Category: लेख

  • डिव्हिडंड देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

    डिव्हिडंड देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

    शेअरबाजारात गुंतवणूक करणारे जाणीवपूर्वक धोका पत्करत असतात. यातून होऊ शकणारा आकर्षक परतावा त्यांना खुणावत असतो. कधीतरी एखादा शेअर्स आपले सर्व आयुष्यच बदलून टाकेल असा विश्वास त्यांना वाटत असतो. असे शेअर्स मिळतील न मिळतील पण शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस बाजारातून मिळणारा परतावा शेअर्सवर मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड आणि भाव वाढून भांडवलात होणारी वृद्धी अशा दोन प्रकारे मिळतो. डिव्हिडंड आणि भांडवलात होणारी वृद्धी दोन्ही करपात्र आहेत.

    डिव्हिडंड व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नात मिळवला जाऊन त्यावर चालूदराने कर आकारणी केली जाते तर भांडवलात झालेली वाढ हा भांडवली नफा समजला जावून शेअर्स धारण करण्याच्या कालावधीनुसार अल्प किंवा दीर्घ मुदतीचा असतो त्यावर विशेष दराने कर भरावा लागतो तो अन्य कराच्या तुलनेत बराच कमी आहे. ज्या भावाने शेअर्स खरेदी केले त्यावर मिळणारा परतावा हा डिव्हिडंड बरोबर तुलना केली तर अत्यल्प असतो. याला अपवाद असलेले काही शेअर्स आहेत जे बँकेतील फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत अधिक परतावा देतात अनेक गुंतवणूकदार असे आहेत त्यांना सातत्याने नियमित उत्पन्नाची गरज असते म्हणून आशा शेअर्सना डिव्हिडंड स्टॉक असेही म्हटले जाते परंतु त्यांचा बाजारभाव हा तुलनेने कमी असल्याने त्यातून होणारी भांडवलवृद्धी कमी असते तर जास्तीतजास्त भांडवलवृद्धी व्हावी अशी गुंतवणूक दाराची इच्छा असते.


    कंपनी कायद्यात, कंपनीने तिला झालेल्या फायद्यातील निश्चित वाटा डिव्हिडंड म्हणून भागधारकांना द्यावा असे कोणतेही बंधन नाही. अशा अनेक जगप्रसिद्ध कंपन्या आहेत ज्यांनी फायद्यात असूनही अद्याप डिव्हिडंड दिलेला नाही तरीही भारतीय शेअरबाजारात सर्वसाधारणपणे फायद्यात असणाऱ्या कंपन्या डिव्हिडंड देतात. बोनस रूपाने शेअर्सही देतात वर म्हटल्याप्रमाणे ज्यांना डिव्हिडंड स्टॉक असे म्हटले जाते त्यात भांडवलवृद्धीची शक्यता कमी असते त्यांची विभागणी – डिव्हिडंड ग्रोथ स्टॉक आणि हाय डिव्हिडंड स्टॉक अशी करता येईल या कंपन्या वर्षातून एकदा किंवा दर तीन महिन्यांनी डिव्हिडंड देतात.
    डिव्हिडंड ग्रोथ स्टॉक आपण अशा कंपन्यांना म्हणू शकतो ज्या कंपन्या भविष्यात डिव्हिडंड अधिक देऊ शकतील तर हाय डिव्हिडंड स्टॉक म्हणजे अशा कंपन्या ज्या भविष्यात डिव्हिडंड कदाचित अधिक देऊ शकतील परंतु सध्या त्या त्यांच्या नफ्यातील अधिक भाग त्या डिव्हिडंड रूपाने भागधारकांना देत आहेत.


    गुंतवणूकदारांनी डिव्हिडंड स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची कारणे-


    सातत्याने मिळणारे अप्रत्यक्ष उत्पन्न– या कंपन्या दरवर्षी किंवा दर तिमाहिस डिव्हिडंड देत असल्याने सातत्याने काहीतरी पैसे नियमित मिळत राहतात याची तुलना बँकेतून मिळणाऱ्या फिक्स डिपॉझिट वरील व्याजाशी करता येईल. अशा तऱ्हेने नियमितपणे उत्पन्न मिळत राहणे ही काही जणांची गरज असू शकते. असे उत्पन्न नियमितपणे मिळणे ही त्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य गुंतवणूक असेल.
    अन्य शेअर्सच्या तुलनेत कमी जोखमीची गुंतवणूक– या शेअर्समधील गुंतवणूकीत तुलनेने जोखीम कमी आहे. त्याच्या बाजारभावात फार चढ उतार होत नाहीत. बाजार अन्य कोणत्याही कारणाने खाली आला तरी या शेअर्सचे भाव फारसे उतरत नसल्याने भांडवली नफा किंचित कमी होऊ शकतो. त्यात फारसा फरक पडत नसल्याने तुलनेने यात जोखीम कमी आहे.
    डिव्हिडंडची त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये पुनर्गुंतवणूक शक्य– जेव्हा गुंतवणूक दारास डिव्हिडंड मिळेल तेव्हा एक तर तो स्वतःसाठी खर्च करता येईल किंवा त्याच कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करता येईल. अशा पध्दतीने गुंतवणूक त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये केल्यास डिव्हिडंड चक्रवाढ पद्धतीने वाढेल. यामधून मिळणारा परतावा सातत्याने वाढताच राहील.
    दुहेरी फायदा– अशा शेअर्समधून डिव्हिडंड तर मिळतोच त्याचप्रमाणे त्यातून भांडवली नफाही होत राहील असा दुहेरी फायदा होईल त्यामुळे आपोआपच मूल्यवृद्धी होत राहील.
    वाढत्या महागाईवर मात– यातून मिळणारा डिव्हिडंड आणि भांडवल वृध्दी यामुळेच अशी गुंतवणूक वाढत्या महागाईवर मात करणारा परतावा मिळावणारी असते.
    बाजार अस्थिरतेवर मात– बाजार कितीही अस्थिर असला तरी अशा शेअर्सच्या बाजारभावात फारसा फरक नसल्याने बाजारातील अस्थिरतेवर आपोआपच मात केली जाते. त्यामुळे गुंतवणूक करून ती तशीच ठेवणे अशा पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्याच्या दृष्टीने अशा शेअर्स मधील गुंतवणूक हे वरदान ठरण्याची शक्यता आहे.


    डिव्हिडंड स्टॉकमधील गुंतवणूक कोणाच्या फायद्याची-


    डिव्हिडंड स्टॉक मधील गुंतवणूक सोपी आणि कमी जोखीम असलेलीच आहे, असा यातून समज होत असेल तरी इतक्या सहजतेने ही गुंतवणूक करावी असा विचार गुंतवणूकदारांनी करू नये. गुंतवणूक केल्याने त्यातून मिळणारे फायदे आणि त्याच्या मर्यादा जाणून घ्याव्यात त्या आपल्या गुंतवणूक धोरणाशी मिळत्या जुळत्या असतील तरच गुंतवणूक करण्याचा विचार करावा. ते स्वतःला सावध गुंतवणूकदार समजत असतील तर अशी गुंतवणूक करण्यामागचे फायदेतोटे लक्षात घ्यावेत. दीर्घकाळात अशी गुंतवणूक अपवादात्मक प्रमाणात भरपूर मूल्यवृद्धीही करून देऊ शकते. यासाठी संशोधन करून कंपनीचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करणे गरजेचे आहे. ग्रोथ स्टॉकमधून खात्रीपूर्वक नियमित परतावा आणि काही प्रमाणात मूल्यवृद्धी निश्चित होईल एवढेच यातून ठामपणे सांगता येईल त्यामुळे अशी गुंतवणूक ही काही जणांच्या दृष्टीने योग्य गुंतवणूक असल्याचा निष्कर्ष आपण यातून काढू शकतो. अनेक गुंतवणूकदार हीच गुंतवणूक आदर्श मानून केवळ ग्रोथ स्टॉकमध्येच गुंतवणूक करीत आहेत.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणून कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही हे लक्षात घ्यावे यातील मुद्द्यांवर आपल्या गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करावी.)

    आणखी वाचा

  • जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?

    जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?

    आपल्याकडे सध्याचे आयकरचे दर मध्यम प्रमाणात आहेत. या करातून अनेक सरकारी खर्च भागावले जातात, शिक्षण, संरक्षण, पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. त्यातूनच देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. सरकारच्या उत्पन्नाचे प्रत्यक्ष कर हे महत्वाचे साधन आहे. ज्याने उत्पन्न अत्यल्प आहे त्यांना सरकारची मदत मिळते तर अतिशय श्रीमंत लोक संघटितपणे त्यांच्या अनेक उत्पन्नावरील कर कमी करावेत यासाठी सरकारवर दबाव आणतात.

    याउलट मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नातूनच कर लगेच कापून घेत असल्याने त्यात अधिक सवलती मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सरकारला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करून सर्वच घटकांना खुष ठेवावे लागते निदान जे काही आहे ते त्यांच्या फायद्यासाठी आहे असा दिलासा समाजातील प्रत्येक घटकांना द्यावा लागतो. अनेक आयकरदात्याना कराचे दर अधिक वाटतात. बरेचदा त्याची कर भरण्याची जबाबदारी मालकावर असल्याने कामाच्या ठिकाणी करकपात केली जाते.

    दरमहा वेतनातून काही कपात न केल्यास शेवटचे तीन चार महिने करदात्यांवर ताण येऊ शकतो त्यामुळेच कच्चा हिशोब करून दरमहा काहीतरी कपात केली जाते. आयकर मापन करण्याच्या जुन्या पद्धतीत विविध गुंतवणूका आणि खर्च यावर सूट मिळते. त्यामुळे निव्वळ उत्पन्नाचा विचार करता द्याव्या लागणाऱ्या आयकराचे प्रमाण अप्रत्यक्षपणे खूप कमी होते. अनेक सवलती रद्द करून काही प्रमाणात करदेयता कमी करणारी नवीन करयोजना सरकारने आणली असली तरी सरकारने आयकरच रद्द करावा अशी मागणी नियमित केली जाते. यात अनेकदा राजकारण असले तरी या मागणीस करदात्यांचे समर्थनही मिळते. आयकर रद्द केला तर विकासाची गती कशी वाढेल याचे अनेक दाखले दिले जातात.

    समर्थनार्थ पुढे येणारे ठळक मुद्दे-

    सध्याच्या पद्धतीत व्यक्ती आणि उद्योजक यांच्यावरील भार अधिक वाढतो. आयकर रद्द केल्यास अधिक खेळाता पैसा बाजारात उपलब्ध होईल त्यातून अधिक गुंतवणूक होईल आणि अधिक खर्चही केला जाईल त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. यासाठी युनायटेड अरब अमिरात, सौदी अरेबिया या देशाची उदाहरणे दिली जातात आयकर नसताना तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात, गेल्या दहा वर्षांत जागतिक सरासरीहून 4.2% दराने वाढ झाली आणि तो दर 5% होऊ शकेल. विकासदरात वाढ झाल्यास नवीन नोकऱ्या निर्माण होतात, परदेशी गुंतवणूक वाढते त्यामुळे जनतेचे सर्वसाधारण राहणीमान उंचावते.

    भारतातील कररचना गुंतागुंतीची आहे. आयकर रद्द केल्याने त्यात सुलभता येईल त्यामुळे करदाते आणि व्यावसायिक यांना कर नियमांचे पालन करणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे कर गोळा करण्यासाठी जो प्रशासकीय खर्च होतो तो कमी होईल. कर सल्लागाराची महागडी फी द्यावी लागणार नाही त्याचप्रमाणे हिशोबांचे लेखा परीक्षण सहसा आवश्यक नसल्याने परीक्षकांची गरज कमी होईल.

    आयकर रद्द केल्याने व्यक्ती आणि व्यवसायांना करचुकवेगिरी करण्यात किंवा त्यांचे उत्पन्न लपविण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्तारू शकते. अधिक पारदर्शक आणि जबाबदार आर्थिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकते. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय कर मानकांचे पालन करणारा देश म्हणून भारताची जागतिक पत देखील सुधारू शकते. जे विश्वासार्ह आणि अनुपालित वातावरण शोधत असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांना आणि व्यवसायांना आकर्षित करू शकते

    भारताने प्राप्तिकर रद्द केल्यास विदेशी गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यासाठी एक सशक्त आकर्षक पर्याय उपलब्ध झाल्याने जागतिक बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.
    आयकर रद्द केल्याचे असे अनेक फायदे असताना सरकार तो रद्द करीत नाही कारण-

    आयकर हा सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्राच्या गरजा यातून भागवल्या जातात. त्यामुळे त्यास व्यवहार्य पर्याय उपलब्ध होयला हवा, नाहीतर यामुळे येणारी तूट भरून काढण्यास अधिक कर्ज घ्यावे लागेल त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वाटते.

    महसूल वाढवण्यासाठी विविध अन्य करपर्याय शोधावे लागतील. जसे की वस्तू आणि सेवाकर, संपत्तिकर, कंपनीकर यात वाढ करावी लागेल. व्यवहार कर आणावा लागेल या वाढीचे स्वतःचे वेगळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात.

    व्यवहारकरासारख्या करात वाढ करताना त्याचे आंतरराष्ट्रीय करार , जबाबदाऱ्या, परकीय गुंतवणूक आणि व्यापार यावर होणारे संभाव्य परिमाण तपासून पाहावे लागतील.

    सध्याच्या व्यवस्थेने संपत्तीचे असमान वितरण होत आहे आयकर रद्द केल्यास त्याचा अधिक फायदा श्रीमंतांना होईल त्यामुळे विषमता अधिक वाढेल. अप्रत्यक्ष करवाढीचा थेट परिणाम कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर अधिक होतो त्यामुळे अशी करप्रणाली विकसित करावी लागेल जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे अप्रत्यक्ष कर समायोजित करू शकेल आणि त्यांच्यावरील कराचे ओझे हे संपत्ती वाढीच्या प्रमाणात किंचित वाढेल. त्यामुळे संपत्तीचे असमान ऐवजी पुनर्वितरण होऊ शकेल. या दिशेने जाणारा एकही मार्ग समोर नाही.

    आयकर रद्द करण्याची मागणी करणारे सर्व युक्तिवाद हे व्यवहारकराची आकारणी करण्याची मागणी करीत आहेत किंबहुना त्यांची सर्व मदार या करावर आहे. व्यवहार करांमध्ये सामान्यत: विशिष्ट आर्थिक व्यवहारांवर कर आकारणे समाविष्ट असते, जसे की स्टॉक ट्रेड, मालमत्ता विक्री किंवा बँकिंग व्यवहार.

    व्यवहार करांच्या बाजूने केले जाणारे युक्तिवाद:

    ★ साधेपणा: व्यवहार कर हे आयकराच्या तुलनेत सोपे मानले जाते व्यवस्थापन आणि गोळा करण्याची पद्धत सोपी आहे.

    ★ आर्थिक वाढ: याबाबत असा युक्तिवाद आहे की व्यवहार कर व्यक्ती आणि व्यवसायांवरील आयकराचा भार कमी करून त्यास चालना देऊ शकतात. कमी आयकर दर किंवा त्याचे निर्मूलन यामुळे संभाव्यपणे गुंतवणूक आणि वापर याला प्रोत्साहन मिळू शकते.

    ★ कमी करचोरी: व्यवहार कर चुकवणे अधिक आव्हानात्मक असू शकते कारण ते विशिष्ट व्यवहारांशी जोडलेले असतात आणि व्यवहाराच्या ठिकाणी गोळा केले जाऊ शकतात.

    निष्कर्ष

    ● भारतात आयकर रद्द करणे हा एक धाडसी प्रस्ताव आहे ज्याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
    ● आर्थिक विकासाला चालना देण्याची, करप्रणाली सुलभ करणे, करचोरी टाळणे, कर कमी करण्याचे आश्वासन देताना संभाव्य महसुलाची हानी आणि वाढत्या संपत्ती असमानतेची चिंता त्यामुळे अशा बदलाच्या व्यवहार्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी व्यापक संशोधन, तज्ञांशी सल्लामसलत करणे आणि त्याचे परिणाम याचा विचार करणे आवश्यक आहे.
    ● आयकर रद्द करण्याचा प्रस्ताव देशाच्या भविष्यासाठी व्यवहार्य आणि फायदेशीर प्रस्ताव आहे की नाही हे ठरवण्यासाठी आर्थिक वाढ आणि निष्पक्षता बाळगून यातील संभाव्य उणीवांकडे लक्ष देणारा संतुलित दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

    आणखी वाचा

  • शेअर डिलिस्टिंग : एक गुंतवणूकदार मार्गदर्शक

    शेअर डिलिस्टिंग : एक गुंतवणूकदार मार्गदर्शक

    शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या शेअर्सची खरेदीविक्री गुंतवणूकदार करू शकतात हे आपल्याला माहिती आहे. सध्या देशभरात कुठेही व्यवहार होऊ शकणाऱ्या मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यापैकी किमान एका बाजारात सार्वजनिक मर्यादित कंपनीस नोंदणी करावीच लागते. अनेक चांगल्या कंपन्या गुंतवणूक दारांच्या सोईसाठी दोन्हीही शेअरबाजारात नोंदणी करतात.

    अशी नोंदणी करण्यासाठी दरवर्षी नोंदणी फी द्यावी लागते त्याचप्रमाणे शेअरबाजाराच्या नियमावलीचे पालन करून कंपनी बाबतची सर्व माहिती पारदर्शकपणे विहित कालावधीत जाहीर करावी लागते जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारातील आपल्या शेअर्सची खरेदीविक्री पूर्णपणे थांबवते तेव्हा ती सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून न राहता तिचे रूपांतर खाजगी कंपनीत होते. जोपर्यंत वरील दोनपैकी कोणत्याही एका शेअरबाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार होत असतात तोपर्यंत ती कंपनी नोंदणीकृत कंपनी आहे असे म्हटले जाते. जेव्हा दोन्हीही राष्ट्रीयस्तरावर बाजारातील खरेदी विक्री कंपनी प्रवर्तकांकडून रीतसर नियमाचे पालन करून थांबवली जाते किंवा कंपनीवर कारवाई म्हणून बाजारातील व्यवहार थांबवले जातात तेव्हा सदर कंपनीचे शेअर्स डिलिस्ट झाले असे आपल्याला म्हणता येईल.

    शेअर डिलिस्ट करण्याची गरज कुणाला आणि का पडावी? याची कारणे शोधली असता शेअर्सचे डिलिस्टिंग दोन प्रमुख पद्धतीने होऊ शकते.

    ★ सन्मानपूर्वक पद्धतीने
    ★ सक्तीने

    ★ सन्मानपूर्वक पद्धतीने शेअर डिलिस्ट करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाकडून घेतला जातो तशी नियामकांकडे मागणी केली जाते. सर्व शेअरहोल्डरना त्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्याकडील शेअर्सचा उचित मोबदला दिला जातो आशा प्रकारे बाजारातील विक्रीयोग्य सर्वच लॉट काढून घेतले जातात असे करत असताना सर्व शेअरहोल्डरनी आपल्याकडील शेअर्स व्यवस्थापनास दिलेच पाहिजेतच अशी सक्ती नसते फक्त यापुढे शेअर्स खरेदीविक्री सहजासहजी होऊ शकणार नाही याची शेअरहोल्डरना जाणीव करून देऊन त्यावर तात्पुरता उपलब्ध पर्याय उपलब्ध करून दिलेला असतो.

    सन्मानपूर्वक डिलिस्टिंग हा कंपनीच्या विस्तार कार्यक्रमाचा आणि पुनर्रचनेचा एक भाग असतो किंवा एखादा मोठा गुंतवणूकदार ती कंपनी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असतो तो मूळ प्रवर्तकाचे सर्व शेअर्स खरेदी करतो याशिवाय संस्थात्मक गुंतवणूकदारांचे जास्तीत जास्त शेअर्स आपल्याकडे येतील असा प्रयत्न करतो हाच नियम सर्वसाधारण भागधारकांना लागू पडतो सध्या एकूण भागभांडवलाच्या 25% शेअर्स हे जनतेकडे बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असावेत असा नियम आहे या नियमावलीतून फक्त सरकारी मालकीच्या कंपन्यांना वगळण्यात आले आहे. प्रवर्तक अथवा कंपनी खरेदी करणारा गुंतवणूकदार आपला कंपनीवर पूर्ण ताबा असावा या हेतूने 75% हून अधिक भागभांडवल आपल्या ताब्यात राहावे अशा प्रयत्नात असतात अशा प्रसंगी कंपनी डिलिस्ट करण्यास काही अटींवर नियमकांची परवानगी मिळू शकते.

    जी कंपनी डिलिस्ट होणार त्याचे प्रवर्तक किंवा नवे मालक यांना कंपनीचे शेअरबाजारातील व्यवहार पूर्णपणे बंद करण्यासाठी 90% शेअर्स मिळवावे लागतात ते मिळवण्यासाठी त्या शेअर्सचे स्वतंत्र मूल्यांकन करून घेऊन तसा देकार अन्य भागधारकांना द्यावा लागतो ही किंमत प्रवर्तक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांना दिलेल्या किमतीहून कमी असू शकत नाही त्याचप्रमाणे बाजारभावाहून कमी असल्यास त्यास कोणीही प्रतिसाद देणार नाही.

    असे धरून चालू की हे शेअर्स सन्मानपूर्वक डिलिस्ट करण्याची प्रवर्तक किंवा नवे गुंतवणूकदार यांनी ठरवले आहे. हा निर्णय झाल्यावर भागधारकांना 10 आठवडे आधी पूर्वसूचना ठेवून त्यांची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून मान्यता मिळवावी लागते ही मान्यता मिळवली की त्यानंतरची प्रक्रिया अशी-

    मर्चंट बँकर्सची नेमणूक– शेअर डिलिस्टिंग निर्णय झाल्यावर स्वतंत्र मर्चंट बँकरची नेमणूक करावी लागते तो रिव्हर्स बुक बिल्डिंग त्यामधून शेअर्स पुनर्खरेदी कोणत्या भावात करावी लागेल या प्रक्रियेवर लक्ष ठेवेल.

    रिव्हर्स बुक बिल्डिंग– यात कंपनी भागधारकांना एक विशिष्ट किंमत सांगेल जी शेअरहोल्डरना त्यांचे शेअर्स देण्यासाठी आकर्षक वाटेल. यासाठी ऑनलाइन देकार मागवण्यात येतील त्याची किमान किंमत (बेस प्राईज) ही मागील 2 आठवडे किंवा 26 आठवडे यांपैकी जी सर्वाधिक सरासरी किंमत असेल ती किमान किंमत धरली जाईल. भागधारक त्याहून अधिक अशा कोणत्या किंमतीत शेअर्स देण्यास तयार आहेत असे देकार घेतले जातील त्यातून कोणत्या भावांनी सर्वाधिक शेअर्स खरेदी केले जातील याचा शोध घेतला जाईल. ही खरेदी नेमकी कोणत्या भावाने करावी? याचा शोध घेण्याची ही आदर्श पद्धत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. जगभराचा विचार केला असता केवळ भारतातच रिव्हर्स बुक बिल्डिंग पद्दत अस्तित्वात आहे. ही पद्धत बदलून जगभरात मान्य अशी एका विशिष्ट किमतीनेच नियोजित डिलिस्टिंग कंपनीचे शेअर खरेदी करावेत अशी उद्योगांची मागणी असून यावरील संशोधन प्रबंध सेबीने प्रकाशीत केला आहे. त्यावर लोकांच्या सूचना प्रतिक्रिया मागवल्या असून सेबीच्या येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करण्यात येणार असल्याचे सेबी चेअरपर्सन “माधवी पुरी बुच” यांनी अलीकडेच जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच या पद्धतीत कोणते नवे बदल होतील ते समजेल.

    डिलिस्टिंगसाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती– निश्चित केलेल्या भावाने शेअर्स खरेदी केले जातील याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र खाते (एस्क्रू अकाउंट) उघडले जाते. त्यातील पैशांचा वापर केवळ मान्यवर भागधारकांचे शेअर्स खरेदी करण्यासाठीच वापरले जातील.
    बहुसंख्य शेअरहोल्डरची मान्यता– किंमत निश्चित झाल्यावर सर्वाना पत्रे पाठवून खरेदी ऑफर दिली जाईल जोपर्यंत 90% शेअरहोल्डर यास मान्यता देत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील यात कधीही ऑफर केलेला भाव हा बाजारभावाहून कमी नसेल यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास संपूर्ण प्रक्रिया मागे घेण्याचा अधिकार कंपनीस आहे.

    सक्तीने करण्यात आलेले डिलिस्टिंग: यात शेअर्सचे व्यवहार बंद व्हावेत अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाने केलेली नसते. या कंपन्या यथातथाच असल्याने लिस्टिंग नियमावलीचे पालन करू शकत नाहीत त्यांच्यावर शेअरबाजाराच्या नियामक मंडळाकडून अशी कारवाई केली जाते ही कारवाई तात्पुरती अथवा कायमस्वरूपी असू शकते. काही गंभीर गैरवर्तन आढळून आल्यास सेबीकडून सर्व व्यवहार थांबवले जाऊ शकतात झालेले व्यवहार रद्द केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांचे यात नुकसान होत असले तरी बाजारात व्यवहार करणाऱ्या सर्वाना ही जोखीम स्वीकारणे भाग आहे. हा एक शिक्षेचाच प्रकार आहे. अशी शिक्षा केल्याने अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचीच शक्यता असल्याने शक्यतो अशी कारवाई बाजार नियामक मंडळाकडून घाईघाईत केली जात नाही. त्या संबधी योग्य त्या पूर्वसूचना दिल्या जातात. मात्र मोठा गैरव्यवहार आढळल्यास सेबीकडून धडक कारवाई केली जाऊ शकते. यासर्वच प्रक्रियेवर अथवा सेबीने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर कंपनी अथवा भागधारक यांना सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनलकडे (सॅट) अपील करता येते त्यांनीही योग्य निर्णय दिला नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात आणि निर्णय मान्य नसल्यास त्यावर अपील हे प्रकार सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेपर्यंत चालू रहातात. सन 2005 मध्ये 90% भागधारकांच्या संमतीने कॅटबरी ने आपले शेअर्स ₹ 500/- मोबदला देऊन डिलिस्ट केले होते राहिलेल्या शेअरहोल्डर्सनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात या किमतीस आव्हान दिले त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने भागधारकांना ₹ 2014.50 प्रतिशेअर्स द्यावेत असा आदेश दिला होता.

    सक्तीने शेअर्स डिलिस्ट होण्याची काही प्रमूख कारणे-

    ● शेअरबाजाराच्या नियमावलीचे पालन न करणे
    ● शेअरबाजारात 6 महिन्याहून अधिक काळ खरेदीविक्री व्यवहार न होणे किंवा व्यवहारांचे प्रमाण तुरळक असणे
    ● दिवाळखोरी, सतत तीन वर्षाहून अधिक काळ नफा न मिळवणे, कंपनीच्या मालमत्तेचे मूल्यांकन उणे असणे.

    सन्मानाने डिलिस्ट होऊ घातलेल्या कंपनीची ऑफर मान्य करून शेअर्स देण्याची सक्ती कोणत्याही भागधारकावर नाही त्याची इच्छा असल्यास ते त्यापुढेही कंपनीचे भागधारक म्हणून राहू शकतात परंतू असे शेअर्स विकण्यासाठी त्यांच्यावर मर्यादा येतात हे लक्षात घ्यावे डिलिस्ट झालेल्या कंपनीचे शेअर्स त्यानंतर एक वर्षापर्यंत अंतिमतः मान्य केलेल्या भावाने खरेदी करण्याचे बंधन प्रवर्तकावर आहे. डिलिस्टिंग होणाऱ्या शेअर्सचा भाव सर्वसाधारणपणे वाढतो त्यापेक्षा अधिक खरेदी किंमत भागधारकांना मिळत असल्याने अशा शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवून त्यात गुंतवणूक करणे ही एक गुंतवणूक पद्धतही होऊ शकते. यात कंपनीने डिलिस्टिंग मागे घेतल्यास बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडझड होऊ शकेल एवढीच जोखीम आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक
    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य असून महारेरा सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक असल्याची नोंद घ्यावी)

    आणखी वाचा

  • THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

    THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

    THE IKEA Effect – मित्रांनो Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त का मिळतात किंवा डी-मार्टवाले इतक्या कमी किमतीत वस्तू विकून Profit कसा कमावतात या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे त्या जरा बाजूला ठेऊया. मार्केटमध्ये सध्या IKEA हे नाव चांगलंच गाजतंय! कमी किमतीत मिळणारं Top Quality चं फर्निचर, कितीही मोठ्या फर्निचरला आपल्याच कारमध्ये टाकून घरी नेण्याची सोय, फर्निचरचे Simple आणि Unique Designs या सगळ्या गोष्टी IKEA ने कशा मॅनेज केल्या आणि लोकांना या सगळ्या गोष्टींची चटक कशी लावली; जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये!

    IKEA बद्दल तुम्हीसुद्धा कधी ना कधी ऐकलं असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी… IKEA ही जगातली सर्वात मोठी Furniture Manufacturing Company आहे, जिचा जन्म १९४३ साली स्वीडनमध्ये झाला. या कंपनीच्या नावाची स्टोरी पण मजेदार आहे. IKEA च्या I आणि K मध्ये दडलंय कंपनीच्या फाऊंडरचं नाव, म्हणजे Ingvar Kamprad (इंगवार कॅम्परड). E for Elmtaryd हे त्या फार्मचं नाव आहे, जिथं ते लहानाचे मोठे झाले आणि A for Agunnaryd जे की या फार्म जवळचं एक गाव आहे. अशा पद्धतीने बनलं ते IKEA. IKEA सुरुवातीला एकदम छोट्या Scale वर सुरु झालं होतं; पेन्सिल, पोस्ट कार्ड्स सारख्या छोट्या छोट्या गोष्टी आधी ते विकायचे. कंपनी सुरु केल्यानंतर ५ वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली फर्निचर विकण्यासाठी आणि आज ४६० पेक्षा जास्त स्टोअर्सचं हे जाळं पसरलंय ६३ देशांमध्ये. 

    the-ikea-effect-everything-you-need-to-know

    कुठल्याही फेमस स्टोअरमध्ये लोकं का गर्दी करतात? तिथल्या क्वालिटीमुळे? का त्याच्या प्राईम लोकेशनमुळे? नाही. तर तिथल्या Affordable Pricing मुळे. अर्थात क्वालिटी, लोकेशन या गोष्टी Matter करतातच, पण Pricing समोर कोणती गोष्ट टिकलीये का भाऊ? IKEA Effect च्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होते. इथं मिळणारं फर्निचर हे टॉप क्वालिटीचं तर आहेच, पण त्याचसोबत ते Affordable आहे. आणि Quality आणि Affordability एकत्र आली की होतो… धमाका!

    आता येऊया यांच्या फर्निचरकडे. IKEA मध्ये आपल्याला एका सध्या चमच्यापासून ते एका रूमच्या अख्ख्या सेटअपपर्यंत सगळ्या प्रकारचं फर्निचर पाहायला मिळतं. स्टडी टेबल, स्टूल्स, लॅम्प्स, कार्पेट, डिशेस, बाऊल्स, कपाटं, सोफा, बेड, खुर्च्या,आरसे, टी-पॉय असे नाही नाही ते सगळे Product इथं पाहायला मिळतात. या सगळ्याचे डिझाइन्स, व्हरायटी, क्वालिटी आणि  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर बघून तुम्ही यातलं एखादं तरी Product होनाही करता करता घेताच.

    फर्निचर तर घेतलं पण याची Delivery कधी मिळणार? कधी तो टेम्पो येणार? कधी त्याला आपल्या घराचा पत्ता सापडणार? बर परत फर्निचर आतमध्ये नेताना कशाला घासलं वगैरे तर? सोसायटीवाल्यांच्या नाहीतर घरात बायकोच्या शिव्या खायला लागणार! पण काळजी करू नका; असं काहीच होणार नाही. कारण हे फर्निचर तुम्ही तुमच्या कारमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. काय? तुम्हाला सुद्धा शॉक बसला असेल नाही तो वाला शॉक नाही. तर तुम्ही जे पण फर्निचर चूझ करता त्या फर्निचरला IKEA हे Dissemble करून देतं आणि इथंच येतो तो सगळ्यात महत्त्वाचा IKEA Effect. IKEA चा हा USP आहे म्हणा हवं तर.

    the-ikea-effect-everything-you-need-to-know

    आता हा IKEA Effect आपण समजून घेऊया आपल्या घराघरातल्या उदाहरणाने. समजा तुमच्या आईने तुमच्यासाठी उद्या मस्त इडली सांबार बनवण्याचा प्लॅन केलाय. तर त्यासाठी त्या माऊलीनं रात्री पीठ भिजवून ठेवलं, मग सकाळी लवकर उठून कांदा, टोमॅटो चिरून, खोबरं, कोथिंबीर घालून मस्त सांबार बनवलं. मग इडली पात्रात त्या इडल्या उकडल्या. मग एक एक इडली काढून ती तुमच्यासमोर ठेवली आणि हे सगळं करून झाल्यावर ती म्हणाली, “हूssश दमले बाबा खूप!” एवढं सगळं करून झाल्यावर इडल्या खाऊन तुम्ही तिला काय म्हणाले तर, “काय आई कशाला एवढा कुटाणा केला. मी तुला इन्स्टंट पीठ आणि इन्स्टंट सांबार मसाला आणून दिला असता ना!” खाल्ला का इन्स्टंट मार??? तर एवढं सगळं करून आई शेवटी काय म्हणाली दमले बाबा खूप! पण मित्रांनो या दमले बाबामध्येच आईचा खरा आनंद आहे, कारण हे सगळं करून तिला एक Sense of Achievement मिळतो, जो या इन्स्टंट पिठातून मिळणं कधीच शक्य नसतं. IKEA ने सुद्धा या Human Psychology ला ओळखलं आणि आपलं Furniture Dessemble करून देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे झालं काय. जेव्हा Customer घरी जाऊन स्वतःच हे Furniture Assemble करायला लागला, तेव्हा त्याला एक Sense of Achievement मिळाला आणि यातूनच सुरुवात झाली IKEA च्या यशस्वी वाटचालीला.

    तुम्हाला ही आजची IKEA स्टोरी कशी वाटली आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. जर लेख आवडला असेल तर लाईक करा Channel ला Subscribe करा जेणेकरून YouTube ला, पण कळेल Market मध्ये नवीन Brand आलाय ते. आणि हो तुम्हाला अजून अशा कोणकोणत्या ब्रॅण्डच्या केस स्टडीज जाणून घ्यायला आवडतील हेही नक्की सांगा. तो पर्यंत Bye Bye.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling

    करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling

    Career counselling – दहावी – बारावीची परीक्षा झाली. निकाल सुद्धा जाहीर झाले. आता विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास रिकामे झाले, पण या वयातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुढे करायचं काय? कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं? अनेकांचे सल्ले घेऊन आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतो, पण 3- 4 वर्ष त्या फील्डमध्ये काम केल्यानंतर मग लक्षात येतं की अरे आपण चुकीच्या क्षेत्रात काम करतोय. मग पुन्हा काही जण फील्ड चेंज करण्याचा विचार करतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. भविष्यात अशी वेळ तुमच्यावर येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर करिअर निवडताना सुरुवातीलाच प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. 

    करिअरचा निर्णय घेताना सामान्यत: दहावी-बारावीचे गुण, आवड, करिअरमधील वाढीच्या संधी, व्यक्तिमत्त्व, वेळ आणि शिक्षणासाठीचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. बऱ्याचदा आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे ते ज्या क्षेत्रात काम करतायेत त्याच क्षेत्रात स्वतः देखील काम करण्याचा निर्णय घेतो, पण असा निर्णय तुम्हाला पुढील आयुष्यात महागात पडू शकतो. कोणीतरी यशस्वी झालं म्हणून तुम्ही देखील त्या क्षेत्रात व्हाल हा विचार डोक्यातून बाहेर काढा आणि तुम्हाला कोणते काम करण्यात आनंद मिळतो, त्यातच करिअर घडवा.

    क्षमता ओळखा:  एखाद्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे स्किल्स असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एखादे क्षेत्र आवडते, पण त्यामध्ये करिअर करण्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे नसतात. जसे की काही क्षेत्रात तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल. तर काही क्षेत्रात नऊ ते पाच जॉब असेल. तुम्हाला आधीच तुम्ही काय करु शकता याचा अंदाज असणे गरजेचे आहे. तुम्हाला आवडणाऱ्या जॉबसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी तुमच्याकडे आहेत का? याचा विचार करुन मगच योग्य निर्णय घ्या.

    Career counselling ची मदत: सध्याच्या काळात दररोज नव्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हे करू की ते करू असा गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मतावर ठाम नसता अशा वेळी प्रोफेशनल मदत घेणे योग्य राहते. एक चांगला करिअर काऊन्सिलर तुमच्या आवडी-निवडी, गरजा आणि तुमचे मार्क्स या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुमच्यासाठी बेस्ट काय असेल याबद्दल सल्ला देतो. 

    स्वतःला कामात चॅलेंज करत राहा: जर तुम्हाला तुमचे काम कायमस्वरुपी आवडत राहावे असे वाटत असेल, तर तुम्ही सतत स्वतःला चॅलेंज करत राहणे गरजेचे आहे, तुम्ही दररोज एकसारखेच काम करत राहाल, तर नक्कीच एक दिवस तुम्हाला कंटाळा येईल आणि ते काम तुम्हाला नकोसे वाटेल. म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. जर दररोज काही नवे करणे शक्य नसेल, तर स्वतःसाठी काही गोल्स सेट करा, ज्यामुळे कामात तुमचा उत्साह टिकून राहील आणि तुम्ही यशस्वी होण्याकरिता अतिरिक्त मेहनत करत राहाल.

    मित्रांनो दहावी, बारावी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर निवडलेली वाटच पुढे आपलं करिअर घडवण्यात मोलाची ठरते. बऱ्याचदा आपण ऐकीव माहितीवरून फील्ड निवडतो. हा निर्णय कधी योग्य ठरतो, तर कधी अयोग्य. त्यामुळे केवळ ऐकीव माहितीवरुन फील्ड निवडण्याऐवजी वरील मुद्यांचा विचार करून योग्य पद्धतीने निर्णय घेणं जास्त महत्त्वाचे ठरते.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

    Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी

  • जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

    जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

    आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल! 

    “बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष  वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.

    Bertha Benz & Karl Benz

    कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.

    कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.

    Benz Patent Motorwagen

    जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का?  इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.

    आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.

    जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले  ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.

    Bertha Benz and the first road trip in history

    Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.

    1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे  वेगळं सांगायलाच नको.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • Pivot स्टार्टअपसाठी : यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची पायरी

    Pivot स्टार्टअपसाठी : यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची पायरी

    Pivot – सोमवारची सकाळ, दरवेळेस प्रमाणे सुरेशला याही सोमवारी एका महत्त्वाच्या Meeting साठी जायला उशीर झालेला आहे. सुरेश गाडी काढतो आणि रोजच्या रस्त्याने निघतो, पण जाता जाता अलीकडेच त्याच्या लक्षात येतं की Traffic मुळे आपल्याला पोहचायला खूप वेळ लागेल. काय करावं काही सुचत नसतं. Traffic मध्ये थांबलो तर उशीर होणार हे फिक्स आणि उशिरा पोहचलो, तर डील ब्रेक होणार हे फिक्स! अशा द्विधा मनःस्थितीत असताना सुरेशला अचानक लक्षात येतं की अलीकडूनच एक छोटा रस्ता आहे. ठरवलेल्या रस्त्याने जाण्यापेक्षा इकडून गेलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल. सुरेश लगेच गाडीचा Reverse Gear टाकतो, शक्य होईल तितक्या लवकर गंतव्य ठिकाणी पोहचतो, Meeting होते आणि शेवटी डील पक्की होते.

    स्टार्टअप विश्वच्या लेखात हे काय? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. जरा धीर धरा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हळूहळू मिळतीलच. मित्रांनो, व्यवसाय आणि आपलं रोजचं जगणं काही वेगवेगळं नाही हे आत्तापर्यंत आपण अनेक लेखांत वेगवेगळ्या उदाहरणांसोबत पाहिलं. आता वरच्या उदाहरणाप्रमाणे सुरेशला एका महत्त्वाच्या कामाच्या वेळेस नेमका अडथळा आला. आपलं काम आता होईल का? या चिंतेत असतानाच त्याने ठरवलेल्या रोजच्या मार्गाने जाण्याऐवजी एक वेगळा मार्ग निवडला आणि शेवटी तो ते काम करण्यात यशस्वी झाला. सुरेशच्या जीवनात जे काही घडलं तेच आता आपण एका स्टार्टअप फाउंडरच्या संदर्भात पाहूया.

    एक फाउंडर अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर आपला स्टार्टअप उभा करतो. त्यासाठी लागणारे पैसे, टीम हे सगळं तो व्यवस्थितरीत्या Manage करतो. सगळं होतं कामाला सुरुवात होते, पण पाहिजे तेवढा Profit त्याला त्यातून मिळत नाही. खूप विचार करून शेवटी तो ठरवतो की स्टार्टअपची ही आयडिया Scrap करून आपण एका नव्या कल्पनेवर काम सुरु करूया. ठरवलेल्या गोष्टीतला तोटा लक्षात घेऊन ती गोष्ट सोडून नफा मिळवून देणाऱ्या गोष्टीवर काम सुरु करण्यालाच स्टार्टअप विश्वात Pivot असं म्हणतात.   

    Pivot हे कोणत्याही बाबतीत असू शकतं म्हणजे दरवेळेस असं नाही की एखादी पूर्ण कल्पनाच बदलणं म्हणजे Pivot करणं. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणकोणते ते पण आपण जरा पाहूया.

    Pivot चे प्रकार

    Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने Lean Startup या पुस्तकात Pivot चे दहा प्रकार सांगितले आहेत.

    Zoom-in : समजा तुमचं एक Product आहे. त्या Product मध्ये खूप सारे Features आहेत, पण User Reports नुसार तुमच्या लक्षात आलं की, यापैकी एकाच Feature चा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मग तुम्ही ठरवता की सगळे Feature ठेवण्यापेक्षा फक्त एकाच Feature वर Focus करूया आणि तेच तुमचं Final Product बनतं. याच Process ला Zoom-in Pivot असं म्हणतात.

    Zoom-out : Zoom-In Pivot च्या अगदी विरुद्ध Process म्हणजे Zoom-Out Pivot. यात सुरुवातीला तुमच्या Product मध्ये एकच Feature असतं, पण हळू हळू तुम्ही त्यात वेगेवगळे Features Add करता आणि तेच तुमचं Main Product बनतं.

    Customer segment pivot : तुमचं Product हे त्या लोकांना आवडतंय ज्यांना तुम्ही Target केलेलंच नाही, मग अशा वेळेस करणार काय? तर तुमचा जो Target Audience आहे तो बदलणं गरजेचं आहे म्हणजे Customer Segment Pivot करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा Profit वाढेल.

    Customer Need Pivot : तुम्ही बनवलेलं तुमचं Dream Product हे Customer ला आवडेलच याची काही Gurantee नसते. आणि Customer ला पाहिजे असलेल्या गोष्टी तुम्ही Provide करत नसाल, तर Profit चा आणि तुमचा कधी संबंधच येणार नाही. मग अशावेळी काय करणार तर Customer च्या गरजेनुसार तुम्ही तुमचं Product बदलू शकता म्हणजेच Customer Need Pivot करू शकता.

    Platform Pivot : App ला वेबसाईटमध्ये Convert करणं किंवा याउलट वेबसाईटला App मध्ये Convert करणं या गोष्टी त्यामध्ये येतात. यामध्ये तुम्ही तुमच्या Product चा Platform च Change करत असता. 

    या महत्त्वाच्या पाच प्रकारांसोबत Pivot चे आणखी काही प्रकार आहेत. जसं की Business Architecture , Value Capture, Engine of Growth, Channel आणि Technology Pivot.

    Pivot म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणकोणते? हे आपण पाहिलं. आता ही Term आपण एका उदाहरणाने समजून घेऊया.

    Burbn या Location Based Check-in App विषयी तुम्ही कधी ऐकलं आहे का? कसं काय ऐकणार सुरुवातीच्या काळातच त्यांनी Pivot केलं आणि ते Photo-Video Posting, Comments, Like, Share च्या दुनियेत शिरले In Short Social Media Platform म्हणून त्यांची कंपनी उदयास आली सुरुवातीच्या काळातच तोट्यात असणारी ही कंपनी आता अख्ख्या जगभरात Profitable असणाऱ्या कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. ही Profitable कंपनी म्हणजे Instagram. Instagram सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना करावा लागला, पण वेळेवर Pivot केल्याने त्या नंतरच्या काळात तितक्याच यशस्वीसुद्धा ठरल्या.

    तर मित्रांनो आजचा हा स्टार्टअप विश्वाचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहचवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि Interesting गोष्टींसाठी नवी अर्थक्रांतीच्या दररोज वेबसाईटला भेट देत चला.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?

    स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?

    Pitch Deck – मित्रांनो आजपर्यंत आपण स्टार्टअप विश्वाच्या भागात वेगवेगळ्या terms पाहिल्या. यातल्या बराचशा गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील किंवा काही आधीपासून माहितीही असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून ही series पाहत असाल, तर नक्कीच तुमच्या डोक्यात स्टार्टअपची एखादी तरी कल्पना शिजली असेल. काही जणांनी ती प्रत्येक्षात उतरवलीसुद्धा असेल. पण कसंय, कल्पना वगैरे सगळं ठीके ओ! ती कल्पना सत्यात उतरवायला किती पैसे लागतात याचा एकदा हिशोब काढला ना की, वाटतं जाऊ दे… कोणी सांगितलेत एवढे पैसे घालायला? त्यापेक्षा आपलं रोजचं कामच बरंय! पण सगळेच काही असा विचार करत नाहीत बरं का! काहीजण असतात खतरों के खिलाड़ी; रिस्क घ्यायला तयार असतात.

    सुरुवातीला स्वतःचे पैसे घालवून, family कडून, मित्रांकडून पैसे घेऊन ते एकदाचा स्टार्टअप सुरु करतात, पण अजून growth करण्यासाठी अजून पैसे हवे असतात; सगळी गडबड होते ती इथं! डायरेक्ट एखाद्याकडे पैसे मागायला गेलं, तर कोणी पैसे देत नाही… तोंडी व्यवहाराला काही व्हॅल्यू नसते. Pitch Deck बद्दल त्यांनी कधी ऐकलेलंच नसतं; ऐकलं असेल तरी त्यात करायचंय काय हे त्यांना माहिती नसतं. तुम्हाला माहितीये का? असेल तर चांगलंच आहे आणि नसेल तर त्याहून चांगलंय; कारण आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. चला मग करूया सुरुवात.

    Pitch deck / startup deck / slide deck म्हणजे काय तर तुमच्या कंपनीबद्दलचं असं एक presentation जे तुम्ही investors ला दाखवता. त्या presentation च्या आधारावरच investors  ठरवतात की तुमच्या कंपनीत investment करायची का नाही ते. हे ऐकून तुमच्या डोक्यात काही तरी आलं असेल; आलं ना? बरोबर Shark Tank. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या show मध्ये वेगवेगळे founders यायचे आणि तिथल्या Sharks ना त्यांच्या कंपनीबाबत pitch करायचे. मग Sharks ना जर ते सगळे मुद्दे पटले, काही तरी interesting वाटलं तरंच ते त्यात investment करायचे. यासाठी एक साधं, सरळ, Concise Pitch Deck बनवणं हे खूप गरजेचं असतं, कारण याचाच फायदा तुम्हाला Funding raise करण्यासाठी होतो.

    Slide 1: Problem

    कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात होते एका problem पासून. म्हणजे लोक त्यांच्या रोजच्या जीवनात काय problems face करतायेत आणि तुम्ही त्या problem कडे कसं पाहताय हे येणार first slide मध्ये. उदाहरणार्थ, लोकांना जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असायचं, तेव्हा त्यांना कधी कधी वेळेवर रिक्षा मिळायच्या तर कधी कधी तासनतास थांबून सुद्धा एकही रिक्षा मिळत नसायची. हा झाला Problem जो लोक face करत होते.

    Slide 2: Solution

    आता तुम्ही त्या problem वर काय solution देताय हे येणार second slide वर. पहिल्या उदाहरणाला जर continue करायचं ठरवलं, तर यावरचं solution काढलं Ola ने. 

    Slide 3: Market

    तुमच्या या solution ला market मध्ये किती value आहे हे येणार third slide वर. तुमचं जे market आहे त्याची size किती आहे, तुमचा target audience कोणता आहे? या सगळ्या गोष्टी इथं येतील.

    Slide 4: Business model

    तुमच्या business चं model कसं असणार आहे ते सगळं fourth slide वर येईल. आता Business model म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? हे सगळं आम्ही आधीच एका लेखा मध्ये cover केलेलं आहे. वेळ काढून तो लेख नक्की पहा. अगदी थोडक्यात सांगायचं तर, बिझनेसमध्ये तुम्ही काय विकणार आणि त्यातून पैसे कसे येणार आहेत ते इथं सांगायचं आहे. 

    Slide 5: Competitive Advantage किंवा USP

    आता, तुम्हाला सुचलेली Business Idea ही कदाचित आधीही कोणाला तरी सुचलीच असेल, तशीच सर्व्हिस देणारे किंवा सेम प्रोडक्ट विकणारे हजारो जण मार्केट मध्ये असतील, पण त्यातही ती idea तुम्ही कशा वेगळ्या पद्धतीने मांडणार आहात आणि बाकीच्यांपेक्षा तुम्ही कसे  वेगळे आहात हे इथं explain करायचं आहे.

    Slide 6: Marketing and sales strategy

    कोणत्याही product ला जर मार्केटमध्ये आणायचं असेल, तर त्यासाठी काहीतरी strategy plan करावी लागेल आणि याबद्दल In detail माहिती हवी असेल, तर तुम्हाला आधी Go-to-market strategy चा लेख बघावा लागेल. बघा मग लवकर कशाला वेळ घालवताय?

    Slide 7: Team

    प्रत्येक startup ला grow करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती team. तुमच्या team मध्ये कोण कोण आहे, त्यांच्या expertise काय आहेत, त्यांचे key roles काय आहेत. हे सगळं येणार या slide मध्ये.

    Slide 8: Financials

    यामध्ये तुम्हाला तुमच्या startup चा revenue, expenses आणि cash flow असं सगळं explain करायचं आहे. त्याचसोबत तुम्ही याआधी काही fundraising केली आहे का? किंवा त्याबाबत तुमचे future मध्ये काही plans आहेत का? हेसुद्धा सगळं सांगायचं आहे.

    Slide 9: Milestones and timeline

    याआधी तुमच्या Startup ने काही milestones achieve केले आहेत का? म्हणजे पहिले १०००, १० हजार किंवा लाख product कधी sale झाले, नवीन ऑफिस कधी सुरु झालं वगैरे त्याची timeline काय आहे? हे सगळं येईल या slide वर.

    Slide 10 Ask

    Finally आता सांगायचं आहे की तुम्हाला किती रुपयांची गरज आहे? ते पैसे कुठे, किती, कसे खर्च होणार आहेत आणि या पैशांच्या बदल्यात तुम्ही इन्व्हेस्टरला किती percent equity देणार आहात.

    आपण ज्याप्रमाणे या slides पाहिल्या अगदी त्याचप्रमाणे त्यांचा sequence असावा असा काहीही नियम नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा sequence change करू शकता किंवा काही points सुद्धा बदलू शकता. बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेख like आणि share करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • Minimal Viable Product तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत करणारा एक शक्तिशाली साधन

    Minimal Viable Product तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत करणारा एक शक्तिशाली साधन

    नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, होईल या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी झाल्या ना; यापैकी अजून एकही गोष्ट झालेली नाही, हे सगळं तुम्हाला सध्या फक्त वाटतंय. यातल्या गोष्टी खऱ्या ठरण्यासाठी तुम्हाला वर्तमानात यावं लागेल, म्हणजे आधी तुम्हाला तुमचं Product Launch करावं लागेल. तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. याच Product बद्दल म्हणजेच Minimal Viable Product बद्दल. चला मग करूया सुरुवात.

    What is MVP (Minimal Viable Product)?

    MVP किंवा Minimal Viable Product म्हणजे असं एक Basic Product की ज्यामध्ये तुमच्या Final Product मध्ये असणारे सगळे Main Features आहेत, पण ते इतकंही परफेक्ट नाहीये की, ते तुमच्या Final Product शी Compete करू शकेल बर हे समजून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या App चं उदाहरण पाहूया WhatsApp चं! तुम्हाला आठवतंय का जेव्हा WhatsApp launch झालं होतं, तेव्हा त्यात फक्त दोनच Features होते. Text Messaging आणि Voice Messaging. हे ते Features होते जे की Normal Users पर्यंत वापरण्यासाठी आले होते. पण त्याहीआधी WhatsApp ने त्यांचं Minimal Viable Product बनवलं होतं जे की काही लोकांनाच वापरण्यासाठी मिळालं होतं आणि त्या Version मध्ये फक्त एक महत्वाचं feature होतं ते म्हणजे Text Messaging चं! जेव्हा WhatsApp ला समजलं की आपलं हे MVP लोकांना आवडतंय, तेव्हाच त्यांनी यावर आणखी काम करायला सुरुवात केली.

    MVP launch करण्यामागची कारणं

    Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने MVP या concept चा शोध लावला. MVP का launch केलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांनी तीन महत्त्वाची कारणं सांगितली.

    १. पहिलं कारण म्हणजे MVP मुळे तुमचं जे Dream Product आहे, ते लवकरात लवकर Market मध्ये उतरवता येतं.

    २. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला हे समजतं की Customer तुमच्या Product ला कसं React करतायेत. तुम्हाला जसं वाटलं होतं, तसं ते Actually काही Value Generate करतंय का? हे समजायला मदत होते.

    ३. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या वेळेचा आणि पैशाचा खर्च कमी होतो. आता MVP असल्यामुळं साहजिक आहे Final Product च्या Comparison मध्ये याला बनवायला कमी वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे जर तुम्ही एखादं Product मोठ्या Scale वर Launch केलं, पण ते लोकांना आवडलंच नाही तर यात नुकसान कोणाचं आहे? तुमचं! पण जर हेच Product तुम्ही MVP च्या रुपात Launch केलं आणि लोकांना ते नाही आवडलं, तर आधीच्या तुलनेत इथं होणार नुकसान हे खूप कमी  आहे. बघा आहे का नाही Double फायदा?

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान

    Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान

    Agro Tourism – सिमेंटच्या शहरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, बेसुमार औद्योगिकरण आणि वाढत जाणारे प्रदूषण यामळे शहरं बकाल होत आहेत. मोठ्या प्रमाणावर गावागावातील लोक शहराकडे नोकरीसाठी येत आहेत. ज्यामुळे शहरांमध्ये गर्दी वाढत आहे. अशावेळी या गर्दीला गरजेचा असतो मोकळा श्वास आणि एक विरंगुळ्याची जागा.

    यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला सगळे जात असतात प्रेक्षणीय किंवा रम्य ठिकाणी जिथे आपल्या कुटुंबासोबत त्यांना निवांत वेळ घालवता येईल आणि रोजच्या जेवणापेक्षा छान, वेगळं काहीतरी खाता येईल. लोक हे पर्यटन नेमके कशासाठी करतात. त्यांचं स्वतःचं शहर सोडून, देश सोडून का जातात पर्यटनाला. तर Enjoy करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी. सुट्टीचा दिवस आनंदात घालता यावा, एक नवीन अनुभव मिळावा म्हणून.

    असं म्हणतात “गरज हीच शोधाची जननी” आणि नेमकी हीच गरज ओळखून आपण आपल्या उद्योगाला सुरुवात करू शकतो. कृषी या विषयाचा तुम्हाला गंध असेल किंवा मूळातच शेती हा तुमचा व्यवसाय असेल, तर शेती करत करत किंवा अगदी पूर्णवेळ उद्योग म्हणून “Agro Tourism” म्हणजेच “कृषी पर्यटन” या व्यवसायाकडे बघू शकता.

    नेमके हे कृषी पर्यटन म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. शहरात राहात असताना अनेकांना ग्रामीण जीवनाबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्यांचे राहणीमान, शेती, शेतीचे व्यवस्थापन, पशुपालन, गावरान भोजन आणि निसर्गरम्य वातावरण याबद्दल प्रचंड आकर्षण असते. धकाधकीच्या जीवनातून एक दिवस हे सर्व याची देही, याची डोळा अनुभवता यावे यासाठी लोक कृषी पर्यटन करतात. हे निव्वळ पर्यटन नाही तर एक प्रकारचे संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा उपक्रम आहे.

    तुम्हाला माहित आहे का की भारतामध्ये Travel आणि Tourism industry ही Service Sector मधील सर्वात मोठ्या Industry पैकी एक आहे. २०१८ साली भारतामध्ये Travel आणि Tourism Industry हि २३४ बिलियन डॉलरची होती. २०१९ मध्ये देशातील एकूण Jobs पैकी ८% Jobs हे या Industry ने देशाला दिले होते. भारतामध्ये दर वर्षी करोडो लोक पर्यटनाला जातात. इतकंच नाही तर अनेकी लोक दरवर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात. भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत, ज्यांना करोडो लोक दरवर्षी भेट देतात.

    या कृषी पर्यटनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो? तर त्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धत आणि तिचे महत्त्व, पशुपालन पद्धत, चुलीवरच्या जेवणाची पद्धत तसेच बैलगाडी, घोडागाडी, घोड्याची सवारी, कुकुटपालन आणि नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती व महत्त्व अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे किंवा शेत जमीन. त्यावर इतर गोष्टी तुम्ही विकसित करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा हा प्रकल्प उभा करणार आहात. त्या ठिकाणी जवळच असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊन त्याचाही वापर तुम्ही यासाठी करू शकता.

    तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा व्यवसाय उभा करू शकता. यासाठी भेट देणाऱ्या लोकांसाठी ठराविक तिकीट रक्कम तसेच ग्रुपसाठी काही खास ग्रुप बुकिंग सवलत आणि विध्यार्थ्यांसाठी किंवा शालेय सहलींसाठी खास ऑफर ठेऊ शकतो. अशापद्धतीने शेती सांभाळत पर्यटन हा उद्योग खास करून शेतकऱ्यांना एक नवी आर्थिक उभारी देऊ शकतो. तसेच या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी आपण जागरूकता निर्माण करू शकतो.

    या संकल्पनेविषयी तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.


    आणखी वाचा