Category: दिनविशेष

  • Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

    Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

    माणसाच्या याच भावनिक गरजेमुळे जन्म होतो नाते-संबंधांचा. आणि घरच्या मंडळींसोबत असलेला हाच दुवा पुढे मित्र-मैत्रिणींसह जपला जातो. मैत्रीचं नातं जरी जन्मापासून निर्माण झालं नसलं, तरीही जन्मभरासाठी जपता येतं आणि जपलं देखील जातं. मैत्रीच्या नात्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे मैत्री दिवस किंवा फ्रेन्डशिप डे. तुमचा देखील कोणीतरी खास मित्र असेलच ना, ज्याच्यासोबत तुम्ही हा दिवस घालवणार आहात. मात्र आपण मैत्री दिवस का साजरा करतो? मैत्री तर आयुष्यभरासाठी असते, मग केवळ एका दिवसाचा आनंद का? चला जाणून घेऊया…

    फ्रेन्डशिप डे का साजरा केला जातो?

    फ्रेन्डशिप डे (Friendship Day) हा मैत्रीचा दिवस आहे, दोन मित्रांमधील नातं साजरं करण्याचा दिवस. भारतात आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करतो. मग त्यात मित्रांसोबत घेतलेला एक घोट चहा असेल किंवा मोठाल्या हॉटेलमध्ये पार्टी, महत्त्वाचं काय, तर मित्रांसोबत वेळ घालवणं. आता तुम्ही असं म्हणाल की मैत्री ही दररोज निभवायची असते, मग एका दिवसाचं सेलीब्रेशन का? एकमेकांच्या आधारासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, समोरचा व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून देण्यासाठी एखादा खास दिवस हवाच. नाही का? कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण जगभरात वेगवेगळ्या दिवशी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) मध्ये ३० जुलै, तर मेक्सिकोमध्ये १४ फेब्रुवारी आणि सिंगापूरमध्ये एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मैत्री दिवस साजरा केला जातो. दिवस वेगळे असले, तरी त्यामागे असलेला उद्देश मात्र बदलत नाही.

    हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी मैत्री दिवसाची सुरुवात दोन मित्रांमधील नातं खुलवण्यासाठी केली होती. जॉयस हॉलच्या याच सिद्धांतचा पुढे स्वीकार करण्यात आला आणि अशाप्रकारे मैत्री दिवसाची सुरुवात झाली.  दोन देशांमधले संबंध सुधारावेत, शांतता प्रस्तापित व्हावी म्हणून या दिवसाला महत्व दिलं जाऊ लागलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? कित्येक वर्षांपासून सुरु असलेली मैत्री दिवसाची ही परंपरा अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली आहे. वर्ष 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने (United Nations General Assembly) 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. विविध लोकं, देश आणि संस्कृती यांच्यामध्ये शांततेचे संबंध निर्माण व्हावे आणि परस्परांमध्ये एक आपुलकीचा धागा निर्माण व्हवा म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व संस्कृतींना समान आदर मिळावा, त्यांचा विविधतेसह स्वीकार व्हावा म्हणून मैत्री दिवस साजरा केला जातो. 

    मैत्रीचे महत्व काय?

    आपल्या आयुष्यात नाते संबंधांचे खरोखर महत्व आहे का? वरती उल्लेख केल्याप्रमाणे कुणीतरी आपले विचार समजून घ्यावे, आपल्याला गटाचा भाग बनवून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ही आपली मानसिक गरज आहे. घरच्या चौकटीत बांधलेलं असताना कुणी आपल्याला दूर लोटण्याचे किंवा समजून न घेण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत, मात्र एकदाका घरचा उंबरा ओलांडला की बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना कुणीतरी आपल्यासोबत असावं अशी मानसिक भूक निर्माण होते. परिणामी शाळेत गेलेलं मूल ‘माझ्या आवडीचा खेळ खेळणारं इथे कोण असेल?’  याचा विचार करू लागतं. माणसाचे विचार जुळले म्हणजे आवडी-निवडी उलगडून बघता येतात आणि यातूनच मैत्रीचं नातं तयार होतं, खुलतं आणि बहरू लागतं. 

    भले या नात्यात असलेली दोन लोकं जन्मापासून एकत्र नसतील, मात्र वेळेसोबत जोडली गेलेली ही नाळ दिवसेंदिवस घट्ट होते. मैत्री म्हटलं की कट्ट्यावरच्या गप्पा, चहाचा एक कप, संध्याकाळचा खेळ, गाडीवरून मारलेल्या फेऱ्या आणि “माझ्या मित्राला बाईंनी बाहेर ठेवलंय म्हणून मी पण बाहेर जाणार” याचा अट्टाहास. रुसव्या-फुव्यांशिवाय कोणतंही नातं टाकलेलं नाही. असं म्हणतात आपण त्याच्यावरच रागावरतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, हक्क असतो आणि म्हणून मैत्रीतदेखील कधीतरी भांड्याला भांडं लागतंच. वेळप्रसंगी मित्रासाठी खंबीरपणे उभं राहणं असो किंवा मित्राची प्रेयसी सोडून गेली म्हणून रडायला खांदा देणं असो मैत्रीचं नातं आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सामावलेलं आहे. 

    मैत्रीच्या नात्याचे पौराणिक दाखले:

    मैत्री म्हणजे माणसाला मिळालेली एक खास भेट, आणि याला अनेक पौराणिक दाखले देखील जोडता येतात. मैत्री दिवस म्हटलं म्हणजे हमखास आठवते ती सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाची जोडी. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात झालेली ही मैत्री कायम चिरतरुण राहिली. श्रीकृष्ण राजा झाले, तर सुदामा मात्र गरीब ब्राह्मणच राहिला, तरीही पायपीट करून आलेल्या सुदाम्याच्या पायात रुतलेले काटे आपल्या मऊ हातांनी काढणारे श्रीकृष्ण कोणी देव अगर राजा नव्हते, ते केवळ आणि केवळ सुदाम्याचे मित्र होते. महाभारताच्या पानांमध्ये आपल्याला मैत्रीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, मग ती मित्राचं बोट कापलं म्हणून भरजरी शालू फाडणारी द्रौपदी आणि चिंधीची परतफेड लाज राखून करणारे श्रीकृष्ण असोत किंवा खरी आई कोण याची प्रचिती येऊन सुद्धा मैत्रीच्या नात्यापायी कौरवांकडून लढलेला कर्ण, असे कैक प्रसंग पहिले म्हणजे यामधील प्रत्येक मित्राने आपल्या मित्रासाठी केलेला  त्याग डोळ्याच्या पापण्या अलगद ओल्या करतो. 

    रामायणाच्या पानांमध्ये देखील मैत्रीची बरीच उदाहरणं आहेत. राजा दशरथाच्या मैत्रीखातर स्वतःचा जीव धोक्यात घालत अपहरण झालेल्या सीतेच्या रक्षणार्थ धावलेला जटायू किंवा मैत्री निभावण्यासाठी वानरसेनेसह समुद्र पार करून गेलेला सुग्रीव, सर्वात महत्वाचं म्हणजे दिलेल्या शब्दाला जागत जिंकलेलं संपूर्ण राज्य विभीषणच्या नावे करणारे श्रीराम ही मैत्रीच्या नात्याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. मात्र कायम लक्षात असुद्या की पुराण किंवा इतिहासातील दाखले केवळ गोष्ट म्हणून ऐकण्यासाठी नाहीत, तर स्वतःमध्ये ते गुण उतरवण्यासाठी आहेत. वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाने मैत्रीची परिभाषा ओळखत, प्रामाणिक राहत, नात्याचा सन्मान करत वेळोवेळी नातं खुलवलं आणि म्हणूनच ते नातं टिकलं. 

  • गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

    गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

    भारतीय शिकवणीनुसार ज्या कुणा सजीव आणि निर्जीव वस्तूचा आपण जगण्यासाठी वापर करतो, त्या वास्तुप्रती कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. सामान्य माणसाला हीच शिकवण समजावी म्हणून पुराणांच्या पानांमध्ये गोष्टींच्या रूपाने त्या व्यक्त केल्या जातात एवढंच. त्यामुळे अश्या एखाद्या खास दिवशी आपण ज्या देवाची किंवा वस्तूची पूजा करतो ती का करतोय याची जाणीव असली पाहिजे, केवळ श्रद्धा आणि भक्ती हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश नसून कृतज्ञतेचा भाव माणसाच्या मनात कायम राहावा हीच त्यामागची खरी शिकवण आहे, त्यामुळे कायम लक्ष्यात ठेवा की भारतीय संस्कृती ही कधीही मागासलेली नव्ह्ती तर कायम पुढारलेलीच होती केवळ आपण त्याचा अर्थ समजायला कमी पडलो एवढंच.

    गुरुपौर्णिमेचे पौराणिक महत्व:

    आज आपण अश्याच एका महत्वाच्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. मनुष्य जन्म घेतल्यानंतर थेट मृत्यू येईपर्यंत माणूस काही ना काही शिकत असतो, त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्यातील अनेकविध घटक त्याला पदोपदी शिकवण देत असतात. मग या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव बाळगला पाहिजे की नाही? नक्कीच हो!! आणि यातच गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं सार दडलेलं आहे. सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो? पुराणांच्या आधारे हा दिवस म्हणजे महर्षी व्यास यांची जन्मदिवस आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. प्रसिद्ध ग्रंथ महाभारताचे रचते आणि चारही वेदांचे विभाजन करणारे वेदव्यासच होते.असं म्हणतात महर्षी व्यासांना दिव्यदृष्टी प्राप्त होती आणि या शक्तीच्या जोरावरच त्यांनी कलयुगातील घटनाक्रम ओळखला होता. व्यासांच्या याच अलौकिक ज्ञानामुळे त्यांना कैक युगानंतरही मानाचं स्थान प्राप्त आहे. ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आजही आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो.

    233084184 25903594 aaf4 48fa bc0f 2b7e2755dfd8

    गुरु म्हणजे कोण?

    असं म्हणतात एका नवजात बालकाचा देखील गुरु असतो आणि ती म्हणजे आई. जिच्या नावातच आत्मा आणि ईश्वर दोन्ही सामावलेले आहेत ती जन्मदात्री आई. आईच तिच्या लेकराला चालायला, बोलायला, जेवायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभं करते. त्यामुळे जन्मापासूनच माणसाचं शिक्षण एकार्थाने सुरु होतं असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. “अंधकार निरोधित्वात गुरुर-इत्यभिधियते” याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करणारा म्हणजे गुरु होय. जीवनाच्या टप्याटप्यावर भेटलेला प्रत्येक माणूस या-ना-त्या प्रकारे आपल्याला शिकवण देऊन जातो, आणि म्हणूनच ही प्रकृती आणि त्यात सामावलेला प्रत्येक घटक हा आपला गुरु आहे. लहान मूल जसजसं मोठं होऊ लागतं तसं त्याला शाळेत भरती करतात आणि पुढे त्याचा शैक्षणिक प्रवास सुरु होतो. शैक्षणिक प्रवासात समोर आलेले शिक्षक आणि मार्गदर्शक आपल्या मनातील गुरु या शब्दाच्या धूसर चित्राला आकार देतात. शैक्षणिक जीवनानंतर माणसाचा खरा प्रवास सुरु होतो, नवीन आव्हानं आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न इथूनच सुरु होतो. अश्या या कठीण काळात भेटणारा प्रत्येक मार्गदर्शक देखील गुरु’च ठरतो नाही?

    आजच्या जगात गुरुचे महत्व काय?

    काळ कितीही बदलत असला तरीही गुरुचं महत्व कधीही कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अश्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञतेचा भाव मनात असणं महत्वाचं आहे. तुम्ही कदाचित आजूबाजूला पाहिलं असेल शाळकरी मुलं किंवा कॉलेजला जाणारे तरुण शिक्षकांची खिल्ली उडवतात, वेळ जाण्यासाठी शिक्षकांच्या नावाने मजा-मस्ती केली जाते. मात्र एकदा स्वतःला विचारून बघा की हे कितपत योय आहे. मित्रपरिवाराच्या आनंदासाठी शिक्षकांची टर उडवणं, त्यांना नावं ठेवणं, नकला करणं हा आपल्या शिकवणीचा भाग नाही. तरुण वयात मजा-मस्ती नक्कीच करावी मात्र त्यात कुणावर शिंतोडे फेकणं योग्य नाही.

    WhatsApp Image 2024 07 20 at 4.24.03 PM

    भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याकडे पिढ्यांपिढ्यांपासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण ज्यांना आपण भगवंताचा परमअवतार मानतो, त्यांचे पूजन करतो त्या भगवंताने देखील गुरुचे शरण मिळवलेच होते. गुरु सांदीपनी असुद्या किंवा गुरु वसिष्ठ भगवंताला देखील गुरुची गरज भासलीच आणि आपण तर क्षुल्लक माणसं आहोत.

    आणखी वाचा:

  • बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक

    बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक

    02 09 2023 uday kotak 23520198

    बनायचं होतं क्रिकेटर, पण झाला ‘तो’ अपघात

    आयुष्यभर संघर्ष करायला लावणारा एखादा अपघात तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो का? हो बनवू शकतो. जर तुम्ही हा प्रश्न उदय कोटक यांना विचारला, ज्यांनी अपघातानंतर १३ अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती कमावली आहे. खरं तर, उदय कोटक (Uday Kotak) यांचा जन्म १५ मार्च, १९५९ रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला. ते अभ्यासात हुशार होते, पण त्यांचं पहिलं प्रेम हे क्रिकेट होतं. मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या उदय कोटक यांना क्रिकेटपटू (Uday Kotak Cricketer) बनण्याची इच्छा होती. ते एक चांगले खेळाडू होते. एवढंच काय, तर त्यांनी प्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षणही घेतलं होतं.

    जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असताना ते त्यांच्या कॉलेज टीमचे कर्णधार होते. कांगा लीग सामन्यादरम्यान, एक चेंडू येऊन त्यांच्या डोक्यावर लागला. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांनी बरेच महिने घेतले. यामुळे त्यांना वर्षभर कॉलेजलाही मुकावे लागले. अशात तुम्ही त्यांना अपघाती बँकर म्हणू शकता. कारण, क्रिकेटमध्ये चांगले करिअर होत असताना एका अपघाताने त्यांना वित्त (Finance) या क्षेत्रात आणले.

    त्यांनी कष्ट आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. त्यांनी टाटा समूहात काम केले आणि नंतर स्वतःची बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोटक महिंद्रा बँक आज भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी खाजगी बँकांपैकी एक आहे. बँकेने अनेक क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उदय कोटक हे एक दूरदर्शी लीडर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक तरुणांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आहे.

    उदय कोटक यांचे कुटुंब

    jpg

    अब्जाधीश उदय कोटक यांनी १९८५ साली पल्लवी कोटक यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे नाव जय कोटक आणि धवल कोटक आहे. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात. उदय हे एक गुजराती हिंदू परिवारातून येतात. त्यांनी मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून वाणिज्य शाखेची पदवी आणि एमएमएस पदवी घेतली आहे. त्यांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रात ३५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

    भारताचे सर्वात श्रीमंत बँकर

    कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची बँकेत २५.७१ टक्के भागीदारी आहे, त्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत बँकर (India’s Richest Banker Uday Kotak) आहेत. या बँकेचे मूल्य ३.५ लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. उदय कोटक यांच्या संपत्तीचा विचार करायचा झाला, तर फोर्ब्स इंडियानुसार त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल १ लाख ११ हजार ४७४ कोटी इतकी आहे.

    कधी केली होती सुरुवात?

    उदय कोटक यांनी वयाच्या २३व्या वर्षी सन १९८५मध्ये कोटक कॅपिटल फायनान्स लिमिटेड नावाची एक आर्थिक सल्ला देणारी फायनान्स फर्म सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये या फर्मला एका बँकेच्या रूपात बदलले. उदय यांनी त्यांचा वित्त आणि बिल डिस्काऊंटिंग व्यवसाय कुटुंब आणि मित्रांकडून घेतलेल्या १० हजार रुपयांनी सुरू केला होता. ही रक्कम आताच्या हिशोबानुसार तब्बल ३०० कोटी रुपये होते. विशेष म्हणजे, गुंतवणुकीचा मोठा भाग हा त्यांचे सर्वात चांगले मित्र आनंद महिंद्रा यांनी दिला होता. त्यामुळे बँकेचे नाव कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) ठेवण्यात आले.

    new project 2023 12 29t144034600 1703841074

    इतिहासात पहिल्यांदा एनबीएफसीला (NBFC) मिळाला बँकेचा परवाना

    कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला २२ मार्च, २००३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात, ही भारताची पहिली गैर-बँकिंग वित्त कंपनी आहे, जिने बँकिंग परवाना मिळवला. तसेच, एक गैर-बँकिंग वित्त कंपनीचे रुपांतर बँकेत झाले. सन २०१४मध्ये उदय कोटक यांनी छोट्या बिल-डिस्काऊंटिंग व्यवसायाला वित्तीय सेवा समूहात बदलले. तसेच, १२७० पेक्षा जास्त शाखांसह बाजार भांडवलाने भारतातील दुसरी सर्वात मोठी अनुसूचित व्यावसायिक बँक बनली.

    मागील वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्त

    भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कमाल कार्यकाळ १५ वर्षे निश्चित केला आहे. त्यामुळे उदय कोटक हे डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी निवृत्त होणार होते. मात्र, त्यांनी निवृत्तीच्या चार महिन्याआधीच म्हणजे सप्टेंबरमध्येच निवृत्तीची घोषणा केली होती.

    आणखी वाचा

  • श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

    श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

    img 125557 bernardarnault gettyimages 160724991 2048x2048 1

    कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट?

    सध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २२८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आज बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसतात. एलोन मस्क (२०२ अब्ज डॉलर्स) आणि जेफ बेझोस (१९८ अब्ज डॉलर्स) हेदेखील बर्नार्ड यांच्या खाली असून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. लक्झरी गुड्स क्षेत्रातील त्यांचे सम्राज्य जगभरात पसरलेले आहे. लुई व्हिटॉन, डिओर, फेंडी, टॅग ह्यूअर, बल्गरी आणि जिव्हान्ची सारख्या प्रसिद्ध लक्झरी ब्रँड त्यांच्या मालकीचे आहेत. ८० वर्षांच्या वयातही बर्नार्ड अविरत काम करत आहेत आणि नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

    bernard arnault get awarded

    केव्हा बनले होते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

    बर्नार्ड अरनॉल्ट यांनी यापूर्वी डिसेंबर २०१९, जानेवारी २०२०, मे २०२१ आणि जानेवारी २०२४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता.

    कधी केली होती कारकीर्दीची सुरुवात?

    इंजिनियरिंग पदवी घेतल्यानंतर बर्नार्ड यांनी वडिलांच्या बांधकाम व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना अधिक काहीतरी करण्यास प्रवृत्त करत होती. फॅशन क्षेत्राची त्यांना मोठी आवड होती. त्यात यशस्वी होण्याची त्यांना खात्री होती. १९७१ साली बर्नार्ड यांनी फॅशन क्षेत्रात पदार्पण केले. तसेच, स्वतःची कंपनी स्थापन केली. क्रिएटिव्हिटी आणि व्यवसायिक कौशल्य यांच्या मिश्रणामुळे बर्नार्ड यांची कंपनी झपाट्याने यशस्वी झाली. अनेक प्रसिद्ध फॅशन ब्रँड त्याच्या एलव्हीएमएच (LVMH) कंपनीच्या स्वामित्वाखाली आले आणि बर्नार्ड जगातील सर्वात शक्तिशाली फॅशन सम्राट बनले.

    SIMHV2WNNJOL7AGODORSAW2F3M

    टिफनी अँड कंपनीही केली खरेदी

    जानेवारी २०२१मध्ये बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या एलव्हीएमएच कंपनीने अमेरिकन ज्वेलरी कंपनी टिफनी अँड कंपनीही १५.८ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ही कोणताही लक्झरी ब्रँड खरेदी करण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरली होती.

    द टर्मिनेटर नावाने झालेले प्रसिद्ध

    सन १९८५मध्ये फ्रान्सच्या सरकारने बर्नार्ड यांनी दिवाळखोरीत निघालेली टेक्सटाईल कंपनी बुसॉक खरेदी केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच त्यांनी कंपनीतील ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर त्यांनी याच्या डिओर ब्रँड वगळून अधिकतर संपत्ती विकली. तेव्हापासून बर्नार्ड अरनॉल्ट यांना ‘द टर्मिनेटर’ म्हटले जाऊ लागले.

    आणखी वाचा

  • २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

    २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

    साधारण दीड लाख वर्षांपूर्वी कृत्रिमरीत्या अग्निनिर्मिती किंवा अग्नीचे नियंत्रण आवाक्यात आल्यानंतर मानवाने प्रगती करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने सभोवतालच्या घटनांचा आणि त्या अनुषंगाने निसर्गाचा विचार करण्यास सुरुवात केली. मग स्वतंत्र ओळख होईल, अशी मानवी संस्कृती निर्माण झाल्यानंतर ‘हे जग कशाचं बनलंय?’ हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित झाला आणि रूढार्थाने विज्ञान विषयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हणता येईल. हे जग जमीन, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश मिळून तयार झाले आहे, असे जवळपास सर्वच संस्कृतीमध्ये सांगण्यात येते. या सर्वच संस्कृतींनी सुरुवातीला केवळ तर्काच्या आधाराने निसर्गातील तत्त्वे उलगडण्याचा प्रयत्न केला.. त्या वेळी प्रयोगांसाठीची साधने जवळपास नव्हतीच. मात्र यातून निसर्गाच्या अनुषंगाने तत्त्वज्ञान आकाराला आले.

    National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

    विज्ञानाची वाटचाल सुरू झाली, ती इथे. मर्यादित का होईना, प्रयोग करण्यासाठी खडक, पाणी, जमीन यांचा वापर झाला आणि निरीक्षण-तर्क यांच्या आधारे आकाशाचा अभ्यास सुरू झाला. खगोलशास्त्राचा इतिहास आज चार पर्वामध्ये विभागला जातो. पहिले पर्व थेट आदिकालापासून गॅलिलिओच्या कालखंडापर्यंतचे मानले जाते. या प्रदीर्घ कालखंडात फक्त उघड्या डोळ्यांनीच अवकाश निरीक्षण केले जाते. सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओने खगोलीय निरीक्षणांसाठी सर्वप्रथम दुर्बीण वापरली आणि खगोलशास्त्राच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ झाला. अठराव्या शतकात वर्णपटीय विश्लेषणातून खगोलीय अभ्यास सुरू झाला, हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून खगोलशास्त्राच्या चौथ्या पर्वाचा प्रारंभ झाला वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच शतकाच्या मध्यावर झाला. या संदर्भात १९६७ मध्ये चंद्रावर ठेवलेले पाऊल हे मानवाने खऱ्या अर्थाने केलेले सीमोल्लंघन म्हणता येईल.

    अणुभौतिकीची वाटचालही अशीच जुनी आहे. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे संबोधले गेले होते. यानंतर किमान २४०० वर्षांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी आधुनिक विज्ञानात अणुसिद्धांत मांडण्यात आला. तथापि अणूचे अद्ययावत स्वरूप स्पष्ट होण्यास विसावे शतक उजाडावे लागल़े. आज अणूच्याही मूलकणांची संकल्पना स्पष्ट होऊन, मूलकणांच्या टकरी घडवून माणूस विश्वाच्या प्रारंभीची स्थिती जाणून घेत आहे.

    गुरुत्वाकर्षण गतीचे नियम विद्युतचुंबकत्व उष्मागतिकीचे नियम सापेक्षता सिद्धांत पुंजवाद हे भौतिकशास्त्रातील मैलाचे दगड ठरलेले आहेत. संदेशवहन हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आदिकालात हातवारे, खाणाखुणा, वेगवेगळे आवाज यातून संदेशवहनाची निर्मिती झाली. पुढे भाषालिपीमुळे हे काम खूपच सोपे होत गेले. वाहनांच्या माध्यमातून साध्य झालेला कमाल वेग आणि केवळ एका क्लिकच्या अंतराने जोडले गेलेले जग; यातून दळणवळण आणि संदेशवहन ही प्रगती गेल्या दीडशेच वर्षांतली आहे. आज विद्युतचुंबकीय प्रारणांच्या माध्यमांमधून ध्वनी आणि दृश्य स्वरूपाचे प्रसारण थेट समुद्रापारच नाही तर अंतराळातही अगदी सहज साध्य झाले आहे. आजच्या जगण्यात विद्युतचुंबकीय प्रारणांचे ऑक्सिजनइतकेच महत्त्व आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. उपग्रहांद्वारे भ्रमणध्वनींसाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाचे कार्य चालते, ते काही काळासाठी बंद पडले तरी माणसे कासावीस होतात.

    National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

    रसायनशास्त्राची चार पर्वे सांगितली जातात. अतिप्राचीन काळापासून ख्रिस्तकाळापर्यंत जी काही रसायनशास्त्राची माहिती उपलब्ध होती ती गूढ असल्यामुळे या पर्वाला गूढपर्व असे संबोधले जाते. दुसरे पर्व ख्रिस्तकाळापासून सतराव्या शतकापर्यंतचे हा अल्केमी म्हणजेच किमयागारांचा काळ. तिसरे पर्व सतराव्या शतकाच्या मध्यापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे, त्या पर्वाला पारंपरिक रसायनशास्त्राचा कालखंड म्हणतात. त्यापुढचा कालखंड आधुनिक रसायनशास्त्राचा मानला जातो. रसायनशास्त्राच्या अनुषंगाने सांगायचे झाले तर इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी फार तर नऊ ते दहा धातुस्वरूप मूलद्रव्ये परिचयाची होती, आज त्यांची संख्या ११८ झाली आहे.

    प्राचीन जीवशास्त्रामध्ये सृष्टिनिर्माणाचे श्रेय ईश्वराला बहाल करून जीवशास्त्र धार्मिकतेच्या बंधनाखाली होते. मात्र एकोणिसाव्या शतकातील उत्क्रांती सिद्धांताने या सगळ्याचा पाया उखडून टाकला. आज पेशीची जनुकीय संरचनाही समजावून घेण्यात आली आहे. जीवशास्त्रासंदर्भात इसवी सनपूर्व दोन ते तीन हजार वर्षांपूर्वी फक्त २०० आजार ज्ञात होते. आज ३० हजार आजारांची परिपूर्ण माहिती मानवजातीला झाली आहे. दूरस्थ ठिकाणी यंत्रमानवाच्या साहय़ाने केली जाणारी शस्त्रक्रिया, इथवर शरीरविज्ञानाची प्रगती केली आहे.

    कालखंड किंवा वेळेबाबत विचार केला तर आदिम काळात ढोबळपणे ऋतूंचे मोजमाप करणाऱ्या माणसाने आज सेकंदाचेही अब्जावधी भाग पाडले गेले आहेत आणि त्यावर तंत्रज्ञानही आधारलेले आहे. आज तळहातावर मावणारा संगणक सुरुवातीला अवाढव्य खोलीभर पसरलेला असायचा आणि संगणकाच्या पायाचा दगड रोवला गेला. सतराव्या शतकातल्या ‘अबॅकस’द्वारे.

    एकविसावे शतक हे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे नॅनोविज्ञान-तंत्रज्ञानाचे असेल असे म्हटले जाते. मात्र माणूस सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञानाकडे चौथ्या शतकात वळला होता. काचा, हिरे, माणिक,मोती यांच्यावरील नाजूक नक्षीकामातून सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रारंभ अगदी बीजरूपानेच का होईना, झाला होता.

    दैनंदिन व्यवहारातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातील असंख्य उदाहरणे डोळसपणे अभ्यासताना सामान्यजनांना एक प्रश्न पडायला हवा की विश्वाच्या प्रारंभापासून अस्तित्वात असलेले विज्ञान जर मानवाची आदिकालापासून साथसंगत करीत आहे तर विज्ञान आपलेसे का झाले नाही?

    देशोदेशीच्या क्षितिजांवर विस्तारलेल्या विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा झाला आहे, तो म्हणजे मानवी जीवनात आलेली पारदर्शकता. निसर्गातील न सुटलेले प्रश्न मानवी मनात गूढ बनून राज्य करतात. याचा रोजच्या जीवनमानावर अनुचित प्रभाव पडत राहतो आणि यात सर्वसामान्य भरडले जातात. मात्र जसजसे नैसर्गिक घटनांमागील विज्ञानाचे आकलन होत जाते तसतसे मानवी मन कणखर होण्यास मदत होते. आजवरच्या वैज्ञानिक कालखंडाचा आढावा घेतला तर याचा प्रत्यय येईल. तथापि आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करताना सर्वसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता सुदृढ होणे हे एक मोठे आव्हान आहे. दुर्दैवाने राज्यकर्ते आणि शासनकर्ते हे आव्हान स्वीकारण्याबाबत उदासीन आहेत.

    आजकाल कर्मकांडांशी विज्ञानाचा कसा तरी कुठे तरी ओढूनताणून संबंध जोडत कर्मकांडांचेच उदात्तीकरण होत आहे. यातून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कर्मकांडांमुळेच मानवता धोक्यात आली आहे, हा न विसरता येणारा कटू इतिहास आहे.

    अखेर एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे पर्यावरणऱ्हासाचा. पर्यावरणऱ्हास हा आजचा कळीचा मुद्दा आहे यात शंका नाही, परंतु त्याचे खापर विज्ञान-तंत्रज्ञानावर फोडले जात आहे. मुळात पर्यावरणऱ्हास हा विज्ञानाने केला की माणसाने, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळून जर पर्यावरणही समृद्ध आणि संपन्न अवस्थेत टिकून राहिले तर पृथ्वीचा आणि माणसाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.

    >> आपण कुठे आहोत..?

    साधारण १४०० कोटी वर्षांपूर्वी विश्व तर ४५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण होऊन ३८५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला जीव तयार झाला. यथावकाश ३०० कोटींपेक्षा जास्त वर्षे पार पडल्यानंतर म्हणजे ७० कोटी वर्षांपूर्वी प्राणी निर्माण झाले. यामध्ये मानवसदृश प्राणी अगदी अलीकडचा म्हणजे ४५ लाख वर्षांपूर्वीचा. आदिमानव ४ लाख वर्षांपूर्वी तर आजच्या आपल्या पूर्वजाची अवस्था १ लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली. हा मानव स्थिरस्थावर होऊन संस्कृती निर्माण होण्यास तब्बल ८० ते ९० हजार वर्षे लागली़. इसवी सनापूर्वीचा फार तर १० हजार वर्षांचा कालखंड ज्ञात असून आता इसवी सनानंतर फक्त २ हजार वर्षे पार पडली आहेत. पृथ्वीच्या आजवरच्या आयुष्याचा कालखंड एका वर्षांत मांडला तर, आपण ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेवटच्या सेकंदातील आहोत.

    आणखी वाचा

  • अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. वास्तविक संत गाडगेबाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांना आपली स्वाक्षरीसुद्धा करता येत नव्हती. पण त्यांच्या जिभेवर मात्र तुकोबांचे अभंग नाचत असत. त्यांचा वेशही साधाच होता. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात खराटा आणि दुसर्‍या हातात मडक्याचे फुटके खापर घेऊन संत गाडगेबाबा गावोगावी कीर्तन करत फिरत असत.

    250px Maharaj Baba

    ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने साफ करत आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत.

    संत गाडगेबाबांनी जाणले होते की, समाजातील लोक अज्ञानी, अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना दगडात परमेश्वर दिसतो, परंतु माणसातला देव दिसत नाही. भूत, भानामती, करणी, जादूटोणा यावर लोकांचा दाट विश्वास आहे. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. भयाण दारिद्र्याची कारणे केवळ व्यसन व रोगराई नसून निरक्षरता, अंधश्रद्धा हीच आहेत. म्हणून रोग, गरिबी, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध गाडगेबाबा जन्मभर लढले. व्यसन संपले की गरिबी संपणार, व्यसन संपले की रोगराई संपणार म्हणून प्राण्यांची हत्या करू नका, कर्ज काढू नका, भोंदू गुरूकडून मंत्र घेऊ नका, हाच मंत्र गाडगेबाबांनी दिला.

    संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, गोरक्षण संस्था व शाळा- कॉलेजेस काधली. त्यांच्याजवळ पोथी नव्ह्ती. पूजा-अर्चा करा, असा उपदेश नव्हता. त्यांचे कीर्तन दु:खितांसाठी व अज्ञानासाठी होते. परखड कीर्तनातून सार्‍या महाराष्ट्राला उपदेश केला. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरूंसाठी सोय त्यांनी केली. दु:ख , दारिद्र्य व अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाने ते लोकांना मंत्रमुग्ध करत.

    संत गाडगेबाबा म्हणजे एक क्रांतिसूर्य होय. माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणापासून महारापर्यंत सगळी माणसे एकच आहेत. ‘ कोंबडे- बकर्‍या खाणारा देव नसून सैतानच आहे’ हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभूत संत! भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले ते म्हणतात,’ देव देवळात नाही, दगडात नाही. माणसात आहे.’ पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लोकांना आवर्जून सांगितले की, बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करून काहीही मिळणार नाही. माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा.

    640px Gadge Maharaj and Tukdoji Maharaj

    बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते. तसेच तथाकथित सुशिक्षितांसाठीही होते, दु:खितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, त्यात पूजा-अर्चा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या, भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उद्धाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन.

    माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्‍या या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. अविश्रांत कीर्तने , धावपळ यामुळे त्यांच्या मजबूत देहावर दगदगीचा परिणाम होऊ लागला. काही अनुयायांच्या काही विचित्र वर्तनांची त्यांच्या मनावर तीव्र परिणाम झाला. मधुमेहाच्या आजारानेही त्यांना जर्जर केले. बाबांनी शेवटी शेवटी अन्नही वर्ज्य करून आमटीचे पाणी व भाजी यावरच आपला निर्वाह चालवू लागले.

    collage 1450763080 148238

    बाबा म्हणजे माणसात देव पाहणारा मानवतापूजक संतश्रेष्ठ. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्मशताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या, ‘ परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करून मानवतेवर अनंत उपकार केले आहेत.’ मात्र मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी , लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही. अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यांना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतादी संत आहेत.’

    रंजल्या-गांजल्यांना ‘आपुले’ म्हणणारा आणि अनाथ -अपंगांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना तंतोतंत लागू पडते. बाबांनी आपल्या उपदेशात म्हटले की, ‘ बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.’

    कबीर कहे कमालकू सबसे बडी दया |

    तीर्थ जावो, काशी जावो, चाहे जावो गया ||

    अशा या महामानव युगप्रवर्तकाची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्री मावळली.

    — मच्छिंद्र ऐनापुरे

    आणखी वाचा

  • अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    desh bandu lupin

    २६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.

    ‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.

    How Deshbandhu Gupta Turned Rs. 5000 into a Global Pharma Company

    त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.

    डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अ‍ॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.

    The Life and Legacy of Deshbandhu Gupta, Founder of Lupin Pharma

    सौ. लोकसत्ता, व्यक्तिवेध

    आणखी वाचा

  • चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?

    चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?

    झुक्या भाऊंनी फेसबुकचा संसार कसा उभारला? जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक बद्दल.

    Facebook Journey:

    The History of Facebook and How It Was started

    लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण याचा वापर करताना दिसतात. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीत फेसबुकची एकहाती सत्ता आहे. व्हॉट्सअप (२०० कोटी) आणि इंस्टाग्राम (२०० कोटी) हे दोन्ही मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही फेसबुकचा भाग आहेत. फेसबुकविषयी चर्चा करण्यामागील कारण असे की, आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी फेसबुकची स्थापना झाली होती. जगभरात पसरलेल्या फेसबुकची सुरुवात नेमकी झाली तरी कशी, याचाच आढावा आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.

    फेसबुक हे एक असे समाजमाध्यम आहे, जे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आपलेसे करणाऱ्या या फेसबुकची सुरुवात होण्याची कहाणी खूपच रंजक आहे. खरं तर, २००३ मध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हा पठ्ठ्या हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्याच्या भूमिकेत होता. मार्कचा सुरुवातीपासूनच कम्प्यूटर प्रोग्रॅमिंगमध्ये हातखंडा होता. २००३ मध्ये मार्कने हार्वर्ड स्टुडंट डिरेक्टरी सर्व्हर हॅक करून त्यातील सर्व प्रोफाईल गोळा करून फेसमास नावाची नवीन साईट तयार केली होती.

    या मजेशीर प्लॅटफॉर्मवर सुंदर तरुणींचे फोटो लावले जात होते. तसेच, यांपैकी सर्वात आकर्षक कोण आहे? याचं मत घेतलं जायचं. याबद्दलची माहिती हार्वर्डच्या व्यवस्थापनाला समजताच, त्यांनी तातडीने ही वेबसाईट बंद करून टाकली. यानंतर २००४ साल उजाडतं. वर्षाच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गने त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या (डस्टिन मोस्कोवीट्ज, एड्युर्डो सॅव्हेरिन आणि ख्रिस ह्यूज) मदतीने भागीदारी करून फेब्रुवारी २००४मध्ये फेसबुक डॉट कॉमची सुरुवात केली.

    अशी झाली Facebook ची सुरुवात

    फेसबुकची सुरुवात ४ फेब्रुवारी, २००४ रोजी झाली. खरं तर, हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपल्या काही मित्रांसोबत कॉलेजात एकमेकांशी जोडण्यासाठी फेसबुक बनवले होते. लाँचिंगवेळी त्याने याचे नाव ‘द फेसबुक’ ठेवले होते. मात्र, नंतर द काढून फक्त फेसबुक असे नाव देण्यात आले. फेसबुकला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत.

    The History of Facebook and How It Was started

    Facebook ने लाँच होताच गाठले यशाचे शिखर

    विशीतच झाला अब्जपती

    कीर्ती लहान, मूर्ती महान ही म्हण खरी करून दाखवण्याचं धाडस झुकरबर्गने केले. फेसबुकचे युजर्स दिवसेंदिवस वाढत गेले आणि ही जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट म्हणून उदयास आली. फेसबुकची वाढती लोकप्रियता पाहून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचीही रांगच लागली. यामुळे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग वयाच्या अवघ्या २३ वर्षांच्या वयात अब्जपतींच्या यादीत सामील झाला. फेसबुकच्या लोकप्रियतेचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे.

    The History of Facebook and How It Was started

    Facebook मध्ये मोठा बदल

    तब्बल १८ वर्षे फेसबुक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीला २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी वेगळे नाव मिळाले. मार्क झुकरबर्गने पॅरेंट कंपनीचे नाव बदलून मेटा (Meta) ठेवले. याचे उद्दिष्ट हे होते की, कंपनी मेटाव्हर्सच्या निर्माणावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छित होती. मेटाव्हर्स शब्दाचा वापर डिजिटल जगात व्हर्च्युअल आणि इंटरऍक्टिव्ह स्पेस समजून घेण्यासाठी केला जातो. मेटाव्हर्स खरं तर एक व्हर्च्युअल जग आहे, जिथे एक व्यक्ती शारीरिकरीत्या उपस्थित नसूनही उपस्थित राहू शकतो. मेटाच्या अंतर्गत येणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यांची नावे तीच राहतील, जी आधीपासून आहेत. झुकरबर्गच्या मते, कंपनीचे नाव बदलल्यानंतरही आमचे ध्येय लोकांना एकत्र आणणेच राहील.

  • आपल्या शास्त्रीय गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती

    आपल्या शास्त्रीय गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती

    त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली; पण तेवढ्यावर समाधान न होऊन ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता इ. ठिकाणी भ्रमंती केली. काही काळ त्यांनी लखनौच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. अखेरीस त्यांनी सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. त्यांनी निरलसपणे गुरुसेवा करून अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. सवाई गंधर्वानीही त्यांना पाच वर्षे मनःपूर्वक तालीम दिली.

    pandit-bhimsen-joshi-the-uncrowned-emperor-of-classical-music

    सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली. ही समृद्ध गायकी भीमसेन यांनी निष्ठेने आत्मसात केलीच; शिवाय त्या बरोबरच केसरबाई केसकर व अमीरखाँ यांच्या अनुक्रमे जयपूर व इंदूर गायकींचाही व्यासंग करून, त्यांतील लयकारीच्या, बोल फिरवण्याच्या व तानफिरक्क्यांच्या जाती आत्मसात केल्या.

    परिणामतः सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापचारीची व माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनांनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासूनच पकड घेणारी अशी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यामुळेच संगितेतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहील. आधुनिक भारतीय गायकांमध्ये लोकप्रियता व यश या दृष्टींनी भीमसेन यांचे नाव अग्रगण्य आहे. मध्वपीठातर्फे ‘संगीत-रत्न’ (१९७१), भारत सरकारची ‘पद्मश्री’ (१९७२), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) यांसारखे मानसन्मानही त्यांना लाभले. त्यांच्या शिष्यवर्गामध्ये रामकृष्ण पटवर्धन, माधव गुडी, श्रीकांत देशपांडे आदींचा समावेश होतो.

    त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.

    pandit-bhimsen-joshi-the-uncrowned-emperor-of-classical-music

    भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी ‘संतवाणी’ या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.

    भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकीगायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.

  • युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा अकिओ मोरीता फक्त २४ वर्षांचा होता. १९४६ रोजी त्याने मसारू ईबुकासोबत अणुबॉम्ब स्फोटात बेचिराख झालेल्या एका दुकानाच्या कोपऱ्यात एक कंपनी सुरु केली. हीच भविष्यातील ‘सोनी कॉर्पोरेशन’ची सुरुवात होती. २००० साली या कंपनीची उलाढाल ६३०८ कोटी डॉलर्सची होती तर त्यात १८९७०० माणसे काम करत होती. पण या सर्वांहून गाजला तो म्हणजे अकिओ मोरीताचा वॉकमन. गंमत म्हणजे जेव्हा अकिओ मोरीता आणि ईबुका यांनी तरुण पिढीला आवडेल असा वॉकमन बनवायला घेतला तेव्हा मोरीता साठीला तर ईबुका सत्तरीला टेकला होता. जेव्हा वॉकमन ची कल्पना त्यांनी त्यांच्या कंपनीसमोर मांडली तेव्हा कंपनीतील सर्वांनी विरोध केला होता, चक्क वेड्यात काढले होते.

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday
    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    या दोघांतील ईबुका हा तंत्रज्ञानात बाप माणूस होता तर मोरीता ग्रेट सेल्समन होता. IBM च्या सेल्समनबद्दल असं म्हटलं जायचं की हे लोक एस्कीमो लोकांनाही फ्रिज विकून दाखवतील. अकिओ तितकाच सामर्थ्यवान विक्रेता होता. सुरुवातीला त्यांनी सुरु केलेल्या कंपनीचं नाव होतं ‘टोकियो त्सुशीन कोग्यो काबुशिकी काईशा‘ म्हणजे ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग कंपनी’. पुढे याचीच ‘सोनी कॉर्पोरेशन’ बनली. जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा फक्त एका छोट्याशा खोलीत अनेक लोक काम करत असत. सामान ठेवायलाही जागा नसे. सगळी मंडळी रात्री कंपनीचा मुख्य दरवाजा बंद केल्यावर फायर एक्झिटच्या दरवाजाने ये-जा करत, त्यामुळे त्यांना कित्येक वेळा पोलीस चोर समजून पकडत.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सुरुवातीला त्यांना कामाच्या मोबदल्यात तांदूळ मिळे, कारण त्यावेळी दुसर्‍या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. युद्धानंतर तांदूळ खूपच दुर्मिळ आणि महाग झाला होता. पुढे कंपनी वाढल्यावर तिचं वेगळं नाव ठेवायचं ठरवलं, तेव्हा आख्खी डिक्शनरी चाळून त्यांच्या लक्षात आलं की लॅटिनमध्ये सोनस म्हणजे ध्वनी,आणि अमेरिकेत ‘सॉनी’ हा शब्द तरुण हुशार मुलांसाठी वापरला जाई. मग या दोन्हीचा वापर करून ‘सोनी’ या शब्दाचा उगम झाला आणि ‘सोनी कॉर्पोरेशन’चा जन्म झाला. फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. आता सोनीने टेप, रेडिओ अगदी लहान आकाराचे म्हणजे खिशात मावतील असे रेडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण गंमत म्हणजे त्यांची उपकरणे खिशात बसेनात म्हणून चक्क मोठे खिसे असलेले शर्टही बनवून विकायला सुरु केले होते.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सोनीचे मालाच्या दर्जावर खूपच बारीक लक्ष असे. पण त्याकाळी जपानी मालाच्या दर्जाची चेष्टा सुरु असल्याने मोरीता त्यांच्या मालावर ‘मेड इन जपान’ असं बारीक अक्षरात लिहित. कारण त्यादरम्यान ‘Made in Japan’ चा अर्थ असा होता की ‘स्वस्त व तकलादू उत्पादने’ परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे ‘भव्य ध्येय’ होते की ‘जगातील जपानची प्रतिमा बदलणे.’ सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन ‘जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा’ अशी करायची होती. एकदा अमेरिकेतील बोलावा नावाच्या कंपनीने सोनीकडून १ लाख ट्रांझीस्टर बनवण्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर म्हणजे त्याकाळच्या दहा वर्षांच्या ऑर्डरइतकी मोठी होती. त्यांची एकच अट होती की सोनीने त्यावर सोनीचे नाव न टाकता बोलावाचे टाकावे. अकिओला इतका प्रचंड पैसा दिसत असूनही त्या मिटिंगमधून चक्क निघून गेला. पण नंतर ‘सोनी’ ही कंपनी बोलावाच्या ३० पटीने मोठी कंपनी झाली. आज कॅसेट्स, सीडीज, टीव्ही,टेप, डिस्कमन, वॉकमन, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅमेरा,हँडीकॅम, सोनी एंटरटेनमेन्ट असा वाढलेला पसारा म्हणजे अकिओ मोरीता आणि ईबुकाचे प्रयत्न होय. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत ‘सोनी’ने प्रगती केली आहे.

    साभार :- अच्युत गोडबोले