Category: बिझनेस महारथी

  • Indian CEOs of Global Companies: जगावर राज्य करणारे भारतीय CEO

    Indian CEOs of Global Companies: जगावर राज्य करणारे भारतीय CEO

    Indian CEOs: आज जगातील तंत्रज्ञानाचा नकाशा पाहिला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जगातील आघाडीच्या कंपन्यांची धुरा एका भारतीय व्यक्तीच्या हातात आहे. सॉफ्टवेअरपासून ते एआय (AI) आणि सायबर सुरक्षेपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. चला जाणून घेऊयात अशाच काही दिग्गजांबद्दल, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास रचला आहे.

    १. गुगलचा प्रवास – चेन्नई ते सिलिकॉन व्हॅली

    कंपनी: Google & Alphabet

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): सुंदर पिचाई (Sundar Pichai)

    Indian CEOs: चेन्नईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सुंदर पिचाई आज संपूर्ण गुगलचे प्रमुख आहेत. गुगलचे प्रसिद्ध क्रोम (Chrome) ब्राउझर आणि अँड्रॉइड (Android) ऑपरेटिंग सिस्टमला जगातील घराघरात पोहोचवण्यात आणि यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज जगातील अब्जावधी लोकांचे डिजिटल आयुष्य सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील गुगलवर चालते.

    २. मायक्रोसॉफ्टचा कायापालट – बुडत्या जहाजाला बनवले जगातील सर्वात मौल्यवान!

    कंपनी: Microsoft

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): सत्या नडेला (Satya Nadella)

    Indian CEOs: हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नडेला जेव्हा २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले, तेव्हा कंपनी कठीण काळातून जात होती. नडेला यांनी कंपनीची दिशा बदलून क्लाउड कम्प्युटिंगवर लक्ष केंद्रित केले. आज त्यांच्याच दूरदृष्टीमुळे मायक्रोसॉफ्टने OpenAI (ChatGPT) सोबत भागीदारी करून AI युगात जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

    ३. यूट्यूबचे व्हिडिओ किंग – मनोरंजनाच्या जगाचे भारतीय बॉस

    कंपनी: YouTube

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): नील मोहन (Neal Mohan)

    Indian CEOs: आपण सर्वजणच रोज पाहत असलेले यूट्यूब व्हिडिओ आणि शॉर्ट्स (Shorts) यांच्याच मार्गदर्शनाखाली चालतात. नील मोहन यांनी यूट्यूबच्या प्रीमियम (Premium) सेवा आणि शॉर्ट्स या संकल्पनांना जगभर लोकप्रिय केले. आज डिजिटल कन्टेंट क्रिएटर्सच्या जगावर नील मोहन यांचे नियंत्रण आहे.

    ४. क्रिएटिव्हिटीचा राजा – प्रत्येक डिझायनरचा आधार

    कंपनी: Adobe

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): शांतनू नारायण (Shantanu Narayen)

    Indian CEOs: फोटोशॉप (Photoshop), इलस्ट्रेटर किंवा पीडीएफ (PDF) जगातील प्रत्येक डिझायनर, एडिटर आणि कॉर्पोरेट कर्मचारी या सॉफ्टवेअर्सचा वापर करतो. या बलाढ्य ॲडोबी (Adobe) कंपनीचे नेतृत्व शांतनू नारायण हे गेल्या दीड दशकाहून अधिक काळ अत्यंत यशस्वीपणे करत आहेत.

    ५. आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया – १०० वर्षे जुन्या कंपनीचे भारतीय कमांडर

    कंपनी: IBM

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): अरविंद कृष्णा (Arvind Krishna)

    Indian CEOs: इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (IBM) सारख्या १०० वर्षांहून अधिक जुन्या आणि ऐतिहासिक टेक कंपनीची धुरा एका भारतीय वैज्ञानिकाच्या हातात आहे. अरविंद कृष्णा यांनी IBM ला हायब्रीड क्लाउड आणि क्वांटम कम्प्युटिंग (Quantum Computing) सारख्या भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये ग्लोबल लीडर बनवले आहे.

    ६. AI युगातील गुगल किलर – थेट दिग्गजांना आव्हान

    कंपनी: Perplexity AI

    CEO & सह-संस्थापक: अरविंद श्रीनिवास (Aravind Srinivas)

    Indian CEOs: IIT मद्रासचे माजी विद्यार्थी असलेल्या अरविंद श्रीनिवास यांनी ‘Perplexity AI’ नावाचे असे सर्च इंजिन बनवले आहे, जे थेट गुगलच्या मक्तेदारीला आव्हान देत आहे. त्यांच्या या क्रांतिकारक कल्पनेमुळे ॲमेझॉनचे जेफ बेझोस सारख्या जगातील सर्वात मोठ्या दिग्गजांनी त्यांच्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

    ७. नेटवर्किंग आणि सुरक्षेची ढाल

    कंपनी: Palo Alto Networks

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): निकेश अरोरा (Nikesh Arora)

    Indian CEOs: जगातील सर्वात मोठ्या सायबर सेक्युरिटी कंपनीचे बॉस. आज इंटरनेटच्या युगात जगातील मोठ्या कंपन्या, बँका आणि सरकारचा डेटा सुरक्षित ठेवण्याची अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील जबाबदारी निकेश अरोरा या भारतीय नेतृत्वावर आहे.

    ८. जगातील सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग ऍप 

    कंपनी: WhatsApp

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): कुणाल शाह (Kunal Shah)

    Indian CEOs: भारतातील स्टार्टअप जगतात ‘फ्रीचार्ज’ (Freecharge) आणि ‘क्रेड’ (CRED) च्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणणारे कुणाल शाह यांची नुकतीच जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘व्हॉट्सॲप’ (WhatsApp) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जागतिक टेक जगतात भारतीयांचा दबदबा आणखी वाढला आहे. दुसरीकडे, व्हॉट्सॲपच्या जागतिक यशामागे आणि भारतातील विस्तारामागे शिवनाथ ठुकराल यांच्यासारख्या भारतीय दिग्गजांचे व्यवस्थापनही अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे.

    आपल्या देशातील बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम आज संपूर्ण जगावर राज्य करत आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या भारतीय दिग्गज व्यक्तींचा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तुम्हाला काय वाटते? पुढील काळात जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावणारा पुढील ग्लोबल CEO कोण असेल? तुमच मत कमेंट करून नक्की सांगा!

  • Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    झोमॅटो आणि स्विग्गी या दोन प्रमुख फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सनंतर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फूड डिलिव्हरी अ‍ॅप म्हणजे मॅजिकपिन. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात मॅजिकपिनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तुम्हाला मॅजिकपिनच्या यशामागे असलेल्या व्यक्तीविषयी माहिती आहे का? ती व्यक्ती म्हणजे अंशू शर्मा. त्यांची दूरदृष्टी, धडाडी, आणि कठोर परिश्रम यांनी मॅजिकपिनला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

    अतिशय साध्या सुरुवातीपासून त्यांनी आपल्या यशाचा मार्ग स्वतः घडवला. त्यांना माहित होते की चिकाटी, मेहनत आणि जिद्दीशिवाय यश मिळत नाही. त्यांच्या धाडसाने आणि अथक मेहनतीने मॅजिकपिनला आज या प्रतिष्ठित स्थानी पोहोचवले आहे.

    या लेखात आपण अंशू शर्मा यांचा जीवनप्रवास, त्यांचे संघर्ष, आणि मॅजिकपिनची स्थापना कशी झाली याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन 

    अंशू शर्मा यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची विशेष खासियत म्हणजे नव्या गोष्टी शोधण्याचा ध्यास आणि त्यातून मोठा परिणाम साधण्याची जिद्द. आयआयटी दिल्लीमधून संगणक विज्ञानाची पदवी, आयआयएम अहमदाबादमधून एमबीए, आणि Bain & Company सारख्या जगप्रसिद्ध कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरी मिळवणे ही अनेकांसाठी यशस्वी कारकीर्दीची परिसीमा असते. मात्र, अंशू यांची महत्त्वाकांक्षा यापेक्षा वेगळी होती. त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करून नवनवीन समस्यांचे समाधान शोधायचे होते आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून मोठा प्रभाव पाडायचा होता.

    २००९  साली त्यांनी Lightspeed Venture Partners या प्रसिद्ध व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये काम करण्याची संधी मिळवली, जिथे ते भारतातील दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या रूपात सहभागी झाले. येथे त्यांनी नऊ वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांचा स्टार्टअप्सशी निगडित यशस्वी प्रवास सुरू झाला.

    याच काळात त्यांना भारतीय रिटेल क्षेत्रातील स्थानिक व्यापाऱ्यांसमोरील एका मोठ्या समस्येची जाणीव झाली.  ग्राहकांना आकर्षित करून त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही व्यापाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक बाब होती.या समस्येवर उपाय शोधण्याचा दृढ निश्चय अंशू यांनी केला. त्यांनी आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा आणि दूरदृष्टीचा उपयग करून रिटेल क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यासाठी पावले उचलली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय स्टार्टअप्सच्या क्षेत्राला नवी दिशा मिळाली, आणि स्थानिक व्यवसायांसाठी प्रगतीचा मार्ग खुला झाला.

    मॅजिकपिनची स्थापना 

    सर्व काही सुरळीत चालले असतानाही अंशू यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. सामान्यतः जेव्हा लोक सुरक्षित नोकरीचा विचार करतात, तेव्हा अंशू यांनी २०१५ मध्ये नोकरीचा  त्याग करून आपल्या कल्पनांना आकार देण्यासाठी मॅजिकपिन या फूड आणि फॅशन डिलिव्हरी कंपनीची स्थापना केली. अंशू यांना दृढ विश्वास होता की ग्राहकांच्या अनुभवावर आधारित स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने फूड डिलिव्हरीच्या संकल्पनेस एक नवीन पातळीवर घेऊन जाता येऊ शकतं . मॅजिकपिन लवकरच एक अत्याधुनिक आणि लोकप्रिय फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनलं.

    अंशू यांच्या नेतृत्वाखाली मॅजिकपिनने एक वेगळं व्यवसाय मॉडेल विकसित केलं, ज्यात ग्राहकांना त्यांच्या खरेदी बिलांचे फोटो अपलोड करून पॉइंट्स कमावण्याची संधी मिळते. या पॉइंट्सला नंतर विविध ऑफर्स आणि आकर्षक डिस्काउंट्समध्ये बदलता येतं. हे त्याचं खास वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदी अनुभव अधिक फायदेशीर आणि मजेशीर बनवता आले.

    मॅजिकपिनने फूड डिलिव्हरीच्या पारंपरिक मॉडेलला एक वेगळा आणि नवीन आकार दिला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना स्थानिक रेस्टॉरंट्स, स्टोअर्स आणि फॅशन आउटलेट्सवर आकर्षक डील्स मिळतात . यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट्स किंवा ब्रँड्स अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि फायदेशीर पद्धतीने शोधता येतात. मॅजिकपिन हे असे एक ठिकाण बनलं आहे,जिथं ग्राहकांना त्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्स उपलब्ध होतात, ज्यामुळे त्यांचा अनुभव अधिक समाधानकारक होतो.

    याशिवाय, अ‍ॅपवर सहज नेव्हिगेशन आणि  आंतरिक डिझाइनमुळे ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय ऑर्डर प्लेस करणं शक्य होतं. मॅजिकपिनचे वापरकर्ते ते सहज वापरू शकतात आणि त्यांना उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि डिस्काउंट्सचा लाभ घेता येतो. 

    संघर्ष ते विस्तार

    सुरुवातीला मॅजिकपिनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तांत्रिक समस्यांपासून ते खोट्या बिलांच्या समस्यांपर्यंत, तसेच व्यापाऱ्यांना  पैसे देण्यास तयार करणे यासारख्या अनेक अडचणी होत्या. या सर्व समस्यांचा सामना करत मॅजिकपिनने मेहनतीने उपाय शोधले आणि ग्राहकांच्या खरेदीची माहिती व्यापाऱ्यांना दिली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये विश्वास निर्माण झाला. यामुळे, मॅजिकपिनने आपला व्यवसाय मजबूत केला आणि एक सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यावर स्थानिक इव्हेंट्स, ब्रँड्स, आणि ऑफर्स शोधता येऊ लागल्या. यामुळे कंपनीला एका वर्षातच ७  पट वाढ साधता आली. २०१६ पर्यंत मॅजिकपिनकडे ३०,००० व्यापारी, १ दशलक्ष ग्राहक, आणि २५६  कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

    मॅजिकपिनने दिग्गज गुंतवणूकदारांकडून जसे की Lightspeed आणि Vy Capital यांच्याकडून निधी उभारला आणि आपली सेवा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली. सलून्स, रेस्टॉरंट्स, आणि स्पा यांसारख्या व्यवसायांसोबत, त्यांनी McDonald’s आणि Taco Bell यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी भागीदारी केली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा चांगलाच जम बसला . कोविड-१९ च्या काळातही, मॅजिकपिनने आपला धोरणात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आणि व्यवसाय वाढवला. त्यांनी ५० शहरांमध्ये ४५ मिनिटांत फार्मसी डिलिव्हरी सेवा सुरू केली आणि दररोज ३ लाखांहून अधिक व्यवहार पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचा बाजारात अधिक प्रभाव वाढला.

    यशाच्या शिखरावर 

    नोव्हेंबर २०२१ मध्ये झोमॅटोने मॅजिकपिनमध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचे मूल्य २४२३ कोटी रुपयांवर पोहोचले. हे कंपनीसाठी एक  मोठे टर्निंग पॉइंट ठरले आणि मॅजिकपिनचा प्रवास पुढे वेगाने सुरू झाला. आज, मॅजिकपिन ८००० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार हाताळत आहे, आणि त्यांच्या प्रभावी कार्यप्रणालीमुळे ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनले आहे.

    अंशू शर्मा यांची कहाणी म्हणजे केवळ एक व्यवसायिक यशोगाथा  नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी लाखोंची नोकरी सोडून भारतीय रिटेल क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे मॅजिकपिन हे भारतीय स्टार्टअप्समधील एक यशस्वी आणि प्रभावशाली नाव बनले आहे. २५०० कोटी रुपयांची कंपनी उभारणे हि छोटी गोष्ट नाही, आणि त्यासाठी अंशु शर्मा यांचा  दृढ निश्चय, कष्ट आणि मानसिकता महत्त्वाची ठरली.

    मित्रांनो अंशू शर्मांच्या या प्रवासावरून  हे सिद्ध होतं की, दूरदृष्टी, मेहनत आणि नाविन्यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करून काहीही साधता येऊ शकते. अंशू शर्मा यांचे नेतृत्व, धाडस आणि परिश्रम हेच मॅजिकपिनच्या यशाचे मुख्य कारण ठरले. खरंच, अंशू यांच्या “मॅजिक-पिन”ने इतिहास घडवला आहे!

    आणखीन वाचा:

  • मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

    मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

    वर्ष २०१५. दोन तरुण आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी, विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल, यांच्या मनात एक विचार घोळत होता काहीतरी असामान्य करायचं, जे फक्त त्यांच्यासाठी नाही, तर असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल. मोठ्या मल्टी-नॅशनल कंपन्यांमध्ये आकर्षक नोकऱ्या असतानाही, या दोघांनी स्वतःच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म उभारायचा ठरवलं ज्यामुळे लहान व्यापाऱ्यांना, विशेषत: महिलांना, आर्थिक स्वावलंबन आणि व्यवसायिक यश मिळवता येईल. त्या वेळी डिजिटल इंडिया आणि सोशल मीडिया हळूहळू लोकांच्या जीवनाचा भाग बनत होते, पण ई-कॉमर्सची कल्पना अजूनही अनेकांच्या आवाक्याबाहेर होती

    अशा वेळेला या दोन मित्रांनी या क्षेत्रातील संधी ओळखून तिचं   सोनं करतं   ‘मीशो (Meesho)’ची स्थापना केली,जिथे प्रत्येक व्यक्ती अगदी शून्य खर्चात आपला व्यवसाय सुरू करू शकतो. ‘मीशो (Meesho)’ म्हणजेच  ‘मेरी ई-शॉप’ हे अल्पावधीतच  प्रसिद्ध झालं, आणि आपल्या अनोख्या मॉडेलमुळे लोकांना घरबसल्या आपली उत्पादने विकण्याची संधी दिली. आज नवी अर्थंक्रांतीच्या माध्यमातून आपण मिशो च्या या प्रवासावर एक नजर फिरवूया

     सुरुवात आणि यशस्वी प्रवास

    सुरूवातीला , विदित आणि संजीव यांनी ‘फॅशनियर’ नावाच्या कंपनीची सुरुवात केली होती,  ज्या प्रमाणे झोमॅटो आणि स्विगी फूड इंडस्ट्री मध्ये सेवा देत होते अगदी त्याचप्रमाणे  ते फॅशन उद्योगासाठी सेवा देत होते. पण हा प्रयोग तितकासा यशस्वी ठरला नाही. तेव्हा त्यांनी आपले विचार  बदलून ‘मीशो (Meesho)’ची संकल्पना मांडली. ‘फॅशनियर’च्या अपयशामुळे ते  शिकले की, बाजारपेठेच्या वास्तविक गरजांचा सखोल अभ्यास करूनच काहीतरी प्रभावी तयार करायला हवे.

    एकदा विदित आणि संजीव कोरमंगला(बंगळूर) येथील स्थानिक बाजारपेठेतील एका दुकानदाराकडे गेले. तिथे त्या दुकानदाराने त्याच्या व्यवसायात वापरत असलेल्या एका खास ट्रिकची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तो 

    आधीपासूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, जसे की फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर, आपली उत्पादने ‘ऑनलाइन’ विकत आहे. त्या ठिकाणी तो वारंवार आपल्या उत्पादनांचे फोटो ‘अपलोड’ करतो. या प्रक्रियेत, दुकानदार ऑर्डर घेतो, त्याचा एक कामगार वस्तू डिलिव्हरी करतो आणि ग्राहकांकडून रोख रक्कम घेतो.

    इतक्या साध्या आणि प्रभावी कल्पनेने विदित आणि संजीव खूप प्रेरित झाले. या कल्पनेवर विचार करून त्यांनी आपल्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये आवश्यक ते बदल केले आणि त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली. अशाप्रकारे ‘मीशो (Meesho)’ची स्थापना झाली ‘मीशो (Meesho)’ची सुरुवात अशा वेळी झाली होती, जेव्हा सोशल ई-कॉमर्सची संकल्पना नुकतीच रुजत होती. विदित आणि संजीव यांनी त्यांच्या अनुभवांमधून शिकत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पुनर्विक्री मॉडेल तयार केले, ज्याने लाखो लोकांना आपला व्यापार सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी दिली.

    २०१६ मध्ये, ‘वाय कॉम्बिनेटर’ या स्टार्टअप्सना सहाय्य देणाऱ्या प्रसिद्ध संस्थेने ‘मीशो (Meesho)’ची निवड केली, ज्यामुळे ‘मीशो (Meesho)’ला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. यानंतर ‘मीशो (Meesho)’ने आपला विस्तार केला आणि केवळ पाच वर्षांत ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये सामील होऊन साडेसात हजार कोटी रुपये मुल्यांकनाचा टप्पा गाठला. ‘मीशो (Meesho)’ने जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले, आणि ‘सॉफ्ट बँक व्हिजन फंड’, ‘फेसबुक’, ‘शुनवेई कॅपिटल’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून निधी उभारला. 

     विस्तार आणि भविष्याच्या  संधी

    मीशो (Meesho) च्या पुनर्विक्री मॉडेलमुळे लोकांना सहजपणे उत्पादनांचे विक्री आणि वितरण करण्याची संधी मिळाली. येथे कोणत्याही विक्रेत्याला त्याचा  उत्पादन ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, आणि ‘इन्स्टाग्राम’वर शेअर करता येतं, मीशो (Meesho)’ थेट उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवते, ज्यामुळे प्रत्येकाला नफा होतो,पुरवठादाराचा  माल विकला जातो, पुनर्विक्रेत्याला नफा मिळतो, आणि ‘मीशो (Meesho)’ला त्याचे कमिशन मिळते.

    आज, ‘मीशो (Meesho)’कडे १.७ कोटींहून अधिक पुनर्विक्रेते आहेत. ‘मीशो (Meesho)’ने लहान आणि मध्यम शहरांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे ई-कॉमर्सच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली आहे. ‘मीशो (Meesho)’ने दोन हजारांपेक्षा जास्त छोट्या-मध्यम शहरांना सेवा दिलेली आहे, ज्यामुळे भारतातील छोट्या व्यापारांना एक नवा मंच मिळाला आहे.

    भविष्यात मीशो (Meesho) आपल्या ‘यूजर फर्स्ट’ नीतीतून  ‘मीशो (Meesho) मॉल’ ची सुरुवात करून एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकणार आहे. हा  त्यांचा विस्तार भारतीय जनतेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असेल . ‘मीशो (Meesho) मॉल’ ब्रँडेड वस्तूंसह उत्पादनांचे मुबलक प्रमाण  सादर करेल, त्यांचा  उद्देश भारतीय ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव अधिक उत्तम बनवणे आहे.

    विदित आत्रे यांचे मत आहे की, भारतातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ५० कोटी लोकसंख्येपैकी केवळ १ कोटी लोक ऑनलाइन खरेदी करतात, याचा अर्थ अजूनही एक मोठी संधी उपलब्ध आहे. ‘मीशो (Meesho)’ने या संधीचा लाभ घेत, अनेक छोटे व्यापारी, विशेषत: महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून दिले आहे

    मीशो (Meesho)’ची कहाणी केवळ दोन तरुण उद्योजकांच्या यशाची नाही, तर ती हजारो, लाखो लहान व्यापारी आणि महिलांच्या सक्षमीकरणाची गोष्ट आहे. विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी त्यांच्या धाडसाने आणि नवनिर्माणाच्या इच्छाशक्तीने ‘मीशो (Meesho)’सारख्या सोशल ई-कॉमर्स  प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ‘मीशो (Meesho)’ने हे सिद्ध केले आहे की, योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास, कोणताही व्यक्ती किंवा व्यवसाय मोठं यश मिळवू शकतो. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने आणि ‘मीशो (Meesho)’च्या वाढत्या लोकप्रियतेने हे दाखवून दिलं आहे की, स्वप्न आणि ध्येयांच्या मागे धावणारे  माणसं , कितीही मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात .

    मीशो (Meesho)ची कहाणी म्हणजे संधी ओळखणं, आव्हानं पेलणं, आणि जिद्दीने यशाच्या दिशेने वाटचाल करणं याचं प्रतीक आहे. ‘मीशो (Meesho)’ने केवळ ई-कॉमर्सच्या क्षेत्रात नाही तर आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनेही एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यामुळे, ‘मीशो (Meesho)’ ची प्रेरणादायी कहाणी  प्रत्येक उद्योजकाला आणि स्वप्नाळू व्यक्तीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.

  • Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

    Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

    Natu Caterers Success Story: एक लहान मुलगा ! लहानपणापासून अभ्यासापेक्षा इतर उचापती करण्यात पटाईत, बोलका स्वभाव, सदैव मित्रांच्या घोळक्यात रममाण असणारा पण रक्तात व्यवसाय भिनलेला. म्हणजेच एक रुपयाचे-दोन रुपये-५ रुपये कसे करायचे? ह्याचे अचूक आकलन असणारा एक मुलगा! अभ्यासाची आवड नाही. त्यामुळे शिक्षणात रस नाही. मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजात न जाता व्यवसायाची आवड असल्याने त्याने टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायात फायदा होत होता..

    पण त्याच्या वडिलांनी एकदा सहजच म्हटले, “तुझी व्यवसायाची आवड मी समजू शकतो पण ही टूरिस्ट लाईन, ड्रायव्हरची लाईन मला पसंत नाही, मला आवडत नाही. माझ्या मुलाने हा व्यवसाय करावा हे माझ्या मनाला पटत नाही.” त्या मुलाने वडिलांचे म्हणणे ऐकले. वडिलांच्या ओळखीने त्या तरुणाला क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीमध्ये नोकरी लागली. त्यानंतर कंपनीतर्फेच त्याला नाशिकला पाठवण्यात आले. त्या तरुणाला नाशिक मनापासून आवडले. ज्याचा ‘व्यवसाय’ हाच आत्मा होता त्या तरुणाने चक्क २२ वर्षे नोकरी केली. पत्नीने सुरु केलेल्या छोटेखानी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांची जेवणाच्या डब्याची सोय त्याने नोकरी सांभाळून १० वर्षे केली. त्यात प्रचंड मेहनत केली. श्रमांना हार न मानणाऱ्या ह्या गृहस्थाने पत्नीच्या संपूर्ण सहकायनि व्यवसायाचा वेलू दरवर्षी वाढवत उंचीवर नेला. सन २००० मध्ये अशी स्थिती आली की नोकरीमध्ये ३६५ दिवसांमध्ये १२० ते १३० दिवस बिनपगारी रजा होऊ लागली. ह्या गृहस्थाचे भाग्य जोरावर ! खरेपणाने वागणाऱ्याला परमेश्वराकडून नेहमीच बक्षीस मिळत असते फक्त ते बक्षीस कधी व किती मिळणार हे पृथ्वीतलावरील प्राणीमात्राला कळत नाही.

    ह्या गृहस्थाच्या मनात आले, आता बस.. नोकरी सोडावी.. ज्या कंपनीने २०-२२ वर्षे सांभाळले तिथे आता कामाला न्याय देणे शक्य होत नाही. अन् नेमकी तेव्हाच कंपनीची व्ही.आर.एस. स्कीम म्हणजेच स्वेच्छा निवृत्तीची योजना आली. व्ही.आर.एस.साठी पहिला फॉर्म ह्या गृहस्थाचा ! काहीही आर्थिक नुकसान न होता नोकरीमध्ये निवृत्ती.. अन् पुढील १५ वर्षांत व्यवसायाच्या वृक्षाचा अक्षरशः वटवृक्षासारखा विस्तार झाला. ते गृहस्थ म्हणजे नाशिकमधील प्रसिद्ध नातू कॅटरर्सचे श्री. अरुण नातू. ज्यांच्याकडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ३ लहान मोठ्या हॉल्स्मधील कॅटरिंगची पूर्ण मोनोपॉली आहे. तसेच प्रसाद मंगल कार्यालय, इंद्रप्रस्थ हॉल, सोमेश्वर लॉन्स येथील कॅटरिंग पॅनेलवर नातू आहेत. तेथे ‘नातू कॅटरर्स’ला लोकांची सर्वाधिक पसंती ! हीच आहे, नातू कॅटरर्सची ओळख.. ग्राहकांच्या चवीची तृप्ती । 

    प्रारंभिक जीवन :  

    ठाणे येथे वास्तव्यास असलेले श्री. महादेव नातू व सौ. शैलजा नातू या दांपत्याला दोन मुलगे – मोठा अनिल व धाकटा अरुण ! अरुणचे लहानपणापासून शालेय अभ्यासापेक्षा इतर उचापतींकडे अधिक लक्ष, तसाच त्याचा स्वभाव त्याच्या आईसारखाच बोलका ! जनसंपर्काची प्रचंड आवड ! १९७० च्या दरम्यान अरुणच्या वडिलांनी मुलुंड पूर्वेला एक ब्लॉक घेतला व नातू कुटुंब मुलुंड येथे राहावयास गेले. मुलुंडला नातू कुटुंब ज्या सोसायटीमध्ये राहत होते तेथील ४० ब्लॉक्सपैकी ३८ कुटुंब गुजराती तर फक्त २ कुटुंब मराठी त्यातील एक म्हणजे नातू कुटुंब !  अरुणचे अनेक मित्र गुजराती होते. अन् गुजराती  समाजामध्ये ९८% मंडळी व्यावसायिक तर २% मंडळी नोकरी पेशातील ! त्यांच्यामध्ये व्यवसाय पिढ्यानपिढ्या परंपरागत आलेला. मुलांना लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते.

    ह्या गुजराती  मित्रांकडून अरुण व्यवसाय म्हणजेच एक रुपयाचे दोन रुपये, एक रुपयाचे पाच रुपये कसे करायचे हे गणित शिकला. त्याला स्वतःला शिक्षणात अजिबात रस नसल्याने इयत्ता आठवी, नववीपासूनच अरुण अनेक वस्तूंची खरेदी विक्री करु लागला. अरुण नफ्याचे प्रमाण कमी ठेवत असल्याने त्याच्या सर्व वस्तूंची विनासायास विक्री होत असे.  आठवी-नववीतला विद्यार्थी असलेला अरुण कुठल्या जबाबदारीने है काम करीत नव्हता. एकतर व्यवसायाची उपजत आवड आणि मुख्य म्हणजे मिळालेल्या पैशांतून मौजमजा करणे, त्यामध्ये सिनेमा पाहणे, हॉटेलमध्ये जाणे, जनसंपर्काची आवड असल्याने मित्रांना स्वपैशाने खाऊ घालणे हेच उद्योग ! २-३ वर्ष अरुणने नवीन रिक्षा भाड्याने आणून चालवणे हा व्यवसाय केला. त्यामध्ये रोजचा १० रु. फायदा होऊ लागला. 

    व्यवसायाची सुरुवात :

    अरुणने मॅट्रिकनंतर टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय करण्याचे ठरवले. लायसन्स नसतानाही अरुण गाडी चालवत असत ह्याचा पुरावा पर्मनंट लायसन्सच्या परीक्षेच्या वेळेस तेथील अधिकाऱ्यांना आला. त्याचे असे झाले. अधिकारी परीक्षा घेत असताना त्यांनी अरुणला वरळी येथील एका चढावरती अचानक गाडी थांबवून. मग पुढे जाण्यास सांगितले तेव्हा अरुणने सराईत ड्रायव्हरप्रमाणे गाडी एक इंचही मागे न येऊ देता गाडी पुढे नेली. तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या तात्काळ लक्षात आले की कायमस्वरुपी लायसन्स नसताना हा पठ्ठया सर्वत्र गाडी चालवत असावा. तसे विचारल्यानंतर अरुणने सुद्धा खरे खरे उत्तर दिले. माझा टॅक्सी- टूरिस्टचा व्यवसाय २ वर्षांपासून आहे. मी अनेकवेळा गाडी चालवली आहे. त्या अधिकाऱ्याने मंद स्मित करीत अरुणला कायमस्वरुपी लायसन्स दिले. असा हा अरुण खरे बोलणारा, मन निर्णय देईल त्याप्रमाणे वागणारा, स्वच्छतेचा पुरस्कर्ता, मित्रांसाठी जिवाला जीव देणारा पण तितकाच कठोर व स्पष्ट बोलणारा !

    एकदा अरुणच्या वडिलांनी त्याला सांगितले, “अरुण, तुझ्या आतापर्यंतच्या उचापतींना मी कधी आडकाठी घेतली नाही किंवा तुझ्या कुठल्याही गोष्टींना मी कधी विरोध केला नाही. पण तू तुझा हा टूरिस्ट व टॅक्सी ड्रायव्हरचा व्यवसाय बंद करावास. ही टूरिस्ट लाईन मला पसंत नाही. ह्या व्यवसायात दारु, जुगार अशी व्यसने लागण्याची शक्यता जास्त असते.  मी माझ्या ओळखीने तुला चांगली नोकरी मिळवून देतो.” वडिलांचे हे कळकळीचे सांगणे ऐकून अरुणच्या मनात ठसले की एक भल्यासाठीच सांगतो आहे. यामध्ये कुठेही नाही, आग्रहाचा बाऊ नाही. अरुणने टूरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय बंद केला.

    वडिलांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या मित्राच्या साहाय्याने अरुणला क्रॉम्प्टन ग्रीव्हज्सारख्या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळवून दिली. १९७८मध्ये अरुण क्रॉम्पटनच्या फॅक्टरीमध्ये जाऊ लागला. १९८० च्या दरम्यान क्रॉम्प्टनने फॅक्टरीमधील स्टाफला नाशिक १४ मे १९८० मध्ये अरुण नाशिकला रवाना झाले. 

    वैवाहिक जीवन : 

    ७ जून १९८४ रोजी अरुणचे कल्पना खरे हिच्याशी लग्न झाले व १९८५ मध्ये अरुण व कल्पना यांना मुलगा झाला.. एक मध्यमवर्गीय समाधानी कुटुंब । आर्थिक संपन्नतेची स्वप्ने अरुण पाहत असला तरी त्यासाठी विशेष प्रयत्न असे नव्हते. मुलगा झाल्यानंतर मात्र अरुण व त्यांच्या पत्नीला वाटले की मुलाच्या वाढीच्या दृष्टीने, संस्कारांच्या दृष्टीने सिडको वसाहतीमधील वास्तव्य योग्य नव्हे. सिडकोच्या ब्लॉकचे पैसे अरुणच्या पगारातून वजा होत असत. १९९० पर्यंत सिडकोचा ब्लॉक अरुणच्या नावावर जणू झाला होता. १९९० मध्ये अरुण यांनी नाशिकच्या महात्मा नगर भागामध्ये ६१० चौ. फुटांचा २ बेडरुम हॉल किचनचा ब्लॉक घेतला. त्यासाठी त्यांनी H.D.F.C. बँकेकडून कर्ज घेतले. ब्लॉकमध्ये राहावयास आल्यानंतर अरुण समाधानाने म्हणतात, “स्वतःचा ब्लॉक होणे.. म्हणजेच ‘ही माझी वास्तू आहे’ असे सांगण्यात एक वेगळाच आनंद असतो. तसेच १९८७ पर्यंत मी सायकलने प्रवास करीत असे. १९८७ मध्ये मी पहिली बजाज सुपर स्कूटर घेतली. त्याहीवेळेस माझ्या स्कूटरला पहिली किक मारली तेव्हा वेगळाच आनंद झाला. १९८७ मध्ये अरुण यांच्या सौभाग्यवतीला अंबड येथील ग्लॅक्सो कंपनीमधील पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. कुटुंबाच्या डबल इन्कममुळे अरुण यांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारली.

    १९९० मध्ये अरुण यांनी ब्लॉक घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांना— महादेवपंतांना खरा आनंद झाला.. मुलगा मार्गी लागला.. चांगला कुटुंबवत्सल झाला. त्याने टूरिस्ट लाईन सोडली म्हणून हे दिवस मी पाहू शकलो ह्याचे त्यांनी समाधान मानले. पण त्या कर्तव्यदक्ष पित्याला हे माहीत नव्हते की हाच माझा मुलगा अरुण उद्योजक होणार आहे. करोडोंचे व्यवहार करणार आहे व नाशिकमध्ये एक ‘सन्माननीय व्यक्ती’ म्हणून वावरणार आहे.

    सौ. कल्पना यांना नोकरी लागल्यानंतर आर्थिक विवंचना मिटली असली तरी ‘बालसंगोपन’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावेळेस अरुण कायम सेकंड शिफ्ट घेऊ लागले. म्हणजेच दुपारी ३.३० ते रात्री ११.३०! दुपारी ३ ते रात्री ७ वाजेपर्यंत मुलाला पाळणाघरात ठेवावे लागले. ह्या अशा दिनचर्येमुळे पती पत्नींचे ओट्यावरती ठेवलेल्या चिठ्यांद्वारे संभाषण.. त्यामध्ये अनेक वेळा गैरसमज होत. मग शाब्दिक वादावादी व्हायची. मुलावर संस्कार करण्यास, त्याचा अभ्यास घेण्यास कोणालाच वेळ नाही. परत महादेवपंतांनी स्पष्ट सांगितले की ही तुमची जीवनशैली मला मान्य नाही. सूनबाईंनी नोकरी सोडावी. मुलांना आईचेच संस्कार हवेत. मनाच्या दोलायमान स्थितीत नातू दांपत्य असताना ७ जुलै १९९० रोजी कल्पना यांना कन्यारत्न झाले. काही महिने ह्या छोट्या बाळाला ग्लॅक्सोच्या फ्रेशमध्ये ठेवून पाहिले पण तरीही दोघांना वाटू लागले की कल्पनाच्या नोकरीबाबत ठाम निर्णय घेणे गरजेचे आहे. डिसेंबर १९९० मध्ये सौ. कल्पना यांनी नोकरी सोडली. 

    केटरिंग व्यवसायात पाऊल : 

    १९९४ मध्ये मुलगी ४ वर्षांची झाली. बालवाडीत जाऊ लागली तेव्हा सौ कल्पनाच्या मनात आले. “काहीतरी करु या का? पण ‘काहीतरी’ या प्रश्नाला उत्तर सुचत will power म्हणजेच आंतरिक इच्छा प्रबळ असली की समोरून येणाऱ्या संधी त्या व्यक्तीला खुणावतात. भोसला मिलिटरी स्कूलमधील आमटे मॅडम नातू परिवाराच्या परिचित होत्या. त्या तिथे मोठ्या पदावर होत्या, एकदा सहज त्या सौ. कल्पनाला म्हणाल्या, “भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थांचे काऊंटर लावता येतील का? ज्या विद्यार्थ्यांना घरून डबे आणणे जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पोळीभाजी, दही भात किंवा नाश्ता म्हणून इडली, सँडविच, बटाटावडा असे प्रकार ठेवावेत. सौ. कल्पनाताईंना हा प्रस्ताव आवडला. कारण महात्मानगर पासून भोसला मिलिटरी स्कूल हे अंतर फक्त १० मिनिटे ! सौ. कल्पनाताईंनी अरुण यांच्याशी चर्चा करून हे काम स्वीकारले, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळू लागला. अरुण स्वतःची नोकरी सांभाळून पत्नीला व्यवसायात मदत करीत. अगदी भाज्या खरेदीपासून भाज्या चिरण्यापर्यंत अरुण पत्नीला मदत करु लागले. एकदा शाळेतील २५ शिक्षकांची ट्रीप जाणार होती.

    शिक्षकांनी २५ जेवणाच्या डब्यांची फर्माइश केली. खरं म्हणजे ही फर्माईश हाच व्यवसायाचा श्रीगणेशा ठरला ! ह्या २५ शिक्षकांना जेवणाचे डबे म्हणजेच खाद्यपदार्थांची चव इतकी आवडली की त्यांच्याकडून त्यांच्या घरच्या समारंभाच्या ऑर्डर्स सौ. कल्पनाताईंना मिळू लागल्या. जेवणाची पार्सल्स, हळदीकुंकू, बारसे, केळवण, डोहाळ जेवण, वाढदिवस अनेक छोटे छोटे कार्यक्रम.. भरपूर ऑर्डर्स वाढल्या. ५ वर्षात व्यवसाय इतका वाढला की मदतीला ४ बायका येऊ लागल्या. अर्थातच महात्मानगर येथील राहत्या घरातून सर्व कामे करणे कठीण झाले. अरुण व सौ. कल्पना यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला व जवळच असलेल्या डिसोझा कॉलनीमध्ये एक २ रुम किचन ब्लॉक विकत घेतला व तिथे केटरिंगचे काम सुरु झाले. पदार्थांची चव ग्राहकांची संख्या वाढवत होती. ग्राहकांना हसतमुखाने सामोरे जाण्याचे काम अरुण नातू यांचे ! ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचे सकारात्मक उत्तर तयार असे.

    ज्यांना यश मिळत नाही ते नेहमी नशिबाला दोष देऊन मोकळे होतात व स्वतःवर ‘अपयशी’ हा शिक्का मारतात, पण खरे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांची दिशा चुकलेली असते. कुणाचेही नशीब खरे किंवा खोटे नसते. डोक्यावर बर्फ व जिभेवर खडीसाखर ठेवून वागले तर ग्राहकांच्या सर्व आक्षेपांना, प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता येतात. श्री. अरुण नातू यांना हे सूत्र चांगलेच अवगत असल्याने त्यांना ग्राहकांची कमतरता कधीच जाणवली नाही.

    सन २००० पर्यंत ‘नातू कॅटरर्स’च्या छोट्या-मोठ्या अशा भरपूर ऑर्डर्स वाढल्या. नातू कॅटरर्सच्या पदार्थांची, भोजनाची चव खवय्ये मंडळींच्या जिभेवर इतकी रेंगाळू लागली की नाशिकमध्ये मंगल कार्यालयांमध्ये पॅनेलमध्ये ‘नातू केटरर्स’ आहेत का ? अशी लोकांची विचारणा होऊ लागली. आणि नातू केटरर्स ग्राहकांच्या हक्काचा केटरिंग ब्रॅंड बनला. 

    आणखीन वाचा:

  • संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’-  Physics Wallah

    संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’- Physics Wallah

    अलख पांडे यांची प्रेरणादायी शैक्षणिक क्रांती

    देशातील मोठ्या उद्योगपती, अभिनेते, डॉक्टर किंवा राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण एका सामान्य शिक्षकाने अब्जोंची कंपनी उभी करून देशभरातील विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला, ही प्रेरणादायी गोष्ट आहे ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांची. अतिशय साधारण परिस्थितीतून आलेल्या या तरुणाने आपल्या जिद्दीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि अनोख्या शिकवण्याच्या शैलीने लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला. एडटेक क्षेत्रात त्यांचं नाव आज सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.

    कधीकाळी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणारा, कधी वर्गात उभा राहून विद्यार्थ्यांना शिकवणारा, तर कधी यूट्यूबवर मोफत शिकवून विद्यार्थ्यांचा मित्र बनणारा हा मुलगा पुढे एका प्रचंड साम्राज्याचा सहसंस्थापक बनेल, हे कोणालाही वाटलं नव्हतं. त्यांची जिवंत, मजेदार आणि समजण्यास सोपी शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवत गेली आणि हळूहळूच त्यांचा अब्जावधींच्या ‘युनिकॉर्न’ कंपनीपर्यंतचा रोमांचक प्रवास सुरु झाला.

    आजच्या लेखात आपण अलख पांडे यांच्या एका साध्या शिक्षकापासून देशातील सर्वात मोठ्या एडटेक युनिकॉर्नपैकी एक घडवणाऱ्या त्यांच्या क्रांतिकारक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    बालपणातील संघर्ष आणि स्वप्नांची उंच भरारी

    अलख पांडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. पथनाट्ये, शालेय सादरीकरणे,या सगळ्यात भाग घेत त्यांनी कला जगतातील दारं उघडून पाहिली. पण घरची कठीण परिस्थिती त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. आठवीत असतानाच त्यांनी ट्युशन घेण्यास सुरुवात केली. चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा हा मुलगा पुढे नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचा विश्वासू शिक्षक आणि मार्गदर्शक बनेल, याची कल्पना कदाचित कोणालाही नव्हती.

    घरची आर्थिक अवस्था इतकी कठीण होती की अलख आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना स्वतःचं घरदेखील विकावं लागलं. पण अडचणींनी त्यांची पावलं थांबवली नाहीत,उलट त्यांच्या जिद्दीला आणखी धार मिळाली. दहावीत ९१% आणि बारावीत ९३.५% गुण मिळवत त्यांनी HBTI, कानपूर येथे बी.टेकमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणासाठीचं हे पाऊल पुढे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे नवी दिशा देणार होतं आणि इथूनच त्यांच्या पुढच्या महत्वाच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.

    एका छोट्या खोलीतून उभा राहिलेला ‘फिजिक्सवाला’

    बी.टेक करत असतानाच अलख पांडे यांनी आपल्या क्लासरूममधील शिकवणीचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आणि आकर्षक होती,अवघड संकल्पना अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणं, मजेदार ॲक्शन आणि ऊर्जेनं भरलेलं प्रेझेंटेशन. विद्यार्थ्यांना हवी असलेली तीच पद्धत अलख यांनी दिली, आणि त्यामुळे त्यांचे व्हिडिओ झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले. थोड्याच काळात व्ह्यूज वाढले, सबस्क्राइबर्सची संख्या उंचावली आणि एक साधा शिक्षक यूट्यूबवरील ‘स्टार टीचर’ म्हणून ओळख मिळवू लागला.

    २०१७ मध्ये प्रयागराजमधील एका छोट्याशा खोलीत अत्यंत मर्यादित साधनांनी त्यांनी ‘फिजिक्सवाला’ची पायाभरणी केली. एक बोर्ड, एक कॅमेरा आणि प्रचंड इच्छाशक्ती,इतक्याच गोष्टींवर आधारलेलं हे छोटसं स्वप्न पुढे लाखो विद्यार्थ्यांचा आधार ठरलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू लागलं.

    कोरोना काळात मिळाली अभूतपूर्व लोकप्रियता

    तीन वर्षे विनामूल्य व्हिडिओ देणाऱ्या अलख पांडे यांनी करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून स्वतःचं ॲप सुरू केलं. अत्यंत कमी फी मध्ये त्यांनी JEE आणि NEET ची कोचिंग उपलब्ध करून दिली. महागड्या कोचिंग संस्थांच्या स्पर्धेतही विद्यार्थ्यांसाठीची त्यांची खरी तळमळ, त्यांचं ज्ञान आणि विश्वासार्हता यामुळे ‘फिजिक्सवाला’ वेगाने लोकप्रिय होऊ लागलं. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या ॲपचा आधार घेत आपल्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल सुरू केली.

    या काळात अलख सरांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना केवळ समजण्यास सोपेच नव्हते, तर मजेशीर, उत्साही आणि प्रेरणादायीही वाटू लागले. त्यांच्या शिकवण्याची शैली तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करू लागली, आणि त्यांचे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा व आत्मविश्वासाचा स्रोत बनले. कोरोनाकाळात मिळालेल्या या प्रचंड लोकप्रियतेने त्यांच्या कामाला नवा वेग दिला, आणि यानंतर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला प्रत्येक पुढचा पाऊल ठाम, प्रभावी आणि न थांबणारा ठरला.

    मोठ्या ऑफर्स नाकारून स्वतःचा मार्ग निवडणारा शिक्षक

    लोकप्रियता वाढत असताना अलख पांडे यांच्या कामाची दखल मोठ्या एडटेक कंपन्यांनी घ्यायला सुरुवात केली. अनअकॅडमीने त्यांना तब्बल ४० कोटींचे वार्षिक पॅकेज ऑफर केले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या ‘फिजिक्सवाला’मधील १०% हिस्सा ७५ कोटींना खरेदी करण्याची मोठी ऑफरही देण्यात आली. कोणत्याही तरुणासाठी ही स्वप्नवत संधी असू शकली असती, पण अलख यांच्या मनात वेगळंच ध्येय होतं.

    त्यांच्यासाठी पैसा नव्हता तर विद्यार्थ्यांचं भविष्य, शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्या मूल्यांची जपणूक अधिक महत्त्वाची होती. म्हणूनच त्यांनी या दोन्ही आकर्षक ऑफर्स ठामपणे नाकारल्या. स्वतःचा मार्ग, स्वतःची ओळख आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, परवडणारे शिक्षण हेच त्यांचं ध्येय राहिलं. आणि याच निर्णयाने ‘फिजिक्सवाला’ला पुढे एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचवण्याची ताकद दिली.

    भारतातील  पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक युनिकॉर्न  कंपनी 

    २०२० मध्ये ‘फिजिक्सवाला’ची कंपनी नोंदणीकृत झाली आणि त्याचा प्रगतीचा वेग झपाट्याने वाढू लागला. IIT BHU पदवीधर आणि अलख पांडे यांचे सहकारी प्रतीक माहेश्वरी व्यवस्थापन सांभाळू लागले, तर अलख पांडे पूर्णपणे शिक्षणात गुंतले. आज फिजिक्सवालाकडे ५००+ शिक्षक, १००+ टेक एक्स्पर्ट्स, १०९ शहरांतील १९८ सेंटर्स, ९९ मिलियन यूट्यूब सबस्क्राइबर्स आणि २,८८७ कोटींचे वार्षिक उत्पन्न आहे. या मेहनतीमुळे फिजिक्सवाला आज १.१ बिलियन डॉलर नेटवर्थ असलेली युनिकॉर्न कंपनी बनली आणि भारतीय एडटेक क्षेत्रात ही एक ऐतिहासिक पायरी ठरली आहे.

    फिजिक्सवाला IPO ही भारतीय एडटेकसाठी एक ऐतिहासिक क्षण मानली जाते. पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक कंपनी म्हणून IPO घेणे म्हणजे शिक्षकांपासून स्टार्टअप्सपर्यंत सर्वांसाठी प्रेरणेची नवी दारे उघडण्यासारखं आहे. फिजिक्सवालाने सिद्ध केले की लहान शहरांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, शिक्षकांनाही मान, सन्मान आणि योग्य कमाई मिळू शकते, आणि भारत जागतिक स्तरावर एडटेक क्रांतीचे नेतृत्व करू शकतो.

    मित्रांनो, अलख पांडे यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, स्वप्नं आणि कठोर परिश्रमांनी विणलेलं एक प्रेरणादायी गीत आहे, जिथे एका मुलाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आशेचा उजेड दिला. आज ते केवळ एक  शिक्षक नाहीत, तर भारताच्या नव्या शिक्षणयुगाचे दीपस्तंभ बनले आहेत. त्यांची कहाणी हे सांगते की शिक्षणाच्या पायावर उभं राहिलेलं स्वप्न कधीही अपयशी ठरत नाही, आणि जिद्द, सातत्य आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे कोणतीही मर्यादा पार करता येते.

    आणखीन वाचा:

  • अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    यशाचा ‘सफारी’ पॅटर्न: हार न मानता अपयशालाच ताकद बनवणाऱ्या सुधीर जाटियांची गोष्ट.

    यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, स्वतःवरचा ठाम विश्वास, प्रचंड जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते. अनेक लोक अडचणी आल्या की थांबतात, पण काही मोजकेच लोक अपयशालाच आपली ताकद बनवून पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने यश मिळवतात. अशा लोकांचा प्रवास नेहमीच प्रेरणा देणारा असतो.

    कधी कधी यशाची खरी सुरुवात अपमान, दुर्लक्ष आणि नाकारण्यातून होते. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचं नाव आहे,  सुधीर जाटिया. अत्यंत साध्या सुरुवातीपासून ते आज करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या व्यवसायिक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    करिअरची सुरुवात 

    वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी सुधीर जाटिया यांनी VIP Industries मध्ये Aristocrat (Value Luggage) या विभागात ट्रेनी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या काळात अनेकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. मात्र त्यांनी हार न मानता मेहनत, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आणि बाजाराची सखोल समज विकसित केली.

    या गुणांच्या जोरावर त्यांनी हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि सर्व शंका चुकीच्या ठरवल्या. अवघ्या १२ वर्षांत ते VIP Industries चे Vice President (VP) बनले. ट्रेनीपासून VP पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा खरा पुरावा आहे.

    ब्रँडिंगचा मास्टरस्ट्रोक

    सुधीर जाटिया यांनी VIP Industries च्या ब्रँडिंगमध्ये मोठा आणि धाडसी बदल केला. त्यांनी कंपनीचं संपूर्ण पोर्टफोलिओ नव्यानं मांडून प्रत्येक ब्रँडची वेगळी ओळख ठरवली. VIP ब्रँडला त्यांनी प्रीमियम आणि बिझनेस-क्लास सेगमेंटमध्ये स्थान दिलं, ज्यामुळे तो दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला.

    त्याच वेळी Aristocrat ब्रँडला तरुण पिढीसाठी परवडणारा, मजबूत आणि व्हॅल्यू-फॉर-मनी ब्रँड म्हणून सादर करण्यात आलं. या स्पष्ट रणनीतीचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दिसून आला आणि २०१० पर्यंत VIP Industries ही कंपनी १० कोटींच्या तोट्यातून बाहेर येत थेट ५६ कोटींच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नफ्यापर्यंत पोहोचली.

    safari bag 1

    टर्निंग पॉइंट 

    इतकं मोठं यश मिळवूनही २०१० साली व्यवस्थापनाने नवीन Lead VP नेमला आणि सुधीर जाटिया हळूहळू निर्णयप्रक्रियेतून बाजूला केलं. हा प्रसंग कुणालाही खचवणारा ठरला असता, कारण इतक्या मेहनतीनंतरही दुर्लक्ष होणं वेदनादायक असतं.

    पण सुधीर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःशीच एक ठाम निर्णय घेतला की उत्तर शब्दांनी नाही, तर यशातून द्यायचं. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील खरा वळणबिंदू ठरला.

    Safari ची निवड 

    २०११ मध्ये Safari ही एक लिस्टेड लगेज कंपनी होती, मात्र तिचा वार्षिक नफा केवळ २.६५ कोटींच्या मर्यादेत अडकलेला होता. VIP ला खऱ्या अर्थाने टक्कर देण्यासाठी Safari हाच योग्य ब्रँड आहे, हे सुधीर जाटिया यांनी अचूक ओळखलं. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी २९ कोटींची गुंतवणूक करत Safari मध्ये ४१.३४% भागीदारी मिळवली आणि कंपनीच्या मालकीत प्रवेश केला.

    Safari मध्ये पाऊल टाकताच सुधीर यांनी ग्राहककेंद्री धोरण राबवलं. त्यांचा पहिला निर्णयच धक्कादायक होता तो म्हणजे वॉरंटीमध्ये आलेल्या बॅग दुरुस्त न करता थेट नवीन बॅग देण्याचा आदेश. यामुळे डिझाईन आणि उत्पादन टीमवर गुणवत्तेबाबत प्रचंड दबाव आला. त्याचबरोबर त्यांनी मटेरियल, टिकाऊपणा आणि उत्पादन प्रक्रियेवर पुन्हा लक्ष केंद्रित केलं आणि “Quality First” ही फक्त टॅगलाईन न राहता कंपनीची संस्कृती बनली. विक्री वाढवण्यासाठी त्यांनी Big Bazaar, Reliance Trends, Spencer’s यांसारख्या रिटेल चॅनेल्ससोबत भागीदारी केली आणि Amazon व Flipkart वर जाणारा भारतातील पहिला लगेज ब्रँड म्हणून Safari ने आपली वेगळी ओळख निर्माण केली. याच टप्प्यावरून Safari च्या यशाची खरी सुरुवात झाली.

    झपाट्याने वाढ आणि स्पर्धेत आघाडी

    २०१५ पर्यंत Safari ची विक्री १५० कोटींवर पोहोचली होती, ज्यातील सुमारे ३०% विक्री ई-कॉमर्समधून होत होती. २०१६ मध्ये Genius आणि Magnum या ब्रँड्सचे अधिग्रहण करून Safari ने शालेय बॅग्स आणि बजेट लगेज सेगमेंटमध्ये आपला विस्तार केला. या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे VIP आणि Samsonite सारखे दिग्गज ब्रँडही सावध झाले.

    VIP ने aspirational branding वर भर दिला, Samsonite ने पूर्णपणे ऑफलाइन नेटवर्कवर विश्वास ठेवला, तर Safari ने स्टायलिश जाहिराती, मोठ्या रिटेल स्टोअर्स आणि मजबूत ई-कॉमर्स या तिन्हींचा प्रभावी मेळ साधला. या स्मार्ट रणनीतीचा परिणाम असा झाला की २०१९ पर्यंत Safari ची विक्री ६०० कोटींवर पोहोचली आणि Samsonite ला मागे टाकत Safari भारतातील नंबर २ लगेज कंपनी बनली. COVID-19 च्या कठीण काळातही Safari ने १००% ऑर्डर्स पूर्ण करून आपली विश्वासार्हता आणि ताकद सिद्ध केली.

    यशाच्या शिखरावर 

    २०२३ पर्यंत VIP Industries ची मार्केट कॅप ८,४७६ कोटी होती, तर Safari ची विक्री १,२१२ कोटींवर पोहोचली. कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यूएशन ९,२७३ कोटी झाली आणि सुधीर जाटिया यांचं “उत्तर” सगळ्यांनाच दिसून आलं.

    आज Safari ची स्थिती आणखी मजबूत आहे . विक्री १,८०० कोटी, नफा १८५.५७ कोटी, ८०० हुन अधिक  प्रॉडक्ट्स आणि ९,३०० टचपॉइंट्ससह. कंपनीची मार्केट व्हॅल्यूएशन आता १०,७३४ कोटींवर पोहचलं आहे आणि Safari आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारी लगेज कंपनी म्हणून ओळखली जाते.

    आणखीन वाचा:

  • नादच खुळा! सॉफ्टवेअर इंजिनिअरने उभारला ११,२२७ कोटींचा ब्रँड; BlueStone च्या यशाचं नेमकं गुपित काय?

    आजच्या काळात ‘Set Life’ सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर चालण्याचं धाडस फार कमी लोक करतात. जेव्हा हाताशी IIT दिल्लीची पदवी आणि खिशात Amazon सारख्या जागतिक कंपनीचा कोट्यवधींचा पगार असतो, तेव्हा लोक सहसा स्थिरावण्याचा विचार करतात. पण गौरव सिंग कुशवाहा हे वेगळ्या मातीचे बनले होते. एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतातील ज्वेलरी मार्केटचा चेहरामोहरा कसा बदलला आणि ११,२२७ कोटींचे साम्राज्य कसे उभे केले? चला जाणून घेऊया BlueStone च्या यशाचं ‘अस्सल’ गुपित!

    करिअरची सुरुवात 

    गौरव सिंग कुशवाहा यांचा प्रवास सुरू झाला IIT दिल्ली मधून. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांच्यासमोर यशाचे पायघड्या अंथरल्या होत्या. त्यांनी Amazon मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून भारत आणि अमेरिकेत काम केले. पैसा, प्रतिष्ठा आणि सुख सोयी सर्व काही होते. पण त्यांच्या मनात एक स्वप्न सतत धडका मारत होतं – “स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं!”

    ठरलेल्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःचा नवा रस्ता शोधण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर दीड वर्षातच त्यांनी सुरक्षित नोकरीला रामराम ठोकला आणि उद्योजकतेच्या मैदानात उडी घेतली.

    पहिलं अपयश: जेव्हा स्वप्नांना ब्रेक लागला

     Amazon मध्ये सुमारे दीड वर्ष काम केल्यानंतर गौरव सिंग कुशवाहा यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि “Chapak” नावाचं ऑनलाइन मूव्ही पोर्टल सुरू केलं. 

    तब्बल ४ वर्षे त्यांनी यावर जीवापाड मेहनत घेतली. पण म्हणतात ना, “वेळ आणि काळ” नेहमी आपल्या बाजूने नसतो. त्या काळात स्मार्टफोनचा वापर फारसा नव्हता आणि व्यवसायासाठी ठोस कमाईचं मॉडेल तयार झालं नव्हतं. त्यामुळे Chapak अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही.

    पण गौरव खचले नाहीत. या अपयशाने त्यांना एक मौल्यवान धडा दिला: फक्त कल्पना चांगली असणं पुरेसं नसतं, तर योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि लोकांची खरी गरज ओळखणं तितकंच महत्त्वाचं असतं.

    समस्येतून संधीचा शोध

    या अपयशाच्या काळात गौरव सिंग कुशवाहा यांनी बाजाराकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं की भारतातील ज्वेलरी मार्केट प्रचंड मोठं आहे, तरीही त्याचा अगदी कमी भाग ऑनलाइन उपलब्ध आहे. Flipkart आणि Amazonसारखे प्लॅटफॉर्म असूनही फाइन ज्वेलरीची विक्री जवळजवळ पूर्णपणे ऑफलाइनच होत होती. 

    ज्वेलरी खरेदी ही केवळ वस्तू खरेदी नसून ती विश्वासावर आधारित प्रक्रिया होती. मर्यादित डिझाइन्स, किमती आणि शुद्धतेबाबत स्पष्ट माहिती नसणं, तसेच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन न मिळणं या मोठ्या अडचणी होत्या. ह्याच समस्या ओळखून गौरव यांनी त्यावर उपाय शोधण्याचं ठरवलं आणि इथूनच एका नव्या संधीची बीजं रोवली गेली. 

    ChatGPT Image Jan 12 2026 11 27 41 AM

    BlueStone चा जन्म

    ऑनलाइन शॉपिंगची लाट येत असताना सोन्या-चांदीचे दागिने ऑनलाइन का विकले जाऊ नयेत? याच प्रश्नातून२०११ साली गौरव यांनी विद्या यांना सहसंस्थापक म्हणून सोबत घेतलं आणि BlueStone या ऑनलाइन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. हा ब्रँड डिझाइनला प्राधान्य देणारा आणि तंत्रज्ञानावर आधारित होता. “Blue” म्हणजे विश्वास आणि “Stone” म्हणजे कारागिरी, या दोन मूल्यांवर BlueStone उभा राहिला. 

    ऑनलाइन ज्वेलरी खरेदी ही संकल्पनाच नवीन असल्याने सुरुवातीपासूनच हा प्रवास आव्हानात्मक होता. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे BlueStone समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं.  सुरुवातीला लोकांच्या मनात भीती होती – “ऑनलाइन सोनं कसं काय घ्यायचं?” ही भीती घालवण्यासाठी गौरव यांनी भन्नाट आयडिया वापरल्या:

    • Try at Home: दागिने विकत घेण्यापूर्वी घरी बसून ट्राय करण्याची सोय.
    • पारदर्शकता: प्रत्येक दागिन्याचं कॅरेट वजन, शुद्धता आणि हॉलमार्क सर्टिफिकेटची पूर्ण माहिती.
    • Customization: ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने बनवून मिळण्याची सोय.

    यामुळे BlueStone वरचा लोकांचा विश्वास वाढला आणि ऑर्डरचा ओघ सुरू झाला

    गुंतवणूक आणि वेगवान वाढ

    BlueStone ने इन्व्हेंटरी-लाइट आणि ऑर्डर-वर-निर्मिती मॉडेल स्वीकारलं, ज्यामुळे खर्च कमी राहिला आणि व्यवसाय सहज वाढू लागला. सुरुवातीला Accel, Kalaari आणि Saama कडून ६० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, आणि २०१५ पर्यंत महसूल ८० कोटी रुपये झाला. नंतर Accel, IvyCap आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली १०० कोटी रुपये अधिक गुंतवले गेले. एका वर्षातच कंपनी दरमहा ७,००० ऑर्डर्स पूर्ण करू लागली, ज्यात सरासरी विक्री २५,००० रुपये होती.

    ऑनलाइन ते ऑफलाइन प्रवास

    गौरव यांना लक्षात आलं की ज्वेलरी मार्केटमधला ऑनलाइन हिस्सा फक्त 0.५% आहे. मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी ऑफलाइन स्टोअर्स उघडणे आवश्यक होते. त्यामुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या Pacific Mall मध्ये पहिलं फिजिकल स्टोअर उघडलं. २०१९ पर्यंत BlueStone कडे २० स्टोअर्स झाले आणि महसूल ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. रोमँटिक-मुव्ही थीमवर आधारित LoveLike कॅम्पेनमुळे Millennials आणि Gen Z मध्ये ब्रँड खूप लोकप्रिय झाला. पाहता पाहता स्टोअर्सची संख्या १७५ च्या पार गेली.

    आणखीन वाचा:

  • श्वेत क्रांतीचा शिल्पकार: डॉ. वर्गीस कुरियन आणि अमूलची यशोगाथा – Amul Success Story

    श्वेत क्रांतीचा शिल्पकार: डॉ. वर्गीस कुरियन आणि अमूलची यशोगाथा – Amul Success Story

    डॉ. वर्गीस कुरियन यांची ओळख आणि सुरुवात

    डॉ. वर्गीस कुरियन हे आधुनिक भारताच्या कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळ राज्यात झाला. त्यांनी भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यांना मूळतः शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा नव्हती. मात्र, नियतीने त्यांना गुजरातमधील आनंद या छोट्या शहरात आणले आणि येथूनच भारतीय दुग्धक्रांतीचा इतिहास घडू लागला. त्या काळात भारत दूध उत्पादनात खूप मागे होता आणि शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या शोषणाला बळी पडत होते. दूध उत्पादकांना योग्य दर मिळत नव्हता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत होती. अशा परिस्थितीत डॉ. कुरियन यांनी शेतकऱ्यांच्या मालकीची, शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी सहकारी संस्था उभारण्याचा विचार मांडला. त्यांचा ठाम विश्वास होता की जर शेतकऱ्यांना निर्णयप्रक्रियेत सामील केले, तर ते स्वतःचे जीवनमान सुधारू शकतात. हीच विचारधारा पुढे अमूल आणि श्वेत क्रांतीचा पाया ठरली. 

    अमूलची स्थापना आणि सहकारी चळवळ

    १९४६ साली गुजरातमधील कैरा जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन केला, ज्यालाच पुढे “अमूल” म्हणून ओळख मिळाली. डॉ. वर्गीस कुरियन यांनी या संघटनेचे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व स्वीकारले. अमूलची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे “शेतकरी हा मालक” ही संकल्पना. दूध थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून प्रक्रिया केली जाऊ लागली आणि नफा मध्यस्थांकडे न जाता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागला. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला. अमूलने आधुनिक दुग्धप्रक्रिया तंत्रज्ञान, थंड साखळी व्यवस्था आणि गुणवत्तेवर आधारित उत्पादन पद्धती स्वीकारल्या. बटर, चीज, दूध पावडर यांसारखी उत्पादने तयार होऊ लागली. अमूलचा यशस्वी सहकारी मॉडेल पाहून संपूर्ण देशात अशाच संघटनांची उभारणी होण्यास सुरुवात झाली. यामुळे सहकारी चळवळ एक राष्ट्रीय आंदोलन बनली. 

    श्वेत क्रांती आणि ऑपरेशन फ्लड

    डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या दुग्ध चळवळीला राष्ट्रीय स्तरावर ऑपरेशन फ्लड या नावाने ओळख मिळाली. हे जगातील सर्वात मोठे कृषी विकास कार्यक्रमांपैकी एक मानले जाते. १९७० साली सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणे हा होता. ऑपरेशन फ्लडमुळे ग्रामीण भागातील लाखो शेतकरी थेट शहरी बाजारपेठांशी जोडले गेले. दूध संकलन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे आणि वाहतूक व्यवस्था उभारली गेली. यामुळे दूध वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आणि ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळू लागले. या क्रांतीमुळे भारत काही दशकांतच जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. श्वेत क्रांतीने केवळ उत्पादन वाढवले नाही, तर ग्रामीण रोजगार, महिलांचा सहभाग आणि आर्थिक स्थैर्य यांनाही चालना दिली. डॉ. कुरियन यांची ही कामगिरी केवळ कृषी क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरली.

    शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकास

    श्वेत क्रांतीचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण शेतकऱ्यांना झाला. डॉ. वर्गीस कुरियन यांनी दुग्धव्यवसायाला केवळ उद्योग न मानता ग्रामीण विकासाचे साधन मानले. अमूलच्या सहकारी संस्थांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढला. अनेक महिलांना पहिल्यांदाच स्वतःचे उत्पन्न मिळू लागले आणि त्यांचा सामाजिक दर्जा उंचावला. दूध विक्रीतून मिळणारे नियमित उत्पन्न शिक्षण, आरोग्य आणि पोषणासाठी वापरले जाऊ लागले. यामुळे ग्रामीण जीवनमानात मोठा बदल झाला. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांनाही या व्यवस्थेत समान संधी मिळाली. कोणताही भेदभाव न करता दूध गुणवत्तेनुसार दर दिले जाऊ लागले. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवले आणि गाव पातळीवर नेतृत्व विकसित केले. डॉ. कुरियन यांचा ठाम विश्वास होता की खरी विकास प्रक्रिया तळागाळापासून सुरू झाली पाहिजे. त्यांची ही दृष्टी आजही भारताच्या ग्रामीण विकास धोरणांसाठी प्रेरणादायी आहे.

    the Amul success story

    डॉ. वर्गीस कुरियन यांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी मान्यता मिळाली. त्यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ची स्थापना करून दुग्धविकासाला संस्थात्मक स्वरूप दिले. त्यांच्या नेतृत्वशैलीत प्रामाणिकपणा, शिस्त आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा दिसून येते. त्यांनी कधीही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता देशहित आणि शेतकरीहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आले. अनेक देशांनी भारतीय दुग्ध सहकारी मॉडेलचा अभ्यास करून ते आपल्या देशात राबवले. डॉ. कुरियन हे केवळ प्रशासक नव्हते, तर दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी दाखवून दिले की योग्य व्यवस्थापन आणि प्रामाणिक उद्देश असतील, तर कोणतेही राष्ट्र आत्मनिर्भर होऊ शकते.

    डॉ. वर्गीस कुरियन यांचे २०१२ साली निधन झाले, पण त्यांचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहेत. अमूल हा आज भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडपैकी एक आहे आणि लाखो शेतकऱ्यांचे जीवन त्याच्याशी जोडलेले आहे. श्वेत क्रांतीमुळे भारताची अन्नसुरक्षा मजबूत झाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळाले. आजही “शेतकऱ्यांच्या मालकीचा उद्योग” ही संकल्पना अनेक नव्या स्टार्टअप्स आणि सहकारी संस्थांसाठी आदर्श ठरत आहे. डॉ. कुरियन यांचा वारसा आपल्याला सामाजिक जबाबदारी, स्वदेशी विचार आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व शिकवतो. त्यांनी दाखवलेला मार्ग केवळ दूध उत्पादनापुरता मर्यादित न राहता इतर कृषी क्षेत्रांनाही लागू पडतो. त्यामुळेच त्यांना भारताला दूध उत्पादक देश बनवणारा श्वेत क्रांतीचा जनक असे सन्मानाने संबोधले जाते. त्यांचे जीवन हे सेवाभाव, नेतृत्व आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे.

    आणखीन वाचा:

  • दोन अपयशांनंतर उभा केलेला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा होम-सोल्यूशन्स ब्रँड: Wakefit

    दोन अपयशांनंतर उभा केलेला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा होम-सोल्यूशन्स ब्रँड: Wakefit

    Wakefit बद्दल जाणून घ्या.

    भारतामध्ये स्टार्टअप्सची मोठी लाट आली तेव्हा काही उद्योजकांनी प्रचंड यश मिळवलं, तर काहींची स्वप्नं अपयशामुळे कोलमडली. पण अपयशाचा स्वीकार करून पुन्हा उभं राहणं, स्वतःचा उद्योग उभारणं आणि लाखो ग्राहकांचा विश्वास मिळवणं,ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही. अशा मोजक्याच धैर्यवान उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे चैतन्य रामलिंगेगौडा. मध्यमवर्गीय घरात वाढलेला हा तरुण, शिक्षण पूर्ण करून मोठ्या करिअरच्या संधींच्या उंबरठ्यावर असताना काहीतरी वेगळं करण्याच्या स्वप्नाने प्रेरित झाला. पण त्याचे सुरुवातीचे दोन स्टार्टअप्स अपयशी ठरले आणि त्याला पुन्हा नव्याने विचार करावा लागला.

    याच टप्प्यावर चैतन्य यांनी हार न मानता, स्वतःच्या चुका समजून घेतल्या आणि लोकांच्या खऱ्या गरजा ओळखण्यावर लक्ष केंद्रित केलं. चिकाटी, सातत्य, ग्राहकांचा सखोल अभ्यास आणि अखंड मेहनत यांच्या बळावर त्यांनी Wakefit ला करोडोंची कंपनी बनवलं. आजच्या या लेखात आपण अपयशातून शिकत यशाकडे वाटचाल कशी केली, याचा त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकूया.

    कर्नाटकातील मध्यमवर्गीय घरातून ISB पर्यंतचा प्रवास

    चैतन्य रामलिंगेगौडा यांचा जन्म कर्नाटकमधील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मेहनत, शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या संस्कारात वाढलेल्या चैतन्य यांनी लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य राखलं. त्यामुळेच त्यांनी VTU मधून कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेतलं आणि नंतर भारतातील प्रतिष्ठित संस्थेत मानल्या जाणाऱ्या ISB हैदराबादमधून MBA पूर्ण करून कुटुंबाचा अभिमान वाढवला. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात बुद्धिमत्ता, मेहनत आणि स्वतःला सिद्ध करण्याची ओढ स्पष्ट दिसत होती.

    पण अभ्यासात यश मिळूनही खऱ्या आयुष्याचा प्रवास इथेच थांबला नाही. उच्च शिक्षणानंतर चैतन्य यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवणाऱ्या घटनांची सुरुवात झाली. मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही, त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न मनात जपलं. आयुष्यात जोखीम घेण्याचा निर्णय घेत त्यांनी उद्योजकतेची दिशा पकडली. 

    पहिले दोन स्टार्टअप्स अपयशी 

    चैतन्य रामलिंगेगौडा यांनी उद्योजकतेत पहिले पाऊल टाकलं ते TwolyMadlyDeeply या डेटिंग मीटअप ॲपद्वारे. ॲपची कल्पना नाविन्यपूर्ण होती आणि उत्पादन देखील चांगलं होतं. पण व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा मॉनेटायझेशनचा मार्ग त्यांना सापडला नाही. वापरकर्त्यांची संख्या वाढत असतानाही आर्थिक स्थैर्य मिळू शकत नव्हतं, आणि शेवटी हा उपक्रम बंद करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. यानंतर त्यांनी मीडिया क्षेत्रात दुसऱ्या स्टार्टअपची सुरुवात केली, पण इथेही अपेक्षित प्रोडक्ट-मार्केट फिट साधता आलं नाही. लोकांना नक्की काय हवं आहे आणि ते कशासाठी पैसे मोजायला तयार आहेत हे समजून घेणं त्यांच्या दृष्टीने अजूनही एक महत्त्वाचं आव्हान होतं.

    सलग दोन अपयश कोणालाही खचवू शकतात, अनेक जण या टप्प्यावर धैर्य सोडून परत नोकरीच्या मार्गावर वळले असते. पण चैतन्य यांची वृत्ती वेगळी होती. त्यांनी अपयशाकडे अडथळा म्हणून पाहिलं नाही, तर शिकण्याची संधी म्हणून घेतलं. कुठे चूक झाली?, ग्राहकांच्या खऱ्या समस्या काय आहेत?, लोक काय शोधत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी अधिक अभ्यास केला.

    समस्या शोधली – Wakefit  ची सुरुवात 

    Wakefit ची सुरुवात एका रोजच्या पण महत्त्वाच्या समस्येपासून झाली. एकदा चैतन्य यांचा मित्र अंकित सतत पाठीच्या दुखण्याची तक्रार करत होता. उपाय शोधताना दोघांना लक्षात आलं की बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक गाद्या महाग आहेत, त्यांचा दर्जा समाधानकारक नाही आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. महागड्या गाद्या घेतल्या तरी आराम मिळत नाही, हमी फक्त कागदोपत्री असते आणि ग्राहक कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत,हीच खरी समस्या होती. तेव्हा चैतन्य आणि अंकित यांनी ठरवलं की मॅट्रेस उद्योगच बदलायचा. फक्त बोलून न थांबता, त्यांनी स्वतःची १३ लाखांची बचत जमा करून Hosur–Mysore औद्योगिक पट्ट्यात एक छोटंसं फोम कटिंग आणि मॅट्रेस असेंब्ली युनिट सुरू केलं. आणि याच ठिकाणी मार्च २०१६ मध्ये Wakefit चा जन्म झाला.

    सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. वर्कफोर्स जवळजवळ नसल्यामुळे दोघांनाच सर्व कामं हाताळावी लागत होती. चैतन्य दिवसभर फोमची गुणवत्ता, डेन्सिटी आणि मटेरियल तपासत, तर रात्री ते स्वतःच ग्राहकांच्या घरी गाद्या पोहोचवत. ग्राहकांचा विश्वास मिळवणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं जाणून त्यांनी भारतात पहिल्यांदाच १००-night free trial सुरू केलं,ग्राहकांनी गादी १०० रात्री वापरून पाहावी, न पसंत पडली तर परत करावी, कोणताही प्रश्न नाही. तक्रारी असोत, विलंब असो किंवा फोन कॉल्स,सगळं चैतन्य स्वतः सांभाळत होते. हळूहळू ही पारदर्शकता, मेहनत आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन लोकांच्या मनाला भिडला. आणि इथूनच Wakefit च्या उल्लेखनीय यशाची खरी सुरुवात झाली.

    माऊथ मार्केटिंग मुळे व्यवसायात प्रचंड वाढ 

    Wakefit च्या वेगवान वाढीमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचं डायरेक्ट-टू-कन्स्युमर (D2C) मॉडेल. या मॉडेलमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणतेही दलाल किंवा दुकानदार नसतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि ग्राहकांना बाजारातील इतर ब्रँड्सपेक्षा ४० % स्वस्त आणि दर्जेदार उत्पादने मिळू लागली. समाधानी ग्राहकांनी Wakefit बद्दल इतरांनाही सांगितल्याने माऊथ मार्केटिंग वाढत गेलं. परिणामी, २०१८ मध्ये Wakefit चा महसूल तब्बल ८० कोटींवर पोहोचला. ही वाढ इतकी उल्लेखनीय होती की Sleepwell आणि Kurlon सारखे मोठे ब्रँडदेखील या नव्या स्पर्धकाकडे लक्ष देऊ लागले.

    याच वर्षात Wakefit ला मोठा टप्पा गाठता आला, कारण Sequoia Surge या प्रतिष्ठित गुंतवणूकदाराने कंपनीत ६५ कोटींची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीच्या जोरावर Wakefit ने सोनीपत आणि होसूर येथे मोठी आणि आधुनिक उत्पादन केंद्रे उभारली. उत्पादन क्षमता वाढली, सेवा अधिक वेगवान झाली आणि ग्राहकांचा विश्वास आणखी मजबूत झाला. २०१९ पर्यंत कंपनीचा महसूल जवळजवळ १९७ कोटींवर पोहोचला आणि Wakefit देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक बनला.

    यशाच्या शिखरावर 

    Wakefit ने फक्त गाद्यांपुरतं मर्यादित न राहता सोफा, बेड, वॉर्डरोब, स्टडी टेबल अशा घरासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रॉडक्ट्सची निर्मिती सुरू केली. दर्जेदार आणि परवडणारी उत्पादने दिल्यामुळे कंपनीचा महसूल ४०० कोटींच्या पुढे गेला. त्यांनी भारतातील पहिला Sleep Research Lab सुरू केला आणि त्यांच्या मार्केटिंग मोहिमा देशभरात वायरल झाल्या.

    Wakefit ची ताकद म्हणजे गुणवत्ता आणि सततचा नवोन्मेष. दररोज ५०० पेक्षा जास्त गाद्या तयार होतात आणि महिन्याला जवळपास ९,००० गाद्या ग्राहकांकडे पोहोचतात. त्यांच्या फोमला आंतरराष्ट्रीय Certi-PUR आणि Greenguard प्रमाणपत्रे आहेत. भारतातील मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पाठीच्या वेदना आणि झोपेच्या समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून अधिक आरामदायी आणि आरोग्यदायी मॅट्रेस तयार केल्या.

    २०२१ ते २०२४ या कालावधीत Wakefit ने झपाट्याने प्रगती केली. २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन ३८०  दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचलं. २०२२ मध्ये महसूल ८२० कोटींवर गेला आणि Investcorp कडून २०० कोटींची गुंतवणूक मिळाली. २०२४ मध्ये Wakefit ने १००० कोटी महसूल, ६५ कोटी नफा आणि २ मिलियनहून अधिक ग्राहकांची नवी उंची गाठली. आज Wakefit देशभर ५ उत्पादन केंद्रे आणि ९८ स्टोअर्ससह भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक आहे.

    मित्रांनो, चैतन्य आणि अंकित यांनी अपयश आल्यावरही हार मानली नाही. ग्राहकांच्या गरजा समजून घेणं, गुणवत्ता कधीही न घसरू देणं आणि सतत सुधारत राहणं,या तत्त्वांमुळेच Wakefit आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. एका साध्या समस्येतून उगम पावलेली कल्पना आज उपाय बनली, उपायातून ब्रँड तयार झाला आणि तोच ब्रँड आता भारतातील १००० कोटींपेक्षा मोठी कंपनी बनला. Wakefit ही फक्त कंपनी नाही, तर तरुण उद्योजकांसाठी जिद्द, सातत्य आणि शिकण्याची प्रेरणा देणारी एक जिवंत उदाहरण आहे की अपयश हा शेवट नसून, मोठ्या यशाची सुरुवात असते.

    आणखीन वाचा:

  • Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    इटली देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अब्जाधीश ब्रँड मालक जॉर्जिओ अरमानी यांचे दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अरमानी ही कंपनी गुच्ची आणि प्राडा नंतर इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फॅशन समूह मानला जातो. या ब्रँडखाली शेकडो स्टोअर्स आणि 10 अब्जाहून अधिक डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. मिलानच्या रेडी-टू-विअर फॅशनमध्ये अग्रणी ठरलेले अरमानी यांनी ‘अनस्ट्रक्चर्ड लुक्स’ द्वारे फॅशनमध्ये क्रांती घडवून आणली होती. ते इटालियन शैली आणि शालीनतेचे मूर्तिमंत स्वरूप होते.

    मिलानच्या रस्त्यावरून चालणाऱ्या एका साध्या मुलाने कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस तो जगभरातल्या फॅशनविश्वाला नवं रूप देईल. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेला हा तरुण, थोडे दिवस सैन्यात आणि मग एका दुकानातल्या शोकेस सजवण्यात रमला. परंतु त्याच्या डोळ्यात मात्र कपड्यांच्या पलीकडचं स्वप्न होतं. अखेर सर्जियो गॅलोटी या मित्रासोबत १९७५ च्या दशकात त्याने स्वतःचा ब्रँड उभारला.

    पुढे काळ बदलत गेला आणि त्यांचे कष्ट आणि कल्पकता सतत वाढत राहिले. त्यांनी एम्पोरियो अरमानी, अरमानी ज्युनियर आणि एएक्स अरमानी एक्सचेंज यांसारख्या नव्या श्रेणींमधून जागतिक स्तरावर आपला ब्रँड विस्तारला. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम तसेच होम फर्निशिंग क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले. हॉलीवूडमधील १९८० साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर गिगोला चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन तयार करताच जगाने त्यांच्या नावाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. चित्रपट उद्योगाशी असलेल्या या संबंधामुळे त्यांचे नाव आणि ब्रँड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आले. अरामानींनी शंभराहून अधिक चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले.


    त्यानंतर जॉर्जिओ अरमानी (Giorgio Armani) फॅशनच्याही पलीकडे गेली. फॅशनच्या पलीकडे जाऊन त्यांनी हॉटेल्स, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवले. दुबईतील अरमानी हॉटेल, ऑलिंपिक व विविध व्यावसायिक क्रीडा संघांसाठी गणवेश डिझाइन, तसेच एम्पोरियो अरमानी कॅफे संगीत संकलनांचे क्युरेशन हे त्याचे काही उल्लेखनीय उपक्रम ठरले. त्यांच्या नावावर उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे फक्त कपड्यांचं नव्हे, तर आज ते शालीनतेचं प्रतिक आहे.

    आज त्यांच्या जाण्याने जग शोकाकुल आहे, पण त्यांनी विणलेली शैली अजूनही जिवंत आहे. “खरा डिझायनर तोच, जो स्वप्नांना कृतीतून प्रत्यक्षात घडवतो“ हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शून्यातून विश्व उभे करण्याचा त्यांचा प्रवास आज सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.


    जॉर्जिओ अरमानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    आणखी वाचा :