Author: naviarthkranti

  • एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    अश्नीर ग्रोव्हरचा सल्ला

    शार्क टँकचा माजी परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याने नितीन कामथ (Nithin Kamath) यांना आपल्या तब्येतीची काळजी आणि ब्रेक घेण्यास सांगितले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हटले की, “यार, काळजी घे. असे होऊ शकते की, तुझ्यावर तुझ्या वडिलांच्या निधनाचा मोठा परिणाम झाला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावरही खूप परिणाम झाला होता. एक दिवस मी पडलो होतो. एक ब्रेक घेऊन टाक.”

    डॉक्टर काय सांगतात?

    डॉक्टर मनन वोरा यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवरून नितीन यांच्या स्ट्रोकविषयी भाष्य केले. ते म्हणतात की, एक डॉक्टर म्हणून हे संकेत देते की, १८ ते ५५ वयातील व्यक्तींमध्ये ही प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच, त्यांनी हा स्ट्रोक येण्यामागील शक्यताही सांगितल्या आहेत. जेणेकरून तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता.

    १. तीव्र ताण

    भारतात अति-तणावाचे वातावरण असणे हे सामान्य आहे, परंतु कॉर्टिसॉलसारखे भारदस्त तणाव संप्रेरक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, जळजळ होण्यास हातभार लावू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

    २. झोपेची कमतरता

    सतत झोप न लागल्यामुळे सामान्य हार्मोनल संतुलन बिघडू शकते. तसेच, रक्तदाबही वाढू शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि स्ट्रोकचा धोका संभवतो.

    ३. भावनिक आघात

    नितीन यांनी अलीकडेच त्यांचे वडील गमावले होते, ज्यामुळे कदाचित ते कामावर परत जाण्यापूर्वी या गोष्टीतून सावरले नसतील. अचानक भावनिक धक्का किंवा तणाव देखील हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरू शकतो.

    ४. अतिविचार

    व्यायाम करणे सामान्यतः फायदेशीर असले, तरीही जास्त व्यायाम करणे आणि स्वतःवर मर्यादेपेक्षा जास्त जोर देणे, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येऊ शकतो. यामुळेच स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

    ५. पाण्याची कमतरता (Dehydration)

    पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचे रक्त घट्ट होते आणि तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे तुमच्या हृदयावर कालांतराने ताण येऊ शकतो.

    डॉक्टर वोरा पुढे सांगतात की, नितीन यांच्यासोबत जे घडलं, ते कुणासोबतही घडू शकतं, परंतु लक्षणं लक्षात घेऊन आणि लगेच कृती करून तुम्ही तात्काळ बरे होऊ शकता. त्यामुळे तुम्ही स्ट्रोकची लक्षणे FAST या शब्दाद्वारे समजू शकता.

    F: Face dropping (झुकलेला चेहरा)
    A: Arm weakness (हाताला कमजोरी जाणवणे)
    S: Speech difficulty (बोलताना अडचण होणे)
    T: Time to call 102 (१०२ या क्रमांकावर कॉल करणे)

  • श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

    श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

    कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट?

    सध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २२८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आज बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसतात. एलोन मस्क (२०२ अब्ज डॉलर्स) आणि जेफ बेझोस (१९८ अब्ज डॉलर्स) हेदेखील बर्नार्ड यांच्या खाली असून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. लक्झरी गुड्स क्षेत्रातील त्यांचे सम्राज्य जगभरात पसरलेले आहे. लुई व्हिटॉन, डिओर, फेंडी, टॅग ह्यूअर, बल्गरी आणि जिव्हान्ची सारख्या प्रसिद्ध लक्झरी ब्रँड त्यांच्या मालकीचे आहेत. ८० वर्षांच्या वयातही बर्नार्ड अविरत काम करत आहेत आणि नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

    केव्हा बनले होते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

    बर्नार्ड अरनॉल्ट यांनी यापूर्वी डिसेंबर २०१९, जानेवारी २०२०, मे २०२१ आणि जानेवारी २०२४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता.

    कधी केली होती कारकीर्दीची सुरुवात?

    इंजिनियरिंग पदवी घेतल्यानंतर बर्नार्ड यांनी वडिलांच्या बांधकाम व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना अधिक काहीतरी करण्यास प्रवृत्त करत होती. फॅशन क्षेत्राची त्यांना मोठी आवड होती. त्यात यशस्वी होण्याची त्यांना खात्री होती. १९७१ साली बर्नार्ड यांनी फॅशन क्षेत्रात पदार्पण केले. तसेच, स्वतःची कंपनी स्थापन केली. क्रिएटिव्हिटी आणि व्यवसायिक कौशल्य यांच्या मिश्रणामुळे बर्नार्ड यांची कंपनी झपाट्याने यशस्वी झाली. अनेक प्रसिद्ध फॅशन ब्रँड त्याच्या एलव्हीएमएच (LVMH) कंपनीच्या स्वामित्वाखाली आले आणि बर्नार्ड जगातील सर्वात शक्तिशाली फॅशन सम्राट बनले.

    टिफनी अँड कंपनीही केली खरेदी

    जानेवारी २०२१मध्ये बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या एलव्हीएमएच कंपनीने अमेरिकन ज्वेलरी कंपनी टिफनी अँड कंपनीही १५.८ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ही कोणताही लक्झरी ब्रँड खरेदी करण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरली होती.

    द टर्मिनेटर नावाने झालेले प्रसिद्ध

    सन १९८५मध्ये फ्रान्सच्या सरकारने बर्नार्ड यांनी दिवाळखोरीत निघालेली टेक्सटाईल कंपनी बुसॉक खरेदी केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच त्यांनी कंपनीतील ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर त्यांनी याच्या डिओर ब्रँड वगळून अधिकतर संपत्ती विकली. तेव्हापासून बर्नार्ड अरनॉल्ट यांना ‘द टर्मिनेटर’ म्हटले जाऊ लागले.

    आणखी वाचा

  • बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    ‘डॉली चायवाला’ (Dolly Chaiwala) हा बहाद्दर त्याच्या चहा बनवण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्टॉलचे नाव ‘डॉली की टपरी’ (Dolly Ki Tapri) असे आहे. याच नावाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक भारतीयांसोबतच परदेशी व्यक्तीही डॉली चायवालासोबत व्लॉग बनवताना दिसतात. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे.

    डॉली चायवाला याने कुठल्याही साध्या सुध्या नाही, तर चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले अब्जपती आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना चहा पाजला आहे. “वन चाय प्लीज” म्हणत बिल गेट्स ‘डॉली की टपरी’वर चहा पिण्यासाठी हजर झाले होते आणि डॉलीचा चहा पिऊन तेदेखील त्याचे दीवाने झाले. खुद्द बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही भारतात प्रत्येक ठिकाणी इनोव्हेशन पाहू शकता. अगदी साधा चहा बनवतानाही.”

    आता हा व्हिडिओ जगभरात आगीसारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ६ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ४५ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    कोण आहे डॉली चायवाला?

    माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉली चायवाला नागपूरच्या सदर भागातील वीसीए स्टेडिअमजवळ ‘डॉली की टपरी’ नावाने चहाचा स्टॉल चालवतो. डॉली चायवाला सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. नागपूरमध्ये लोक दूरहून या प्रसिद्ध चहावाल्याच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी हजेरी लावतात. डॉली चायवाल्याविषयी बोलायचं झालंं, तर त्याचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तो आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने चहा विकून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

    डॉली चायवाला एवढा प्रसिद्ध आहे तरी का?

    चहाच्या दुनियेत डॉली चायवाला हे नाव आता छोटे राहिले नाहीये. त्याच्या अनोख्या पेहरावासोबतच त्याच्या चहा देण्याच्या टेक्निकमुळे त्याची तुलना चक्क आयकॉनिक, दिग्गज हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपशी केली जाते. त्याच्या ट्रेंडी सेटअप आणि चहा बनवण्याच्या आकर्षक पद्धतीमुळे तो एक सेन्सेशन बनला आहे. स्टायलिश ग्लासेसमध्ये चहा देण्यापासून ते सिगारेट आणि टॉफी क्रिएटिव्ह पद्धतीने देण्यापर्यंत, डॉलीची टपरी नेहमीच चहाच्या शौकिनांनी गजबजलेली असते.

    लोकांच्या प्रतिक्रिया

    जेव्हा डॉली चायवाल्याचा बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला, तसा अनेक लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या की, “मला वाटते की, हे एआय जनरेटेड आहे.” एकाने असेही म्हटले की, “हा डीपफेक आहे का?” दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटले की, “सर, तुमचे बिल ५६७८९० डॉलर्स इतके झाले.” आणखी एकाने कमेंट केली की, “डॉली चायवाला नाही, तर इंडियन जॅक स्पॅरो.”

    बिल गेट्स यांचा भारत दौरा

    खरं तर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी २८ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्टच्या भारत विकास केंद्राचा दौरा केला होता. याच ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी डॉली चायवाल्याला बोलावण्यात आले होते. डॉलीचा भाऊ शैलेश याने माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. शैलेशनुसार, डॉलीला कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करण्यासाठी बिल गेट्स यांच्या ऑफिसकडून बोलावण्यात आले होते. शैलेशने हा संपूर्ण नागपूरसाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले.

  • तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

    तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

    नोकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नोकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो. इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत. खुप लोक अशावेळेस Give Up करतात. आणि आयुष्यभर ‘काश …’ च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात. काही लोक मात्र याला अपवाद असतात. ते टिकून राहतात, लढतात आणि जिंकतात पण. अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची. इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही. Brokeback Mountain, नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत. आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो. पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक, आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी, melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :

    १९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला. माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली.: ‘दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेजच्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकऱ्या किती असतात, तर फक्त २००. ‘तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो. पण त्यामुळे पिता – पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला. पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू.

    पण जेव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती कीती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागलं. एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हतं. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष ही कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती. या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला. सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता. त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला.

    त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो. एक जुनी चिनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची. पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो. या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते. एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच.

    या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल. तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नोकरी करत होती. पण तिच्या नोकरीमधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते. त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या. घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. जेव्हा बायको कामावर जायची तेव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे. फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते. रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला, घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही. मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत.

    हे असलं आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारकच. माझ्या सासू सासऱ्यांना हे डाचत असावं. त्यांनी माझ्या बायकोला काही पैसे देऊ केले. त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु करावं जेणेकरून माझं स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल. माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला. जेव्हा मला याबद्दल कळल तेव्हा मी सुन्न झालो. अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझं चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही. सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

    जड अंत:करणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो. माझ्या बायकोला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला. कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक तिने माझ्या बॅगमध्ये पाहिलं. त्या रात्री ती काहीच बोलली नाही.

    दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली. मी सुन्नपणे बसून होतो. ती घराबाहेर पडली. पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक. घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढंच म्हणाली, “आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस.” तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली. निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारं माझ स्वप्न पुन्हा जिवंत झालं. त्याचा पुनर्जन्म झाला.

    मी ते कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक बॅगमधून बाहेर काढलं. त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले.

    अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही. पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला. मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले. नंतर माझ्या बायकोने माझ्याशी बोलताना कबुली दिली,’ मला नेहमीच असा विश्वास होता की तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठीच झाला आहे. संगणक क्षेत्रात आधीच खूप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरजपण नव्हती.”

    (http://whatshihsaid.com/2013/02/26/ang-lee-a-never-ending-dream/) मुळ लेख इथे आहे.

    Source : http://www.misalpav.com/node/27124

    आणखी वाचा

  • स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    कामात परफेक्शन हवे

    नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    प्रामाणिकपणा

    नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    स्वतःला ठेवा अपडेट

    काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आत्मविश्वास

    आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आणखी वाचा

  • एकेकाळी ८ हजार पगारावर करायचा काम, पण आता हजारो कोटींमध्ये खेळतो; Zerodha च्या मालकाचा रंजक प्रवास

    एकेकाळी ८ हजार पगारावर करायचा काम, पण आता हजारो कोटींमध्ये खेळतो; Zerodha च्या मालकाचा रंजक प्रवास

    यशाचे शिखर गाठणाऱ्या या स्टार्टअपचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, सहा आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. कामथ यांनी ही माहिती त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली. चला तर, नितीन कामथ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    झेरोधा (Zerodha) या स्टार्टअपने ही भारतात ऑनलाईन ट्रेडिंगला लोकप्रिय बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नितीन कामथ यांनी त्यांचा भाऊ निखिलला सोबतीला घेत झेरोधाची स्थापना केली होती. नितीन लाखो युवा उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.

    किती वर्षांचे आहेत झेरोधाचे संस्थापक?

    नितीन कामथ (Nithin Kamat) यांचा जन्म ५ ऑक्टोबर, १९७९ रोजी कर्नाटकाच्या शिमोगा येथे झाला. ४५ वर्षीय नितीन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीईची पदवी घेतली आहे. २००८ मध्ये त्यांनी सीमा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, सीमा या झेरोधामध्ये क्वालिटी चीफ आहेत. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. त्यांची संपत्ती ही जवळपास २.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 22,526 कोटी रुपये आहे. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेले नितीन हे Rainmatter नावाच्या एका व्हेंचर कॅपिटल फर्मचेही सह-संस्थापक आहेत.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    काय म्हणाले नितीन?

    ट्विटरचा वापर कोण करत नाही? अर्थातच सर्वजण करतात. नितीनही एक सक्रिय ट्विटर युजर आहेत. ते नेहमी आपले विचार आणि अनुभव लोकांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांना स्ट्रोक आला, तेव्हा त्यांनी याची माहिती देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “जवळपास सहा आठवड्यांपूर्वी मला अचानक हलका स्ट्रोक आला होता. यामागील कारण, वडिलांचे निधन, व्यवस्थित झोप पूर्ण न होणे, थकवा, शरीरातील पाण्याची कमतरता आणि जास्त काम करणे, यापैकी काहीही असू शकते.”

    कशी झाली सुरुवात?

    नितीन यांनी २०००च्या दशकाच्या सुरुवातीला एक ट्रेडर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. एक वेळ अशी होती जेव्हा नितीन यांना कॉल सेंटरमध्ये ८ हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. त्यावेळी नितीन फक्त १७ वर्षांचे होते. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. नितीन यांनी त्यांच्या याच पगारासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली होती. सुरुवातीला एक वर्ष त्यांनी स्टॉक मार्केटला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, नंतर त्यांना कळून चुकले की, यामधून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    नितीन यांनी २००१ ते २००५ पर्यंत कॉल सेंटरमध्ये काम केले. सन २००५मध्ये त्यांनी आपला एक सल्लागार व्यवसाय सुरू केला. काही वेळानंतर जेव्हा NSEने मोफत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केला, तेव्हा नितीन यांना झेरोधा सुरू करण्याची कल्पना सुचली. कामथ बंधूंनी कोणत्याही फंडिंगशिवाय स्वत:च्या जोरावर २०१० साली बंगळुरूत झेरोधाची सुरुवात केली होती. २०१६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७० हजार एवढी होती. मात्र, डिसेंबर २०१५मध्ये कंपनीने झिरो ब्रोकरेज इक्विटी इन्व्हेस्टिंग सुरुवात केली. त्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.

    मागील वर्षी मिळाली कोट्यवधींची भरपाई

    नितीन आणि निखिल यांना मागील वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १९५.४ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. यादरम्यान दोन्ही भावांना प्रत्येकी ७२ कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळाला. म्हणजेच दोन्ही भावांना दर महिन्याला ६ कोटी रुपये पगार मिळाला.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    कंपनीचा फायदा

    झेरोधा या कंपनीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न हे ३८.५ टक्क्यांच्या वाढीसह ६८७५ कोटी रुपये राहिले होते. हेच उत्पन्न २०२२च्या आर्थिक वर्षात ४,९६४ कोटी रुपये होते. यादरम्यान कंपनीचा नेट प्रॉफिटही ३९% वाढून २९०७ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२२मध्ये हे उत्पन्न २०९४ कोटी रुपये होते. कंपनीचे मूल्य पाहायचे झाले, तर तब्बल ३०००० कोटी रुपये आहे. हा नफा वार्षिक नफ्यापेक्षा जवळपास १० पटींनी जास्त आहे. स्टार्टअप कंपन्यांमध्ये कामथ बंधूंची संपत्ती ही सर्वाधिक आहे.

    आणखी वाचा

  • यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

    यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

    मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे, जिने प्रत्येकाला फोन वापरण्याची सवय लावली होती. ही रिलायन्स कंपनी आज भारतातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनीही आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही १११ बिलियन डॉलर्स एवढी आहे. एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधी-अब्जो रुपये एका दिवसात किंवा एका रात्रीत कमावले जात नाहीत. यामागे त्यांचे वडील स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांची कठोर मेहनत राहिली आहे. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. तसं पाहिलं, तर मुकेश अंबानींना हा व्यवसाय वारशात मिळाला आहे, पण त्यांनीही आपलं डोकं लावून आणि कठोर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून यशस्वी बनण्याच्या त्यांच्या ५ नियमांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हीही बिझनेस किंग बनू शकता.

    यशस्वी बनण्यासाठी मुकेश अंबानींचे ५ नियम (Mukesh Ambani’s 5 rules to success)


    १. धैर्यवान बना

    मुकेश अंबानी यांनी यशस्वी बनण्यासाठी सांगितलेला पहिला नियम म्हणजे धैर्यवान बना. व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात धैर्याशिवाय कोणीही मोठे यश मिळवले नाहीये. अर्थातच, तुम्ही एखादी मोठी गोष्ट करायला जाता, तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटते. मात्र, तुमच्यात दडलेला नायक शोधण्यासाठी तुम्हाला भीतीवर विजय मिळवावाच लागेल. धैर्याने, आत्मविश्वासाने कोणत्याही संकटावर मात करू शकता.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    २. समस्या शोधा आणि त्यावर तोडगा काढा

    अंबानींचा दुसरा नियम असा की, एक उद्योजक म्हणून, तुम्हाला ज्या समस्येचे निराकरण करायचे आहे ती शोधणे खूप महत्वाचे आहे. अंबानी सांगतात, ममला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मध्ये प्रोफेसर शर्मा मिळाल्याने मी धन्य झालो. ते नेहमी म्हणायचे की, मी तुम्हाला समस्यांची यादी देणार नाही. तुम्ही जाऊन कोणत्याही गोष्टीवर काम करू शकता. तुम्हाला एखादी समस्या सापडेल आणि मग तुम्हाला सापडलेल्या समस्येच्या आणि त्यावर शोधलेल्या निराकरणाच्या गुणवत्तेवर मी तुम्हाला ग्रेड देईन. त्यामुळे उद्योजकाला हेच नियम लागू होतात की, तो समस्या सोडवत नाही, तर तो प्रथम समस्या शोधतो. एकदा तुम्हाला समस्या सापडली की, तुम्ही ती सोडवता.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ३. कठोर मेहनत करा

    अंबानी म्हणतात, तुमचे धावण्याचे शूज घाला, परंतु लक्षात ठेवा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश हे स्प्रिंट (Sprint) नसून एक मॅरेथॉन आहे. आपण एका गतिमान जगात राहत असल्याने भाग्यवान आहोत, जिथे काहीही शक्य आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, असे रातोरात यश मिळत नाही. तुम्हाला समर्पित व्हावे लागेल. एकल मनाने राहावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागेल. यातील कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही. तसेच, हेही लक्षात ठेवा की, जीवनाच्या या मॅरेथॉनमध्ये आपले ध्येय साध्य करणे महत्वाचे आहे.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ४. उच्च उद्देशाची सेवा करा

    वडील धीरूभाई अंबानी यांनी १०० डॉलर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुरू केल्याचे मुकेश अंबानी सांगतात. ते म्हणतात, १९८० मध्ये जेव्हा मी व्यवसाय जॉईन केला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य हे ३० किंवा ४० दशलक्ष डॉलर्स होते. पुढच्या ३० वर्षात, या देशाने दिलेल्या संधींमुळे आम्हाला भारतासाठी संपत्ती निर्माण करता आली.

    माझ्या वडिलांचा मोठा विश्वास होता की, कोणताही व्यवसाय ज्याचा एकमेव उद्देश पैसा कमविणे हा आहे तो करणे योग्य नाही. खरं तर, व्यवसाय हा एक मोठा सामाजिक हेतू पूर्ण केला पाहिजे. रिलायन्सने आपले सर्व पैसे भांडवली बाजारातून आणि वैयक्तिक लहान भागधारकांकडून उभे केले, म्हणून आम्ही सामान्य भारतीयांपैकी फक्त रिलायन्समध्ये गुंतवणूक करून दहा लाख करोडपती निर्माण केले आहेत आणि हीच देशासाठी संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संधी निर्माण झाली की संपत्ती ही येतेच.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ५. अपयश स्वीकारा

    अंबानी असेही म्हणतात की, अपयश हे सामान्य असते. सर्व यश पाहून, माझ्या स्वतःच्या बाबतीतही लोक हे पाहत नाहीत की, यशस्वी होण्यापूर्वी मी किती वेळा अयशस्वी झालो आहे. तुम्ही यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहात. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. त्याच्याकडून शिका, पण हार मानू नका.

    आणखी वाचा

  • फसव्या ‘लोन ॲप’वर अंकुश; अर्थमंत्री सीतारामन यांचे नियामकांना आणखी कठोर पावले टाकण्याचे निर्देश

    फसव्या ‘लोन ॲप’वर अंकुश; अर्थमंत्री सीतारामन यांचे नियामकांना आणखी कठोर पावले टाकण्याचे निर्देश

    येथे आयोजित वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या (एफएसडीसी) २८ व्या बैठकीपुढे बोलताना, सीतारामन यांनी नियामकांना सतत जागरुक राहण्यास आणि देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, आर्थिक स्थिरतेला जोखीम ठरणाऱ्या संभाव्य घटकांना शोधून ते पटलावर आणण्यासाठी दक्ष आणि सक्रिय राहण्यास सांगितले.

    Crackdown on fraudulent 'loan apps'; Finance Minister Sitharaman directs regulators to take tougher steps

    वित्तीय क्षेत्रातील वेगवेगळ्या नियामकांना भेडसावणारे सामाईक मुद्दे, ज्यामध्ये एकसमान केवायसी मानदंड निर्धारित करणे, संपूर्ण वित्तीय क्षेत्रातील केवायसी नोंदींची आंतर-उपयोगिता आणि केवायसी प्रक्रियेचे सरलीकरण आणि डिजिटलीकरण यांचा देखील चर्चेत समावेश होती. ऑनलाइन ॲप्सद्वारे अनधिकृत कर्ज देण्याचे हानिकारक प्रभाव रोखणे आणि त्यांचा पुढील प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे हा त्यापैकीच एक चर्चेचा मुद्दा होता.

    सरकारने डिसेंबरमध्ये संसदेला दिलेल्या माहितीप्रमाणे, गूगलने एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत प्ले स्टोअरवरून तब्बल २,५०० फसव्या कर्ज प्रदात्या ॲप काढून टाकली आहेत. वित्तीय क्षेत्रातील नियामकांनी सक्रिय राहणे, सतत दक्ष राहून सायबर सुरक्षा तैनात ठेवणे आणि भारताच्या वित्तीय व्यवस्थेतील अशा कोणत्याही त्रुटी-उणीवा कमी करण्यासाठी योग्य आणि वेळेवर कारवाई करणे हे उद्दिष्ट असायला हवे, असे अर्थमंत्र्यांनी सूचित केले.

    रिझर्व्ह बँख गव्हर्नर शक्तीकांत दास, सेबी अध्यक्षा माधबी पुरी बुच, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (इर्डा) अध्यक्ष देबाशिष पांडा, दिवाळखोरी आणि नादारी बोर्डाचे अध्यक्ष रवी मित्तल, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मोहंती आणि इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटीचे (आयएफएससी) अध्यक्ष के. राजारामन हे या बैठकीला उपस्थित होते. यांच्याशिवाय, केंद्रीय वित्त सचिव टी व्ही सोमनाथन, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, वित्तीय सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी आणि महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.


    या बचत योजनांबाबत बदलले नियम, गु्ंतवणूकदारांनो काळजी घ्या; ३१ मार्चपर्यंत ‘ही’ कामे केली नाहीत तर दंड द्यावा लागेल

    दरवर्षी आर्थिक योजनांमध्ये मोठे बदल होत असतात. या वर्षीसाठी विविध लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि NPS च्या गुंतवणूकदारांना दंडासह इतर नुकसान होऊ शकते. या कोणत्याही योजनेत तुमची गंतवणूक असल्यास ही काम करुन घेणे तुमचे देखील यापैकी कोणत्याही योजनेत खाते असल्यास ३१ मार्चपर्यंत ही कामे करुन घेणे गरजेचे आहे.

    या आर्थिक वर्षात अजुनही खात्यात पैसे जमा केले नाहीत तर नुकसान होऊ शकते, तुमच्याकडे खाते सुरू ठेवण्यासाठी फक्त ३१ मार्चपर्यंत वेळ आहे. तुम्ही किमान वार्षिक ठेव चुकवल्यास, तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. तसेच, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

    Crackdown on fraudulent 'loan apps'; Finance Minister Sitharaman directs regulators to take tougher steps

    PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत किमान ठेव ठेवण्याची अंतिम तारीख प्रत्येक आर्थिक वर्षाची ३१ मार्च आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ही तारीख ३१ मार्च २०२४ आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी नियम २०१९ नुसार, PPF खातेधारकांना प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. किमान रक्कम जमा न केल्यास पीपीएफ खाते बंद केले जाईल.

    खाते बंद झाल्यानंतर कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा सुरू होणार नाही. खाते पूर्णपणे बंद केल्याशिवाय तुम्ही तुमच्या नावावर दुसरे खाते उघडू शकणार नाही. बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा उघडता येते, पण यासाठी तुम्हाला दरवर्षी ५० रुपये दंड भरावा लागेल. दंडासोबतच व्यक्तीला वार्षिक किमान ठेव म्हणून ५०० रुपये देखील जमा करावे लागतील. किमान ठेव न भरल्यामुळे खाते बंद झाल्यास, ते पुन्हा उघडण्यासाठी तुम्हाला दरवर्षी ५५० रुपये द्यावे लागतील.

    सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीची योजना आहे. मुलींच्या करिअरसाठी आणि लग्नासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. जर तुमचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान २५० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही हे पैसे जमा केले नाहीत तर खाते डिफॉल्ट मानले जाते. खाते पुन्हा उघडण्यासाठी वर्षाला ५० रुपये दंड भरावा लागेल. तसेच, दरवर्षी किमान २५० रुपये जमा करावे लागतील.

    जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जुन्या कर प्रणालीमध्ये कर भरण्याचा विचार करत असाल, तर PPF आणि सुकन्या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर वाचवण्याची संधी मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, PPF आणि सुकन्यामधील गुंतवणुकीवर १.५ लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे. 80C अंतर्गत कपातीचा लाभ घेऊन कर ओझे कमी करण्यासाठी, ३१ मार्च २०२४ पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी कर बचत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. तुम्ही या तारखेपर्यंत गुंतवणूक न केल्यास, तुम्ही त्या आर्थिक वर्षात कपातीचा दावा करू शकणार नाही.

    आणखी वाचा

  • इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

    इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

    कोण आहेत ते चार अंतराळवीर?

    गगनयान मोहिमेअंतर्गत भारताचे अंतराळवीर स्वतःच्या बळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये तब्बल ६ टन वजनाचे अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. या यानाची क्षमता ४ अंतराळवीर सामावतील इतकी असणार आहे. विशेष म्हणजे, हे यान पृथ्वीपासून तब्बल ४०० किमी अंतरावर ३ दिवस प्रदक्षिणा घालेल, असे गगनयान मोहिमेचे नियोजन असेल.

    अशात या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या चार अंतराळवीरांची नावेही समोर आली आहेत. त्यात ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. हे चारही वैमानिक बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. इतकंच नव्हे, तर रशियात या चौघांनीही काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक असलेले प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चारही वैमानिकांना ऍस्ट्रोनॉट विंग्स (अंतराळवीर पंख) देऊन जगापुढे सादर केले. तसेच, त्यांना पुढील तयारीसाठी शुभेच्छाही दिल्या.

    देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव

    या चारही वैमानिकांबाबत महत्त्वाची बाब अशी की, त्यांनी देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. या चौघांनीही प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानांची सखोल माहिती आत्मसात केली आहे. त्यांनी विमानांची वैशिष्ट्ये आणि कमतरता यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ज्ञान समृद्ध केले आहे. त्यामुळे या चौघांची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

    राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर

    यापूर्वी एप्रिल १९८४ मध्ये राकेश शर्मा हे तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या Soyuz-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर बनले होते. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी इतर देशांचे प्रतिनिधित्व करत अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली होती.

    मात्र, आतापर्यंत भारताला स्वत:च्या बळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवता आला नव्हता. त्यामुळे आता देशाचे चारही अंतराळवीर पुढील वर्षी म्हणजेच २०२५च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेतून अवकाश वारी करतील.

  • गाव खेड्यातील लाखो गरिबांना दृष्टी देणारा डोळ्यांचा डॉक्टर

    गाव खेड्यातील लाखो गरिबांना दृष्टी देणारा डोळ्यांचा डॉक्टर

    Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

    या डॉक्टरला महिन्याला ३० रुपये मजुरीसाठी रोज खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी आणावे लागले.या डॉक्टरला MBBS ला ॲडमिशन घेतल्यावर वसतिगृहातील ७ मुलांचा रोज स्वयंपाक करावा लागला. का? तर जेवण फुकट मिळायचे म्हणून..

    अथक परिश्रम करून तो एक नेत्रतज्ज्ञ बनला…

    १९९१ साल उजाडलं या डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या डॉक्टरांनी एका वर्षांतच तुम्ही मरणार असे भाकीत केलं आईनं अंजनाबाईनं स्वत:ची किडनी दिली. पुनर्जन्म मिळाला. आणि पुढील आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी व्यतीत करायचं हा निर्णय त्याने घेतला आजवर या अवलिया डॉक्टरने सव्वा कोटींवर रुग्णांची तपासणी केली आहे. तर, त्यापैकी दीड लाख वृद्धांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. जन्मत: अंध असलेल्या १० हजार रुग्णांच्या आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरण्याचं काम केलं. एक लाख शस्त्रक्रिया केल्याबद्दल या डॉक्टरचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला असा हा अवलिया डॉक्टर म्हणजे डॉ. तात्याराव लहाने.

    Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

    मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांचे काम चालत असले तरी विविध शिबीरांच्या निमित्ताने त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. आनंदवन येथे डॉ. बाबा आमटे यांच्या पुढाकाराने झालेल्या शिबीरातून त्यांनी दुर्गम भागातील अनेक मोतीबिंदू झालेल्या आदिवासी बांधवांनाही दृष्टी दिली.

    तळातील कष्टकरी तसेच हायप्रोफाईल व्यक्तींवरही त्यांनी यशस्वी उपचार केले. बारामतीतील शिबीरात एक एडसग्रस्त व्यक्ती होती, तिच्यावर कोणीच उपचार करायला तयार नव्हते, त्या व्यक्तीची खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करुन घेण्याची परिस्थितीही नव्हती. लहाने यांनी त्याला तपासून लगेचच शिबीरात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रीया केली, त्याला दिसू लागले.

    Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

    ६६७ वैद्यकीय शिबिरांमधून तीस लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार आणि १८० हून अधिक शिबिरांमधून एक लाख ३० हजार रुग्णांना दृष्टी देणाऱ्या शस्त्रक्रिया एवढे अफाट काम त्यांनी केले. लातूरमधील मकेगावसारख्या लहानशा खेडयातून मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे सहसंचालक या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सारं काही सांगणारा आहे. नुकतेच डॉ. लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर निवृत्त झाले.

    प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय गाठणारा एक ध्येयवादी म्हणून डॉ. लहानेंचं नाव घेता येईल. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.