Author: naviarthkranti

  • Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

    Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

    तोराकुसू यामाहा. २० मे १८५१ साली जपानमधील वाकायामा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील किशू राजघराण्यातील ज्योतिषी होते.  प्रत्येक वडिलांच्या आपल्या मुलाप्रती काही ना काही अपेक्षा या असतातच, आपला मुलगा यशस्वी व्हावा. चार चौघात त्याचं नाव व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी तुमच्या आमच्या आईवडिलांच्याही आपल्याकडून त्याच अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या परीने ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. तोराकुसूच्या वडिलांनाही वाटायचे की, आपल्या मुलाने आपल्याप्रमाणेच ज्योतिषी बनावे. लहानपणापासूनच अभ्यासात हुषार आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा असलेल्या आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. १८६८ साली तो नागसाकीला गेला. तिथे एका इंग्रज अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ दुरुस्तीचे शिक्षण त्याने घेतले. पुढे ओसाका या शहरात जाऊन वैद्यकीय उपकरण दुरुस्ती शिकून घेतली. वयाच्या ३५व्या वर्षी हमामात्सू या शहरात तो व्यवसाय सुरु केला. पण शहर लहान असल्यामुळे म्हणावी तेवढी मिळकत होत नव्हती. त्यामुळे जोडीला घड्याळ रिपेअरिंग आणि रिक्षा ड्रायव्हर म्हणूनसुद्धा त्याने काम केले.

    the-story-of-torakusu-yamaha-the-man-who-founded-yamaha
    the-story-of-torakusu-yamaha-the-man-who-founded-yamaha

    १९०२साली तोराकुसू यांना जपान सरकारचा मेडल ऑफ होनर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९११ साली शहर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 8-ऑगस्ट 1916 रोजी वयाच्या ६५व्या वर्षी तोराकुसू यामाहा यांचे निधन झाले. कंपनीला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी तोराकुसू आयुष्यभर झटत राहिले.

    पुढे १९३०-४० च्या दशकात व्यवसाय तेजीत असतानाच दुसऱ्या महायुध्दास प्रारंभ झाला आणि म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या या कंपनीला आपला व्यवसाय थांबवावा लागला. पण थांबणं यामाहाच्या धोरणांत बसतच नव्हतं. कंपनीने या काळात म्युजीकल इन्स्ट्रुमेंट सोडून शस्त्रास्त्रे बनवायला सुरुवात केली, कारण युद्धामुळे शस्त्रांचा साठा वाढविणे गरजेचे होते. त्यावेळी कंपनीने एअरक्राफ्ट, लढाऊ विमानं, टँक बनवले. कंपनीत त्यावेळेस एकूण तीनशेपेक्षा अधिक कामगार काम करत होते. या कंपनीचे प्रॉडक्ट इतके उत्कृष्ट होते की, विदेशातून देखील मागणी वाढली, अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र कंपनीकडून शस्त्रं घेत होते. पुढे युद्ध संपल्यावर शस्त्रात्रांची मागणी कमी होऊ लागली आणि कंपनी पुन्हा तोट्यात गेली. आता कंपनी टिकवून ठेवण्यासाठी काय करावे म्हणून कंपनीने पुन्हा म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनविण्यावर भर दिला.

    YAMAHA YA-1 (1955)
    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ

    अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    अठराव्या वर्षापर्यंत चिंधीची तीन बाळंतपणं झाली. ती चौथ्या वेळी गर्भवती असताना तिने तिच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.

    मग जमीनदाराने चिंधीच्या पोटातील मूल आपलेच असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात चिंधीच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या चिंधीला त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गावकऱ्यांनीही गावाबाहेर हाकलले. माराने अर्धमेल्या झालेली चिंधी माहेरी आली, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.

    चिंधीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण “लहान मुलीचा जीव घेतला, तर पाप लागेल.” म्हणून चिंधी मागे फिरली. मग भीक मागत पोट भरणे सुरू झाले. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर चिंधी भीक मागत हिंडू लागली. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरू लागली. भीक मागणे, स्टेशनवर झोपणे, उपाशी राहणे या सारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण, २१ वर्षाची चिंधी डगमगली नाही.

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    चिंधी पुण्यात आली. रस्त्यावर तिला एक मुलगा रडत बसलेला दिसला. मुलाला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली. तिथे तक्रार नोंदवून घेतली नाही.

    चिंधीने मुलाला सांभाळण्याचे ठरवले. पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले तिला भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रितांचे जगणे किती भयंकर असते ते तिने अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, अशी तिची इच्छा होती. आणि म्हणून ही चिंधी बनली ‘अनाथांची यशोदा’ ही अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ.

    सिंधुताईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या या छत्रछायेखाली त्यांचा नवरा सुद्धा आला. पण, नवरा म्हणून नाही मुलगा म्हणून…

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे. सिंधुताई सपकाळ या एक खऱ्याखुऱ्या यशवंत आहेत.

  • शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

    शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

    शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न जो केवळ सरकारी कार्यालयातच खितपत पडायचा, त्या प्रश्नाला न्याय चरणसिंह यांनी दिला. ज्या मातीत आपण शेतकऱ्याच्या सहनुभूतीचे नारे लगावतो, त्याला न्याय देण्यासाठी आंदोलने करतो त्याच मातीत पहिल्यांदा चरणसिंह यांनी सामंजस्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले.

    चौधरी चरण सिंह 

    चौधरी चरणसिंह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या नुरपूर या गावात 23 डिसेंबर 1902 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. शेतीत काम करत करत ते आग्रा विश्वविद्यालयामधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर बनले. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडून गेले आणि 1946, 1952, 1962 व 1967 मध्ये विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

    भारत पारतंत्र्यात असताना गांधीवादी विचारांनी प्रेरित होऊन भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ब्रिटिश सरकारला नामोहरम करण्याच काम चरणसिंह यांनी केलं. ते केवळ सत्याग्रह चळवळीत सहभागी झाले नाहीत, तर प्रत्येकाला चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले.

    Exciting part of the story

    १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. जेलमधून बाहेर सुटल्यावरही ते शांत बसले नाहीत. त्यांनी ब्रिटिशांविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. ब्रिटिशांना भारतातून हकलवून लावण्यासाठी प्रबोधन करू लागले.आणि म्हणूनच ब्रिटिशांनी उत्तरप्रदेशात एक पत्रक जारी केलं. ज्यात सूचना होती की, चरणसिंह जिथे दिसतील तिथे त्यांना मारून टाका.

    १९४७ साली भारत अखेर स्वतंत्र झाला. पण त्यानंतरही भारताला अनेक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी क्षेत्राचा प्रश्न. आणि याच क्षेत्रावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न चौधरी चरण सिंह यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या.

    उत्तरप्रदेशात कार्यरत असताना त्यांनी अनेकवेळा स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विभागीय कर्जमुक्ती विधेयक, १९३९ तयार करण्यात आणि अंतिम प्रारूप देण्यामध्ये श्री. चरण सिंह यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांना जमीनदार, तलाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना होती. यासाठी त्यांनी जमीनदारी उन्मूलन बिल-१९५२ हे विधेयक आणले. त्यामुळे शेतकरी अधिकाऱ्यांच्या त्रासातून मुक्त होतील, असा विश्वास त्यांना होता. हे विधेयक येताच अनेक तलाठी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. चौधरी चरण सिंह यांनी ते राजीनामे स्वीकारून नव्याने पदभरती सुरू केली. त्यामध्येही १८ टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवल्या.

    शेतकर्‍यांच्या भरभराटीसाठी शेतीवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी देखील ते खूप गंभीर होते. त्यामुळे शेतकरी त्यांना आपले नेते मानत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जमीन धारणा कायदा 1960 बनवला. त्यांनी केवळ शेतीतच उल्लेखनीय कामगिरी केली असे नाही तर महसूल, वैद्यकीय, सार्वजनिक, आरोग्य, न्याय इत्यादी विविध विभागात काम केले. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना सुद्धा त्यांनीच केली.

    त्यांनी २८ जुलै १९७९ मध्ये देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे ते केवळ १४ जानेवारी १९८० पर्यंत म्हणजेच सहा महिनेच पंतप्रधान पदावर कार्यरत होते.

    शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली होती. त्याची आठवण म्हणून २००१ साली अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारमध्ये चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. चौधरी चरण सिंह यांचे २९ मे १९८७ रोजी निधन झाले.

    राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधानपदापर्यंत त्यांनी केवळ शेतकऱ्याचाच विचार केला. मात्र इतके करूनही आज आपला शेतकरी राजा खुश आहे का हाच प्रश्न पडतो. चौधरी चरणसिंह यांचे शेतकऱ्यांच्या काळजीचे तत्व आज प्रत्येक नेत्याने अवलंबलं असते, तर कदाचित शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटले असते आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा झाला असता. 


  • ४. शिक्षण – समज व गैरसमज

    ४. शिक्षण – समज व गैरसमज

    * इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा 

    तीन चार वर्षाच्या मुलांना असं काय शिक्षण देत असतील? ज्याची किंमत पन्नास हजार ते एक लाखाच्या घरात जाते. हा एक न उघडलेला प्रश्न आहे. मला एक मराठी माध्यमात शिकवणारे शिक्षक सांगत होते. की त्यांच्या मुलाची पाचवीच्या वर्षाची फी ६० हजार रुपये आहे. पुढे त्यांनी सांगितलेली माहिती त्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होतीच त्याचबरोबर मी विस्मयचकित झालो. ते म्हणाले की त्यांच्या शेजाऱ्याच्या मुलाचे इंजिनियरींग केवळ ४२ हजारात पूर्ण झाले आहे. (चार वर्षाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची एकूण फी ४२००० रुपये होती.) हे एक उदाहरण आहे. 

    भरमसाठ फी घेण्याला माझा विरोध नाहीच. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही विरोध नाही. जे काही घेतलं जातं त्याची किंमत ठरवण्याची एकके काय आहेत? त्याचा विचार कधी होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय तन्मयतेने शिकवणारे शिक्षक असणाऱ्या अशा हजारो शाळा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आहेत. त्यात मिळणाऱ्या इंग्रजी भाषेचा शिक्षणाचा दर्जा म्हणावा तितका चांगला नाही हे मान्य केले पाहिजे.

    मराठी शाळेत अथवा मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांमधून शिक्षण घेत असतानाच इंग्रजी शिकणे उत्तम ठरते. कारण ऑक्सफर्ड, केंम्ब्रिज व हारवर्ड विद्यापीठाने सुध्दा मान्य केले आहे की, मातृभाषेतून शिकणे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मोठमोठे उद्योजक, सिनेअभिनेत, क्रिकेटपटू, राजकारणी, नेते, कलाकारांमधील बरेचजण आपल्या शालेय जीवनात जिथे मिळेल तिथून शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. यशस्वी होणे हा वेगळा घटक आहे. सर्व ठिकाणाचे विद्यार्थी यशस्वी होतात. धीरुभाई अंबानी कोणत्याच मॅनेजमेंट च्या शाळेत गेले नव्हते. अण्णाभाऊ साठे तीन दिवसापेक्षा जास्त शाळेत गेले नव्हते. तरीही त्यांनी यश मिळवलेच. जीवनातील यश व प्रसिध्दी या गोष्टी प्रत्येकाला मिळवता येतात. त्यासाठी लागणारे परिश्रम, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, यशस्वी होण्याची तळमळ या घटकांचा ध्यास घेतलेली माणसे कुठूनही यशस्वी होतात.

    यशस्वी होणे ही कोणत्या एका ठराविक गटाची मक्तेदारी नाहीच. श्रीमंताची मुले यशस्वी होतात तशी गरिबीतून आलेली मुले सुध्दा यशस्वी होतात. शहरातील होतात त्याचप्रमाणे खेड्यातील मुलेसुध्दा यशस्वी होतात. इंग्रजी उत्तम येणारे यशस्वी होतात त्याच प्रमाणे इंग्रजीचा गंध नसणारे सुध्दा यशस्वी होतात. गरिबी-श्रीमंती, वातावरण, ठिकाण, भाषा याचा जेवढा वाटा आपल्या यशात असतो. त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व अनुकुलन क्षमतेचा असतो. तुम्ही कुठेही शिकला असला तरी प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार आहे.

    तुमची मुले कुठेही शिकत असली तर त्यांना सुध्दा यश मिळवणे शक्य आहेच. हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्रात एक करोडहून अधिक विद्यार्थी खेड्यात शिक्षण घेत आहेत. यातूनच उद्याचे नेते, खेळाडू, कलाकार, शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, वक्ते निर्माण होणार आहेत. शहरी भागात शिकणारे विद्यार्थी सुध्दा यशस्वी होतील.

    जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या घटकांमध्ये शालेय शिक्षणाचा वाटा किती? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.

    तुम्ही दहावी, बारावी व पदवी (Graduation) ला असताना केलेल्या अभ्यासात तुम्हाला कितीही मार्क पडलेले असोत. (नापास होण्यापासून १०० टक्क्यांपर्यंत) आज तुम्हाला त्याच प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न परत सोडवता येतील? आजच्या जगण्यात त्या प्रश्नांच्या उत्तरांचा सहभाग किती? या दोन प्रश्नांची उत्तरे म्हणजे आपल्या जीवनात यशस्वी होण्यात असणारा शिक्षणाचा वाटा होय.

  • 12 गोष्टी ज्या तुमच्या स्टार्टअपसाठी ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात मदत करतील

    12 गोष्टी ज्या तुमच्या स्टार्टअपसाठी ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात मदत करतील

    तुम्ही नुकतीच सुरुवात करत असता, तेव्हा तुमची ब्रँड प्रतिष्ठा एक कोरी स्लेट असते. त्यामुळं तुम्ही त्याला योग्य दिशा देऊ शकता.

    1. तुम्हाला कशासाठी प्रसिद्ध व्हायचे आहे?

    तुम्ही तुमचा व्यवसाय कशासाठी उभा केला आहे? तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रँड तयार करायचा आहे? तुम्हाला आणि तुमच्या ब्रँड ची समाजामध्ये कशी ओळख निर्माण करायची आहे? याचा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्पष्ट असाल की लोकांनी तुम्हाला कसे पाहिले पाहिजे, तोच तुमच्या व्यवसायाचा चेहरा असेल.

    2. तुमची स्वतःची वेबसाइट तयार करा

    तुमच्या ग्राहकांना तुमची माहिती पाहिजे असल्यास तुमची वेबसाईट सर्वोत्तम मार्ग आहे. तुमची वेबसाईट सर्च इंजिनवर सर्वात पुढे असणे गरजेचे आहे. खराब ऑनलाइन रँकिंग तुमच्या ब्रँडला घातक ठरू शकते. नियमित पणे तुमची वेबसाईट अपडेट ठेवा. सर्च इंजिनच्या विविध टूल्स चा उपयोग करा.

    3. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा

    तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकत नाही, परंतु तुमच्या कंपनीचे नाव सर्व प्लॅटफॉर्मवर असले पाहिजे  आणि आवश्यक असल्यास संबंधित डोमेन खरेदी करणे ही नेहमीच चांगले ठरते. तुमचे पेज नेहमी अपडेट ठेवा आणि ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासोबतच ग्राहकांशी संवाद देखील साधा. यामुळे तुमची प्रतिष्ठा लगेच वाढेल असे नाही, तर तुमचे ग्राहक तुमच्या ब्रँडला कसा प्रतिसाद देतात यावर लक्ष ठेवण्यास हे खूप मदत करेल.

    4. ब्लॉगिंग

    ब्लॉगिंग हे तुमच्यासाठी तुमच्या व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणखी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. तुमच्या व्यवसायाबद्दल नवीन माहिती आणि अपडेट शेअर करण्यासाठी तुमचा ब्लॉग वापरा. तुमच्या वाचकांना कमेंट विभागाचा वापर करण्यास आणि त्यांच्याशी सक्रियपणे संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करा.

    5. प्रतिसाद देत रहा

    सोशल मीडियावर असो, ईमेलवर असो किंवा तुमच्या ब्लॉगवरील कमेंट विभाग असो, योग्य वेळी आणि आवर्जून प्रतिसाद द्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा वेबवर ग्राहकांशी संवाद साधणे हा ग्राहक सेवेचा आणखी एक उत्तम प्रकार आहे, वैयक्तिक स्तरावर तुमच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी हे माध्यम वापरा.

    6. रिव्ह्यू खरेदी करण्याचा मोह झाला?

    खरे सांगायचे तर, अगदी डोनाल्ड ट्रम्पचे ट्विटरवर लाखो बनावट फॉलोअर्स होते. परंतु फक्त प्रसिद्ध होण्याच्या हेतूने असे बनावट फॉलोअर्स बनवणे घटक ठरू शकते. याचा सकारत्मक पेक्षा नकारात्मक परिणाम जास्त पाहायला मिळतो.

    7. ब्रँडची प्रतिष्ठा नियंत्रित ठेवा

    तुम्हाला सकारात्मक रित्या सोशल मीडिया चालवू शकता, पण त्यामध्ये तुमच्या ब्रँडची प्रतिष्ठा लवकरात लवकर नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. नवीन व्यवसाय म्हणून, तुम्ही कोर्‍या स्लेटने सुरुवात करता. त्याचा फायदा घ्या आणि ब्रँड प्रतिष्ठा व्यवस्थापनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकडे लक्ष केंद्रित करा, जे तुम्हाला काही मोठ्या यशासाठी उपयोगी ठरेल.

    8. विश्वास निर्माण करा

    उत्कृष्ट ब्रँड यशस्वी होतात कारण ते गुणवत्ता देतात आणि ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात . तुम्ही वितरित करत असलेली गुणवत्ता, तुम्ही पाठवलेले संदेश आणि तुमची ग्राहक सेवा या सर्वांचा परिणाम तुमच्या ग्राहकांचा तुमच्यावर असलेल्या विश्वासावर होतो. तुमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पारदर्शकता. तुम्ही चूक केली असेल तरीही तुमचे ग्राहक तुमच्या प्रामाणिकपणा मुळे नेहमी तुमचा आदर करतील.

    9. प्रोएक्टिव्ह पीआरवर लक्ष केंद्रित करा

    जेव्हा तुम्हाला एखादी मोठी घोषणा करायची असेल तेव्हा फक्त प्रेस रिलीझ पाठवणे तितकेसे संयुक्तिक नाही. तुमच्याकडे शेअर करण्यासाठी कंपनीच्या बातम्या नसतील तरीही मोठ्या उद्योग संभाषणांमध्ये सामील व्हा आणि तुम्ही PR वाढवा. तुमच्या व्यवसायाला, तुमच्या कंपनीला सतत प्रकाशझोतात ठेवण्यासाठी PR हि सर्वोत्तम संधी आहे.

    10. तुमची SEO धोरण आणि SERP

    तुमच्या व्यवसायासाठी मजबूत ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात आणि कोणत्याही नकारात्मक परिणामांना दूर करण्यात SEO महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण ते तिथेच थांबत नाही. तुम्हाला तुमच्या SERP वर सतत काम करावे लागेल जेणेकरुन जेव्हा कोणी तुमच्या कंपनीचा शोध घेते तेव्हा त्यांना तुमची माहिती प्रथम सापडते.

    11. टीका कशी हाताळायची ते जाणून घ्या

    नकारात्मक टिप्पण्या किंवा ऑनलाइन टीकेपासून दूर जाऊ नका. नकारात्मक अभिप्राय तुमचा व्यवसाय मजबूत करायला मदत करून तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल. लोक तुमची ऑनलाइन निंदा करत असल्यास, त्यांना योग्य आणि त्वरीत तुमची बाजू सांगा. त्याकडे लक्ष न देणे हा चुकीचा संकेत आहे. जेव्हा तुम्ही  व्यावहारिक आणि तत्परतेने प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही समस्या सोडवत आहात आणि तुमच्या कंपनीला संभाव्य गोंधळापासून वाचवत आहातहे लक्षात ठेवा.

    12. हे कधीही संपणार नाही हे स्वीकारा

    तुमच्या ब्रॅण्डला मिळालेली प्रतिष्ठा सांभाळणे हे केवळ स्टार्टअपसाठी नाही तर कायम स्वरूपी आहे. तुमची आज एक उत्कृष्ट प्रतिष्ठा असेल, सर्च इंजिन परिणाम आणि अल्गोरिदम, ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांची मते सतत बदलत असतात. तुम्हाला तुमची सकारात्मक ब्रँड प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी नेहमी काम करत राहावे लागेल.

  • तुमचा स्टार्टअप प्रभावशाली व्यक्तींसोबत (इन्फ्लुएन्सर सोबत) कसा सहयोग करू शकतो

    तुमचा स्टार्टअप प्रभावशाली व्यक्तींसोबत (इन्फ्लुएन्सर सोबत) कसा सहयोग करू शकतो

    आजकाल बहुतेक ब्रँड त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींसोबत (influencers) सहयोग करतात. का? कारण या व्यक्तींनी  स्वतःच्या  मागे खूप विश्वास निर्माण केलेला असतो, ते तुमच्या उत्पादनाचा किंवा सेवांचा त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत प्रचार करू शकतात. विशेषत: नवीन आणि आगामी व्यवसायांसाठी हे एक प्रचंड सेल्स -ड्रायव्हिंग धोरण आहे.

    इन्फ्लुएन्सर सोबत सहयोग करणे हे अजूनही तुलनेने नवीन मार्केटिंग धोरण आहे. यात त्रुटीही भरपूर आहेत. स्टार्टअप्सना हे माहित असणे आवश्यक आहे की यांच्यासोबत कशा प्रकारे सहयोग करावा आणि त्यांच्याशी वास्तविक संबंध कसे निर्माण करावे. अन्यथा, त्यांचे मर्यादित बजेट वाया जाण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही योग्य manager शोधण्यात यशस्वी झालात, तर तुम्हाला यातून मिळणार नफा सुद्धा जास्त असतो.

    १. फॉलोअर्सच्या संख्येपेक्षा एंगेजमेंट अधिक महत्त्वपूर्ण आहे

    2. तुमचे उत्पादन आवडणाऱ्यांकडे लक्ष द्या

    इन्फ्लुएन्सर शोधताना असे शोधा ज्यांना तुमच्या उत्पादनांमध्ये रस आहे. हे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमचे ग्राहक कोणत्या प्रकारची सोशल चॅनेल अधिक वापरतात हे पाहून ठरवणे. तुमच्या कंपनीचे ग्राहक आणि सोशल मीडिया चॅनेल आधीपासूनच कनेक्ट असल्यास ते शोधणे अधिक सोपे जाते.

    लक्षात ठेवा, तुम्ही कॉलेजमधील लोकप्रिय मुलगी शोधत आहात, दीपिका नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की  दीपिका काही मिनिटांत कपडे  किंवा तुमचं दुसरं कुठलंही उत्पादन विकू शकते, परंतु बहुतेक ब्रँडसाठी असे मेगास्टार्स परवडणारे नाहीत. म्हणूनच तुमच्या उत्पादनावर प्रेम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींना शोधणे आणि त्यांच्यासोबत सहयोग करणे. तुमच्या समवयस्कांमध्ये तुमची ब्रँड जागरुकता वाढविण्यात मोठी मदत करेल.

    3. त्यांच्या कामगिरीसाठी पैसे द्या, पोस्टसाठी नाही

    इन्फ्लुएन्सर जितका प्रभाव टाकतो त्यावर त्याला पैसे द्या, ना कि तो पोस्ट किती करेल त्यावर. अशा घटनांमध्ये, फक्त पोस्टसाठी पैसे दिले तर इन्फ्लुएन्सर त्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा पुरेपूर वापर करत नाही. या  मार्केटिंग फॉरमॅटची तुलना पारंपारिक मासिके आणि टीव्ही ऍडशी करता येत असली तरी, इन्फ्लुएन्सरच्या परफॉर्मन्सच्या आधारावर त्यांना पैसे देता येतात.

    प्रत्येक इन्फ्लुएन्सर अशा प्रकारे सहयोग करेलच असे नाही, परंतु असे काही असतात जे अशा प्रकारे सहयोग करतात. त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला फक्त काही प्रयत्न करावे लागतील. 

    तुमच्या पुढील मार्केटिंग धोरणावर, वर नमूद केलेल्या गोष्टीचा नक्कीच चांगला प्रभाव पडेल. त्याची योग्य अंमलबजावणी करून तुम्ही यशस्वी स्टार्टअप उभा करू शकता.

    सौंदर्य आणि फॅशन कंपन्या इन्फ्लुएन्सरसोबत सहयोग करणाऱ्या पहिल्या कंपन्या असतील पण काळ बदलला आहे. इन्फ्लुएन्सर सोबत मार्केटिंग करुन आज पेड मीडिया आणि इतर बहुतेक ब्रँडनी आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली आहे.

    तुम्‍हाला तुमचं इन्फ्लुएन्सर कॅम्पेन यशस्‍वी करायचं असल्‍यास, असा इन्फ्लुएन्सर शोधावा लागेल जो तुमच्‍या उत्‍पादनावर मनापासून प्रेम करणारा असेल आणि जनतेची मुक्त संवाद साधणारा असेल.

  • तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तरीसुद्धा, तुम्हाला जीवनात खरोखर काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ओळखणे आवश्यक आहे. यावरून तुम्ही कोणत्या मार्गावर जावे आणि कोणती पावले उचलावीत याचे स्पष्टीकरण मिळते.

    बिल गेट्स यश मिळवण्याचे रहस्य सांगतात कि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर काम करायला सुरवात करा. ते स्वतः वयाच्या १३व्या वर्षांपासून कॉम्पुटर क्षेत्रात काम करत आहेत आणि ते किती यशस्वी आणि प्रभावशाली झाले आहेत हे आपण पाहतच आहोत. Facebook चे CEO, मार्क झुकेरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी असताना त्यांची आताची अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी केली. आज फेसबुक हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. वय हा यशाचा निर्णयात्मक घटक नसला तरी आपण पुरेसे मोठे आणि स्थिर होण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

    जीवनात यश कसे मिळवायचे?

    पहिली पायरी: जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता ठेवा

    शीर्षक सगळं स्वतःच स्पष्ट करते. तुम्हाला जीवनात यश मिळवता येण्यासाठी, तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. स्वतःला विचारा, “मला खरोखर काय साध्य करायचे आहे?” तुम्हाला तुमच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी साध्य करायच्या असतील, प्रत्येक ध्येयाचा त्याच्या प्राधान्यानुसार क्रम लावा. त्यातील कोणते जवळचे आहे कोणते लांबीचे आहे हे ठरवा आणि त्यानुसार ध्येयात स्पष्टता आणा.

    दुसरी पायरी: प्रेरणा शोधा

    तुमचे ध्येय हे तुमच्यासाठी खरी प्रेरणा असले पाहिजे, काहीवेळा जेव्हा तुमचे उद्दिष्ट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो किंवा तुम्ही ठरवल्याप्रमाणे काही घडत नाही तेव्हा निराशा येते. अशा वेळी, स्वतःला हे स्मरण करून दिले पाहिजे कि आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचीय आहेत. त्यामुळे मागे हटण्यापेक्षा आपण काय चुकीचे करत आहोत याचे मूल्यांकन करणे आणि आपल्या चुका सुधारणे हे जास्त संयुक्तिक आहे.

    तिसरी पायरी: टाइमलाइन तयार करा

    वेळ कुणासाठीही थांबत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक टाइमलाइन असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही नियोजित वेळेत चालत राहता आणि सर्वात वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे पाहता. तुमचे ध्येय कालबद्ध असल्यास, ठरवलेल्या वेळेत ते साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नानांची पराकाष्टा करता.

    चौथी पायरी: तुम्ही काय करणार आहेत याची योजना बनवा

    हे तुमच्या कृतींशी संबंधित आहे. तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे? त्यासाठी आवश्यक उपाययोजना न करता नियोजन करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, योजना न करता गोष्टी करणे म्हणजे वेळ आणि पैसे व्यर्थ घालवणे. म्हणूनच, यश मिळविण्यासाठी नियोजनाप्रमाणे कृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाइमलाइन वापरून, तुमची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे योग्य नियोजन करा.

    पाचवी पायरी: एक आकस्मिक योजना तयार करा

    बदल हा सतत होत असतो. त्यामुळे अपरिहार्य आणि अचानक होणाऱ्या बदलांना सामोर जाण्यासाठी तयार राहा. त्यासाठी तुमच्या योजना आणि उद्दिष्टे लवचिक बनवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आकस्मिक योजना (प्लॅन B) असणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरुन गोष्टी नियोजनानुसार होत नसतील तर आपण मार्ग बदलू शकतो. बर्‍याचदा, या आकस्मित नियोजनामुळे आपल्याला खात्री मिळते की, आपले ध्येय साध्य करण्याचा अजून एक मार्ग आहे. यामुळे आपण पुढे होणारे  नुकसान कमी करु शकतो.

    सहावी पायरी: विश्वास ठेवा

    तुम्ही आधीच प्रत्येक पायरीचे काटेकोरपणे पालन केले आहे. आता पुढची पायरी म्हणजे नशीब तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवणे आणि सर्व काही तुमच्या नियोजनानुसार करत राहणे.

    सातवी पायरी: आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत चला

    आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत राहणे ही चांगली सवय आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समजाचे आपण देणे लागतो ही भावना नेहमी तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यास मदत करते आणि यामुळे तुमचे शत्रू देखील कमी होतात. लोकांकडून मिळालेल्या सद्भावना नेहमीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात.

  • स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

    स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

    व्यावसायिक जीवनशैलीतील जोखीम पूर्णपणे स्वीकारण्यासाठी तुम्हाला निश्चितता सोडावी लागेल. ही जीवनशैली रोलर-कोस्टर सारखी असेल. तार्किकदृष्ट्या, हे जाणून घेणे सोपे आहे. पण भावनिकदृष्ट्या पाहिल्यास, उद्योजकाच्या आयुष्यात खूप चढ-उतार येतात. तणाव, निराशा येते आणि प्रेरणा कमी होते आणि हे होणे अपरिहार्य आहे.

    म्हणूनच स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग खाली आहेत:

    1. सकाळचा नित्यक्रम नेटाने पाळा 

    सकाळची दिनचर्या सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक स्थिर आणि रोज नित्याने करता येण्याजोगी दिनचर्या असणे महत्त्वाचे आहे. ही दिनचर्या तुमचे मन केंद्रित करते आणि तुम्हाला तुमच्या दिवसासाठी आनंदी राहण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करू शकता आणि तुम्हाला हवे ते करू शकता. जेव्हा व्यवसाय स्वतःचा असतो तेव्हा कोणीही तुमचा बॉस नाही आणि कोणीही तुम्हाला काय करावे हे सांगत नाही. त्यामुळे दिवसाची सुरवात पूर्णक्षमतेने करणे हे उत्पादनक्षम ते पूर्णपणे गोंधळलेल्या दिवसांचे मिश्रण हाताळण्यास मदत करते. यामुळे तुम्ही स्वत:ला थोडी स्थिरता देऊ शकता. मनाच्या त्या शांत स्टेज वर पोहचण्यासाठी ध्यानाची गरज आहे.

    Habits For Successful Businessman

    2. उच्च कार्यक्षमता असलेल्या पुस्तकांसाठी वेळ काढा

    Habits For Successful Businessman

    3. तुमच्या आठवड्याचं कामकाज शेड्युल करा

    ऑफिस जॉब करता असताना आठवड्याचं कामकाज शेड्युल केलेलं असतं. कंपनीतील प्रत्येकजण एका किंवा दुसर्‍या मीटिंगसाठी तुमचा वेळ मागत असताना दिसतो. निरर्थक बैठका हे देखील काही लोकांचे नोकर्‍या सोडण्याचे कारण आहे. तुमची स्वतःची स्टार्टअप असल्यावर या निरर्थक मिटिंग संपून जातील. यामुळे कॅलेंडर कसे भरायचे हे तुमच्या हातात असेल. रविवारची संध्याकाळ हि तुमच्या आठवड्याच्या मिटिंग ठरवण्यासाठी असावी. आठवड्याभरात दररोज मोठ्या कामांचे  नियोजन करा. अशा प्रकारे काम केल्यास तुम्ही नेहमी जागरूक असता की तुम्ही कशावर काम केले पाहिजे आणि तुम्ही ट्रॅकवर रहता.

     Habits For Successful Businessman

    4. व्यायामशाळेत जा

    हा खरोखर एक अत्यंत असा योग्य सकाळच्या नित्यक्रमाचा भाग आहे आणि त्याचे फायदे भरपूर आहेत. व्यायामामुळे चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. तुमच्या व्यवसायातील निराशा दूर करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. तुम्ही दररोज व्यायाम केल्यावर तुमचे शरीर आणि मन अधिक आरामशीर होईल. जेव्हा उद्योजक होण्याच्या तणावाचा प्रश्न येतो तेव्हा व्यायाम हि एक गरज आहे. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता.

     Habits For Successful Businessman

    5. कृतज्ञ व्हा

    कृतज्ञता ही एक चांगली गोष्ट आहे. कृतज्ञतेची भावना हि नेहमी माणसाला नम्र ठेवते. तसेच व्यवसाय वाढत असताना होणाऱ्या वेदना, मनाची चलबिचल यावर आराम मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. कृतज्ञतेमुळे शंका आणि अनिश्चितता वेदनांमधून जात असताना किंवा काही चुकीचे होत आहे असे दिसते तेव्हा अनेक गोष्टीतून मार्ग निघतो.

    कृतज्ञता माणसाला प्रगतीच्या नव्या मार्गाला घेऊन जाते. कृतज्ञतेमुळे अनेक माणसे जोडली जातात. ज्याचा तुमच्या व्यवसायामध्ये खूप फायदा होतो. त्यामुळं मानसिक तणावापासून लांब राहून माणसं जोडण्यासाठी नेहमी कृतज्ञ असावं.

     Habits For Successful Businessman

    आणखी वाचा

  • ३.१ शिकण्याच्या पध्दती

    ३.१ शिकण्याच्या पध्दती

    सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शिक्षकांना प्रत्येक विषयाची सक्ती नको असे सांगितले. आम्ही आम्हाला ज्या विषयात गती आहे त्या विषयात चांगला अभ्यास करु अशी विनवणी केली. मात्र शिक्षकांनी त्यांना तुम्ही नापास व्हाल असे सांगितले. तेव्हा सर्वांचा नाईलाज झाला. त्यांनी इतर विषयाचा अभ्यास चालू ठेवला. 

    त्याचा परिणाम असा झाला की, त्यांना ज्या विषयात चांगली गती होती. तो विषय सोडून इतर विषयांचा अभ्यास करताना त्यांच्या पहिल्या विषयाची सुध्दा हालत बेकार झाली. बदकाला उत्तम पोहता येत होते. मात्र वर्षाअखेरीस जेव्हा निकाल लागला तेव्हा बदक ना चालू शकत होते, ना पोहू शकत होते. जमिनीवर धावण्याच्या विषयात पास होण्यासाठी त्याने पोहण्याची क्षमता पण कमी करुन टाकली. कोकिळा पाण्यात पोहू शकली नाही. वर्षाअखेरीस सगळेजण नापास झाले. गरुडाला कावळा आणि कावळ्याला पोपट करण्याच्या या परिक्षा पध्दतीचे आपल्याला नक्कीच हसू आले असेल. ही गोष्ट आपल्या बाबतीत सुध्दा फारशी वेगळी नाही. आपल्या क्षमता आपल्या पालकांना व शिक्षकांना माहिती नसल्याने त्यांनी आपल्याला सरसकट सर्व विषयांचा अभ्यास करायला लावला. परिणामी आपण आपल्या विषयावरची पकड सुध्दा हरवून बसलो. 

    मी शाळेत असताना मला लिहायला व पाठांतर करायला कधीच आवडले नाही. मी कोणत्याही शिक्षकाचे लिहण्याच्या व पाठांतराच्या बाबतीत कधीही ऐकले नाही. प्रसंगी कित्येक वेळा मार खाल्ला. लिहण्याचा सराव नसल्याने परिक्षेत माझे कितीतरी गुणांचे प्रश्न उत्तरे माहित असूनही लिहायचे राहून जायचे. मला परिक्षेत मार्क कमी पडले असतील. मात्र त्या गोष्टी मला येतच नव्हत्या असे नाही. त्याउलट मला वाचनाची, गणिते व शब्दकोडी सोडवण्याची, भाषणे करण्याची प्रचंड आवड होती. त्यात मी रोखूनही कुणाला थांबत नव्हतो. आता मला माझ्या शाळेतील शिक्षक भेटले की, माझे कौतुक करतात. ज्या विद्यार्थ्याचा कल ज्या क्षेत्रात आहे त्याला त्यातच अभ्यास करु दिला पाहिजे. इंग्रजी ही महत्त्वाची भाषा असली तरी मातृभाषेतून लवकर व चांगले शिकता येते. या गोष्टींचा विचार करुन शिकत गेल्यास माणूस लवकर यशस्वी होण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. या सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर एक प्रश्न आपल्या समोर ‘आ’ वासून उभा राहतो. तो म्हणजे, आपल्याला कोणत्या गोष्टीत गती आहे? ते ओळखायचे कसे? हे एकदा ओळखता आले की, मग त्याच तंत्राचा वापर आपल्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी करुन घेता येईल. 

  • 7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

    7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

    उद्योजक हे फक्त नाव एखाद्याला यशस्वी बनवते असे नाही, तर एखादी व्यक्ती त्याचा व्यवसाय कसा चालवतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. “उद्योजक” ही पदवी धारण केल्याने एखाद्याच्या खिशात डॉलरची भर पडत नाही. तुमच्याकडून जे आवश्यक आहे ते तुम्ही न केल्यास, तुम्ही व्यवसायाच्या जगात यशस्वी होणे जवळजवळ अशक्य होईल.

    1. कुटुंबातील अकुशल सदस्य किंवा मित्राला कामावर घेऊ नका

    “यशस्वी नोकरीचे रहस्य हे आहे: ज्या लोकांना जग बदलायचे आहे त्यांना शोधा.” – मार्क बेनिऑफ

    2. तुमच्या व्यवसायाकडे कधीही बँक म्हणून पाहू नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    यशस्वी उद्योजक ते आहेत जे त्यांच्या व्यवसायाला किंवा उपक्रमाकडे बँक म्हणून नव्हे तर समस्या सोडवण्याचे माध्यम म्हणून पाहतात. ते सहसा ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याच्या दृष्टीकोनातून एक किंवा दुसरी समस्या सोडवण्याच्या मार्गांचा विचार करतात. यातून पैसे कसा काढायचा याचा नाही. त्यामुळेच ते त्यांच्या कारकिर्दीची यशोगाथा बनवू शकतात.

    यशस्वी उद्योजक बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍या व्यक्तीने समस्या सोडवण्याचे एक माध्यम म्हणून व्यवसाय उपक्रमाकडे पाहणे आवश्यक आहे. ही मानसिकता उद्योजकाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणते.

    3. आवश्यक असेल तेव्हा प्रश्न विचारा

    Mistakes- avoid-in-startup-business

    जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा खांदे उचलण्याऐवजी किंवा असुरक्षितता दर्शविण्यास घाबरण्याऐवजी, यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणारा उद्योजक हा त्याच्या आधी घडलेल्या उद्योजकांना प्रश्न विचारतो. अर्थात, या लोकांनी भूतकाळात अशाच चुका केल्या असतात, धडा घेतलेला असतो आणि आता ते यातून पुढे आलेले असतात.

    कन्फ्यूशियसच्या मते, “ज्याने प्रश्न विचारला तो एक मिनिटासाठी मूर्ख आहे, जो माणूस विचारत नाही तो आयुष्यभरासाठी मूर्ख आहे.” प्रत्येक व्यवसाय मालकासाठी सुवर्ण नियम लक्षात ठेवा: “स्वतःला तुमच्या ग्राहकांच्या जागी ठेवा. तुम्ही ग्राहकांना खूप वेळ वाट पाहायला लावल्यास, त्यांना जवळचे स्टोअर सापडेलच. पण एकदा गेलेला ग्राहक पुन्हा येणार नाही.”

    4. तुम्ही जे देऊ शकत नाही, त्याचे वचन देऊ नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    जेव्हा ग्राहकांना कळते की तुम्ही विश्वासार्ह नाही, तेव्हा ते तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी परत येत नाहीत. ग्राहकांचा विश्वास हाच तुमच्या व्यवसायाचा पाया आहे. तुम्ही जर ग्राहकांना सांगितलेली एखादी गोष्ट पूर्ण करू शकला नाहीत, तर ते पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना पाहिजे ती वस्तू देण्यासाठी भरपूर व्यावसायिक आहेत. यामुळे ग्राहकाशी वचनबद्ध होताना तेच वचन द्या, जे तुम्ही पूर्ण करू शकाल.

    5. मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे:

    तुमच्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल लोकांना माहिती नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. प्रभावी मार्केटिंग योजनेचा विकास करा आणि तुमच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्केटिंग चॅनेल वापरा. मार्केटिंगवर पैसा खर्च करताना कंजूषपणा करू नका. उलट त्यातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून विक्री कशी वाढवता येईल याकडे लक्ष असू द्या..

    6. व्यवसायाच्या संधींसाठी बाजार संशोधन आणि शोध कधीही थांबवू नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    सततच्या जीवघेण्या स्पर्धेच्या तोंडावर, यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या उद्योजकाने कल्पना किंवा व्यवसायाच्या संधींसाठी बाजार संशोधन आणि शोध कधीही थांबवू नये. कारण ज्या क्षणी तो हे करायचा थांबतो, त्याची उत्पादने किंवा व्यवसाय करण्याची पद्धत ही जुनी फॅशन बनते. त्यामुळे सतत नवीन गोष्टींचा पाठपुरावा करत चला.

    आपल्या स्पर्धकांची उत्पादने आणि जाहिराती पाहून, एक व्यावसायिकाने आपण कोठे कमी पडतो हे पाहून त्या जागा भरल्या पाहिजेत. नवीन व्यवसाय कल्पना अंमलात आणणे किंवा सध्याच्या कल्पनांमध्ये सुधारणा करणे, हे आजच्या वेगवान व्यवसायाच्या वातावरणात उद्योजकांच्या यशासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

    7. तुमच्या व्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टी करणे टाळा

    mistakes-to-avoid-in-startup-

    एक उद्योजक ज्याला, त्याला काय हवं आहे हे माहित आहे, तो ध्येय साध्य करण्यासाठी उद्दिष्टांची मालिका सेट करतो. एकाच वेळी बर्‍याच गोष्टींमध्ये गुंतणे ही व्यावसायिक जगामधील एक त्रुटी आहे. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, व्यावसायिकाने तेच केले पाहिजे जे त्याच्यासाठी महत्वाचे आहे.

    त्याच्या व्यवसायाच्या अस्तित्वाच्या आणि विकासाच्या अनुषंगाने महत्वाच्या नसलेल्या गोष्टी त्याने करू नयेत म्हणून, त्याने त्याची उद्दिष्टे लिहून ठेवली पाहिजेत आणि त्याला प्रथम, द्वितीय, तृतीय, अशा कोणत्या क्रमाने काम करायचे आहे ते ठरवले पाहिजे. उद्योजक एलोन मस्क म्हणाले, “जेव्हा लोकांना लक्ष्य काय आहे आणि का हे माहित असते तेव्हा ते अधिक चांगले कार्य करतात.” जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर फक्त वरील सूचनांचे पालन करा.

    आणखी वाचा