Author: naviarthkranti

  • उद्योजकांनो, ‘या’ 5 प्रकारे करा तुमच्या व्यावसायिक मालमत्तेचे संरक्षण, पाचवा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

    उद्योजकांनो, ‘या’ 5 प्रकारे करा तुमच्या व्यावसायिक मालमत्तेचे संरक्षण, पाचवा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

    १. धोक्यांचे मूल्यांकन करा
    सर्वात प्रथम, आपल्या मालमत्तेला कोणत्या प्रकारचे धोके असू शकतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी, आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारच्या धोक्यांचे मूल्यांकन करणारे एक सखोल “जोखीम मूल्यांकन” (Risk Assessment) करा. भौतिक सुरक्षा (जसे की, CCTV वगैरे.), सायबर सुरक्षा, कर्मचारी चोरी आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या गोष्टींचा विचार करा. धोक्यांची जाणीव झाल्यावर, आपण त्यांना रोखण्यासाठी योजना आखू शकता.

    २. प्रवेशावर नियंत्रण ठेवा
    संवेदनशील क्षेत्र आणि माहितीमध्ये प्रवेश मर्यादित करणे, हे आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी, RFID कार्ड, पासवर्ड लॉक आणि बायोमेट्रिक स्कॅनर यांसारख्या प्रवेश नियंत्रण उपाययोजना राबवा. यामुळे अनधिकृत प्रवेश आणि चोरी रोखण्यास मदत होईल.

    ३. सुरक्षा प्रणालींमध्ये गुंतवणूक करा
    सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म आणि सॉफ्टवेअर यांसारख्या सुरक्षा प्रणाली स्थापित करणे आपल्या व्यावसायिक मालमत्तेसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. या प्रणाली चोरी आणि तोडफोड रोखण्यास मदत करतात आणि सुरक्षा घटना घडल्यास पुरावे देखील देतात. यासोबतच तुम्ही आपल्या स्थानिक व्यावसायिक कुलूप बनवणाऱ्याशी संपर्क करून स्मार्ट किंवा अतिरिक्त टिकाऊ लॉक मिळवू शकता. तुमच्या मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित सुरक्षा (Security) प्रणालींवर गुंतवणूक करणे हा फायद्याचा खर्च ठरतो.

    ४. डेटाचा नियमितपणे बॅकअप ठेवा
    आजच्या डिजिटल युगात, डेटा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सायबर हल्ला, हार्डवेअर खराब होणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे डेटा गमावण्यापासून बचाव करण्यासाठी आपण नियमितपणे डेटा बॅकअप घेणे आवश्यक आहे. ऑफसाईट किंवा क्लाऊड बॅकअप डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतील. विश्वासार्ह बॅकअप घेऊन, तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुमची महत्त्वाची व्यावसायिक माहिती सुरक्षित आहे.

    ५. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
    आपले कर्मचारी हे आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यातील पहिली पायरी आहेत. त्यांना सुरक्षा प्रोटोकॉल आणि आपत्कालीन प्रक्रियांबद्दल प्रशिक्षण द्या. यामुळे ते सुरक्षा धोक्यांना ओळखण्यास आणि त्यांचा सामना करण्यास सक्षम बनतील. तुमच्या मालमत्तेचे प्रभावीपणे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या संस्थेमध्ये सुरक्षा जागरूकता संस्कृतीला प्रोत्साहन द्या.

    या सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपण आपल्या व्यावसायिक मालमत्तेचे रक्षण करू शकता. तसेच, आपल्या यशाची आणि दीर्घकालीन टिकून राहण्याची शक्यता वाढवू शकता.

  • अर्थशास्त्र

    अर्थशास्त्र

    अर्थव्यवस्थांचे प्रकार –

    जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात.

    १) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार
    २) विकासाच्या अवस्थेनुसार.BYHIS
    १) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार याचे पुन्हा तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. अ)भांडवलशाही अर्थव्यवस्था
    ब)समाजवादी अर्थव्यवस्था
    क)मिश्र अर्थव्यवस्था

    अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy) –

    ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने खासगी मालकीची असतात.

    वैशिष्टय़े –

    १) उत्पादक उपभोगाच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतात.
    २) ग्राहक सार्वभौम असतात, त्यांच्या पसंतीनुसारच उत्पादन केले जाते. थोडक्यात, उपभोक्ता बाजारपेठेत राजा असतो.
    ३) किंमत ठरविण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्तअसते. म्हणून या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असेदेखील म्हणतात. (Laissez faire).
    ४) उत्पादन हे नफा मिळविण्याच्या हेतूने केले जाते.

    दोष – आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरिबी व श्रीमंतांची दरी वाढत असते. त्याप्रमाणे गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण आदींचा विचार केला जात नाही.

    ब) समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy) –

    ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीची असतात, त्यांना समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात.

    वैशिष्ट्ये –

    १) उत्पादनांची साधने सरकारी मालकीची असतात.
    २) वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेते.
    ३) या व्यवस्थेत ग्राहक सार्वभौम ठरत नाही.
    दोष- यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होतो. कधीकधी सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होतो. कार्यक्षमता, उत्पादकता कमी होते.

    क) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed Economy)-

    ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात.

    वैशिष्टय़े-

    १) खासगी मालमत्तेचा मर्यादित हक्क असतो.
    २) काही उद्योगांची उभारणी सरकारी व खासगी स्तरावर केली जाते.
    ३) भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष टाकून चांगल्या गुणांचा समन्वय या अर्थव्यवस्थेत करण्यात आला आहे.

    विकसित अर्थव्यवस्था- ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते. मोठय़ा प्रमाणावर औद्योगीकरण, शहरीकरण झालेले असते. त्याचप्रमाणे साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर व मृत्युदराचे प्रमाण कमी असते. उदा. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इ

    विकसनशील अर्थव्यवस्था– ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते. मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात.
    उदा., भारत, श्रीलंका, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील काही देश.

    आधारभूत वर्ष (Base Year)- वस्तू आणि सेवांच्या किमती अस्थिर असल्यामुळे खरे राष्ट्रीय उत्पन्न वाढते आहे किंवा किमती वाढल्या आहेत हे कळत नाही, म्हणून उत्पन्नाची मोजणी एखाद्या स्थिर वर्षांची तुलना करून केली जाते. या स्थिर वर्षांला आधारभूत वर्षे असे म्हणतात. २०१०मध्ये अभिजीत सेनगुप्ता समितीच्या शिफारशीवरून २००४-२००५ हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. उदा. २०१२ मध्ये मोजल्या जाणाऱ्या सर्व वस्तू व सेवांच्या किमती २००४-२००५ मधील किमतीशी तुलना करून मगच मोजल्या जातील.

    हरित जी.डी.पी. (Green GDP) – बऱ्याच वेळा आर्थिक विकास होताना नसíगक स्र्रोतांचा ऱ्हास होत असतो. या सर्व घटकांचा विचार करण्यासाठी हरित जी.डी.पी. ही संकल्पना १९९५मध्ये उदयास आली. हरित जी.डी.पी.ला Health of Nations असेही म्हणतात. प्रमुख संख्याशास्त्रज्ञ प्रणब सेन यांच्या अध्यक्षतेखाली २०१५ पासून हरित जी.डी.पी.चे आकडे प्रकाशित करण्याचा प्रयत्न चालू आहे.

    केंद्रीय सांख्यिकी संघटन (CSO) – भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी Central Statistical Organisation कडे आहे. या संस्थेच्या स्थापनेची घोषणा १९५४मध्ये करण्यात आली. उरड चे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ठरडला मदत करण्यासाठी National sample survey organization

    ( NSSO) ची स्थापना करण्यात आली.
    मायक्रोइकॉनॉमिक्स (Micro Economics) – यात बाजारपेठेतील विक्रेता आणि ग्राहक या मूलभूत घटकाचा अभ्यास केला असतो.
    उदा. पुस्तकबांधणी, आगकाडय़ा तयार करणे तसेच खरेदीदार, विक्रेता या घटकांचा विचार केला असतो.

    मॅक्रोइकॉनॉमिक्स (Macro Economics ) – यात अर्थव्यवस्थेच्या व्यापक घटकांचा विचार केलेला असतो. म्हणजे यात राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण यांचा अभ्यास केलेला असतो.

    आणखी वाचा

  • चेक म्हणजे काय?

    चेक म्हणजे काय?

    चेक (धनादेश) ही सुविधादेखील त्यापैकी एक. बँकेने निर्धारित केलेली रक्कम तुमच्या खात्यावर असल्यास बँक तुम्हाला चेकबुक सुविधा देते. वैयक्तिक व्यवहार,कंपनीचे व्यवहार हे चेकद्वारे सोप्या आणि सहज पद्धतीने होतात. चेकद्वारे केलेला व्यवहार हा सुरक्षित असतो.

    चेकचे दोन प्रकार असतात.

    • बेअरर चेक
    • क्रॉस चेक

    बेअरर चेक – बेअरर चेकद्वारे आपण निर्धारित केलेली रक्कम संबंधित बँकेतून काढू शकतो. उदारणार्थ, तुम्हाला अक्षयने ५,000/- रुपयांचा एखाद्या बँकेचा बेअरर चेक दिला. तर तुम्ही ती रक्कम त्या बँकेच्या शाखेत जाऊन काढू शकता.

    क्रॉस चेक – क्रॉस चेक हा आपल्या बँक अकाउंटवर जमा करून निर्धारित रक्कम आपण मिळवू शकतो. उदारणार्थ, तुमचे नाव सागर गोते या नावाने कंपनीने तुम्हाला क्रॉस चेक दिला, तर तो चेक तुमच्या बँक अकाउंटवर जमा करावा लागतो, त्यानंतर २ ते ३ दिवसात चेकवरील रक्कम तुमच्या बँक अकाउंटवर जमा होते.

    चेक बाउंस म्हणजे काय?

    चेक बाउंस झाला म्हणजे नेमके काय ? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने
    तुम्हाला ५,000/- रुपयांचा चेक दिला आणि ती रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. म्हणजे तो चेक बाउंस झाला असे समजावे. चेक बाउंस होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात.
    कधी कधी बँक अकाउंटवर रक्कम नसली, तरी खातेदार चेक देऊन फसवतात. अशावेळी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. तुम्हाला दिलेला चेक बाउंस झाला, तर तुम्ही कलम १३८,निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा, १८८१ द्वारे तुम्ही न्यायालयीन कारवाई करू शकता.

    चेक बाउंसची कारणे?

    बँक खात्यामध्ये निर्धारित रक्कम नसणे – चेकवर लिहिलेली रक्कम संबधित बँक अकाउंटवर नसल्यास चेक बाउंस होतो. उदाहरणार्थ, अक्षयने संग्रामला ५,000/- रुपयांचा चेक दिला. परंतू अक्षयच्या बँक अकाउंटवर फक्त ४800/- रुपयेच आहेत. चेकवर लिहिलेली रक्कम अक्षयच्या बँक अकाउंटवर नसल्यामुळे संग्रामला दिलेला चेक हा बाउंस होतो.

    सहीमधील फरक – चेकवरील सही तपासून बँकेकडून संबंधित व्यक्तीला चेकची रक्कम दिली जाते. खातेदाराच्या चेकवरील सहीमध्ये फरक असेल किंवा चुकीची सही असेल, तर चेक बँकेकडून बाउंस होतो.

    चेकवरील ओव्हर रायटिंग – चेकवर ओव्हर रायटिंग किंवा खाडाखोड केली आणि त्या ठिकाणी सही नसली, तर चेक बाउंस होतो.

    चेक बाउंस झाल्यावर काय करावे?

    चेक बाउंस झाल्यावर पहिल्यांदा ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिला आहे, त्या व्यक्तीशी संपर्क साधावा. त्या व्यक्तीला त्यासंदर्भात कल्पना द्यावी. त्या व्यक्ती कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला किंवा त्याने कबूल केले की चेक चुकून बाउंस झाला आहे. तर त्याला रक्कम देण्यासाठी थोडा वेळ द्यावा. जर चेक देणार्या व्यक्ती काही प्रतिसाद दिला नाही, तर त्यावर तक्रार किंवा कायदेशीर कारवाई करता येवू शकते.

    कायदेशीर नोटीस – चेक बाउंस झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत चेक देणार्या व्यक्तीस किंवा कंपनीस कायदेशीर नोटीस द्यावी. ही नोटीस स्वतरू किंवा वकिलामार्फत आपण पाठवू शकतो. कायदेशीर नोटीसपाठवताना आपले नाव, ज्या व्यक्ती किंवा कंपनीने चेक दिला आहे त्याचे नाव, पत्ता, बँकेचे नाव पत्ता, चेक बाउंसचे कारण, इत्यादी बाबी अर्जात नमूद कराव्या. अर्ज स्वतरू संबधित व्यक्तीध्संस्थेला देऊन त्यांना अर्ज मिळाल्याची प्रत (Received Copy) घ्यावी किंवा रजिस्ट्रर पोस्टाने अर्ज पाठवून त्याचा पुरावा स्वतरूकडे ठेवावा. पुढील कारवाईसाठी त्या कागदपत्रांचा उपयोग होतो.

    👍 चेक बाबतच्या टिप्स

    • चेक वटण्याची मुदत सहा महिन्यापेक्षा कमी करता येते.
    • चेकवर लिहिलेली अक्षरी रक्कमच गृहीत धरली जाते.
    • चेक क्लिअरिंग प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून चुंबकीय शाई (MICR) वापरण्याची आधुनिक समाशोधन पद्धती अस्तित्वात आली.
    • खाते बंद असताना धनादेश देणे हा फौजदारी गुन्हा आहे.
    • देणगीचा चेक परत गेल्यास गुन्हा होत नाही.

    आणखी वाचा

  • उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासनतास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्‍याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत!

    ‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्‍वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला.

    एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्‍यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्‍या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनं पैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!

    ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ – न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व – बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलेनिअर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.

    हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही….!

    • Gunvant Sarpate

    आणखी वाचा

  • मार्केटिंग क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि करिअर संधी यांची सविस्तर माहिती.

    मार्केटिंग क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि करिअर संधी यांची सविस्तर माहिती.

    मार्केटिंग विषयाचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना प्रकल्प व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, बाजारपेठीय विश्लेषक आदी करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रात येण्यासाठी मार्केटिंग विषयातील एमबीए ही पदव्युत्तर पदवी किंवा याच विषयातील एक अथवा दोन वर्षे कालावधीचे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदविका प्राप्त असणे उपयुक्त ठरू शकते. बॅचरल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन मार्केटिंग मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमसुद्धा या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मार्केटिंग क्षेत्राव्यतिरिक्त ब्रँड मॅनेजमेंट, जाहिरात कम्युनिकेशन या क्षेत्रांतही करिअर करता येऊ शकते.

    कोणत्याही कंपनीला अथवा उद्योगाला वित्तीय यश प्राप्त होण्यासाठी प्रतिभावंत मार्केटिंग व्यवस्थापकांची गरज भासते. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालेला उमेदवार स्वत:च्या परिश्रमाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर अल्पावधीत मार्केटिंग मॅनेजर अथवा प्रॉडक्ट मॅनेजर या पदापर्यंत पोहोचू शकतो.

    एमबीए किंवा दोन वर्षे कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयाचे पदवीधर अर्ज करू शकतात. बहुतेक सर्व व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमांना लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखत या तीन टप्प्यांद्वारे प्रवेश दिला जातो. नामवंत संस्थेतून एमबीए केलेल्या उमेदवारांना त्यांच्या मनाप्रमाणे कंपनीची अथवा उद्योगाची निवड करता येऊ शकते. काही उमेदवारांची निवड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, चॅनेल सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर म्हणून होऊ शकते. अन्न प्रक्रिया उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये मार्केटिंग विषयातील मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते. या कंपन्या उमेदवारांना उत्तम वेतन, भत्ते व इतर वित्तीय लाभ देतात. माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील व्यापाराचा वाढ व विस्तार हा मार्केटिंग तज्ज्ञांच्या साहाय्याने केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांना करिअर संधी उपलब्ध होतात. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना सध्या मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्ह या मनुष्यबळाची गरज भासते आहे.

    मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्हला ग्राहकांसोबत उत्तम संबंध निर्माण करणे आवश्यक ठरते. त्यामुळे मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्केटिंग कम्युनिकेशन ही ज्ञानशाखा कला आणि शास्त्र या दोन्हींचा समन्वय साधणारी आहे. या विषयातील तज्ज्ञांना कंपनीच्या वस्तू आणि उत्पादन वाढीसोबत कंपनीचे सकारात्मक ब्रँडिगसुद्धा करावे लागते. त्यासाठी त्याला विविध माध्यमांचा प्रभावीरीत्या उपयोग करून माहितीची देवाणघेवाण करावी लागते. या क्षेत्रातील उमेदवाराला नवनव्या कल्पनांचा सातत्याने वापर करता येणे गरजेचे असते.

    मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्रामुळे कंपनीच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी नवी व्यूहनीती अमलात आणणे शक्य झाले आहे. यामुळे कंपनीच्या अथवा उद्योगाच्या संपूर्ण उलाढालीवर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मार्केटिंग कम्युनिकेटरला निश्चित अशा ग्राहकांकडे प्रभावीपणे कंपनीच्या वस्तुनिष्ठ माहितीसह वस्तूंची अथवा उत्पादकांची विक्री वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतात. कंपनी आणि उत्पादकांबाबत जाणीवजागृती करणे, जुन्या ग्राहकांचा विश्वास कायम राखणे, नव्या आणि युवा ग्राहकवर्गाला आकर्षति करणे, ग्राहकांच्या मनात कंपनी व उत्पादकांबाबत विश्वास निर्माण करणे, कंपनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवणे आणि त्यास अधिक सक्षम करणे या बाबींवर मार्केटिंग कम्युनिकेटरला लक्ष केंद्रित करावे लागते. नव्या वैश्विक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना काम करावे लागते.

    हे क्षेत्र बहुज्ञानशाखीय असे झाले असून त्यामध्ये अर्थशास्त्र, वाणिज्य, समाजशास्त्रे, व्यवस्थापन आणि कम्युनिकेशन या विषयांचा समावेश होतो. जाहिरात, विक्री, विपणन, जनसंपर्क, थेट आणि व्यक्तिगत विक्री असे घटक यांत अंतर्भूत झाले असून त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या वस्तू आणि उत्पादनांना गतिमानतेने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बाबींचा एकत्रितरीत्या वापर करण्याचे कौशल्य या क्षेत्रातील तज्ज्ञास प्राप्त करावे लागते. या सर्वाच्या प्रभावी एकत्रित वापरातूनच कंपनीच्या वित्तीय वृद्धीस हातभार लागत असल्याचे दिसून आले आहे.

    इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटीचे अभ्यासक्रम

    या विद्यापीठाने बारावीनंतरचे पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत : बॅचलर ऑफ व्होकेशन इन सॉफ्टेवअर डेव्हलपमेंट, बॅचलर ऑफ व्होकेशन इन थिएटर, बॅचलर ऑफ व्होकेशन इन स्टेजक्राफ्ट, बॅचलर ऑफ व्होकेशन इन फिल्म प्रॉडक्शन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
    या अभ्यासक्रमांना बारावीमधील गुणांवर प्रवेश दिला जातो. कालावधी- चार वर्षे. संकेतस्थळ – www.igntu.ac.in

    रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे अभ्यासक्रम

    नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असून या संस्थेच्या टेक्निकल सर्व्हिसेस सेंटरने रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
    • मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन अ‍ॅडव्हान्स्ड एअर कंडिशिनग. कालावधी- चार महिने. शुल्क- २४ हजार रुपये. या अभ्यासक्रमात एअर कंडिशिनग दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक समस्या दूर करण्याचे कौशल्य शिकवले जाते. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक.
    • मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन रेफ्रिजरेटर अ‍ॅण्ड एअर कंडिशिनग. कालावधी- चार महिने. फी- २१ हजार रुपये. या अभ्यासक्रमात एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक समस्या दूर करण्याचे कौशल्य शिकवले जाते.

    अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयांतील पदविका किंवा आयटीआयमधील मेकॅनिस्ट/ फिटर हा अभ्यासक्रम.

    • सर्टिफिकेट कोर्स इन क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन (मेकॅनिकल). कालावधी- २ महिने. फी- ६ हजार रुपये. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील पदविका किंवा आयटीआयमधील मेकॅनिस्ट/ फिटर हा अभ्यासक्रम.
    • मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन (मेकॅनिकल). कालावधी- ४ महिने. फी- २१ हजार रुपये. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक. संपर्क- ओखला इन्डस्ट्रियल इस्टेट, फेज-३, न्यू दिल्ली- ११००२०.
    संकेतस्थळ- www.nsic.co.in
    ई-मेल- ntscok@nsic.co.in

    • सुरेश वांदिले
      http://www.loksatta.com/way-to-success-news/marketing-world-1239827/

    आणखी वाचा

  • शिक्षणात वेगळेपण जपणारी विद्यापीठे

    शिक्षणात वेगळेपण जपणारी विद्यापीठे

    हे खरे आहे की, देशातील शिक्षणाच्या विकासाला अधिक विस्तारावे लागेल. पण गेल्या वर्षात झालेल्या भारतीय शिक्षणाच्या प्रगतीला बेदखलही केले जाऊ शकत नाही. रोचक हे आहे की, जगभरात पहिल्यांदा उघडणारी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. काही विशेष क्षेत्रांमध्ये विशेष (स्पेशलाइझ्ड) शिक्षणाशी जोडलेल्या संस्थादेखील इथे अस्तित्वात आहेत, ज्या शैक्षणिक विकासासाठी
    प्रयत्नरत आहेत.

    👍 पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये

    अशातच झालेल्या सरकारी घोषणेनुसार, गुजरातच्या वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ एमबीए व एमटेक पदवी प्रदान करील. नंतर रेल्वे ऑपरेशन्समध्ये (अभियान) पदविका व बीटेकची पदवीदेखील इथे उपलब्ध असेल.

    • काय विशेष : ही संस्था भारताला रेल्वे अभियांत्रिकी व व्यवस्थापनात संशोधन व विकासाच्या जागतिक केंद्रात परिवर्तित करेल.
    Top Universities Embracing Uniqueness in Education

    👍 गुडगावात पहिले संरक्षण विद्यापीठ

    संरक्षण क्षेत्रात धोरण बनवणाऱ्या विशेषज्ञांपासून ते परदेशाशी संरक्षण संबंधांवर संशोधनासाठी सुरू होणाऱ्या या देशातील पहिल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची निर्मिती गुडगावातील बिनौला गावात सुरूही झाली आहे. इथे लष्करी शिक्षणात प्रशिक्षण आणि शोधासाठी ही एक अशा प्रकारचे अनोखे व पहिले शिक्षण संस्थान असेल.

    • काय विशेष : संरक्षण संशोधनासह युनिव्हर्सिटी डिफेन्स स्टडीज, डिफेन्स मॅनेजमेंट, डिफेन्स सायन्स व टेक्नॉलॉजी क्षेत्रात उच्च शिक्षणाला विकसित करेल.

    👍 मणिपुरात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

    तसे पाहता खेळासाठी देशात अनेक संस्था आहेत. पण आता राष्ट्रीय स्तरावर खेळाच्या विकासासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी बजेट २०१४-१५ मध्ये प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना मणिपुरातील थाऊबल जिल्ह्यामध्ये केली जाईल.

    • काय विशेष : खेळाच्या क्षेत्रात शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर शिक्षण संस्था असतील. बीपीएड, एमपीएड, फिजिओथेरपी, फिटनेस, क्रीडा व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध होतील.
    Top Universities Embracing Uniqueness in Education

    👍 रोचक तथ्य

    • २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांसह बीएचयू आशियातील सर्वात मोठ्या निवासी विद्यापीठांपैकी एक आहे.
    • ७०० हून अधिक विद्यापीठे व ३८,००० महाविद्यालयांसह भारत जगातील सर्वात मोठ्या हायर एज्युकेशन सेक्टर(क्षेत्र) असणाऱ्या देशांपैकी एक आहे.
    • ४० लाखांहून अधिक विद्यार्थी संख्या असणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे.
    • भारतात केवळ भाषांनाच समर्पित वा वाहिलेली हून २० अधिक विद्यापीठे आहेत.

    👍 जगभरात पहिल्यांदा

    • गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, फॉरेन्सिक व इन्व्हेस्टिगेटिव्ह सायन्सला समर्पित जगभरातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
    • जगातील पहिली होमिओपॅथी युनिव्हर्सिटी जयपुरात (साईपुरा) आहे.
    • जगातील पहिली किडनी प्रत्यारोपण युनिव्हर्सिटी अहमदाबादेत आहे.
    • २०१५ मध्ये स्थापन झालेल्या गुजरात युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन संपूर्ण विश्वात ट्रान्सप्लांटेशन व अलाइड सायन्सेसचे हे पहिले विद्यापीठ आहे.
    • देशातील पहिली ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ युनिव्हर्सिटी – इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी बंगळुरूत स्थापन झालेली आहे.

    👍 हेदेखील आहे विशेष

    रॉयल स्कूल ऑफ माइन्स – लंडनच्या धर्तीवर तयार झालेली इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबादला खाण शिक्षणाच्या उद्देशानेच सुरू केले गेले. जे अनेक विभागांसह टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये विकसित झालेले आहे.
    आंध्र प्रदेशची द्रविड युनिव्हर्सिटी – द्रविड भाषा आणि संस्कृतीच्या विकासासाठी स्थापित केली गेली होती. दोन विभागांसह सुरू झालेले हे विद्यापीठ आता जवळजवळ २० शैक्षणिक विभागांसह विस्तारली आहेत.

    👍 देशात प्रथमत:च

    • रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी – भारतात अशा प्रकारातले हे पहिलेच विद्यापीठ आहे. जे पोलिस सायन्स व इंटर्नल सिक्युरिटीमध्ये प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
    • हरियाणास्थित नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर देशातील एकमात्र इन्स्टिट्यूट आहे. जे न्यूूरो सायन्समधील संशोधन व शिक्षणासाठी समर्पित आहे.
    • बीएचयूचे मालवीय सेंटर फॉर पीस रिसर्च भारतीय विद्यापीठाच्या प्रणालीत आपल्या प्रकारातले पहिलेच केंद्र आहे.
    • युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज भारताची पहिली एनर्जी युनिव्हर्सिटी आणि आशियातील पहिली आणि एकमात्र ऊर्जा व कोअर सेक्टर विद्यापीठ आहे.

    👍 केरळात येणार जेंडर रिसर्च युनिव्हर्सिटी

    केरळ सरकार देशातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ कोझिकोडे जिल्ह्यात स्थापन करण्याच्या तयारीत आहे, जे विशेष करून जेंडर(लिंग)शी संबंधित संशोधन अभ्यासासाठी असेल. विद्यापीठाची संकल्पना विदेशी संस्थांच्या नमुन्यानुसार तयार केली जात आहे.

    • काय आहे विशेष : करिकुलम आणि अभ्यासक्रम पारंपरिकऐवजी आंतरराष्ट्रीय मानकानुसार वा त्यावर आधारित असेल.

    👍 झारखंडमध्ये सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटी

    अशातच झालेल्या एका घोषणेच्या अनुसार, रांचीत सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटीची स्थापना होईल, ज्यात देशी आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती व औषधी वनस्पतींवर संशोधनाशिवाय पदवी व पदविका अभ्यासक्रम असेल. छत्तीसगडमध्येही आयुष अँड हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी, छत्तीसगड अस्तित्वात आहे.

    • काय विशेष : याविषयी संबंधित क्षेत्रातील शिक्षणाला अधिक मजबुती मिळेल.
    Top Universities Embracing Uniqueness in Education

    👍 संशोधन व नवकल्पनांचे शिक्षण

    अशातच प्रधानमंत्री कार्यालयात मनुष्यबळ विकास मंत्रालयातून संशोधन व नवकल्पनांसाठी (सर्जनशीलता-नवोन्मेष) १० खासगी स्वायत्त विद्यापीठे स्थापन करण्याच्या योजनेत वेग आणण्यासाठी सांगितले गेले आहे. या प्रकरणी उच्च शिक्षणासाठी जगभरातील खासगी संस्थांचा भारतात येण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल.

    • काय विशेष : ही विद्यापीठे संशोधन व नवकल्पनांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करवतील.

    आणखी वाचा

  • बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक

    बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक

    बनायचं होतं क्रिकेटर, पण झाला ‘तो’ अपघात

    आयुष्यभर संघर्ष करायला लावणारा एखादा अपघात तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो का? हो बनवू शकतो. जर तुम्ही हा प्रश्न उदय कोटक यांना विचारला, ज्यांनी अपघातानंतर १३ अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती कमावली आहे. खरं तर, उदय कोटक (Uday Kotak) यांचा जन्म १५ मार्च, १९५९ रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला. ते अभ्यासात हुशार होते, पण त्यांचं पहिलं प्रेम हे क्रिकेट होतं. मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या उदय कोटक यांना क्रिकेटपटू (Uday Kotak Cricketer) बनण्याची इच्छा होती. ते एक चांगले खेळाडू होते. एवढंच काय, तर त्यांनी प्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षणही घेतलं होतं.

    जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असताना ते त्यांच्या कॉलेज टीमचे कर्णधार होते. कांगा लीग सामन्यादरम्यान, एक चेंडू येऊन त्यांच्या डोक्यावर लागला. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांनी बरेच महिने घेतले. यामुळे त्यांना वर्षभर कॉलेजलाही मुकावे लागले. अशात तुम्ही त्यांना अपघाती बँकर म्हणू शकता. कारण, क्रिकेटमध्ये चांगले करिअर होत असताना एका अपघाताने त्यांना वित्त (Finance) या क्षेत्रात आणले.

    त्यांनी कष्ट आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. त्यांनी टाटा समूहात काम केले आणि नंतर स्वतःची बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोटक महिंद्रा बँक आज भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी खाजगी बँकांपैकी एक आहे. बँकेने अनेक क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उदय कोटक हे एक दूरदर्शी लीडर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक तरुणांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आहे.

    उदय कोटक यांचे कुटुंब

    अब्जाधीश उदय कोटक यांनी १९८५ साली पल्लवी कोटक यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे नाव जय कोटक आणि धवल कोटक आहे. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात. उदय हे एक गुजराती हिंदू परिवारातून येतात. त्यांनी मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून वाणिज्य शाखेची पदवी आणि एमएमएस पदवी घेतली आहे. त्यांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रात ३५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

    भारताचे सर्वात श्रीमंत बँकर

    कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची बँकेत २५.७१ टक्के भागीदारी आहे, त्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत बँकर (India’s Richest Banker Uday Kotak) आहेत. या बँकेचे मूल्य ३.५ लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. उदय कोटक यांच्या संपत्तीचा विचार करायचा झाला, तर फोर्ब्स इंडियानुसार त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल १ लाख ११ हजार ४७४ कोटी इतकी आहे.

    कधी केली होती सुरुवात?

    उदय कोटक यांनी वयाच्या २३व्या वर्षी सन १९८५मध्ये कोटक कॅपिटल फायनान्स लिमिटेड नावाची एक आर्थिक सल्ला देणारी फायनान्स फर्म सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये या फर्मला एका बँकेच्या रूपात बदलले. उदय यांनी त्यांचा वित्त आणि बिल डिस्काऊंटिंग व्यवसाय कुटुंब आणि मित्रांकडून घेतलेल्या १० हजार रुपयांनी सुरू केला होता. ही रक्कम आताच्या हिशोबानुसार तब्बल ३०० कोटी रुपये होते. विशेष म्हणजे, गुंतवणुकीचा मोठा भाग हा त्यांचे सर्वात चांगले मित्र आनंद महिंद्रा यांनी दिला होता. त्यामुळे बँकेचे नाव कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) ठेवण्यात आले.

    इतिहासात पहिल्यांदा एनबीएफसीला (NBFC) मिळाला बँकेचा परवाना

    कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला २२ मार्च, २००३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात, ही भारताची पहिली गैर-बँकिंग वित्त कंपनी आहे, जिने बँकिंग परवाना मिळवला. तसेच, एक गैर-बँकिंग वित्त कंपनीचे रुपांतर बँकेत झाले. सन २०१४मध्ये उदय कोटक यांनी छोट्या बिल-डिस्काऊंटिंग व्यवसायाला वित्तीय सेवा समूहात बदलले. तसेच, १२७० पेक्षा जास्त शाखांसह बाजार भांडवलाने भारतातील दुसरी सर्वात मोठी अनुसूचित व्यावसायिक बँक बनली.

    मागील वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्त

    भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कमाल कार्यकाळ १५ वर्षे निश्चित केला आहे. त्यामुळे उदय कोटक हे डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी निवृत्त होणार होते. मात्र, त्यांनी निवृत्तीच्या चार महिन्याआधीच म्हणजे सप्टेंबरमध्येच निवृत्तीची घोषणा केली होती.

    आणखी वाचा

  • ‘मी का म्हणून कर देऊ?

    ‘मी का म्हणून कर देऊ?

    why we have to pay tax

    कर तीन प्रकारच्या संस्था घेतात – महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. सध्या आपल्या देशात प्रत्यक्ष कर (डायरेक्‍ट टॅक्‍सेस) आणि अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्‍ट टॅक्‍सेस) असे एकूण 25 विवMMMMMMMMMMMMMM प्रकारचे विविध कर आकारले जात आहेत. त्यात प्राप्तिकर, व्यवसाय कर, विक्रीकर, सेवाकर आदींचा समावेश होतो.

    👍 का घेतले जातात असे कर ?

    विविध विधायक कामांसाठी सरकारकडून कर घेतला जातो. रस्ते बांधणे, लोहमार्ग बनविणे, गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा देणे, त्यांना मोफत शिक्षण सुविधा देणे, स्वस्त दरात वीजपुरवठा करणे, अशा पायाभूत सुविधा सरकारला पुरवायच्या असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, देशाची सुरक्षा अबाधित ठेवणे व भक्कम करणे, यालाही प्राधान्य द्यायचे असते. आज सर्वत्र दहशतवादाचे सावट आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक युद्धसामग्री गरजेची असते. त्याची खरेदी करण्यासाठी सरकारकडे पुरेसे पैसे विविध करांमधूनच येत असतात.

    why we have to pay tax

    👍 आपल्या देशात ‘कर‘ जास्त आहे ?

    प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका गुणोत्तराची (रेशो) आकडेवारी पाहू. देशाचे एकूण करउत्पन्न आणि जीडीपी (देशात एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तूची व सेवेची एकूण किंमत) यांचे गुणोत्तर (प्रमाण) साधारणपणे 23 असणे आवश्‍यक आहे. हे प्रमाण एकूण करउत्पन्न भागिले जीडीपी असे मोजले जाते. भारतात फक्त चार टक्के लोकच प्राप्तिकर भरत असल्यामुळे आपल्याकडे हे प्रमाण सध्या फक्त 17.7 इतकेच आहे. सर्व अविकसनशील देशांचे हेच प्रमाण सरासरी 21 आहे आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) यांच्या सभासद देशांमध्ये तेच प्रमाण 34 इतके आहे. आखाती देशांत हे प्रमाण 1 ते 2 टक्केच आहे. डेन्मार्कमध्ये हे प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे 50 आहे. म्हणजेच डेन्मार्कमध्ये ‘कर‘ सर्वांत जास्त आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार, डेन्मार्कमधील लोक संपूर्ण जगात सर्वांत आनंदी लोक आहेत. हे विश्‍लेषण पाहता, आपल्या देशात ‘कर‘ कमी आकारला जातो आणि कमी लोकांना आकारला जातो, असेच उत्तर येते.

    • सुहास राजदेरकर

    आणखी वाचा

  • तात्काळ सौदापूर्तीच्या दिशेने

    तात्काळ सौदापूर्तीच्या दिशेने

    अमेरिका आणि जपान हे देश आता याबाबत विचार करीत असून काही देश या वर्षी टप्याटप्याने या चळवळीत सामील होतील. सौदापूर्तीचा कालावधी जितका कमी तेवढी त्यातील जोखीम कमी होते त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. आपण याबाबत T+0 (म्हणजेत्याच दिवशी) अशी सौदापूर्ती करू शकू आणि भविष्यात तात्काळ(स्पॉट) सौदापूर्ती करू शकू का? याबाबत विचार करीत आहोत. अस झालं तर तात्काळ सौदापूर्ती करणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश असेल.

    शेअरबाजारामुळे उद्योगांना कमीतकमी खर्चात भांडबल उपलब्ध झाले. गुंतवणूकदारांना भागधारक या नात्याने उद्योगाची मालकी मिळाली. भागधारकाचे उत्तरदायित्व हे त्यानी गुंतवलेल्या रकमेइतकेच मर्यादित असून दुय्यम बाजारात त्यांच्या भांडवल खरेदी विक्रीची संधी प्राप्त झाली आहे. थोडी जोखम स्वीकारून गुंतवणुकीवर कदाचित डिव्हिडंड आणि भाववाढ असे दोन्हीही फायदे मिळू शकल्याने गुंतवणूक करण्याचे नवीन साधन मिळाले. 31 ऑगस्ट 1957 रोजी सिक्युरिटीज काँट्रॅक्ट ऍक्ट या कायद्याने अधिकृतता प्राप्त खाली. यापूर्वी असे व्यवहार केवळ विश्वासाने केले जाऊन पूर्ण केले जात असत. त्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाल्याने एक्सचेंजच्या नियामक मंडळाची जबाबदारी वाढली. भारतात मुंबईसह अनेक प्रादेशिक बाजार अस्तीत्वात आले. या सर्व बाजारांतील नियामक मंडळात दलालांचे वर्चस्व होते, कार्यकारी संचालकांवर दलालांचा दबाव होता बाजाराच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता नव्हती. दलालांची एकाधिकारशाही निर्माण खाली होती. सौदापूर्ती वेळेवर होत नसे त्यामुळे खरेदी केलेले शेअर्स मिळण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागे. व्यवहारात पारदर्शकता नव्हती अनेक व्यवहार जाहीर केले जात नसत, त्यामुळे योग्य किमतीचा अंदाज बांधणे कठीण जात असे. विक्री करताना कमीतकमी भाव आणि खरेदी करताना सर्वाधिक भाव अशी परिस्थिती जवळपास सन 1990 होती.

    देशी आणि विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवल बाजारातकडे आकर्षित होण्यासाठी या सर्व व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सरकारने पुढाकार घेतला. त्यांनी मुंबई शेअरबाजाराचे कंपनीकरण करून त्याचे विश्वस्त मंडळ आणि संचालक मंडळ वेगळे असावे, विश्वस्त मंडळात दलाल असले तरी चालतील परंतु संचालक मंडळात व्यावसायिक व्यवस्थापन अस्तित्वात असले पाहिजे असे सुचवले. त्यास अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रीय शेअरबाजार निर्माण करण्यास सरकारने पुढाकार घेतला.

    राष्ट्रीय शेअरबाजाराच्या रूपाने देशातील पहिला आधुनिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअरबाजार अस्तित्वात आला. त्याचे व्यवहार चक्र सुरवातीला आठवड्याचे मग तीन दिवसाने नंतर दोन दिवसाने ठराविक कालावधीत अस्तीत्वात आले. असा बाजार अस्तीत्वात येताना भविष्यात एक दिवसात सौदापूर्ती आणि शेवटी तात्काळ सौदापूर्ती असे उद्दिष्ट ठेवले होते. हा बाजार अस्तीत्वात आल्यावर मुंबई शेअरबाजाराने धडा घेऊन आवश्यक ते बदल करून चूक दुरुस्ती केली आणि व्यवसायाचे नवनवे मार्ग शोधत राहिला म्हणून तो टिकून आहे अन्य प्रादेशिक बाजार एकामागोमाग एक बंद पडले कोलकाता स्टॉक एक्सचेंज कागदोपत्री अस्तित्वात आहे पण तेथे कोणतेही व्यवहार होत नाहीत. दरम्यान राष्ट्रीय शेअरबाजाराने उलढालीच्या दृष्टीने सध्या प्रथम क्रमांकावर आणि जगात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून डिरिव्हेटिव्ह व्यवहाराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर गेला. मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत त्यांनीं आता गांधीनगर येथे दिवसभरात 16 ते 22 तास चालू असणारे आंतराष्ट्रीय शेअरबाजारही चालू केले आहेत.

    वर म्हटल्याप्रमाणे लवकरच T+0 म्हणजे व्यवहार ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याची सौदापूर्ती होईल आणि भविष्यात तात्काळ सौदापूर्ती होईल या दिशेने बाजार नियामक सेबी काम करीत आहे. त्यांनी यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करून जनतेकडून त्यांवरील सूचना 12 जानेवारी 2024 पर्यंत मागवल्या होत्या. याबाबत कोणत्या सूचना आल्या आणि त्यावर काय निर्णय झाला हे अद्याप जमजले नसले सध्या ज्या सुलभतेने आपण यूपीआयचा वापर करून आता कुणालाही तात्काळ पैसे पाठवू शकत आहोत त्याचप्रमाणे शेअर्समधील खरेदी विक्रीचे व्यवहार सहज आणि तात्काळ करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

    सेबीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार टप्याटप्याने ही पद्धत अस्तीत्वात येईल, सुरुवातीस-

    ●पहिल्या टप्यात S&P 500 मध्ये असलेल्या शेअर्ससाठी T+0 ही पद्धत वैकल्पिक स्वरूपात उपलब्ध होईल. सुरुवातीस 200 नंतर 200 आणि मग 100 कंपन्यासाठी ही पद्धत उपलब्ध होईल.

    ●एकाच शेसर्सचे T+1 आणि T+0 असे दोन्ही सेगमेंटचे भाव स्क्रीनवर वेगवेगळे दिसतील.

    ●या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यत केलेले T+0 चे सर्व व्यवहार त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यत पूर्ण केले जातील.

    ●दुपारी दीड नंतर केलेले सर्व व्यवहार T+1 या यासाठी सध्या अस्तीत्वात असलेल्या पद्धतीने होतील.

    ●सौदापूर्तीचा विचार करता या दोन्ही प्रकारच्या पद्धतीसाठी सध्याच्या जोखीम व्यवस्थापन धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही.

    थोडक्यात,

    सुरुवातीला काही शेअर्सच्यासाठी T+0 चे व्यवहार मर्यादित काळासाठी असतील.

    यानंतरच्या टप्यात,

    ●दिवसाचे वेगवेगळे विभाग करून दर भागाचे वेगवेगळे सेटलमेंट होईल त्याची रचना सध्याच्या T2T पद्धती प्रमाणे असेल असे प्रस्तावित आहे.

    ●यासाठी T+1 मधील सेटलमेंट पद्धतीप्रमाणेच फक्त दुसऱ्या दिवसाऐवजी त्या दिवसाच्या विशिष्ट काळाच्या व्यवहारांची सौदापूर्ती होईल.

    ●त्याचे दिवसाच्या वेगवेगळ्या भागाचे भाव स्वतंत्र दिसतील.

    ●यासाठी खरेदीची ऑर्डर देण्यापूर्वी पैसे दिलेले असल्याची त्याचप्रमाणे विक्री ऑर्डर देणाऱ्याच्या खात्यातून ऑर्डर देण्यापूर्वीच शेअर्सची डिलिव्हरी घेतली जाईल.

    ●क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे त्याची खात्री करून घेतल्यावरच ऑर्डर पुढे जाईल.

    ●केवळ लिमिट ऑर्डरच घेतल्या जातील.

    ●क्लायंट कोड बदलांना परवानगी दिली जाणार नाही.

    ●ऑर्डर मधील बदल अथवा ऑर्डर पूर्णपणे रद्द करणे एक्सचेंजद्वारे क्लिअरिंग कॉर्पोरेशनला कळवून केले जाईल.

    ●ही पद्धत सुरळीत झाल्यावर आधी चालू केलेली दीड वाजेपर्यंत केलेले व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करणाऱ्या कंपन्यांची संख्या कमीकमी करून ती पद्धती बंद केली जाईल.

    ●त्यानंतर दिवसाचे वेगवेगळे भाग करून त्यातील सौद्यांची पूर्तता पुढील तासाभरात केली जाईल.

    आलेल्या दोन्ही प्रकारच्या अनुभवातून आवश्यक सुधारणा करीत यानंतरच्या टप्यात सर्व शेअर्ससाठी-

    ●असा अँप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) उपलब्ध करून दिला जाईल जो खरेदी करणाऱ्यास पैशाच्या बदल्यात शेअर्स अथवा विक्री करणाऱ्यास शेअर्सच्या बदल्यात पैसे, तात्काळ देऊ शकेल.

    यामुळे

    ●रोख बाजारातील तरलता वाढेल, यामुळे सकारात्मक वाढीची शक्यता आहे.

    ●सध्या अस्तित्वात असलेले नियमित ब्रोकर्स अत्यंत कमी दलालीवर काम करतात, त्यांच्या व्यवसायाचा काही भाग ग्राहकांच्या निधीवरील व्याजातून येतो त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांना आपली व्यवसाय नीती ( bissiness model) तपासावी लागेल.

    याचबरोबर

    ●सध्या अस्तित्वात असलेली T+1 ही पद्धती बंद करण्याचा प्रस्ताव नाही त्यामुळे डे ट्रेडर्स त्याचे व्यवहार त्याच दिवशी करू शकतील.

    ●यातून काही वाद निर्माण झाल्यास लवादामार्फत सोडवता येतील.

    या सर्व भानगडीत काही तांत्रिक प्रश्न उद्भवू शकतात जसे –

    ●खरेदीदारास तात्काळ व्यवहार करायचा असेल आणि विक्रेत्यास तो दुसऱ्या दिवशी चालणार असेल तर असे व्यवहार होऊ शकणार नाहीत.

    ●ज्यांना डे ट्रेडिंग करायचं आहे ते T+0 किंवा तात्काळ व्यवहाराकडे जाणारच नाहीत कारण त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल.

    बाजारात एकाच वेळी एका कंपनीच्या शेअर्सचे T+1, T+0 दीड वाजेपर्यंत आणि / किंवा T+0 दिवसातील वेगवेगळ्या भागाचे आणि स्पॉट सेटलमेंटचे असे अनेक वेगवेगळे भाव दिसतील. हे भाव ओळखून त्यातील फरक समजून घेण्यासाठी गुंतवणूकदार अधिक शिक्षित आणि जागृत असणे जरुरीचे आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार एकाच शेअर्सच्या वेगवेगळ्या व्यवहार प्रकारातील (segment) भावातील फरकामुळे त्या शेअर्सची प्रत्येक प्रकारातील खरीखुरी किंमत निश्चित होण्यास मदतच होईल. भावातील या फरकामुळे निर्माण होणाऱ्या नव्या गुंतवणूक संधी शोधणाऱ्या बाजारातील साधकांना विविध सेगमेंटमधील भावाच्या फरकाचा लाभ घेता येईल.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते ही वैयक्तिक मते आहेत)

    आणखी वाचा

  • शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी, टर्नओव्हर आहे तब्बल 100 कोटी रुपये, वाचा प्रेरणादायी कहाणी

    शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी, टर्नओव्हर आहे तब्बल 100 कोटी रुपये, वाचा प्रेरणादायी कहाणी

    आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या खूपच सामान्य असतात. मात्र, त्यातही दूरदृष्टी असणारे व्यक्ती असं काही शोधतात, ज्यामुळे त्यांच्यासोबतच शेकडो लोकांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं असामान्य काम केलंय तिलक मेहता नावाच्या मुलानं. हा मुलगा इतर कुणी नसून पेपर एन पार्सल या १०० कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे. शाळेत जाण्याच्या वयात तिलकने ही कंपनी कशी उभारली, हेच सांगणारा हा लेख.

    inspiring-story-of-a-young-entrepreneur tilak Mehta

    कुटुंब

    आज तिलक मेहताचे वय १८ वर्षे आहे. सन २००६मध्ये गुजरातमध्ये जन्मलेला तिलक पेपर एन पार्सल (Paper N Parcel) या कुरिअर कंपनीचा संस्थापक आहे. तिलकच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं झालं, तर तिलकचे वडील विशाल मेहता एक लॉजिस्टिक कंपनीशी जोडलेले आहेत. तिलकची आई काजल मेहता या गृहिणी आहेत. तसेच, तिलकला एक बहीणदेखील असून तिचं नाव तन्वी मेहता असं आहे.

    कशी सुचली कल्पना?

    तिलक मेहता जेव्हा १३ वर्षांचा होता, तेव्हा एकेदिवशी वडिलांच्या थकव्यामुळे त्याला व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना सुचली. तिलक त्याच्या वडिलांना ऑफिसहून घरी परतल्यानंतर जेव्हाही स्टेशनरीचे सामान आणायला सांगायचा, तेव्हा त्याला वाईट वाटायचे. वडिलांचा थकवा पाहून तो सतत त्यांना हे सांगू शकत नव्हता की, त्याला शाळेसाठी स्टेशनरी हवीये. एकदा काय झालं की, तिलक त्याच्या काकांकडे सुट्ट्यांसाठी गेला होता. त्यावेळी घरी परतताना तो त्याची पुस्तके त्यांच्या घरी विसरला. मात्र, काही दिवसांनी परीक्षा सुरू होणार होत्या, त्यामुळे तिलक मेहताला ती पुस्तके हवी होती.

    inspiring-story-of-a-young-entrepreneur tilak Mehta

    जेव्हा त्याने कुरिअर एजन्सीशी संपर्क साधला, तेव्हा समजले की, पुस्तक कुरिअर करण्यासाठी पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त रुपये खर्च होत आहेत. एवढंच नाही, तर इतके सारे रुपये खर्च करूनही त्याचे पुस्तक एका दिवसात पोहोचले नाही. इथेच तिलकच्या डोक्यात व्यवसायाच्या कल्पनेने जन्म घेतला.

    तिलक मेहताने त्याच्या वडिलांसोबत आपल्या व्यवसायाच्या योजनेविषयी चर्चा केली आणि त्याने कुरिअर सर्व्हिस सुरू करण्याची संपूर्ण योजना आखली. वडिलांनी तिलकला पेपर एन पार्सल सुरू करण्यासाठी फंडिंग केलं. त्यानंतर त्याची भेट बँक अधिकारी घनश्याम पारीक यांच्याशी घालून दिली, ज्यांनी तिलकच्या व्यवसायात गुंतवणूक केली.

    तिलक मेहताच्या व्यवसायाची कल्पना ऐकून पारीक यांनी बँकेची नोकरी सोडून थेट पेपर एन पार्सल व्यवसाय जॉईन केला. दोघांनी मिळून २०१८मध्ये पेपर एन पार्सल कुरिअर सर्व्हिस सुरू केली. तिलकने आपल्या कंपनीचे नाव पेपर एन पार्सल ठेवले आणि घनश्याम यांना कंपनीचा सीईओ बनवले. १०० कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या कंपनीत आजघडीला २००हून अधिक लोक काम करतात. तसेच, तिलक मेहता देशातील सर्वात युवा उद्योजक बनला आहे.

    inspiring-story-of-a-young-entrepreneur tilak Mehta

    कंपनी काय काम करते?

    तिलकची कंपनी ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जी शिपिंग आणि लॉजिस्टिकशी संबंधित सेवा देते. ही कंपनी प्रत्येक प्रकारची गरजेची वस्तू, दैनंदिन आयुष्यातील वापरली जाणारी गोष्ट डिलीव्हर करते. तिलकची कंपनी आपल्या मोबाईल ऍपमार्फत लोकांना डोअरस्टेप सेवा देते. कंपनीत २००हून अधिक कर्मचारी तर आहेतच. शिवाय ३००हून जास्त मुंबईचे डब्बेवालेही कंपनीशी जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनी दरदिवशी हजारो पार्सल डिलीव्हर करते. यासाठी कंपनी ४० ते १८० रुपये आकारते.

    सन २०१८मध्ये सुरू झालेल्या तिलकच्या कंपनीने ६ वर्षांच्या कालावधीत यशाचे शिखर गाठले आहे. अशाप्रकारे १८ वर्षांच्या वयातच एवढी मोठी कंपनी उभी केल्यामुळे तिलकला सर्वात यशस्वी युवा उद्योजकाचा दर्जाही मिळाला.

    आणखी वाचा