Tag: success tips

  • स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    कामात परफेक्शन हवे

    नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    प्रामाणिकपणा

    नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    स्वतःला ठेवा अपडेट

    काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आत्मविश्वास

    आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आणखी वाचा

  • आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    प्रत्येकाला आपल्या जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जावे लागत असतं. मग ते प्रसंग आनंदाचे, दुःखाचे, धैर्याचे, भीतीचे, जबाबदारीचे कोणतेही असू शकतात. या सर्व प्रसंगाचे अस्तित्व म्हणजेच माणसाचे जीवन होय. अपेक्षित यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे निर्णयक्षमता. जरी आपण आत्मविश्वासाला यशाची गुरुकिल्ली म्हटलं, तरी निर्णयक्षमता हेच यशाचं रहस्य असतं. जेव्हा आपण एखादी कृती करण्याचा निर्णय घेऊ तेव्हाच ती पूर्णतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होईल.. नाहीतर जर तुम्ही निर्णयच नसेल घेतला तर यश अपयश लांबच्या गोष्टी.  

    मंडळी, तुम्ही जर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीनुसार काम करत गेला ना, तरंच तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकता. सिद्धार्थने जर आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचाच मार्ग अवलंबला असता, तर तो युगप्रवर्तक गौतम बुद्ध कधीच बनला नसता. आपला एखादा लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जसे महाभारतातील दोन वेगवेगळ्या निर्णयांची आपण अजूनही चर्चा करतो. एक योग्य निर्णय म्हणजे अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षात घेणे आणि दूसरा अयोग्य निर्णय दुर्योधनाने कृष्णाकडे सैन्याची मागणी करणे. एकाच परिस्थितीतील या दोन निर्णयांनी एकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले तर दुसऱ्याचे समृद्ध.

    आणखी वाचा

  • स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

    स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

    ध्येयनिश्चिती –

    शिस्त –

    ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती यांच्यामधील पूल म्हणजे शिस्त. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकते. मग तुमच्यामध्ये टॅलेंट असो वा नसो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी अतिशय शिस्तप्रिय असते. या व्यक्ती तिच्या आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे त्यांचे आऊटपुट हे आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्तच असते, कारण त्यांना आज काय करायचे याचा विचार करण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. त्यांचा प्लॅन हा आधीच ठरलेला असतो.

    जोखीम –

    आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजतेने मिळत नाही आणि जर तुमच्या नावाचा उल्लेख यशस्वी लोकांच्या यादीत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासमोर कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्हाला स्वीमर व्हायचे असेल, पण पाण्यात उतरायची भीती वाटते म्हणून तुम्ही पाण्यात उडीच मारली नाही, तर तुम्ही स्विमर बनू शकता का? अर्थातच नाही. म्हणून तुम्ही जे ध्येय निवडले आहे ते पूर्ण करण्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले तरी मागे हटू नका. जोखीम स्वीकारा आणि कार्य पूर्ण करून दाखवा.

    शिकाऊ वृत्ती –

    असं म्हणतात की, माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तो नेहमी कोणाकडून काही ना काही शिकत असतो. मग त्याचे वय 25 असो, 50 असो किंवा 70. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल, तर नेहमी अपडेटेड राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शिकाऊ वृत्ती असणं खुप गरजेचं आहे. जग काळानुसार बदलत असतं आणि या बदलत्या जगानुसार तुम्ही आम्ही देखील बदलणं गरजेच आहे. जर आपण प्रवाहानुसार चाललो तर किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर प्रवाहाबाहेर फेकले जाऊ. त्यामुळे या बदलत्या दुनियेनुसार इतरांकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकून स्वतःला जगावेगळे बनविण्यासाठी सज्ज व्हा.      

    वाचन: 

    प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन यशप्राप्ती करण्यासाठी आपले आयुष्य खुप छोटे आहे, त्यामुळे यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचे धडे घेऊन त्यांच्या अनुभवातून गोष्टी शिकल्या पाहिजे आणि यासाठी वाचन हा एकमेव पर्याय आहे. वॉरेन बफे दररोज न चुकता पुस्तकं वाचतात. कारण त्यांना माहीत आहे की; त्यांची संपत्ती हे त्यांचे सर्वस्व नाही, तर नॉलेज हेच सर्वस्व आहे. तुम्हाला जर त्यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असेल, तर दिवसातून निदान 10 पानं तरी वाचलीच पाहिजे. 

    आणखी वाचा