Category: लेख

  • शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या

    शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या

    भारताला शेतीमध्ये प्रगत बनविण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार नेहमीच नवीन काहीतरी योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे KCC अर्थात किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ शेतीसोबतच, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे.

    चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल:

    भारतातील सर्व शेतकरी ज्यांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे ते या योजनेस पात्र ठरू शकतात. या योजनेअंतर्गत मागील वर्षापेक्षा जास्त कर्जाचा आणि कमी व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुमच्या जवळच्या बँकेत जमिनीची कागदपत्रे तसेच कर्ज मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा, पटवारी कागदपत्रे, बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे भरणे बंधनकारक आहे. HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या बँकांद्वारे किसान क्रेडिट कार्ड बँकांद्वारे ऑफर केले जाते.

    तुम्ही KCC Bank Loan कशा कशासाठी घेऊ शकता?

    1. KCC Bank Loan शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी घेऊ शकतो.

    2. किटकनाशके, खते, बियाणे खरेदीसाठी आणि कृषी यंत्रं घेण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

    3. काढणीनंतरचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी हे कर्ज घेऊ शकतात.

    4. कृषी मालमत्तेच्या देखभालीसाठी तसेच आपला माल विकण्यासाठी देखील या कर्जाचा वापर केला जाऊ शकतो.  

    5. तसेच मत्स्यपालन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसाठी.                                                 

    6. कुक्कुटपालन करण्यासाठी मेंढ्या, ससे, शेळ्या, डुकर यांच्या पालनपोषणासाठी लागणाऱ्या खाद्य खरेदीसाठी

    7. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःचे शेड उभारण्यासाठी किंवा भाडेतत्वावर शेड घेण्यासाठी देखील या कर्जाची मदत होऊ शकते.

    या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी 50 हजारांपासून ते जास्तीतजास्त 3 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. १.६० लाख रुपयां पर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही तारण लागत नाही. यासोबतच शेतकऱ्यांना पिकांचा विमाही काढता येऊ शकतो. हे कर्ज 4% व्याजदराने घेता येऊ शकते. पण जसजशी तुमची कर्जाची रक्कम वाढेल तसे त्यावरचे व्याज देखील वाढू शकते. शेतकऱ्यांना बँकांकडून नियमित दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या उच्च व्याजदरातून KCC Bank Loan अंतर्गत सूट दिली जाते.

    मात्र मिळालेल्या या कर्जाची परतफेड केव्हा करायची?

    तर ज्या पिकासाठी तुमचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे, त्या पिकाच्या अपेक्षित कापणी आणि एकूण उत्पादन येण्याच्या कालावधीनुसार बँक मुदतीचा कालावधी ठरवत असते. सामान्यतः प्रत्येक बँकेत 5 वर्षांचा कालावधी हा परतफेड करण्यायोग्य कालावधी असतो.

    सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेऊन येत असते, मात्र बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतात. त्या योजना नवी अर्थक्रांती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी नवी अर्थक्रांती वेबसाईटला नियमित भेट द्या.


    आणखी वाचा

  • कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

    कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

    आजकाल मोठ-मोठे पदवीधर, सुशिक्षित वर्गातील लोक नोकरीपेक्षा शेती करण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. उत्तम पद्धतीची आधुनिक शेती करून चांगलीच कमाई देखील कमवत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अशाच एका आधुनिक पिकाबद्दल बेबी कॉर्न या पिकाबद्दल.

    कॉर्न मंच्युरीयन, चिली, पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे सगळेच पदार्थ प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. त्यामुळे बेबी कॉर्नची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी आपल्या घरापासून ते 5 स्टार हॉटेल्स, पिझ्झा, पास्ता चेन आणि छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील कॉर्नला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

    तांदूळ आणि गहू या पिकांनंतर मका हे भारतातील सर्वात जास्त लागवडीचे पीक म्हणून ओळखले जाते. याच मक्याच्या अपरिपक्व कोंबांना बेबी कॉर्न असे म्हणतात. लागवडीनंतर दोन महिन्यांच्या आताच बेबी कॉर्न तयार होतात. बेबी कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वं असतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायद्याचे मानले जाते, पण केवळ आरोग्याच्याच दृष्टीने नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर यातून खूप फायदा मिळू शकतो. एका एकरात बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो. फक्त 15 हजारांच्या गुंतवणुकीतून एकरी चार ते सहा क्‍विंटल उत्पादन घेऊन तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. याचे उत्पादन तुम्ही वर्षातून केवळ एकदाच नाही तर 4 वेळा घेऊ शकता. फक्त इतकेच नव्हे तर तुम्हाला यातून दुप्पट नफा मिळवता येऊ शकतो. म्हणजे बेबी कॉर्नच्या कापणीनंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो, तो जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येऊ शकतो. शेतकरी त्याचा हिरवा चारा म्हणूनही वापर करू शकतात किंवा कापून सुकवल्यानंतर सुकी पेंडही बनवता येतो. मक्याचे खाद्य हे जनावरांसाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. त्याचा चारा जनावरांना दिल्याने त्यांची दूध उत्पादन क्षमताही वाढते.

    फायदेमंद शेतीसाठी बेबी कॉर्न हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेबीकॉर्नचे उत्पादन घ्यायचे असेल मात्र तुम्हाला पैशांचा प्रश्न भेडसावत असेल, तर शासनाकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. भारत सरकार मका आणि बेबी कॉर्नच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी कर्ज उपलब्ध करून देते. याच्या सहाय्याने तुम्ही बेबी कॉर्नची शेती करून लाखोंनी पैसे कमवू शकता.

    अशा या बेबी कॉर्न लागवड ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


    आणखी वाचा

  • Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली

    Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली

    BUSINESS PLAN

    कोणतीही गोष्ट करताना आपण एक रफ प्लॅन बनवत असतो. आपण आखलेल्या प्लॅननुसार आपण दिवसभरातील कामकाज करत असतो. काही वेळेस तुम्ही केलेल्या प्लॅननुसार गोष्टी घडतात, तर काही वेळेस त्या घडत नाहीत, मात्र तरीही आपण प्लॅन हा बनवतोच. हे झाले आपल्या रोजच्या दिवसाचे. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा असतो, त्यावेळी आपण आपल्याला वाटलं म्हणून कोणताही बिझनेस चालू नाही करू शकत ना! याचसाठी सर्वात महत्वाचे आहे ते Business Planning.

    Business Plan ची सरळ सोपी व्याख्या म्हणजे असे document ज्यात कंपनीची उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या योजनांचा तपशील असतो. तुमचं उत्पादन बाजारात कोणत्या पद्धतीने येणार, ते कोणत्या ग्राहकाला आकर्षित करणार आहे, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीला कशी मात देणार, तुमच्या व्यवसायाचं बाजारमूल्य किती असणार, Business च्या बाबतीतला तुमचा दृष्टीकोन काय आहे यांसारख्या अनेक गोष्टींची मांडणी बिझनेस मॉडेलमध्ये असते. भविष्यामध्ये जशी परिस्थिती आणि गरज बदलते, त्यानुसार बिझनेस प्लॅन देखील बदलत असतो.

    आता Business Plan करणं का गरजेचं आहे ते पाहूया.

    पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याआधी इन्वेस्टर कंपनीचा बिजनेस प्लॅन बघतात. तो प्लॅन जर त्यांना convincing वाटला तरच ते तुमच्या business मध्ये गुंतवणूक करतात. तर दुसरा मुद्दा आहे लोनसंदर्भात. जर तुम्हाला तुमच्या business development साठी बँकेतून लोन घ्यायचे असेल तर बँकेला आधी हे सांगणं गरजेचं असत की तुम्हाला ते लोन कशासाठी पाहिजे आहे? तुम्ही मिळणाऱ्या पैशांचा वापर कशा पद्धतीने करणार आहात. जर तुमच्याकडे business plan असेल तर या सर्व गोष्टी explain करण तुम्हाला सोप्पं जातं.

    तिसरा मुद्दा म्हणजे चांगले Employee मिळवण्यासाठी देखील बिझनेस प्लॅनचा उपयोग होतो. बरेच employee हे त्या ज्या कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्या कंपनीचे future goals काय आहेत आणि ते आपल्या future goals ला पोषक आहेत का हे तपासतात. या सगळ्याचे तपशील त्यांना बिजनेस प्लॅनमध्ये मिळतात.

    बिझनेस करताना अनेक अडचणी येतात आणि बिझनेस प्लॅनमुळे तुम्हाला आधीच त्याची तयारी करता येते.

    आता वळूयात बिझनेस प्लॅनच्या प्रकाराकडे

    बिजनेस प्लॅनचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे Simple Business Plan आणि दुसरा प्रकार आहे Detailed Project Report (DPR)

    तर जाणून घेऊयात Simple Business Plan बद्दल

    या बिजनेस प्लॅन मध्ये Short मध्ये एक-दोन पानांत किंवा ८-१० स्लाईडच्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व माहिती सांगितलेली असते. या प्रकारचा Business प्लॅन बऱ्यापैकी वापरला जातो. या plan मध्ये मार्केटची समस्या, तुम्ही त्यावर देत असलेले उपाय, तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस, तुमचे स्पर्धक आणि तुमची वैशिष्ट्ये, मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि सेल्स प्लॅन, व्यवसायाची उलाढाल, खर्च व नफा यांची अंदाजे गणितं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे येतात.

    आता जाणून घेऊयात Detailed Project Report बद्दल

    हा बिझनेस प्लॅन एकदम Detail मध्ये लिहिलेला असतो. हा कधीकधी 25 ते 30 पानांचा देखील असू शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक वर्षे मागदर्शन होत राहते, कारण यामध्ये सर्व माहिती एकदम Detail मध्ये लिहिलेली असते. बँका आणि Investor व्यवसायला Loan देण्याआधी किंवा Business मध्ये Investment करण्याआधी या बिझनेस प्लॅनची मागणी करतात. या मध्ये वर Simple Business Plan मध्ये नमूद केलेले सर्वच मुद्दे येतात. फरक फक्त इतकाच की वर हेच मुद्दे अत्यंत कमी शब्दांत येतात, तर यात सविस्तर येतात.

    वरील दोन्ही Business प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक गोष्टी अजून Add करू शकता किंवा यातील काही गोष्टी कमी देखील करू शकता.

  • Business Model: आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठीचा दिशादर्शक

    Business Model: आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठीचा दिशादर्शक

    Business Model म्हणजे तुमची कंपनी पैसे कसे कमावणार आहे याची योजना. सर्वसाधारणपणे कोणत्याही Business Model मध्ये चार गोष्टी स्पष्ट केल्या जातात. त्या म्हणजे:-

    १. कंपनी कोणत्या उत्पादनाची किंवा सेवांची विक्री करेल

    २. त्या उत्पादनाचे किंवा सेवेचे मार्केटिंग कसे करायचे

    ३. कंपनीला कोणत्या प्रकारच्या खर्चाला सामोरे जावे लागेल

    ४. कंपनीला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल

    आता पाहूया Business Model चे प्रकार आणि काही उदाहरणे : –

    वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्यवसाय असल्यामुळे, Business Model च्या प्रकारांची यादी सतत बदलत असते. आज आपण सर्वसाधारणपणे वापरले जाणारे 12 business model options पाहणार आहेत, जे सर्व Business साठी इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात.

    Manufacturer mode

    पहिला प्रकार आहे Manufacturer model. Manufacturer कच्च्या मालाचे रूपांतर उत्पादनांमध्ये करतो. त्यानंतर, तो ती उत्पादने distributors, retailers किंवा थेट consumers ला विकतो. या Business Model ला फर्निचरपासून ते pharmaceuticals पर्यंत सगळे follow करतात, मग त्या कंपन्या कितीही मोठ्या असोत वा छोट्या.

    Distribution model

    उत्पादित वस्तू बाजारात नेण्यासाठी distributor म्हणून काम करणारी कंपनी जबाबदार असते. नफा मिळविण्यासाठी distributors मोठ्या प्रमाणात product खरेदी करतात आणि retailers ते विकत घेऊन पुढे जास्त किंमतीला विकतात.

    Retailer model

    Business Model चा तिसरा प्रकार आहे Retailer model. Retailer म्हणजेच किरकोळ विक्रेता हा supply chain मधला शेवटचा दुवा असतो. Retailer हे manufacturers किंवा distributors कडून वस्तू खरेदी करतात आणि नंतर ग्राहकांना त्या किंमतीला विकतात, ज्यामुळे त्यांचा खर्च आणि नफा दोन्ही वसूल होतील.

    Fee-for-service model

    हा Business Model चा चौथा प्रकार आहे. नावावरून तुम्हाला हे काय प्रकरण आहे ते लक्षात आलेलंच असेल. यामध्ये कोणताहीBusiness विशिष्ट सेवेसाठी निश्चित शुल्क आकारतो. या मॉडेलवर सेट केलेला Business हा additional clients साठी extra काम करून किंवा service rate वाढवून त्याची कमाई वाढवू शकतो.

    Subscription model

    सध्या बऱ्याच ठिकाणी use केलं जाणारं model म्हणजे Subscription model. हे Business Model जास्त वेळा ई-कॉमर्स व्यवसायांसाठी लागू केले जाते. चालू असलेल्या सेवेसाठी कस्टमर हा दर महिन्याला, सहा महिन्याला किंवा वर्षाला payment करत राहतो.

    Bundling model

    या Business Model मध्ये कंपन्या दोन किंवा अधिक product एकच unit म्हणून एकत्र विकतात. अनेकदा ते product स्वतंत्रपणे विकले तर त्याचे शुल्क हे जास्त असते. या प्रकारच्या बिझनेस मॉडेलमुळे कंपन्यांना त्यांच्या product ची विक्री मोठ्या प्रमाणात करायला मदत होते तसेच इतर वेळेस जास्त विक्री न होणारे product सुद्धा यामुळे विकले जातात. 

    Franchise model

    एखाद्या established business ची Franchise घेणं आता common झालंय. फ्रँचायझर किंवा मूळ मालक फ्रँचायझीसोबत काम करतात आणि त्यांना financing, marketing आणि other business operations मध्ये मदत करतात. जेणेकरून त्यांच्या business ची अजून development होईल. चहापासून ते Pizza पर्यंत सगळे business हे या मॉडेल प्रमाणे काम करतात.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

    काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

    शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा जोड-धंदा म्हणून स्वतःच्या सुपीक जागेत बी-बियाणे पेरून केलेला व्यवसाय म्हणजे शेती होय. कोणतही पीक पिकवायचं म्हटलं की, पहिले शेतीची मशागत, नांगरणी, कोळपणी असे बरेच टप्पे पार करावे लागतात. आज आपण ऐषोरामात जीवन जगतो, चांगलं-चुंगलं खातो. त्यामागे शेतकरी राजाचे बरेच कष्ट, त्यांची मेहनत असते. मात्र हल्ली एसआरटी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीला थोडा आराम मिळाला आहे. पण नेमकं हे एसआरटी तंत्र काय आहे? याबद्दल अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे बरेचजण पारंपरिक शेतीतच अडकले आहेत. चला तर जाणून घेऊ एसआरटी टेक्नॉलॉजीबद्दल.

    एसआरटी म्हणजेच सगुणा राईस तंत्र. या तंत्रज्ञानालाच विनामशागतीची किंवा शून्य मशागतीची शेती असं देखील म्हणतात. विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे ज्यात नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही यात करावं लागत नाही. याउलट पारंपरिक शेती पद्धतीत जमिनीची नांगरणी किंवा पूर्वमशागतीची कामे केली जातात. कोकण आणि विदर्भातील भात शेतीत हे नवे तंत्र वापरले जाते.

    या पद्धतीने शेती करण्यासाठी पाहिल्यांदा गादीवाफे तयार करावे लागतात. गादिवाफे म्हणजे २० सेमी उंची, १ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेऊन वाफे बनवावले जातात. दोन्ही गादी वाफ्यांत ६० सेमी ते ७५ सेमी. रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. गादीवाफे तयार करण्यासाठी सुरवातीला एकदाच नांगरणी करावी लागते. वाफे तयार केल्यावर त्यावर पीक टोकन पद्धतीने पेरले जाते. पाऊस जास्त झाला तर मारलेल्या चरांवाटे पाण्याचा निचरा करता येतो आणि जर पाऊस कमी झाला तर वाफ्यांमध्ये पाणी साठवलं जातं आणि किमान 8 ते 10 दिवस ते पाणी तग धरून राहतं. आता प्रश्न उभा राहतो तो मशागतीचा. शेतीतील मशागत करण्यासाठी गडी लोक दिवसाला 350 ते 400 रुपये घेतात.

    पीक म्हटलं की तण हे आलंच. शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या तणनाशकांचा उपयोग करून तणाचा बिमोड करता येतो. त्याबरोबरच पिकांच्या काढणीचीही एक विशेष पद्धत आहे. पारंपरिक शेतीत आपण बऱ्याच वेळी पीक उपटून काढतो, मात्र यामध्ये कोणतही पीक हे कापावच लागतं.

    पिकाचे मूळ जिथे आहे तिथे कुजले तर आपल्या जमिनीतला कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. होणारं बाष्पीभवन ते थांबवून ठेवतं. म्हणून एसआरटी तंत्रज्ञानात पीक मुळासकट काढले जात नाही. सेंद्रिय खत, कर्ब जमिनीत तयार होण्यास मदत होते आणि मुळाच्या शोषणाद्वारे हवा जमिनीत जाते आणि गादीवाफा भूसभुशीत राहतो. एकदा तयार केलेला गादीवाफा किमान १५ ते २० वर्ष टिकतो. गादीवाफा निर्मितीवेळी एकदाच शेणखताचा वापर करतात. या पद्धतीत खर्चात आणि कष्टात दोन्हीत बचत होते. ही पद्धत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाफ्यांमध्ये पाणी साठवता येते.

    विनामशागतीच्या शेतीचे फायदे काय आहेत?

    तर…..

    मातीची धूप कमी होण्यास मदत होते. तसेच जमिनीचा पोत कडक होण्यापासून बचाव होतो. गेल्या तीन वर्षाच्या अभ्यासाच्या निकषानुसार विनामशागत शेतीमुळे 80% जमिनीची धूप थांबली आहे. कापलेले पीक आणि तणांची मुळं जमिनीत कुजल्याने निर्माण होणाऱ्या पोकळीत हवा खेळती राहते.

    गादीवाफ्यात जसजसे सेंद्रिय घटक वाढतील, त्या प्रमाणात गांडुळांची संख्या वाढते आणि त्याचा शेतीला फायदाच होतो. आपण विना-मशगतीच्या शेती कशी करतात त्याचे फायदे काय आहेत? हे सगळं आपण पाहिलं, पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात कशी झाली?  नव्वदच्या दशकात शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी नांगरणीविणा शेती होऊ शकते हा विचार मांडला.

    त्यानंतर कोकणातील कृषीभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी भात शेतीत विनानांगरणीच्या शेतीचं तंत्र अंमलात आणलं. त्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग चालू केला. त्यावेळी चिखलणी न करता त्यांनी गादीवाफे तयार केले, भाताचे टोकन तयार केले, टोकन केलेल्या भाताचं पीक चांगलं येतं असं त्यांच्या लक्षात आलं. 2014 ते 15 च्या दरम्यान या तंत्रज्ञानात चांगले रिजल्ट्स आल्यावर कृषी विभागानं हे तंत्र राज्यभर विस्तारण्यासाठी सुरुवात केली.

    अशा या एसआरटी टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    आपल्या शेतात सुंदर सुंदर मोती, त्या मोत्यांना असलेली वाढती मागणी आणि त्यातून मिळणारे भरमसाठ पैसे, वा..! तुम्ही थोड्याच दिवसात लखपती होऊ शकता. हो हो पण जरा थांबा. कसंय स्वप्न बघायला काहीच लागत नाही ओ, मात्र ती स्वप्नं पूर्ण करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यात तुम्ही मोत्यांची शेती करणार म्हटल्यावर मेहनतीशिवाय पर्यायच नाही.

    पहिल्यांदा आपण पाहूया ही शेती कशी केली जाते? त्यातून कसा फायदा मिळतो? याचं मार्केटिंग कसं केलं जातं?

    मोत्यांची शेती हा मत्स्यपालन प्रकाराचाच भाग आहे. यामध्ये ऑयस्टर पाळले जातात. ऑयस्टर म्हणजेच कालवे. हा शिंपल्यांचाच एक प्रकार असतो. कोकण्यात या कालव्यांची मस्त झणझणीत चटणी किंवा कालवं मसाला बनवलं जातं, त्याची चव आहा अप्रतिम. त्यात ते मस्त चुलीवर बनवलं असेल, तर मग काही विषयच नाही. स्वर्ग सुख! एकदा तुम्ही हे कालवं मसाला खाऊनच बघा. sorry sorry मी चुकून जरा मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये घुसतिये… तर आपला मुद्दा आहे शेतीचा. हा तर, हे जे ऑयस्टर असतात म्हणजेच काल. ते गोळा करून त्यावर शस्त्रक्रिया करून, रोपन करून मग मोती गोळा केले जातात.  

    ही शेती करण्यासाठी 20*30 आकाराचा तलाव लागू शकतो. त्याची खोली 5-6 फुट खोल असावी लागते. तलाव उभा करण्यास जर पुरेशी जागा किंवा आर्थिक सोय नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एक टाकी बनवून मोत्यांची शेती करू शकता. टॅंकच्या किंवा तलावाच्या अवतीभवती हिरवळ कायम राखण्यासाठी तुम्ही झाडं किंवा वेली लावू शकता. टॅंकमध्ये काही दिवस ऑयस्टर ठेवल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली जाते.  ऑयस्टर शस्त्रक्रिया 15 दिवसांनी केली जाते.

    शस्त्रक्रियेअंतर्गत, देवाच्या किंवा फुलांच्या पानांच्या साध्या किंवा डिझाइनर मण्यासारख्या आकृत्या प्रत्येक ऑयस्टरमध्ये घातल्या जातात, 4 ते 6 मिली व्यासाचा. त्याची दोन्ही आवरणे हळुवार पद्धतीने उघडून त्यात त्यात बिया सोडल्या जातात आणि शिंपले बंद केले जातात. या ज्या बिया असतात, त्या जंगली वनस्पती पासून बनवल्या जातात. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जवळच्या कृषी-केंद्रातून देखील माहिती मिळवू शकता.

     हे ऑयस्टर नंतर नायलॉनच्या पिशव्यांमध्ये ठेवले जातात आणि बांबू किंवा पीव्हीसी पाईपमध्ये टांगल्या जातात आणि एक मीटर खोलीवर तलावामध्ये सोडल्या जातात. या ऑयस्टरचे खाद्य म्हणजे शेवाळ आणि जनावरांची विष्ठा. दीड, दोन वर्षं तलावात शेवाळ आणि जनावरांची विष्ठा टाकली, तर दोन वर्षानंतर शिंपल्यातील मोती परिपक्व झालेले असतात. यामध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बीज तयार करून त्याचे रोपण करणे. त्यामुळे हे करताना योग्य मार्गदर्शन घेवूनच करावे. 

    एका शिंपल्यात दोन मोती तयार होतात हे, दोन मोती तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील साधारण 70 रुपये खर्च करावे लागतात आणि त्या 70 रुपयांचे 2 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये मिळू शकतात. एका हंगामात तुम्हाला एका टॅंक मध्ये कमीत कमी 5000 मोती मिळू शकतात. त्या 5000 पैकी समजा 4000 मोती वाचले, तर तुम्हाला त्याचे साधारण ६० लाख रुपये मिळू शकतात. मात्र ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे.

    कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असते. मात्र एकदा का तुम्हाला या शेतीची संपूर्ण टेक्निक समजली की मग तुम्ही मालामालच!

    मोती तयार झाले की. दूसरा मुद्दा येतो तो विक्रीचा. सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतीची असल्यास त्याला बाराशे रुपये कॅरेट इतकी किंमत मिळते.   

    तुम्हाला वाटत असेल हे खूप रिस्की काम आहे, पण घाबरू नका, अशा बऱ्याच संस्था आहेत, ज्या या शेतीचं प्रशिक्षण देतात तसेच प्रत्येक जिल्ह्यात कृषी केंद्रं असतात, तिथे तुम्हाला उपयुक्त माहिती मिळू शकते आणि कसंय ना जो पर्यंत आयुष्यात risk नाही, तोपर्यंत मजा नाही. काय म्हणता? पटतंय ना!

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • Acquisition : व्यवसायातील एक महत्त्वपूर्ण टर्म

    Acquisition : व्यवसायातील एक महत्त्वपूर्ण टर्म

    नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअपची या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पून्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्टार्टअप जगतात असे शब्द जे सर्रास वापरले जातात, पण त्यांचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. अशाच शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत या सिरीजमध्य आम्ही तुम्हाला समजावून सांगत असतो.

    तर आजचा शब्द आहे (ॲक्वीजिशन)

    Acquisition चा साधासोपा अर्थ म्हणजे अधिग्रहण किंवा संपादन करणे.

    जर एखादी कंपनी दुसऱ्या एखाद्या कंपनीचा पूर्णपणे किंवा अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सा खरेदी करत असेल, तर त्या प्रक्रियेला  Acquisition म्हणतात. ती कंपनी आधीच्याच नावाने आपले काम करत असते. acquisition मध्ये त्या कंपनीचे नाव बदलत नाही, फक्त काही टक्के शेअर्स हे त्यांचे होतात. जरी A या कंपनीने B हि कंपनी खरेदी केली, तरीही त्या दोघांचीही ओळख कमी होत नाही. या टर्ममध्ये दोन्हीही कंपन्यांचे फायदे हे होतातच.

    एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीत विलिन होण्यामागे किंवा एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे अधिग्रहण करण्यामागे अनेक उद्देश असू शकतात, जसे की – बाजारहिस्सा एकत्र करणे, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन, भौगोलिक अस्तित्व मिळवणे किंवा ग्राहकसंख्या विस्तारणे. साधारणतः एकमेकांत विलीन होणाऱ्या कंपन्यांची क्षमता यामुळे दुप्पट होते. ॲक्वीजिशन दोन प्रकारचे फ्रेंडली म्हणजेच मैत्रीपूर्ण किंवा होस्टाईल म्हणजेच शत्रुतापूर्ण. नुकतीच अदानी समूहाने एका न्यूज चॅनेल विकत घेतला. तो होस्टाईल ॲक्वीजिशनचाच एक प्रकार होता.

    आता, तुम्ही म्हणाल, यात फायदा कसा काय? तर आपण लहान असताना एक गोष्ट ऐकली आहे

    की, एका माणसाला चार मूलं  असतात, तो प्रत्येकाला एक लहान काठी देतो, आणि ती मोडायला सांगतो सगळे जण लगेचच ती काठी मोडतात मग तो प्रत्येकाला एक-एक अशी लाकडाची मोठी मोळी देतो. आणि ती मोडायला सांगतो मात्र ती कोणालाच मोडता येत नाही.ती मूलं थोडा विचार करतात, चौघे एकत्र येतात आणि मग चौघे मिळून लाकडची मोळी सहज मोडतात. हेच ते एकीचे बळ. जर कोणत्याही गोष्टीत एकी असेल तर काहीच अशक्य नाही.  हीच एकी आपल्याला acquisition मध्येही पाहायला मिळते. जर अनेक कंपन्या सारख्याच सेवा पुरवत असतील तर तिथे स्पर्धा निर्माण होते. मात्र जर त्याच 2 कंपन्या एकत्र आल्या तर तेथील स्पर्धक संख्या कमी होते. इतकंच नाही तर कंपनीची ग्राहक संख्या देखील वाढते आणि तुमचा ब्रॅंड आणखी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते.

    हे सगळं जरी खरं असलं, Acquisitionचा हेतू साध्य करणं फार अवघड काम आहे. एका रिपोर्टनुसार जगातील ५० टक्के कंपन्यांची Acquisitions फेल झाल्याचं दिसतं. 

  • संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!

    संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’

    तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.

    इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.

    लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.

    बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.

    मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.

    मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    जॉईस चॅपमन या लेखिकेचं एक खूप प्रेरणादायी वाक्य आहे “जर तुमचं स्वप्नं खूप मोठं असेल आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तुम्ही तयार असाल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी करणे हा एकचं मार्ग आहे.” त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका, नेहमी पुढे जात राहा.

    आणखी वाचा

  • शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

    शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

    बारामतीत जमीन खरेदीत शेतकऱ्याची 5 लाख रुपयांची फसवणूक.
    भावाभावात शेतजमिनीच्या हद्दीपायी बेदम हाणामारी.
    एकाने शेतकऱ्याची 7 एकर जमीन शिताफीने लुबाडली.

    अशा एक ना अनेक बातम्या आपण रोज वाचत असतो, ऐकत असतो. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की, मूळ जमिनीचा मालक वेगळाच असतो आणि बनावट कागदपत्रे करून दुसऱ्याच कोणाकडून तरी जमिनीचे व्यवहार होतात आणि मग वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तसेच जमिनीवर कर्ज काढून खोटी कागदपत्रे तयार करून देखील जमिनीची विक्री केली जाते, तर अशावेळी कोणती दक्षता घेतली पाहिजे? चला तर पाहूया…

    1. सातबारा उतारा तपासा

    सातबारा उतारा हा जमिनीचा अधिकृत दस्तावेज असतो. यावर जमिनीचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार, कर्जाचा बोजा, न्यायालयीन खटल्याची नोंद इत्यादी माहिती असते. त्यामुळे सातबारा उतारा तपासून घेतल्यास, जमिनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याची माहिती मिळू शकते. सातबारा उतारा तहसील कार्यालयातून किंवा तलाठ्याकडून मिळू शकतो.

    2. भूधारणा पद्धत तपासा

    महाराष्ट्रात भूधारणा पद्धतीनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाते. भोगवटादार वर्ग-1 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यात कोणतेही निर्बंध नसतात. मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करताना सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. भूधारणा पद्धत तहसील कार्यालयातून तपासून घेता येते.

    3. शेतजमीनचा मूळ मालक कोण आहे हे तपासा

    शेतजमीन विकत घेताना त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे तपासणे आवश्यक आहे. अन्यथा, जमिनीची खरेदी केल्यानंतर मूळ मालकाकडून वाद होऊ शकतो. जमिनीचा मूळ मालक कोण हे सातबारा उतारावरून तपासून घेता येते.

    4. जमिनीचा खरेदी-विक्री करार नोंदणी करा

    शेतजमिनीची खरेदी-विक्री करार नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत करारामुळे, भविष्यात कोणत्याही वादात, कराराची नोंदणी हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. जमिनीच्या खरेदी-विक्री करारासाठी वकीलाचा सल्ला घेणे चांगले.

    5. वकीलचा सल्ला घ्या

    शेतजमीन विकत घेताना वकीलचा सल्ला घेणे देखील चांगले. वकील तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची माहिती देऊ शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही वाद असल्यास, त्या बाबतीत वकीलाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

    वरील गोष्टींची काळजी घेतल्यास, शेतजमीन विकत घेताना फसवणूक होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे.

    मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

    ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

    मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ ‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

    माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

    वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. ‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

    ‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

    ‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

    पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला1

    ‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

    ‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

    ‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

    वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा