Category: लेखमालिका

  • व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे

    व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे

    कर्ज, आजार व शत्रू याकडे तुम्ही लक्ष नाही दिले व वेळीच उपाय नाही केला, तर तुमचे आयुष्य उध्वस्त करते. आज व्यवसाय, उद्योग करत असताना व सर्वसामान्य जीवन जगत असताना कर्ज हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जास्तीत जास्त कर्ज घेऊन जो अत्यंत चांगल्या पध्दतीने हाताळतो तो प्रगती साधतो. बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना मार्केट कंडिशनमुळे किंवा स्वतःच्या चुकीमुळे नुकसान होते. चढउतार येत असतात व कर्जाचा कमी अधिक डोंगर उभा राहतो. तेव्हा कर्ज हाताळण्याची काही सूत्रं स्वतःला घालून घेतली पाहिजेत.

    दुसरे सूत्र म्हणजे; कर्ज काढण्यापूर्वी व्याजदराचे पर्याय शोधा. केव्हाही बँका किंवा अर्थसंस्थांकडून कर्ज घ्या. खाजगी व्यक्तीकडून कर्ज केव्हाही घेऊ नका. मित्र, नातेवाईकांकडून कर्ज घेणे टाळा. तुमचा उद्योग ही पूर्णतः वेगळी एन्टीटी आहे. तिचा कोणताही मित्र, नातेवाईक व इतर खाजगी व्यक्तीच्या व्यवहारात संबंध येऊ देऊ नका. खाजगी जीवन हे खाजगीच ठेवा व व्यावसायिक जीवन हे व्यावसायिकच ठेवा. कोणतेही आर्थिक संबंध नसल्यावरच मैत्री व नातेवाईकांचे नाते व प्रेम टिकून राहते.

    तिसरे सूत्र म्हणजे; काढलेले कर्ज हे नेहमी व शक्य तितक्या खेळत्या भांडवलासाठी वापरा व त्याद्वारे व्यवसायाची जास्तीतजास्त उलाढाल करा. कर्ज नेहमी उत्पादक बाबींसाठीच वापरा. परतावा न देणाऱ्या कोणत्याही बाबीसाठी कर्ज वापरू नये. बहुसंख्य व्यावसायिक ह्याच कारणामुळे गोत्यात येतात. कर्ज काढले की काही भाग लग्नासाठी वापरतात, घराचे इंटेरिअर करणे, गाडी घेणे इत्यादीसाठी पैसे खर्चून बसतात.

    चौथे सूत्र म्हणजे; कर्ज घेतल्यावर रिलॅक्स होऊ नका. ते तुम्हाला व्याजासहित परत फेडायचे आहे लक्षात ठेवा. ३ वर्षांनी, ५ वर्षांनी फेडायचे आहे म्हणून निवांत राहू नका. फेडण्यासाठी लागणारा भाग प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवा.

    पाचवे सूत्र म्हणजे; कर्जाचा डोंगर उभा राहिला व फिटण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहत नाही असे वाटत असेल, तर पटकन प्रॉपर्टीचा भाग विकून, कर्ज फेडून योग्य वेळी मोकळे व्हा. समाज व लोक काय म्हणतील म्हणून लाजेपोटी गप्प राहू नका. योग्य वेळी व पटापट निर्णय घेतल्यास व्याज व दंडही कमी बसेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मोकळे होऊन व्यवसायातील पुढील निर्णय घेऊ शकाल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे

    व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे

    एक बिल्डर आमच्याकडे आले. त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये ६० फ्लॅट विक्रीविना पडून होते. त्याचा खप लवकर व्हावा म्हणून त्यांनी विविध ठिकाणी केवळ एक महिन्यात १० ते १२ लाख रुपये खर्च केले; पण फ्लॅट काय विकले गेले नाहीत. काय चूक झाली त्यांची? म्हणतात ना, तूप खाल्यावर रूप येत नाही किंवा आज लावलेल्या झाडाला उद्या लगेच फळे लागत नाहीत. किंवा आज मेकअप करून उद्या कोण हिरॉईन होणार नाही, दिल्लीत यूपीएससीचा क्लास लावला म्हणून कोणी आयएएस ऑफिसर होणार नाही. जगात कोणताही रिझल्ट किंवा यश असे सहजासहजी मिळत नाही. बिझनेसचेही तसेच आहे, फक्त पैसा खर्च केल्यानेच काही होत नाही. मार्केटिंगची व ब्रँडिंगची नियोजनबद्ध प्रक्रिया पार पाडावी लागते. त्या त्या गोष्टीला कालावधी घ्यावा लागतो.

    आज १० किलो तूप प्यायल्यावर उद्याच्या उद्या कोण पैलवान होणार नाही. उलट आहे ती तब्येतही ढासळेल. पण त्याऐवजी त्याने रोज ५० ग्रॅम तूप प्यायले व १ तास व्यायाम केला तर त्याची तब्येत नक्कीच सुधारून तो पैलवान होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पुढे जाऊन तो रोज १०० ग्रॅम, २०० ग्रॅम असे तूप पिणे वाढवू शकतो. त्याचबरोबर त्याला व्यायामही वाढवावा लागेल. तसेच कोणत्याही व्यवसायात अचानक जाहिरातबाजी करून फायदा होत नसतो. तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला शास्त्रीय पध्दतीने ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्लॅनिंग करून राबवावे लागते. फ्लॅट खपत नाहीत म्हणून १० लाख जाहिरातींवर घालविले म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे. अगोदरच खप नाही, त्यात १० लाख वाया! व्यवसायात कोणत्याही नियोजनाशिवाय खर्च केलेला पैसा वाया जाऊन नुकसानीस सामोरे जावे लागते. आज जाहिरात केली आणि उद्या प्रॉडक्ट खपला एवढं सोपं नाही.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?

    मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?

    ) गर्भ व बाल संस्कार :

    लहानपणीच मुलांना श्रीमंतीच्या व यशस्वी उद्योजकांच्या गोष्टी सांगितल्या व दाखवल्या पाहिजेत, जसे जिजाऊंनी शिवबाला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू दिले. ज्यू, मारवाडी, गुजराती, पारशी लोक लहानपणापासूनच मुलांवर व्यवसाय करण्याचे संस्कार करतात. यामुळे मुलांना लहानपणापासून व्यवसायाविषयी आवड निर्माण होईल.

    ) शिक्षण :

    ) प्रयोग करा :

    हायस्कूल जीवनापासूनच छोट्या मोठ्या व्यवसायाचे प्रयत्न सुरू करा. दिवाळीत फटाके, फराळ, उन्हाळ्यात आंबे, लोणचे यांचे स्टॉल लावणे इत्यादी प्रयोग करीत रहा. मुलांना व्यापार म्हणजे काय असतो ते कळेल.

    ) वाचन :

    उद्योजकतेविषयी मासिके, पुस्तके, पेपर, लेख इत्यादी वाचण्यासाठी सतत घरात ठेवा. मोकळ्या वेळेत तुम्हीही वाचा व मुलांनाही वाचण्यास सांगा. वाचल्यामुळे विचार करण्याची पातळी वाढेल व त्यांना जग समजेल.

    ) भेटा :

    सेमिनार, कन्सलटंट, व्याख्याने, उद्योजक इत्यादींना जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मुलांसोबत भेटा. यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येईल, उद्योजक व श्रीमंत लोकही आपल्यासारखेच असतात, आपण जर मेहनत केली, तर आपणही उद्योजक होऊ शकतो असा विश्वास त्यांना येईल.

    ) पहा :

    टीव्ही, सिनेमा, डीव्हीडी, यूट्युबवर अनेक उद्योग व श्रीमंती विषयी कार्यक्रम येत असतात ते न चुकता कुटुंबासमवेत पहा, त्यातून माहिती मिळत जाईल.

    ) पैसे दाखवा :

    मुलांना पैसा काय असतो तो दाखवा. लपवून ठेवू नका. पगार आल्यावर पैशाचे गठ्ठे मुलांना दाखवा. दाखविल्यास पैसा कळेल व कमवण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल.

    ) जबाबदारी टाका :

    अगदी शालेय जीवनापासूनच हळूहळू थोडीथोडी जबाबदारी टाकण्यास सुरू करा. उदा. किराणा माल आणणे, भाजीपाला आणणे, शेतीकडे लक्ष देणे, बँकेचे लहानसहान व्यवहार इत्यादी.

    ) उठ-बस:

    मुलांना लहान समजू नका. कमी वयातच त्यांची मोठ्या व्यक्तीत उठ-बस जाणीवपूर्वक वाढवा. त्यामुळे मुलं लवकर मॅच्युअर (प्रगल्भ) होतील.

    १०) कल्पक :

    क्रिएटिव्हिटी हा जीवनाच्या प्रगतीचा पाया आहे. मुलांना कल्पक विचार करायला शिकवा. आयडियाज तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.

    ११) करिअर कौन्सेलिंग:

    मुलांची आवड, कला, कुवत व पालकांची शिक्षण, करिअरवर खर्च करण्याची तयारी यासर्वांचा विचार करून तज्ज्ञ व्यक्तीकडून करिअर सल्ला घेणे शक्य आहे.

    १२) लाज सोडून मेहनत :

    मेहनत करण्यासाठी लाज वाटता कामा नये, याची सवय तुम्ही मुलांच्यात लहानपणापासून लावली पाहिजे. पडेल ते काम करायची मुलांना सवय लावा. कुठलंही काम छोटं नसतं हे त्यांच्या मनावर बिंबवा. नाहीतर आज सुशिक्षित बेकार मुलं शेतात काम करायला लाजतात.

    १३) पर्सनॅलिटी (व्यक्तिमत्त्व) :

    प्रत्येक यशस्वी व्यक्तीची एक आकर्षक पर्सनॅलिटी असते ती तुमच्या मुलांची जाणून विकसित करा.

    १४) संवाद कौशल्य :

    शिक्षक व व्यवसायिक ठिकाणी प्रत्येक भेटीवेळी, फोनवर व ईमेल वर कसा संवाद साधावा याचे ज्ञान घ्या.

    १५) आर्थिक साक्षरता :

    मुलांचे बँकेत खाते काढा, पॅनकार्ड, शेअर मार्केट, एफ डी, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, व्याज, चक्रवाढ व्याज, व्हेंचर कॅपिटल इत्यादी अनेक बाबीची माहिती त्यांना करून द्या.

    १६) मोठी स्वप्ने जागवा :

    मोठा पैसा, बंगला, कार गाड्या, आलिशान ऑफिस अशा मोठ्या गोष्टींची स्वप्ने मुलांच्यात सतत जागवा. तशा प्रकारची पोस्टर्स, वॉलपेपर्स मुलांच्या खोलीत लावा.

    १७) सेल्समन बना :

    कोणताही यशस्वी उद्योजक व श्रीमंत व्यक्ती हा हाडाचा सेल्समन असतो हे लक्षात ठेवा. आपली वस्तू, सेवा, प्रोजेक्ट, ब्रँड सतत विकता आला पाहिजे. जसे पटेल लोकांबद्दल म्हटलं जातं ना, ‘पटेल्स आर बॉर्न टू सेल’ तेव्हा हाडाचे सेल्समन बना.

    १८) स्मार्ट गोल सेट करा :

    Specific, Measurable, Achievable, Realistic, Timely (SMART) असा प्रत्येक ५ वर्षांचा गोल सेट करा.

    19) संधी ओळखणे :

    संधी ओळखणे व ती व्यवहारात आणणे हा श्रीमंत व यशस्वी व्यक्तीचा गुण आहे तेव्हा मुलांच्यात संधी ओळखायला शिकण्याचे कौशल्य विकसित करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस

    उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस

    सर्वसाधारण नोकरी करण्याचीच ज्या कुटुंबात प्रथा आहे, त्या कुटुंबातील कोणीही व्यवसायात आला तर लोकांना वाटते की, आता लगेच पैसा मिळायला हवा. पण नोकरी म्हणजे, बे एके बे. पगाराचा कालावधी एक महिन्याचा असतो. महिना झाल्यावरच ठराविक रक्कम हातात येते. तर उद्योग म्हणजे; बे दुणे चार, चार दुणे आठ… पण व्यवसायाचा कालावधी हा किमान १ हजार दिवसांचा असतो. अर्थात व्यक्तिपरत्वे, व्यवसायपरत्वे हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.

    जसे स्त्री एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने घेते, पण नऊ स्त्रिया मिळून एका महिन्यात एका मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. तसेच एखाद्या माणसाला, नवउद्योजकाला उद्योग समजण्यासाठी, मार्केटमधील सर्व प्रक्रिया, तेजी मंदी, खरेदी, विक्री, जाहिरात, मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाच्या सर्व खाचाखोचा समजून त्याला व्यवसायात तरबेज होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात, मग तुमच्याकडे कितीही भांडवल असू द्या.

    तुमच्याकडे जरी २० लाखांचे भांडवल असले तर ते टप्याटप्प्याने गुंतवत जा. सर्व भांडवल एकदम गुंतवले, तर अनुभवाविना नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. प्रथम ५ लाख गुंतवा. पहिले सहा महिने व्यवसाय करा व शिका. नंतर पुढचे पाच लाख गुंतवा. असे हळूहळू भांडवल वाढवत जा व व्यवसायात तीन वर्षात चांगल्या प्रकारे जम बसवा. नाहीतर एकदम गुंतवाल अन उत्पन्न नाही आल्यावर स्वतःचा खर्च, बँकेचे हप्ते याचे टेन्शन यायला लागेल व व्यवसाय सोडून पैशाच्या जुळवाजुळवीत वेळ जाऊन फ्लॉप शो होईल. परंतु तुम्ही टप्पाटप्प्याने २० लाख गुंतवले तर तुम्हाला अनुभव येईल, मार्केटचा अंदाज येईल, बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येईल. त्यामुळे रिस्क कमी होईल. तीन वर्षात तुमची चांगली बॅलन्सशीट तयार होऊन कोणतीही बँक २५ ते ३० लाख नवीन भांडवलही देईल. तेव्हा व्यावसायिक बंधूनी १००० दिवस हा कालावधी लक्षात ठेवावा व त्यानुसार मार्गक्रमण करावे. नाहीतर आरंभशूर खूप असतात व ते दोन तीन महिन्यात यशाची अपेक्षा करतात आणि अपयशी झाल्यावर स्वतःच्या अपयशाचे खापर व्यवसायावर आणि इंडस्ट्रीवर फोडतात. त्यामुळे समाजात व्यवसायाविषयी नकारात्मक वातावरण तयार होते व नवीन व्यावसायिक तयार होत नाहीत. तुम्ही असे करू नका.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे ?

    आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे ?

    १) गोल सेट करा व बाकी कचरा फेका :

    ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका. ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा.

    २) दैनंदिन सवयी विकसित करा :

    ३) यश व्हीज्युअलाईझ करा :

    यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.

    ४) नेटवर्क विकसित करा :

    समविचारी लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ.

    ५) लवकर सुरुवात करा :

    उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.

    ६) जागा ठिकाण बदला :

    चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते. प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

    ७) माईंड रीड करा :

    कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते.

    ८) स्वतःशी प्रामाणिक रहा :

    जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात.

    ९) डिसीप्लीन मेंटेन करा :

    शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येय गाठण्यास मदत होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!

    परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!  

    घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवायचे. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले आणि किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.

    त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, नवनवीन गोष्टी वाचा, podcast ऐका, मोठ्या लोकांचे interviews पहा त्यातून जेवढं शिकता येईल तेवढं शिका. निर्णय घेण्यास वेग द्या व स्वतःला सुनील होण्यापासून वाचवा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!

    रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!

    जगभरात श्रीमंत व्यक्तींच्या आचरणाचे अध्ययन करण्यात आले, त्यात असे लक्षात आले की, जवळपास सर्व श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती नियमित वाचन करतात, तर गरीब लोक टीव्ही पाहतात व मोबाईलवर टाईमपास करतात. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने, त्यातील एखाद्या घटनेने आयुष्यात मोठी प्रेरणा मिळून आपले जीवन बदलू शकते. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात.

    ग्रंथ आमुचे साथी… ग्रंथ आमुच्या हाती…

    ग्रंथ उजळती अज्ञानाच्या… अंधाराच्या राती…

    या ग्रंथांच्या तेजामधुनी, जन्मा येते क्रांती,

    ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती

    निराश जीवा धीर धरूनी पुढे घेऊनी जाती…

    वाचन करणाऱ्या माणसाची कल्पनाशक्ती विकसित होते व तो नवनवीन गोष्टी शिकत राहतो. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगला (कल्पक विचारशक्ती) चालना देणारे माहितीपूर्ण वाचन करा. राजकीय चिखलफेक, अपघात, बलात्कार, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार, आंदोलने, मोर्चे, खंडणी, आत्महत्या अशा संबधी बातम्या व माहिती देणारे वाचन करू नये, त्यामुळे तुमचे मन व विचारही कलुषित होतात.

    रोज ५ किमी चालण्याने रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. रोज चालायची सवय मेंदूसाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

    त्यामुळे आयुष्यात श्रीमंत व निरोगी होण्यासाठी माणसाने रोज किमान ५ किमी चालावे, किमान ५ पाने वाचावी व पाच वाक्ये लिहावीत आणि मोबाईल व टीव्ही यांचा गरजेपुरताच वापर करून त्यापासून दूर व्हावे, मग बघा श्रीमंती तुमच्या घरी कशी आपोआप चालत येईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती

    व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती

    व्यापार हा चतुराईने होत असतो. तुमच्याकडे खूप भांडवल, खूप हुशारी आहे, तुम्ही खूप मेहनती आहात, तरीही व्यापारात यशस्वी होण्यासाठी चतुराई खूप महत्वाची आहे. फक्त मेहनतीनेच व्यापार होत असता, तर काबाडकष्ट करणारे सर्वजण व्यापारी व श्रीमंत झाले असते. चतुराई म्हणजे योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची कला… योग्य व्यक्ती, संस्थांशी संवादाची कला… कधी थांबायचे, कधी माघार घ्यायची, कधी व कसे आक्रमक व्हायचे? कधी बचत करायची, कधी खर्च करायचा याचे तारतम्य. मार्केटची हवा ओळखून आपला बिझनेस चालविणे होय.

    नीती म्हणजे तुमचा व्यवसाय करण्याच्या पध्दतीमुळे मार्केटमध्ये तुमचा एक प्रकारचा नावलौकिक तयार होतो. तुमची व्यापार करण्याची हातोटी, व्यवहार करण्यातील प्रामाणिकपणा, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा, योग्य ब्रँड व व्यक्तीबरोबर नेटवर्क यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुमचे नाव व ब्रॅंड तयार होतो व व्यवसाय मोठा होतो. याचा मूलभूत पाया व तयारी तुमच्या नीतीपासून तयार होते. तुमच्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही प्रोफेशनल वागत असाल तर अधिक चांगले लोक तुम्हाला येऊन मिळतील. तुम्ही पुरवठादारांची देणी वेळेत देणार असाल, तर अधिक क्रेडिट मिळते व मोठी पत तयार होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा

    जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा  

    गाडी वेगाने कशामुळे धावते? असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला, तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, ॲक्सलरेटर, चाक अशी उत्तरे दिली. ही उत्तरं बरोबर आहेत. परंतु मित्रहो थोडा वेळ विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता, तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही. वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते. ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात. जशी आकाशातून पडलेली उल्का किंवा नियंत्रण हरवून बसलेलं एखादं विमान. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात.

    व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं. सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने एक दिवस याच करोडोंची उलाढाल करणाऱ्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली. थांबल्याने, हळूहळू चालल्याने फरक पडत नाही. फक्त कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि किती वेळ थांबायचं याचं विजडम जवळ हवं…  

    तुम्ही असा ब्रेक घेता का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधील प्रवास म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनात सुखी व यशस्वी होणं हे लक्ष्य असतं व प्रत्येकजण त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. जीवनात यशस्वी असणं व सुखी असणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत.

    सुखी असण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात, मग मनुष्य श्रीमंत असो वा गरीब. उदा. आज पैशाला खूप महत्त्व आले आहे. असे म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सुखी, परंतु तुम्ही खेड्यापाड्यात जा, गरीब शेतकरी, किंवा जंगलात राहणारा आदिवासी पहा तो देखील आपल्या आयुष्यात सुखी आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपापली सुखाची व्याख्या व दृष्टिकोन वेगळे असतात. तर यशाची परिभाषा ही समाजाच्या दृष्टीने वेगळी असते, ज्याने स्वत:च्या आयुष्यातील ध्येय प्राप्त केलं, तोच खरा यशस्वी असतो. ध्येयप्राप्ती म्हणजेच यशाचा मार्ग हा थोडा खडतर असतो, परंतु समाजात असे अनेकजण आहेत की, ज्यांनी जीवनात खूप यश मिळवले. जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो, तर जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचे कोणते तीन प्रमुख स्तंभ असतात ते आजच्या video मध्ये आपण पाहूया.

    १) Health (आरोग्य) : “Health is Wealth” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण आपण खरंच त्याकडे किती लक्ष दिलंय? आम्हाला सांगू नका, तुमचं तुम्हाला माहिती आहेच! जर तुम्ही शारीरिक, मानसिक व बौध्दिकदृष्ट्या सुदृढ असाल, तर तुम्हाला सर्व काही मिळतं, परंतु जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, विविध विकारांनी ग्रस्त असाल, डॉक्टर आणि महागड्या उपचार पध्दतींच्या अधीन झालेले असाल तर जीवनातील आनंद हरवून गेलेला असतो, जीवन नीरस झालेले असते. जर उत्तम आरोग्य असेल, तरंच तुम्ही आयुष्यातील इतर गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. “You can’t enjoy wealth, if you are not good in health.

    २) Wealth (संपत्ती) : जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचा दुसरा प्रमुख स्तंभ म्हणजे संपत्ती. पैसा, संपत्ती तुम्हाला आदर देते आणि प्रतिकूलतेशी लढण्यास सक्षम बनवते. आर्थिक साक्षरता व आर्थिक स्वातंत्र्य असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज पैसा असेल, तरच आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात व आपल्या इच्छेनुरूप जीवन जगता येते. चांगल्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. वाईट दिवसांसाठी नेहमी पैसे वाचवा करा. गरिबीत तुमच्यासोबत कोणीही नसेल, तेव्हा हा पैसा तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून सुखी व समाधानी जीवनासाठी तुमच्याकडे आरोग्यासोबतच संपत्ती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.

    ३) Relationships (संबंध) : तुमच्याकडे उत्तम आरोग्य व खूप संपत्ती आहे, परंतु तुमचे इतरांशी संबंध चांगले नसतील, तर तुम्हाला समाधान, सुख, यश मिळणे कठीण असते. इतरांशी चांगले संबंध आपले जीवन समृध्द करण्यात मोठी मदत करतात. ते आपल्याला आपलं जीवन आनंदी करण्यात मदत करतात; जीवनात कठीण प्रसंग आल्यास मनावरचे ओझे कमी करतात, मन हलके होते आणि आपले जीवन आनंददायी होते. विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या यशस्वी लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे अत्यंत शहाणपणाचे असते, कारण त्यांच्याकडून बरेच काही शिकता येते. त्यांच्या सहवासामुळे सकारात्मक दृष्टिकोन अवलंबता येतो. त्यामुळे पैसा, आरोग्य यासोबतच इतरांशी चांगले संबंध असणे अत्यंत महत्त्वाचे असते. Self centric किंवा egoistic माणसे कधीच आयुष्यात पुढे जात नसतात. याबाबतीत एक मस्त शेर आहे की, “किसीने पूछा हमें उम्र और जिंदगी में क्या फर्क है? तो हमने यूँ जवाब दिया की, जो अपनों के बिना बीती वो “उम्र” और जो अपनों के साथ बीती वो “ज़िन्दगी”

    ४) आपण काय करावे? : आयुष्यात सुखी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी आयुष्यात उत्तम आरोग्य, संपत्ती कमावण्याचा व आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील तसेच आपल्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी चांगले संबध प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तसेच जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. व्यायाम आणि आध्यात्माला महत्व दिले पाहिजे. तरुण वयात कशाला पाहिजे अध्यात्म वगैरे सारखे प्रश्न विचारणाऱ्यांपासून जरा लांबच राहिलं पाहिजे. जर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेले असेल, तर आपल्याकडे आपल्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करण्याची शारीरिक क्षमता शिल्लक राहत नाही. परिणामी, आपले नातेसंबंध बिघडतात. जर आपण चांगले नातेसंबंध टिकवण्यात अपयशी ठरलात, तर आपली मानसिक स्थिती, आरोग्यावर आणि परिणामी आपल्या श्रीमंतीवर वाईट परिणाम होतो. ज्याच्या आयुष्यात चांगले आरोग्य नाही त्याला शारीरिक आणि मानसिक रोग होतात; ज्याच्या आयुष्यात संपत्ती नाही त्याला दारिद्र्य आणि गरिबीचा रोग होतो आणि ज्याच्या आयुष्यात स्वतःची म्हणावी अशी चांगली माणसे नाहीत, त्याला एकलकोंडेपणाचा रोग होतो आणि त्यातच आयुष्य संपून जाते. त्यामुळं आयुष्यातल्या या तीन महत्त्वाच्या स्तंभांना कसं मजबूत बनवता येईल याचा आत्तापासूनच विचार करायला सुरुवात करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा