Author: naviarthkranti

  • या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

    या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

    या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या कसे ते जाणून घ्या.

    नुकतीच मूर्तिजापूरमध्ये एक अनोखी घटना घडली. लग्नाच्या सर्व तयारीनंतर शेवटच्या टप्प्यावर असताना, फक्त नवरदेवाचा सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे वधूच्या नातेवाईकांनी हे लग्न मोडले. ही घटना ऐकायला हास्यस्पद वाटू शकते, पण यावरून सिबिल स्कोअरचे महत्त्व अधोरेखित होते.

    सिबिल स्कोअर म्हणजे तुमचा आर्थिक शिस्तबद्धतेचा एकप्रकारे आरसाच असतो. हा स्कोअर तुमच्या क्रेडिट इतिहासावर आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर आधारित असतो. बँका किंवा इतर वित्तीय संस्था जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करतात, तेव्हा सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासतात. कमी सिबिल स्कोअर म्हणजे खराब क्रेडिट व्यवस्थापन, थकीत हप्ते किंवा वित्तीय अस्थिरतेचे लक्षण असते .

    अनेकदा काही नकळत झालेल्या चुका आपल्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम करतात. या लेखात अशा कुठल्या चुका सिबिल स्कोअर खराब करू शकतात आणि त्यांच्यावर काय उपाय करावे  यावर एक नजर टाकूया.

     क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज करणे किंवा बंद करणे

    वारंवार क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे आणि ती बंद करणे यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता, तेव्हा बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरची तपासणी करतात,ज्याला “हार्ड इन्क्वायरी” म्हणतात. या चौकश्या वारंवार झाल्यास तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज किंवा इतर क्रेडिट सुविधा मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, फक्त गरज असेल तेव्हाच नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा.

    क्रेडिट कार्ड बंद करताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही एखादे कार्ड बंद करता, तेव्हा तुमच्या एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादेत घट होते, ज्यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो (उपयोग केलेली क्रेडिट रक्कम आणि एकूण उपलब्ध क्रेडिट यामधील प्रमाण) वाढतो. हा रेशो जास्त असल्यास CIBIL स्कोअर कमी होतो. त्यामुळे, जर तुम्हाला एखादे कार्ड बंद करायचे असेल, तर आधी दुसऱ्या कार्डाचा योग्य वापर सुरू करावा आणि उपलब्ध क्रेडिट मर्यादेचे संतुलन राखावे, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोअर प्रभावित होणार नाही.

    क्रेडिट कार्डचा अयोग्य वापर

    क्रेडिट कार्ड उपयोगी असले तरी त्याचा जास्त वापर आर्थिक अडचणीत टाकू शकतो. अनेक जण मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यामुळे त्यांचे CIBIL स्कोअर कमी होते, आणि भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होते. क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% च्या आत ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच, तुमच्या कार्डची मर्यादा ₹1,00,000 असेल, तर दरमहा ₹30,000 पेक्षा जास्त खर्च टाळा, नाहीतर उच्च व्याजदराचा फटका बसू शकतो.

    तुमच्या क्रेडिट कार्डचा शिस्तबद्ध आणि मर्यादित वापर करा. शक्यतो मर्यादेपेक्षा कमी खर्च करा आणि बिल वेळेआधी भरण्याची सवय ठेवा, यामुळे अतिरिक्त व्याज आणि विलंब शुल्क टाळता येते. क्रेडिट कार्ड फक्त तात्पुरत्या गरजांसाठी वापरा आणि गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याची सवय टाळा. योग्य नियोजन आणि जबाबदारीने वापर केल्यास क्रेडिट कार्ड तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाला मदत करू शकते. 

    बिल आणि कर्जाचा हप्ता वेळेवर न भरणे


    कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास CIBIL स्कोअर कमी होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होते. तसेच, उशीर झाल्यास दंड भरावा लागतो आणि क्रेडिट हिस्ट्री देखील खराब होते, ज्यामुळे आर्थिक ताण वाढतो आणि विश्वासार्हतेवर परिणाम होतो.

    म्हणून सर्व EMI आणि क्रेडिट कार्ड बिलं वेळेवर भरण्याची सवय लावा. विसरण्याची शक्यता टाळण्यासाठी ऑटो-डेबिट सुविधा सुरू करा. शक्य असल्यास, बिल वेळेआधी भरा, यामुळे CIBIL स्कोअर सुधारतो आणि भविष्यातील अडचणी टाळता येतात. योग्य नियोजन केल्यास कर्ज आणि क्रेडिट कार्ड हाताळणे सोपे होण्यास मदत होते.  

    फक्त क्रेडिट कार्ड किंवा एकाच प्रकारचे क्रेडिट वापरणे

    जर तुमच्याकडे फक्त क्रेडिट कार्ड असेल आणि कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुमच्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये विविधता नसल्यामुळे CIBIL स्कोअर वाढण्यास वेळ लागतो. जर तुमच्या क्रेडिट मिक्समध्ये फक्त क्रेडिट कार्डच असेल, तर भविष्यात गृहकर्ज, कार लोन किंवा कोणतेही मोठे कर्ज घेणे कठीण होऊ शकते, कारण बँकांना विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्याचा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दिसत नाही.

    त्यामुळे, केवळ क्रेडिट कार्डवर अवलंबून न राहता, गरजेनुसार लहान कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे फायदेशीर ठरते. मात्र, कोणतेही कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर फेडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित आणि शिस्तबद्ध परतफेड केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो आणि भविष्यात मोठे कर्ज सहज मिळू शकते. तसेच, विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड केल्याने तुमच्या क्रेडिट मिक्समध्ये सुधारणा होते, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक विश्वासार्ह ठरता.

    गॅरेंटर किंवा सह-अप्लिकंट म्हणून जबाबदारी न समजणे

    जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर किंवा सह-अप्लिकंट असाल आणि त्या व्यक्तीने हप्ता वेळेवर भरला नाही, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. अनेकांना हे माहिती नसते, त्यामुळे नातलग किंवा मित्रांसाठी गॅरेंटर होण्याचा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

    गॅरेंटर होण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि कर्ज फेडण्याची क्षमता नीट तपासा. गरज नसताना कोणासाठीही गॅरेंटर होऊ नका, कारण जर त्यांनी हप्ता न भरल्यास तुमचा CIBIL स्कोअरही खराब होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज घेणे कठीण जाऊ शकते.

    मित्रांनो आजच्या काळात चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत गरजेचे आहे. कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड वापरणे किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी बँक आणि वित्तीय संस्था तुमचा CIBIL स्कोअर तपासतात. जर हा स्कोअर कमी असेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा जास्त व्याजदर द्यावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे
    .

    आणखी वाचा:

  • Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते.

    पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आपण तिकीट त्वरित बुक करू शकतो आणि त्यासाठीचे पेमेंट प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत करू शकतो. म्हणजेच, अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीटासाठी पुरेसे पैसे हाताशी नसले, तरीही ही योजना मदतीला येते.

    या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी कशी कार्य करते, कोणाला याचा लाभ मिळू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    भारतीय रेल्वेने ही योजना फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा 

    1. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करा.

    2. आपल्या प्रवासासाठी योग्य ट्रेन, प्रवाशांची संख्या आणि प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर उपलब्ध तिकिटे तपासा आणि तुमच्या सोयीच्या गाडीसाठी तिकीट निवडा.

    3. तिकीट बुक करताना पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी ‘पे लेटर’ हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीट शुल्क त्वरित न भरता प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत पैसे भरण्याची सुविधा मिळते.

    4. जर तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करत असाल, तर EpayLater या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमची नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि KYC संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल.

    5. EpayLater वर नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या IRCTC खात्यातून तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. तिकीट यशस्वीपणे बुक झाल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS द्वारे त्याचा तपशील मिळेल.

    6. तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत EpayLater च्या माध्यमातून पेमेंट करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत पैसे भरले, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. मात्र, उशीर झाल्यास व्याज किंवा दंड आकारला  जातो.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना का उपयुक्त आहे?

    रेल्वे प्रवास करताना अनेकदा अचानक प्रवास करण्याची गरज भासते, पण तिकीट बुक करताना तत्काळ पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. या सुविधेमुळे तिकीट त्वरित बुक करता येते, पण त्याचे पैसे नंतर भरता येतात. त्यामुळे अचानक प्रवासाची वेळ आली तरीही कोणतीही अडचण न येता तुम्ही सहज प्रवास करू शकता.

    प्रवाशांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय, ही प्रक्रिया अगदी सोपी असून जास्त कागदपत्र लागत नाहीत. फक्त IRCTC च्या EpayLater च्या मदतीने काही मिनिटांत तिकीट बुक करता येते.

    ही योजना वारंवार रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी पैशांची कमतरता जाणवत असेल, तर ही सुविधा नक्कीच दिलासा देणारी ठरेल.

    योजनेचे फायदे 

    • तिकीट बुक करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे अचानक प्रवास करायचा असल्यास आर्थिक ताण येत नाही.
    • ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध असल्याने तिकीट सहज आणि झटपट मिळते.
    • ठरवलेल्या मुदतीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
    • मुदतीनंतर पैसे भरल्यास फक्त ३.५% सेवा शुल्क आकारले जाते, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत नाही.

  • कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

    मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

    लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष

    लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

    पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्‌तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.

    एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही. 

    सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी

    या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.

    स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.

    काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .

    दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू

    लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.

    यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.

    बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.

    यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.

    आणखी वाचा :

  • जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला. 

    वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.

    त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.

    करिअरची सुरुवात

    MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

    या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.

    व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष 

    २०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

    ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.

    ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.

    ACKO चा यशस्वी प्रवास

    ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.

    ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.

    आणखीन वाचा:

  • Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळतो. मात्र, जीमेल पूर्णतः मोफत असल्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो की, गूगल जीमेलवरून पैसे कसे कमावते? जर तुम्हाला सुद्धा कधी ही शंका आली असेल आणि याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख वाचा. 

    वापरकर्त्यांची माहिती आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स

    गूगलचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्याचा डेटा-आधारित जाहिरात व्यवसाय. जेव्हा वापरकर्ते जीमेल वापरतात, तेव्हा गूगलला त्यांच्या ईमेलमधून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. उदाहरणार्थ, ईमेलचे विषय, ट्रेंडिंग कीवर्ड्स, खरेदी संदर्भ (shopping receipts) आणि उत्पादने किंवा सेवांबद्दल असलेले संवाद याबद्दल माहिती मिळते. ही माहिती गूगलच्या अल्गोरिदमद्वारे संकलित केली जाते आणि त्याचा वापर जाहिरातींचे टार्गेटिंग करण्यासाठी केला जातो.

    उदाहरणार्थ, जर एखादा युजर जीमेलवर फिटनेसबद्दल ईमेल्स मिळवत असेल, तर गूगल त्या युजरला फिटनेस उपकरणे किंवा आहारयुक्त जाहिराती दाखवते. यामुळे जाहिरातदारांना त्यांचे उत्पादन किंवा सेवा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि गूगलला या जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूल मिळतो.

    जाहिरात उत्पन्न (Google Ads/AdSense) अ‍ॅड्स हे गूगलच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे आणि जीमेल त्यात महत्त्वाचा भाग आहे. जीमेलमध्ये वापरकर्त्यांच्या इनबॉक्समध्ये थेट जाहिराती दाखविल्या जातात. जीमेलमध्ये तीन विभाग असतात. ते म्हणजे  ‘इनबॉक्स, सोशल आणि प्रोमोशनल’. प्रोमोशनल टॅबमध्ये गूगल जाहिराती दाखवते. यामुळे, जीमेल वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये आवश्यक असलेली माहिती मिळवता येते, त्याच वेळी गूगलच्या जाहिराती देखील दाखवल्या जातात. काही वेळा, इनबॉक्समध्ये देखील स्पॉन्सर्ड ईमेल्स येतात, जे विशिष्ट ब्रँडद्वारे पाठवले जातात. गूगल वापरकर्त्यांच्या ईमेलमधील शब्दांवर आधारित संबंधित कंटेक्स्चुअल अ‍ॅड्स (Contextual Ads) दाखवतो. गूगलला या जाहिरातींमधून उत्पन्न मिळते. जाहिरातदार गूगलला त्यांच्या जाहिरातींसाठी पैसे देतात आणि जर एखाद्या युजरने त्या जाहिरातीला क्लिक केले किंवा पाहिले, तर त्याचा महसूल थेट गूगलला मिळतो. यामुळे गूगलची जाहिरात प्रणाली अत्यंत यशस्वी ठरते, कारण ती वापरकर्त्यांच्या ईमेल अनुभवाशी संबंधित असते. जेव्हा जाहिराती वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आणि आवडीनुसार असतात, तेव्हा त्या अधिक प्रभावी ठरतात आणि गूगलला त्याचबरोबर मोठा लाभ मिळवून देतात.

    गूगल वर्कस्पेस (Google Workspace)

    गूगल वर्कस्पेस हे गूगलचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, जे व्यवसायांसाठी खास डिझाइन केले आहे. या सेवेमध्ये व्यवसायांना कस्टम डोमेनसह ईमेल वापरण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये 30 GB किंवा त्यापेक्षा अधिक स्टोरेज, प्रगत सुरक्षा उपाय, आणि गूगल ड्राईव्ह, कॅलेंडर, मीट सारख्या गूगलच्या सेवांचा समावेश आहे. गूगल वर्कस्पेससाठी दर महिन्याला प्रति वापरकर्त्यापासून ६ ते १८ अमेरिकन डॉलर घेतले जातात. हजारो व्यवसाय गूगल वर्कस्पेस वापरतात, ज्यामुळे गूगलला प्रचंड उत्पन्न मिळते.

    स्टोरेज योजना (Google Drive Storage Plans)

    जीमेलसह गूगल वापरकर्त्यांना 15 GB मोफत स्टोरेज पुरवतो, ज्यामध्ये ईमेल, गूगल ड्राईव्ह आणि गूगल फोटोज यांचा समावेश असतो. ज्या वापरकर्त्यांना अधिक स्टोरेज आवश्यक असते, ते गुगलचा पेड स्टोरेज प्लॅन्स खरेदी करतात. गूगलचे स्टोरेज प्लॅन्स 100 GB साठी 130 रुपये प्रति महिना, 200 GB साठी २१० रुपये प्रति महिना आणि 2 TB साठी ६५० रुपये प्रति महिना असे आहेत . यातुन गूगलला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, कारण लाखो वापरकर्ते हे प्लॅन्स वापरत असतात.

     AI आणि मशीन लर्निंगवर आधारित सेवा

    जीमेलमध्ये विविध एआय-आधारित फिचर्स आहेत, जे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यात मदत करतात. ‘स्मार्ट रिप्लाय’ फिचर ईमेलच्या संदर्भानुसार त्वरित उत्तरांचे सुचवलेले पर्याय देते, ज्यामुळे वेळ वाचतो. ‘ईमेल फिल्टरिंग’ फिचर वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण ईमेल्स ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे इनबॉक्स व्यवस्थापन अधिक सुलभ होते. हे सर्व फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवतात आणि कार्यक्षमता वाढवतात, तसेच गूगलला प्रीमियम फिचर्ससाठी ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतात, ज्यामुळे  त्यांच्या उत्पन्नात सतत वाढ होत असते.

    गूगलने जीमेलच्या माध्यमातून एक यशस्वी व्यावसायिक मॉडेल निर्माण केले आहे. वापरकर्त्यांना मोफत सेवा देऊन आणि त्यावर जाहिराती, डेटा अ‍ॅनालिटिक्स, प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि स्टोरेज योजनांच्या माध्यमातून महसूल मिळवून गूगलने आपली जागतिक प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत करु शकले आहे. डेटा आधारित व्यवसाय मॉडेलने गूगलला वित्तीय आणि व्यवसायिक यश प्राप्त करण्यास मदत केली आहे, यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.

    आणखी वाचा :

  • Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    या जगात वावरणाऱ्या कुणालाही मेहनतीशिवाय फळ मिळालेलं नाही, त्यामुळे जर का कुणाच्या यशाकडे पाहत अचंबित होत असाल, तर त्यामागे असणाऱ्या खडतर वाटचालीकडे सुद्धा नक्कीच लक्ष द्या. आज आम्ही देखील अशाच एका खेडेगावातून आलेल्या बिझनेस महारथीची गोष्ट तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहोत… 

    शिव नादर : जन्म आणि शिक्षण

    तुम्ही HCL Technologies या कंपनीबद्दल ऐकून आहात का? याच कंपनीचे मालक म्हणजे शिव नादर, ज्यांचा जन्म १४ जुलै १९४५ रोजी तामिळनाडू मधल्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोजी नावाच्या एका छोट्या गावात झाला. दक्षिण भारतातील एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शिव नादर हे आत्ताच्या घडीला भारतीय  IT क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक बनले आहेत. बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या शिव नाडार यांनी शिक्षणात बाजी मारत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची (Electrical and Electronics Engineering) पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर आपण जसं नोकरी करण्याचा निर्णय घेतो, त्याप्रमाणेच  शिव नाडार यांनी देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २२व्या वर्षी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंजिनियरिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

    नोकरी ते व्यवसायाचा प्रवास:

    अनेकवेळा आपण एखादं काम करत असतो, मात्र त्यात खुश असत नाही किंवा आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण न झाल्याने केलेल्या कामातून म्हणावा तसा आनंद मिळत नाही. शिव नाडार यांच्या बाबतीतही काही अंशी असंच घडलं. त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा आपण मनात तीव्र इच्छा बाळगतो तेव्हा कितीही खडतर प्रवास करण्याची, मेहनत घेण्याची आपली तयारी असते. शिव नाडार याच विचारसरणीचे असल्याने कामाच्या अनुभवाची पुंजी सोबत घेऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. या प्रवासात त्यांना काही मित्रांची सोबत लाभली जे देखील चौकटीच्या बाहेर जात  काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. समविचारी माणसांनी एकत्र येणं हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि वर्ष १९७६ मध्ये पाच मित्रांनी सोबत येऊन मायक्रोकॉम्प नावाची कंपनी उभारली, ही कंपनी त्या काळात कॅल्क्युलेटर विकण्याचे काम करायची. 

    काही वर्षांच्या मेहनतीनंतर याच कंपनीचं  रूपांतर हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडमध्ये (Hindustan Computers Limited) करण्यात आलं, ज्याला आपण HCL Technologies म्हणून ओळखतो. काही कारणास्तव त्यावेळी IMB सारख्या दिग्गज कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि हीच संधी नादरआणि समूहासाठी महत्वाची ठरली. व्यावसायिकाचे सर्व गुण घेऊन जन्मलेल्या नादर यांनी मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि IMB च्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली. केवळ १,८७,ooo रुपयांच्या गुंतवणुकीमधून सुरु झालेल्या HCL ला पुढे राज्य सरकारकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आणि बदल्यात सरकारने कंपनीचा २६ टक्के वाटा मिळवला. 

    वर्ष १९७८ मध्ये HCL कडून पहिला वाहिला पर्सनल कंप्युटर (Personal Computer/ PC) बाजारात आणण्यात आला आणि हा अनोखा बदल संपूर्ण बाजारपेठेसाठी महत्वाचा ठरला. HCL Technologies यशाची शिखरं काबीज करत असतानाच शिव नादर यांनी फार इस्ट कम्प्युटर्स (Far East Computers) नावाची आणखीन एक कंपनी सुरु करत आंतराष्ट्रीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९८० मध्ये याच कंपनीच्या माध्यमातून नाडार सिंगापूरमध्ये IT Hardware विकायचे. तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी फक्त एक वर्षाच्या व्यवसायातून शिव नादर यांच्या कंपनीचे मूल्य ३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले होते. देशात आणि परदेशात नाव कमावत असलेल्या नादर यांनी इथून मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही. वर्षांची  मेहनत आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी  जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स’ (Forbes) च्या यादीत अनेकवेळा नाव पटकावलं. शिव नादर यांची मेहनत आणि सोबत असेल्या मंडळींची साथ यामुळे आज HCL ला केवळ एक कंपनी म्हणून नाही, तर ब्रँड म्हणून ओळखलं जातं.

    फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नादर हे भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती ३३.६ बिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. आशिया खंडात श्रीमंत व्यक्तींमध्ये नादर यांचा ९ वा, तर जागतिक स्तरावर ४५ वा क्रमांक लागतो म्हणूनच शिव नादर हे नाव आज केवळ भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातच नाही, तर जगभरात पसरलं आहे. तसेच त्यांच्या नेतृवाखाली HCL ने जगभरातील ४४ विविध देशांमध्ये विस्तार केला आहे. कैक वर्ष मेहनत केल्यानंतर काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र ते नेहमी म्हणतात की, “प्रत्येक माणसाने लक्ष ठरवण्यासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे, कारण स्वप्न  पाहिल्याशिवाय लक्ष ठरवता येत नाही आणि ज्याने लक्षच ठरवलेलं नाही, तो यश संपादन करू शकत नाही.” नादर हे अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर आता त्यांची मुलगी रोशनी नादर-मल्होत्रा कंपनीच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळते, तसेच शिव नादर हे आजही व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम कार्यरत आहेत. 

    शिव नादर यांनी लहानपणी हलाखीचे दिवस सोसले होते, घरची आर्थिक परिस्थिती काही खास चांगली नव्हती.  मात्र कधीही त्यांनी स्वतःच्या परिस्थितीला दोष दिला नाही, याउलट सतत मेहनत करत परिस्थितीवर मात करण्याची जिद्ध उराशी बाळगली. शिक्षण घेत असताना त्यांना अनेक  हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरीही खचून न जाता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपलं तरीही समोर उभी ठाकलेली आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नव्हती. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत इथवर आल्यांनतर, नोकरीमधून काहीशी रक्कम मिळायची. मात्र मिळणाऱ्या पैशांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेणं देखील सोपं नव्हतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याकाळात भारतात कम्प्युटर्स बद्दल अधिक माहिती उपलब्ध नव्हती,लोकांना माहिती नसलेल्या वस्तूची विक्री करणं आणि स्पर्धात्मक वातावरणात नवख्या माणसाने व्यवसाय सुरु करणं  ही वाटते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. 

    शिशिव नादर यांचे सामाजिक कार्य:

    अझीझ प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी यांच्यासोबत शिव नादर यांना आधुनिक भारतातील एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, कारण या दिग्गज उद्योगपतीने नेहमीच स्वतःजवळ असलेली धनाची पुंजी गरजू माणसांसाठी खुली केली आहे. विद्याज्ञान, शिव नादर युनिव्हर्सिटी, शिव नादरस्कुल, किरण नादर म्युझियम ऑफ आर्टस् अशा एक ना अनेक माध्यमांमधून त्यांनी समाजापर्यंत वेळोवेळी मदत पोहोचवली आणि म्हणूनच हुरून इंडिया फिलोनत्रोफीच्या (Hurun India Philanthropy List) यादीत शिव नाडर यांचं नाव पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी शिव नादर फाउंडेशनतर्फे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रांना आर्थिक मदत पोहोचवून महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. 

    आणखीन वाचा:

  • फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

    फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

    मारिया कुरियोकोस ही मुळची केरळच्या त्रिशुरची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती स्पेनला शिकायला गेली. 2017 मध्ये तिला नोकरी लागली; पण 2019 मध्ये तिने नोकरी सोडून दिली. तिला स्वतःच असं काहीतरी करायचं होत. थोडं संशोधन केल्यावर तिला समजलं, की लोकं नारळाच्या कवट्या फेकून देतात; पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनू शकतात. मग तिने नारळाच्या कवट्या Recycle करायला सुरुवात केली आणि त्यापासून सजावटीचे सामान बनवले.

    2019 मध्ये मारियाने Thenga Coco नावाने व्यवसाय सुरू केला. ती नारळाच्या कवट्या रिसायकल करून त्यापासून बाऊल, कँडल होल्डर तसेच प्लांट हँगर्स अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवते.

    सुरूवातीला तिने 150 किचन बाऊल बनवले. ते एका इव्हेंटमध्ये तसेच तिच्या मित्रपरिवाराला विकले. 60 रुपयाला एक बाऊल असा व्यवसाय तिने सुरुवातीला केला. त्यातून तिला 9000 रुपये मिळाले. मग तिने 1500 रुपयांची ड्रिलिंग मशीन घेतली. एकूण 4000 गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केल्याचं मारिया सांगते. आता तिच्याकडे महिला कामाला आहेत ज्या तिला हे प्रोडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविड-19 मध्ये तिने तिचा व्यवसाय ऑनलाईन नेला, तेव्हा तिच्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यांचे जास्त ग्राहक हे मुंबई, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरातून आहेत, जिथे लोकं इकोफ्रेंडली प्रोडक्ट्सबद्दल जास्त जागरूक आहेत.

    तसेच ती आता युरोप, अमेरिकेतसुध्दा आपले प्रोडक्ट्स निर्यात करते. तिला विदेशातूनदेखील अनेक ऑर्डर्स मिळतात.

    पहिल्या वर्षी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपये होता, तर दुसऱ्या वर्षी तो 50 लाख रुपये इतका झाला. मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा टर्नओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. 

    Thenga Coco : 

    Thenga Coco हा केरळमधील एक स्वदेशी ब्रँड आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होतो. या ब्रँडमध्ये कचरा मानला जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांवर पुनर्प्रक्रिया व त्याचे पुनरुत्पादन केले जाते. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. याशिवाय, कंपनी भविष्यात नारळाच्या कवट्यांपासून खेळणी आणि दागिने तयार करण्याचा विचार करत आहे, जे प्लास्टिकच्या खेळण्यांना सुरक्षित पर्याय ठरू शकतात. 

    थेंगा कोकोचे उत्पादन केवळ पर्यावरणपूरक नसून, हे महिलांना आर्थिक स्वावलंबनही प्रदान करते. कंपनीत 80% कर्मचारी महिला आहेत आणि त्यांच्या हातांनी ह्या वस्तू तयार केल्या जातात. ही उत्पादने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीत 18 कर्मचारी आहेत, त्यातील 12 महिला असून, त्यांना लवचिक कामाच्या वेळा दिल्या जातात जेणेकरून त्या घरगुती जबाबदाऱ्यांसह काम करू शकतील.

    आणखी वाचा :

  • Financial Planning | आजच करा आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद गुंतवणूक करुन

    Financial Planning | आजच करा आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद गुंतवणूक करुन

    प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं असतात. ती आज ना उद्या पूर्ण करायची त्यांची इच्छाही असते. स्वत:साठी, कुटुंबासाठी बचत करून त्या बचतीचा पुढे भविष्यात योग्य वापर त्यांनाही करायचा असतो आणि इथेच गुंतवणूक ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते.

    गुंतवणुकीचे चार मुख्य प्रकार आहेत जे गुंतवणूकदाराच्या गरजा किंवा उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विभागण्यात आले आहेत ते प्रकार खालीलप्रमाणे :

    • वाढ गुंतवणूक
    • बचावात्मक गुंतवणूक 
    • रोख गुंतवणूक
    • निश्चित व्याज गुंतवणूक

    १. वाढ गुंतवणूक

    वाढ गुंतवणूक ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे ज्यामध्ये वाढीच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूकदाराची संपत्ती किंवा भांडवल वाढविले जाते.  

    २. बचावात्मक गुंतवणूक 

    बचावात्मक गुंतवणूक ही एक अशी रणनीती आहे, जिथे तुम्ही शक्य तितकी कमी जोखीम घेता आणि अशी गुंतवणूक उत्पादनं निवडता. ज्यांचा मागील काही वर्षांचा परतावा चांगला आहे किंवा त्यात सातत्य दिसून येत आहे. सामान्यतः, यामध्ये बलाढ्य कंपन्यांचे स्टॉक यात समाविष्ट असतात, जे प्रत्येक वर्षी निश्चित लाभांश देतात. 

    ३. रोख गुंतवणूक 

    रोख गुंतवणूक म्हणजे अल्प-मुदतीची साधने किंवा बचत खात्यांमध्ये साधारणपणे ९० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक ज्यामध्ये सामान्यतः कमी व्याजदर असतो किंवा गुंतवणुकीच्या दुसऱ्या पद्धतीच्या तुलनेत तुलनेने कमी जोखीम दरासह परतावा असतो.

    ४. निश्चित व्याज गुंतवणूक : 

    ज्या गुंतवणूक पद्धतीमध्ये निश्चित व्याज परताव्याची हमी असते ती गुंतवणूक पद्धती निश्चित व्याज गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. विशिष्ट निश्चित उत्पन्नाच्या आधारे गुंतवणूकदाराला व्याज म्हणून परतावा दिला जातो.

     ही पोस्ट वाचा: कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता

    गुंतवणूकदार खालील माध्यमातून देखील गुंतवणूक करतात :  

    १) कंपन्याचे भाग भांडवल

    २) मुच्युअल फंडाचे किंवा युनिट ट्रस्टचे युनिट्स

    ३) बँकातील चालू वा बचत खाती किंवा मुदतीच्या ठेवी

    ४) पतपेढ्या, चिट फंड, क्रेडिट सोसायट्या यांतील ठेवी

    ५) भिशी योजना

    ६) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना

    ७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना

    ८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

    ९) प्रॉव्हिडंट फंड

    १०) वैयक्तिक विमा योजना

    ११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे

    गुंतवणूकीचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

    1. भविष्याची सुरक्षितता :

    गुंतवणूक केल्यामुळे भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते. वयाच्या वाढीसोबत किंवा निवृत्तीच्या वेळी एक नियमित उत्पन्न स्रोत यामुळे निर्माण होतो.

    2. आर्थिक स्वातंत्र्य :

    गुंतवणूक केल्यामुळे संबंधित व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते. गरजेप्रमाणे पैसे वापरण्याची मुभा मिळते आणि इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही.

    3. महागाईशी लढा :

    महागाई वाढत असताना, गुंतवणूक केलेले पैसे जास्त परतावा देऊन महागाईशी सामना करण्यासाठी मदत करतात.

    4. कर बचत :

    काही गुंतवणूक साधने कर सवलत देतात, ज्यामुळे आपण आपल्या उत्पन्नावरील कर कमी करू शकतो.

    5. धनवृद्धी :

    गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला पैसे अधिक वाढवता येतात, ज्यामुळे आपल्याला भविष्यात मोठ्या योजना आखता येतात.

    6. आपत्कालीन परिस्थितीत मदत :

    गुंतवणूक केल्याने त्या निधीचा वापर आपण आपत्कालीन परिस्थितीत करू शकतो, ज्यामुळे आपल्याला अनपेक्षित संकटांचा सामना करण्यात सोपे जाते.

  • यश तुमच्या हातात 

    यश तुमच्या हातात 

    अर्ल नाईटिंगेल यांच्या मते,

     “एखाद्या उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश होय”

     उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा याचा अर्थ – यशाच्या कोणत्याच टप्प्यावर आपण थांबून राहत नाही. म्हणजे हा एक न संपणारा प्रवास आहे, एक उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर पुढच्या उद्दिष्टाकडे चालायला लागणं. असं करत करत आपण निश्चित केलेल्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर पुढे पुढे चालत राहतो. यशप्राप्तीच्या या प्रवासात चालत राहणं फक्त खूप महत्वाचं आहे, कारण इथं थांबणाऱ्याचा अंत निश्चित आहे. 

    यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे गुण खालीलप्रमाणे आहेत :

    1. कर्तव्यनिष्ठा : 

    कोणतेही काम वेळेवर आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. ती सवय स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट फक्त करायची म्हणून करणं आणि ती जबाबदारी समजून करणं यात खूप फरक आहे. 

    यश मिळवायचं असेल तर आपली जबाबदारी तितक्याच जबाबदारपणे पार पाडणं आवश्यक असतं. प्रवासात अनेक अडचणीचे, अडथळ्याचे आणि कसोटीचे प्रसंग येतात पण तीच खरी परीक्षा असते त्यावर मात करण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची.

    2. कठोर परिश्रम : 

    मित्रांनो यश कोणालाही सहज मिळत नाही. त्यासाठी आवश्यक मेहनत घ्यावी लागते आणि त्यात सातत्य ठेवणे अपेक्षित असते.

    सर्वांनाच यशस्वी व्हावं असं वाटतं पण त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची वेळ देण्याची तयारी किती जणांची असते ? यशासाठी अपार त्यागाची आणि स्वयंशस्तीची गरज असते. कठोर परिश्रमाला दुसरा पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीतील परिपूर्णता ही काही नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि निरंतर सराव करावा लागतो. 

    3. सकारात्मक विचारसरणी :

     प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळवणं सोपं होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीकडे आपण जर नकारात्मक नजरेने बघितलं तर आपलं इच्छित कधीच साध्य होणार नाही.

    4. आत्मविश्वास : 

    स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे ही यशस्वी होण्याची अगदी प्राथमिक पायरी आहे. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही.

    5. धैर्य आणि चिकाटी : 

    अडथळ्यांना सामोरे जाताना कधीही हार न मानता पुढे जाणे आवश्यक आहे. यशप्राप्तीच्या वाटेत येणाऱ्या अडचणी, अडथळे आणि निरुत्साह यावर मात करत ध्येय गाठण्यासाठी सतत, कसून प्रयत्न करण्याची क्षमता म्हणजे चिकाटी. चिकाटी हे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची आणि तुमच्या प्रयत्नांवर अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे लक्षण आहे. हे लक्षण धैर्याने आत्मसात करून पुढं जाणं हाच काय तो यशाचा राजमार्ग.

    6. वेळेचे व्यवस्थापन : 

    वेळेचे योग्य नियोजन आणि त्या प्रमाणे काम करणे यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. कोणते वेळी आपल्याला काय करायचं हे ती गोष्ट करण्याच्या आधी आपल्या मनाला माहीत असलं पाहिजे. हे वेळेचं नियोजन अनेक अडचणी येण्याआधीच त्यांना दूर करतं.

    7. नवीन शिकण्याची इच्छा : 

    आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालण्याची इच्छा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आपली असली पाहिजे. दररोज स्वतःच्या ज्ञानात व्यक्तिमत्त्वात 1 % भर घालणं ही कायमची सवय आपण आत्मसात केली पाहिजे.

    8. चांगले संबंध : 

    लोकांशी चांगले संबंध ठेवणे, सहयोगी वृत्तीने काम करणे, सहकार्याची भावना ठेवणं  हेदेखील यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. एक चांगलं Network केवळ यशाच्याच नाही तर आयुष्याच्या प्रवासात कामाला येतं हे मात्र नक्की !

    9. इच्छाशक्ती :

    आपल्या मनात असलेलं कोणतही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आपलं अपेक्षित साध्य करण्याची प्रचंड तळमळ हीच आपल्याला यशाकडे नेणारे सर्वात प्रबळ प्रेरणा ठरते. ईच्छा असल्याशिवाय मार्ग कधीच सापडणार नाही. 

    हे गुण कौशल्य आत्मसात केल्यास यशाच्या मार्गावर निश्चितपणे यशस्वीपणे वाटचाल करता येईल.

    आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे हे लवकर ठरवलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट आपल्याला जितक्या लवकर सापडेल तेवढं जगणं अर्थपूर्ण ठरेल हे मात्र नक्की. आपल्याला का जगायचय याच ठोस कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. दररोज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माझ्या जीवनाच्या उद्दिष्टपूर्तीकडे योग्य दिशेने जात आहे का ? आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

    आणखी वाचा :

  • व्यवसायासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारखे धडे

    व्यवसायासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारखे धडे

    आज आपण या लेखात पाहूया की, भगवद्गीतेतील हे तत्त्वज्ञान आपल्याला व्यवसायाच्या यशासाठी कसे मार्गदर्शन करते.

    १) निष्काम कर्मयोग – कार्यावर लक्ष केंद्रित करा,

    भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक ४७ मध्ये भगवान  श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

    “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

    मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥”

    याचा अर्थ असा की, माणसाचा अधिकार फक्त कर्मावर असतो, फळावर नाही. आपण कर्म करताना फळाची अपेक्षा करू नये आणि फक्त आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे.

    व्यवसायाच्या संदर्भात, या श्लोकाचा असा अर्थ लागू होतो की उद्योजकाने नेहमी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं, नफ्यावर किंवा यशावर नाही. जर एखादा उद्योजक नेहमी फक्त परिणामांवरच लक्ष केंद्रित करतो, तर तो आपल्या कामातून आनंद घेण्यास अपयशी ठरतो. उलट, जर आपलं ध्येय, उद्दिष्ट आणि कार्यप्रणाली यावर लक्ष केंद्रित केलं, तर यश नक्कीच प्राप्त होईल.

    २)  त्याग आणि नेतृत्व

    भगवद्गीतेत त्याग आणि नेतृत्व ह्या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व दिलेलं आहे. गीतेच्या १८व्या अध्यायातील श्लोक ९ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

    “कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन।

    सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः॥”

    याचा अर्थ असा आहे की, जे कर्म फक्त कर्तव्य म्हणून केलं  जातं , ज्यात फळाची आसक्ती नसते, तोच सात्त्विक त्याग मानला जातो.

    उद्योजकतेतही, त्याग हा फार महत्त्वाचा घटक आहे. उद्योजकाने केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित न करता, कर्मचाऱ्यांचे कल्याण, सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी समान वेतन धोरण, सामाजिक जबाबदारी कार्यक्रम राबवले आहेत, कारण त्यांनी स्वतःच्या फायद्यापलीकडे पाहण्याची वृत्ती स्वीकारली आहे.

    जेव्हा उद्योजकात त्यागाची वृत्ती निर्माण होते, तेव्हा त्याच्या नेतृत्वगुणांची देखील आपोआप वाढ होते. त्यागाच्या शक्तीमुळे नेतृत्वकर्त्याला केवळ स्वतःच्या लाभाची नव्हे, तर इतरांच्या हिताची देखील जाणीव होते, ज्यामुळे तो अधिक प्रभावी आणि संवेदनशील लीडर होतो. 

    ३)  बदल स्वीकारणे 

    भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक १४ मध्ये, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

    “मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।

    आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥”

    या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, “हे कुंतीपुत्र, या जगात शीत-उष्णता, सुख-दुःख यासारख्या गोष्टी तात्पुरत्या आणि नाशिवंत आहेत. यांचा धैर्याने सामना करावा.”

    ही शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात तसेच व्यावसायिक क्षेत्रातही महत्त्वाची आहे. कोविड-१९ महामारीसारख्या अनपेक्षित संकटांमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या  व्यवस्थापनात अनेक बदल करावे लागले. व्यवसायात बदल अपरिहार्य असतात आणि त्यांना सामोरे जाणे आवश्यक असते. जो व्यवसाय या बदलांना स्वीकारतो आणि नवीन संधींचा शोध घेतो, तोच यशस्वी होतो.

    उद्योजकाने नेहमीच नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठा आणि बदलणाऱ्या ग्राहकांच्या गरजा यांना स्वीकारण्यासाठी सज्ज असले पाहिजे. जेव्हा आपण संकटांना धैर्याने तोंड देतो आणि त्यांच्यातून शिकतो, तेव्हा आपण यशस्वी होण्याची शक्यता वाढवतो.

    ४) भावनांवर नियंत्रण – शांत मनाने यशस्वी व्हा

    भगवद्गीतेच्या अध्याय ६, श्लोक ५ मध्ये श्रीकृष्ण सांगतात

    “उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।

    आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥”

    या श्लोकाचा अर्थ असा आहे की, व्यक्तीने स्वतःचा आत्मविकास साधावा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं, इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पाहणं आवश्यक आहे, कारण सुख-दुःखाची खरी मुळं आपल्या आतच असतात. 

    उद्योजकांसाठी हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक लोकांशी आणि परिस्थितींशी जुळवून घ्यावं लागतं. यशस्वी होण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. निर्णय घेताना शांत चित्त ठेवून प्रसंगानुरूप विचारपूर्वक पाऊल उचलणं उद्योजकाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतं .

    राग, चिंता, असुरक्षितता यासारख्या भावना उद्योजकाने आपल्यावर हावी होऊ देऊ नयेत, कारण अशा परिस्थितीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. शांत आणि संयमी मनाने विचार केल्यास योग्य दिशा ठरवता येते, ज्यामुळे यश प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते.

    ५) बुद्धीचा वापर 

    अध्याय ३, श्लोक ४३ मध्ये, श्रीकृष्ण सांगतात

    “एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।

    जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्॥”

    या श्लोकात सांगितलं हे की, आपल्या बुद्धीच्या साहाय्याने कामरूपी शत्रूचा पराभव करावा. व्यवसायात, इच्छांचा प्रभाव अनेक वेळा बुद्धीवर होतो. एक उद्योजक म्हणून आपल्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून बुद्धीने योग्य निर्णय घ्यावा लागतो. चुकीच्या लोकांना कामावर ठेवणं, चुकीच्या गुंतवणूकदारांची निवड करणं यांसारख्या गोष्टींमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून, इच्छांवर नियंत्रण ठेवून सत्य आणि योग्य गोष्टींची निवड करणं  आवश्यक आहे.

    ६) निर्णयांवर ठाम रहा – आपल्या कर्तव्याचे पालन करा

    अध्याय १८, श्लोक ४८ मध्ये श्रीकृष्ण सांगतात

    “सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।

    सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः॥”

    याचा अर्थ असा आहे की, आपले सहज कर्म, जरी त्यात काही दोष असले तरी, त्याला नाकारता येत नाही. याचा अर्थ, आपल्याला आपल्या कर्तव्याचे पालन करताना किंवा निर्णय घेताना जरी काही अडचणी आल्या  किंवा दोष काही असले तरी त्यांना थांबवू नये.

    उद्योजकतेमध्ये प्रत्येक निर्णयावर काही ना काही दोष किंवा असहमती असू शकते. परंतु, जर तो निर्णय कर्तव्य म्हणून घेतला असेल आणि योग्य हेतूने करण्यात आलेला असेल, तर त्यावर ठाम राहणं आवश्यक आहे. यशस्वी उद्योजक कधीच स्वतःच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करून काम सोडत नाहीत. उलट ते आपल्या निर्णयांवर ठाम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करतात.

    ७)  नैतिकता

    भगवद्गीतेच्या अध्याय १६, श्लोक ३ मध्ये श्रीकृष्ण सांगतात

    “तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।

    भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत॥”

    या श्लोकात ‘तेज’, ‘क्षमा’, ‘धैर्य’, ‘शुद्धता’, ‘कोणाबद्दलही शत्रुत्व न बाळगणे’ आणि ‘स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान न ठेवणे’ यांसारख्या गुणांची महत्ता सांगितली आहे. हे गुण प्रामाणिक आणि गुणी व्यक्तींची लक्षणे मानली जातात. 

    उद्योजकतेत नैतिकतेवर आधारित नेतृत्व असणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे कर्मचार्‍यांशी आदराने वागणं , सामाजिक जबाबदारीचे पालन करणं आणि कंपनीच्या सर्व निर्णयांमध्ये पारदर्शकता राखणं हेचं यश मिळवण्याचं  मुख्य द्योतक आहेत. \