Author: naviarthkranti

  • ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

    ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

    यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले.

    Bill Gates Success Comes Through Effort

    कर्नल सँडर्स हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65 व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडर्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात सँडर्सने 86 देशांत 13,000 हॉटेल्स काढली. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे.

    सुनीता पंडेर नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही.

    यशाच्या पाठी लागणाऱ्या माणसाच्या पाठी पैसा आपोआप येतो. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी सामान्य माणसे जे काही करतात ते करायचे टाळा, म्हणजे तुम्ही असामान्य व्हाल. ज्ञान हे कोणत्याही वयात घेता येते. कौशल्य आणणे हे तुमच्या हातात आहे. सवयी बदलल्या की तुम्ही कोणीतरी बनू शकाल. कृती करताना तुम्ही-आम्ही सबबी सांगतो, परमेश्वराने तुम्हाला मन, बुद्धी, आयुष्य दिलेले आहे, तेव्हा तुम्ही किडामुंगीसारखे का जगता? आपण यशस्वी होऊ शकत नाही, असे आपल्या मनावर बिंबवलेले असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या असलेले अपंगत्व फेकून द्या.

    जेसिका कॉक्स नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते.

    Success Comes Through Effort

    स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. तुमचे आयुष्य तुम्हीच बदलू शकता.

  • अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

    अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

    How to Make Your Goals a Reality

    फुलपाखरांना फक्त चौदा दिवसाचं आयुष्य मिळतं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदानं बागडत वावरतं. म्हणून छोट्या अपयशानं खचून जाऊ नका. धीर सोडू नका. प्रयत्न सोडू नका. त्यासाठी अपयशाची भीती न बाळगता ध्येय निश्‍चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुमचं ध्येय कोणतंही असो, पण ते निश्‍चित हवं, स्पष्ट हवं. ठराविक कालावधीत पूर्ण होणारं हवं. आपण घरी भिंतीवर देवदेवतांचे अथवा आपल्या पूजनीय वडीलधाऱ्या मंडळींचे फोटो लावतो. कशासाठी? त्यातून आपल्याला काय मिळते? ज्या वेळी आपली नजर त्या फोटोकडे जाते, त्या वेळी काही क्षणात एक विशिष्ट सकारात्मक, श्रद्धायुक्त ऊर्जा आपल्या डोळ्यांवाटे आपल्या अंत-करणात उतरते आणि ती आपल्याला प्रेरणा देते. वाईट विचारापासून प्रवृत्त करते. चांगले विचार आपोआपच आपल्या मनात येतात आणि मग कृतीही तशीच होते. अगदी त्याचप्रमाणे, आपले ध्येय एका मोठ्या कागदावर लिहून ते भिंतीवर समोर दिसेल असे लावावे. म्हणजे ते तुम्हाला रोज आठवण करून देईल. मग तुमचे विचार व कृती आपोआपच त्याच दिशेने होईल.

    How to Make Your Goals a Reality

    कुटुंबीयांना सामील करून घ्या –

    कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आपले कुटुंबीय व हितचिंतकांची मन-पूर्वक साथ हवी, म्हणून तुमच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासात तुमच्या कुटुंबीयांना व हितचिंतकांना सामील करून घ्या. त्या खडतर प्रवासाचे ते सुद्धा साथीदार व मालक असतात, यशाचे धनी असतात. ध्येयप्राप्तीचा प्रवास बैलगाडीच्या प्रवासासारखा असतो. शेतकरी “ढवळ्या आणि पवळ्या’ या बैलजोडीला गाडीला जुंपतो, हातात कासरे धरून आपण गाडीत बसतो. मागे कुटुंबीय बसतात. गाडी वाटेने खडखडाट करीत करीत जात असते. बैलांना गाडी ओढणे सुखकर होण्यासाठी, शेतकरी चाकात वंगण घालतो, उन्हाचा चटका कमी व्हावा म्हणून बैलांच्या पाठीवर रंगीत, नक्षीदार झूल घालतो, प्रवासाचा शिणवटा कमी व्हावा म्हणून बैलांच्या गळ्यात घुंगरांची माळ घालतो, कुटुंबीयांना सावली मिळावी म्हणून गाडीवर वक्राकार छत घालतो आणि सर्वांचाच प्रवास सुखकर होण्यासाठी एखादं गाणंही म्हणतो व मजल दरमजल करीत इच्छित गावी पोचतो.

    How to Make Your Goals a Reality

    अगदी त्याचप्रमाणे, यशाच्या प्रवासात जिद्द व कष्ट हे दोन बैल असतात. त्यांचे कासरे तुमच्या हातात असतात. या कासरांचा वापर करून दिशा ठरवायची असते. योग्य ठिकाणी वळण घ्यायचे असते. योग्य विचार व आचाराची झूल घालून कुटुंबीयांना प्रेमाचे छत करून चालत राहा, तुमचे इच्छित गाव तुम्हाला सहज भेटेल. गाडीचा रस्ता नेहमीच खडबडीत असतो. तो तसाच असायला हवा. या प्रवासात छोटे मोठे हादरे, धक्के बसतात ते बसायलाच हवेत. कारण गुळगुळीत रस्ता शेवटपर्यंत कधीच नसतो. तो आपल्या इच्छित स्थळापर्यंत नेईलच याची खात्री नसते. म्हणून इच्छित स्थळ जायचे असेल तर रस्ता कसा आहे हे पाहू नका. एकदा इच्छित स्थळी पोचला, की यश हाती येते. पैसा तुमच्या हातात आपोआप येईल व टिकूनही राहील.

    अपयश हीच खरी यशाची पहिली पायरी

    अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत-हून निर्माण केली पाहिजे. नाउमेद, निराश, हताश होऊन चालणार नाही. कारण यांच्याशी सामना करणारी माणसंच यशस्वी होतात. जगातील सर्वच यशस्वी, श्रीमंत माणसं कधी ना कधी, बऱ्याच वेळा अपयशाच्या मार्गातून गेलेली असतात. अपयशातूनच अनुभव मिळतो. अनुभवातून आत्मविश्‍वास निर्माण होतो. आत्मविश्‍वासातून जोम व ताकद मिळते. हाच जोम व ताकद आपल्याला पुढे घेऊन जाते, अपयशच आपल्याला जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. अंगात नवीन बळ देते, विश्‍वास देते, नम्र बनवते आणि परिस्थितीवर मात करण्याची कला व कौशल्य मिळवून देते. म्हणून अपयशाच्या भीतीने येणाऱ्या परिस्थितीचे बळी पडण्यापेक्षा तिच्यावर मात करून यश व समृद्धी मिळवा.

  • छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

    छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

    साल १९१६. इटली तेव्हा अनेक समस्यांमधून जात होती. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे हरतऱ्हेचे बदल हा देश उघड्या डोळ्यांनी पाहत होता. काही लोक रोजच्या जेवणासाठी तडफडत होते तर काही जीवनासाठी. या दरीमध्ये आणखी एक वर्ग होता ज्याला ना या बदलांमुळं फरक पडायचा ना कोणाच्या मरणामुळं. रोज उठायचं, शेतात जाऊन कष्ट करायचे आणि आपलं पोट भरायचं असंच आयुष्य तो वर्षानुवर्ष जगत होता. अशी अनेक कुटुंब होती आणि यातल्याच एका कुटुंबात जन्म झाला फेरुशिओचा.

    लहानपणापासून हा मुलगा आपल्या वडिलांना शेतामध्ये मदत करायचा. ‘जसं आपल्या बापानी आपल्याला शेतीचा वारसदार बनवलं, तसंच आपण पण याच्या नावावर अख्खी जमीन करायची असं त्याच्या वडिलांनी ठरवलं.’ पण शेती इकायची नसते राखायची असते हे काही छोट्या फेरुशिओला माहिती नव्हतं. त्याला नाद होता tractor चा. खराब झालेल्या tractor चे part दुरुस्त करण्यात हा पठ्ठ्या तासन् तास घालवायचा. शेवटी त्याच्या वडिलांना ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फेरुशिओ मोठा झाला आणि त्याने शेती न करण्याचा निर्णय घेतला. या छोट्या गावात आता जास्त वेळ न अडकता आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे असं त्याला वाटलं आणि Bologna (बोलोन्या) च्या Technical college मध्ये तो दाखल झाला. Graduation झाल्यावर त्याला लगेच जॉब मिळाला, पण इटलीत चाललेल्या सततच्या युद्धामुळे तो काही फार काळ टिकू शकला नाही. त्यातच फेरुशिओला Royal Italian Air Force मध्ये जबरदस्तीने दाखल करण्यात आलं, पण पोराला गाड्यांबाबत बरंचसं ज्ञान आहे हे कळल्यानंतर त्याला तिथं जास्त वेळ न ठेवता Greek च्या Rhode Island ला पाठवण्यात आलं; कशासाठी, तर Army चे जे काही tractors, trucks होते त्यांच्या maintenance करायला. युद्ध संपल्यावर सैन्याच्या सगळ्या तुकड्या तिथून गेल्या, पण फेरुशिओ मात्र गेला नाही. त्यानं तिथली Citenzship घेतली आणि तिथंच छोटसं mechanical workshop उघडलं. दोन वर्षांनी म्हणजे १९४५ साली मित्र राष्ट्रांनी पुन्हा या Island वर कब्जा केला. अन दिसेल त्याला तुरुंगात टाकायला सुरुवात केली. यात फेरुशिओचा सुद्धा नंबर लागला. पण यावेळीसुद्धा त्याला तारलं ते त्याच्या mechanical skills नी. वर्षभर त्यानं तिथल्या गाड्या repair केल्या. 1946 मध्ये त्याला तुरुंगातून सोडून त्याच्या मायदेशी म्हणजेच इटलीला पाठवलं गेलं.

    जॉब गेला होता आता पुढं काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. मध्येमध्ये तो काही गाड्यांची कामं वगैरे करायचा पण fix असं काही ठरत नव्हतं. याच काळात त्यानं एक गोष्ट observe केली ती म्हणजे इटलीची एकूण आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली होती की त्यामुळं शेतकऱ्यांना tractor घेण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. आपण या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटलं. दुसरीकडंक petrol, diesel च्या किंमती वाढत होत्या. त्यामुळे महागाई वाढली. देशाचा आर्थिक कारभार काही प्रमाणात का होईना सुरळीत होईल या आशेने इटालियन सरकारने एक निर्णय घेतला; Military ची काही वाहने विकण्याचा. झालं फेरुशिओला सोन्यासारखी संधी चालत आली होती. यातली बरीचशी वाहनं त्यानं विकत घेतली. या वाहनांपासून tractor बनवण्याचा त्याच्या डोक्यात होतं. यासाठी त्याने “British Morris Engine” विकत घेतलं. या इंजिनला modify करून त्यांना आपल्या tractor मध्ये use करायचं ठरवलं.

    Engine ready होतं, design वर काम चालू होतं. दिवस जात होते तसा तसा फेरुशिओ आपल्या स्वप्नाकडं एक एक पाऊल टाकत होता. ३ फेब्रुवारी १९४८ शेवटी तो दिवस उजाडला, Lamborghini चा पहिला tractor साकार झाला होता. खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे म्हणा किंवा त्यासाठी लागणाऱ्या छोट्या जागेसाठी म्हणा हा tractor लोकांना चांगलाच आवडला. पहिल्या slot मधले सगळे tractors sold out झाले. फेरुशिओने परत British Morris Engine विकत घेतले, पण यावेळेस quantity होती एक हजार. दिवसेंदिवस फेरुशिओच्या यशाचा आलेख वरवरच जात होता. एवढं सगळं असूनही त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. Tractor चा sale होतोय, तो लोकांना आवडतोय हे चांगलंचय, पण यातलं engine आपलं नाही याची हुरहुर त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

    त्यानं ठरवलं आता tractor धावणार, तर आपल्याच engine ने. म्हणजे सलमान खान म्हणतो तसं, “एक बार जो मैंने कमिटमेंट करदी, तो फिर में अपने आप की भी नहीं सुनता!” असंच काहीतरी. आणि खरंच ठरवल्याप्रमाणे त्यानं स्वतःचं engine तयार केलं होतं. आता त्याला imported British Morris Engine वापरण्याची गरज नव्हती. दुधात साखर म्हणून कि काय त्याच सुमारास सरकारने सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केलेली की, इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याला tractor खरेदीवर loan मिळेल. फक्त तो tractor “Made in Italy” असावा. या काळात Lamborghini चे इतके tractor sale झाले की फेरुशिओ इटलीतला सर्वात श्रीमंत माणूस बनला.

    इटालियन Cars त्यावेळी जगभरातल्या रस्त्यांवर धावत होत्या. Fiat, Maserati, Ferrari एक से बढकर एक कंपन्या. Celebrities’ पासून मोठमोठ्या businessman पर्यंत सर्वांनाच या cars नी भुरळ घातली होती. फेरुशिओ सुद्धा याला अपवाद नव्हते. वेगवेगळ्या brands च्या cars त्यांच्या collection मध्ये होत्या. यातली सगळ्यात महागडी आणि luxurious car म्हणजे “Ferrari 250 GT”. Ferrari त्यावेळी सगळ्यात नावाजलेली कंपनी होती

    सगळ्यांनी या Ferrari ला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. Ferrari 250 GT ने तर विक्रीचे सगळे record break केले होते. फेरुशिओंनी सुद्धा ही car घेतली, पण त्यांना तिच्यात विशेष असं काही वाटलं नाही. या कारचा driving experience किमतीच्या मनाने खूपच वाईट आहे असं त्यांना वाटायला लागलं. दुसरा एक problem म्हणजे तिच्या clutch plate सारख्या खराब व्हायच्या.  एकदा mechanic त्या plates बदलत असताना फेरुशिओंचं लक्ष त्या plates कडं गेलं आणि त्यांना धक्काच बसला. या so called luxurious, expensive, high performance कार मध्ये त्याच Clutch plates वापरल्या जात होत्या, ज्या Lamborghini च्या tractor मध्ये वापरल्या जायच्या. फेरुशिओंनी त्या गाडीत दुसऱ्या plates टाकल्या आणि तडक निघाले Ferrari चे मालक Enzo Ferrari यांना भेटायला. Enzo नी Ferrari ला शून्यातून उभं केलं होतं. प्रचंड यशामुळे थोडासा प्रकारचा अहंकार त्यांना झाला होता. आपण जर आपल्या problem विषयी Enzo ना सांगितलं, तर कदाचित ते आपल्या गाड्यांमध्ये सुधारणा करतील असं फेरुशिओना वाटत होतं. पण Enzoचे पाय जमिनीवर नव्हतेच. त्यामुळं उलट ते फेरुशिओंवर संतापले. “Clutch हा माझ्या गाडीचा problem नाहीये. तुलाच Ferrari drive करायला जमत नाही.” एवढंच नाही, ते पुढं म्हणाले, “तू tractor बनवतोय तर तेवढच कर, कार कशी बनवायची हे मला माहितीये, ते मी बरोबर करतो.”

    Lamborghini Miura

    “माणूस जेव्हा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा अशा काही घटना घडतात की, निरंतर मिळणारं यश एकदम क्षणिक वाटू लागतं”. फेरुशिओंच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं. Car सोबत tractor चा बिझनेसही एकदम जोरदार चालला होता, पण अचानक tractor ची एक मोठ्ठी order cancel झाली. त्यामुळं कित्येक ready tractors तसेच पडून राहिले. त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. नाईलाजाने पूर्ण कंपनीचं आपल्या competitor ला विकून टाकली. जी tractor ची गत झाली, तीच Cars ची झाली. त्यातलेही 51% त्यांना विकावे लागले. पुढं काही वर्षात Oil Crisis, तेलाचा तुटवडा झाला. कार manufacture करणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळं फेरुशिओंनी उरलेले 49% सुद्धा विकून टाकले. आता फेरुशिओंकडे काहीच नव्हतं. Automobile Industry तून पूर्णपणे बाहेर पडल्यावर त्यांनी एक wine making चा business सुद्धा केला.

    झाली संपली गोष्ट! काय झालं गोष्ट चांगली नाही वाटली? पुढं Lamborghini चं काय झालं हे जाणून घ्यायचंय? Hmm ठीके… पाहूया पुढं काय झालं ते! १९७० मध्ये “SAME” या group ने Lamborghini Tractor कंपनी विकत घेतली. दहा वर्षांनी १९८० साली Lamborghini Automobiles म्हणजेच Car कंपनी मीम्रन बंधूंनी विकत घेतली. पण त्यांनासुद्धा कंपनीला तारता आलं नाही आणि पुढच्या सात वर्षात ही कंपनी “Chrysler” कडे गेली. तो काळच असा होता की car विक्रीचं प्रमाण खूप कमी झालं होतं. शेवटी Chrysler लाही loss झाला आणि त्यामुळं त्यांनी ही कंपनी विकली “Volkswagen” ला. Volkswagen कडे आधीच Audi, Bentley, Skoda अशा कंपन्या होत्या आणि आता त्यात भर पडली Lamborghini ची. Design मध्ये असणारे changes, performance मध्ये असणारे changes Volkswagen ने व्यवस्थितरित्या हेरले. आणि त्याचमुळे Lamborghini जगभरातले रस्ते काबीज करण्यासाठी सज्ज झाली. पुन्हा एकदा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • १००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांची आज जयंती… विनम्र अभिवादन

    १००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांची आज जयंती… विनम्र अभिवादन

    १८८९ साली पॅरिसमधे एका विशाल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दोनपैकी एका पूर्ण भागात फक्त एकाच माणसाच्या संशोधनाने मंडप व्यापून टाकला होता ती थोर व्यक्ती म्हणजे, ‘थॉमस अल्वा एडिसन’. या वैज्ञानिकाला पॅरिसला सादर आमंत्रित केले होते आणि त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ११ फेब्रुवारी १८४७ हा जन्मदिवस आहे त्याचा….

    वयाच्या १० व्या वर्षीच एडिसनने घरातील कोठारात एक प्रयोगशाळा थाटली. पैसे कमी पडू लागले म्हणून याने ग्रँड ट्रंक रेल्वेच्या धावणार्‍या आगगाडीत वर्तमानपत्र व चॉकलेट विकावयास सुरुवात केली. एके दिवशी धावपळीत आगगाडी सुटली. गाडी पकडण्याच्या प्रयत्न असलेल्या एडिसनच्या दोन्ही हातात वस्तू होत्या, म्हणून एका सहप्रवाशाने त्याचा एक कान धरून त्याला गाडीत ओढले. या धडपडीत त्याचा एक कान निकामी झाला. पण याच एका वर्षाच्या कालावधीत एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत एक सर्वसाधारण टेलिग्राफ मशीन निर्माण करण्यात यश संपादन केलं होतं.

    १८६२ मधे एडिसनला एक लहान मुलगा रुळावर खेळताना आढळला. आपला जीव धोक्यात घालून एडिसनने त्याला वाचवले. त्यामुळे स्टेशनमास्तर असलेले त्या मुलाचे वडील खुश झाले आणि बक्षीस म्हणून त्यांनी एडिसनला टेलिग्राफी शिकविली. १८६८ उजाडताच एडिसनने आपले पहिले टेलिग्राफ तयार करून आपले पहिले पेटेंट मिळविले. आपलं टेलिग्राफ उपकरण त्याने एक्सचेंजच्या अध्यक्षाला या अपेक्षेने विकले की, त्याला २,००० डॉलर तरी मिळतील. एक्सचेंजच्या अध्यक्षाला ते टेलिग्राफमशीन इतके भावले की, त्यांनी एडिसनला या टेलिग्राफ मशीनचे ४०,००० डॉलर दिले. ही घटना एडिसनला एका निर्णायक दिशेने घेऊन जाण्यात कारणीभूत ठरली.

    बॅटरी तयार करण्याच्या प्रयत्नात त्याचे ८००० प्रयोग फसले. एकाने त्यांना म्हटले ‘‘विनाकारण वेळ गेला हे ८००० प्रयोग करण्यात!’’ एडिसनने उत्तर दिले, ‘‘अरे मला ८००० शोध लागलेत की या पदार्थांच्या संयोगाने चांगली बॅटरी बनू शकत नाही.’’ याला म्हणतात शोधकर्ता!

    कधी कधी महान शास्त्रज्ञसुद्धा अगदी बालिशपणे वागतात. कोणे एकेकाळी दिलीपकुमार श्रेष्ठ की अभिताभ बच्चन श्रेष्ठ,असा वाद त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असे. हा वाद तसा आजही सुरू आहे. पण त्यात आणखी दोन-चार अभिनेत्यांच्या नावांची भर पडलेली आहे. एडिसन व टेस्ला यांच्या चाहत्यांतसुद्धा हा अशा प्रकारचा वाद आजही सुरू आहे. कोण मोठा शास्त्रज्ञ आहे? एडिसन डायरेक्ट करंट (DC)चा खंदा समर्थक. परंतु टेस्ला अल्टर्नेट करंट (AC) तंत्रज्ञानावर दृढ विश्वास असणारा (आणि टेस्लाचच बरोबर होतं!).

    एडिसन व टेस्ला यांच्यात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. एडिसन हे ‘व्यावहारिक’ शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनाचा सारा कल या एकाच गोष्टीवर अवलंबून होता. ज्या शोधाचा उपयोग सर्वसामान्यांच्या मदतीसाठी होत नसेल व त्यातून कोणतीही अर्थप्राप्ती होत नसेल तर त्या शोधाकडे ते ढुंकूनही पाहत नसत. याच कारणास्तव ते शास्त्रज्ञ-व्यापारी किंवा धंदेवाईक शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. आपल्या कार्याची व्याप्ती वाढण्यासाठी व नवनवीन संशोधनाचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पदरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांची फार मोठी फौज जमा केली होती. हे सारे वेगवेगळय़ा प्रश्नांवर काम करत राहायचे व एखादा शोध लागला की, त्याचं पेटंट एडिसन यांच्या नावावर जमा व्हायचं.

    टेस्ला यांची ही विद्युत प्रणाली अधिक लोकप्रिय झाली तर त्यांना त्यांच्या एक दिशा विद्युत पद्धतीचा गाशा गुंडाळावा लागेल याची एडिसनना मनोमन खात्री पटली. त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याकारणानं टेस्ला यांची पद्धत कशी व किती धोकादायक आहे व या प्रणालीचा त्रास कशाप्रकारे होऊ शकेल हे दाखवून व पटवून देण्यासाठी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मुक्या जीवांना व प्राण्यांना ‘शॉक’ देऊन मारण्याचा उपद्व्याप सुरू केला. त्यांच्या या हीन कृत्यांतून अनेक कुत्रे, मांजरी, गाई, म्हशी, घोडे व एका हत्तिणीला हकनाक प्राण गमवावे लागले. ६ ऑगस्ट १८९० रोजी पहिल्यांदा एडिसनच्या आग्रहाखातर एका कैद्याला प्रत्यावर्ती करंटच्या साहाय्याने हाल हाल करून मारण्यात आले. एडिसनचा हा सारा खटाटोप स्वत:चे व्यापारी हित जोपासण्यासाठी होता. एवढे करूनही त्यांना हवा तो परिणाम साधता आला नाही. आज टेस्ला यांची प्रत्यावर्ती विद्युत प्रणाली सरस ठरलेली आहे. पुढे एडिसनला त्यांचे पूर्व सहयोगी टेस्ला सोबत नोबेल पारितोषिक मिळणार होतं, परंतु टेस्लाने एडिसनसोबत पारितोषिक घेण्यास नकार दिला आणि दोघेही नोबेलपासून वंचित राहिले.

    आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शोध करण्याची मानसिकता ठेवणारा हा महान वैज्ञानिक अत्यंत मृदुभाषी होता. त्याचं खालील वाक्य त्याची नम्रता सांगून जाते.

    ‘‘माझ्या यशात विद्वत्तेची भूमिका १ टक्का आणि परिश्रमाची भूमिका ९९ टक्के आहे!’’ पण जर कोणी निकोला टेस्ला यांना हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी जिनियस म्हणजे नव्याण्णव टक्के स्फूर्ती व एक टक्का मेहनत असं उत्तर बहुधा दिलं असतं. अशा प्रकारची परस्परविरोधी उत्तरं थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला यांच्या अंगभूत गुणवैशिष्टय़ांना समर्पकपणे अधोरेखित करतात. ते दोघेही अतिशय महान वैज्ञानिक होते.

    संदर्भ :- शिरीष उऱ्हेकर यांचा एडिसनवरील लेख

  • तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

    तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

    बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत असतात. धंदा तोच असतो, प्रॉडक्‍ट तेच असते, मार्केट तेच असते, तितकाच वेळ सर्वांकडे असतो. काही वेळेला तर भांडवल देखील कमी असते, तरी पण मोजके लोक चांगला धंदा करतात व बाकीचे रडतखडत किंवा कसा तरी धंदा चालवत असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे ? फरक आहे तो ऍटिट्यूडचा म्हणजे वृत्तीचा. एकाचे धंद्यावर प्रेम असते, तर दुसरा करावा लागतो म्हणून किंवा आता दुसरे काय करू म्हणून धंदा करीत असतो.

    याच वृत्तीवर – “ऍटिट्यूड‘वर एक तत्त्व लागू होते. त्याला “पॅरेटोज लॉ‘ म्हणतात किंवा “80/20‘ म्हणतात. एकाच मार्केटमध्ये 20 टक्के उद्योजक मिळून 80 टक्के धंदा करतात. उदा. शंभरातील वीस व्यापारी. एकूण धंदा समजा शंभर कोटींचा असेल, तर ऐंशी कोटींचा धंदा ते करतात. उरलेले ऐंशी, वीस कोटींच्या धंद्यात मारामारी करतात, हे तत्त्व सगळीकडे लागू होते, कारखानदारीत, व्यापारात, पेठेत, रोडवर, डॉक्‍टर, वकील व इतर व्यवसायात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. अगदी नोकऱ्या मिळण्यामध्ये देखील म्हणजे काहींना अजीर्ण होईल इतके मिळते व काहींना उपाशी राहावे लागते. असे का होते, तर त्याला वृत्तीच कारणीभूत असते.

    तुमचे जर तुमच्या व्यवसायावर प्रेम असेल, तर निश्‍चितच तुम्ही चांगला धंदा करू शकता. प्रेम कशाला म्हणतात, तर ज्याला कधी एकदा सकाळ होते व मी माझ्या उद्योगात जाऊन रमतो असे वाटते. जो कधीही आपल्या धंद्याबद्दल रडत बसत नाही, आपला धंदा वाईट आहे असे म्हणत नाही. धंद्यावर प्रेम असले की त्याला उत्साह असतो, जोश असतो, नवे विचार मनात येतात. अडचणी जरूर येतात; पण त्याला न घाबरता तो तोंड देतो, खचून तर निश्‍चितच जात नाही. उलट जोमाने कामाला लागतो.

    ज्यांचे धंद्यावर प्रेम असते, ती संस्था-कंपनी अगदी नोकरापासून मालकापर्यंत उत्तम काम करते व अर्थातच भरपूर नफा कमविते. एकदा का आपल्याला आपला धंदा मनापासून आवडतो म्हटले, की आपोआपच त्याला लागणाऱ्या योग्य गोष्टी घडतात. तुमचा स्टाफ, कामगार, ग्राहक, बॅंका, शेअरहोल्डर, आजूबाजूचा समाज सर्व जण खूष राहतात. कित्येक वेळेला, धंद्यामध्ये मागून आलेले लोक पुढे जातात, मोठे होतात. कारण अगोदरपासून त्या व्यवसायात असलेले लोक गाफील राहतात. धंदा ज्याप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते करीत नाहीत, योग्य बदल करीत नाहीत. निश्‍चितच कोठे तरी धंद्यावरचे प्रेम कमी झालेले असते. अलीकडे तर हे फार पाहायला मिळते.

    प्रत्येकाला दुसऱ्याचा धंदा चांगला वाटतो. तिथूनच गडबड सुरू होते. अनेक वेळेला मालकाचे वय झालेले असते, उत्साह कमी झालेला असतो, नवीन पिढी व्यवसायात येणार नसते; मग प्रेम कमी व्हायला लागते. धंदा तोच, पण आवड कमी झाल्यावर निश्‍चितच धंदा कमी व्हायला सुरू होतो. त्यामुळे जो उत्साही आहे, ज्याला आपला धंदा आवडतो, त्यालाच संधी दिसते. त्याच्या मनाची दारे कायम उघडी असतात व तेथेच लक्ष्मी येते.

    आज हवाच खराब आहे‘, “खूप कॉम्पिटीशन वाढली आहे‘, “पूर्वीसारखे मार्जिन राहिलेले नाही‘, “धंद्यात दम नाही‘, “सरकारची पॉलिसी बरोबर नाही‘, “जागतिक मंदी आहे‘, “पाऊसच पडलेला नाही‘.. अशी कारणे बऱ्याचदा ऐकू येतात. ते अगदी खरेही असेल; पण नुसती चर्चा करून काय होते, बोलून काय होते? अशी वाक्‍ये रोज पावलो-पावली ऐकायला मिळतात. एकतर आपल्याला आपला व्यवसाय चिकाटीने करायचा असेल, तर अशी वाक्‍ये बोलूच नाहीत व तसे बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहावे. कारण त्यांना फक्त रडायला खांदा हवा असतो.

    – अनामिक

  • जिद्दीला सलाम! 50 लाखांचे लोन घेऊन शून्यातून हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणारा बहाद्दर, रंजक स्टोरी वाचाच

    जिद्दीला सलाम! 50 लाखांचे लोन घेऊन शून्यातून हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणारा बहाद्दर, रंजक स्टोरी वाचाच

    शून्यातून भलंमोठं साम्राज्य निर्माण करण्याची धमक आपल्याकडे असायला पाहिजे. अशीच धमक टीएस कल्याणरमन यांच्यात होती. त्यामुळेच त्यांची आज फक्त भारतातच नाही, तर जगात ख्याती पसरली आहे. एक काळ होता, जेव्हा त्यांनी कर्ज काढून स्वतःचं ज्वेलरी शॉप सुरू केले होते. मात्र, आज तोच एक प्रचंड मोठा ब्रँड बनला आहे. आज त्यांचे ज्वेलरी दुकानं एका शहरापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत.

    आम्ही ज्या ज्वेलर्सबद्दल बोलत आहोत, ते इतर कोणी नसून कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) आहे. कल्याण ज्वेलर्स हे नाव, गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनीच ऐकले असेल. कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक टीएस कल्याणरमण (TS Kalyanraman) यांची एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कहाणी वेगळी आणि प्रेरणा देणारी आहे. कल्याणरमण यांनी शून्यातून सुरुवात करून यशाचे शिखर गाठले आहे. चला तर, त्यांच्या रंजक प्रवासाविषयी जाणून घेऊयात.

    व्यापारी कुटुंबात जन्म

    अब्जपती लोकांच्या पंक्तीत विराजमान झालेल्या टीएस कल्याणरमण यांचा जन्म भारत देश स्वतंत्र होण्याच्या चार महिन्यांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल १९४७ रोजी केरळच्या त्रिशूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना व्यवसायाचे बाळकडू बालपणीपासूनच मिळाले होते. त्यांचे वडील टीआर सीतारामय्या कपड्याचे व्यापारी होते. तसेच, कल्याणरमण यांचे आजोबा हे पुजारी होते. मात्र, नंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली होती. रंजक बाब अशी की, कल्याणरमण हे अवघ्या १२ वर्षांच्या वयातच आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानात मदतीसाठी जायचे. तिथेच त्यांनी व्यवसायाची बाराखडी शिकली होती. मात्र, शालेय शिक्षणही तितकेच गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजात ऍडमिशन घेतले आणि याच कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली.

    कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय

    हा व्यवसाय ५ भावांमध्ये विभागला होता. त्यांना ज्वेलरी शॉप्सने भरलेल्या त्रिशूरच्या मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान मिळाले होते. मात्र, आजूबाजूच्या दुकानांपासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या पारंपारिक कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेतला. गाठीशी २५ लाखांची बचत होती; मात्र, ज्वेलरी शॉप सुरू करण्यासाठी एवढे रुपये पुरेसे नव्हते. त्यासाठी त्यांनी बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याकडे ७५ लाख रुपये जमा झाले होते. याच रक्कमेतून त्यांनी त्रिशूरमध्ये १९९३साली एक ज्वेलरी शॉप सुरू केले. हीच ती कंपनी, जिला आज संपूर्ण जग कल्याण ज्वेलर्स म्हणून ओळखते.

    The inspiring story of T.S. Kalyanaraman

    एकदम सोपी होती आयडिया

    आपल्या व्यवसायात पारदर्शकता ठेवण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. जुन्या पारंपरिक बुकलेट्सचा वापर न करता त्यांनी ग्राहकांसाठी जी ज्वेलरी दुकानात ठेवली होती, त्यासोबत त्यांची मूळ किंमतही लावली. कल्याणरमन यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी ज्वेलरीची जी दुकानं पाहिली होती, ती खूपच छोट्याशा जागेत असल्याचे त्यांनी हेरले होते. यामुळे आपले वेगळेपण सिद्ध करायचे तर आपण व्यवसायात उतरताना, आपले दुकानही तितकेच प्रशस्त असायला हवे, हे त्यांनी ठरवले. त्यांनी सुरुवातीला तब्बल ४००० स्क्वेअर फूट जागेवर मोठे दुकान सुरू केले. ज्यामुळे लोकांना ज्वेलरी खरेदी करताना रियल-टाईम अनुभव मिळेल. विशेष म्हणजे, त्यांनी लढवलेली ही शक्कल यशस्वी ठरली.

    पहिल्या वर्षाच्या अखेरपर्यंत कल्याण ज्वेलर्सने ३० लाख रुपयांचा सेल केला होता. त्यांच्या दुकानात लोकांना प्रीमिअम अनुभव घेता येत होता. कारण, त्यांनी एसी, स्वच्छ टॉयलेट्स आणि पार्किंगच्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या. यानंतर त्यांनी पल्लकड येथे आणखी एक ४००० स्क्वेअर फूटाचे दुकान सुरू केले. मात्र, यावेळी त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली, जी त्यांना यापूर्वी माहितीदेखील नव्हती. खरं तर, त्रिशूर आणि पल्लकडमधील ५६ किमीच्या परिघातही दागिन्यांची वेगळी बाजारपेठ होती. म्हणून, त्यांनी हायपर-लोकल टचवर लक्ष केंद्रित केले आणि पल्लकडमधील आपले ज्वेलरी शॉप यशस्वी करून दाखवले.

    How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

    दशकभरात सुरू केली ३२ दुकाने

    सन १९९८मध्ये कोयम्बतूर बाँब ब्लास्ट झाला आणि त्यांना आपला व्यवसाय पल्लकडच्या सीमेजवळील शहरात शिफ्ट करावा लागला. कल्याणरमण यांना वाढती मागणी हाताळण्यासाठी राज्यात अनेक दुकाने सुरू करायची होती. २०१२ साल उजाडताच त्यांनी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे दागिण्यांची ३२ दुकाने सुरू केली. पाहता पाहता कल्याण ज्वेलर्स दक्षिण भारतातील स्टार ब्रँड तयार झाला.

    दक्षिण भारताबाहेर विस्तारला व्यवसाय

    बीआयएस प्रमाणपत्रासह १०० टक्के प्युअर सोने विकणारा पहिला ब्रँड असणाऱ्या कल्याण ज्वेलर्सने दक्षिण भारताबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. यासाठी त्यांनी २०१२मध्ये अहमदाबाद येथे आपले दागिण्यांचे दुकान सुरू केले. यावेळी त्यांनी मोठा डाव खेळला. त्यांनी ‘माझे सोने, माझा हक्क’ (My Gold, My Right) या कँपेनसह महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपला ब्रँड अँबेसेडर बनवले.

    How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

    कँपेनमुळे बनला ५ हजार कोटींचा ब्रँड


    अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या कँपेनमुळे कल्याण ज्वेलर्स ५ हजार कोटी रुपयांचा ब्रँड बनला. एवढंच नाही, तर तब्बल ९० कोटी मार्केटिंग बजेटसह बॉलीवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर सेलिब्रिटींसोबत करार केला. यानंतर कल्याणरमणजींनी पहिल्यांदा देशाबाहेर झेप घेतली. त्यांनी २०१३ मध्ये यूएईमध्ये फक्त एकाच दिवसात आपली ६ दुकाने सुरू केली.

    कल्याण ज्वेलर्सने हायपर लोकल दृष्टिकोन ठेवत आणि वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळ्या ज्वेलरीही लाँच केल्या आहेत. त्यात मुहुरत या वेडिंग ज्वेलरी आणि अनोखी, झिया, तेजस्वी या डायमंड ज्वेलरींचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या प्रगतीत वेगाने वाढ होत आहे. 2020पर्यंत कल्याण ज्वेलर्सने आपला व्यवसाय 140 दुकानांपर्यंत नेला आणि तब्बल १० हजार कोटी रुपयांची कंपनी बनण्याचा बहुमानही मिळवला.

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश

    कल्याण ज्वेलर्स कंपनीचा IPO २६ मार्च, २०२१मध्ये NSE आणि BSE लिस्ट झाला. ही कंपनीची सर्वात मोठी भरारी ठरली. स्टॉक मार्केटला लिस्ट झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने टाटासारख्या बलाढ्य पाठबळ असलेल्या टायटन आणि पीसी ज्वेलर्सलाही टक्कर दिली. सध्या कल्याण ज्वेलर्सच्या शेअरची किंमत 339 रुपयांपेक्षा जास्त आहे.

    कल्याण ज्वेलर्सचे बाजारमूल्य

    आज घडीला टीएस कल्याणरमण हे भारतातील सर्वात श्रीमंत ज्वेलर मानले जातात. कल्याण ज्वेलर्सने मागील वर्षी ४३२ कोटींच्या नफ्यासह १४०७१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. विशेष म्हणजे, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड किती मोठा आहे याचा अंदाज त्यांच्या एकूण दुकानांच्या संख्येवरूनच येतो. सध्या संपूर्ण भारत आणि यूएईत कल्याण ज्वेलर्सचे तब्बल २०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

    How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

    या लेखाचा शेवट करताना टीएस कल्याणरमण यांच्याविषयी आणखी एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. ती अशी की, वयाची सत्तरी (७३) पार करूनही कल्याणरमण आजही दर महिन्याला कोणत्याही १५ ग्राहकांना फोन करतात. तसेच, त्यांच्याकडून आपल्या दागिन्यांविषयी प्रतिक्रिया जाणून घेतात. यावरूनच समजते की, कल्याणरमण हे ग्राहकांशी आणि आपल्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहेत.

  • अनुक्रमणिका

    अनुक्रमणिका

    स्वतःच्या क्षमतावर असणारा विश्वास अधिक दृढ करायचा आहे, न्यूनगंडावर मात करायची आहे, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवायची आहे, विसरभोळेपणा विसरायचा आहे, रागावर नियंत्रण मिळवायचे आहे, जीवनात संयम आणायचा आहे, जोखीम घ्यायची क्षमता वाढवायची आहे व व्यक्तीमत्त्व प्रभावशाली बनवायचे आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ही लेखमालिका महत्त्वाची आहे.

    इंटरनॅशनल शाळा, सीबीएसई, तसेच पब्लिक स्कूल (अर्थात भरपूर पैसे भरुन जिथे शिक्षण विकत घेतले जाते व दर्जेदार शिक्षणाचा फुगा फुगवला जातो अशा खाजगी शाळा) मधून (या प्रकारच्या संस्थाना आपण अ गट म्हणू या.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जिल्हा परिषद शाळा, मुन्सिपालिटीच्या शाळा, सरकारी विद्यालये, बोर्डिंग स्कूल, विनानुदानित शाळांमध्ये (या प्रकारच्या संस्थाना आपण ब गट म्हणू या.) शिक्षण घेणारे विद्यार्थी कुठेच कमी नाहीत याची जाणीव दोन्ही वर्गाला होईल. त्यातून विकासाचा मार्ग पुढे जात राहील. अ गटात ब गटापेक्षा असणारी साधने नक्कीच प्रभावशाली आहेत. मात्र त्या साधनांना वापरण्यासाठी त्याचा योग्य परिणाम साधण्यासाठी करावी लागणारी साधना करण्याची क्षमता दोन्ही गटाकडे सारखीच आहे. या साधनेचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे. 

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक 

    १. शिक्षणाचे महत्त्व 

    २. कल ओळखण्याची कला 

    ३. शिकण्याच्या पध्दती 

    ४. ऐकून शिकण्याचे महत्त्व

    ५. बघून शिकण्याचे महत्त्व 

    ६. अनुभवातून शिकण्याचे महत्त्व 

    भाग २ – शिक्षणाच्या पुढील टप्प्यावर 

    ७. आकलन – वाचनाची गरज 

    १०. लेखन एक देणगी 

    ११. पाठांतराला फाटा देऊन लक्षात ठेवण्याची कला 

    १२. योग्य वेळी योग्य गोष्टी आठवण्याची पध्दती 

    १३. जगताना चालता फिरता शिकण्याचे तंत्र 

    १४. मुल्ये जोपासताना – मुल्यांचे मूल्य 

    १५. शिक्षणातून करिअरकडे जाताना 

    भाग ३ – व्यावहारिक जगात शिक्षणाची सांगड 

    १४. कविता जीवन मधूर करतात 

    १५. गणिताने व्यवहार सुलभ होतात 

    १६. गणिताची भीती घालवण्याची सोपी पध्दत 

    १७. अवघड सुत्रांना मित्र बनवू या 

    १८. इतिहासातील सनावळ्या झाल्या 

    १९. चित्रकलेने आयुष्यात भरले रंग 

    २०. खेळामुळे जीवन बनते आनंदी 

    २१. भूगोल म्हणजे सहलीची मजा 

    २२. मराठी-हिंदी-इंग्रजी भाषा म्हणजे ताई-माई-अक्का 

    २३. नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र म्हणजे मैत्रीचे धडे 

    २४. शब्दकोडी म्हणजे जीवनातला विरंगुळा 

    २५. चर्चेतून शिकू या सारे काही 

    २६. बाजारातील घटकांचे गणित 

    २७. उद्योगशिक्षणासाठी कार्यानुभव 

    २८. शिक्षणातील गमती (मजेशीर अनुभव) 

    २९. अनेक विषय म्हणजे ताण नाही तर मजा 

    भाग ४ – परिक्षा म्हणजे महोत्सव 

    ३०. चुटकीसरशी घालवू परिक्षेची भीती 

    ३१. परिक्षेची वाट पाहताना

    ३२. रोजच पाहिजे शाळा – शिक्षणाची गोडी 

    ३३. विषयाची भीती नको – गंमत जाणून घेऊ 

    ३४. मुलाखती म्हणजे गप्पांचा अड्डा 

    ३५. भाषण माझ्या आवडीचे 

    ३६. स्टेज गाजवायचा – रंगमंचावर रंग भरताना 

    ३७. चला शिक्षकमित्र बनू या

    भाग ५ – व्यक्तिमत्व विकास : सारे काही शिकताना 

    ३८. आत्मविश्वासाला बाहेर काढू, संकटांना भिडू 

    ३९. चार भिंतीतल्या शिक्षणाच्या मर्यादा जुगारताना 

    ४०. नवीन भाषा – संकट नव्हे संधी 

    ४१. आनंदाने समाजात वावरताना 

    ४२. भूतकाळ भूतकाळात जमा 

    ४३. वर्तमानातून भविष्याकडे 

    ४४. न्यूनगंड, भीती, नकारात्मकता हद्दपार 

    ४५. जोखीम नव्हे पराक्रमाचे मैदान 

    ४६. पैसे मिळवण्याची कला 

    ४७. दानातून मिळणारा आनंद 

    ४८. रागावर मात – जीवन आनंदात 

    ४९. जीवनसंगीताचे सूर जुळवताना 

    ५०. नात्यांचे बंध जोडताना 

    उद्यापासून रोज सकाळी दहा वाजता एक लेख प्रकाशित होईल. शिक्षणाच्या निरंतर प्रवासासाठी शुभ यात्रा. 

  • अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    २६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.

    ‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.

    How Deshbandhu Gupta Turned Rs. 5000 into a Global Pharma Company

    त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.

    डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अ‍ॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.

    The Life and Legacy of Deshbandhu Gupta, Founder of Lupin Pharma

    सौ. लोकसत्ता, व्यक्तिवेध

    आणखी वाचा

  • शिकण्यासाठी सारे काही

    शिकण्यासाठी सारे काही

    त्यासाठी प्रत्येक वेळी शाळेत किंवा महाविद्यालयात गेलेच पाहिजे असे काही नाही. माणूस अनुभवातून शिकत जातो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहून माणूस चांगूल पणा शिकतो. तर यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहून माणूस यशस्वी बनायला शिकतो. पैसेवाल्या लोकांच्या संगतीत राहून त्याला आर्थिक मार्गांचे दर्शन होते. जिथे जाईल तिथे माणूस कळत नकळत बरेच काही शिकत असतो. अध्यात्मिक लोकांच्या उपस्थितीत त्याला शांततेचे दर्शन प्राप्त होते. निसर्गाच्या वास्तव्यात त्याला विश्वाची रहस्ये समजू शकतात.

    The Ultimate Guide to Learning

    शिकण्याची ही प्रक्रिया आईच्या पोटात गर्भावस्थेत असल्यापासून सुरु होत असल्याचे विज्ञानाने मान्य केलेले आहे. महाभारतात सुध्दा अभिमन्यू आई द्रौपदीच्या पोटात असताना चक्रव्यूहात कसे जायचे? ही कला शिकला होता अशी कथा आहे. जन्माच्या आधीपासून सुरु झालेली ही शिकण्याची निरंतर प्रक्रिया माणसाचे अस्तित्व आहे तोपर्यंत चालूच राहते. आईच्या पोटात असताना किंवा लहान असताना तो जे काही शिकतो ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते. आपोआप काही गोष्टी तो शिकत जातो. उदा. चालणे, बोलणे, खाणे अशा काही गोष्टी तो स्वतःहून ग्रहण करतो.

    मात्र अक्षरओळख होणे, गणिते, आर्थिक व्यवहार करणे यासारख्या मानवनिर्मित गोष्टी त्याला नैसर्गिक पध्दतीने शिकता येत नाहीत. त्यासाठी त्याला बाहेरुन प्रयत्न करावे लागतात. या गोष्टी आपोआप होत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या प्रयत्नाने साध्य होईल तेवढे यश संपादन करतो. नैसर्गिक गोष्टीत प्रत्येकजण १०० टक्के यश प्राप्त करतो कारण या गोष्टी आपोआप होत असतात. प्रत्येकजण चालायला शिकतो म्हणजे १०० टक्केच चालायला शिकतो. त्यात निसर्ग भेदभाव करत नाही. प्रत्येकाला तो संपूर्ण क्षमता बहाल करतो. मात्र माणसाला वैयक्तिक विकास साध्य करताना त्याच्या प्रयत्नाइतके यश मिळते. 

    The Ultimate Guide to Learning

    एकंदरीतच शिकण्याच्या व ज्ञान आत्मसात करण्याच्या गोष्टींवर आपल्या विकासाचा व प्रगतीचा दर अवलंबून असतो. म्हणून शिकण्यासाठी सोप्या प्रक्रिया कोणत्या? त्या अधिक प्रभावी कशा करता येतील? त्या सर्वसमावेशक कशा असतील? यावर सविस्तर अभ्यास आपण येणाऱ्या नव्या लेखमालिकेत करणार आहोत. प्रत्येकाला स्वतःच्या कलानुसार शिकण्यास मिळाले तर किती चांगले होईल. सचिनला क्रिकेट, लता संगीत, अमिताभला अभिनय, सायनाला बॅडमिंटन शिकताना जेवढे आवड होती तेवढी कदाचित दुसरे विषय शिकताना नसावी. त्यांना त्यांचे कल व कला समजल्या त्यानंतर त्यांची शिकण्याची व त्यातील सर्वोच्चता साध्य करण्याची वाट मिळाली. विद्यार्थ्यापासून नोकरदारांपर्यंत, गृहिणीपासून उद्योजकापर्यंत प्रत्येकाला शिकण्याचे काय फायदे होतात? याविषयीचे कानमंत्र या नव्या लेखमालिकेत दिले आहेत. 

  • आई करायची दुसऱ्यांकडे घरकाम, मेहनतीच्या जोरावर तो आज आहे जगातील सर्वात महागडा आणि सर्वात श्रीमंत फुटबॉलर

    आई करायची दुसऱ्यांकडे घरकाम, मेहनतीच्या जोरावर तो आज आहे जगातील सर्वात महागडा आणि सर्वात श्रीमंत फुटबॉलर

    गल्ली ते दिल्ली, लंडन ते पॅरिस, जगाच्या पाठीवर कुठेही जा, सर्वोत्तम फुटबॉलपटूंचं नाव विचाराल, तर तुम्हाला ख्रिस्तियानो रोनाल्डो (किंवा लिओनेल मेस्सी) हेच उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारा हा स्टार खेळाडू ५ फेब्रुवारी रोजी आपला ३९वा वाढदिवस साजरा करतोय.

    Special Story About legendary footballer Cristiano Ronaldo on his birthday

    सध्याच्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचा अव्वल क्रमांक लागतो. एवढंच काय, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्याच नावावर आहे. रोनाल्डोविषयी आणखी एक भुवया उंचावणारी बाब अशी की, जगभरात इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डो अव्वलस्थानी आहे. इतके सारे कारनामे करण्याचे अनेकजण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाहीत आणि साध्य करणं तर काहींनाच जमतं, त्यापैकीच एक म्हणजे रोनाल्डो.

    गरीब आई-वडिलांचा चौथा मुलगा

    डोलोरेस आणि जोस डिनिस या दाम्पत्याला 3 अपत्यं होती. त्यात ह्यूगो, केटिया आणि एल्मा यांचा समावेश आहे. यानंतर रोनाल्डोने त्यांचे चौथे अपत्य म्हणून ५ फेब्रुवारी १९८५ रोजी जन्म घेतला. आई डोलोरेस रोनाल्डोला जन्म देऊ इच्छित नव्हती. आपली आत्मकथा ‘मदर करेज’मध्ये डोलोरेस लिहिते की, ती डॉक्टरांशी गर्भपात करण्याविषयी बोलली होती, पण नकार दिला. डोलोरेस आता परमेश्वराला धन्यवाद देते की, तिने ते पाऊल उचलले नाही. रोनाल्डो आता मजेतही म्हणताना दिसतो की, ‘पाहा गं आई! तू माझ्यावेळी गर्भपात करू इच्छित होती आणि आज मीच आहे, जो घरात पैसे आणत आहे.’

    Special Story About legendary footballer Cristiano Ronaldo on his birthday

    दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायची आई

    पोर्तुगालचा फुटबॉलपटू रोनाल्डोच्या आई-वडिलांविषयी बोलायचं झालं, तर त्याचे वडील माळी होते, तर आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण बनवत होती. चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या रोनाल्डोचे कुटुंब पत्र्याच्या घरात राहायचे. रोनाल्डो म्हणतो की, ‘मी खूपच गरिबीत वाढलो. आम्ही प्रचंड गरीब होतो. माझ्याकडे खेळण्यासाठी वस्तू नव्हत्या आणि कोणतेही ख्रिसमस गिफ्टही नव्हते. मात्र, मी कधीही याचा विचार केला नाही.’ आज रोनाल्डो प्रचंड श्रीमंत का असेना, पण तो आपल्या मुलांना तेच संस्कार देऊ इच्छितो, जे त्याच्या आईने त्याला दिले आहेत.

    सतत रडल्यामुळे नाव पडले होते ‘रडका’

    शिक्षण ही काळाची गरज असते. त्यामुळे रोनाल्डोलाही शाळेत धाडले गेले. जेव्हा तो शाळेत गेला, तेव्हा तो घरची आठवण काढून रडू लागायचा. सोबत शिकणारी मुलं त्याला रडका म्हणू लागली होती. रोनाल्डो प्रचंड वेगाने धावायचा, त्यामुळे त्याने फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. त्याने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. रोनाल्डोला अभ्यासापेक्षा फुटबॉलमध्ये जास्त रस होता. त्याने अवघ्या ८ वर्षांच्या वयात स्थानिक संघासाठी फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच्या शानदार प्रदर्शनामुळे त्याची निवड १७ वर्षांखालील संघात झाली होती.

    वयाच्या १८ वर्षांपर्यंत आई सांभाळायची सर्व कमाई

    सन २००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोनाल्डोच्या आईने स्वीकार केले की, १८ वर्षांच्या वयापर्यंत त्यांचे दोघांचे जॉईंट खाते होते. यामध्येच रोनाल्डोचे पैसे यायचे. या सर्व पैशांची देखभाल त्याची आई करत होती. इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने २००३ साली त्याला १७ मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये साईन केले होते. त्याचे वय त्यावेळी फक्त १८ वर्षे होते. यानंतर रोनाल्डोने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो २००९ ते २०१८ दरम्यान स्पेनचा फुटबॉल क्लब रियल माद्रिद संघाचा भाग राहिला. त्यानंतर तो २०१८ ते २०२१ दरम्यान जुवेंटस संघाकडून खेळला. पुढे पुन्हा त्याने २०२१ ते २०२२ वर्षात मँचेस्टर युनायटेडचा हात पकडला. मात्र, ही साथ जास्त काळ टिकली नाही. २०२३मध्ये त्याने अल नासेर या क्लबमध्ये एन्ट्री केली.

    Special Story About legendary footballer Cristiano Ronaldo on his birthday

    संपत्ती आणि कमाईचे स्त्रोत

    जगाच्या पाठीवर नाव कमावणारा रोनाल्डो संपत्तीच्या बाबतीतही तितकाच शक्तिशाली आहे. ज्या रोनाल्डोची संपत्ती २०२०मध्ये फोर्ब्सनुसार ४६० मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३३ अब्ज ५४ कोटी रुपये होती. तीच संपत्ती २०२४ मध्ये रिपोर्ट्सनुसार ४१ अब्ज रुपये आहे. याव्यतिरिक्त रोनाल्डो सोशल मीडियावरूनही बक्कळ कमाई करतो.

    रोनाल्डोचे फेसबुक (१६८ मिलियन), इंस्टाग्राम (६१९ मिलियन) आणि ट्विटरवर (११०.४ मिलियन) मिळून ८९७.४ मिलियन (८९.७४ कोटी) फॉलोअर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डो इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून तब्बल 26 कोटींहून अधिक रुपयांची कमाई करतो. याव्यतिरिक्त त्याच्याकडे आलिशान गाड्यांचाही ताफा आहे. त्यात लॅम्बोर्गिनी एवेंटाडोर, बुगाटी कायरन, मर्सिडीज एएमजी आणि पोर्श करेरा यांसारख्या सुपरकार्सचा समावेश आहे.

    Special Story About legendary footballer Cristiano Ronaldo on his birthday

    वैयक्तिक आयुष्य

    आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक १२८ गोल करणाऱ्या रोनाल्डोच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ५ अपत्यं आहेत. त्यातील ३ अपत्य ही दोन सरोगेट मातांकडून झालेली आहेत. मात्र, त्याने अद्याप कुणाशीही लग्न केले नाहीये. त्याची सध्याची गर्लफ्रेंड स्पॅनिश मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्ज आहे.