Category: शेती

  • ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    Black Rice

    शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.

    दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

    भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxidant गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

    सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादन

    कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहाय्यता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत.आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांडूळ प्रकल्पसुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    – मराठी कृषी जागरण

  • जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

    तापमान: खरबूज शेतीसाठी सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे.

    पाऊस: खरबूज शेतीसाठी दरवर्षी 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस आवश्यक असतो.

    आर्द्रता: खरबूज शेतीसाठी आर्द्रता 50 ते 60 टक्के असावी.

    प्रकाश: खरबूज शेतीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

    a-complete-guide-to-muskmelon-farming

    खरबूज शेतीसाठी आवश्यक जमीन खालीलप्रमाणे आहे:

    जमीनीचा  प्रकार: खरबूज शेतीसाठी हलकी, सुपीक आणि निचरा होणारी जमीन योग्य असते.

    जमिनीचा pH: खरबूज शेतीसाठी जमिनीची pH 6.0 ते 7.0 असावी.

    a-complete-guide-to-muskmelon-farming

    खरबूज शेतीची जोपासणी खालीलप्रमाणे केली जाते

    आंतरपिके: खरबूज शेतीत आंतरपिके घेऊन उत्पादन वाढवता येते. खरबूजसोबत वाल, मका, मूग, उडीद इत्यादी पिके घेता येतात.

    खत व्यवस्थापन: खरबूज शेतीसाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केला जातो. खरबूजाच्या शेतात रोप लावण्यापूर्वी 15 ते 20 किलो शेणखत प्रति रोप या प्रमाणात देऊन जमिनीची चांगली मशागत केली जाते.

    पाणी व्यवस्थापन: खरबूज शेतीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक असते. खरबूजाच्या रोपट्याला लागवड केल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी पहिल्यांदा पाणी दिले जाते. त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी पुन्हा पाणी दिले जाते. फळधारणेच्या काळात पाण्याची आवश्‍यकता जास्त असते.

    आंतरमशागत: खरबूजाच्या शेतात वेळोवेळी आंतरमशागत करून तण काढून टाकले जाते. तण काढल्याने जमिनीत हवा खेळती राहते आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो.

    कीड व रोग नियंत्रण: खरबूजाच्या शेतात कोळंबी, फळमाशी, फुलकिडे, पाने खाणारी अळी इत्यादी किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. या किडी आणि रोगांचा नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरली जातात.

    खरबूज शेतीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वरील गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे.

    आणखी वाचा

  • जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    All-you-need-to-know-about-sweet-corn
    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    शेतकरी सातत्यान चांगलं पिक घेण्याचा प्रयत्न करतात परंतु कधीकधी त्यांना हवामानाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा  सामना करावा लागतो.  अशा वेळी ते आपल्या शेतात हे पिक घेऊन भरघोस नफा कमवू शकतात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून स्वीटकॉर्न ची शेती कशी करावी या विषयी माहिती घेऊयात. 

    आवश्यक हवामान आणि जमीन – 

    तसे तर  स्वीटकॉर्न  च्या शेतीसाठी कोणतीही जमीन चालते पण पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन जास्त फायदेशीर ठरते. ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे . या मक्यासाठी मातीची इष्टतम  PH श्रेणी 6.5 -7.5 इतकी आहे . उगवणीसाठी तापमानाची कक्षा 21 ते 32  डिग्री सेल्शियस इतकी आहे .  लागवड करण्याआधी मातीचे परीक्षण करून घ्यावे. स्वीटकॉर्न हे वाढीसाठी पोषकतत्त्वांची मागणी करणारे पिक आहे. या पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन ,  २ स्फरस, आणि  शियमची गरज असते. हे पिक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाऊ शकते.  

    अशी करा लागवड –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    स्वीटकॉर्न ची लागवड ही मक्यासारखीच असते. आणि विशेष म्हणजे यामध्ये  मका पूर्ण परिपक्व होण्याआधीच तिची काढणी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना झटपट नफा मिळवता येतो . चांगले पिक येण्यासाठी जमिनीमध्ये खाते आणि इतर पोषक तत्त्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. लागवड करताना जमिनीत 20:20:20 हे खत हेक्टरी 100 किलो टाकावे आणि 10 किलो मायक्रोन्यू ३ टाकावेत.

    उन्हाळी हंगामात २-३ उथळ मशागतीची कामे आवश्यक असतात. खोल नांगरणी तण नियंत्रित करण्यासाठी आणि प्रभावी ओलावा संवर्धनासाठी देखील उपयुक्त आहे.

    बियाणे दर:

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    1. शुद्ध पिकासाठी: 20-25 किलो/हे

    2. चारा मक्यासाठी: 40-50 किलो/हे

    3. सोयाबीनसह आंतरपीक घेण्यासाठी: 10kg/हेक्टर (1:3) किंवा 15 kg/hector (1:2)

    लागवड करताना अंतर 65X20 किंवा 75X20  इतके ठेवावे .

    जोपासणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    या पिकासाठी 75 ते 80% ओलावा असणारी जमीन उत्तम ठरते . मक्याची दोन वेळा आंतरमशागत आणि दोन वेळा हाताने खुरपणी केली जाते.  पहिल्या वेळेस केलेली आंतरमशागत रोपांमधल्या अर्थिंग साठी फायदेशीर असते. तण काढून टाकण्यासाठी तणनाशके आणि आंतरमशागती यांचा एकत्र वापर महत्त्वाचे तंत्र ठरू शकते. पावसाच्या उपलब्धतेवर सिंचनाचा कालावधी 6 ते 10 दिवस  इतका असतो . 

    परिपक्वतेची चाचणी अशी करा –

    भुसाचे आवरण फिकट तपकिरी रंगाचे होते आणि दाणे बोटांच्या नखेने दाबणे खूप कठीण होते.

    काढणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    काढणीनंतर एक ते दोन दिवस रोपे शेतात सोडावीत. भुसा काढा आणि दाण्यांना 2-3 दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. लाठी मारून किंवा हाताने किंवा शक्तीने चालवल्या जाणार्‍या मक्याच्या शेलर्सचा वापर करून शेलिंग करता येते.

     स्वीटकॉर्न  चा दर 140 – 200 रुपये प्रतिकिलो आहे. 

  • जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

    चंदन’ या वृक्षाचा वापर होम, हवन, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. एवढंच काय तर सौंदर्य प्रसाधानांमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे; कारण चंदन चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चंदन शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. चंदन शेतीविषयी आपल्या मनात अनेक समज, गैरसमज असतात ते कळण्यास या लेखाच्या माध्यमातून मदत होईल. 

    चंदन लागवड करत असताना सर्वप्रथम हे समजून घ्या की, यासाठी कोणतीही सरकारी परवानगी लागत नाही. पण काही  कायदेशीर बाबी आहेत त्या मात्र वेळोवेळी पूर्ण करून घ्याव्या लागतील. चंदनाची लागवड केल्यावर पहिल्यांदा तलाठ्याकडून सात-बारा वर नोंद करून घ्यावी. जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर सरकारकडून तीन टप्प्यात हेक्टरी 45,000 इतके अनुदान मिळेल. शेवटी झाडे तोडताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी. अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटावे.   

    चंदनाच्या झाडाची उंची 12 -15 मीटर असते आणि घेर 2-2.5 असतो. याची पाने सदाहरित असतात. त्यांचा आकार अंडाकार असतो आणि ते टोकाला निमुळते होत जातात. खोड सुरवातीला लहान असते, तेव्हा ते मऊ असते. जसजसे झाड मोठे होते तसे ते मजबूत आणि उभ्या चीरांचे बनते. चंदनाचे लाकूड कठीण असते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण 1-6% असते. लाकडाचा बाहेरचा भाग कडक आणि सुगंध रहित असतो, तर आतला भाग पिवळस ते तपकिरी आणि सुगंधी असतो. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून ते पिवळसर असते. फळाचा वरचा भाग लुसलुशीत आणि गरयुक्त असून त्यामध्ये बी मिळते. हे बी काढून त्यापासून रोपे तयार केली जातात. 

    रोपे कशी तयार करावीत- 

    1

    लहान रोपे अति सूर्यप्रकाशात किंवा कमी पाण्यामुळे सुकून जातात. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. पहिला एक महिना हे बी सुप्तअवस्थेत असल्याने त्यावर पाणी आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम होत नाही. यासाठी 50 ml जर्मिनेटर, 50 ml प्रिझम, आणि एक लिटर पाण्यात बी भिजवून ठेवावे. असे केल्यास एक महिन्यातच अंकुर दिसायला लागतील. 

    गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत

    2

    गादीवाफे 2 प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे, तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे 10 मीटर x 1 मीटर आकाराचे करून 15 सेमी उंची ठेवावी. यामध्ये लाल माती व चाळलेली वाळू 2:1 प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट 50%) करावी. बी उगविल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर-जानेवारीत पेरावे.

    पिशवीत रोपे लावणे

    3

    बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी व रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियांपासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.

    कधी करावी लागवड

    4

    मान्सून सुरु होताच जुलै-ऑगस्ट महिन्यात या रोपांची लागवड करावी. त्यासाठी मार्च महिन्यात 16×12 अंतरावर 1.5×1.5×1.5 फुटाचे खड्डे खोडून घ्यावेत. या खड्ड्यांमध्ये निंबोळी खत किंवा सेंद्रिय खत टाकावे आणि पहिला पाऊस झाल्यावर रोपे लावावीत. चंदन हा एक अर्धपरजीवी वृक्ष आहे. त्यासाठी आधार म्हणून एक मजबूत झाड असावे. 

    आवश्यक हवामान आणि जमीन

    5

    चंदनाचे झाड 600 ते 1600 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या क्षेत्रात येते. यासाठी 12-45 डिग्री सेल्शियस तापमान योग्य मानले जाते.  थंड हवामान, मध्यम पर्जन्यमान आणि भरपूर सूर्यप्रकाश या वनस्पतीसाठी पोषक ठरतो. चंदनाच्या झाडासाठी लाल, काळी माती, चिकणमाती, लोहयुक्त वाळूमिश्रीत जमीन पोषक ठरते. जमिनीचा सामू  6.5- 8 च्या दरम्यान असावा.

    जोपासणी

    6

    चंदनाच्या झाडाला पाहिल्या वर्षी आठवड्यातून 2 -3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पावसाची कमतरता असल्यास झाडाला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या चंदनाचा भाव 12000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो असा आहे.

    Follow Google News

    आणखी वाचा

  • शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

    शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

    शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न जो केवळ सरकारी कार्यालयातच खितपत पडायचा, त्या प्रश्नाला न्याय चरणसिंह यांनी दिला. ज्या मातीत आपण शेतकऱ्याच्या सहनुभूतीचे नारे लगावतो, त्याला न्याय देण्यासाठी आंदोलने करतो त्याच मातीत पहिल्यांदा चरणसिंह यांनी सामंजस्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले.

    CHARAN SINGH032116 1685440822 1685440822
    चौधरी चरण सिंह 

    चौधरी चरणसिंह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या नुरपूर या गावात 23 डिसेंबर 1902 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. शेतीत काम करत करत ते आग्रा विश्वविद्यालयामधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर बनले. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडून गेले आणि 1946, 1952, 1962 व 1967 मध्ये विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

    भारत पारतंत्र्यात असताना गांधीवादी विचारांनी प्रेरित होऊन भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ब्रिटिश सरकारला नामोहरम करण्याच काम चरणसिंह यांनी केलं. ते केवळ सत्याग्रह चळवळीत सहभागी झाले नाहीत, तर प्रत्येकाला चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले.

    Exciting part of the story

    १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. जेलमधून बाहेर सुटल्यावरही ते शांत बसले नाहीत. त्यांनी ब्रिटिशांविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. ब्रिटिशांना भारतातून हकलवून लावण्यासाठी प्रबोधन करू लागले.आणि म्हणूनच ब्रिटिशांनी उत्तरप्रदेशात एक पत्रक जारी केलं. ज्यात सूचना होती की, चरणसिंह जिथे दिसतील तिथे त्यांना मारून टाका.

    १९४७ साली भारत अखेर स्वतंत्र झाला. पण त्यानंतरही भारताला अनेक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी क्षेत्राचा प्रश्न. आणि याच क्षेत्रावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न चौधरी चरण सिंह यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या.

    उत्तरप्रदेशात कार्यरत असताना त्यांनी अनेकवेळा स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विभागीय कर्जमुक्ती विधेयक, १९३९ तयार करण्यात आणि अंतिम प्रारूप देण्यामध्ये श्री. चरण सिंह यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांना जमीनदार, तलाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना होती. यासाठी त्यांनी जमीनदारी उन्मूलन बिल-१९५२ हे विधेयक आणले. त्यामुळे शेतकरी अधिकाऱ्यांच्या त्रासातून मुक्त होतील, असा विश्वास त्यांना होता. हे विधेयक येताच अनेक तलाठी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. चौधरी चरण सिंह यांनी ते राजीनामे स्वीकारून नव्याने पदभरती सुरू केली. त्यामध्येही १८ टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवल्या.

    शेतकर्‍यांच्या भरभराटीसाठी शेतीवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी देखील ते खूप गंभीर होते. त्यामुळे शेतकरी त्यांना आपले नेते मानत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जमीन धारणा कायदा 1960 बनवला. त्यांनी केवळ शेतीतच उल्लेखनीय कामगिरी केली असे नाही तर महसूल, वैद्यकीय, सार्वजनिक, आरोग्य, न्याय इत्यादी विविध विभागात काम केले. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना सुद्धा त्यांनीच केली.

    त्यांनी २८ जुलै १९७९ मध्ये देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे ते केवळ १४ जानेवारी १९८० पर्यंत म्हणजेच सहा महिनेच पंतप्रधान पदावर कार्यरत होते.

    शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली होती. त्याची आठवण म्हणून २००१ साली अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारमध्ये चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. चौधरी चरण सिंह यांचे २९ मे १९८७ रोजी निधन झाले.

    राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधानपदापर्यंत त्यांनी केवळ शेतकऱ्याचाच विचार केला. मात्र इतके करूनही आज आपला शेतकरी राजा खुश आहे का हाच प्रश्न पडतो. चौधरी चरणसिंह यांचे शेतकऱ्यांच्या काळजीचे तत्व आज प्रत्येक नेत्याने अवलंबलं असते, तर कदाचित शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटले असते आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा झाला असता. 


    Follow Google News
  • शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

    शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

    1. माती आरोग्य कार्ड योजना

    मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

    2. शेतकरी पोर्टल

    3. मेरा किसान पोर्टल

    हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    4. पंतप्रधान पीक विमा योजना

    शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

    5. पंतप्रधान कृषी विकास योजना

    शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    6. राष्ट्रीय शेती बाजार

    शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.

    7. ई-राष्ट्रीय शेती बाजार

    राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.

    8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल

    शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणं सोप आहे…


  • आधुनिक शेती – Modern Agriculture

    आधुनिक शेती – Modern Agriculture

    Modern Agriculture – मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये कांदा असतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. संपूर्ण भारतात कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात, क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत, महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे एक लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते.

    नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराष्‍ट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. साहजिकच येथे कांद्याचे उत्पादन घेताना पेरणी, काढणी आणि कापणी अशा प्रक्रियांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. सध्याच्या काळात मजुरांची वाढती मजुरी बघता नक्की त्यांना काम द्यावं का? अशी समस्या सर्व शेतकरी बांधवांसमोर उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला दूर करण्यसाठी म्हणून की काय नाशिक जिल्हाच्या चांदवड तालुक्यातील तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या मुलांनी कांदा काढणी व पात कापणी यंत्राचा यशस्वी प्रयोग केला आहे. श्रम, वेळ आणि खर्च या तीनही गोष्टी कमी करण्यासाठी या यंत्राचा चांगलाच वापर होणार आहे. 

    कांदा काढणीच्या वेळेस अनेकदा विळा लागून इजा होण्याचा धोका असतो. या गोष्टींचा विचार करून या विद्यार्थ्यांनी उन्हाळी कांद्यासाठी उपयोगी ठरेल असे नावीन्यपूर्ण व स्वयंचलित कांदा काढणी व पात कापणी यंत्र विकसित केले आहे. सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे व लोकेश देवरे हे चौघे विद्यार्थी कळवण, सटाणा व देवळा तालुक्यांतील आहेत. जन्मच शेतकरी कुटुंबातला असल्याने लहानपणापासूनच त्यांना शेतीतील समस्या जवळून माहित होत्या. यंत्रनिर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक होता. तांत्रिक ज्ञानासह त्यांनी विविध शोधनिबंधांचा अभ्यास केला. कांदा पात यंत्र तयार झाले, पण त्यात काही त्रुटी होत्या. मग योग्य अंतरावर कापणी, पात व कांदा विलगीकरण यात काही बदल करून शेवटी बुद्धी कौशल्य, संशोधकवृत्ती अथक प्रयत्नांतून स्वयंचलित पद्धतीचे कांदा पात कापणी (ओनियन लीफ कटर) यंत्र विकसित करण्यात त्यांना यश आले.

    यंत्राची रचना आणि काढणी-कापणी प्रक्रिया

    – दोन मिलिमीटर जाडी व ३ X १.५ इंच आकाराच्या एमएस पाइपवर आधारित आर्क वेल्डिंगच्या साह्याने सांगाडा निर्मिती केली गेली.

    – सांगाडा वाहतुकीसाठी मागील बाजूस १४ इंच आकार परिघाच्या दोन चाकांना जोडून पुढील भागात आधारासाठी बोल्टच्या आधारे स्टँड लावण्यात आलं.

    – शेतातून पातीसहित काढणी केलेले कांदे यंत्राच्या मागील भागात वरील बाजूस हॉपरमध्ये टाकले जातात. हे हॉपर एक मिमी शीट मेटलद्वारे तयार करण्यात आलंय. तसेच यात एकावेळी क्रेटभर पातीसहित कांदे टाकता येतात.

    – हे कांदे यंत्राद्वारे पुढे जाण्यासाठी कन्व्हेअर सिस्टीम आहे. त्यासाठी जीआय शीटचा वापर केला गेलाय.

    – या यंत्रणेतून पुढे आलेले कांदे, कापणीसाठी पातीसहित जाण्यासाठी वर्तुळाकार स्लॉटेड रोटर रचना केली आहे. त्यात एकूण २८ ओळी आणि प्रत्येक ओळीत ९ स्लॉट्‍स आहेत. असे एकूण २५२ चौकोनी स्लॉट्‍स यात आहेत.

    – या यंत्रणेद्वारे कांदा स्लॉटमध्ये तर पात वर उभी असते. रोटर फिरल्यानंतर पात कटरच्या संपर्कात येऊन योग्य अंतरावर कांद्याच्या मानेजवळ कापली जाते. व्यवस्थित कापणी व्हावी म्हणून हार्ड मेटल स्टीलचा कटर वापरला आहे.

    – एकदा कांद्यापासून पात बाजूला झाली तर कापला गेलेला कांदा एका भांड्यात जाऊन पडतो.

    – कन्व्हेअर आणि रोटरच्या गतीवर नियंत्रण व सुसंगतता ठेवण्यासाठी गिअर बॉक्स व वेगवेगळ्या आकाराच्या पुलीचा वापरसुद्धा यात केला गेला आहे.

    – या यंत्राच्या वापरासाठी सिंगल फेज वीजपुरवठा आवश्यक आहे.

    – हे यंत्र तसं ६२ हजार रुपयांत तयार झालंय, पण त्याचा एकूण निर्मिती खर्च धरल्यास ही किंमत ९० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

    यंत्राचे फायदे

    – तासाला १० क्विंटल कांदा प्रक्रिया करण्याची यंत्राची क्षमता असल्याने वेळ, मजुरी आणि खर्चात बचत होते.

    – या यंत्राला चाके असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणंसुद्धा शक्य आहे.

    –  या यंत्राची हाताळणी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने सुलभ व सुरक्षित करण्यात आलेली आहे.

    – तसेच हे यंत्र पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित आहे.

    आता हे यंत्र बाजारात कधी येतंय आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचतंय हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

    अशा या आधुनिक शेती – Modern Agriculture ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


    आणखी वाचा

  • उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

    उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

    जसे माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गोष्टींची गरज लागते, तसेच मातीला देखील अन्न पाणी हवा या गोष्टींची गरज लागते आणि यामध्ये मातीचे अन्न काय; तर तिला दिली जाणारी पोषक द्रव्य. आपण जरी आपल्या बाल्कनीमध्ये एखादं छोटं रोपटं लावलं, तरी त्यात काहीतरी खत हे टाकतोच. मग शेताचा विचार केला तर चांगलं पीक येण्यासाठी आणि जमीन चांगली राहण्यासाठी खत तर द्यावच लागणार ना. खतांसोबत जमिनीची योग्य मशागत, जमिनीला पोषक द्रव्य अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.

    शेती करीत असताना शेतीचे व्यवस्थापन ही महत्त्वपूर्ण बाब आहे. केवळ फक्त राबराब राबणे म्हणजे शेती नव्हे, तर तुमच्या कष्टाचे चीज होणे म्हणजे खरी शेती. कोणतेही पीक घेत असताना काही गोष्टींचा प्रकर्षाने अभ्यास केला पहिजे.  कमी खर्चात पाण्याचा वापर, कमी खर्चात कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन व पीक विक्रीचाही शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. चला तर पाहूया उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

    पाणी व्यवस्थापन –

    पाणी हा शेतीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आवश्यक तेथे मुळांच्या कक्षेला दिले जावे. रेताड जमिनीची जलधारण क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची पाण्याची गरज अधिक असते. तर खोल काळ्या जमिनीची जलधारण क्षमता जास्त असते. अशा जमिनीत तुलनेने पिकांना पाण्याची गरज कमी असते. अतिरिक्त पाणी दिल्याने उत्पादन वाढत नाही तर जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यामुळे पिकांना गरजेप्रमाणेच पाणी द्यावे.

    जमिनीची निवड –

    फुलशेती, फळशेती किंवा कोणतेही अन्नधान्य पिकविताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची निवड. जर डोंगराळ भागात तुमची जमीन असेल, तर चांगले पीक येण्यास खूप वर्ष लागू शकता. जमिनी ह्या पिकांनुसार विविध अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या व पिकांनुसार आवश्यक ओल टिकवून ठेवणाऱ्या असाव्यात. लागवड पूर्व जमिनीची निवड हा पीक व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी विविध कृषी विद्यापीठं अथवा खासगी संस्थांकडून मातीपरीक्षण करून त्यातील बारकावे शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावेत.

    जमिनीची मशागत –

    जमिनीच्या मशागतीमुळे आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. मशागतीमुळे जमिनीची घनता, रंग, पोकळी, भौतिक गुणधर्म ह्यावर परिणाम होत असतो.

    पिकांची निवड –

    पिकांची निवड करताना घेणारे पीक हे किडीस कमी बळी पडणारे गुणवत्तापूर्वक पीक असावे. यामध्ये फळे आणि फुले देणारे वाण हे अधिक उपयुक्त ठरते. यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच चौकस बुद्धीने, बियाण्यांची निवड करावी, बियाणे, रोपे खात्रीशीर ठिकाणांहून घ्यावीत. तसेच फळबागा किंवा इतर रोपे खरेदी वेळी रोपांच्या मातृवृक्षाची माहिती घ्यावी, रोपांचा दर्जा, वय इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात.

    अशा पद्धतीने जर जमिनीची योग्य काळजी घेऊन शेती केली, तर नक्कीच तुम्ही शेतीत चांगले उत्पन्न घेऊ शकता.


    आणखी वाचा

  • Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान

    Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान

    Agro Tourism – सिमेंटच्या शहरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, बेसुमार औद्योगिकरण आणि वाढत जाणारे प्रदूषण यामळे शहरं बकाल होत आहेत. मोठ्या प्रमाणावर गावागावातील लोक शहराकडे नोकरीसाठी येत आहेत. ज्यामुळे शहरांमध्ये गर्दी वाढत आहे. अशावेळी या गर्दीला गरजेचा असतो मोकळा श्वास आणि एक विरंगुळ्याची जागा.

    यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला सगळे जात असतात प्रेक्षणीय किंवा रम्य ठिकाणी जिथे आपल्या कुटुंबासोबत त्यांना निवांत वेळ घालवता येईल आणि रोजच्या जेवणापेक्षा छान, वेगळं काहीतरी खाता येईल. लोक हे पर्यटन नेमके कशासाठी करतात. त्यांचं स्वतःचं शहर सोडून, देश सोडून का जातात पर्यटनाला. तर Enjoy करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी. सुट्टीचा दिवस आनंदात घालता यावा, एक नवीन अनुभव मिळावा म्हणून.

    असं म्हणतात “गरज हीच शोधाची जननी” आणि नेमकी हीच गरज ओळखून आपण आपल्या उद्योगाला सुरुवात करू शकतो. कृषी या विषयाचा तुम्हाला गंध असेल किंवा मूळातच शेती हा तुमचा व्यवसाय असेल, तर शेती करत करत किंवा अगदी पूर्णवेळ उद्योग म्हणून “Agro Tourism” म्हणजेच “कृषी पर्यटन” या व्यवसायाकडे बघू शकता.

    नेमके हे कृषी पर्यटन म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. शहरात राहात असताना अनेकांना ग्रामीण जीवनाबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्यांचे राहणीमान, शेती, शेतीचे व्यवस्थापन, पशुपालन, गावरान भोजन आणि निसर्गरम्य वातावरण याबद्दल प्रचंड आकर्षण असते. धकाधकीच्या जीवनातून एक दिवस हे सर्व याची देही, याची डोळा अनुभवता यावे यासाठी लोक कृषी पर्यटन करतात. हे निव्वळ पर्यटन नाही तर एक प्रकारचे संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा उपक्रम आहे.

    Agro Tourism 1

    तुम्हाला माहित आहे का की भारतामध्ये Travel आणि Tourism industry ही Service Sector मधील सर्वात मोठ्या Industry पैकी एक आहे. २०१८ साली भारतामध्ये Travel आणि Tourism Industry हि २३४ बिलियन डॉलरची होती. २०१९ मध्ये देशातील एकूण Jobs पैकी ८% Jobs हे या Industry ने देशाला दिले होते. भारतामध्ये दर वर्षी करोडो लोक पर्यटनाला जातात. इतकंच नाही तर अनेकी लोक दरवर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात. भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत, ज्यांना करोडो लोक दरवर्षी भेट देतात.

    या कृषी पर्यटनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो? तर त्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धत आणि तिचे महत्त्व, पशुपालन पद्धत, चुलीवरच्या जेवणाची पद्धत तसेच बैलगाडी, घोडागाडी, घोड्याची सवारी, कुकुटपालन आणि नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती व महत्त्व अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे किंवा शेत जमीन. त्यावर इतर गोष्टी तुम्ही विकसित करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा हा प्रकल्प उभा करणार आहात. त्या ठिकाणी जवळच असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊन त्याचाही वापर तुम्ही यासाठी करू शकता.

    तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा व्यवसाय उभा करू शकता. यासाठी भेट देणाऱ्या लोकांसाठी ठराविक तिकीट रक्कम तसेच ग्रुपसाठी काही खास ग्रुप बुकिंग सवलत आणि विध्यार्थ्यांसाठी किंवा शालेय सहलींसाठी खास ऑफर ठेऊ शकतो. अशापद्धतीने शेती सांभाळत पर्यटन हा उद्योग खास करून शेतकऱ्यांना एक नवी आर्थिक उभारी देऊ शकतो. तसेच या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी आपण जागरूकता निर्माण करू शकतो.

    या संकल्पनेविषयी तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.


    आणखी वाचा

  • शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या

    शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या

    भारताला शेतीमध्ये प्रगत बनविण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार नेहमीच नवीन काहीतरी योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे KCC अर्थात किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ शेतीसोबतच, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे.

    चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल:

    भारतातील सर्व शेतकरी ज्यांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे ते या योजनेस पात्र ठरू शकतात. या योजनेअंतर्गत मागील वर्षापेक्षा जास्त कर्जाचा आणि कमी व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुमच्या जवळच्या बँकेत जमिनीची कागदपत्रे तसेच कर्ज मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा, पटवारी कागदपत्रे, बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे भरणे बंधनकारक आहे. HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या बँकांद्वारे किसान क्रेडिट कार्ड बँकांद्वारे ऑफर केले जाते.

    तुम्ही KCC Bank Loan कशा कशासाठी घेऊ शकता?

    1. KCC Bank Loan शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी घेऊ शकतो.

    2. किटकनाशके, खते, बियाणे खरेदीसाठी आणि कृषी यंत्रं घेण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

    3. काढणीनंतरचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी हे कर्ज घेऊ शकतात.

    4. कृषी मालमत्तेच्या देखभालीसाठी तसेच आपला माल विकण्यासाठी देखील या कर्जाचा वापर केला जाऊ शकतो.  

    5. तसेच मत्स्यपालन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसाठी.                                                 

    6. कुक्कुटपालन करण्यासाठी मेंढ्या, ससे, शेळ्या, डुकर यांच्या पालनपोषणासाठी लागणाऱ्या खाद्य खरेदीसाठी

    7. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःचे शेड उभारण्यासाठी किंवा भाडेतत्वावर शेड घेण्यासाठी देखील या कर्जाची मदत होऊ शकते.

    या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी 50 हजारांपासून ते जास्तीतजास्त 3 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. १.६० लाख रुपयां पर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही तारण लागत नाही. यासोबतच शेतकऱ्यांना पिकांचा विमाही काढता येऊ शकतो. हे कर्ज 4% व्याजदराने घेता येऊ शकते. पण जसजशी तुमची कर्जाची रक्कम वाढेल तसे त्यावरचे व्याज देखील वाढू शकते. शेतकऱ्यांना बँकांकडून नियमित दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या उच्च व्याजदरातून KCC Bank Loan अंतर्गत सूट दिली जाते.

    मात्र मिळालेल्या या कर्जाची परतफेड केव्हा करायची?

    तर ज्या पिकासाठी तुमचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे, त्या पिकाच्या अपेक्षित कापणी आणि एकूण उत्पादन येण्याच्या कालावधीनुसार बँक मुदतीचा कालावधी ठरवत असते. सामान्यतः प्रत्येक बँकेत 5 वर्षांचा कालावधी हा परतफेड करण्यायोग्य कालावधी असतो.

    सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेऊन येत असते, मात्र बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतात. त्या योजना नवी अर्थक्रांती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी नवी अर्थक्रांती वेबसाईटला नियमित भेट द्या.


    आणखी वाचा