Author: naviarthkranti

  • २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

    २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

    साधारण दीड लाख वर्षांपूर्वी कृत्रिमरीत्या अग्निनिर्मिती किंवा अग्नीचे नियंत्रण आवाक्यात आल्यानंतर मानवाने प्रगती करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने सभोवतालच्या घटनांचा आणि त्या अनुषंगाने निसर्गाचा विचार करण्यास सुरुवात केली. मग स्वतंत्र ओळख होईल, अशी मानवी संस्कृती निर्माण झाल्यानंतर ‘हे जग कशाचं बनलंय?’ हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित झाला आणि रूढार्थाने विज्ञान विषयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हणता येईल. हे जग जमीन, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश मिळून तयार झाले आहे, असे जवळपास सर्वच संस्कृतीमध्ये सांगण्यात येते. या सर्वच संस्कृतींनी सुरुवातीला केवळ तर्काच्या आधाराने निसर्गातील तत्त्वे उलगडण्याचा प्रयत्न केला.. त्या वेळी प्रयोगांसाठीची साधने जवळपास नव्हतीच. मात्र यातून निसर्गाच्या अनुषंगाने तत्त्वज्ञान आकाराला आले.

    National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

    विज्ञानाची वाटचाल सुरू झाली, ती इथे. मर्यादित का होईना, प्रयोग करण्यासाठी खडक, पाणी, जमीन यांचा वापर झाला आणि निरीक्षण-तर्क यांच्या आधारे आकाशाचा अभ्यास सुरू झाला. खगोलशास्त्राचा इतिहास आज चार पर्वामध्ये विभागला जातो. पहिले पर्व थेट आदिकालापासून गॅलिलिओच्या कालखंडापर्यंतचे मानले जाते. या प्रदीर्घ कालखंडात फक्त उघड्या डोळ्यांनीच अवकाश निरीक्षण केले जाते. सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओने खगोलीय निरीक्षणांसाठी सर्वप्रथम दुर्बीण वापरली आणि खगोलशास्त्राच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ झाला. अठराव्या शतकात वर्णपटीय विश्लेषणातून खगोलीय अभ्यास सुरू झाला, हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून खगोलशास्त्राच्या चौथ्या पर्वाचा प्रारंभ झाला वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच शतकाच्या मध्यावर झाला. या संदर्भात १९६७ मध्ये चंद्रावर ठेवलेले पाऊल हे मानवाने खऱ्या अर्थाने केलेले सीमोल्लंघन म्हणता येईल.

    अणुभौतिकीची वाटचालही अशीच जुनी आहे. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे संबोधले गेले होते. यानंतर किमान २४०० वर्षांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी आधुनिक विज्ञानात अणुसिद्धांत मांडण्यात आला. तथापि अणूचे अद्ययावत स्वरूप स्पष्ट होण्यास विसावे शतक उजाडावे लागल़े. आज अणूच्याही मूलकणांची संकल्पना स्पष्ट होऊन, मूलकणांच्या टकरी घडवून माणूस विश्वाच्या प्रारंभीची स्थिती जाणून घेत आहे.

    गुरुत्वाकर्षण गतीचे नियम विद्युतचुंबकत्व उष्मागतिकीचे नियम सापेक्षता सिद्धांत पुंजवाद हे भौतिकशास्त्रातील मैलाचे दगड ठरलेले आहेत. संदेशवहन हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आदिकालात हातवारे, खाणाखुणा, वेगवेगळे आवाज यातून संदेशवहनाची निर्मिती झाली. पुढे भाषालिपीमुळे हे काम खूपच सोपे होत गेले. वाहनांच्या माध्यमातून साध्य झालेला कमाल वेग आणि केवळ एका क्लिकच्या अंतराने जोडले गेलेले जग; यातून दळणवळण आणि संदेशवहन ही प्रगती गेल्या दीडशेच वर्षांतली आहे. आज विद्युतचुंबकीय प्रारणांच्या माध्यमांमधून ध्वनी आणि दृश्य स्वरूपाचे प्रसारण थेट समुद्रापारच नाही तर अंतराळातही अगदी सहज साध्य झाले आहे. आजच्या जगण्यात विद्युतचुंबकीय प्रारणांचे ऑक्सिजनइतकेच महत्त्व आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. उपग्रहांद्वारे भ्रमणध्वनींसाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाचे कार्य चालते, ते काही काळासाठी बंद पडले तरी माणसे कासावीस होतात.

    National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

    रसायनशास्त्राची चार पर्वे सांगितली जातात. अतिप्राचीन काळापासून ख्रिस्तकाळापर्यंत जी काही रसायनशास्त्राची माहिती उपलब्ध होती ती गूढ असल्यामुळे या पर्वाला गूढपर्व असे संबोधले जाते. दुसरे पर्व ख्रिस्तकाळापासून सतराव्या शतकापर्यंतचे हा अल्केमी म्हणजेच किमयागारांचा काळ. तिसरे पर्व सतराव्या शतकाच्या मध्यापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे, त्या पर्वाला पारंपरिक रसायनशास्त्राचा कालखंड म्हणतात. त्यापुढचा कालखंड आधुनिक रसायनशास्त्राचा मानला जातो. रसायनशास्त्राच्या अनुषंगाने सांगायचे झाले तर इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी फार तर नऊ ते दहा धातुस्वरूप मूलद्रव्ये परिचयाची होती, आज त्यांची संख्या ११८ झाली आहे.

    प्राचीन जीवशास्त्रामध्ये सृष्टिनिर्माणाचे श्रेय ईश्वराला बहाल करून जीवशास्त्र धार्मिकतेच्या बंधनाखाली होते. मात्र एकोणिसाव्या शतकातील उत्क्रांती सिद्धांताने या सगळ्याचा पाया उखडून टाकला. आज पेशीची जनुकीय संरचनाही समजावून घेण्यात आली आहे. जीवशास्त्रासंदर्भात इसवी सनपूर्व दोन ते तीन हजार वर्षांपूर्वी फक्त २०० आजार ज्ञात होते. आज ३० हजार आजारांची परिपूर्ण माहिती मानवजातीला झाली आहे. दूरस्थ ठिकाणी यंत्रमानवाच्या साहय़ाने केली जाणारी शस्त्रक्रिया, इथवर शरीरविज्ञानाची प्रगती केली आहे.

    कालखंड किंवा वेळेबाबत विचार केला तर आदिम काळात ढोबळपणे ऋतूंचे मोजमाप करणाऱ्या माणसाने आज सेकंदाचेही अब्जावधी भाग पाडले गेले आहेत आणि त्यावर तंत्रज्ञानही आधारलेले आहे. आज तळहातावर मावणारा संगणक सुरुवातीला अवाढव्य खोलीभर पसरलेला असायचा आणि संगणकाच्या पायाचा दगड रोवला गेला. सतराव्या शतकातल्या ‘अबॅकस’द्वारे.

    एकविसावे शतक हे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे नॅनोविज्ञान-तंत्रज्ञानाचे असेल असे म्हटले जाते. मात्र माणूस सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञानाकडे चौथ्या शतकात वळला होता. काचा, हिरे, माणिक,मोती यांच्यावरील नाजूक नक्षीकामातून सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रारंभ अगदी बीजरूपानेच का होईना, झाला होता.

    दैनंदिन व्यवहारातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातील असंख्य उदाहरणे डोळसपणे अभ्यासताना सामान्यजनांना एक प्रश्न पडायला हवा की विश्वाच्या प्रारंभापासून अस्तित्वात असलेले विज्ञान जर मानवाची आदिकालापासून साथसंगत करीत आहे तर विज्ञान आपलेसे का झाले नाही?

    देशोदेशीच्या क्षितिजांवर विस्तारलेल्या विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा झाला आहे, तो म्हणजे मानवी जीवनात आलेली पारदर्शकता. निसर्गातील न सुटलेले प्रश्न मानवी मनात गूढ बनून राज्य करतात. याचा रोजच्या जीवनमानावर अनुचित प्रभाव पडत राहतो आणि यात सर्वसामान्य भरडले जातात. मात्र जसजसे नैसर्गिक घटनांमागील विज्ञानाचे आकलन होत जाते तसतसे मानवी मन कणखर होण्यास मदत होते. आजवरच्या वैज्ञानिक कालखंडाचा आढावा घेतला तर याचा प्रत्यय येईल. तथापि आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करताना सर्वसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता सुदृढ होणे हे एक मोठे आव्हान आहे. दुर्दैवाने राज्यकर्ते आणि शासनकर्ते हे आव्हान स्वीकारण्याबाबत उदासीन आहेत.

    आजकाल कर्मकांडांशी विज्ञानाचा कसा तरी कुठे तरी ओढूनताणून संबंध जोडत कर्मकांडांचेच उदात्तीकरण होत आहे. यातून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कर्मकांडांमुळेच मानवता धोक्यात आली आहे, हा न विसरता येणारा कटू इतिहास आहे.

    अखेर एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे पर्यावरणऱ्हासाचा. पर्यावरणऱ्हास हा आजचा कळीचा मुद्दा आहे यात शंका नाही, परंतु त्याचे खापर विज्ञान-तंत्रज्ञानावर फोडले जात आहे. मुळात पर्यावरणऱ्हास हा विज्ञानाने केला की माणसाने, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळून जर पर्यावरणही समृद्ध आणि संपन्न अवस्थेत टिकून राहिले तर पृथ्वीचा आणि माणसाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.

    >> आपण कुठे आहोत..?

    साधारण १४०० कोटी वर्षांपूर्वी विश्व तर ४५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण होऊन ३८५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला जीव तयार झाला. यथावकाश ३०० कोटींपेक्षा जास्त वर्षे पार पडल्यानंतर म्हणजे ७० कोटी वर्षांपूर्वी प्राणी निर्माण झाले. यामध्ये मानवसदृश प्राणी अगदी अलीकडचा म्हणजे ४५ लाख वर्षांपूर्वीचा. आदिमानव ४ लाख वर्षांपूर्वी तर आजच्या आपल्या पूर्वजाची अवस्था १ लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली. हा मानव स्थिरस्थावर होऊन संस्कृती निर्माण होण्यास तब्बल ८० ते ९० हजार वर्षे लागली़. इसवी सनापूर्वीचा फार तर १० हजार वर्षांचा कालखंड ज्ञात असून आता इसवी सनानंतर फक्त २ हजार वर्षे पार पडली आहेत. पृथ्वीच्या आजवरच्या आयुष्याचा कालखंड एका वर्षांत मांडला तर, आपण ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेवटच्या सेकंदातील आहोत.

    आणखी वाचा

  • प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना करतो ‘या’ 7 Common चुका, पण तुम्ही चुकू नका; वाचा

    प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना करतो ‘या’ 7 Common चुका, पण तुम्ही चुकू नका; वाचा

    १. पात्र उमेदवार

    हे जग वेगाने पुढे जात आहे. जगात अनेक लोक आहेत आणि त्यांच्यासाठी कधीही न संपणारे इंटरनेट कनेक्शनही आहे. अशात तुम्हाला वाटते की, नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला पात्र उमेदवार सापडतील. मात्र, दुर्दैवाने असे नसते. पात्र उमेदवार शोधणे हे तितकेच आव्हानात्मक असू शकते. तसेच, तुम्हाला पात्र उमेदवार जरी मिळाला, तरीही त्याच्या कामाची पद्धत, त्याची मूल्ये आणि इतर गोष्टी आवडतीलच असे होत नाही.

    Difficult to find out right candidate

    त्यामुळे नवीन स्टार्टअप आणि प्रस्थापित व्यवसायांसह पात्र उमेदवारांना जोडण्यासाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या जॉब पोर्टल साइट्सचा वापर केल्याने तुम्ही फक्त आवश्यक पात्रता असलेल्यांचीच मुलाखत घेत आहात, याची खात्री करू शकता. इंटरनेट तुमच्या निवडी कमी करण्यासाठी अनेक उत्तम साधने ऑफर करत असताना तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.

    २. एचआर आणि पगार

    स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एचआर विभाग आणि त्याचे सर्व पैलू हाताळणे, यामुळे संपूर्ण स्टार्टअप प्रक्रियेत अतिरिक्त ताण आणि चिंता वाढवू शकते. त्यामुळे, तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे. तुमच्यासाठी फक्त तुमच्या ब्रँडची प्रतिमा आणि मूल्यांवर काम करणे, नवीन कर्मचारी नियुक्त करणे, दुकान सुरू करणे आणि आपल्या ग्राहकांचा शोध घेणे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एचआर विभाग स्थापन करणे.

    HR And Payroll

    हा अधिकचा ताण टाळण्यासाठी, काही व्यवसाय एचआर विभाग हाताळण्यासाठी पीईओ (Professional Employer Organization) सेवा निवडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम PEO कंपन्यांपैकी एक निवडता, तेव्हा तुमच्या सर्व HR संबंधी गरजांची काळजी घेतली जाते. यामुळे होतं असं की, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

    ३. वाढती स्पर्धा

    सध्याच्या जगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामागील कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे वेब. वेब पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांना जोडत असल्याने स्पर्धा वाढली आहे. नवीन व्यवसायांना त्यांच्या उद्योगांमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये सारखाच व्यवसाय करणारे सुस्थापित व्यावसायिक आधीच मोठ्या संख्येने ग्राहकांचे नेतृत्व करतात. तसेच, आपली प्रतिष्ठाही निर्माण करतात. अनेकदा काही व्यवसाय मालक या आव्हानामुळे भारावून जातात, परंतु याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहण्याऐवजी, वाढ होण्याची संधी म्हणून पाहा. स्पर्धेचा अभ्यास केल्याने, बाजार आणि तुमच्या भावी ग्राहकांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.

    Competation In Business

    ४. मार्केटिंगसाठी कष्ट न घेणे

    मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या आत्मा आहे. कारण, यामुळेच नवीन ग्राहक तुमच्या स्टोअर किंवा वेबसाइटवर येतात. तसेच, तुमच्या ब्रँडची दृश्यमानता (Visibility) वाढवते आणि तुम्ही ज्या उद्योगात काम करत आहात, त्या उद्योगाचा एक प्रतिष्ठित भाग म्हणून तुमचा व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगसाठी संघर्ष करतात. कारण, त्यांच्याकडे पेरोलवर कोणीही नसते, ज्यामुळे त्यांना कळेल की, ते काय करत आहेत. मार्केटिंग किंवा SEO तज्ञ हा नवीन व्यवसायाचा व्यावहारिकदृष्ट्या एक आवश्यक घटक आहे. कारण, चांगल्या मार्केटिंगशिवाय, आपल्या उत्कृष्ट उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल कोणालाही माहिती होणार नाही.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    तुम्ही जर मार्केटिंगमध्ये संघर्ष करत असाल, तर थर्ड पार्टी फर्म किंवा SEO तज्ञ नियुक्त केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसायाला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच, ते सातत्याने तुमच्याकडे येत राहतील.

    ५. निधी (फंडिंग)

    खरं तर, अनेक व्यवसाय असे असतात, ज्यांना पुरेसा निधी कधीच मिळत नाही, मिळतो का? दररोज किंवा आठवड्याला आपल्याकडे कल्पना येतात, त्यापैकी काहींवर आपण कृती करतो आणि इतर काही बॅकअपमध्ये अशा वेळेसाठी ठेवतो, जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा, अधिक वेळ किंवा स्पष्टता असते. अनेक स्टार्टअप्सना निधीच्या कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि काहींना मर्यादित बजेटमुळे काही उत्पादने आणि सेवाही मिळतात.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    निधी कधीही पुरेसा पुरवठा करत नाही, परंतु स्टार्टअप आणि स्थापित व्यवसायांसाठी बरेच पर्याय असतात. नवीन स्टार्टअपसाठी एंजेल गुंतवणूकदार, बँक कर्ज आणि नेहमीच लोकप्रिय क्राऊड-फंडिंग यांसारखे काही पर्याय आहेत. गुंतवणूकीसाठी पैसे कर्ज म्हणून घेण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या निधीच्या अटींची चांगली जाणीव आहे, याची खात्री जरूर करा.

    ६. वेळेचे खराब नियोजन

    नवीन व्यवसाय जेव्हाही सुरू करतात, तेव्हा व्यवसाय मालक एक सामान्य चूक नक्कीच करतात. ती म्हणजे, त्यांना वाटते की, ते संपूर्ण व्यवसाय स्वत: व्यवस्थापित करू शकतात. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून इतरांवर विश्वास ठेवणे, अर्थातच कठीण काम आहे. तुमच्या व्यवसायाचे यश हे थेट तुमच्या वैयक्तिक यशाशी जोडलेले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्येकजण चांगला व्यवस्थापक नसतो. काही लोक जरी कल्पना, वित्त किंवा मार्केटिंगमध्ये उत्कृष्ट असले, तरीही व्यवसाय व्यवस्थापित करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संघर्ष होत असल्यास, तुम्हाला तो चालवण्यात मदत करण्यासाठी कोणालातरी कामावर घेणे, यात कसलीही लाज नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या व्यक्तीला, ज्याला व्यवस्थापन प्रक्रियेसाठी योग्य कौशल्ये माहिती आहेत, अशा व्यक्तीला व्यावसायिक भागीदार बनवण्यात कोणतीही अडचण नाही.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    ७. संवाद

    नवीन स्टार्टअप म्हणजे एका कॉर्पोरेट छताखाली काम करणारी पूर्णपणे नवीन टीम असू शकते. अगदी उत्तम परिस्थितीतही संवाद आव्हानात्मक बनू शकतो. नवीन लोकांशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु व्यवसायाच्या निरंतर यशासाठी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन चॅट रूमसह एक संघ व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेट करा, जेणेकरून व्यवसायातील प्रत्येकजण सहजपणे एकमेकांशी संपर्क साधू शकेल, फायली शेअर करू शकेल आणि त्यातूनच कामांचे वाटपही करू शकेल.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    तर मित्रांनो, आता व्यवसायात उतरताना किंवा उतरला असाल, तर तुम्ही या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढू शकता.

  • Chat GPTला टक्कर देणार देसी ‘हनुमान’, मार्चमध्येच लाँच होणार 11 भाषेत काम करणारा अंबानींचा AI मॉडेल

    Chat GPTला टक्कर देणार देसी ‘हनुमान’, मार्चमध्येच लाँच होणार 11 भाषेत काम करणारा अंबानींचा AI मॉडेल

    पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देसी AI टूल हनुमान (Hanooman) लाँच केले जाणार आहे. त्यामुळे Hanooman ChatGPT शी जोरदार टक्कर असेल. कारण, ChatGPT प्रीमिअम सेवांसाठी जास्त पैसे चार्ज करते, तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स ग्रूपचे चेअरमन मुकेश अंबानी ही सेवा स्वस्त दरात किंवा मोफतही उपलब्ध करून देऊ शकतात.

    काय आहे ‘हनुमान’ AI मॉडेल?

    मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयआयटी मुंबई सोबत इतर ७ आघाडीच्या इंजिनीअरिंग संस्थांच्या प्रयत्नातून एक देसी AI मॉडेल बनवण्यात आले आहे. या AI मॉडेलचे नाव हनुमान ठेवण्यात आले आहे. BharatGPT संस्थेच्या लोकांनी मुंबईतील एका तंत्रज्ञान संम्मेलनात हनुमान AI लँग्वेज मॉडेल सादर केले. हनुमान AI मॉडेलची सेवा पुढील महिन्यापासून सुरू होईल.

    यादरम्यान एक बाईक मेकॅनिकला AI मॉडेलसह तमिळ भाषेत प्रश्न विचारताना दाखवले गेले. तसेच, एका बँकरला AI बॉटसोबत हिंदी भाषेत संवाद साधताना पाहिले गेले. यासोबतच एका डेव्हलपरने AI मॉडेलच्या मदतीने कम्प्यूटर कोडही लिहिला.

    का आहे खास?

    हनुमान AI मॉडेल ११ स्थानिक भाषांमध्ये काम करण्यास सक्षम असेल. हनुमान AI मॉडेल, शासन, आरोग्य, शिक्षण आणि वित्त सेवांसारख्या प्रमुख 4 क्षेत्रांना प्राथमिकता देऊन आपल्या सेवा पुरवेल. हे मॉडेल शासन, मॉडेल आरोग्य, शिक्षण आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांसाठी डिझाईन केले गेले आहे. जर हे मॉडेल यशस्वी ठरले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात रिलायन्स मोठा प्लेअर म्हणून समोर येईल. हनुमान AI मॉडेल (Hanooman AI Model) भारतीय धर्मग्रंथापासून प्रेरित आहे. जिओकडून इतर अनेक AI मॉडेल जसे की, जिओ ब्रेनवरही काम सुरू आहे.

    LLM आहे तरी काय?

    हनुमान AI मॉडेल स्पीच टू टेक्स्ट यासारख्या युजर फ्रेंडली सेवा देईल. हे एक मोठे लँग्वेज मॉडेल किंवा LLM (Large Language Model) सिस्टीम आहे, जी मोठ्या प्रमाणात डेटाचा वापर करून शिकते आणि नैसर्गिक साऊंड रिस्पॉन्स जनरेट करते. असे मॉडेल जनरेटिव्ह AI चा वापर करतात, जी एक नवीन प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. भारताचे हे मॉडेल आगामी काळात OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देईल.

    हे मॉडेल यशस्वी झाले, तर हे AI तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत भारताचा मार्ग मोकळा करेल. मागील वर्षीच्या एका कार्यक्रमादरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान IIT Bombay सोबत एका प्रोजेक्टवर सन २०१४ पासून काम करण्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जिओ २.० सोबत BharatGPT चीही सुरुवात केली जाईल. अशाप्रकारे, सर्वांनाच या मॉडेलची आतुरता लागली आहे.

    आणखी वाचा

  • शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा…! स्टोरी दोन जगज्जेत्यांची

    शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा…! स्टोरी दोन जगज्जेत्यांची

    निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं. दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं. अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं. आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. आणि मग तो परतला परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले. तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. 

    किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं हे स्वप्न. सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघे आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा. फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची ऑफर केली, तर तो नाही म्हणू शकणार नाही. पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट.

    २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्स आणि बोल्ट या दोघांनी स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली. फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली, तर बोल्टनं धावण्याच्या मैदानावर असे काही आकडे गाठून ठेवले आहेत, की ते कीर्तिमान मोडायचे तर दुसरा बोल्टच व्हावं लागेल. 

    अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या. त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला. रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला. आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं  

    खरं तर त्याला पाण्यात उडी मारल्यानंतर त्यात जास्त वेळ चेहरा ठेवायला आवडत नाही. नाका-तोंडात पाणी जाण्याची त्याला भीती वाटे. त्यामुळं सराव करतानाही तोंड पाण्यात कमीत कमी वेळ ठेवण्याचा त्याचा शिरस्ता असे. पाहता पाहता तो पोहण्यात इतका पारंगत झाला, की त्यानं दहाव्या वर्षीच एक राष्ट्रीय विक्रम नोंदवून ठेवला. त्याच वर्षी त्याला बॉब बाउमन नावाचे प्रशिक्षक मिळाले अन् त्याच्या स्विमिंगच्या करिअरला कलाटणी मिळाली. तेच त्याचे आवडते प्रशिक्षक बनले. ‘‘त्यांच्याशिवाय मी पाण्यातच उतरणार नाही’’, असं आजही फेल्प्स म्हणतो. बॉब त्याला सॉलिटरी मॅन म्हणतात. एकाकी माणूस. त्यांच्या मते या पोराचं एकच ध्येय असतं. पाण्यात उतरल्यावर शक्य तितक्या लवकर अंतर पार करायचं. 

    वडिलांनी त्याच्या आईशी घटस्फोट घेतल्यानंतर फेल्प्स एकटा पडला. त्याला कुटुंबात राहणंही शक्य वाटेनासं झालेलं. तेव्हा प्रशिक्षक बॉबनं त्याला वडीलकीचा आधार दिला. बॉबनंच त्याला मोठं केलं. त्यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर ‘फ्लाइंग फिश’ बनलेला फेल्प्स एक-एक सुवर्णपदकांवर नाव कोरत गेला. त्यानं स्वत:च्या नावावर एवढी ऑलिम्पिक पदकं नोंदवून ठेवली आहेत की अनेक देशांच्या अख्ख्या ऑलिम्पिक संघांनाही त्याला गाठणं मुश्कील व्हावं! 

    खरं तर या यशाच्या उन्मादात सुरुवातीच्या काळात फेल्प्स वाहवत गेला. कधी-कधी तो भरघोस दारू ढोसायचा. तसाच गाडी दामटायचा. पोलिसांनी त्याला २००४ साली असंच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अपराधापोटी पकडलं. त्यावेळी तो दोषीही ठरला आणि १८ महिन्यांची शिक्षा झाली. शिवाय २५० डॉलरचा दंडही भरावा लागला. शिवाय मदर्स अगेन्स्ट ड्रंक ड्रायव्हिंगच्या शिबिरात सक्तीच्या समाजसेवेसाठी जावं लागलं. 

    त्यानंतर पाच वर्षांनी फेल्प्सचा एक फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत तो अंमली पदार्थ घेताना दिसत होता. हा फोटो खोटा-बनावट असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं होतं, पण तो खरा असल्याचं आणि एका पार्टीत घेतला गेल्याचं त्यानं कबूल केलं. या फोटोचा मोठा फटका फेल्प्सला बसला. केलॉग्ज नावाच्या कंपनीनं त्याचं प्रायोजकत्व काढून घेतलं; शिवाय अमेरिकेच्या स्विमिंग संघटनेनं फेल्प्सवर तीन महिन्यांची बंदीही घातली. असाच अनुभव २०१४ साली आला होता. फेल्प्सला अटक झाली होती. कारण पुन्हा त्यानं अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवलं होतं. पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी त्याच्यावर ओढवली.

    याच काळात त्याला नैराश्यानं ग्रासलं  इतकं की तो आत्महत्त्येचाही विचार करत होता. आता काहीच शिल्लक राहिलं नाही, कमबॅक करणं शक्य नाही, अशा नकारार्थी विचारांनी त्याला घेरलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी फेल्प्सला मित्रांनी मदत केली. सहा महिने मेडिटेशन करायला लावलं. त्यातून तो बाहेर पडला. माणूस बनला. पुन्हा नव्या जोशानं पाण्यात उतरला. २०१६च्या  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे नवे टोक गाठून त्यानं थांबायचं ठरवलं. तेव्हा तो एक लेकराचा बाप बनला होता आणि त्याचा चांगला सांभाळ करायचा त्यानं ठरवलंय.

    दुसरीकडे उसैन बोल्टनंही तेव्हाच आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. फेल्प्सनंतर एका वर्षानं जन्मलेला बोल्ट लोकप्रियतेच्या तेवढ्याच उंचीवर आहे, जेवढ्या उंचीवर फेल्प्स. खरं तर बोल्ट जन्मला तो प्रदेश जंगलाचा. जमैकातलं शेरवूड कंटेंट हे त्याचं जुळं शहर. त्याला एक बहीण अन् एक भाऊ. त्याच्या वडिलांचे ग्रामीण भागात छोटं किराणा दुकान होतं. बोल्टला क्रिकेटची जास्त आवड होती. सचिन तेंडुलकर, ख्रिस गेलचा तो चाहता होता आणि वकार युनुससारखी बॉलिंग त्याला करायची होती. पण ज्या शाळेत तो गेला तिथं त्याला धावण्याची संधी मिळाली आणि तो त्यात पहिला आला. करिअरला कलाटणी मिळण्यासाठी एवढी स्पर्धा पुरेशी ठरली. 

    त्यानंतर तो कधीच थांबला नाही. त्याचा सराव एवढा अवघड असतो की सर्वसामान्यांनी त्याचा विचारही करू नये. तो जेव्हा धावतो तेव्हाच त्याच्या अंगातील क्षमता दिसून येते. सारे धावपटू काही मीटरवर मागे असताना हा फिनिशिंग लाइनला पोहोचलेला असतो आणि बाजूला हसून बघत असतो.

    घरातला लाडका होता आणि घरचे म्हणतील तसं ऐकायचा. त्यामुळं त्याला फारशा वाईट सवयी लागल्या नाहीत, असं म्हणतात. पण त्याच्यावर कायमच डोपिंगचा आरोप होत आला आहे. जेव्हा जेव्हा त्यानं विक्रम प्रस्थापित केला, तेव्हा तेव्हा त्यानं उत्तेजकं घेतल्याचे आरोप झाले आहेत. पण त्यानं तो अजिबात डगमगला नाही. कारण ‘‘ज्या गावीच जायचे नाही त्याबाबत विचार तरी कशाला करायचा’’, असं तो म्हणतो. त्याचे प्रशिक्षक ग्लेन मिल्सही अशा उत्तेजकांच्या विरोधात होते. त्यांनी डोपिंग चाचणी करणाऱ्यांनाही आव्हान दिलं होतं. बोल्टच्या सगळ्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता, तो उत्तेजकं घेत नसल्याचंच सिद्ध होईल, असं ग्लेन यांनी एकदा म्हटलंही होतं.  

    ऑलिम्पिकच्या आधी बोल्टच्या चार चाचण्या झाल्या आणि ज्या पदार्थांवर बॅन आहे असे कोणतेही उत्तेजक पदार्थ त्याच्या शरीरात आढळले नाहीत. आम्ही मेहनत करतो. ती पण जिवापाड. अशा गोष्टींवर अवलंबून राहत नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी आमची चाचणी घ्या, असं बोल्टने स्पष्ट केलं होतं. डोपिंगच्या चुकीच्या बातम्यांमुळे बोल्टला आपला प्रायोजकही गमवावा लागला. पण त्याला फारसा फरक पडला नाही. कारण बाकी प्रायोजक रांगेत उभे होतेच. 

    बोल्ट आणि फेल्प्स हे दोघे आता खेळताना दिसत नाहीत. धावण्याच्या शर्यतीत बोल्टला पाहता येणार नाही आणि फेल्प्स डाइव्ह मारतानाचा क्षण आपल्याला टिपता येणार नाही. पण, या दोघांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेली शिखरं पार करणं हेच पुढील पिढीसाठी आव्हान असेल.

    फेल्प्स ३०० कोटींचा धनी

    मायकेल फेल्प्स भलेही यशाच्या शिखरावर असेल आणि त्यानं मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या विक्रमी असेल, पण त्याची कमाई एखाद्या स्टार फुटबॉलपटूपेक्षा कमीच आहे. 

    ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड संघात असण्याची फी ६०० कोटी रुपयेहोती आणि फेल्प्सचं प्रायोजकांमधून मिळणारं उत्पन्न ३०० कोटी. कधीकधी वर्षाला दुप्पट कमाई दाखवणारे आकडेही आहेत. पण ते सारे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे़ त्यातून जाणारा कर आणि इतर खर्च वगळता फेल्प्सला ३०० कोटींच्या आसपास समाधान मानावं लागतं.

    बोल्ट ४०० कोटींचा मालक

    फेल्प्सपेक्षा बोल्टची कमाई अधिक आहे. सुवर्णपदकं कमी जिंकूनही बोल्टला मिळणाऱ्या जाहिरातदार कंपन्यांचे काँट्रॅक्ट अधिक आहेत. प्युमासारखी कंपनी बोल्टसाठी जवळपास ९० लाख डॉलर खर्च करते. दरवर्षी तो १३० कोटी रुपयांची कमाई करतो आणि सध्या त्याच्याकडे सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

    दानशूर विक्रमवीर

    बोल्ट आणि फेल्प्स या दोघांनीही स्वत:च्या नावाच्या सामाजिक संस्था सुरू केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू अनेक गरजू लोकांना मदत करत असतात़ खेळाडू घडविणाऱ्या संस्था असो वा शिक्षण संस्था असो, साऱ्यांना सढळ हाताने मदत करण्यास हे दोन्ही खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत.

    बोल्ट ज्या शाळेत शिकला ती शाळा चांगली व्हावी यासाठी त्यानं पुढाकार घेतला होता. ज्या शहरात तो राहायचा तिथं खेळाचं मैदान त्यानं तयार केलंय आणि तिथं सगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्यानं लाखो डॉलर्सची मदत केली आहे. 

    फेल्प्सही याबाबतीत मागे नाही. फेल्प्सची संस्था अर्थातच पाण्यासाठी काम करतेय. स्विमिंग आर्मी तयार व्हावी असं त्याचं स्वप्न आहे. अमेरिकेत असलेल्या सध्याच्या अत्याधुनिक स्विमिंगच्या सुविधांपेक्षाही अधिक चांगल्या सुविधा तो होतकरू जलतरणपटूंना देऊ इच्छितो आणि त्यासाठी कामही करतो.

    – पवन देशपांडे, लोकमत मुख्य उपसंपादक

    आणखी वाचा

  • इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

    इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

    विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला डिश वॉशर म्हणून काम करायचे. हे काम करत असताना सतत त्यांना वाटायचं की, आपलं स्वतःचं एक हॉटेल असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, रात्रंदिवस काम केले आणि अखेरीस 1952 मध्ये त्यांनी सत्कार हे पहिले हॉटेल उभे केले. हे हॉटेल उभे करण्यासाठी व्यंकटेश कामत यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि व्यवसायाची उभारणी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. धंद्यात यश येऊ लागलं. सगळं काही आनंदात चालू होत. या अश्या आनंदाच्या वातावरणातच 1956 साली विठ्ठल कामत यांचा जन्म झाला. लहानपणापासून विठ्ठल कामत अभ्यासात हुशार होते, नवीन गोष्टी करण्यात त्यांना रस होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या विठ्ठल यांनी 1973 साली मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

    विठ्ठल यांच्या आईला नेहमी वाटायचं की, त्यांनी वडिलांना हॉटेलमध्येच मदत करावी, मात्र त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्यांनी इंजीनियरिंगची पदवी मिळवली. इकडे वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. वडिलांनी दोन चांगली हॉटेल उभी केली होती. मात्र अपयशाशिवाय यश मोठं वाटत नाही म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, संकटं ही येतच असतात, जवळच्याच एका व्यक्तीने फसवणूक करून विठ्ठल यांच्या वडिलांचे हॉटेल हिसकावले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अश्यावेळी त्यांच्याकडे असलेले दुसरे म्हणजेच सत्कार हॉटेलही असेच लुबाडले जाईल, या भीतीने विठ्ठल यांनी वडीलांसोबत काम करायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आवडला. हेच होते विठ्ठल यांचे हॉटेल व्यवसायातले पहिले पाऊल. व्यवसाय कसा वाढेल यासाठी विठ्ठल काम करू लागले. त्यांनी मुंबईत ‘विठ्ठल कामत’ या नावाने अनेक हॉटेल्सची साखळीच उभी केली.

    The orchid hotel pune

    त्यांनी इतकं अफाट यश मिळवलं खरं पण ‘ऑर्किड’ च्या उभारणीवेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा देखील बलाढ्य डोंगर उभा राहिला. या कर्जाच्या ओझ्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. तब्बल 282 कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाढलं होतं. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या ते खचले होते, आता पुढे काय होईल? पैश्यांची जोडणी कशी करता येईल? या विचाराने ते बैचेन झाले होते आणि अशातच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले, मात्र एका दृश्यामुळे त्यांना संकटांना हरवण्याची प्रेरणा मिळाली. एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावर एक पेंटर काहीही सुरक्षाकवच नसताना भिंत रंगवत होता आणि भिंत रंगवून झाल्यावर तो सुरक्षित खाली देखील उतरला, “जर तो पेंटर जीवघेणी जोखीम घेऊ शकतो तर मग मी नक्कीच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.” या विचाराने त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि शेवटी संकटांना हरवून दाखवले. 

    ही झाली विठ्ठल कामत यांची व्यावसायिक बाजू. पण विठ्ठल कामत हे एक बहुरंगी, बहुढंगी, बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पर्यावरणावर देखील खूप प्रेम. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसेच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्याचा मानस आहे. यासाठी ‘पाथरे गाव’ सारख्या डोंगराळ भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवण्यास सहाय्य केले. ६० लाखांहून अधिक झाडे लावली. १०० पेक्षा जास्त टेकड्यांचे त्यांनी औषधी आणि स्थानिक झाडांमध्ये रुपांतर केले. पक्षीशास्त्रज्ञाच्या पेशाने त्यांनी ‘ऑर्किड’ हॉटेल जवळ पोपट गल्ली देखील तयार केली. तिथे नानाविविध प्रकारचे  पोपट, इतर काही पक्षी पाहायला मिळतात, त्याबरोबर ओडिसा येथील “चिल्का सरोवर” येथे डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर”ची स्थापना केली. ऑर्किड हॉटेल, मुंबई आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय देखील त्यांनी उभे केले. तिथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पूरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी करून दाखवला.

    The Orchid Jamnagar

    विठ्ठल कामत यांचा हॉटेल व्यवसाय आज संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांना आजवर ११० हून  अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार,  राजीव गांधी पुरस्कार, २०१२ मध्ये जर्मनचा जीवनगौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विठ्ठल कामत हे  ‘हॉटेल आणि रेस्टॉरेट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले काम करतात.

    हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो किंवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं, परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोकं उद्योजक बनण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. अशांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेल्या वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ आणि यश, अपयश आणि मी  या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    आपल्या सगळ्यांच्याच घरात रिमोटवर चालणारे टीव्ही, आपल्या हातात असलेला स्मार्टफोन, किंवा कार चालवताना मिळणारे मार्गदर्शन, या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आत्ताच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या सहजपणे रुतले गेलेलं हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे. सर्वप्रथम, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर, संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची, समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी विविध तंत्रज्ञानं वापरली जातात, जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नेटवर्क थिअरी इत्यादी.

    कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास खूप जुना नाही. १९५० च्या दशकात या संकल्पनेवर पहिली चर्चा झाली. पण त्यावेळी संगणक तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते, त्यामुळे ही संकल्पना तशीच राहिली. संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर 1990 च्या दशकात त्यावर पुन्हा संशोधन सुरु झालं. आता या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. आज robots पासून ते स्वयंचलित गाड्यांपर्यंत, AI सर्वत्र आपले अस्तित्व दाखवत आहे. आत्ता आपण वापरत असलेले Google Assistant किंवा Siri सारखे व्हॉइस असिस्टंट्स, सोशल मीडियावरील व्यक्तिगत पसंतीनुसार दिसणाऱ्या जाहीरती, तुमच्या आवडीनुसार शिफारसी देणारे ऑनलाइन स्टोअर्स हे सगळं AI चीच उदाहरण आहेत.

    आज आपण अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पाहतो आहोत, जसे की-

    • वैद्यकीय क्षेत्रात: आजारांचं निदान, औषधांचा शोध, शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींमध्ये
    • वित्तीय क्षेत्रात: धोका ओळखणं, गुंतवणूक सल्लागार, फसवणूक रोखणे इत्यादी गोष्टींसाठी
    • वाहतूक क्षेत्रात: स्वयंचलित वाहनं, वाहतूक नियंत्रण, अपघात टाळणे इत्यादी गोष्टींसाठी
    • ग्राहक सेवा: चॅटबॉट्स, कस्टमर केअर, वैयक्तिकृत जाहिराती (personalized ads) इत्यादी गोष्टींसाठी

    भविष्य काय:

    AI ची वाटचाल खऱ्या अर्थाने आत्ता कुठे सुरु झाली आहे. भविष्यात AI आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग होणार आहे. स्वयंचलित वाहनं सर्वत्र दिसतील, तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार शिक्षण आणि वैद्यकीय सेवा सर्वसामान्य होईल आणि रोबोट्स आपल्यासोबत सहकारी म्हणून काम करतील. यामुळे आपला वेळ आणि श्रम बचत होईल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपले जीवन सुखदायी बनण्यास मदत होईल.

    तसेच, AI चा वापर योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर झाला तर मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ शकते, काही प्रमाणात बेकारी वाढू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. जसे की AI तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनिअर इत्यादी. पण दुसरीकडे काही नोकऱ्या संपुष्टातही येऊ शकतात. जसे की कॉल सेंटरमधील ऑपरेटर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स इत्यादी. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे आणि नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे.

    भविष्यात काय करायचं?:

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन ते आपल्या कल्याणासाठी वापरली पाहिजेत. यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत:

    शिक्षण आणि प्रशिक्षण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आणखी संशोधन आणि विकास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजाला या तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवणेही गरजेचे आहे.
    नियमन: AIचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे आणि नियमावली तयार करणे गरजेचे आहे.
    नैतिकता: AI तयार करताना आणि वापरताना नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे.

    आपण जर जबाबदारीने आणि सुबुद्धीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते मानवाच्या प्रगतीचं आणि कल्याणाचं एक शक्तिशाली साधन ठरू शकते. ते मानवापेक्षा हुशार होईल का? ही चर्चा अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की, AI आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या नशिबाचा खेळ खेळवणार की आपल्या मदतगार ठरणार हे आपल्या हातातच आहे. म्हणून आपण या क्षेत्रात झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेऊन त्याचा सावधपणे आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे.

  • सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.

    गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत.

    मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे. सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.

    आणखी वाचा

  • अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    अश्मयुगीन मानवाला आगीचा शोध लागला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन आले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवन अधिक गतिमान झाले. त्यानंतर जवळजवळ हजार वर्षांनतर मुद्रणकलेचा शोध लागला व ज्ञानाचे, माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणावर केले गेले आणि जगभर ज्ञानाचा प्रसार झाला. ज्ञानाची देवाणघेवाण सहज व सुलभ झाली.

    युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रांची निर्मिती व वापर सर्वत्र सुरु झाला. त्यांनतर अलिकडच्या काळात आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत शोधून काढला तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्रांती झाली. संगणकाचा शोध हा माहिती तंत्रज्ञानाची पायाभरणी होती. आज माहिती तंत्रज्ञानाने संपूर्ण जगावर मोहिनी घातली आहे. कोणतेही क्षेत्र घ्या. माहिती तंत्रज्ञान वगळल्यास त्यातील जीवनदायी तत्त्वच नष्ट होऊन जाईल. आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, राजकारण, व्यापार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान हा आत्माच मानला जातो.

    social-media-marketing-for-business-growth

    निवडणुका जिंकण्यासाठी, राजकीय कारभार सुरळीत चालवण्यासाठी, बँकिंग व्यवहारासाठी, प्रवासासाठी रस्ते शोधताना, घरपोच वस्तू व सेवा प्राप्त करण्यासाठी व अगदी काहीही करण्यासाठी आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    जगभरातील करोडो तरुण Social Media वर उपलब्ध आहेत. त्यांच्यापर्यंत आपला उद्योग पोहोचवणे सर्वात कमी किमतीत व कमी वेळेत सहजसाध्य झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, हाईक, टेलिग्राम असे अगणित मोबाईल ॲप्स सर्वांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली पाहायला मिळतात. तुमच्या आमच्या सर्वाच्या मोबाईलमध्ये या social media उपकरणांचा समावेश हमखास असतो. जो कोणी समाज माध्यमाचा वापर करत नाही त्याला खचितच काही कळत नाही असा समज इतर लोकांचा होऊ शकतो.

    social-media-marketing-for-business-growth

    दिवसेंदिवस स्वस्त होणारे नेटपॅक खिशाला परवडत असल्याने तरुणाई मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल हातातून सोडत नाही. अवघे जग आभासी जगाला (Virtual World) वास्तव मानू लागले आहे. दिवसभरातला अधिकाधिक वेळ मोबाईलवर व्यस्त असलेल्या व्यक्ती सर्व काही गुगलला विचारतात. आजकाल रस्ता विचारावा लागत नाही. वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जावे लागत नाही. पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल व टीव्हीचे रिचार्ज घरबसल्या होऊ लागले. कुठेही जाताना खिशात रोख मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची पध्दत आता इतिहासजमा झाली आहे. प्रियजनांना वाढदिवस व इतर प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आठवण करुन देणारे सहाय्यक (Reminder) तर साध्या मोबाईलमध्ये सुध्दा उपलब्ध आहेत. नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात. Video conferencing च्या माध्यमातून घरबसल्या मुलाखती देता येऊ लागल्या आहेत. परिक्षा व कितीतरी प्रशिक्षण क्रम घरबसल्या व्यक्ती शिकू लागला आहे. कर्जापासून अगदी आरोग्याचा सल्ला गुगल देऊ लागले आहे. स्वयंपाकघरातून बेडरुममध्ये व्हॉट्सॲपद्वारे संभाषण केले जाऊ लागले आहे. विनाचालक कार लवकरच बाजारात येतील. तुमचा पगार व इतर देणी-घेणी थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. अशी न संपणारी उदाहरणांची यादी आहे. या सगळ्या गोष्टी आपले जीवन सुलभ व सोपे करण्यासाठी खूप सोयीस्कर झाल्या आहेत. ग्राहक म्हणून विचार केल्यास फायदेशीर ठरतातच.

    social-media-marketing-for-business-growth

    जेव्हा आपण व्यावसायिक म्हणून किंवा उद्योजक म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या दृष्टीने सोयीस्कर झालेल्या काही गोष्टींची यादी पाहू या. ज्याप्रमाणे ग्राहक घरबसल्या ऑर्डर देऊ लागला आहे, त्याप्रमाणे आपल्याला ग्राहकांकडून त्या ऑर्डरचे पैसे थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया निर्माण झाली आहे. दुकानात येऊन ग्राहक वस्तूंची निवड करताना दाखवावे लागणाऱ्या varieties नुसार होणारा पसारा होत नाही. त्याशिवाय वेळ वाचतो तसेच ग्राहकाची मानसिकता जाणून घेण्याची गरज उरत नाही. ग्राहक स्वतःच्या आवडी निवडी, पाहिजे तेवढ्या varieties, त्याच्या गरजेनुसार व आर्थिक क्षमतेनुसार ऑर्डर करतो त्यामुळे ग्राहकाला झेलायची वेळ विक्रेत्यावर येत नाही. दरामध्ये घासाघीस करावी लागत नाही. आपल्याला परवडणारी सूट (Discount) देऊन ग्राहकाला आकर्षित करता येते. जगभरातल्या कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला ग्राहक मिळू शकतात. वेगवेगळ्या परवानग्या काढण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. कंपनी नोंदणी (Company Registration) पासून कर भरणा (Tax Filing) करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःहून बसल्या ठिकाणी करु शकतो. व्हर्च्युअल ऑफिसच्या माध्यमातून व्यवसायाच्या कक्षा रुंदावतात. २४ * ७ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस दररोज २४ तास आपला व्यवसाय आपल्या प्रत्यक्ष सहभागाविना चालू राहतो. तुम्ही झोपलेले असताना, जेवताना, चहा पिताना, गप्पा मारताना, व्यायाम करताना तसेच अगदी सहलीला गेल्यावर सुध्दा व्यवसाय चालूच राहतो. असे कितीतरी चमत्कार होत असतात.

    social-media-marketing-for-business-growth

    मात्र हे सगळं एवढं सोपं असूनही आपल्याला हे सर्व कसं साध्य करुन घेता येईल. आपल्या व्यवसायाची वेबसाईट असावी. त्या वेबसाईटला ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांकडून पैसे येण्यासाठी पेमेंट गेटवे जोडलेला असावा. ग्राहकाला ऑर्डर करण्याची व्यवस्था असावी. व्यवसायाचे फेसबुक पेज असावे. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनच्या माध्यमातून आपली वेबसाईट गुगल शोधात पहिल्या क्रमांकावर कशी आणायची? बल्क मेसेज व बल्क Email काय आहे? त्याचा उपयोग करायचा कसा? फेसबुक पेज कसे तयार करावे? त्याचा प्रसार, प्रचार व प्रसिध्दी कशी करावी? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या भाषेत जाणून घेण्यासाठी एक महिनाभर आपण दररोज सकाळी दहा वाजता एक विषय घेऊन भेटू या.

  • हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

    हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

    जन्म आणि कुटुंब

    मायकल डेल (Michael Dell) यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात झाला आहे. त्यांचे वडील अलेक्झांडर डेल, दातांचे डॉक्टर होते. तसेच, आई लंगफान या एक स्टॉक ब्रोकर होत्या. मायकल यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. आई-वडील दोघेही कमावते होते. त्यामुळे घरात पैशांची कसलीच कमतरता नव्हती. दुसरीकडे, मायकल हे बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. ते बालपणी इतर मुलांसारखे अजिबातच नव्हते. ते त्यांच्या जास्तीत जास्त वेळ काही ना काही शिकण्यात घालवत होते. मायकल यांचे प्राथमिक शिक्षण ह्यूस्टन शहरातील ‘हीरोड एलिमेंटरी स्कूल’मध्ये झाले होते. शिकत असतानाच मायकल यांनी आई-वडिलांकडून गुंतवणूक आणि व्यापाराचे सर्व गुण शिकून घेतले होते. बालपणापासूनच हे सर्व गुण शिकल्यानंतर मायकल यांचा व्यवसायाबद्दलचा रस आणखीच वाढला होता. त्यांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, जेव्हा ते १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून पॉकेट मनी मिळायची. हेच पैसे ते साठवू लागले होते.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    बालपणीपासून मायकल यांच्यात पैसे साठवण्याची धडपड असायची. त्यामुळेच त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहरात टपाल तिकिटांची विक्री सुरू केली होती. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, पैसे साठवण्याच्या चांगल्या सवयीमुळे त्यांनी अवघ्या १२ वर्षांच्या वयात २०००हून अधिक डॉलर्स साठवले होते.

    यशाचे पहिले पाऊल

    बालपणीपासून एक चांगला धडा घेतल्यामुळे मायकल डेल यांनी त्यांच्याजवळची संपूर्ण रक्कम मेटल्समध्ये गुंतवली. आयुष्यातील आपल्या पहिल्याच गुंतवणूकीतून मायकल यांना १८००० डॉलरचा फायदा झाला. तसेच, त्यांचे मनोबलही खूप वाढले. मायकल यांना इतक्या कमी वयात झालेला फायदा हा त्यांच्या वडिलांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही कित्येक पटींनी जास्त होता. मायकल लहान वयातच यशाच्या त्या टप्प्यावर होते, जिथे अनेक व्यावसायिकही पोहोचू शकत नाहीत. मायकलचा काम करण्याबद्दलचा रस पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न साकार करण्याचा विडा उचलला.

    बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात रस

    प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. तसंच काहीसं मायकल यांच्याविषयीही होतं. मायकल यांना बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात खूपच रस होता. यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी एक कम्प्यूटर खरेदी करून दिला. मात्र, मायकल यांनी कम्प्यूटर बाहेरून शिकण्याऐवजी त्याच्या आतमधील भागांविषयी शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या कम्प्यूटरचा एक-एक भाग वेगळा केला आणि आता त्यांना कम्प्यूटरचा प्रत्येक भाग व्यवस्थित दिसत होता.

    याच घटनेनंतर मायकल यांचे कम्प्यूटरविषयीचा रस आणखी वाढला आणि त्यांनी आपला अधिकतर वेळ कम्प्यूटरवर घालवण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे कम्प्यूटरचा प्रत्येक भाग चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका कंपनीचा कम्प्यूटर खरेदी केला. इथंही मायकल यांनी दुसऱ्या कम्प्यूटरसोबत तेच केले, जे आधीच्या कम्प्यूटरसोबत केले होते. नंतर त्यांनी त्या कम्प्यूटरचे सर्व भाग योग्यरीत्या कम्प्यूटरमध्ये लावले आणि पुन्हा त्या कम्प्यूटरला पहिल्यासारखे बनवले, जे खूपच चकित करणारे होते.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    कॉलेजमध्ये जुन्या पार्ट्सपासून बनवला कम्प्यूटर

    मायकल डेल जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्यांनी एकदा कम्प्यूटरशी संबंधित हार्डवेअर आणि त्याचे पार्ट्स एकत्र करून आपला स्वत:चा एक कम्प्यूटर बनवला. त्यांनी तयार केलेला कम्प्यूटर आपल्याच कॉलेजमधील मित्राला विकला आणि त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. आता पैशांचे आकर्षण मायकल डेल यांना बालपणीपासूनच होते. आता मायकल आणि कम्प्यूटर हे एक समीकरण बनले होते. ते आणखी कम्प्यूटर बनवू लागले. ते जे कोणते कम्प्यूटर बनवायचे, ते लोकांची सुविधा लक्षात ठेवून बनवत होते. यामुळे लोकांना त्यांनी बनवलेले कम्प्यूटर खूपच आवडू लागले होते.

    कॉलेजला रामराम अन् स्वत:ची कंपनी

    एका अहवालानुसार, १९८४मध्ये मायकल डेल यांनी १ हजार डॉलरमधून कम्प्यूटरचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यांनी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी मेडिकल कॉलेजला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या कंपनीला पीसीज लिमिटेड (PC’s Limited) या नावाने रजिस्टर केले. सुरुवातीला त्यांनी हॉस्टेलच्या एका रूममध्ये कम्प्यूटर असेम्बल करण्यास सुरुवात केली आणि त्यांना यातून यशही मिळाले. १९८५मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा पहिला टर्बो पीसी बनवला, ज्याचे डिझाईन मायकल यांनीच केले होते. हे कम्प्यूटर विकण्यासाठी त्यांनी जाहिराती आणि मेल-ऑर्डर कॅटलॉग या माध्यमाची निवड केली. मायकल यांच्या सर्व पॉलिसी मार्केट आणि ग्राहक, या दोघांसाठी योग्य होती, ज्यामुळे कंपनी दिवसेंदिवस प्रगती करू लागली. यानंतर १९८८ मध्ये कंपनीचे नाव पीसीज लिमिटेड बदलून डेल कम्प्यूटर कॉर्पोरेशन (Dell Computer Corporation) असे ठेवले.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी म्हणजे १९८९मध्ये मायकल यांनी संसार थाटला. त्यांनी सुझेन डेल यांच्यासोबत लग्न केले. या दोघांनी ३ मुली आणि १ मुलगा अशी ४ अपत्य आहेत. मुलींची नावे, अलेक्सा, ज्युलिएट आणि किरा आहे. तसेच, मुलाचे नाव झॅकरी डेल असे आहे.

    हळूहळू मायकल यांनी बनवलेल्या कंपनीचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर येऊ लागले, जे मायकल यांच्यासाठी मोठ्या यशाचे संकेत होते. मायकल यांची डेल कंपनी त्यावेळी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कमी किंमतीत लोकांना कम्प्यूटर उपलब्ध करून देऊ लागली. एवढंच नाही, तर मायकल यांची कंपनी जगभरात यशस्वी झाली. विशेष म्हणजे, अवघ्या २७व्या वर्षी मायकल हे सर्वात कमी वयातील CEO बनले. त्यांची कंपनी जगातील प्रसिद्ध 500 कंपन्यांमध्येही सामील झाली. मायकल यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांची कंपनी आज जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे.

    आज घडीला मायकल डेल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७व्या स्थानी आहेत. रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२३मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही ७२.८ बिलियन डॉलर्स इतकी होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते मित्रांनो, जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करत आयुष्यात पुढे जात राहिलात, तर एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

    आणखी वाचा

  • अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. वास्तविक संत गाडगेबाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांना आपली स्वाक्षरीसुद्धा करता येत नव्हती. पण त्यांच्या जिभेवर मात्र तुकोबांचे अभंग नाचत असत. त्यांचा वेशही साधाच होता. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात खराटा आणि दुसर्‍या हातात मडक्याचे फुटके खापर घेऊन संत गाडगेबाबा गावोगावी कीर्तन करत फिरत असत.

    ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने साफ करत आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत.

    संत गाडगेबाबांनी जाणले होते की, समाजातील लोक अज्ञानी, अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना दगडात परमेश्वर दिसतो, परंतु माणसातला देव दिसत नाही. भूत, भानामती, करणी, जादूटोणा यावर लोकांचा दाट विश्वास आहे. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. भयाण दारिद्र्याची कारणे केवळ व्यसन व रोगराई नसून निरक्षरता, अंधश्रद्धा हीच आहेत. म्हणून रोग, गरिबी, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध गाडगेबाबा जन्मभर लढले. व्यसन संपले की गरिबी संपणार, व्यसन संपले की रोगराई संपणार म्हणून प्राण्यांची हत्या करू नका, कर्ज काढू नका, भोंदू गुरूकडून मंत्र घेऊ नका, हाच मंत्र गाडगेबाबांनी दिला.

    संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, गोरक्षण संस्था व शाळा- कॉलेजेस काधली. त्यांच्याजवळ पोथी नव्ह्ती. पूजा-अर्चा करा, असा उपदेश नव्हता. त्यांचे कीर्तन दु:खितांसाठी व अज्ञानासाठी होते. परखड कीर्तनातून सार्‍या महाराष्ट्राला उपदेश केला. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरूंसाठी सोय त्यांनी केली. दु:ख , दारिद्र्य व अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाने ते लोकांना मंत्रमुग्ध करत.

    संत गाडगेबाबा म्हणजे एक क्रांतिसूर्य होय. माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणापासून महारापर्यंत सगळी माणसे एकच आहेत. ‘ कोंबडे- बकर्‍या खाणारा देव नसून सैतानच आहे’ हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभूत संत! भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले ते म्हणतात,’ देव देवळात नाही, दगडात नाही. माणसात आहे.’ पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लोकांना आवर्जून सांगितले की, बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करून काहीही मिळणार नाही. माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा.

    बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते. तसेच तथाकथित सुशिक्षितांसाठीही होते, दु:खितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, त्यात पूजा-अर्चा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या, भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उद्धाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन.

    माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्‍या या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. अविश्रांत कीर्तने , धावपळ यामुळे त्यांच्या मजबूत देहावर दगदगीचा परिणाम होऊ लागला. काही अनुयायांच्या काही विचित्र वर्तनांची त्यांच्या मनावर तीव्र परिणाम झाला. मधुमेहाच्या आजारानेही त्यांना जर्जर केले. बाबांनी शेवटी शेवटी अन्नही वर्ज्य करून आमटीचे पाणी व भाजी यावरच आपला निर्वाह चालवू लागले.

    बाबा म्हणजे माणसात देव पाहणारा मानवतापूजक संतश्रेष्ठ. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्मशताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या, ‘ परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करून मानवतेवर अनंत उपकार केले आहेत.’ मात्र मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी , लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही. अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यांना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतादी संत आहेत.’

    रंजल्या-गांजल्यांना ‘आपुले’ म्हणणारा आणि अनाथ -अपंगांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना तंतोतंत लागू पडते. बाबांनी आपल्या उपदेशात म्हटले की, ‘ बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.’

    कबीर कहे कमालकू सबसे बडी दया |

    तीर्थ जावो, काशी जावो, चाहे जावो गया ||

    अशा या महामानव युगप्रवर्तकाची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्री मावळली.

    — मच्छिंद्र ऐनापुरे

    आणखी वाचा