Tag: business

  • ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती गॉर्डन मूर यांचा जन्मदिन.

    ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती गॉर्डन मूर यांचा जन्मदिन.

    जॅक किल्बीशिवाय इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) च्या शोधात महत्त्वाचं काम बजावणारा माणूस म्हणजे रॉबर्ट नॉइस (१९२७-१९९०). रॉबर्ट नॉइस फेयरचाईल्ड कंपनीत बऱ्यापैकी रुळला होता. तो कंपनी सोडेल हे कोणाच्याही डोक्यात आले नसते पण १९६८ ला त्याने गॉर्डन मूर सोबत एक अनपेक्षित खेळी खेळली. १९४७ च्या साली बेल लॅब्स मध्ये ट्रान्झिस्टर नावाच्या इलेक्ट्रॉनिक स्विचचा शोध लागला होता. या शोधाने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली होती. यामुळे संगणकाच्या आकारात आणि किंमतीत प्रचंड मोठा फरक पडणार होता.

    हे ‘भवितव्य’ ओळखल्याने हे ट्रान्झिस्टर्स वापरावेत म्हणून मूर आणि नॉइस यांनी ओरडून ओरडून फेयरचाईल्ड कंपनीला सांगितले होते पण कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या दोघांनी वैतागून ती कंपनीच सोडून दिली. स्वतःच्या खिशातून अडीच लाख डॉलर्स गुंतवून ऑर्थर रॉक नावाच्या प्रसिद्ध वित्तसहाय्यकाकडून ३ लाख डॉलर्स घेतले आणि नवी कंपनी सुरु केली.

    Gordon Moore and Robert Noyce at Intel in 1970

    गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉइस यांच्या नावावरून सुरुवातीला ‘मूर नॉइस’ ठेवण्याचा विचार होता.पण त्याचा उच्चार ‘मोअर नॉईज’ असा वाटेल अशी त्यांना भीती वाटली! मग त्यांनी वर्षभर ‘एनएम इलेक्ट्रॉनिक्स’ या नावानं त्यांची कंपनी चालवली. त्यानंतर त्यांनी तिचं नामकरण ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ असं करायचं ठरवलं. पण दुसऱ्या एका हॉटेलची साखळी चालवणाऱ्या कंपनीनं ते नाव आधीच घेतलं असल्यानं त्यांनी ते त्यांच्याकडून ‘विकत’ घेतलं आणि या लांब नावाचं छोटं स्वरूप (म्हणजे ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ ऐवजी ‘इंटेल’) घेऊन ते आपल्या कंपनीला द्यायचं ठरवलं. हीच आजची ‘इंटेल’ होय.इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ चे लघुरूप म्हणजे इंटेल. आपल्या आधीच्या फेअरचाइल्ड कंपनीशी स्पर्धा करून आयसी बनवण्याऐवजी त्यांनी संगणकात माहिती साठवण्यासाठी लागत असलेल्या मेमरी चिप्स बनवायचा घाट घातला. लवकरच त्यांनी यात छान यश संपादन केलं. अँडी ग्रोव्हही या दोघांना येऊन सामील झाला.

    खरं तर ज्या कंपनीत आधी हे दोघे काम करत होते त्या फेयर चाईल्ड कंपनीने ‘इंटिग्रेटेड सर्किट’वर बऱ्यापैकी संशोधन केले होते. त्यामुळे याची माहिती नव्याने कंपनी स्थापणाऱ्या मूर आणि नॉइस या दोघांनाही माहित होते. त्यामुळे त्या दोघांनी फेयरचाईल्ड कंपनीचे संशोधन चक्क ढापले आणि आयसीज वापरून कॉम्पुटरची मेमरी बनवण्यास सुरुवात केली. यावर फेयर चाईल्डचा चांगलाच जळफळाट झाला पण काहीच करू शकली नाही. त्याकाळी इंटेलने काढलेल्या ११०३ मॉडेलच्या मेमरी चिपमध्ये १०२४ बिट्स (म्हणजे १ केबी) इतकी माहिती साठवू शकता येई. इतकी माहितीही त्याकाळी ‘प्रचंड’ मानली जाई. इंटेलच्या इंजिनियर्सच्या मते त्या चिपची किंमत १० डॉलर्स इतकी योग्य होती,म्हणजे थोडक्यात १ बिटला एक सेंट अशी किंमत होती. पुढे मुरने आपला एक महत्वाचा सिद्धांत १९६५ सालच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मासिकात मांडला.

    Gorden Moor

    कॉम्प्युटरच्या वेगाच्या संर्दभात गॉर्डन मूरचा एक नियम सांगणे आवश्यक आहे. ‘दर अठरा महिन्यांनी आयसीजची आणि परिणामी कॉम्पुटर्सची क्षमता दुप्पट होत जाईल’ हे त्याचे भाकीत होते. एका स्क्वेअर इंचातील ट्रांझिस्टर्सची संख्या दर अठरा महिन्यांनी दुप्पट होते. मूरने १९६५ साली केलेले हे निरिक्षण मूर लॉ (Moore law) या नावाने प्रसिध्द आहे. याचा दुसरा अर्थ असा की, साधारणपणे दीड वर्षाने प्रोसेसरचा वेग दुप्पट होईल.आश्चर्य म्हणजे मूरचे सुमारे चाळीसवर्षांपूर्वी केलेले भाकीत खरे ठरले आहे. आज आपण २.४ गिगाहर्ट्झचे मायक्रोप्रोसेसर वापरतो. काही वर्षांपूर्वी आपण एक गिगाहर्ट्झ या वेगाचा मायक्रोप्रोसेसर वापरत होतो. तर त्याही आधी आपण पाचशे मेगाहर्ट्झचे प्रोसेसर वापरत होतो. आज हेच भाकीत प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

    सुरवातीला ही कंपनी कॅल्क्युलेटर्सना लागणाऱ्या मेमरी चिप्स बनवत असे. १९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. ठराविक कामे करण्यापेक्षा नवनवीन ‘प्रोग्रॅम लिहून’ या चीपकडून वेगवेगळी कामे करून घेता येतील अशी सोय यात होती. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं. तरीही पुढची अनेक वर्षे इंटेलचा प्रमुख व्यवसाय मेमरीच्या चिप्स बनवणं हाच होता. पण १९८० च्या दशकात जपानी कंपन्यांनी अतिशय स्वस्त दरात मेमरीच्या चिप्स विकायला सुरुवात केल्यावर इंटेलला काहीतरी वेगळं करणं भाग होतं. त्याच सुमाराला आयबीएमचा ‘पर्सनल कॉम्प्युटर (पीसी)’ जोर धरायला लागला होता. ऐंशीच्या दशकांत “पर्सनल कॉम्प्युटर” तयार झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा वापर वाढतच गेला. त्यामुळे आता मेमरीच्या चिप्सऐवजी मायक्रोप्रोसेसर वापरून संगणकाचा ‘सेंट्रल प्रॉसेसिंग युनिट (सीपीयू)’ नावाचा भाग बनवण्याकडे इंटेलनं मोहरा वळवला. यालाच आपण संगणकाचा मेंदू असंही म्हणतो. इंटेलची ही चाल कमालीची यशस्वी ठरली, आणि पुढची अनेक वर्षं इंटेलनं अक्षरश: दणाणून सोडली.

    Intel

    नव्वदच्या दशकांत ऍन्ड्य्रू ग्रोव्ह हा धडाडीचा ‘सीईओ’ कंपनीत जॉईन झाला. तेव्हापासून इंटेलची कॉम्प्युटरविश्वात जवळजवळ मक्तेदारीच तयार झाली. २८६, ३८६, ४८६ या चीप फारशा कुणाला माहीत नाहीत, कारण चिप्सच्या नंबरांमुळे होणाऱ्या कायद्याच्या कटकटी नकोत म्हणून इंटेलने त्यांचं नाव “पेंटियम” ठेवलं. हाच तो जगप्रसिद्ध पेंटियम मायक्रोप्रोसेसर. यामागची गंमतशीर कहाणी अशी की चिप्सना आकड्यांची (४००४, ८०८०, ८०२८६ वगैरे) नावं दिल्याने इंटेलला त्यावर पेटंट्स मिळेनात. कारण आकड्यांवर पेटंट्स मिळत नसतात. म्हणून ‘पेंटियम’ हे नाव निघालं. या चिप्सची ताकद बघा! १९९७ साली बाजारात आलेल्या ‘पेंटियम २’ मध्ये ७५००० ट्रान्झिस्टर्स एका चिपवर होते, आणि ही चिप दर सेकंदाला ४० कोटी आकडेमोडी करू शकत असे! हीच क्षमता आताच्या चिप्समध्ये कैकपटीनं वाढली आहे!

    ‘इंटेल इनसाइड’ या जाहिरात मोहिमेमुळे ‘पेंटियम’ हे नाव कोट्यवधी लोकांना माहीत झाले. त्यानंतर ‘पेंटियम ४’ श्रेणीवर आधारलेले कॉम्प्युटर्सही खूपच लोकप्रिय झाले. कॉम्प्युटरवर आधारित कामे जसजशी वाढत गेली. तसतशी त्याचा वेग वाढण्याची गरजही वाढतच गेलेली दिसते; पण एका कॉम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोप्रोसेसर लावणे किचकट आहे. आज आपण कम्प्युटर विकत घेतो तेव्हा ‘पी-फोर’वाला कम्प्युटर विकत घ्यायचा की पी-फाइव्ह की पी-सिक्स या प्रश्नांनी गांगरून जातो. ही सारी नावं या पेंटियम सीपीयूचीच असतात. पी-४ यातील पी म्हणजे पेंटियम. पण यातल्या ‘पी सिक्स’ सीपीयूची मूळ युक्ती ‘डिजिटल इक्विपमेंट कापोर्रेशन (डेक)’ नावाच्या कंपनीकडून इंटेलनं चोरली असल्याच्या आरोपांनी मोठं वादळचं उभं राहिलं. त्या भानगडीत ‘डिजिटल’नं इंटेलला न्यायालयात खेचून ६०,००,००,००० डॉलर्सची वसुलीही केली !

    WhatsApp Image 2023 12 30 at 4.11.25 PM

    पण पुढे एक आणखी गडबड झाली. व्हर्जिनियातील एका प्राध्यापकाने इंटेलला त्यांचा प्रोसेसर एक ठराविक आकडेमोड करताना चुकतोय हे दाखवून दिले, पण ही चूक २७००० वर्षांतून एकदाच होते असं इंटेलचे इंजिनियर पटवून देत होते तरी या प्रसंगाला वेगळेच वळण लागले. पेंटियमवर अनेक जोक्स येऊ लागले, लोक थट्टा करू लागले. त्यामुळे आयबीएमने पेंटियमवर आधारित पीसी बनवणे बंद केले. तेव्हा मात्र इंटेलने सपशेल शरणागती पत्करली. चिपमधील दोष काढून त्याजागी नव्या चिप्स बसवण्यात आल्या यात इंटेलला ४७.५ कोटी डॉलरचा फटका बसला.

    वाढत्या वेगाची गरज भागविण्यासाठी आता इंटेलने नवे ‘कोअर’ तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. कोअर तंत्रज्ञानामध्ये एक चीपच्या आतच माहितीवर प्रक्रिया करणारे दोन किंवा चार भाग असतात. यामुळे कॉम्प्युटरवर एकाच वेळी अनेक कामे वेगाने करणे शक्य होते. ऍपलच्या संगणकात इंटेलचे प्रोसेसर आधी वापरले जात नव्हते. हा इंटेलसाठी एक धब्बाच होता, पण २००५ साली स्टीव्ह जॉब्जने इंटेलच्या चिप्स बसवणे मान्य केल्याने आधीच दबदबा असलेल्या इंटेलचा मार्केटमधील धाक अजूनच वाढला. कॉम्प्युटर डेलचा असो, वा ऍपलचा… इंटेलच्या चिपशिवाय त्याचे पान हलत नाही.

    आणखी वाचा

  • कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?

    कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?

    म्युच्युअल फंडची गुंतवणूक दोन प्रकारात विभागली जाऊ शकते :

    इक्विटी म्युच्युअल फंड : हे फंड इक्विटी बाजारात गुंतवणूक करतात, म्हणजेच ते कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे, कारण ते इक्विटी बाजाराच्या दीर्घकालीन वाढीचा लाभ घेतात.

    डेट म्युच्युअल फंड : हे फंड डेट बाजारात गुंतवणूक करतात, म्हणजेच ते सरकार आणि कंपन्यांनी जारी केलेल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात. डेट म्युच्युअल फंड हे कमी जोखीम असलेले गुंतवणूक साधन आहे, कारण ते सरकार आणि कंपन्यांच्या सोयीस्कर पतप्रदर्शनाची हमी देतात.

    Advantages And Benefits of Mutual Funds in India

    म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की :

    विविधीकरण (Diversification) : म्युच्युअल फंडामध्ये विविध प्रकारच्या सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केली जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम कमी होते.

    प्रोफेशनल मॅनेजमेंट : म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन अनुभवी आणि तज्ज्ञ निधी व्यवस्थापकांद्वारे केले जाते.

    फ्लेक्सिबिलिटी : म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आणि गुंतवलेली रक्कम काढण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

    लिक्विडिटी : म्युच्युअल फंड हे लिक्विड गुंतवणूक साधन आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेची आवश्यकता असल्यास ती सहजपणे काढून घेऊ शकतात.

    म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक उद्दिष्टे, जोखीम सहनशीलता आणि गुंतवणूकीचा कालावधी विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच, गुंतवणूकदारांनी विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या मागील २-३ वर्षांच्या कामगिरीचा अभ्यास करणे आणि त्यांच्या गुंतवणूक उद्दिष्टांशी ते किती जुळते ते पहावे.

    म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड कंपनीकडे किंवा त्यांच्या वित्तीय सल्लागाराकडे खाते उघडण्याची आवश्यकता आहे. एकदा खाते उघडल्यानंतर, गुंतवणूकदार विशिष्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो.

  • जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

    जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

    1 डिफ्लेशन खालील कारणांमुळे होऊ शकते

    (I) पुरवठा वाढणे: जेव्हा वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ होते आणि मागणी स्थिर राहते, तेव्हा डिफ्लेशन होऊ शकते. हे उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा, नवीन बाजारपेठ उपलब्ध होणे किंवा इतर देशांकडून आयात वाढल्यामुळे होऊ शकते.

    (II) मागणी कमी होणे: जेव्हा लोक कमी खरेदी करतात, तेव्हा मागणी कमी होते आणि डिफ्लेशन होऊ शकते. हे बेरोजगारी वाढणे, वेतन कमी होणे किंवा लोकसंख्या घटल्यामुळे  होऊ शकते.

    (III) पैसे कमी होणे: जेव्हा अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा कमी होतो तेव्हा डिफ्लेशन होऊ शकते. हे बँकांचे वाढलेले कर्जदर किंवा सरकारच्या कर वाढवण्यामुळे होऊ शकते.

    2. डिफ्लेशन कसे मोजले जाते

    डिफ्लेशन अनेक आर्थिक मापदंड जसे की Consumer Price Index म्हणजेच CPI च्या आधारे मोजले जाते. CPI दर एका महिन्यांनी प्रकाशित केला जातो. यावरून ठरवले जाते की अर्थव्यवस्थेची अवस्था कशी आहे. 

    3. डिफ्लेशनचे खालील परिणाम होऊ शकतात:

    (I) खरेदीची क्षमता वाढणे: जेव्हा वस्तूंच्या किंमती कमी होतात, तेव्हा लोकांची खरेदीची क्षमता वाढते. त्यामुळे त्यांना अधिक वस्तू खरेदी करता येतात.

    (II) नफा आणि उत्पादन कमी होणे: डिफ्लेशनमुळे उत्पादकांचा नफा कमी होतो आणि त्यामुळे ते उत्पादन कमी करू शकतात. यामुळे बेरोजगारी वाढू शकते.

    (III) कर्जदारांना फायदा: डिफ्लेशनमुळे कर्जदारांना फायदा होतो, कारण त्यांना व्याजाची रक्कम कमी द्यावी लागते.

    (IV) उपभोक्ता खर्चात वाढ: डिफ्लेशनमुळे लोकांना वाटते की भविष्यात वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे ते उपभोग खर्च वाढवतात. 

    4. डिफ्लेशन कसे रोखायचे?

    सरकार डिफ्लेशन रोखण्यासाठी खालील उपाययोजना करू शकते:

    (I) पैशाचा पुरवठा वाढवणे: सरकार अर्थव्यवस्थेत पैशाची रक्कम वाढवू शकते. हे करण्यासाठी ते बँकाना कर्ज देणे वाढवू शकतात किंवा कर कमी करू शकतात.

    (II) सरकारी खर्च वाढवणे: सरकारी खर्च वाढवून अर्थव्यवस्थेत मागणी वाढवू शकते. हे करण्यासाठी ते infrastructure प्रकल्पांवर खर्च करू शकतात किंवा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम वाढवू शकतात.

    (III) व्याजदर कमी करणे: सरकार मध्यवर्ती बँकेला व्याजदर कमी करण्यास सांगू शकते. 

  • भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या कुटुंबात दत्तक गेलेले कै. नवल टाटा यांचे ते पुत्र. जे. आर. डी. टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा त्यांच्या समुहाचे प्रमुख बनले. 2002 पर्यंत त्यांनी टाटा सन्स या उद्योगसमुहाचे प्रमुखपद सांभाळताना समुहाच्या कक्षा विस्तारून त्या देशाबाहेरही पसरवल्या.

    ‘टेटली’, जग्वार लँड क्रूझर',कोरस’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या त्यांच्याच पुढाकारामुळे भारतीय मालकीच्या बनल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदावरून निवृत्ती स्वीकारली व सायरस मिस्त्री या 41 वर्षांच्या भाच्याकडे सूत्रं सोपवली.

    पण २०१६ मध्ये त्यांनी टाटा समूहात क्रांती घडवून आणली व मिस्त्रींना बाजूला करून ते पुन्हा समुहाचे अध्यक्ष बनले. त्यामुळे उद्योग जगतात निर्माण झालेली खळबळ अद्याप शमलेली नाही.

    dhirubhai-ambani-and-ratan-tata-birhday-special-indian-business-iconic-two-stars-of-indian-industry

    धीरूभाई मात्र केवळ स्वकष्टाने राखेतून निर्माण झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व होते. गरीब कुटुंबात जन्मलेले धीरूभाई एकेकाळी साड्या विकण्याचे काम करत. त्यातूनच ‘विमल’ हा घराघरात पोहोचलेला साड्यांचा ब्रँड तयार झाला.

    दूर एडनमध्ये एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या धीरूभाईंनी तेव्हा जगातील सर्वात मोठी पेट्रोकेमिकल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वकष्टाने ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कर्तृत्व दाखवले. बँका वा अन्य कंपन्यांकडून कर्जें घेऊन उद्योग उभारण्याऐवजी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांकडून छोट्या-मोठ्या ठेवी भाग भांडवल म्हणून गोळा करून त्यावर उद्योगांची मांडणी करण्याची अभूतपूर्व कल्पना धीरूभाईंनी राबवली व यशस्वीही केली.

    धीरूभाई व टाटा या दोघांच्याही भोवती वादाची वादळे घोंघावत राहिली. पण दोघानीही त्याची पर्वा न करता आपली वाटचाल चालूच ठेवली. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी उमटवलेला ठसा बराच काळ कायम राहील हे नक्की !

    Author : भारतकुमार राऊत

  • 12 गोष्टी ज्या तुमच्या स्टार्टअपसाठी ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात मदत करतील

    12 गोष्टी ज्या तुमच्या स्टार्टअपसाठी ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात मदत करतील

    तुम्ही नुकतीच सुरुवात करत असता, तेव्हा तुमची ब्रँड प्रतिष्ठा एक कोरी स्लेट असते. त्यामुळं तुम्ही त्याला योग्य दिशा देऊ शकता.

    1. तुम्हाला कशासाठी प्रसिद्ध व्हायचे आहे?

    तुम्ही तुमचा व्यवसाय कशासाठी उभा केला आहे? तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रँड तयार करायचा आहे? तुम्हाला आणि तुमच्या ब्रँड ची समाजामध्ये कशी ओळख निर्माण करायची आहे? याचा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्पष्ट असाल की लोकांनी तुम्हाला कसे पाहिले पाहिजे, तोच तुमच्या व्यवसायाचा चेहरा असेल.

    2. तुमची स्वतःची वेबसाइट तयार करा

    तुमच्या ग्राहकांना तुमची माहिती पाहिजे असल्यास तुमची वेबसाईट सर्वोत्तम मार्ग आहे. तुमची वेबसाईट सर्च इंजिनवर सर्वात पुढे असणे गरजेचे आहे. खराब ऑनलाइन रँकिंग तुमच्या ब्रँडला घातक ठरू शकते. नियमित पणे तुमची वेबसाईट अपडेट ठेवा. सर्च इंजिनच्या विविध टूल्स चा उपयोग करा.

    3. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा

    तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकत नाही, परंतु तुमच्या कंपनीचे नाव सर्व प्लॅटफॉर्मवर असले पाहिजे  आणि आवश्यक असल्यास संबंधित डोमेन खरेदी करणे ही नेहमीच चांगले ठरते. तुमचे पेज नेहमी अपडेट ठेवा आणि ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासोबतच ग्राहकांशी संवाद देखील साधा. यामुळे तुमची प्रतिष्ठा लगेच वाढेल असे नाही, तर तुमचे ग्राहक तुमच्या ब्रँडला कसा प्रतिसाद देतात यावर लक्ष ठेवण्यास हे खूप मदत करेल.

    4. ब्लॉगिंग

    ब्लॉगिंग हे तुमच्यासाठी तुमच्या व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणखी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. तुमच्या व्यवसायाबद्दल नवीन माहिती आणि अपडेट शेअर करण्यासाठी तुमचा ब्लॉग वापरा. तुमच्या वाचकांना कमेंट विभागाचा वापर करण्यास आणि त्यांच्याशी सक्रियपणे संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करा.

    5. प्रतिसाद देत रहा

    सोशल मीडियावर असो, ईमेलवर असो किंवा तुमच्या ब्लॉगवरील कमेंट विभाग असो, योग्य वेळी आणि आवर्जून प्रतिसाद द्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा वेबवर ग्राहकांशी संवाद साधणे हा ग्राहक सेवेचा आणखी एक उत्तम प्रकार आहे, वैयक्तिक स्तरावर तुमच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी हे माध्यम वापरा.

    6. रिव्ह्यू खरेदी करण्याचा मोह झाला?

    खरे सांगायचे तर, अगदी डोनाल्ड ट्रम्पचे ट्विटरवर लाखो बनावट फॉलोअर्स होते. परंतु फक्त प्रसिद्ध होण्याच्या हेतूने असे बनावट फॉलोअर्स बनवणे घटक ठरू शकते. याचा सकारत्मक पेक्षा नकारात्मक परिणाम जास्त पाहायला मिळतो.

    7. ब्रँडची प्रतिष्ठा नियंत्रित ठेवा

    तुम्हाला सकारात्मक रित्या सोशल मीडिया चालवू शकता, पण त्यामध्ये तुमच्या ब्रँडची प्रतिष्ठा लवकरात लवकर नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. नवीन व्यवसाय म्हणून, तुम्ही कोर्‍या स्लेटने सुरुवात करता. त्याचा फायदा घ्या आणि ब्रँड प्रतिष्ठा व्यवस्थापनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकडे लक्ष केंद्रित करा, जे तुम्हाला काही मोठ्या यशासाठी उपयोगी ठरेल.

    8. विश्वास निर्माण करा

    उत्कृष्ट ब्रँड यशस्वी होतात कारण ते गुणवत्ता देतात आणि ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात . तुम्ही वितरित करत असलेली गुणवत्ता, तुम्ही पाठवलेले संदेश आणि तुमची ग्राहक सेवा या सर्वांचा परिणाम तुमच्या ग्राहकांचा तुमच्यावर असलेल्या विश्वासावर होतो. तुमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पारदर्शकता. तुम्ही चूक केली असेल तरीही तुमचे ग्राहक तुमच्या प्रामाणिकपणा मुळे नेहमी तुमचा आदर करतील.

    9. प्रोएक्टिव्ह पीआरवर लक्ष केंद्रित करा

    जेव्हा तुम्हाला एखादी मोठी घोषणा करायची असेल तेव्हा फक्त प्रेस रिलीझ पाठवणे तितकेसे संयुक्तिक नाही. तुमच्याकडे शेअर करण्यासाठी कंपनीच्या बातम्या नसतील तरीही मोठ्या उद्योग संभाषणांमध्ये सामील व्हा आणि तुम्ही PR वाढवा. तुमच्या व्यवसायाला, तुमच्या कंपनीला सतत प्रकाशझोतात ठेवण्यासाठी PR हि सर्वोत्तम संधी आहे.

    10. तुमची SEO धोरण आणि SERP

    तुमच्या व्यवसायासाठी मजबूत ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात आणि कोणत्याही नकारात्मक परिणामांना दूर करण्यात SEO महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण ते तिथेच थांबत नाही. तुम्हाला तुमच्या SERP वर सतत काम करावे लागेल जेणेकरुन जेव्हा कोणी तुमच्या कंपनीचा शोध घेते तेव्हा त्यांना तुमची माहिती प्रथम सापडते.

    11. टीका कशी हाताळायची ते जाणून घ्या

    नकारात्मक टिप्पण्या किंवा ऑनलाइन टीकेपासून दूर जाऊ नका. नकारात्मक अभिप्राय तुमचा व्यवसाय मजबूत करायला मदत करून तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल. लोक तुमची ऑनलाइन निंदा करत असल्यास, त्यांना योग्य आणि त्वरीत तुमची बाजू सांगा. त्याकडे लक्ष न देणे हा चुकीचा संकेत आहे. जेव्हा तुम्ही  व्यावहारिक आणि तत्परतेने प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही समस्या सोडवत आहात आणि तुमच्या कंपनीला संभाव्य गोंधळापासून वाचवत आहातहे लक्षात ठेवा.

    12. हे कधीही संपणार नाही हे स्वीकारा

    तुमच्या ब्रॅण्डला मिळालेली प्रतिष्ठा सांभाळणे हे केवळ स्टार्टअपसाठी नाही तर कायम स्वरूपी आहे. तुमची आज एक उत्कृष्ट प्रतिष्ठा असेल, सर्च इंजिन परिणाम आणि अल्गोरिदम, ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांची मते सतत बदलत असतात. तुम्हाला तुमची सकारात्मक ब्रँड प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी नेहमी काम करत राहावे लागेल.

  • तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तरीसुद्धा, तुम्हाला जीवनात खरोखर काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ओळखणे आवश्यक आहे. यावरून तुम्ही कोणत्या मार्गावर जावे आणि कोणती पावले उचलावीत याचे स्पष्टीकरण मिळते.

    बिल गेट्स यश मिळवण्याचे रहस्य सांगतात कि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर काम करायला सुरवात करा. ते स्वतः वयाच्या १३व्या वर्षांपासून कॉम्पुटर क्षेत्रात काम करत आहेत आणि ते किती यशस्वी आणि प्रभावशाली झाले आहेत हे आपण पाहतच आहोत. Facebook चे CEO, मार्क झुकेरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी असताना त्यांची आताची अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी केली. आज फेसबुक हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. वय हा यशाचा निर्णयात्मक घटक नसला तरी आपण पुरेसे मोठे आणि स्थिर होण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

    जीवनात यश कसे मिळवायचे?

    पहिली पायरी: जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता ठेवा

    शीर्षक सगळं स्वतःच स्पष्ट करते. तुम्हाला जीवनात यश मिळवता येण्यासाठी, तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. स्वतःला विचारा, “मला खरोखर काय साध्य करायचे आहे?” तुम्हाला तुमच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी साध्य करायच्या असतील, प्रत्येक ध्येयाचा त्याच्या प्राधान्यानुसार क्रम लावा. त्यातील कोणते जवळचे आहे कोणते लांबीचे आहे हे ठरवा आणि त्यानुसार ध्येयात स्पष्टता आणा.

    दुसरी पायरी: प्रेरणा शोधा

    तुमचे ध्येय हे तुमच्यासाठी खरी प्रेरणा असले पाहिजे, काहीवेळा जेव्हा तुमचे उद्दिष्ट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो किंवा तुम्ही ठरवल्याप्रमाणे काही घडत नाही तेव्हा निराशा येते. अशा वेळी, स्वतःला हे स्मरण करून दिले पाहिजे कि आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचीय आहेत. त्यामुळे मागे हटण्यापेक्षा आपण काय चुकीचे करत आहोत याचे मूल्यांकन करणे आणि आपल्या चुका सुधारणे हे जास्त संयुक्तिक आहे.

    तिसरी पायरी: टाइमलाइन तयार करा

    वेळ कुणासाठीही थांबत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक टाइमलाइन असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही नियोजित वेळेत चालत राहता आणि सर्वात वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे पाहता. तुमचे ध्येय कालबद्ध असल्यास, ठरवलेल्या वेळेत ते साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नानांची पराकाष्टा करता.

    चौथी पायरी: तुम्ही काय करणार आहेत याची योजना बनवा

    हे तुमच्या कृतींशी संबंधित आहे. तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे? त्यासाठी आवश्यक उपाययोजना न करता नियोजन करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, योजना न करता गोष्टी करणे म्हणजे वेळ आणि पैसे व्यर्थ घालवणे. म्हणूनच, यश मिळविण्यासाठी नियोजनाप्रमाणे कृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाइमलाइन वापरून, तुमची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे योग्य नियोजन करा.

    पाचवी पायरी: एक आकस्मिक योजना तयार करा

    बदल हा सतत होत असतो. त्यामुळे अपरिहार्य आणि अचानक होणाऱ्या बदलांना सामोर जाण्यासाठी तयार राहा. त्यासाठी तुमच्या योजना आणि उद्दिष्टे लवचिक बनवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आकस्मिक योजना (प्लॅन B) असणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरुन गोष्टी नियोजनानुसार होत नसतील तर आपण मार्ग बदलू शकतो. बर्‍याचदा, या आकस्मित नियोजनामुळे आपल्याला खात्री मिळते की, आपले ध्येय साध्य करण्याचा अजून एक मार्ग आहे. यामुळे आपण पुढे होणारे  नुकसान कमी करु शकतो.

    सहावी पायरी: विश्वास ठेवा

    तुम्ही आधीच प्रत्येक पायरीचे काटेकोरपणे पालन केले आहे. आता पुढची पायरी म्हणजे नशीब तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवणे आणि सर्व काही तुमच्या नियोजनानुसार करत राहणे.

    सातवी पायरी: आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत चला

    आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत राहणे ही चांगली सवय आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समजाचे आपण देणे लागतो ही भावना नेहमी तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यास मदत करते आणि यामुळे तुमचे शत्रू देखील कमी होतात. लोकांकडून मिळालेल्या सद्भावना नेहमीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात.

  • स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

    स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

    व्यावसायिक जीवनशैलीतील जोखीम पूर्णपणे स्वीकारण्यासाठी तुम्हाला निश्चितता सोडावी लागेल. ही जीवनशैली रोलर-कोस्टर सारखी असेल. तार्किकदृष्ट्या, हे जाणून घेणे सोपे आहे. पण भावनिकदृष्ट्या पाहिल्यास, उद्योजकाच्या आयुष्यात खूप चढ-उतार येतात. तणाव, निराशा येते आणि प्रेरणा कमी होते आणि हे होणे अपरिहार्य आहे.

    म्हणूनच स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग खाली आहेत:

    1. सकाळचा नित्यक्रम नेटाने पाळा 

    सकाळची दिनचर्या सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक स्थिर आणि रोज नित्याने करता येण्याजोगी दिनचर्या असणे महत्त्वाचे आहे. ही दिनचर्या तुमचे मन केंद्रित करते आणि तुम्हाला तुमच्या दिवसासाठी आनंदी राहण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करू शकता आणि तुम्हाला हवे ते करू शकता. जेव्हा व्यवसाय स्वतःचा असतो तेव्हा कोणीही तुमचा बॉस नाही आणि कोणीही तुम्हाला काय करावे हे सांगत नाही. त्यामुळे दिवसाची सुरवात पूर्णक्षमतेने करणे हे उत्पादनक्षम ते पूर्णपणे गोंधळलेल्या दिवसांचे मिश्रण हाताळण्यास मदत करते. यामुळे तुम्ही स्वत:ला थोडी स्थिरता देऊ शकता. मनाच्या त्या शांत स्टेज वर पोहचण्यासाठी ध्यानाची गरज आहे.

    Habits For Successful Businessman

    2. उच्च कार्यक्षमता असलेल्या पुस्तकांसाठी वेळ काढा

    Habits For Successful Businessman

    3. तुमच्या आठवड्याचं कामकाज शेड्युल करा

    ऑफिस जॉब करता असताना आठवड्याचं कामकाज शेड्युल केलेलं असतं. कंपनीतील प्रत्येकजण एका किंवा दुसर्‍या मीटिंगसाठी तुमचा वेळ मागत असताना दिसतो. निरर्थक बैठका हे देखील काही लोकांचे नोकर्‍या सोडण्याचे कारण आहे. तुमची स्वतःची स्टार्टअप असल्यावर या निरर्थक मिटिंग संपून जातील. यामुळे कॅलेंडर कसे भरायचे हे तुमच्या हातात असेल. रविवारची संध्याकाळ हि तुमच्या आठवड्याच्या मिटिंग ठरवण्यासाठी असावी. आठवड्याभरात दररोज मोठ्या कामांचे  नियोजन करा. अशा प्रकारे काम केल्यास तुम्ही नेहमी जागरूक असता की तुम्ही कशावर काम केले पाहिजे आणि तुम्ही ट्रॅकवर रहता.

    Habits For Successful Businessman

    4. व्यायामशाळेत जा

    हा खरोखर एक अत्यंत असा योग्य सकाळच्या नित्यक्रमाचा भाग आहे आणि त्याचे फायदे भरपूर आहेत. व्यायामामुळे चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. तुमच्या व्यवसायातील निराशा दूर करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. तुम्ही दररोज व्यायाम केल्यावर तुमचे शरीर आणि मन अधिक आरामशीर होईल. जेव्हा उद्योजक होण्याच्या तणावाचा प्रश्न येतो तेव्हा व्यायाम हि एक गरज आहे. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता.

    Habits For Successful Businessman

    5. कृतज्ञ व्हा

    कृतज्ञता ही एक चांगली गोष्ट आहे. कृतज्ञतेची भावना हि नेहमी माणसाला नम्र ठेवते. तसेच व्यवसाय वाढत असताना होणाऱ्या वेदना, मनाची चलबिचल यावर आराम मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. कृतज्ञतेमुळे शंका आणि अनिश्चितता वेदनांमधून जात असताना किंवा काही चुकीचे होत आहे असे दिसते तेव्हा अनेक गोष्टीतून मार्ग निघतो.

    कृतज्ञता माणसाला प्रगतीच्या नव्या मार्गाला घेऊन जाते. कृतज्ञतेमुळे अनेक माणसे जोडली जातात. ज्याचा तुमच्या व्यवसायामध्ये खूप फायदा होतो. त्यामुळं मानसिक तणावापासून लांब राहून माणसं जोडण्यासाठी नेहमी कृतज्ञ असावं.

    Habits For Successful Businessman

    आणखी वाचा

  • 7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

    7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

    उद्योजक हे फक्त नाव एखाद्याला यशस्वी बनवते असे नाही, तर एखादी व्यक्ती त्याचा व्यवसाय कसा चालवतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. “उद्योजक” ही पदवी धारण केल्याने एखाद्याच्या खिशात डॉलरची भर पडत नाही. तुमच्याकडून जे आवश्यक आहे ते तुम्ही न केल्यास, तुम्ही व्यवसायाच्या जगात यशस्वी होणे जवळजवळ अशक्य होईल.

    1. कुटुंबातील अकुशल सदस्य किंवा मित्राला कामावर घेऊ नका

    “यशस्वी नोकरीचे रहस्य हे आहे: ज्या लोकांना जग बदलायचे आहे त्यांना शोधा.” – मार्क बेनिऑफ

    2. तुमच्या व्यवसायाकडे कधीही बँक म्हणून पाहू नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    यशस्वी उद्योजक ते आहेत जे त्यांच्या व्यवसायाला किंवा उपक्रमाकडे बँक म्हणून नव्हे तर समस्या सोडवण्याचे माध्यम म्हणून पाहतात. ते सहसा ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याच्या दृष्टीकोनातून एक किंवा दुसरी समस्या सोडवण्याच्या मार्गांचा विचार करतात. यातून पैसे कसा काढायचा याचा नाही. त्यामुळेच ते त्यांच्या कारकिर्दीची यशोगाथा बनवू शकतात.

    यशस्वी उद्योजक बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍या व्यक्तीने समस्या सोडवण्याचे एक माध्यम म्हणून व्यवसाय उपक्रमाकडे पाहणे आवश्यक आहे. ही मानसिकता उद्योजकाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणते.

    3. आवश्यक असेल तेव्हा प्रश्न विचारा

    Mistakes- avoid-in-startup-business

    जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा खांदे उचलण्याऐवजी किंवा असुरक्षितता दर्शविण्यास घाबरण्याऐवजी, यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणारा उद्योजक हा त्याच्या आधी घडलेल्या उद्योजकांना प्रश्न विचारतो. अर्थात, या लोकांनी भूतकाळात अशाच चुका केल्या असतात, धडा घेतलेला असतो आणि आता ते यातून पुढे आलेले असतात.

    कन्फ्यूशियसच्या मते, “ज्याने प्रश्न विचारला तो एक मिनिटासाठी मूर्ख आहे, जो माणूस विचारत नाही तो आयुष्यभरासाठी मूर्ख आहे.” प्रत्येक व्यवसाय मालकासाठी सुवर्ण नियम लक्षात ठेवा: “स्वतःला तुमच्या ग्राहकांच्या जागी ठेवा. तुम्ही ग्राहकांना खूप वेळ वाट पाहायला लावल्यास, त्यांना जवळचे स्टोअर सापडेलच. पण एकदा गेलेला ग्राहक पुन्हा येणार नाही.”

    4. तुम्ही जे देऊ शकत नाही, त्याचे वचन देऊ नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    जेव्हा ग्राहकांना कळते की तुम्ही विश्वासार्ह नाही, तेव्हा ते तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी परत येत नाहीत. ग्राहकांचा विश्वास हाच तुमच्या व्यवसायाचा पाया आहे. तुम्ही जर ग्राहकांना सांगितलेली एखादी गोष्ट पूर्ण करू शकला नाहीत, तर ते पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना पाहिजे ती वस्तू देण्यासाठी भरपूर व्यावसायिक आहेत. यामुळे ग्राहकाशी वचनबद्ध होताना तेच वचन द्या, जे तुम्ही पूर्ण करू शकाल.

    5. मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे:

    तुमच्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल लोकांना माहिती नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. प्रभावी मार्केटिंग योजनेचा विकास करा आणि तुमच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्केटिंग चॅनेल वापरा. मार्केटिंगवर पैसा खर्च करताना कंजूषपणा करू नका. उलट त्यातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून विक्री कशी वाढवता येईल याकडे लक्ष असू द्या..

    6. व्यवसायाच्या संधींसाठी बाजार संशोधन आणि शोध कधीही थांबवू नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    सततच्या जीवघेण्या स्पर्धेच्या तोंडावर, यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या उद्योजकाने कल्पना किंवा व्यवसायाच्या संधींसाठी बाजार संशोधन आणि शोध कधीही थांबवू नये. कारण ज्या क्षणी तो हे करायचा थांबतो, त्याची उत्पादने किंवा व्यवसाय करण्याची पद्धत ही जुनी फॅशन बनते. त्यामुळे सतत नवीन गोष्टींचा पाठपुरावा करत चला.

    आपल्या स्पर्धकांची उत्पादने आणि जाहिराती पाहून, एक व्यावसायिकाने आपण कोठे कमी पडतो हे पाहून त्या जागा भरल्या पाहिजेत. नवीन व्यवसाय कल्पना अंमलात आणणे किंवा सध्याच्या कल्पनांमध्ये सुधारणा करणे, हे आजच्या वेगवान व्यवसायाच्या वातावरणात उद्योजकांच्या यशासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

    7. तुमच्या व्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टी करणे टाळा

    mistakes-to-avoid-in-startup-

    एक उद्योजक ज्याला, त्याला काय हवं आहे हे माहित आहे, तो ध्येय साध्य करण्यासाठी उद्दिष्टांची मालिका सेट करतो. एकाच वेळी बर्‍याच गोष्टींमध्ये गुंतणे ही व्यावसायिक जगामधील एक त्रुटी आहे. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, व्यावसायिकाने तेच केले पाहिजे जे त्याच्यासाठी महत्वाचे आहे.

    त्याच्या व्यवसायाच्या अस्तित्वाच्या आणि विकासाच्या अनुषंगाने महत्वाच्या नसलेल्या गोष्टी त्याने करू नयेत म्हणून, त्याने त्याची उद्दिष्टे लिहून ठेवली पाहिजेत आणि त्याला प्रथम, द्वितीय, तृतीय, अशा कोणत्या क्रमाने काम करायचे आहे ते ठरवले पाहिजे. उद्योजक एलोन मस्क म्हणाले, “जेव्हा लोकांना लक्ष्य काय आहे आणि का हे माहित असते तेव्हा ते अधिक चांगले कार्य करतात.” जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर फक्त वरील सूचनांचे पालन करा.

    आणखी वाचा

  • तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

    तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

    We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवतो, त्यापैकी सरासरी पाच लोकांप्रमाणेच आपणही बनतो.

    power of surrounding positive people

    साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली. तो कुंभार म्हणाला, “महाराज, तुम्हाला हवं असेल, तर चांगलं मडकं घेऊन जा. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?” ते म्हणाले, “देणार असशील तर हेच दे. नाहीतर चाललो मी!” नाईलाजास्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं. त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासाने, संत समागमाने देवकार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायचे तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं.

    आर्थिक परिस्थिती, काही गोष्टीत कमीपणा, संधीचा अभाव जरी असला तरी तुमच्याकडे जे कौशल्य असेल, त्यानुसार मिळेल ती संधी घेऊन चांगल्या लोकांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न करा. जसे परिसाला लोखंड लागले, की त्याचे सोने होते. तसेच तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण किंवा अवगुण तुमच्यात उतरत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.

    संगतीचा परिणाम एकदम थोडक्यात सांगायचा म्हणजे;

    जर तुम्ही ५ हुशार लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे हुशार तुम्ही असाल…

    जर तुम्ही ५ यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल…

    जर तुम्ही ५ करोडपती लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे करोडपती तुम्ही असाल…

    आणि जर तुम्ही ५ टवाळ लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे टवाळखोर तुम्ही असाल…

    आणखी वाचा

  • कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे बुध्दी चालायची बंद होते. सगळे लोक पैसे मागत असतात व तुम्हाला मालक असूनही तोंड चुकवून पळावे लागते. कर्मचाऱ्यांना पगार वेळेत न दिल्याने कंपनी बुडणार आहे, अशा अफवा पसरतात, कंपनीचे एकूण वातावरण खूप वाईट होते व बरेच चांगले कर्मचारी नोकरी सोडून जातात. चेक बाऊन्स झाल्याने बिझनेस मार्केटमधून उठला, असा समज होतो.

    १. विक्रेत्यांशी चर्चा करा

    तुमच्याकडे किती पैसे आणि कधी येणार आहेत यावर कदाचित तुमचे नियंत्रण नसेल, परंतु तुमच्याकडून जाणाऱ्या पैशांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता. विक्रेत्यांना/पुरवठादारांना काही कालावधीसाठी थांबवता येईल का ते बघा किंवा एकदम सर्व पैसे देण्याऐवजी टप्प्याटप्याने पैसे देणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. बरेच व्यावसायिक आपल्या विक्रेत्यांशी बोलायला कचरतात. त्यांना वाटते की, आपली ‘इज्जत’ कमी होईल किंवा समोरची व्यक्ती कमी पैसे घ्यायला तयारच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. विक्रेते/पुरवठादार सुद्धा तुमच्यासारखेच व्यावसायिक असतात. त्यांनीसुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलेला असतो. त्यामुळे ते तुमची अडचण समजू शकतात.

    तसेच त्यांनासुद्धा आपला ग्राहक (तुम्ही) टिकवायचा असतो. जर तुमच्यासोबतचा त्यांचा अनुभव चांगला असेल तर ते नक्कीच तुमची मदत करतील. जेणेकरून दोघांचा फायदा होईल. त्यामुळे किती पैसे येणार आहेत याचा अंदाज घ्या. एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत? त्यात कुणाला तातडीने द्यावे लागतील? कुणाला काही कालवधीसाठी थांबवू शकतो? त्यांना फोन करा, चर्चा करा. आणि त्यानुसार नियोजन करा.

    २. अनावश्यक खर्च लांबणीवर टाका

    ‘कडकी’ चालू असताना आपला खर्च कुठे होतोय याचा बारीक विचार करा. त्यातील काही खर्च लांबणीवर टाकता येतात का किंवा पूर्णपणे काढून टाकता येतात का ते पाहा. तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही मालाचा आठवड्याला/महिन्याला जो स्टॉक भरून ठेवता तो कमी भरणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. जेवढा खर्च कमी कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याजवळ खर्चासाठी उपलब्ध होतील.

    ३. निरुपयोगी गोष्टी विकून टाका

    समजा एखादे नवीन उत्पादन करण्यासाठी एखादी मशीन दोन वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतली होती. पण तुमचे नियोजन फसले. ती मशीन तुमच्या कार्यालयात तशीच पडून आहे. ती विकू शकता का? कदाचित तुमच्याबाबतीत मशीन नसेल, एखादा कंप्यूटर, गाडी किंवा इतर काहीही असू शकते. जे तुम्ही विकू शकता. अशा गोष्टींचा अंदाज घ्या. त्यांची किंमत ठरवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रीस ठेवा. विकताना जास्त आढेवेढे न घेता व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच पैसा उपलब्ध होईल. 

    ४. पेमेंटवर सूट द्या.

    आपल्याच पैशांसाठी वाट बघत बसणं जिकिरीचं असतं. अशावेळी तुमच्या सर्व ग्राहकांशी संपर्क साधा आणि पेमेंट बाबत विचारा. काहींची मुदत संपायला (नूतनीकरण) अजून वेळ असेल. अशा लोकांना थोडीफार सूट (विशेष लाभ) देऊ शकता. त्यांना परिस्थितीची कल्पना द्या. ‘जर तुम्ही मुदतपूर्तीच्या आधी पेमेंट केलं, तर तुम्हाला सूट मिळेल’ असं सांगून बघा. अर्थात, सूट देताना कमीत कमी द्या. मुख्य उद्दिष्ट आपल्याला लागणारे पैसे उभे करणं हे असावं. अशाच प्रकारे सर्व ग्राहकांशी बोलून घ्या. कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारे परिणाम मिळतील आणि तुमची पैशांची चिंता मिटेल.

    ५. फ्लॅश सेल सुरु करा

    तुमच्याकडे तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस असेलच. त्यांचे फोन नंबर, ईमेल आयडी असतील. कदाचित त्या ग्राहकांनी कोणत्या वस्तू किंवा सेवा आधी वापरल्या आहेत याची सुद्धा माहिती असेल. याच ग्राहकांसाठी तुमच्या सर्वात लोकप्रिय वस्तू/सेवांवर एखादी ऑफर सुरु करा. किंमत आकर्षक ठेवा. फक्त डिस्काउंट देऊ नका. ऑफर अशी असली पाहिजे की, लोकांचं लक्ष आकर्षून घेईल आणि त्यांना खरेदी करायला भाग पाडेल.

    तसेच ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच ठेवा, कदाचित ४८ तास किंवा पुढील ५ दिवस. त्यानंतर ही ऑफर कधीच असणार नाही असं सांगा. ही माहिती देणारा संदेश तुमच्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना बल्क ईमेल/मेसेज करा. फक्त एकच ईमेल पाठवून थांबू नका. अनेक लोक रोज ईमेल बघत नाहीत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे ईमेल/मेसेज पाठवून वेळ संपत चालल्याची आठवण करून दिली पाहिजे. तुमची सेल्स आणि मार्केटिंग टीम सुद्धा व्यक्तिशः फोन करून जास्तीत जास्त बिझनेस मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.  

    ६. वस्तू/सेवांच्या किंमतीवर पुनर्विचार करा

    किंमत वाढवणे हा सुद्धा व्यवसायाचा एक भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तेव्हा या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. अर्थात वस्तूंचे/सेवांचे दर वाढवण्याआधी पूर्ण विचार करा. तुमचा एकूण खर्च किती आहे? त्याबदल्यात तुम्ही किती रक्कम आकारत आहात? तुम्ही दर वाढवून बराच कालावधी झाला आहे का? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता तुमचे दर कसे आहेत? दर वाढवणे हा कॅश क्रंच मधून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. परंतु, नियोजनबद्धपणे वाढवले पाहिजेत. नाहीतर हा पर्याय अंगलट आला तर, आहेत ते ग्राहक सुद्धा तुम्हाला सोडून जातील.    

    ७. कर्मचारी कमी करा, पगार लांबवा

    हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. कनिष्ठ/नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेनं वरिष्ठ/जुने कर्मचारी कंपनीची परिस्थिती समजून घेऊ शकतात. पुढे अडचण येणार आहे, असे लक्षात येताच आपल्या मुख्य सहकाऱ्यांशी चर्चा करा. यातून बाहेर पडण्यासाठी वर दिलेले पर्याय वापरून काय करता येईल याची योजना बनवा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सहकार्य मागा.

    शेवटी, एवढं सगळं करूनही समस्या सुटली नाही, तर सर्वांचे पगार करण्याइतपत पैसे कंपनीजवळ नसतील. त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत पगार मिळू शकणार नाही, असे सांगा. अर्थात कुठल्याही कर्मचाऱ्याला हे आवडणार नाही. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमची साथ देऊ शकतात. अगदीच गरज पडली तर काही कर्मचारी कामावरून कमी करा.