Category: शेती

  • कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

    कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

    आजकाल मोठ-मोठे पदवीधर, सुशिक्षित वर्गातील लोक नोकरीपेक्षा शेती करण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. उत्तम पद्धतीची आधुनिक शेती करून चांगलीच कमाई देखील कमवत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अशाच एका आधुनिक पिकाबद्दल बेबी कॉर्न या पिकाबद्दल.

    कॉर्न मंच्युरीयन, चिली, पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे सगळेच पदार्थ प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. त्यामुळे बेबी कॉर्नची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी आपल्या घरापासून ते 5 स्टार हॉटेल्स, पिझ्झा, पास्ता चेन आणि छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील कॉर्नला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

    तांदूळ आणि गहू या पिकांनंतर मका हे भारतातील सर्वात जास्त लागवडीचे पीक म्हणून ओळखले जाते. याच मक्याच्या अपरिपक्व कोंबांना बेबी कॉर्न असे म्हणतात. लागवडीनंतर दोन महिन्यांच्या आताच बेबी कॉर्न तयार होतात. बेबी कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वं असतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायद्याचे मानले जाते, पण केवळ आरोग्याच्याच दृष्टीने नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर यातून खूप फायदा मिळू शकतो. एका एकरात बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो. फक्त 15 हजारांच्या गुंतवणुकीतून एकरी चार ते सहा क्‍विंटल उत्पादन घेऊन तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. याचे उत्पादन तुम्ही वर्षातून केवळ एकदाच नाही तर 4 वेळा घेऊ शकता. फक्त इतकेच नव्हे तर तुम्हाला यातून दुप्पट नफा मिळवता येऊ शकतो. म्हणजे बेबी कॉर्नच्या कापणीनंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो, तो जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येऊ शकतो. शेतकरी त्याचा हिरवा चारा म्हणूनही वापर करू शकतात किंवा कापून सुकवल्यानंतर सुकी पेंडही बनवता येतो. मक्याचे खाद्य हे जनावरांसाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. त्याचा चारा जनावरांना दिल्याने त्यांची दूध उत्पादन क्षमताही वाढते.

    फायदेमंद शेतीसाठी बेबी कॉर्न हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेबीकॉर्नचे उत्पादन घ्यायचे असेल मात्र तुम्हाला पैशांचा प्रश्न भेडसावत असेल, तर शासनाकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. भारत सरकार मका आणि बेबी कॉर्नच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी कर्ज उपलब्ध करून देते. याच्या सहाय्याने तुम्ही बेबी कॉर्नची शेती करून लाखोंनी पैसे कमवू शकता.

    अशा या बेबी कॉर्न लागवड ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


    आणखी वाचा

  • काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

    काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

    शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा जोड-धंदा म्हणून स्वतःच्या सुपीक जागेत बी-बियाणे पेरून केलेला व्यवसाय म्हणजे शेती होय. कोणतही पीक पिकवायचं म्हटलं की, पहिले शेतीची मशागत, नांगरणी, कोळपणी असे बरेच टप्पे पार करावे लागतात. आज आपण ऐषोरामात जीवन जगतो, चांगलं-चुंगलं खातो. त्यामागे शेतकरी राजाचे बरेच कष्ट, त्यांची मेहनत असते. मात्र हल्ली एसआरटी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीला थोडा आराम मिळाला आहे. पण नेमकं हे एसआरटी तंत्र काय आहे? याबद्दल अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे बरेचजण पारंपरिक शेतीतच अडकले आहेत. चला तर जाणून घेऊ एसआरटी टेक्नॉलॉजीबद्दल.

    एसआरटी म्हणजेच सगुणा राईस तंत्र. या तंत्रज्ञानालाच विनामशागतीची किंवा शून्य मशागतीची शेती असं देखील म्हणतात. विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे ज्यात नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही यात करावं लागत नाही. याउलट पारंपरिक शेती पद्धतीत जमिनीची नांगरणी किंवा पूर्वमशागतीची कामे केली जातात. कोकण आणि विदर्भातील भात शेतीत हे नवे तंत्र वापरले जाते.

    या पद्धतीने शेती करण्यासाठी पाहिल्यांदा गादीवाफे तयार करावे लागतात. गादिवाफे म्हणजे २० सेमी उंची, १ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेऊन वाफे बनवावले जातात. दोन्ही गादी वाफ्यांत ६० सेमी ते ७५ सेमी. रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. गादीवाफे तयार करण्यासाठी सुरवातीला एकदाच नांगरणी करावी लागते. वाफे तयार केल्यावर त्यावर पीक टोकन पद्धतीने पेरले जाते. पाऊस जास्त झाला तर मारलेल्या चरांवाटे पाण्याचा निचरा करता येतो आणि जर पाऊस कमी झाला तर वाफ्यांमध्ये पाणी साठवलं जातं आणि किमान 8 ते 10 दिवस ते पाणी तग धरून राहतं. आता प्रश्न उभा राहतो तो मशागतीचा. शेतीतील मशागत करण्यासाठी गडी लोक दिवसाला 350 ते 400 रुपये घेतात.

    पीक म्हटलं की तण हे आलंच. शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या तणनाशकांचा उपयोग करून तणाचा बिमोड करता येतो. त्याबरोबरच पिकांच्या काढणीचीही एक विशेष पद्धत आहे. पारंपरिक शेतीत आपण बऱ्याच वेळी पीक उपटून काढतो, मात्र यामध्ये कोणतही पीक हे कापावच लागतं.

    पिकाचे मूळ जिथे आहे तिथे कुजले तर आपल्या जमिनीतला कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. होणारं बाष्पीभवन ते थांबवून ठेवतं. म्हणून एसआरटी तंत्रज्ञानात पीक मुळासकट काढले जात नाही. सेंद्रिय खत, कर्ब जमिनीत तयार होण्यास मदत होते आणि मुळाच्या शोषणाद्वारे हवा जमिनीत जाते आणि गादीवाफा भूसभुशीत राहतो. एकदा तयार केलेला गादीवाफा किमान १५ ते २० वर्ष टिकतो. गादीवाफा निर्मितीवेळी एकदाच शेणखताचा वापर करतात. या पद्धतीत खर्चात आणि कष्टात दोन्हीत बचत होते. ही पद्धत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाफ्यांमध्ये पाणी साठवता येते.

    विनामशागतीच्या शेतीचे फायदे काय आहेत?

    तर…..

    मातीची धूप कमी होण्यास मदत होते. तसेच जमिनीचा पोत कडक होण्यापासून बचाव होतो. गेल्या तीन वर्षाच्या अभ्यासाच्या निकषानुसार विनामशागत शेतीमुळे 80% जमिनीची धूप थांबली आहे. कापलेले पीक आणि तणांची मुळं जमिनीत कुजल्याने निर्माण होणाऱ्या पोकळीत हवा खेळती राहते.

    गादीवाफ्यात जसजसे सेंद्रिय घटक वाढतील, त्या प्रमाणात गांडुळांची संख्या वाढते आणि त्याचा शेतीला फायदाच होतो. आपण विना-मशगतीच्या शेती कशी करतात त्याचे फायदे काय आहेत? हे सगळं आपण पाहिलं, पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात कशी झाली?  नव्वदच्या दशकात शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी नांगरणीविणा शेती होऊ शकते हा विचार मांडला.

    त्यानंतर कोकणातील कृषीभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी भात शेतीत विनानांगरणीच्या शेतीचं तंत्र अंमलात आणलं. त्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग चालू केला. त्यावेळी चिखलणी न करता त्यांनी गादीवाफे तयार केले, भाताचे टोकन तयार केले, टोकन केलेल्या भाताचं पीक चांगलं येतं असं त्यांच्या लक्षात आलं. 2014 ते 15 च्या दरम्यान या तंत्रज्ञानात चांगले रिजल्ट्स आल्यावर कृषी विभागानं हे तंत्र राज्यभर विस्तारण्यासाठी सुरुवात केली.

    अशा या एसआरटी टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    आपल्या शेतात सुंदर सुंदर मोती, त्या मोत्यांना असलेली वाढती मागणी आणि त्यातून मिळणारे भरमसाठ पैसे, वा..! तुम्ही थोड्याच दिवसात लखपती होऊ शकता. हो हो पण जरा थांबा. कसंय स्वप्न बघायला काहीच लागत नाही ओ, मात्र ती स्वप्नं पूर्ण करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यात तुम्ही मोत्यांची शेती करणार म्हटल्यावर मेहनतीशिवाय पर्यायच नाही.

    पहिल्यांदा आपण पाहूया ही शेती कशी केली जाते? त्यातून कसा फायदा मिळतो? याचं मार्केटिंग कसं केलं जातं?

    मोत्यांची शेती हा मत्स्यपालन प्रकाराचाच भाग आहे. यामध्ये ऑयस्टर पाळले जातात. ऑयस्टर म्हणजेच कालवे. हा शिंपल्यांचाच एक प्रकार असतो. कोकण्यात या कालव्यांची मस्त झणझणीत चटणी किंवा कालवं मसाला बनवलं जातं, त्याची चव आहा अप्रतिम. त्यात ते मस्त चुलीवर बनवलं असेल, तर मग काही विषयच नाही. स्वर्ग सुख! एकदा तुम्ही हे कालवं मसाला खाऊनच बघा. sorry sorry मी चुकून जरा मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये घुसतिये… तर आपला मुद्दा आहे शेतीचा. हा तर, हे जे ऑयस्टर असतात म्हणजेच काल. ते गोळा करून त्यावर शस्त्रक्रिया करून, रोपन करून मग मोती गोळा केले जातात.  

    ही शेती करण्यासाठी 20*30 आकाराचा तलाव लागू शकतो. त्याची खोली 5-6 फुट खोल असावी लागते. तलाव उभा करण्यास जर पुरेशी जागा किंवा आर्थिक सोय नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एक टाकी बनवून मोत्यांची शेती करू शकता. टॅंकच्या किंवा तलावाच्या अवतीभवती हिरवळ कायम राखण्यासाठी तुम्ही झाडं किंवा वेली लावू शकता. टॅंकमध्ये काही दिवस ऑयस्टर ठेवल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली जाते.  ऑयस्टर शस्त्रक्रिया 15 दिवसांनी केली जाते.

    शस्त्रक्रियेअंतर्गत, देवाच्या किंवा फुलांच्या पानांच्या साध्या किंवा डिझाइनर मण्यासारख्या आकृत्या प्रत्येक ऑयस्टरमध्ये घातल्या जातात, 4 ते 6 मिली व्यासाचा. त्याची दोन्ही आवरणे हळुवार पद्धतीने उघडून त्यात त्यात बिया सोडल्या जातात आणि शिंपले बंद केले जातात. या ज्या बिया असतात, त्या जंगली वनस्पती पासून बनवल्या जातात. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जवळच्या कृषी-केंद्रातून देखील माहिती मिळवू शकता.

     हे ऑयस्टर नंतर नायलॉनच्या पिशव्यांमध्ये ठेवले जातात आणि बांबू किंवा पीव्हीसी पाईपमध्ये टांगल्या जातात आणि एक मीटर खोलीवर तलावामध्ये सोडल्या जातात. या ऑयस्टरचे खाद्य म्हणजे शेवाळ आणि जनावरांची विष्ठा. दीड, दोन वर्षं तलावात शेवाळ आणि जनावरांची विष्ठा टाकली, तर दोन वर्षानंतर शिंपल्यातील मोती परिपक्व झालेले असतात. यामध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बीज तयार करून त्याचे रोपण करणे. त्यामुळे हे करताना योग्य मार्गदर्शन घेवूनच करावे. 

    एका शिंपल्यात दोन मोती तयार होतात हे, दोन मोती तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील साधारण 70 रुपये खर्च करावे लागतात आणि त्या 70 रुपयांचे 2 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये मिळू शकतात. एका हंगामात तुम्हाला एका टॅंक मध्ये कमीत कमी 5000 मोती मिळू शकतात. त्या 5000 पैकी समजा 4000 मोती वाचले, तर तुम्हाला त्याचे साधारण ६० लाख रुपये मिळू शकतात. मात्र ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे.

    कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असते. मात्र एकदा का तुम्हाला या शेतीची संपूर्ण टेक्निक समजली की मग तुम्ही मालामालच!

    मोती तयार झाले की. दूसरा मुद्दा येतो तो विक्रीचा. सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतीची असल्यास त्याला बाराशे रुपये कॅरेट इतकी किंमत मिळते.   

    तुम्हाला वाटत असेल हे खूप रिस्की काम आहे, पण घाबरू नका, अशा बऱ्याच संस्था आहेत, ज्या या शेतीचं प्रशिक्षण देतात तसेच प्रत्येक जिल्ह्यात कृषी केंद्रं असतात, तिथे तुम्हाला उपयुक्त माहिती मिळू शकते आणि कसंय ना जो पर्यंत आयुष्यात risk नाही, तोपर्यंत मजा नाही. काय म्हणता? पटतंय ना!

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

    शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

    बारामतीत जमीन खरेदीत शेतकऱ्याची 5 लाख रुपयांची फसवणूक.
    भावाभावात शेतजमिनीच्या हद्दीपायी बेदम हाणामारी.
    एकाने शेतकऱ्याची 7 एकर जमीन शिताफीने लुबाडली.

    अशा एक ना अनेक बातम्या आपण रोज वाचत असतो, ऐकत असतो. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की, मूळ जमिनीचा मालक वेगळाच असतो आणि बनावट कागदपत्रे करून दुसऱ्याच कोणाकडून तरी जमिनीचे व्यवहार होतात आणि मग वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तसेच जमिनीवर कर्ज काढून खोटी कागदपत्रे तयार करून देखील जमिनीची विक्री केली जाते, तर अशावेळी कोणती दक्षता घेतली पाहिजे? चला तर पाहूया…

    1. सातबारा उतारा तपासा

    सातबारा उतारा हा जमिनीचा अधिकृत दस्तावेज असतो. यावर जमिनीचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार, कर्जाचा बोजा, न्यायालयीन खटल्याची नोंद इत्यादी माहिती असते. त्यामुळे सातबारा उतारा तपासून घेतल्यास, जमिनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याची माहिती मिळू शकते. सातबारा उतारा तहसील कार्यालयातून किंवा तलाठ्याकडून मिळू शकतो.

    2. भूधारणा पद्धत तपासा

    महाराष्ट्रात भूधारणा पद्धतीनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाते. भोगवटादार वर्ग-1 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यात कोणतेही निर्बंध नसतात. मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करताना सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. भूधारणा पद्धत तहसील कार्यालयातून तपासून घेता येते.

    3. शेतजमीनचा मूळ मालक कोण आहे हे तपासा

    शेतजमीन विकत घेताना त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे तपासणे आवश्यक आहे. अन्यथा, जमिनीची खरेदी केल्यानंतर मूळ मालकाकडून वाद होऊ शकतो. जमिनीचा मूळ मालक कोण हे सातबारा उतारावरून तपासून घेता येते.

    4. जमिनीचा खरेदी-विक्री करार नोंदणी करा

    शेतजमिनीची खरेदी-विक्री करार नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत करारामुळे, भविष्यात कोणत्याही वादात, कराराची नोंदणी हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. जमिनीच्या खरेदी-विक्री करारासाठी वकीलाचा सल्ला घेणे चांगले.

    5. वकीलचा सल्ला घ्या

    शेतजमीन विकत घेताना वकीलचा सल्ला घेणे देखील चांगले. वकील तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची माहिती देऊ शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही वाद असल्यास, त्या बाबतीत वकीलाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

    वरील गोष्टींची काळजी घेतल्यास, शेतजमीन विकत घेताना फसवणूक होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही

    पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही

    २०२३ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. शेतकरी सुखी, तर जग सुखी हे फक्त ऐकायला बरं वाटतं, पण ते प्रत्यक्षात कधी येणार काय माहीत. तर मंडळी आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी शेतीबद्दल इंटरेस्टिंग माहिती घेऊन येत असतो. आज देखील मी तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करुया.

    मित्रांनो, शेतीला आपण वेळच्या वेळी जितकं पाणी देणार, तितकंच पीक ती आपल्याला देत असते. पण शेतावरची लाईटच गेली, तर पाणी कसं देणार? आणि म्हणूनच शेतकऱ्यांना सौर पंपाच्या माध्यमातून वीज उपलब्ध व्हावी तसेच जलसिंचन करता यावं, शेतीला पाणी देता यावं यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सोलार योजना आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसहाय्य करतं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. मात्र अनेकांना याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे खूप सारे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

    या योजनेचा एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये,

    केंद्र सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल

    ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.

    शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्यावी लागेल.

    मात्र या पंपांचं  वाटप शेतकऱ्यांना कोणत्या निकषांवर केलं जातं?

    जर 2.5 एकर पर्यंत शेती असेल, तर 3 एचपीचा पंप मिळेल, अडीच ते पाच एकर जमिनीसाठी 5 एचपी आणि त्यापेक्षा जास्त जमीन असेल, तर 7.5 एचपीचा पंप मिळू शकतो. 

    3 एचपी पंपची एकूण किंमत – 1,93,803 रुपये आहे.

    मात्र अनुदानानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तो 19,380 रुपयांना तर एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 9,690 रुपयांना मिळेल.

    म्हणजे तुम्हाला जवळ जवळ दीड लाखापेक्षाही अधिक लाभ मिळणार आहे.

    तसेच 5 एचपी पंपची एकूण किंमत आहे 2,69,746

    सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यासाठी भरावे लागतील 26,975 रुपये आणि एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त 13,488 रुपये.

    आणि जर तुम्हाला 7.5 एचपीचा पंप हवा असेल, तर त्याची एकूण किंमत आहे 3,74,402

    पण सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तो 37,440 रुपयांमध्ये आणि एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 18,720 रुपयांमध्ये पंप मिळून जाईल. 

    या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज शेतकरी विकूसुद्धा शकतो आणि या वीज विक्रीतून पैसेसुद्धा कमवू शकतो.

    पण आत्ता तुम्ही हा लेख ज्या फोनमध्ये बघताय ना, त्यातच गूगलवर जाऊन mahaurja type करा. वेबसाईटची लिंकसुद्धा आम्ही खाली description box मध्ये दिलीच आहे. त्यावरसुद्धा क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता.

    https://www.mahaurja.com/meda/en

    या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर पंप अर्ज नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म open होईल. त्यावर विचारली गेलेली माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. पण हा फॉर्म भरण्यासाठी काही डॉक्युमेंट्स देखील लागतात. त्यात 7/12 उतारा लागेल. त्यावर विहीर किंवा बोअरची नोंद असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, जातीचा दाखला, बँक पासबूक पासपोर्ट साइज फोटो या गोष्टी लागतात. नोंदणीसाठी 100 रुपयांची फी आकारली जाते. ती फी भरल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यासोबतच तुम्हाला user ID आणि password दिला जातो. अर्थात तुमची नोंदणी successful झाली. पण फॉर्म भरला म्हणजे झालं, मला लगेच पंप मिळेल या धारणेत राहू नका. कारण ही प्राथमिक प्रक्रिया आहे. कोटा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे कळवलं जातं आणि मग त्यानंतर लाभार्थ्याचे संपूर्ण details, कोटेशन, कंपनी निवडणं हे सारी प्रोसेस केली जाते आणि मग पंप हा तुमचा होतो.

    तेव्हा लगेच फॉर्म भरा आणि पंप मिळवा. आता आम्ही तुमच्या फायद्याची एवढी माहिती दिली आहे, तेव्हा चॅनेलला Subscribe सुद्धा होऊन जाऊद्या. त्याला तर कसला अर्जपण करावा लागत नाही हो…

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल!

    Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल!

    मागच्या दोन महिन्यांपासून सामन्यांच्या किचनचे बजेट बिघडवणारा टोमॅटो आता कवडीमोल भावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रबीचे पिक संपायला आले असताना आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे दळणवळण समस्या निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे भाव 200 च्याही वर पोहोचले होते. दिल्ली, एनसीआर आणि इतर काही राज्यांत टोमॅटो 250-270 रूपे किलो दराने विकले जात होते. आता मात्र हेच टोमॅटो 5-10 रूपये किलोने विकले जात आहेत.

    शेतकरी हवालदिल 

    जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

    मात्र ऑगस्टमध्ये पावसाळा कोरडाच गेला आणि खरीपाचे पिक बाजारात यायला सुरुवात झाली. पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे टोमॅटोचे भाव देखील गडगडायला सुरुवात झाली. 200 रूपये पार गेलेले टोमॅटो आता 3 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये किलोने शेतकऱ्यांना विकावे लागत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता टोमॅटो गायगुरांना खाऊ घालायला सुरुवात केल्याचे देखील समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे.

    सरकार घेणार निर्णय 

    शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारी यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळते आहे. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने ज्या भागात टोमॅटोचे भाव पडले आहेत, तेथून सरकार थेट टोमॅटो खरेदी करू शकते.

    केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ग्राहक व्यवहार विभागाने याबाबत चाचपणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. सदर मंत्रालयाकडे किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) असतो, जो निधी शेतीमालाच्या किमती स्थिर करण्यासाठी सरकार वापरू शकते. सदर निधीच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.


    आणखी वाचा