प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही, मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत......... तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला, तुमच्यात शक्ती असती तर ......... त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला. गुंडांना भीत जावू नको म्हणावं, त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवित चला त्याला, ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव. मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला, पाहू दे त्याला, पक्षांची अस्मान भरारी ............ सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर .......... आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं...... शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा, सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे . आपल्या कल्पना, आपले विचार, यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने, बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी, त्याला सांगा ................ भल्याशी भलाईनं वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी . माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा ......... जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत, सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी, पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनाच अगदी सर्वांच ........... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत रहावं उरातल दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसवांची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा ......... तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला, अन चाटुगिरीपासून सावध रहायला. त्याला हे पुरेपूर समजवा की, करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर, कानाडोळा करायला शिकवा त्याला. आणि ठसवा त्याच्या मनावर, जे सत्य आणि न्याय वाटते, त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा. त्याला ममतेनं वागवा, पण, लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं, त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, अन धरला पाहिजे धीर त्याने, जर गाजवायच असेल शौर्य . आणखीही एक सांगत रहा त्याला .......... आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर, माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे......... पण पहा........ जमेल तेवढ अवश्य कराच, माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!! - अब्राहम लिंकन
Tag: लेखमालिका
-

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र
-

जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम
जगामध्ये व भारतामध्ये काही विशिष्ट उदा. जैन, मारवाडी, सिंधी, गुजराती, ज्यू, पारशी, बोहरी ह्या आणि अशा मोजक्या जातीजमाती का सतत श्रीमंत व उद्योगात यशस्वी होत गेल्या आहेत? तर त्यांच्या जीवनात चार गोष्टी प्रामुख्याने दिसतात. त्या जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आचरणात आणल्यास, तुम्हीही यशस्वी व कोट्याधीश झाल्याशिवाय राहणार नाही.
पहिलं जीभेवर साखर :
सतत गोड बोलणे, मृदुभाषा, आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत, चहापान वगैरे इत्यादींमुळे माणसाचे संपर्क वाढतात, संबंध सलोख्याचे बनतात. गोड, मृदु व समजूतदारपणे बोलणार्याबरोबर ग्राहकांना व्यवहार करावासा वाटतो. गोड बोलणार्या दुकानदाराचे दुकान इतरांपेक्षा निश्चित अधिक चालते. गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी बर्थडे, अभिनंदन असे प्रशंसेचे उद्गार काढण्यास किंवा तसा एखादा व्हॉटसअप मेसेज पाठवण्यास काय तोटा होतो? मग गोड बोलण्याची सवय लावून घ्या ना! सतत उद्धट भाषा, शिवीगाळ, वादविवाद, चिडचिड अशा प्रकारच्या वागण्याने माणूस कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही.
दुसरी डोक्यावर बर्फ :
उद्योग तर सोडा, पण आता सर्वसामान्य जीवनसुध्दा प्रचंड तणावाचे झाले आहे. आयुष्यात येणार्या ताणतणावाच्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी डोके अतिशय शांत असणे महत्वाचे आहे. मोबाईल तापला की हँग होतो, तसे डोके गरम झाले की बुध्दी चालत नाही आणि बुध्दी चालायची बंद झाली झाली की सगळं संपलं. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवूनच जीवनात व व्यवसायात वावरले पाहिजे, तरच तुमची आयुष्यात प्रगती होत जाईल. तापट स्वभावाच्या माणसाचा काही दिवसात सत्यानाश होऊन तो शेवटी मागे पडून गरिबीच्या खाईत लोटला जातो.
तिसरी मेंदूत आयडिया :
आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी केवळ पारंपारिक पध्दतीने जगणे आता कालबाह्य झाले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत नवीन नवीन आयडियांचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रोडक्ट, सेवांमध्ये चांगला फायदा आहे, भविष्यात कोणत्या जागांचे भाव वाढतील, मार्केटिंग करताना काय करावे म्हणजे फायदा वाढेल, कोणत्या व्यक्तीशी संपर्क कुठे व कसा साधावा म्हणजे आपणास फायदा होईल, कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी म्हणजे फायदा होईल, ई-कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून काय करता येईल का? असे मेंदूत सतत आयडियांचे मंथन सुरू पाहिजे.
चौथी हातात काम :
श्रीमंत होणार्या व प्रचंड यशस्वी होणार्या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ६ वाजता उठल्यापासून ते रात्री १२ वाजता झोपेपर्यंत त्यांच्या हाताला काही-ना-काही काम असते. आपला व्यवसाय, व्यवहाराचा व्यापच येवढा पाहिजे, की तुम्हाला सतत काम असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजक एकाच वेळी १० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. हातात काम नसणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे लक्षण आहे. ज्यांच्या हाताला आज काम नाही म्हणजे, तो लवकरच मार्केट बाहेर पडून होऊन मागे पडेल. काम नसेल तर काम शोधून काढले पाहिजे :
तेव्हा तुम्हीसुद्धा ह्या चार गोष्टी लक्षात घेऊन स्वत:चा व्यवसाय लवकर सुरू करतील व जीवनात प्रचंड यशस्वी व्हा या शुभेच्छा… ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान… करायची सुरुवात?
एका गावात एक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते. गेली ३ ते ४ वर्ष त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता. रोजचे पेशंट ५० ते ६० वरुन फक्त २० ते २५ वर आले होते. त्यांचे वय ५०च्या पुढे होतं. तसं म्हणावं, तर ते मागच्या पिढीचे डॉक्टर. त्यांच्या आजूबाजूला नवीन डॉक्टरांचे दवाखाने सुरू झाले होते, त्यांचे दवाखाने चालायला लागले, पण यांचा धंदा कमी झाला होता. आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचे क्लिनिक पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती, ती म्हणजे हे महाशय नको तेवढे कंजूष होते. तपासणीचा टेबल, बसण्याचं बाकडं, खुर्च्या त्याच २० ते ३० वर्षापूर्वीच्या. रिसेप्शनिस्टसुध्दा एकदम लो प्रोफाईल. त्यांना धड चांगल्याप्रकारे संवादही साधता येत नव्हता. त्या बऱ्याच वेळी घरच्या कामानिमित्त गैरहजर असत. कमी पगारात काम करते म्हणून त्याच रिसेप्शनिस्टला ठेवलं होतं. क्लिनिकमध्ये पेपर नाही, की पाणी पिण्याची सोय नाही, आरोग्याशी संबंधित माहिती देणारे पोस्टरही नाहीत.
व्यवसायात अप-टू-डेट राहण्यासाठी काही खर्च करावा लागतो याचं जुन्या विचारसरणीमुळे बऱ्याच जणांना भान नसतं. काहींना तो वायफळ खर्च वाटतो, काहींना आपल्या ज्ञानावर भलताच अहंकार असतो; पण जमाना शोबाजीचा आहे, जमाना ब्रॅण्डिंगचा आहे, जमाना जाहिरातबाजीचा आहे हे लोकांना समजत नाही. गावागावात होमिओपॅथी, आयुर्वेदिक डॉक्टरांना पेशंट मिळत नाहीयेत, पण चांगले ब्रॅडिंग करून पतंजली कोट्यावधीचा धंदा करत आहे. तुमचा व्यवसाय कोणताही असो, तो अद्ययावत ठेवण्यासाठी तुम्हाला खर्च करावाच लागतो. तो खर्च नसून ती गुंतवणूक असते हे लक्षात ठेवा.
क्लिनिकमध्ये एखादी एखादी तपासणीची आधुनिक मशीन आणलीत तरी फरक पडतो. साधा ॲप्रन स्वत: व रिसेप्शनिस्टला वापरायला दिला तरी फरक पडतो. औषध ठेवण्याचा चांगला रॅक, बाहेर चांगली पोस्टर्स, चांगले इंटेरिअर करून क्लिनिकला जाणारा डॉक्टर समाजाच्या दृष्टीने हुशार असतो, प्रत्यक्षात कदाचित वेगळंही असू शकतं. पण तो व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे व्यवसायाची जागा अधिक आकर्षक कशी दिसेल याचा विचार करा आणि तसे बदल करा.
तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? आला असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा
-

भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व
शिकेल तो टिकेल नावाची पुरातन म्हण मराठी भाषेत रुढ आहे. या म्हणीतून जीवनात आपल्याला हव्या त्या क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर शिकण्याला पर्याय नाही. ‘शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही’ अशा अर्थाचा एक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. एकूणच काय? तर एखादा माणूस जितका जास्त शिकला त्यावर त्याच्या यशाची गणिते अवलंबून असतात.
एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे.

माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला.
आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींची समृध्दी व योग्य मेळ साधण्याची कला म्हणजेच शिक्षण होय. आयुष्य ही एक अनेक कोन असणारी आकृती आहे. उदाहरणासाठी आपण ही आकृती षटकोनी आहे असे मानू या. षटकोनाला सहा बाजू, सहा कोन व सहा शिरोबिंदू असतात. आर्थिक समृध्दी प्राप्त करणे ही या आयुष्यरुपी षटकोनाची एक बाजू आहे. त्याचप्रमाणे आरोग्य, सामाजिक प्रतिष्ठा, आनंद, भौतिक गोष्टी व नातेसंबंध या इतर बाजू आहेत. या सर्व बाजू जोडल्या गेल्या तरच षटकोन पूर्ण होईल. यातील एकही बाजू राहिली तर षटकोन कधीही पूर्ण होणार नाही. आपल्या आयुष्याच्या आकृतीला आकार देऊन साकार करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.

कोणते शिक्षण घेतले पाहिजे? याचे महत्त्व खऱ्या अर्थाने अगदी सोप्या व कमी शब्दात सांगण्याचे काम अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केले आहे. त्यांनी हेडमास्तरांना लिहलेल्या पत्रात शिक्षणाचे एकूण महत्त्व विषद केले आहे. हे पत्र प्रत्येक माणसाने आपल्या हृदयावर कोरुन ठेवले पाहिजे इतके महत्त्वाचे आहे. आपण हे पत्र वाचा. पुढील लेखात अब्राहम लिंकनने हेडमास्तरांना पाठवलेले पत्र प्रकाशित करत आहोत.
-

जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिके अंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील… करायची सुरवात?
इतिहास काय सांगतो, ‘जे तलवारी चालवतील, ते तलवारीने मरतील, जे डोकं चालवतील, ते जगावर राज्य करतील; तसेच जे तराजू चालवतील, ते संपत्ती कमवतील.’ मित्रहो, आजही तेच दिसतंय. पुस्तकं वाचणारे बुद्धीवादी सरकारमध्ये आहेत, तराजूवाले त्यांना पैसे पुरवतात आणि तलवारीची भाषा करणारे अजून मोर्चे व आंदोलन करत आहेत. यात मराठी माणूस कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तराजूवाले, आज देशातील उद्योग क्षेत्रात मुख्यतः यांचेच वर्चस्व दिसून येते, कारण हे लोक पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात आहेत. स्वतःचा उद्योग कसा यशस्वी करायचा, याचाच विचार ते करतात आणि परिणामी ते यशस्वी होतात. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात येताना दिसतात. हे पिढ्यानपिढ्या चालू राहणार. यात मराठी माणसे आहेत ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.
आज बऱ्याच मराठी तरुणांची मानसिकता नोकरी मिळवणे ही असते. त्याच दृष्टीने ते शिक्षण घेतात, परंतु आजची परिस्थिती पाहता नोकरी मिळणे अवघड आहे. बरेचजण बेरोजगार आहेत. बऱ्याच जणांना राजकारणात रस असतो. अनेक राजकीय नेतेमंडळी अस्मितेच्या नावाखाली तरुणांना भडकवण्याचे काम करतात. त्यात युवक भरडले जातात, त्यांना नेत्यांच्या मागे कार्यकर्ता म्हणून मिरवण्यात रस असतो, परंतु यांचं भविष्य काय?
आजकाल सोशल मीडियावर आपण शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट टाकून आपण मराठी असल्याचे अभिमानाने सांगतो. स्वतःला त्यांचे वारस समजतो; परंतु शिवरायांनी नुसती तलवार नाही चालवली, तर बुध्दी चालवली. त्यांचे राजकीय डावपेच आणि गनिमी काव्यापुढे त्यांचे सर्व शत्रू हतबल झाले होते हे विसरू नका. केवळ आपली बुध्दी व दूरदृष्टीच्या साहाय्याने त्यांनी इतिहास घडवला. आजही त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधले जाते. हा इतिहासाचा भाग आतातरी मराठी तरुणांना समजेल का? अनेकांच्या व्हॉटसअप प्रोफाईलवर तलवारीचा फोटो असतो, तेव्हा असे वाटते की अजून यांच्या डोक्यात तलवारच आहे. त्यांच्या डोक्यात बुध्दी आणि पैसा यावा हीच शिवरायांचरणी प्रार्थना.
आज तलवारीपेक्षा पैशाची धार जास्त आहे. ज्याच्याजवळ पैसा त्याचीच जास्त पॉवर. यामध्ये बहुतांशी उद्योजक आहेत. आज मराठी तरुणांनी देखील उद्योग क्षेत्रात उतरणे गरजेचे झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर यश मिळवण्यासाठी केलात, तर तुमचेच भले होईल. आपल्याकडे एक म्हण आहे, “उद्योगीला महापूर, आळश्याला गंगा दूर.”
मग तुम्ही काय करणार तलवार चालवणार कि डोकं चालवणार… कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे? करायची का सुरुवात?
कर्ज, आजार व शत्रू याकडे तुम्ही लक्ष नाही दिले व वेळीच उपाय नाही केला, तर तुमचे आयुष्य उध्वस्त करते. आज व्यवसाय, उद्योग करत असताना व सर्वसामान्य जीवन जगत असताना कर्ज हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जास्तीत जास्त कर्ज घेऊन जो अत्यंत चांगल्या पध्दतीने हाताळतो तो प्रगती साधतो. बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना मार्केट कंडिशनमुळे किंवा स्वतःच्या चुकीमुळे नुकसान होते. चढउतार येत असतात व कर्जाचा कमी अधिक डोंगर उभा राहतो. तेव्हा कर्ज हाताळण्याची काही सूत्रं स्वतःला घालून घेतली पाहिजेत.
पहिले सूत्र म्हणजे; ज्या कारणासाठी जितके लागणार आहे, तितकेच कर्ज काढा. व्यवसायासाठी ३ लाखाचे फर्निचर, पाच लाखांची गाडी किंवा १० लाखांचे दुकान लागणार असेल तर तेवढेच कर्ज काढा. उगाच मिळते म्हणून महागड्या गाड्या, लॅव्हिश दुकान, फर्निचर घेऊ नका. ऑप्टिमम युटीलायझेशन ऑफ मनी खूप महत्वाचे आहे. काही जण तीन खोल्यांच्या घराची गरज असताना कर्ज मिळते, म्हणून मोठा ५ ते ६ खोल्यांचा बंगला बांधतात. शेवटी कर्जाचे हफ्ते व व्यवसायातील फायदा यांचा मेळ बसत नाही, त्यामुळे व्यवसाय आणि घर दोन्ही गोत्यात येते.
दुसरे सूत्र म्हणजे; कर्ज काढण्यापूर्वी व्याजदराचे पर्याय शोधा. केव्हाही बँका किंवा अर्थसंस्थांकडून कर्ज घ्या. खाजगी व्यक्तीकडून कर्ज केव्हाही घेऊ नका. मित्र, नातेवाईकांकडून कर्ज घेणे टाळा. तुमचा उद्योग ही पूर्णतः वेगळी एन्टीटी आहे. तिचा कोणताही मित्र, नातेवाईक व इतर खाजगी व्यक्तीच्या व्यवहारात संबंध येऊ देऊ नका. खाजगी जीवन हे खाजगीच ठेवा व व्यावसायिक जीवन हे व्यावसायिकच ठेवा. कोणतेही आर्थिक संबंध नसल्यावरच मैत्री व नातेवाईकांचे नाते व प्रेम टिकून राहते.
तिसरे सूत्र म्हणजे; काढलेले कर्ज हे नेहमी व शक्य तितक्या खेळत्या भांडवलासाठी वापरा व त्याद्वारे व्यवसायाची जास्तीतजास्त उलाढाल करा. कर्ज नेहमी उत्पादक बाबींसाठीच वापरा. परतावा न देणाऱ्या कोणत्याही बाबीसाठी कर्ज वापरू नये. बहुसंख्य व्यावसायिक ह्याच कारणामुळे गोत्यात येतात. कर्ज काढले की काही भाग लग्नासाठी वापरतात, घराचे इंटेरिअर करणे, गाडी घेणे इत्यादीसाठी पैसे खर्चून बसतात.
चौथे सूत्र म्हणजे; कर्ज घेतल्यावर रिलॅक्स होऊ नका. ते तुम्हाला व्याजासहित परत फेडायचे आहे लक्षात ठेवा. ३ वर्षांनी, ५ वर्षांनी फेडायचे आहे म्हणून निवांत राहू नका. फेडण्यासाठी लागणारा भाग प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवा.
पाचवे सूत्र म्हणजे; कर्जाचा डोंगर उभा राहिला व फिटण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहत नाही असे वाटत असेल, तर पटकन प्रॉपर्टीचा भाग विकून, कर्ज फेडून योग्य वेळी मोकळे व्हा. समाज व लोक काय म्हणतील म्हणून लाजेपोटी गप्प राहू नका. योग्य वेळी व पटापट निर्णय घेतल्यास व्याज व दंडही कमी बसेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मोकळे होऊन व्यवसायातील पुढील निर्णय घेऊ शकाल.
तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं आहे का? आणि घेतलं असेल तर ते कसं हाताळता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिके अंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील… करायची सुरवात?
एक बिल्डर आमच्याकडे आले. त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये ६० फ्लॅट विक्रीविना पडून होते. त्याचा खप लवकर व्हावा म्हणून त्यांनी विविध ठिकाणी केवळ एक महिन्यात १० ते १२ लाख रुपये खर्च केले; पण फ्लॅट काय विकले गेले नाहीत. काय चूक झाली त्यांची? म्हणतात ना, तूप खाल्यावर रूप येत नाही किंवा आज लावलेल्या झाडाला उद्या लगेच फळे लागत नाहीत. किंवा आज मेकअप करून उद्या कोण हिरॉईन होणार नाही, दिल्लीत यूपीएससीचा क्लास लावला म्हणून कोणी आयएएस ऑफिसर होणार नाही. जगात कोणताही रिझल्ट किंवा यश असे सहजासहजी मिळत नाही. बिझनेसचेही तसेच आहे, फक्त पैसा खर्च केल्यानेच काही होत नाही. मार्केटिंगची व ब्रँडिंगची नियोजनबद्ध प्रक्रिया पार पाडावी लागते. त्या त्या गोष्टीला कालावधी घ्यावा लागतो.
ब्रँडिंग ही एक ‘स्लो’ प्रोसेस आहे, ह्या पद्धतीद्वारे तुम्ही हळूहळू ग्राहकांच्या मनात तुमच्या प्रॉडक्टच्या नावाबद्दल जागा तयार करता. ग्राहकांना प्रथम तुमच्याबद्दल माहिती व्हायला सुरु होते, परत फोन, भेटी, ईमेलच्या माध्यमातून संवाद सुरू होतो. त्यानंतर अधिक सखोल चर्चा होऊन पुढे व्यवहारात रूपांतर होते. रातोरात जाहिरातबाजी करून कोणताही ब्रॅंड, प्रॉडक्ट किंवा व्यक्ती प्रसिध्द होऊ शकत नाही. तसे केल्यास तो एक पैसा वाया घालविण्याचा खेळ होऊन बसतो. मानसशास्त्रानुसार एखादा व्यवसाय ग्राहकांच्या मनात चांगले घर करून बसण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात व तुमचा एक कायमचा ग्राहक वर्ग तयार होतो.
आज १० किलो तूप प्यायल्यावर उद्याच्या उद्या कोण पैलवान होणार नाही. उलट आहे ती तब्येतही ढासळेल. पण त्याऐवजी त्याने रोज ५० ग्रॅम तूप प्यायले व १ तास व्यायाम केला तर त्याची तब्येत नक्कीच सुधारून तो पैलवान होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पुढे जाऊन तो रोज १०० ग्रॅम, २०० ग्रॅम असे तूप पिणे वाढवू शकतो. त्याचबरोबर त्याला व्यायामही वाढवावा लागेल. तसेच कोणत्याही व्यवसायात अचानक जाहिरातबाजी करून फायदा होत नसतो. तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला शास्त्रीय पध्दतीने ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्लॅनिंग करून राबवावे लागते. फ्लॅट खपत नाहीत म्हणून १० लाख जाहिरातींवर घालविले म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे. अगोदरच खप नाही, त्यात १० लाख वाया! व्यवसायात कोणत्याही नियोजनाशिवाय खर्च केलेला पैसा वाया जाऊन नुकसानीस सामोरे जावे लागते. आज जाहिरात केली आणि उद्या प्रॉडक्ट खपला एवढं सोपं नाही.
बिझनेसला इतकं हलक्यात घेवू नका. तुम्ही तुमच्या व्यवसायात ब्रॅण्डिंगची काळजी घेताय ना…? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास व्हिडीओ लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा आणखी वाचा
-

मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?
आज जर पालकांना वाटत असेल की आपला मुलगा बिल गेट्स, अंबानी, बन्सल असा करोडपती मोठा व श्रीमंत उद्योजक व्हावा, तर त्यासाठी आपणास काही संस्कार जाणूनबुजून मुलांवर करावे लागतील. काही टिप्स पुढील प्रमाणे आहेत.
१) गर्भ व बाल संस्कार :
लहानपणीच मुलांना श्रीमंतीच्या व यशस्वी उद्योजकांच्या गोष्टी सांगितल्या व दाखवल्या पाहिजेत, जसे जिजाऊंनी शिवबाला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू दिले. ज्यू, मारवाडी, गुजराती, पारशी लोक लहानपणापासूनच मुलांवर व्यवसाय करण्याचे संस्कार करतात. यामुळे मुलांना लहानपणापासून व्यवसायाविषयी आवड निर्माण होईल.
२) शिक्षण :
उद्योजकतेस पूरक आवडीनुसार व गरजेपुरतेच शिक्षण द्या. अती खर्चिक, गरज नसणारे शिक्षण घेवून पैसा व वेळ घालवू नका. योग्य तो विचारपूर्वक निर्णय घ्या. अनेक कमी शिकलेले लोक मोठे उद्योजक होतात व जास्त शिकलेले तेथे नोकऱ्या करतात.
३) प्रयोग करा :
हायस्कूल जीवनापासूनच छोट्या मोठ्या व्यवसायाचे प्रयत्न सुरू करा. दिवाळीत फटाके, फराळ, उन्हाळ्यात आंबे, लोणचे यांचे स्टॉल लावणे इत्यादी प्रयोग करीत रहा. मुलांना व्यापार म्हणजे काय असतो ते कळेल.
४) वाचन :
उद्योजकतेविषयी मासिके, पुस्तके, पेपर, लेख इत्यादी वाचण्यासाठी सतत घरात ठेवा. मोकळ्या वेळेत तुम्हीही वाचा व मुलांनाही वाचण्यास सांगा. वाचल्यामुळे विचार करण्याची पातळी वाढेल व त्यांना जग समजेल.
५) भेटा :
सेमिनार, कन्सलटंट, व्याख्याने, उद्योजक इत्यादींना जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मुलांसोबत भेटा. यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येईल, उद्योजक व श्रीमंत लोकही आपल्यासारखेच असतात, आपण जर मेहनत केली, तर आपणही उद्योजक होऊ शकतो असा विश्वास त्यांना येईल.
६) पहा :
टीव्ही, सिनेमा, डीव्हीडी, यूट्युबवर अनेक उद्योग व श्रीमंती विषयी कार्यक्रम येत असतात ते न चुकता कुटुंबासमवेत पहा, त्यातून माहिती मिळत जाईल.
७) पैसे दाखवा :
मुलांना पैसा काय असतो तो दाखवा. लपवून ठेवू नका. पगार आल्यावर पैशाचे गठ्ठे मुलांना दाखवा. दाखविल्यास पैसा कळेल व कमवण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल.
८) जबाबदारी टाका :
अगदी शालेय जीवनापासूनच हळूहळू थोडीथोडी जबाबदारी टाकण्यास सुरू करा. उदा. किराणा माल आणणे, भाजीपाला आणणे, शेतीकडे लक्ष देणे, बँकेचे लहानसहान व्यवहार इत्यादी.
९) उठ-बस:
मुलांना लहान समजू नका. कमी वयातच त्यांची मोठ्या व्यक्तीत उठ-बस जाणीवपूर्वक वाढवा. त्यामुळे मुलं लवकर मॅच्युअर (प्रगल्भ) होतील.
१०) कल्पक :
क्रिएटिव्हिटी हा जीवनाच्या प्रगतीचा पाया आहे. मुलांना कल्पक विचार करायला शिकवा. आयडियाज तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.
११) करिअर कौन्सेलिंग:
मुलांची आवड, कला, कुवत व पालकांची शिक्षण, करिअरवर खर्च करण्याची तयारी यासर्वांचा विचार करून तज्ज्ञ व्यक्तीकडून करिअर सल्ला घेणे शक्य आहे.
१२) लाज सोडून मेहनत :
मेहनत करण्यासाठी लाज वाटता कामा नये, याची सवय तुम्ही मुलांच्यात लहानपणापासून लावली पाहिजे. पडेल ते काम करायची मुलांना सवय लावा. कुठलंही काम छोटं नसतं हे त्यांच्या मनावर बिंबवा. नाहीतर आज सुशिक्षित बेकार मुलं शेतात काम करायला लाजतात.
१३) पर्सनॅलिटी (व्यक्तिमत्त्व) :
प्रत्येक यशस्वी व्यक्तीची एक आकर्षक पर्सनॅलिटी असते ती तुमच्या मुलांची जाणून विकसित करा.
१४) संवाद कौशल्य :
शिक्षक व व्यवसायिक ठिकाणी प्रत्येक भेटीवेळी, फोनवर व ईमेल वर कसा संवाद साधावा याचे ज्ञान घ्या.
१५) आर्थिक साक्षरता :
मुलांचे बँकेत खाते काढा, पॅनकार्ड, शेअर मार्केट, एफ डी, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, व्याज, चक्रवाढ व्याज, व्हेंचर कॅपिटल इत्यादी अनेक बाबीची माहिती त्यांना करून द्या.
१६) मोठी स्वप्ने जागवा :
मोठा पैसा, बंगला, कार गाड्या, आलिशान ऑफिस अशा मोठ्या गोष्टींची स्वप्ने मुलांच्यात सतत जागवा. तशा प्रकारची पोस्टर्स, वॉलपेपर्स मुलांच्या खोलीत लावा.
१७) सेल्समन बना :
कोणताही यशस्वी उद्योजक व श्रीमंत व्यक्ती हा हाडाचा सेल्समन असतो हे लक्षात ठेवा. आपली वस्तू, सेवा, प्रोजेक्ट, ब्रँड सतत विकता आला पाहिजे. जसे पटेल लोकांबद्दल म्हटलं जातं ना, ‘पटेल्स आर बॉर्न टू सेल’ तेव्हा हाडाचे सेल्समन बना.
१८) स्मार्ट गोल सेट करा :
Specific, Measurable, Achievable, Realistic, Timely (SMART) असा प्रत्येक ५ वर्षांचा गोल सेट करा.
19) संधी ओळखणे :
संधी ओळखणे व ती व्यवहारात आणणे हा श्रीमंत व यशस्वी व्यक्तीचा गुण आहे तेव्हा मुलांच्यात संधी ओळखायला शिकण्याचे कौशल्य विकसित करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजचा विषय आहे; उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस… करायची सुरवात?
सर्वसाधारण नोकरी करण्याचीच ज्या कुटुंबात प्रथा आहे, त्या कुटुंबातील कोणीही व्यवसायात आला तर लोकांना वाटते की, आता लगेच पैसा मिळायला हवा. पण नोकरी म्हणजे, बे एके बे. पगाराचा कालावधी एक महिन्याचा असतो. महिना झाल्यावरच ठराविक रक्कम हातात येते. तर उद्योग म्हणजे; बे दुणे चार, चार दुणे आठ… पण व्यवसायाचा कालावधी हा किमान १ हजार दिवसांचा असतो. अर्थात व्यक्तिपरत्वे, व्यवसायपरत्वे हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.
जसे स्त्री एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने घेते, पण नऊ स्त्रिया मिळून एका महिन्यात एका मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. तसेच एखाद्या माणसाला, नवउद्योजकाला उद्योग समजण्यासाठी, मार्केटमधील सर्व प्रक्रिया, तेजी मंदी, खरेदी, विक्री, जाहिरात, मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाच्या सर्व खाचाखोचा समजून त्याला व्यवसायात तरबेज होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात, मग तुमच्याकडे कितीही भांडवल असू द्या.
बियांतून अंकुर येण्यासाठी ३ दिवस, अंड्यातून पिल्लू येण्यासाठी २० दिवस, मूल जन्माला येण्यासाठी ९ महिने लागतात, त्याचप्रमाणे एखाद्या मार्केटमध्ये एखाद्या व्यक्तीला व्यवसायात स्थिर होण्यासाठी ३ वर्षे लागतात. एकदा का तो तीन वर्षे यशस्वीपणे टिकला, की समजायचे तो व्यवसाय आयुष्यभर चालत राहणार. व्यवसाय करायचा म्हणजे संयम पाहिजे, बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देण्याची तयारी पाहिजे. झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जात राहिले पाहिजे, पण बरेच व्यवसाय इथेच मार खातात आणि आपला गाशा गुंडाळतात.
तुमच्याकडे जरी २० लाखांचे भांडवल असले तर ते टप्याटप्प्याने गुंतवत जा. सर्व भांडवल एकदम गुंतवले, तर अनुभवाविना नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. प्रथम ५ लाख गुंतवा. पहिले सहा महिने व्यवसाय करा व शिका. नंतर पुढचे पाच लाख गुंतवा. असे हळूहळू भांडवल वाढवत जा व व्यवसायात तीन वर्षात चांगल्या प्रकारे जम बसवा. नाहीतर एकदम गुंतवाल अन उत्पन्न नाही आल्यावर स्वतःचा खर्च, बँकेचे हप्ते याचे टेन्शन यायला लागेल व व्यवसाय सोडून पैशाच्या जुळवाजुळवीत वेळ जाऊन फ्लॉप शो होईल. परंतु तुम्ही टप्पाटप्प्याने २० लाख गुंतवले तर तुम्हाला अनुभव येईल, मार्केटचा अंदाज येईल, बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येईल. त्यामुळे रिस्क कमी होईल. तीन वर्षात तुमची चांगली बॅलन्सशीट तयार होऊन कोणतीही बँक २५ ते ३० लाख नवीन भांडवलही देईल. तेव्हा व्यावसायिक बंधूनी १००० दिवस हा कालावधी लक्षात ठेवावा व त्यानुसार मार्गक्रमण करावे. नाहीतर आरंभशूर खूप असतात व ते दोन तीन महिन्यात यशाची अपेक्षा करतात आणि अपयशी झाल्यावर स्वतःच्या अपयशाचे खापर व्यवसायावर आणि इंडस्ट्रीवर फोडतात. त्यामुळे समाजात व्यवसायाविषयी नकारात्मक वातावरण तयार होते व नवीन व्यावसायिक तयार होत नाहीत. तुम्ही असे करू नका.
तुम्ही व्यवसाय सुरु केला आहे का? केला असेल, तर किती दिवसांपासून करत आहात. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे ?
यश नशिबाने मिळत नाही व वैभव कधीच अपघाताने मिळत नाही. जे वैभवसंपन्न व यशस्वी झाले त्यांनी स्वतःला अधिक उत्पादनक्षम व प्रभावी बनवण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या. जर तुम्हाला आयुष्यात सुपर सक्सेस मिळवायचे असेल तर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सवयींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. मी तुम्हाला २० टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीमंत व यशस्वी व्हाल.
१) गोल सेट करा व बाकी कचरा फेका :
ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका. ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा.
२) दैनंदिन सवयी विकसित करा :
पैसा व यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम सवयी लावणे ही मूलभूत गरज आहे. यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये त्यांच्या दैनंदिन सवयी हाच फरक असतो. यश कोणाला सहज मिळत नसते, त्यासाठी खूप कष्ट, मेहनत, समर्पण व समृध्दीसाठी आवश्यक असणार्या सवयी लावणे महत्वाचे असते. उदा. सकाळी लवकर उठणे, डेली प्लॅन तयार करणे, सकस आहार, व्यायाम, ध्येय निश्चिती, टू डू लिस्ट बनवणे, वेळेस महत्व देणे, सर्व कामे वेळेवर पार पाडणे, वाचन करणे, हेतूपूर्वक जोखीम घेणे, नेटवर्किंग, संयम या सर्व सवयी यशस्वी व्यक्ती स्वतःला लावून घेतात.
३) यश व्हीज्युअलाईझ करा :
यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.
४) नेटवर्क विकसित करा :
समविचारी लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ.
५) लवकर सुरुवात करा :
उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.
६) जागा ठिकाण बदला :
चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते. प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.
७) माईंड रीड करा :
कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते.
८) स्वतःशी प्रामाणिक रहा :
जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात.
९) डिसीप्लीन मेंटेन करा :
शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येय गाठण्यास मदत होते.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!
सुनील हा ग्रामीण भागातील एक तरुण. शाळेत हुशार होता. 80 ते 85% गुण मिळवायचा. १२ वी नंतर बीसीए केलं. नोकरी करावी, व्यवसाय करावा की स्पर्धा परीक्षा द्यावी यात गोंधळलेला होता. दरम्यान बीसीए झाल्यानंतर १-२ वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या. नोकरीसाठी पुण्याला जाऊन आला. नंतर म्हणाला आता काहीतरी व्यवसाय करू. कोणता व्यवसाय करावा हे शोधण्यात २-३ वर्षे अजून घालवली. कशात काय ठरत नाही.
घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवायचे. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले आणि किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.
निर्णयक्षमता नसल्यामुळे अशाचप्रकारे सुनीलसारख्या लाखो हुशार मुलांचं आयुष्य बरबाद होतं. तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याचा निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ आणि हे जगच तुमचा निर्णय घेईल. वेळ आणि जग ठरवेल, तेच आयुष्यभर करण्याची वेळ तुमच्यावर येईल. सुमार बुध्दीचा, पण निर्णयक्षमता असणारा माणूस आयुष्यात धाडसाने पुढे जातो; पण निर्णयक्षमता नसणारा अत्यंत हुशार माणूससुध्दा आयुष्यात खूप मागे पडतो. शेवटी मिळेल ते काम, नोकरी करून जीवन जगायला लागतं. सुनील आपलेच शाळेचे मार्कशीट स्वतःच बघत बसायचा. तो आपल्या मुलांनाही सांगत नव्हता, की मला इतके मार्क पडायचे, कारण मुलं म्हणतील की तुम्ही एवढे हुशार होता, तर मग अजून इथेच कसे काय? शेवटी अशा हुशार पण निर्णयक्षमता नसणार्या माणसाचे आयुष्य असेच छोटेमोठे काम, रोजगार, नोकरी करण्यात निघून जाते. आपण शाळेत इतके हुशार होतो, पण आयुष्यात खूप मागे राहिलो याची खंत त्याच्या मनाला आयुष्यभर लागते.
त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, नवनवीन गोष्टी वाचा, podcast ऐका, मोठ्या लोकांचे interviews पहा त्यातून जेवढं शिकता येईल तेवढं शिका. निर्णय घेण्यास वेग द्या व स्वतःला सुनील होण्यापासून वाचवा.
तुम्हाला काय वाटतं, आयुष्यात फार विचार न करत बसता निर्णय घेण योग्य आहे का? तुमच्या आयुष्यात कोणते असे प्रसंग होते की त्या एका निर्णयामुळे तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजचा विषय आहे; रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा! करायची सुरुवात?
जगभरात श्रीमंत व्यक्तींच्या आचरणाचे अध्ययन करण्यात आले, त्यात असे लक्षात आले की, जवळपास सर्व श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती नियमित वाचन करतात, तर गरीब लोक टीव्ही पाहतात व मोबाईलवर टाईमपास करतात. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने, त्यातील एखाद्या घटनेने आयुष्यात मोठी प्रेरणा मिळून आपले जीवन बदलू शकते. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात.
ग्रंथ आमुचे साथी… ग्रंथ आमुच्या हाती…
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या… अंधाराच्या राती…
या ग्रंथांच्या तेजामधुनी, जन्मा येते क्रांती,
ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती
निराश जीवा धीर धरूनी पुढे घेऊनी जाती…
वाचन माणसाला विचाराने व कृतीने श्रीमंत करते, त्यामुळे तो शांत राहायला शिकतो. यामुळेच जसे उत्तम शरीरासाठी रोज किमान व्यायाम व दोन वेळचे जेवण लागते, तसे उत्तम बुध्दीसाठी रोज किमान ५ पाने वाचणे आवश्यक आहे. जगात ज्या ज्या व्यक्तींचा विकास झाला तो वाचनामुळेच. टीव्ही, मोबाईलमुळे तर ऱ्हास आणि वाटोळे झाले. मोबाईलच्या व्यसनामुळे अर्धी तरुण पोरं वेडी व ॲडिक्टेड झाली. मोबाईलमुळे झोपेच्या वेळेचे चक्र बिघडून मन अशांत होते.
वाचन करणाऱ्या माणसाची कल्पनाशक्ती विकसित होते व तो नवनवीन गोष्टी शिकत राहतो. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगला (कल्पक विचारशक्ती) चालना देणारे माहितीपूर्ण वाचन करा. राजकीय चिखलफेक, अपघात, बलात्कार, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार, आंदोलने, मोर्चे, खंडणी, आत्महत्या अशा संबधी बातम्या व माहिती देणारे वाचन करू नये, त्यामुळे तुमचे मन व विचारही कलुषित होतात.
रोज ५ किमी चालण्याने रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. रोज चालायची सवय मेंदूसाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
त्यामुळे आयुष्यात श्रीमंत व निरोगी होण्यासाठी माणसाने रोज किमान ५ किमी चालावे, किमान ५ पाने वाचावी व पाच वाक्ये लिहावीत आणि मोबाईल व टीव्ही यांचा गरजेपुरताच वापर करून त्यापासून दूर व्हावे, मग बघा श्रीमंती तुमच्या घरी कशी आपोआप चालत येईल.
तुम्ही सध्या कोणतं पुस्तक वाचताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी नवी अर्थक्रांती चॅनेल आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा
हा लेख विडीयो मध्ये पहा -

व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील… करायची सुरवात?
व्यापार हा चतुराईने होत असतो. तुमच्याकडे खूप भांडवल, खूप हुशारी आहे, तुम्ही खूप मेहनती आहात, तरीही व्यापारात यशस्वी होण्यासाठी चतुराई खूप महत्वाची आहे. फक्त मेहनतीनेच व्यापार होत असता, तर काबाडकष्ट करणारे सर्वजण व्यापारी व श्रीमंत झाले असते. चतुराई म्हणजे योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची कला… योग्य व्यक्ती, संस्थांशी संवादाची कला… कधी थांबायचे, कधी माघार घ्यायची, कधी व कसे आक्रमक व्हायचे? कधी बचत करायची, कधी खर्च करायचा याचे तारतम्य. मार्केटची हवा ओळखून आपला बिझनेस चालविणे होय.
फक्त चतुराई असेल पण मेहनत नसेल तरी चालणार नाही. चतुराईने बिझनेस चालतो, पण काही मर्यादेपर्यंत… पुढे तो वाढवण्यासाठी सतत मेहनत करावी लागते. योग्य व्यवस्थापन ठेवण्यासाठी, व्यवसायाला योग्य तो वेळ देण्यासाठी तसेच योग्य लोकांची नियुक्ती करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुमचा आयक्यू कितीही चांगला असला तरी मोठे ज्ञान मिळविण्यासाठी तुम्हाला शेकडो पुस्तके वाचावीच लागतात, तेव्हाच तुम्ही ज्ञानी व्हाल. फक्त आयक्युने काम चालणार नाही. त्याप्रमाणे चतुराईला मेहनतीची जोड लागते.
नीती म्हणजे तुमचा व्यवसाय करण्याच्या पध्दतीमुळे मार्केटमध्ये तुमचा एक प्रकारचा नावलौकिक तयार होतो. तुमची व्यापार करण्याची हातोटी, व्यवहार करण्यातील प्रामाणिकपणा, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा, योग्य ब्रँड व व्यक्तीबरोबर नेटवर्क यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुमचे नाव व ब्रॅंड तयार होतो व व्यवसाय मोठा होतो. याचा मूलभूत पाया व तयारी तुमच्या नीतीपासून तयार होते. तुमच्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही प्रोफेशनल वागत असाल तर अधिक चांगले लोक तुम्हाला येऊन मिळतील. तुम्ही पुरवठादारांची देणी वेळेत देणार असाल, तर अधिक क्रेडिट मिळते व मोठी पत तयार होते.
म्हणजेच, व्यवसाय करण्यासाठी माणसाला चतुराई लागते, तो चालवण्यासाठी मेहनत लागते आणि तो मोठा होण्यासाठी नीती असावी लागते. तुम्ही ही त्रिसूत्री वापरताय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा’ करायची सुरुवात ?
गाडी वेगाने कशामुळे धावते? असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला, तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, ॲक्सलरेटर, चाक अशी उत्तरे दिली. ही उत्तरं बरोबर आहेत. परंतु मित्रहो थोडा वेळ विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता, तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही. वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते. ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात. जशी आकाशातून पडलेली उल्का किंवा नियंत्रण हरवून बसलेलं एखादं विमान. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात.
ज्या गाडीला ब्रेक नाही अशी गाडी कितीही मोठ्या ब्रॅंडची असो, तिचे इंजिन कितीही चांगले असो त्याचा उपयोग नाही. गाडीचा ब्रेक हा चांगल्यासाठीच असतो. स्त्याला असणारे स्पीड ब्रेकर हे चांगल्यासाठीच असतात. शाळेला/ऑफिसला रविवारी सुट्टी चांगल्यासाठीच असते. दिवाळी. ख्रिसमस, उन्हाळीसुट्टी चांगल्यासाठीच असते. पाश्चात्य देशात शनिवारी व रविवारी लोक अगदी कडक सुट्टी घेतात, अगदी मोबाईलसुध्दा बंद असतात. त्यामुळेच त्यांची कार्यक्षमतासुद्धा अधिक आहे.
व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं. सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने एक दिवस याच करोडोंची उलाढाल करणाऱ्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली. थांबल्याने, हळूहळू चालल्याने फरक पडत नाही. फक्त कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि किती वेळ थांबायचं याचं विजडम जवळ हवं…
तुम्ही असा ब्रेक घेता का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
तुमचं ध्येय नेहमी लक्षात राहावं यासाठी तुम्ही अशी काही आयडिया वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा -

फ्रँचायझीचे फायदे | Benefits of Franchise Business
Benefits of Franchise Business – हल्ली फ्रँचायझीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. चहा पासून ते सलूनपर्यंत सगळे व्यवसाय फ्रँचायझी मॉडेलवर चालत आहेट. स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तुलनेत फ्रँचायझी सुरु करणे हे कितीतरी पटीने सुरक्षित आहे. तर आजच्या या व्हिडीओत जाणून घेऊया फ्रँचायझी व्यवसायाचे फायदे.

Franchise Business चा पहिला फायदा आहे
1. व्यवसाय करताना किमान धोका: –
स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तुलनेत फ्रँचायझी सुरु करण्यात असलेली जोखीम कमी असते. स्वतःच्या नवीन व्यवसायात अपयशाची शक्यताही असते. मात्र फ्रँचायझी प्रकारात त्याचे प्रमाण अत्यल्प असते. नवीन व्यवसाय सुरू करताना बिझनेस मार्गदर्शन घेण्यापासून ते मार्केटिंग करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी नवीन कराव्या लागतात. परिणामी, फ्रँचायझरच्या सर्व सूचनांनुसार तुम्ही काम केले गेले तर नफा येण्यास जास्त वेळ लागणार नाही. फ्रँचायझीला ज्या मार्गावरून जावे लागते ते फ्रँचायझी मालकाने आधीच पार केलेले असते त्यामुळे त्याला उत्पन्न मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच फ्रँचायझी व्यवसायात तुमच्या स्वतःच्या व्यवसायापेक्षा तुलनेने खूप कमी धोका असतो.
२. प्रशिक्षण :
एक चांगला फ्रँचायझर नवीन फ्रँचायझीसाठी प्रशिक्षण देतो. हे सहसा त्या फ्रँचायझरच्या मुख्यालयात किंवा फ्रँचायझीच्या ठिकाणी केले जाते. यामुळे व्यवसायातील सर्व पैलूंसाठी एक परिपूर्ण प्रशिक्षण मिळते व फ्रँचायझी व्यवसायास योग्य दिशा व मार्गदर्शन मिळते.
३. खरेदी व जाहिरात :
व्यावसायिक मोठ्या ब्रँडची सर्वच उत्पादने आणि सेवा घेण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात असे नाही किंवा मोठ्या स्केलवर जाहिरात करू शकत नाहीत. परंतु फ्रँचायझी व्यवसायात फ्रँचायझी धारकास फ्रँचायझरची बाजारपेठेतील परचेसिंग पावर व त्यांचे मार्केटिंग तंत्र बहुतेक वेळा शिकवले जाते. फ्रँचायझर ब्रँड्स त्यांच्या फ्रँचायझीना जाहिरात साहाय्य व मार्गदर्शनही करतात, याचा त्यांना फायदा होतो. शिवाय फ्रँचायझींची संख्या वाढत गेल्यास आपोआप ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत जाते व त्यांना माहिती मिळत जाते. हा जाहिरातीसाठी सर्वात मोठा फायदा असतो. एकमेकांपासून जवळ असलेल्या फ्रँचायझी एकत्रितपणेसुध्दा जाहिरात करून खर्च कमी करू शकतात.
4. बिझनेस सिनर्जी :
जे फ्रँचायझी विकत घेतात, ते त्या फ्रँचायझर कंपनीचा हिस्सा बनतात. त्यांच्या ब्रँड परिवाराचा हिस्सा बनतात, जिथे सर्वजण व्यवसाय वृध्दीसाठी एक कार्य करत असतात. बऱ्याचदा फ्रँचायझर त्यांच्या फ्रँचायझी धारकांकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांचा व नवीन कल्पनांचासुध्दा विचार करतात व ते आपल्या योजनांमध्ये व इतर फ्रँचायझीसोबत शेअर करतात.
४. सल्ला, संशोधन आणि विकास:
फ्रँचायझींना त्यांच्या व्यावसायिक अडचणींना सामोरे जाताना बरेच परिश्रम घ्यावे लागत असतात, त्यावेळी त्यांना फ्रेंचायझरकडून मदत होत असते आणि फ्रँचायझरच्या प्रतिनिधीकडून सर्व व्यावसायिक घटकांबद्दल आवश्यक मदत पुरवली जाते. फ्रँचायझींसाठी नवीन उत्पादने/सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फ्रँचायझर सतत संशोधन व विकासयोजना बनवत असतात. त्याचाही लाभ फ्रँचायझींना होत असतो.

कमीत कमी भांडवलामध्ये मोठ्या ब्रँडचे मालक बनविणाऱ्या या फ्रँचायझी मॉडेल मध्ये ग्राहकांची विश्वसनीयता सहज प्राप्त होते, नफ्यामधील मोठा हिस्सा फ्रँचायझीला प्राप्त होतो. व्यावसायिकांसाठी लागणाऱ्या परवानग्याही ब्रॅंडकडूनच मिळतात. फ्रँचायझी फ्रेंचायझरला कमी खर्चात नवीन व्यवसाय क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्षम करते. व्यवसाय कार्याचा विस्तार करण्याचा हा तुलनेने जलद मार्ग आहे. फ्रँचायझींचा वापर फ्रँचायझरद्वारे उत्पादित किंवा पुरवलेल्या वस्तू आणि सेवांसाठी आउटलेट म्हणून केला जाऊ शकतो. हे उत्पादन आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था प्रदान करते.
आजची माहिती फ्रँचायझीचे फायदे | Benefits of Franchise Business कशी वाटली ही कमेन्टमध्ये नक्की कळवा. लेख आवडल्यास लाइक आणि शेअर करा. आणि नवी अर्थक्रांतीच्या you tube चॅनलला आताच subscribe करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा आणखी वाचा
-

What is a Franchise Model? | फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय?
फ्रँचायझी ही काही नवीन संकल्पना नाही. खरंतर ही मध्ययुगीन काळापासून चालत आलेली delivery system आहे. जुन्या काळात जमिनीचे मालक त्यांची जमीन शेतकऱ्यांना किंवा मजुरांना शिकारीसाठी, शेतीसाठी किंवा गुरे चरण्यासाठी देत असत. त्यासाठी काही अटी व नियम घालून दिलेले असत. आधुनिक फ्रँचायझिंगची सुरुवात १७३१ साली बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस व्हाईटमार्श यांच्यातील प्रिंटिंग सेवांसाठी झालेल्या फ्रँचायझीच्या डीलने झाल्याचे मानण्यात येते.
आज हजारो उद्योगांत आणि क्षेत्रांत लाखो फ्रँचायझी काम करत आहेत. फ्रँचायझी या क्षेत्राने आजवर कोट्यावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या क्षेत्रात होत आहे. या क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली असून financial stability च्या शोधात असणाऱ्यांसाठी किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण फ्रँचायझी म्हणजे नक्की काय? फ्रँचायझीचे काय प्रकार आहेत? ही व्यवस्था कशी चालते?
फ्रँचायझी हा व्यवसायाचा असा प्रकार आहे, ज्यात एक व्यक्ती म्हणजेच फ्रँचायझी; फ्रँचायझरचे ब्रॅंडिंग, ट्रेडमार्क आणि बिझनेस मॉडेल वापरून व्यवसाय चालवत असतो. या प्रकारामध्ये फ्रँचायझी आणि फ्रँचायझर यांच्यात कायदेशीर आणि व्यावसायिक करार झालेला असतो. म्हणजेच फ्रँचायझीला फ्रँचायझरचे नाव आणि इतर व्यवस्था वापरण्याची रीतसर परवानगी मिळालेली असते.
फ्रँचायझरचे बिझनेस मॉडेल वापरण्याच्या म्हणजेच वस्तू विकण्याच्या किंवा सेवा प्रदान करण्याच्या तसेच training, guidance या गोष्टींच्या बदल्यात फ्रँचायझरला फ्रँचायझी फी द्यावी लागते. फ्रँचायझीला ठरवून दिलेल्या अटी व नियम मान्य असल्याच्या करारावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. प्रत्येक फ्रँचायझी ही कंपनीची एक स्वतंत्र शाखा म्हणून काम करते.
आता पाहूया फ्रँचायझर आणि फ्रँचायझी यांच्यातील संबंध
फ्रँचायझर म्हणजे मूळ कंपनी जी आपल्या कंपनीच्या वस्तू किंवा सेवा विकण्याचे अधिकार प्रदान करते. फ्रँचायझरने स्वतःचा व्यवसाय, ब्रँड आणि त्याची कार्यप्रणाली विकसित केलेली असते. फ्रँचायझी देण्याचे निश्चित झाल्यावर फ्रँचायझर त्यांच्या कंपनीचे बिझनेस मॉडेल वापरण्याचे अधिकार समोरच्याला देतात.
तर फ्रँचायझी म्हणजे अशी व्यक्ती जी आधी नमूद केलेल्या वस्तू किंवा सेवा विकण्याचे अधिकार विकत घेते. जरी फ्रँचायझी आधीच चांगल्या प्रकारे चालू असलेला व्यवसाय विकत घेत असतील, तरीसुद्धा मार्केटमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी, हुशार माणसे निवडण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे. फ्रँचायझी/फ्रँचायझर यांचे संबंध परस्पर आदर, समजूतदारपणा, सहकार्य यांवर आधारित असले पाहिजेत, कारण त्यातच दोघांचाही फायदा आहे.
फ्रँचायझीला फ्रँचायझरकडून कोणत्या गोष्टी मिळतात
१) फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट (FDD)
जेव्हा फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आपण उत्सुकता दर्शवतो, तेव्हा फ्रँचायझर त्यांचे ‘फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट’ (FDD) आपल्यासमोर ठेवतात. व्यवसायाची एकूण उलाढाल, कर्ज, उत्त्पन्न, वेगवेगळे शुल्क, फ्रँचायझीच्या जबाबदाऱ्या यांची विस्तृत माहिती FDD मध्ये नमूद केलेली असते.
२) Financing options
उत्सुक आणि प्रामाणिक व्यक्तींना काही फ्रँचायझर वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध करून देतात. जसे की, कर्ज मिळवण्यास मदत करणे किंवा पैसे भरण्याचे सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे.
३) Training and operational guidance
फ्रँचायझरकडून फ्रँचायझीला एक मॅन्युअल सुद्धा मिळते, ज्यामध्ये संपूर्ण काम कसे चालते याबाबत माहिती दिलेली असते. तसेच व्यक्तिशः किंवा ऑनलाईन प्रशिक्षणसुद्धा अनेक फ्रँचायझर देतात. मॅन्युअलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, गुणवत्ता मानके, व्यवस्थापन प्रणाली, त्यांची जबाबदारी आणि इतर बारीकसारीक तपशील असतो. Training हे कंपनीच्या main office मध्ये, personally, online पद्धतीनेसुद्धा दिले जाते.

४) Marketing & Advertising
फ्रँचायझरने फ्रँचायझीला मार्केटिंग बाबतसुद्धा सहकार्य प्रदान करणे अपेक्षित आहे. मग ते टीव्हीच्या, रेडिओच्या माध्यमातून असो किंवा सोशल मिडिया आणि ईमेलच्या माध्यमातून. सहसा फ्रँचायझर फ्रँचायझीकडून यासाठी लागणारा खर्च वसूल करतात.
५) Cooperation म्हणजेच सहकार्य
फ्रँचायझीने व्यवसायात प्रवेश केला आणि दैनंदिन कामकाज सुरु झाले की, रोज अनेक नवीन प्रश्न, समस्या समोर येत जातात. फ्रँचायझरने कराराची मुदत संपेपर्यंत या समस्या सोडवण्यासाठी फ्रँचायझीला सहकार्य करणे अभिप्रेत आहे. तसेच फ्रँचायझीसुद्धा इतर सहकारी फ्रँचायझींशी संपर्क साधू शकतात. त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात.
आता वळूया फ्रँचायझींच्या प्रकारांकडे
फ्रँचायझी बिझनेस मॉडेलचे (Franchise Model) दोन प्रकार आहेत. प्रोडक्ट डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझी मॉडेल आणि बिझनेस फॉरमॅट फ्रँचायझी मॉडेल
१) प्रोडक्ट डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझी मॉडेल (Franchise Model)
या प्रकारात फ्रँचायझर वस्तू बनवतो आणि फ्रँचायझी ती विकतो. थोडाफार फरक सोडल्यास हा प्रकार सप्लायर-डीलर सारखाच आहे. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे फ्रँचायझी प्रकारात फ्रँचायझीला फक्त त्याच ब्रँडच्या किंवा उत्पादनाशी निगडित वस्तू विकता येतात, तर सप्लायर डीलर प्रकारात डीलर इतर ब्रँडची उत्पादने सुद्धा विकू शकतो.

२) बिझनेस फॉरमॅट फ्रँचायझी मॉडेल (Franchise Model)
हा बहुतांशी वापरला जाणारा प्रकार आहे. यात फ्रँचायझी फ्रँचायझरचे नाव आणि पद्धत वापरून उत्पादने बनवू शकतो आणि त्याच नावाने विकू शकतो. उदाहरणे – केएफसी, मॉन्जिनीस, डॉमिनोज पिझ्झा, इत्यादी.

तर आजचा लेख तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल म्हणजे नक्की काय, फ्रँचायझर आणि फ्रँचायझी म्हणजे काय त्यांच्यातील संबंध कसा आहे आणि फ्रेंचायझिचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील. असेच काही interesting लेख वाचण्यासाठी नवी अर्थक्रांतीच्या you tube चॅनलला आताच subscribe करा.
हा लेख विडीयो मध्ये पहा आणखी वाचा
-

यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time management) कसे करावे?
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time Management) कसे करावे… करायची सुरवात?
आयुष्य म्हणजे तरी काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्याकडे असणारा वेळच. जो हा वेळ अत्यंत प्रभावीपणे वापरतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. आपला वेळ शास्त्रशुध्द पध्दतीने कसा वापरावा, जेणेकरून तुम्ही जीवनात व उद्योगात यशस्वी व्हाल? प्रथम आज, या महिन्यात, या वर्षी, या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे, ते ध्येय निश्चित करा व त्यानुसार टाईम मॅनेजमेंट (Time Management) करा. रोज सकाळी शांतपणे दिवसभराच्या नियोजनासाठी १५ मिनिटे द्या. प्राधान्यक्रमानुसार कामाची यादी बनवा, कामाचे चार भाग बनवा.
पहिली – अत्यावश्यक व अर्जंट अशी कामे पहिल्यांदा करा;
दुसरी – महत्वाची पण अर्जंट नाहीत, ती त्यानंतर करा;
तिसरी – अर्जंट पण महत्वाची नाही, ती त्यानंतर करा;
चौथी – अर्जंटही नाहीत व महत्वाची नाहीत, ती कामे शेवटी वेळ उरला तर करा.
दिवस सुरू करताना वहीमध्ये कामाची नोंद करा व दिवस संपताना ती पूर्ण झाल्याची खात्री करा. नाही म्हणायला शिका, प्रत्येक फोन घेतलाच पाहिजे किंवा लगेच घेतला पाहिजे, ईमेल किंवा फेसबुक किंवा व्हॉटसअपवर आलेल्या मेसेजला लगेच रिप्लाय केलाच पाहिजे असे नाही. पहिल्यांदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. फोन कितीही वाजू दे, अत्यंत महत्वाचा असेल, तरच उचला. ई-मेल, व्हॉटसअपला ठराविक वेळेनंतर रिप्लाय द्या. सकाळी एकदा, दुपारी एकदा, सायंकाळी एकदा असा प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ द्या. सर्व कामे स्वतः करण्याचा आग्रह धरू नका कमी महत्वाची, वेळखाऊ कामे इतरांकडून करून घ्या. ज्याचे काम त्याने करावे, वेळेचा व पैशाचा अपव्यय त्यामुळे टळतो.
आज जीवनातील अनेक लोकांच्या एकाच वेळी संपर्कामुळे डिस्ट्रॅक्शन खूप वाढले आहे, ते कमी करा, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. नातेवाईक, मित्र, क्लब इत्यादींचा उगाचच फापट पसारा वाढवू नका. सिलेक्टिव्ह व्हा, ज्याच्यांशी आपले जमते अशांशी सबंध व संपर्क ठेवा, त्यामुळे तुमचे आयुष्यातील वेळ वाचून सुखी, श्रीमंत व समृध्द होत राहाल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या, वेळेवर उठणे, थोडासा का होईना व्यायाम करणे, वेळेवर योग्य आहार घेणे याकडे लक्ष द्या. किमान आठ तास झोप व्हायला हवी, तरच दिवसभराचे जीवनाचे टाईम मॅनेजमेंट (Time Management) तुम्हाला साधता येईल.
तुम्ही तुमचे टाइम मॅनेजमेंट (Time Management) कसे करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.
हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी -

फुकट वाटा, पण उधार नको
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे फुकट वाटा, पण उधार नको… करायची सुरवात?
उधारी आणि व्यवसाय याचं नातं वेगळंच आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. उधार द्यायचं नाही, तर धंदा होत नाही आणि उधार दिलं तर वसूल होत नाही. उधारी देऊन नुकसान होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेलं काय वाईट? लोकांना फुकट वाटायला तुम्ही काय कुबेराचे नातेवाईक आहात का? उधारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता विकत घेता व चिंता ही चिता समान असते, जी माणसाला हळूहळू मारते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आपल्या हक्काचे, कामाचे पैसे दुसऱ्याकडे पडून आहेत, त्याचा वापर आपण करू शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट कोणती.
उधारीवर बाजारात खूप मजेशीर किस्से आहेत. “उधार एक जबरदस्त जादू है। हम उधार देंगे आज, तो कल आप गायब हो जाओगे।”, “उधार ८० साल के उपरवाले को मिलेगा, वो भी उनके माता पिता को पुछकर।”
उधार न दिल्याचे व्यवसायात फायदे आणि तोटे
१) डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.
२) तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू शकता.
३) उधार देऊन संबध बिघडण्यापेक्षा उधारी नाकारून बिघडलेले बरे.
४) माल नाही खपला तर तो दानधर्म करा, पुण्य तरी मिळेल; पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.
५) उधारीतून वाद म्हणजे विकतचे भांडण होऊ शकते.
६) उधारीमुळे बुद्धिमान, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आयुष्यातून बरबाद होतो.
७) उधारीपुढे नुकसान झाल्यास तुमचा चांगुलपणा तुम्हालाच भोवतो व जग तुम्हालाच खुळे समजते, तुम्ही फेल बिझनेसमन आहेत असा समज होतो.
९) माल नाही खपला तर तो दानधर्म करीन, पुण्य तरी मिळेल पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.
प्रमाणाबाहेर उधारी म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू. “एक रूपयाच्या मार्जिनवर धंदा करेन, पण उधारीवर करणार नाही.” अशी खूणगाठ बांधा. उधारीची वही हा प्रकारच दुकानात ठेऊ नका. नंतर देतो, लिहून ठेवा; तसले काही नको. ‘माल ठेवा, पैसे असतील तेव्हा घेऊन जा.’ कोणाशी कितीही दुश्मनी असली तरी मृत्यूनंतर आपण त्यांच्या कार्यास जातो; पण उधार घेणारा कधीच येत नाही. उधारी माणसात इतके वाईट अंतर निर्माण करते.
तुम्ही व्यवसाय करत असताना उधारीच्या समस्येला कसे हाताळता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आत्ताच सब्स्क्राइब करा.
हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी -

पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे… करायची सुरवात?
एका गावात एक व्यावसायिक कुटुंब होते. तिघे भाऊ, वडील मिळून इंजिनीअरिंग स्पेअर पार्टस, हॉटेल इत्यादी व्यवसाय करत होते. गेल्या ७ ते ८ वर्षात एक्सपोर्टमधून बराच फायदा कमविला. अंदाजे १ ते ३ कोटी रुपये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतविले. मुंबईजवळ काही अंतरावर रोडलगत २७ एकर शेतजमीन १८ लाख रुपये एकर दराने विकत घेतली. काही महिने प्रोजेक्टचे नियोजन करीत होते. नंतर त्यांनी ती शेतजमीन एनए करून घेतली. त्यावर व जमिनीतील अंतर्गत रस्ते हेक्टरच्या लेवलने केले, वृक्षारोपण इत्यादीसाठी अंदाजे एकरी सहा लाख खर्च आला. तो त्यांनी बँकेतून कर्ज काढून केला. प्रत्येकी २००० वर्गफुटाने प्लॉट प्रत्येकी १६ लाख दराने विक्रीस आणले व ३ बीएचके बंगलो ४० ते ५० लाख ह्या दरम्यान. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची विक्री त्यांनी सुरू केली. सुरुवातीचे काही प्लॉट खपल्यानंतर थोडे महिने विक्री बंद करून आलेले पैसे खर्च करून सर्व प्लॉटना लहान बाउंड्री हॉल, छोटे वूड हाऊस, आकर्षक एन्ट्रन्स लॉन प्रोजेक्टससाठी बनविली. खूप लहान व १५ गुंठे ओपन जागेत लॉन बनविले. प्रोजेक्ट अंतर्गत खूप छान वृक्ष लागवड केली. प्रोजेक्ट्सचे थ्रीडी प्रझेंटेशन तयार केले, पूर्ण प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचा आकर्षक व्हिडीओ बनविला व त्यांची पुणे, मुंबई आणि इतर चांगल्या ठिकाणी जाहिरातबाजी केली. पुढे काही महिन्यात प्रॉपर्टीचे दरही वाढले होते. प्लॉट, बंगलो बघायला येणाऱ्यासाठी आकर्षक वेटिंग रूम, छोटेसे छान ऑफिस, साईटवर माहिती देण्यासाठी एमबीए झालेल्या तरुणाची नियुक्ती केली.
२७ एकर जमिनीपैकी एनए केल्यानंतर सुमारे २२ एकर जमीन विक्रीस उपलब्ध होती व प्रत्येकी २००० वर्गफुटाचे ४४० प्लॉट विक्रीस तयार होते. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे ४४० गुणिले २० लाख बरोबर आठ कोटी ऐंशी लाख इतक्या किंमतीचा होता. एनए करणे, अंतर्गत रस्ते, सजावट, बाउंड्री वॉल, गार्डनिंग, फलकहाऊस, प्लॅन, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, एजंटना देऊ केलेले ५% कमिशन, बँकेचे व्याज, कामगारांचा पगार इत्यादीवर १५ ते २०% खर्च त्यांनी केला होता. पाच ते सहा वर्षात हळूहळू करून सर्व प्लॉट विकले गेले. सुरुवातीचे काही प्लॉट १० लाखाने विकले व परत प्रत्येक सहा महिन्यात किंमत वाढत गेली, शेवटचे ३० ते ३५% प्लॉट २७ लाखाच्या दराने विकले गेले. सरासरी दर १८ लाखाचा राहिला. ज्या शेतकर्याने १८ लाख एकरी दर म्हणून जमीन विकली त्याला त्याच जमिनीला दोन गुंठ्याला १८ लाख दर केवळ ५-७ वर्षात होईल असा विचार केला नसेल.
पैशातून पैसा कमविण्याचे हे एक उदाहरण खूप काही सांगत आहे. जमिनी विकून खायच्या की आपण उद्योजक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. जसे कस्तुरीमृगाला माहीत नसते की, आपल्याकडे अत्यंत किंमती कस्तुरी आहे, तसे शेतकर्यांनाही माहीत नाही आपल्या जमिनीचे भविष्यातले खरे मोल काय आहे. ज्यांनी जमिनी २० लाख प्रति एकराने विकल्या तेथे आज २० लाख गुंठ्याचा दर आहे व दुर्दैव त्या मुळ जमीन मालकाकडे एक गुंठा तेथे घेण्याची ऐपत नाही. कारण बाटली, गाडी, सोन्याची चेन, राजकारण यातच त्याचे सर्व पैसे संपले.
पैशाने पैसा वाढवायचं तंत्र तुम्ही कधी अंमलात आणलाय का? आणलं असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचे नियोजन तुम्ही कसं केल? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.
हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी -

काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा…’ करायची सुरवात?
रामलाल मिठाईवाले ४० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर मुंबईत आले. दुसर्याच्या दुकानात हलवाईचे काम करत करत स्वतःचा धंदा सुरू केला. आज मुंबईत ५ दुकाने, ४ फ्लॅट, गाड्या सर्व काही आहे. दोन मुलं त्यांना व्यवसायात हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी रामलाल याचं दुःखद निधन झालं. सांत्वन सभा पुढील रविवारी होती, त्यांच्या मोठ्या मुलाने व्हॉटसअपवर तसा निरोप सर्वांना दिला. त्यांचा लहान मुलगा काऊंटर सांभाळत होता, ग्राहकांची गर्दी होती. ख्रिसमसमुळे केक, मिठाईला चांगली मागणी होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ दुकानात गेले आणि म्हणाले, “बिपीनभाई पिताजी गुजर गये समजके बहुत दुःख हुआ.” तो म्हणाला; मेहमान मिलने के लिए घर मे आते रहते है, इसलिए बडा भाई घर पे है। ख्रिसमस का सीझन है, तो मै धंदा संभाल रहा हू। क्या करे शो मस्ट गो ऑन! सर जी, वो कंडोलन्स मीटिंग का मेसेज मिला क्या, हमारे समाजभवन मे है।” ते गृहस्थ म्हणाले, “हा मिल गया, चलता हूँ।”. तीन दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं, त्याचा परिणाम काऊंटरला अजिबात न जाणवू देता तो व्यवसाय चालवत होता.
असे म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला हसता येत नाही त्या दिवशी दुकान उघडू नका. ज्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर हसू नसते, त्याच्या दुकानात आले की ग्राहकांना जाऊच नये असे वाटते. काऊंटर सेल्सचीसुद्धा एक विशिष्ट सायकॉलॉजी आहे. माल त्याच किंमतीचा, पण चांगल्या सेल्स मॅनेजमेंटमुळे काही दुकाने जोरदार चालतात.
यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघडणारे व सगळ्यात शेवटी बंद होणारे दुकान तुमचेच हवे. देवाला सुगंधी अगरबत्ती, दिवा लावूनच काऊंटरची सुरवात करा. मद्यपान, मांसाहार केले असेल तर आंघोळ केल्याशिवाय काऊंटरला येऊ नका. गृहकलह, बायकोबरोबर भांडण, टेन्शन, आजार, तब्येत, कुणाचा मृत्यू किंवा काहीही असेल, तरी कोणत्याही परिस्थितीत त्याचा काऊंटरवर दिखावा व वाच्यता करू नका. खरंच काही अडचण असेल व तुम्हाला त्या दिवशी हसता येत नसेल, तर एकतर दुकान उघडू नका, नाहीतर तुम्ही काऊंटरला बसू नका.
दुकानाचे सर्व शेल्फ गच्च भरलेले दाखवा व ठेवा. अर्धवट शेल्फ ग्राहकांवर अत्यंत बॅड इंम्प्रेशन टाकतात. नेहमी स्वच्छ कपडे घाला, शक्यतो पांढरे शुभ्र किंवा लाईट कलरचे शर्ट वापरा. काऊंटरवर नेहमी स्वच्छता ठेवा. दुकानातील कामगारसुध्दा नीटनेटके असावेत. गल्ल्यात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. सुट्टे नसले की उगीच प्रत्येक वेळी इकडे तिकडे पळू नका. ‘छुट्टा लेके आओ’ असे ग्राहकांना म्हणू नका. नाहीतर सुट्टे आणायला जातो आणि मालही तिकडेच खरेदी करतो, तुम्ही वाट पाहत बसणार कधी येतोय म्हणून. अशा लहान लहान गोष्टीचे बारीक लक्ष व नियोजन म्हणजे ‘काऊंटर सेल्स मॅनेजमेंट’ हे लक्षात ठेवा.
तुमचे काउंटर सांभाळताना तुम्ही या गोष्टी पाळता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्टीचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी