Category: लेख

  • आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते.

    हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो.

    पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात-

    ★ कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक:

    अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे,

    S M A R T म्हणजेच-

    Specific निश्चित,

    Measurable मोजता येणारे,

    Achievable शक्य असणारे,

    Relevant संबंधित,

    Time-bound विशिष्ट कालमर्यादेत

    असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात-

    ★ आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे:

    प्रत्येकाच्या जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.

    ★ निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं:

    आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते.

    ★ आयकर कायद्याच्या संबंधित चुका:

    अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी.

    ★ आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे:

    गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा.

    ★ महाग कर्जाचा बोजा कमी न करणे:

    गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये.

    ★ जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं:

    आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी)

    आणखी वाचा

  • फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

    फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

    गरुडाचे जीवनमान ७० वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा ४०वर्षांचा होतो, तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडता येत नाही. चोच पुढील बाजूला वळते, ज्यामुळे भोजन करता येत नाही. पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, त्यामुळे गरुडभरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे, अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात. एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडाप्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतःला पुनर्स्थापित करणे!

    १५० दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षेनंतर त्याला मिळते त्याची गरुडभरारी, यानंतर तो 30 वर्षे जगतो, ताकदीने आणि अभिमानाने!

    याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. तेव्हा आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत!

    150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतःला पुनरुज्जीवित करण्यासाठी! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे, ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच! पण त्यानंतर जी उड्डाणं असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील!

    दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहेत, जे स्वतःला परिपूर्ण ओळखता आणि तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • करिअरची झेप अंतराळापर्यंत

    करिअरची झेप अंतराळापर्यंत

    12वी झाली आता पुढे काय करू हा सगळ्या विद्यार्थ्यांचा ठरलेला प्रश्न. पण तुम्हाला जर विज्ञानात रस असेल, तर आजच्या लेखातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.

    आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे माणूस भूगर्भापासून ते अंतराळातील कृष्ण-विवरांपर्यंत प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणि नवीन काहीतरी शोध लावण्यात, संशोधन करण्यात तरबेज झाला आहे. या तंत्रज्ञानामुळेच करिअरचे नव-नवे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे Career In Space Science. तुम्हाला जर अंतराळ विश्वात रमायला आवडत असेल, तर तुम्ही स्पेस सायन्समध्ये उत्तम करिअर करू शकता.

    पूर्वीसारख्या अंतराळ विज्ञानात आता केवळ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळवीर बनणं फक्त एवढ्याच संधी उपलब्ध नाहीत, तर स्पेस इंजिनीअरिंग, स्पेस रिसर्च, स्पेस लॉ, स्पेस टुरिझम, स्पेस टेक्नोलॉजी असे अनेक पर्याय आहेत.


    Astronomers

    खगोलशास्त्रज्ञ: विज्ञानाच्या दृष्टीने अवकाश अजूनही कधीही न सुटणारे कोडे आहे. अनेक देशांचे शास्त्रज्ञ अवकाशाचा शोध घेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खगोलशास्त्रामध्ये सूर्यमाला, तारे, आकाशगंगा, ग्रह इत्यादींचा समावेश होतो. हे शास्त्रज्ञ जमिनीवरून संशोधन करून तिथे घडणाऱ्या विविध घटना जाणून घेत असतात, त्यावर अभ्यास करत असतात.


    Astronauts

    अंतराळवीर : अंतराळवीरांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते, हे असे लोक असतात जे अंतराळात फिरून आपली स्वप्ने पूर्ण करतात. स्पेस स्टेशनवर राहून संशोधन करणे हे त्यांचे काम असते. कल्पना चावला, सुनीता विल्यम असे अंतराळवीर आणि त्याची अभिमानास्पद कार्य आपल्याला माहितीच आहेत. तुम्ही देखील स्पेस सायन्समध्ये करिअर करून अंतराळवीर बनू शकता.


    Space Engineer

    स्पेस इंजिनीअरिंग : आता इंजिनीअर म्हणून तुम्ही केवळ आयटी कंपन्यांमध्येच काम करू शकता असे नाही, तर तुम्ही अंतराळाचा देखील वेध घेऊ शकता. अंतराळ मोहिमेशी संबंधित सर्व उपकरणं डिझाइन करणे हे स्पेस इंजिनिअरचे मुख्य काम असते. एरोस्पेस, रोबोटिक्स, मटेरियल सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग तसेच मेकॅनिकल आणि टेलिकॉम इंजिनीअरिंग अशा अनेक क्षेत्रातील इंजिनीअर्स स्पेसमध्ये काम करु शकतात. 


    Space Technology

    स्पेस टेक्नॉलॉजी: यामध्ये मुख्यतः सॅटेलाइट, स्पेस स्टेशन, स्पेसक्राफ्ट, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, अंतराळ युद्धात गुंतलेली विविध उपकरणे, इक्विपमेंट डिझाईन करण्याचे काम केले जाते. 


    Space Research

    स्पेस रिसर्च: विज्ञान म्हटलं की शोध, संशोधन हे आलेच आणि अंतराळ हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये संशोधकाला वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता येतात. अवकाश संशोधनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असतो. जसे – खगोलभौतिकशास्त्रज्ञ, खगोलजीवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ, जैवभौतिकशास्त्रज्ञ. आणि हे सर्वजण आपापल्या पद्धतीनुसार अंतराळातील गोष्टींवर काम करत असतात.


    Space Law

    स्पेस लॉ: स्पेस लॉ हा अंतराळ अंतर्गत क्षेत्राशी संबंधित कायदा आहे. यामध्ये देश आणि कंपन्यांमधील करार, संधी, अधिवेशनं आणि संघटना यांच्या नियमांची माहिती मिळते. आजच्या काळात अवकाशात माणसाने ज्याप्रकारे विस्तार केला आहे, ते पाहता स्पेस लॉ करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.


    Space Tourism

    स्पेस टुरिझम: कोणाला अवकाशात फिरायला आवडणार नाही. 2030 पर्यंत अंतराळवीरच नाही, तर तुम्ही आम्ही देखील अंतराळ सफर करू शकतो अशी घोषणा ईस्त्रोने केली आहे. त्यामुळे भारत स्पेस टुरिझम मॉडेलवर जोरदार काम करत आहे. यामध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक, ब्लू ओरिजिन, ओरियन, स्पेसएक्स, ओरियन स्पॅन आणि बोईंग यांसारख्या खासगी विदेशी कंपन्या या क्षेत्रात खूप पुढे गेल्या आहेत. त्यामुळे स्पेस टुरिझम क्षेत्र तुमच्या करिअरसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं.

    मग कशी वाटली आजची माहिती? कमेन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा…

  • स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

    स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

    ध्येयनिश्चिती –

    शिस्त –

    ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती यांच्यामधील पूल म्हणजे शिस्त. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकते. मग तुमच्यामध्ये टॅलेंट असो वा नसो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी अतिशय शिस्तप्रिय असते. या व्यक्ती तिच्या आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे त्यांचे आऊटपुट हे आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्तच असते, कारण त्यांना आज काय करायचे याचा विचार करण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. त्यांचा प्लॅन हा आधीच ठरलेला असतो.

    जोखीम –

    आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजतेने मिळत नाही आणि जर तुमच्या नावाचा उल्लेख यशस्वी लोकांच्या यादीत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासमोर कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्हाला स्वीमर व्हायचे असेल, पण पाण्यात उतरायची भीती वाटते म्हणून तुम्ही पाण्यात उडीच मारली नाही, तर तुम्ही स्विमर बनू शकता का? अर्थातच नाही. म्हणून तुम्ही जे ध्येय निवडले आहे ते पूर्ण करण्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले तरी मागे हटू नका. जोखीम स्वीकारा आणि कार्य पूर्ण करून दाखवा.

    शिकाऊ वृत्ती –

    असं म्हणतात की, माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तो नेहमी कोणाकडून काही ना काही शिकत असतो. मग त्याचे वय 25 असो, 50 असो किंवा 70. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल, तर नेहमी अपडेटेड राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शिकाऊ वृत्ती असणं खुप गरजेचं आहे. जग काळानुसार बदलत असतं आणि या बदलत्या जगानुसार तुम्ही आम्ही देखील बदलणं गरजेच आहे. जर आपण प्रवाहानुसार चाललो तर किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर प्रवाहाबाहेर फेकले जाऊ. त्यामुळे या बदलत्या दुनियेनुसार इतरांकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकून स्वतःला जगावेगळे बनविण्यासाठी सज्ज व्हा.      

    वाचन: 

    प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन यशप्राप्ती करण्यासाठी आपले आयुष्य खुप छोटे आहे, त्यामुळे यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचे धडे घेऊन त्यांच्या अनुभवातून गोष्टी शिकल्या पाहिजे आणि यासाठी वाचन हा एकमेव पर्याय आहे. वॉरेन बफे दररोज न चुकता पुस्तकं वाचतात. कारण त्यांना माहीत आहे की; त्यांची संपत्ती हे त्यांचे सर्वस्व नाही, तर नॉलेज हेच सर्वस्व आहे. तुम्हाला जर त्यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असेल, तर दिवसातून निदान 10 पानं तरी वाचलीच पाहिजे. 

    आणखी वाचा

  • ध्यानाने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!

    ध्यानाने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!

    “वर्तमानात जगा, भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा जास्त विचार करू नका”, हे वाक्य तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. पण अतिविचार करणं आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की हजार वेळा वाचून सुद्धा हे वाक्य आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात उतरवता येत नाही. तुम्ही कधी एखाद्या लहान मुलाचं बारीक निरीक्षण केलंय का? जर केलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल; ती गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या मनात फक्त आज असतो.

    1. दृष्टीकोनात सुधार

    अतिविचार तुम्हाला कधीच शांत आणि आनंदी आयुष्य जगू देत नाहीत. दररोजच्या ध्यानामुळे दुःख, राग, भीती या गोष्टींतून बाहेर यायला आणि पर्यायाने वास्तवाची जाणीव व्हायला मदत होते.

    2. नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मदत

    बऱ्याचदा, आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांना जबाबदार असणारे दोष कुणा दुसऱ्यांवर लादण्याच्या प्रयत्नात असतो. काही झाले तरी, दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवले की अडचणींचा सामना करणे सोपे वाटते. दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे आणि बोट दाखवणे यांसारख्या नकारात्मक वृत्तींना बाजूला करायला ध्यान मदत करते.

    3. मनातील कचरा साफ होतो

    अतिविचार हे तुमचं मन तुम्हाला खात असल्याचं लक्षण आहे. तुमच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाऊन त्याच्याशी दोन हात करा. ध्यानामुळे मनातील कचरा साफ होण्यासाठी मदत होते. तुमच्या डोक्यातील विचारांना व्यवस्थित मांडणं, योग्य विचारांना प्राधान्यक्रम देणं आणि संपूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करणं या गोष्टीसुद्धा ध्यानाने शक्य होतात.

    4. आसक्तींपासून मुक्तता

    अतिविचार हे तुमच्या – तुमचे शब्द, कृती, कल्पना आणि विचार यांच्याबद्दलच्या – आसक्तीचे प्रकट रुप आहे. आपण लोक आणि नात्यांना इतके चिकटून बसलेले असतो. त्यामुळे इतकी मतं व कारणं तयार होतात, आणि मग आपण अती टीका करायला लागतो किंवा अति चिकित्सक होतो. ध्यानामुळे आसक्ती आणि अतिविचारांच्या गोंधळातून बाहेर पडायला मदत होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    उत्तर कर्नाटकात स्थित असलेलं दांडेली म्हणजे कर्नाटकातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य. फारच कमी माणसांची वर्दळ, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग, लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एखाद-दुसरं हॉटेल अशा वातावरणात असलेलं दांडेली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या झुलत्या कमानी पाहिल्या की, वाटतं दांडेली जणूकाही आपल्या स्वागतासाठीच नटलेली आहे. त्या गर्द झाडीची शहरी लोकांना भीती वाटू शकते पण तिथली स्वच्छ हवा, पक्षांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा किलबिलाट, काळी नदीचा शांत प्रवाह एकूणच सगळं वातावरण पाहिलं की दोन – तीन दिवस तरी तिथून मुक्काम हलवावा नाही वाटत.

    पुण्याहून दांडेलीचा रस्ता जवळपास 442 किलोमीटरचा आहे. पुणे- सातारा हायवेने कोल्हापूर मधून बेळगाव वरुन 2 तासात तुम्ही दांडेलीला पोहोचू शकता. पुण्याहून 8 – 8.30 तासांचा प्रवास करून जरी थकवा आला असेल तरी तिथल्या शांत वातावरणाने हा थकवा अगदी चुटकीसरशी निघून जातो.

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

    व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

    आता व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं, तर आपण एखादी वस्तू किंवा सेवा तिच्या खरेदीच्या किंवा निर्मिती मूल्यापेक्षा जास्त किंमतीने बाजारात विकतो आणि त्यातून नफा मिळवतो तेव्हा या व्यवहाराला बिझनेस म्हणजे व्यवसाय असं म्हणतात. पूर्वीच्या काळी चलन म्हणून वस्तूंचा वापर व्हायचा. अजूनही काही गावांमध्ये अशी पद्धत आहे कि वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते. मग प्रश्न हा पडतो आपल्या आजूबाजूला इतके लोक व्यवसाय करताना दिसत असतात, त्यातले काही यशस्वी असतात आणि तर काहींचा व्यवसाय ठराविक काळापुरताच सुरु राहून नंतर बंद पडतो. असं का होत असेल? तर एक म्हणीमध्ये याचं सार लपलेले आहे, ते म्हणजे, ‘शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकलं जातं’ हे महत्वाचं  आहे. व्यवसाय म्हणून आपण ज्या गोष्टीचा किंवा प्रॉडक्टचा विचार करतो त्याचा आणि सध्याच्या बाजारात त्याची किती गरज आहे हा विचार फार महत्वाचा आहे.

    या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्यासोबतच किंबहुना त्याआधीपासूनच विचार करावी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी किंवा भांडवल. यामध्ये विचार करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे आवश्यक आहेत हे तर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच व्यवसायातून नफा मिळेपर्यंत व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात ते म्हणजे, आपण गुंतवणूकदारांकडून भांडवल घेऊ शकतो किंवा सरळ आपण बँकमधून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. नवीन उद्योजकांसाठी सरकारने उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अनेक योजना देखील आणल्या आहेत आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो.

    या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही तुमचा लहान-मोठा बिझनेस नक्कीच सुरु करु शकता, पण तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तम सवयी असणे गरजेचे आहे. आता या नेमक्या सवयी कोणत्या? अगदी थोडक्यात सांगायचं तर धाडस, आत्मविश्वास, रिस्क घेण्याची तयारी, दूरदृष्टी, संयम, कष्ट, जिद्, मेहनत, सातत्य आणि चिकाटी. हो हे शब्द बोलायला जितके सोपे वाटतात तितकीच हे सर्व अमलात आणण्यासाठी खूप मोठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ही मानसिक तयारी तेव्हाच असू शकते, जेव्हा तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी असता आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व प्रकारे तयार असता.

    आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की यश मिळवणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा यश टिकवणे जास्त अवघड असते. हे समीकरण व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसाय सुरु करणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा सातत्याने तो चालवणे आणि त्याचा सर्वदूर प्रसार करणे अवघड आहे. अवघड असले, तरी अशक्य आजिबात नाही आणि हो शेवटी एवढं नक्की सांगता येईल की अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जसा प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा त्याची पद्धत वेगळी अगदी तसेच प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून आलेले शहाणपण हे त्याहून वेगळे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करून नक्कीच आपण आपल्या स्वप्नातील व्यवसायच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार करू शकू.

  • तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    जिभी

    हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव म्हणजे जिभी. इथल्या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखळत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच्या पक्षांचा चिवचिवाटही या आनंदात भर घालतो.

    जलोरी पास आणि सिरोलसार लेक

    इथल्या आकर्षणामध्ये ही दोन ठिकाणंसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त ठिकाणंच नाही तर इथपर्यंत पोहोचण्याचे रस्तेही तितकेच मनमोहक आहेत. रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली असल्याचा भास या ठिकाणी जाताना होतो. मध्यभागी गोठलेला तलाव आणि चारही बाजूंनी बर्फच बर्फ. उंचावर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.

    चैहणी गाव

    तीर्थन व्हॅलीतील आणखी एक छोटसं गाव म्हणजे चैहणी. यालाच चैहणी कोठी सुद्धा म्हणतात. इथे एक कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे. या कोठीतच शृंगा ऋषींचं भंडारही आहे. या कोठीपासूनच साधारण एक किमीच्या अंतरावर शृंगा ऋषींचं मंदीर आहे.   

    तीर्थन व्हॅलीला केव्हा जाणार?

    तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.

    कसे जाल?

    आणखी वाचा

  • स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.

    khajjiar-tourism

    खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

    खजियारला जाणार कसं?

    आणखी वाचा

  • महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

    महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

    पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुळे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी इतकं आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं वैभव बघून तुमची गावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल. सतत खळखणाऱ्या नदीचा, पाटबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल.

    आणखी वाचा