Category: लेख

  • जाणून घ्या मटकी शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या मटकी शेतीविषयी संपूर्ण माहिती

    आवश्यक हवामान 

    आवश्यक जमीन 

    मटकी शेतीसाठी मध्यम ते हलकी, सुपीक, चांगली निचऱ्याची आणि थोडीशी अम्लीय जमीन योग्य आहे. pH 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावे.

    How to Grow Matki

    अशी करा लागवड

    मटकीची लागवड उन्हाळ्यात केली जाते. बीजांची पेरणी सरी-वरंबे पद्धतीने केली जाते. पेरणीचं अंतर 30 x 30 सेंटीमीटर किंवा 45 x 45 सेंटीमीटर ठेवावे.

    कशी करावी जोपासणी

    मटकीची जोपासणी खालीलप्रमाणे केली जाते:

    खरीप: पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने दोन-तीन खुरपणी करावी.

    पाणी व्यवस्थापन: मटकीला मध्यम पाणी लागते. पेरणीनंतर सुरुवातीला दररोज पाणी द्यावे. नंतर 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

    खत व्यवस्थापन: मटकीला खताची गरज कमी असते. पेरणीपूर्वी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे.

    रोग आणि कीड नियंत्रण: मटकीला तांबेरा रोग आणि बोंडकी कीड यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोग आणि कीड नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

    कापणी

    मटकीची कापणी 5 ते 6 महिन्यांनी केली जाते. कापणीनंतर मटकिला कोरडे करून साठवले जाते.

    इतके मिळेल उत्पादन

    योग्य निगा राखल्यास मटकीची प्रति हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.

    मटकीच्या जाती

    मटकीच्या अनेक जाती आहेत. काही प्रमुख जाती खालीलप्रमाणे आहेत:

    राजा मटकी, कांदे मटकी, काळी मटकी, सातपुडा मटकी, विदर्भ मटकी

    या जातींमध्ये रोग आणि कीड प्रतिरोधक क्षमता चांगली असते. तसेच, या जातींमध्ये उत्पादन क्षमता देखील चांगली असते.

  • इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

    इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

    कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

    गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.

    वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

    आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

    जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

    त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतच प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडिअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा

    आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा

    ३० वर्षीय त्रिशनित उद्योजक, एका कंपनीचा मालक आणि लेखक आहे.  त्याची ‘हॅकर टॉक’ आणि ‘हॅकिंग विथ स्मार्टफोन’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2017 मध्ये त्याचे नाव ‘50 Most Influential Young Indians’ या  GQ मासिकाच्या यादीत नोंदवले गेले. ‘Fortune India’ च्या अंडर 40 यादीत सुद्धा त्याचे नाव आहे. एवढंच काय तर पुढे जाऊन फोर्ब्सच्या प्रतिष्ठित ‘30 अंडर 30’ यादीत सुद्धा त्याने स्थान मिळवले. TAC Security या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करते. विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांच्या सायबर सुरक्षेमधील त्रुटी शोधून मार्गदर्शन करणे हे या कंपनीचे मुख्य काम आहे.

    एथिकल हॅकींग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात. तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण देतात. त्रिशनित भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल, पंजाब पोलिस, गुजरात पोलिस, एवन सायकल्स यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. रिपोर्ट्स नुसार दिग्दर्शक सुनील बोहरा त्रिशनितच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यावर काम करत आहेत. हा चित्रपट हंसल मेहतांद्वारा दिग्दर्शित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या लेखाच्या माध्यमातून त्रिशनित चा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

    अशी झाली हॅकिंगची सुरुवात

    त्रिशनितचा जन्म 2 नोव्हेंबर 1993 रोजी पंजाबमधील लुधियाना मध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्याला संगणकाची आवड होती. तेव्हा त्याला स्वत:चा वैयत्तिक संगणक हवा होता, परंतु मध्यमवर्गीय घरात सहसा एकाच संगणक असतो जो सर्वांच्या कामासाठी वापरला जातो. त्रिशनितचे कुटुंब याला अपवाद नव्हते. त्याला संगणक आणि त्याच्या एकूणच कार्यप्रणाली बद्दल खूप उत्सुकता होती. एकेदिवशी त्याने घरातील संगणकाच्या वायर्स काढून त्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली. त्याने निर्माण केलेल्या या गोंधळामुळे घरी मॅकॅनिक बोलवावा लागला. त्याच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेचे त्रिशनितने बारीक निरीक्षण केले आणि त्याचा त्याला पुढे जाऊन फायदा झाला. 

    आठवीत नापास झाल्यावर त्याचे मित्रही त्याची चेष्टा करू लागले तेव्हा त्याने शाळा सोडली व बाहेरून बारावीची परिक्षा दिली. एकीकडे एथिकल हॅकींग सुरू होतेच. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कंपनी स्थापन केली व अवघ्या दोन वर्षात त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक क्लायंट आले. TAC Security कंपनी सुरु केली तेव्हा तो केवळ 19 वर्षांचा होता.  आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी त्रिशनितच्या आई-वडिलांनी सुद्धा त्याला या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा दिला होता. त्याने सुरुवातीला संगणक दुरुस्त करणे आणि हार्डवेअर दुरुस्त करणे अशी कामे केली.  त्याला 19 व्या वर्षी तब्बल 60,000 रुपयांचा चेक मिळाला. पुढे जाऊन हेच पैसे त्याने आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले. जेवढे काही साठवले होते तेवढ्या सर्वच बचतीचा उपयोग कंपनी उभा करण्यासाठी केला गेला असे त्रिशनित सांगतो. 

    TAC सिक्युरिटी सध्या जगभरातील ग्राहकांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीची सायबर सुरक्षा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीची सध्याला भारतात 4 आणि दुबईमध्ये 1 अशी 5 कार्यालये आहेत. देशातील प्रमुख कायदे अंमलबजावणी संस्थांसह, TAC सिक्युरिटीचे ग्राहक म्हणून रिलायन्स आणि अमूल देखील आहेत. शिवाय, विविध सध्याच्या डिजिटल व्यवहारांचा कणा असलेली UPI प्रणाली, या तरुण टेक प्रतिभावंताच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. त्रिशनित आता त्याचा व्यवसायाची उलाढाल ८ हजार कोटींवर नेण्याची आशा बाळगून आहे.

  • BFA – कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

    BFA – कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

    बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हे शब्दाचे पूर्ण रूप आहे. बीएफए प्रोग्राम हा तीन ते चार वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, यामध्येही विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. ललित कलांमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, ॲनिमेशन, व्हिज्युअल, परफॉर्मिंग आर्ट्स असे कोर्सेस आहेत. बऱ्याच वेळा BFA ला व्हिज्युअल आर्ट्स असेही संबोधले जाते. बीएफए अभ्यासक्रमाची ऑफर देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश हा गुणवत्तेवर तसेच प्रवेश परीक्षांवर आधारित असतो.

    Why a BFA Is the Best Choice for Your Arts Career

    BFA कोर्स का निवडावा?

    इतर पारंपारिक अभ्यासक्रमांप्रमाणेच, बीएफए अभ्यासक्रम तुम्हाला कला, सौंदर्यशास्त्र, मातीची भांडी आणि मातीची भांडी बनवणे इत्यादी नवीन युगातील विषयांची ओळख करून देतो. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवीनंतर करिअरच्या  वैविध्यपूर्ण शक्यता आहेत आणि विचारात घेण्यासाठी अनेक जॉब प्रोफाइल आहेत. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स प्रोग्रामचे पदवीधर फ्रीलान्स डिझायनर, लेखक किंवा शिक्षक म्हणून करिअर करू शकतात. स्वातंत्र्य आणि उत्तम कमाईच्या क्षमतेमुळे आजकाल फ्रीलान्स व्यवसाय लोकप्रिय आहे.

    How to Get a BFA and Start Your Career in the Arts

    BFA कोर्स कोणी करावा?

    ज्या उमेदवारांमध्ये एखादा कलाकार लपलेला असतो ते सहसा ललित कला अभ्यासक्रम निवडतात. ललित कला अभ्यासक्रम हा सहसा विद्यार्थी ज्यांच्यात एक कलाकार दडलेला असतो ते घेतात. तथापि, ज्या उमेदवारांची सर्जनशीलता उत्तम आहे आणि व्हिज्युअल किंवा परफॉर्मिंग आर्ट्सची प्रवृत्ती आहे ते बीएफए कोर्ससाठी योग्य आहेत. विद्यार्थ्यांना मनोरंजन क्षेत्र, वृत्तसंस्था, विपणन कंपन्या, प्रकाशने, कला संग्रहालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात.

    BFA चे फायदे

    या अभ्यासक्रमाचे पदवीधर त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:साठी नवीन मार्ग उघडतात. ललित कलांची पदवी त्यांना परफॉर्मिंग, ललित किंवा व्हिज्युअल आर्ट्समधील व्यावसायिक करिअरसाठी तयार करू शकते. सर्जनशील आणि कलात्मक असलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम शिकू शकतात. ते त्यांच्या बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवीचा भाग म्हणून फोटोग्राफी, व्हिज्युअल आर्ट, पेंटिंग, मिश्र माध्यम, सिनेमॅटोग्राफी आणि डिजिटल चित्रण यांचा अभ्यास करू शकतात. ते अनेक क्षेत्रात रोजगार शोधू शकतात आणि त्यांच्या करिअरची व्याप्ती वाढवू शकतात. तसेच, BFA त्यांना अनुभवाच्या शिडीवर चढत असताना त्यांची वेतनश्रेणी वाढवण्यास मदत करते. BFA पदवीधर INR 5 लाख ते  सरासरी INR 25  लाखांपर्यंत पगार मिळवू शकतात.

    Bachelor Of Fine Arts

    BFA साठी पात्रता निकष

    सर्व उमेदवार, ज्यांनी मान्यताप्राप्त मंडळातून कोणत्याही स्ट्रीममधून बारावी उत्तीर्ण केली आहे, ते बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हा कोर्स निवडू शकतात. यासाठी सामान्यतः इतर कोणतेही निश्चित निकष नसतात, परंतु काही विद्यापीठे/महाविद्यालये  किमान टक्केवारीची अट ठेऊ  शकतात  जी सामान्यत: 50 – 60% असते. ज्या उमेदवारांना बीएफए अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी 12 वी मध्ये आवश्यक मार्क्स मिळणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त, प्रवेशाच्या वेळी काहीवेळा अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, ज्यांनी इयत्ता 12 मध्ये कला/ ह्यूमॅनिटीजचा अभ्यास केला आहे आणि ज्यांना ललित कला विषयाचे काही मूलभूत ज्ञान आहे ज्याचा ते पाठपुरावा करू इच्छित आहेत.

    आणखी वाचा

  • युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा अकिओ मोरीता फक्त २४ वर्षांचा होता. १९४६ रोजी त्याने मसारू ईबुकासोबत अणुबॉम्ब स्फोटात बेचिराख झालेल्या एका दुकानाच्या कोपऱ्यात एक कंपनी सुरु केली. हीच भविष्यातील ‘सोनी कॉर्पोरेशन’ची सुरुवात होती. २००० साली या कंपनीची उलाढाल ६३०८ कोटी डॉलर्सची होती तर त्यात १८९७०० माणसे काम करत होती. पण या सर्वांहून गाजला तो म्हणजे अकिओ मोरीताचा वॉकमन. गंमत म्हणजे जेव्हा अकिओ मोरीता आणि ईबुका यांनी तरुण पिढीला आवडेल असा वॉकमन बनवायला घेतला तेव्हा मोरीता साठीला तर ईबुका सत्तरीला टेकला होता. जेव्हा वॉकमन ची कल्पना त्यांनी त्यांच्या कंपनीसमोर मांडली तेव्हा कंपनीतील सर्वांनी विरोध केला होता, चक्क वेड्यात काढले होते.

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday
    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    या दोघांतील ईबुका हा तंत्रज्ञानात बाप माणूस होता तर मोरीता ग्रेट सेल्समन होता. IBM च्या सेल्समनबद्दल असं म्हटलं जायचं की हे लोक एस्कीमो लोकांनाही फ्रिज विकून दाखवतील. अकिओ तितकाच सामर्थ्यवान विक्रेता होता. सुरुवातीला त्यांनी सुरु केलेल्या कंपनीचं नाव होतं ‘टोकियो त्सुशीन कोग्यो काबुशिकी काईशा‘ म्हणजे ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग कंपनी’. पुढे याचीच ‘सोनी कॉर्पोरेशन’ बनली. जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा फक्त एका छोट्याशा खोलीत अनेक लोक काम करत असत. सामान ठेवायलाही जागा नसे. सगळी मंडळी रात्री कंपनीचा मुख्य दरवाजा बंद केल्यावर फायर एक्झिटच्या दरवाजाने ये-जा करत, त्यामुळे त्यांना कित्येक वेळा पोलीस चोर समजून पकडत.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सुरुवातीला त्यांना कामाच्या मोबदल्यात तांदूळ मिळे, कारण त्यावेळी दुसर्‍या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. युद्धानंतर तांदूळ खूपच दुर्मिळ आणि महाग झाला होता. पुढे कंपनी वाढल्यावर तिचं वेगळं नाव ठेवायचं ठरवलं, तेव्हा आख्खी डिक्शनरी चाळून त्यांच्या लक्षात आलं की लॅटिनमध्ये सोनस म्हणजे ध्वनी,आणि अमेरिकेत ‘सॉनी’ हा शब्द तरुण हुशार मुलांसाठी वापरला जाई. मग या दोन्हीचा वापर करून ‘सोनी’ या शब्दाचा उगम झाला आणि ‘सोनी कॉर्पोरेशन’चा जन्म झाला. फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. आता सोनीने टेप, रेडिओ अगदी लहान आकाराचे म्हणजे खिशात मावतील असे रेडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण गंमत म्हणजे त्यांची उपकरणे खिशात बसेनात म्हणून चक्क मोठे खिसे असलेले शर्टही बनवून विकायला सुरु केले होते.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सोनीचे मालाच्या दर्जावर खूपच बारीक लक्ष असे. पण त्याकाळी जपानी मालाच्या दर्जाची चेष्टा सुरु असल्याने मोरीता त्यांच्या मालावर ‘मेड इन जपान’ असं बारीक अक्षरात लिहित. कारण त्यादरम्यान ‘Made in Japan’ चा अर्थ असा होता की ‘स्वस्त व तकलादू उत्पादने’ परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे ‘भव्य ध्येय’ होते की ‘जगातील जपानची प्रतिमा बदलणे.’ सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन ‘जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा’ अशी करायची होती. एकदा अमेरिकेतील बोलावा नावाच्या कंपनीने सोनीकडून १ लाख ट्रांझीस्टर बनवण्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर म्हणजे त्याकाळच्या दहा वर्षांच्या ऑर्डरइतकी मोठी होती. त्यांची एकच अट होती की सोनीने त्यावर सोनीचे नाव न टाकता बोलावाचे टाकावे. अकिओला इतका प्रचंड पैसा दिसत असूनही त्या मिटिंगमधून चक्क निघून गेला. पण नंतर ‘सोनी’ ही कंपनी बोलावाच्या ३० पटीने मोठी कंपनी झाली. आज कॅसेट्स, सीडीज, टीव्ही,टेप, डिस्कमन, वॉकमन, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅमेरा,हँडीकॅम, सोनी एंटरटेनमेन्ट असा वाढलेला पसारा म्हणजे अकिओ मोरीता आणि ईबुकाचे प्रयत्न होय. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत ‘सोनी’ने प्रगती केली आहे.

    साभार :- अच्युत गोडबोले

  • सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात : १९३८ साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षिण कोरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.

    पहिला बदल : १९४० साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    दुसरा बदल : १९५० साली कोरिअन युद्धामुळे व्यवसाय बुडाला. त्यानंतर सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरुवात केली. स्वतःचा साखर कारखाना सुरु केला.                                                                     

    तिसरा बदल : युद्धसमाप्तीनंतर १९५४ साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी लागणारे लोकरीचे कापड बनवणारी कोरियातील सर्वात मोठी कापड गिरणी सुरू केली.

    चौथा बदल : जसजसा कोरिया विकसित होत गेला, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी १९५६ साली सॅमसंगने कापड गिरणी बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटीज विकायच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    पाचवा बदल : १९६० साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ टेलिव्हिजन सेट्स बनवायला सुरुवात केली.

    सहावा बदल : १९८० साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड आणि फॅक्स सिस्टिम्स बनवायला सुरुवात केली.

    सातवा बदल : १९८७ साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यू झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर/टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे चार स्वतंत्र विभाग झाले.

    आठवा बदल : त्याच साली सॅमसंगने जागतिक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

    नववा बदल : १९९० साली सॅमसंगने जागतिक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात प्रवेश केला. मलेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई १०१ आणि दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.

    दहावा बदल : १९९३ साली मोठी मंदी आली. आशियन बाजारात मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बसला. त्यावेळी लीचा मुलगा ली कून ही याने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उपकंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरुवात केली.

    अकरावा बदल : इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल विभागांचे एकत्रीकरण केल्यामुळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.                                                                                                    

    बारावा बदल : मेमरी चिप्सच्या व्यवसायात खूप स्पर्धा निर्माण झाल्यामुळे १९९५ साली सॅमसंगने ‘लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले’च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ १० वर्षातच ‘फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन’ बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.

    तेरावा बदल : २०१० साली लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील १० वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. त्याचवेळी आयफोनसाठी लागणारे अनेक महत्वाचे सुटे भागसुद्धा सॅमसंग पुरवत होती.

    आज 2024 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आयफोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधिक आहे.

    एवढे सगळे बदल होऊनही एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती कोणती? जेव्हा लीने कंपनी सुरु केली होती त्याने कंपनीला नावे दिले होते, ‘सॅमसंग’ कोरियन भाषेत याचा अर्थ होतो ‘तीन तारे’. लीसाठी हे तीन तारे म्हणजे ‘भव्य, असंख्य व शक्तिशाली’ आणि हे तारे अनादी, अनंत असतात. त्याचं ध्येय हेच होतं की कंपनीचा प्रमुख म्हणून तो ज्या कुठल्या क्षेत्रात काम करेल तिथे कंपनीचा स्वतःचा ठसा उमटवायचा.

    याच धोरणामुळे आज सॅमसंगची विक्री २५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे व दक्षिण कोरियाच्या एकूण निर्यातीमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.

    तुमच्या व्यवसायात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तेव्हा असा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आहे? तुमचा व्यवसाय बदलण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे?

    या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात, सॅमसंगचे उदाहरण घ्या. मोठे उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी दीर्घकालीन योजना बनवा आणि छोटे छोटे परिणाम साधण्याचा प्रयत्न करा आणि वेळ पडेल तेव्हा व्यवसाय बदलण्याचं धाडस अंगात असू द्या. योग्य वेळी बदल करत रहा, कधी ना कधीतरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल.

  • एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली.

    पण फ्रेडने हा विचार सोडून दिला नाही. त्याला आपल्या या कल्पनेवर विश्वास होता. फ्रेडला जेव्हा जहाजावर व्हिएतनामला पाठवण्यात आलं, त्याने तिथे अमेरिकन हवाई दलाच्या पुरवठा सेवेचा (logistics) अभ्यास केला. १९७० मध्ये जेव्हा तो परत आला त्याने Ark Aviation Sales नावाची विमान दुरुस्त करणारी एक कंपनी विकत घेतली आणि जुन्या विमानांचा वापर करायला सुरुवात केली.

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    १९७३ पर्यंत म्हणजे पुढच्या तीन वर्षात त्याने हवाई दलाच्या पुरवठा सेवेची पद्धत ‘फाल्कन-२०’ या प्रकारच्या १४ विमानांचा ताफा तयार करून जशीच्या तशी अंमलात आणली आणि त्याची कल्पना पहिल्यांदा नाकारली गेल्याच्या अकरा वर्षानंतर फ्रेडने पहिलं पार्सल पाठवलं.

    त्यानंतर एके दिवशी त्याचा सहकारी रॉजर फ्रॉकने त्याला पैसे कुठून आणले असे विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, “जनरल डायनामिक्स कंपनीबरोबरची आपली मिटिंग फिस्कटली. आपलं मोठं नुकसान झालं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत पैसे उभे करावे लागणार होते, म्हणून मी विमानाने लास वेगासला गेलो आणि तिथे २७ हजार डॉलर्स जिंकलो.” 

    रॉजर म्हणाला, “म्हणजे तू आपल्याकडे उरलेले शेवटचे ५ हजार डॉलर्स घेऊन गेलास. तू असं कसं करु शकतो?”

    आपले खांदे उडवत तो म्हणाला, “काय फरक पडला असता? पैशांशिवाय आपण विमानात इंधन सुद्धा भरू शकत नाही. या पैशांनी काही दिवस तरी आपलं काम सुरु राहील.”

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    फेडेक्सला त्यानंतरसुद्धा अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण फ्रेडने मोठ्या धीराने आणि हिंमतीने सर्व संकटातून मार्ग काढत वाटचाल सुरूच ठेवली. आज चाळीस वर्षानंतर, फेडेक्स जगातील सर्वात मोठ्या कुरियर कंपन्यांपैकी एक आहे. २०१८ मध्ये फेडेक्सचे वार्षिक उत्पन्न ६५.४५ अब्ज डॉलर्स होते. फ्रेडची ही कंपनी वर्षाला अब्जावधी पार्सल पाठवते आणि फ्रेडची स्वतःची जवळपास ५.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

  • वॉरेन बफेट यांची कथा

    वॉरेन बफेट यांची कथा

    How Warren Buffett Became the World's Richest Man

    वयाच्या २० व्या वर्षी वॉरेन यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. जिथे श्री. बेंजामिन ग्रॅहम शिकवत होते. मूल्य गुंतवणूक सिद्धांतासाठी त्यांना ओळखले जाते. जगातील सर्वात महान गुरुकडून आपल्याला शिकायला मिळावे ही वॉरेनची इच्छा होती.

    वॉरेन बेंजामिन यांची सर्व कामे कोणत्याही मोबदल्याशिवाय करू लागले. त्यांचा प्रामाणिकपणा बघून श्री. बेंजामिन प्रभावित झाले. सुट्टीच्या दिवशी ते वॉरेनला त्यांची गुंतवणुकीची कामे करायला सांगत. १९५१ साली बेंजामिन यांनी GEICO या वाहन विमा कंपनीत अभ्यास करण्यासाठी पाठवले. स्वतः बेंजामिन त्या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळावर होते. तो शनिवारचा दिवस होता. कार्यालयाच्या दरवाज्यावर ते बराच वेळ थापा मारत राहिले. शेवटी द्वारपालाने दरवाजा उघडला आणि त्यांना थेट कंपनीचे प्रमुख लोरीमोर डेव्हिडसन यांच्याकडे पाठवले. त्या दिवशी ते एकटेच कार्यालयात आलेले होते.

    त्या दिवशी या दोघांच्यात पाच तास चर्चा झाली. बफेट यांच्यावर त्यांचा फार प्रभाव पडला. वॉरेननी जवळच्या कमाईतून कंपनीचे नऊ हजार डॉलर्सचे शेअर विकत घेण्याची तयारी दर्शवली. या गोष्टीने प्रभावित झालेल्या बेंजामिन यांनी GEICO कंपनीचे ५० टक्के शेअर ७.२० लाख डॉलर्स देऊन विकत घेतले.

    Warren Buffett's Advice for Success: How to Achieve Your Financial Goals

    बफेट पुढची सहा वर्षं १९५७ पर्यंत बेंजामिन यांच्याकडेच शिकत होते. स्वतःची वेगळी गुंतवणूक कंपनी काढण्याइतपत ज्ञान त्यांना मिळाले होते. बेंजामिन यांच्या एका डॉक्टर गुंतवणूकदाराला त्यांच्या नव्या कंपनीसाठी भागीदारीत १० हजार डॉलर्स  गुंतवू शकणारे १० डॉक्टर्स शोधण्यास सांगितले. या प्रस्तावास अकरा डॉक्टर्सनी होकार दिला.

    पुढची पाच वर्षं बफेट आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या मित्रमंडळींना कंपनीची शिफारस करायला सांगत होते. १९६२ मध्ये १.०५ लाख डॉलर्सच्या भागीदारीतून सुरु झालेला हा व्यवसाय ७० लाख डॉलर्सवर पोहोचला. बफेट यांनी स्वतःजवळचे १० लाख डॉलर्स डेम्पस्टर मिल या कंपनीत गुंतवले. ज्यामुळे कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली आणि फक्त दोन वर्षात  कंपनीने २३ लाख डॉलर्सची कमाई केली.

    १९६२ मध्येच बफेट यांना अशीच अजून एक लॉटरी लागली. एका घोटाळ्यामुळे अमेरिकन एक्स्प्रेसचे शेअर्स ६५ डॉलर वरून ३५ डॉलर पर्यंत घसरले होते.  बाकीचे सर्व लोक मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत शेअर विकत होते. त्यावेळी बफेट यांनी स्वतःच्या संपत्तीचा ४० टक्के हिस्सा १३ लाख डॉलर्स अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये गुंतवले. पुढच्या दोन वर्षात त्या शेअर्सची किंमत तिपटीने वाढली आणि भागीदारांनी २० लाख डॉलर्स कमावले.

    त्यानंतर चार वर्षांनी मरणासन्न अवस्थेतील एक कापड कंपनी, ‘बर्कशायर हाथवे’ त्यांनी विकत घेतली. त्यावेळची आठवण सांगताना बफेट म्हणतात, “आम्ही एका भयानक बिझनेस मध्ये हात घातला होता. मी त्याला ‘वापरलेल्या सिगारेटचा थोटका’ म्हणतो. तुम्हाला तो खाली पडलेला दिसतो. तो खराब झालेला दिसतो, पण त्यात अजून थोडासा भाग शिल्लक राहिलेला असतो आणि तो तुम्हाला फुकटात मिळतो म्हणून तुम्ही तो उचलता. बर्कशायर विकत घेताना हाच विचार माझ्या मनात होता. ती तिच्या एकूण भांडवलापेक्षा खूप कमी किमतीत विकली जात होती म्हणून मी घेतली. पण ती खूपच वाईट चूक होती”

    ही कंपनी विकत घेतल्यावर बफेट यांनी तिच्या कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळे प्रयत्न फोल गेले. मग त्यांनी त्यांच्या या ‘चुकीचा’ वापर त्यांचे सर्व गुंतवणूक व्यवहार सांभाळण्यासाठी सुरु केला. कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत असल्याने ते आता शेअर बाजारातून पैसे उभे करू शकत होते. GEICO बरोबरचा अनुभव गाठीशी असल्याने विमा कंपन्यांचे महत्त्व ते जाणून होते.

    Warren Buffett's Journey to Success

    १९७९ पर्यंत बफेट यांची एकूण संपत्ती १४ कोटी डॉलर्सवर पोहोचली होती, पण त्यांनी आपल्या पगारात वाढ केली नाही. पूर्वीचाच ५० हजार डॉलर एवढाच पगार घेत राहिले. अजूनही ते आपल्या जुन्या घरातच राहतात, जे त्यांनी १९५८ मध्ये ३१ हजार ५०० डॉलर्सला विकत घेतले होते. पुढे ४० वर्षं बर्कशायर हाथवेचे शेअर चक्रवाढ पद्धतीने जवळपास २२.२ टक्के या दराने वाढतच राहिले आणि आज बफेट यांची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे.

    काही वर्षांपूर्वीच त्यांनी लोवातील (अमेरिकेतील एक राज्य) जगातील सर्वात मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पात ३.५ अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी आपल्या आपल्या संपत्तीचा ९९ टक्के हिस्सा दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे. याआधीच २००६ पासून आजपर्यंत त्यांनी जवळपास २१.५ अब्ज डॉलर्सचा निधी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान स्वरुपात दिला आहे. 

    Warren Buffett's Journey to Success

    वॉरेन यांनी गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य दिले. ते नेहमी म्हणतात, “तुम्हाला प्रतिष्ठा कमवायला २० वर्षे लागतात आणि गमवायला फक्त ५ मिनिटे पुरेशी आहेत. तुम्ही जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे कराल” 

    जगातील सर्वात श्रीमंत लोकांकडून तुम्ही कोणते धडे शिकू शकता?

    पैसा कमावण्याआधी तो कसा कमवायचा हे शिकण्यात तुमचा वेळ गुंतवायला तुम्हाला आवडते का?                                     ‘निर्गमन धोरण (Exit Strategy) ऐवजी यशस्वी धोरण (Success Strategy) वर तुम्ही कसे लक्ष केंद्रित करू शकता? ज्यामुळे तुम्हाला कधीही व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार नाही.

  • स्वतःच स्वतःचे नायक बना

    स्वतःच स्वतःचे नायक बना

    मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करायचो.

    पण हा संवाद माझ्या एकट्यापुरता मर्यादित होता.

    पुढे अनेक यशस्वी लोकांना भेटल्यावर माझ्या लक्षात आले की, यापैकी कुणीही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत नाही आहे. या सगळ्यांना एक गोष्टी पक्की ठाऊक आहे की, इतरांसाठी काम केल्यानेच यश प्राप्त होते. त्यामुळे त्यांनी आपापल्या परीने स्वतःचे बॉस निवडले होते.

    त्यामुळे जर तुम्ही अजूनही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते लगेच सोडून द्या, त्याऐवजी योग्य बॉस शोधण्याचा प्रयत्न करा. चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. ‘जे करावे लागते’ ते न करता, ‘जे करायला आवडते’ ते करण्याचा प्रयत्न करा. जो कोणता व्यवसाय कराल त्याची क्षितिजे विस्तारताना आपल्यामधील शक्यतांचा, क्षमतांचा वापर करा. स्वतःच स्वतःचे नायक बना…

  • तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा अगदी मुकेश अंबानी, आर्थिक नियोजनाची गरज प्रत्येकाला आहे

    तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा अगदी मुकेश अंबानी, आर्थिक नियोजनाची गरज प्रत्येकाला आहे

    • मुलांच्या शिक्षणासाठी
    • नवीन / मोठे घर घेण्यासाठी
    • मुलीच्या लग्नासाठी
    • स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी

    अशा प्रकारे आर्थिक ध्येय आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खुणावत असतात. एका बाजूला वाढणारी महागाई, सुधारत चाललेला राहणीमानाचा दर्जा आणि प्रत्येक वस्तू ब्रँडेड हवी अशी मानसिकता; हे सर्व मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. आज शेअर बाजार गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय समोर दिसत असले, तरी या पर्यायाकडे वळण्याआधी स्वतःचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत किती पैसा आणि कोणत्या आर्थिक ध्येयासाठी, कधी लागणार हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला किती पैसा गुंतवावा, किती जोखीम घ्यावी हेही कळणार नाही. चला तर मग आज आपण आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.

    why-financial-planning-is-important

    आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?

    आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा मुकेश अंबानी प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येयं आहेत. आज एखादा व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये कमवत असेल आणि ४०-५० हजार जर त्याला दर महिन्याला घरखर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे, हो ना? आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा मागोवा घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषधपाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी ‘आर्थिक नियोजन’ करून घेणे हाच पर्याय उभा राहतो.

    why-financial-planning-is-important

    आर्थिक नियोजन करताना पुढील मुख्य घटक पहिले जातात

    • सध्याची आर्थिक परिस्थिती
    • भविष्यातील आर्थिक ध्येय
    • गुंतवणुकीत जोखीम घेण्याची क्षमता

    वरील ३ मुख्य घटकांवर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत. आर्थिक नियोजनाचे खालील मुख्य भाग आहेत.

    • पैशाचे व्यवस्थापन
    • विमा नियोजन
    • गुंतवणूक नियोजन
    • निवृत्ती नियोजन
    • मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन
    why-financial-planning-is-important

    आपण सविस्तरपणे प्रत्येक बाजू समजावून घेऊ, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.

    • पैशाचे व्यवस्थापन – आर्थिक नियोजन करण्याआधी आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कसे करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. महिन्याला आपण किती कमावतो, किती खर्च करतो, महिन्याच्या खर्चाचे बजेट, वर्षाच्या खर्चाचे बजेट हे सर्व पैशाच्या व्यस्थापनामध्ये केले जाते. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाला महत्व देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उंचावू शकत नाही.
    • विमा नियोजन – आज जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे, त्यामुळे कधी कोणते संकट समोर उभे राहील सांगता येत नाही. विमा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा कंपन्यांवर सोपवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराचा विमा अशा अनेक पद्धतीने आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच उभा करू शकतो. भारतीय मानसिकतेत अजूनही विम्यावर होणार खर्च म्हणजे वाया गेलेला खर्च समजला जातो.
    • गुंतवणूक नियोजन – आर्थिक नियोजनातील महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक नियोजन. वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी वेगवेगळे आर्थिक नियोजन करणे म्हणजे गुंतवणूक नियोजन होय. मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन/मोठे घर घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी अशा एक ना अनेक ध्येयासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.
    • निवृत्ती नियोजन – आपण २५ वर्ष शिकत असतो आणि २५-३० वर्ष नोकरी किंवा धंदा करतो आणि या काळात जी काही शिल्लक बाजूला ठेवली असते त्यातून आपल्याला आपल्या निवृत्ती नंतरच्या काळासाठी नियोजन करायचं असते. निवृत्ती नियोजन ही काळाची गरज आहे; कारण वाढलेली महागाई, कमी होणारे व्याजदर यामुळे आपल्या भविष्यासाठीच्या नियोजनाची सुरुवात आजपासूनच करा.
    • मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन – बॉलीवूड सिनेमा असो किंवा आपला मराठी सिनेमा, मालमत्तेसाठी होणारे कौटुंबिक वाद आपण त्यामध्ये पहिले आहेत. आज तसे वाद कदाचित आपल्या घरात होणार नाहीत कारण ते बहुधा काल्पनिक असतात, पण आपण हयात नसताना आपल्या मालमत्ता आपल्या कुटुंबियांच्या नावावर हस्तांतरित होताना त्यांना त्रास होऊ द्यायचा नसेल तर काही तरतुदी आजच कराव्या लागतील; जसे की इच्छापत्र किंवा मृत्यपत्र बनविणे. लक्षात घ्या आज या गोष्टी खूप सहजरित्या करू शकतो, पण पैसा कमावण्यातच आपण इतके अडकलो आहोत की ह्या सर्व गोष्टींकडे पाहायला आपल्याला वेळच नाही.
    why-financial-planning-is-important

    पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे महत्व ज्याला पटले आणि त्यानुसार स्वतःच्या आर्थिक जीवनाला ज्यांनी योग्य आकार दिला त्यांची आर्थिक ध्येयं दृष्टीक्षेपात येतात कारण एक राजमार्ग त्यांच्यासाठी तयार झालेला असतो. आर्थिक नियोजन नसलेले लोक एक तर बचत करत मन मारून जगत असतात किंवा आलेले पैसे खर्च करून आजचा आनंद घेतात आणि भविष्य भगवान भरोसे सोडतात. या दोघांचा सुवर्णमध्य म्हणजे आपल्या कमाईनुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणे आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमाईचे पर्याय वाढविणे होय.

    आणखी वाचा