कुठलंही नाव ठेवताना त्यामागे काही ना काही कारण किंवा अर्थ असतो. जगप्रसिद्ध कार ब्रँड्सच्या नावामध्येसुद्धा काही रंजक गोष्टी लपल्या आहेत. पाहुया अशाच काही कंपन्यांबाबत.
BMW
जर्मनीचा BMW हा ब्रँड लक्झरी कोर्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरूवातीला ही कंपनी दक्षिण जर्मनीच्या बव्हेरिया (Bavaria) या ठिकाणी विमानांचे इंजिन निर्मिती करत होती. त्यावेळी कंपनीचं नाव Bayerische Motoren Werke असं होतं. त्याचंच संक्षिप्त नाव हे BMW म्हणून ओळखलं जातं.
Fiat
फियाट ही इटलीची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीनं 1899 मध्ये ट्युरिन येथे वाहन उत्पादन सुरू केलं. या कारखान्याचं नाव इटालियन ऑटोमोबिल्स फॅक्टरी ट्युरिन या नावानं ओळखलं जातं. याला इटालियन भाषेत Fabbrica Italiana Automobili Torino या नावानं संबोधलं जायचं. याचंच संक्षिप्त रूप FIAT हे आहे. १९६०-८० अशी सलग २० वर्षं Fiatजगातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी होती.
Hyundai
दक्षिण कोरियाची ह्युंदाई हीदेखील भारतीय बाजारपेठेत सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी आहे. कोरियन भाषेत Hyundai चा अर्थ ‘वर्तमान युग’ असा आहे. यावरच कंपनीचं नाव Hyundai असं ठेवण्यात आलं. १९६८ साली चुंग जु-युंग यांनी कोरियातील सेऊलमध्ये कंपनीची स्थापना केली होती.
KIA
किया मोटर्सनं नुकतीच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. या कारचं नाव दक्षिण कोरियन भाषेतील दोन अक्षरं 起 (ki) और 亞 (a) यांनी बनलं आहे. यातील ‘कि’ चा अर्थ उदय होणं किंवा बाहेर येणं आणि ‘या’ चा अर्थ पूर्व अथवा एशिया असा आहे. कंपनीच्या नावाचा पूर्ण अर्थ Rising From the east असा वाचला जातो.
Rolls-Royce
Rolls-Royce ही ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी आहे आणि अनेक वर्षांपासून लक्झरी कार उत्पादनांसाठी ओळखीची आहे. या ब्रँडचं नाव कंपनीच्या दोन संस्थापकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. 1884 मध्ये फेडरिक हेनरी रॉयस (rederick Henry Royce) यांनी एका इलेक्ट्रिक/मेकॅनिकल बिझनेसची सुरूवात केली होती त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली. त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली.
Mercedes-Benz
ऑटो सेक्टरमधील जुना ब्रँड म्हणून Mercedes-Benz ची ओळख आहे. यामध्ये त्यांच्या संस्थापकांचं नाव आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कार्ल बेंझ हे या ब्रँडचे संस्थापक होते. परंतु Mercedes हे नाव ऑस्ट्रियाचे बिझनेसमन एमिल जेलिनेक यांच्या मुलीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर आपण नंतर चर्चा करू.
Tesla
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टेस्लाच्या तोडीस तोड देणारी सध्या दुसरी कंपनी नाही. या ब्रँडच्या नावामागेही एक गोष्ट आहे. याचं नाव सर्बियन शोधकर्ते निकोला टेस्ला यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1884 च्या दरम्यान अमेरिकेत प्रवास केला होता. ते आपल्या उत्कृष्ट इलेक्ट्रिक वर्क्ससाठी प्रसिद्ध होते.
Datsun
Datsun ही निस्सान या कंपनीचाच एक ब्रँड आहे. यातील DAT हे नाव त्याचे फायनॅन्सर्स डेन, आओयामा आणि टेकूची यांच्या नावाच्या सुरूवातीच्या अक्षरापासून करण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनीनं आपली छोटी कार SON च्या आधारावर याचं नाव DATSON हे ठेवलं. परंतु जपानी भाषेत SON चा अर्थ नुकसान असा होतो. म्हणून त्यानंतर त्यांनी या कारचं नाव DATSUN असं केलं.
Ford
फोर्ड या कंपनीची स्थापना 1914 मध्ये करणअयात आली. या कंपनीचं नाव त्यांचे संस्थापन Henry Ford यांच्या नावावर ठेवण्यात आलं. Henry Ford हे कंपनीच्या मालकाच्या रुपात जगातील सर्वात धनवान आणि परिचित लोकांपैकी एक होते.
Toyota
या ब्रँडचंही नाव कंपनीचे संस्थापन Sakichi Toyoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं. टोयोडा हे वाल बोलण्यात आणि आधिक सुलभ होण्यासाठी याच्या स्पेलिंगमध्ये थोडे बदल करून ते टोयोटा असं करण्यात आलं.
Skoda
स्कोडा ही कंपनीदेखील आपल्या प्रिमिअम कार्ससाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँडचं नाव कंपनीचे संस्थापक Emil Škoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.
Volkswagen
या कंपनीचं मुख्यालय जर्मनीतील वोल्फ़्सबर्ग येथे आहे. १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. अडॉल्फ हिटलरनं सामान्य लोकांच्या गरजा पुरवणारी एखादी कार तयार करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान अनेक कंपन्या कार उत्पादन करत होत्या. परंतु Beetle नं एक स्वस्त मॉडेल सादर केलं होतं आणि ते हिटलरला आवडलंही. यानंतर या कंपनीला Volkswagen हे नाव देण्यात आलं. Volks आणि wagen याचा जर्मन भाषेत अर्थ जनता आणि वाहन म्हणजेच जनतेचं वाहन असा होतो.
सध्या लोकांचा कल या बिझनेस किंवा व्यवसाय या क्षेत्रात वाढताना जास्त दिसतोय. व्यवसाय करून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यावर अनेकांचा भर दिसून येतो आहे. उद्योजक व्हा आणि आपली स्वप्नं पूर्ण करा किंवा मोठी स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर उद्योजक व्हावे लागेल असे मोटिव्हेशनल डायलॉग वाचून सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात उद्योगाकडे वळताना आपल्याला दिसत आहे.
व्यवसाय किंवा उद्योग सुरु करताना तुमच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी असणे गरजेचे आहे. आता हा अनुभव एकतर तुम्हाला तुमच्या घरातच परंपरेने चालत आलेल्या व्यवसायात मिळू शकतो किंवा त्यासाठी काही काळ एखाद्या ठिकाणी नोकरी करून तुम्ही तो मिळवू शकता. अनेक संस्थांमध्ये तुम्हाला व्यवसायाचे परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन तयार केले जाते. हे सर्व आजमावल्यानंतर तुम्ही नेमकी व्यवसायाला सुरुवात करता, तेव्हा मात्र तुम्हाला वेगळेच अनुभव येतात. एकाच आजारावरील औषधाची मात्रा सर्वांना एकसारखी लागू पडत नाही तसेच व्यवसाय किंवा उद्योग ठराविक अशा एकाच मार्गाने चालवता येत नाही. प्रत्येकाच्या अनुभवातून तो वेगवेगळ्या पद्धतीने फुलवता जरूर येतो. यासाठीच व्यवसाय करताना काही टिप्सची गरज पडते.
या टिप्स म्हणजे कोणतं व्यवसाय पुराण नसून अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याची व्यापकता वाढवण्यासाठी कामी येऊ शकतात.
व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाल्यास व्यवसायाची सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जो बिझनेस प्लॅन तयार करत असतो, तो बिझनेस प्लॅन इन डिटेल प्रत्येकासोबत शेअर करू नका. कदाचित तुमचा हा बिझनेस प्लॅन पूर्णपणे चोरीला जाऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला नाहक मानसिक किंवा आर्थिक त्रास सहन करावा लागू शकतो. योग्य आणि भरवश्याच्या व्यक्तींना हा प्लॅन दाखवा आणि गरज असेल तर सुधारणा करा…
सुरुवातीला येणाऱ्या अनुभवांमध्ये निरीक्षणास येणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुमच्या पदरात अपयश आले, तर त्याला अनुभव म्हणून पाठीशी घ्या आणि चुकांची पुनरावृत्ती न करता, यशस्वी व्यवसाय करण्यासाठी सातत्य ठेवा.
एखादा व्यवसाय सुरु करत असताना आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईंकांमध्ये आपले अनेक हितचिंतक असतात ज्यांना आपल्यासोबत यायचे असते, अशा काही विश्वासू लोकांना भागीदार किंवा गुंतवणूकदार म्हणून सोबत घेऊ शकता. यामुळे तुमच्या व्यवसायाला अधिक बळ मिळू शकते. त्यासोबतच आपल्या व्यवसायात आपण एकटेच जर सगळ्या प्रकारची व्यवस्था आणि काम करत असू, तर त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या प्रगतीची गती कमी होऊ शकते. एकाचवेळी व्यवसायाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल, तर एक ग्रुप म्हणून अनेक सभासदांना सोबत घेऊन तम्ही व्यवसाय सुरु ठेऊ शकता.
एकत्र येऊन एक ग्रुप म्हणून काम करत असताना संघटनात्मक वृत्तीतून व्यवसायातले अनेक विभाग एकाचवेळी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले जाऊ शकतात. व्यवसाय सुरु केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु केला आहे, तेथील स्थानिकांना व्यवसायात सामावून घ्या. यामुळे व्यवसायाच्या अनेक लहान मोठ्या गरजांसाठी स्थनिकांच्या मदतीमुळे कमीतकमी खर्चात अनेक प्रकारची कामं पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या सुरुवातीला आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांची आगाऊ व्यवस्था. अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला अपेक्षित असा व्यवसाय किंवा नफा नाही झाला, तर तूट भरून काढण्यासाठी गाठीशी पैशांची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असते. व्यवसाय सुरु केल्यानंतर ज्या नावाने आपण व्यवसाय सुरु केला आहे त्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसायाने थोडीशी गती मिळवल्यानंतर आपण त्याचा ऑनलाईन मार्केटिंगचा उत्तम प्लॅन बनवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी एखाद्या वेबसाईटचा तसेच सोशल मीडियाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याकडे आपण कळत नकळत दुर्लक्ष करू शकतो ती गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबी. व्यवसाय सुरु होताच स्थानिक आणि राज्य यांचे कर कशापद्धतीने आहेत ते समजून घेऊन त्याप्रमाणे सर्व तरतूद करणे गरजेचे आहे.
तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही काही कर्मचारी घेतले असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या आणि त्यांच्यासाठी योग्य व मूलभूत सुविधा देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा रीतीने अगदी सुरुवातीपासून व्यवसायाच्या लहान-लहान गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष दिले तर व्यवसायाची प्रगती आणखी जोमाने नक्कीच होऊ शकते.
बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेखला like आणि share करा channel ला subscribe करा.
व्यवसाय! हा शब्द उच्चारला की संपूर्ण सोशल मीडिया पटकन डोळ्यासमोरून तरळून जातो. व्यवसाय असा करा, तसा करा, तुम्ही अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे. अशा सतरा गोष्टी आणि या गोष्टी सांगणारे अठरा गुरु.
खरं सांगायचं झालं तर बिझनेस शिकवून किंवा वाचून शिकता येत नाही. तो करताना येणारे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अत्यंत समर्पित वृत्तीने झोकून देऊन बिझनेससाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. बिझनेसची संपूर्ण रचना आणि व्यवस्था यावर नीट अभ्यास करून शुभारंभ केला की मागे वळून पाहण्याची गरज नाही.
जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बिझनेस सुरू करता, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात तुमचा चांगला जम बसलेला असतो. तुम्ही मन लावून आणि लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करत असता, पण जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होतो आणि तुम्हाला सगळेजण एक यशस्वी बिझनेसमन म्हणून बघायला लागतात, तेव्हा नेमकं असं होतं की; आपल्या बिझनेसपेक्षा आपण बाकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो. ते म्हणतात ना, यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं फार जास्त अवघड असते. अगदी याच म्हणीप्रमाणे बिझनेसचा जम बसायला लागल्यानंतर आपले लक्ष विचलित होते आणि कळत नकळत आपण रोज वेगवेगळ्या चुका करायला लागतो. या चुका जेव्हा एक मर्यादा गाठतात, तेव्हा तुमच्या बिझनेसला उतरती कळा लागली म्हणून समजा.
नेमकं याच विषयावर आपण या लेखामध्ये बोलणार आहोत. तुम्ही जेव्हा नुकताच बिझनेस सुरु केलेला असतो, तेव्हा तो तुमच्या ग्राहकांसाठीही नवीन असतो. अशावेळी तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टची त्यांना आणि त्यांची तुम्हाला नुकतीच ओळख झालेली असते. सगळं नवीन नवीन असताना दोन्हीकडून समजुतदारपणा दाखवला जातो. पण जेव्हा हा सगळा नवा काळ ओसरून जातो, खरी मजा तेव्हा सुरु होते. बिझनेसमध्ये तोचतोचपणा येऊ नये यासाठी तुमची कसरत सुरु होते. त्यामधीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्टचा दर्जा कायम टिकवून ठेवणे.
उदाहरण म्हणून आपण एक गोष्ट घेऊ. गोपाळला खाद्यपदार्थांचा भलताच नाद होता. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तो नेहमीच सर्वांसाठी बनवायचा. हळूहळू त्याचे हे पदार्थ त्याच्या नातेवाईकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आणि त्यासोबत गोपाळसुद्धा लोकप्रिय होऊ लागला. अशातच त्याच्या सर्व मित्रांनी त्याला इडलीचा व्यवसाय सुरु करण्याचा आग्रह केला. स्वतःचे हे नवे स्वप्न आणि थोडाफार अनुभव घेऊन इडलीच्या व्यवसायात गोपाळने एन्ट्री केली. बघता बघता त्याचा व्यवसाय त्याच्या हाताच्या उत्कृष्ट चवीमुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला. ज्यामुळे त्याच्याकडे ग्राहकांची संख्या प्रचंड वाढू लागली आणि त्याच्यावर कामाचा ताण वाढू लागला. या वाढत्या गर्दीबरोबर त्याने त्याच्या सोबतीला कामासाठी कोणीच व्यक्ती ठेवली नसल्यामुळे इडलीच्या चवीवर, सर्व्हिसवर प्रचंड परिणाम होऊ लागला. ज्यामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला.
गोपाळच्या या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कळत नकळत चुका होत जातात, वेळीच त्या सुधारल्या जात नाहीत, त्याकडे पाहिलं जात नाही आणि या दुर्लक्षामुळे व्यवसाय कोलमडून पडू शकतो. म्हणजेच काय व्यवसायाची सुरुवात झाल्यांनतर एकदा जम बसला की त्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी गरजेनुसार जे बदल करणे महत्वाचे आहे, त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे.
गोपाळचे उदाहरण घेतले, तर नेमक्या कोणत्या चुका झाल्या ते आपण पाहूया. जेव्हा तुमचा बिझनेस वेगाने प्रगती करत असतो, तेव्हा बिझनेसच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रकारचे बदल अपेक्षित असतात, हे बदल करत असताना बिझनेसच्या प्रॉडक्टवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गरजेनुसार मनुष्यबळ वाढवणे, कामाची रचना नीट लावणे, सर्व कामं शिस्तीने पूर्ण होत आहेत ना याकडे लक्ष देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून वैयक्तिकपणे याकडे नीट लक्ष देणे. हे सगळं जमून आलं की, दर्जा टिकून राहतो आणि ग्राहकांचा उत्साहदेखील.
थोडक्यात काय, तर तुमचा बिझनेस हा नेहमी updated असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं व्यावसायिक म्हणून किंवा ग्राहक म्हणून अजून कोणते बदल तुमच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
मेहनत करूनही यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देणारे जगात अनेकजण आहेत, पण आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व इतकं महान आहे, की हजारहून अधिक वेळा आपले प्रयत्न चुकले, तरी त्यात सातत्य ठेवून त्याने अखेरीस विजेच्या बल्बचा शोध लावला. लहानपणी ज्याला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण आज त्याच्या नावावर १०९३ पेटंट आहेत अशा त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन.
नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.
अमेरिकेतील ओहियो राज्यामधील मिलान या गावात सॅम्युअल आणि नॅन्सी नावाचे दाम्पत्य राहात होते. सॅम्युअल दुकानात काम करत, तर नॅन्सी घरी शिकवणी घेऊन संसाराला हातभार लावत असे. ११ फेब्रुवारी १८४७ रोजी या दाम्पत्याच्या पोटी एडिसनचा जन्म झ़ाला. लहानपणापासूनच एडिसनला प्रत्येक गोष्टीच कुतूहल होतं. एडिसनने एकदा आपल्या आईला विचारलं कि, ‘पक्षी हवेत का उडतात?’ यावर तिने सांगितलं कि, ‘ते किडे खातात ना, त्यामुळं हवेत उडतात.’ यावर एडिसन बागेत गेला. त्याने अनेक किडे जमा केले, त्याचा घोळ बनवला आणि आपल्या मित्राला म्हणाला की, ‘हे पिलं कि तू हवेत उडशील.’ त्याचा मित्र ते प्याला. तो हवेत काय उडाला नाही, पण एडिसनला दिवसा तारे मात्र नक्की दिसले. आपल्या कुतुहलामुळं असे अनेक वेडेवाकडे प्रश्न एडिसन विचारायचा. त्यामुळं त्याला सगळे निर्बुद्ध आणि मतिमंद म्हणायचे.
शाळेतून येताना एकदा एडिसन शिक्षकांची एक चिट्ठी घेऊन आला. जी त्याने आपल्या आईला दिली. ती वाचून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. एडिसनने जेव्हा आपल्या आईला विचारलं की यात काय लिहिलंय, तेव्हा त्याची आई म्हणाली, त्यांनी लिहिलेलं आहे की, ‘तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तो एक विद्वान आहे आणि आमची शाळा आणि शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत.’ तेव्हापासून पुढं एडिसनचं घरातच शिक्षण चालू झालं. त्याची आई त्याला अनेक पुस्तक आणून द्यायची आणि एक पुस्तक वाचलं कि त्याला पैसे मिळायचे. एडिसन विज्ञानाची अनेक पुस्तकं वाचू लागला. त्यानं आपल्या घरातच एक लहान प्रयोगशाळा चालू केली. तो तिथं अनेक प्रयोग करू लागला. रसायनं घ्यायला पैसे कमी पडत, म्हणून तो पेपर टाकत असे, रेल्वेमध्ये चॉकलेट गोळ्या विकत असे. घरातील त्याच्या उपद्व्यापामुळे घरचे वैतागले. त्याच्या आईने चिडून त्याची प्रयोगशाळाच बंद केली. नंतर त्यानं रेल्वेच्या एका लहान डब्यात आपले प्रयोग चालू केले. तिथं देखील एक अपघात घडला आणि त्याच्या एका रसायनामुळं डब्याला आग लागली. यावर रेल्वेच्या टिसीने एडिसनच्या इतक्या जोरात कानफटात वाजवली कि, तेव्हापासून एडिसनला कमी ऐकू यायला लागलं. पुढं जेव्हा त्याला यावर प्रश्न विचारला. तेव्हा याकडं देखील सकारात्मक पाहत एडिसन म्हणाले कि, ‘बरं झालं मला कमी ऐकू येतं. त्यामुळे मला वायफळ बडबड ऐकून घ्यावी लागत नाही आणि माझं लक्ष फक्त कामावर असतं.’
हार न मानता लहान एडिसनने त्याचे प्रयोग चालू ठेवले. अशातच एकदा रेल्वेखाली येणाऱ्या एका लहान मुलाचा जीव एडिसनने वाचवला. तो लहान मुलगा स्टेशनमास्तर मॅकेंझीचा होता. याचं बक्षिस म्हणून त्याने एडिसनला टेलिग्राफ ऑपरेटिंग शिकवले. १५ वर्षाचा एडिसन टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करू लागला आणि सोबतच आपले प्रयोगही. दिवसभर प्रयोगात दंग असल्यामुळे त्याला रात्री झोप येई, म्हणून त्याने टेलिग्राफलाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी.
घरची परिस्थिती बिघडत चालली होती वडिलांची नोकरी सुटली, आई आजारी. यामुळं घरची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एडिसन बोस्टनला आला आणि वेस्टर्न युनियन कंपणीमध्ये नोकरी करू लागला. १८६९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी तो न्यूयॉर्क मध्ये आला. तिथं त्यानं आपला पहिला यशस्वी प्रयोग केला युनिवर्सल स्टोक प्रिंटर बनवण्याचा. त्याने जेव्हा तो विकायचा ठरवलं तेव्हा त्याची किंमत ४हजार डॉलर्स लावली, पण एडिसनचा तो अविष्कार एक अमेरिकन माणसाने चक्क ४० हजार डॉलर्सला विकत घेतला. आता मात्र एडिसनकडे आपली स्वतःची प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुरेसे पैसे होते.
या प्रयोगशाळेत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांने ग्रामोफोनचा शोध लावला. त्याकाळी गाणी ऐकण्यासाठी वापरलं जाणारं हे मशीन अल्पावधीतच लोकप्रिय झालं. एडिसनचं पहिलं प्रेम इलेक्ट्रिसिटी होतं. खरंतर इलेक्ट्रिकं बल्बचा शोध वोडवॉर्ड आणि इवान यांनी लावला, पण अपुऱ्या पैशामुळं त्यांना तो पुढं नेता आला नाही. एडिसनने त्यांच्याकडून या साठीचे सगळे हक्क खरेदी केले आणि आपल्या प्रयोगशाळेत तो याचे प्रयोग करू लागला. अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ मध्ये दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास चालणारा बल्ब बनवण्यात एडिसनला यश मिळालं. त्याचा हा अविष्कार पहाण्यासाठी माणसं येऊ लागली.
त्यांनी नंतर एडिसन एलुमनेटिंग कंपनी चालू केली. जिच्यासाठी फोर्ड यांनी मदत केली आणि ती बनली जनरल इलेक्ट्रिक कंपनी बनली. याच हेन्री फोर्ड यांची माहिती मागील व्हिडीओमध्ये आम्ही सांगितली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
एडिसन आपल्या अनेक प्रयोगात यशस्वी होत होते. घरातील कपाट आवरत असताना त्यांना एक पत्र सापडलं. हे ते पत्र होतं, जे त्यांच्या आईला त्यांच्या शिक्षकांनी दिलं होतं. त्यांनी ते उघडलं, तर त्यात लिहिलं होतं की, ‘तुमचा मुलगा मतिमंद आहे, निर्बुद्ध आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे.’ हे पत्र वाचून एडिसन रडू लागले. आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एडिसन यांनी लिहून ठेवलं आहे कि, ‘एका महान आईनं एका मतिमंद मुलाला अजरामर असा संशोधक बनवलं.’ मित्रहो आजकाल आपण पहातो की, आपल्या मुलाने अमुक एवढे मार्क्स मिळवलेच पाहिजेत म्हणून दबाव टाकणारे अनेक पालक आहेत. अशांसाठी एडिसनची आई बरंच काही शिकवून जाते.
आपल्याला माहित नसेल, पण मोशन पिक्चर म्हणजेच चलतचित्र, त्याचा शोध लावण्यात देखील एडिसन यांचा खूप मोठा वाटा आहे. फ्लोरोस्कोपी मशीन जे Xरे साठी वापरलं जात, ट्रान्समीटर, रिचार्जेबल बॅटरी, अनेक प्रकारचे केमिकल्स असे एक ना अनेक शोध एडिसन यांनी लावले आहेत. एडिसन हे संशोधकासोबतच एक गुंतवणूकदारसुद्धा होते. त्यांनी खाणकाम क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. पहिल्या जागतिक युद्धात देखील अमेरिका सरकारला एडिसन यांची खूप मदत झाली.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. एडिसन यांनी पहिल्या बायकोच्या मृत्यनंतर दुसरं लग्न केलं. त्याना एकूण ६ मुलं आणि विशेष म्हणजे सहाही जण शास्त्रज्ञ होती. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन याने त्यांच्या कंपनीची घोडदौड सांभाळली.
माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. शाळेतून काढलेल्या मुलाबाबत आजकालचे आईवडील, समाज कदाचित मानसिक खच्चीकरण करेल, पण एडिसनच्या आईच्या विश्वासाने याच मतिमंद समजल्या जाणाऱ्या मुलाला १०९३ पेटंट मिळवणारा संशोधक बनवलं. कमी ऐकू येण्याला जीवनातला अडथळा न मानता, उलट त्यामुळे आपण कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकलो, बल्ब बनवण्यात मला १००० वेळा अपयश आलं नाही, तर कोणत्या पद्धतीने बल्ब बनवला, तर तो बनत नाही याचे १००० मार्ग सापडले असा जगावेगळा विचार करणारे एडिसन.
THE IKEA Effect – मित्रांनो Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त का मिळतात किंवा डी-मार्टवाले इतक्या कमी किमतीत वस्तू विकून Profit कसा कमावतात या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे त्या जरा बाजूला ठेऊया. मार्केटमध्ये सध्या IKEA हे नाव चांगलंच गाजतंय! कमी किमतीत मिळणारं Top Quality चं फर्निचर, कितीही मोठ्या फर्निचरला आपल्याच कारमध्ये टाकून घरी नेण्याची सोय, फर्निचरचे Simple आणि Unique Designs या सगळ्या गोष्टी IKEA ने कशा मॅनेज केल्या आणि लोकांना या सगळ्या गोष्टींची चटक कशी लावली; जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये!
IKEA बद्दल तुम्हीसुद्धा कधी ना कधी ऐकलं असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी… IKEA ही जगातली सर्वात मोठी Furniture Manufacturing Company आहे, जिचा जन्म १९४३ साली स्वीडनमध्ये झाला. या कंपनीच्या नावाची स्टोरी पण मजेदार आहे. IKEA च्या I आणि K मध्ये दडलंय कंपनीच्या फाऊंडरचं नाव, म्हणजे Ingvar Kamprad (इंगवार कॅम्परड). E for Elmtaryd हे त्या फार्मचं नाव आहे, जिथं ते लहानाचे मोठे झाले आणि A for Agunnaryd जे की या फार्म जवळचं एक गाव आहे. अशा पद्धतीने बनलं ते IKEA. IKEA सुरुवातीला एकदम छोट्या Scale वर सुरु झालं होतं; पेन्सिल, पोस्ट कार्ड्स सारख्या छोट्या छोट्या गोष्टी आधी ते विकायचे. कंपनी सुरु केल्यानंतर ५ वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली फर्निचर विकण्यासाठी आणि आज ४६० पेक्षा जास्त स्टोअर्सचं हे जाळं पसरलंय ६३ देशांमध्ये.
कुठल्याही फेमस स्टोअरमध्ये लोकं का गर्दी करतात? तिथल्या क्वालिटीमुळे? का त्याच्या प्राईम लोकेशनमुळे? नाही. तर तिथल्या Affordable Pricing मुळे. अर्थात क्वालिटी, लोकेशन या गोष्टी Matter करतातच, पण Pricing समोर कोणती गोष्ट टिकलीये का भाऊ? IKEA Effect च्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होते. इथं मिळणारं फर्निचर हे टॉप क्वालिटीचं तर आहेच, पण त्याचसोबत ते Affordable आहे. आणि Quality आणि Affordability एकत्र आली की होतो… धमाका!
आता येऊया यांच्या फर्निचरकडे. IKEA मध्ये आपल्याला एका सध्या चमच्यापासून ते एका रूमच्या अख्ख्या सेटअपपर्यंत सगळ्या प्रकारचं फर्निचर पाहायला मिळतं. स्टडी टेबल, स्टूल्स, लॅम्प्स, कार्पेट, डिशेस, बाऊल्स, कपाटं, सोफा, बेड, खुर्च्या,आरसे, टी-पॉय असे नाही नाही ते सगळे Product इथं पाहायला मिळतात. या सगळ्याचे डिझाइन्स, व्हरायटी, क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर बघून तुम्ही यातलं एखादं तरी Product होनाही करता करता घेताच.
फर्निचर तर घेतलं पण याची Delivery कधी मिळणार? कधी तो टेम्पो येणार? कधी त्याला आपल्या घराचा पत्ता सापडणार? बर परत फर्निचर आतमध्ये नेताना कशाला घासलं वगैरे तर? सोसायटीवाल्यांच्या नाहीतर घरात बायकोच्या शिव्या खायला लागणार! पण काळजी करू नका; असं काहीच होणार नाही. कारण हे फर्निचर तुम्ही तुमच्या कारमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. काय? तुम्हाला सुद्धा शॉक बसला असेल नाही तो वाला शॉक नाही. तर तुम्ही जे पण फर्निचर चूझ करता त्या फर्निचरला IKEA हे Dissemble करून देतं आणि इथंच येतो तो सगळ्यात महत्त्वाचा IKEA Effect. IKEA चा हा USP आहे म्हणा हवं तर.
आता हा IKEA Effect आपण समजून घेऊया आपल्या घराघरातल्या उदाहरणाने. समजा तुमच्या आईने तुमच्यासाठी उद्या मस्त इडली सांबार बनवण्याचा प्लॅन केलाय. तर त्यासाठी त्या माऊलीनं रात्री पीठ भिजवून ठेवलं, मग सकाळी लवकर उठून कांदा, टोमॅटो चिरून, खोबरं, कोथिंबीर घालून मस्त सांबार बनवलं. मग इडली पात्रात त्या इडल्या उकडल्या. मग एक एक इडली काढून ती तुमच्यासमोर ठेवली आणि हे सगळं करून झाल्यावर ती म्हणाली, “हूssश दमले बाबा खूप!” एवढं सगळं करून झाल्यावर इडल्या खाऊन तुम्ही तिला काय म्हणाले तर, “काय आई कशाला एवढा कुटाणा केला. मी तुला इन्स्टंट पीठ आणि इन्स्टंट सांबार मसाला आणून दिला असता ना!” खाल्ला का इन्स्टंट मार??? तर एवढं सगळं करून आई शेवटी काय म्हणाली दमले बाबा खूप! पण मित्रांनो या दमले बाबामध्येच आईचा खरा आनंद आहे, कारण हे सगळं करून तिला एक Sense of Achievement मिळतो, जो या इन्स्टंट पिठातून मिळणं कधीच शक्य नसतं. IKEA ने सुद्धा या Human Psychology ला ओळखलं आणि आपलं Furniture Dessemble करून देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे झालं काय. जेव्हा Customer घरी जाऊन स्वतःच हे Furniture Assemble करायला लागला, तेव्हा त्याला एक Sense of Achievement मिळाला आणि यातूनच सुरुवात झाली IKEA च्या यशस्वी वाटचालीला.
तुम्हाला ही आजची IKEA स्टोरी कशी वाटली आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. जर लेख आवडला असेल तर लाईक करा Channel ला Subscribe करा जेणेकरून YouTube ला, पण कळेल Market मध्ये नवीन Brand आलाय ते. आणि हो तुम्हाला अजून अशा कोणकोणत्या ब्रॅण्डच्या केस स्टडीज जाणून घ्यायला आवडतील हेही नक्की सांगा. तो पर्यंत Bye Bye.
अश्मयुगात मानवाने चाकाचा शोध लावला. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा तो नवीन गोष्टींचा अविष्कार करत गेला. कबुतरापासून ते निरोपाचा खलिता घेऊन निघालेल्या दूतापर्यंत संपर्क-संवादाची अनेक रूपे आपण पाहिली. आता आपला एखादा छोटासा msg सुद्धा काही क्षणात दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. पण आधी तसं नव्हतं. तेव्हा घोड्यावरून पत्र पोहोचवली जायची. मग हळूहळू घोडागाडी आली, बैलगाडी आली. त्यातून लोकांनी प्रवास करायला सुरुवात केली. प्रवास चालू होता पण सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नव्हती.
आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल!
“बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.
१८७१ मध्ये त्यांनी ऑगस्ट रीटर यांची मेकॅनिकल कंपनी जॉइन केली. मात्र ती कंपनी पहिल्याच वर्षात डबघाईला आली. अशावेळी बेंझ यांनी त्यांची प्रेयसी बर्था रिंगरच्या मदतीने कंपनीला या अडचणीतून बाहेर काढले. बर्थाने लग्नात मिळालेल्या हुंड्यातून कंपनीचे शेअर्स विकत घेतले. २० जुलै १८७२ रोजी कार्ल बेंझने बर्था रिंगरशी लग्न केलं आणि बर्था रिंगरची बर्था बेंझ झाली.
Bertha Benz & Karl Benz
या कंपनीमध्ये त्यांनी नवीन इंजिनाच्या उत्पादनासाठी काम सुरू केले. अधिक दर मिळविण्यासाठी त्यांनी 1878 मध्ये नवीन पेटंटवर काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन बनविण्यावर फोकस केला, खूप अभ्यासानंतर, परिश्रमानंतर त्यांनी ते इंजिन बनवलं, हे इंजिन बनवताना त्यांना अनेकदा अपयश आलं, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ते इंजिन बनवून पूर्ण केलं आणि त्यांना त्याचं पेटंट मिळाले ते २८ जून १८८० मध्ये.
टू स्ट्रोक इंजिनच्या यशानंतर स्पार्क प्लग, क्लच गियर, वॉटर रेडियटर speed regulation system, spark ignition चा शोध लावून त्यांनी त्याचे पेटंट मिळविले. मात्र समाजात एखादा जर चांगलं काम करत असेल, तर त्याचे पाय ओढणारे अनेक लोक असतात. प्रॉडक्टवरील High product cost मुळे मॅनहाइममधील बँकांनी कार्ल यांना joint stock company बनविण्यास भाग पाडले. या घटनेमुळे कार्ल नाखुश होते कारण इतकं जीव ओतून काम करूनही त्याच्याकडे फक्त पाच टक्के शेअर्स आणि संचालक म्हणून माफक पद शिल्लक होते. आणि सर्वात वाईट म्हणजे, नवीन उत्पादने तयार करताना त्याच्या कल्पनांचा विचार केला जात नव्हता, म्हणूनच कार्ल यांनी एका वर्षानंतर, 1883 मध्ये त्या कॉर्पोरेशनमधून माघार घेतली.
कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.
कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.
Benz Patent Motorwagen
जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का? इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.
आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.
जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.
Bertha Benz and the first road trip in history
Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.
1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे वेगळं सांगायलाच नको.
Automobile क्षेत्रातल्या या सम्राटाचा प्रवास ४ एप्रिल १९२९ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी थांबला, पण आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना आजही the father of the car किंवा “father of the automobile industry” म्हणून ओळखले जाते.
तर ही होती कार्ल बेंझ यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसल्यास लगेच सबस्क्राईबसुद्धा करा.
भारतातली पहिली शिपयार्ड कंपनी, पहिली विमान कंपनी सोलापुरात जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाने चालू केली असं सांगितलं तर ते अनेकांना विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. त्या माणसाचं नाव आहे वालचंद हिराचंद दोशी.
२३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला
Walchand Hirachand Doshi
तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.
या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.
कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.
काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.
वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.
वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.
1919 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर जलवाहतुकीचं महत्त्व वाढू लागलं. ही संधी लक्षात घेऊन ग्वाल्हेरचे राज्यकर्ते शिंदे यांच्याकडून वालचंद यांनी एस एस लॉयल्टी ही बोट विकत घेतली आणि मालवाहतूक चालू केली. ब्रिटिशांच्या मक्तेदारीलाच आव्हान दिल्यामुळे त्यांच्यापुढे समस्यांचे अनेक डोंगर ब्रिटिश कंपन्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना खूप तोटा व त्रास सहन करावा लागला. वालचंद यांची ही कंपनी परदेशी कंपन्यांनासोबत दराबाबत चांगलीच स्पर्धा करत होती. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन या नावाने चालू केलेली ही भारतातली पहिली जलवाहतूक कंपनी.
SS Loyalty, 5 April 1919
5 एप्रिल 1919 रोजी एस एस रॉयल्टी या बोटीने मुंबई ते लंडन हा पहिला प्रवास पूर्ण केला आणि म्हणूनच पाच एप्रिल हा दिवस नॅशनल मेरीटाईम डे म्हणजेच समुद्री दिन म्हणून साजरा केला जातो. १९५० पर्यंत वालचंद या कंपनीचे प्रमुख होते. तोपर्यंत किनारी भागात केल्या जाणाऱ्या वाहतुकीचा २१ टक्क्यांहून अधिक भाग वालचंद यांच्या कंपनीने काबीज केला होता. महात्मा गांधीनी स्वतः हरिजन आणि बहिष्कार या वृत्तपत्रांमधून पहिली स्वदेशी कंपनी असा या कंपनीचा उल्लेख केला होता.
पुढे 1940 मध्ये विशाखापट्टणम येथे त्यांनी सिंधिया शिपयार्ड ही जहाजबांधणी कंपनी सुरु केली. ही देखील पहिली स्वदेशी शिपयार्ड कंपनी ठरली. या कंपनीने जलसा ही पहिली स्वदेशी बोट बांधली. पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९६१ साली याचे राष्ट्रीयीकरण होऊन ती हिंदुस्तान शिपयार्ड कंपनी म्हणून नावारूपाला आली.
1939 साली वालचंद यांची भेट अमेरिकेतील विमान उत्पादकांशी झाली. त्यांच्याकडून विमान निर्मितीचे कौशल्य शिकल्यानंतर म्हैसूर संस्थानच्या मदतीने त्यांनी बंगळूरु येथे पहिली विमान निर्माण करणारी कंपनी बनवली. १९४१ मध्ये सरकाराने त्याचा एक तृतीयांश भाग विकत घेतला. पुढे 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने संपूर्ण कंपनी विकत घेतली आणि हिंदुस्थान एअरक्राफ्ट हे नाव बदलून त्याला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं नाव दिलं. आजही तिथे जागतिक दर्जाची विमाने बनतात.
१९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.
Premier Padmini
आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.
ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.
शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.
तर ही होती आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे शिल्पकार वालचंद हिराचंद दोशी यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
आज आपण सर्वजण कारमधून फिरतो, परंतु 100 वर्षांपूर्वी केवळ अति श्रीमंत लोकच कार वापरू शकत असत. पण एक व्यक्ती होती जिने ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणली आणि कार सामान्य लोकांच्या दारापर्यंत पोचवली. स्वतःच्या हिंमतीवर गरिबांना चारचाकी गाडीचं स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणाऱ्या त्या अवलियाचं नाव आहे हेन्री फोर्ड…
३० जून १८६३ रोजी अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका छोट्या शहरात हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या हेन्रीला ४ भावंडं. घरची परिस्थिती बेताची. शेतातून मिळेल तेवढंच उत्पन्न. अमेरिकेतला तो काळ असा होता जेव्हा शेती ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने केली जात होती. दिवसभर शेतात काम करणं लहानग्या हेन्रीला पसंत नव्हतं. भावंडांसोबत शाळेत जाणारा हेन्री ८ व्या ग्रेड पर्यंत शिकला. शालेय शिक्षणात जास्त रस नसणाऱ्या हेन्रीने माध्यमिक शिक्षण काय केलं नाही. बुक किपींगचा एक कोर्स करायला त्यानं ऍडमिशन घेतलं.
Young Henry Ford
१२ वर्षाच्या हेन्रीला त्याच्या वडिलांनी हातात घालायचं घड्याळ भेट दिलं… हेन्रीने ते घड्याळ खोललं आणि परत जोडलं. जगातली पहिली आधुनिक कार तयार करण्याची हीच होती पहिली पायरी… जिथं त्याच्या वयाची मुलं मैदानात खेळ खेळायची तिथं हेन्री आसपासच्या घरातली बिघडलेली घड्याळ दुरुस्त करायचा.
त्या काळात वाहतुकीसाठी घोडागाडीच वापरली जायची. मग ती सामानाची असो किंवा माणसांची. शेतात वडिलांना मदत करत असताना हेन्रीने पहिल्यांदा एक असं मशीन पाहिलं, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चक्क घोड्याशिवाय जात होतं. पाण्याच्या वाफेवर चालणारं, शेतात वापरलं जाणारं हे मशीन म्हणजे हेन्रीसाठी आश्चर्य होतं. समोर दिसणारं हे मशीन म्हणजे हेन्रीचा हेन्री फोर्ड होण्यासाठी एक निमित्त आहे हे बहुतेक काळ ओळखून होता. मशीनवर प्रेम कणाऱ्या हेन्रीने तेव्हाच ठरवलं कि आपण देखील अशी गाडी बनवायची जी घोड्यांशिवाय चालेल.
वयाच्या १६ व्या वर्षी हेन्री यांच्या आईच निधन झालं. आईवर अतिशय प्रेम करणारे हेन्री आतून तुटले होते. आईच्या निधनानंतर वडिलांनी त्यांना सांगितलं कि तू आता शेतात कामाला सुरवात कर, पण शेतीच्या कामात अजिबात रस नसणाऱ्या हेन्रीने सरळ घर सोडून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.
हेन्री यांनी सरळ अमेरिकेतील डेट्रॉईट शहर गाठलं. अनेक उद्योगधंदे जिथं जन्माला येत होते असं डेट्रॉईट शहर म्हणजे हेन्री सारख्या होतकरूंसाठी संधीच भांडारच होत.
घोड्याशिवाय चालणारी ती वाफेवरची गाडी काही हेन्रीच्या डोक्यातून जात नव्हती. डेट्रोईट मध्ये गेल्यावर त्यांनी स्टिम इंजिन बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि स्टीमवर चालणारी ही गाडी खूपच जड आहे. जर आपल्याला सर्वसामान्य वापरतील अशी गाडी बनवायची असेल, तर वाफेवर चालणारं इंजिन वापरून काहीच उपयोग नाही. कारण हे इतकं तापतं कि ते रोजच्या वापरात येऊच शकणार नाही.
सर्वसामान्यांना वापरता येणारी गाडी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. स्टीम इंजिनला पर्याय शोधताना त्यांच्या वाचनात जर्मन इंजिनर निकोलस ऑटो यांनी बनवलेलं गॅस इंजिन आलं. युरोपात थोड्या फार प्रमाणात वापरलं जाणार हे इंजिन अमेरिकेसाठी मात्र नवीन होतं.
१८८६ मध्ये आपल्या प्रयत्नातून त्यांनी गॅस इंजिन वापरून एक गाडी बनवली जिला त्यांनी Ford Quadricycle असं नाव दिल. गाडीचा पहिला डेमो जेव्हा त्यांना द्यायचा होता तेव्हा बाहेर खूप पाऊस पडत होता. पण आपल्या प्रयत्नांना सफल झालेलं त्यांना पाहायचं होतं. पावसाची पर्वा न करता रात्रीच्या वेळी त्यांनी आपली गाडी बाहेर काढली.
पुढं १८९६ मध्ये हेन्री फोर्ड यांची भेट थॉमस एडिसन यांच्या सोबत झाली. हेन्री यांनी केलेलं काम त्यांना खूप आवडलं. त्यांच्या या संशोधनावर एडिसन खुश झाले. यातुन प्रेरणा घेऊन हेन्री फोर्ड यांनी आपल्या नोकरीचा राजीमाना दिला आणि त्यांनी १८९९ मध्ये स्वतःची Detroit Automobile Company स्थापन केली. पण यातून तयार होणाऱ्या गाड्या कमी दर्जाच्या आणि जास्त महाग होत्या. त्यामुळं १९०१ मध्ये हेन्रीनी ती कंपनी बंद केली.
Thomas Edison & Henry Ford
पुढे डेट्रॉईट ऑटोमोबाईल कंपनीतील त्याचे सहकारी मर्फी आणि इतर भागीदारांसोबत 30 नोव्हेंबर 1901 रोजी हेन्री फोर्ड कंपनीची स्थापना केली. पण तिथं देखील इतर सहकाऱ्यांसोबत मतभेद झाल्याने आपलं नाव असणारी ती कंपनी त्यांनी सोडून दिली.
सलग २ वेळा आलेलं अपयश, जवळची संपत चालली बचत अशा परिस्थितीत हार न मानता फोर्ड यांनी गुंतवणूकदार असणारे माल्कन यांच्या सोबत १६ जून १९०३ रोजी फोर्ड मोटार कंपनी चालू केली.
कंपनी तर चालू झाली पण ती लोकांपर्यंत पोहचणार कशी? यासाठी फोर्ड यांनी अमेरिकेत भरल्या जाणाऱ्या कार रेसिंग स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मॉडेल ९९९ हे कार रेसिंग मॉडेल तयार केलं. ही रेस जिंकून त्याचं हे मॉडेल तर हिट ठरलंच सोबत कंपनीचं नावसुद्धा झालं.
त्या काळच्या चारचाकी गाड्या इतक्या महाग होत्या की श्रीमंत सुद्धा त्या घेताना विचार करत होते. अश्या या काळात हेन्री फोर्ड यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी गाडी बनवण्याचे प्रयत्न काही त्रुटी असल्यामुळे फेल गेले. पण १९०८ मध्ये त्यांनी बनवलेल्या मॉडेल-T ने मात्र जगाला वेड लावलं. फक्त काळ्या आणि डार्क ब्लु रंगात येणारी गाडी हळू हळू फक्त काळ्या रंगात मिळू लागली. या गाडय़ांचे स्टिरिंग व्हील डावीकडे होते. गाडी चालवायला सोपी होती आणि दुरुस्त सुद्धा लवकर होत असे.
Henry Ford Model-T
पहिल्या वर्षी कंपनीने १७०८ गाड्या विकल्या. गाडीची किंमत होती ९०० डॉलर. १९१४ मध्ये या गाडीच्या सेलने २,५०,००० चा टप्पा ओलांडला. पुढे गाडीची किंमत ३६० डॉलर्स वर आल्यावर तर गाडीचा सेल ४,७०,००० पर्यंत गेला. खऱ्या अर्थानं हेन्री फोर्ड यांची ही मॉडेल T गाडी म्हणजे विसाव्या शतकातली सगळ्यात सेन्सेशनल गाडी ठरली. एक वेळ तर अशी आली कि जिथं नजर जाईल तिथं फक्त हीच काळी गाडी दिसायची.
सर्वोत्तम ज्ञान असणारे कर्मचारी आपल्या कंपनीत असले पाहिजेत म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला ५ डॉलर पगार घोषित केला. जिथं दिवसाला २ डॉलर पगार मिळायचा तिथं इतका पगार म्हणजे कर्मचारांसाठी सोनंच होत. कामाचे दिवस आठवड्याचे ५ च करून त्यांनी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढेल याकड लक्ष दिलं.
सतत येणाऱ्या अपयशाला नमवत प्रत्येक समस्येतून नवीन संधी निर्माण करणारे हेन्री फोर्ड खऱ्या अर्थाने आधुनिक गाड्यांचे जनक आहेत. १०८ वर्षाची फोर्ड मोटार कंपनी ही अनेक चढ उतारानंतर आज ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे.
आपल्या आईवर अतिशय प्रेम करणाऱ्या हेन्री फोर्ड याना तितकीच प्रेमळ आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी पत्नी त्यांना लाभली… तीच नाव होत क्लारा. आधुनिक युगातील चारचाकी गाड्यांमध्ये क्रांती करणाऱ्या या अवलियाने ७ एप्रिल १९४७ रोजी आपल्या पत्नीच्या खांद्यावर जीव सोडला.
चारचाकी गाडी हा श्रीमंती थाट न राहता सामान्य माणसाच्या आवाक्यातील व्हावे यासाठी फोर्ड यांनी अथक प्रयत्न केले. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता आणि परिस्थिती कशी बदलता हे महत्वाचं असतं. शेतकऱ्याच्या या मुलानं ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून याच ज्वलंत उदाहरण आपल्यापुढं ठेवलं आहे.
तर ही होती हेन्री फोर्ड यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.यासारख्याच अनेक उद्योजकांच्या जीवनकथा ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेलला आताच सबस्क्राईब करा.
एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही, तर तो एका समाजाला उभारी देतो. आणि त्यात जर तो उद्योग उभारण्यामागे हेतूच समाजाची प्रगती असेल मग तर, समाज प्रस्थापित सर्व जुनाट रूढी परंपरा मोडून एका नव्या पर्वाला सुरुवात करतो. असंच काहीसं कार्य केलं आहे, पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी.
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९रोजी तेव्हा महाराष्ट्रात असणाऱ्या बेळगावमधील गुर्लहोसूर येथे झाला. पांडित्याचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांचं मन काय त्यात लागायचं नाही. सतत कानावर पडणाऱ्या वेद आणि मंत्रांऐवजी त्यांचं मन यंत्रांत, चित्रात रमत होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पंडितांच्या मुलानं पांडित्यच करायचं या मानसिकतेच्या त्या काळात लक्ष्मणरावांनी बंडखोरी करत मुंबईच जे जे स्कूल ऑफ आर्टस् गाठलं. तिथं त्यांनी पेंटिंग आणि मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं मन त्यांच्या आवडत्या विषयात म्हणजेच पेंटिंगमध्ये लागत होतं, तोच त्यांना सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा जाणवू लागला. पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या आजारामुळे त्यांनी पेंटिंगमधलं आपलं लक्ष पूर्णपणे मेकॅनिकल ऑब्जेक्ट डिझाईन म्हणजेच यंत्रांचं चित्र काढण्याकडे दिलं.
यामुळे मूलतः यंत्रांची आवड असणारे लक्ष्मणराव यंत्रांच्या अधिकच जवळ गेले. त्यांनी यांत्रिक चित्रकलेमध्ये इतकं प्राविण्य मिळवलं कि, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTIमध्ये ते मेकॅनिकल ड्रॉईंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महिना ४५ रुपये पगारावर तर रुजू झाले. ती वेळ अशी होती, जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सायकल वापरायला सुरुवात केली होती. ते यंत्र बघून लक्ष्मणरावांनी सरळ त्याची डीलरशिप घेतली. मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत. तिथं त्यांचा भाऊ रामूअण्णा ती सायकल ७०० ते हजार रुपयांना विकत होते, तर तिथल्या लोकांना सायकल शिकवायचे १५ रुपये घ्यायचे.
१८८८ मध्ये लक्ष्मणरावांनी आपली नोकरी सोडली आणि बेळगाव गाठलं. तिथं त्यांनी आणि रामूअण्णांनी मिळून एक छोटं सायकल रिपेअरचं दुकान चालू केलं आणि व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. त्यांचा हा छोटासा व्यवसाय चांगला चालू होता. तोच महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून त्यांचं दुकान काढून टाकलं.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याची त्यांची इच्छा होती. १९०१ मध्ये त्यांनी त्याकाळच्या औरंगाबाद स्टेटमध्ये एक छोटं दुकान चालू केलं. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. त्याचबरोबर ते शेतीसाठी लागणारी रहाट, चरख आणि लोखंडाचा नांगर बनवत होते. पण त्यावेळच्या शेतकऱ्यांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की लोखंडाचा नांगर वापरला, की माती विषारी बनते आणि तिची उत्पादनक्षमता कमी होते. शेतकऱ्यांच्या मनातला हा गैरसमज दूर करायला लक्ष्मणरावांना तब्ब्ल २ वर्ष लागली, नंतर मात्र शेतकऱ्यांनी तो नांगर स्वीकारला.
लक्ष्मणरावांना आपला व्यवसाय वाढवायचा होता, पण दिशा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा दरबार गाठला. दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी लक्ष्मणरावांच्या अंगची कला आणि त्यांचं यंत्रांप्रती असणारं प्रेम पाहून संस्थानाचा नकाशा मागवून हवी ती जागा निवडायला सांगितलं. लक्ष्मणरावांनी कुंडल रोडजवळील ३२ एकर ओसाड जमीन निवडली. राजांनी व्यवसाय उभारण्यासाठी १० हजार रुपयेसुद्धा दिले.
कुंडलजवळची ही जमीन म्हणजे निवडुंगांनी गच्च भरलेलं ओसाड माळरान. तिथं राहायचे ते भयानक विषारी असे साप आणि सरडे. या भकास माळरानावर औद्यगिक नगरीरुपी नंदनवन उभं करायचं स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मणराव आणि रामूअण्णा कामाला लागले.
कुंडल रोड रेल्वे स्टेशन
किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन
त्यावेळी देखील जास्त शिकलेली माणसं देखील गोऱ्यांच्या दरबारी नोकऱ्या करत. आपल्याला जास्त शिकलेल्या माणसांपेक्षा, ज्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा असेल अशी माणसं पाहिजेत या हेतूने घेऊन दोघे भाऊ माणसं एकवटण्याच्या कामाला लागले. रामूअण्णांनी स्वतः जातीने या नगरीचं नियोजन आणि प्रशासन पाहिलं. शंभूराव जांभेकर हे प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले, तर के.के. कुलकर्णी हे मॅनेजर म्हणून. मंगेशराव रेगे यांनी क्लार्क आणि अकाउंट विभाग पाहिला, तर इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेल्या अनंतराव फाळणीकर यांनी इमॅजिनेटिव्ह इंजिनिअरिंग विभाग सांभाळला. लक्ष्मणरावांचा माणुसकीवर इतका विश्वास होता कि, तुरुंगातून सुटलेल्या तुकाराम रामोशी आणि पिऱ्या मांग यांना या नगरीच्या सुरक्षिततेची जबाबदारी दिली. अशा प्रकारे अनंत अडचणींवर उभी राहत होती ती ‘उद्यम नगरी’ म्हणजेच किर्लोस्करवाडी!
किर्लोस्करवाडी हे भारतातलं जमशेदपूर नंतरचं दुसरं औद्योगिक शहर आपल्या महाराष्ट्रात उभं राहत होतं. जमशेटजी टाटांप्रमाणेच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला. पहिल्यांदा आपल्या ३० कर्मचाऱ्यांची कुटुंबासहित राहायची सोय करत किर्लोस्करवाडी वाढत होती. लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. लक्ष्मणरावांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या. मोठे रस्ते, प्रशस्त घरे, उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. प्रखर जातीवाद आणि स्पृश्य-अस्पृश्यता असणाऱ्या त्या वेळच्या समाजात किर्लोस्करवाडी हे असं ठिकाण होतं, जिथं कोणताही जातीभेद पळाला जात नव्हता. जिथं फक्त एकच जात होती माणुसकीची. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली.
१५ जानेवारी १९२० मध्ये लक्ष्मणरावांची कंपनी कागदोपत्री रजिस्टर झाली आणि उदयाला आली ती किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची सुद्धा निर्मिती केली. एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली.
लक्ष्मणरावांचं लग्न राधाबाई यांच्याशी झालं होतं. यंत्र हेच पाहिलं प्रेम असणाऱ्या लक्ष्मणरावांचा संसार राधाबाई यांनी नेटाने फुलवला. लक्ष्मणरावांना ५ मुलं. ४ पुत्र आणि एक कन्या. यातील मोठे शंतनुराव आणि पुतण्या यांना लक्ष्मणरावांनी शिकायला अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology म्हणजेच MIT मध्ये पाठवलं. तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुरावांनी किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडला जणू काही पंखच दिले.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लक्ष्मणराव स्वदेशीचे खंदे प्रचारक होते. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट देऊन त्यांच्या कार्याचा भरभरून गौरव केला. लक्ष्मणरावांची किर्लोस्करवाडी ही यंत्रांसोबतच क्रीडा कला यामध्ये सुद्धा संपन्न होत होती. क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ तिथं खेळले जायचे, किर्लोस्करवाडीचा रंगमंच हा बाबुराव पेंटर यांनी बनवलेला त्याकाळचा सर्वात सुबक आणि सुनियोजित रंगमंच होता. हा असा रंगमंच होता जिथं फक्त स्त्रिया आपल्या कला सादर करायच्या आणि ही त्याकाळची अत्यंत क्रांतिकारी गोष्ट होती. किर्लोस्करवाडीचा स्वतःचा प्रिंटिंग प्रेस होता, जिथं किर्लोस्कर खबर नावाने एक वृत्तपत्र चालत होतं, तर स्त्री नावाने निघणारं मासिक हे खास स्त्रियांसाठी चालवलं जात होतं. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत आधुनिक पद्धतीने शेती करायला देखील चालना दिली. तिथली जमीन पाहता त्यांनी द्राक्ष पिकाचं उत्पन्न घेऊन कित्येक शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली.
लक्ष्मणरावांचं व्यापाराचं तंत्र अगदी साधं होतं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवायचं आणि व्यवसाय वाढवायचा. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बोलताना ते नेहमी तुमची कंपनी असा उल्लेख करत. किर्लोस्करवाडीत होणारे सण समारंभ, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, प्रत्येक ठिकाणी केला जाणारा कर्मचाऱ्यांचा विचार यामुळं इथल्या प्रत्येक माणसाला ही कंपनी त्याची वाटायची. किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड हळू हळू पुणे, बंगलोर येथे देखील पसरू लागली.
सायकलच्या डिलरशिप पासून सुरु झालेला लक्ष्मणरावांचा प्रवास कुट्टी मशीन, ऊस तोडणी मशीन, लेथ मशीन, टेक्स्टाईल मशीन, भुईमूग सोलणी मशीन, हॅन्ड पंप, हॉस्पिटल फर्निचर करत वाढत गेला. लक्ष्मणरावांनी रचलेल्या किर्लोस्करवाडीच्या पायाला मुलगा शंतनुराव यांनी त्याला भक्कम आधार दिला, तर पुढच्या पिढ्यांनी त्याच्यावर कळस चढवला. भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं डिझेल इंजिन, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशिनसुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं. आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्यासुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवते.
किर्लोस्करवाडीचा ४०वा वर्धापन दिन
लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935मध्ये नेमण्यात आले. किर्लोस्करवाडीच्या ४० व्या वर्धापन दिनी ८१ वर्षाचे लक्ष्मणराव आणि ९१ वर्षाचे रामूयाण्णा किर्लोस्करवाडीला भेट द्यायला आले. आजारी असणाऱ्या लक्ष्मणरावांना त्यांचा मुलगा पुण्यात औषधोपचारासाठी बोलवत होता, तेव्हा ८१ वर्षाच्या या तरुणाचे उद्गार होते कि, “जोपर्यंत पहिलं ऑइल इंजिन तयार होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही.” अखेरीस डिसेंबर १९४८ ला पाहिलं इंजिन तयार झालं आणि लक्ष्मणराव पुण्याला गेले. बंगलोर वरून पुण्याला जाताना त्यांनी आपलं विमान किर्लोस्करवाडीवरून घ्यायला सांगितलं. एका ओसाड जमिनीला यंत्र, तंत्र आणि माणसांच्या साहाय्यानं जिवंत झालेलं पाहून ते भरून पावले. तिथल्या उंच इमारती, रस्ते, कंपन्या, माणसांची वर्दळ हे सारं डोळ्यात भरून अभिमानाने ते पुण्यात आले.
आज किर्लोस्कर ग्रुप ७० देशांत पसरलेला असून ग्रुपच्या २६ कंपन्यांमध्ये १८००० हून अधिक जण काम करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये; मग ते दुबईतील बुर्ज खलिफा असो की अमेरिकेतील न्यू वर्ल्ड ट्रेड सेंटर… सिंगापूरचं मरीना बे असो की ऑस्ट्रेलियातील ओपेरा हाऊस… तिथे किर्लोस्करांचेच पंप तुम्हाला बघायला मिळतील…. एक भारतीय म्हणून आणि त्याठी एक मराठी माणूस म्हणून ही आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
‘काम करत राहा, प्रयत्न कधीही सोडू नका. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल’ हे सांगणाऱ्या भारताच्या या ‘हेन्री फोर्ड’ने अखेरीस २६ सप्टेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २० जून १९८९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले. या महान उद्योजकाचा आदर्श घेऊन भविष्यात हजारो मराठी उद्योजक तयार होतील अशी खात्री आहे.
तर ही होती लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तो काळ होता १८४०चा. भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रज भारतीयांची सर्वच बाबतींत पिळवणूक करत होते. समाज या अन्यायाविरुद्ध लढत होता, तर यातील एक भारतीय देशाच्या अर्थव्येवस्थेचा पाया रचत होता. ते द्रष्टे भारतीय म्हणजे टाटा ग्रुपचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा.
गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.
नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.
आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.
याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.
१८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.
Empress Mill, Nagpur
Svadeshi Mill, Mumbai
आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.
आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.
आपल्या अपमानाचा बदला म्हणून भारतीयांसाठी एक भलंमोठं हॉटेल बांधायचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्या काळातील ४ कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले ‘दि ताजमहल पॅलेस’ हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते! हे जगविख्यात हॉटेल कसं उभं राहिलं याची कहाणी आम्ही एका व्हिडीओमध्ये सांगितली आहे. त्याची लिंक खाली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
मुंबईची वाढती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ला खोपोली येथे जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. खंडाळा, लोणावळा येथे पडणारे पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइपलाइन टाकून आणायचे, तेथे जनित्राद्वारे वीज निर्माण करायाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधण्यात आली. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपांतून पाणी येत आहे व ८००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. हे काम टाटांच्या ७ हजार लोकांनी ४ वर्षात पूर्ण केले. १९११ साली दळणवळणाची साधने, टेक्नॉलॉजी, परिस्थिती आणि इतर सोयींचा विचार केला, तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.
Tata Power hydro plant, Khopoli
ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला.
भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्विख्यात आहे.
Indian Institute of Science (IISc), Bangalore
अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.
प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.
कर्मचार्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’
जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.
जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
१९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.
शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.
तर ही होती जमशेदजी टाटा यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.