Category: उद्योजकता

  • यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

    यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

    मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे, जिने प्रत्येकाला फोन वापरण्याची सवय लावली होती. ही रिलायन्स कंपनी आज भारतातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनीही आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही १११ बिलियन डॉलर्स एवढी आहे. एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधी-अब्जो रुपये एका दिवसात किंवा एका रात्रीत कमावले जात नाहीत. यामागे त्यांचे वडील स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांची कठोर मेहनत राहिली आहे. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. तसं पाहिलं, तर मुकेश अंबानींना हा व्यवसाय वारशात मिळाला आहे, पण त्यांनीही आपलं डोकं लावून आणि कठोर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून यशस्वी बनण्याच्या त्यांच्या ५ नियमांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हीही बिझनेस किंग बनू शकता.

    यशस्वी बनण्यासाठी मुकेश अंबानींचे ५ नियम (Mukesh Ambani’s 5 rules to success)


    १. धैर्यवान बना

    मुकेश अंबानी यांनी यशस्वी बनण्यासाठी सांगितलेला पहिला नियम म्हणजे धैर्यवान बना. व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात धैर्याशिवाय कोणीही मोठे यश मिळवले नाहीये. अर्थातच, तुम्ही एखादी मोठी गोष्ट करायला जाता, तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटते. मात्र, तुमच्यात दडलेला नायक शोधण्यासाठी तुम्हाला भीतीवर विजय मिळवावाच लागेल. धैर्याने, आत्मविश्वासाने कोणत्याही संकटावर मात करू शकता.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    २. समस्या शोधा आणि त्यावर तोडगा काढा

    अंबानींचा दुसरा नियम असा की, एक उद्योजक म्हणून, तुम्हाला ज्या समस्येचे निराकरण करायचे आहे ती शोधणे खूप महत्वाचे आहे. अंबानी सांगतात, ममला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मध्ये प्रोफेसर शर्मा मिळाल्याने मी धन्य झालो. ते नेहमी म्हणायचे की, मी तुम्हाला समस्यांची यादी देणार नाही. तुम्ही जाऊन कोणत्याही गोष्टीवर काम करू शकता. तुम्हाला एखादी समस्या सापडेल आणि मग तुम्हाला सापडलेल्या समस्येच्या आणि त्यावर शोधलेल्या निराकरणाच्या गुणवत्तेवर मी तुम्हाला ग्रेड देईन. त्यामुळे उद्योजकाला हेच नियम लागू होतात की, तो समस्या सोडवत नाही, तर तो प्रथम समस्या शोधतो. एकदा तुम्हाला समस्या सापडली की, तुम्ही ती सोडवता.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ३. कठोर मेहनत करा

    अंबानी म्हणतात, तुमचे धावण्याचे शूज घाला, परंतु लक्षात ठेवा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश हे स्प्रिंट (Sprint) नसून एक मॅरेथॉन आहे. आपण एका गतिमान जगात राहत असल्याने भाग्यवान आहोत, जिथे काहीही शक्य आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, असे रातोरात यश मिळत नाही. तुम्हाला समर्पित व्हावे लागेल. एकल मनाने राहावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागेल. यातील कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही. तसेच, हेही लक्षात ठेवा की, जीवनाच्या या मॅरेथॉनमध्ये आपले ध्येय साध्य करणे महत्वाचे आहे.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ४. उच्च उद्देशाची सेवा करा

    वडील धीरूभाई अंबानी यांनी १०० डॉलर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुरू केल्याचे मुकेश अंबानी सांगतात. ते म्हणतात, १९८० मध्ये जेव्हा मी व्यवसाय जॉईन केला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य हे ३० किंवा ४० दशलक्ष डॉलर्स होते. पुढच्या ३० वर्षात, या देशाने दिलेल्या संधींमुळे आम्हाला भारतासाठी संपत्ती निर्माण करता आली.

    माझ्या वडिलांचा मोठा विश्वास होता की, कोणताही व्यवसाय ज्याचा एकमेव उद्देश पैसा कमविणे हा आहे तो करणे योग्य नाही. खरं तर, व्यवसाय हा एक मोठा सामाजिक हेतू पूर्ण केला पाहिजे. रिलायन्सने आपले सर्व पैसे भांडवली बाजारातून आणि वैयक्तिक लहान भागधारकांकडून उभे केले, म्हणून आम्ही सामान्य भारतीयांपैकी फक्त रिलायन्समध्ये गुंतवणूक करून दहा लाख करोडपती निर्माण केले आहेत आणि हीच देशासाठी संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संधी निर्माण झाली की संपत्ती ही येतेच.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ५. अपयश स्वीकारा

    अंबानी असेही म्हणतात की, अपयश हे सामान्य असते. सर्व यश पाहून, माझ्या स्वतःच्या बाबतीतही लोक हे पाहत नाहीत की, यशस्वी होण्यापूर्वी मी किती वेळा अयशस्वी झालो आहे. तुम्ही यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहात. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. त्याच्याकडून शिका, पण हार मानू नका.

    आणखी वाचा

  • प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना करतो ‘या’ 7 Common चुका, पण तुम्ही चुकू नका; वाचा

    प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना करतो ‘या’ 7 Common चुका, पण तुम्ही चुकू नका; वाचा

    १. पात्र उमेदवार

    हे जग वेगाने पुढे जात आहे. जगात अनेक लोक आहेत आणि त्यांच्यासाठी कधीही न संपणारे इंटरनेट कनेक्शनही आहे. अशात तुम्हाला वाटते की, नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला पात्र उमेदवार सापडतील. मात्र, दुर्दैवाने असे नसते. पात्र उमेदवार शोधणे हे तितकेच आव्हानात्मक असू शकते. तसेच, तुम्हाला पात्र उमेदवार जरी मिळाला, तरीही त्याच्या कामाची पद्धत, त्याची मूल्ये आणि इतर गोष्टी आवडतीलच असे होत नाही.

    Difficult to find out right candidate

    त्यामुळे नवीन स्टार्टअप आणि प्रस्थापित व्यवसायांसह पात्र उमेदवारांना जोडण्यासाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या जॉब पोर्टल साइट्सचा वापर केल्याने तुम्ही फक्त आवश्यक पात्रता असलेल्यांचीच मुलाखत घेत आहात, याची खात्री करू शकता. इंटरनेट तुमच्या निवडी कमी करण्यासाठी अनेक उत्तम साधने ऑफर करत असताना तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.

    २. एचआर आणि पगार

    स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एचआर विभाग आणि त्याचे सर्व पैलू हाताळणे, यामुळे संपूर्ण स्टार्टअप प्रक्रियेत अतिरिक्त ताण आणि चिंता वाढवू शकते. त्यामुळे, तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे. तुमच्यासाठी फक्त तुमच्या ब्रँडची प्रतिमा आणि मूल्यांवर काम करणे, नवीन कर्मचारी नियुक्त करणे, दुकान सुरू करणे आणि आपल्या ग्राहकांचा शोध घेणे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एचआर विभाग स्थापन करणे.

    HR And Payroll

    हा अधिकचा ताण टाळण्यासाठी, काही व्यवसाय एचआर विभाग हाताळण्यासाठी पीईओ (Professional Employer Organization) सेवा निवडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम PEO कंपन्यांपैकी एक निवडता, तेव्हा तुमच्या सर्व HR संबंधी गरजांची काळजी घेतली जाते. यामुळे होतं असं की, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

    ३. वाढती स्पर्धा

    सध्याच्या जगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामागील कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे वेब. वेब पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांना जोडत असल्याने स्पर्धा वाढली आहे. नवीन व्यवसायांना त्यांच्या उद्योगांमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये सारखाच व्यवसाय करणारे सुस्थापित व्यावसायिक आधीच मोठ्या संख्येने ग्राहकांचे नेतृत्व करतात. तसेच, आपली प्रतिष्ठाही निर्माण करतात. अनेकदा काही व्यवसाय मालक या आव्हानामुळे भारावून जातात, परंतु याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहण्याऐवजी, वाढ होण्याची संधी म्हणून पाहा. स्पर्धेचा अभ्यास केल्याने, बाजार आणि तुमच्या भावी ग्राहकांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.

    Competation In Business

    ४. मार्केटिंगसाठी कष्ट न घेणे

    मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या आत्मा आहे. कारण, यामुळेच नवीन ग्राहक तुमच्या स्टोअर किंवा वेबसाइटवर येतात. तसेच, तुमच्या ब्रँडची दृश्यमानता (Visibility) वाढवते आणि तुम्ही ज्या उद्योगात काम करत आहात, त्या उद्योगाचा एक प्रतिष्ठित भाग म्हणून तुमचा व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगसाठी संघर्ष करतात. कारण, त्यांच्याकडे पेरोलवर कोणीही नसते, ज्यामुळे त्यांना कळेल की, ते काय करत आहेत. मार्केटिंग किंवा SEO तज्ञ हा नवीन व्यवसायाचा व्यावहारिकदृष्ट्या एक आवश्यक घटक आहे. कारण, चांगल्या मार्केटिंगशिवाय, आपल्या उत्कृष्ट उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल कोणालाही माहिती होणार नाही.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    तुम्ही जर मार्केटिंगमध्ये संघर्ष करत असाल, तर थर्ड पार्टी फर्म किंवा SEO तज्ञ नियुक्त केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसायाला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच, ते सातत्याने तुमच्याकडे येत राहतील.

    ५. निधी (फंडिंग)

    खरं तर, अनेक व्यवसाय असे असतात, ज्यांना पुरेसा निधी कधीच मिळत नाही, मिळतो का? दररोज किंवा आठवड्याला आपल्याकडे कल्पना येतात, त्यापैकी काहींवर आपण कृती करतो आणि इतर काही बॅकअपमध्ये अशा वेळेसाठी ठेवतो, जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा, अधिक वेळ किंवा स्पष्टता असते. अनेक स्टार्टअप्सना निधीच्या कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि काहींना मर्यादित बजेटमुळे काही उत्पादने आणि सेवाही मिळतात.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    निधी कधीही पुरेसा पुरवठा करत नाही, परंतु स्टार्टअप आणि स्थापित व्यवसायांसाठी बरेच पर्याय असतात. नवीन स्टार्टअपसाठी एंजेल गुंतवणूकदार, बँक कर्ज आणि नेहमीच लोकप्रिय क्राऊड-फंडिंग यांसारखे काही पर्याय आहेत. गुंतवणूकीसाठी पैसे कर्ज म्हणून घेण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या निधीच्या अटींची चांगली जाणीव आहे, याची खात्री जरूर करा.

    ६. वेळेचे खराब नियोजन

    नवीन व्यवसाय जेव्हाही सुरू करतात, तेव्हा व्यवसाय मालक एक सामान्य चूक नक्कीच करतात. ती म्हणजे, त्यांना वाटते की, ते संपूर्ण व्यवसाय स्वत: व्यवस्थापित करू शकतात. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून इतरांवर विश्वास ठेवणे, अर्थातच कठीण काम आहे. तुमच्या व्यवसायाचे यश हे थेट तुमच्या वैयक्तिक यशाशी जोडलेले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्येकजण चांगला व्यवस्थापक नसतो. काही लोक जरी कल्पना, वित्त किंवा मार्केटिंगमध्ये उत्कृष्ट असले, तरीही व्यवसाय व्यवस्थापित करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संघर्ष होत असल्यास, तुम्हाला तो चालवण्यात मदत करण्यासाठी कोणालातरी कामावर घेणे, यात कसलीही लाज नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या व्यक्तीला, ज्याला व्यवस्थापन प्रक्रियेसाठी योग्य कौशल्ये माहिती आहेत, अशा व्यक्तीला व्यावसायिक भागीदार बनवण्यात कोणतीही अडचण नाही.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    ७. संवाद

    नवीन स्टार्टअप म्हणजे एका कॉर्पोरेट छताखाली काम करणारी पूर्णपणे नवीन टीम असू शकते. अगदी उत्तम परिस्थितीतही संवाद आव्हानात्मक बनू शकतो. नवीन लोकांशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु व्यवसायाच्या निरंतर यशासाठी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन चॅट रूमसह एक संघ व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेट करा, जेणेकरून व्यवसायातील प्रत्येकजण सहजपणे एकमेकांशी संपर्क साधू शकेल, फायली शेअर करू शकेल आणि त्यातूनच कामांचे वाटपही करू शकेल.

    These 7 Startup Mistakes Everyone Makes But You Can Fix

    तर मित्रांनो, आता व्यवसायात उतरताना किंवा उतरला असाल, तर तुम्ही या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढू शकता.

  • इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

    इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

    विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला डिश वॉशर म्हणून काम करायचे. हे काम करत असताना सतत त्यांना वाटायचं की, आपलं स्वतःचं एक हॉटेल असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, रात्रंदिवस काम केले आणि अखेरीस 1952 मध्ये त्यांनी सत्कार हे पहिले हॉटेल उभे केले. हे हॉटेल उभे करण्यासाठी व्यंकटेश कामत यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि व्यवसायाची उभारणी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. धंद्यात यश येऊ लागलं. सगळं काही आनंदात चालू होत. या अश्या आनंदाच्या वातावरणातच 1956 साली विठ्ठल कामत यांचा जन्म झाला. लहानपणापासून विठ्ठल कामत अभ्यासात हुशार होते, नवीन गोष्टी करण्यात त्यांना रस होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या विठ्ठल यांनी 1973 साली मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

    विठ्ठल यांच्या आईला नेहमी वाटायचं की, त्यांनी वडिलांना हॉटेलमध्येच मदत करावी, मात्र त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्यांनी इंजीनियरिंगची पदवी मिळवली. इकडे वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. वडिलांनी दोन चांगली हॉटेल उभी केली होती. मात्र अपयशाशिवाय यश मोठं वाटत नाही म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, संकटं ही येतच असतात, जवळच्याच एका व्यक्तीने फसवणूक करून विठ्ठल यांच्या वडिलांचे हॉटेल हिसकावले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अश्यावेळी त्यांच्याकडे असलेले दुसरे म्हणजेच सत्कार हॉटेलही असेच लुबाडले जाईल, या भीतीने विठ्ठल यांनी वडीलांसोबत काम करायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आवडला. हेच होते विठ्ठल यांचे हॉटेल व्यवसायातले पहिले पाऊल. व्यवसाय कसा वाढेल यासाठी विठ्ठल काम करू लागले. त्यांनी मुंबईत ‘विठ्ठल कामत’ या नावाने अनेक हॉटेल्सची साखळीच उभी केली.

    The orchid hotel pune

    त्यांनी इतकं अफाट यश मिळवलं खरं पण ‘ऑर्किड’ च्या उभारणीवेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा देखील बलाढ्य डोंगर उभा राहिला. या कर्जाच्या ओझ्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. तब्बल 282 कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाढलं होतं. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या ते खचले होते, आता पुढे काय होईल? पैश्यांची जोडणी कशी करता येईल? या विचाराने ते बैचेन झाले होते आणि अशातच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले, मात्र एका दृश्यामुळे त्यांना संकटांना हरवण्याची प्रेरणा मिळाली. एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावर एक पेंटर काहीही सुरक्षाकवच नसताना भिंत रंगवत होता आणि भिंत रंगवून झाल्यावर तो सुरक्षित खाली देखील उतरला, “जर तो पेंटर जीवघेणी जोखीम घेऊ शकतो तर मग मी नक्कीच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.” या विचाराने त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि शेवटी संकटांना हरवून दाखवले. 

    ही झाली विठ्ठल कामत यांची व्यावसायिक बाजू. पण विठ्ठल कामत हे एक बहुरंगी, बहुढंगी, बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पर्यावरणावर देखील खूप प्रेम. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसेच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्याचा मानस आहे. यासाठी ‘पाथरे गाव’ सारख्या डोंगराळ भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवण्यास सहाय्य केले. ६० लाखांहून अधिक झाडे लावली. १०० पेक्षा जास्त टेकड्यांचे त्यांनी औषधी आणि स्थानिक झाडांमध्ये रुपांतर केले. पक्षीशास्त्रज्ञाच्या पेशाने त्यांनी ‘ऑर्किड’ हॉटेल जवळ पोपट गल्ली देखील तयार केली. तिथे नानाविविध प्रकारचे  पोपट, इतर काही पक्षी पाहायला मिळतात, त्याबरोबर ओडिसा येथील “चिल्का सरोवर” येथे डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर”ची स्थापना केली. ऑर्किड हॉटेल, मुंबई आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय देखील त्यांनी उभे केले. तिथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पूरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी करून दाखवला.

    The Orchid Jamnagar

    विठ्ठल कामत यांचा हॉटेल व्यवसाय आज संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांना आजवर ११० हून  अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार,  राजीव गांधी पुरस्कार, २०१२ मध्ये जर्मनचा जीवनगौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विठ्ठल कामत हे  ‘हॉटेल आणि रेस्टॉरेट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले काम करतात.

    हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो किंवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं, परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोकं उद्योजक बनण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. अशांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेल्या वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ आणि यश, अपयश आणि मी  या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

    हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

    जन्म आणि कुटुंब

    मायकल डेल (Michael Dell) यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात झाला आहे. त्यांचे वडील अलेक्झांडर डेल, दातांचे डॉक्टर होते. तसेच, आई लंगफान या एक स्टॉक ब्रोकर होत्या. मायकल यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. आई-वडील दोघेही कमावते होते. त्यामुळे घरात पैशांची कसलीच कमतरता नव्हती. दुसरीकडे, मायकल हे बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. ते बालपणी इतर मुलांसारखे अजिबातच नव्हते. ते त्यांच्या जास्तीत जास्त वेळ काही ना काही शिकण्यात घालवत होते. मायकल यांचे प्राथमिक शिक्षण ह्यूस्टन शहरातील ‘हीरोड एलिमेंटरी स्कूल’मध्ये झाले होते. शिकत असतानाच मायकल यांनी आई-वडिलांकडून गुंतवणूक आणि व्यापाराचे सर्व गुण शिकून घेतले होते. बालपणापासूनच हे सर्व गुण शिकल्यानंतर मायकल यांचा व्यवसायाबद्दलचा रस आणखीच वाढला होता. त्यांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, जेव्हा ते १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून पॉकेट मनी मिळायची. हेच पैसे ते साठवू लागले होते.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    बालपणीपासून मायकल यांच्यात पैसे साठवण्याची धडपड असायची. त्यामुळेच त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहरात टपाल तिकिटांची विक्री सुरू केली होती. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, पैसे साठवण्याच्या चांगल्या सवयीमुळे त्यांनी अवघ्या १२ वर्षांच्या वयात २०००हून अधिक डॉलर्स साठवले होते.

    यशाचे पहिले पाऊल

    बालपणीपासून एक चांगला धडा घेतल्यामुळे मायकल डेल यांनी त्यांच्याजवळची संपूर्ण रक्कम मेटल्समध्ये गुंतवली. आयुष्यातील आपल्या पहिल्याच गुंतवणूकीतून मायकल यांना १८००० डॉलरचा फायदा झाला. तसेच, त्यांचे मनोबलही खूप वाढले. मायकल यांना इतक्या कमी वयात झालेला फायदा हा त्यांच्या वडिलांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही कित्येक पटींनी जास्त होता. मायकल लहान वयातच यशाच्या त्या टप्प्यावर होते, जिथे अनेक व्यावसायिकही पोहोचू शकत नाहीत. मायकलचा काम करण्याबद्दलचा रस पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न साकार करण्याचा विडा उचलला.

    बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात रस

    प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. तसंच काहीसं मायकल यांच्याविषयीही होतं. मायकल यांना बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात खूपच रस होता. यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी एक कम्प्यूटर खरेदी करून दिला. मात्र, मायकल यांनी कम्प्यूटर बाहेरून शिकण्याऐवजी त्याच्या आतमधील भागांविषयी शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या कम्प्यूटरचा एक-एक भाग वेगळा केला आणि आता त्यांना कम्प्यूटरचा प्रत्येक भाग व्यवस्थित दिसत होता.

    याच घटनेनंतर मायकल यांचे कम्प्यूटरविषयीचा रस आणखी वाढला आणि त्यांनी आपला अधिकतर वेळ कम्प्यूटरवर घालवण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे कम्प्यूटरचा प्रत्येक भाग चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका कंपनीचा कम्प्यूटर खरेदी केला. इथंही मायकल यांनी दुसऱ्या कम्प्यूटरसोबत तेच केले, जे आधीच्या कम्प्यूटरसोबत केले होते. नंतर त्यांनी त्या कम्प्यूटरचे सर्व भाग योग्यरीत्या कम्प्यूटरमध्ये लावले आणि पुन्हा त्या कम्प्यूटरला पहिल्यासारखे बनवले, जे खूपच चकित करणारे होते.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    कॉलेजमध्ये जुन्या पार्ट्सपासून बनवला कम्प्यूटर

    मायकल डेल जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्यांनी एकदा कम्प्यूटरशी संबंधित हार्डवेअर आणि त्याचे पार्ट्स एकत्र करून आपला स्वत:चा एक कम्प्यूटर बनवला. त्यांनी तयार केलेला कम्प्यूटर आपल्याच कॉलेजमधील मित्राला विकला आणि त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. आता पैशांचे आकर्षण मायकल डेल यांना बालपणीपासूनच होते. आता मायकल आणि कम्प्यूटर हे एक समीकरण बनले होते. ते आणखी कम्प्यूटर बनवू लागले. ते जे कोणते कम्प्यूटर बनवायचे, ते लोकांची सुविधा लक्षात ठेवून बनवत होते. यामुळे लोकांना त्यांनी बनवलेले कम्प्यूटर खूपच आवडू लागले होते.

    कॉलेजला रामराम अन् स्वत:ची कंपनी

    एका अहवालानुसार, १९८४मध्ये मायकल डेल यांनी १ हजार डॉलरमधून कम्प्यूटरचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यांनी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी मेडिकल कॉलेजला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या कंपनीला पीसीज लिमिटेड (PC’s Limited) या नावाने रजिस्टर केले. सुरुवातीला त्यांनी हॉस्टेलच्या एका रूममध्ये कम्प्यूटर असेम्बल करण्यास सुरुवात केली आणि त्यांना यातून यशही मिळाले. १९८५मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा पहिला टर्बो पीसी बनवला, ज्याचे डिझाईन मायकल यांनीच केले होते. हे कम्प्यूटर विकण्यासाठी त्यांनी जाहिराती आणि मेल-ऑर्डर कॅटलॉग या माध्यमाची निवड केली. मायकल यांच्या सर्व पॉलिसी मार्केट आणि ग्राहक, या दोघांसाठी योग्य होती, ज्यामुळे कंपनी दिवसेंदिवस प्रगती करू लागली. यानंतर १९८८ मध्ये कंपनीचे नाव पीसीज लिमिटेड बदलून डेल कम्प्यूटर कॉर्पोरेशन (Dell Computer Corporation) असे ठेवले.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी म्हणजे १९८९मध्ये मायकल यांनी संसार थाटला. त्यांनी सुझेन डेल यांच्यासोबत लग्न केले. या दोघांनी ३ मुली आणि १ मुलगा अशी ४ अपत्य आहेत. मुलींची नावे, अलेक्सा, ज्युलिएट आणि किरा आहे. तसेच, मुलाचे नाव झॅकरी डेल असे आहे.

    हळूहळू मायकल यांनी बनवलेल्या कंपनीचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर येऊ लागले, जे मायकल यांच्यासाठी मोठ्या यशाचे संकेत होते. मायकल यांची डेल कंपनी त्यावेळी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कमी किंमतीत लोकांना कम्प्यूटर उपलब्ध करून देऊ लागली. एवढंच नाही, तर मायकल यांची कंपनी जगभरात यशस्वी झाली. विशेष म्हणजे, अवघ्या २७व्या वर्षी मायकल हे सर्वात कमी वयातील CEO बनले. त्यांची कंपनी जगातील प्रसिद्ध 500 कंपन्यांमध्येही सामील झाली. मायकल यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांची कंपनी आज जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे.

    आज घडीला मायकल डेल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७व्या स्थानी आहेत. रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२३मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही ७२.८ बिलियन डॉलर्स इतकी होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते मित्रांनो, जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करत आयुष्यात पुढे जात राहिलात, तर एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

    आणखी वाचा

  • शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची    कहाणी

    शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    हरियानाच्या आदमपूर शहरात, १९५० साली एक सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात जन्म झाला सुभाष चंद्रा गोयल यांचा. लहानपणापासूनच कौटुंबिक दुकानात हातभार लावत कष्टाचे संस्कार व कौटुंबिक व्यावसायिकतेचे धडे घेतले. सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडले, तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना ते एका पॅकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेले. तेव्हाच त्यांच्या मनात आपणही पॅकेजिंग कंपनी सुरु करायची असा विचार आला. देशात त्याकाळी ॲल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात ॲल्युमिनिअम नव्हे, तर लॅमीनेटेड ट्यूबची चलती असेल हे हेरून त्यांनी एस्सेल प्रोपॅक नावाने कंपनी सुरु केली. टूथपेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा पॅकिंगची निर्मिती त्यांनी सुरु केली. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच, पण जगातली ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 2019 मध्ये द ब्लॅकस्टोन ग्रुपने कर्जबाजारी एस्सेल ग्रुपच्या मालमत्ता विक्रीदरम्यान कंपनीचे अधिग्रहण केले होते आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीचे नाव बदलून ईपीएल लिमिटेड असे करण्यात आले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    परदेशी पर्यटन करताना एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये फिरताना त्यांना भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईजवळ त्यांनी ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वॉटर किंग्डमही उभारले. देशातील लाखो लोक त्यांच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.

    एकदा ते मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्यांना २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्यांना वेड्यात काढले. कमावलेले सारे काही ते एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता, पण सुभाष चंद्रांना स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी २ ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही हे देशातील पहिलं २४ तास चालणारं टीव्ही चॅनेल सुरु केलं. सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही सुभाष यांनी जिद्द आणि नावीन्यतेने झी टीव्हीला यशस्वी केले. मनोरंजनापासून बातम्यांपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रादेशिक भाषांमधील वाहिन्या, तसेच आंतरराष्ट्रीय विस्तार यामुळे ‘झी’ लवकरच घराघरात पोहोचली. नंतर त्यांनी २४ तास बातम्या देणारी झी न्यूझ वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा सपाटाच लावला. सुभाष चंद्राना प्रचंड यश मिळालं. त्यांच्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला.

    त्यानंतर सुभाष चंद्रांनी ‘प्ले विन’ लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर डिश टीवी, सिटी केबल, फन सिनेमा नावाने चित्रपटगृहंही सुरु केली. गोल्ड रिफायानिंग कंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली. हे सर्व व्यवसाय एस्सेल ग्रुपच्या नावाखाली एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारतातील एक प्रमुख मीडिया घराणे बनले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्यानेउद्योग उभारून सुभाष चंद्रांनी जगासमोर एक अचंबित करणार आदर्श उभा केला. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फाउंडेशन स्थापना केलीय. दूरचित्रवाणी क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरवले गेले.

    2019 मध्ये कर्जफेडीच्या समस्येत अडकलेल्या झी एंटरटेनमेंटच्या दोन स्वतंत्र संचालकांनी एस्सेल ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने झी एंटरटेनमेंटच्या मुदत ठेवीचा वापर केल्याच्या आरोपाखाली सेबीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आणि त्यांना संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले.

    आणखी वाचा

  • भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

    भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

    भल्याभल्यांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) या भारताचे अब्जपती आणि TVS मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट म्हणझेच टॅफे (TAFE) कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवू शकतात.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    मल्लिका श्रीनिवासन या देशातील त्या निवडक महिला उद्योजकांपैकी एक आहेत, ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. त्या देशातील दुसऱ्या आणि जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक ब्रँड टॅफेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन आहेत. टॅफे हा ब्रँड मोठा होण्यात मल्लिका यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी या कंपनीला तंत्राची जोड दिली आणि कंपनीला यशाच्या पायऱ्या चढण्यात मदत केली. आजघडीला कंपनीची वार्षिक उलाढाल ही १० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.

    कौटुंबिक व्यवसायात कधी घेतली उडी?

    सन १९५९मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले होते. तसेच, यूएसए येथील पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिका पुन्हा भारतात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली १९८६मध्ये कौटुंबिक व्यवसायात उडी घेतली. या कंपनीची सुरुवात मल्लिका यांचे आजोबा एस अनंतरामाकृष्णन यांनी केली होती. त्या टॅफेच्या जनरल मॅनेजर म्हणून कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या. जेव्हा त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हापासूनच महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    टॅफेचा प्रवास

    ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट (Tractors and Farm Equipment) म्हणझेच टॅफेची (TAFE) सुरुवात १९६०मध्ये चेन्नई येथे झाली होती. कंपनीची स्थापना जरी १९६०मध्ये झाली असली, तरीही यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल घडवून आणण्याचा विडा मल्लिका श्रीनिवासन यांनीच उचलला. त्यांनी कंपनीला तंत्राची जोड देऊन तिचा विस्तार केला. त्यामुळेच टॅफेचे प्रोडक्ट भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंत बनले आहेत. टॅफे ही ट्रॅक्टर बनवणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीकडे जवळपास १६०० डीलर्सचं नेटवर्क आहे. तसेच, कंपनी जगातील जवळपास १०० देशांमध्ये व्यापार करत आहे. एवढंच नाही, तर टॅफे फक्त ट्रॅक्टर बनवण्यापर्यंत मर्यादित राहिली नाहीये. ही कंपनी बॅटरी, डिझेल इंजिन, जेनेसेट, गियर पार्ट्स, पॅसेंजर व्हेइकल, हायड्रॉलिक पंप्स आणि फार्म मशिनरीही तयार करते.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    कौटुंबिक व्यवसायाला मिळवून दिला फायदा

    टॅफेला यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी भाग पाडण्यात मल्लिका श्रीनिवासन यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली टॅफेने फ्रेंच कंपनी फॉरेसियाला विकत घेण्यासाठी ४०० कोटींचा करार केला. त्यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन ऍग्रो कंपनी AGCO शी मिळून काम करण्यास सुरुवात केली. कंपनीने AGCOसोबत मिळून तुर्की येथेही आपला प्लान्ट सुरू करत जगातील अनेक भागात ट्रॅक्टर पोहोचवणे सुरू केले. कालांतराने व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी टॅफेने अनेक कंपन्या आपल्यात जोडल्या. टॅफे कंपनीने आयशर लिमिटेडचे ट्रॅक्टर, इंजिन आणि गियर्स विभाग विकत घेतले. त्यामुळेच भारतात कृषी यंत्र व्यवसायात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

    पद्मश्री पुरस्काराने सन्मान

    टॅफेच्या यशाचा डंका जगभरात गाजवल्यानंतर ६४ वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना ट्रेड आणि इंडस्ट्रीतील यशामुळे जानेवारी २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्या अशा निवडक महिलांपैकी एक आहेत, ज्यांचे नाव दिग्गज उद्योगपतींमध्ये घेतले जाते.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    भारतातील ८३ व्या श्रीमंत व्यक्ती

    प्रसिद्ध उद्योगपती असण्याव्यतिरिक्त मल्लिका श्रीनिवासन या एनजीसीओ, टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेवरेजेस बोर्डाच्या सदस्या आहेत. तसेच, चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (ISB) कार्यकारी बोर्डाच्याही सदस्या आहेत. त्यांनी अलीकडेच, स्विगी बोर्डातील स्वतंत्र संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. स्विगीची व्हॅल्यू ही जवळपास ६८९१८ कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. तसेच, मल्लिका श्रीनिवासन यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, तर त्यांची एकूण संपत्ती २.८४ बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास २३,६२५ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, फोर्ब्सनुसार त्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८३व्या क्रमांकावर आहेत.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    आणखी वाचा

  • कसा झाला जगातील पहिल्या रेसिंग कारचा जन्म? पोर्श कारची गोष्ट

    कसा झाला जगातील पहिल्या रेसिंग कारचा जन्म? पोर्श कारची गोष्ट

    Ferdinand Porsche Founder of Porsche Car


    आपल्या कंपनीत ते नेहमीच उत्कृष्ट काम करत राहिले. एकदा Austrian carriage company चे head Ludwig Lohner या कंपनीला भेट देण्यसाठी आले होते तेव्हा त्यांचे लक्ष Ferdinand यांच्या कामाकडे गेले आणि त्यांचं काम पाहून Ludwig खूप impressed झाले. काही काळ गेला; Ludwig यांनी असा अंदाज बांधला की बऱ्याच वर्षापासून चालत आलेले घोड्याचे carriages म्हणजे ज्यांना आपण बग्गी म्हणतो ते आता बंद होतील आणि त्या ऐवजी मोटरवर चालणारे carriages जास्त वापरले जातील. वेळ वाया न घालवता लगेचच त्यांनी eager company शी tie up केला आणि तिथे काम करणाऱ्या Porsche यांना त्या carriages चं design बनवायला लावले. बऱ्याच दिवसांच्या कामानंतर अखेर 26 June 1898 ला ही carriage जिला त्यांनी Porsche  P1 असं नाव दिलं होतं Vienna च्या रस्त्यांवर वर चालू लागली. या Carriage मध्ये 2.2kw ची hub motor होती तर तब्बल 12-speed gears होते. यापैकी 6 forward gears होते, 2 reverse आणि 4 braking gears होते. यात असलेल्या battery चं वजन 1350 kg होतं जी एका वेळी 79 Km पर्यंत चालू शकत होती.


    1899 मध्ये Porsche आपण बनवलेल्या carriage ला घेऊन Berlin Road Race मध्ये सहभागी झाले आणि तिथं ते इतर स्पर्धकांच्या तुलनेत १८ मिनिटांनी लवकर अंतर पार करून अव्वल स्थानावर आले. अशाच दुसऱ्या एका स्पर्धेत त्यांची ही carriage, efficiency test जिंकली आणि याच carriage ला ‘most efficient vehicle in urban traffic’ अशी सर्वमान्यता मिळाली. Electric Carriage च्या grand success नंतर 1901 मध्ये त्यांनी जगातील पहिली petrol-electric कार बनवली. या कारचा 56 km/hr एवढा स्पीड होता, जो की कोणत्याही कारसाठी त्या काळातला highest speed मानला गेला. काही काळानंतर या कारमध्ये आणखी powerful engine बसवले गेले, ज्यामुळे या कारचा speed आणखी वाढला. इकडे Automobile क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा वाढत असताना 1902 मध्ये त्यांची लष्करी सेवेत नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ऑस्ट्रियाचे क्राऊन प्रिन्स फ्रांझ फर्डिनांड यांच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. पुढे 1914 मध्ये याच Prince ची गोळी मारून हत्या करण्यात आली आणि इथूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पेटली.

    वडील तुरुंगात आहेत याचे दुःख कुरवाळत न बसता त्यांचा मुलगा Ferry Porsche ने आपल्या व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. काही काळ शिक्षा भोगल्यानंतर Porsche यांची सुटका करण्यात आली आणि 1949 मध्ये संपूर्ण Porsche कुटुंबाने आपल्या व्यवसायाला नव्याने सुरुवात केली. November 1950 मध्ये Volkswagen आणि Porsche यांच्यात consulting work साठी contract झालं, ज्यामुळे Volkswagen च्या प्रत्येक beetle मागे Porsche यांना Royalty मिळू लागली. हे सगळं सुरु असतानाचं Tank बनविण्यात अपयशी ठरलेल्या Porsche यांनी आपला मोर्चा परत Tank Manufacturing कडे वळवला.

    आपल्या अथक प्रयत्नांनी अखेर त्यांनी Tank चे design complete केले ज्याचं नाव होतं ‘The Leopard’. हा tank main battle field वर सर्वात जास्त वापरला जाणारा tank ठरला. आत्तापर्यंत Porsche यांनी दैदिप्यमान कारकीर्द अनुभवली होती, पण आपण बनवलेल्या tank चे यश त्यांना पाहता आले नाही. 30 जानेवारी 1951 या दिवशी त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि आयुष्यातले प्रत्येक speed breaker ओलांडून वेगाने धावलेल्या या अवलियाच्या गाडीला ब्रेक लागला तो कायमचाच!

    1996 मध्ये, Porsche यांना ‘इंटरनॅशनल मोटरस्पोर्ट्स हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि 1999 मध्ये त्यांच्या मरणोत्तर ‘Car Engineer of the Century’ चा पुरस्कार त्यांना देण्यात आला. Ferdinand Porsche यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर Automobile industry मध्ये एक क्रांती घडवली जी आजतागायत आपण सर्वजण अनुभवतोय .
         

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • उद्योजक व्हायचे असेल तर…

    उद्योजक व्हायचे असेल तर…

    आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.

    How to Be a Successful Entrepreneur

    व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.

    स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे.
    तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.

    How to Be a Successful Entrepreneur

    कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .

    बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.

    सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.

    How to Be a Successful Entrepreneur

    तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.

    तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.

    नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.

    व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.

    How to Be a Successful Entrepreneur

    थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .

    बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.

    बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.

    तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.

    नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.

    How to Be a Successful Entrepreneur

    सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.

    धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.

    कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.

    becoming-an-entrepreneur-the-essential-skills-you-need-to-succeed

    अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी ….
    “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .”
    HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA

  • यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गुण

    यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गुण

    १) डोमेन एक्सपर्ट :

    उद्योजक हा आपल्या क्षेत्रातील डोमेन एक्सपर्ट असला पाहिजे. तो ज्या क्षेत्रात व्यवसाय करतो त्या क्षेत्राची माहिती त्याला हवी. त्या क्षेत्रातील ज्ञानी म्हणून त्याची मार्केटमध्ये ओळख हवी. तेव्हाच तो आपल्या क्षेत्रातला एक आघाडीचा व्यावसायिक मानला जाईल.

    २) अस्वस्थ :

    यशस्वी व्यावसायिक हा कधीही एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही, काही ना काही व्यावसायिक कुरापती चालू असतातच. स्वस्थ बसेल तो उद्योजक कसला? यशस्वी उद्योजक वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास सतत व्यस्त व अस्वस्थ असतो. तो सतत असमाधानी असतो, त्याला अजून पुढे जायचे असते.

    ३) रीचेबल :

    हा आपले लोक व व्यवसायासंबधी जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी नेहमी रीचेबल असतो, फोनद्वारे, इमेलद्वारे, व्हॉटसअपने व प्रत्यक्ष भेटण्यासाठी. हा कोणत्याही व्यवसायिकांचा अत्यंत महत्वाचा गुण आहे, व्यावसायिक अधिक मोठा असल्यास त्याचे पी. ए. व पी. आर. ओ. असतात.

    ४) प्रवासी :

    यशस्वी व्यावसायिक हा प्रवासी असतो. तो जेव्हा संधी मिळेल, तेव्हा देश विदेशात प्रवास करत असतो. प्रवासामुळे आपणास अनेक संधी, कल्पना सुचतात. त्याचा आपल्या व्यवसाय वाढीसाठी खूप उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

    ५) शिस्तशीर :

    तो खूप शिस्तशीर असतो. त्याच्या जीवनात व व्यवसायात अस्ताव्यस्तपणा नसतो. सर्व काही जिथल्या तिथे असते, मग ते ऑफिस असो, घर असो, गाडी असो किंवा इतर कोणतीही गोष्टी. व्यवस्थितपणा हा खूप महत्वाचा गुण आहे.

    ६) व्यवहार कौशल्यता :

    कोणत्या गोष्टीला किती पैसे द्यायचे? कोणामागे किती वेळ घालवायचा? पैसे कोठे वाचवायचे व कोठे खर्च करायचे? इत्यादी व्यवहारात चाणाक्षपणा असायला हवा.

    ७) निर्लज्जपणा व बिनधास्त :

    व्यावसायिक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी, तो लोकांना सांगण्यासाठी अत्यंत निर्लज्ज व बिनधास्त असावा. माझा एक व्यावसायिक मित्र त्याच्या नवीन उत्पादनाबद्दल स्मशानात माहिती देत होता. तेव्हा प्रसंग कोणताही असो, आपल्या व्यवसायाबद्दल निर्लज्जपणे काम करा.

    ८) अर्थिक साक्षरता :

    पैसा, गुंतवणूक, अर्थसहाय्य, कर्ज, सबसिडी, कर, शेअर्स, खेळते भांडवल, अकाउंटिंग, फायनान्स इत्यादी सर्वांबद्दल चांगली माहिती ही उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.

    ९) अत्यंत आवड :

    व्यवसाय व उद्योग हा नोकरीसारखा नसतो. ती थोडावेळ लागली म्हणून करण्याची गोष्ट नव्हे, ती एक स्वत:हून स्वीकारलेली जीवनपद्धती असते. तुम्हाला उद्योगाच्या जीवनपद्धतीची अत्यंत आवड असावी.

    १०) गंभीर :

    यशस्वी व्यावसायिक आपले काम, उत्पादन, उद्योग इत्यादी सर्व गोष्टीबद्दल अत्यंत गंभीर असतो, त्याला थोडादेखील हलगर्जीपणा चालत नाही.

    ११) प्लॅनिंग :

    तो अत्यंत चांगला प्लॅनर असतो, तो स्वतःच स्वतःच्या जीवनाचा आर्किटेक्ट असतो. प्लॅनिंग हे शास्त्र आहे, ते शिकून घेऊन आपण तसे गुण डेव्हलप केले पाहिजेत.

    १२) विपणन तज्ञ :

    त्याला मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रातील चांगले ज्ञान असते. मार्केटिंग व जाहिरात हा त्याचा अंगभूत गुण झालेला असतो. मार्केटिंग हा कोणत्याही व्यावसायिकासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे.

    १३) सकारात्मक :

    त्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असतो. नाही हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसतोच. जसे ‘दुनिया उम्मीद से चलती है’, तसे उद्योग उद्योजकाच्या सकारात्मक गुणावर चालतो.

    १४) तंत्रज्ञानी :

    आजच्या युगात टेक्नॉलॉजीची माहिती असणे अनिवार्य झाले आहे, आपल्या व्यवसायासाठी व प्रगतीसाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजीची त्याला चांगली माहिती असते.

    १५) विश्वासार्हता :

    त्याची खूप मोठी विश्वासार्हता मार्केटमध्ये असते. त्याच्या शब्दाला खूप मोठा मान व भरोसा असतो. केवळ शब्दावर कोट्यावधीचा माल उधार मिळतो. तेव्हा स्वत:च्या शब्दाला मोठी किंमत निर्माण केली पाहिजे.

    १६) सहभागी :

    हा समाजातील, व्यवसायातील बऱ्याच संघटना, मित्र, कुटुंबे यांच्याशी संबंधित व सहभागी असतो. तो एकटा राहत नाही. तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होतो.

    १७) ग्राहक जाणकार :

    हा व्यवसायाचा की-पॉईंट आहे. जो आपल्या ग्राहकांना, श्रोत्यांना चांगला जाणतो. त्यांना केव्हा काय हवं आहे, ते तो जाणतो व अत्यंत यशस्वी होतो. हा गुण अनुभवाने व अभ्यासाने डेव्हलप होतो.

    १८) स्वतःमध्ये गुंतवणूक :

    व्यायाम, अभ्यास, ट्रेंनिग, तंत्रज्ञान इत्यादी शिकण्यामुळे स्वतःचा वेळ व पैसा कारणी लागतो व स्वत:चे व्यक्तिमत्व सतत प्रगल्भ बनवत राहतो.

    १९) हॉलीडे मॅन :

    स्वत:चे जीवन व कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी वर्षातून काही दिवस सुट्टी घेवून फिरायला जातो. कामाचा ताण कमी करून तो मन फ्रेश करून परत येतो. तेव्हा थोडा थोडा हॉलीडे ब्रेक हा गरजेचा गुण आहे.

    २०) डेलीगेशन :

    काम सोपवण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते, कोणाला कोणते काम सांगायचे व कसे करून घ्यायचे हे त्याला माहीत असते. यालाच ‘आर्ट ऑफ डेलीगेशन’ म्हणतात.

    २१) सातत्य :

    कोणतेही काम, उत्पादन, व्यवसाय यात कमालीचे सातत्य असते. एखादे काम उत्साहाने कित्येक वर्षे, दशके तो चालवतो, वाढवतो. तेव्हा सातत्य हा मोठा गुण यशस्वी उद्योजकांत दिसून येतो.

    २२) दूरदृष्टी :

    त्याला पुढील ५, १०, २० वर्षांनंतरच्या गोष्टीचा सेन्स असतो. आज काय करावे, म्हणजे पुढील काही वर्षात आपल्याला फायदा होईल, याचा सेन्स त्याला असतो व तसे तो निर्णय आजच घेतो. यालाच दूरदृष्टी म्हणतात.

    २३) मोटीव्हेटर :

    तो खूप चांगला मोटीव्हेटर असतो. तो लोकांना, कर्मचाऱ्यांना, मित्रांना सतत प्रेरणा देत असतो. त्याला बघितल्यावर आजूबाजूच्या लोकांना उत्साह येतो. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचे तेज असते.

    २४) स्वप्नाळू :

    तो सतत स्वप्नं पाहतो. स्वप्नं पाहणे व ती सत्यात उतरवणे हा जणू काही त्याचा छंद असतो. आज सायकलवरून फिरणारा उद्योजक कारची स्वप्नं बघतो व पुढील २-३ वर्षात तो कारने फिरतो. तेव्हा स्वप्नं पहा.

    २५) खवय्या :

    हा खूप चांगला खवय्या असतो. चांगले चांगले पदार्थ शोधणे, ते खाणे याचा तो शौकीन असतो. त्याला नेहमी आवडीचे व चटकदार खाण्याची सवय असते.

    २६) रिस्क टेकर :

    रिस्क घेण्याची तयारी नेहमी असावी लागते. खूप विचार करणारा, घाबरणारा व्यक्ती कधीही उद्योजक होऊ शकत नाही. तेव्हा रिस्क टेकिंग हा खूप महत्वाचा गुण असावा लागतो.

    २७) दुर्दम्य आत्मविश्वास :

    आपल्या कामावर, उत्पादनावर, व्यवसायात व स्वतःवर अत्यंत दुर्दम्य आत्मविश्वास असतो. कोणत्याही परिस्थितीत आपली योजना व उद्योग यशस्वी होणारच असा त्यांचा कमालीचा विश्वास असतो.

    २८) स्वीकारणारा :

    नवीन येणाऱ्या गरजेच्या गोष्टी तो परत शिकतो व स्वीकारतो. त्यासाठी स्वत:च्या विचारसरणीत पटकन बदल करतो. तो जगाबरोबर ताबडतोब स्वतःला बदलतो व अपडेट राहतो.

    २८) संवादक :

    याचे कम्युनिकेशन स्किल खूप चांगले असते. आपले म्हणणे दुसऱ्याला कसे पटवून सांगायचे, आपले काम कसे काढून घ्यायचे हे यांना चांगले माहित असते. तेव्हा चांगला संवादक असणे हा महत्वाचा गुण आवश्यक आहे. मग संवाद फोनद्वारे असो, इमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष.

    ३०) सेल्फ आणि फास्ट स्टार्टर :

    एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर ती स्वतः व पटकन सुरुवात करतो. तो विचार करण्यात, ठरविण्यात फारसा वेळ घालवत नाही. फटाफट सुरुवात करणे हा त्याचा गुण आहे, त्याला फास्ट मुव्हर म्हणतात. बाकीचे लोक काय करायचे व कसे करायचे याचा विचार करतात, तेवढ्या वेळेत उद्योजक काम सुरू करून बराच पुढे निघून गेलेला असतो.

    आणखी वाचा

  • छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

    छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

    साल १९१६. इटली तेव्हा अनेक समस्यांमधून जात होती. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे हरतऱ्हेचे बदल हा देश उघड्या डोळ्यांनी पाहत होता. काही लोक रोजच्या जेवणासाठी तडफडत होते तर काही जीवनासाठी. या दरीमध्ये आणखी एक वर्ग होता ज्याला ना या बदलांमुळं फरक पडायचा ना कोणाच्या मरणामुळं. रोज उठायचं, शेतात जाऊन कष्ट करायचे आणि आपलं पोट भरायचं असंच आयुष्य तो वर्षानुवर्ष जगत होता. अशी अनेक कुटुंब होती आणि यातल्याच एका कुटुंबात जन्म झाला फेरुशिओचा.

    लहानपणापासून हा मुलगा आपल्या वडिलांना शेतामध्ये मदत करायचा. ‘जसं आपल्या बापानी आपल्याला शेतीचा वारसदार बनवलं, तसंच आपण पण याच्या नावावर अख्खी जमीन करायची असं त्याच्या वडिलांनी ठरवलं.’ पण शेती इकायची नसते राखायची असते हे काही छोट्या फेरुशिओला माहिती नव्हतं. त्याला नाद होता tractor चा. खराब झालेल्या tractor चे part दुरुस्त करण्यात हा पठ्ठ्या तासन् तास घालवायचा. शेवटी त्याच्या वडिलांना ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फेरुशिओ मोठा झाला आणि त्याने शेती न करण्याचा निर्णय घेतला. या छोट्या गावात आता जास्त वेळ न अडकता आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे असं त्याला वाटलं आणि Bologna (बोलोन्या) च्या Technical college मध्ये तो दाखल झाला. Graduation झाल्यावर त्याला लगेच जॉब मिळाला, पण इटलीत चाललेल्या सततच्या युद्धामुळे तो काही फार काळ टिकू शकला नाही. त्यातच फेरुशिओला Royal Italian Air Force मध्ये जबरदस्तीने दाखल करण्यात आलं, पण पोराला गाड्यांबाबत बरंचसं ज्ञान आहे हे कळल्यानंतर त्याला तिथं जास्त वेळ न ठेवता Greek च्या Rhode Island ला पाठवण्यात आलं; कशासाठी, तर Army चे जे काही tractors, trucks होते त्यांच्या maintenance करायला. युद्ध संपल्यावर सैन्याच्या सगळ्या तुकड्या तिथून गेल्या, पण फेरुशिओ मात्र गेला नाही. त्यानं तिथली Citenzship घेतली आणि तिथंच छोटसं mechanical workshop उघडलं. दोन वर्षांनी म्हणजे १९४५ साली मित्र राष्ट्रांनी पुन्हा या Island वर कब्जा केला. अन दिसेल त्याला तुरुंगात टाकायला सुरुवात केली. यात फेरुशिओचा सुद्धा नंबर लागला. पण यावेळीसुद्धा त्याला तारलं ते त्याच्या mechanical skills नी. वर्षभर त्यानं तिथल्या गाड्या repair केल्या. 1946 मध्ये त्याला तुरुंगातून सोडून त्याच्या मायदेशी म्हणजेच इटलीला पाठवलं गेलं.

    जॉब गेला होता आता पुढं काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. मध्येमध्ये तो काही गाड्यांची कामं वगैरे करायचा पण fix असं काही ठरत नव्हतं. याच काळात त्यानं एक गोष्ट observe केली ती म्हणजे इटलीची एकूण आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली होती की त्यामुळं शेतकऱ्यांना tractor घेण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. आपण या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटलं. दुसरीकडंक petrol, diesel च्या किंमती वाढत होत्या. त्यामुळे महागाई वाढली. देशाचा आर्थिक कारभार काही प्रमाणात का होईना सुरळीत होईल या आशेने इटालियन सरकारने एक निर्णय घेतला; Military ची काही वाहने विकण्याचा. झालं फेरुशिओला सोन्यासारखी संधी चालत आली होती. यातली बरीचशी वाहनं त्यानं विकत घेतली. या वाहनांपासून tractor बनवण्याचा त्याच्या डोक्यात होतं. यासाठी त्याने “British Morris Engine” विकत घेतलं. या इंजिनला modify करून त्यांना आपल्या tractor मध्ये use करायचं ठरवलं.

    Engine ready होतं, design वर काम चालू होतं. दिवस जात होते तसा तसा फेरुशिओ आपल्या स्वप्नाकडं एक एक पाऊल टाकत होता. ३ फेब्रुवारी १९४८ शेवटी तो दिवस उजाडला, Lamborghini चा पहिला tractor साकार झाला होता. खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे म्हणा किंवा त्यासाठी लागणाऱ्या छोट्या जागेसाठी म्हणा हा tractor लोकांना चांगलाच आवडला. पहिल्या slot मधले सगळे tractors sold out झाले. फेरुशिओने परत British Morris Engine विकत घेतले, पण यावेळेस quantity होती एक हजार. दिवसेंदिवस फेरुशिओच्या यशाचा आलेख वरवरच जात होता. एवढं सगळं असूनही त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. Tractor चा sale होतोय, तो लोकांना आवडतोय हे चांगलंचय, पण यातलं engine आपलं नाही याची हुरहुर त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

    त्यानं ठरवलं आता tractor धावणार, तर आपल्याच engine ने. म्हणजे सलमान खान म्हणतो तसं, “एक बार जो मैंने कमिटमेंट करदी, तो फिर में अपने आप की भी नहीं सुनता!” असंच काहीतरी. आणि खरंच ठरवल्याप्रमाणे त्यानं स्वतःचं engine तयार केलं होतं. आता त्याला imported British Morris Engine वापरण्याची गरज नव्हती. दुधात साखर म्हणून कि काय त्याच सुमारास सरकारने सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केलेली की, इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याला tractor खरेदीवर loan मिळेल. फक्त तो tractor “Made in Italy” असावा. या काळात Lamborghini चे इतके tractor sale झाले की फेरुशिओ इटलीतला सर्वात श्रीमंत माणूस बनला.

    इटालियन Cars त्यावेळी जगभरातल्या रस्त्यांवर धावत होत्या. Fiat, Maserati, Ferrari एक से बढकर एक कंपन्या. Celebrities’ पासून मोठमोठ्या businessman पर्यंत सर्वांनाच या cars नी भुरळ घातली होती. फेरुशिओ सुद्धा याला अपवाद नव्हते. वेगवेगळ्या brands च्या cars त्यांच्या collection मध्ये होत्या. यातली सगळ्यात महागडी आणि luxurious car म्हणजे “Ferrari 250 GT”. Ferrari त्यावेळी सगळ्यात नावाजलेली कंपनी होती

    सगळ्यांनी या Ferrari ला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. Ferrari 250 GT ने तर विक्रीचे सगळे record break केले होते. फेरुशिओंनी सुद्धा ही car घेतली, पण त्यांना तिच्यात विशेष असं काही वाटलं नाही. या कारचा driving experience किमतीच्या मनाने खूपच वाईट आहे असं त्यांना वाटायला लागलं. दुसरा एक problem म्हणजे तिच्या clutch plate सारख्या खराब व्हायच्या.  एकदा mechanic त्या plates बदलत असताना फेरुशिओंचं लक्ष त्या plates कडं गेलं आणि त्यांना धक्काच बसला. या so called luxurious, expensive, high performance कार मध्ये त्याच Clutch plates वापरल्या जात होत्या, ज्या Lamborghini च्या tractor मध्ये वापरल्या जायच्या. फेरुशिओंनी त्या गाडीत दुसऱ्या plates टाकल्या आणि तडक निघाले Ferrari चे मालक Enzo Ferrari यांना भेटायला. Enzo नी Ferrari ला शून्यातून उभं केलं होतं. प्रचंड यशामुळे थोडासा प्रकारचा अहंकार त्यांना झाला होता. आपण जर आपल्या problem विषयी Enzo ना सांगितलं, तर कदाचित ते आपल्या गाड्यांमध्ये सुधारणा करतील असं फेरुशिओना वाटत होतं. पण Enzoचे पाय जमिनीवर नव्हतेच. त्यामुळं उलट ते फेरुशिओंवर संतापले. “Clutch हा माझ्या गाडीचा problem नाहीये. तुलाच Ferrari drive करायला जमत नाही.” एवढंच नाही, ते पुढं म्हणाले, “तू tractor बनवतोय तर तेवढच कर, कार कशी बनवायची हे मला माहितीये, ते मी बरोबर करतो.”

    Lamborghini Miura

    “माणूस जेव्हा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा अशा काही घटना घडतात की, निरंतर मिळणारं यश एकदम क्षणिक वाटू लागतं”. फेरुशिओंच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं. Car सोबत tractor चा बिझनेसही एकदम जोरदार चालला होता, पण अचानक tractor ची एक मोठ्ठी order cancel झाली. त्यामुळं कित्येक ready tractors तसेच पडून राहिले. त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. नाईलाजाने पूर्ण कंपनीचं आपल्या competitor ला विकून टाकली. जी tractor ची गत झाली, तीच Cars ची झाली. त्यातलेही 51% त्यांना विकावे लागले. पुढं काही वर्षात Oil Crisis, तेलाचा तुटवडा झाला. कार manufacture करणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळं फेरुशिओंनी उरलेले 49% सुद्धा विकून टाकले. आता फेरुशिओंकडे काहीच नव्हतं. Automobile Industry तून पूर्णपणे बाहेर पडल्यावर त्यांनी एक wine making चा business सुद्धा केला.

    झाली संपली गोष्ट! काय झालं गोष्ट चांगली नाही वाटली? पुढं Lamborghini चं काय झालं हे जाणून घ्यायचंय? Hmm ठीके… पाहूया पुढं काय झालं ते! १९७० मध्ये “SAME” या group ने Lamborghini Tractor कंपनी विकत घेतली. दहा वर्षांनी १९८० साली Lamborghini Automobiles म्हणजेच Car कंपनी मीम्रन बंधूंनी विकत घेतली. पण त्यांनासुद्धा कंपनीला तारता आलं नाही आणि पुढच्या सात वर्षात ही कंपनी “Chrysler” कडे गेली. तो काळच असा होता की car विक्रीचं प्रमाण खूप कमी झालं होतं. शेवटी Chrysler लाही loss झाला आणि त्यामुळं त्यांनी ही कंपनी विकली “Volkswagen” ला. Volkswagen कडे आधीच Audi, Bentley, Skoda अशा कंपन्या होत्या आणि आता त्यात भर पडली Lamborghini ची. Design मध्ये असणारे changes, performance मध्ये असणारे changes Volkswagen ने व्यवस्थितरित्या हेरले. आणि त्याचमुळे Lamborghini जगभरातले रस्ते काबीज करण्यासाठी सज्ज झाली. पुन्हा एकदा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा