Category: प्रेरणादायी

  • एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली.

    पण फ्रेडने हा विचार सोडून दिला नाही. त्याला आपल्या या कल्पनेवर विश्वास होता. फ्रेडला जेव्हा जहाजावर व्हिएतनामला पाठवण्यात आलं, त्याने तिथे अमेरिकन हवाई दलाच्या पुरवठा सेवेचा (logistics) अभ्यास केला. १९७० मध्ये जेव्हा तो परत आला त्याने Ark Aviation Sales नावाची विमान दुरुस्त करणारी एक कंपनी विकत घेतली आणि जुन्या विमानांचा वापर करायला सुरुवात केली.

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    १९७३ पर्यंत म्हणजे पुढच्या तीन वर्षात त्याने हवाई दलाच्या पुरवठा सेवेची पद्धत ‘फाल्कन-२०’ या प्रकारच्या १४ विमानांचा ताफा तयार करून जशीच्या तशी अंमलात आणली आणि त्याची कल्पना पहिल्यांदा नाकारली गेल्याच्या अकरा वर्षानंतर फ्रेडने पहिलं पार्सल पाठवलं.

    त्यानंतर एके दिवशी त्याचा सहकारी रॉजर फ्रॉकने त्याला पैसे कुठून आणले असे विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, “जनरल डायनामिक्स कंपनीबरोबरची आपली मिटिंग फिस्कटली. आपलं मोठं नुकसान झालं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत पैसे उभे करावे लागणार होते, म्हणून मी विमानाने लास वेगासला गेलो आणि तिथे २७ हजार डॉलर्स जिंकलो.” 

    रॉजर म्हणाला, “म्हणजे तू आपल्याकडे उरलेले शेवटचे ५ हजार डॉलर्स घेऊन गेलास. तू असं कसं करु शकतो?”

    आपले खांदे उडवत तो म्हणाला, “काय फरक पडला असता? पैशांशिवाय आपण विमानात इंधन सुद्धा भरू शकत नाही. या पैशांनी काही दिवस तरी आपलं काम सुरु राहील.”

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    फेडेक्सला त्यानंतरसुद्धा अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण फ्रेडने मोठ्या धीराने आणि हिंमतीने सर्व संकटातून मार्ग काढत वाटचाल सुरूच ठेवली. आज चाळीस वर्षानंतर, फेडेक्स जगातील सर्वात मोठ्या कुरियर कंपन्यांपैकी एक आहे. २०१८ मध्ये फेडेक्सचे वार्षिक उत्पन्न ६५.४५ अब्ज डॉलर्स होते. फ्रेडची ही कंपनी वर्षाला अब्जावधी पार्सल पाठवते आणि फ्रेडची स्वतःची जवळपास ५.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

  • स्वतःच स्वतःचे नायक बना

    स्वतःच स्वतःचे नायक बना

    मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करायचो.

    पण हा संवाद माझ्या एकट्यापुरता मर्यादित होता.

    पुढे अनेक यशस्वी लोकांना भेटल्यावर माझ्या लक्षात आले की, यापैकी कुणीही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत नाही आहे. या सगळ्यांना एक गोष्टी पक्की ठाऊक आहे की, इतरांसाठी काम केल्यानेच यश प्राप्त होते. त्यामुळे त्यांनी आपापल्या परीने स्वतःचे बॉस निवडले होते.

    त्यामुळे जर तुम्ही अजूनही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते लगेच सोडून द्या, त्याऐवजी योग्य बॉस शोधण्याचा प्रयत्न करा. चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. ‘जे करावे लागते’ ते न करता, ‘जे करायला आवडते’ ते करण्याचा प्रयत्न करा. जो कोणता व्यवसाय कराल त्याची क्षितिजे विस्तारताना आपल्यामधील शक्यतांचा, क्षमतांचा वापर करा. स्वतःच स्वतःचे नायक बना…

  • एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

    एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

    हा लेख लिहिताना आज मी ३९ वर्षांचा आहे.

    तुमचं वय काय आहे?

    पण खरंच तुमचं वय झालं आहे का? तुमच्या शरीराकडे बघा. या शरीराचं वय ३२ वर्ष नाही. तुमच्या डोक्यावरील केस, त्यांचं वय ३२ वर्ष नाही. तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमचे हात, तुमचे पाय यातील कशाचंच वय झालेलं नाही. ते सगळं ठीक आहे, पण मग ३२ वर्ष वय नक्की कशाचं आहे?सांगतो, पण यापुढे कधीही आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो असं समजायचं नाही.

    आपल्या शरीरात रोज काहीतरी बदल घडून येत असतात. शरीरातील पेशींची संख्या रोज बदलत असते. आपल्या मेंदूतील विचार रोज बदलत असतात. या बदलांमुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. तुमच्या मनातील भावभावनासुद्धा कालच्यापेक्षा आज थोड्याफार वेगळ्या असतात.

    याचा अर्थ असाही काढता येईल, की तुमचं वय एक दिवस इतकंही नाही. आयुष्याकडे बघण्याचा हा एक वेगळा दृष्टीकोन मला तुम्हाला द्यायचा आहे.

    आता मी काही प्रश्न विचारतो बघू तुमच्यापैकी किती जणांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत. जर आपण आजचा दिवस आयुष्यातील आपला पहिला दिवस असल्याप्रमाणे जगू लागलात, तर काय होईल?

    आज तुम्ही कोणते नवे निर्णय घ्याल?

    • आज कोणती नवीन स्वप्नं पाहण्याचं धाडस तुम्ही कराल?
    • आजपासून तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी करायला सुरुवात कराल?
    • आजपासून आपलं आयुष्य कसं वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल?

    आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी खालील १० सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.

    1. आपलं वय हा फक्त एक आकडा आहे. त्याबद्दल फार चिंता करू नका.
    2. आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत, नंतर आपल्याला पृथ्वीची आठवण येईल, त्यामुळे आजपासूनच जगणे प्रारंभ करा.
    3. आपले ध्येय ठरवा, आपल्या स्वप्नांची निवड करा आणि आजपासूनच त्यांचा पाठलाग सुरु करा.
    4. नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे, चांगले कपडे वापरायला सुरुवात करा.
    5. निराशावादी आणि आळशी लोकांपासून दूर राहा. जास्त कार्यक्षम आणि उत्साही व्हा.
    6. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काय खायला पाहिजे आणि काय नाही याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
    7. आजपासून चांगले आर्थिक निर्णय घेण्यास प्रारंभ करा.
    8. आपल्याला किती पैसा आणि कधीपर्यंत कमवायचा आहे, याचं नियोजन करा. एक उद्दिष्ट ठरवा आणि आजपासूनच त्यावर काम करायला सुरुवात करा.
    9. मनात स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवून ठेवा.
    10. आशावादी बना. आनंदी बना. उत्साही बना. आजपासूनच…

    आता मला सांगा : तुमचं वय काय आहे?

    • हेन्री फोर्ड यांनी प्रसिद्ध ‘मॉडेल टी कार’ बनवली, तेव्हा त्यांचं वय होतं ४५ वर्ष.
    • चार्ल्स डार्विनने ‘मानवी उत्क्रांती’चा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याचं वय होतं ५० वर्ष.
    • जॉन पेंबरटन यांनी कोका-कोलाचा शोध वयाच्या ५५व्या वर्षी लावला.
    • रे क्रॉकनी मॅकडोनाल्ड विकत घेतली, तेव्हा त्यांचं वय होतं ५९ वर्ष.
    • कर्नल सँडर्स यांनी केफसीची सुरुवात वयाच्या ६२व्या वर्षी केली होती.

    यशस्वी होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका

  • चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    ‘टाइम झोन’ आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं ४०व्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे.

    The Power of Relaxation and Humility

    ओबामा ५५व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने ७०व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या ‘टाईमझोन’ मध्ये काम करत असतो.काही लोक आपल्या ‘किती पुढे गेलेत?’ असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट ‘टाइमझोन’ मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय!पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या ‘टाइम झोन’ मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या!

    आणखी वाचा

  • बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

    बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

    इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या.

    9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून काटावर पास होऊन बारावीत नापास झालेल्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? अर्थातच टपोरी, वाया गेलेला, बिनकामी; पण जर मी म्हणाले, की तोच बारावीत नापास झालेला मुलगा जर पोलिस आधिकारी बनला तर? तुमचा विश्वास बसणार आहे का? पण हे खरंय!

    आम्ही सांगतोय, त्या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल ज्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांना पाणी पाजलं. तो डॅशिंग अधिकारी म्हणजे आयपीएस मनोज कुमार शर्मा. 12 वी मध्ये केवळ हिंदी सोडून बाकी सगळ्या विषयात नापास झालेले मनोज कुमार परिस्थितीशी झगडत अखेर आयपीएस बनले ते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. नुकताच त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित “12th फेल” हा सिनेमासुद्धा प्रदर्शित झाला.

    मुलाखती वेळी त्यांची थोडी कच्ची-पक्की इंग्रजी पाहून मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं, ‘अरे तुला तर इंग्रजीच येत नाही, तर तू काम कसं करणार?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, भाषेचा आणि कामाचा काय संबंध, त्यावर ते मुलाखत घेणारे म्हणाले, ‘अरे तुला जर इंग्रजी बोलताच येत नसेल, तर लोकांचे प्रश्न तू कसे सोडवशील?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, ‘सर तुम्ही मला जर प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पाणी दिलं, पण मी जर म्हटलं की, मला प्लॅस्टिकच्या ग्लासमधून नको काचेच्याच ग्लासमधून पाणी द्या. तर तुम्ही काय कराल? अर्थातच तुम्ही म्हणाल की, ग्लास कुठलाही असो, पण पाणी तेच आहे ना. मग काचेचा ग्लास असला काय किंवा प्लॅस्टिकचा असला काय. त्याची चव बदलणार नाहीच. अगदी तसंच माझी भाषा कोणतीही असो, त्याने माझ्या कामावर काय फरक पडणार आहे? मला जरी इंग्रजी अस्खलित बोलता येत नसले, तरी माझे काम मी सक्षमपणे व जबाबदारीने करू शकेन. यावर माझा विश्वास आहे” त्यांच्या या उत्तराने सर्वजण प्रभावित झाले आणि मनोज कुमार यांची निवड झाली.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    प्रत्येकाला आपल्या जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जावे लागत असतं. मग ते प्रसंग आनंदाचे, दुःखाचे, धैर्याचे, भीतीचे, जबाबदारीचे कोणतेही असू शकतात. या सर्व प्रसंगाचे अस्तित्व म्हणजेच माणसाचे जीवन होय. अपेक्षित यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे निर्णयक्षमता. जरी आपण आत्मविश्वासाला यशाची गुरुकिल्ली म्हटलं, तरी निर्णयक्षमता हेच यशाचं रहस्य असतं. जेव्हा आपण एखादी कृती करण्याचा निर्णय घेऊ तेव्हाच ती पूर्णतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होईल.. नाहीतर जर तुम्ही निर्णयच नसेल घेतला तर यश अपयश लांबच्या गोष्टी.  

    मंडळी, तुम्ही जर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीनुसार काम करत गेला ना, तरंच तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकता. सिद्धार्थने जर आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचाच मार्ग अवलंबला असता, तर तो युगप्रवर्तक गौतम बुद्ध कधीच बनला नसता. आपला एखादा लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जसे महाभारतातील दोन वेगवेगळ्या निर्णयांची आपण अजूनही चर्चा करतो. एक योग्य निर्णय म्हणजे अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षात घेणे आणि दूसरा अयोग्य निर्णय दुर्योधनाने कृष्णाकडे सैन्याची मागणी करणे. एकाच परिस्थितीतील या दोन निर्णयांनी एकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले तर दुसऱ्याचे समृद्ध.

    आणखी वाचा

  • ‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

    ‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

    हल्ली Social Media वर तुम्हाला इतके सारे  Motivational Speaker पाहायला मिळतील की विचारायची सोय नाही. YouTube वर साधं Motivation हा शब्द जरी टाइप केला तरी संदीप महेश्वरी, विवेक बिंद्रा, प्रिया कुमार, गौर गोपाल दास अशा कित्येक Motivational Speakers चे Channels ओपन होतील. ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जीवनातील अध्यात्माच्या, ध्यानाच्या अनेक गोष्टींपर्यंतची प्रेरणा मिळते. प्रेरणा ही अग्निसारखी असते. तिला जर इंधन पुरवलं नाही तर ती विझून जाते. ‘मला यशस्वी व्हायचंय, मला पैसा कमवायचाय’ या जिद्दीतूनच प्रेरणेचा जन्म होत असतो. जर तुमच्यात जिद्दच नसेल तर इंधन नसलेल्या वाहनाप्रमाणे तुमच्या यशाची गाडी धक्के खात खात धीम्या गतीने चालेल.

    एका वाक्यात प्रेरणा म्हणजे काय सांगायचं झालं, तर प्रेरणा ही आपल्या आयुष्याला गती देणारी एक शक्ती आहे. ती तुम्हाला कोणाच्या बोलण्यातून मिळेल, वाचनातून मिळेल किंवा कृतीतून मिळेल. आमच्या घराशेजारी पाटील कुटुंबीय राहत होते. त्यांचा तुषार नावाचा मुलगा चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. नम्र आणि इतरांप्रती नेहमी आदराची भावना बाळगणारा तुषार सगळ्यांच्याच आवडीचा होता. मात्र त्याचा भाऊ मंगेश व्यसनी आणि व्याभिचारी होता. दारू, सिगारेट, गांजाचं त्याला व्यसन होतं. तो आपल्या बायकोला देखील भरपूर मारायचा. एके दिवशी असंच त्याला कोणीतरी विचारलं. का रे तु असा वागतोस, दारू पिऊन का मारझोड करत असतोस? त्यावर मंगेश म्हणाला, “लहानपणी माझे बाबा दारू पिऊन आईला खूप मारायचे. रोज दारू पिऊन शिवीगाळ करायचे. त्याच वातावरणात मी वाढलो आणि मला देखील त्यांच्यासारखीच सवय लागली. कामाच्या आळसामुळे माझी ही अशी माझ्या वडिलांसारखीच अवस्था झाली.”

    14746094 3b90 45a0 89a7 55d3da8714b6

    कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील तरुण. इतक्या मोठ्या संकटात देखील तो गुरुजींकडे पैसे नाही, तर पाठीवर एक प्रेरणेची थाप मागत होता. मित्रांनो हे जे प्रोत्साहन आहे ना, तेच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळवून देत असतं. लहानपणी शाळेत गुणगौरव सोहळा असायचा. शालेय परीक्षा, खेळ, संगीत, नृत्य, वादन अशा प्रत्येक क्षेत्रात अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जायचं. साहाजिकच त्यामुळे मुलांच्यात अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण व्हायची. आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असावी जी तुम्हाला नेहमी प्रेरणा देईल. नवीन काहीतरी करण्याचं बळ देईल आणि जर कोणी नसेलच तर बाह्य प्रेरणा मिळविण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला प्रेरणा देऊन तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेचा दरवाजा खुला करा. तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेला बळ देऊन तिला भरभक्कम बनवा.

    आणखी वाचा

  • सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

    सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

    निळेशार आकाश, त्या आकाशातून विहार करणारे पक्षी, उंच-उंच हिरवीगार झाडे, खाली बागेत बागडणारी मुले, बाहेरचा सुंदर निसर्ग तो त्याच्या डोळ्यासमोर उभा करायचा. त्याला देखील खूप छान वाटायचं जयसिंग इतकं सुंदर वर्णन करायचा की रामलाल वाटायचं की, कधी एकदा मी बाहेर पडून माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहतो. असेच बरेच दिवस या दोघांचे हे वर्णनात्मक खेळ चालू होते. आणि एक दिवस अचानक सका-सकाळी रामलाल पाहतो तर काय? जयसिंग रूममध्ये नव्हताच. रामलालला वाटलं, बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळाला असेल, पण ‘मग त्याने रात्री मला सांगितलं कसं नाही?’ आता मला बाहेरचं जग कोण दाखवेल? आता बाहेर काय चाललंय ते मी कसं बघू?

    आणि एक दिवस शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्याने हातापायची हालचाल केली. हळूहळू कॉटवरुन पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. रामलाल रोज खिडकीबाहेर काय चालू आहे हे पाहण्यासाठी धडपडत होता आणि एकदिवस त्याच्या प्रयत्नांना यश आले, संपूर्ण ताकदीनिशी तो दोन्ही पायांवर उभा राहिला. धडपडला आणि समोरच्या कॉटवर जाऊन आदळला. पण पुन्हा उभा राहिला आणि अखेर तो खिडकीजवळ गेला. खिडकीतून बाहेर पाहतो तर काय! जयसिंग सांगत होता त्यातील काहीच तिथे नव्हते. तो नर्सला जोरजोरात हाका मारू लागला. नर्स धावत-पळत आली. ‘नर्स इथं खाली मोठं गार्डन होतं, उंच मोठी-मोठी झाडे होती, कुठं गेलं सगळं, इथे तर आत्ता काहीच दिसतं नाही. २ महिन्यातच सगळं गायब कसं झालं.’ त्यावर नर्स म्हणाली, ‘साहेब मी इथे १० वर्ष झालं काम करतीये आणि राहायला पण इथं जवळच आहे. माझ्या बघण्यात तरी इथं जवळपास कुठेच गार्डन नाही. गार्डन तर सोडा, इथं जास्त झाडेदेखील नाहीत. पहा ना, सगळ्या बिल्डिंगच दिसतायेत.’

    त्यावर रामलालला प्रश्न पडतो, मग जयसिंग एवढे दिवस माझ्याशी खोटं का बोलला असेल. पण काही वेळाने रामलालच्या लक्षात येतं, जयसिंगच्या त्या बोलण्यामुळेच मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो. माझ्यात उभं राहण्याचं बळ आलं ते जयसिंगमुळेच.

    मित्रांनो आपल्या वाणीत इतकी ताकद असते ना की, त्यामुळे अशक्यप्राय गोष्टीदेखील शक्य होतात. त्यामुळे कधीकधी कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोललं किंवा कोणाचं कौतुक केलं तरी काही बिघडत नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलायचं असतं असं काही नाही. एकेक लोक असतात, जे नेहमी negative विचार करतात negative बोलत असतात. आपल्या बोलण्याने जास्त काही फरक नाही पडणार मान्य आहे, मात्र समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देखील पुरेशी असते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा

    परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा

    मित्रांनो साधं आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक कुत्रा आपल्याकडे पाहून गुरगुताना दिसतो तेव्हा आपण काय करतो… तिथून धूम ठोकतो. पण त्याच्यासमोरून आपण जर पळ काढला, तर तोही आपल्यामागून भुंकत येतो. मात्र तेच जर हातात एक दगड घेऊन आपण त्याच्या मागे लागलो तर? चित्र उलटं असेल.

    मित्रांनो आपल्या आयुष्याचं देखील तसंच आहे, दुःखाला कवटाळत बसलो, तर दुःख अजून मोठं होतं. एक म्हण आहे ‘भित्या पाठी ब्रम्हराक्षस’ या म्हणीनुसार घाबरणाऱ्याच्या पाठीमागेच अनेक वाईट घटना, प्रसंग लागतात. मात्र त्यातून घाबरून पळ न काढता सक्षमतेने, निर्भयपणे आणि सद्सद्विवेकाने तोंड दिले, तरच आपण प्रत्येक संकटातून तारू शकतो.

    एकदा 12-13 वर्षाच्या मुलाला अभ्यास न झाल्याच्या कारणावरून त्याचे शिक्षक भर खूप ओरडतात. वर्गात उभे करतात आणि त्याच्या हातावर जोराने छडी ने मारण्यासाठी हात वर करतात. आता त्याचा हात लालच होणार, पण त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. शिक्षक छडी खाली टाकतात आणि म्हणतात, “अरे तुला मारून काय फायदा. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्याला खूप दुःख होतं. माझ्याच हातावर कशी काय रेषा नाही. तो शिक्षकांना विचारतो गुरुजी विद्येची रेषा कुठे असते. गुरुजी सांगतात की बाबा इथे इथे असते. तो तडक शिक्षकांसमोरुन बाहेर जातो आणि चाकूने आपला हातावर रेष ओढतो आणि शिक्षकांना सांगतो, “गुरुजी माझ्या हातावर देवाने रेषा निर्माण केली नसेल, पण मी ती केली.” तो मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून व्याकरणाचार्य पाणिनी होता. पुढे जाऊन त्याने व्याकरणाचे गणित अख्ख्या जगासमोर मांडले.

    आणखी वाचा

  • अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

    अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

    एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन एक सायकॉलॉजिस्टला भेटायला गेले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवर्गीय होतं; पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी, व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. त्या सायकॉलॉजिस्टनं त्यांना विचारलं की, ‘इतके वर्ष का नाही आलात भेटायला?’ तर म्हणाले, ‘आम्ही विचार करत होतो जाऊया की नको.’

    ज्यांना कुणाला असा ओव्हर थींकिंगचा प्रॉब्लेम आहे, तो लवकर ओळखा, कारण हा पूर्ण आयुष्य बरबाद करणारा खतरनाक विषाणू आहे. याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीला फाटे फोडणे, इतरांना मत विचारणे व त्यावर पुन्हा विचार करणे, नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करणे. याचे दुष्परिणाम म्हणजे कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत न पोहचणे, त्यामुळे कोणतीही ॲक्शन न घेणे, गोष्टी उगीचच अवघड करणे, सतत भीतीच्या भावनेत राहणे, आत्मविश्वास कमी कमी होत जाणे, डिप्रेशन वाढणे, शारीरिक थकवा वाढणे व हे अती व सतत काही महिने होत राहिल्यास जीवन निरुत्साही होऊन मनोरुग्ण होण्याचीही शक्यता असते.

    ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, त्याने अतिविचाराच्या रोगापासून दूर रहावे. जे काही करायचं आहे, त्याचा थोडा विचार करा, निर्णय घ्या, झटपट कामाला लागा. हातात काम असेल, तर विचार करायला वेळ मिळत नाही. विचार करत बसला की, हाताला काहीही मिळत नाही, मग आयुष्यभर सुशिक्षित बेकार ही पदवी कायम राहते. त्यामुळे अतिविचार करणे टाळा. काय ते लवकर निर्णय घ्या, ठरवा आणि कामाला लागा. स्वत:चे व इतरांचे डोके खाऊ नका. नाहीतर आयुष्यभर बेकारी व अविवाहितपणा तुमच्या नशिबी नक्कीच आहे. म्हणून रतन टाटा म्हणतात, ‘निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे, हे सुध्दा कधीकधी अधिक बरोबर ठरते. मी आधी निर्णय घेतो, मग तो खरा ठरवतो.’

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा