Tag: Success

  • यश तुमच्या हातात

    यश तुमच्या हातात 

    अर्ल नाईटिंगेल यांच्या मते,

     “एखाद्या उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश होय”

     उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा याचा अर्थ – यशाच्या कोणत्याच टप्प्यावर आपण थांबून राहत नाही. म्हणजे हा एक न संपणारा प्रवास आहे, एक उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर पुढच्या उद्दिष्टाकडे चालायला लागणं. असं करत करत आपण निश्चित केलेल्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर पुढे पुढे चालत राहतो. यशप्राप्तीच्या या प्रवासात चालत राहणं फक्त खूप महत्वाचं आहे, कारण इथं थांबणाऱ्याचा अंत निश्चित आहे. 

    यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे गुण खालीलप्रमाणे आहेत :

    1. कर्तव्यनिष्ठा : 

    कोणतेही काम वेळेवर आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. ती सवय स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट फक्त करायची म्हणून करणं आणि ती जबाबदारी समजून करणं यात खूप फरक आहे. 

    यश मिळवायचं असेल तर आपली जबाबदारी तितक्याच जबाबदारपणे पार पाडणं आवश्यक असतं. प्रवासात अनेक अडचणीचे, अडथळ्याचे आणि कसोटीचे प्रसंग येतात पण तीच खरी परीक्षा असते त्यावर मात करण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची.

    2. कठोर परिश्रम : 

    मित्रांनो यश कोणालाही सहज मिळत नाही. त्यासाठी आवश्यक मेहनत घ्यावी लागते आणि त्यात सातत्य ठेवणे अपेक्षित असते.

    सर्वांनाच यशस्वी व्हावं असं वाटतं पण त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची वेळ देण्याची तयारी किती जणांची असते ? यशासाठी अपार त्यागाची आणि स्वयंशस्तीची गरज असते. कठोर परिश्रमाला दुसरा पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीतील परिपूर्णता ही काही नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि निरंतर सराव करावा लागतो. 

    3. सकारात्मक विचारसरणी :

     प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळवणं सोपं होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीकडे आपण जर नकारात्मक नजरेने बघितलं तर आपलं इच्छित कधीच साध्य होणार नाही.

    4. आत्मविश्वास : 

    स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे ही यशस्वी होण्याची अगदी प्राथमिक पायरी आहे. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही.

    image 10

    5. धैर्य आणि चिकाटी : 

    अडथळ्यांना सामोरे जाताना कधीही हार न मानता पुढे जाणे आवश्यक आहे. यशप्राप्तीच्या वाटेत येणाऱ्या अडचणी, अडथळे आणि निरुत्साह यावर मात करत ध्येय गाठण्यासाठी सतत, कसून प्रयत्न करण्याची क्षमता म्हणजे चिकाटी. चिकाटी हे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची आणि तुमच्या प्रयत्नांवर अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे लक्षण आहे. हे लक्षण धैर्याने आत्मसात करून पुढं जाणं हाच काय तो यशाचा राजमार्ग.

    6. वेळेचे व्यवस्थापन : 

    वेळेचे योग्य नियोजन आणि त्या प्रमाणे काम करणे यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. कोणते वेळी आपल्याला काय करायचं हे ती गोष्ट करण्याच्या आधी आपल्या मनाला माहीत असलं पाहिजे. हे वेळेचं नियोजन अनेक अडचणी येण्याआधीच त्यांना दूर करतं.

    7. नवीन शिकण्याची इच्छा : 

    आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालण्याची इच्छा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आपली असली पाहिजे. दररोज स्वतःच्या ज्ञानात व्यक्तिमत्त्वात 1 % भर घालणं ही कायमची सवय आपण आत्मसात केली पाहिजे.

    8. चांगले संबंध : 

    लोकांशी चांगले संबंध ठेवणे, सहयोगी वृत्तीने काम करणे, सहकार्याची भावना ठेवणं  हेदेखील यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. एक चांगलं Network केवळ यशाच्याच नाही तर आयुष्याच्या प्रवासात कामाला येतं हे मात्र नक्की !

    9. इच्छाशक्ती :

    आपल्या मनात असलेलं कोणतही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आपलं अपेक्षित साध्य करण्याची प्रचंड तळमळ हीच आपल्याला यशाकडे नेणारे सर्वात प्रबळ प्रेरणा ठरते. ईच्छा असल्याशिवाय मार्ग कधीच सापडणार नाही. 

    image

    हे गुण कौशल्य आत्मसात केल्यास यशाच्या मार्गावर निश्चितपणे यशस्वीपणे वाटचाल करता येईल.

    आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे हे लवकर ठरवलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट आपल्याला जितक्या लवकर सापडेल तेवढं जगणं अर्थपूर्ण ठरेल हे मात्र नक्की. आपल्याला का जगायचय याच ठोस कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. दररोज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माझ्या जीवनाच्या उद्दिष्टपूर्तीकडे योग्य दिशेने जात आहे का ? आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

    आणखी वाचा :

  • स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    कामात परफेक्शन हवे

    नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    प्रामाणिकपणा

    नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    स्वतःला ठेवा अपडेट

    काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आत्मविश्वास

    आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आणखी वाचा

  • उद्योजक व्हायचे असेल तर…

    उद्योजक व्हायचे असेल तर…

    आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.

    How to Be a Successful Entrepreneur

    व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.

    स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे.
    तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.

    How to Be a Successful Entrepreneur

    कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .

    बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.

    सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.

    How to Be a Successful Entrepreneur

    तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.

    तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.

    नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.

    व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.

    How to Be a Successful Entrepreneur

    थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .

    बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.

    बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.

    तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.

    नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.

    How to Be a Successful Entrepreneur

    सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.

    धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.

    कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.

    becoming-an-entrepreneur-the-essential-skills-you-need-to-succeed

    अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी ….
    “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .”
    HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA

  • स्टार्टअप वाढीचे टप्पे…

    स्टार्टअप वाढीचे टप्पे…

    पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स)

    जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.

    दुसरा टप्पा : लघुउद्योग (५० हजार ते ३ लाख डॉलर्स)

    तुम्ही व्यवसाय सुरु केला आणि तो चांगला चालू लागला, तुम्हाला ग्राहक मिळू लागले, नवी उत्पादने तुम्ही बाजारात आणू लागलात. हा तुमचा संघर्षाचा काळ असतो. काहीजण आपला व्यवसाय स्वतःपुरता मर्यादित करून घेतात., तर काहीजण यातून पुढे जाऊन स्वतःची एक टीम बनवतात.

    तिसरा टप्पा :  यशस्वी व्यवसाय (३ लाख – २० लाख डॉलर्स)

    आजवरचा तुमचा संघर्ष, तुमची मेहनत फळाला आली. आता तुमचा व्यवसाय एका शाश्वत गतीने चालू लागला आहे. आता तुम्ही तुमचे लक्ष तुमची टीम वाढवण्यावर द्यायला हवे. स्वतःसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तुमचा व्यवसाय आता तुमच्याशिवाय चालू लागला आहे. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. आता आराम करायचा, फिरायचं, मौजमजा करायची, की आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर न्यायचा?

    जगातील पंधरा कोटी व्यवसायांपैकी ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय ५ कोटी रुपयांपर्यंत आपला महसूल वाढवतात, तसेच ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात. 

    चौथा टप्पा : लघु व मध्यम उद्योग (२० लाख – १ कोटी डॉलर्स)

    तुम्ही जसजसा व्यवसायाचा पसारा वाढवत जाता, नवनवीन आव्हाने तुमच्यासमोर उभी राहतात. या टप्प्यावर व्यवसायाचे नियोजन, व्यवस्था, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते आणि तुम्ही पुन्हा एकदा संघर्षमय अशा दुसऱ्या टप्प्यात जाता.

    पाचवा टप्पा : मध्यम आणि मोठे उद्योग (१ कोटी – ५ कोटी डॉलर्स)

    आता तुमचा व्यवसाय एवढा मोठा झालेला आहे, की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि जगावर प्रभाव पाडत आहात. तुमच्या व्यवसायाची एक वेगळी ओळख जगभर निर्माण झालेली आहे.

    ‘जुगार आणि विचार करून घेतलेली जोखीम यात फरक असतो.’ – एडमंड एच. नॉर्थ

    हजारातील एक-दोन व्यवसाय ५ कोटी डॉलर्सचा टप्पा पार करून पुढे जातात. पण आजच्या जमान्यात तुम्ही भविष्यातील योग्य संधी ओळखल्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यावर काम केले, तर तुम्ही पूर्वी कधी नव्हे त्यापेक्षा जास्त वेगाने बाजारपेठ काबीज करू शकता. त्यामुळे आपले कामाची दिशा ठरवा, ध्येय निश्चिती करा आणि प्रवासाचा आनंद घ्या!!! आणि जर तुमचा व्यवसाय अयशस्वी ठरला तर? काळजी करू नका, पुन्हा सुरुवात करा…

  • उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

    उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

    उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा.

    १. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा.

    २. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा.

    ३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल.

    ४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या

    ५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा.

    ६. आत्मविश्वास वाढवा.

    ७. चांगले सहकारी तयार करा.

    ८. भविष्यातील ध्येय स्पष्ट असू द्या.

    ९. मोठी स्वप्नं बघा.

    १०. संपूर्ण प्रवासाची ब्लूप्रिंट (आराखडा) बनवा.

    या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला सुरुवातीलाच पडणार नाही, पण उद्योजकतेचा प्रवास जसजसा पुढे सरकेल, यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे.

    तथापि हा प्रवास तितकासा सोपा असणार नाही. तुम्हाला एकटं वाटू शकतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, पण वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मध्येच सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.

    Tips for Successful Entrepreneurship

    बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखीम घेतात. थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधींचा शोध घेत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी जात आहात. सुरुवातीला तुम्ही खूप आनंदात असता. आपण काहीतरी नवीन करतोय याची वेगळीच मजा आणि उत्सुकता तुमच्या मनात असते, पण चढण जशी अधिक कठीण होत जाते, तुम्ही चालताना मध्येच अडखळू लागता (बहुतांशी लोकांच्या बाबतीत हेच होतं). तुम्हाला पुढे जायचं असतं, पण जाता येत नाही आणि एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने परत आला म्हणून लोकं नावं ठेवतील या भीतीने माघारी जाऊ शकत नाही, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकलेले असता.  

    या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला नवीन संधीचं दार उघडून देण्यासाठी एखादा चांगला मार्गदर्शक/प्रशिक्षक उपयुक्त ठरू शकतो.