Tag: व्यवसायाच्या वाटेवर चालताना

  • Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    असं म्हटलं जातं की, श्रीमंत घरात जन्मलेल्या लोकांना मोठा व्यवसाय उभारण्याची अधिक संधी असते, सर्वसामान्य लोकांना व्यवसाय उभा करणं अवघड जातं. अनेक व्यक्ती स्वप्नं पाहतात, मोठे विचार मनात ठेवतात, पण त्यांच्या वास्तविक गरजांनी ती स्वप्नं धूसर होत जातात. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, जर तुमच्यात स्वप्नं पाहण्याची क्षमता आणि ती पूर्ण करण्याची मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

    देशातील वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरुवात केली इतरांच्या औषधांचा व्यवसाय करून आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वतःचा औषध व्यवसाय सुरू केला. ना त्यांच्यामागे व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, ना त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद होती. पण त्यांचं धाडस आणि जिद्द यामुळेच त्यांनी ‘फार्मा किंग’ म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला.

    प्रारंभिक जीवन

    दिलीप संघवी  यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ रोजी गुजरातमधील अमरेली या छोट्या गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यामुळे व्यापाराची मूलभूत समज त्यांच्याकडे बालपणापासूनच होती. त्यांच्या वडिलांचा एक छोटा औषध विक्रीचा व्यवसाय होता आणि संघवी लहानपणापासूनच वडिलांना या व्यवसायात मदत करत असत. ही मदत त्यांच्यासाठी फक्त कुटुंबाला दिलेला हातभार नव्हता, तर औषध उद्योगातील प्राथमिक अनुभव घेण्याची एक महत्त्वाची संधी होती. वडिलांना व्यवसायात केलेल्या मदतीमुळे औषध विक्रीच्या विविध बाजू समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. 

    संघवी यांनी कोलकात्यातील भवानी पूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. औषध निर्मितीचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता, त्यांनी वडिलांच्या व्यवसायात काम करत करत औषध बाजारातील विविध संधींची जाण मिळवली. औषध विक्रीच्या व्यवसायात असताना संघवींना हे लक्षात आलं की जेनेरिक औषधांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांनी विचार केला, की जर मी इतरांनी तयार केलेली औषधे विकू शकतो, तर मी स्वतःची औषधे का बनवू नये?

    या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून पुढे ‘सन फार्मास्युटिकल्स’ या यशस्वी कंपनीची स्थापना झाली. त्यांच्या लहानपणी घेतलेल्या अनुभवांनी आणि औद्योगिक दृष्टिकोनाने त्यांना औषध उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं

    सन फार्माची सुरुवात आणि विस्तार 

    १९८२ साली वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन सन फार्माची सुरुवात संघवींनी गुजरातमधील वापी येथे केली. सुरुवातीला कंपनीने मनोरुग्ण आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्पादनांची विविधता कमी होती, पण संघवी यांनी नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिलं,  ज्यामुळे कंपनीची औषधं बाजारात लोकप्रिय होऊ लागली.

    १९९७ मध्ये, कंपनीच्या स्थापनेनंतर १५ वर्षांनी, संघवी यांनी अमेरिकेतील कॅराको फार्मास्युटिकल्स नावाची एक फार्मा कंपनी विकत घेतली, ज्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. यानंतर २००७ मध्ये, त्यांनी इस्रायलमधील टारो फार्मा ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान आणखी बळकट झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी रॅनबॅक्सी कंपनी विकत घेतली. हे अधिग्रहण भारतीय औषध उद्योगात एक मोठा टप्पा होता, कारण यामुळे सन फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी बनली. यामुळे जागतिक बाजारातही सन फार्माचे स्थान मजबूत झाले.

    संघवी यांनी केलेली या कंपन्यांची खरेदी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे, तर संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी देखील होती. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर विकसित बाजारांमध्ये विस्तार केला, ज्यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वासार्ह ब्रँड बनली.

    २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय आज आहे २६०००० कोटींची कंपनी 2 1

    यशाच्या शिखरावर 

    दिलीप संघवी यांनी भारतीय औषध उद्योगात केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर औषध निर्मितीची गुणवत्ता वाढवून आणि किफायतशीर औषधांचा पुरवठा करून एक महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं  आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिकतेच्या पलिकडे जातो, जो समाजाभिमुख आहे, त्यांच्या या कार्यामुळे  अनेकांना योग्य आणि परवडणारी औषधे उपलब्ध झाली आहेत.

    संघवी यांनी फार्मास्युटिकल उद्योगाला नवी दिशा दिली, विशेषतः भारतात जेनेरिक औषधांची क्रांती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. औषधांच्या किमती कमी करून त्यांनी केवळ भारतीय ग्राहकांना नाही, तर जागतिक स्तरावरही आरोग्यसेवा परवडणारी बनवली आहे.

    त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी आणि योगदानासाठी दिलीप संघवी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, जो देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय, संघवी हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित झाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांनी अनेक वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून स्थान मिळवलं  आहे. २०१५ मध्ये त्यांना फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं, तेव्हा त्यांची संपत्ती $१७.५ बिलियन इतकी होती. सध्या फोर्ब्सनुसार, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती २९.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २.५० लाख कोटी रुपये इतकी आहे. सन फार्मा जगातील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी असून कंपनीत जवळपास ४१००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

    दिलीप संघवी यांचा जीवनप्रवास हा चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यांचा अद्भुत संगम आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते जागतिक स्तरावरील एक प्रमुख उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे खूप काही आहे – विशेषत: उद्योजकतेत टिकून राहण्यासाठी आणि सातत्याने नवनवीन संधी शोधण्यासाठीची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

    आणखी वाचा

  • बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर व्यवसाय करायला व सर्व आघाड्यावर तोंड द्यायला तयार असणारा आपला व्यावसायिक भागीदार अर्थात आपल्या व्यवसायाचा बिझनेस पार्टनर होय.

    बिझनेस पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी? 

    • व्यवसायात भागीदार असावाच का? 
    • असला तर तो का असावा? 
    • नसला तर तो का नसावा? 

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणे चांगले नसल्याचा सल्ला अनेक अनुभवी लोकांनी दिला आहे. तरीसुध्दा पार्टनर घ्यावाच का? 

    असे अनेक प्रश्न व्यवसायिकाला पडू शकतात. खरंतर बिझनेसमध्ये पार्टनर असणे गरजेचे आहे का, हे बिझनेसच्या प्रकारावर आणि त्याच्या गरजांवर अवलंबून असते; परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची बाब  म्हणजे व्यवसायात पार्टनर न घेता फार मोठे संघटन तुम्हाला उभे करता येत नाही. एकटा व्यक्ती फक्त एक प्रोप्रायटर होऊ शकतो. त्याची मजल पुढे जाऊन एकल व्यक्ती कंपनी (One Person Company – OPC) पर्यंतच जाऊ शकते आणि भारतात कायदा असे सांगतो की, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे.

    प्रोप्रायटर किंवा एकल व्यक्ती कंपनी फार मोठी Growth करू शकत नाही. त्यामुळे मोठा व्यवसाय करायचा असला, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी सुरू करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच बँका व इतर कंपन्या आपल्यासोबत (अर्थात कंपनीसोबत) मोठे व्यवहार करायला तयार होतात. म्हणून आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनर हा घ्यावाच लागेल; कारण ती व्यवसायाची गरज आहे. काहीजण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना घरातील व्यक्तींची (विशेष करून बायको अथवा नवरा, भाऊ, आई, वडील, मुलगा) नावे व्यवसायात सहभागी करतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र अशा कंपनीत केवळ नावालाच असणारे डायरेक्टर (संचालक/पार्टनर) काही काम करू शकत नाहीत किंवा कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना काम कसे करायचे हे माहिती असतेच असे होत नाही. त्यामुळे फायदा जरी घरातच राहिला, तरी कंपनी मोठी होत नाही. त्यामुळे हा फायदा व व्यवसायाचा विस्तार कमी प्रमाणात असतो.

    त्याउलट एखादा अनुभवी काम करणारा संचालक (तो घरातला नसला तरीही) पार्टनर म्हणून घेतला, तर कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण तो प्रत्यक्ष आपल्या कामांनी कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यामुळे फायद्याचे वाटे झाले, तरीसुध्दा चांगले उत्पन्न मिळते. कंपनी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक ग्राहक जोडले जातात. गुणवत्तेचा पार्टनर घ्यायचा की, केवळ नावालाच पार्टनर घेऊन स्वतः काम करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण आपण स्वतः किती काम करू शकतो हे आपल्यालाच चांगले माहिती असते.

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचे काही फायदे:

    1) नवीन कौशल्यं : 

    पार्टनरमुळे तुमच्या जोडीला नवीन कौशल्यं आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने पार पाडले जाऊ शकते.

    2) भांडवल वाढ : 

    पार्टनरमुळे आर्थिक गुंतवणुकीचा भार एकट्याच्या खांद्यावर न येता, तो दोन किंवा अधिक लोकांमध्ये विभागला जातो.

    3) निर्णय घेण्यात मदत : 

    पार्टनरमुळे निर्णय घेण्यात वेगवेगळी मतं आणि दृष्टीकोन मिळतात, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते

    4) Networking :

    प्रत्येक पार्टनरकडे त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक संपर्कांचे जाळे असते, जे बिझनेसला नवीन ग्राहक, सप्लायर्स किंवा इतर व्यवसायिक संधी मिळवून देऊ शकते.

    business agreement handshake hand gesture

    5) जोखीम वाटप :

    पार्टनरमुळे बिझनेसची जोखीम अनेकांमध्ये वाटली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते. आर्थिक नुकसान किंवा बिझनेसच्या अडचणींमध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येऊन त्या समस्येचा, अडथळ्यांचा सामना सोबतीने करू शकतात.

    व्यवसाय मोठा करायचा म्हटलं की, पार्टनर हा घ्यावाच लागतो, कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. मग तो पार्टनर नावापुरताच असावा की, प्रत्यक्ष काम करणारा असावा याबाबत जरी कायद्याने कोणतेही बंधन घातले नसले, तरी पार्टनरला फायद्यातील वाटा हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला द्यावाच लागतो. 

    दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, कंपनीचे मालक म्हणून कंपनीत येणारा सगळा नफा घरी न्यायचा नसतो किंवा कंपनी तोट्यात चालायला लागली म्हणून घरातील सगळ्या गोष्टी दाव्यावर लावून कंपनीबरोबर स्वतःचे वाटोळेदेखील करून घ्यायचे नसते ही पक्की खूणगाठ प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या मनात बांधून ठेवली पाहिजे. तुम्ही जरी कंपनीचे मालक असलात तरी तुमचा पगार आधी ठरवा. तेवढेच पैसे महिन्याच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबर आपल्या घरी न्या. तुमच्या पार्टनरलासुध्दा हेच नियम लागू करा. ही विचारांची स्पष्टता जर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असेल तरंच ही व्यवसायातील भागीदारी दीर्घकाळ टिकेल व व्यवसाय मोठा होईल.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा

    जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा 

    मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.

    image 5

    खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,

    1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं. 

    2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.

    3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.

    4. Risk घेण्याचं धाडस नसणं.

    5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव 

    6. सामाजिक दबाव 

    या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो. 

    image 7

    असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.

    बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.

  • भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल नसणे (३६६ मते)
    मार्गदर्शन नसणे (२१३ मते)
    कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा नसणे (१२७ मते)
    मार्केटिंग न करता येणे (९३ मते)
    मानसिकता व यशाबाबत साशंकता (५५ मते)
    सरकारी अडथळे (४१ मते)
    चुकीचे निर्णय (२८ मते)

    म्हणजेच भांडवल नसणे ही समस्या सर्वाधिक उद्योजकांना जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुम्हाला हवे तेवढे भांडवल मिळाले तर काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याचा बिझनेस प्लॅन बनविलेला आहे का? त्या व्यवसायासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही तयार आहात का? त्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असली, तर लगेच तुम्हाला भांडवलदार उपलब्ध आहेत. नसतील तर आपण त्याची तयारी करुन घेऊ.

    भांडवल उभारणीचे काही पर्याय :

    📌 बँका – बँकेसाठी सर्वात महत्त्वाची माणसे असतात ती म्हणजे कर्जदार. ठेवीदारापेक्षा बँकांना कर्जदाराची गरज जास्त असते; कारण बँका चालवण्यासाठी लागणारा पैसा हा कर्जदाराकडून मिळालेल्या व्याजातूनच मिळत असतो. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी उद्योजकांचा शोध घेत असतात. मात्र त्यांना कर्जाची रक्कम व व्याज योग्य वेळी आपण परत करु शकतो, या गोष्टीची खात्री पटवून देणे गरजेचे असते. एकदा आपण बँकेला कर्ज फेडण्याची खात्री पटवून देऊ शकलो की,० बँक आपल्याला लागेल एवढे कर्ज उपलब्ध करुन देते. आपणही आपला व्यवसाय अधिक जोमाने वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती पार पाडून व्यवसायाच्या वेगवान वृध्दीची गुरुकिल्ली प्राप्त करु शकतो.

    📌 HNI, NRI – एचएनआय म्हणजे High Networth Individual. काही भरपूर संपत्ती कमावलेली माणसे आपल्या समाजात असतात. त्यांना आपले पैसे काही नवीन व्यवसाय करणाऱ्या होतकरु तरुणांना मदत म्हणून द्यायचे असतात. यापैकी काही एचएनआय हे भागीदारी (Partnership) मागतात, तर काही लोकांना खात्रीशीर (fixed return) पैसे परत हवे असतात. ह्या लोकांपर्यंत आपली व्यवसायाची संकल्पना पोहोचवणे गरजेचे असते. अशा लोकांचे संपर्क क्रमांक, ईमेल असल्यास त्यांना आपला बिझनेस प्लॅन पाठवावा व नंतर त्यांना आपण बिझनेस प्लॅन पाठवल्याची व त्यांना तो पोहोचला असल्याची खात्री करुन घ्यावी.

    भारताबाहेर राहणारे अनिवासी भारतीय म्हणजेच NRI (Non Resident Indian) या लोकांकडे बऱ्यापैकी पैसे असतात. त्यांना भारताविषयी आस्था असते. ती व्यक्त करण्यासाठी व त्यातून ते गुंतवणूक करण्यास तयार असतात. त्यातून येणारी मिळकत ही रिटायरमेन्ट साठी वापरता यावी म्हणून जमा करुन ठेवतात; म्हणून हे पैसे दीर्घ कालावधीसाठी वापरता येतात. फक्त प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराचे पैसे इमानेइतबारे परत करावेत. कारण आपल्याला वेळोवेळी व्यवसायवाढीसाठी लागणारे पैसे ते देऊ करतात, त्यामुळे वेळच्यावेळी परत पैसे दिल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो.

    📌 अँजेल इन्व्हेस्टर्स : अँजेल इन्व्हेस्टर्स म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पतपुरवठा करत असतात. त्याबदल्यात त्यांना कंपनीत भागीदारी द्यावी लागते. केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोकांचं नेटवर्क खूप मोठं असतं. त्याचा फायदा करून घेता येतो. दुसरा फायदा म्हणजे, जसे कर्ज घेतले की दुसऱ्या महिन्यापासून हप्ते सुरु होतात, तसं इथे होत नाही. इन्वेस्टर्सनी दिलेले पैसे परत करण्याची गरज नसते, कारण त्या बदल्यात तुम्ही कंपनीचे शेअर्स त्यांना विकलेले असतात. त्यामुळे व्यवसाय वाढला तर त्यांचा फायदा होतो आणि बुडाला तर त्यांचे पैसेही बुडतात.

    📌 *क्राउड फंडिंग – *आजूबाजूच्या सामान्य माणसांकडून कमी प्रमाणात व जास्तीत जास्त लोकांकडून पैसा उभा करुन मोठे भांडवल उभे करता येते. ५०० लोकांकडून १००० रुपये प्रत्येकी एक वर्षासाठी कर्जाऊ घेतल्यास ५ लाख रुपये सहज उभे करता येतात. आपला प्रस्ताव हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बल्क एसएमएस, सोशल मिडीया व बल्क ईमेल या माध्यमातून आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवू शकतो. उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी आगाऊ नोंदणी करणे हाही एक भांडवलनिर्मितीचा मार्ग आहे. काही वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीने ५०० रुपयात मोबाईल देण्याची घोषणा करुन आगाऊ नोंदणी (Advance Booking) करुन लाखो रुपयांचे भांडवल उभे केले होते व नंतर काही महिन्यांनी ग्राहकांना मोबाईल दिले. टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी सुद्धा हाच मार्ग वापरला गेला आहे.

    मुक्त अर्थव्यवस्थेमुळे थेट परकीय गुंतवणूक हाही भांडवलनिर्मितीचा पर्याय उपलब्ध आहे. आपण जेवढी अधिक कल्पकता वापरु तेवढे अधिक पर्याय आपण स्वतःच निर्माण करु शकतो व त्यातून हवे तेवढे भांडवल उभे करता येते. त्यासाठी अतिशय उत्तम असा बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार असायला हवा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    हुशार व कल्पक उद्योजक अगदी कमी भांडवलात उत्तम प्रतीच्या सेवा व उत्तम प्रकारची गुणवत्ता असणारी उत्पादने बाजारात आणत असतो किंवा काही उद्योजक अगदी मुबलक प्रमाणात भांडवल उद्योगात गुंतवतात. ग्राहकांकडून ते हक्काने मागून घेतात व ग्राहकही स्वखुशीने त्या उत्पादनांची किंमत त्या उद्योजकाला देत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मॅकडोनाल्ड ही कंपनी १०-१२ रुपयाला मिळणारा वडापाव (बर्गर) २७ रुपायांना विकते. त्याची उत्पादन किंमत अगदी २-३ रुपये इतकी कमी आहे, तरीही ग्राहक ती किंमत स्वखुशीने देतात.

    आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मुख्य शहरात असावे. एकापेक्षा अधिक शहरात व्यवसाय करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या शहरात एक एक कार्यालय चालू करावे. म्हणजे ६ उद्योजक एकत्र आले व त्या सहाही उद्योगांना नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबई या ६ ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी ६-६ कार्यालये चालू करणे आवश्यक आहे. येथे ३६ कार्यालये सुरु करण्याऐवजी फक्त सहाच कार्यालये सुरु करावीत. प्रत्येकाने एक-एक कार्यालय सांभाळावे, म्हणजे प्रत्येकाच्या सहा शाखा होतील; मात्र खर्च एकाच कार्यालयाच्या खर्चाएवढा असेल.

    को-वर्किंग स्पेस हा एक खूप चांगला प्रकार आहे. Innov8, WeWork, 91Springboard, Awfis, Smartworks, Kafnu, myHQ अशा अनेक कंपन्या ही सुविधा पुरवतात. यामध्ये एका मोठ्या जागेत अनेक छोटे छोटे डेस्क बनवलेले असतात. इथे चहा-कॉफी, वायफाय, ऑफिस चेअर, डेस्क अशा सर्व सुविधा मिळतात. नाममात्र शुल्क देऊन यापैकी एक डेस्क तुम्ही घेऊ शकता आणि तिथून काम सुरु करू शकता. एखादी मिटिंग करायची असेल तर त्यासाठी वेगळी मिटिंग रूम असते. अनेक नवउद्योजक एकाच ठिकाणी त्यांच्या आयडियाजवर काम करत असतात त्याचा सुद्धा नेटवर्किंगसाठी फायदा होतो.

    Virtual Office (व्हर्च्युअल ऑफिस) ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. हे एक अशा प्रकारचे ऑफिस असते ज्यामध्ये जगभरातल्या सर्व मुख्य शहरात तुम्ही तुमचे कार्यालय अगदी कमी खर्चात सुरु करु शकता. उदा. मुंबईत नरीमन पॉईंट किंवा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या महागड्या ठिकाणी एक ऑफिस भाड्याने घ्यायचे झाल्यास दरमहा ६० हजार रुपये ते २ लाख रुपये भाडे लागते. त्याऐवजी virtual office चे भाडे हे केवळ ६-१० हजार एवढेच असते. Virtual office मध्ये असिस्टंटचा पगार देण्याची गरज नाही, फोनबिल व वीजबिल भरण्याची गरज नाही; तरीही या पत्यावर आलेली पत्रे व डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात. तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो. तो उचलण्यासाठी व फोन वर झालेल्या चर्चेच्या नोंदी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ६-१० हजारात हे सर्व मिळत असते. इतर कोणतीही छुपी किंमत द्यावी लागत नाही. याचा फायदा नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी होतो, समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडतो.

    अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ‘जुगाड’ या तत्त्वाचा वापर करुन कमी भांडवलात निर्माण करता येतात. आपली विचार करण्याची पध्दत थोडीशी बदलून फार काही साधता येते. अर्थात हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात करायचे आहे, त्यानंतर जसजसा व्यवसाय वाढत जाईल, तसतशा ह्या जुगाड केलेल्या गोष्टी बदलून गुणवत्ता असलेल्या (Standard) स्वरुपात स्थापित करणे चांगले. यामध्ये कुणालाही फसवण्याचा उद्देश नसावा. समोरुन जर विचारणा करण्यात आली, तर स्पष्ट शब्दात आपण केलेली तजवीज त्यांना सांगणे हितावह असते. विश्वास टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर विचारले नाही तर आपणहून सांगणे गरजेचे नाही.

    जयहिंद!!!

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याचे योग्य व सोपे असे उत्तर शोधून काढूया. नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरले. दुसऱ्या लेखाकांत व्यवसाय करण्याचे फायदे पाहिले. सुरुवात करण्याआधी काय करावे व मानसिकता कशी असावी याबाबत जाणून घेतले. कोणता व्यवसाय करावा व त्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र कसे निवडावे हेही आपण ठरवले. बिझनेस प्लॅनची गरज जाणून घेतली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले. घरातील व्यक्ती पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनुभवाबद्दल जाणून घेतले. हे सगळे केलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या सुरुवातीला करायच्या गोष्टींचा अंदाज आलेला असतो.

    व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल किती व ते कसे मिळवावे? भांडवल उभारणी करत असताना तारण नसल्यास काय करावे? भांडवल उभारणीचे पैसे परत कसे करावे? सरकारी परवानग्या कोणत्या व त्या कशा मिळवाव्यात? या परवानग्यांचा होणारा फायदा कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे बाकी असते. त्याआधी आपली उत्पादने (वस्तू/सेवा) निर्मितीसाठी लागणारी यंत्रे, अवजारे, मनुष्यबळ व जागा या सारख्या गोष्टी कुठे मिळतील याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे भांडवल उभारणीनंतर आपला उद्योगाचा मार्ग सुकर होतो. व्यवसायाची वाढ अतिशय वेगाने होते

    तुम्ही भांडवल उभारणी करण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी पाठवलेला प्रत्येक ईमेल हा लेटरहेड वरच असावा. लेटरहेडचे एक module तुमच्या लॅपटॉपमध्ये जतन करुन ठेवलेले असावे. त्यामुळे आपण पाठवलेला प्रत्येक व्यवसाय प्रस्ताव गांभीर्याने वाचला जाण्याची शक्यता वाढते. तुम्ही कार्यालय/ऑफिस घेऊ शकत नसाल, तर घरचा पत्ता हा कार्यालयाचा पत्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरा. व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करावे, त्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही, मात्र हजारो लोकांपर्यत व्यवसाय पोहोचवण्यास त्याची मदत होते.

    आपल्या व्यवसायात भागीदार घेणार की नाही? हा प्रश्न सोडवणे गरजेचे ठरते. भागीदार घेणार असल्यास त्याचे व तुमचे काम काय असेल? याची विभागणी करणे किफायतशीर ठरेल. एकाच व्यक्तीने सर्व काम करणे म्हणजे व्यवसायाला मिळालेली गती कमी करण्यासारखे ठरते. त्यामुळे व्यवसायाच्या प्रमुखाने स्वतःचा काही काळ रिकामा ठेवला पाहिजे, जेणेकरुन व्यवसाय वृध्दीसाठी इतर प्रयत्न करता येतील.

    लागणारी यंत्रे घेतलीच पाहिजेत किंवा नाही याचा विचार तुमच्या मूळ भांडवलाचा अंदाज घेऊन केला पाहिजे. फार कमी भांडवल असल्यास काही कामे outsourcing करणे हितावह ठरते. त्यामुळे जागा व पैशाची बचत, तर होतेच शिवाय आपल्याला थोडासा वेळही मिळतो.

    व्यवसाय करु इच्छिणारी काही हुशार माणसे आपल्या सोबत असल्यास त्यांच्याकडून आपण बनवलेली प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे व त्यात अपेक्षित असणारे बदल केले पाहिजेत. ही हुशार माणसे तुम्हाला कायमस्वरुपी मार्गदर्शकाच्या भूमिकेत भेटत असतात. त्यांचा आदर करणे व त्यांची मर्जी राखणे ही आपली प्राथमिकता असावी. मग काही कायदेविषयक, तर काही अर्थविषयक, काही लोकसंपर्क दांडगा असलेली अशी प्रत्येक प्रकारची माणसे तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यांना पगार देऊन कामाला ठेवणे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात परवडण्यासारखे नसले, तरी अशा माणसांचे संपर्क आपल्या मोबाईलमध्ये कायम जतन करुन ठेवलेले असल्यास आपल्याला हवे तेवढे काम तेवढाच मोबदला देऊन करुन घेणे उत्तम ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता, तर कुठपर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

    या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षांपूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे, तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारा समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे, तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

    मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा Direct (थेट) तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल, तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु. दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

    हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाही, तर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना मिळत असतो. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेला टाटा समूह आज १५० वर्षांनीही यशस्वी घौडदौड करतो आहे. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रिक कंपनी आज एडिसन नंतरही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली, की आपले काम पूर्ण होते. व्यवसायामध्ये हा कालावधी सरासरी तीन वर्षाचा आहे. काही ठिकाणी तो कमीअधिक होऊ शकतो. नाउमेद होता हा व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर उभा राहिपर्यंत कसा पुढे नेता येईल? यासाठी कोणती मानसिकता लागेल? या वर पुढील लेखात जाणून घेऊ.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी लागणारी अब्जावधीची संपत्ती वॉल्टने उभी केली व जगात त्याआधी कधीच झाले नाही ते घडवण्याचा प्रकल्प सुरु केला. त्याचा भाऊ रे डिस्ने त्याच्यासोबत होता. या प्रकल्पाचे काम चालू असतानाच वॉल्ट डिस्नेला या जगाचा निरोप घ्यावा लागला.

    रे डिस्नेने या प्रकल्पाचे काम पुढे चालू ठेवले. जगप्रसिध्द Disneyland तयार केले. तेव्हा पत्रकारांनी रे डिस्नेला एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला वॉल्ट असायला हवा होता असे तुम्हाला वाटत नाही का?” त्यावेळी रे डिस्नेने पत्रकाराला दिलेले उत्तर हे आजच्या लेखाचे उत्तर आहे. रे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “मित्रहो, वॉल्टने हा प्रकल्प पूर्ण झालेला कित्येक वेळा पाहिला आहे. आज आपण जे पहात आहोत; ते वॉल्टने कित्येक वेळा पाहिले म्हणून हे साकारले.”

    खरोखरच डिस्नेलँडने पर्यटन व्यवसायातले सगळे विक्रम मोडून काढले. व्यवसाय करताना उद्योजक जे स्वप्न पाहतो, ते साकारण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा अनुभव असतो. अनुभव हा विकत मिळत नाही किंवा तो इतरांकडून उसणवारही घेता येत नाही. तो मिळवावा लागतो. तो प्रत्यक्ष काम केल्यानेच मिळतो. अबांनींसारखे उद्योजकही त्यांच्या मुलांना त्यांचा अनुभव देऊ शकत नाहीत. ते फक्त मार्गदर्शन करु शकतात. त्यांच्या मुलांनाही अनुभव घ्यावाच लागतो.

    ठराविक कामाचा अनुभव घ्यायचा झाल्यास काही मार्ग अजून आहेत. त्यामध्ये वाण्याचा मुलगा दुकानात बसून आर्थिक व्यवहार त्याच्या सवयीचे करुन घेतो. वाण्याची गिऱ्हाईकांशी बोलण्याची कला आत्मसात करुन घेतो. मारवाडी, गुजराती माणसाला या गोष्टींचे निरीक्षण करण्याची व त्याचे आकलन करण्याची संधी घरातच मिळत असते. हा अनुभवाचाच भाग असतो, संपूर्ण अनुभव नव्हे. आता ज्याला हे वातावरण मिळत नाही. अशा आपल्यासारख्या मराठी माणसाला हा अंशत: अनुभव मिळवण्याचे काही मार्ग आहेत त्यावर एक नजर टाकूयात. या मार्गाचा अवलंब केल्यास आपण वर वर्णन केलेल्या मुलांपेक्षा काहीशा जास्त वेगाने तेवढाच अनुभव कमी वेळात प्राप्त करुन घेऊ शकतो.

    Youtube वर अशा अनेक उद्योजकांनी केलेली भाषण उपलब्ध आहेत, ती लक्षपूर्वक ऐकणे व त्यातील महत्वाच्या नोंदी करुन ठेवणे. काही भाषणं डाऊनलोड करून मोबाईलमध्ये घेऊन येताजाता प्रवास करताना ऐकल्यासही नवे अनुभव सहज घेता येतात. प्रत्येक उद्योजकांनी हे अनुभव मिळवण्यासाठी वाचावे असे एक पुस्तक म्हणजे – How I raised Myself from Failure to Success in Selling. हे पुस्तक फ्रँक बैटगर यांनी लिहलेले असून याची मराठी आवृत्ती (मी अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसे पोहोचलो?) गोयल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. याच बरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) मध्ये एकदोन वर्षे काम करणेसुध्दा फायदेशीर ठरेल. कारण इथे कामाच्या वेळेची मर्यादा नसते व उत्तम उत्पन्न (चांगले पैसे) मिळते. आपल्याला व्यवसाय शिकण्यासाठी वेळ मिळतो.

    अनुभव घेण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायातील यशस्वी माणसाचा सहाय्यक (Assistant/Helper/Driver) म्हणून वर्षभर काम करणे हा होय. या माणसांचा सहवास लाभेल असे कोणतेही काम तुम्ही स्वीकारा. एका वर्षाने तुम्हाला जी अनुभवाची शिदोरी मिळेल ती एमबीए केलेल्या तरुणाहून सरसच असेल. या सर्व पध्दतीतून अनुभवसंपन्न झाल्यावर आपण प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करत आहोत.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    उद्योगपती वालचंद हिराचंद, लोखंडी नांगरांना जन्म देणारे किर्लोस्कर बंधू, आबासाहेब गरवारे, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विकोचे पेंढारकर घराणे, कॅमलिनचे दांडेकर, आयफ्लेक्सचे दीपक घैसास, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, घोडावत ग्रुपचे संजय घोडावत, व्हीआयपी कपड्यांचे सर्वेसर्वा पाठारे बंधू, सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर, मराठी नाटक व्यवसायाला वेगळा आयाम देणारे विष्णुदास भावे, दाते पंचांग विकणारे दाते, पितांबरीचे प्रभुदेसाई, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, माने ग्रुपचे रामदास माने, हावरे ग्रुप अशी न संपणारी मराठी व्यावसायिकांची यादी आहे.

    मात्र या सर्व उद्योजकांचा विचार केला तर असे आढळून आले आहे, ते म्हणजे यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना आपला उद्योग वारसा पुढच्या पिढीकडे म्हणाव्या तशा प्रभावी पध्दतीने हस्तांतरीत करता आला नाही व या सर्व उद्योजकांच्या आधीच्या पिढीनेही कधी व्यवसाय केलेला नव्हता. त्यामुळे ओघानेच हे आले की, कोणालाही कुटुंबातून फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. तरीही या उद्योजकांनी आपला उद्योग मोठा करण्याची स्वप्ने पाहिली. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसले, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला व अपेक्षित असणारे यश त्यांना मिळाले. त्यामुळे आपण खचून न जाता या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वाटांवरून पुढे चालायचे आहे.

    घरातील व्यक्तींचा विरोध कमी करुन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काही उपाय आपण पाहू या. घरातील व्यक्तींचा विरोध असणाची काही कारणे म्हणजे उत्पन्नाची अनिश्चितता, भांडवल लावण्यासाठी कमी पडणारी क्षमता, अनुभवाचा अभाव ही होत. एकतर तुम्ही भरपूर पैसा कमावून घरी द्यायला लागला की, घरच्यांचा व्यवसायाला असलेला विरोध सहज मावळून जातो. तुम्ही पैसे कमावावेत ही त्यांची माफक अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आता घरातील सर्वात जिव्हाळ्याच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन व्यवसाय पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील या व्यक्तीला तुम्ही व्यवसाय करु शकता ही खात्री पटवून देऊ शकलात, तर व्यवसायासाठी लागणारी मदतसुध्दा घरातल्या व्यक्तींकडून मिळते. जेव्हा तुम्ही घरातील या व्यक्तीचा विश्वास संपादन करता तेव्हा तुम्हाला कोणालाही व्यवसाय पटवून देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मग ती व्यक्ती हळूहळू घरातील इतर व्यक्तींना तुमच्या बाजूने करते.

    गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी कुटुंबामध्ये घरातील वातावरणच व्यवसायासाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही. म्हणून शक्यतो काहीजणांनी मिळून व्यवसाय चालू केला, तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात समजावून सांगावे म्हणजे ते पटकन समजून जातात व त्यांना विश्वास बसतो की हा शेजारचा/किंवा कॉलेजमधला मित्र व्यवसाय करतोय म्हणजे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे व तुम्ही काहीतरी करु शकता.

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट; कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा असो किंवा विरोध असो आपले पूर्ण लक्ष व्यवसाय मोठा करणे, त्यासाठी लागेल त्या गोष्टी करणे यावरच असले पाहिजे. घरातील लोक तुम्हाला सुरवातीला पाठिंबा देत नसतील, तर कालांतराने का होईना ते तुमच्या बाजूने होतातच. हे सगळीकडे झाले आहे हा इतिहास आहे. परत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

    अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

  • लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    ५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची निर्मिती करणारे कितीतरी उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात असतात. त्यापैकी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत व आपल्या ग्राहक वर्गाला आकर्षित करणारे कोण आहेत. त्या तीन–पाच स्पर्धकांची नावे यात समाविष्ट करायची आहेत. कारण आपल्याला आपल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी हे माहिती असणे गरजेचे असते. याशिवाय गुंतवणूकदाराला हे समजते की आपला बाजाराविषयी (मार्केटचा) अभ्यास खूप चांगला आहे.

    ६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे – आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करतो आहे, त्या प्रकारची उत्पादने निर्माण करणारे उद्योजक जर आधीच असतील तर आपण नवीन उद्योग सुरु का करतोय? किंवा आपल्या व्यवसायाची ग्राहकांना गरज काय? आपला व्यवसाय चालण्याची शक्यता काय? या प्रश्नांची उत्तरे देणारा हा टप्पा आहे. तर या प्रश्नांची उत्तरे अशी असतात; आधीचे उद्योजक ज्या सेवा देण्यात कमी पडतात, त्या सेवांची उपलब्धता करुन देण्याची क्षमता असणारी उत्पादने आपण तयार करत आहोत, त्याच किंमतीत चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवत आहोत.

    ७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग – आपण सुरु करत असणाऱ्या व्यवसायासाठी लागणारे अंदाजे भांडवल आणि त्याचा उपयोग आपण कोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे करणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना द्यावी लागते.

    ८. विक्री व जाहिरात माध्यमे – या टप्प्यात आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत याची माहिती थोडक्यात द्यावी लागते. विक्री वाढवण्यासाठी कोणती पावले उचलणार आहोत तसेच आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं मार्केटिंग कसे करणार आहोत यासंदर्भात माहिती द्यावी.

    ९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख – उद्योगाला सुरुवात केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज गुंतवणूकदारांना द्यावा लागतो. यात आपल्याला साधारणपणे पुढील तीन सहामाही (दीड वर्ष) किंवा तीन वर्षात उद्योगाचा होणारा विस्तार दाखवून द्यायचा असतो. यात आपल्या उद्योगाची होणारी एकूण उलाढाल, विक्री व जाहिरात माध्यमांवर होणारा तसेच इतर खर्च वजा करून निव्वळ नफा दाखवून द्यावा लागतो. ही सर्व माहिती एखाद्या तक्त्याच्या किंवा आलेखाच्या स्वरूपात दाखविल्यास त्याचे आकलन करणे सोपे जाते.

    १०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा – यामध्ये व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे कोणते असतील आणि ते कधीपर्यंत पूर्ण होतील याची निश्चित कालमर्यादा सांगावी लागते. उदाहरणार्थ, सहा महिन्यात दोन नवीन शाखा काढणार (ठिकाणांसहित), स्वतःची वेबसाईट सुरु करणार, उद्योगातील एखादा विशिष्ट दर्जा/मानांकन प्राप्त करणार इत्यादी.

    ११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड – आपल्या बरोबरीने काही छोटे मोठे ब्रँड काम करीत असतील किंवा काही सेवांसाठी आपण एखाद्या उद्योगाशी, संस्थेशी, व्यक्तीशी टायअप केलेले असेल, तर त्यांचासुद्धा उल्लेख आवर्जून करावा. याचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक प्रभाव निर्माण होतो.

    १२. काम करणारी टीम फोटो व पदासहित – आपल्या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे याची माहिती करून द्यावी. तसेच त्या व्यक्तींची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव किंवा एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याचासुद्धा उल्लेख करावा.

    १३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट – यामध्ये आपल्या व्यवसायाचा पत्ता, संपर्क क्रमांक, व्यावसायिक ईमेल आयडी आणि वेबसाईट असल्यास तिचा उल्लेख करावा. तसेच सोशल मिडियावर तुमचे व्यावसायिक पेज किंवा अकाऊंट असल्यास त्याची माहिती द्यावी. तुम्हाला संपर्क करण्यासाठीची सर्व माहिती एकत्रित एकाच ठिकाणी देणे फायद्याचे ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती