Tag: स्टार्टअप

  • Home Business Ideas for Women | घरबसल्या सुरू करा ५ भन्नाट व्यवसाय

    Home Business Ideas for Women | घरबसल्या सुरू करा ५ भन्नाट व्यवसाय

    Home Business Ideas: महिलांनो… तुम्ही रोज इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर रील्स स्क्रोल करण्यात किती वेळ घालवता? अर्धा तास, एक तास की दोन तास? विचार करा, जर याच स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही घरबसल्या महिन्याला चांगली कमाई करू शकलात तर?

    कारण आजच्या धावपळीच्या युगात घर सांभाळून ९ ते ५ ची नोकरी करणे अनेकींसाठी कसरत ठरत आहे. बॉसची कटकट, प्रवासाचा त्रास आणि कुटुंबाला वेळ न देता येणे, यामुळे अनेक महिला नोकरी सोडण्याचा विचार करतात. पण आर्थिक स्वावलंबनही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर डिजिटल युगाने तुमच्यासाठी अनेक सुवर्णसंधी आणल्या आहेत. आज आपण अशा ५ सुपरहिट गृहउद्योगांची (Home Businesses) माहिती घेणार आहोत, जे तुम्ही अगदी कमी भांडवलात घरातून सुरू करून महिन्याला उत्तम नफा कमवू शकता.

    १.होममेड आणि कस्टमाइज्ड फूड बिझनेस (Food Business)

    Home Business Ideas: खाद्यपदार्थांचा व्यवसाय हा कधीही मंदी न येणारा सदाबहार उद्योग आहे, कारण अन्नाची गरज कधीच संपत नाही. जर तुमच्या हाताला छान चव असेल, तर तुम्ही घरगुती मसाले, ताजी लोणची, कुरकुरीत पापड, सणासुदीला लागणारे मोदक किंवा मऊसुत पुरणपोळ्या बनवून विकू शकता. आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आणि नोकरी करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना शुद्ध, हायजिनिक आणि घरगुती जेवणाची प्रचंड गरज असते. अशा वेळी तुम्ही ‘हेल्दी टिफिन सर्व्हिस’ सुरू करून आयटी पार्क किंवा ऑफिस एरियातील लोकांना घरगुती डबे पुरवू शकता. याशिवाय वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी कस्टमाइज्ड केक्स आणि होम-बेकिंगलाही मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची गरज नसते, तुम्ही थेट तुमच्या किचनमधूनच अत्यंत कमी भांडवलात याची सुरुवात करू शकता.

    २. Digital Marketing and Social Media Management

    Home Business Ideas: आजच्या आधुनिक युगात अगदी लहान दुकानापासून ते मोठ्या ब्रँड्सपर्यंत प्रत्येकाला आपली ऑनलाईन उपस्थिती (Online Presence) निर्माण करायची असते. जर तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स बनवणे किंवा व्हिडिओ एडिटिंगची चांगली आवड आणि समज असेल, तर हा तुमच्यासाठी एक ‘हाय-पेइंग’ बिझनेस बनू शकतो. या व्यवसायांतर्गत तुम्ही स्थानिक कंपन्या, कपड्यांची दुकाने, ब्युटी पार्लर्स, तसेच डॉक्टर किंवा इंजिनिअर्स यांच्यासाठी सोशल मीडिया पेजेस मॅनेज करू शकता. त्यांच्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी कॅनव्हा (Canva) सारख्या सोप्या अ‍ॅप्सचा वापर करून पोस्ट डिझाईन करणे आणि त्यांचे रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ एडिट करून देणे, असे याचे स्वरूप असते. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसची गरज नसते फक्त एक चांगला स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि तुमची Creativity एवढ्याच गोष्टींच्या जोरावर तुम्ही घरबसल्या मोठी कमाई करू शकता.

    ३.कस्टमाइज्ड गिफ्ट्स आणि हॅँडिक्राफ्ट्स (Handicrafts & Gifts)

    Home Business Ideas: आजकाल बाजारात रेडीमेड किंवा मशीनवर बनवलेल्या वस्तूंपेक्षा हाताने बनवलेल्या, युनिक वस्तूंना (Handmade Products) खूप जास्त मागणी आहे. लोकांना आपल्या प्रिय व्यक्तींना काहीतरी वेगळे आणि खास गिफ्ट द्यायचे असते, ज्यामुळे या व्यवसायाला मोठी संधी मिळाली आहे. तुम्ही घरी बसून Resin Art चे की-चेन्स आणि फोटो फ्रेम्स, हाताने बनवलेली फॅशनेबल ज्वेलरी, सुगंधी मेणबत्त्या (Scented Candles) किंवा सणांनुसार खास कस्टमाइज्ड गिफ्ट हॅम्पर्स तयार करू शकता. हे प्रॉडक्ट्स दिसायला अत्यंत आकर्षक असतात आणि ग्राहकांना आकर्षित करतात. तुम्ही या वस्तूंचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढून तुमच्या इंस्टाग्राम पेजवर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लिस्ट करून थेट संपूर्ण देशभरातील ग्राहकांना विकू शकता आणि घरबसल्या चांगला नफा मिळवू शकता.

    ४.ऑनलाईन ट्युशन्स आणि स्किल्स क्लासेस (Online Tuitions)

    Home Business Ideas: तुमच्याकडे असलेले ज्ञान, शिक्षण किंवा एखादी कला हाच तुमचा सर्वात मोठा बिझनेस बनू शकतो, कारण आजच्या काळात शिक्षण हे केवळ शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादित राहिलेले नाही. जर तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल, तर तुम्ही प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिकवू शकता. शालेय विषयांव्यतिरिक्त इंग्रजी बोलणे (Spoken English), कोडिंग, गाणे, डान्स, चित्रकला किंवा अगदी ब्युटीशियन आणि मेहंदीचा कोर्स यांसारख्या कौशल्यांचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. Zoom किंवा Google Meet सारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही एकाच जागी बसून देश-विदेशातील विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकता. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पैशांची गुंतवणूक शून्य असते आणि नफा १००% असतो, कारण तुम्ही तुमची बुद्धी आणि कौशल्य विकत असता.

    ५. कपड्यांचा आणि फॅशन बुटिक व्यवसाय (Fashion Boutique)

    Home Business Ideas: फॅशन आणि कपड्यांची क्रेझ कधीच कमी होत नाही, त्यामुळे हा महिलांसाठी अत्यंत सुरक्षित आणि हमखास यशस्वी ठरणारा गृहउद्योग मानला जातो. हा बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच खूप मोठी गुंतवणूक करण्याची किंवा दुकान थाटण्याची गरज नसते. तुम्ही सुरत, मुंबई किंवा थेट मॅन्युफॅक्चरर (Manufacturer) कडून होलसेल दरात साड्या, कुर्तीज किंवा लहान मुलांचे कपडे आणू शकता. सुरुवातीला तुम्ही व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) ग्रुप्सच्या माध्यमातून या कपड्यांचे फोटो तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करून ‘रिसेलिंग’ (Reselling) सुरू करू शकता. जर तुम्हाला स्टिचिंग किंवा फॅशन डिझायनिंगची आवड असेल, तर तुम्ही युनिक डिझायनर कपडे शिवून देण्याचे बुटिकही घरी सुरू करू शकता. हळूहळू जसा तुमचा ग्राहकवर्ग आणि विश्वास वाढेल, तसे तुम्ही घरातच एक मोठे स्टोअर किंवा स्वतःची ऑनलाईन वेबसाईट सुरू करून मोठी झेप घेऊ शकता.

    महिलांनो, आजची स्त्री ही फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल युगाच्या या क्रांतीचा फायदा घ्या, तुमच्यातील सुप्त गुणांना ओळखा आणि आजच स्वतःचा एक छोटा गृहउद्योग सुरू करा. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या साम्राज्याची सुरुवात ही एका छोट्या पावलानेच होते. तुम्हाला या पाच व्यवसायांपैकी कोणत्या बिझनेसमध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा?

  • Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय.

    या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुमच्या नवीन व्यवसायाला योग्य मार्गदर्शन देण्यासोबतच आर्थिक पाठबळ देखील देतील.

    १) प्रधानमंत्री मुद्रा योजना

    प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSMEs) आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विशेषत: लहान आणि नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले भांडवल उपलब्ध करून दिले जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये:

    या योजनेत एकूण तीन प्रकारे कर्ज दिले जाते. 

    • शिशु (Shishu):  यात रु. 50,000 पर्यंतचे कर्ज नवीन उद्योजकांसाठी दिले जाते
    • किशोर (Kishore):यात  रु. 50,001 ते रु. 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 
    • तरुण (Tarun): यात  रु. 5 लाख ते रु. 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते

    प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?

    मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

    बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी आवश्यक माहिती विचारतील. या माहितीनुसार, तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाऊ शकते. उद्योगाच्या स्वरूपानुसार, शाखा व्यवस्थापक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासही सांगू शकतात. पीएमएमवाय योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही योजनेची अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता.

    या योजनेत  कर्ज प्राप्त करण्यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, कर्जावरील व्याजदर बँकांच्या धोरणांवर अवलंबून असतो. व्यावसायिक आवश्यकतांसाठी, जसे की मशीन खरेदी, कामगारांचे पगार, सामग्री खरेदी इत्यादीसाठी आपण हे कर्ज घेऊ शकतो. ही योजना लहान उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे, कारण यात कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळवता येते. विविध बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांकडून (NBFCs) आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

    २) पीएम स्वनिधी योजना 

    प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजना १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना (स्ट्रीट व्हेंडर्स) आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, या योजनेसाठी स्ट्रीट वेंडर जवळ महापालिकेने जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र जर स्ट्रीट वेंडर्स नोंदणीकृत नसतील, तर ते सुद्धा स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन तथा ऑफलाईन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज लाभार्थ्यांना एक वर्षाच्या आत सुलभ हप्त्यात किंवा कमी व्याजदरात परतफेड करावे लागते.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    कर्जाची उपलब्धता: या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना सुरुवातीला ₹१०,००० पर्यंतचे विना गॅरंटी कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास पुढील टप्प्याचे जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते.

    सुविधाजनक परतफेड: हे कर्ज १ वर्षाच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये परत करता येते. जर विक्रेत्यांनी हप्ते वेळेत भरले, तर त्यांना व्याजावर ७% सबसिडी मिळते.

    डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन: डिजिटल माध्यमातून व्यवहार केल्यास अतिरिक्त लाभ दिले जातात. UPI, डेबिट कार्ड, QR कोड इत्यादींच्या माध्यमातून व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

    क्रेडिट स्कोर सुधारणा: नियमित हप्ते भरण्यामुळे विक्रेत्यांचा क्रेडिट स्कोर सुधारतो, ज्यामुळे भविष्यात आणखी कर्ज घेणे सुलभ होते.

    रस्त्यावरील विक्रेते, ज्यांनी २४ मार्च २०२० किंवा त्याआधी व्यवसाय सुरू केला असेल, या योजनेसाठी पात्र आहेत. लायसन्सधारक विक्रेत्यांव्यतिरिक्त ओळखपत्र असलेल्या विक्रेत्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो.

    अर्ज कसा कराल ?

    Startup Yojana: पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना नजीकच्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.

    रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःच्या व्यवसायाची पुनर्बांधणी आणि विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. यामुळे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होत आहे. पीएम स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतात आणि आपला व्यवसाय  सुरू करू शकतात.

    ३) स्कील इंडिया डिजिटल हब (SIDH )

    स्कील इंडिया डिजिटल हब योजना ही भारत सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी युवकांना विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश भारतातील युवकांना नव्या डिजिटल युगाच्या मागणीनुसार सक्षम करणे आहे.

    योजनेची उद्दिष्टे

    डिजिटल कौशल्य विकास: युवकांना डिजिटल कौशल्ये शिकवून त्यांना रोजगारक्षम बनवणे.

    स्वयंरोजगाराची संधी: युवकांना विविध डिजिटल व्यावसायिक संधी निर्माण करण्यास प्रेरित करणे.

    कौशल्य प्रशिक्षण: ऑनलाइन माध्यमातून आणि क्लासरूम ट्रेनिंगद्वारे विविध कौशल्यं शिकवणे.

    उद्योगाशी संलग्नता: उद्योगांच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

    अर्ज करण्याची प्रक्रिया:

    यासाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी आवश्यक दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराला योग्यतेनुसार प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. ही योजना युवकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यातील डिजिटल जगात उत्तम संधी मिळतील.

    या योजनेअंर्तगत विविध कौशल्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध असते, तसेच वेगवेगळ्या डिजिटल कौशल्यांवरील ऑनलाईन कोर्सेसची सुविधा उपलब्ध असते.  प्रशिक्षणानंतर उद्योगांमध्ये इंटरशिप किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची संधी मिळते तसेच प्रशिक्षणानंतर सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळते.

    ४) स्टार्टअप इंडिया

    स्टार्टअप इंडिया योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी भारतातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. देशातील उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2016 रोजी या योजनेची घोषणा केली होती.  स्टार्टअप इंडिया योजनेच्या माध्यमातून सरकारने अनेक धोरणात्मक बदल केले, ज्यामुळे स्टार्टअप्सना अनुकूल वातावरण मिळाले. ही योजना देशातील बेरोजगारी कमी करणे, नवकल्पनांना  प्रोत्साहन देणे आणि आर्थिक विकासाला गती देणे या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित आहे.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    करभरण्यातून सूट: स्टार्टअप्सना तीन वर्षांसाठी करातून सूट दिली जाते. त्याचबरोबर, पात्र स्टार्टअप्सना Minimum Alternate Tax मध्ये सूट मिळते.

    स्वतःच्या संकल्पना आणि उत्पादने पेटंट करण्यासाठी सहाय्य: स्टार्टअप्सना जलदगतीने पेटंट अर्ज मंजूर होण्यासाठी सहाय्य दिले जाते. पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या फीमध्ये सवलत मिळते, तसेच सरकारतर्फे आर्थिक सहाय्यही दिले जाते.

    फंडिंग आणि गुंतवणूक सहाय्य: स्टार्टअप्ससाठी सरकारने ₹10,000 कोटींचा ‘फंड ऑफ फंड्स’ स्थापन केला आहे. या फंडाच्या माध्यमातून स्टार्टअप्सना भांडवल मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते. व्हेंचर कॅपिटलिस्ट्स, अँजेल इन्व्हेस्टर्स आणि बँका यांच्याकडून स्टार्टअप्सना गुंतवणूक मिळवण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते.

    मॅन्युफॅक्चरिंग आणि व्यापारातील सवलती: स्टार्टअप्सना सरकारच्या विविध निविदांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि खरेदीसाठी विशेष सवलती मिळतात. यामध्ये स्टार्टअप्सना मागील अनुभवाची किंवा टर्नओव्हरची अट लावली जात नाही.

    उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण: देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये आणि संशोधन केंद्रांमध्ये इनक्यूबेशन सेंटर स्थापन करून नवउद्योजकांना सहाय्य केले जाते. स्टार्टअप्ससाठी योग्य धोरणं तयार करून, यासाठी उद्योजकाना मार्गदर्शन केले जाते. 

    लायसन्सिंग आणि नियमातील सवलती: स्टार्टअप्सना विविध प्रकारची लायसन्स मिळवण्यासाठी कमीत-कमी  कागदपत्रांची आवश्यकता असते, तसेच ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होते. पर्यावरणीय आणि श्रम नियमांमधून काही सवलती दिल्या जातात, ज्यामुळे स्टार्टअप्सना व्यवसाय सुरु करण्यासाठी सहूलियत मिळतं असते.

    स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग: उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये स्टार्टअप कोर्सेस आणि प्रोग्राम्स सुरु करून उद्योजकतेची मानसिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

    योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    Startup Yojana: सर्वप्रथम, स्टार्टअप इंडिया पोर्टलवर स्टार्टअपची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी, PAN कार्ड, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, आणि संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असते. स्टार्टअप्सना डीपीआयआयटी (DPIIT) कडून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळवावी लागते. या मान्यतेसाठी स्टार्टअपने नवीन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या असाव्यात आणि कंपनीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे लागते.

    नोंदणी झाल्यानंतर, स्टार्टअप्स विविध कर लाभ, सवलती, आणि निधी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या ‘फंड ऑफ फंड्स’ आणि विविध वित्तीय संस्थांमधून गुंतवणूक मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. स्टार्टअप्सना इनक्यूबेशन सेंटर आणि इन्व्हेस्टर मॅचमेकिंग सेवांचा लाभ देखील घेता येतो.

    स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशभरातील नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली आहे. या योजनेमुळे उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन रोजगार निर्मिती, उत्पादनक्षमता वाढवणे, आणि जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढवण्यास मदत झाली आहे.

    ५) जागृती यात्रा 

    जागृती सेवा संस्थेने मध्य भारतातील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी जागृती यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेअंतर्गत उद्योजकांना एक अनोखी संधी मिळते. ज्यामुळे त्यांना प्रख्यात उद्योजकांशी भेटण्याची, व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची आणि जागतिक अनुभव मिळवण्याची संधी मिळते.

    यात्रेचे मुख्य उद्दिष्ट:

    जागृती यात्रा (JY): भारतातील टियर 2 (अधिक विकसित जिल्हे परंतु मोठ्या शहरांपेक्षा कमी) . आणि टियर 3 (कमी विकसित, आर्थिक आणि सामाजिक संसाधनांची उपलब्धता कमी असणारे जिल्हे ) जिल्ह्यांमधील उद्योजकांना पाठिंबा देणे.

    सहकार्य वाढवणे: उद्योजकांमध्ये नेटवर्किंग आणि सहकार्य वाढवणे, व्यावसायिक ज्ञान आणि संसाधनांची उपलब्धता.

    शिष्यवृत्ती अर्ज: यात आपल्यालाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. 

    विविध भारतीय प्रदेशांतून प्रवास करून सांस्कृतिक आणि भौगोलिक अनुभव मिळवयाचा असेल तर या यात्रेपेक्षा उत्तम पर्याय नाही. तसेच या ठिकाणी अनेक तज्ज्ञांच्या कार्यशाळा आणि सत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करता येते. व्यावसायिक कौशल्यं आणि नेटवर्किंगच्या संधी मिळवता येतात अनेक उद्योजक आणि सामाजिक बदल घडवणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येतो 

    तर मित्रांनो, हे काही प्रमुख उपक्रम आहेत जे नवउद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतात. या योजनांचा वापर करून, आपण आपल्या कल्पकतेला सकारात्मक दिशा देऊ शकता आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाऊ शकता. नवउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा फायदा करून घेतल्यास त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासास गती नक्कीच  मिळेल.

    आणखी वाचा

  • जागतिक महिला दिन 2026: भारतीय स्त्रीशक्तीचा नवा आवाज – International Womens Day

    जागतिक महिला दिन 2026: भारतीय स्त्रीशक्तीचा नवा आवाज – International Womens Day

    ८ मार्च (International Womens Day) हा केवळ शुभेच्छांचा उत्सव नसून, तो महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा दिवस आहे. २०२६ मध्ये, जेव्हा आपण संयुक्त राष्ट्रांच्या (UN Women)हक्क, न्याय आणि कृती’ (Rights. Justice. Action. For ALL Women and Girls) या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा हे स्पष्ट होतं की आता केवळ चर्चा करून चालणार नाही. आजही मालमत्तेचा हक्क, समान वेतन आणि सुरक्षिततेसाठी स्त्रियांना जगाच्या कानाकोपऱ्यात लढावं लागत आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. कायद्याने दिलेले हक्क जेव्हा समाजात प्रत्यक्ष न्यायात रूपांतरित होत नाहीत, तेव्हा मानवी प्रगती खुंटते. त्यामुळे, स्त्रियांच्या हक्कांचं रक्षण हे केवळ स्त्रियांसाठी आवश्यक नसून, जागतिक मानवी हक्कांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे.

    भारतीय महिला: आकाशाला गवसणी घालणारी झेप

    भारताचा विचार केला तर २०२६ सालापर्यंत आपण एक मोठा टप्पा गाठला आहे. भारतीय स्त्रिया आज केवळ स्वयंपाकघरातील सुगृहिणी राहिलेल्या नाहीत, तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे चाक फिरवणाऱ्या खऱ्या ‘कर्त्या’ बनल्या आहेत.

    उद्योजकीय क्रांती: भारतातील स्टार्टअप क्षेत्रात महिलांचे योगदान गेल्या दोन वर्षांत विक्रमी वाढले आहे. ‘नायका’ (Nykaa) च्या फाल्गुनी नायर असोत किंवा ग्रामीण भागातील एखादी छोटी उद्योजिका, भारतीय महिला आज स्वतःच्या हिमतीवर ‘ब्रँड’ उभे करत आहेत. २०२६ च्या आकडेवारीनुसार, देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांपैकी (MSME) सुमारे २४% उद्योगांची मालकी महिलांकडे आहे.

    संरक्षण आणि अंतराळ संशोधन: भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना आता ‘कॉम्बॅट रोल’ (युद्धभूमीवरील भूमिका) मध्ये सामावून घेतले जात आहे. इस्रो (ISRO) च्या गगनयान आणि चांद्रयान मोहिमांमध्ये महिला शास्त्रज्ञांचे नेतृत्व जगाने पाहिले आहे. ही केवळ एक नोकरी नसून भारतीय मानसिकतेत झालेला हा एक क्रांतिकारी बदल आहे.

    ग्रामीण भारताचा कणा: लखपती दीदी आणि तंत्रज्ञान

    महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ ग्रामीण भारतात पाहायला मिळतो. केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ यांसारख्या मोहिमांमुळे ग्रामीण महिलांच्या हातात आर्थिक सत्ता आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ कर्ज घेणेच शिकले नाही, तर त्या आता उत्पादने तयार करून ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवत आहेत. डिजिटल इंडियाच्या प्रसारामुळे आज गावातील एक सामान्य महिलाही क्यूआर कोड (QR Code) वापरून व्यवहार करत आहे. हे तांत्रिक साक्षरतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. २०२६ मध्ये ‘ड्रोन दीदी’ सारख्या उपक्रमांमुळे शेतीसारख्या पारंपरिक पुरुषप्रधान क्षेत्रातही महिलांनी आपली पकड घट्ट केली आहे.

    शिक्षण आणि आरोग्य: बदलाचे दोन मुख्य स्तंभ

    कोणत्याही प्रगत समाजाची ओळख ही तिथल्या स्त्रियांच्या शिक्षणावरून होते. २०२६ मध्ये भारताचा ‘महिला उच्च शिक्षण प्रवेश दर’ (GER) वाढून तो ३०% च्या पुढे गेला आहे. विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित (STEM) या विषयांत मुलींची आवड वाढत आहे. आरोग्य क्षेत्रातही ‘मिशन शक्ती’ आणि ‘मिशन वात्सल्य’ यांसारख्या योजनांमुळे माता मृत्यू दरात (MMR) मोठी घट झाली आहे. मात्र, आजही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकडे आणि पोषण आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेव्हा स्त्री निरोगी असेल, तेव्हाच घर आणि देश प्रगत होईल.

    क्रीडा क्षेत्र: मैदानावरची स्त्रीशक्ती

    क्रीडा क्षेत्रातील भारतीय महिलांचे यश हे २०२६ मधील सर्वात मोठे ठळक वैशिष्ट्य आहे. स्मृती मानधना, निखत जरीन किंवा पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. महिलांच्या प्रीमियर लीग (WPL) सारख्या स्पर्धांमुळे महिला खेळाडूंना केवळ आर्थिक स्थैर्यच मिळाले नाही, तर त्यांना एक मोठी ओळखही मिळाली आहे. आज ‘मुलगी आहे म्हणून काय झाले?’ हा प्रश्न विचारणे बंद झाले असून ‘मुलगी आहे म्हणून करून दाखवणार!’ हा विश्वास वाढला आहे.

    भविष्यातील आव्हाने: सायबर सुरक्षा आणि सामाजिक समानता

    indian women day

    प्रगती होत असली तरी २०२६ मध्ये नवी आव्हाने उभी राहिली आहेत. ‘डीपफेक’ (Deepfake) आणि ‘एआय’ (AI) च्या माध्यमातून स्त्रियांची बदनामी करणे किंवा त्यांना सायबर गुन्ह्यांना बळी पाडणे हे मोठे संकट आहे. तसेच, आजही कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि घरगुती हिंसाचार यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. ‘न्याय’ आणि ‘कृती’ या २०२६ च्या थीमचा अर्थ हाच आहे की, आपण अशा कायद्यांची निर्मिती आणि अंमलबजावणी केली पाहिजे, जिथे प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटेल.

    कृतीची वेळ आताच!

    जागतिक महिला दिन हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, तो वर्षभर राबवण्याचा एक विचार आहे. ‘स्त्री’ ही निसर्गाची सर्वात मोठी शक्ती आहे. तिला सवलती नको आहेत, तर तिला समान संधी हवी आहे. तिला आरक्षणापेक्षा अधिक सन्मानाची गरज आहे. “Rights. Justice. Action. For ALL Women and Girls” या मंत्राचा अवलंब करून आपण असा समाज घडवूया जिथे लिंगभेद हा केवळ शब्दापुरता उरेल आणि प्रत्येकाची प्रगती त्याच्या कौशल्यानुसार होईल.

    चला तर मग, २०२६ च्या या महिला दिनानिमित्त संकल्प करूया की, आपण आपल्या घरातील, कार्यालयातील आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर करू, तिचे हक्क मान्य करू आणि तिला तिचे आकाश शोधण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देऊ. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.

    आणखी वाचा :

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर

    CARS24 1


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!

  • नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

    नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

    आज अनेक तरुण-तरुणी नवीन कल्पनांवर आधारित स्टार्टअप सुरू करत आहेत. स्वतः काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, नवे प्रयोग आणि मोठ्या संधी शोधण्याची धडपड यामुळे उद्योजकतेकडे ओढा वाढला आहे. मात्र, केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, ती योग्य प्रकारे अंमलात आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा नवीन उद्योजक काही मूलभूत चुका करतात, ज्या व्यवसायाच्या वाढीला अडथळा ठरू शकतात. योग्य नियोजन आणि योग्य धोरणांशिवाय फक्त उत्साहाच्या जोरावर व्यवसाय यशस्वी होणं कठीण असतं.

    व्यवसाय सुरू करताना आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा आणि योग्य मार्गदर्शन यावर भर देणं आवश्यक आहे. सुरुवातीला काही महत्त्वाच्या चुका टाळल्या नाहीत, तर  सुरुवातीचा उत्साह लवकरच निराशेत बदलू शकतो. म्हणूनच, या लेखात आपण अशा ७ चुका पाहणार आहोत, ज्या कळत-नकळत व्यवसायिकांकडून होऊ शकतात. मात्र, नव्याने स्टार्टअप सुरू करताना त्या टाळणं अत्यंत गरजेचं आहे.

    १. कल्पनेची पडताळणी न करणे

    फक्त कल्पना चांगली आहे म्हणून उत्पादन तयार केलं, पण लोकांना त्याची गरजच नसेल, तर तो व्यवसाय अपयशी ठरू शकतो. म्हणूनच कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणण्याआधी बाजारपेठेचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची लोकांना खरंच गरज आहे का, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

    यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधा, त्यांचे मत जाणून घ्या आणि आवश्यकतेनुसार बदल करा. ग्राहक सर्वेक्षण करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि सर्वात कमी खर्चात ‘MVP’ म्हणजेच किमान व्यवहार्य उत्पादन तयार करून त्याची चाचणी करा. यामुळे बाजारातील मागणी आणि उत्पादनाच्या यशाची शक्यता तपासता येईल.

    2 1

    २. आर्थिक व्यवस्थापनात निष्काळजीपणा

    स्टार्टअप सुरू झाल्यावर पैशांची ये-जा इतकी वेगाने होते की कधी खर्च जास्त झाला आणि भांडवल कमी पडलं, हे लक्षातही येत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही किती खर्च करत आहात, हे तपासा. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या भांडवलाचा अंदाज घ्या आणि त्याचा योग्य वापर करा.

    यालाच ‘बर्न रेट‘ म्हणतात, म्हणजे तुमचं स्टार्टअप किती वेगाने पैसे खर्च करत आहे. भविष्यात जर जास्त भांडवलाची गरज भासली, तर ते कुठून मिळवायचं, याची आधीच योजना तयार ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि नफ्याच्या दिशेने योग्य आर्थिक नियोजन करा, म्हणजे तुमच्या स्टार्टअपचा प्रवास अधिक स्थिर आणि यशस्वी होईल.

    3 1

    ३. ग्राहकांचा अभिप्राय दुर्लक्षित करणे

    ग्राहक हे तुमच्या व्यवसायाचा आरसा असतात. त्यांचा अभिप्राय लक्षात घेतला नाही, तर तुमचं उत्पादन किंवा सेवा हळूहळू अप्रासंगिक ठरू शकते. ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला उत्पादनातील सुधारणा आणि बाजारातील मागणी समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे ग्राहक काय म्हणत आहेत, ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या गरजांनुसार बदल करण्याची मानसिकता ठेवा.

    सतत सुधारणा करत राहिल्यास, तुमचं उत्पादन अधिक उपयुक्त आणि ग्राहकांसाठी आकर्षक होत जातं. ग्राहकांच्या फीडबॅकवर त्वरित कृती करा, त्यांच्यासोबत संवाद साधा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या ब्रँडवर विश्वास निर्माण होईल आणि व्यवसाय अधिक वेगाने वाढेल.

    4

    ४.हायरिंग करताना अति घाई किंवा अति विलंब

    योग्य टीमशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. काही वेळा स्टार्टअपमध्ये गरज नसताना लवकर भरती केली जाते, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. तर काही वेळा आवश्यक वेळेत भरती न केल्यामुळे कामाचा ताण वाढतो आणि व्यवसायाची वाढ मंदावते. त्यामुळे हायरिंग करताना गरज आणि वेळ यांचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे.

    योग्य कर्मचारी निवडताना केवळ कौशल्य पाहू नका, तर त्यांच्या विचारसरणी, काम करण्याची पद्धत आणि कंपनीच्या मूल्यांशी त्यांची जुळवणूक होते का, हेही तपासा. चांगली टीम म्हणजे फक्त अनुभवी लोकांचा गट नव्हे, तर तुमच्या उद्दिष्टांसोबत जुळणारी लोकं असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे भरती करण्याआधी स्पष्ट योजना तयार करा आणि योग्य वेळी, योग्य लोकांना संधी द्या.

    5

    ५. स्पष्ट व्यवसाय मॉडेल नसणे

    पैसे कुठून येणार? हा प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच स्वतःला विचारला पाहिजे. अनेक स्टार्टअप केवळ चांगल्या कल्पनेच्या जोरावर पुढे जातात, पण त्यांना उत्पन्नाचा स्पष्ट स्रोत नसतो. त्यामुळे काही काळानंतर पैशांची अडचण येते आणि व्यवसाय टिकून राहणं कठीण होतं.

    यावर उपाय म्हणजे सुरुवातीलाच तुमचं बिझनेस मॉडेल स्पष्ट करणं. तुम्ही कुठल्या सेवांसाठी पैसे घेणार? ग्राहकांना कोणत्या सुविधांसाठी शुल्क द्यावं लागेल? आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते पर्याय आहेत? हे सर्व ठरवा. वेळोवेळी व्यवसाय मॉडेल सुधारत राहा आणि वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्याच्या शक्यता तपासा.

    6

    ६. खराब मार्केटिंग रणनीती

    फक्त चांगलं उत्पादन तयार केलं की ग्राहक आपोआप येतील, असा समज अनेक नव्या उद्योजकांचा असतो. पण वास्तवात, लोकांना तुमच्या ब्रँडबद्दल माहितीच नसेल, तर ते ते विकत घेणार कसं ? त्यामुळे उत्तम उत्पादनासोबत प्रभावी मार्केटिंगही गरजेचं आहे.

    मार्केटिंगसाठी योग्य रणनीती ठरवा. सोशल मीडिया, डिजिटल जाहिराती, प्रभावशाली लोकांचे (influencers) सहकार्य, आणि ग्राहकांशी थेट संवाद यासारख्या पद्धती वापरा. कोणत्या मार्गाने तुमचं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचं, यासाठी ठोस योजना तयार ठेवा आणि सतत नवीन प्रयोग करत राहा.

    Navi Blogs Size 13

    ७. बाजारातील बदलांना न जुळवून घेणे

    आजचा बाजार सतत बदलत आहे. तंत्रज्ञान, ट्रेंड्स आणि ग्राहकांच्या गरजा झपाट्यानं बदलतात. अशा वेळी, जुन्या कल्पनांवर अडून न राहता परिस्थितीनुसार लवचिक राहणं महत्त्वाचं आहे. काही वेळा तुमच्या उत्पादनाची दिशा बदलावी लागू शकते, तर कधी नवीन संधी स्वीकाराव्या लागू शकतात.

    बदल ही वाढीची संधी असते. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणि बाजारातील बदल लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करा. वेळेप्रमाणे स्वतःला अपडेट ठेवा आणि नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहा. यामुळे तुमचं स्टार्टअप टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढेल.

    7 1

    मित्रांनो,स्टार्टअप म्हणजे एक रोमांचक प्रवास असतो, पण तो यशस्वी करायचा असेल तर काही महत्त्वाच्या चुका टाळणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून योग्य नियोजन करा, स्पष्ट व्यवसाय मॉडेल ठरवा आणि मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहकांचा अभिप्राय ऐकून सुधारणा करण्याची तयारी ठेवा.

    सतत शिकण्याची वृत्ती ठेवल्यास आणि बदल स्वीकारल्यास तुमचं स्टार्टअप यशाच्या दिशेने पुढे जाईल. योग्य टीम, आर्थिक शिस्त आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे गेलात, तर तुमचा व्यवसाय निश्चितच उंच भरारी घेईल!

    आणखी वाचा :

  • Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी उपयोगी ठरू शकतात.

    जर व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या लेखात आपण अशाच यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकता येणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया आणि ते व्यवसायासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, हे पाहूया.

    १) खऱ्या समस्येवर उपाय शोधा – ग्राहकांच्या गरजा ओळखा

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ग्राहकांच्या समस्येचा अभ्यास करणं. प्रत्येक व्यवसाय हा एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी असतो. जर तुम्ही लोकांच्या मोठ्या समस्येवर सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दिला, तर तुमच्या व्यवसायाला हमखास यश मिळेल.

    उदाहरणार्थ, Meesho या कंपनीने भारतातील लहान व्यावसायिक आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. ऑनलाईन विक्रीसाठी त्यांच्याकडे महागडी वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नव्हतं. Meesho ने एक सोपा प्लॅटफॉर्म तयार केला, जिथे कोणीही सहजपणे ऑनलाइन विक्रेता बनू शकतो. यामुळे लाखो लघु उद्योजकांना डिजिटल मार्केटमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

    जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधलात, तर तुमच्या व्यवसायाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. बाजाराचा अभ्यास करा, लोकांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घ्या आणि त्यावर सोपा, किफायतशीर आणि उपयुक्त उपाय द्या.

    3

    २) छोटी सुरुवात करा, मग हळूहळू विस्तार करा

    अनेक नवउद्योजक सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे खर्च वाढतो आणि अपयशाची शक्यता अधिक राहते. त्याऐवजी, लहान सुरुवात करून, अनुभव घेत घेत व्यवसाय वाढवणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं.

    उदाहरणार्थ, Zerodha या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांसोबत व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांच्या तुलनेत कमी शुल्कात सोपं आणि किफायतशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दिलं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. आज Zerodha ही भारतातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली आहे.

    4

    ३) मजबूत आणि सक्षम टीम तयार करा

    कोणताही मोठा व्यवसाय एकट्याने उभा करता येत नाही. व्यवसायाची वाढ आणि यश हे चांगल्या टीमवर आणि त्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. विश्वासू, मेहनती आणि कौशल्यपूर्ण लोक सोबत असतील, तर आव्हानं पार करणं आणि संधीच सोन्यात रूपांतर करणं सोपं जातं. 

    उदाहरणार्थ, CRED हा स्टार्टअप त्यांच्या मजबूत टीममुळे यशस्वी झाला. CRED हे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. संस्थापकांनी सुरुवातीपासूनच अनुभवी आणि हुशार लोकांची निवड केली, ज्यांनी उत्कृष्ट ॲप डिझाइन, प्रभावी मार्केटिंग आणि ग्राहकांसाठी उपयुक्त योजना तयार केल्या.

    सुरुवातीला थोड्या, पण हुशार लोकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत काम करा. तुमच्या उद्दिष्टांशी जुळणारी, नवे प्रयोग करण्यास तयार असलेली आणि आव्हानांना सामोरे जाणारी टीम निवडा. एक चांगली टीमच तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते.

    5

    ४) ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवा

    ग्राहक समाधानी असतील, तरच व्यवसाय टिकून राहतो. समाधानी ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतात आणि इतरांनाही तुमच्या सेवेची शिफारस करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

    उदाहरणार्थ, Zomato ने ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सहज वापरता येणारं आणि वेगवान ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया आणि तात्काळ ग्राहकसेवा दिली. यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि Zomato एक लोकप्रिय ब्रँड बनला.

    ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांचे प्रश्न पटकन सोडवा आणि त्यांचा अनुभव चांगला राहील याची काळजी घ्या. यामुळे ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल.

    6

    ५) डेटा आणि ग्राहकांचा फीडबॅक वापरा

    बाजार सतत बदलत असतो, त्यामुळे व्यवसायात वेळेनुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा फीडबॅक आणि डेटा विचारात घेतल्यास तुमची सेवा अधिक चांगली होऊ शकते आणि व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो.

    उदाहरणार्थ, Swiggy सुरुवातीला फक्त अन्न वितरण सेवा पुरवत होते. मात्र, ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या खरेदीच्या सवयींचा अभ्यास केल्यावर त्यांना समजले की लोक घरपोच किराणासामानही हवे आहे. त्यानंतर त्यांनी Swiggy Instamart सुरू केलं आणि आता किराणा व इतर वस्तूंच्या डिलिव्हरीमध्येही ते यशस्वी झाले आहेत.

    ग्राहकांचा फीडबॅक आणि बाजारातील डेटा सतत तपासा. गरजेनुसार सेवा सुधारत राहिल्यास तुम्ही स्पर्धेत टिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढेल.

    7

    मित्रांनो,यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवत असताना खरी समस्या ओळखणं, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करणं, सक्षम टीम तयार करणं, ग्राहकांचा अनुभव उत्तम ठेवणं आणि डेटा व फीडबॅकच्या आधारे सुधारणा करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

    जर तुम्हीही या गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केला, तर तुमचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हेच यशस्वी उद्योजकतेचं खरं रहस्य आहे!

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.

    राचेल कौर या भारतीय वंशाच्या असून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या मलेशियातील क्वालालंपूर ते सिंगापूर असा रोज विमान प्रवास करतात. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या आणि रंजक प्रवासाबद्दल!

    रोजचा प्रवास कसा असतो?

    राचेल कौर या मलेशियातील पेनांग शहरात राहतात, तर त्यांचं ऑफिस क्वालालंपूरमध्ये आहे. त्या एअर एशिया कंपनीत फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. आधी त्या ऑफिसजवळ राहत होत्या, पण तिथलं घरभाडं खूप महाग होतं. आणि त्या फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या मुलांना भेटू शकत होत्या. आई म्हणून त्यांना हे सहन होईना. म्हणून त्यांनी अनोखा मार्ग निवडला  तो म्हणजे दररोज विमानाने प्रवास करण्याचा!

    राचेल रोज पहाटे ४ वाजता उठतात, तयारी करून ५:५५ च्या फ्लाइटने क्वालालंपूरला जातात आणि ७:४५ ला ऑफिसला पोहोचतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर त्या पुन्हा विमानाने पेनांगला परततात आणि रात्री ८ वाजता आपल्या मुलांसोबत असतात. हा प्रवास ऐकायला अविश्वसनीय वाटतो, पण त्यांच्या मते यामुळे त्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यांच्या संगोपनात कुठलीही तडजोड करावी लागत नाही.

    विमान प्रवास महाग नाही का?

    पहिल्यांदा ऐकून वाटतं की रोज विमानाने प्रवास करणं खूप महाग असेल. पण प्रत्यक्षात राचेल कौर यांचा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आधी त्या ऑफिसजवळ राहायच्या, तेव्हा त्यांना दरमहा २८,००० (३४० डॉलर) घरभाडं द्यावं लागायचं. त्यात मुलांपासून दूर राहण्याचं दुःख वेगळंच होतं.

    आता त्या रोज विमानाने प्रवास करतात, तरी त्यांचा खर्च कमी आहे. विमान तिकिटासाठी त्यांना रु. १८,५०० (२२६ डॉलर) आणि जेवणासाठी रु. ५,५०० (६८ डॉलर) इतकाच खर्च येतो. त्यामुळे त्यांची पैशांची बचतही होते आणि त्यांना कुटुंबासोबत राहण्याचा आनंदही मिळतो.

    आई असणं म्हणजे त्याग आणि कष्ट

    राचेल कौर यांची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण अशीच कहाणी लाखो भारतीय महिलांचीही आहे. भारतातही अनेक स्त्रिया रोज तासन्‌तास लोकल ट्रेन, बस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून ऑफिसला जातात. घरी परतल्यानंतरही त्या कुटुंबाची जबाबदारी  सांभाळतात. आईपण आणि करिअर एकत्र निभावणं सोपं नसतं, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.

    The story of Indian-origin supermom from Malaysia who flies 600 km daily to work and back

    राचेल यांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या आपल्या कुटुंब आणि करिअरमध्ये सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतात. ही कहाणी त्या सर्व आईंना समर्पित आहे, ज्या आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात.

    नवी अर्थक्रांती राचेल आणि अशा सर्व “आयांना” सलाम करते , ज्या आपल्या कुटुंबासाठी आणि करिअरसाठी अखंड झटत असतात!

    आणखी वाचा:

  • उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व रोजगार आणि अर्थव्यवस्था वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. तसेच, नव्या पिढीतील उद्योजिकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

    सध्या भारतात सुमारे १४% व्यवसाय महिलांच्या मालकीचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्पकता, दूरदृष्टी आणि चिकाटीच्या जोरावर अनेक महिला उद्योजिकांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्या इतरांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय देशाच्या आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

    नुकताच जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला अशाच यशस्वी भारतीय महिला उद्योजिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

    सबीना चोप्रा – यात्रा.कॉमच्या सह-संस्थापक

    5

    सबीना चोपड़ा या ‘यात्रा.कॉम’ च्या सह-संस्थापक असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २००६ मध्ये त्यांनी यात्रा.कॉमची स्थापना केली. ट्रॅव्हल आणि बीपीओ क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सबीना यांनी आरसीआय इंडिया मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रा.कॉममध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या वाढीत विशेष भूमिका बजावली.

    व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत आणि मुलींच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी एनजीओच्या माध्यमातून मदत करतात. त्यांचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील मजबूत नेटवर्क आणि व्यावसायिक कौशल्यामुळे यात्रा.कॉमला मोठं यश मिळालं. भारतीय पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या प्रेरणादायी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे.

    विनीता सिंग – ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक 

    6

    विनीता सिंग या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIT मद्रास आणि IIM अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये त्यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली. हा ब्रँड विशेषतः तरुण महिलांमध्ये लोकप्रिय असून, भारताच्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात त्याने नवी क्रांती घडवली आहे.

    विनीता सिंग या भारताच्या आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा ब्रँड ‘शुगर कॉस्मेटिक्स’ दर्जेदार आणि ट्रेंडी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या बिझनेस रियालिटी शोमध्येही शार्क म्हणून सहभागी झाल्या असून, नवउद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीमुळे त्या आजच्या तरुणींना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत.

    फाल्गुनी नायर – ‘नायका’च्या संस्थापिका 

    7

    फाल्गुनी नायर या ‘नायका’ (Nykaa) या ब्युटी अँड लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या मोठ्या ऑनलाइन कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये १८ वर्षे मोठ्या पदावर काम केलं. २०१२ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आणि ‘नायका’ ची स्थापना केली. आज नायका हा भारताचा सर्वात प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे.

    फाल्गुनी नायर या स्वतःच्या मेहनतीवर अब्जाधीश झालेल्या भारतातील मोजक्या महिलांपैकी एक आहेत. त्यांना २६ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. नायका आज केवळ ऑनलाइनच नाही, तर भारतभर अनेक दुकानांतूनही उपलब्ध आहे. त्यांनी महिलांसाठी उच्च दर्जाची सौंदर्य उत्पादने सहज उपलब्ध करून दिली, त्यामुळे नायका हा लोकांचा आवडता ब्रँड बनला आहे.   

    राधिका घई अग्रवाल – शॉपक्लूझच्या सह-संस्थापक

    8

    राधिका घई अग्रवाल या ‘शॉपक्लूझ’ (ShopClues) या लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि काही वर्षांतच शॉपक्लूझ युनिकॉर्न क्लबमध्ये पोहोचले. 

    त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून व्यवस्थापन शिक्षण घेतलं, तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात वेब २.० आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा अभ्यास केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे शॉपक्लूझ भारतातील मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. राधिका भारताच्या पहिल्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत, ज्यांची कंपनी युनिकॉर्न बनली आहे.

    नमिता थापर – एमक्योर फार्मास्युटिकल्स

    9

    नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या प्रसिद्ध औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या व्यवसायविषयक कार्यक्रमात ‘शार्क’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी फुकुआ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं असून, त्या चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. २००७ मध्ये सीएफओ म्हणून एमक्योरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड आणि थापर उद्योजक अकादमीच्या संस्थापक आहेत आणि त्यांनी १०० हून अधिक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ‘40 अंडर 40’, वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस सुपर अचिव्हर अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. 

    श्रद्धा शर्मा – युवरस्टोरीच्या संस्थापक 

    श्रद्धा शर्मा या ‘युअरस्टोरी’ मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २००८ मध्ये सुरू केलेलं हे व्यासपीठ नव्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. या माध्यमातून ७०,००० हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली आहे.

    २०२३ मध्ये भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर, ५२० उपक्रमांच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फॉर्च्यून मासिकाच्या ‘40 अंडर 40’ प्रभावी व्यक्तींच्या यादीत तीन वेळा त्यांचं नाव झळकलं. तसेच, त्यांना  २०१८ मध्ये फोर्ब्स पॉवर ट्रेलब्लेझर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे.

    उपासना टाकू – मोबिक्विकच्या सह-संस्थापक

    उपासना टाकू या ‘मोबिक्विक’ या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २००९ मध्ये त्यांनी मोबिक्विकची स्थापना केली. भारतात डिजिटल पेमेंट क्रांतीत त्यांचं मोठं योगदान आहे. मोबिक्विकने ई-वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सोपे आणि सुलभ केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोबिक्विक भारतातील प्रमुख फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने IPO आणत सार्वजनिक लिस्टिंग केली, ज्यामुळे ती आणखी मजबूत झाली. 

    वंदना लुथरा – VLCC हेल्थकेअरच्या संस्थापिका

    वंदना लुथरा या सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. १९८९ मध्ये त्यांनी ‘VLCC हेल्थकेअर’ची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते आणि त्यांची ही कंपनी  १३ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. VLCC केवळ सौंदर्य उत्पादनांसाठीच नव्हे, तर आरोग्य सेवांसाठीही प्रसिद्ध आहे.

    वंदना लुथरा या  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिलच्या (B&WSSC) अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांची पहिली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षणाला चालना दिली असून, त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आणि अतुलनीय आहे.

    मित्रांनो, वरील सर्व महिला उद्योजिकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संधी शोधून त्यांचा योग्य उपयोग करत त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.

  • १३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

    १३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

    यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष करणं हेच यशाचं खरं गमक असतं.

    “डोसा क्रश” या फूड स्टार्टअपचे संस्थापक अंचल कुमार चौरसिया हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी व्यवसायात एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ वेळा अपयश अनुभवलं. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाच्या सुरुवातीला अपेक्षित यश मिळाल नाही. पण त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. अपयशाने खचण्याऐवजी त्यांनी त्यातून शिकण्याचा आणि अधिक जोमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

    आजच्या लेखात आपण अंचल कुमार चौरसिया यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. 

    प्रारंभिक जीवन 

    अंचल कुमार चौरसिया यांचा जन्म ११ मे १९९३ रोजी मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत साध्या आणि संस्कारक्षम वातावरणात गेलं. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी होत्या. घरातील सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यामुळे अंचल यांनीही शिक्षणात चांगली प्रगती केली.

    त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, त्यांना सुरुवातीपासूनच नोकरी करण्याची इच्छा नव्हती. स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवायचं, हे त्यांचे ध्येय होतं. मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथांनी त्यांना नेहमीच प्रेरित केलं. त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

    अपयशाची कहाणी

    अंचल कुमार यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी २००९ मध्ये आपला पहिला व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात अपयश आलं. त्यानंतर मोबाईल शॉप्स, पोल्ट्री फार्म यांसारखे अनेक व्यवसाय उभारले. मात्र, प्रत्येक वेळी काही काळाने व्यवसाय अडचणीत येत होत्या आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागायचा. सतत अपयश पदरी पडत असतानाही त्यांनी धीर सोडला नाही, पण आर्थिक नुकसान वाढत गेलं. अखेर, १३ व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर ८७ लाख रुपयांचं कर्ज झालं आणि त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली.

    या संघर्षमय काळात त्यांच्या कुटुंबावर आणखी मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या धक्क्याने अंचल कुमार पूर्णतः खचले, पण त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. आईच्या विश्वासामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयशावर मात करण्याचा निर्धार केला. मात्र, दुर्दैवाने वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या आईचंही निधन झालं. एकाच वर्षात दोन्ही पालकांना गमावल्यामुळे त्यांचं मानसिक आणि आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळलं होतं.

    पुन्हा उभारणी आणि मोठे यश

    आधीच कर्जात बुडालेल्या अंचल यांना आता कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हतं. त्यांनी इंदोर येथे एक कॅफे सुरू केला. पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. याआधी १३ व्यवसाय अपयशी ठरले होते, त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यास काहीच उरलं नव्हतं.  त्यांनी पुन्हा एकदा मेहनतीने फंड गोळा करण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि स्वतःच्या अपयशांचा सामना करताना त्यांच्यातील जिद्द मात्र कायम राहिली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायला लागलं. 

    शेवटी, २३ जुलै २०१९ रोजी त्यांनी जबलपूर येथे “डोसा क्रश” या ब्रँडचं पहिलं आउटलेट सुरू केलं. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. त्यांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांनी ग्राहकांना आकर्षित केलं आणि अल्पावधीतच त्यांचा ब्रँड लोकप्रिय होऊ लागला. केवळ तीन महिन्यांत त्यांनी दुसरं आउटलेट सुरू केलं, आणि त्यानंतर परिस्थिती सुधारत गेली. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी ३ लाख रुपये प्रति फ्रँचायझी दराने नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, त्यांनी “डोसा क्रश” या ब्रँडला नव्या जोमाने बाजारात विस्तारायला सुरुवात केली आणि त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली.

    डोसा क्रश: एक लोकप्रिय फास्ट फूड ब्रँड

    “डोसा क्रश” ही एक फास्ट फूड फ्रँचायझी आहे, जी पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थांना आधुनिक ट्विस्ट देऊन ग्राहकांसमोर सादर करते. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार आणि स्वादिष्ट पदार्थ परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणं. त्यामुळे ग्राहकांना उत्तम चव आणि उत्कृष्ट गुणवत्ता एकाच ठिकाणी मिळते. आज “डोसा क्रश” केवळ दक्षिण भारतीय पदार्थांपुरता मर्यादित न राहता, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि फास्ट फूडमध्येही विस्तारली आहे. 

    नवीन उत्पादने आणि आव्हाने

    डोसा क्रश नेहमीच नाविन्यपूर्ण पदार्थ ग्राहकांसमोर आणत आहे. त्यांनी जैन अमेरिकन डोसा, चीज डोसा, पिझ्झा उत्तप्पम आणि स्प्रिंग रोल डोसा यांसारखे नवे आणि आकर्षक पदार्थ सादर केले आहेत, जे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

    Navi Blogs Size 8

    कोविड महामारीच्या काळात “डोसा क्रश” च्या अनेक शाखांना स्थलांतर करावं लागलं. मात्र, आधीच अनेक अपयशांचा सामना केलेल्या अंचल कुमार यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन नव्हती. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि व्यवसाय वाढवला. आज छिंदवाडा, सागर, डिंडोरी यांसारख्या मध्य प्रदेशातील शहरांसह त्यांच्या अनेक  ठिकाणी शाखा सुरू आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आज “डोसा क्रश” चा वार्षिक व्यवसाय १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

    मित्रांनो, अंचल कुमार चौरसिया यांचा प्रवास सोपा नव्हता. सततच्या अपयशांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या, मानसिक ताण वाढला, पण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. प्रत्येक अपयशातून शिकत राहिले, नव्या संकल्पना मांडत राहिले आणि अखेर यश संपादित केले. 

    त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की अपयश म्हणजे अंत नसतो, तर तो नव्या संधीचा आरंभ असतो. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही स्वप्नवत वाटणारा प्रवास यशस्वी होऊ शकतो. 

    आणखी वाचा:

  • Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर गुप्ता हा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने पारंपारिक मार्गापेक्षा वेगळं काही करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास याचा त्याने वापर केला.

    केवळ २२ व्या वर्षी सागरने आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. आपल्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवून, त्याने चार वर्षांच्या कालावधीत आपल्या व्यवसायाला ६०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोचवलं. त्याचा हा प्रवास सिद्ध करतो की, आपल्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली, तर काहीही शक्य आहे.

    आजच्या लेखात आपण सागर गुप्ताच्या याच प्रेरणादायक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    सागर गुप्ताचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाले. लहानपणापासूनच त्याला शिक्षणात आवड होती. त्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, सागर चार्टर्ड अकाउंटंट बनावा. यासाठी त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोचिंग घेतलं, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठरवला होता.

    सागरला सीए होण्यापेक्षा व्यवसायात अधिक रुची होती. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे, शिक्षण घेत असतानाच त्याला उद्योग क्षेत्राची गोडी लागली. 

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    २०१७ मध्ये सागरने आपल्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, पण चीनच्या कंपन्यांचं उत्पादन बाजारात वर्चस्व गाजवत होते. अशा स्पर्धात्मक बाजारात आपलं स्थान निर्माण करणं हे एक मोठे आव्हान होतं. सागरने एक धाडसी निर्णय घेतला आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्याला ठाऊक होतं की, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काहीतरी वेगळं आणि उत्तम करावं लागेल.

    सागरच्या कुटुंबात कोणीही मोठा व्यावसायिक नव्हतं, त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याला कमी अनुभव होता. पण त्याने मेहनत, योग्य नियोजन, आणि बाजारपेठेचं  बारकाईने निरीक्षण केलं आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्सला यशाच्या मार्गावर नेलं. अनेक अडचणी येत होत्या, पण सागरने प्रत्येक अडचणीला संधी मानून त्यावर काम केलं.

    त्याला एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग होती. चीनच्या कंपन्यांची उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध होती, तर भारतीय ग्राहकांना स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करवून घेणं खूप कठीण होतं. पण सागरने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा लाभ घेत, उत्पादनांची गुणवत्ता वाढवली आणि विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.

    एक्का इलेक्ट्रॉनिक्स – विस्तार आणि यश

    आज ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी एलईडी टीव्ही, स्मार्टवॉच, इअरफोन, हेडफोन, वॉशिंग मशीन यासारखी विविध उत्पादने तयार करते. भारतातील १०० हून अधिक व्यावसायिक या कंपनीकडून उत्पादने घेत आहेत. कंपनीने आपली गुणवत्ता, विश्वसनीयता आणि इतर गुणात्मक वैशिष्ट्यांमुळे बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

    कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सोनीपत, हरियाणा येथे स्थित आहे, जिथे १,००० हून अधिक कुशल कामगार आणि अभियंते कार्यरत आहेत. कंपनीत दर महिन्याला लाखाहून अधिक एलईडी टीव्हीचे उत्पादन केले जाते. २०२२-२३ मध्ये कंपनीने ६०० कोटी रुपयांचा महसूल गाठला, जो त्याच्या व्यवसायातील मोठ्या यशाचं प्रतीक आहे.

    Sagar Gupta started Ekkaa Electronics Industries with his father at the age of 22

    सागर आणि त्याच्या वडिलांनी आता नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरुवातीला ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचे सुधारणा केली जाईल. ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली आहे, आणि आज भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची बनली आहेत. त्यामुळे, त्यांची उत्पादने आता परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहेत.

    मित्रांनो, सागर गुप्ता याचा प्रवास हा केवळ एक व्यवसायिक यशोगाथा नाही, तर तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने सिद्ध केलं आहे की योग्य संधीचा लाभ घेतल्यास आणि कठोर परिश्रम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतं.

    आणखी वाचा: