Author: naviarthkranti

  • व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    आपला अनुभव, आपल्या आवडी, आपले ज्ञान व कसब, उपलब्ध असणारी मानवी संसाधने, कच्चा माल व आपली काम करण्याची क्षमता व इतर बाबींचा विचार करुन कोणता व्यवसाय करावा? यासाठी पुढे दिलेल्या माहितीचा उपयोग आपल्याला होईल.

    तर सेवा पुरवण्यासाठी त्या त्या सेवेनुसार अनेक घटकांची गरज असते. समजा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेबसाईट तयार करण्याचा व्यवसाय करायचा असेल, तर फार घटकांची आवश्यकता नाही. याउलट एखादा पर्यटनविषयक व्यवसाय करायचा असेल तर गाड्या, मार्गदर्शक, राहण्याची व्यवस्था अशा सर्व सोयींची गरज पडेल. त्यासाठी त्या सर्व गोष्टी स्वतःच्या असणे आवश्यक नाही, त्या तुम्ही आउटसोर्स करु शकता. तसे तुमचे नेटवर्क असणे अत्यावश्यक आहे. वेगवेगळ्या सेवानुंसार लागणाऱ्या गोष्टींची माहिती घेणे उपयुक्त ठरते.

    उबर या जगातील सर्वात मोठ्या टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही. फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या व लोकप्रिय सोशल मिडीया कंपनीकडे स्वतःचे एक अक्षरही लेखन नाही. अलिबाबा या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीकडे एक खिळासुध्दा स्टॉकमध्ये नाही. एअरबीएनबी (Airbnb) या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःचे एकही घर नाही.

    ॲपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही. व्हॉट्सॲप या दिवसातून कोट्यावधी संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुध्दा नाही. नाइकी या जगातील आघाडीच्या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा स्वतःची कोणताही कारखाना नाही.

    वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की, एकदा कोणता व्यवसाय करायचा हे ठरवल्यानंतर सर्व गोष्टी स्वतःच्या असणे गरजेचे नाही. त्या स्वतःच्या असतील तर उत्तमच पण नसतील तर काळजी नसावी. उद्योजक हा नेहमी सर्व उपलब्ध वस्तूंचा योग्य ताळमेळ घालून उत्तम वस्तू व सेवा निर्माण करणारा एक तरबेज माणूस असतो. कारण व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे, भांडवल या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी संकल्पना किंवा वस्तू शोधून काढा. Outsourcing व Out sharing सारख्या तंत्राचा उपयोग करुन, निरनिराळ्या एजन्सींना आपल्यासोबत घ्या. मार्केटिंगवर जास्तीत जास्त भर देणे. ग्राहकांना उत्तम सेवा देणे. प्रामाणिक व पारदर्शी व्यवहार ठेवणे, आपल्याबरोबरच, आपल्याबरोबर काम करणाऱ्या संस्थांचा विकास करणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शिरकाव करणे हे नवीन व्यवसायाचे मंत्र आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसऱ्याचा हे तत्त्व चालते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

    व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

    व्यवसाय हा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळला, जपला व वाढवला पाहिजे. म्हणजे त्याला लागेल ते सर्व काही पुरवायची तयारी ठेवली पाहिजे. वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घेता आले पाहिजेत. मात्र व्यवसाय हा त्याच्या System प्रमाणे आपोआप चालत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर तो वेगाने वाढत जातो.

    आपल्या आवडीचे काम करावे किंवा जे काही करतो आहे त्यामध्ये आवड निर्माण करावी, अन्यथा आपले आयुष्य हे केवळ इतरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या कामाचे बनून जाते. हेच तत्त्व व्यवसाय करताना लागू होते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा किंवा आपण जो व्यवसाय करतो त्यात आवड निर्माण करावी म्हणजे व्यवसाय हा आनंद देईल. त्यात तोचतोचपणा किंवा रटाळपणा जाणवणार नाही, त्यामुळे कायम झोकून देऊन काम करण्याची आपली तयारी होते. इतरांना अवघड वाटणारी अनेक काम आपण सहजपणे कधी करुन जातो, ते आपल्या लक्षातसुध्दा येत नाही.

    मानसिकता निर्माण करण्याचा व टिकवण्याचा अजून एक उपाय म्हणजे व्यवसायविषयक सल्ला ऊठसूट कोणालाही विचारु नका. फक्त तज्ज्ञ व जाणकार मंडळीकडून हा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे. नकारात्मक लोकांपासून दूर रहावे. याचे कारण कित्येक लोकांना काहीही माहित नसताना तू व्यवसाय करु नको तुला जमणार नाही असे फुकटचे सल्ले देण्याची सवय असते किंवा काही लोक तुम्हाला नोकरीचे महत्त्व पटवून देण्यासाठीच केवळ बोलत असतात.

    एका इंजिनियर मुलाने नुकताच फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या आईने तिच्या मैत्रिणीला त्या मुलाची ओळख करुन देताना त्याने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला असल्याचे सांगितले. तेव्हा त्या मैत्रिणीने त्या मुलाला तू हा व्यवसाय करु नको ह्यात काही भविष्य नाही असा फुकटचा सल्ला दिला. त्या मुलाने विचारले की “याचे कारण काय? तुम्ही हे कशावरुन सांगत आहात?” त्या मुलाला मिळालेले उत्तर असे होते की, “माझ्या भाच्याने हा व्यवसाय सुरु केला व काही फायदा नाही म्हणून बंदही करुन टाकला व तू तर इंजिनियर असून हा व्यवसाय का करतोस? तुला एखादी चांगली नोकरी मिळू शकेल.” या प्रसंगामध्ये सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा व व्यवसायाचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. शिवाय अमुक एक व्यक्ती अपयशी झाला म्हणजे जगात कोणीच यशस्वी होणार नाही हा समज चुकीचा आहे. जगात जेवढ्या यशोगाथा आहेत त्याहून अधिक अपयशाच्या कथासुध्दा आहेत. आपण यशस्वी माणसांकडून योग्य दिशा घेऊन तसेच अपयशी लोकांकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रगती करणे गरजेचे असते. आपण स्वतःच्या व्यवसायाबद्दल जेवढे जाणतो तेवढे जगातला कोणताही तज्ज्ञ जाणत नाही. म्हणून व्यवसायविषयक सल्ला घेताना अशा लोकांचा सल्ला घ्यावा की जे तुम्हाला त्याची योग्य उत्तरे देतील. पुढे जाण्याचे चांगले मार्ग सांगतील किंवा त्यांच्याकडे उत्तर नसले तर तुम्हाला हतोत्साहित करणार नाहीत. तुमच्या मार्गातील अडथळे व धोके समाजावून सांगतील व त्यावरचे उपायही सांगतील अशाच लोकांचा सल्ला घ्यावा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

    भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

    आता तुम्ही सगळ्यांनी पिनकोड तर पाहिलाच असेल. पाहिलाच असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं…

    पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिनकोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.

    ■ पिनकोडची रचना अशी आहे.

    पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

    आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..

    यातले पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल

    ११ – दिल्ली

    १२ व १३ – हरयाणा

    १४ ते १६ – पंजाब

    १७ – हिमाचल प्रदेश

    १८ ते १९ जम्मू आणि काश्मिर

    २० ते २८ – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड

    ३० ते ३४ – राजस्थान

    ३६ ते ३९ – गुजरात

    ४० ते ४४ – महाराष्ट्र

    ४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

    ५० ते ५३ – आंध्र प्रदेश

    ५६ ते ५९ – कर्नाटक

    ६० ते ६४ – तामिळनाडू

    ६७ ते ६९ – केरळ

    ७० ते ७४ – पश्चिम बंगाल

    ५५ ते ७७ – ओरिसा

    ७८ – आसाम

    ७९ – पूर्वांचल

    ८० ते ८५ बिहार आणि झारखंड

    ९० ते ९९ – आर्मी पोस्टल सर्व्हिस

    म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक – सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक – ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

    आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा…!

  • ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.

    दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

    भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxidant गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

    सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादन

    कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहाय्यता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत.आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांडूळ प्रकल्पसुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    – मराठी कृषी जागरण

  • चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    ‘टाइम झोन’ आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं ४०व्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे.

    The Power of Relaxation and Humility

    ओबामा ५५व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने ७०व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या ‘टाईमझोन’ मध्ये काम करत असतो.काही लोक आपल्या ‘किती पुढे गेलेत?’ असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट ‘टाइमझोन’ मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय!पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या ‘टाइम झोन’ मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या!

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

    असे प्रश्न दररोज विचारले जातात. ह्या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर असते, पण विचार करण्याची कला अवगत नसल्याने किंवा तिची ओळख नसल्याने हे प्रश्न अवघड वाटतात. शिवाय ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यावर निराशा येते. काय करावे ते सुचत नाही, कुणाकडे उत्तर मागावे ते कळत नाही. आता ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कला आपण जाणून घेऊ या.

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व वरील सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद याद्वारे झालेली असते. त्यामुळे प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्व, एक वेगळी विचारसरणी तयार झालेली असते. अशा वेळी कोणत्या व्यक्तीने कोणता व्यवसाय करावा हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत जाणारे समीकरण आहे. आता सगळ्यांना समर्पक असे एक उत्तर शोधण्याची प्रक्रिया चालू होते.

    पहिल्यांदा एक गोष्ट मनावर कोरुन ठेवली पाहिजे की, प्रत्येक प्रकारचा व्यवसाय हा अतिशय उत्कृष्ट पध्दतीने करता येतो. त्यातून हवा तेवढा नफा मिळवता येतो. त्याचा ब्रँडही बनवता येतो. वडापावचे दुकान (मॅकडोनाल्ड, जंबोकिंग), चहाकॉफीचा ठेला (कॅफे कॉफी डे, बरिस्ता, स्टारबक्स), शिकवण्या घेणे (बायजूज, स्टडी सर्कल, चाटे कोचिंग) अशी काही उदाहरणे देता येतील. अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रापुरता व्यवसाय वाढवता येतो. ‘व्यवसाय कोणता करावा?’ हे अनुभव, आवडी, तुमची जोखीम घेण्याची क्षमता यावरुन ठरवावे लागेल. एखाद्याला शेत कसले असते हे माहित नसताना जाऊन नांगरणीपासून ते माल बाजारात विकेपर्यंतची प्रक्रिया समजून घेण्यात व अंमलात आणण्यात किती वेळ लागेल हे तुमच्या लक्षात येईल. त्याऐवजी ज्याचे बालपण शेतीत गेले आहे, ज्याने ह्या सर्व प्रक्रिया बघितल्या आहेत, त्याला थोडासा वेगळा विचार करुन, आधुनिक पध्दती वापरुन शेती करणे व मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे सोपे आहे. शेकडो तरुण शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्यावर हे सहज समजून येते.

    डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रज्वलित मने या पुस्तकातील एक उतारा – “आपण कसे आहोत याचा विचार माणूस करतो आणि नेमका तसाच घडतो. मी काहीही करु शकत नाही असा विचार केला, तर माझी काही करायची कार्यक्षमताच लोप पावते. तेच जर मी काहीही करु शकतो असा विचार मी मनाशी केला, तर माझी सुरवातीला ते करायची कार्यक्षमता नसली तरी ते मी करु शकतो.”

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    >> डोकेदुखी

    कम्प्युटर आणि लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं मोठं कारण ठरतात. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. असे मानले जाते की, कम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश, पॅटर्न आणि चित्रांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सर्वात जास्त वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोकेदुखीची समस्या होते.

    >> मांसपेशींमध्ये समस्या

    एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, फार जास्त वेळ खुर्चीवर बसून कम्प्युटर काम करत राहिल्याने मांसपेशी थकतात. त्यामुळे मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यासोबतच पाय, छाती, खांदे आणि हात सुन्न होतात. कम्प्युटरवर अनेक तास सतत बसून राहिल्याने हे एक मोठं नुकसान होतं.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> डोळ्यांसाठी घातक

    कम्प्युटरवर काम करतेवेळी सतत स्क्रीनकडे बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, फार जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांना थकवा, खाज, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांना जड वाटणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अकाली कमजोर होते. खासकरुन लहान मुलांच्या डोळ्यांवर याचा फार वाईट प्रभाव पडतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> तणाव वाढतो

    फार जास्त वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटर स्क्रीनवर काम करणे तणाव वाढण्याचं मोठं कारण आहे. तासंतास कम्प्युटरवर काम केल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेत कमतरता येते. त्यांना सतत २४ तास हलकी डोकेदुखी होत राहते. नंतर अशी स्थिती येते की, व्यक्ती गंभीर स्ट्रेस, डिप्रेशन आणि वेगवेगळ्या मानसिक समस्यांनी ग्रस्त होतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> वजन वाढतं

    लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर जास्त वेळ करणे आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. मात्र कम्प्युटरचा अधिक वापर करणारे जवळपास ३० टक्के लोक वेगाने वजन वाढण्याच्या समस्येचे शिकार होत आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, कम्प्युटरचा अधिक वापर सर्वच वयोगटातील लोकांच्या, खासकरुन लहान मुला-मुलींच्या सुस्त आणि आळशी होण्याचं कारण आहे. त्यानंतर त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच डायबिटीज आणि हृदयरोगांचाही धोका वाढतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    Source : ऑनलाइन लोकमत

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

    या प्रश्नात मुख्य प्रवाहाबाहेरच्या इतर काही प्रश्नांचीदेखील भर पडत असते. ते प्रश्न म्हणजे, शिक्षणासाठी आयुष्याची २०-२२ वर्षे घालवल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात पैसा कमावण्यासाठी घरुन येणारा दबाव किंवा मजबूरी, पाठीमागच्या पिढीने करुन ठेवलेले कर्ज (मग ते आपल्या शिक्षणासाठी असो की अजून कोणत्या कारणाने) कसे फेडायचे? त्यानंतर समाजातील काही लोक विचारतात लग्न कधी करणार? लग्न केले तर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन लग्नाआधीच व्यवसाय स्थिरस्थावर करण्यासाठीची धावपळ व कमीअधिक महत्त्वाचे अजून काही प्रश्न सोडवता सोडवता कोणता प्रश्न कधी सोडवायचा? हाही एक नवीन प्रश्न.

    उत्तर देणारे कुणी नसते. आपल्या वाट्याला येते मग गळचेपी. पाठीमागची पिढी नव्या वाटेवरुन चालायला विरोध करते, तर आपल्या सोबत असणारी नवी पिढी अनुभवाअभावी व थोड्याशा अधीरपणामुळे काही ठिकाणी चुकते. ह्या चुका टाळता याव्यात म्हणून करता येणाऱ्या उपाययोजना या लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकशित करू ज्या व्यवसायाच्या वाटेवर चालताना मार्गदर्शक ठरतील.

    👇 अनुक्रमणिका

    👉 भाग १ – मानसिकता व पूर्वतयारी

    १. व्यवसाय की नोकरी?
    २. व्यवसायच का?
    ३. सुरुवात करण्यापूर्वी काय?
    ४. मानसिकता
    ५. व्यवसाय कोणता?
    ६. कार्यक्षेत्र कसे ठरवावे?
    ७. बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?
    ८. कुटूंबातील व्यक्तींचा पाठिंबा की विरोध? व उपाय
    ९. अनुभवाची गरज आहे का?

    👉 भाग २ – प्रत्यक्ष सुरुवात, भांडवली उभारणी व सरकारी परवानग्या

    १०. कशी करावी सुरवात?
    ११. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? व्यवसाय प्रकारानुसार
    १२. भांडवल कसे उभे करावे?
    १३. भांडवल उभे करताना तारण नसल्यास काय?
    १४. भांडवलासाठी घेतलेले पैसे कसे परत करणार?
    १५. कोणत्या परवानग्या लागतील? व्यवसाय प्रकारानुसार
    १६. सरकारी परवानग्यांचा होणारा फायदा काय?
    १७. कशा मिळवाव्यात परवानग्या?

    👉 भाग ३ – उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा

    १८. उत्पादन करण्यापूर्वी काय तयारी करावी?
    १९. प्रत्यक्ष उत्पादन कसे करावे?
    २०. आकर्षक मांडणी व लागल्यास पॅकेजिंग कसे करावे?
    २१. मार्केटिंगसाठी लागणारे सोपे उपाय
    २२. सेल्स करताना घ्यावयाची काळजी
    २३. अडचणीच्या काळात व्यवसायात टिकून कसे रहावे?
    २४. नेहमी उत्साहात काम करण्याची कला
    २५. प्रत्यक्ष नफा मिळवण्याची प्रक्रिया

    👉 भाग ४ – करप्रणाली, व्यवसाय वृध्दी व ब्रँड बनवणे

    २६. भरावे लागणारे कर व त्याचे फायदे तोटे
    २७. व्यवसाय वृध्दीची गरज
    २८. व्यवसाय वृध्दीसाठी उचलावी लागणारी पावले
    २९. ब्रँडचे महत्त्व व गरज
    ३०. ब्रँड निर्मितीचे मार्ग व यशस्वी उद्योग चिरकाल टिकवताना
    ३१. व्यवसायातील स्पर्धा व त्यातून निर्माण होणारे अडथळे
    ३२. व्यवसायातील स्पर्धा व त्यात टिकून राहण्याची कला

  • व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

    व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार, नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करु या. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरुवातसुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते. मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर Rat Race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतच आयुष्य पुढे सरकत असते. त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही. पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्त्वाची कारणे आहेत. ह्यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरुवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे Rat Race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असूनही बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे ह्यांचे पण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवला उभारणीच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम पण द्विधा मनस्थितीत असतात. ह्या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा? याचा पुसटसा अंदाजही यांनी बाधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे ते करुनही दाखवतात.

    मी काही जणांना “पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात?” असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. मात्र व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी. मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरुवातीची काही वर्षे संघर्ष केला, की मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती


    आणखी वाचा

  • १५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

    १५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

    आजच्याच दिवशी १९४९ साली पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के. एम. करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती.

    km-cariappa - Army Day

    एक ऐतिहासिक दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ – स्वातंत्र्यलढय़ात यशस्वी होऊन भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारच्या विनंतीवरून ब्रिटिश लष्करातील काही उच्च अधिकारी आपल्या लष्करात काही वर्षे आणखी राहण्यास तयार झाले. फिल्डमार्शल क्लोड औकीनलेक यांची सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्ती झाली; तर जनरल सर रोब लोकहार्ट कमांडर इन चीफ बनले. १ जानेवारी १९४८ रोजी जनरल सर रॉबर्ट रॉय बुचर यांनी कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाल एका वर्षानंतर समाप्त व्हायची वेळ जेव्हा आली, तेव्हा भारत सरकारने हा निर्णय घेतला, की आता भारतीय सेनेचा मुख्य – कमांडर इन चीफ भारतीयच असेल..

    लष्कर दिन म्हणजे आपला देश आणि त्यातील लोकांच्या रक्षणार्थ आपले जीवन सर्मपित करणार्या वीर सैनिकांना एक खर्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. नवी दिल्ली येथील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीजवळ शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून समारंभास सुरुवात होते. लष्कराची तांत्रिक प्रगती आणि भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेली शस्त्रसामग्री, वाहने – हत्यारे, हेलिकॉप्टरची कर्तबगारी आणि शत्रूवर हल्ल्याची प्रात्यक्षिक दृश्ये, तसेच सैनिकी कवायत दर वर्षी दिल्ली छावणी येथील आर्मी परेड मैदानावर आयोजित केली जाते. प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या सैन्याच्या कवायतीची ही रंगीत तालीमच मानली जाते..

    Amar Jawan Jyoti - Army Day

    फौजी बँडच्या तालावर सैनिकांच्या तुकड्या शिस्तशीरपणे आगेकूच करीत जातात, ते दृश्य पाहण्यासारखे असते. जमीन आणि आकाशात आपल्या दुर्दम्य साहसाचा परिचय करून देणारा भारतीय लष्कराचा शो प्रत्यक्ष पाहणे हासुद्धा एक रोमांचकारी अनुभव असतो. जय हिंदच्या जयघोषाने आसमंत निनादून टाकत कार्यक्रमाची सांगता होते. देशात अन्यत्रही लष्कराच्या प्रमुख ठिकाणी १५ जानेवारीला लष्करी कवायतीचे आयोजन केले जाते. आपल्या देशातील जनतेला सेनेची तयारी आणि उत्साह पाहण्याची चांगली संधी यामुळे मिळते. तसेच युवकांना यामुळे देशाकरिता काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते..

    Army Day

    भारतीय लष्कर जगातील सशक्त आणि मजबूत सैन्यापैकी एक आहे. भारतीय लष्कर आपल्या निडर आणि साहसी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासात भारतीय सेना म्हणजे एक गौरवास्पद शौर्यगाथाच आहे. सेना राजकारणापासून दूर असते आणि फक्त अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून आपले रक्षण करते. भारतीय सेनेचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. जेव्हा जेव्हा भारतीय सीमेवर आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा भारतीय सेनेने अतिशय उत्साही प्रतिकार करून देशाला यशस्वी केले आहे. खरं तर या प्रकारच्या सर्मपित आणि शिस्तशीर सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि अशा लष्कराचा एक भाग बनून देशाची सेवा करायला मिळाली, तर तो आमचा सर्वोच्च सन्मान ठरला पाहिजे.