Tag: naviarthkrantiblogs

  • बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ मुबलक पैसा असणे खूप गरजेचे आहे. पण पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो.  पण, हे ही बचत काही एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. 

    तुमची बचत तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. भरपूर बचत गाठीशी असल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागण्याबोलण्यातून जाणवत असतो. उत्पन्न जेमतेम असल्याने बचत करू शकत नाही, असा फार मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हातातोंडाशी गाठ आहे, अशा उत्पन्न गटातील लोकांना बचत करणे कठीण असते, जीवनावश्यक खर्च एका मर्यादेपेक्षा कमी होऊ शकत नाहीत, म्हणून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे हाच पर्याय योग्य ठरतो.

    कोण किती कमावतो, यापेक्षा त्याच्या कमाईतून किती प्रमाणात बचत करतो, किती अतिरिक्त खर्च करतो यांसारख्या बाबींवर त्या व्यक्तीची दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती क्षमता आणि त्याचे आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते.

    कमी किंवा योग्य तितकाच खर्च करणे हा बचतीचा मूलमंत्र आहे; परंतु बरेच जण बचतीचा विचार करण्यापेक्षा कुठे, कसा आणि किती खर्च करता येईल याच विचारात जास्त असतात.

    खर्च किती, कसा, कुठे आणि का करावा हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे. तरीही उत्पन्नाच्या तुलनेत आणि बचतीचे व्यवस्थापन ठरवून केल्यास आर्थिक अडचणी येत नाहीत.

     उदाहरण १ :

    निशा आणि पंकजचा रविवार उजाडला तोच मुळी कागद आणि पेन घेऊन. प्रत्येक खोलीत काय फर्निचर करायचं याचा आराखडा दोघांनी मिळून तयार केला. गेल्या कित्येक महिन्यांत दोघांच्या पगारातले थोडे थोडे करत बरेच पैसे त्यांनी त्यांचे घर सजवण्यासाठी साठवले होते.

    उदाहरण २ :

    रोजंदारीच्या कामावर जाणारा रघू आज खुश होता. गावाकडे असणारी त्याची बायको, मुलं लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ शकणार होती. कारण आजच तो एक खोली भाड्याने घेण्यासाठी मालकासोबत व्यवहार करून आला होता. रोजच्या कामाचे मिळणारे पैसे अगदी गरजेपुरते थोडे वापरून बाकीचे पैसे त्याने शेठच्या सांगण्यावरून बँकेत साठवले होते.

    निशा-पंकज असोत की रघू असो, रोजच्या दैनंदिन खर्चाशिवाय अधिकचा खर्च ते करू शकत होते. हे त्यांना कसे सहज शक्य झाले? याचे उत्तर म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कमाईच्या पैशातून काही पैसे त्यांनी वेगळे काढले होते, बचत केली होती. उत्पन्नातील सर्वच्या सर्व पैसे त्यांनी लगेच खर्च केले नव्हते.

    अविचाराने खर्च करणारी, कोणाच्याही साहाय्याशिवाय लढणारी आणि प्रत्येक गोष्टीची घाई करणारी व्यक्ती लवकर लयास जाते.

    साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेले सर्वच उत्पन्न उधळून न देता काही रक्कम हाती राखणे महत्वाचे आहे. हातात आले आणि उडवून लावले असे न करता उत्पन्नातून खर्च वजा जाता जी शिल्लक आपल्याकडे उरते ती रक्कम म्हणजे बचत! बचतीचे हे सूत्र कोणत्याही बाबतीत लागू पडते, पैसा असो, वेळ असो, अन्न धान्य असो की पाणी असो, बचत सर्वव्यापी आहे.

    Add a heading 7

    बचतीची सुरुवात कशी करावी : 

    1. तुमच्या खर्चाची नोंद करा

    पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या खर्चाची तुम्हाला चांगली जाणीव असणे. लोक पुरेशी बचत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे खर्च केल्यानंतर फारसा पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट महिन्यात खर्च केलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. 

    2. कर्ज नियोजन

    जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असते तेव्हा कर्ज सामान्यतः अटळ असते. तुमच्यावर एकूण किती कर्ज आहे, ते कर्ज तुम्ही किती दिवसात आणि कसे फेडणार आहात याचा आराखडा तुमच्याकडे आधीच तयार असणे आवश्यक आहे. नियोजन केलेले असेल तर त्या कर्जाचा अतिरिक्त ताण न येता सुलभरित्या तुम्ही त्या कर्जाची परतफेड करू शकाल.

    3. बजेट तयार करा

    तुमचा पैसा कुठे जात आहे हे एकदा तुम्हाला कळले की, तुम्ही तुमच्या पैशांचे वाटप कसे करायचे यावर विचार  करून निर्णय घेऊ शकता. आपण प्रत्येक खर्चाचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. घरभाडे, कर्ज यांसारखे निश्चित खर्च आहेतच; पण जेवण, वाहतूक आणि मनोरंजन यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवता येवू शकते. 

    4. मोठी बचत करण्यासाठी लहान प्रारंभ करा

    तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न फारसे जास्त नसेल. बर्‍याच वेळा, सर्व खर्चानंतर खूप कमी गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम उरते. तरीही जमेल तेवढी बचत करत जा. तुम्ही केलेली छोटी सुरुवातच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. जसजसे उत्पन्न वाढते तसतसे गुंतवणुकीचे प्रमाण वाढवता येते.

    5. बचतीची उद्दिष्टे सेट करा

    बचत उद्दिष्टे सेट केल्याने प्रारंभ करणे खूप सोपे होते. प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे ठरवून सुरुवात करा.

    काही अल्प-मुदतीची  उद्दिष्टे (ज्याला साधारणत: 1-3 वर्षे लागू शकतात) उदा. नोकरी गमावल्यास किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत 6 महिने ते एक वर्षाचा खर्च करण्यासाठी आणीबाणी निधी, सुट्टीसाठी पैसे वाचवणे, नवीन खरेदी करण्यासाठी बचत करणे.

    दीर्घकालीन बचत उद्दिष्टे अनेक वर्षे किंवा अगदी दशके लांब असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो : निवृत्तीसाठी बचत करणे, तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे टाकणे, दुसऱ्या घरासाठी बचत करणे किंवा तुमच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करणे.

    6. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा

    तुम्हाला करावयाच्या प्रत्येक गोष्टीची प्राथमिकता ठरवा. कोणती गोष्ट जास्त गरजेची आहे तिला आधी प्राधान्य द्या. कमी आवश्यक असणाऱ्या बाबी नंतर ठेवा. तुमची उद्दिष्टे ठरवा आणि ती कोणत्या क्रमाने तुम्हाला साध्य करायची आहेत याचे नियोजन करा.

    शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरीसुद्धा निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत ही केलीच पाहिजे. तुम्ही किती ताठ मानेने चालता याच्याशी तुमच्या बचतीच्या स्थितीचा खूप जास्त संबंध आहे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातील पत ठरणार हे मात्र नक्की !

    हे पण वाचा:

  • भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे…

    भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे… 

    कोणताही व्यवसाय म्हटला की, तुम्ही तुमची उत्पादनं लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहचवता आणि ते ग्राहकांना कसं आणि किती आकर्षित करतं याची भूमिका खूप महत्त्वाची असते. चांगल्या मार्केटिंग तंत्राचा वापर करणारी उत्पादनं ग्राहकांना लवकर आकर्षित करतात. आज आपण अशाच एका लोकप्रिय Brand ची Marketing टेक्निक पाहणार आहोत. 

    भारतात मॅगी नूडल्स एक लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. 1980 च्या दशकात भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर, मॅगी नूडल्सचा केवळ एक Brand म्हणून राहण्यापेक्षा, भारतीयांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली. त्यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये दडलेले आहे.

    मॅगीने ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन उत्पादनं तयार केली, स्थानिक चवींवर जोर दिला आणि विविधता आणली. त्याचबरोबर, सोशल  मीडिया, इमोशनल मार्केटिंग आणि क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ब्रँडची लोकप्रियता वाढवली.

    चला तर मग पाहूया भारतात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मॅगी या नूडल्स ब्रँड कडून शिकण्यासारखे काही मार्केटिंगचे धडे :

    1. जाहिरातींमध्ये भावनांचा वापर :

    जेव्हा जेव्हा आपण मॅगी बद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात चवदार नूडल्स बनवणाऱ्या आईची प्रतिमा येते. मॅगी हे अनेक वर्षांपासून कौटुंबिक खाद्य म्हणून सादर केले जाते आणि त्यांच्या जाहिरात कॅम्पेनमुळे त्यांना त्यांची ही प्रतिमा टिकवून ठेवण्यास खूप मदत झाली आहे.

    1

    2. लहान आणि अर्थपूर्ण tagline चा वापर :

    कोणत्याही मार्केटिंग मोहिमेत टॅगलाइन्सचा महत्त्वाचा भाग असतो. मॅगी अनेक वर्षांपासून लहान आणि आकर्षक टॅगलाइन वापरत आहे. “स्वाद भी, स्वास्थ्य भी”चे उदाहरण घ्या, ही टॅगलाइन मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करू शकते, कारण नूडल्स ही अशी गोष्ट आहे जी लोक खाणे टाळतात कारण ते आरोग्यास चांगलं नाही; परंतु मॅगीच्या या tagline मुळे त्यांचे नूडल्स आरोग्यास चांगले आहेत हे लोकांच्या मनात आपसूकच ठसवले जाते. 

    2

    3. प्रत्येक प्रकारचे मार्केटिंग :

    प्रिंट जाहिराती, होर्डिंगपासून सोशल मीडियापर्यंत, मॅगीच्या जाहिराती सर्वत्र आहेत. मॅगीवरील बंदी हटवल्यानंतर मॅगीने आपली मार्केटींगमधील गुंतवणूक सुमारे 96 टक्क्यांपर्यंत वाढवली. ही साधी गोष्ट नाही. अगदी चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्ये मॅगीचे प्रायोजकत्व दिसून येते. अनेक ब्रँड सहसा मार्केटिंगच्या एका मार्गावर लक्ष केंद्रित करण्याची चूक करतात. जे धोकादायक देखील असू शकते, म्हणून नेहमी शक्य तितक्या विविध प्रकारच्या मार्केटिंगचे प्रकार वापरणं गरजेचं आहे. ज्यामुळे अनेक प्रकारच्या ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचण्यास मदत होईल. 

    3

    4. विक्री 

    मॅगीच्या पॅकेटच्या मागील बाजूस एक रेसिपी मॅन्युअल आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा मॅगी बनवते किंवा ती कशी बनवायची हे तिला माहित असतेच असे होत नाही. तेव्हा या पाककृती खूप मदत करतात. पॅकेजिंगमध्ये उत्पादनाबद्दल योग्य ज्ञान देणे हा देखील एक खूप चांगला आणि अर्थपूर्ण धडा आहे. त्याचबरोबर मॅगी २ मिनिटात बनते हे त्यांच्या प्रत्येक जाहिरातीतून ग्राहकांच्या मनावर ठसवलं जातं. खरं बघायला गेलं तर मॅगी बनायला २ मिनिटांपेक्षा जास्तच वेळ लागतो, पण आमची रेसिपी कमी वेळात बनते ही भावना ग्राहकांच्या गळी उतरण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.    

    4

    5. सेलिब्रेटींच्या शक्तीला कमी लेखू नका :

    अमिताभ बच्चनपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत, मॅगीने त्यांच्या जाहिरातींमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला आहे. नूडल्समध्ये नंबर १ ब्रँड बनण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे, कारण भारतातील

    आणखी वाचा

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. यामुळे त्यांनाही उपयुक्त माहिती मिळेल.

  • लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे  व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे.

    भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक म्हणता येईल.

    जेव्हा एखादी वस्तू किंवा मालमत्ता कमी किमतीत खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किमतीला विकून त्यावर मिळणारा भांडवली नफा हा त्या गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा होय. 

    अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारात आपल्याला गुंतवणूक करता येते.

    गुंतवणूक ही आपले आर्थिक भवितव्य अधिक आणि लवकर  सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. गुंतवणूक सुरु करण्यास खरंतर उशीर कधीच होत नसतो, पण तरीसुद्धा लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याशिवाय आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते, कारण त्यांच्या Professional Life च्या  सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.  

    आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की माणसाने जर १ रुपया कमावला तर त्यातले २५ पैसे खर्च करावेत, २५ पैसे दान करावेत, २५ पैसे मुलांसाठी आणि उरलेले २५ पैसे गुंतवणूक करण्यासाठी वापरावेत. म्हणजेच थोडक्यात आपल्या कमाईचा २५% हिस्सा आपण गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. गुंतवणूक म्हणजे आपल्या भविष्यकाळाची तरतूद असते. बहुतांश लोक लवकर गुंतवणूक करत नाहीत, कारण आयुष्यात लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना ठाऊक नसते ; परंतु लवकर गुंतवणूक करणे नेहमीच आपल्या हिताचे ठरते.

    लवकर म्हणजे नक्की कधी?

    वॉरन बफे म्हणतात की ‘मी वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो.’

    आपण आपल्या पहिल्या पगारापासून आपली गुंतवणूक सुरू करावी याचा अर्थ कमाई सुरू झाल्यावर साधारणतः २२ ते २५ वयोगटाच्या आसपास आपण गुंतवणूक सुरु करायला हरकत नाही.

    तरुण वयात चांगली कमाई होत असताना योग्य बचत न करता खर्चाची सवय लागल्यास पुढील आयुष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण होते. त्यापेक्षा शुभस्य शीघ्रम् ! आता गुंतवणूक सुरु करा. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्या वेळेचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. लवकर गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर आपण लवकर प्रारंभ केला नसेल तर त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आता गुंतवणूक सुरू करा.

     म्हातारपणातही ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण राहतात. याउलट, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती मात्र तरुणपणातच वृद्ध होतात.

    थोडक्यात काय तर जेव्हा आपण कमवायला सुरुवात करू तेव्हा आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा आपल्याला झेपेल त्या प्रकारात आपण गुंतवलाच पाहिजे, ज्या गुंतवणूक प्रकाराचा आपल्याला भविष्यात लाभ होईल.

    लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे विविध फायदे :

    1. संपत्ती : 

     लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या संपत्तीला वेळ देऊन ती वाढवता येते. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या रकमेचा स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदा मिळवू शकता. भविष्यातील ध्येयनिश्चिती करू शकता. काय योग्य ? काय अयोग्य? हे ओळखून कुठं गुंतवणूक करायची ? कशी आणि किती करायची हे आर्थिक शहाणपण कमी जबाबदारी असलेल्या वयातच येतं.

    2. कम्पाउंड इंटरेस्ट :

    गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज म्हणून वाढते, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.

    3. सहनशीलता : 

    लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला बाजारातील उतार-चढावांशी सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही अधिक शांतपणे गुंतवणूक करु शकता. संयम ठेवायला शिकता येतं. एक गुंतवणूकदार म्हणून आपली Risk Taking Capacity वाढते. त्या तणावाचं योग्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं.

    4. आर्थिक स्वातंत्र्य : 

    जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक, बचत, आणि इतर आर्थिक योजना आखता, आर्थिक ध्येयनिश्चिती करता,  तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या जीवनात भविष्यातील आर्थिक संकटांची चिंता कमी करत असता.

    सुरुवातीला कमी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमची दिर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता.

    5. सातत्यपूर्ण बचत :

    लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला आर्थिक नियोजनाची आणि बचतीची सवय लागते. आपल्या उत्पन्नाच्या काही रकमेची आपल्याला बचत करायचीच आहे ही सवय लागून जाते.

    यामुळे लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला भविष्यात मोठ्या लाभाची, मोठ्या परताव्याची संधी देतात. 

    म्हणून आजच श्रीगणेशा करा तुमच्या गुंतवणुकीचा !

    हे पण वाचा

  • तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    CIBIL Score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited Score होय. हा एक 3-अंकी Score आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा व्यक्तीच्या क्रेडिटच्या  इतिहासावर आणि कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची Credit पात्रता चांगली मानली जाते.

    जर CIBIL 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना अशा व्यक्तीस प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते किंवा उच्च व्याजदर भरावा लागू शकतो.

    CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे आणि अधिक कर्ज किंवा क्रेडिटची गरज न ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

    जास्त Score म्हणजे त्या व्यक्तीची क्रेडिट क्षमता चांगली आहे आणि कमी Score म्हणजे ती व्यक्ती वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेवर करत नाही.

    CIBIL Score ची भूमिका : 

    कर्ज प्रक्रियेत CIBIL Score खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जर हा Score चांगला असेल, तर कर्ज मंजूर होण्यास शक्यतो कोणतीही अडचण येत नाही; पण जर हा Score कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. चांगल्या CIBIL Score सह कमी व्याजावर कर्ज मिळण्याचीही शक्यता असते. 300 ते 550 चा CIBIL Score कमकुवत मानला जातो. तर 550 ते 650 सरासरी, 650 ते 750 चांगला आणि 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो. 

    CIBIL Scoreची मुख्य भूमिका खालीलप्रमाणे आहे :

    1. कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा आधार: जेव्हा तुम्ही गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमचा CIBIL Score  तपासते. चांगला Score असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.

    2. व्याजदर ठरवण्यासाठी: जास्त CIBIL Score असलेल्या व्यक्तींना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, कारण बँकांना अशा व्यक्तींवर जास्त विश्वास असतो की, ते वेळेवर परतफेड करतील.

    3. क्रेडिट कार्ड मंजुरी: क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या देखील तुमचा CIBIL Score पाहून तुमच्यासाठी योग्य कार्ड मंजूर करतात. चांगला स्कोर असल्यास जास्त क्रेडिट Limit मिळते.

    4. Risk Management: कर्ज देणाऱ्या संस्थांना तुमचा CIBIL Score पाहून ठरवता येते की, तुम्ही त्यांच्या दृष्टीने जोखीम आहात की नाही. कमी Score असणाऱ्या व्यक्तींना कर्ज देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांना कर्ज नाकारले जाते किंवा जास्त व्याजदर दिला जातो.

    5. करिअर: काही क्षेत्रांमध्ये, विशेषतः आर्थिक सेवांमध्ये, बहुतांश कंपन्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचा CIBIL Score तपासतात. चांगला Credit Score म्हणजे त्या व्यक्तीची आर्थिक शिस्त आणि जबाबदारी दर्शवत असते. 

    6. इतर फायदे: जास्त CIBIL Score असणाऱ्या व्यक्तींना कधी कधी विशेष ऑफर, जास्त क्रेडिट लिमिट किंवा कमी प्रोसेसिंग फी सारखे अनेक फायदे मिळतात.

    Untitled design 12

    1. तुम्ही तुमचा CIBIL Score कसा तपासू शकता: 

    Step 1: CIBIL वेबसाइटला भेट द्या.

    Step 2: मुख्य पानावर ‘Get Your CIBIL Score’ किंवा ‘Free CIBIL Score’ या पर्यायावर क्लिक करा.

    Step 3: तिथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक असतो.

    Step 4: या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा CIBIL Score दिसेल. सुरुवातीला कदाचित एकदा नोंदणी करावी लागू शकते. काहीवेळा, हे मोफत असते, तर काहीवेळा वार्षिक Subscription

     शुल्क भरावे लागते.

    2. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे CIBIL Score तपासणे

    तुम्ही विविध अ‍ॅप्स वापरून देखील CIBIL Score तपासू शकता :

    Paytm :

    • Paytm अ‍ॅप उघडा आणि Loans & Credit Cards किंवा CIBIL Score पर्यायावर जा.
    • आपले KYC डिटेल्स किंवा पॅन कार्ड नंबर भरून Score तपासा.

    Bajaj Finserv:

    • Bajaj Finserv अ‍ॅपवर नोंदणी करा.
    • Check your CIBIL Score या पर्यायावर जा आणि पॅन कार्ड आणि इतर माहिती भरून तपासणी करा.

    BankBazaar:

    • BankBazaar अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जा.
    • CIBIL Score मोफत तपासण्याचा पर्याय निवडा आणि त्यानुसार आपली माहिती भरा.

    बँक किंवा वित्तीय संस्थांमधून बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्थाही मोफत किंवा सवलतीच्या दरात CIBIL Score तपासण्याची सेवा देतात.

    तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करून देखील काही बँकांच्या सेवा वापरून CIBIL Score तपासू शकता

    उदा.

    • HDFC Bank
    • ICICI Bank
    • SBI (State Bank of India)

    3. विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट्स मिळवण्यासाठी इतर पर्याय :

    • भारतात, तुम्ही TransUnion CIBIL कडून वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. तुम्हाला या अहवालात तुमचा CIBIL Score  तसेच इतर क्रेडिट माहिती दिसेल.
    • CIBIL वेबसाइटवर जा आणि Free Annual Credit Report पर्यायावर क्लिक करा.

    आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि CIBIL Score दिसेल.

    तुमचा CIBIL Score हा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा आणि जबाबदारपणाचा आरसा आहे. तो फक्त कर्ज मिळवण्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर तुमची आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता याचेही प्रतीक आहे. त्यामुळे नियमितपणे क्रेडिट कार्डच्या देयकांचे वेळेवर पेमेंट, कर्जाचे नियोजनबद्ध पुनर्भरण आणि खर्चाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. CIBIL स्कोअर चांगला ठेवणे म्हणजे तुमच्या आर्थिक भवितव्यासाठी उत्तम तरतूद करण्यासारखे आहे.

    आणखी वाचा:

  • 2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

    2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

    आजकाल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी अनेकजण ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतात, परंतु त्यातून पैसे कसे मिळवायचे हे अनेकांना माहित नसतं. ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं की; गुगल ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप, प्रॉडक्ट्सची विक्री इत्यादी. परंतु या सगळ्यांमध्ये Google AdSense हा एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा मार्ग. आज आपण या लेखात Google AdSense म्हणजे काय, ते कसं कार्य करतं, AdSense ची मान्यता कशी मिळवायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे सविस्तरपणे समजून घेऊया

    Google AdSense म्हणजे काय?

    Google AdSense ही एक Google द्वारे चालवली जाणारी जाहिरात सेवा आहे. हा एक Advertise प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध स्वरूपाच्या जाहिराती, जसं की इमेज, व्हिडिओ, बॅनर जाहिराती दाखवण्यात येतात. जेव्हा तुमच्या ब्लॉगला Google AdSense चे अप्रूवल मिळतं, तेव्हा तुमच्या कंटेंटशी संबंधित जाहिराती Google तुमच्या वेबसाईटवर दाखवतं. वेबसाईटवर आलेले व्हिजिटर्स जेव्हा जाहिरातींवर क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.

    Google AdSense कशाप्रकारे कार्य करते?

    Google AdSense च्या कार्यप्रणालीमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम, तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगला पात्रतेसाठी Google द्वारे एक मूल्यांकन केलं जातं. जर तुमची वेबसाईट पात्र असेल, तर तुम्हाला एक अकाउंट अप्रूव्ह केलं जातं. एकदा अप्रूवल मिळाल्यानंतर, Google तुम्हाला एक कोड प्रदान करतं . हा कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. या कोडच्या माध्यमातून जाहिराती तुमच्या ब्लॉगवर दिसायला लागतात, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्लिकवर CPC (Cost Per Click) प्रमाणे पैसे कमवू शकता. वेबसाईटवरील ट्रॅफिक जितके जास्त असेल, तितके अधिक पैसे कमवता येतील. त्यामुळे, जाहिरातींवर जेवढे अधिकाधिक व्हिजिटर क्लिक करतात आणि तुमची कमाई वाढते.

    YouTube आणि AdSense

    फक्त ब्लॉगच नाही, तर YouTube चॅनलद्वारे सुद्धा Google AdSense च्या मदतीने कमाई करता येते. तुम्ही जेव्हा तुमच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओमध्ये जाहिराती दाखवता आणि त्यावर लोक क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला CPC च्या आधारावर पैसे मिळतात.

    AdSense ची मान्यता कशी मिळवायची?

    AdSense चे अप्रूवल मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे . तुमच्या वेबसाईटवर जरा युनिक आणि माहितीपूर्ण कंटेंट असणं महत्वाचं आहे. तसेच, तुमच्या वेबसाईटवर Contact Us, About Us, Privacy Policy, Terms & Conditions सारखी पेजेस तयार करणं  आवश्यक आहे. यानंतर Google AdSense च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक नवीन खातं तयार करावं लागेल. तुमची वेबसाईट Google च्या अटींनुसार योग्य असल्यास, तुम्हाला अप्रूवल मिळतं आणि जाहिराती वेबसाईटवर दिसायला लागतात. या प्रक्रियेत थोडा वेळ लागू शकतो, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश निश्चित  मिळेल.

    Google AdSense ही ब्लॉग आणि वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याची एक सोपी व प्रभावी पद्धत आहे. जर तुमच्याकडे ब्लॉग किंवा न्यूज वेबसाईट असेल किंवा तुम्ही जर उत्तम लिहणारे असाल, तर तुम्ही स्वतःची वेबसाईट सुरु करून योग्य पद्धतीने AdSense द्वारे पैसे कमवू शकता.

    Google AdSense मधून किती पैसे कमावता येतात?

    यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमच्या वेबसाईटवरील ट्रॅफिक आणि जाहिरातींवर क्लिक होण्याच्या प्रमाणावर हे अवलंबून असतं. युनिक कंटेंट, योग्य पेजेस (About Us, Privacy Policy), आणि नियमित ट्रॅफिक मिळणारी वेबसाईट Google AdSense च्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमविण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकता.

    मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायलाही विसरू नका. 

    आणखी वाचा:

  • Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

    Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

    जगामध्ये प्रत्येक कालखंडात एकाचवेळी किमान ३-४ पिढ्या आढळून येतात. 21 व्या शतकात १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात.

    आत्ताचा काळ वेगाने बदलत आहे व त्यानुसार तंत्रज्ञानही. या तंत्रज्ञानाशी मैत्रीपूर्ण नाते असलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड. ही पिढी म्हणजे १९९५ नंतर जन्मलेली १२ ते १८ वयोगटातील मुले. त्यांची इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडियाशी खूपच मैत्री आहे. दीर्घकाळ ऑनलाइन असणारी ही पिढी. इतरांच्या तुलनेत तंत्रज्ञान विश्वाच्या अधिक जवळ दिसून येते.

    Gen z पिढीची वैशिष्ट्ये :

    तंत्रज्ञानाचा अंगीकार : 

    Gen Z ची पिढी लहानपणापासूनच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटशी जोडलेली आहे. ते डिजिटल युगात वाढलेले असल्यामुळे तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत आहेत.

    सामाजिक जाणीव :

    या पिढीतील लोक सामाजिक प्रश्नांबद्दलसुद्धा जागरूक असतात. पर्यावरण, समानता, मानसिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांबद्दल ही पिढी विचारशील दिसून येते. समाजाबद्दल असलेली आंतरिक ओढ या पिढीमध्ये दिसून येते.

    मल्टी-टास्किंग कौशल्य : 

    या पिढीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यात यशस्वी झालेले दिसतात.

    स्वतंत्र विचारसरणी : 

    Gen Z स्वतःच्या निर्णयांवर भर देणारी, स्वत:वर विश्वास असणारी, आत्मविश्वासाने भरलेली पिढी आहे. ते स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे धाडस करत आहेत, ते धाडस यशस्वी करूनही दाखवत आहेत तसेच पारंपारिक नोकऱ्यांच्या ऐवजी फ्रीलान्सिंग आणि स्टार्टअपमध्ये त्यांचे स्वारस्य दाखवत आहेत.

    वैश्विक दृष्टिकोन : 

    सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील विविध संस्कृतींशी जोडले गेल्यामुळे त्यांची विचारसरणी आणि दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक झालेला दिसतो.

    अर्थपूर्ण कामे : 

    या पिढीला केवळ पैशासाठी काम करणे आवडत नाही, तर त्यांना त्यांचे काम अर्थपूर्ण आणि सामाजिक बदल घडविणारे असावे असे वाटते.

    निर्णयक्षमता : 

    तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रचंड उपलब्धतेमुळे, Gen Z जलद निर्णय घेण्यास सक्षम आहे. ते लवकर माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करून तितक्याच तात्काळ निर्णय घेण्यावर भर देतात.

    व्यक्तिमत्त्व विकास : 

    सोशल मीडियाच्या युगात, स्वतःचे “व्यक्तिमत्त्व” कसे सादर करावे हे Gen Z चांगले जाणते. Instagram, Facebook, LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची ओळख आणि वैयक्तिक ब्रँड विकसित करण्यास ही पिढी अधिक महत्त्व देते.

    विविधतेचा स्वीकार : 

    Gen Z पिढी विविधतेबद्दल अधिक संवेदनशील आहे. जात, लिंग, लैंगिकता आणि सामाजिक स्थिती याबद्दल त्यांची विचारसरणी अधिक समर्पक आणि आधुनिक आहे.

    उद्योजकता : 

    ही पिढी पारंपारिक 9-5 च्या नोकरीपेक्षा उद्योजकतेवर भर देते. अनेक Gen Z युट्युबर, इन्फ्लुएन्सर, फ्रीलान्सर तसेच स्टार्टअप फाउंडर्स आहेत. त्यांना स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची आवड आहे.

    मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता : 

    मानसिक आरोग्य हा विषय Gen Z साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते ताणतणाव, चिंता आणि मानसिक आजार यांबद्दल खुलेपणाने बोलतात आणि मदत घेण्यासही तत्पर असतात.

    इको-फ्रेंडली दृष्टिकोन : 

    पर्यावरण आणि शाश्वत मूल्ये याबद्दल ही पिढी अधिक जागरूक आहे. ते पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उत्पादनांचा वापर, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देताना दिसून येतात.

    सतत शिकण्याची वृत्ती : 

    Gen Z पिढीला सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा दिसते. ऑनलाईन कोर्सेस, ट्यूटोरियल्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ते नियमितपणे स्वतःला Improve करत आहेत.

    या पिढीची नोकरी टिकत का नाही ?

    Gen Z at Workplace ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगितले गेले आहे कि Gen Z पिढीतील ४५% तरुण २ वर्षेही नोकरीच्या एका जागी टिकत नाहीत. याला विविध कारणेदेखील आहेत. मुळात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. तर ५१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्या करिअरच्या संभाव्यतेपर्यंत विस्तारित आहे. कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.

    या अहवालामध्ये आणखी काही बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये असणाऱ्या ७७% तरुणांनी कमर्शिअल ब्रँड तसेच त्यांच्या पदाला जास्त किंमत दिली आहे. तर या ७७% तरुणांमधील ४३% तरुण अनुभव तसेच Improvement आणि Growthच्या संधीला जास्त महत्व देत असतात. अहवालात सादर असलेल्या तरुणांपैकी ७२% तरुण वेतनाच्या रक्कमेपेक्षा Job Satisfaction ला जास्त महत्व देतात, तर ७८% तरुण नोकरी बदलत आहेत कारण त्यांना आणखी पुढे जायचे आहे. HR प्रोफेशन मधील ७१% तरुणांचे असे सांगणे आहे, कि नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण वेतन हेच आहे. त्यामुळे तरुणाईतील २५% लोक नोकरी बदलताना विशेष लक्ष त्यांच्या पगारावर देतात. अशा लोकांना स्वतःमध्ये राहायला जास्त आवडते. 

    आणखी वाचा:

  • पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभा राहू शकतो. यासाठी उत्पन्न कितीही असलं तरी त्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करता येणे गरजेचे ठरते. 

    आज आपण पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या 10 Master Tricks पाहूया: 

    • महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंगवर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
    • तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा, इच्छेनुसार नको.
    • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेकजण यामध्ये अडकलेले असतात.
    • महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS (Electronic Clearing Service) मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
    • क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकणारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
    • स्मार्ट कर्जं आणि वाईट कर्जं घ्या. स्मार्ट कर्ज म्हणजे अशी कर्ज ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात, याविरुद्ध वाईट कर्ज म्हणजे अशी कर्जं जी महाग दराने मिळतात उदा. वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
    • तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
    • तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दीमध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता, तेव्हा तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतात.
    • तुमच्या परिवाराला, घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूका समजून सांगा, जेणेकरून भविष्यात या गुंतवणूका त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
    • आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक लोकांचा सल्ला घ्या.

    लक्षात घ्या; एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते, त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात कमाई सुरू झाल्यापासून करणे गरजेचे आहे. ज्याला पैसा कमावता येतो, त्याला तो सांभाळताही आला पाहिजे आणि वाढवताही आला पाहिजे.

    आणखी वाचा

  • सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही. 

    आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंट हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे. 

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे काय ?

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे असा एक व्यक्ती जो व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे त्यांचा Presence निर्माण करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

    यामध्ये – 

    • सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे
    • पोस्ट्सचे नियोजन करणे
    • टार्गेट ऑडियन्सशी संवाद साधणे
    • ब्रँड प्रमोशन करणे, ट्रॅफिक वाढवणे 
    • व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी रणनीती तयार करणे यांचा समावेश असतो. 

    सोशल मीडिया कन्सलटंटचे मुख्य काम व्यवसायाचे ब्रँडिंग इमेज सुधारण्याचे असते, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विक्री किंवा लोकप्रियता वाढवण्याचे असते.

    आज कोणताही व्यावसायिक किंवा कंपनी, मग ती मोठी असो वा लहान त्यांचे ऑनलाईन अस्तित्व वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे एक सोशल मीडिया कन्सलटंट म्हणून पार्ट टाईम किंवा फुलटाईममध्ये पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे, परंतु या व्यवसायात येण्याअगोदर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

    सोशल मीडिया कन्सलटंट बनण्यासाठी आवश्यक बाबी : 

    1. सोशल मीडिया कन्सलटंटला प्रत्येक सोशल मीडिया टूलच्या साधक बाधक गोष्टींबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान केवळ फेसबूक किंवा ट्विटरपुरते मर्यादित नसावे. त्यांनी नफा मिळवण्याच्या व व्यवसायाच्या गुंतवणुकीवर परतावा (ROI) देण्याच्या धोरणांमध्येदेखील सर्जनशील असावे. 
    2. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    3. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    4. एक सोशल मीडिया सल्लागार म्हणून आपल्या ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे संभाव्य ग्राहक, सोशल मीडिया प्रेझेन्स, सध्याची वर्तमान सोशल मीडिया धोरणे व संबंधित इतर माहिती असणे आवश्यक असते. 
    5. ग्राहकाची सोशल मीडिया रणनीती, त्यांच्या कमजोर बाबी व अन्य समस्या निवारणाबद्दल नि:पक्षपाती मत तयार करण्यासाठी सोशल मीडिया सल्लागाराकडे विशेष कौशल्य असावे लागते.
    6.  सोशल मीडियाद्वारे व्यवसायवृध्दीचे धोरण तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. 
    7. एक सल्लागार म्हणून सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या डेटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. 
    8. सोशल मीडिया सल्लागार हे आपल्या ग्राहकाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये विविध डावपेच आखत व सतत नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये सोशल मीडियामधील सध्याचे ट्रेंडस व बदलांचे परीक्षण करणे, प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण बनवताना सोशल मीडिया माध्यमांचा व आपल्या मार्केटिंग ज्ञानाचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश असतो. 
    9. मार्केटिंग योजनांमध्ये विविध तंत्राचा कसा वापर करावा याचे व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे. 
    10. ग्राहकाच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायातील सर्वोत्तम योजनांचे मूल्यांकन व त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोशल मीडिया सल्लागाराचे असते. 
    11. ऑनसाईट कामकाजाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे हे कौशल्य विकसित करावे लागते. 
    creative team having discussion social media application

    एक परिपूर्ण सोशल मीडिया सल्लागार होण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

    सध्याच्या काळात आपल्या व्यवसायास ऑनलाईन अस्तित्व प्रदान करण्यासाठी उद्योजक सोशल मीडियाचा चांगल्यापैकी उपयोग करतात. परिणामी आजच्या काळात अनेक उद्योजक कंपन्याचे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया Presence प्रभावशाली करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया सल्लागारांची गरज असते. त्यामुळे सोशल मीडिया सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा अवश्य घ्या आणि करिअरच्या दृष्टीकोनातून याचा नक्की विचार करा. 

    आणखी वाचा :

  • 3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

    गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

    Zettafarms चे काम कसे चालते? 

    Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

    Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

    Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

    ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

    Zettafarms

    Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

    एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

    ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

    औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

    भविष्यातील वाटचाल : 

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

    आणखी वाचा

  • Apple च्या तिजोरीची चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    apple s new cfo kevan parekh 1724734551

    52 वर्षीय केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता  थेट CEO टीम कुक  यांना रिपोर्ट करणार आहेत आणि त्यांचा Appleच्या टीममध्ये एक महत्त्वाचा सहभाग असेल.

    Apple ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

    लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केवन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेले काही महिने केवन पारेख यांना ऍपलच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदासाठी तयार करत होते.

    पारेख यांनी यापूर्वी ऍपलमध्ये विक्री आणि विपणन विभाग हाताळले आहेत, त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी याआधी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील काम केले आहे. रॉयटर्समध्ये त्यांनी चार वर्षे उपाध्यक्ष पदावर काम केले, तर जनरल मोटर्समध्ये बिझनेस ग्रोथ डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते.

    ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी नवीन सीएफओ केवन पारेख यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. टीम कुक म्हणाले की, “केवन पारेख हे ऍपलच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.” लुका मेस्त्री यांनी देखील त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे आणि पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    आणखी वाचा