Category: उद्योजकता

  • सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

    सर्वसामान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय – जीवनावश्यक वस्तूंवर GST कपात

    देशातील सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी होणार आहेत. या निर्णयामुळे थेट ग्राहकांना फायदा होईल आणि घरगुती बजेटला थोडा दिलासा मिळेल. 

    ही करकपात काही निवडक वस्तूंवर मर्यादित नसून रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंवर लागू होणार आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते घरगुती वापराच्या सामानापर्यंत बरीच उत्पादने आता कमी किमतीत मिळतील. थोडक्यात, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजच्या खरेदीत बचत करता येणार आहे. आता नेमक्या कोणत्या वस्तूंवर किती टक्के करकपात झाली आहे आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना कसा होणार आहे, हे आपण या लेखात समजून घेऊया.

    दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दिलासा

    सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर दिलासा देण्यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. याआधी १२% ते १८% जीएसटी भरावा लागणाऱ्या अनेक वस्तूंवर आता फक्त ५% जीएसटी लागू होणार आहे. 

    या यादीत केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, टॉयलेट सोप, शेव्हिंग क्रीम यांसारख्या वस्तूंवरचा कर १८% वरून ५% झाला आहे. तसेच लोणी, तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, प्री-पॅकेज नमकीन, भुजिया, मिश्रण, भांडी, बाळांच्या बाटल्या, नॅपकिन्स, क्लिनिकल डायपर यांसारख्या वस्तूंवरचा जीएसटी १२% ऐवजी आता फक्त ५% भरावा लागेल. शिलाई मशीन व त्याचे सुटे भाग यांनाही या दरकपातीचा लाभ मिळणार आहे.

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून हे नवीन GST दर लागू होणा 3

     शेतकरी आणि शेती व्यवसायासाठी फायदा

    शेतकरी आणि शेती व्यवसायासाठीही सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या अनेक साधनांवरील आणि उपकरणांवरील जीएसटी आता कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

    या यादीत ट्रॅक्टर टायर्स आणि सुटे भाग यांवरील कर १८% वरून ५% करण्यात आला आहे, तर ट्रॅक्टरवरचा जीएसटी १२% ऐवजी फक्त ५% आकारला जाणार आहे. याशिवाय जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषक घटक, ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर तसेच माती तयार करणे, लागवड, कापणी आणि मळणीसाठी लागणाऱ्या यंत्रांवरही जीएसटी १२% वरून ५% इतका कमी झाला आहे. 

    आरोग्यसेवा क्षेत्रात मोठा दिलासा

    आरोग्यसेवा क्षेत्रातही सरकारने मोठ्या प्रमाणात कर कपात केली आहे. लोकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधोपचार आणि आरोग्य तपासणीसाठी लागणारा खर्च कमी होणार आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा आता १८% वरून थेट शून्य टक्के म्हणजेच पूर्णपणे करमुक्त करण्यात आला आहे.

    याशिवाय थर्मोमीटरवरील कर १८% वरून ५%, वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन, निदानासाठी लागणारी सर्व किट, ग्लूकोमीटर व चाचणी पट्ट्या आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी लागणारा चष्मा यांवरील कर १२% वरून ५% इतका करण्यात आला आहे. या निर्णयामुळे उपचार आणि आरोग्य तपासणीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू सर्वसामान्यांना अधिक परवडतील. 

    परवडणाऱ्या दरात मोटारगाड्या

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून हे नवीन GST दर लागू होणा

    वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील जीएसटीत मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मोटारगाड्या आणि इतर वाहने आता परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून ग्राहकांना थेट फायदा होईल. आधी २८% जीएसटी (GST) आकारला जाणाऱ्या वाहनांवर आता फक्त १८% जीएसटी (GST) लागू होणार आहे.

    या यादीत पेट्रोल, पेट्रोल-हायब्रिड, एलपीजी आणि सीएनजी कार (१२०० सीसी आणि ४००० मिमी पेक्षा कमी), डिझेल आणि डिझेल-हायब्रिड कार (१५०० सीसी आणि ४००० मिमी पेक्षा कमी), तीन चाकी वाहने, ३५० सीसी पर्यंतच्या मोटारसायकली तसेच मालवाहतूक मोटारगाड्या यांचा समावेश आहे. यामुळे वाहन खरेदीचा खर्च कमी होऊन सामान्य नागरिकांना वाहतुकीच्या सोयी अधिक सुलभ होणार आहेत.

    शिक्षण क्षेत्रात करमुक्ती 

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून हे नवीन GST दर लागू होणा 1

    शिक्षण क्षेत्रालाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या अनेक शैक्षणिक वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी लागणारे साहित्य अधिक स्वस्त आणि परवडणारे होणार आहे.

    या यादीत नकाशे, चार्ट, पेन्सिल, शार्पनर, रंगीत खडू, व्यायाम पुस्तके, वह्या यांवरील १२% जीएसटी हटवून शून्य टक्के करण्यात आला आहे. तर खोडरबरवरील ५% करही रद्द करून ती वस्तू पूर्णपणे करमुक्त केली आहे. यामुळे शालेय साहित्य खरेदीत विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट बचत होणार आहे.

     इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बचत

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून हे नवीन GST दर लागू होणा 1 1

    सामान्य कुटुंबाच्या घरगुती खर्चात मोठा वाटा असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही सरकारने जीएसटी कपात जाहीर केली आहे. दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर करणारी मोठी घरगुती उपकरणे आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. याआधी २८% जीएसटी लागू असलेल्या उपकरणांवर आता फक्त १८% जीएसटी (GST) आकारला जाणार आहे. 

    या यादीत एअर कंडिशनर, ३२ इंचांपेक्षा मोठे टेलिव्हिजन, मॉनिटर, प्रोजेक्टर आणि डिश वॉशिंग मशीन यांचा समावेश आहे. अशा प्रकारची उपकरणे आधी महागडी वाटत असली तरी करकपातीनंतर ती तुलनेने परवडणारी ठरणार आहेत. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना घरात आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा आणणे सोपे होईल आणि बाजारातील विक्रीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

    आणखी वाचा

  • Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    इटली देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अब्जाधीश ब्रँड मालक जॉर्जिओ अरमानी यांचे दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अरमानी ही कंपनी गुच्ची आणि प्राडा नंतर इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फॅशन समूह मानला जातो. या ब्रँडखाली शेकडो स्टोअर्स आणि 10 अब्जाहून अधिक डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. मिलानच्या रेडी-टू-विअर फॅशनमध्ये अग्रणी ठरलेले अरमानी यांनी ‘अनस्ट्रक्चर्ड लुक्स’ द्वारे फॅशनमध्ये क्रांती घडवून आणली होती. ते इटालियन शैली आणि शालीनतेचे मूर्तिमंत स्वरूप होते.

    मिलानच्या रस्त्यावरून चालणाऱ्या एका साध्या मुलाने कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस तो जगभरातल्या फॅशनविश्वाला नवं रूप देईल. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेला हा तरुण, थोडे दिवस सैन्यात आणि मग एका दुकानातल्या शोकेस सजवण्यात रमला. परंतु त्याच्या डोळ्यात मात्र कपड्यांच्या पलीकडचं स्वप्न होतं. अखेर सर्जियो गॅलोटी या मित्रासोबत १९७५ च्या दशकात त्याने स्वतःचा ब्रँड उभारला.

    पुढे काळ बदलत गेला आणि त्यांचे कष्ट आणि कल्पकता सतत वाढत राहिले. त्यांनी एम्पोरियो अरमानी, अरमानी ज्युनियर आणि एएक्स अरमानी एक्सचेंज यांसारख्या नव्या श्रेणींमधून जागतिक स्तरावर आपला ब्रँड विस्तारला. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम तसेच होम फर्निशिंग क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले. हॉलीवूडमधील १९८० साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर गिगोला चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन तयार करताच जगाने त्यांच्या नावाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. चित्रपट उद्योगाशी असलेल्या या संबंधामुळे त्यांचे नाव आणि ब्रँड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आले. अरामानींनी शंभराहून अधिक चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले.


    त्यानंतर जॉर्जिओ अरमानी (Giorgio Armani) फॅशनच्याही पलीकडे गेली. फॅशनच्या पलीकडे जाऊन त्यांनी हॉटेल्स, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवले. दुबईतील अरमानी हॉटेल, ऑलिंपिक व विविध व्यावसायिक क्रीडा संघांसाठी गणवेश डिझाइन, तसेच एम्पोरियो अरमानी कॅफे संगीत संकलनांचे क्युरेशन हे त्याचे काही उल्लेखनीय उपक्रम ठरले. त्यांच्या नावावर उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे फक्त कपड्यांचं नव्हे, तर आज ते शालीनतेचं प्रतिक आहे.

    आज त्यांच्या जाण्याने जग शोकाकुल आहे, पण त्यांनी विणलेली शैली अजूनही जिवंत आहे. “खरा डिझायनर तोच, जो स्वप्नांना कृतीतून प्रत्यक्षात घडवतो“ हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शून्यातून विश्व उभे करण्याचा त्यांचा प्रवास आज सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.


    जॉर्जिओ अरमानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    आणखी वाचा :

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर

    CARS24 1


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!

  • PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म उभारतो. तो तरुण म्हणजे Porter या कंपनीचे सहसंस्थापक प्रणव गोयल.

    Porter ची संकल्पना प्रणव यांना एका वैयक्तिक अडचणीतून सुचली. शहरांत छोट्या मालवाहतुकीसाठी विश्वसनीय आणि सुलभ पर्याय नव्हता, ही अडचण अनेकांना भेडसावत होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर उपाय शोधता येईल, यावर विश्वास ठेवून त्याने Porter ची स्थापना केली. आज Porter लाखो लोकांना मालवाहतुकीसाठी मदत करत आहे. या लेखात आपण Porter कशी सुरू झाली, कोणते टप्पे पार करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

    एका लहानशा अडचणीतून सुचलेली कल्पना

    Porter या स्टार्टअपची कल्पना प्रणव गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुचली. ते IIT खरगपूरचे पदवीधर असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात JP Morgan या नामांकित कंपनीत विश्लेषक (ANALYST) म्हणून केली. कामानिमित्त त्यांना गुरगावहून मुंबईला स्थलांतर करावं लागलं. या वेळी घरातील फर्निचर हलवण्यासाठी मिनी ट्रक बुक करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात योग्य ड्रायव्हर मिळत नव्हता, भाडं ठरवणं कठीण जात होतं आणि संपूर्ण सेवा प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती.

    याच अनुभवातून त्यांना जाणवलं की शहरांमधील वाहतूक व्यवस्था अजूनही पारंपरिक पद्धतीने चालते आणि त्यात ग्राहक, ड्रायव्हर आणि एजंट सगळेच त्रासलेले असतात. ही अडचण म्हणजेच एक मोठी संधी असू शकते, हे त्यांनी ओळखलं. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही समस्या सोडवता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशाच विचारातून Porter या नव्या युगाच्या लॉजिस्टिक स्टार्टअपची सुरुवात झाली.

    स्टार्टअपची सुरुवात – Porter चा जन्म

    porter delivery


    एप्रिल २०१४ मध्ये प्रणव गोयल यांनी JP Morgan मधील नोकरी सोडली आणि IIT मधील आपले दोन  मित्र उत्तम डिग्गा आणि विकास चौधरी यांच्यासोबत मिळून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांच्या तयारीनंतर, ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘Porter’ हा मोबाईल अ‍ॅप आधारित लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म सुरू केलं. त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश शहरांतर्गत मालवाहतूक अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करणे हा होता.

    Porter अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक मिनी ट्रक, टू-व्हीलर किंवा थ्री-व्हीलर सहजपणे बुक करू शकतात. या प्लॅटफॉर्ममुळे वाहनचालक आणि ग्राहक एकाच ठिकाणी जोडले गेले. पारदर्शक आणि परडवणारे दर, GPS मार्गदर्शन आणि सहज ऑर्डर प्रक्रिया यामुळे सेवा अधिक विश्वासार्ह आणि वापरण्यास सुलभ बनली. पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक लॉजिस्टिक सोल्यूशन तयार केलं.

    तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट बिझनेस मॉडेल

    Porterचं बिझनेस मॉडेल साधं पण अत्यंत परिणामकारक होतं. प्रत्येक बुकिंगवर कंपनी १० ते १५ टक्के कमिशन घेत होती. यासोबतच इन्शुरन्स, ड्रायव्हर क्रेडिट, प्रायोरिटी लिस्टिंग यांसारख्या अतिरिक्त सेवा देऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करण्यात आले. या मॉडेलनं ग्राहकांना त्यांच्या मालवाहतुकीच्या खर्चात जवळपास २०% पर्यंत बचत मिळवून दिली, तर चालकवर्गाला त्यांच्या उत्पन्नात सुमारे ३०% वाढ अनुभवायला मिळाली.

    Porter अ‍ॅप स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध केल्यामुळे चालकांसाठी ते वापरणं सोपं झालं. सहज नोंदणी प्रक्रिया आणि योग्य प्रोत्साहन यामुळे अवघ्या १८ महिन्यांत १ लाख बुकिंग्स पार करण्यात त्यांनी यश मिळवलं. मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विस्तार करताना त्यांना Sequoia Capital आणि Kae Capital या गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपयांची  फंडिंगही मिळाली. हे यश त्यांच्या कल्पकतेचं आणि धाडसाचं प्रतीक ठरलं.

    पुढील वाटचाल आणि मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी

    Porter ची सेवा गुणवत्ता, वेळेचं भान आणि पारदर्शक व्यवहार यांच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. २०१८ मध्ये त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या Smartshift या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मसोबत विलीन होण्याचा निर्णय घेतला. याच टप्प्यावर त्यांना ५० कोटींची Series C फंडिंग मिळाली. याच वर्षी त्यांनी ‘Porter for Enterprise’ हा नवीन विभाग सुरू केला, ज्यामार्फत BigBasket, Urban Company, Flipkart यांसारख्या मोठ्या कंपन्यांना B2B लॉजिस्टिक सेवा पुरवायला सुरुवात केली.

    २०१९ पर्यंत Porter ने ३० लाख डिलिव्हरी पूर्ण करून जबरदस्त प्रगती केली. कंपनीचं वार्षिक उत्पन्न २२७ कोटींवर पोहोचलं. त्यांनी अशा छोट्या पण महत्त्वाच्या लॉजिस्टिक गरजांवर लक्ष केंद्रित केलं ज्या अनेक मोठ्या कंपन्यांनी दुर्लक्षित केल्या होत्या, जसं की संध्याकाळचं कुरिअर किंवा काही तासांसाठी टेम्पो बुकिंग. अशा गरजांना सेवा पुरवून त्यांनी बाजारात आपलं वेगळेपण सिद्ध केलं.

    युनिकॉर्न बनण्याचा प्रवास

    Porter च्या यशस्वी प्रवासात एप्रिल २०२० एक महत्त्वाचा टप्पा ठरला. Lightstone (आता Lightrock) या गुंतवणूकदार संस्थेने कंपनीमध्ये १४० कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतर २०२२ मध्ये Tiger Global च्या नेतृत्वाखाली ७५० कोटींचं भांडवल उभं करण्यात आलं. याच काळात कंपनीने १७८९ कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळवून आपली ताकद सिद्ध केली.

    १६ मे २०२४ रोजी Porter ने आपले काही शेअर्स (ऑप्शन पूल) विकले. त्यामुळे कंपनीचं एकूण मूल्य $१ बिलियनच्या पुढं गेलं आणि Porter ही Krutim आणि Perfios नंतर २०२४ मधली तिसरी युनिकॉर्न कंपनी बनली.

    porter delivery app

    यशाच्या शिखरावर 

    आज Porter देशातील १६ शहरांमध्ये सेवा देत आहे आणि त्यांचे ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. रोज २.५ लाखांहून अधिक चालक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. दर महिन्याला सुमारे ५० लाख डिलिव्हरी पार पडतात. सध्या कंपनीचं उत्पन्न २७३३ कोटींवर पोहोचलं असून, कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन ८३०० कोटींहून अधिक आहे.

    Porter हे फक्त एक ॲप नाही, तर एक आधुनिक आणि स्मार्ट लॉजिस्टिक सोल्यूशन आहे. यात AI तंत्रज्ञान वापरून ग्राहक आणि चालक यांना एकत्र जोडलं गेलं आहे. GPS ट्रॅकिंग, झटपट बुकिंग, परवडणारे दर आणि वापरण्यास सोपं इंटरफेस यामुळे सर्वांचा अनुभव चांगला होतो. Porter B2B आणि B2C (सर्वसामान्य ग्राहकांसाठी) दोघांसाठी उपयुक्त असून, मोठ्या मालवाहतुकीपासून ते घरगुती वस्तूंच्या डिलिव्हरीपर्यंत या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

    मित्रांनो, प्रणव गोयल यांची कथा आपल्याला शिकवते की, अडचणींवर फक्त तक्रार न करता जर त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली, तर त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा राहू शकतो आणि Porter हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

    आणखी वाचा :

  • New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

    New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

    १ एप्रिल २०२५ पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच बँकिंग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. हे बदल एटीएम व्यवहार, बचत खाते, मुदत ठेवी (एफडी), क्रेडिट कार्ड फायदे आणि चेक व्यवहार यासारख्या अनेक गोष्टींवर थेट परिणाम करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या नव्या नियमांची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे, नाहीतर अनावश्यक शुल्क भरावे लागू शकते किंवा काही फायदे गमवावे लागू शकतात.

    नवे नियम ग्राहकांच्या सोयीसाठी असले तरी त्यामध्ये काही बंधने आणि अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा, एफडीवरील व्याजदरातील बदल, क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्क आणि चेक क्लिअरिंगबाबतच्या नव्या अटींचा सरळ परिणाम सर्वसामान्य बँकिंग व्यवहारांवर होणार आहे. या लेखात आपण कोणते नियम बदलले आहेत या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

    एटीएममधून पैसे काढण्याचे नियम 

    नव्या आर्थिक वर्षापासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला ५ वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा होती. मात्र, आता ही मर्यादा ३ व्यवहारांवर आली आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ५ पेक्षा जास्त वेळा पैसे काढले, तर प्रत्येक वेळी २० ते २५ रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

    जर तुम्ही वारंवार दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल, तर तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल. त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा डिजिटल पेमेंटच्या पर्यायांचा अधिक विचार करावा. 

    2

    किमान शिल्लक रकमेच्या नियमांत बदल

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक यांनी किमान शिल्लक ठेवण्याच्या अटी बदलल्या आहेत. यापूर्वी ग्राहकांसाठी ठराविक किमान रक्कम ठेवण्याचा नियम होता, मात्र आता हा निकष खात्याचे स्थान शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शाखांनुसार ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक रकमेची मर्यादा वेगळी असणार आहे.

    या बदलामुळे खात्यात आवश्यक शिल्लक न ठेवल्यास ग्राहकांना दंड भरावा लागू शकतो. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, शहरी आणि निमशहरी भागातील ग्राहकांनी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची काळजी घ्यावी, अन्यथा दरमहा काही शुल्क कपात होऊ शकते.

    बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदरांत बदल

    बँकांनी बचत खाती (Savings Account) आणि मुदत ठेवी (Fixed Deposit) यांचे व्याजदर नव्या नियमांनुसार ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता खात्यातील शिल्लक रकमेच्या आधारे व्याजदर ठरेल. म्हणजेच, ज्या ग्राहकांच्या खात्यात जास्त शिल्लक असेल, त्यांना अधिक व्याज मिळेल, तर कमी शिल्लक असणाऱ्यांना तुलनेने कमी व्याजदर लागू होईल.

    या बदलामुळे मोठ्या ठेवींवरील परतावा वाढण्याची शक्यता आहे, तर कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यात जास्तीत जास्त शिल्लक ठेवावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल लोकांना अधिक बचतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने करण्यात आला आहे.

    3 2

    चेक व्यवहारांसाठी “पॉझिटिव्ह पे” सिस्टीम लागू

    बँका आता ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ नावाची नवी सुविधा लागू करत आहेत, ज्यामुळे मोठ्या रकमांच्या चेक व्यवहारांची सुरक्षा वाढणार आहे. या प्रणालीअंतर्गत, जर तुम्ही ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चेक दिला, तर तो वटवण्यापूर्वी तुम्हाला बँकेला चेकचा क्रमांक, तारीख, लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम याची माहिती द्यावी लागेल.

    या नव्या नियमामुळे फसवणूक आणि चुकीच्या व्यवहारांना आळा बसणार आहे. मोठ्या चेक व्यवहारांवर अधिक नियंत्रण राहील, ज्यामुळे चुकीने चेक वटण्याच्या घटना कमी होतील. मात्र, व्यवसाय आणि मोठ्या व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बँकेला आधी माहिती द्यावी लागेल, त्यामुळे अतिरिक्त काळजी घेण्याची गरज भासेल.

    5 1

    क्रेडिट कार्डच्या फायद्यांमध्ये बदल

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ॲक्सिस बँक यांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. याआधी या कार्ड्सवर टिकर व्हाऊचर, नूतनीकरण फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स मिळत होते. मात्र, १ एप्रिल २०२५ पासून काही फायदे बंद होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होईल.

    विशेषतः प्रवासासाठी हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पूर्वीइतके फायदे मिळणार नाहीत, त्यामुळे त्यांनी आपल्या खर्चाची पुनर्रचना करावी लागेल. तसेच, इतर बँकाही भविष्यात आपल्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये अशा प्रकारचे बदल करू शकतात, त्यामुळे ग्राहकांनी नवीन योजना निवडताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

    4 2

    डिजिटल बँकिंग आणखी सुरक्षित आणि सोयीस्कर

    बँका डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यात एआय (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट्स, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यांसारख्या आधुनिक सुविधा समाविष्ट केल्या जाणार आहेत. या बदलांमुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.

    ग्राहकांना २४/७ मदतीसाठी एआय चॅटबॉट्स उपलब्ध असतील, त्यामुळे तक्रारी आणि शंका तत्काळ सोडवता येतील. तसेच, डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील, ज्यामुळे हॅकिंग आणि फसवणुकीचा धोका कमी होईल. या सुधारणांमुळे ऑनलाइन बँकिंग अधिक जलद आणि सोपे होणार आहे.

    6 1

    नवीन आर्थिक वर्षात लागू होणारे बँकिंग नियम ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्ही नियमितपणे एटीएम वापरत असाल, क्रेडिट कार्डचे फायदे घेत असाल किंवा मोठ्या रकमेचे चेक व्यवहार करत असाल, तर या बदलांची माहिती ठेवणे गरजेचे आहे. यामुळे अनावश्यक शुल्क किंवा इतर अडचणी टाळता येतील.

    योग्य आर्थिक नियोजनासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेत जाऊन नवीन नियमांची माहिती घ्या. 

    आणखी वाचा

  • Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    स्वप्नांना सत्यात उतरवण्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द आवश्यक असते ,असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत,आणि वंदना लुथरा यांचा यशस्वी प्रवास हे याच गोष्टींचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध करून दाखवलं आहे की, एक स्त्री जी कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, तिच्या परिश्रमाने VLCC सारख्या मोठ्या कंपनीचं साम्राज्य उभं करू शकते. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

    आजच्या लेखात आपण वंदना लुथरा यांच्या संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून उभं केलेल्या यशस्वी व्यवसायाचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा

    वंदना लुथरा (Vandana Luthra) यांचा जन्म १२ जुलै १९५९ रोजी दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई, डॉ. अरुणा सप्रू, या एक समाजसेविका होत्या आणि गरीब, वंचित लोकांसाठी काम करत होत्या. त्यांनी ‘अमर ज्योती‘ नावाची एक आयुर्वेदिक संस्था स्थापन केली, जी गरजूंसाठी मदतकार्य करत होती . या समाजसेवेचा वंदनांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि लहानपणापासूनच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळाली.

    वंदना लुथरा यांना शाळेत असतानाच सौंदर्य, आरोग्य आणि फिटनेस या क्षेत्रांची विशेष आवड होती. या क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र, त्या काळात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आव्हानात्मक होतं . तरीही, वंदनाने कधीही हार न मानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला.

    दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतल्यानंतर वंदनाने भारतात पोषण आणि कॉस्मेटोलॉजीबाबत असलेल्या उदासीनतेची जाणीव केली. यासाठी त्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. तिथे त्यांनी पोषणशास्त्र आणि कॉस्मेटोलॉजीचं सखोल शिक्षण घेतलं. जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी आरोग्य आणि वेलनेस क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आणि भारतात या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

    व्यवसायाची सुरूवात 

    वंदना लुथरा यांनी १९८९ साली भारतात परतल्यावर  केवळ २०,००० रुपयांच्या भांडवलावर दिल्लीत VLCC (वंदना लुथरा कर्ल्स अँड कर्व्स) ची स्थापना केली. सुरुवातीला वजन कमी करण्याच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करताना, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं .सुरुवातीला दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव्हच्या गजबजलेल्या बाजारात पहिले सेंटर सुरू करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांच्या दृष्टिकोनामुळे लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरल्या.

    VLCC ने वजन कमी करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींबरोबर सौंदर्य सेवांची भर टाकून ग्राहकांची मने जिंकली. वेलनेस क्षेत्रात ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं . कठोर परिश्रम, नावीन्य, आणि उच्च गुणवत्तेमुळे VLCC आज एक मोठे नाव बनलं आहे, ज्याने देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

    सुरुवातीचे आव्हान आणि संघर्ष

    वंदनाला सुरुवातीला त्यांच्या व्यवसायासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात महिलांसाठी व्यवसायात यश मिळवणं अत्यंत कठीण होतं. समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे, त्यांची कल्पनाही लोकांना आवडत नव्हती, आणि त्यातच डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीला पाठिंबा देण्यास नकार दिला. मात्र वंदनाने हार मानली नाही, कारण त्यांचा विश्वास खूप दृढ होता.त्यांनी त्यांच्या  कामामध्ये सातत्य ठेवलं. त्यांचं ध्येय होतं एक असा व्यवसाय तयार करणं, जो वैद्यकीय दृष्टिकोनातून कार्यरत राहील, पण त्यासाठी वेळ लागणार होता.

    सुरुवातीला ग्राहक मिळवणं देखील त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण त्या कधीही मागे ह्टल्या नाहीत . सतत मेहनत करत राहिल्या आणि आपल्या कल्पनांना प्रगल्भतेच्या दिशेने आकार देत राहिल्या . त्यांच्या या परिश्रमांमुळे त्यांनी एक नवा मार्ग तयार केला. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायातील गुणवत्तेचा आणि कार्यपद्धतीचा विश्वास ग्राहकांमध्ये वाढला, ज्यामुळे त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली 

    यशाच्या शिखरावर 

    १९९० च्या दशकात VLCC चं नाव हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं. २००० च्या दशकात, VLCC चा वार्षिक महसूल ५० कोटींवर पोहोचला. ग्राहक त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवांसाठी अधिक पैसे देण्यास तयार होऊ लागले. २००५ मध्ये “जस्सी जैसी कोई नहीं” या मालिकेतील नायिका  जस्सीचं मेकओव्हर केल्यानंतर VLCC चं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आणि ब्रँड अधिक चर्चेत आला.

    २००५ पासून VLCC ने आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरू केला. आज VLCC १२ देशांमध्ये कार्यरत आहे . २००९ मध्ये Shine या प्रसिद्ध  कंपनीने VLCC मध्ये १४.४ कोटींची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचा महसूल १२५ कोटींवर पोहोचला. त्यानंतर VLCC ने २०१० मध्ये भारतात आणि भारताबाहेर  १०० सेंटर्स सुरू केले आणि महिलांना ब्युटी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला.

    Vandana Luthra Success Storyy

    सप्टेंबर २०१३ मध्ये VLCC ने सिंगापूरमधील Gvig कंपनीचा ताबा घेतला आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवलं . त्यानंतर त्यांच्या  हरिद्वार आणि सिंगापूर येथील GMP सर्टिफाइड प्लांट्समधून स्किन, केस आणि बॉडी केअर उत्पादने तयार होऊ लागली. 2023 पर्यंत, VLCC ने २१० सेंटर्स, १०० प्रशिक्षण संस्था आणि ११ देशांमध्ये विस्तार केला आहे . 

    पुरस्कार आणि सन्मान

     २०१० मध्ये वंदना यांना ‘एंटरप्राइझ एशिया वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं,, तसेच २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये फोर्ब्स आशियाच्या “५० पॉवर बिझनेसवुमन” यादीत त्यांचं स्थान मिळवणं हे त्यांच्या यशाचं प्रतीक आहे.

    वंदना लुथरा यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष दिलं. आज VLCC मध्ये ७०% कर्मचारी महिला आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आणि आत्मनिर्भर बनवून, त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे फक्त महिलांची आर्थिक स्थितीच  सुधारली नाही, तर कंपनीला देखील अधिक यश प्राप्त झालं.

    मित्रांनो ,वंदना लुथरा यांचा संघर्ष आणि यशाचा हा प्रवास आपल्यला शिकवतो  की, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असला की कोणतंही स्वप्न शक्य पूर्ण करता येतं . आणि सोबतच त्यांचा हा  प्रवास आपल्याला दाखवतो की, सुरुवात कितीही छोटी असली तरी प्रामाणिक प्रयत्नांनी मोठं यश नक्कीच मिळवता येतं.

    आणखीन वाचा:

  • Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी उपयोगी ठरू शकतात.

    जर व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या लेखात आपण अशाच यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकता येणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया आणि ते व्यवसायासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, हे पाहूया.

    १) खऱ्या समस्येवर उपाय शोधा – ग्राहकांच्या गरजा ओळखा

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ग्राहकांच्या समस्येचा अभ्यास करणं. प्रत्येक व्यवसाय हा एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी असतो. जर तुम्ही लोकांच्या मोठ्या समस्येवर सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दिला, तर तुमच्या व्यवसायाला हमखास यश मिळेल.

    उदाहरणार्थ, Meesho या कंपनीने भारतातील लहान व्यावसायिक आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. ऑनलाईन विक्रीसाठी त्यांच्याकडे महागडी वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नव्हतं. Meesho ने एक सोपा प्लॅटफॉर्म तयार केला, जिथे कोणीही सहजपणे ऑनलाइन विक्रेता बनू शकतो. यामुळे लाखो लघु उद्योजकांना डिजिटल मार्केटमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

    जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधलात, तर तुमच्या व्यवसायाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. बाजाराचा अभ्यास करा, लोकांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घ्या आणि त्यावर सोपा, किफायतशीर आणि उपयुक्त उपाय द्या.

    3

    २) छोटी सुरुवात करा, मग हळूहळू विस्तार करा

    अनेक नवउद्योजक सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे खर्च वाढतो आणि अपयशाची शक्यता अधिक राहते. त्याऐवजी, लहान सुरुवात करून, अनुभव घेत घेत व्यवसाय वाढवणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं.

    उदाहरणार्थ, Zerodha या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांसोबत व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांच्या तुलनेत कमी शुल्कात सोपं आणि किफायतशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दिलं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. आज Zerodha ही भारतातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली आहे.

    4

    ३) मजबूत आणि सक्षम टीम तयार करा

    कोणताही मोठा व्यवसाय एकट्याने उभा करता येत नाही. व्यवसायाची वाढ आणि यश हे चांगल्या टीमवर आणि त्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. विश्वासू, मेहनती आणि कौशल्यपूर्ण लोक सोबत असतील, तर आव्हानं पार करणं आणि संधीच सोन्यात रूपांतर करणं सोपं जातं. 

    उदाहरणार्थ, CRED हा स्टार्टअप त्यांच्या मजबूत टीममुळे यशस्वी झाला. CRED हे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. संस्थापकांनी सुरुवातीपासूनच अनुभवी आणि हुशार लोकांची निवड केली, ज्यांनी उत्कृष्ट ॲप डिझाइन, प्रभावी मार्केटिंग आणि ग्राहकांसाठी उपयुक्त योजना तयार केल्या.

    सुरुवातीला थोड्या, पण हुशार लोकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत काम करा. तुमच्या उद्दिष्टांशी जुळणारी, नवे प्रयोग करण्यास तयार असलेली आणि आव्हानांना सामोरे जाणारी टीम निवडा. एक चांगली टीमच तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते.

    5

    ४) ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवा

    ग्राहक समाधानी असतील, तरच व्यवसाय टिकून राहतो. समाधानी ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतात आणि इतरांनाही तुमच्या सेवेची शिफारस करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

    उदाहरणार्थ, Zomato ने ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सहज वापरता येणारं आणि वेगवान ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया आणि तात्काळ ग्राहकसेवा दिली. यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि Zomato एक लोकप्रिय ब्रँड बनला.

    ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांचे प्रश्न पटकन सोडवा आणि त्यांचा अनुभव चांगला राहील याची काळजी घ्या. यामुळे ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल.

    6

    ५) डेटा आणि ग्राहकांचा फीडबॅक वापरा

    बाजार सतत बदलत असतो, त्यामुळे व्यवसायात वेळेनुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा फीडबॅक आणि डेटा विचारात घेतल्यास तुमची सेवा अधिक चांगली होऊ शकते आणि व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो.

    उदाहरणार्थ, Swiggy सुरुवातीला फक्त अन्न वितरण सेवा पुरवत होते. मात्र, ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या खरेदीच्या सवयींचा अभ्यास केल्यावर त्यांना समजले की लोक घरपोच किराणासामानही हवे आहे. त्यानंतर त्यांनी Swiggy Instamart सुरू केलं आणि आता किराणा व इतर वस्तूंच्या डिलिव्हरीमध्येही ते यशस्वी झाले आहेत.

    ग्राहकांचा फीडबॅक आणि बाजारातील डेटा सतत तपासा. गरजेनुसार सेवा सुधारत राहिल्यास तुम्ही स्पर्धेत टिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढेल.

    7

    मित्रांनो,यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवत असताना खरी समस्या ओळखणं, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करणं, सक्षम टीम तयार करणं, ग्राहकांचा अनुभव उत्तम ठेवणं आणि डेटा व फीडबॅकच्या आधारे सुधारणा करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

    जर तुम्हीही या गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केला, तर तुमचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हेच यशस्वी उद्योजकतेचं खरं रहस्य आहे!

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला…

    Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला… 

    यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षण, मोठं भांडवल किंवा मोठ्या ओळखीचं नेटवर्क लागतं, असं अनेकजण मानतात. पण काही लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं ठरवतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘हॅवेल्स’ या जगभर प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल ब्रँडचे शिल्पकार किमत राय गुप्ता. 

    केवळ १०,००० रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मेहनत, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांच्या जोरावर एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला. उत्कृष्ट उत्पादने, ग्राहकांचे समाधान आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे हॅवेल्सने विश्वासार्हता मिळवली आणि आज तो जगभर लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मात्र, हे यश सहज मिळालं नाही. त्यामागे संघर्ष, कठोर मेहनत आणि ध्येयासाठी दिलेली अनेक वर्षे आहेत. या लेखात आपण त्यांचा हा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    बालपण आणि सुरुवातीचा प्रवास 

    किमत राय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली तत्कालीन अविभाजित पंजाबमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीतेच्या शिकवणींचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवलं की, परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यांनी निर्धार केला की केवळ शिक्षणावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करायचं.

    १९५८ साली, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठली. त्यांच्याकडे १०,००० रुपये होते आणि मनात असंख्य स्वप्नं आणि पुढे जाण्याची अपार जिद्द होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मार्केट, भागीरथ पॅलेसमध्ये गुप्ताजी अँड कंपनी नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, पण मेहनत, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हळूहळू बाजारात आपली ओळख निर्माण केली.

    व्यवसाय उभारणीची खडतर वाटचाल

    सुरुवातीला किमत राय गुप्तांनी छोटे-छोटे इलेक्ट्रिकल पार्ट्स विकण्यास सुरुवात केली. ते स्वतः दुकानात बसून ग्राहकांशी संवाद साधायचे, त्यांची गरज समजून घ्यायचे आणि अनेकदा त्यांच्यासाठी वस्तू दुरुस्तही करायचे. त्यांच्या मेहनतीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. त्यांनी केवळ व्यापार केला नाही, तर नातेसंबंध जपले आणि विश्वासार्हता निर्माण केली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.

    १९७१ हे वर्ष किमत राय गुप्ता यांच्या आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. दिल्लीतील व्यापारी हवेली राम गांधी आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपली ‘हॅवेल्स’ (Havells) कंपनी विकावी लागणार होती. ही संधी ओळखून किमत राय गुप्तांनी मोठ्या जिद्दीने ७ लाख रुपये उभे करून ‘हॅवेल्स’ विकत घेतली. मात्र, कंपनीची स्थिती अत्यंत खराब होती. उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारातील ओळख या सर्वच बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. पण किमत राय गुप्ता हार मानणारे नव्हते. त्यांनी अपार मेहनत, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर ‘हॅवेल्स’ला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला.

    हॅवेल्सचं नव्या दमाचं नवं रूप! 

    किमत राय गुप्तांनी ‘हॅवेल्स’ विकत घेतल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी केवळ स्विचेसपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता विविध उत्पादनांची भर घातली. केबल्स, फॅन्स, लाईटिंग, गिझर, किचन अप्लायन्सेस यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश करून कंपनीला नव्या उंचीवर नेलं.

    ते केवळ व्यवसाय वाढवत नव्हते, तर एक विश्वासार्ह ब्रँड तयार करत होते, जिथे गुणवत्ता, ग्राहक सेवा आणि इनोव्हेशन यांचा उत्तम समतोल होता. त्यांनी भारतभर उत्पादन केंद्रं स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाचं उत्पादन हेच उद्दिष्ट ठेवलं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे हॅवेल्सने इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 

    हॅवेल्स भारतातील मार्केट लीडर बनली, पण हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही. किमत राय गुप्तांनी ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगलाही तितकंच महत्त्व दिलं. प्रभावी जाहिराती, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स आणि ग्राहकांशी थेट संवाद यामुळे हॅवेल्सची ओळख संपूर्ण देशभर पोहोचली. त्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे हॅवेल्स केवळ एक उत्पादन करणारी कंपनी न राहता घराघरात विश्वासाने वापरण्यात येणारा ब्रँड बनली.

    आजचं हॅवेल्स (Havells)

    आज हॅवेल्स केवळ एक इलेक्ट्रिकल कंपनी नसून भारताच्या औद्यगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ५०,००० हून अधिक डीलर नेटवर्क, १३ अत्याधुनिक उत्पादन केंद्रं आणि ७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उपस्थिती ठेवत हॅवेल्सने जागतिक स्तरावरही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सतत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या जोरावर हा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचला आहे.

    Qimat Rai Gupta

    किमत राय गुप्तांनी आपल्या व्यवसायात कुटुंबालाही सहभागी करून घेतलं. १९९२ साली त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता कंपनीत सामील झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे बारकावे शिकत त्याने हॅवेल्ससाठी नव्या युगाची वाट तयार केली. २००७ साली, अनिल राय गुप्तांनी जर्मनीतील प्रसिद्ध ‘सिल्व्हेनिया’ लाइटिंग कंपनीचं अधिग्रहण केलं. हा हॅवेल्सच्या आंतरराष्ट्रीय विस्तारातील सर्वात मोठा टप्पा ठरला. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी हॅवेल्सला स्थिर ठेवत व्यवसाय अधिक मजबूत केला.

    २०१४ साली, वयाच्या ७७व्या वर्षी किमत राय गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्यांनी मागे केवळ एक यशस्वी व्यवसाय नाही , तर एक मजबूत मूल्यव्यवस्था आणि लाखो लोकांसाठी प्रेरणादायी वारसा ठेवला. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. 

    मित्रांनो, हॅवेल्स ही केवळ एक ब्रँडची गोष्ट नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या स्वप्नाची, त्याच्या परिश्रमांची आणि अपार चिकाटीची कहाणी आहे. किमत राय गुप्ता यांनी एका छोट्याशा दुकानातून सुरू केलेला प्रवास, आज कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आधार बनला आहे. 

    आणखीन वाचा:

  • ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यात मोठे यश मिळवत आहेत. नोकरीची सुरक्षितता सोडून व्यवसायात उतरणं म्हणजे मोठा धोका पत्करणं, पण ज्या लोकांकडे नवीन कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, ते या प्रवासात यशस्वी ठरतात. अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट म्हणजे ‘अपना’ ॲप या कंपनीचे संस्थापक निर्मित पारेख यांची.

    व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं, त्यात अनेक अडथळे होते. पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि “अपना” ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीचं बाजारमूल्य ९१०० कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. निर्मित पारेख यांचा हा प्रवास केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर हजारो तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    बालपणापासून तंत्रज्ञानाची आवड

    निर्मित पारेख यांचा जन्म मुंबईतील एका सर्वसाधारण व्यावसायिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. वयाच्या केवळ व्या वर्षीच त्यांनी एक डिजिटल घड्याळ तयार केले, तर १३ व्या वर्षी रोबोटिक्स प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. बालपणातच त्यांनी विविध तांत्रिक प्रयोग केले आणि तंत्रज्ञानाच्या गूढ विश्वात स्वतःला झोकून दिले. नवनवीन शोध लावण्याची त्यांची वृत्ती आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची उत्सुकता यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहिले.

    पुढे शिक्षणासाठी त्यांनी गुजरातमधील प्रसिद्ध निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला आणि बी. टेक. पूर्ण केले. या काळात त्यांनी विविध प्रोजेक्ट्सवर काम केले आणि तंत्रज्ञानाचा अधिक मन लावून अभ्यास केला. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची स्पष्ट दिशा ठरवली आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला. 

    पहिले स्टार्टअप आणि व्यावसायिक सुरुवात

    निर्मित पारेख यांनी कॉलेजमध्ये असतानाच ‘इंकॉन टेक्नॉलॉजीज’ नावाचे स्टार्टअप सुरू केले, जे पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना विकसित करत होते. लहान वयातच मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याची त्यांची प्रवृत्ती होती. बी. टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी’“क्रक्सबॉक्स’ नावाची दुसरी कंपनी सुरू केली, जी डेटा अ‍ॅनालिटिक्स क्षेत्रात काम करत होती.

    त्यांची मेहनत, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य पाहून ‘इंटेल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने क्रक्सबॉक्स विकत घेतले आणि त्यांना नोकरीची संधी दिली. इंटेलमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स विभागाचे संचालकपद मिळवले. तिथे त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत कंपनीच्या वाढीमध्ये मोठा वाटा उचलला.

    उच्च शिक्षण आणि ॲपलमधील नोकरी

    निर्मित पारेख यांनी पुढे प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांना जागतिक बाजारपेठ, व्यवसायातील नवे ट्रेंड्स आणि इनोव्हेशन यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. एमबीएनंतर त्यांनी ॲपल  कंपनीत प्रवेश केला ,तिथे त्यांनी ‘आयफोन प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी टीम’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

    मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेले निर्मित ॲपल सारख्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मोठ्या पगाराची नोकरी असूनही त्यांना समाधान नव्हते, कारण त्यांची खरी ओढ स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे होती. 

    ‘अपना’ अ‍ॅपची संकल्पना आणि संघर्ष

    अ‍ॅपलमध्ये काम करत असताना, निर्मित पारेख यांनी असंगठित क्षेत्रातील मोठी अडचण ओळखली. ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नव्हते. त्यामुळे कामगार (employee) आणि नियोक्ते (employer) यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्याचा निर्धार करत त्यांनी २०१९ मध्ये ‘अपना’ अ‍ॅप सुरू करण्यासाठी अ‍ॅपलसारखी मोठी नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, काहींनी त्यांना वेड्यात काढले, पण त्यांनी कोणाच्याही मतांची पर्वा न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

    व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या कंपनीतील सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणे सोपे नव्हते. समाजातील अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘अपना’ ला यश मिळवून दिले. 

    यशाच्या शिखरावर 

    कोरोना काळात ‘अपना’ ॲपने मोठी झेप घेतली. अवघ्या २२ महिन्यांत ते १.१ अब्ज डॉलर (९१०० कोटी रुपये) बाजारमूल्य असलेलं युनिकॉर्न स्टार्टअप बनलं! आज अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट यांसारख्या १.५ लाखांहून अधिक कंपन्या यावर नोंदणीकृत आहेत. लाखो कामगारांना या प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराच्या संधी मिळाल्या.

    निर्मित पारेख यांची कहाणी चिकाटी, मेहनत आणि दृढ निश्चयाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आज ‘अपना’ लाखो लोकांचे करिअर घडवत आहे. जर तुमच्याकडे कल्पना, जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर तुम्हीही मोठं यश मिळवू शकता! 🚀

    आणखीन वाचा:

  • उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व रोजगार आणि अर्थव्यवस्था वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. तसेच, नव्या पिढीतील उद्योजिकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

    सध्या भारतात सुमारे १४% व्यवसाय महिलांच्या मालकीचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्पकता, दूरदृष्टी आणि चिकाटीच्या जोरावर अनेक महिला उद्योजिकांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्या इतरांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय देशाच्या आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

    नुकताच जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला अशाच यशस्वी भारतीय महिला उद्योजिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

    सबीना चोप्रा – यात्रा.कॉमच्या सह-संस्थापक

    5

    सबीना चोपड़ा या ‘यात्रा.कॉम’ च्या सह-संस्थापक असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २००६ मध्ये त्यांनी यात्रा.कॉमची स्थापना केली. ट्रॅव्हल आणि बीपीओ क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सबीना यांनी आरसीआय इंडिया मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रा.कॉममध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या वाढीत विशेष भूमिका बजावली.

    व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत आणि मुलींच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी एनजीओच्या माध्यमातून मदत करतात. त्यांचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील मजबूत नेटवर्क आणि व्यावसायिक कौशल्यामुळे यात्रा.कॉमला मोठं यश मिळालं. भारतीय पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या प्रेरणादायी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे.

    विनीता सिंग – ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक 

    6

    विनीता सिंग या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIT मद्रास आणि IIM अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये त्यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली. हा ब्रँड विशेषतः तरुण महिलांमध्ये लोकप्रिय असून, भारताच्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात त्याने नवी क्रांती घडवली आहे.

    विनीता सिंग या भारताच्या आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा ब्रँड ‘शुगर कॉस्मेटिक्स’ दर्जेदार आणि ट्रेंडी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या बिझनेस रियालिटी शोमध्येही शार्क म्हणून सहभागी झाल्या असून, नवउद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीमुळे त्या आजच्या तरुणींना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत.

    फाल्गुनी नायर – ‘नायका’च्या संस्थापिका 

    7

    फाल्गुनी नायर या ‘नायका’ (Nykaa) या ब्युटी अँड लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या मोठ्या ऑनलाइन कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये १८ वर्षे मोठ्या पदावर काम केलं. २०१२ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आणि ‘नायका’ ची स्थापना केली. आज नायका हा भारताचा सर्वात प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे.

    फाल्गुनी नायर या स्वतःच्या मेहनतीवर अब्जाधीश झालेल्या भारतातील मोजक्या महिलांपैकी एक आहेत. त्यांना २६ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. नायका आज केवळ ऑनलाइनच नाही, तर भारतभर अनेक दुकानांतूनही उपलब्ध आहे. त्यांनी महिलांसाठी उच्च दर्जाची सौंदर्य उत्पादने सहज उपलब्ध करून दिली, त्यामुळे नायका हा लोकांचा आवडता ब्रँड बनला आहे.   

    राधिका घई अग्रवाल – शॉपक्लूझच्या सह-संस्थापक

    8

    राधिका घई अग्रवाल या ‘शॉपक्लूझ’ (ShopClues) या लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि काही वर्षांतच शॉपक्लूझ युनिकॉर्न क्लबमध्ये पोहोचले. 

    त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून व्यवस्थापन शिक्षण घेतलं, तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात वेब २.० आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा अभ्यास केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे शॉपक्लूझ भारतातील मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. राधिका भारताच्या पहिल्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत, ज्यांची कंपनी युनिकॉर्न बनली आहे.

    नमिता थापर – एमक्योर फार्मास्युटिकल्स

    9

    नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या प्रसिद्ध औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या व्यवसायविषयक कार्यक्रमात ‘शार्क’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी फुकुआ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं असून, त्या चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. २००७ मध्ये सीएफओ म्हणून एमक्योरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड आणि थापर उद्योजक अकादमीच्या संस्थापक आहेत आणि त्यांनी १०० हून अधिक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ‘40 अंडर 40’, वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस सुपर अचिव्हर अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. 

    श्रद्धा शर्मा – युवरस्टोरीच्या संस्थापक 

    श्रद्धा शर्मा या ‘युअरस्टोरी’ मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २००८ मध्ये सुरू केलेलं हे व्यासपीठ नव्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. या माध्यमातून ७०,००० हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली आहे.

    २०२३ मध्ये भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर, ५२० उपक्रमांच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फॉर्च्यून मासिकाच्या ‘40 अंडर 40’ प्रभावी व्यक्तींच्या यादीत तीन वेळा त्यांचं नाव झळकलं. तसेच, त्यांना  २०१८ मध्ये फोर्ब्स पॉवर ट्रेलब्लेझर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे.

    उपासना टाकू – मोबिक्विकच्या सह-संस्थापक

    उपासना टाकू या ‘मोबिक्विक’ या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २००९ मध्ये त्यांनी मोबिक्विकची स्थापना केली. भारतात डिजिटल पेमेंट क्रांतीत त्यांचं मोठं योगदान आहे. मोबिक्विकने ई-वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सोपे आणि सुलभ केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोबिक्विक भारतातील प्रमुख फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने IPO आणत सार्वजनिक लिस्टिंग केली, ज्यामुळे ती आणखी मजबूत झाली. 

    वंदना लुथरा – VLCC हेल्थकेअरच्या संस्थापिका

    वंदना लुथरा या सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. १९८९ मध्ये त्यांनी ‘VLCC हेल्थकेअर’ची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते आणि त्यांची ही कंपनी  १३ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. VLCC केवळ सौंदर्य उत्पादनांसाठीच नव्हे, तर आरोग्य सेवांसाठीही प्रसिद्ध आहे.

    वंदना लुथरा या  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिलच्या (B&WSSC) अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांची पहिली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षणाला चालना दिली असून, त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आणि अतुलनीय आहे.

    मित्रांनो, वरील सर्व महिला उद्योजिकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संधी शोधून त्यांचा योग्य उपयोग करत त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.