Tag: naviarthkranti

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर

    CARS24 1


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!

  • PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म उभारतो. तो तरुण म्हणजे Porter या कंपनीचे सहसंस्थापक प्रणव गोयल.

    Porter ची संकल्पना प्रणव यांना एका वैयक्तिक अडचणीतून सुचली. शहरांत छोट्या मालवाहतुकीसाठी विश्वसनीय आणि सुलभ पर्याय नव्हता, ही अडचण अनेकांना भेडसावत होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर उपाय शोधता येईल, यावर विश्वास ठेवून त्याने Porter ची स्थापना केली. आज Porter लाखो लोकांना मालवाहतुकीसाठी मदत करत आहे. या लेखात आपण Porter कशी सुरू झाली, कोणते टप्पे पार करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

    एका लहानशा अडचणीतून सुचलेली कल्पना

    Porter या स्टार्टअपची कल्पना प्रणव गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुचली. ते IIT खरगपूरचे पदवीधर असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात JP Morgan या नामांकित कंपनीत विश्लेषक (ANALYST) म्हणून केली. कामानिमित्त त्यांना गुरगावहून मुंबईला स्थलांतर करावं लागलं. या वेळी घरातील फर्निचर हलवण्यासाठी मिनी ट्रक बुक करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात योग्य ड्रायव्हर मिळत नव्हता, भाडं ठरवणं कठीण जात होतं आणि संपूर्ण सेवा प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती.

    याच अनुभवातून त्यांना जाणवलं की शहरांमधील वाहतूक व्यवस्था अजूनही पारंपरिक पद्धतीने चालते आणि त्यात ग्राहक, ड्रायव्हर आणि एजंट सगळेच त्रासलेले असतात. ही अडचण म्हणजेच एक मोठी संधी असू शकते, हे त्यांनी ओळखलं. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही समस्या सोडवता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशाच विचारातून Porter या नव्या युगाच्या लॉजिस्टिक स्टार्टअपची सुरुवात झाली.

    स्टार्टअपची सुरुवात – Porter चा जन्म

    porter delivery


    एप्रिल २०१४ मध्ये प्रणव गोयल यांनी JP Morgan मधील नोकरी सोडली आणि IIT मधील आपले दोन  मित्र उत्तम डिग्गा आणि विकास चौधरी यांच्यासोबत मिळून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांच्या तयारीनंतर, ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘Porter’ हा मोबाईल अ‍ॅप आधारित लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म सुरू केलं. त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश शहरांतर्गत मालवाहतूक अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करणे हा होता.

    Porter अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक मिनी ट्रक, टू-व्हीलर किंवा थ्री-व्हीलर सहजपणे बुक करू शकतात. या प्लॅटफॉर्ममुळे वाहनचालक आणि ग्राहक एकाच ठिकाणी जोडले गेले. पारदर्शक आणि परडवणारे दर, GPS मार्गदर्शन आणि सहज ऑर्डर प्रक्रिया यामुळे सेवा अधिक विश्वासार्ह आणि वापरण्यास सुलभ बनली. पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक लॉजिस्टिक सोल्यूशन तयार केलं.

    तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट बिझनेस मॉडेल

    Porterचं बिझनेस मॉडेल साधं पण अत्यंत परिणामकारक होतं. प्रत्येक बुकिंगवर कंपनी १० ते १५ टक्के कमिशन घेत होती. यासोबतच इन्शुरन्स, ड्रायव्हर क्रेडिट, प्रायोरिटी लिस्टिंग यांसारख्या अतिरिक्त सेवा देऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करण्यात आले. या मॉडेलनं ग्राहकांना त्यांच्या मालवाहतुकीच्या खर्चात जवळपास २०% पर्यंत बचत मिळवून दिली, तर चालकवर्गाला त्यांच्या उत्पन्नात सुमारे ३०% वाढ अनुभवायला मिळाली.

    Porter अ‍ॅप स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध केल्यामुळे चालकांसाठी ते वापरणं सोपं झालं. सहज नोंदणी प्रक्रिया आणि योग्य प्रोत्साहन यामुळे अवघ्या १८ महिन्यांत १ लाख बुकिंग्स पार करण्यात त्यांनी यश मिळवलं. मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विस्तार करताना त्यांना Sequoia Capital आणि Kae Capital या गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपयांची  फंडिंगही मिळाली. हे यश त्यांच्या कल्पकतेचं आणि धाडसाचं प्रतीक ठरलं.

    पुढील वाटचाल आणि मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी

    Porter ची सेवा गुणवत्ता, वेळेचं भान आणि पारदर्शक व्यवहार यांच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. २०१८ मध्ये त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या Smartshift या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मसोबत विलीन होण्याचा निर्णय घेतला. याच टप्प्यावर त्यांना ५० कोटींची Series C फंडिंग मिळाली. याच वर्षी त्यांनी ‘Porter for Enterprise’ हा नवीन विभाग सुरू केला, ज्यामार्फत BigBasket, Urban Company, Flipkart यांसारख्या मोठ्या कंपन्यांना B2B लॉजिस्टिक सेवा पुरवायला सुरुवात केली.

    २०१९ पर्यंत Porter ने ३० लाख डिलिव्हरी पूर्ण करून जबरदस्त प्रगती केली. कंपनीचं वार्षिक उत्पन्न २२७ कोटींवर पोहोचलं. त्यांनी अशा छोट्या पण महत्त्वाच्या लॉजिस्टिक गरजांवर लक्ष केंद्रित केलं ज्या अनेक मोठ्या कंपन्यांनी दुर्लक्षित केल्या होत्या, जसं की संध्याकाळचं कुरिअर किंवा काही तासांसाठी टेम्पो बुकिंग. अशा गरजांना सेवा पुरवून त्यांनी बाजारात आपलं वेगळेपण सिद्ध केलं.

    युनिकॉर्न बनण्याचा प्रवास

    Porter च्या यशस्वी प्रवासात एप्रिल २०२० एक महत्त्वाचा टप्पा ठरला. Lightstone (आता Lightrock) या गुंतवणूकदार संस्थेने कंपनीमध्ये १४० कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतर २०२२ मध्ये Tiger Global च्या नेतृत्वाखाली ७५० कोटींचं भांडवल उभं करण्यात आलं. याच काळात कंपनीने १७८९ कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळवून आपली ताकद सिद्ध केली.

    १६ मे २०२४ रोजी Porter ने आपले काही शेअर्स (ऑप्शन पूल) विकले. त्यामुळे कंपनीचं एकूण मूल्य $१ बिलियनच्या पुढं गेलं आणि Porter ही Krutim आणि Perfios नंतर २०२४ मधली तिसरी युनिकॉर्न कंपनी बनली.

    porter delivery app

    यशाच्या शिखरावर 

    आज Porter देशातील १६ शहरांमध्ये सेवा देत आहे आणि त्यांचे ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. रोज २.५ लाखांहून अधिक चालक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. दर महिन्याला सुमारे ५० लाख डिलिव्हरी पार पडतात. सध्या कंपनीचं उत्पन्न २७३३ कोटींवर पोहोचलं असून, कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन ८३०० कोटींहून अधिक आहे.

    Porter हे फक्त एक ॲप नाही, तर एक आधुनिक आणि स्मार्ट लॉजिस्टिक सोल्यूशन आहे. यात AI तंत्रज्ञान वापरून ग्राहक आणि चालक यांना एकत्र जोडलं गेलं आहे. GPS ट्रॅकिंग, झटपट बुकिंग, परवडणारे दर आणि वापरण्यास सोपं इंटरफेस यामुळे सर्वांचा अनुभव चांगला होतो. Porter B2B आणि B2C (सर्वसामान्य ग्राहकांसाठी) दोघांसाठी उपयुक्त असून, मोठ्या मालवाहतुकीपासून ते घरगुती वस्तूंच्या डिलिव्हरीपर्यंत या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

    मित्रांनो, प्रणव गोयल यांची कथा आपल्याला शिकवते की, अडचणींवर फक्त तक्रार न करता जर त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली, तर त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा राहू शकतो आणि Porter हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

    आणखी वाचा :

  • नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

    नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

    आज अनेक तरुण-तरुणी नवीन कल्पनांवर आधारित स्टार्टअप सुरू करत आहेत. स्वतः काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, नवे प्रयोग आणि मोठ्या संधी शोधण्याची धडपड यामुळे उद्योजकतेकडे ओढा वाढला आहे. मात्र, केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, ती योग्य प्रकारे अंमलात आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा नवीन उद्योजक काही मूलभूत चुका करतात, ज्या व्यवसायाच्या वाढीला अडथळा ठरू शकतात. योग्य नियोजन आणि योग्य धोरणांशिवाय फक्त उत्साहाच्या जोरावर व्यवसाय यशस्वी होणं कठीण असतं.

    व्यवसाय सुरू करताना आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा आणि योग्य मार्गदर्शन यावर भर देणं आवश्यक आहे. सुरुवातीला काही महत्त्वाच्या चुका टाळल्या नाहीत, तर  सुरुवातीचा उत्साह लवकरच निराशेत बदलू शकतो. म्हणूनच, या लेखात आपण अशा ७ चुका पाहणार आहोत, ज्या कळत-नकळत व्यवसायिकांकडून होऊ शकतात. मात्र, नव्याने स्टार्टअप सुरू करताना त्या टाळणं अत्यंत गरजेचं आहे.

    १. कल्पनेची पडताळणी न करणे

    फक्त कल्पना चांगली आहे म्हणून उत्पादन तयार केलं, पण लोकांना त्याची गरजच नसेल, तर तो व्यवसाय अपयशी ठरू शकतो. म्हणूनच कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणण्याआधी बाजारपेठेचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची लोकांना खरंच गरज आहे का, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

    यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधा, त्यांचे मत जाणून घ्या आणि आवश्यकतेनुसार बदल करा. ग्राहक सर्वेक्षण करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि सर्वात कमी खर्चात ‘MVP’ म्हणजेच किमान व्यवहार्य उत्पादन तयार करून त्याची चाचणी करा. यामुळे बाजारातील मागणी आणि उत्पादनाच्या यशाची शक्यता तपासता येईल.

    2 1

    २. आर्थिक व्यवस्थापनात निष्काळजीपणा

    स्टार्टअप सुरू झाल्यावर पैशांची ये-जा इतकी वेगाने होते की कधी खर्च जास्त झाला आणि भांडवल कमी पडलं, हे लक्षातही येत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही किती खर्च करत आहात, हे तपासा. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या भांडवलाचा अंदाज घ्या आणि त्याचा योग्य वापर करा.

    यालाच ‘बर्न रेट‘ म्हणतात, म्हणजे तुमचं स्टार्टअप किती वेगाने पैसे खर्च करत आहे. भविष्यात जर जास्त भांडवलाची गरज भासली, तर ते कुठून मिळवायचं, याची आधीच योजना तयार ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि नफ्याच्या दिशेने योग्य आर्थिक नियोजन करा, म्हणजे तुमच्या स्टार्टअपचा प्रवास अधिक स्थिर आणि यशस्वी होईल.

    3 1

    ३. ग्राहकांचा अभिप्राय दुर्लक्षित करणे

    ग्राहक हे तुमच्या व्यवसायाचा आरसा असतात. त्यांचा अभिप्राय लक्षात घेतला नाही, तर तुमचं उत्पादन किंवा सेवा हळूहळू अप्रासंगिक ठरू शकते. ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला उत्पादनातील सुधारणा आणि बाजारातील मागणी समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे ग्राहक काय म्हणत आहेत, ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या गरजांनुसार बदल करण्याची मानसिकता ठेवा.

    सतत सुधारणा करत राहिल्यास, तुमचं उत्पादन अधिक उपयुक्त आणि ग्राहकांसाठी आकर्षक होत जातं. ग्राहकांच्या फीडबॅकवर त्वरित कृती करा, त्यांच्यासोबत संवाद साधा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या ब्रँडवर विश्वास निर्माण होईल आणि व्यवसाय अधिक वेगाने वाढेल.

    4

    ४.हायरिंग करताना अति घाई किंवा अति विलंब

    योग्य टीमशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. काही वेळा स्टार्टअपमध्ये गरज नसताना लवकर भरती केली जाते, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. तर काही वेळा आवश्यक वेळेत भरती न केल्यामुळे कामाचा ताण वाढतो आणि व्यवसायाची वाढ मंदावते. त्यामुळे हायरिंग करताना गरज आणि वेळ यांचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे.

    योग्य कर्मचारी निवडताना केवळ कौशल्य पाहू नका, तर त्यांच्या विचारसरणी, काम करण्याची पद्धत आणि कंपनीच्या मूल्यांशी त्यांची जुळवणूक होते का, हेही तपासा. चांगली टीम म्हणजे फक्त अनुभवी लोकांचा गट नव्हे, तर तुमच्या उद्दिष्टांसोबत जुळणारी लोकं असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे भरती करण्याआधी स्पष्ट योजना तयार करा आणि योग्य वेळी, योग्य लोकांना संधी द्या.

    5

    ५. स्पष्ट व्यवसाय मॉडेल नसणे

    पैसे कुठून येणार? हा प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच स्वतःला विचारला पाहिजे. अनेक स्टार्टअप केवळ चांगल्या कल्पनेच्या जोरावर पुढे जातात, पण त्यांना उत्पन्नाचा स्पष्ट स्रोत नसतो. त्यामुळे काही काळानंतर पैशांची अडचण येते आणि व्यवसाय टिकून राहणं कठीण होतं.

    यावर उपाय म्हणजे सुरुवातीलाच तुमचं बिझनेस मॉडेल स्पष्ट करणं. तुम्ही कुठल्या सेवांसाठी पैसे घेणार? ग्राहकांना कोणत्या सुविधांसाठी शुल्क द्यावं लागेल? आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते पर्याय आहेत? हे सर्व ठरवा. वेळोवेळी व्यवसाय मॉडेल सुधारत राहा आणि वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्याच्या शक्यता तपासा.

    6

    ६. खराब मार्केटिंग रणनीती

    फक्त चांगलं उत्पादन तयार केलं की ग्राहक आपोआप येतील, असा समज अनेक नव्या उद्योजकांचा असतो. पण वास्तवात, लोकांना तुमच्या ब्रँडबद्दल माहितीच नसेल, तर ते ते विकत घेणार कसं ? त्यामुळे उत्तम उत्पादनासोबत प्रभावी मार्केटिंगही गरजेचं आहे.

    मार्केटिंगसाठी योग्य रणनीती ठरवा. सोशल मीडिया, डिजिटल जाहिराती, प्रभावशाली लोकांचे (influencers) सहकार्य, आणि ग्राहकांशी थेट संवाद यासारख्या पद्धती वापरा. कोणत्या मार्गाने तुमचं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचं, यासाठी ठोस योजना तयार ठेवा आणि सतत नवीन प्रयोग करत राहा.

    Navi Blogs Size 13

    ७. बाजारातील बदलांना न जुळवून घेणे

    आजचा बाजार सतत बदलत आहे. तंत्रज्ञान, ट्रेंड्स आणि ग्राहकांच्या गरजा झपाट्यानं बदलतात. अशा वेळी, जुन्या कल्पनांवर अडून न राहता परिस्थितीनुसार लवचिक राहणं महत्त्वाचं आहे. काही वेळा तुमच्या उत्पादनाची दिशा बदलावी लागू शकते, तर कधी नवीन संधी स्वीकाराव्या लागू शकतात.

    बदल ही वाढीची संधी असते. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणि बाजारातील बदल लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करा. वेळेप्रमाणे स्वतःला अपडेट ठेवा आणि नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहा. यामुळे तुमचं स्टार्टअप टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढेल.

    7 1

    मित्रांनो,स्टार्टअप म्हणजे एक रोमांचक प्रवास असतो, पण तो यशस्वी करायचा असेल तर काही महत्त्वाच्या चुका टाळणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून योग्य नियोजन करा, स्पष्ट व्यवसाय मॉडेल ठरवा आणि मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहकांचा अभिप्राय ऐकून सुधारणा करण्याची तयारी ठेवा.

    सतत शिकण्याची वृत्ती ठेवल्यास आणि बदल स्वीकारल्यास तुमचं स्टार्टअप यशाच्या दिशेने पुढे जाईल. योग्य टीम, आर्थिक शिस्त आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे गेलात, तर तुमचा व्यवसाय निश्चितच उंच भरारी घेईल!

    आणखी वाचा :

  • Repo Rate : रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत.

    Repo Rate : रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत.

    आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो की, ‘RBI ने रेपो दर वाढवला’ किंवा ‘रेपो दर कमी केला.’ पण नक्की हा रेपो दर म्हणजे काय? आणि तो आपल्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम करतो? सोप्या भाषेत सांगायचं तर, रेपो दर हा तो व्याजदर आहे, ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकांना अल्पकालीन कर्ज देते. जर हा दर वाढला, तर बँकांना जास्त व्याज भरावं लागतं आणि त्याचा परिणाम थेट कर्जाच्या व्याजदरांवर होतो. याउलट, रेपो दर कमी झाला, तर बँकांना स्वस्तात पैसे मिळतात, त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता असते.

    (Repo Rate) रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत. रेपो दर हा आपल्या घराच्या EMI पासून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या हालचालींवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तर समजून घेऊया.

    रेपो दर म्हणजे काय?

    (Repo Rate) रेपो दर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) इतर बँकांना अल्पकालीन कर्ज देण्यासाठी ठरवलेला व्याजदर. जेव्हा बँकांना तात्पुरत्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात, तेव्हा त्या RBI कडून ठराविक व्याजाने कर्ज घेतात. हे कर्ज घेण्यासाठी बँका काही सरकारी रोखे (Government Securities) गहाण ठेवतात. या कर्जावर लावण्यात येणाऱ्या व्याजदरालाच रेपो दर म्हणतात.

    रेपो दर वाढला किंवा कमी झाला, तर काय परिणाम होतो?

    जेव्हा RBI रेपो दर वाढवते, तेव्हा बँकांसाठी कर्ज घेणं महाग होतं, त्यामुळे बँका ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांचे व्याजदर वाढवतात. याचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांवर होतो. म्हणजेच, मासिक हप्ते (EMI) वाढतात, ज्यामुळे नवीन घर, गाडी किंवा इतर मोठ्या खरेदीचा खर्च वाढतो. तसेच, उद्योगांना कर्ज घेणं अवघड होतं, परिणामी नोकऱ्या आणि आर्थिक वाढीचा वेग काहीसा मंदावतो.

    याउलट, RBI ने जर रेपो दर कमी केले, तर बँकांना स्वस्तात पैसे मिळतात, त्यामुळे त्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. याचा फायदा असा होतो की गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य कर्जांचे EMI कमी होतात आणि लोक कर्ज घेण्यास प्रवृत्त होतात. परिणामी, घरखरेदी, वाहन खरेदी आणि उद्योग-व्यवसायांना चालना मिळते. यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहतो आणि बाजारपेठेत तेजी निर्माण होते.

    रेपो दर ठरवण्यामागचं कारण काय असतं?

    रेपो दर ठरवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवणं आणि अर्थव्यवस्थेत स्थिरता राखणं. जर देशात महागाई वाढू लागली, तर RBI रेपो दर वाढवते. परिणामी, लोक आणि उद्योग खर्च कमी करतात, बाजारात पैशांचा प्रवाह मर्यादित राहतो आणि वस्तूंच्या किमती वाढण्याचा वेग कमी होतो.

    याउलट, जर अर्थव्यवस्थेत थोडी मंदी आली, तर RBI रेपो दर कमी करते, म्हणजेच बँकांना स्वस्तात कर्ज मिळतं आणि त्या कमी व्याजाने ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे लोक आणि उद्योग जास्त खर्च करतात, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन नोकऱ्या वाढतात आणि बाजाराला गती मिळते. यामुळे अर्थव्यवस्था स्थिर राहते आणि विकासाला चालना मिळते.

    रेपो दराचे परिणाम कोणावर होतात?

    रेपो दराचा परिणाम वेगवेगळ्या स्तरांवर होतो. सामान्य ग्राहकांसाठी, होम लोन, कार लोन आणि वैयक्तिक कर्जांचे EMI थेट रेपो दरावर अवलंबून असतात, त्यामुळे दर वाढला की हप्ते महाग होतात आणि दर कमी झाला की स्वस्त. बँकांसाठी, रेपो दर वाढला तर त्यांना महाग कर्ज घ्यावं लागतं, ज्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होतो आणि त्या ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज देतात. उद्योगांसाठी, मोठ्या कंपन्या बँकांकडून कर्ज घेत असतील, तर त्यांचेही खर्च वाढतात किंवा कमी होतात. महागाईसाठी, रेपो दर हे RBI चे एक महत्त्वाचे साधन असते. दर वाढवला की बाजारातील पैशांचा प्रवाह कमी होतो आणि महागाई आटोक्यात येते, तर दर कमी केला की बाजाराला गती मिळते.

    रेपो दर कोण ठरवतं?

    रेपो दर भारतीय रिझर्व्ह बँकेची ‘मॉनेटरी पॉलिसी कमिटी’ (MPC) ठरवते. ही कमिटी दर दोन महिन्यांनी बैठक घेते आणि देशातील आर्थिक परिस्थितीनुसार रेपो दर वाढवायचा, कमी करायचा किंवा स्थिर ठेवायचा हे ठरवते. हा दर ठरवल्यानंतर बँका आपले कर्जाचे व्याजदर त्यानुसार बदलतात, त्यामुळे हा निर्णय थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करणारा असतो. म्हणूनच, नवीन कर्ज घ्यायचं असेल किंवा आधीच घेतलेल्या कर्जाचा EMI समजून घ्यायचा असेल, तर रेपो दरातील बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच WhatsApp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा:

  • जाहिरातीसाठी टक्कल! या माणसाच्या आयडियाने सोशल मीडियावर उडवली खळबळ

    जाहिरातीसाठी टक्कल! या माणसाच्या आयडियाने सोशल मीडियावर उडवली खळबळ

    आपल्या समाजात माणसाला पहिल्यांदा त्याच्या रूपावरूनच ओळखलं जातं. कोणी उंच आहे की ठेंगणा, बारीक आहे की जाड, सुंदर आहे की नाही, यावरूनच लोक त्याच्या विषयी मत बनवतात. अगदी डोक्यावर केस आहेत की नाही, यावरूनही माणसाला जज केलं जातं. त्यामुळे अनेक लोक आपल्या लुक्सविषयी अत्यंत संवेदनशील असतात. विशेषतः पुरुषांमध्ये लवकर वयात गळणारे केस ही मोठी चिंतेची बाब असते. गंजेपणा किंवा टक्कल आल्यावर अनेकांना लाज वाटते, आत्मविश्वास कमी होतो आणि काही जण तर डिप्रेशनमध्येही जातात. मात्र, केरळच्या एका तरुणाने या गोष्टीला संधीमध्ये रूपांतरित करून असं काही साध्य केलं आहे की, तो आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. 

    केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील करूर गावात राहणारा शफीक हाशिम हा एक ट्रॅव्हल व्लॉगर आहे. वय फक्त ३६ वर्षं. शफीकच्या केसांची गळती कॉलेजमध्ये असतानाच सुरू झाली होती. त्यामुळे त्याला अनेकदा लोकांच्या टिंगलटवाळ्या सहन कराव्या लागल्या. मित्रमंडळी त्याच्या टक्कलवरून मस्करी करत, त्यामुळे तो काहीसा अस्वस्थ होत असायचा. या परिस्थितीत त्याने हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार केला होता. पण अचानक त्याचा विचार बदलला आणि त्याने ठरवलं कि “मी हे स्वीकारणार आणि त्याचा फायदा करून घेणार!”

    शफीकने एक भन्नाट कल्पना लढवली. त्याने ठरवलं की, डोक्यावर केस नसले तरी हरकत नाही, पण हे टक्कलच जर जाहिरातीसाठी वापरता आलं तर? होय, अगदी खरं! त्याने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ शेअर केला आणि कंपन्यांना आवाहन केलं, की माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावर जाहिरात करा!  त्याची ही अनोखी कल्पना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

    शफीकची ही कल्पना कोची शहरातील ‘ला डेंसिटे’ नावाच्या हेअर ट्रान्सप्लांट कंपनीच्या लक्षात आली. त्यांनी शफीकसोबत तात्काळ संपर्क साधला आणि तीन महिन्यांचा करार केला. या करारानुसार, शफीक आपल्या डोक्यावर त्यांच्या कंपनीचा तात्पुरता टॅटू करून ठेवणार आणि आपल्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये तो दाखवणार. या अनोख्या जाहिरात संकल्पनेतून शफीकला तब्बल ५०,००० रुपये मिळणार. 

    मात्र, शफीकचा हा प्रयोग केवळ कमाईसाठी नाही, तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. टक्कल असणे म्हणजे कमीपणा नाही, तर त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारता येतं, हेच तो दाखवून देतो. लोक ज्या गोष्टीला न्यूनगंड मानतात, त्याचा उपयोग संधी म्हणूनही करता येऊ शकतो, हे शफीकच्या प्रयोगातून स्पष्ट होतं.

    शफीकचे यूट्यूबवर २८,००० हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तो ट्रॅव्हल व्लॉग्स तयार करतो आणि त्याच्या या युनिक कल्पनेमुळे तो लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. केस गेल्यामुळे आत्मविश्वास गमवण्याऐवजी, त्याचा सकारात्मक उपयोग करून त्याला आपल्या ताकदीत बदलता येतं, हे शफीकने सिद्ध करून दाखवलं आहे.

    आपल्यात एखादी गोष्ट कमी आहे असं वाटलं, तरी स्वतःला कमी न समजता त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहा. आत्मविश्वास, कल्पकता आणि सकारात्मक विचारसरणी असेल, तर कोणतीही अडचण संधीमध्ये बदलता येते. शफीक हाशिमसारखा विचार करा. मग टक्कल असो की अडथळे, प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्याची ठरू शकते!

    आणखी वाचा:

  • Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी उपयोगी ठरू शकतात.

    जर व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या लेखात आपण अशाच यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकता येणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया आणि ते व्यवसायासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, हे पाहूया.

    १) खऱ्या समस्येवर उपाय शोधा – ग्राहकांच्या गरजा ओळखा

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ग्राहकांच्या समस्येचा अभ्यास करणं. प्रत्येक व्यवसाय हा एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी असतो. जर तुम्ही लोकांच्या मोठ्या समस्येवर सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दिला, तर तुमच्या व्यवसायाला हमखास यश मिळेल.

    उदाहरणार्थ, Meesho या कंपनीने भारतातील लहान व्यावसायिक आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. ऑनलाईन विक्रीसाठी त्यांच्याकडे महागडी वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नव्हतं. Meesho ने एक सोपा प्लॅटफॉर्म तयार केला, जिथे कोणीही सहजपणे ऑनलाइन विक्रेता बनू शकतो. यामुळे लाखो लघु उद्योजकांना डिजिटल मार्केटमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

    जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधलात, तर तुमच्या व्यवसायाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. बाजाराचा अभ्यास करा, लोकांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घ्या आणि त्यावर सोपा, किफायतशीर आणि उपयुक्त उपाय द्या.

    3

    २) छोटी सुरुवात करा, मग हळूहळू विस्तार करा

    अनेक नवउद्योजक सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे खर्च वाढतो आणि अपयशाची शक्यता अधिक राहते. त्याऐवजी, लहान सुरुवात करून, अनुभव घेत घेत व्यवसाय वाढवणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं.

    उदाहरणार्थ, Zerodha या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांसोबत व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांच्या तुलनेत कमी शुल्कात सोपं आणि किफायतशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दिलं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. आज Zerodha ही भारतातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली आहे.

    4

    ३) मजबूत आणि सक्षम टीम तयार करा

    कोणताही मोठा व्यवसाय एकट्याने उभा करता येत नाही. व्यवसायाची वाढ आणि यश हे चांगल्या टीमवर आणि त्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. विश्वासू, मेहनती आणि कौशल्यपूर्ण लोक सोबत असतील, तर आव्हानं पार करणं आणि संधीच सोन्यात रूपांतर करणं सोपं जातं. 

    उदाहरणार्थ, CRED हा स्टार्टअप त्यांच्या मजबूत टीममुळे यशस्वी झाला. CRED हे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. संस्थापकांनी सुरुवातीपासूनच अनुभवी आणि हुशार लोकांची निवड केली, ज्यांनी उत्कृष्ट ॲप डिझाइन, प्रभावी मार्केटिंग आणि ग्राहकांसाठी उपयुक्त योजना तयार केल्या.

    सुरुवातीला थोड्या, पण हुशार लोकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत काम करा. तुमच्या उद्दिष्टांशी जुळणारी, नवे प्रयोग करण्यास तयार असलेली आणि आव्हानांना सामोरे जाणारी टीम निवडा. एक चांगली टीमच तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते.

    5

    ४) ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवा

    ग्राहक समाधानी असतील, तरच व्यवसाय टिकून राहतो. समाधानी ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतात आणि इतरांनाही तुमच्या सेवेची शिफारस करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

    उदाहरणार्थ, Zomato ने ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सहज वापरता येणारं आणि वेगवान ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया आणि तात्काळ ग्राहकसेवा दिली. यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि Zomato एक लोकप्रिय ब्रँड बनला.

    ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांचे प्रश्न पटकन सोडवा आणि त्यांचा अनुभव चांगला राहील याची काळजी घ्या. यामुळे ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल.

    6

    ५) डेटा आणि ग्राहकांचा फीडबॅक वापरा

    बाजार सतत बदलत असतो, त्यामुळे व्यवसायात वेळेनुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा फीडबॅक आणि डेटा विचारात घेतल्यास तुमची सेवा अधिक चांगली होऊ शकते आणि व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो.

    उदाहरणार्थ, Swiggy सुरुवातीला फक्त अन्न वितरण सेवा पुरवत होते. मात्र, ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या खरेदीच्या सवयींचा अभ्यास केल्यावर त्यांना समजले की लोक घरपोच किराणासामानही हवे आहे. त्यानंतर त्यांनी Swiggy Instamart सुरू केलं आणि आता किराणा व इतर वस्तूंच्या डिलिव्हरीमध्येही ते यशस्वी झाले आहेत.

    ग्राहकांचा फीडबॅक आणि बाजारातील डेटा सतत तपासा. गरजेनुसार सेवा सुधारत राहिल्यास तुम्ही स्पर्धेत टिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढेल.

    7

    मित्रांनो,यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवत असताना खरी समस्या ओळखणं, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करणं, सक्षम टीम तयार करणं, ग्राहकांचा अनुभव उत्तम ठेवणं आणि डेटा व फीडबॅकच्या आधारे सुधारणा करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

    जर तुम्हीही या गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केला, तर तुमचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हेच यशस्वी उद्योजकतेचं खरं रहस्य आहे!

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला…

    Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला… 

    यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षण, मोठं भांडवल किंवा मोठ्या ओळखीचं नेटवर्क लागतं, असं अनेकजण मानतात. पण काही लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं ठरवतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘हॅवेल्स’ या जगभर प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल ब्रँडचे शिल्पकार किमत राय गुप्ता. 

    केवळ १०,००० रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मेहनत, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांच्या जोरावर एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला. उत्कृष्ट उत्पादने, ग्राहकांचे समाधान आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे हॅवेल्सने विश्वासार्हता मिळवली आणि आज तो जगभर लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मात्र, हे यश सहज मिळालं नाही. त्यामागे संघर्ष, कठोर मेहनत आणि ध्येयासाठी दिलेली अनेक वर्षे आहेत. या लेखात आपण त्यांचा हा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    बालपण आणि सुरुवातीचा प्रवास 

    किमत राय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली तत्कालीन अविभाजित पंजाबमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीतेच्या शिकवणींचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवलं की, परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यांनी निर्धार केला की केवळ शिक्षणावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करायचं.

    १९५८ साली, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठली. त्यांच्याकडे १०,००० रुपये होते आणि मनात असंख्य स्वप्नं आणि पुढे जाण्याची अपार जिद्द होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मार्केट, भागीरथ पॅलेसमध्ये गुप्ताजी अँड कंपनी नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, पण मेहनत, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हळूहळू बाजारात आपली ओळख निर्माण केली.

    व्यवसाय उभारणीची खडतर वाटचाल

    सुरुवातीला किमत राय गुप्तांनी छोटे-छोटे इलेक्ट्रिकल पार्ट्स विकण्यास सुरुवात केली. ते स्वतः दुकानात बसून ग्राहकांशी संवाद साधायचे, त्यांची गरज समजून घ्यायचे आणि अनेकदा त्यांच्यासाठी वस्तू दुरुस्तही करायचे. त्यांच्या मेहनतीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. त्यांनी केवळ व्यापार केला नाही, तर नातेसंबंध जपले आणि विश्वासार्हता निर्माण केली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.

    १९७१ हे वर्ष किमत राय गुप्ता यांच्या आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. दिल्लीतील व्यापारी हवेली राम गांधी आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपली ‘हॅवेल्स’ (Havells) कंपनी विकावी लागणार होती. ही संधी ओळखून किमत राय गुप्तांनी मोठ्या जिद्दीने ७ लाख रुपये उभे करून ‘हॅवेल्स’ विकत घेतली. मात्र, कंपनीची स्थिती अत्यंत खराब होती. उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारातील ओळख या सर्वच बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. पण किमत राय गुप्ता हार मानणारे नव्हते. त्यांनी अपार मेहनत, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर ‘हॅवेल्स’ला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला.

    हॅवेल्सचं नव्या दमाचं नवं रूप! 

    किमत राय गुप्तांनी ‘हॅवेल्स’ विकत घेतल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी केवळ स्विचेसपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता विविध उत्पादनांची भर घातली. केबल्स, फॅन्स, लाईटिंग, गिझर, किचन अप्लायन्सेस यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश करून कंपनीला नव्या उंचीवर नेलं.

    ते केवळ व्यवसाय वाढवत नव्हते, तर एक विश्वासार्ह ब्रँड तयार करत होते, जिथे गुणवत्ता, ग्राहक सेवा आणि इनोव्हेशन यांचा उत्तम समतोल होता. त्यांनी भारतभर उत्पादन केंद्रं स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाचं उत्पादन हेच उद्दिष्ट ठेवलं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे हॅवेल्सने इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 

    हॅवेल्स भारतातील मार्केट लीडर बनली, पण हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही. किमत राय गुप्तांनी ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगलाही तितकंच महत्त्व दिलं. प्रभावी जाहिराती, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स आणि ग्राहकांशी थेट संवाद यामुळे हॅवेल्सची ओळख संपूर्ण देशभर पोहोचली. त्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे हॅवेल्स केवळ एक उत्पादन करणारी कंपनी न राहता घराघरात विश्वासाने वापरण्यात येणारा ब्रँड बनली.

    आजचं हॅवेल्स (Havells)

    आज हॅवेल्स केवळ एक इलेक्ट्रिकल कंपनी नसून भारताच्या औद्यगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ५०,००० हून अधिक डीलर नेटवर्क, १३ अत्याधुनिक उत्पादन केंद्रं आणि ७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उपस्थिती ठेवत हॅवेल्सने जागतिक स्तरावरही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सतत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या जोरावर हा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचला आहे.

    Qimat Rai Gupta

    किमत राय गुप्तांनी आपल्या व्यवसायात कुटुंबालाही सहभागी करून घेतलं. १९९२ साली त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता कंपनीत सामील झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे बारकावे शिकत त्याने हॅवेल्ससाठी नव्या युगाची वाट तयार केली. २००७ साली, अनिल राय गुप्तांनी जर्मनीतील प्रसिद्ध ‘सिल्व्हेनिया’ लाइटिंग कंपनीचं अधिग्रहण केलं. हा हॅवेल्सच्या आंतरराष्ट्रीय विस्तारातील सर्वात मोठा टप्पा ठरला. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी हॅवेल्सला स्थिर ठेवत व्यवसाय अधिक मजबूत केला.

    २०१४ साली, वयाच्या ७७व्या वर्षी किमत राय गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्यांनी मागे केवळ एक यशस्वी व्यवसाय नाही , तर एक मजबूत मूल्यव्यवस्था आणि लाखो लोकांसाठी प्रेरणादायी वारसा ठेवला. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. 

    मित्रांनो, हॅवेल्स ही केवळ एक ब्रँडची गोष्ट नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या स्वप्नाची, त्याच्या परिश्रमांची आणि अपार चिकाटीची कहाणी आहे. किमत राय गुप्ता यांनी एका छोट्याशा दुकानातून सुरू केलेला प्रवास, आज कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आधार बनला आहे. 

    आणखीन वाचा:

  • Master Your Money: स्वतःची आर्थिक शिस्त कशी निर्माण करावी? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

    Master Your Money: स्वतःची आर्थिक शिस्त कशी निर्माण करावी? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

    आजच्या धावपळीच्या जगात आर्थिक स्थैर्य मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, फक्त पैसे कमावणं पुरेसं नाही, त्यासाठी आर्थिक शिस्त असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आर्थिक शिस्त म्हणजे आपल्या उत्पन्नाचं योग्य नियोजन करून खर्च, बचत आणि गुंतवणुकीमध्ये समतोल राखणं. अनेकदा आपण केवळ कमाईवर भर देतो, पण जर योग्य बचत आणि गुंतवणुकीचं नियोजन नसेल, तर आर्थिक स्थैर्य मिळवणं कठीण होऊ शकतं. ही सवय एकदम तयार होत नाही, तर हळूहळू विकसित करावी लागते.

    योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, शिस्तबद्ध बचत आणि सुज्ञ गुंतवणूक हे आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. या लेखात आपण आर्थिक शिस्तीचं महत्त्व आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त टिप्स जाणून घेणार आहोत. 

    १. स्वतःच्या खर्चावर लक्ष ठेवा

    3 4

    महिन्याभरात आपण किती आणि कुठे खर्च करतो, हे जाणून घेणं आर्थिक शिस्तीचा पहिला टप्पा आहे. यासाठी एक छोटी डायरी किंवा मोबाईल अ‍ॅपचा वापर करून दररोजचा खर्च नोंदवा. सुरुवातीला ही सवय लावणं थोडंसं कठीण वाटेल, पण सातत्य ठेवल्यास हळूहळू आपल्या खर्चाच्या सवयी स्पष्ट होऊ लागतील.

    नियमित खर्चाच्या नोंदीमुळे गरज नसलेल्या खर्चांची जाणीव होईल आणि त्यावर नियंत्रण ठेवता येईल.लहानश्या वाटणाऱ्या या बदलांचं केव्हा मोठ्या बचतीत रूपांतरित होईल हे कळणारही नाही. काही काळाने तुम्ही स्वतःच पाहाल की अनावश्यक खर्च टाळून किती मोठी बचत करता येते.  

    २ . बजेट बनवा आणि पाळा

    4 5

    महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही किती आणि कुठे खर्च करायचा आहे, याचा अंदाज घ्या. घरखर्च, वीजबिल, मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि वैद्यकीय गरजा यासाठी ठराविक रक्कम बाजूला ठेवा. यामुळे पैशांची योग्य वाटणी होईल आणि अनावश्यक खर्च टाळता येईल.

    बजेटमध्ये थोडी बचत आणि स्वतःसाठी थोडा खर्च यासाठीही जागा ठेवा, जेणेकरून बचतीसाठी कठोर नियम पाळतोय असं तुम्हाला वाटणार नाही. ठरवलेल्या बजेटनुसार खर्च केल्यास महिनाअखेर पैशांची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक शिस्तही जपता येईल.

    ३. अनावश्यक खर्च टाळा

    5 3

    अनेकदा आपण आकर्षक जाहिराती किंवा सवलतींना भुलून अशा वस्तू खरेदी करतो, ज्या आपल्याला खरंतर गरजेच्या नसतात. या सवयीमुळे अनावश्यक खर्च वाढतो आणि बचतीवर परिणाम होतो.

    यासाठी प्रत्येक खरेदीपूर्वी स्वतःला एक साधा प्रश्न विचारा कि “ही वस्तू खरोखर गरजेची आहे का, की फक्त हौसेसाठी घेतोय?” जर ती फक्त हौसेसाठी असेल आणि तिच्याशिवायही तुमचं सहज चालू शकत असेल, तर तो खर्च टाळणं कधीही चांगलं!

    ४. बचतीची सवय लावा

    6 3

    ज्या प्रकारे आपण घरखर्चासाठी पैसे बाजूला ठेवतो, तसंच दर महिन्याला ठराविक रक्कम बचतीसाठीही ठेवायला हवी. खर्च केल्यावर उरलेल्या पैशांतून बचत करण्यापेक्षा, आधीच ठराविक रक्कम बाजूला काढून मग उरलेले पैसे खर्च करावेत. यासाठी “पहिल्यांदा बचत, मग खर्च” हे तत्त्व पाळा.

    बचतीसाठी बँकेतील Recurring Deposit (RD) किंवा SIP सारखे पर्याय निवडू शकता. हे पर्याय तुमच्या पैशांची वाढ होण्यास मदत करतील आणि नियमित बचतीची चांगली सवय लागेल. लहान रकमेपासून सुरुवात केली तरी हळूहळू मोठी बचत करता येईल.

    ५. क्रेडिट कार्डचा वापर काळजीपूर्वक करा

    7 2

    क्रेडिट कार्ड उपयोगी असलं तरी त्याचा अनावश्यक वापर आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. सहज उपलब्ध असलेल्या क्रेडिटमुळे अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त खर्च करतो आणि नंतर बिल भरताना अडचण येते. त्यामुळे क्रेडिट कार्ड फक्त आवश्यक असताना आणि परतफेड करण्याची क्षमता असल्यासच वापरा.

    क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणं अत्यंत महत्वाचं आहे. विलंब झाल्यास अतिरिक्त व्याज आणि दंड आकारला जातो, जो तुमच्या एकूण आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतो. म्हणूनच, उगाच उधारी वाढवू नका, कारण ती तुमची आर्थिक शिस्त बिघडवू शकते.

    ६. गुंतवणुकीचं महत्त्व समजा आणि सुरुवात करा

    8 5

    फक्त पैसे बचत करून भागत नाही, तर ती बचत वाढवण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणुकीमुळे केवळ पैशांची वाढ होत नाही, तर भविष्यातील आर्थिक सुरक्षितताही मिळते. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट (FD), म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पोस्ट ऑफिस योजना, सोनं अशा विविध पर्यायांचा अभ्यास करा आणि त्यातील फायदे-तोटे समजून घ्या.

    गुंतवणुकीची सुरुवात मोठ्या रकमेने करण्याची गरज नाही. अगदी थोडक्या रकमेपासून सुरू करून, अनुभव घेत हळूहळू गुंतवणूक वाढवता येईल. योग्य नियोजन आणि शहाणपणाने केलेली गुंतवणूक तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठी मदत करू शकते.

    ७. फसवणुकीपासून सावध राहा

    9 2

    डबल पैसे मिळवा किंवा इथे गुंतवणूक करून झटपट श्रीमंत व्हा अशा आकर्षक जाहिराती अनेकदा खोट्या असतात आणि त्या फसवणुकीसाठीच तयार केलेल्या असतात. कमी वेळेत जास्त फायदा मिळवण्याच्या लालसेत लोक अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर त्यांची फसवणूक होते. त्यामुळे कोणतीही योजना, स्कीम किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी तिची पूर्ण माहिती घ्या आणि विश्वासार्हता तपासा.

    शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणुकीनेच आर्थिक स्थैर्य मिळवता येतं. कमी परतावा असला तरी सुरक्षित आणि नियोजित गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील आर्थिक चिंता दूर ठेवायला मदत करेल. म्हणूनच, कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या आणि झटपट नफा मिळवण्याच्या भूलथापांना बळी पडू नका.

    ८. आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या

    10 1

    सर्वांनाच आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचे तांत्रिक ज्ञान असतंच असं नाही. जर तुम्हाला कुठे, किती आणि कशा प्रकारे गुंतवणूक करावी हे समजत नसेल, तर कोणत्याही अंदाजावर निर्णय घेण्यापेक्षा एखाद्या विश्वासू आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं चांगलं . तो तुमच्या उत्पन्न, खर्च आणि भविष्यातील गरजांनुसार योग्य गुंतवणूक योजना सुचवेल.

    एक योग्य आर्थिक सल्लागार तुम्हाला कर वाचवण्याचे उपाय, जोखीम व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे गोंधळून चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा, एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्या आणि आर्थिक स्थैर्याचा मजबूत पाया रचा.

    मित्रांनो, आर्थिक शिस्त एकाच दिवसात येत नाही,ती हळूहळू सवयीनं आणि सातत्यानं येते.रोज थोडं थोडं करत गेलं, तर काही वर्षांतच तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि आत्मनिर्भर बनाल.

    आणखी वाचा:

  • बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    आजच्या तरुण पिढीला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठं व्हायचंय. अनेकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ असते आणि मेहनतीची तयारीही असते, पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे समोर येतात त्यात मार्केटमध्ये टिकून राहण्याची धडपड, स्पर्धा, व्यवस्थापन यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा, म्हणजेच फायनान्सिंगचा!

    व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, नवीन कर्मचारी भरती करायची असेल, आधुनिक तंत्रज्ञान विकत घ्यायचं असेल किंवा उत्पादनाची जाहिरात करायची असेल, तर त्यासाठी भांडवल लागणारच. तर मग, या भांडवलाची व्यवस्था कुठून करायची? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? या लेखात आपण व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचे विविध मार्ग समजून घेऊया.

    स्वतःची बचत वापरणं (Bootstrapping)

    व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या बचतीचा वापर करणं हा सगळ्यात सोपा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशांतून व्यवसाय सुरू करता. कधी कधी कुटुंबातील सदस्य, जसे की आई-वडील, भाऊ-बहिण किंवा जवळचे नातेवाईकही सुरुवातीला आर्थिक मदत करू शकतात. या पद्धतीला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. यामध्ये बाहेरच्या गुंतवणूकदाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही, त्यामुळे व्यवसायावर तुमचा संपूर्ण हक्क राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता.

    या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही कर्जाचा बोजा नसतो आणि नफा कमावला की तो पूर्णतः तुमचाच असतो. मात्र, यामध्ये एक मोठी अडचण म्हणजे पैशांची मर्यादा. तुमच्याकडे भांडवल कमी असल्यामुळे व्यवसायाची वाढ मर्यादित राहू शकते. मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता भासू शकते.

     एंजल इन्व्हेस्टर्स

    ‘एंजल’ म्हणजे देवदूत, आणि एंजल इन्व्हेस्टर्स हे खरंच तुमच्या व्यवसायासाठी तसंच काम करतात. हे अनुभवी उद्योजक किंवा मोठे गुंतवणूकदार असतात, जे आपल्या वैयक्तिक संपत्तीमधून त्यांना आवडणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. तुमच्या कल्पनेवर आणि व्यवसायाच्या भविष्यातील संधींवर विश्वास ठेवून ते तुम्हाला भांडवल देतात. मात्र, त्याबदल्यात ते व्यवसायात काही प्रमाणात भागीदारी (equity) घेतात.

    एंजल इन्व्हेस्टर्स फक्त पैसा देत नाहीत, तर त्यांचा अनुभव, उद्योग क्षेत्रातील ओळखी आणि व्यावसायिक सल्लाही देतात. त्यामुळे तुमच्या स्टार्टअपला योग्य दिशा मिळते आणि व्यवसाय वाढीला गती मिळते. योग्य एंजल इन्व्हेस्टर मिळाल्यास तुमच्या व्यवसायाला केवळ आर्थिक मदतच नाही, तर एक मजबूत आधारसुद्धा मिळतो.

    व्हेंचर कॅपिटल – मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

    जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला चालू होतो, ग्राहक वाढतात आणि विक्री होण्यास सुरुवात होते , तेव्हा पुढील विस्तारासाठी जास्त पैशांची गरज लागते. अशावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट्स (VC’s) मदतीला येतात. हे मोठ्या कंपन्यांचे फंड असतात, जे भविष्यात भरभराटीला जाणाऱ्या स्टार्टअप्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. जर तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असेल, तर हे इन्व्हेस्टर्स तुम्हाला भांडवल देतात.

    व्हेंचर कॅपिटलिस्ट्स फक्त पैसे देत नाहीत, तर व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचे सल्लेही देतात. हे सुद्धा तुमच्या कंपनीत भागीदारी घेतात आणि काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही प्रमाणात त्यांचं नियंत्रण राहतं. तरीही, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल, तर व्हेंचर कॅपिटल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    सरकारी योजना आणि अनुदान

    सरकार नव्या स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. यामुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळतं. Startup India योजनेत सहभागी झाल्यास व्यवसाय नोंदणीवर सवलती, कर सवलत आणि इतर अनेक फायदे मिळतात. Mudra योजना ही लहान व्यवसायांसाठी आहे, जिथे कोणत्याही तारणाशिवाय छोटे कर्ज मिळू शकतं. तसेच, SIDBI (Small Industries Development Bank of India) ही योजना लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य देते.

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित व्यवसाय योजना (Business Plan) आणि अधिकृत नोंदणी असणं गरजेचं आहे. जर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण केल्या, तर सरकारकडून भांडवल उभारणं तुलनेनं सोपं होतं. योग्य योजनेचा लाभ घेतल्यास तुमचा व्यवसाय वेगाने वाढू शकतो.

    बँकेकडून कर्ज

    व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा सर्वात पारंपरिक आणि सहज मार्ग म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं. जर तुमच्याकडे व्यवस्थित बिझनेस प्लॅन, आधीपासून काही उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल, तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि कर्ज देण्यास तयार होतात. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी किंवा नवीन उपकरणे खरेदीसाठी वापरता येतं.

    लहान आणि मध्यम उद्योगांसाठी MSME (Micro, Small & Medium Enterprises) योजनां अंतर्गत काही विशेष कर्ज सुविधा दिल्या जातात. या योजनांमध्ये तुलनेने कमी व्याजदर आणि सोप्या परतफेडीच्या अटी मिळतात. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, व्यवसाय नोंदणी आणि आर्थिक स्थिरता दाखवावी लागते. जर तुमचा व्यवसाय सक्षम असेल आणि विश्वासार्हता असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    How to Raise Funding for Business?

    क्राउडफंडिंग 

    आजच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा एक नवीन आणि प्रभावी मार्ग म्हणजे क्राउडफंडिंग. यामध्ये तुम्ही तुमची व्यवसाय कल्पना ऑनलाइन शेअर करता आणि लोकांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करता. Kickstarter, Wishberry, Ketto यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमची संकल्पना जर लोकांना उपयुक्त, आकर्षक किंवा भावनिकदृष्ट्या जोडणारी वाटली, तर अनेक जण थोडीथोडी रक्कम देऊनही मोठी मदत करू शकतात.

    क्राउडफंडिंगमुळे मोठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या-थोड्या मदतीतून मोठी रक्कम उभारता येते. याशिवाय, लोकांशी थेट संपर्क होतो आणि तुमच्या उत्पादन किंवा सेवेबाबत सुरुवातीपासूनच जागरूकता निर्माण होते. जर तुमची कल्पना इनोव्हेटिव्ह आणि लोकांना आवडणारी असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स हे नव्या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करणारे विशेष उपक्रम असतात. IIT, IIMसारख्या प्रतिष्ठित संस्थांपासून खासगी कंपन्यांपर्यंत अशा अनेक संस्था या प्रोग्रॅम्स चालवतात. यात स्टार्टअपला व्यवसायाची योग्य दिशा, तंत्रज्ञान, नेटवर्किंग, आणि कधी कधी थोडी गुंतवणूक मिळते. नव्याने व्यवसाय सुरू करत असाल, तर हे प्रोग्रॅम्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यातून मार्केटिंग, व्यवस्थापन, संघटन कौशल्ये आणि निधी उभारणीचं ज्ञान मिळतं.

    व्यवसायासाठी योग्य फायनान्सिंग निवडणं महत्वाचं आहे. काहींसाठी स्वतःची बचत पुरेशी असते, तर काहींना गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागते. काहींना बँकेचे कर्ज योग्य वाटते, तर काहींसाठी सरकारी योजना फायदेशीर ठरतात. तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात आणि तुम्हाला किती भांडवलाची गरज आहे, यानुसार योग्य पर्याय निवडावा. योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या स्टार्टअपचा यशाचा मार्ग सुकर होईल.

    सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे ठोस, स्पष्ट आणि विश्वासार्ह व्यवसाय योजना असणं गरजेचं आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा बँक कर्ज देण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाची संकल्पना आणि योजना नीट समजून घेतं. तुमची कल्पना किती व्यवहार्य आहे, त्यातून किती नफा होऊ शकतो आणि ती किती काळ टिकू शकते ,हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे व्यववसायाचं उद्दिष्ट, उत्पन्नाचे स्रोत, खर्च, आणि विस्ताराची योजना या सर्व गोष्टी नीट मांडणं गरजेचं आहे. मजबूत व्यवसाय योजना असेल, तर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणं सोपं होतं आणि तुमच्या स्टार्टअपला भक्कम आधार मिळतो.

    आणखी वाचा

  • Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.

    राचेल कौर या भारतीय वंशाच्या असून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या मलेशियातील क्वालालंपूर ते सिंगापूर असा रोज विमान प्रवास करतात. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या आणि रंजक प्रवासाबद्दल!

    रोजचा प्रवास कसा असतो?

    राचेल कौर या मलेशियातील पेनांग शहरात राहतात, तर त्यांचं ऑफिस क्वालालंपूरमध्ये आहे. त्या एअर एशिया कंपनीत फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. आधी त्या ऑफिसजवळ राहत होत्या, पण तिथलं घरभाडं खूप महाग होतं. आणि त्या फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या मुलांना भेटू शकत होत्या. आई म्हणून त्यांना हे सहन होईना. म्हणून त्यांनी अनोखा मार्ग निवडला  तो म्हणजे दररोज विमानाने प्रवास करण्याचा!

    राचेल रोज पहाटे ४ वाजता उठतात, तयारी करून ५:५५ च्या फ्लाइटने क्वालालंपूरला जातात आणि ७:४५ ला ऑफिसला पोहोचतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर त्या पुन्हा विमानाने पेनांगला परततात आणि रात्री ८ वाजता आपल्या मुलांसोबत असतात. हा प्रवास ऐकायला अविश्वसनीय वाटतो, पण त्यांच्या मते यामुळे त्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यांच्या संगोपनात कुठलीही तडजोड करावी लागत नाही.

    विमान प्रवास महाग नाही का?

    पहिल्यांदा ऐकून वाटतं की रोज विमानाने प्रवास करणं खूप महाग असेल. पण प्रत्यक्षात राचेल कौर यांचा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आधी त्या ऑफिसजवळ राहायच्या, तेव्हा त्यांना दरमहा २८,००० (३४० डॉलर) घरभाडं द्यावं लागायचं. त्यात मुलांपासून दूर राहण्याचं दुःख वेगळंच होतं.

    आता त्या रोज विमानाने प्रवास करतात, तरी त्यांचा खर्च कमी आहे. विमान तिकिटासाठी त्यांना रु. १८,५०० (२२६ डॉलर) आणि जेवणासाठी रु. ५,५०० (६८ डॉलर) इतकाच खर्च येतो. त्यामुळे त्यांची पैशांची बचतही होते आणि त्यांना कुटुंबासोबत राहण्याचा आनंदही मिळतो.

    आई असणं म्हणजे त्याग आणि कष्ट

    राचेल कौर यांची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण अशीच कहाणी लाखो भारतीय महिलांचीही आहे. भारतातही अनेक स्त्रिया रोज तासन्‌तास लोकल ट्रेन, बस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून ऑफिसला जातात. घरी परतल्यानंतरही त्या कुटुंबाची जबाबदारी  सांभाळतात. आईपण आणि करिअर एकत्र निभावणं सोपं नसतं, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.

    The story of Indian-origin supermom from Malaysia who flies 600 km daily to work and back

    राचेल यांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या आपल्या कुटुंब आणि करिअरमध्ये सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतात. ही कहाणी त्या सर्व आईंना समर्पित आहे, ज्या आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात.

    नवी अर्थक्रांती राचेल आणि अशा सर्व “आयांना” सलाम करते , ज्या आपल्या कुटुंबासाठी आणि करिअरसाठी अखंड झटत असतात!

    आणखी वाचा: