Tag: प्रेरणादायी

  • स्वाभिमानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे

    स्वाभिमानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे

    जीवनात सफलता मिळवायची असेल, तर आपल्याकडे आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सीजन लागलो, माशाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज लागते. तसेच माणसाला स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याच जणांकडे हा विश्वास नसतो. तो कसा मिळवायचा ते आजच्या गोष्टीत पाहूयात.

    गोदावरीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याश्या, सुख समृद्धीने भरलेल्या गावात सगळेजण अगदी आनंदाने नांदत होते. त्या गावात एक धनाढ्य सावकार होता. धनाजीराव त्याचं नाव. सावकार म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो गावकऱ्यांकडून पैसे बळकवणारा, त्यांना गुलाम म्हणून वागवणारा, त्यांचा छळ करणारा, मात्र धनाजीराव तसा नव्हता. तो गावकऱ्यांवर खूप प्रेम करायचा आणि गावातील लोक देखील त्याला खूप मानायचे. असेच एकदा गावात मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. गाव अगदी गजबजून गेले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.

    गोदावरीकाठी गावातील काही लहान मुलं पकडापकडीचा खेळ खेळत होती. त्यात त्या सावकाराचा मुलगा देखील होता. खेळ ऐन रंगात आला असतानाच काठाजवळून धावताना अचानक तो नदीत पडला. सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. हा हा म्हणता अख्खा गाव नदीकाठी जमा झाला. धनाजीराव आणि त्याची बायको देखील तिथे आली. तिचा आक्रोश सुरु झाला. धनाजीरावचा ‘माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा रे!’ म्हणून आरडाओरडा करत होता. त्याची ती अवस्था सर्वांचं काळीज पिळवटून टाकत होती. मात्र कोणीच त्या लहानग्याला वाचवायला पुढे गेलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींना तर पोहता येत असून देखील ते नदीत उतरले नाहीत. त्या गर्दीत एक जलतरणपटू देखील होता. त्याच नाव होतं विकास. मात्र सगळे इतके घाबरले होते, की त्यांच्याकडे बघून विकासचे मन नदीत उतरण्यासाठी धजावत नव्हते.

    तितक्यात अचानक कोणीतरी त्याला पाठीमागून नदीत ढकललं. नदीकाठचा गोंधळ अचानक शांत झाला. कोणाला काहीच तर्क लावता येईना. नदीत पडलेला विकास तर पूर्णपणे भांबावून गेला होता, पण काही वेळाने विकास देखील त्या प्रवाहात दिसेनासा झाला. विकास ठीक असेल ना? पाटलाचा पोरगा जिवंत असेल ना? असे असंख्य प्रश्न गावकऱ्यांसमोर होते. आणि काही वेळाने पाण्यात एक हालचाल जाणवली. विकास एका हाताने पाण्याला दूर सारत दुसऱ्या हातात पाटलाच्या मुलाला घेवुन नदीकाठी आला. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. धनाजीरावाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकासने मुलाला वाचवलं म्हणून संपूर्ण गाव त्याची शाही मिरवणूक काढत होतं. मात्र त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं, त्याला कळत नव्हतं की आपल्याला नदीत कोणी ढकललं.

    त्याची नजर शोध घेत होती त्या व्यक्तीचा. मिरवणूक संपली. तो तरुण आपल्या घरी निघाला आणि अचानक रस्त्यात एक 70-80 वर्षाचे आर्मी रिटायर्ड माने आजोबा त्याच्या समोर आले. ते म्हणाले तू सकाळपासून ज्याला शोधतोय तो मीच आहे. त्याला काहीच कळेना. तो माने आजोबांना विचारतो, “तुम्ही मला पाण्यात का ढकललं? त्यावर ते म्हणाले, अरे मला माहीत होतं तुला उत्तम पोहता येतं ते. आणि त्याक्षणी तुझ्या मनात जो गोंधळ चालू होता, तोही मी ओळखला होता. तुझ्यात त्याला वाचवण्याची क्षमता होती मात्र धाडस नव्हतं. मला माहिती होतं जर मी तुला पाण्यात ढकलंल तर 100 टक्के तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याबरोबरच त्या लेकराला देखील वाचवणार. फक्त गरज होती एका हलक्याश्या धक्क्याची. आणि ते मी केलं. पुढे माने आजोबा विकासला म्हणाले: लेकरा तुला आयुष्यात खूप पुढे जायचं असेल, तर असा स्वतःवरचा विश्वास हरवून बसू नकोस. प्रत्येकवेळी तुला कोणीतरी यशाचा रस्ता दाखवेलच असं नाही. तो तुझा तुलाच शोधावा लागेल.   

    बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट येईल का, आपण ते करू शकतो का असे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कधी कधी आपण स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो. मात्र आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे पावलोपावली आपल्याला प्रोत्साहित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो तुम्ही जर बघ्याची भूमिका घेवून आयुष्य जगलात, तर कधीच तुमचं कौतुक होणार नाही, असं काहीतरी करा की ज्यामुळे यशस्वी लोकांच्या यादीत तुमचं नाव येईल. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विचारवंताच्या सहवासात राहिलं पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपलं रूप, आपली बुद्धी, आपला रंग या गोष्टी आपण जन्मत:च घेऊन येतो. परंतु आत्मविश्‍वास हा आपल्याला विकसित करावा लागतो आणि प्रत्येकाने तो केलाच पाहिजे.

    तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • ध्येयासाठी झपाटून जा

    ध्येयासाठी झपाटून जा

    शाळेत असताना मराठीच्या पेपरमध्ये 5 मार्कांसाठी व्याकरणाचे काही प्रश्न दिलेले असायचे. वर्तमानकाळाचे भविष्यकाळात रूपांतर करा किंवा भविष्यकाळाचे भूतकाळात, वर्तमानकाळात रूपांतर करा. प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तरपत्रिकेत बदलता येऊ शकतो, मात्र वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो, ना मागे आणता येतो.

    प्रत्येकालाच आपण का जगतोय आणि कशासाठी जगतोय हे प्रश्न पडलेच पाहिजेत, कारण त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाचे मर्म कळू शकते. आपलं नशीब बदलण्याची धमक प्रत्येकामध्ये असते, मात्र त्यासाठी तुमच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. एका महाकाय पर्वताच्या टोकावर एक 40-50 वर्षाचा सद्गृहस्थ पर्वत सर करण्याच्या उद्देशाने जातो. थंडी, वारा, ऊन, पाऊस कश्या-कश्याचीही पर्वा न करता तो तो पर्वत पार करतो आणि काही दिवसानंतर सुखरूप पायथ्याशी येतो. पायथ्याशी असलेले सर्वजण अचंबित होतात. ते म्हणतात,  “अरे तुला माहीत नाही का या पर्वतावर कोणीच जावू शकत नाही, मग तू कसं काय गेलास.” त्यावर तो गृहस्थ म्हणतो, मला ही गोष्ट माहीतच नव्हती आणि म्हणून मी गेलो. आणि बघा यशस्वी झालो. आयुष्यात यश मिळवत असताना जशी प्रोत्साहन देणारी माणसं असतात, तशीच निरुत्साहित करणारी लोकंदेखील असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे गेलं पाहिजे. ओम शांती ओम सिनेमात शाहरूख खानचा एक फेमस डायलॉग आहे, ‘अगर आप किसी चीज को पुरी शिद्दत से चाहते हो, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे जुड जाती है.”

    प्रत्येकामध्ये आपले आयुष्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असते, फक्त त्याला याची जाणीव नसते. गाडीला ५ गियर असतात, जर योग्यवेळी योग्य गियर टाकला तरच गाडी वेगाने पळू शकते. बाकीचे 4 गियर असूनसुद्धा आपण जर पहिल्याच गियरवर गाडी चालवत असू, तर निश्चितच गाडी पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपल्या बाबतीतही तसेच होते. घोड्याप्रमाणे झापडं लावून तुम्ही काम केलं, तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचे ध्येय गाठू शकाल, कारण शेवटी यश किंवा अपयश हे केवळ आपल्याच हातात असतं.       

    रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका मजुराचा रॉबर्ट नावाचा एक मुलगा असतो. त्याची नववीची परीक्षा चालू असते. एकेदिवशी वर्गशिक्षिका अचानक वर्गात येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणतात, “मुलांनो “माझे स्वप्न” या विषयावर निबंध लिहा. निबंध मनापासून आणि तुमच्या खऱ्या-खुऱ्या स्वप्नावर लिहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच निबंधावर तुमचा यावर्षीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे निबंध व्यवस्थित आणि विचार करून लिहा. सगळे जण अगदी मन लावून निबंध लिहीत असतात. पेपर जमा करण्याची वेळ येते. घंटा वाजते, पेपर जमा करून सगळे आनंदाने घरी जातात. काही दिवसांनी निकालाचा दिवस येतो. सगळे विद्यार्थी वर्गात उपस्थित असतात. सगळ्यांच्या मनाला धाकधूक लागलेली असते, मला मार्क चांगले पडले असतील ना? मी पास झालो असेल ना? असे अनेक प्रश्न मनात डोकावत असतात. मात्र केवळ रॉबर्टच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत असतं, कारण आपण निबंध चांगला लिहिलाय त्यामुळे आपण पास होणारच याचा त्याला विश्वास असतो. सगळ्यांचा रिजल्ट जाहीर होतो. वर्गातली सगळी मुलं पास होतात, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला स्वतावर विश्वास असतो, तो रॉबर्ट नापास होतो. ज्या चेहऱ्यावर हास्य खुललेलं होतं, तो चेहरा अचानक चिंताग्रस्त होतो. त्याला काहीच कळत नाही.

    तो तडक शिक्षिकेच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, ‘मॅडम, कदाचित तुम्ही माझा पेपर व्यवस्थित तपासला नसेल, कृपया तुम्ही परत चेक करता का? बहुदा चुकून तुम्ही….”

    शिक्षिका त्याला मध्येच थांबवत म्हणतात. “अरे चुकून नाही मी पेपर बघूनच तुला नापास केलं. अरे वेड्या तू निबंध काय लिहिलास, तुझं तुला तरी माहिती आहे का? मी रेसकोर्सचा मालक बनेल. २००-३०० घोडे माझ्याकडे असतील, अनेक कामगार माझ्या हाताखाली असतील, मी करोडपती बनेल. अरे हे शक्य आहे का? माणसाने झेपतील अशी स्वप्न बघावी. हे बघ अजूनही वेळ गेली नाही. तू तुझा निबंध बदल, दुसरा निबंध लिहून दे. मी रिजल्ट बदलते.”

    त्यावर रॉबर्ट म्हणाला, “नाही मॅडम, तुम्ही तुमच्या खऱ्या स्वप्नावर निबंध लिहायला सांगितला होता, मी तो लिहिलाय आणि मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच.”

    त्यावर बाई म्हणाल्या, “ठीके, आता तूच ठरव निबंध बदलून पुढच्या वर्गात जायचं की, इथेच बसायचं ते.”

    त्यावर रॉबर्ट तो रिजल्ट घेतो आणि रागारागाने निघून जातो.

    काही वर्षांनी त्याच शिक्षिका एका मोठ्या रेसकोर्सवर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जातात. रेसकोर्सचा तरुण मालक अगदी आदराने त्यांचे स्वागत करतो. स्वतः पूर्ण रेसकोर्स त्यांना फिरून दाखवतो आणि त्यांना दुपारच्या जेवणासाठी देखील आग्रह करतो. त्याने केलेला तो कळकळीचा आग्रह त्या शिक्षिका स्वीकारतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन डायनिंग हॉलमध्ये जातात. त्या हॉलच्या एका भिंतीवर एक फ्रेम अडकवलेली असते. कुतुहलाने त्या शिक्षिका त्या फ्रेमजवळ जातात. त्यात फ्रेमकडे बघतात आणि आश्चर्याने म्हणतात, “अरे या सर्टिफिकेटवर तर माझीच स्वाक्षरी आहे. कोणाचं सर्टिफिकेट आहे हे? रॉबर्ट! अरे हा तर माझाच विद्यार्थी! तुमच्या इथे काम करतो का तो? जरा बोलवा त्याला.”

    त्यावर रेसकोर्सचा तो तरुण, उमदा मालक त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो मॅडम मीच तो तुमचा विद्यार्थी, रॉबर्ट. मॅडम शॉक झाल्या. त्यावर रॉबर्ट म्हणाला मॅडम, “त्यावेळी जर मी तुमचं ऐकून स्वप्न बदललं असतं, तर कदाचित शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो; मात्र जीवनाच्या परीक्षेत नापास झालो असतो.”  

    मित्रांनो, तुम्हाला खरंच एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर स्वस्थ बसू नका. त्यामुळे ध्येयासाठी झपाटून जा. जर तुम्हाला अगदी मनापासून आणि तीव्रतेने वाटत असेल की, ही गोष्ट मला मिळवायचीच आहे आहे, तर नक्कीच ती तुम्ही मिळवाल.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • मानसिक शांततेसाठी या सहा गोष्टी करून पाहाच!

    मानसिक शांततेसाठी या सहा गोष्टी करून पाहाच!

    स्वतःची काळजी घ्यायला शिका

    आपण नेहमी स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेत आहोत का? याची खात्री करा. कारण इतर कामं करण्याच्या नादात आपण त्या कामांची किंवा इतरांची काळजी घेत असतो, पण स्वत:कडं मात्र दुर्लक्ष करत राहतो. स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? तर शांत बसणं, आवडीची गाणी ऐकणं किंवा एखादा आवडीचा पदार्थ बनवणं. थोडक्यात काय तर ज्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं.

    वेळेचे नियोजन

    सतत शिका

    तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे आणि ओळख निर्माण करायची आहे ते क्षेत्र निवडा. तुमच्या कौशल्यांवर काम करा आणि ज्ञान वाढवा. पुस्तकं वाचा, ऑनलाइन अभ्यासक्रम घ्या, कार्यशाळेत सहभागी व्हा किंवा वेबिनारमध्ये भाग घ्या. या गोष्टी केल्याने तुमचं मन उत्साही राहील आणि नवीन संधीसुद्धा मिळतील.

    ध्येय निश्चित करा

    स्वतःसाठी काही स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा. त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये divide करा आणि त्या दिशेने कार्य करण्याची योजना तयार करा. जर तुमच्याकडे निश्चित ध्येय नसेल, तर तुमच्या डोक्यात बिनकामाचे विचार येतील आणि यामुळे तुम्ही पुन्हा मानसिक शांततेपासून चार हात लांब राहाल.

    सजगतेचा सराव करा

    मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे तुमची सजगता वाढविण्यासाठी ध्यानाचा सराव करा. ध्यान हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे, जे तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवते. जेव्हा तुम्हाला वाटेल की, आपण अतिविचार करायला लागलो आहोत, तेव्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. 

    चांगली संगत ठेवा

    तुम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांसोबत रहा. मित्र असो वा कुटुंब वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवा. नकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहून आपणही नकारात्मक विचार करायला लागतो आणि परिणामतः आपण आपली शांतता गमावून बसतो.

    आणखी वाचा

  • सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधील प्रवास म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनात सुखी व यशस्वी होणं हे लक्ष्य असतं व प्रत्येकजण त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. जीवनात यशस्वी असणं व सुखी असणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत.

    सुखी असण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात, मग मनुष्य श्रीमंत असो वा गरीब. उदा. आज पैशाला खूप महत्त्व आले आहे. असे म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सुखी, परंतु तुम्ही खेड्यापाड्यात जा, गरीब शेतकरी, किंवा जंगलात राहणारा आदिवासी पहा तो देखील आपल्या आयुष्यात सुखी आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपापली सुखाची व्याख्या व दृष्टिकोन वेगळे असतात. तर यशाची परिभाषा ही समाजाच्या दृष्टीने वेगळी असते, ज्याने स्वत:च्या आयुष्यातील ध्येय प्राप्त केलं, तोच खरा यशस्वी असतो. ध्येयप्राप्ती म्हणजेच यशाचा मार्ग हा थोडा खडतर असतो, परंतु समाजात असे अनेकजण आहेत की, ज्यांनी जीवनात खूप यश मिळवले. जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो, तर जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचे कोणते तीन प्रमुख स्तंभ असतात ते आजच्या video मध्ये आपण पाहूया.

    १) Health (आरोग्य) : “Health is Wealth” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण आपण खरंच त्याकडे किती लक्ष दिलंय? आम्हाला सांगू नका, तुमचं तुम्हाला माहिती आहेच! जर तुम्ही शारीरिक, मानसिक व बौध्दिकदृष्ट्या सुदृढ असाल, तर तुम्हाला सर्व काही मिळतं, परंतु जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, विविध विकारांनी ग्रस्त असाल, डॉक्टर आणि महागड्या उपचार पध्दतींच्या अधीन झालेले असाल तर जीवनातील आनंद हरवून गेलेला असतो, जीवन नीरस झालेले असते. जर उत्तम आरोग्य असेल, तरंच तुम्ही आयुष्यातील इतर गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. “You can’t enjoy wealth, if you are not good in health.

    २) Wealth (संपत्ती) : जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचा दुसरा प्रमुख स्तंभ म्हणजे संपत्ती. पैसा, संपत्ती तुम्हाला आदर देते आणि प्रतिकूलतेशी लढण्यास सक्षम बनवते. आर्थिक साक्षरता व आर्थिक स्वातंत्र्य असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज पैसा असेल, तरच आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात व आपल्या इच्छेनुरूप जीवन जगता येते. चांगल्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. वाईट दिवसांसाठी नेहमी पैसे वाचवा करा. गरिबीत तुमच्यासोबत कोणीही नसेल, तेव्हा हा पैसा तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून सुखी व समाधानी जीवनासाठी तुमच्याकडे आरोग्यासोबतच संपत्ती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.

    ३) Relationships (संबंध) : तुमच्याकडे उत्तम आरोग्य व खूप संपत्ती आहे, परंतु तुमचे इतरांशी संबंध चांगले नसतील, तर तुम्हाला समाधान, सुख, यश मिळणे कठीण असते. इतरांशी चांगले संबंध आपले जीवन समृध्द करण्यात मोठी मदत करतात. ते आपल्याला आपलं जीवन आनंदी करण्यात मदत करतात; जीवनात कठीण प्रसंग आल्यास मनावरचे ओझे कमी करतात, मन हलके होते आणि आपले जीवन आनंददायी होते. विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या यशस्वी लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे अत्यंत शहाणपणाचे असते, कारण त्यांच्याकडून बरेच काही शिकता येते. त्यांच्या सहवासामुळे सकारात्मक दृष्टिकोन अवलंबता येतो. त्यामुळे पैसा, आरोग्य यासोबतच इतरांशी चांगले संबंध असणे अत्यंत महत्त्वाचे असते. Self centric किंवा egoistic माणसे कधीच आयुष्यात पुढे जात नसतात. याबाबतीत एक मस्त शेर आहे की, “किसीने पूछा हमें उम्र और जिंदगी में क्या फर्क है? तो हमने यूँ जवाब दिया की, जो अपनों के बिना बीती वो “उम्र” और जो अपनों के साथ बीती वो “ज़िन्दगी”

    ४) आपण काय करावे? : आयुष्यात सुखी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी आयुष्यात उत्तम आरोग्य, संपत्ती कमावण्याचा व आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील तसेच आपल्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी चांगले संबध प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तसेच जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. व्यायाम आणि आध्यात्माला महत्व दिले पाहिजे. तरुण वयात कशाला पाहिजे अध्यात्म वगैरे सारखे प्रश्न विचारणाऱ्यांपासून जरा लांबच राहिलं पाहिजे. जर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेले असेल, तर आपल्याकडे आपल्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करण्याची शारीरिक क्षमता शिल्लक राहत नाही. परिणामी, आपले नातेसंबंध बिघडतात. जर आपण चांगले नातेसंबंध टिकवण्यात अपयशी ठरलात, तर आपली मानसिक स्थिती, आरोग्यावर आणि परिणामी आपल्या श्रीमंतीवर वाईट परिणाम होतो. ज्याच्या आयुष्यात चांगले आरोग्य नाही त्याला शारीरिक आणि मानसिक रोग होतात; ज्याच्या आयुष्यात संपत्ती नाही त्याला दारिद्र्य आणि गरिबीचा रोग होतो आणि ज्याच्या आयुष्यात स्वतःची म्हणावी अशी चांगली माणसे नाहीत, त्याला एकलकोंडेपणाचा रोग होतो आणि त्यातच आयुष्य संपून जाते. त्यामुळं आयुष्यातल्या या तीन महत्त्वाच्या स्तंभांना कसं मजबूत बनवता येईल याचा आत्तापासूनच विचार करायला सुरुवात करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • खरी संपत्ती म्हणजे काय ?

    खरी संपत्ती म्हणजे काय ?

    रॉजर एच. यांच्या पुस्तकातील एक गोष्ट आजच्या संडे मोटिव्हेशनमध्ये आपण बघुयात.आजवर शिकलेल्या उद्योजकतेच्या धड्यांपैकी एक खूप चांगला धडा मला योगायोगाने श्रीलंकेतील एक नदीमध्ये प्रवास करताना शिकायला मिळाला.

    मी श्रीलंकेत गेलो असताना नदीच्या पांढऱ्याशुभ्र पाण्यात राफ्टींग करण्याची माझी इच्छा होती. नदीमध्ये राफ्टींग करत असताना आमची राफ्ट एका सुंदर अशा नदीच्या खोऱ्यामध्ये शिरली. आमचा जो गाईड होता, तो आम्हाला बोटाने पर्वताच्या आजूबाजूला चहाची केलेली लागवड, अतिशय सुंदर आणि रम्य घरं, नदीकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेलं शहर दाखवत होता.

    “हे सर्व माझ्या वडिलांचं होतं.” तो म्हणाला.

    “यातला नक्की कुठला भाग?” मी प्रश्न केला.

    “सगळंच!” त्याने उत्तर दिलं

    त्याचे वडील श्रीमंत जमीनदार असतील असं मला वाटलं. न राहवून मी त्याला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली, मग त्याने एक चकित करून सोडणारी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

    “माझ्या वडिलांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारत सोडला आणि काहीतरी नवं करता येईल का हे पाहण्यासाठी श्रीलंकेला आले. इथे आल्यावर त्यांना या खोऱ्याचे दर्शन घडले. त्यांना ही जागा इतकी आवडली की त्यांनी इथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे तेव्हा अजिबात पैसे नव्हते. त्यांनी इथली काही जमीन मोकळी केली. चहाची लागवड कशी करायची ते शिकून घेतलं आणि त्या जमिनीवर चहा लागवड सुरु केली.”

    “लोकांना त्यांचा चहा आवडू लागला. त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली. त्यांच्यापेक्षा जास्त माहिती असणाऱ्या अनुभवी लोकांना लागवडीसाठी सोबत घेतलं. आता त्यांच्याजवळ पुरेसे पैसे होते, त्यामुळे ते या लोकांना पगार देऊ शकत होते. पण लांबचा प्रवास करून कामासाठी इथवर येणं लोकांना गैरसोयीचं ठरत होतं. त्यामुळे त्यांनी घरं बांधली आणि त्या लोकांना ती भाडेतत्वावर दिली.”

    मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, “म्हणजे तुझ्या वडिलांनी त्या लोकांना पगार दिला आणि तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात त्यांना परत दिला, असंच ना?”

    “हो.” त्याने उत्तर दिलं.

    “आणि त्यांनी या परत मिळालेल्या पैशातून अजून घरे बांधली असतील?” मी विचारलं.

    “नाही. त्यांच्या घरांची सोय झाली होती, पण त्यांना खायला दर्जेदार अन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा पैसा रेस्टॉरंट बांधण्यासाठी वापरला.”

    मी परत विचारलं “म्हणजे त्यांनी त्या लोकांना पगार दिला, तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात परत दिला, तो पैसा तुझ्या वडिलांनी रेस्टॉरंट काढण्यात गुंतवला. त्यामुळे आपल्याला चांगलं जेवण मिळावं आणि तो खर्च भागवता यावा यासाठी त्या लोकांनी अजून मेहनत करायला सुरुवात केली असेल?”

    “हो, बरोबर. यातूनच पुढे ही सगळी दुकानं सुरु झाली, इथे रस्ते बांधले गेले, रेल्वे स्थानक बांधलं गेलं, पूल बांधला गेला. खरं सांगायचं तर, २० वर्षांत जवळपास २००० लोक या सुंदर शहरात स्थायिक झाले आहेत. त्यातील बऱ्याचशा लोकांनी चहा लागवडीचं कामसुद्धा केलेलं नाही, कारण इथे त्यांना करता येण्याजोग्या अनेक गोष्टी होत्या.”

    जसजसं आम्ही पुढे जाऊ लागलो, त्याची ही गोष्ट ऐकून ‘पैसा हा फुटबॉलसारखा आहे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. म्हणजे तुम्ही फुटबॉल खेळत असताना त्याचा पाठलाग करत असता, पण त्याचा वेग जास्त असल्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपण दोष मात्र इतर खेळाडूंना देतो.

    आपण जर खेळाकडे नीट लक्ष दिले आणि आपल्याकडे बॉल आल्यावर तो पुढच्या खेळाडूकडे ढकलला, तर तोच बॉल मग तुमच्याकडे परत परत येत राहतो. जसं त्या गाईडच्या वडिलांनी केलं. त्यांनी पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा खेळता कसा राहील याकडे लक्ष दिलं. जसं फुटबॉलमध्ये मैदानातील खेळाडूंकडे बॉल परत परत येत राहतो, तसंच त्यांच्याकडे सुद्धा पैसा परत परत, रोज येत राहिला. मग तो चहाच्या विक्रीतून असो, त्यांनी बांधलेल्या घरांतून असो, रेस्टॉरंटमधून असो किंवा दुकानांतून.

    आणि या प्रत्येक वेळी पैशाची देवाणघेवाण झाली, कारण ते लोकांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडवू पाहत होते. संपूर्ण शहराला ते स्वतःचं घर समजत होते. आपलं घर संपन्न आणि समृद्ध व्हावं म्हणून प्रयत्न करत होते. खरे उद्योजक कधीही पैशांच्या मागे लागत नाहीत. ते वाळू व्हॅल्यू अॅडीशन करायचा प्रयत्न करतात. पैसा ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट असते, जिचा ते पुन्हा वापर करतात आणि अजून मोठे होतात.

    चीनमधील महान तत्त्वज्ञ लाओ त्से यांचा एक प्रसिद्ध सुविचार आहे, ‘पर्वतासारखे निश्चल बना आणि नदीसारखे प्रवाही बना.’

    “तुझे वडील आता कुठे आहेत?” मी विचारलं.

    “ते वीस वर्षांपूर्वीच वारले.”

    “अरेरे, ऐकून दुःख झाले.”

    थोडा वेळ थांबून मी म्हणालो, “मग हे सगळं तुला वारसा हक्काने मिळालं असेल ना?”

    तो हसला. “नाही! नागरी युद्धाच्यावेळी सरकारने माझ्या वडिलांची सगळी जमीन आणि सगळे व्यवसाय ताब्यात घेतले. सर्व मालमत्ता जप्त करून नंतर इतरांना विकून टाकल्या. आमच्याकडे आता नदीकिनारी एक लहान घर तेवढं राहिलेलं आहे, दुसरं काही नाही. माझ्या वडिलांचं त्यावेळी खूप वय झालं होतं, त्यामुळे ते काम करू शकत नव्हते. मरताना त्यांच्याकडे फुटकी कवडीसुद्धा नव्हती.”

    हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणालो, “त्यांना खूपच वाईट वाटलं असेल ना?”

    त्याने स्मित केले आणि नदीकडे पाहत म्हणाला, “नाही. मरताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना जिथे जगायचं होतं, तिथे जगता आलं. या परिसरात ते सगळीकडे फिरले, सगळ्यांशी त्यांची मैत्री होती. सगळे त्यांना जेवूखावू घालत असत. त्यामुळे त्यांना पैशांची तशी गरज वाटत नव्हती. खरी संपत्ती काय असते हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणूनच मी इथे गाईडचं काम करतो.”

    वर पर्वताकडे आणि खाली नदीकडे हात करत तो पुढे म्हणाला, “मोठ्या शहरात जावं. खूप मेहनत करून पैसे कमवावे आणि गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करावेत याची मला अजिबात गरज वाटत नाही. हे सगळं जे माझ्याजवळ आहे, ते माझ्यासाठी खूप आहे.”

    प्रवास संपवून तिथून निघताना माझ्याकडे पैसे कमी होते, पण संपत्ती जास्त होती. चिंता कमी होती, आनंद जास्त होता. कमी कमवायचं आणि जास्त द्यायचं ही भावना होती. आणि संपत्तीची एक नवीन व्याख्या मी बनवली: “संपत्ती म्हणजे तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे नव्हे, तर तुमच्याजवळील सर्व पैसे गमावल्यावर तुमच्याकडे शिल्लक राहील, ती तुमची खरी संपत्ती.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    मंदिरात पुजारी म्हणून तरी काम मिळेल या आशेने तो तेथे आला होता. त्यादिवशी बरेच इतर पुजारीसुद्धा तिथे जमा झाले होते. सर्वांनाच धर्माचे उत्तम ज्ञान होते. संचालक मंडळाला त्यातून एकाची निवड करणे अवघड वाटत होते. अनेकजण पुजारी म्हणून उत्तम होते. शेवटी संचालक मंडळातील एकाने असे सुचवले की ज्याला सर्वात चांगली घंटा वाजवता येईल त्यालाच मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानुसार सर्व पुजाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पद्मनाभला नीट घंटा वाजवता न आल्याने त्याची निवड झाली नाही. तो मनात थोडा निराश झाला, त्याचा तिथे अपेक्षाभंग झाला होता. आता काय करावे? तो मंदिराबाहेर बसून विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. मंदिरासमोर खूप मोकळी जागा होती.

    त्याने संचालक मंडळाची परवानगी घेऊन समोर एक चहाची टपरी सुरू केली. मंदिरात भेट द्यायला येणारे भक्तगण ग्रामस्थ तिथे जाऊन चहा प्यायचे. हळूहळू ते मंदिर प्रसिध्द होऊ लागले तशी मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. खूप दूरगावातून लोक यायला लागले. तसा पद्मनाभचा चहाचा व्यवसायही वाढला. तेव्हा लोकांनी त्याला सुचवले की, तुझा चहा तर उत्तम आहे. पण तुझ्या टपरीवर जर तू अल्पोपहाराचे पदार्थ ठेवलेस तर बरे होईल. पद्मनाभला ते पटले. कारण आसपास त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय कुठेच नव्हती. पद्मनाभने लवकरच अल्पोपहाराचे उपवासाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याच्या टपरीजवळ एक शेड बांधून टेबल खुर्च्या लावून सर्वांसाठी बसण्याचीही सोय केली. पुढे भक्तांची, पर्यटकांची संख्या अजून वाढत गेली. पुढे भक्तांच्या आग्रहावरून त्याने जेवणाची थाळी विकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधारू लागली. त्याला गावातही मान मिळू लागला. आता त्याचे रेस्टॉरंट झाले.

    पद्मनाभ एक व्यावसायिक बनला होता. एका भक्ताने त्याला सांगितले की इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय नाही. पद्मनाभने त्याच्या रेस्टॉरंटचे एका लॉजमध्ये रूपांतर करून भक्त व पर्यटकांच्या राहण्याची सोय केली. त्याचा धंदा जोरात चालू आहे, तो सर्वांना उत्तम सेवा पुरवतो. मंदिराच्या वार्षिक जत्रेस दरवर्षी देणगी देतो. जसजशी मंदिरात येणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्या वाढते तसतसा त्याचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय.  एकेकाळचा बेरोजगार पद्मनाभ आज तिथला सर्वात यशस्वी श्रीमंत हॉटेल व्यावसायिक झालाय. पद्मनाभने गावातील इतर बेरोजगार तरुणांना त्याच्याच हॉटेलमध्ये काम दिले आहे. त्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा देखील वाढली. गावातील, तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींची त्याच्या घरी ऊठबस चालू असते. त्याला खूप मान मिळतोय.

    एका व्यक्तीने त्याला त्यांच्या यशाचे गुपित विचारले. पद्मनाभ म्हणाला, “माझ्या यशाचे गुपित मंदिराच्या घंटेत आहे. मला घंटा वाजवता येत नाही म्हणून मी आज श्रीमंत झालोय. जर मला ती घंटा वाजवता आली असती तर मी मंदिरात पुजारी म्हणूनच राहिलो असतो.”

    मित्रांनो, कधीकधी संधी थोडक्यात हुकतात, म्हणून डोक्याला हात लावून बसू नये. डोळे उघडा, आजूबाजूला पहा. बरेच पर्याय, संधी उपलब्ध असतात. पण नोकरीच्या नादात त्या दिसत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तेव्हा आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो. पद्मनाभने संधी निर्माण केली व व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्याजवळ काही नव्हते, तरी त्याने छोटासा का होईना, व्यवसाय सुरू केला. पुढे त्याला अनुभव येत गेला, संधी आपोआप दिसू लागल्या. प्रत्येक वेळी त्याने संधीचा फायदा उठवला आणि आज तो त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी श्रीमंत आणि सुखी आहे. म्हणून संधी हुकल्यावर निराश होऊ नका, नैराश्यावर पाय ठेवून पुढे चालत रहा. संधी मिळत जाईल तिचा फायदा घेत जा.

    तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्नं ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत असे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे. स्वप्नं म्हणजे काय? जर तुम्ही शब्दकोशात याचा अर्थ शोधलात, तर तुम्हाला उत्तर मिळेल, ‘एखादी इच्छित गोष्ट मिळविण्याचा ध्यास, ध्येय, महत्वाकांक्षा’. थोडक्यात एखादी अशक्य वाटणारी, तरीही मिळवता येईल अशी मोठी इच्छा.

    स्वप्नं सारेच बघतात. मोठी स्वप्नं न बघणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, पण सगळ्यांचीच स्वप्नं प्रत्यक्षात येत नाहीत. याचे कारण म्हणजे काहीजण स्वप्न बघतात आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात, तर बाकीचे लोक लगेच आपली स्वप्नं लगेच विसरून जातात. पहिल्या प्रकारच्या लोकांमध्ये मोठी स्वप्नं बघायची, ते साध्य करण्याची हिंमत असते. असे लोक इतरांनाही प्रेरित करत असतात.

    सचिन तेंडुलकर, तुमच्या माझ्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. पण त्याची स्वप्नं आभाळापेक्षाही मोठी होती. जी साकार करणं अशक्यप्राय गोष्ट होती… पण तो निघाला इतिहास घडवण्यासाठी… लहानपणापासूनच क्रिकेटमध्‍ये असलेल्‍या प्रचंड वेडापायी क्रिकेटलाच आपले करिअर करण्‍याचे ठरविले… एकमेव गोष्ट ज्यामुळे तो नेहमी पुढे जात राहिला, ती म्हणजे; त्याची मोठी स्वप्नं, त्याचा दृष्टीकोन, त्याची चिकाटी आणि खेळाविषयी असलेली प्रचंड तळमळ. यामुळे तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट बनला. आपल्या असामान्य बॅटिंगनं त्यानं अवघ्या क्रिकेटजगताला वेड लावलं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे लाखो करोडो लोकांना त्यानं स्वप्न बघायला शिकवलं. या पिढीला त्यानं स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, ज्यांची अशी स्वप्नं बघायची आधी हिंमत सुद्धा होत नव्हती.

    सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते.

    इथे मला ‘टर्बो’ या सिनेमातील एक सुंदर विचार आठवतोय “कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    असं म्हणतात की, ‘यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो’ आणि व्यवसायाच्या बाबतीत तर हे ‘सोळा आणे सत्य’ आहे. तर मग असा कुठला एक सद्गुण आहे की ज्यामुळे एखादा उद्योजक यशस्वी होऊ शकतो?

    स्टीव्ह जॉब्सचे एक वाक्य आहे, “यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजकांची तुलना करायची झाल्यास, अयशस्वी उद्योजकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे प्रयत्नांचा अभाव!”

    आपल्याला उद्योजक व्हायचंय हा निर्णय घेणं एक कठीण काम आहे, पण पटकन यश मिळत नसताना आणि वारंवार अपयशाची चव चाखावी लागत असतानासुद्धा त्याच निर्णयाला चिकटून राहणं हे महाकठीण काम आहे.

    आपल्या आयुष्यात असं अनेकदा होतं कि; आपण काम करत राहतो, पण आपल्याला त्या कामाचं फळ मिळत नाही अगदी असंच उद्योजक म्हणून काम करताना तुम्हाला मेहनत करावी लागू शकते, पण केलेल्या मेहनतीचा मोबदला मिळेल का नाही याची काही खात्री नसते. त्याचबबरोबर अनेक आव्हानं, समाजाचा दबाव हे सुद्धा आहेच. ही ती आव्हाने असतात जी तुम्हाला नाउमेद करतात आणि प्रयत्न सोडायला भाग पाडतात. या अशा अडचणीच्या परिस्थितीतून तर एकच गोष्ट तुम्हाला टिकवून ठेवू शकते आणि ती म्हणजे प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न!

    या सर्व संकटांच्या छातीवर पाय ठेऊन तुम्ही तुमचे उद्योजकतेचे स्वप्न जपले पाहिजे, थोड्याश्या अपयशाने खचून न जाता प्रयत्न निरंतर चालू ठेवले पाहिजे. याबाबतीत सर्वात सोपं उदाहरण म्हणजे नदीचं! नदी सर्व खडकांतून मार्ग काढत पुढे जात राहते, ती शक्तीमुळे नाही, तर सतत पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे! खडकांच्या भीतीने नदीने आपला प्रवाह थांबवला तर त्याच नदीचं डबकं व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं वाहत रहा आणि प्रयत्न करत रहा, कारण एक दिवस यश तुमच्या हातात असेल. 

    हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    आणखी वाचा

  • संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!

    संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’

    तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.

    इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.

    लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.

    बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.

    मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.

    मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    जॉईस चॅपमन या लेखिकेचं एक खूप प्रेरणादायी वाक्य आहे “जर तुमचं स्वप्नं खूप मोठं असेल आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तुम्ही तयार असाल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी करणे हा एकचं मार्ग आहे.” त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका, नेहमी पुढे जात राहा.

    आणखी वाचा

  • पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे.

    मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

    ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

    मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ ‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

    माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

    वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. ‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

    ‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

    ‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

    पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला1

    ‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

    ‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

    ‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

    वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा