Blog

  • वाचाल तर वाचाल

    वाचाल तर वाचाल

    खरंच! वाचाल तर वाचाल

    जगात मानवी वाटचालीचा विचार केला, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे मूल्यमापन करताना विविध ऐतिहासिक प्रसंगांचे स्मरण करून दिले जाते. त्यात औद्योगिक क्रांती आहे,  विविध वैज्ञानिक शोधांचा समावेश असतो, तसेच वैचारिक उत्थानाचेही दाखले दिले जातात. पण मानवी विकासामध्ये किंवा प्रगतीमध्ये सर्वात मोठे योगदान कोणाचे असेल, तर ते छपाई तंत्रज्ञानाचे आहे, हे सत्य आजही नाकारता येणार नाही. जोपर्यंत कागद आणि छपाईचा शोध लागला नव्हता, तेव्हापर्यंतचे जग आणि त्यानंतरचे जग यात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसून येईल. त्या एका शोधाने मानवी जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणलेले आहे. कारण छापलेली अक्षरे, शब्द वा वाक्यांसह पुस्तके, ग्रंथ सामान्य लोकांना उपलब्ध होत गेले. त्यातून आधी वाचनाला चालना मिळाली व आपोआप लिखाणाला प्रेरणा मिळत गेली. वाचनाने अनेकांचं जीवन समृद्ध झालं असे कित्येकजण आजही मान्य करतात. कितीतरी थोर व्यक्तींचा दिवस काहीतरी वाचल्याशिवाय सुरू होत नाही आणि वाचन केल्याशिवाय संपतदेखील नाही. ज्ञान मिळविण्याची किंवा करमणुकीची इतर साधने जेव्हा नव्हती तेव्हा वाचन हाच एकमेव आधार होता. सुशिक्षित वाचनप्रिय समाज वर्तमानपत्रे, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, धार्मिक ग्रंथ इ. चा वाचक बनला. ह्या वाचनामुळेच लोकांची बुद्धी, विचार, मार्गदर्शन प्रसंन्न व प्रगल्भ होत गेले. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देते.

    image 17

    नियमित वाचनाचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे सांगता येतील : 

    1. शब्दसंग्रह वाढतो 

    2. स्मरणशक्ती सुधारते 

    3. लेखन कौशल्य प्राप्त होते. 

    4. एकाग्रता 

    5. मेंदूला चालना मिळते 

    6. सामान्य ज्ञान वाढते 

    7. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता तेथील परिस्थिती, संस्कृतीचा अभ्यास करता येतो. 

    ‘मॅझिनी’चे चरित्र वाचून स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्तीच्या प्रेरणेने प्रेरित झाले. अनेक थोर व्यक्ती ग्रंथवाचनाच्या आवडीमुळे महान झाल्या. वाचनाचा नुसता छंद नव्हे तर वाचनाचे वेड असणारेही बरेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हैद्राबाद श्यामराव बहादूर यांचे ग्रंथप्रेम अतुलनीय आहे. नुसत्या अक्षरांनी, शब्दांनी व पुस्तकांनी जग किती आरपार बदलून टाकलेले आहे. असे असले तरी आजच्या काळात परिस्थिती बदलत चालली आहे. 

    “जिथे नाही पुस्तकांचे कपाट ते घर होईल भुई सपाट” असे म्हटले जाते, ही बाब  सध्या खरी ठरू लागली आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला असून लहान बालकांपासून ते थोरांपर्यंत पुस्तके वाचनाचे प्रमाण घटले असल्याचे चित्र दिसते, याला कारण म्हणजे सध्या इंटरनेट मोबाईलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे, त्यामुळे “वाचाल तर वाचाल” असे म्हणण्याची ही वेळ आहे असं म्हटलं, तर ते नक्कीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आज इंटरनेट वर पाहिजे असणारी 

    आणखी वाचा :

  • अनिल अंबानी यांच्यावर SEBI चा 5 वर्षांचा प्रतिबंध

    अनिल अंबानी यांच्यावर SEBI चा 5 वर्षांचा प्रतिबंध

    अनिल अंबानीवर बॅन का?

    Anil Ambani SEBI

    निवेशकांचं मोठं नुकसान

    रिलायंस होम फायनान्सने नियमांचे उल्लंघन करून कर्ज वितरण केले. त्यामुळे अनेक उधारकर्ते कर्ज फेडण्यात अपयशी ठरले आणि कंपनीने आपली देयकं चुकवली. RBIच्या नियमांनुसार कंपनीला रिसॉल्यूशन प्रोसेसमधून जावे लागले आणि शेअरहोल्डरांना यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. मार्च 2018 मध्ये रिलायंस होम फायनान्सच्या शेअरचं मूल्य 60 रुपये होतं, तर मार्च 2020 पर्यंत धोखाधडीची माहिती समोर येताच कंपनीच्या शेअरचा मूल्य घटून 0.75 रुपये झाला. सध्या, नऊ लाखांपेक्षा जास्त लोकांनी रिलायंस होम फाइनेंसमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    आणखी वाचा

  • केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील” एकमेव गृहउद्योग… उलाढाल १६०० कोटी

    केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील” एकमेव गृहउद्योग… उलाढाल १६०० कोटी

    साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की वेळही निघून जाईल आणि घरखर्चाला हातभार देखील लागेल. कल्पना सुचली आणि तीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या-बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरु करता येईल. उद्योग तर सुरु करायचा पण, त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

    शेवटी त्या मदतीसाठी ‘सर्वंटस ऑफ इंडिया’ सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या. पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ८० रुपये उसने दिले. या पासून त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीकडून जुनी पापड बनवायची मशीन व काही साहित्य खरीदी केले. 

    यापासूनच १५ मार्च १९५९ रोजी सुरु झाला पापड बेलण्याचा उद्योग, जो पुढे चालून ‘लिज्जत पापड’ म्हणून प्रसिद्धीस पावला. आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या ७ महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले. ते फक्त ४ पॅकेट होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृहउद्योगात सामील होऊ लागल्या. तीन महिन्यातच ७ वरून कामगारांची संख्या २५ पर्यंत गेली. तुटलेले पापड या महिला शेजाऱ्यांना मोफत वाटप करत, त्यामुळे शेजारीही सहकार्य करत. 

    image 18

    पाहता-पाहता वर्ष सरलं. पहिल्या वर्षांअंती त्यांची उलाढाल होती ६१९६ रुपये. या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या. काम जोरात सुरु होतं.

    पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना काम बंद ठेवावं लागत असे, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवीत असत. त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती. 

    दुसऱ्या वर्षी त्यांच्या सोबत १०० ते १५० महिला जुळाल्या आणि तिसऱ्या वर्षी हा आकडा ३०० पर्यंत पोहचला होता. जागा कमी पडू लागली. घरी बसायला देखील जागा नसे. त्यानंतर त्यांनी सहकारी महिलांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या पापडाचे वजन मोजून त्यांना पैसे देण्यात येत होते. आज आपण ज्याला ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणतो, म्हणजे घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती.

    lijjat papads success story

    गटाला नेमकं नांव काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढविण्यात आली. महिला गटाचं नांव सुचविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं ‘लिज्जत’ हे नाव गटाला देण्याचं ठरविण्यात आलं. 

    ‘लिज्जत’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘चवदार किंवा स्वादिष्ट’ असा. विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपयांचं बक्षिस देखील देण्यात आलं. जुलै १९६६ मध्ये  ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलं. पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती. उद्योग भरभराटीस यायला लागला होता. यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात ८ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला. 

    लिज्जतची गाडी वेगाने चालत होती, ती धावायला लागली. ८० च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरांमधल्या किचनमध्ये ‘लिज्जत’ हे न टाळता येण्यासारखं नाव झालं. लिज्जतने ९० च्या दशकात विदेशातही व्यवसाय विस्तारला आणि हि घोडदौड अजूनही सुरु आहे.

    3b7e3667e492ec5d974a1a9c9565c5be

    आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. सात मैत्रिणींनी एकत्र येत लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे. आज 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती करतात. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची पापड आणि इतर उत्पादने निर्यात होतात. २००२ मध्ये लिज्जतचा निव्वळ फायदा वार्षिक १० करोड रुपये होता. २००२ साली त्यांना Economics Times तर्फे बिझनेस वूमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला. 

    Screenshot 2024 08 25 131804

    आज लिज्जतमध्ये काम करणाऱ्या अधिकतम महिला गरजू, निरक्षर आहेत. इथे सर्व महिला एकमेकांना बेहन (बेन) या नावाने संबोधतात. आता लिज्जत पापडा सोबतच अप्पालम, मसाला, गव्हाचे पीठ, चपाती, कपड्याची साबण, लिक्विड डिटर्जेंट इत्यादी उत्पादनेदेखील तयार करते.

  • अंतः अस्ति प्रारंभः

    अंतः अस्ति प्रारंभः

    या विचाराचा अर्थ असादेखील होतो की जीवनातील प्रत्येक घटनेचा एक प्रवास असतो – एक सुरूवात, एक मध्यवर्ती काळ आणि एक शेवट. परंतु हा शेवट म्हणजे अंतिम नाही, अंत नाही. तर तो एका नवीन प्रवासाचा प्रारंभ असतो. प्रत्येक संकट, आव्हान, किंवा पराभव यामध्येही नवीन काहीतरी शिकण्याची आणि अनुभवांची सुरुवात असू शकते.

    image 10

    आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जीवनातील अपयशाच्या क्षणांना “अंत” म्हणून पाहणे हा मर्यादित दृष्टिकोन असू शकतो. यामुळेच “अंतः अस्ति प्रारंभः” हा विचार आपल्याला नेहमीच पुढे पाहण्याची प्रेरणा देतो. आपण कोणत्याही स्थितीला अंत म्हणून पाहू नये, तर त्या क्षणाचे एक नवे पाऊल म्हणून स्वागत करावे.

    या विचारामध्ये एक पारदर्शकता आहे. जी आपल्याला शिकवते की, प्रत्येक घटना, अनुभव आणि घडामोडी जीवनाच्या एका मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत. आयुष्य म्हणजेच सतत चालणारी एक यात्रा आहे, ज्यात प्रत्येक अंत आणि प्रारंभ ह्या एका साखळीतील दोन वेगवेगळ्या कड्या आहेत. शेवट हीच सुरुवात या विचारधारेचं अजून एक महत्वाचं अंग म्हणजे परिवर्तन आणि पुनर्जन्म. जीवनातल्या एखाद्या घटनेचा शेवट म्हणजे संपणं नाही, तर त्यातून काहीतरी नवीन उगम पावण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, एखादी नोकरी, नातं किंवा जीवनातील एखादा टप्पा संपतो तेव्हा सुरुवातीला खूप दु:ख होतं, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव येतात.

    या विचारधारेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारू शकतो. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांच्याशी अधिक आत्मविश्वासाने सामना करता येतो.

    शेवटी, अंतः अस्ति प्रारंभ: हाच विचार आपल्याला आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगायला शिकवतो. त्यामुळे, कोणत्याही घटनेच्या किंवा स्थितीच्या अंताचा विचार करताना, त्यातून काय नवीन सुरू होऊ शकते, याचा विचार करावा आणि नव्या अध्यायाचं शांत मनाने आणि जोमाने स्वागत करावे. पडणं हे कधीच अपयश नसतं, तर खरं अपयश हे पडून राहण्यात असतं.

    शेवट हीच सुरुवात:

    जेव्हा सगळं संपलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा ती खरी सकारात्मक विचार करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ असते. या विचारधारेला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारलं पाहीजे. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडविण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांचा अधिक आत्मविश्वासाने आणि निडरपणे सामना करता येईल.  

    image 12

    नव्याने सुरुवात करा: 

    जीवनात कसेही प्रसंग आले, काहीही घडलं, सगळं संपलं असं वाटू लागलं की, स्वत:च्या मनाला सांगायचं की इथून होय इथूनच मला परत माझी नवीन सुरुवात करायची आहे. झालेल्या चुका लक्षात ठेऊन त्यात इष्ट बदल करून मला पुन्हा अचूकतेकडे नव्याने धावायचं आहे. उशिरा का होईना केलेली सुरुवात ही कधीच न केलेल्या सुरुवातीपेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. त्यामुळं सुरुवात करायला कधीही घाबरू नका.  सगळं संपलं तरी त्यात आशेचा नवा किरण शोधा. तोच किरण तुमच्या जीवनात यशाचा प्रकाश घेऊन येईल. पुन्हा सुरुवात केल्याने व्यक्तीला आशा आणि प्रेरणा मिळते. 

    1. स्वत:वर विश्वास

    2. सकारात्मकता 

    3. ध्येय ठरविणे 

    4. आवश्यक तयारी 

    5. To Do List

    6. कामाचं विश्लेषण 

    7. प्रत्यक्ष कृती  

  • कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:

    कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:

    सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा…

    हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा यांच्या यशाची कहाणी या ओळींचा उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वेळा अपयश पचवून त्यांच्या इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने सोशल मीडिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आहे.

     प्रारंभिक जीवन आणि शिक्षण 

    अंकुश सचदेवांचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्याची आई सरकारी रुग्णालयात काम करत होती आणि वडील व्यापारी होते. त्यांनी आपली प्रारंभिक शिक्षण आग्रा येथील स्थानिक शाळेत घेतले. लहानपणीच त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची आवड होती. त्यांनी उच्च शिक्षणासाठी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. आयआयटी कानपूरमधील शिक्षणाने त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची गोडी लावली. आयआयटीमधील शिक्षणानंतर अंकुशने त्यांच्या करियरची सुरुवात करण्यासाठी आपली कल्पकता आणि मेहनत एकत्र केली.

    करियरची सुरुवात आणि अडथळे 

    आयआयटी कानपूरमधून संगणक विज्ञानात (computer science) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर, आणि तब्बल 17 वेळा वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये अपयशी झाल्यानंतर अंकुशने आपल्या दोन मित्रांसह, भानु प्रताप सिंह आणि फरिद अहसान यांच्या सहकार्याने 2015 साली ShareChat ची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केले. Sharechat स्थापन तर झाले. मात्र हा प्रवास सोपा अजिबात नव्हता. समोर अनेक आव्हानं होती. अडचणी होत्या. ज्यात आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि विविध इतर आव्हानं समाविष्ट होती. तसेच सुरवातीला वापरकर्त्यांचा प्रतिसाद मिळवणे हे सर्व खूप आव्हानात्मक होते. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या मेहनत, समर्पण आणि दृढ संकल्पामुळे त्यांनी शेअरचॅटच्या यशाचा मार्ग तयार केला.

    ShareChat चा उद्देश भारतीय भाषांमध्ये वापरकर्त्यांना एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदान करणे होता, जो त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करतो. या प्लॅटफॉर्ममुळे भारतीय भाषांना एक नवा आयाम मिळाला आणि विविध भाषिक समुदायांना एकत्र येण्याचे साधन मिळाले. त्यांनी हे व्यासपीठ एकूण १५ भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले. ज्यात मराठी, गुजराथी, हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू, तामिळ, ओरिया, कन्नड, आसामी, हरियानवी, राजस्थानी, भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.

    l81720230509180205

    सुरुवातीच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कमाईपेक्षा अधिक युजर्स वाढीकडे लक्ष केंद्रित केले. जो मुलगा कधीकाळी त्याच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठीही बसला नाही त्याने सहकाऱ्यांसोबत मिळून आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर बघता बघता 40 हजार कोटींची कंपनी उभी केली, हे खरंच “धडपडणार्‍यांच्या हाती यश येतेच” या उक्तीला सिद्ध करणारे कार्य ठरले.

     सफलता आणि विस्तार

    ShareChat यशस्वी झाल्यानंतर, अंकुशने Moj नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लाँच केला. TikTok बंद झाल्यानंतर, Moj ने भारतीय बाजारपेठेत जलद गतीने आपले स्थान निर्माण केले. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना छोट्या व्हिडिओज तयार करणे आणि शेअर करणे शक्य झाले. Moj ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती आज एक अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनली आहे.

    ShareChat आणि Moj ने भारतातील डिजिटल कंटेंट कंझम्पशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ShareChat चे 160 दशलक्ष पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

    अंकुश सचदेवा आणि त्यांची टीम नेहमीच नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यावर जोर देतात, ज्यामुळे ShareChat आणि Moj वापरकर्त्यांचा अनुभव सतत सुधारत असतो.

    व्हिजन आणि नेतृत्व 

    अंकुश सचदेवांचे व्हिजन भारताच्या लहान शहरांतील आणि ग्रामीण भागांतील लोकांना डिजिटल दुनियेचे दरवाजे उघडणे आहे. त्यांचे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून ऑनलाईन सामग्रीचा उपभोग घेण्याची संधी मिळावी. त्यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून सातत्याने नवविचार  केले आहेत आणि भारतीय टेक्नोलॉजी उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, ShareChat आणि Moj हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स सतत सुधारत आहेत आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.

    Unicorn All Profiles Jul12 10

    गुंतवणूक आणि जागतिक विस्तार 

    अंकुशला SAIF Partners, DCM श्रीराम, ट्विटर (एक्स), Lightspeed India Partners, Venture Highway, India Quotient आणि Hero MotoCorp सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. शेअरचॅटने अखेरीस $40 दशलक्ष उभे केले. 2021 मध्ये, ShareChat ने गुंतवणूकदारांना आकर्षित करून $400 दशलक्ष जमा केले आणि 2022 मध्ये, टाइम्स ग्रुप, Google आणि Temasek Holdings कडून $300 दशलक्ष जमा केले.

    ShareChatने अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार केला आहे, ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि इतर देशांचा समावेश आहे. कंपनीने महत्त्वपूर्ण गुंतवणूक मिळवली, या निधीचा उपयोग प्लॅटफॉर्मच्या वैशिष्ट्यांची सुधारणा आणि वापरकर्त्यांच्या अनुभवाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी केला जात आहे.

    व्यक्तिगत जीवन 

    अंकुश एक साधारण आणि विनम्र व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांना नवीन तंत्रज्ञानात रस आहे आणि ते भारतीय भाषांच्या प्रचार-प्रसारासाठीही काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या टीमला आणि भारतीय वापरकर्त्यांना दिलं आहे. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही तितकेच समर्पित आहेत. 

    अंकुश सचदेवा यांचा ‘फोर्ब्स’ कडून देखील सन्मान झाला आहे. ‘फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30’ च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी अशा तरुण उद्योजकांची ओळख करून देते ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

    आणखीन वाचा:

  • जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा

    जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा 

    मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.

    image 5

    खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,

    1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं. 

    2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.

    3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.

    4. Risk घेण्याचं धाडस नसणं.

    5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव 

    6. सामाजिक दबाव 

    या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो. 

    image 7

    असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.

    बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.

  • म्हणून साजरं करतात रक्षाबंधन… जाणून घ्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचे पावित्र्य

    म्हणून साजरं करतात रक्षाबंधन… जाणून घ्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचे पावित्र्य

    रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णुकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. तसेच हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.

    untitled design 1 1

    रक्षाबंधनचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन व सोबत काही भेटवस्तू दिल्या जातात. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे रक्षाबंधन साजरा केला जातो. 

    image 4

    रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. हा बहीण-भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि ही आपली वैभवशाली संस्कृती जपून ठेवणे ही एक नागरिक म्हणून आपली आपल्या देशाच्या प्रती अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. 

    क्षणात हसणारं आणि क्षणात रडणारं देखील, निखळ प्रेमाचं हे भावा-बहिणीचं पवित्र नातं. दिवस जातील तसं अजूनच बहरणारं कोणतीही मर्यादा नसणारं. दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणारं हे दिलखुलास नातं.

  • रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    काल झोपताना त्याने उद्याच्या दिवसात करावयाच्या सर्व कामांची यादी केली, ती त्याची नेहमीची सवयच होती. पण नेहमीप्रमाणे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायचं त्याच्याकडून राहूनच गेलं. खरंच आपण आपल्या आरोग्याला किती साधारण स्थान दिलंय नाही का? खरंच आपल्या आयुष्यात आरोग्याचं महत्व तितकं साधारण आहे का? गांभीर्याने स्वतःला प्रश्न विचारला तर नाही हेच उत्तर येईल. मुळात आरोग्याशिवाय माणसाला काय करणं शक्य आहे हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. 

    चार दिवानांचं घर जरी आपल्याकडे असलं; पण मणक्यात गॅप असला, तर चटईवर झोपायला लागतं. दहा साखर कारखान्यांचे Shares आपल्याकडे असतील; पण डायबिटीस असेल, तर तो डॉक्टर चमचाभर सुद्धा साखर खाऊ देत नाही. घरी हरभऱ्याची एकरभर शेती आहे; पण ते चणे खायला तोंडात दातच नसतील, तर करणार काय? तोंडासमोर पंचपक्वानांची मेजवानी आहे, पण पचनसंस्थाच जर काम करत नसेल, तर कोणाला दुःख सांगणार…

    Ayurvedic header

    बोध हाच की चांगलं आरोग्य नसणं हे दात नसलेल्या वाघासारखं आहे. अर्थहीन. तरुणपणी पैसा कमावण्यासाठी आपण शरीराची ओढाताण करतो आणि म्हातारपण आलं की हेच शरीर जपण्यासाठी कमावलेलं धन खर्च करतो. मेहनत करू नका असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण या कष्टमय प्रवासात शरीराशी मात्र कधीच तडजोड करू नका, कारण हे शरीर जर आपल्यावर रुसलं, तर समोर असणारं स्वर्गसुख देखील व्यर्थ ठरतं. आपल्या शरीरातील अवयवांची जर किंमत काढायला आपण गेलो, तर ती शेकडो कोटींच्या घरात जाईल. खिशात जर पाचशेच्या चार नोटा असल्या, तर आपण किती वेळा चाचपडून पाहतो, मग एवढी कोट्यावधींची शरीररुपी संपत्ती आपल्याजवळ असताना आपण त्याची किती काळजी घेतो. खूप कमी, खरच खूप कमी. का? कारण ते मोबदल्याशिवाय मिळालंय. या शरीरासाठी आपण कोणते पैसे मोजले नाहीत. आपल्या आई-वडिलांना आपण त्याचं भाडंही देत नाही. म्हणजे फुकटच मिळालेली चीजवस्तू. साधं एक उदाहरण पाहा. आपण आपला चष्मा जास्त जपतो, की डोळे जास्त जपतो? 90% वाचकांचे उत्तर चष्मा हेच असेल. तो चष्मा ठेवायचं खोकं वेगळं, त्याला पुसण्याचा रुमाल वेगळा. ती काच स्वच्छ करायला liquid वेगळं. आणि त्या चष्म्याच्या कितीतरी पटीने महाग असणारे आपले डोळे. त्यांचं काय… ॐ दुर्लक्षाय नमः फक्त एकदा ओल्या पाण्याचा हात फिरवला, की झाले आमचे डोळे स्वच्छ. किती मोठी शोकांतिका. पण याच शोकांतिकेवर वेळ जायच्या आधी विचार व्हायला हवा. आपल्या आरोग्यासाठी आपणच जागं व्हायला हवं. चांगल्या करिअरसाठी जसे आपण झगडतो ती धडपड चांगल्या आरोग्यासाठी देखील व्हायलाच हवी. उत्तम आरोग्याला आपण जर अलंकार मानत असू, तर त्या अलंकाराची बडदास्त देखील आपणच ठेवायला हवी ना!

    Health insurance

    सुदृढ शरीराच्या महत्त्वावर रामदास स्वामी फार सुंदर म्हणतात

    “शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||

    शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”

    आणखी वाचा

  • “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास

    “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

    आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.

    लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.

    आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया. 

    बालपण आणि प्रारंभिक जीवन 

    लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्‍यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…

    लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी  शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं  नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.

    कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले,  ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं. 

    Larry Ellison

    सुरुवातीचा संघर्ष 

    1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या  २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली. 

    1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला,  नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.

    व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)

    1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी  मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले

    त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

    संकटांवर मात

    1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला. 

    संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं. 

    त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची  चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या  यशाचं गमक ठरलं.

    412795243

    यशाच्या शिखरावर

    लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.

    पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज  त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.

    एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि  वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे  उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची  वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते  जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले . 

    मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.

    लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली. 

    जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.

    आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्‍वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी  यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.

    आणखीन वाचा:

  • स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

    स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

    देश परकीय राजवटीतून मुक्त होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे भारतमातेच्या जयघोषात आजचा संपूर्ण दिवस भरून जाईल यात शंका नाही. मात्र उद्याचं काय? आजच्या रॅलीमध्ये हातात झेंडा घेऊन गेल्यानंतर उद्या तोच झेंडा रस्त्यावर पडलेला तर दिसणार नाही ना? दरवर्षीप्रमाणे आजही भाषण ऐकताना “अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि म्हणून आपल्याला आजचा सूर्य स्वतंत्रतेत अनुभवायला मिळतोय” हे वाक्य आपल्याला  रटाळ वाटेल, कारण “स्वातंत्र्य” या शब्दाची खरी ओळख गेल्या 77 वर्षात आपल्याला पटलेलीच नाही. आपण केवळ परकीयांच्या गुलामगिरीतूनच मोकळे झालेलो नाही, तर लोकशाहीमध्ये वावरणारे सर्वात भाग्यवान देशवासी आहोत. आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही याचे महत्त्व काय हे जो पिंजऱ्यात जखडलेला आहे त्यालाच कळेल. मात्र मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना आपण मानसिकदृष्टया अजूनही मागासलेले आहोत याची जाणीव काही केल्या होत नाहीये.

    गेल्या 77 वर्षांत नक्कीच आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. भारताचा इतिहास हा एकेकाळी वैभवशाली होता. असं म्हणतात, इथून सोन्याचा धूर निघायचा मात्र केवळ इंग्रजच नाही, तर अनेक परकीय आक्रमकांनी अनेकवेळा भारताला लुबाडलं, लुटून नेलं आणि तरीही आज भारत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. आज आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत नसला तरीही भारताच्या अंतराळवीरांनी चंद्राला गवसणी घातली आहे, इथे अनेक राज्यांमध्ये आज मेट्रोच्या वेगवान गतीने प्रवास केला जातो, भारताच्या सीमेवर उभ्या असलेल्या सेनेच्या वाकड्यात जाण्याची हिंमत जगभरातील कोणतीही ताकद करत नाही किंवा करणार नाही, आपली अर्थव्यवस्था दरदिवशी सकारात्मक प्रगती करतेय, दूरसंचार क्रांती विविध क्षेत्रांना एका धाग्यात जोडून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. हे आणि असे अनेक बदल पाहिले की सोन्याचा धूर पुन्हा निघायला जास्ती वेळ जाणार नाही यावर विश्वास बसतो. 

    मात्र चौफेर नजर फिरवल्यास प्रश्न पडतो की भारतात वावरणारा प्रत्येक माणूस सामान स्वातंत्र्य अनुभवत आहे का? पूरग्रस्त भागांमध्ये लोकं तेवढ्याच आनंदाने आजचा दिवस साजरा करत असतील का? सोशल मीडियाने जरी संपूर्ण देशाला एकत्र जोडलेलं असलं तरीही तुटलेल्या तारा आणि भंग झालेल्या कनेक्शनमुळे किती लोकं कोपऱ्यांमध्ये अडकून पडलेली असतील? धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या भागात आजही कोणीतरी जीव मुठीत धरून तर बसलेलं नसेल ना? लोकशाहीच्या राज्यात कुणावर धर्म बदलण्याची सक्ती केली जात नसेल ना? सरकारने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरीही भारतात आजही अनेक गावांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यांमुळे स्वतःच्या घरात प्रसूतीची पीडा सोसणारी बाई आढळतेच. भारताच्या कितीतरी गावांची नावं देखील आपल्याला माहिती नाही, त्यांचा उल्लेख नकाशात नाही स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर देखील जिथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, बालमजुरी असे कितीतरी माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार घडतात. शिक्षणाची इच्छा मनात बाळगून स्वतःच्या आई-वडिलांची नजर चोरून पावसाचं पाणी अंगावर सोसत जाणाऱ्या लहानग्यांच्या आणि अनेक पीडितांच्या डोक्यावर खरंच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आहे का असा प्रश्न पडतो. 

    म्हटलं तर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. येणाऱ्या काळात भारतातील तरुणांच्या मेहनतीवर इतर जगभरातील देश चालणार आहेत मग याच हुशारीचा उपयोग भारतालाच करवून दिला तर? तरुणपिढी देशाच्या भक्कम पाया आहे, मात्र हीच वयातील मुलं सोशल मीडियाचा गैरवारपर करताना किंवा संध्याकाळच्यावेळी मित्रांसोबत गप्पाष्टके करताना आढळतात.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे कामाच्या संधी नाही म्हणत परदेशात जाणारे अनेक असतील पण मी माझ्या देशात राहून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील नोकरीच्या संधी तयार करेन असं देशाचा तरुण का म्हणत नाही? गावातील लोकं अशिक्षित आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही, कामाच्या शोधात शहरात येऊन ते शहराला मळवून टाकतायत असं म्हणत आपणच सुशिक्षित लोकं भारत सोडून परदेशी जातो. अशावेळी प्रश्न उभा राहतो की ज्या देशाला नावं ठेऊन, अशिक्षित म्हणत आपण अर्ध्यावर सोडून आलो त्याच भारताच्या स्वातंत्र्यदिनादिवशी “भारत माता की जय” म्हणावं तरी का? परदेशात ट्रॅफिकचे नियम किती कडक आहे हे सांगताना आपण थकत नाही, मात्र उठायला उशीर झाल्याने वाया गेलेला वेळ भरून काढताना ट्रॅफिक नियम मोडणारे देखील आपणच असतो. गावाकडून आलेली लोकं बेशिस्त आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही असं म्हणत स्वतःचं घर नीटनेटकं ठेऊन तोच कचरा बाहेर नेऊन टाकणारे देखील आपणच असतो. रस्त्याने चालताना खाल्लं जाणाऱ्या केळ्याची साल कचरापेटीत टाकणं आपल्याला शक्य होत नाही आणि दिवसभर उन्हात भूक आणि तहान विसरून केवळ दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून तडफडणारा कचरा कर्मचारी आपल्याला मळकट वाटतो. 

    5f08f15d37ca4712ba08448f1cf0ed04