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची आवड सोडली.

    काम करत असताना सोइचिरोंच्या लक्षात आलं की गाडीसाठी लागणाऱ्या पिस्टनला खूप मागणी आहे,. पण ते बनवणाऱ्या कंपन्या कमी. त्यांनी आपल्या मालकाला ही गोष्ट बोलून दाखवली आणि सुचवलं ही आपणही पिस्टन बनवू. पण मालकाने त्यांना साफ नकार दिला. यावर आता आपण स्वतःच पिस्टन बनवू म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल गाव गाठलं. त्यांनी ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनी उभी केली. या कंपनीनं पिस्टन रिंग बनवून त्या टोयोटा कंपनीला चाचणीसाठी दिल्या. पण त्यांनी पाठवलेल्या ५० रिंग पैकी फक्त ३ रिंग टोयोटा कंपनीच्या चाचण्या पास करू शकल्या. हे होत त्यांच्या आयुष्यातलं पहिलं अपयश.

    दोन वर्षांत त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार करून अधिक उत्कृष्ट पिस्टन रिंग बनवल्या. कंपनी बऱ्यापैकी काम करत होती, तोच दुसरं जागतिक महायुद्ध सुरु झालं आणि यात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या B२९ बॉम्बमध्ये सोइचिरोंची कंपनी उध्वस्त झाली. हा त्यांना बसलेला दुसरा तडाखा.

    युद्ध संपल्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे जळालेले अवशेष साडेचार लाख येनना विकले आणि परत नव्या जोमानं कंपनी उभी केली. तिचंही काम चांगलं चालू होतं. तोच जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यांची कंपनी जमीनदोस्त झाली. दैवाने त्यांची तिसऱ्यांदा परीक्षा बघितली. एक वेळ तर अशी होती की, सोइचिरोंकडे फक्त एका दिवसाचं पेट्रोल भरण्याइतकेच पैसे शिल्लक होते.

    मित्रहो सामान्य माणूस इतक्या अपयशानंतर खचून जातो. प्रयत्न सोडून देतो, पण हे सोइचिरो होंडा होते. ते अपयशाचं भांडवल करत बसले नाहीत. ‘हे माझ्याच सोबत का झालं’ म्हणून त्याला गोंजारत बसले नाहीत. इतक्यांदा पडून देखील ते पुन्हा उभे राहिले. नव्या जोमाने कामाला लागले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि ‘टोयोटा’ व ‘नाकाजिमा एअरक्राफ्ट’ सारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.

    The Story of Soichiro Honda

    हळूहळू जपानची अर्थव्यवस्था सुधारू लागली. तसंच सोइचिरोंनी चारचाकी गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील पाय ठेवला. सोइचिरो नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत. अशा या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अवलियाने ५ ऑगस्ट १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. सर्वसामान्यांना परवडेल अशी गाडी तयार करून लाखो मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करणारे सोइचिरो होंडा आपल्याला हेच सांगतात की “जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।”…

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • ‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

    ‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

    हल्ली Social Media वर तुम्हाला इतके सारे  Motivational Speaker पाहायला मिळतील की विचारायची सोय नाही. YouTube वर साधं Motivation हा शब्द जरी टाइप केला तरी संदीप महेश्वरी, विवेक बिंद्रा, प्रिया कुमार, गौर गोपाल दास अशा कित्येक Motivational Speakers चे Channels ओपन होतील. ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जीवनातील अध्यात्माच्या, ध्यानाच्या अनेक गोष्टींपर्यंतची प्रेरणा मिळते. प्रेरणा ही अग्निसारखी असते. तिला जर इंधन पुरवलं नाही तर ती विझून जाते. ‘मला यशस्वी व्हायचंय, मला पैसा कमवायचाय’ या जिद्दीतूनच प्रेरणेचा जन्म होत असतो. जर तुमच्यात जिद्दच नसेल तर इंधन नसलेल्या वाहनाप्रमाणे तुमच्या यशाची गाडी धक्के खात खात धीम्या गतीने चालेल.

    एका वाक्यात प्रेरणा म्हणजे काय सांगायचं झालं, तर प्रेरणा ही आपल्या आयुष्याला गती देणारी एक शक्ती आहे. ती तुम्हाला कोणाच्या बोलण्यातून मिळेल, वाचनातून मिळेल किंवा कृतीतून मिळेल. आमच्या घराशेजारी पाटील कुटुंबीय राहत होते. त्यांचा तुषार नावाचा मुलगा चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. नम्र आणि इतरांप्रती नेहमी आदराची भावना बाळगणारा तुषार सगळ्यांच्याच आवडीचा होता. मात्र त्याचा भाऊ मंगेश व्यसनी आणि व्याभिचारी होता. दारू, सिगारेट, गांजाचं त्याला व्यसन होतं. तो आपल्या बायकोला देखील भरपूर मारायचा. एके दिवशी असंच त्याला कोणीतरी विचारलं. का रे तु असा वागतोस, दारू पिऊन का मारझोड करत असतोस? त्यावर मंगेश म्हणाला, “लहानपणी माझे बाबा दारू पिऊन आईला खूप मारायचे. रोज दारू पिऊन शिवीगाळ करायचे. त्याच वातावरणात मी वाढलो आणि मला देखील त्यांच्यासारखीच सवय लागली. कामाच्या आळसामुळे माझी ही अशी माझ्या वडिलांसारखीच अवस्था झाली.”

    कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील तरुण. इतक्या मोठ्या संकटात देखील तो गुरुजींकडे पैसे नाही, तर पाठीवर एक प्रेरणेची थाप मागत होता. मित्रांनो हे जे प्रोत्साहन आहे ना, तेच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळवून देत असतं. लहानपणी शाळेत गुणगौरव सोहळा असायचा. शालेय परीक्षा, खेळ, संगीत, नृत्य, वादन अशा प्रत्येक क्षेत्रात अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जायचं. साहाजिकच त्यामुळे मुलांच्यात अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण व्हायची. आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असावी जी तुम्हाला नेहमी प्रेरणा देईल. नवीन काहीतरी करण्याचं बळ देईल आणि जर कोणी नसेलच तर बाह्य प्रेरणा मिळविण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला प्रेरणा देऊन तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेचा दरवाजा खुला करा. तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेला बळ देऊन तिला भरभक्कम बनवा.

    आणखी वाचा