परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा

never-surrender-to-circumstances

मित्रांनो साधं आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक कुत्रा आपल्याकडे पाहून गुरगुताना दिसतो तेव्हा आपण काय करतो… तिथून धूम ठोकतो. पण त्याच्यासमोरून आपण जर पळ काढला, तर तोही आपल्यामागून भुंकत येतो. मात्र तेच जर हातात एक दगड घेऊन आपण त्याच्या मागे लागलो तर? चित्र उलटं असेल.

मित्रांनो आपल्या आयुष्याचं देखील तसंच आहे, दुःखाला कवटाळत बसलो, तर दुःख अजून मोठं होतं. एक म्हण आहे ‘भित्या पाठी ब्रम्हराक्षस’ या म्हणीनुसार घाबरणाऱ्याच्या पाठीमागेच अनेक वाईट घटना, प्रसंग लागतात. मात्र त्यातून घाबरून पळ न काढता सक्षमतेने, निर्भयपणे आणि सद्सद्विवेकाने तोंड दिले, तरच आपण प्रत्येक संकटातून तारू शकतो.

एकदा 12-13 वर्षाच्या मुलाला अभ्यास न झाल्याच्या कारणावरून त्याचे शिक्षक भर खूप ओरडतात. वर्गात उभे करतात आणि त्याच्या हातावर जोराने छडी ने मारण्यासाठी हात वर करतात. आता त्याचा हात लालच होणार, पण त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. शिक्षक छडी खाली टाकतात आणि म्हणतात, “अरे तुला मारून काय फायदा. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्याला खूप दुःख होतं. माझ्याच हातावर कशी काय रेषा नाही. तो शिक्षकांना विचारतो गुरुजी विद्येची रेषा कुठे असते. गुरुजी सांगतात की बाबा इथे इथे असते. तो तडक शिक्षकांसमोरुन बाहेर जातो आणि चाकूने आपला हातावर रेष ओढतो आणि शिक्षकांना सांगतो, “गुरुजी माझ्या हातावर देवाने रेषा निर्माण केली नसेल, पण मी ती केली.” तो मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून व्याकरणाचार्य पाणिनी होता. पुढे जाऊन त्याने व्याकरणाचे गणित अख्ख्या जगासमोर मांडले.

आणखी वाचा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *