Author: naviarthkranti

  • Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

    Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

    माणसाच्या याच भावनिक गरजेमुळे जन्म होतो नाते-संबंधांचा. आणि घरच्या मंडळींसोबत असलेला हाच दुवा पुढे मित्र-मैत्रिणींसह जपला जातो. मैत्रीचं नातं जरी जन्मापासून निर्माण झालं नसलं, तरीही जन्मभरासाठी जपता येतं आणि जपलं देखील जातं. मैत्रीच्या नात्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे मैत्री दिवस किंवा फ्रेन्डशिप डे. तुमचा देखील कोणीतरी खास मित्र असेलच ना, ज्याच्यासोबत तुम्ही हा दिवस घालवणार आहात. मात्र आपण मैत्री दिवस का साजरा करतो? मैत्री तर आयुष्यभरासाठी असते, मग केवळ एका दिवसाचा आनंद का? चला जाणून घेऊया…

    फ्रेन्डशिप डे का साजरा केला जातो?

    फ्रेन्डशिप डे (Friendship Day) हा मैत्रीचा दिवस आहे, दोन मित्रांमधील नातं साजरं करण्याचा दिवस. भारतात आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करतो. मग त्यात मित्रांसोबत घेतलेला एक घोट चहा असेल किंवा मोठाल्या हॉटेलमध्ये पार्टी, महत्त्वाचं काय, तर मित्रांसोबत वेळ घालवणं. आता तुम्ही असं म्हणाल की मैत्री ही दररोज निभवायची असते, मग एका दिवसाचं सेलीब्रेशन का? एकमेकांच्या आधारासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, समोरचा व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून देण्यासाठी एखादा खास दिवस हवाच. नाही का? कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण जगभरात वेगवेगळ्या दिवशी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) मध्ये ३० जुलै, तर मेक्सिकोमध्ये १४ फेब्रुवारी आणि सिंगापूरमध्ये एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मैत्री दिवस साजरा केला जातो. दिवस वेगळे असले, तरी त्यामागे असलेला उद्देश मात्र बदलत नाही.

    हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी मैत्री दिवसाची सुरुवात दोन मित्रांमधील नातं खुलवण्यासाठी केली होती. जॉयस हॉलच्या याच सिद्धांतचा पुढे स्वीकार करण्यात आला आणि अशाप्रकारे मैत्री दिवसाची सुरुवात झाली.  दोन देशांमधले संबंध सुधारावेत, शांतता प्रस्तापित व्हावी म्हणून या दिवसाला महत्व दिलं जाऊ लागलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? कित्येक वर्षांपासून सुरु असलेली मैत्री दिवसाची ही परंपरा अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली आहे. वर्ष 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने (United Nations General Assembly) 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. विविध लोकं, देश आणि संस्कृती यांच्यामध्ये शांततेचे संबंध निर्माण व्हावे आणि परस्परांमध्ये एक आपुलकीचा धागा निर्माण व्हवा म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व संस्कृतींना समान आदर मिळावा, त्यांचा विविधतेसह स्वीकार व्हावा म्हणून मैत्री दिवस साजरा केला जातो. 

    मैत्रीचे महत्व काय?

    आपल्या आयुष्यात नाते संबंधांचे खरोखर महत्व आहे का? वरती उल्लेख केल्याप्रमाणे कुणीतरी आपले विचार समजून घ्यावे, आपल्याला गटाचा भाग बनवून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ही आपली मानसिक गरज आहे. घरच्या चौकटीत बांधलेलं असताना कुणी आपल्याला दूर लोटण्याचे किंवा समजून न घेण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत, मात्र एकदाका घरचा उंबरा ओलांडला की बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना कुणीतरी आपल्यासोबत असावं अशी मानसिक भूक निर्माण होते. परिणामी शाळेत गेलेलं मूल ‘माझ्या आवडीचा खेळ खेळणारं इथे कोण असेल?’  याचा विचार करू लागतं. माणसाचे विचार जुळले म्हणजे आवडी-निवडी उलगडून बघता येतात आणि यातूनच मैत्रीचं नातं तयार होतं, खुलतं आणि बहरू लागतं. 

    भले या नात्यात असलेली दोन लोकं जन्मापासून एकत्र नसतील, मात्र वेळेसोबत जोडली गेलेली ही नाळ दिवसेंदिवस घट्ट होते. मैत्री म्हटलं की कट्ट्यावरच्या गप्पा, चहाचा एक कप, संध्याकाळचा खेळ, गाडीवरून मारलेल्या फेऱ्या आणि “माझ्या मित्राला बाईंनी बाहेर ठेवलंय म्हणून मी पण बाहेर जाणार” याचा अट्टाहास. रुसव्या-फुव्यांशिवाय कोणतंही नातं टाकलेलं नाही. असं म्हणतात आपण त्याच्यावरच रागावरतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, हक्क असतो आणि म्हणून मैत्रीतदेखील कधीतरी भांड्याला भांडं लागतंच. वेळप्रसंगी मित्रासाठी खंबीरपणे उभं राहणं असो किंवा मित्राची प्रेयसी सोडून गेली म्हणून रडायला खांदा देणं असो मैत्रीचं नातं आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सामावलेलं आहे. 

    मैत्रीच्या नात्याचे पौराणिक दाखले:

    मैत्री म्हणजे माणसाला मिळालेली एक खास भेट, आणि याला अनेक पौराणिक दाखले देखील जोडता येतात. मैत्री दिवस म्हटलं म्हणजे हमखास आठवते ती सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाची जोडी. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात झालेली ही मैत्री कायम चिरतरुण राहिली. श्रीकृष्ण राजा झाले, तर सुदामा मात्र गरीब ब्राह्मणच राहिला, तरीही पायपीट करून आलेल्या सुदाम्याच्या पायात रुतलेले काटे आपल्या मऊ हातांनी काढणारे श्रीकृष्ण कोणी देव अगर राजा नव्हते, ते केवळ आणि केवळ सुदाम्याचे मित्र होते. महाभारताच्या पानांमध्ये आपल्याला मैत्रीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, मग ती मित्राचं बोट कापलं म्हणून भरजरी शालू फाडणारी द्रौपदी आणि चिंधीची परतफेड लाज राखून करणारे श्रीकृष्ण असोत किंवा खरी आई कोण याची प्रचिती येऊन सुद्धा मैत्रीच्या नात्यापायी कौरवांकडून लढलेला कर्ण, असे कैक प्रसंग पहिले म्हणजे यामधील प्रत्येक मित्राने आपल्या मित्रासाठी केलेला  त्याग डोळ्याच्या पापण्या अलगद ओल्या करतो. 

    रामायणाच्या पानांमध्ये देखील मैत्रीची बरीच उदाहरणं आहेत. राजा दशरथाच्या मैत्रीखातर स्वतःचा जीव धोक्यात घालत अपहरण झालेल्या सीतेच्या रक्षणार्थ धावलेला जटायू किंवा मैत्री निभावण्यासाठी वानरसेनेसह समुद्र पार करून गेलेला सुग्रीव, सर्वात महत्वाचं म्हणजे दिलेल्या शब्दाला जागत जिंकलेलं संपूर्ण राज्य विभीषणच्या नावे करणारे श्रीराम ही मैत्रीच्या नात्याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. मात्र कायम लक्षात असुद्या की पुराण किंवा इतिहासातील दाखले केवळ गोष्ट म्हणून ऐकण्यासाठी नाहीत, तर स्वतःमध्ये ते गुण उतरवण्यासाठी आहेत. वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाने मैत्रीची परिभाषा ओळखत, प्रामाणिक राहत, नात्याचा सन्मान करत वेळोवेळी नातं खुलवलं आणि म्हणूनच ते नातं टिकलं. 

  • संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    पारशी समाजाचा उगम कसा झाला?

    आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च  कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. 

    विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही. 

    राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि  सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं  पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले  मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला. 

    इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज

    पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला. 

    भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या  प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले. 

    पारशी समाज आणि आज

    स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.

    एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.

    आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?

    एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात. 

    आणखीन वाचा:

  • भारतीय विमान सेवेचे जनक, उद्योगरत्न जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस

    भारतीय विमान सेवेचे जनक, उद्योगरत्न जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस

    ओळख
    जेआरडी यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी रतन दादाभॉय व सूनी टाटा यांच्या पोटी पॅरिस येथे झाला. ते टाटा ग्रुपचे चौथे अध्यक्ष होते.
    शिक्षण
    जेआरडींचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. तर शिक्षण लंडन, जपान, फ्रान्स आणि भारतात झालं. त्यांना केंब्रिजमधून इंजिनिअरिंग करायची इच्छा होती, पण वडिलांनी व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात बोलावून घेतलं.
    सुरुवात
    बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून त्यांनी कंपनीत कामाला सुरुवात केली.

    वयाच्या 22 व्या वर्षी ते टाटा सन्सचे डायरेक्टर बनले, तर 34 व्या वर्षी कंपनीचे चेअरमन बनले.
    विमान वाहतुकीचे जनक
    भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक म्हणून जेआरडी ओळखले जातात. ते भारताचे पहिले कमर्शिअल पायलट होते. कराची ते मुंबई
    हे पहिलं विमान त्यांनी स्वतः उडवलं होतं. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स स्थापना केली. ज्याचं नाव नंतर एअर इंडिया झालं.
    टाटा ग्रुपचा विस्तार
    जेआरडी अध्यक्ष झाले तेव्हा टाटांच्या 14 कंपन्या होत्या. निवृत्तीच्या वेळेस ही संख्या 95 पर्यंत पोहोचली. ग्रुपचा महसूल 100 दशलक्ष डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. टीसीएस, टायटन, टाटा मोटर्स, वोल्टास, एअर इंडिया इत्यादी कंपन्या जेआरडींच्याच काळात सुरु झाल्या.
    समाजकल्याण
    त्यांनी कामगारांसाठी दिवसात 8 तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा योजना सुरु केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल इत्यादी संस्था स्थापना करण्यात भूमिका बजावली.
    पुरस्कार
    जेआरडी हे पहिले आणि एकमेव उद्योगपती आहेत, ज्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा त्यांना दिला गेला. भारतीय हवाई दलातील एअर व्हाईस मार्शल हे मानद पद त्यांना देण्यात आले होते. हवाई क्षेत्रातील
    देशातील सामान्य लोकांचा आणि देशाचा जोपर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत
    एक उद्योजक म्हणून मिळणारे कोणतेही यश अपूर्ण आहे.
    – जेआरडी टाटा
  • नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

    नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

    संपूर्ण देशासाठी बजेट किंवा अर्थसंकल्प हा एक महत्वाचा भाग ठरतो, आपल्या देशात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत किंवा भारताचे नागरिक म्हणून आपण सरकारला किती टक्क्यांपर्यंत कर भरणार आहोत या बद्दलची किमान माहिती सुजाण नागरिक म्हणून आपल्याजवळ असली पाहिजे. 

    कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त झाल्या?

    कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कर कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. भारतामध्ये अधिकाधिक मध्यवर्गीय लोकं वावरतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी असे आर्थिक चढ-उतार महत्वाचे ठरतात. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कॅन्सरची औषधं, क्रूझचा प्रवास, सी फूड, वस्त्र, X-Ray मशीन,चामड्याच्या वस्तू, मोबाईल, मोबाईल चार्जर व इतर उपकरणं स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्या-चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये ६ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने या मौल्यवान वस्तू देखील आता स्वस्त होतील. महाग वस्तूंबद्दल बोलायचं झाल्यास फ्लेक्स आणि बॅनरच्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्याने जाहिरातींची  ही साधनं महाग होणार आहेत. 

    अर्थसंकल्प थोडक्यात:

    काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा बऱ्यापैकी तरुणांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी विशेष वरदान ठरला  आहे. देशातील पायाभूत सुविधा मजबूत व्हाव्यात, शेती व्यवसायात वाढ व्हावी, महिलांच्या हातात पैसे खेळात राहावेत म्हणून अर्थमंत्रालयाने धनाची पुंजी खुली केली आहे.भारतातील ग्रामीण भागांचा विकास व्हावा, तसेच आदिवासी वर्गाला आर्थिक मदत मिळावी म्हणून देखील विशेष धनादेश जारी करण्यात आला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार स्थापनेत मैत्रीचा हात पुढे केलेल्या बिहार आणि आंध्र प्रदेशला आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे. एकंदरीतच या अर्थसंकल्पामधून मोदी सरकारचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल अशी आखणी करण्यात आली आहे. 

    अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया:

    निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अनेक राजकीय मंत्र्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या आणि यात सर्वात महत्वाची प्रतिक्रिया ठरली ती म्हणजे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. नरेंद्र मोदी यांच्या मते “हा अर्थसंकल्प देशातील मध्यमवर्गीयांवर लक्ष देणारा आहे. शेतकरी वर्गाला मदत करणारा तसेच तरुण मंडळींना नवीन संधी उपलध करून देणारा आहे.

    अर्थसंकल्पावर राहुल गांधी काय म्हणाले?

    विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देखील अर्थसंकल्पावर मत नोंदवले आहे, त्यांच्या मते “हा खुर्ची बचाओ अर्थसंकल्प आहे. राजकारणात मदत केलेल्या पक्षांना खुश करण्यासाठी त्या-त्या राज्यांच्या नावे  भलामोठा धनादेश जारी करण्यात आला आहे आणि सोबतच अदानी-अंबानींना खुश करण्यात सामान्य जनतेला इथे सपशेलपणे डावलण्यात आले आहे.”

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

    आणखीन वाचा:

  • हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’

    हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’

    मात्र कधी विचार केलात का ‘किंमत किंवा व्हॅल्यू’ म्हणजे काय? दुकानात गेल्यानंतर विकत घेतलेल्या हरेक वस्तूसाठी किंमत मोजली जाते आणि म्हणूनच त्या वस्तूच्या किमतीनुसार आपण ती हाताळतो. अगदीच महागडी वस्तू असेल तर तिला जिवापेक्षा जास्त जपलं जातं. नाही का? पण किंमत फक्त विकत घेतलेल्या वस्तूंचीच केली जाते का? नाही!! आपल्या आजूबाजूला वावरणारी मंडळी, आपलं कुटुंब, मित्र परिवार सर्व आपल्यासाठी महत्वाचे असतात आणि म्हणून आपण त्यांची किंमत करतो म्हणजे काय तर त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्व जाणतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, ते आपल्यापासून दुरावणार नाहीत याची काळजी घेतो. दैनंदिन जीवनातील याच घडामोडींच्या आधारे कैक वर्षांपूर्वी ट्रॉली डेलिमाचा सिद्धांत सादर करण्यात आला होता. पण हा संदर्भ नेमका आहे तरी काय हे आज जाणून घेऊया. 

    ट्रॉली डेलिमा म्हणजे काय?

    वर्ष १९६७ मध्ये फिलिप फूट (Philipa Foot) नावाच्या एका फिलॉसॉफरने (Philosopher) हा सिद्धांत मांडला होता. सदर सिद्धांत सामान्य माणसाला समजण्यासाठी फिलिप फूट यांनी एका रेल्वेचं उदाहरण देत एकूण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात,

    एका वेगाने धावणाऱ्या रेल्वेसमोर जर का पाच माणसं उभी होती म्हणून चालकाने त्यांचा जीव वाचवण्यासाठी रूळ बदलला तर दुसऱ्या रुळावर देखील एक माणूस उभा ठाकला होता. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये रेल्वे चालकाने काय करावं? साहजिकपणे आपण म्हणू की पाच माणसांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेचालकाने एका माणसाचा जीव घ्यावा. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असंही वाटतं की, जीव हा जीव असतो मग तो एका माणसाचा असो किंवा पाच

    या उदाहरणातून आपण काय शिकतो तर आयुष्याच्या प्रवासात काही प्रसंग असेही येतात, जिथे एक योग्य पर्याय निवडला जाऊ शकत नाही. हिंदी भाषेत या प्रसंगाच्या आधारे एक म्हण तयार करण्यात आली आहे ती म्हणजे “आगे कुआं, पीछे खाई” म्हणजे काय तर समोर गेलो तरीही विहिरीत पडू आणि मागे आलो तरीही दरीत कोसळू, एकूण काय तर अशा परिस्थितीत एक सोपा मार्ग निवडला जाऊ शकत नाही. 

    दररोजच्या जीवनात याचा संदर्भ काय?

    जीवन जगात असताना आपण देखील अनेकवेळा अशा ट्रॉली डेलिमाचा सामना करत असतो. विचार करा त्या रेल्वेच्या रुळावर जर का तुमच्या जवळचा कुणीतरी खास व्यक्ती असता, तर तुम्ही कोणाची निवड केली असती, पाच माणसांची की तुमच्या जवळच्या व्यक्तीची? नक्कीच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची निवड केली असती आणि तेव्हा आपण एका व्यक्तीचे प्राण वाचवत आहोत की पाच व्यक्तींना जीवनदान देत आहोत असा विचार देखील मनात आला नसता. का? कारण आपल्यासाठी ती जवळची व्यक्ती महत्वाची असते, आपण त्या व्यक्तीची किंमत जाणून असतो. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर रामायण आणि महाभारतामध्ये देखील या ट्रॉली डेलिमाची उदाहरणं सापडतात. पट्टराणी कैकयीला दिलेल्या वाचनापायी लाडक्या पुत्राला वनवासात जाण्याची आज्ञा न देऊ शकणारा राजा दशरथ असो किंवा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर स्वतःच्याच परिवारासमोर शत्रू म्हणून धनुष्य घेऊन उभा ठाकलेला अर्जुन असो. ट्रॉली डेलिमाचा एका अर्थाने विचार केल्यास अशा कठीण प्रसंगांमध्ये अनेकवेळा नीती-अनीतीला बाजूला सारत आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्या आधारे निर्णय घेतला जातो. 

    याच सिद्धांताचा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास एक खास पैलू उघड होतो. आपल्या मनात अनेक इच्छा असतात, कित्येक गोष्टी साध्य करायच्या असतात, मात्र तरीही आपण त्या करू शकत नाही, कारण आपण त्या इच्छांना महत्व दिलेलं नसतं. ‘मला डॉक्टर व्हायचं आहे’ अशी इच्छा मनात बाळगून वावरणारा कधीही डॉक्टर बनू शकत नाही, मात्र मला डॉक्टर व्हायचं आहे, माझ्यासाठी ही इच्छा पूर्ण होणं महत्वाचं आहे आणि म्हणून मी प्रयत्न करेन असा विश्वास बाळगणाराच यशस्वी होतो आणि म्हणूनच आपलं करिअर घडवताना जे लक्ष साध्य करायचं आहे त्याला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधाला देखील हाच संदर्भ लागू होतो. नवीन लग्न करून सासरी गेलेली मुलगी जेव्हा सासरच्या घराला महत्व देते, त्यांचा आनंद देखील तिच्यासाठी महत्वाचा ठरतो तेव्हाच ती नवीन घरात रुळते किंवा नवीन संबंध जपू शकते. 

    आणखीन वाचा:

  • गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

    गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

    भारतीय शिकवणीनुसार ज्या कुणा सजीव आणि निर्जीव वस्तूचा आपण जगण्यासाठी वापर करतो, त्या वास्तुप्रती कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. सामान्य माणसाला हीच शिकवण समजावी म्हणून पुराणांच्या पानांमध्ये गोष्टींच्या रूपाने त्या व्यक्त केल्या जातात एवढंच. त्यामुळे अश्या एखाद्या खास दिवशी आपण ज्या देवाची किंवा वस्तूची पूजा करतो ती का करतोय याची जाणीव असली पाहिजे, केवळ श्रद्धा आणि भक्ती हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश नसून कृतज्ञतेचा भाव माणसाच्या मनात कायम राहावा हीच त्यामागची खरी शिकवण आहे, त्यामुळे कायम लक्ष्यात ठेवा की भारतीय संस्कृती ही कधीही मागासलेली नव्ह्ती तर कायम पुढारलेलीच होती केवळ आपण त्याचा अर्थ समजायला कमी पडलो एवढंच.

    गुरुपौर्णिमेचे पौराणिक महत्व:

    आज आपण अश्याच एका महत्वाच्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. मनुष्य जन्म घेतल्यानंतर थेट मृत्यू येईपर्यंत माणूस काही ना काही शिकत असतो, त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्यातील अनेकविध घटक त्याला पदोपदी शिकवण देत असतात. मग या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव बाळगला पाहिजे की नाही? नक्कीच हो!! आणि यातच गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं सार दडलेलं आहे. सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो? पुराणांच्या आधारे हा दिवस म्हणजे महर्षी व्यास यांची जन्मदिवस आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. प्रसिद्ध ग्रंथ महाभारताचे रचते आणि चारही वेदांचे विभाजन करणारे वेदव्यासच होते.असं म्हणतात महर्षी व्यासांना दिव्यदृष्टी प्राप्त होती आणि या शक्तीच्या जोरावरच त्यांनी कलयुगातील घटनाक्रम ओळखला होता. व्यासांच्या याच अलौकिक ज्ञानामुळे त्यांना कैक युगानंतरही मानाचं स्थान प्राप्त आहे. ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आजही आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो.

    गुरु म्हणजे कोण?

    असं म्हणतात एका नवजात बालकाचा देखील गुरु असतो आणि ती म्हणजे आई. जिच्या नावातच आत्मा आणि ईश्वर दोन्ही सामावलेले आहेत ती जन्मदात्री आई. आईच तिच्या लेकराला चालायला, बोलायला, जेवायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभं करते. त्यामुळे जन्मापासूनच माणसाचं शिक्षण एकार्थाने सुरु होतं असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. “अंधकार निरोधित्वात गुरुर-इत्यभिधियते” याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करणारा म्हणजे गुरु होय. जीवनाच्या टप्याटप्यावर भेटलेला प्रत्येक माणूस या-ना-त्या प्रकारे आपल्याला शिकवण देऊन जातो, आणि म्हणूनच ही प्रकृती आणि त्यात सामावलेला प्रत्येक घटक हा आपला गुरु आहे. लहान मूल जसजसं मोठं होऊ लागतं तसं त्याला शाळेत भरती करतात आणि पुढे त्याचा शैक्षणिक प्रवास सुरु होतो. शैक्षणिक प्रवासात समोर आलेले शिक्षक आणि मार्गदर्शक आपल्या मनातील गुरु या शब्दाच्या धूसर चित्राला आकार देतात. शैक्षणिक जीवनानंतर माणसाचा खरा प्रवास सुरु होतो, नवीन आव्हानं आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न इथूनच सुरु होतो. अश्या या कठीण काळात भेटणारा प्रत्येक मार्गदर्शक देखील गुरु’च ठरतो नाही?

    आजच्या जगात गुरुचे महत्व काय?

    काळ कितीही बदलत असला तरीही गुरुचं महत्व कधीही कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अश्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञतेचा भाव मनात असणं महत्वाचं आहे. तुम्ही कदाचित आजूबाजूला पाहिलं असेल शाळकरी मुलं किंवा कॉलेजला जाणारे तरुण शिक्षकांची खिल्ली उडवतात, वेळ जाण्यासाठी शिक्षकांच्या नावाने मजा-मस्ती केली जाते. मात्र एकदा स्वतःला विचारून बघा की हे कितपत योय आहे. मित्रपरिवाराच्या आनंदासाठी शिक्षकांची टर उडवणं, त्यांना नावं ठेवणं, नकला करणं हा आपल्या शिकवणीचा भाग नाही. तरुण वयात मजा-मस्ती नक्कीच करावी मात्र त्यात कुणावर शिंतोडे फेकणं योग्य नाही.

    भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याकडे पिढ्यांपिढ्यांपासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण ज्यांना आपण भगवंताचा परमअवतार मानतो, त्यांचे पूजन करतो त्या भगवंताने देखील गुरुचे शरण मिळवलेच होते. गुरु सांदीपनी असुद्या किंवा गुरु वसिष्ठ भगवंताला देखील गुरुची गरज भासलीच आणि आपण तर क्षुल्लक माणसं आहोत.

    आणखी वाचा:

  • दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

    दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

    पुढे मुघल आणि ब्रिटिशांचे झालेले आक्रमण यामुळे भाषेची लिपी बदलली तरीही प्रामुख्याने भारतीय भाषांचा पाया हा बऱ्यापैकी देवनागरी लिपीतच आढळतो. हिंदी जरी आपली राष्ट्रभाषा असली तरीही सर्व राज्य भाषा या-ना-त्या प्रकारे हिंदीसोबत जोडल्या गेल्या आहेत, तरीही दक्षिणी भाषा जसं की तामिळ, तेलगू, मल्याळम यांची लिपी देवनागरीपेक्षा वेगळी मात्र परस्परांशी संबंधित आढळते. आज आपण या विविध भाषांबद्दल नाही, तर केवळ आपल्या मराठी भाषेबद्दल बोलणार आहोत.

    जर का आम्ही तुम्हाला विचारलं मराठी भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर तुम्ही साहजिकपणे महाराष्ट्र असंच म्हणाल. बरोबर? किंवा अधिकाधिक त्यात शेजारील राज्य गोव्याचं नाव जोडलं जाईल. पण जर का आम्ही म्हणालो की महाराष्ट्र आणि गोव्याव्यतिरिक्त मराठी भाषा आणखी एका राज्यात देखील बोलली जाते तर? आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे राज्य भारताच्या दक्षिणी भागात वसलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्याने विस्तार करायला सुरुवात केली होती, पुढे छत्रपती संभाजीराजे, ताराराणी आणि पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य बहरलं, खुललं आणि वाढलं. इतिहासकार असंही सांगतात की नानासाहेब पेशवे राज्य सांभाळत असताना रघुनाथराव पेशव्यांनी थेट अटकेपार मराठी पताका फडकावली होती.

    तंजावर मराठा पॅलेस

    मराठी भाषा दक्षिणेत कशी?

    दक्षिणेतील प्रसिद्ध राज्य म्हणजेच तामिळनाडूमध्ये तंजावर नावाच्या शहरात आजही लोकं मराठी बोलताना आढळतात. तुम्ही जर का या भाषिकांशी संवाद साधला तर लक्ष्यात येईल की या तंजावरच्या मराठी भाषेचे उच्चार हे तामिळ भाषेशी जुळणारे आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल की दक्षिण भागात मराठीचा उगम झाला तरी कुठून? तर इ.स. १६४० च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे स्थायिक झाले. ते इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिले. त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड आणि तमिळ भाषिक प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार होऊ लागला. अनेक मराठी घराणी कर्नाटकात स्थायिक झाली आणि तेथील समाजात मिसळली. त्यामुळे या प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू म्हणजेच व्यंकोजी राजे भोसले यांनी दक्षिणेत मराठी राज्याचा विस्तार केला. कर्नाटक राज्यापासून सुरु झालेली ही मोहीम दक्षिणेत चांगलीच रंगली. वर्ष १६७४ मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरचा राजा अळगिरी नायक याचा पराभव करून दक्षिणेत मराठी राज्याचा झेंडा रोवला.

    तामिळनाडूमध्ये व्यंकोजी राजांचं राज्य सुरु झाल्यानंतर मराठी लोकांना महाराष्ट्राच्या भूमीमधून दक्षिणेत आणून वसवण्यात आलं, यामागचा केवळ उद्देश मराठीचा विस्तार असाच होता. व्यंकोजीराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला आणि दक्षिणेत दबदबा निर्माण केला. असं म्हणतात दक्षिणेत मराठ्यांनी वर्ष १८५५ पर्यंत राज्य केलं आणि या संपूर्ण कार्यकाळात दक्षिण भारतात १२ विविध राजांनी कारभाराची धुरा सांभाळली होती. इतिहासातून मिळालेली माहिती असेही दर्शवते की या कैक दशकांच्या कालावधीत इथं अठरा पगड जातींमधली पाच लाख कुटुंबं वसवण्यात आली होती, या कुटुंबांच्या मराठी भाषेवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि दक्षिणी बोलीभाषेचा प्रभाव पडल्याने तंजावर मराठी भाषा उदयास आली.

    काही वर्षानंतर या कुटुंबांनी शिक्षण, काम आणि व्यवसायानिमित्त आजूबाजूच्या ठिकाणी ये जा सुरु केली आणि इतर भाषांचा देखील तंजावरच्या मराठीवर प्रभाव दिसून येऊ लागला. दक्षिणेतील मराठी राज्य जरी वर्ष १८५५ मध्ये संपलं असलं तरी आजही येथे मराठी संस्कृती जपली आणि जगली जाते. महाराष्ट्रातील खास सण जसे की गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, संक्रांत असे विविध सण-उत्सव आजच्या घडीला देखील तंजावरमध्ये साजरे केलेले दिसतात. कदाचित हे वाचून तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल, पण तंजावरच्या या भागात स्थानिकांकडून अंबाबाईचा गोंधळ घातला जातो. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की तंजावरच्या या भागात आजही मराठी भाषाच नाही, तर मराठी संस्कृती आणि मराठीचा संपन्न वारसा देखील जपला जातोय.

    दक्षिण भारतात पसरलेल्या मराठी भाषिकांनी आपल्या बोलीचे वेगळेपण आणि समृद्धी जपण्यासाठी आणि महाराष्ट्रासह इतरत्र राहणाऱ्या मराठी भाषिकांमध्ये त्याची ओळख करून देण्यासाठी दक्षिणी मराठी नावाचे नवीन YouTube चॅनेल सुरू केले आहे. हे चॅनेल दक्षिणी मराठी बोलीचे वैशिष्ट्ये, त्यातील शब्दसंग्रह, व्याकरण आणि संस्कृती यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी समर्पित आहे.

    असं म्हणतात आपल्याकडे अवघ्या काही किलोमीटर्सवर भाषा बदलत जाते आणि म्हणूनच उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या मराठी भाषेत बऱ्यापैकी तफावत दिसून येते. इथे बोलले जाणारे शब्द आणि आणि त्यांचे उच्चर यांमध्ये विविधता आढळते. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि कोकणपट्टी तसेच गोव्यात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर कोकणी आणि मालवणी भाषेचा प्रभाव दिसून येतो. ही विविधता आपली ओळख आहे, मात्र तरीही आपण बोलत असलेलीच भाषा शुद्ध हे इतरांच्या मनावर बिंबवणायचा आपला प्रयत्न काही सुटत नाहीये.

    कळत-नकळतपणे आपण गावातील मराठी भाषिकांना अशुद्ध उच्चार करणारी लोकं म्हणून हिणवतो, त्यांची भाषा सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा यांमधील फरकच आपल्याला समजून घ्यायचा नाही, कार्यालयीन किंवा पुस्तकी भाषा ही बऱ्यापैकी व्याकरणावर अवलंबून असते, मात्र बोलीभाषेला खरोखर अशी बंधनं असतात का? कदाचित ती भाषा ज्या चौकटीत जन्माला येते आणि वावरते त्याच वातावरणाचे संस्कार झाल्यामुळे शब्दोच्चार बदलत असावेत. आपल्या घराघरांमध्ये बोलली जाणारी ही आपली बोलीभाषा आहे आणि त्याला व्याकरणाचं बंधन लावलं जाऊ शकत नाही म्हणूनच आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांना ही जाणीव असली पाहिजे की कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषेचा गोडवा हा ती भाषा जपण्यात आणि जगण्यात आहे. महाराष्ट्र राज्यापासून कैक दूर असलेल्या तंजावरकडून हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे. तंजावरमध्ये मराठी साम्राज्य नसताना आजही जपला जाणारा हाच भाषेचा गोडवा मराठी माणसाचे मराठी भाषेप्रती प्रेम म्हणावे लागेल.

    तंजावरची विशेषता

    तंजावरच्या मध्यभागी शिवगंगा दुर्ग पाहायला मिळतो आणि त्याच्या मध्यभागी चोल राज्यकर्त्यांनी बांधलेलं बृहदेश्वर मंदिर स्थित आहे. इतिहासकार असेही सांगतात की या बृहदेश्वर मंदिराच्या उभारणीत मराठ्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. कदाचित म्हणूनच आवारात असलेल्या गणपती मंदिरामध्ये शहाजीराजे, शिवाजीराजे, व्यंकोजीराजे आणि इतर मराठी शूर राजांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि तारखा यांचा ठासून उल्लेख करणारा शिलालेख आढळतो.

    आणखी वाचा:

  • शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

    शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

    आता जर का इतिहासात डोकावून पाहिलं तर पैशांचा शोध लागण्यापूर्वी लोक मालाची/वस्तूंची देवाण-घेवाण करून (Barter System Of Exchange) संसाराची गाडी ओढायचे याचा प्रत्यय येतो, त्यामुळे व्यवसाय हा आपल्या जगण्याचा भाग आधीपासूनच होता असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय उद्योजक विश्वात अनेक नावं जोडली गेली आणि त्यांपैकी गाजणारं आणि अनेक लोकांसाठी प्रेरणा बनलेलं एक नाव म्हणजे नमिता थापर होय… 

    काय आहे शार्क टॅंक इंडिया?

    नमिता थापर हे नाव ऐकलं की सर्वात अगोदर डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमावलेला कार्यक्रम; शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India). तुम्हाला माहिती आहे का? शार्क टॅंक हा काही प्रामुख्याने भारतीय कार्यक्रम नाही. वर्ष 2001 मध्ये जपानमधून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती, पूढे अमेरिकेमधील ABC वाहिनी आणि नंतर भारतात सोनी वाहिनीवरून याचे प्रक्षेपण व्हायला सुरुवात झाली. या कार्यक्रमात उद्योजक बनण्याची किंवा व्यवसाय वाढवण्याची इच्छा मनात घेऊन आलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मदत केली जाते आणि भारतात शार्क टॅंक इंडिया म्हटलं की, “So for that reason, I am OUT!!” म्हणणारी नमिता हमखास सर्वांना आठवते.

    नमिता थापर: बालपण आणि शिक्षण 

    एम्क्युअर फार्मासुटिकल्सची (Emcure Pharmaceuticals) सर्वेसर्वा आणि शार्क टॅंक या  कार्यक्रमामध्ये सर्वांची ‘Pharm’माँ’ बनलेल्या नमिताचा जन्म पुण्यातला. वर्ष 1977 मध्ये सतीश आणि भावना मेहता यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नमिता यांनी प्राथमिक ते थेट CA पर्यंतचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं आणि पुढे MBA चं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप घेतली, अमेरिकेतील प्रसिद्ध ड्यूक विद्यापीठातून नमिता थापर यांनी सदर पदवी प्राप्त केली असून परदेशातच त्यांच्या हेवा वाटावा अश्या करियरचा श्रीगणेशा झाला होता.

    करियरच्या सुरुवातीला उद्योजिका बनण्याच्या विचार कदाचित नमिता यांच्या मनात नसावा कारण एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा वर्ष त्यांनी अमेरिकेतील गायडंट कॉर्पोरेशनमध्ये कामाचा पक्का अनुभव कमावला आहे. 

    भारतात परतल्यानंतर एम्क्युअर फार्मासुटिकल्स हा त्यांनी निवडलेला दुसरा पर्याय होय. नमिता थापर यांचे वडील म्हणजेच सतीश मेहता हेच सदर कंपनीचे संस्थापक असल्याने नमिता यांच्यावर कोवळ्या वयातच व्यवसायाचे संस्कार झाले होते, आणि आत्ताच्या घडीला त्या कमावत असलेलं नाव हे याच पक्क्या शिकवणीचा परिणाम म्हणावा लागेल. आपण म्हणतोच ना, ‘जे पेरावं, तेच उगवतं’ नमिता थापर देखील याच उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण वाटतात. 

    व्यवसाय आणि शार्क टॅंक

    आपल्यापैकी अनेकजण नमिता थापर यांना ओळखतो ते शार्क टॅंकमुळे, त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात नसलेल्या नमिता या नेमक्या कोणत्या कारणाने व्यवसायाच्या दिशेने वळल्या असतील आणि शार्क टॅंकपर्यंत नेमकी कशी मजल मारली असेल हे प्रश्नचिह्न कायम राहतंच. तर सहा वर्ष अमेरिकेत नोकरी केल्यानंतर नमिता भारतात परतल्या. सतीश मेहता यांनी वर्ष 1981 मध्ये एम्क्युअर फार्मासुटिकल्सची स्थापना केली होती. सुरुवातीला चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) म्हणून व्यवसायात उतरलेल्या नमिता यांनी अथक मेहनत, परिश्रम आणि हुशारीच्या जोरावर फक्त काही काळातच कंपनीच्या एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर (Executive Director) ची धुरा सांभाळायला सुरुवात केली.

    भारताच्या इतिहासाची पानं उलटून पहिली तर घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला दिसतात, मात्र आताच्या घडीला त्याच महिला चूल आणि मुलासोबत स्वतःचे अस्तित्व देखील घडवतात, नव्हे इतरांना प्रोत्साहन देतात. खरोखर आपल्या भारताचं बदलणारं हे चित्र किती मोहक आहे. नमिता थापारच नाही तर त्यांच्यासारख्या अनेक महिलांचा हा प्रवास पहिला कि आपला देश खऱ्या अर्थाने सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे याची जाणीव होते आणि अभिमानाने उर भरून येतो. 

    शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमामुळे भारतीय व्यवसायांना किंवा उद्योगांना खऱ्या अर्थाने नाव आणि दर्जा मिळायला सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमन गुप्ता, अनुपम मित्तल, पियुष बन्सल, विनिता सिंग यांच्यासारखे विविध क्षेत्रातील उद्योजक नवख्या व्यवसायांना आर्थिक मदत तसेच मार्गदर्शनही करतात. नमिता थापर यांना कैकवेळा “ये मेरी एक्सपर्टरीज नाही, so for that reason I am out!” या त्यांच्याच वाक्यासाठी टार्गेट केलं जातं, किंवा सोशल मीडियाच्या जगात त्यांच्यावर अनेक मिम्स देखील बनवले जातात. सोशल मीडियावर अशा चर्चा रंगात असल्या तरीही नमिता थापर सलग तीन वर्ष या कार्यक्राचा भाग बनून राहिल्या आहेत आणि ही बाब नरजेआड करता येत नाही. नमिता यांची चालण्या-बोलण्याची पद्धत असुद्या किंवा व्यवसायातील त्याचा दांडगा अनुभव या सर्व घटकांमुळे नमिता अनेक जणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत एवढं मात्र नक्की. 

    महिला उद्योग आणि नमिता

    वरती म्हटल्याप्रामणे जुन्या भारतात महिलांना घराबाहेर पडत काम करण्याला परवानगी नसायची. जी स्त्री समाजाच्या विरुद्ध जात हे धाडस करू पाहायची तिला वाळीत टाकलं जायचं. महिलांचं काम म्हणजे केवळ घर सांभाळणं एवढ्यापुरतं मर्यादित करण्यात आलं होतं आणि परिणामी इच्छा, आवड आणि कौशल्य असूनही त्या केवळ चार भिंतींच्या आड दडून राहायच्या. शेकडो वर्षांनंतर का होईना पण देश बदलत आहे. नमिता आणि इतर अनेक महिला विविध क्षेत्रांमधून हे बदल घडवून आणत आहेत. 

    शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमानंतर नमिता थापर या नावामुळे भारतातील उद्योजक आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात धूम उडाली आहे. स्वतःच्या व्यवसायाला नवीन उंची देण्यासाठी नमिता यांनी HR, डोमेस्टिक मार्केटिंग (Domestic Marketing) आणि फायनान्स (Finance) या क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कंपनीने आत्तापर्यंत ३००० पेक्षाही अधिक वैद्यकीय प्रतिनिधींच्या द्वारे १ बिलीयन डॉलर्सच्या घरात योगदान दिले आहे. 

    शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून त्यांनी Brandsdaddy, Wakao Foods, Your Foot Doctor, Kabaddi Adda यांसारख्या अनेक स्टार्टअप्सना (Start-Ups) मदत केली. इनक्रेडिबल व्हेंचर्सच्या (Incredible Ventures) अंतर्गत तरुणांच्या मनात व्यवयसायची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुंबई, बंगलोर, पुणे आणि चेन्नई अश्या प्रमुख शहरांमध्ये नमिता मार्गदर्शनपर वर्ग राबवतात. या उपक्रमांमधून नमिता नवनवीन व्यावसायिक कल्पना तरुणांपर्यंत पोहोचवतात. शार्क टॅंकमध्ये त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा जर का तुम्ही आढावा घेतला तर त्या नेहमीच नाविण्याच्या शोधात दिसतात. 

    सोशल मीडियावर जरी आपण नमिता यांच्या “I am Out” या वाक्याची खिल्ली उडवत असलो तरीही यातून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे ती म्हणजे जर का अट्टाहासाने एखादी गोष्ट करूनही त्यातून आपलं नुकसानच होणार असेल तर अशी आव्हानं स्वतःवर ओढवूं घेऊ नये. “ये कचरा नही हैं, It has a lot of Potential” या वाक्याचा देखील नेटकऱ्यांनी चुकीचा अर्थ घेतला होता, मात्र इथे आपण समजून घेतलं पाहिजे कि एखादी गोष्ट जर का इतरांच्या कमी येत नसेल, तर ती कामाची नाही असं होत नाही, आपण स्वतःचे कौशल्य वापरून त्यामधून  नवनिर्मिती नक्कीच घडवून आणू शकतो. नमिता यांच्या सतत हसऱ्या चेहऱ्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जवळपास ६०० कोटी रुपयांची मालकीण असलेल्या नमिता थापर यांना आत्तापर्यंत इकॉनॉमिक टाइम्सच्या (Economic Times) ‘40 under Forty’ Award, Barclays Hurun Next Gen Leader Recognition, Economic Times 2017 Women Ahead List, World Women Leadership Congress Super Achiever Award अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 

    आणखी वाचा:

  • घरबसल्या युट्युब देईल लाखो रुपये; ना डिग्री, ना कोणत्या सर्टिफिकेटची गरज

    घरबसल्या युट्युब देईल लाखो रुपये; ना डिग्री, ना कोणत्या सर्टिफिकेटची गरज

    एक तर आपण सात-आठ तास काम करून दमून-भागून घरी परतत असतो आणि त्यानंतर काम करण्याची ना इच्छा असते ना तयारी. मग अश्यावेळी आपल्या आवडीची कामं करावीत जेणेकरून मनाला समाधान, काम करण्याचा आनंद आणि सोबत चार-दोन पैसे देखील कमावता येतील. आम्ही देखील तुम्हाला आज अशीच एक भन्नाट कल्पना सुचवणार आहोत जिचा वापर करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता.

    व्हिडिओ बनवण्याची आवड आहे का?

    आजकाल सोशल मीडियाचा आवाका बऱ्यापैकी वाढत चालला आहे. सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही क्षणार्धात शेकडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला जर का व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर काही ठराविक विषयांवर घर बसल्या 60 सेकंदांचा व्हिडिओ बनवत पैसे कमावणं सहज शक्य आहे. युट्युबच्या दुनियेत अशा प्रकारच्या व्हिडिओजना युट्युब शॉर्ट्स (YouTube Shorts) असं म्हटलं जातं. आजकाल लोकांना जास्त वेळ एका जागेवर बसत काही ऐकण्याची किंवा बघण्याची सवय राहिलेली नाही किंवा एवढी उसंत सुद्धा मिळत नाही. मग अशावेळी लोकनांची गरज ओळखून त्यांच्या कलाकलानं जात जर का तुम्ही कमीत कमी वेळात महत्वाची आणि मुद्याची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलात, तर नक्कीच यामधून भरपूर पैसे कमावता येतात.

    हा व्यवसाय करण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला भरमसाठ पैसे भरत कोणताही कोर्स करण्याची किंवा सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नसते. लोकांना काय जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांचं मनोरंजन नेमकं कशातून होऊ शकतं, ते काय बघणं किंवा ऐकणं पसंत करतात या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्याने आपण कुठे भर दिला पाहिजे याचा अंदाज येतो आणि पुढे जात त्यावर काम करणं सहज शक्य होतं.

    युट्युबवरून पैसे कमवा:

    आपण सध्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत जगात वावरतो, म्हणजे काय तर टेक्नोलॉजिचा (Technology) वापर करून काही मिनिटातच अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य झाल्या आहेत. लक्षात घ्या की, प्रत्येक नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. त्यामुळे आपण टेक्नोलॉजी कशी हाताळतोय यावर ती आपल्यासाठी चांगली ठरेल की नाही याचा निर्णय अवलंबून असतो. मुळातच कोणतीही गोष्ट वाईट नसते, त्यामुळे इतरांच्या अनुभवांवरून कोणतेही मत बनवू नका.

    युट्युब हे आताच्या घडीला सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम आहे, एखादा नवीन पदार्थ देखील बनवायचा म्हटलं तरीही आई हमखास युट्यूबची मदत घेताना दिसते. हो ना? मग आपण देखील याचाच वापर करत पैसा कसा कमावता येईल हे पाहुयात.

    युट्युब शॉर्ट्स (YouTube Shorts) बनवताना सर्वात अगोदर एका विषयाची निवड करा, यासाठी तुम्हाला समोर असणाऱ्या ग्राहक वर्गाची माहिती असणं गरजेचं आहे. ग्राहक वर्गाची ओळख पटल्यानंतर त्यांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत माहिती तयार करा. असे व्हिडिओ बनवताना तुम्हाला मोठाल्या सेटअप किंवा कॅमेऱ्याची गरज भासत नाही. अगदी घरच्या घरीच आणि ते देखील मोबाईलच्या साहाय्याने असे व्हिडीओ बनवता येतात. अधिकाधिक लोकांपर्यत लवकर पोहोचायचं असेल, तर आपलं कंटेन्ट प्रेझेंट एकदम उत्तमरित्या झालं पाहिजे. आणि त्यासाठी तर थोड्या प्रमाणात व्हिडिओ एडिटिंगची माहिती असावी जेणेकरून यासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.

    युट्युब व्हिडीओ बनवण्याच्या नियम व अटी:

    हे काम जरी सोपं वाटत असलं तरीही युट्युबने या प्रक्रियेला काही नियम आणि अटी घातल्या आहेत. कोणत्याही व्यवसायात किंवा कामात उतरताना आपल्याला अशा नियम आणि अटींची माहिती असणं सोपं आणि सोयीस्कर ठरतं. तुम्ही जर का युट्युब शॉर्ट्सचा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करणार असाल, तर त्यामधून पैसे कमावण्यासाठी तुमच्या चॅनलवर 1,000 किंवा त्याहून अधिक फॉलोवर्स (Followers) असणं अत्यावश्यक आहे. तुमचा चॅनल जर का या नियमाच्या चौकटीत बसत नसेल, तर यातून तुम्ही आर्थिक नफा कमावू शकणार नाही.

    दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही या व्हिडिओ मधून जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहात ती माहिती शंभर टक्के खरी असलीच पाहिजे, कारण लोकं अशा प्रकारच्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने आपण इतरांचं नुकसान करू शकत नाही.

    आता तुमच्या मनात साहजिकपणे कंटेंट क्रिएशनसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) विचार आलाच असेल. AI चा वापर करणं ही चुकीची गोष्ट नाही. आधुनिक सुविधांचा वापर करून नक्कीच आपण काम सोपं करून घेऊ शकतो किंवा स्मार्टवर्क करून वेळही वाचवू शकतो मात्र लक्ष्यात असुद्या की वेळ वाचवण्याच्या नादात तुम्ही कोणतीही माहिती डोळे बंद ठेऊन उचलणार नाही. तुम्ही जर का युट्युब व्हिडीओ बनवत असाल तर एकार्थाने तुम्ही तुम्हाला समजलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचवत असता आणि म्हणूनच यात युट्यूब कोणत्याही प्रकारची उचललेली किंवा कॉपी पेस्ट केलेली माहिती खपवून घेत नाही. इथे नक्कीच तुमच्याकडून मेहनतीची अपेक्षा केली जाते.

    आणखी वाचा:

  • नवीन अर्थसंकल्पावरचा पडदा उठणार; अर्थसंकल्प 2024-25 च रहस्य उलघडणार…

    नवीन अर्थसंकल्पावरचा पडदा उठणार; अर्थसंकल्प 2024-25 च रहस्य उलघडणार…

    नियमांनुसार मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक वर्ष संपतं आणि नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. यावर्षी मात्र देशात मार्च-एप्रिलच्या काळात निवडणुकांचं वारं वाहत होतं आणि याच कारणामुळे तेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आता अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय? अंतरिम अर्थसंकल्प हा काही दिवसांसाठी सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प आहे. जुनं सरकार जाऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंत बाकी राहिलेल्या काळात देशाची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून अशाप्रकारच्या अर्थसंकल्पाची मदत घेतली जाते. आता निवडणूक पूर्ण झाली असून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यावेळा निवड झाली आहे, आणि सोबतच पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून देशाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्या खांद्यांवर सोपवण्यात आली आहे. 

    अर्थसंकल्पाची गरज काय?

    नवीन अर्थसंकल्प कधी येणार हे जाणून घेण्याआधी अर्थसंकल्प महत्वाचा का आहे? हे जाणून घेतलं पाहिजे. अगदीच सोपं उदाहरण द्यायचं झाल्यास आपण आपल्या घरातच डोकावून पाहू शकतो. नवीन महिना सुरु झाला म्हणजे घरातील स्त्री संपूर्ण महिन्याचं आर्थिक नियोजन पक्कं करते. घरात माणसं किती आहेत, संपूर्ण घर व्यवस्थित चालायचं असेल, तर धान्य किती प्रमाणात आणलं पाहिजे वगैरे नियोजन दरम्यान केलं जातं. तसंच देशाचा विचार करायचा झाल्यास हेच गणित लागू होतं. संपूर्ण आर्थिक वर्षात जर का देशाचं कामकाज सुरळीतपणे पार पाडायचं असेल, तर नियोजनाची गरज भासते. कोणत्या विभागाला किती प्रमाणात पैशांची गरज आहे, ती गरज का आहे या सर्व गोष्टींची शहनिशा केल्यानंतरच अर्थसंकल्प तयार होतो. पुढे याच अर्थसंकल्पामधून प्रत्येक विभागाला आवश्यक असणारे पैसे पुरवले जातात. थोडक्यात सांगायचं तर अर्थसंकल्प तयार होत असताना सर्वात आधी प्रत्येक विभाग त्यांच्या गरजा मंत्रालयासमोर समोर ठेवतो आणि त्यावर नीट विचार करून पैसे पुरवले जातात.

    नवीन अर्थसंकल्प कधी येणार?

    समोर आलेल्या माहितीनुसार 23 जुलै 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता देशात नवीन अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर केला जाईल आणि हा अर्थसंकल्प पूर्ण वर्षभरासाठी लागू होईल. अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी अर्थमंत्रालयाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते आणि आता नवीन अर्थसंकल्पामधून यात नेमके कोणते बदल केले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. तुम्हाला माहिती असेलच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकिर्दीची सुरुवात नवीन लोकसभेच्या इमारतीतून झाली होती आणि आता येणारा नवीन अर्थसंकल्प देखील याच भव्यदिव्य इमारतीमध्येच सादर केला जाईल. 

    तुम्हाला जर का अर्थविश्वाची आवड असेल तर घर बसल्या देखील या अर्थसंकल्पाचा आढावा घेणं शक्य आहे. दूरदर्शन, संसद टीव्ही यांसारख्या वाहिन्या येणाऱ्या अर्थसंकल्पाचं थेट प्रक्षेपण जारी करतील, शिवाय युट्युबच्या माध्यमातून देखील तुम्ही अर्थसंकल्पाबद्दल आवश्यक माहिती मिळवू शकता. याव्यतिरिक्त वृत्तवाहिन्या आणि सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही वेळेत आवश्यक माहिती मिळवू शकता. 

    नवीन अर्थसंकल्प जुलैमध्ये का?

    आर्थिक वर्षाच्या गणितानुसार मार्च आणि एप्रिल हे दोन महिने फारच महत्वाचे ठरतात, कारण वर नमूद केल्याप्रमाणे या महिन्यांमध्येच जुनं आर्थिक वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होते. आपल्या देशात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशीच अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरू आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही वर्षांअगोदर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी देशात बजेट सादर केलं जायचं, मात्र राहिलेल्या काळात सरकारला नवीन बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून सदर बदल घडवण्यात आले. यंदाच्या वर्षी आलेलं निवडणुकांचं वारं आणि सोबत लागू होणाऱ्या आचार संहितेमुळेच अंतरिम अर्थसंकल्पानंतर आता संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी ‘विकसित भारत’ या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सरकार कार्यरत असल्याची माहिती दिली होती. आता विकसित भारत म्हणजे काय? तर सरकारला वर्ष 2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यव्यस्थेला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे आणि म्हणूनच सरकार त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

    आणखी वाचा: