बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

IPS Manoj Kumar Sharma

इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या.

9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून काटावर पास होऊन बारावीत नापास झालेल्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? अर्थातच टपोरी, वाया गेलेला, बिनकामी; पण जर मी म्हणाले, की तोच बारावीत नापास झालेला मुलगा जर पोलिस आधिकारी बनला तर? तुमचा विश्वास बसणार आहे का? पण हे खरंय!

आम्ही सांगतोय, त्या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल ज्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांना पाणी पाजलं. तो डॅशिंग अधिकारी म्हणजे आयपीएस मनोज कुमार शर्मा. 12 वी मध्ये केवळ हिंदी सोडून बाकी सगळ्या विषयात नापास झालेले मनोज कुमार परिस्थितीशी झगडत अखेर आयपीएस बनले ते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. नुकताच त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित “12th फेल” हा सिनेमासुद्धा प्रदर्शित झाला.

मुलाखती वेळी त्यांची थोडी कच्ची-पक्की इंग्रजी पाहून मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं, ‘अरे तुला तर इंग्रजीच येत नाही, तर तू काम कसं करणार?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, भाषेचा आणि कामाचा काय संबंध, त्यावर ते मुलाखत घेणारे म्हणाले, ‘अरे तुला जर इंग्रजी बोलताच येत नसेल, तर लोकांचे प्रश्न तू कसे सोडवशील?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, ‘सर तुम्ही मला जर प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पाणी दिलं, पण मी जर म्हटलं की, मला प्लॅस्टिकच्या ग्लासमधून नको काचेच्याच ग्लासमधून पाणी द्या. तर तुम्ही काय कराल? अर्थातच तुम्ही म्हणाल की, ग्लास कुठलाही असो, पण पाणी तेच आहे ना. मग काचेचा ग्लास असला काय किंवा प्लॅस्टिकचा असला काय. त्याची चव बदलणार नाहीच. अगदी तसंच माझी भाषा कोणतीही असो, त्याने माझ्या कामावर काय फरक पडणार आहे? मला जरी इंग्रजी अस्खलित बोलता येत नसले, तरी माझे काम मी सक्षमपणे व जबाबदारीने करू शकेन. यावर माझा विश्वास आहे” त्यांच्या या उत्तराने सर्वजण प्रभावित झाले आणि मनोज कुमार यांची निवड झाली.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *