Category: उद्योजकता

  • Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

    Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

    Avocado Farming: युवा शेतकरी हर्षित गोधा हे मुळचे मध्य प्रदेशमधील भोपाळचे. मूळचे भोपाळचे असलेले हर्षित यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलीची असली, तरी त्यांना मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. 

    ब्रिटनमध्ये डिग्रीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:च्या मातीत प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून एव्होकॅडोची शेती करण्यास सुरुवात केली. 

    ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना हर्षित यांना एव्होकॅडो या फळाबद्दल माहिती मिळाली आणि त्या फळाचे आरोग्यविषयक फायदे त्यांच्या लक्षात आले. अधिक माहिती घेतल्यावर हे फळ इस्त्राईलमध्ये पिकवले जाते हे त्यांच्या लक्षात आले. इंग्लंडसारखा देश हे फळ इस्त्राईलमधून आयात करत आहे म्हणजे नक्कीच या  इस्रायली एव्होकॅडोमध्ये काहीतरी खास आहे.

    सामान्यतः एव्होकॅडो या फळाच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु इस्राईलसारख्या कोरड्या आणि उष्ण देशामध्ये एव्होकॅडो कसे वाढू शकतात यावर आश्चर्यचकित होऊन हर्षित यांनी अधिक संशोधन सुरू केले.

    अभ्यासाअंती हर्षित यांच्या लक्षात आले की इस्त्राईलने परिस्थितीवर मात करत आणि समस्यांवर उपाय शोधत यशस्वी शेती केली आहे आणि त्याचे अनेक संकरित वाण देखील तयार केले आहेत 

    इस्त्राईलसारख्या उष्ण वातावरणात जर ही शेती होऊ शकते तर आपण देखील का करू नये? हा विचार त्यांच्या डोक्यात चमकला.

    त्यांनी इस्त्राईलमध्ये जाऊन या शेतीविषयी अभ्यास केला, तेथील शेतकऱ्यांकडून आवश्यक प्रशिक्षण देखील घेतले. 

    प्रशिक्षण घेतल्यानंतर हर्षित यांनी ॲव्होकॅडोच्या रोपांची इस्त्राईलमधून भारतात आयात केली. आयात प्रक्रियेत देखील हर्षित यांना बऱ्याच अडचणी आल्या.

    Avocado Farming: 2019 मध्ये Order केलेली रोपं त्यांना 2021 मध्ये प्राप्त झाली. यानंतर मात्र हर्षित यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या 28 वर्षीय हर्षित यांनी 100 एकर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड केली असून त्यातून त्यांना 10 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. आज हर्षित संपूर्ण भारतात ॲव्होकॅडोची रोपे विकतात आणि करोडोंची उलाढाल करतात. 

    शेती करणं हे केवळ कमी शिक्षण असलेल्या गावाकडील लोकांचं काम आहे अशी समजूत असणाऱ्यांच्या डोळ्यात हर्षित यांनी त्यांच्या कर्तृत्वाने झणझणीत अंजन घातलं आहे.

    आणखी वाचा:

  • Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: वयाच्या ४५ व्या वर्षी लोक आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात. पण एका महिलेने वयाच्या ४५ व्या वर्षी, एका छोट्याशा गॅरेजमध्ये फक्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करून असा ब्रँड उभा केला… ज्याचं व्हॅल्युएशन आज १,२९० कोटी रुपये आहे!

    ही कथा कुठल्या कॉर्पोरेट घराण्यातील नाही, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी आयुर्वेदिक ब्रँड ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ (Forest Essentials) च्या संस्थापिका मीरा कुलकर्णी यांची आहे.

    १. संघर्षाची काळी बाजू (The Dark Reality)

    ही कहाणी सुरू होते एका अत्यंत कठीण वळणावरून. वयाच्या २० व्या वर्षी मीरा यांचं लग्न झालं आणि शिक्षण अर्धवट सुटलं. लग्नानंतर पतीला दारूचं व्यसन लागल्याने घरची परिस्थिती बिघडत गेली. शेवटी मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा कठोर निर्णय घेतला.

    पण नियतीची परीक्षा इथेच संपली नव्हती. वयाच्या २८ व्या वर्षी आई-वडिलांचं एकापाठोपाठ एक निधन झालं. दोन लहान मुलं आणि आधार द्यायला पाठीशी कुणीही नाही. ही ती वेळ होती, जिथे कोणीही खचून गेलं असतं.

    २. एक ‘आयडिया’ आणि गॅरेजमधून सुरुवात

    ४५ व्या वर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेल्या असताना, तिथे त्यांनी हाताने नैसर्गिक साबण आणि मेणबत्त्या बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. भारतात परतल्यावर त्यांनी ठरवलं, आपणही काहीतरी करूया.

    २००० साली, फक्त २ कर्मचारी आणि २ लाख रुपये घेऊन त्यांनी एका गॅरेजमधून ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ची सुरुवात केली. पण आता खरा प्रश्न हा आहे की… साबण तर अनेक जण बनवतात, मग मीरा कुलकर्णी १,२९० कोटींपर्यंत कशा पोहोचल्या?

    ३. ‘लक्झरी मार्केटिंगचा’ मास्टरस्ट्रोक! (The Real Business Strategy)

    इथेच मीरा यांनी खरी बिझनेस बुद्धी वापरली. भारतात तोपर्यंत ‘आयुर्वेद’ म्हणजे फक्त स्वस्त आणि आजारांवरची औषधं मानली जायची. मीरा यांनी आयुर्वेदाला ‘लक्झरी’ बनवलं. त्यांनी स्वस्त साबण विकण्यापेक्षा, अस्सल नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ‘प्रीमियम प्रॉडक्ट्स’ तयार केली.

    B2B मास्टरस्ट्रोक:

    आपली प्रॉडक्ट्स सामान्य दुकानात विकण्याऐवजी, त्यांनी ताज (Taj) आणि हयात (Hyatt) सारख्या फाईव्ह-स्टार हॉटेल्सना ती सप्लाय करायला सुरुवात केली. जेव्हा श्रीमंत आणि परदेशी पाहुण्यांनी त्यांच्या हॉटेल्समध्ये ही उत्पादने वापरली, तेव्हा ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ रातोरात एक जागतिक दर्जाचा ‘प्रीमियम ब्रँड’ बनला!

    Mira Kulkarni: या दमदार स्ट्रॅटेजीमुळे २००८ मध्ये जागतिक कॉस्मेटिक जायंट ‘एस्टी लॉडर’ (Estée Lauder) ने त्यांच्या कंपनीसोबत करार केला. आज देशभरातील २८ शहरांमध्ये त्यांची ११० हून अधिक यशस्वी स्टोअर्स आहेत. फॉर्च्युन मॅगझिनने त्यांना ‘भारतातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक महिलांच्या’ यादीत स्थान दिले आहे.

    ४. ग्लोबल उड्डाण (The Big League)

    थोडक्यात सांगायचं तर…

    Mira Kulkarni: वयाच्या २८ व्या वर्षी पोरक्या झालेल्या आणि ४५ व्या वर्षापर्यंत स्वतःची कोणतीही व्यावसायिक ओळख नसलेल्या मीरा कुलकर्णी, जर आज १,२९० कोटींचं साम्राज्य उभं करू शकतात… तर “वेळ निघून गेलीये” किंवा “माझ्याकडे पुरेसं भांडवल नाही”, ही फक्त आपली कारणं आहेत.

    मित्रांनो, तुम्हाला ही ‘खऱ्या संघर्षाची आणि बिझनेसची’ स्टोरी कशी वाटली? “सक्सेससाठी वयाची कोणतीही अट नसते”, यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!

  • Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

    Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

    Bike Blazers: अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखरावर: केशव राय यांचा प्रेरणादायी प्रवास

    जीवनातील यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो. तो मेहनत, ध्येय, आणि अपयशाला येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अडचणी येतात, पण त्या परिस्थितीचा सामना करून मार्ग काढणारा व्यक्तीच खरा यशस्वी ठरतो. याच मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. माणसामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याचा ध्यास, तसेच त्यासाठी करावी लागणारी मेहनत करण्याची तयारी असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होते.

    तसेच, यशप्राप्तीसाठी अनेक अपयशांचे डोंगर पार करावे लागतात. परिस्थितीशी दोन हात करत, परिस्थितीतून मार्ग काढत वाटचाल करावी लागते, तेव्हाच कुठे माणूस यशस्वी होतो. अशाच परिस्थितीतून मार्ग काढत यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे “बाईक ब्लेझर्स” चे सर्वेसर्वा केशव राय.

    कोण आहेत केशव राय?

    भारतामध्ये बहुतेक घरांमध्ये तुम्हाला बाईक मिळेल. आजच्या काळात हे परिवहनाचे सर्वात स्वस्त साधन आहे, असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. जर तुमच्याकडे बाईक आहे, तर तिची योग्य काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. बाईकचा विचार केला तर त्यासोबत बाईक कव्हरची देखील चर्चा होते. उन्हापासून आणि पावसापासून बचाव करण्यासाठी बाईक झाकून ठेवण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईक कव्हर स्टार्टअप ‘बाईक ब्लेझर’ विषयी सांगणार आहोत, ज्यांनी एक अनोखं बाईक कव्हर डिझाइन केलं आहे. केशव राय हे याच ‘बाईक ब्लेझर’ कंपनीचे संस्थापक आहेत.

    प्रारंभिक जीवन 

    मुळचे दिल्ली गाझियाबादचे असलेले केशव शाळेत अगदी सरासरी विद्यार्थी होते. त्यांचं अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं म्हणून कुठलातरी व्यवसाय करावा, हे सतत त्यांच्या डोक्यात असायचं. कॉलेजमध्ये असताना केशव त्यांच्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे. विविध आणि नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यात घर करून असायच्या. तसेच वेगवेगळ्या वस्तू आणि उपकरणे दुरुस्त करण्याच्या त्यांच्या उत्सुकता आणि आवडीमुळे ते अभियांत्रिकी क्षेत्रात आले, आणि अशातच २०१५ साली त्यांनी एका ॲप्लिकेशनची निर्मिती करून त्यावर आधारित व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

    Bike Blazers: व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांकडे निधी म्हणजेच फंडची मागणी केली. वडिलांनी निधी दिला सुद्धा, मात्र म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. जे काही घडायचं असतं ते त्या वेळेवर बरोबर घडतं. केशवचा पहिला प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पण नवनवीन गोष्टी शिकण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांना नंतर व्यवसायात प्रचंड यश मिळवून दिलं.

    घर सोडले 

    पहिल्या ॲप आधारित व्यवसायामध्ये अपयश आल्यानंतर आता घरी न बसता काहीतरी करावं, या उद्देशाने त्यांनी बॅग भरली व घरी चार दिवसांनी परत येतो, असं सांगून घर सोडायचं ठरवलं व घर सोडलं देखील. त्यानंतर ते सतत तीन दिवस दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिले, मात्र डोक्यात कुठलीही कल्पना नसताना देखील तीन दिवस रस्त्यांवर फिरून चौथ्या दिवशी परत घरी जावं, हा विचार सुरू असताना दिल्ली शहरातील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये केशव राय बसलेले होते.

    Bike Blazers: त्या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये एक माणूस त्याची बाईक साफ करण्यासाठी धुळीचे फॅब्रिक शोधत होता. परंतु त्याला ते मिळाले नाही व त्या माणसाने शेजारील बाईकचं डस्टर घेतलं व स्वतःची बाईक स्वच्छ करून तो निघून गेला. ही सगळी परिस्थिती केशव यांनी पाहिली, व तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आली, आणि तीच आयडिया घरी येऊन त्यांनी वडिलांना सांगितली. केशव राय यांची ती व्यावसायिक कल्पना होती बाईकचे कव्हर बनवणं, असं कवर जे सेमीऑटोमॅटिक असेल आणि ते गाडीची धूळ आणि पावसाळ्यातील पाणी काढण्यास मदत करेल. वडिलांना देखील ही कल्पना आवडली व केशव यांना पाठिंबा दर्शवला आणि अशा पद्धतीने झाली बाईक ब्लेझरची सुरुवात.

    व्यवसायाच्या दुसऱ्या पर्वाची  सुरवात 

    २०१६ च्या सुरुवातीला, केशव यांनी त्यांच्या व्यवसायात दुसरा प्रयत्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ‘बाईक ब्लेझर’ या ब्रँडची स्थापना केली. त्यांनी हा प्रवास अगदी साधेपणाने सुरुवातीला घराच्या गच्चीवरून सुरू केला. केशव यांनी बाईक कव्हरचं उत्पादन घरच्या गच्चीवर सुरू केलं, परंतु त्यांच्या कष्टाने आणि ध्येयाने ते थांबले नाहीत.

    सुरुवातीचं छोटं उत्पादन युनिट आज एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झालं आहे. आज, बाईक ब्लेझर कंपनीकडे नवी दिल्ली आणि गाझियाबाद येथे दोन भव्य उत्पादन युनिट्स आहेत. केशव यांचा हा प्रवास त्यांच्या जिद्दीचा आणि प्रयत्नांचा साक्षीदार आहे, ज्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीला उंचीवर नेलं.

    बाईक ब्लेझरचं कव्हर औद्योगिक दर्जाच्या नायलॉन फॅब्रिकचं बनवलेलं असतं, जे हवामानास प्रतिरोधक असतं. हे कव्हर पावसाळ्यानंतर साठलेलं पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करतं आणि वाहनांना धुळीपासून वाचवतं. बाईक किंवा कारवर ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात कव्हर घालता येतं.

    त्यांच्या या प्रवासातून हे स्पष्ट होतं की, छोटी सुरुवात असली तरी ती मोठ्या यशाची वाट दाखवू शकते. केशव यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्या या उद्योजकतेच्या प्रवासाने आज त्यांना यशाची उंची गाठायला लावली आहे.

    Bike Blazers: २०२१ पर्यंत बाईक ब्लेझरने १.३ कोटी रुपये उलाढाल केली होती आणि आज हा व्यवसाय कैक पटींनी वाढला आहे. केशव रायने अपयशातून शिकून नव्या कल्पनांच्या मदतीने यशाचा मार्ग तयार केला आहे. त्यांची ही कहाणी हे सिद्ध करते की, मनात ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट आणि इच्छाशक्ती आवश्यक आहेत. आज बाईक ब्लेझर एक यशस्वी व्यवसाय म्हणून उभा आहे, ज्याची सुरुवात एका साध्या विचाराने झाली होती.

    मित्रांनो, केशव राय यांचा हा प्रवास निश्चितच लाखो तरुणांना उर्जा देणारा आहे. जेव्हा मनात काहीतरी करण्याची धमक असते आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी कष्ट करण्याची तयारी ठेवतो, तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला रोखू शकत नाही. अशा व्यक्तींच्या वाटेत कितीही अडथळे आले, तरी ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात आणि अखेर यशस्वी होतात. त्यामुळे, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम हे यशाच्या मार्गावरचं सर्वात मोठं शस्त्र आहेत, हे आपल्याला वेळोवेळी अनुभवायला मिळतं.

  • Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

    Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

    Pet Industry Business: काही उद्योजक त्यांच्या उद्योगात, व्यवसायात यशस्वी होतात व काही व्यवसाय अयशस्वी होऊन बंद पडतात. काही जणांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणे आहेत, त्यापैकी योग्य व अचूक व्यवसाय क्षेत्र निवडणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजेच पेट (Pet) इंडस्ट्री हे एक असे क्षेत्र आहे,  ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास कायम उत्सुक असतात. बदलत्या काळानुसार कुत्र्या- मांजरासह इत्यादी पाळीव प्राण्यांच्या संगोपणसाठी सुविधा पुरवण्याच्या या व्यवसायाला मोठी गती प्राप्त झाली आहे. मोठ- मोठ्या शहरांमध्ये प्राण्यांसाठी खास ग्रूमिंग सेंटर्स उभी राहिली आहेत.

     सध्या भारतात या क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांची जीवनशैली खूप वेगाने बदलत आहे. आजकाल उच्चभ्रू वस्त्यांमध्ये व शहरी भागात पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण तुलनेने वाढत आहे. बऱ्याच जणांना एकटेपणा आल्याने ते घरात पाळीव प्राणी पाळतात, तर काही मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आपल्या ग्राहकांना पाळीव प्राणी पाळण्याचा सल्ला देतात. बऱ्याच लोकांना मूलबाळ नसल्यास तेही पाळीव प्राणी पाळतात, तर काहीजण केवळ एक आकर्षण/फॅड म्हणून प्राणी पाळतात. बऱ्याच जणांना पशुपालनाची आवड असते. असे पशुप्रेमी एकापेक्षा अधिक प्राणी (कुत्रे, मांजर, पक्षी) आपल्या घरात पाळतात. 

    आजकाल बऱ्याच घरांमध्ये देशीविदेशी प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. या सर्व कारणास्तव या व्यवसायास मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच शहरी भागात हा व्यवसाय नेहमीच फायद्याचा आहे.

    Pet Industry Business: शहरात व उच्चभ्रू वसाहतीत पाळीव प्राणी पाळण्याची हौस आणि छंद जवळपास सर्वच लोकांना असतो. या व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध देशी विदेशी जातीच्या प्राण्यांचे ब्रीडिंग, उत्पादन त्याची विक्री, पशुखाद्य निर्मिती व विक्री, पेट (Pet) केअर, पेट (Pet) शेल्टर, पेट (Pet) मेडिसिन, पेट (Pet) पार्लर्स, पेट (Pet) शो, पेट (Pet) गेम्स, पेट (Pet) सलून अशा अनेक प्रकारचे व्यवसाय व ब्रँड्स आज बाजारात नावारूपास आले आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी हे एक आकर्षक व्यवसाय क्षेत्र आहे, ज्यामध्ये पुष्कळ संधी उपलब्ध आहेत व यशाची खात्री आहे. 

    पेट (Pet) इंडस्ट्री व्यवसायातील यशाच्या खात्रीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत : 

    1.  सर्वात महत्त्वाचे कारण या व्यवसायात प्राणी व त्यांच्यासंबंधित सर्व उत्पादनांना बाजारात कायम वाढती मागणी असते. 
    2. अगदी मंदीच्या काळातही या व्यवसाय क्षेत्रावर फारसा फरक पडत नाही व आर्थिक संकटांचा त्रास होत नाही. उलट मंदीच्या काळातही कुत्रे व मांजरांच्या विविध जातीची मागणी स्थिर होती.
    3.  हा व्यवसाय वर्षभर चालतो, त्यामुळे कॅशफ्लोमध्ये सातत्य टिकून राहते. या व्यवसायातील ग्राहक हे त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी खर्च करण्यास संकोच करत नाहीत.
       
    4. तसेच ग्राहकांना जास्त माहिती पुरवावी लागत नाही, त्यांना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही, कारण पाळीव प्राणी पाळणाऱ्यांना त्यांच्या प्राण्यांचे आरोग्य, सवयी, प्रशिक्षण व त्यांचे मनोरंजन कसे करावे याबद्दल अगोदरपासून माहिती असते. ते लोक सर्व बाबतीत आधीपासूनच जागरूक असतात. 
    5. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांबद्दल लोकांना खूप आकर्षण असते. त्यामुळे बाजारात त्यांमध्येही खूप विविधता दिसते व त्यास ग्राहकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळतो.
    6. या व्यवसाय वृद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्जिन. या क्षेत्रात एकूण गुंतवणुकीच्या ५० ते ६० टक्के नफा मिळतो. कुत्रे व मांजरांच्या पिल्ल्यांच्या खाद्य उत्पादनांमध्ये ४० ते ५० टक्के मार्जिन मिळते, तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या खेळण्यांमधून ७० टक्के मार्जिन मिळते. पशुखाद्य उत्पादनातून सर्वात जास्त मार्जिन मिळते आणि त्याची मागणी बाजारात वर्षभर असते.
       
    7. आजकाल पेट (Pet) फॅशनमधूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळते.
    8. सर्वसाधारणपणे पाहता या व्यवसायात पाळीव प्राणी व त्यांच्या संबधित सर्व उत्पादनांची मागणी वाढते आहे व ती निरंतर वाढतच राहील यात शंका नाही, हे मार्केट रिटेलर्सनाच नव्हे, तर व्यावसायिकांनासुध्दा आकर्षित करत आहे आणि दरवर्षी १० ते २० टक्यांनी वाढत आहे, कारण पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या प्राण्यांच्या पालन- पोषणासोबतच त्यांचे मनोरंजन, आरोग्य यासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतात.
       
    9. पाळीव कुत्रे पाळणारे मालक अंदाजे १० ते १५ हजाररुपये दरवर्षी खर्च करतात, तर मांजरांसाठी दरवर्षी किमान १२ ते १५ हजार रुपये खर्च करतात.

    Pet Industry Business: व्यवसायाच्या या संधीचा फायदा आपण  घेतलाच पाहिजे. या प्रत्येक व्यवसायामध्ये आपली पशुपालनाची आवड ही जोपासली जाते व पैसेही कमावता येतात.

    वाचक मित्रहो, बिझनेसची ही नवीन कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  

  • Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

    Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

    Tea Stall Business: मित्रांनो, सोशल मीडियावर आपण अनेकदा ऐकतो की, “एका चहावाल्याची कमाई आयटी इंजिनिअरपेक्षा जास्त असते!”

    १०-१२ रुपये देऊन चहा पिताना तुम्हालाही कधीतरी हा विचार नक्कीच आला असेल. वरवर पाहता हे खूप सोपं आणि आकर्षक वाटतं. पण यामागे खरंच एवढा नफा आहे का? चला, आज चहाच्या टपरीचं ‘रिअलिस्टिक बिझनेस मॅथेमॅटिक्स’ समजून घेऊया.

    सुरुवातीला बघूया कागदावरचं गणित:
    समजा, एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशन किंवा आयटी पार्कबाहेर एक चहाची टपरी आहे.

    • रोजची विक्री: सरासरी ५०० कप चहा.
    • एका कपची किंमत: १० रुपये.
    • दिवसाची उलाढाल: ५,००० रुपये.
    • महिन्याची उलाढाल: १,५०,००० रुपये!

    Tea Stall Business: आता खर्चाचा विचार करूया. एक कप चहा बनवण्यासाठी दूध, साखर, चहापत्ती, गॅस आणि कागदी कप मिळून साधारण ५ ते ६ रुपये खर्च येतो. म्हणजेच एका कपमागे ४-५ रुपये ढोबळ नफा (Gross Profit). या हिशोबाने दिवसाचा नफा २,५०० रुपये आणि महिन्याचा नफा ७५,००० रुपये होतो. कोणत्याही कॉर्पोरेट टार्गेट्सशिवाय आणि टॅक्स न भरता हातात येणारी ही रक्कम ऐकून कुणीही थक्क होईल.

    पण थांबा! आता बघूया ‘खरे वास्तव’ (The Ground Reality):
    कोणताही व्यवसाय फक्त कागदावरच्या हिशोबाने चालत नाही. या ७५,००० रुपयांच्या नफ्यामधून काही मोठे ‘छुपे खर्च’ आणि संघर्ष वजा करावे लागतात:

    प्राइम लोकेशनची किंमत: गर्दीची जागा फुकट मिळत नाही. तिथे टपरी लावण्यासाठी अधिकृत भाडे किंवा स्थानिक पातळीवर द्यावा लागणारा ‘हफ्ता’ (Adjustment) हा या व्यवसायातील एक मोठा खर्च असतो.

    Tea Stall Business: मदतनीसांचा पगार: दिवसाला ५०० कप चहा बनवणे, ग्राहकांना देणे आणि कप उचलणे हे एका माणसाचे काम नाही. यासाठी किमान १-२ कामगार लागतात, ज्यांचा मासिक पगार द्यावा लागतो.

    शारीरिक मेहनत (Physical Toll): उन्हाळा असो, थंडी असो वा पाऊस… चहावाल्याला रोज १२-१४ तास गरम गॅसशेजारी उभं राहावं लागतं. इथे शनिवार-रविवारची सुट्टी नसते किंवा ‘पेड लीव्ह’ (Paid Leave) नसते. दुकान बंद, म्हणजे त्या दिवसाची कमाई शून्य!

    स्पर्धा: तुमचा चहा प्रसिद्ध झाला, की दुसऱ्याच महिन्यात आजूबाजूला तशाच ४ नवीन टपऱ्या उघडलेल्या असतात.

    थोडक्यात सांगायचं तर…

    ChatGPT Image Jun 11 2026 11 04 02 AM

    Tea Stall Business: चहाचा व्यवसाय हा नक्कीच ‘कॅश रिच’ (Cash Rich) बिझनेस आहे. जर तुमचं ‘लोकेशन’, ‘चव’ आणि ग्राहकांशी असणारं ‘कौशल्य’ परफेक्ट असेल, तर हा व्यवसाय तुम्हाला उत्तम परतावा देतो. पण आयटी इंजिनिअरची फक्त सॅलरी पाहून चालत नाही, चहावाल्याची ती अफाट शारीरिक मेहनत आणि अनिश्चितताही पाहावी लागते.

    तुम्हाला काय वाटतं? नोकरीमधील सुरक्षितता आणि एसी ऑफिस बरं, की स्वतःच्या व्यवसायातील हा संघर्ष आणि स्वातंत्र्य? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा!

    आणखी वाचा :

  • McDonald’s Success Story in India | वडापावच्या देशात परदेशी कंपनी कशी जिंकली?

    McDonald’s Success Story in India | वडापावच्या देशात परदेशी कंपनी कशी जिंकली?

    McDonald’s Success Story: एक असा देश जिथे नाक्या-नाक्यावर वडापाव, समोसा आणि भजीचा खमंग वास येतो. अशा खवय्यांच्या देशात एका परदेशी कंपनीने आपलं दुकान थाटलं. वर्ष होतं १९९६. कंपनीचं नाव – मॅकडोनाल्ड्स (McDonald’s).

    पण सुरुवातीलाच या कंपनीला एक गोष्ट समजली – इथे आपला जागतिक ‘बीफ’ आणि ‘पोर्क’चा मेनू पूर्णपणे फ्लॉप होणार! कारण भारतात बीफ आणि पोर्क खाणं हे धार्मिक व सांस्कृतिक भावनांच्या विरोधात आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे.

    मग या विदेशी ब्रँडने अशी काय जादू केली, की आज त्यांचेसगळे सगळे आउटलेट्स हाऊसफुल असतात? चला तर मग, या ‘ग्लोबल ब्रँडच्या लोकल तडक्याची’ रंजक कहाणी ऐकूया…

    १. नियम लादले नाहीत, स्वतःला बदललं!


    मॅकडोनाल्डने भारतीयांवर आपले नियम लादले नाहीत. त्यांनी चक्क स्वतःला बदलून घेतलं. जगात पहिल्यांदाच त्यांनी एकाच हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी ग्राहकांसाठी पूर्णपणे ‘स्वतंत्र किचन’ बनवले. हा निर्णय भारतीयांचा विश्वास जिंकण्यासाठी पहिला मास्टरस्ट्रोक ठरला.

    २. ‘मॅकआलू टिक्की’चा जन्म


    भारतीयांना काय आवडतं? बटाटा आणि मसाले! हे ओळखून त्यांनी अस्सल भारतीय चवीचा ‘मॅकआलू टिक्की’ बर्गर लाँच केला. परदेशी पावामध्ये दडलेला हा देशी बटाट्याचा तडका भारतीयांना एवढा आवडला की त्याने विक्रीचे रेकॉर्ड मोडले. आणि त्यांच्या जगप्रसिद्ध ‘बिग मॅक’ची जागा रॉयल ‘महाराजा मॅक’ने घेतली!

    ३. खिशाला परवडणारा रॉयल अनुभव


    पण खरा गेम चेंजर ठरला तो त्यांचा सायकोलॉजिकल प्रायसिंग (Psychological Pricing) फॉर्म्युला. विचार करा, एसी हॉटेल, इंटरनॅशनल ब्रँड, आणि तिथे मिळतंय अवघ्या ७ रुपयांत सॉफ्ट सर्व्ह आईस्क्रीम आणि २५ रुपयांचा बर्गर! याने मध्यमवर्गीय भारतीयांना एका विदेशी ब्रँडचा फील अगदी स्वस्तात दिला.

    ४. ‘हॅपी मील’ची जादू


    McDonald’s Success Story त्यांनी मार्केटिंगसाठी मुलांना टार्गेट केलं. ‘हॅपी मील’सोबत मिळणाऱ्या मोफत खेळण्यांमुळे, लहान मुलं हट्ट करून आपल्या आई-वडिलांना मॅकडोनाल्डमध्ये खेचून आणू लागली. एक मूल आलं की सोबत अख्खं कुटुंब येणार, हे फॅमिली मार्केटिंगचं गणित पक्कं होतं.

    थोडक्यात सांगायचं तर…
    मॅकडोनाल्डने भारतात फक्त फास्ट फूड विकलं नाही, तर भारतीयांच्या खिशाला परवडणारा ‘इंटरनॅशनल अनुभव’ विकला. एका विदेशी ब्रँडने स्थानिक संस्कृती आणि चवीचा आदर करून कसा व्यवसाय मोठा करावा, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

    तुमचा आवडता बर्गर कोणता? अस्सल ‘मॅकआलू टिक्की’ की रॉयल ‘महाराजा मॅक’? कमेंटमध्ये नक्की सांगा!

  • Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय.

    या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुमच्या नवीन व्यवसायाला योग्य मार्गदर्शन देण्यासोबतच आर्थिक पाठबळ देखील देतील.

    १) प्रधानमंत्री मुद्रा योजना

    प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSMEs) आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विशेषत: लहान आणि नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले भांडवल उपलब्ध करून दिले जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये:

    या योजनेत एकूण तीन प्रकारे कर्ज दिले जाते. 

    • शिशु (Shishu):  यात रु. 50,000 पर्यंतचे कर्ज नवीन उद्योजकांसाठी दिले जाते
    • किशोर (Kishore):यात  रु. 50,001 ते रु. 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 
    • तरुण (Tarun): यात  रु. 5 लाख ते रु. 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते

    प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?

    मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

    बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी आवश्यक माहिती विचारतील. या माहितीनुसार, तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाऊ शकते. उद्योगाच्या स्वरूपानुसार, शाखा व्यवस्थापक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासही सांगू शकतात. पीएमएमवाय योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही योजनेची अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता.

    या योजनेत  कर्ज प्राप्त करण्यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, कर्जावरील व्याजदर बँकांच्या धोरणांवर अवलंबून असतो. व्यावसायिक आवश्यकतांसाठी, जसे की मशीन खरेदी, कामगारांचे पगार, सामग्री खरेदी इत्यादीसाठी आपण हे कर्ज घेऊ शकतो. ही योजना लहान उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे, कारण यात कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळवता येते. विविध बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांकडून (NBFCs) आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

    २) पीएम स्वनिधी योजना 

    प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजना १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना (स्ट्रीट व्हेंडर्स) आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, या योजनेसाठी स्ट्रीट वेंडर जवळ महापालिकेने जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र जर स्ट्रीट वेंडर्स नोंदणीकृत नसतील, तर ते सुद्धा स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन तथा ऑफलाईन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज लाभार्थ्यांना एक वर्षाच्या आत सुलभ हप्त्यात किंवा कमी व्याजदरात परतफेड करावे लागते.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    कर्जाची उपलब्धता: या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना सुरुवातीला ₹१०,००० पर्यंतचे विना गॅरंटी कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास पुढील टप्प्याचे जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते.

    सुविधाजनक परतफेड: हे कर्ज १ वर्षाच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये परत करता येते. जर विक्रेत्यांनी हप्ते वेळेत भरले, तर त्यांना व्याजावर ७% सबसिडी मिळते.

    डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन: डिजिटल माध्यमातून व्यवहार केल्यास अतिरिक्त लाभ दिले जातात. UPI, डेबिट कार्ड, QR कोड इत्यादींच्या माध्यमातून व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

    क्रेडिट स्कोर सुधारणा: नियमित हप्ते भरण्यामुळे विक्रेत्यांचा क्रेडिट स्कोर सुधारतो, ज्यामुळे भविष्यात आणखी कर्ज घेणे सुलभ होते.

    रस्त्यावरील विक्रेते, ज्यांनी २४ मार्च २०२० किंवा त्याआधी व्यवसाय सुरू केला असेल, या योजनेसाठी पात्र आहेत. लायसन्सधारक विक्रेत्यांव्यतिरिक्त ओळखपत्र असलेल्या विक्रेत्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो.

    अर्ज कसा कराल ?

    Startup Yojana: पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना नजीकच्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.

    रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःच्या व्यवसायाची पुनर्बांधणी आणि विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. यामुळे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होत आहे. पीएम स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतात आणि आपला व्यवसाय  सुरू करू शकतात.

    ३) स्कील इंडिया डिजिटल हब (SIDH )

    स्कील इंडिया डिजिटल हब योजना ही भारत सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी युवकांना विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश भारतातील युवकांना नव्या डिजिटल युगाच्या मागणीनुसार सक्षम करणे आहे.

    योजनेची उद्दिष्टे

    डिजिटल कौशल्य विकास: युवकांना डिजिटल कौशल्ये शिकवून त्यांना रोजगारक्षम बनवणे.

    स्वयंरोजगाराची संधी: युवकांना विविध डिजिटल व्यावसायिक संधी निर्माण करण्यास प्रेरित करणे.

    कौशल्य प्रशिक्षण: ऑनलाइन माध्यमातून आणि क्लासरूम ट्रेनिंगद्वारे विविध कौशल्यं शिकवणे.

    उद्योगाशी संलग्नता: उद्योगांच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

    अर्ज करण्याची प्रक्रिया:

    यासाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी आवश्यक दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराला योग्यतेनुसार प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. ही योजना युवकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यातील डिजिटल जगात उत्तम संधी मिळतील.

    या योजनेअंर्तगत विविध कौशल्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध असते, तसेच वेगवेगळ्या डिजिटल कौशल्यांवरील ऑनलाईन कोर्सेसची सुविधा उपलब्ध असते.  प्रशिक्षणानंतर उद्योगांमध्ये इंटरशिप किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची संधी मिळते तसेच प्रशिक्षणानंतर सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळते.

    ४) स्टार्टअप इंडिया

    स्टार्टअप इंडिया योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी भारतातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. देशातील उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2016 रोजी या योजनेची घोषणा केली होती.  स्टार्टअप इंडिया योजनेच्या माध्यमातून सरकारने अनेक धोरणात्मक बदल केले, ज्यामुळे स्टार्टअप्सना अनुकूल वातावरण मिळाले. ही योजना देशातील बेरोजगारी कमी करणे, नवकल्पनांना  प्रोत्साहन देणे आणि आर्थिक विकासाला गती देणे या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित आहे.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    करभरण्यातून सूट: स्टार्टअप्सना तीन वर्षांसाठी करातून सूट दिली जाते. त्याचबरोबर, पात्र स्टार्टअप्सना Minimum Alternate Tax मध्ये सूट मिळते.

    स्वतःच्या संकल्पना आणि उत्पादने पेटंट करण्यासाठी सहाय्य: स्टार्टअप्सना जलदगतीने पेटंट अर्ज मंजूर होण्यासाठी सहाय्य दिले जाते. पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या फीमध्ये सवलत मिळते, तसेच सरकारतर्फे आर्थिक सहाय्यही दिले जाते.

    फंडिंग आणि गुंतवणूक सहाय्य: स्टार्टअप्ससाठी सरकारने ₹10,000 कोटींचा ‘फंड ऑफ फंड्स’ स्थापन केला आहे. या फंडाच्या माध्यमातून स्टार्टअप्सना भांडवल मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते. व्हेंचर कॅपिटलिस्ट्स, अँजेल इन्व्हेस्टर्स आणि बँका यांच्याकडून स्टार्टअप्सना गुंतवणूक मिळवण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते.

    मॅन्युफॅक्चरिंग आणि व्यापारातील सवलती: स्टार्टअप्सना सरकारच्या विविध निविदांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि खरेदीसाठी विशेष सवलती मिळतात. यामध्ये स्टार्टअप्सना मागील अनुभवाची किंवा टर्नओव्हरची अट लावली जात नाही.

    उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण: देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये आणि संशोधन केंद्रांमध्ये इनक्यूबेशन सेंटर स्थापन करून नवउद्योजकांना सहाय्य केले जाते. स्टार्टअप्ससाठी योग्य धोरणं तयार करून, यासाठी उद्योजकाना मार्गदर्शन केले जाते. 

    लायसन्सिंग आणि नियमातील सवलती: स्टार्टअप्सना विविध प्रकारची लायसन्स मिळवण्यासाठी कमीत-कमी  कागदपत्रांची आवश्यकता असते, तसेच ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होते. पर्यावरणीय आणि श्रम नियमांमधून काही सवलती दिल्या जातात, ज्यामुळे स्टार्टअप्सना व्यवसाय सुरु करण्यासाठी सहूलियत मिळतं असते.

    स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग: उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये स्टार्टअप कोर्सेस आणि प्रोग्राम्स सुरु करून उद्योजकतेची मानसिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

    योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    Startup Yojana: सर्वप्रथम, स्टार्टअप इंडिया पोर्टलवर स्टार्टअपची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी, PAN कार्ड, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, आणि संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असते. स्टार्टअप्सना डीपीआयआयटी (DPIIT) कडून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळवावी लागते. या मान्यतेसाठी स्टार्टअपने नवीन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या असाव्यात आणि कंपनीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे लागते.

    नोंदणी झाल्यानंतर, स्टार्टअप्स विविध कर लाभ, सवलती, आणि निधी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या ‘फंड ऑफ फंड्स’ आणि विविध वित्तीय संस्थांमधून गुंतवणूक मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. स्टार्टअप्सना इनक्यूबेशन सेंटर आणि इन्व्हेस्टर मॅचमेकिंग सेवांचा लाभ देखील घेता येतो.

    स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशभरातील नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली आहे. या योजनेमुळे उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन रोजगार निर्मिती, उत्पादनक्षमता वाढवणे, आणि जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढवण्यास मदत झाली आहे.

    ५) जागृती यात्रा 

    जागृती सेवा संस्थेने मध्य भारतातील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी जागृती यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेअंतर्गत उद्योजकांना एक अनोखी संधी मिळते. ज्यामुळे त्यांना प्रख्यात उद्योजकांशी भेटण्याची, व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची आणि जागतिक अनुभव मिळवण्याची संधी मिळते.

    यात्रेचे मुख्य उद्दिष्ट:

    जागृती यात्रा (JY): भारतातील टियर 2 (अधिक विकसित जिल्हे परंतु मोठ्या शहरांपेक्षा कमी) . आणि टियर 3 (कमी विकसित, आर्थिक आणि सामाजिक संसाधनांची उपलब्धता कमी असणारे जिल्हे ) जिल्ह्यांमधील उद्योजकांना पाठिंबा देणे.

    सहकार्य वाढवणे: उद्योजकांमध्ये नेटवर्किंग आणि सहकार्य वाढवणे, व्यावसायिक ज्ञान आणि संसाधनांची उपलब्धता.

    शिष्यवृत्ती अर्ज: यात आपल्यालाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. 

    विविध भारतीय प्रदेशांतून प्रवास करून सांस्कृतिक आणि भौगोलिक अनुभव मिळवयाचा असेल तर या यात्रेपेक्षा उत्तम पर्याय नाही. तसेच या ठिकाणी अनेक तज्ज्ञांच्या कार्यशाळा आणि सत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करता येते. व्यावसायिक कौशल्यं आणि नेटवर्किंगच्या संधी मिळवता येतात अनेक उद्योजक आणि सामाजिक बदल घडवणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येतो 

    तर मित्रांनो, हे काही प्रमुख उपक्रम आहेत जे नवउद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतात. या योजनांचा वापर करून, आपण आपल्या कल्पकतेला सकारात्मक दिशा देऊ शकता आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाऊ शकता. नवउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा फायदा करून घेतल्यास त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासास गती नक्कीच  मिळेल.

    आणखी वाचा

  • Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

    Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

    Quick Commerce 2026: क्विक कॉमर्स (Quick Commerce) म्हणजे E-commerce चा पुढचा आणि अत्यंत वेगवान टप्पा. हे नवीन मॉडेल ग्राहकांना किराणा माल, औषधे, खाद्यपदार्थ, आणि इतर दैनंदिन वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे क्विक कॉमर्सने जगभरातील Business क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे.

    भारतात क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप घेतलेले अनेक Startups आहेत, जे लोकांच्या जीवनशैलीत आणि खरेदीच्या पद्धतीत वेगाने बदल घडवत आहेत. या लेखात आपण क्विक कॉमर्सची व्याप्ती, त्याचा इतिहास, प्रमुख कंपन्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असलेली वाढ, यांचा सखोल आढावा घेणार आहोत.

    क्विक कॉमर्स म्हणजे काय आणि ही संकल्पना कशी कार्य करते?

    क्विक कॉमर्स (Q-commerce) म्हणजेच जलद ई-कॉमर्स सेवा, ज्यामध्ये ग्राहकांना १० ते ३० मिनिटांत वस्तू डिलीव्हर केल्या जातात. पारंपारिक ई-कॉमर्समध्ये Delivery ला काही तासांपासून काही दिवस लागू शकतात, पण Q-commerce तात्काळ सेवा पुरवतो. या सेवेमध्ये किराणा, ताजे अन्न, औषधे आणि इतर रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे.

    मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स (Micro-Fulfillment Centers)

    जलद सेवा देण्यासाठी, शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोटे स्टोअर्स उभारले जातात, ज्यांना ‘डार्क स्टोअर्स’ किंवा मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स म्हटले जाते. यामध्ये थोड्या प्रमाणात पण अत्यंत आवश्यक वस्तू साठवल्या जातात.

    यामधील डिलीव्हरीची प्रक्रिया Gig Economy वर आधारित असते, म्हणजेच फ्रीलांस काम करणारे Delivery Partners ऑर्डर पोहोचवतात. यात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे ऑर्डर मिळाल्यानंतर तात्काळ Route Planning आणि Real-time Tracking यासारख्या सुविधा वापरून ग्राहकांना वेळेत सेवा दिली जाते. अशा प्रकारे, क्विक कॉमर्स जलद आणि सोयीस्कर खरेदीचा अनुभव देते.

    क्विक कॉमर्सचा इतिहास (History of Q-Commerce)

    क्विक कॉमर्स संकल्पनेचा उदय विशेषतः COVID-19 महामारीच्या काळात झाला. २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते आणि आवश्यक वस्तूंची तातडीने गरज होती. या स्थितीने किराणा माल, औषधे, आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जलदगतीने पोहोचवणाऱ्या सेवांची मागणी प्रचंड वाढवली.

    तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कंपन्यांनी या संधीचा फायदा घेत, डार्क स्टोअर्स आणि Smart Logistics वापरून जलद सेवा सुरू केल्या. भारतासारख्या देशात, जिथे शहरीकरण वेगाने होत आहे आणि लोकांचा दिनक्रम खूप व्यस्त आहे, तिथे क्विक कॉमर्स सेवांनी जलदगतीने बाजारपेठ काबीज केली.

    क्विक कॉमर्समधील प्रमुख कंपन्या (Top Q-Commerce Brands)

    भारताच्या क्विक कॉमर्स क्षेत्रात काही प्रमुख स्टार्टअप्सने आपला मोठा ठसा निर्माण केला आहे:

    • झेप्टो (Zepto): हा स्टार्टअप २०२१ मध्ये मुंबईत सुरू झाला. झेप्टो अवघ्या १० ते २० मिनिटांत किराणा माल घरपोच पोहचवतो. ते मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्सद्वारे कार्य करतात, ज्यामुळे ग्राहकांच्या ऑर्डर त्यांच्या जवळच्या गोदामातून अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात.
    • ब्लिंकिट (Blinkit): हा स्टार्टअप पूर्वी ग्रोफर्स (Grofers) म्हणून ओळखला जात होता. त्यांनी क्विक कॉमर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपली रणनीती बदलली आहे आणि १०-१५ मिनिटांत वस्तू पोहोचवण्याचा यशस्वी पॅटर्न तयार केला आहे.
    • स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart): स्विगी, जी एक प्रमुख Food Delivery कंपनी आहे, तिने इन्स्टामार्टच्या माध्यमातून क्विक कॉमर्समध्ये प्रवेश केला. Instamart ग्राहकांना तातडीने आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी स्विगीच्या अवाढव्य लॉजिस्टिक्स नेटवर्कचा वापर करते.

    तंत्रज्ञानाचा प्रगत वापर (Role of Technology)

    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) आणि Data Analytics च्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचा सखोल अभ्यास करत आहेत. यामुळे त्यांना ग्राहकांना वेळेवर आणि अचूक सेवा देणे सोपे जात आहे. उदाहरणार्थ, नियमितपणे काही विशिष्ट वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी AI आधीच त्यांचा साठा तयार ठेवतो, ज्यामुळे डिलिव्हरी प्रक्रिया अधिक वेगवान होते.

    Logistics Management हा जलद वितरणासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, जिथे कंपन्या GPS System, स्मार्ट रूट प्लॅनिंग आणि रियल-टाइम ट्रॅकिंगचा प्रभावी वापर करतात. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, कार्यक्षम आणि अचूक होते, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव मोठ्या प्रमाणावर सुधारतो.

    भविष्यातील वाटचाल (Future Trends)

    क्विक कॉमर्स हा ई-कॉमर्स क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल आहे, ज्यामुळे खरेदीचा संपूर्ण अनुभव बदलला आहे. ग्राहकांना जलद सेवा मिळाल्यामुळे त्यांची अपेक्षा वाढली आहे आणि कंपन्यांना त्यांच्या सेवा आणखी सुधारण्याची गरज भासू लागली आहे. भविष्यात, Drone Delivery, Automation (ऑटोमेशन) आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने क्विक कॉमर्स अधिक कार्यक्षम आणि सर्वव्यापी होण्याची शक्यता आहे. या प्रगतीमुळे खरेदी अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम होईल.

    आणखी वाचा :

  • E-Commerce: ई-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ

    E-Commerce: ई-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ

    E-Commerce: जाणून घेऊया, भारतीय ई-कॉमर्स मार्केट, UPI आणि बरंच काही….

    भारतामध्ये मागील अनेक वर्षांत व्यापारी क्षेत्रात अनेक मोठे बदल घडून आले. स्मार्टफोन, इंटरनेट, स्वस्त डेटा यांमुळे ग्राहकांची खरेदी-विक्रीची सवय झपाट्याने बदलली आहे. घरबसल्या मोबाईलवर अगदी काही क्षणात एका क्लिक वरून वस्तू मागवण्याची सुविधा आता सर्वसामान्यात रूढ झाली आहे. याच बदलाला आपण E-commerce (ई-कॉमर्स) असे म्हणतो. वस्तू व सेवा यांची खरेदी-विक्री इंटरनेटद्वारे केली जाणारी पद्धत म्हणजे ई-कॉमर्स.

    भारतात झपाट्याने वाढणारे E-commerce Market

    २०२३ – २४ या आर्थिक वर्षात भारताचा E-commerce Market बाजार सुमारे १०.२५ लाख कोटी एवढा होता. तज्ञांच्या अंदाजानुसार २०२७-२८ पर्यंत हा बाजार २४ लाख कोटींहून अधिक होईल. म्हणजेच दरवर्षी सुमारे १८ ते १९ टक्के दराने प्रचंड वाढ अपेक्षित आहे. २०२४ मध्ये भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८.६ कोटी इतकी झाली आहे. आज B2B Business, B2C Business – थेट ग्राहकाला विक्री, ऑनलाइन लिलाव विक्री, एका ग्राहकाकडून दुसऱ्याला विक्री (C2C), असे काही ई-कॉमर्सचे प्रमुख प्रकार भारतामध्ये प्रचलित आहेत.

    UPI: डिजिटल पेमेंटमधील क्रांती

    ई-कॉमर्सच्या वाढीसाठी Digital Payments चा मोठा वाटा आहे. भारतात UPI (Unified Payments Interface) हे खूप मोठे यश ठरले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये UPI ने २००० कोटींहून अधिक व्यवहार पूर्ण केले, ज्यांची किंमत तब्बल २४.८५ लाख कोटी इतकी होती. एवढ्या प्रमाणावर स्वस्त, सोपी आणि सुरक्षित व्यवहार व्यवस्था जगात दुसरीकडे नाही.

    UPI मुळे ई-कॉमर्समध्ये कार्ड किंवा Cash-on-Delivery (COD) वर अवलंबून राहावे लागत नाही. आता छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या ब्रँडपर्यंत सर्व जण QR Code द्वारे पैसे स्वीकारतात. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे.

    ONDC: छोट्या विक्रेत्यांसाठी सुवर्णसंधी

    आजपर्यंत ऑनलाइन खरेदी काही मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित होती. पण सरकारने सुरू केलेल्या ONDC (Open Network for Digital Commerce) या योजनेमुळे स्थानिक दुकानदार, शेतकरी, किराणा व्यावसायिक, रेस्टॉरंट मालक यांनाही डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. २०२५ मध्ये ONDC वर दर महिन्याला लाखो व्यवहार होत असून हजारो छोटे विक्रेते यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या Platforms वर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

    Logistics व वितरण (Delivery)

    ई-कॉमर्समध्ये ग्राहकाला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे जलद वितरण. भारत सरकारने राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण (National Logistics Policy) जाहीर करून खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. २०२५ मध्ये लॉजिस्टिक्स खर्च GDP च्या ८.३५% इतका आहे, जो ५% पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

    मोठ्या शहरांमध्ये आता एक-दोन दिवसांत वस्तू मिळतात, तर झोमॅटो, ब्लिंकिटसारख्या कंपन्या १०-३० मिनिटांत Grocery घरपोच करत आहेत.

    ई-कॉमर्सचे फायदे (Benefits of E-commerce)

    इंटरनेटच्या मदतीने खरेदी-विक्री करणे अधिक जलद, सुरक्षित आणि सोपं झालं आहे. ई-कॉमर्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो २४ तास उपलब्ध असतो. ग्राहक कुठूनही आणि कधीही आपल्या गरजेची वस्तू खरेदी करू शकतो. यामध्ये एकाच ठिकाणी हजारो उत्पादने व Brands ची निवड मिळते, त्यामुळे जास्त पर्याय सहज उपलब्ध होतात.

    ऑनलाइन खरेदीमुळे वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होते, कारण ग्राहकांना दुकानात जाऊन रांगेत उभे राहावे लागत नाही. त्याशिवाय वस्तू घरपोच सेवेच्या माध्यमातून थेट ग्राहकांच्या दारात पोहोचवल्या जातात. विक्रेत्यांसाठीही ई-कॉमर्स फायदेशीर आहे, कारण दुकानभाडे, कर्मचारी, वीज, इत्यादी खर्च कमी होतो आणि त्यामुळे ते ग्राहकांना सवलती आणि Offers देऊ शकतात.

    ई-कॉमर्समुळे व्यापाऱ्यांना Global Market मध्ये सहज पोहचता येते. एखादा छोटा विक्रेता देखील आपल्या उत्पादनांची विक्री जगभर करू शकतो. तसेच, Price Comparison करणे सोपे असल्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम दर मिळतो. सुरक्षित आणि जलद Digital Payments हेही ई-कॉमर्सचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

    ई-कॉमर्सचे फायदे (Benefits of E-commerce)

    ई-कॉमर्स पुढील आव्हाने (Challenges)

    E-Commerce: जरी ई-कॉमर्स व्यापारी क्षेत्रातील मोठी क्रांती असली तरी ई-कॉमर्ससमोर काही गंभीर आव्हाने आहेत. नकली वस्तूंची विक्री, Returns & Refunds मधील अडचणी, Cyber Fraud, ग्रामीण भागात अजूनही स्थिर इंटरनेट व डिजिटल साक्षरतेचा (Digital Literacy) अभाव इ. समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

    नियमन व ग्राहक संरक्षण (Consumer Protection)

    सरकारने Consumer Protection Rules, 2020 लागू करून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. या नियमांनुसार प्लॅटफॉर्मनी स्पष्ट परतावा धोरण (Return Policy), ग्राहक तक्रार निवारण अधिकारी (Grievance Officer), व पारदर्शक जाहिराती यांची अट पाळणे बंधनकारक केले आहे. तसेच Digital Personal Data Protection Act, 2023 (DPDP Act) मुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपन्यांकडे आली आहे.

    सामाजिक परिणाम (Social Impact)

    ई-कॉमर्सने MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राला प्रचंड चालना दिली आहे. स्थानिक कारागीर, शेतकरी, महिला उद्योजिका आता थेट देशभरात व परदेशात आपली उत्पादने विकू शकतात. उदाहरणार्थ, विदर्भातील संत्री, कर्नाटकातील कॉफी, कोकणातील आंबा, राजस्थानातील हस्तकला हे सगळं आता डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत सहज पोहोचत आहे.

    भविष्याचा वेध (Future Trends)

    आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence), आवाजावर आधारित खरेदी (Voice Commerce), थेट सोशल मीडियावर खरेदी (Social Commerce), पर्यावरणपूरक पॅकेजिंग, तसेच Drone Delivery या गोष्टी ई-कॉमर्सला आणखी नवी दिशा देतील.

    एकंदरीत, ई-कॉमर्स हा आजच्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा नवा इंजिन ठरला आहे. २०२५ मध्येच हा बाजार १० लाख कोटींहून अधिक झाला असून, काही वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता आहे. UPI सारखी पेमेंट व्यवस्था, ONDC सारखी खुली नेटवर्क प्रणाली, आणि सरकारचे ग्राहक संरक्षणाचे कायदे यामुळे लोकांचा ई-कॉमर्सवर विश्वास वाढला आहे. या तंत्रज्ञानाधारित क्रांतीमुळे उद्योजकतेला नवे आयाम मिळाले असून भारताचे डिजिटल भविष्य अधिक सक्षम होत आहे.

    आणखी वाचा :

  • Fevicol Man: एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

    Fevicol Man: एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

    Fevicol Man: फेविकॉलची जाहिरात “फेविकॉल का मजबूत जोड, आसानी से टूटेगा नहीं” ही सर्वांनाच परिचयाची आहे. आजही “मजबूत जोड” म्हटलं की फेविकॉल आठवतं, कारण फेविकॉल असेल तर जोड खरोखरच टिकाऊ असतो. फेविकॉलच्या जाहिरातींनी आणि त्यांच्या Branding ने लोकांच्या मनात या नावाची छाप कायमची बसवली आहे. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी तुटल्या की फेविकॉल वापरायची सवय आहे, मग ती वस्तू कितीही लहान किंवा मोठी असो.

    पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की या यशस्वी Brand च्या मागे कोण आहे? हा ब्रँड उभा करणारी ती प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे बलवंत पारेख, ज्यांना Fevicol Manम्हणूनही ओळखलं जातं. गुजरातच्या भावनगरमधील एक साधा माणूस, ज्याने आपल्या मेहनतीने फेविकॉलला यशस्वी बनवलं आणि तो घराघरात पोहोचवला.

    आजच्या या लेखात आपण बलवंत पारेख यांच्या प्रेरणादायी Life Journey वर एक नजर टाकूया, आणि पाहूया की त्यांनी कसं फेविकॉलसारख्या सामर्थ्यवान ब्रँडची निर्मिती केली.

    प्रारंभिक जीवन (Early Life)

    बलवंत पारेख यांचा जन्म १९२५ साली गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा या शहरात एका जैन कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा मॅजिस्ट्रेट होते, त्यामुळे कुटुंब सुशिक्षित आणि प्रतिष्ठित होते. लहानपणापासूनच बलवंत यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या पालकांना वाटत होतं की त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकील व्हावे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात (Government Law College) कायद्याचं शिक्षण घेतलं.त्याकाळी देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. महात्मा गांधींच्या विचारांची देशात लाट पसरली होती. बलवंत यांनी देखील स्वातंत्र्याच्या या संग्राममध्ये सक्रिय सहभाग घेतला, Quit India Movement मध्येही ते पूर्ण तन मनाने सहभागी झाले होते मात्र त्यांनी आधी आपला अभ्यास पूर्ण करावा असा घरच्यांचा दबाव होता.

    शिक्षण घेत असतानाच बलवंत यांचा विवाह कांताबेन यांच्यासोबत झाला. कायद्याची पदवी तर त्यांना मिळाली पण बलवंत यांना वकिलीपेक्षा व्यवसायात अधिक रस होता. त्यांनी वकिली न करता मुंबईतील एका रंगाई आणि मुद्रणालयात काम करायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि एका लाकूड व्यापाऱ्याच्या कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी धरली, जिथे ते पत्नीसोबत गोदामात राहत होते. त्यांना स्वतःचा Business सुरु करायची तीव्र इच्छा होती म्हणून कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना त्यांनी मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या (Investor) मदतीने पाश्चात्य देशांतून सायकल, सुपारी, आणि कागदी रंग आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला. पण दुर्दैवाने तो व्यवसाय फार काळ टिकू शकला नाही, त्या काळात त्यांनीं व्यवसायासाठी घेतलेल्या विविध कर्जांमुळे त्यांना खूप आर्थिक बोजादेखील सहन करावा लागला.

    संघर्षांतून सुरु केला यशाचा प्रवास (Success Story)

    त्यांनी नंतर अनेक छोटी मोठी कामं करून आपल्या मेहनतीच्या बळावर थेट जर्मनी गाठली आणि फेडको या कंपनीत ते रुजू झाले. फेडकोमधील नोकरी बलवंत यांना उद्योग आणि व्यवसायाचे तंत्र शिकवणारी ठरली. फेडको या जर्मन कंपनीसोबत काम करताना त्यांना उत्पादकता, गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादनांच्या साठवण व्यवस्थापनाबद्दलची माहिती मिळाली. फेडकोने काही काळानंतर व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र बलवंत यांनी परत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. 1954 मध्ये त्यांनी आपल्या भावासह मुंबईच्या जेकब सर्कल येथे ‘Parekh Dyechem Industries‘ नावाने एक कंपनी स्थापन केली, जी औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन आणि रंगांचे उत्पादन आणि विक्री करत होती. ही त्यांची पहिली उद्योजकीय पायरी होती.

    फेविकॉलचा शोध (Invention of Fevicol)

    Pidilite Industries म्हणजेच पारेख डायकेम लाइट इंडस्ट्रीजने प्रथम औद्योगिक उत्पादनासाठी काम केलं , परंतु बलवंत यांना सुतारांच्या वापरासाठी एक नवीन उत्पादने तयार करण्याची संधी दिसली. सुतारांना कामासाठी लागणारे गोंद त्या काळात अनेकदा प्राण्यांच्या अवयवांपासून तयार होत असे, ज्यामुळे त्याच्या वापरात काही मर्यादा येत होत्या. यामुळे त्यांनी शाकाहारी म्हणजेच कोणत्याही प्राण्याची हत्त्या न करता गोंद तयार करण्याचा संकल्प केला. आपल्या जुन्या कंपनीच्या नावातला फेडको आणि कॉल म्हणजे गोंद हा जर्मन शब्द जोडून ‘Fevicol‘ नावाचा त्यांनी नवीन ब्रँड तयार केला. फेविकॉलची निर्मिती १९५९ सालापासून सुरु झाली. सुरुवातीला अपेक्षित असं यश त्यांना मिळालं नाही, मात्र फेविकॉलच्या उत्तम दर्जामुळे ते सुतारांच्या पसंतीस उतरू लागले.

    Fevicol Man एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

    Fevicol Man:फेविकॉलने सुतारांचा बाजार कसा काबीज करावा यासाठी एक अभिनव योजना आखली. बलवंत यांनी “Fevicol Champions Club” नावाचा एक समुदाय निर्माण केला. या क्लबने सुतारांना फेविकॉल उत्पादनांची माहिती देऊन त्यांच कौशल्य आणि व्यवसाय अधिक सुधारण्यासाठी मदत केली. या समुदायात फक्त उत्पादनाबद्दल शिकवलं गेलं नाही, तर सुतारांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या मोहिमेमुळे फेविकॉलने त्या काळात देशभरातील ८०% पेक्षा जास्त सुतारांचा विश्वास प्राप्त केला.

    जाहिरात आणि व्यवसाय विस्ताराचे धोरण (Marketing Strategy)

    १९८९ मध्ये बलवंत पारेख यांनी फेविकॉलला एक सार्वत्रिक ब्रँड बनवण्याचा संकल्प केला. या उद्देशासाठी त्यांनी एक Advertising Strategy अवलंबली. “दम लगाके हैशा” आणि “फेविकॉल का मजबुत जोड़ है, टूटेगा नहीं” या प्रभावशाली स्लोगनद्वारे (Slogan) त्यांनी फेविकॉलला सर्वसामान्यांच्या वापरात आणलं. फेविकॉल केवळ सुतारांसाठी नाही, तर घराघरातील लोकांसाठी एक उपयोगी साधन बनले. या अनोख्या जाहिरातींमुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक विशेष स्थान प्राप्त केले आणि 20 वर्षांच्या आत अविश्वसनीय 70% Market Share मिळवला. या यशात, देशातील प्रत्येक दोन सुतारांपैकी एकाने फेविकॉल वापरण्यास सुरुवात केली.

    Fevicol Man: 1993 पर्यंत, Pidilite ने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) IPO मध्ये प्रवेश केला, आणि सर्व काही ठीकटाक आणि सुरळीत असूनही बलवंत पारेख पूर्णपणे समाधानी नव्हते, कारण त्यांची इच्छा होती की फेविकॉल सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनावं. ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांनी फेविकॉलचा Logo बदलून दोन जोडलेले हत्ती बनवले, जे एकता आणि शक्तीचे प्रतीक झाले. यामुळे फेविकॉल 30 ग्रॅमच्या ट्यूबमध्ये उपलब्ध झाला, त्याला प्रचंड लोकप्रियता मिळली.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवत बलवंत पारेख यांनी २००६ पर्यंत फेविकॉलचा विस्तार केला, फेविकॉल ७१ देशांमध्ये पोहोचले. त्याच वेळी, M-Seal आणि Dr. Fixit सारखे अन्य ब्रँड्स देखील यशस्वीपणे लाँच करण्यात आले. बलवंत यांच्या नेतृत्वाखाली Pidilite Industries जवळजवळ २००० कोटी रुपयांच्या मूल्याची कंपनी बनली, ज्यामुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक वर्चस्व प्रस्थापित केलं.

    सामाजिक आणि शैक्षणिक कार्य (Philanthropy)

    बलवंत पारेख हे केवळ उद्योगातच नाही तर समाजकार्यात देखील सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच महुवा येथे दोन शाळा, एक महाविद्यालय, आणि एक रुग्णालयाची स्थापना केली. त्यांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची प्रचंड आवड होती म्हणून त्यांनी ‘दर्शक फाउंडेशन’ (Darshak Foundation) या संस्थेची स्थापना केली, ही संस्था भारतीय सांस्कृतिक इतिहासावर संशोधन करते. बलवंत यांचे स्वतःचे एक खाजगी ग्रंथालय होते ज्यामध्ये शास्त्र, साहित्य, कायदा, मानसशास्त्र, आणि सामान्य ज्ञानाचे विविध ग्रंथ होते. त्यांनी Balwant Parekh Centre for General Semantics and Other Human Sciencesया संस्थेची स्थापना करून, लोकांच्या शिक्षणासाठी आणि विज्ञानविषयक संशोधनासाठी एक ठोस पाऊल उचलले.

    मित्रांनो, बलवंत पारेख यांचा जीवनप्रवास आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य व्यक्तीने जिद्द, मेहनत आणि सततची शिकण्याची तयारी याच्या जोरावर उद्योगजगताला नवी दिशा दिली. फेविकॉलचे माध्यमातून त्यांनी भारतीयांना एक असा ब्रँड दिला जो एकता, विश्वास, आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहे. आजही बलवंत पारेख यांच्या योगदानाचे स्मरण त्यांच्या उद्योजकीय विचारसरणीतून आणि समाजसेवेच्या कार्यातून होते.