Category: प्रेरणादायी

  • संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    मंदिरात पुजारी म्हणून तरी काम मिळेल या आशेने तो तेथे आला होता. त्यादिवशी बरेच इतर पुजारीसुद्धा तिथे जमा झाले होते. सर्वांनाच धर्माचे उत्तम ज्ञान होते. संचालक मंडळाला त्यातून एकाची निवड करणे अवघड वाटत होते. अनेकजण पुजारी म्हणून उत्तम होते. शेवटी संचालक मंडळातील एकाने असे सुचवले की ज्याला सर्वात चांगली घंटा वाजवता येईल त्यालाच मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानुसार सर्व पुजाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पद्मनाभला नीट घंटा वाजवता न आल्याने त्याची निवड झाली नाही. तो मनात थोडा निराश झाला, त्याचा तिथे अपेक्षाभंग झाला होता. आता काय करावे? तो मंदिराबाहेर बसून विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. मंदिरासमोर खूप मोकळी जागा होती.

    त्याने संचालक मंडळाची परवानगी घेऊन समोर एक चहाची टपरी सुरू केली. मंदिरात भेट द्यायला येणारे भक्तगण ग्रामस्थ तिथे जाऊन चहा प्यायचे. हळूहळू ते मंदिर प्रसिध्द होऊ लागले तशी मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. खूप दूरगावातून लोक यायला लागले. तसा पद्मनाभचा चहाचा व्यवसायही वाढला. तेव्हा लोकांनी त्याला सुचवले की, तुझा चहा तर उत्तम आहे. पण तुझ्या टपरीवर जर तू अल्पोपहाराचे पदार्थ ठेवलेस तर बरे होईल. पद्मनाभला ते पटले. कारण आसपास त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय कुठेच नव्हती. पद्मनाभने लवकरच अल्पोपहाराचे उपवासाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याच्या टपरीजवळ एक शेड बांधून टेबल खुर्च्या लावून सर्वांसाठी बसण्याचीही सोय केली. पुढे भक्तांची, पर्यटकांची संख्या अजून वाढत गेली. पुढे भक्तांच्या आग्रहावरून त्याने जेवणाची थाळी विकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधारू लागली. त्याला गावातही मान मिळू लागला. आता त्याचे रेस्टॉरंट झाले.

    पद्मनाभ एक व्यावसायिक बनला होता. एका भक्ताने त्याला सांगितले की इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय नाही. पद्मनाभने त्याच्या रेस्टॉरंटचे एका लॉजमध्ये रूपांतर करून भक्त व पर्यटकांच्या राहण्याची सोय केली. त्याचा धंदा जोरात चालू आहे, तो सर्वांना उत्तम सेवा पुरवतो. मंदिराच्या वार्षिक जत्रेस दरवर्षी देणगी देतो. जसजशी मंदिरात येणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्या वाढते तसतसा त्याचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय.  एकेकाळचा बेरोजगार पद्मनाभ आज तिथला सर्वात यशस्वी श्रीमंत हॉटेल व्यावसायिक झालाय. पद्मनाभने गावातील इतर बेरोजगार तरुणांना त्याच्याच हॉटेलमध्ये काम दिले आहे. त्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा देखील वाढली. गावातील, तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींची त्याच्या घरी ऊठबस चालू असते. त्याला खूप मान मिळतोय.

    एका व्यक्तीने त्याला त्यांच्या यशाचे गुपित विचारले. पद्मनाभ म्हणाला, “माझ्या यशाचे गुपित मंदिराच्या घंटेत आहे. मला घंटा वाजवता येत नाही म्हणून मी आज श्रीमंत झालोय. जर मला ती घंटा वाजवता आली असती तर मी मंदिरात पुजारी म्हणूनच राहिलो असतो.”

    मित्रांनो, कधीकधी संधी थोडक्यात हुकतात, म्हणून डोक्याला हात लावून बसू नये. डोळे उघडा, आजूबाजूला पहा. बरेच पर्याय, संधी उपलब्ध असतात. पण नोकरीच्या नादात त्या दिसत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तेव्हा आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो. पद्मनाभने संधी निर्माण केली व व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्याजवळ काही नव्हते, तरी त्याने छोटासा का होईना, व्यवसाय सुरू केला. पुढे त्याला अनुभव येत गेला, संधी आपोआप दिसू लागल्या. प्रत्येक वेळी त्याने संधीचा फायदा उठवला आणि आज तो त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी श्रीमंत आणि सुखी आहे. म्हणून संधी हुकल्यावर निराश होऊ नका, नैराश्यावर पाय ठेवून पुढे चालत रहा. संधी मिळत जाईल तिचा फायदा घेत जा.

    तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • आरोग्य हीच खरी संपत्ती, हे लक्षात ठेवा!

    आरोग्य हीच खरी संपत्ती, हे लक्षात ठेवा!

    उत्तम आरोग्य हे माणसाला मिळलेले वरदान आहे. “आरोग्यम धनसंपदा” हे मूल्य अगदी लहानपणीच आपल्याला शिकवले जात असते. कोणीतरी एक मार्मिक सत्य सांगितले आहे की, माणूस पहिल्यांदा संपत्ती मिळविण्यासाठी आरोग्य खर्ची घालतो. नंतर आरोग्य मिळविण्यासाठी पैसा खर्ची घालतो.

    लहानपणी आपण एका भिकाऱ्याची गोष्ट ऐकली होती. आपल्याकडे काहीच नाही म्हणणाऱ्या भिकाऱ्याला राजाने दहा हजार सुवर्णमुद्रा देवून त्याच्याकडे त्याच्या एका डोळ्याची मागणी केली. त्यावर त्याने नकार दिला. पुन्हा राजाने आणखी दहा हजार सुवर्णमुद्रा देवू करून त्याच्या हाताची मागणी केली. त्यावर देखील भिकाऱ्याने राजाला विरोध केला, कारण त्याला त्याच्या आरोग्याचे महत्त्व पटले होते.

    आपलं शरीर आणि मन ही जगातील एक विलक्षण निर्मिती आहे. त्याचसोबत आपण दररोज इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकतो हे देखील एक न उलघडणारं कोडंच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट ही की माणूस पळत्याच्या मागे धावतो, जे मिळालं आहे त्यात समाधानी न राहता तो भटकतोय नको असलेल्या गोष्टींच्या मागे. सोने, धनदौलत, अफाट प्रॉपर्टी म्हणजे श्रीमंती नव्हे. तर आरोग्य हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते हे त्याला कळतच नाही. पैसे मिळवताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली तर त्या पैशांचा उपभोग घेता येणार आहे का? कमावलेले पैसे डॉक्टरकडे जातील, हानी होईल ती वेगळीच.

    Health is real wealth

    या आधुनिकीकरणामुळे आपले आयुष्य सुकर आणि वेगवान झाले आहे, पण त्याचे प्रतिकूल परिणाम देखील मानवी आरोग्यावर होतात. हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम पटकन हव्या असतात. या आधुनिकीकरणामुळे दोन पाहुण्यांना आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात आमंत्रण दिले आहे. ते म्हणजे व्यसन आणि तणाव. कामाचा ताण आणि रोजची धावपळ यामुळे लागलेल्या व्यसनामुळे माणसांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय.

    व्यसन म्हणजे फक्त दारू आणि तंबाखूचे सेवन करणे नाही, तर आजकाल मोबाईल, टॅब्लेटसारखी जी आधुनिक गॅजेटस आपण वापरतो ते सुद्धा एक व्यसनच आहे. आपण या गॅजेटसचे गुलाम बनलो आहोत. या स्पर्धेच्या युगात माणूस खूप काही मिळवण्याच्या नादात वर्तमानाचा कमी आणि भविष्याचा जास्तच विचार करतोय. त्यामुळे भविष्याचा विचार करताना वर्तमानातले सुखही गमावून बसतो, यामुळे आरोग्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होते. या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात आणि मनात हळूहळू विषासारख्या पसरत आहेत आणि आपलं आयुष्य कमी करत आहेत. आपल्याकडे सुदृढ मन आणि निरोगी शरीर नसेल, तर या उच्च तंत्रज्ञानाचा काय उपयोग? या अशा जीवनशैलीमुळे ‘जेवण समोर असूनही नीट जेवता येत नाही आणि डोळ्यावर झोप असूनही झोपता येत नाही’ अशी अवस्था झाली आहे. ध्येयाकडे धावताना आपण आपलं स्वतःचं नुकसान तर करून घेत नाही ना? हे बघणं गरजेचं आहे.

    नेहमी लक्षात ठेवा, चांगलं शरीर आणि आनंदी मन नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. पण अजूनही उशीर झालेला नाही. अजूनही तुम्ही माघारी फिरू शकता. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायची आता वेळ आलेली आहे. आरोग्य जोपासा, शरीराची आणि मनाची शक्य तितकी काळजी घ्या. यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्या, रोज व्यायाम करा, मेडिटेशन करा, स्नेहसंबंध जोपासा, हसत-खेळत राहा, प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या, सकारात्मक विचार करा. हे सगळं एका दिवसात होणार नाही, त्यासाठी वेळ लागेल. उद्योजक हा हजारोंचा पोशिंदा असतो. त्यामुळे त्याचे आरोग्य उत्तम गरजेचे आहे. यासाठी सर्व उद्योजकांनी तब्येतीची पुरेशी काळजी घेऊन नेहमी सुदृढ राहावे. त्यामुळे सर्वांनी स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. आयुष्य एकदाच मिळतं, ते मनसोक्त जगा आणि दुसऱ्यांनाही जगायला शिकवा. तेही उशीर व्हायच्या आधी.

    आणखी वाचा

  • स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्नं ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत असे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे. स्वप्नं म्हणजे काय? जर तुम्ही शब्दकोशात याचा अर्थ शोधलात, तर तुम्हाला उत्तर मिळेल, ‘एखादी इच्छित गोष्ट मिळविण्याचा ध्यास, ध्येय, महत्वाकांक्षा’. थोडक्यात एखादी अशक्य वाटणारी, तरीही मिळवता येईल अशी मोठी इच्छा.

    स्वप्नं सारेच बघतात. मोठी स्वप्नं न बघणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, पण सगळ्यांचीच स्वप्नं प्रत्यक्षात येत नाहीत. याचे कारण म्हणजे काहीजण स्वप्न बघतात आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात, तर बाकीचे लोक लगेच आपली स्वप्नं लगेच विसरून जातात. पहिल्या प्रकारच्या लोकांमध्ये मोठी स्वप्नं बघायची, ते साध्य करण्याची हिंमत असते. असे लोक इतरांनाही प्रेरित करत असतात.

    सचिन तेंडुलकर, तुमच्या माझ्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. पण त्याची स्वप्नं आभाळापेक्षाही मोठी होती. जी साकार करणं अशक्यप्राय गोष्ट होती… पण तो निघाला इतिहास घडवण्यासाठी… लहानपणापासूनच क्रिकेटमध्‍ये असलेल्‍या प्रचंड वेडापायी क्रिकेटलाच आपले करिअर करण्‍याचे ठरविले… एकमेव गोष्ट ज्यामुळे तो नेहमी पुढे जात राहिला, ती म्हणजे; त्याची मोठी स्वप्नं, त्याचा दृष्टीकोन, त्याची चिकाटी आणि खेळाविषयी असलेली प्रचंड तळमळ. यामुळे तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट बनला. आपल्या असामान्य बॅटिंगनं त्यानं अवघ्या क्रिकेटजगताला वेड लावलं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे लाखो करोडो लोकांना त्यानं स्वप्न बघायला शिकवलं. या पिढीला त्यानं स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, ज्यांची अशी स्वप्नं बघायची आधी हिंमत सुद्धा होत नव्हती.

    सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते.

    इथे मला ‘टर्बो’ या सिनेमातील एक सुंदर विचार आठवतोय “कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    असं म्हणतात की, ‘यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो’ आणि व्यवसायाच्या बाबतीत तर हे ‘सोळा आणे सत्य’ आहे. तर मग असा कुठला एक सद्गुण आहे की ज्यामुळे एखादा उद्योजक यशस्वी होऊ शकतो?

    स्टीव्ह जॉब्सचे एक वाक्य आहे, “यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजकांची तुलना करायची झाल्यास, अयशस्वी उद्योजकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे प्रयत्नांचा अभाव!”

    आपल्याला उद्योजक व्हायचंय हा निर्णय घेणं एक कठीण काम आहे, पण पटकन यश मिळत नसताना आणि वारंवार अपयशाची चव चाखावी लागत असतानासुद्धा त्याच निर्णयाला चिकटून राहणं हे महाकठीण काम आहे.

    आपल्या आयुष्यात असं अनेकदा होतं कि; आपण काम करत राहतो, पण आपल्याला त्या कामाचं फळ मिळत नाही अगदी असंच उद्योजक म्हणून काम करताना तुम्हाला मेहनत करावी लागू शकते, पण केलेल्या मेहनतीचा मोबदला मिळेल का नाही याची काही खात्री नसते. त्याचबबरोबर अनेक आव्हानं, समाजाचा दबाव हे सुद्धा आहेच. ही ती आव्हाने असतात जी तुम्हाला नाउमेद करतात आणि प्रयत्न सोडायला भाग पाडतात. या अशा अडचणीच्या परिस्थितीतून तर एकच गोष्ट तुम्हाला टिकवून ठेवू शकते आणि ती म्हणजे प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न!

    या सर्व संकटांच्या छातीवर पाय ठेऊन तुम्ही तुमचे उद्योजकतेचे स्वप्न जपले पाहिजे, थोड्याश्या अपयशाने खचून न जाता प्रयत्न निरंतर चालू ठेवले पाहिजे. याबाबतीत सर्वात सोपं उदाहरण म्हणजे नदीचं! नदी सर्व खडकांतून मार्ग काढत पुढे जात राहते, ती शक्तीमुळे नाही, तर सतत पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे! खडकांच्या भीतीने नदीने आपला प्रवाह थांबवला तर त्याच नदीचं डबकं व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं वाहत रहा आणि प्रयत्न करत रहा, कारण एक दिवस यश तुमच्या हातात असेल. 

    हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    आणखी वाचा

  • Comfort Zone मधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल.

    Comfort Zone मधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल.

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे Comfort Zone मधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…’ करायची सुरवात?

    काही व्यक्तींमध्ये रिस्क घ्यायची हिंमत नसते. अशी लोकं नेहमी आरामदायक, सुरक्षित व जोखीमरहित पर्यायांचा अवलंब करीत असतात. वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात ‘कम्फर्ट झोन’ ही अशा जागा आहे की त्यात अडकलेला माणूस कधीच आव्हांनाना सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्यामुळे तो कायमच संभाव्य अडचणीबद्दल गाफील राहत असतो. Comfort Zone मध्ये अडकलेल्या व्यक्तींचा विकास हा खुंटलेला असतो. Comfort Zone त्यांना प्रगतीच्या संधीचा फायदा घेण्यापासून रोखत असतो. सतत कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने माणूस नवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरतो किंवा संभाव्य अडचणींबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण होत नाही.

    एक प्रयोग केला गेला होता. एका काचेच्या बरणीत धान्य भरून ठेवले होते. एक उंदीर त्यात सोडला. जेव्हा बरणी पूर्ण भरलेली होती तेव्हा उंदराला वाटले की, आता शांतपणे धान्य खाईन, काही अडचण नाही. त्यामुळे तो तिथेच राहिला व बरणीतील धान्याचा उपभोग घेऊ लागला. असे करता करता एक दिवस सर्व धान्य संपले. आता उंदीर बरणीत एकदम तळाला होता आणि दुर्भाग्य म्हणजे तो आता त्यातून बाहेरही पडू शकत नव्हता. फक्त बाहेर पाहून रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

    म्हणूनच तरुण वयात नवनवीन आव्हाने स्वीकारा, त्यातून बरेच काही शिकता येईल, परंतु केवळ आरामदायी सुरक्षित वाटणाऱ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकू नका, कारण ते एक जाळे असते. त्यात दीर्घकाळ अडकाल, तर तुमच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद होतील व वेळही निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही मनातील भीती व चिंता बाजूला सारून नवीन आव्हानांचा सामना करता, तेव्हा तुमच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झालेली असते. दुर्दैवाने बरेच लोक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मानसिकरित्या तयार नसतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते; परंतु नवीन जोखिमा आणि आव्हानांना पेलण्यास ते घाबरत असतात. त्यांना जे सुरक्षित वाटते, त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. कम्फर्ट झोन ही स्वतःला घातलेली मर्यादा असते; जिथे माणूस जीवनात पुढे जाण्याबाबत साशंक असतो, बऱ्याचदा नवीन आव्हानांबाबत चिंताग्रस्त व नर्व्हस असतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या लोकांचे घ्या. उद्योगात जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना उद्योग क्षेत्र असुरक्षित वाटते, परंतु नोकरी हा उत्पन्नाचा शाश्वत व सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीसाठीच शिकतात. हा झाला कम्फर्ट झोन… मग सांगा आपल्यामध्ये उद्योजक कसे घडणार?

    तुम्ही केलात का कधी असा प्रयत्न तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा? केला असाल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    आणखी वाचा

  • संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!

    संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’

    तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.

    इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.

    लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.

    बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.

    मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.

    मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    जॉईस चॅपमन या लेखिकेचं एक खूप प्रेरणादायी वाक्य आहे “जर तुमचं स्वप्नं खूप मोठं असेल आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तुम्ही तयार असाल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी करणे हा एकचं मार्ग आहे.” त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका, नेहमी पुढे जात राहा.

    आणखी वाचा

  • पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे.

    मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

    ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

    मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ ‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

    माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

    वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. ‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

    ‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

    ‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

    पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला1

    ‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

    ‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

    ‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

    वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा