Tag: उद्योजकता

  • National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: पर्यावरणपूरक व्यवसाय, शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging)आणि ग्रीन सप्लाय चेन (Green Supply Chain)

    विज्ञानाशिवाय जग चालत नाही. माणसाने घेतलेला श्वास, माळरानावर उगवलेले झाड ते अवकाशात फिरणारे कृत्रिम उपग्रह – सगळंच विज्ञानाच्या भोवती चालत असतं तसेच अर्थकारण, नोकरी, उद्योग आणि व्यवसायही.

    आज जगभरात पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-friendly Business) हा केवळ ट्रेंड नसून, एक गरज बनली आहे. प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदल, संसाधनांची कमतरता यामुळे कंपन्या आणि उद्योजकांना शाश्वत उपाय स्वीकारावे लागत आहेत. वैज्ञानिक क्षेत्रामधील Material science, biotechnology, AI, आणि nanotechnology यातील नवनवीन शोधांमुळे Biodegradable plastics, Smart recycling systems, Green energy logistics यासारख्या नवकल्पना निर्माण करणे शक्य झाले आहे.

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे काय?

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे असा उद्योग जो उत्पादन, पॅकेजिंग, वाहतूक आणि वापरात नैसर्गिक संसाधनांचा कमी वापर करतो, प्रदूषण कमी करतो आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देतो.

    आजचे ग्राहक केवळ किंमत नाही तर ब्रँडचे पर्यावरणीय मूल्य (Eco Value) पाहून खरेदी करतात. त्यामुळे Green Business ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसून व्यवसायाची गरज बनली आहे.

    Reduce, Reuse, Recycle – व्यवसायासाठी Golden Formula

    Reduce (कमी वापर)
    – हलके पॅकेजिंग
    – कमी प्लास्टिक
    – डिजिटल बिलिंग
    म्हणजे खर्च कमी आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा!

    Reuse (पुन्हा वापर)
    Glass bottles
    – Cloth bags
    – Returnable packaging
    यातून ग्राहकांची loyalty वाढते.

    Recycle (पुनर्निर्मिती)
    Recycled paper
    – Recycled plastic
    – Upcycled products
    त्यातून Circular Economy तयार होते. 

    Sustainable Packaging: 2026 चा एक मोठा ट्रेंड

    Sustainable Packaging म्हणजे काय?

    शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging) म्हणजे पुनर्वापर करता येणाऱ्या, जैवविघटनशील किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून पर्यावरणावर होणारी हानी कमी करणारी पॅकेजिंग प्रणाली.
    यामध्ये Recyclable साहित्य, Biodegradable साहित्य, Plant-based साहित्य यांचा वापर केला जातो.

    Sustainable Packaging Trend 2026

    1. Single-Use Plastic ला पूर्ण पर्याय
      जगभरातील अनेक देश Single-use plastic वर पूर्ण बंदी आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कागद, बांबू, बायोप्लास्टिक, मशरूम पॅकेजिंग यांची मागणी वाढत आहे.
    2. Plant-Based Packaging
      कॉर्न स्टार्च, गव्हाचा कोंडा, ऊसाच्या बॅगॅसपासून पॅकेजिंग तयार केली जात आहे. हे fully biodegradable आणि compostable असते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाला मदत होते. 
    3. Smart Packaging
      QR code, RFID tag, recyclable ink वापरून digital traceability देणारी पॅकेजिंग हा मोठी ट्रेंड आहे. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
    4. Minimal Packaging
      Less is More – कमी साहित्य वापरून पॅकेजिंग करणे म्हणजे खर्च आणि कचरा दोन्ही कमी करणे. 

    Green Supply Chain


    Green Supply Chain म्हणजे उत्पादन तयार करण्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक बनवणे आणि म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचवता व्यवसाय नफा मिळवणे.

    यामध्ये पर्यावरणपूरक कच्चा माल (Eco-friendly raw material), ऊर्जा कार्यक्षम उत्पादन (Energy Efficient Products), Green logistics (EV वाहतूक), Recyclable packaging यांचा समावेश होतो.

    Green Supply Chain चे फायदे

    1. खर्चात बचत
      ऊर्जा, पाणी आणि कच्चा माल कमी वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
    2. ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
      आज ग्राहक पर्यावरणपूरक ब्रँडला, त्यांच्या उत्पादनांना जास्त पसंती देत आहेत.
    3. सरकारी नियमांचे पालन
      भारत सरकार EPR (Extended Producer Responsibility) आणि प्लास्टिक बॅनसारखे नियम लागू करत आहे.
    4. जागतिक बाजारात प्रवेश
      पर्यावरणपूरक उत्पादनांना जागतिक बाजारातही महत्त्वाचे स्थान आहे. Green Supply Chain च्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. 

    Recycled Products: वेगाने वाढणारी Green Businessची नवी सुवर्णसंधी

    Recycled Products इंडस्ट्री आज मल्टी-बिलियन डॉलर मार्केट झाली असून भारतात Startup आणि MSME साठी मोठी व्यवसाय संधी आहे. कचऱ्यातून उपयोगी उत्पादने तयार करून पर्यावरण संरक्षणासोबत नफा कमावणे ही Circular Economy ची मुख्य ताकद आहे.

    लोकप्रिय Recycled Business Categories:

    • Plastic Recycling: बाटल्या, पिशव्या, पाईप्स, फर्निचर
    • Paper Recycling: पॅकेजिंग बॉक्स, कार्डबोर्ड, स्टेशनरी
    • E-waste Recycling: मोबाईल व संगणकातील मौल्यवान धातू
    • Upcycled Fashion: जुन्या कपड्यांपासून बॅगा व फॅशन वस्तू
    • Tyre Recycling: रबर मॅट्स, फर्निचर, बांधकाम साहित्य

    Recycled Products व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि कच्चा माल सहज उपलब्ध असल्यामुळे नव्या उद्योजकांसाठी ही उत्तम संधी आहे. योग्य मशिनरी आणि आवश्यक परवाने घेतल्यास व्यवसाय सुरळीत चालवता येतो. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवता येतात आणि ब्रँड ओळख तयार करता येते. सरकारी प्रोत्साहन योजना आणि वाढती पर्यावरण जागरूकता यामुळे या उद्योगाची मागणी वेगाने वाढत आहे आणि भविष्यात मोठी कमाई व रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.

    भारतीय उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

    भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा कन्झ्युमर मार्केट आहे, परंतु कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे. त्यामुळे Green Businesses हे केवळ CSR (Corporate Social Responsibility) नाही तर Profit Opportunity आहे.

    काही उदाहरणे:
    Zero-waste grocery stores
    Eco-friendly packaging startups
    Sustainable fashion brands
    Organic product brands

    तुम्ही पर्यावरणपूरक व्यवसाय का सुरू करावा?

    1.  ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी
    2.  दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी
    3.  भविष्यातील कायद्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी
    4.  पर्यावरणासाठी योगदान देण्यासाठी

    उत्तर: वरीलपैकी सर्व कारणांसाठी!

    2026 मध्ये Sustainable Business, Eco friendly businesses का ट्रेंडिंग आहे?

    • Gen Z आणि Millennials Eco-conscious आहेत. 
    • ESG (Environmental, Social, and Governance) investing वाढत आहे.
    • सरकार Green regulations आणत आहे. 
    • सोशल मीडिया वर Sustainable Brands Viral होत आहेत. 

    म्हणजेच, Green Business = Growing Business

    भविष्यातील यशस्वी व्यवसायासाठी नवा विचार

    3P = People + Planet + Profit = Sustainable Success

    केवळ नफ्याचा विचार न करता, लोकांसाठी व पर्यावरणासाठी योग्य उद्योग – व्यवसाय करणे! जो उद्योजक आज पर्यावरणपूरक धोरण स्वीकारेल, तो उद्या बाजारात आघाडीवर असेल.

    अशाच नवनवीन माहितीपर लेखांसाठी ‘नवी अर्थक्रांती’च्या वेबसाईटला नियमित भेट द्या!!

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर

    CARS24 1


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!

  • Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी उपयोगी ठरू शकतात.

    जर व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या लेखात आपण अशाच यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकता येणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया आणि ते व्यवसायासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, हे पाहूया.

    १) खऱ्या समस्येवर उपाय शोधा – ग्राहकांच्या गरजा ओळखा

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ग्राहकांच्या समस्येचा अभ्यास करणं. प्रत्येक व्यवसाय हा एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी असतो. जर तुम्ही लोकांच्या मोठ्या समस्येवर सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दिला, तर तुमच्या व्यवसायाला हमखास यश मिळेल.

    उदाहरणार्थ, Meesho या कंपनीने भारतातील लहान व्यावसायिक आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. ऑनलाईन विक्रीसाठी त्यांच्याकडे महागडी वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नव्हतं. Meesho ने एक सोपा प्लॅटफॉर्म तयार केला, जिथे कोणीही सहजपणे ऑनलाइन विक्रेता बनू शकतो. यामुळे लाखो लघु उद्योजकांना डिजिटल मार्केटमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

    जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधलात, तर तुमच्या व्यवसायाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. बाजाराचा अभ्यास करा, लोकांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घ्या आणि त्यावर सोपा, किफायतशीर आणि उपयुक्त उपाय द्या.

    3

    २) छोटी सुरुवात करा, मग हळूहळू विस्तार करा

    अनेक नवउद्योजक सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे खर्च वाढतो आणि अपयशाची शक्यता अधिक राहते. त्याऐवजी, लहान सुरुवात करून, अनुभव घेत घेत व्यवसाय वाढवणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं.

    उदाहरणार्थ, Zerodha या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांसोबत व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांच्या तुलनेत कमी शुल्कात सोपं आणि किफायतशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दिलं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. आज Zerodha ही भारतातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली आहे.

    4

    ३) मजबूत आणि सक्षम टीम तयार करा

    कोणताही मोठा व्यवसाय एकट्याने उभा करता येत नाही. व्यवसायाची वाढ आणि यश हे चांगल्या टीमवर आणि त्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. विश्वासू, मेहनती आणि कौशल्यपूर्ण लोक सोबत असतील, तर आव्हानं पार करणं आणि संधीच सोन्यात रूपांतर करणं सोपं जातं. 

    उदाहरणार्थ, CRED हा स्टार्टअप त्यांच्या मजबूत टीममुळे यशस्वी झाला. CRED हे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. संस्थापकांनी सुरुवातीपासूनच अनुभवी आणि हुशार लोकांची निवड केली, ज्यांनी उत्कृष्ट ॲप डिझाइन, प्रभावी मार्केटिंग आणि ग्राहकांसाठी उपयुक्त योजना तयार केल्या.

    सुरुवातीला थोड्या, पण हुशार लोकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत काम करा. तुमच्या उद्दिष्टांशी जुळणारी, नवे प्रयोग करण्यास तयार असलेली आणि आव्हानांना सामोरे जाणारी टीम निवडा. एक चांगली टीमच तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते.

    5

    ४) ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवा

    ग्राहक समाधानी असतील, तरच व्यवसाय टिकून राहतो. समाधानी ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतात आणि इतरांनाही तुमच्या सेवेची शिफारस करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

    उदाहरणार्थ, Zomato ने ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सहज वापरता येणारं आणि वेगवान ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया आणि तात्काळ ग्राहकसेवा दिली. यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि Zomato एक लोकप्रिय ब्रँड बनला.

    ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांचे प्रश्न पटकन सोडवा आणि त्यांचा अनुभव चांगला राहील याची काळजी घ्या. यामुळे ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल.

    6

    ५) डेटा आणि ग्राहकांचा फीडबॅक वापरा

    बाजार सतत बदलत असतो, त्यामुळे व्यवसायात वेळेनुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा फीडबॅक आणि डेटा विचारात घेतल्यास तुमची सेवा अधिक चांगली होऊ शकते आणि व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो.

    उदाहरणार्थ, Swiggy सुरुवातीला फक्त अन्न वितरण सेवा पुरवत होते. मात्र, ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या खरेदीच्या सवयींचा अभ्यास केल्यावर त्यांना समजले की लोक घरपोच किराणासामानही हवे आहे. त्यानंतर त्यांनी Swiggy Instamart सुरू केलं आणि आता किराणा व इतर वस्तूंच्या डिलिव्हरीमध्येही ते यशस्वी झाले आहेत.

    ग्राहकांचा फीडबॅक आणि बाजारातील डेटा सतत तपासा. गरजेनुसार सेवा सुधारत राहिल्यास तुम्ही स्पर्धेत टिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढेल.

    7

    मित्रांनो,यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवत असताना खरी समस्या ओळखणं, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करणं, सक्षम टीम तयार करणं, ग्राहकांचा अनुभव उत्तम ठेवणं आणि डेटा व फीडबॅकच्या आधारे सुधारणा करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

    जर तुम्हीही या गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केला, तर तुमचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हेच यशस्वी उद्योजकतेचं खरं रहस्य आहे!

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व रोजगार आणि अर्थव्यवस्था वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. तसेच, नव्या पिढीतील उद्योजिकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

    सध्या भारतात सुमारे १४% व्यवसाय महिलांच्या मालकीचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्पकता, दूरदृष्टी आणि चिकाटीच्या जोरावर अनेक महिला उद्योजिकांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्या इतरांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय देशाच्या आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

    नुकताच जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला अशाच यशस्वी भारतीय महिला उद्योजिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

    सबीना चोप्रा – यात्रा.कॉमच्या सह-संस्थापक

    5

    सबीना चोपड़ा या ‘यात्रा.कॉम’ च्या सह-संस्थापक असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २००६ मध्ये त्यांनी यात्रा.कॉमची स्थापना केली. ट्रॅव्हल आणि बीपीओ क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सबीना यांनी आरसीआय इंडिया मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रा.कॉममध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या वाढीत विशेष भूमिका बजावली.

    व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत आणि मुलींच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी एनजीओच्या माध्यमातून मदत करतात. त्यांचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील मजबूत नेटवर्क आणि व्यावसायिक कौशल्यामुळे यात्रा.कॉमला मोठं यश मिळालं. भारतीय पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या प्रेरणादायी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे.

    विनीता सिंग – ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक 

    6

    विनीता सिंग या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIT मद्रास आणि IIM अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये त्यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली. हा ब्रँड विशेषतः तरुण महिलांमध्ये लोकप्रिय असून, भारताच्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात त्याने नवी क्रांती घडवली आहे.

    विनीता सिंग या भारताच्या आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा ब्रँड ‘शुगर कॉस्मेटिक्स’ दर्जेदार आणि ट्रेंडी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या बिझनेस रियालिटी शोमध्येही शार्क म्हणून सहभागी झाल्या असून, नवउद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीमुळे त्या आजच्या तरुणींना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत.

    फाल्गुनी नायर – ‘नायका’च्या संस्थापिका 

    7

    फाल्गुनी नायर या ‘नायका’ (Nykaa) या ब्युटी अँड लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या मोठ्या ऑनलाइन कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये १८ वर्षे मोठ्या पदावर काम केलं. २०१२ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आणि ‘नायका’ ची स्थापना केली. आज नायका हा भारताचा सर्वात प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे.

    फाल्गुनी नायर या स्वतःच्या मेहनतीवर अब्जाधीश झालेल्या भारतातील मोजक्या महिलांपैकी एक आहेत. त्यांना २६ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. नायका आज केवळ ऑनलाइनच नाही, तर भारतभर अनेक दुकानांतूनही उपलब्ध आहे. त्यांनी महिलांसाठी उच्च दर्जाची सौंदर्य उत्पादने सहज उपलब्ध करून दिली, त्यामुळे नायका हा लोकांचा आवडता ब्रँड बनला आहे.   

    राधिका घई अग्रवाल – शॉपक्लूझच्या सह-संस्थापक

    8

    राधिका घई अग्रवाल या ‘शॉपक्लूझ’ (ShopClues) या लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि काही वर्षांतच शॉपक्लूझ युनिकॉर्न क्लबमध्ये पोहोचले. 

    त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून व्यवस्थापन शिक्षण घेतलं, तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात वेब २.० आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा अभ्यास केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे शॉपक्लूझ भारतातील मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. राधिका भारताच्या पहिल्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत, ज्यांची कंपनी युनिकॉर्न बनली आहे.

    नमिता थापर – एमक्योर फार्मास्युटिकल्स

    9

    नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या प्रसिद्ध औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या व्यवसायविषयक कार्यक्रमात ‘शार्क’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी फुकुआ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं असून, त्या चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. २००७ मध्ये सीएफओ म्हणून एमक्योरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड आणि थापर उद्योजक अकादमीच्या संस्थापक आहेत आणि त्यांनी १०० हून अधिक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ‘40 अंडर 40’, वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस सुपर अचिव्हर अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. 

    श्रद्धा शर्मा – युवरस्टोरीच्या संस्थापक 

    श्रद्धा शर्मा या ‘युअरस्टोरी’ मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २००८ मध्ये सुरू केलेलं हे व्यासपीठ नव्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. या माध्यमातून ७०,००० हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली आहे.

    २०२३ मध्ये भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर, ५२० उपक्रमांच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फॉर्च्यून मासिकाच्या ‘40 अंडर 40’ प्रभावी व्यक्तींच्या यादीत तीन वेळा त्यांचं नाव झळकलं. तसेच, त्यांना  २०१८ मध्ये फोर्ब्स पॉवर ट्रेलब्लेझर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे.

    उपासना टाकू – मोबिक्विकच्या सह-संस्थापक

    उपासना टाकू या ‘मोबिक्विक’ या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २००९ मध्ये त्यांनी मोबिक्विकची स्थापना केली. भारतात डिजिटल पेमेंट क्रांतीत त्यांचं मोठं योगदान आहे. मोबिक्विकने ई-वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सोपे आणि सुलभ केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोबिक्विक भारतातील प्रमुख फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने IPO आणत सार्वजनिक लिस्टिंग केली, ज्यामुळे ती आणखी मजबूत झाली. 

    वंदना लुथरा – VLCC हेल्थकेअरच्या संस्थापिका

    वंदना लुथरा या सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. १९८९ मध्ये त्यांनी ‘VLCC हेल्थकेअर’ची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते आणि त्यांची ही कंपनी  १३ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. VLCC केवळ सौंदर्य उत्पादनांसाठीच नव्हे, तर आरोग्य सेवांसाठीही प्रसिद्ध आहे.

    वंदना लुथरा या  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिलच्या (B&WSSC) अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांची पहिली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षणाला चालना दिली असून, त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आणि अतुलनीय आहे.

    मित्रांनो, वरील सर्व महिला उद्योजिकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संधी शोधून त्यांचा योग्य उपयोग करत त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.

  • Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर गुप्ता हा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने पारंपारिक मार्गापेक्षा वेगळं काही करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास याचा त्याने वापर केला.

    केवळ २२ व्या वर्षी सागरने आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. आपल्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवून, त्याने चार वर्षांच्या कालावधीत आपल्या व्यवसायाला ६०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोचवलं. त्याचा हा प्रवास सिद्ध करतो की, आपल्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली, तर काहीही शक्य आहे.

    आजच्या लेखात आपण सागर गुप्ताच्या याच प्रेरणादायक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    सागर गुप्ताचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाले. लहानपणापासूनच त्याला शिक्षणात आवड होती. त्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, सागर चार्टर्ड अकाउंटंट बनावा. यासाठी त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोचिंग घेतलं, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठरवला होता.

    सागरला सीए होण्यापेक्षा व्यवसायात अधिक रुची होती. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे, शिक्षण घेत असतानाच त्याला उद्योग क्षेत्राची गोडी लागली. 

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    २०१७ मध्ये सागरने आपल्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, पण चीनच्या कंपन्यांचं उत्पादन बाजारात वर्चस्व गाजवत होते. अशा स्पर्धात्मक बाजारात आपलं स्थान निर्माण करणं हे एक मोठे आव्हान होतं. सागरने एक धाडसी निर्णय घेतला आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्याला ठाऊक होतं की, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काहीतरी वेगळं आणि उत्तम करावं लागेल.

    सागरच्या कुटुंबात कोणीही मोठा व्यावसायिक नव्हतं, त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याला कमी अनुभव होता. पण त्याने मेहनत, योग्य नियोजन, आणि बाजारपेठेचं  बारकाईने निरीक्षण केलं आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्सला यशाच्या मार्गावर नेलं. अनेक अडचणी येत होत्या, पण सागरने प्रत्येक अडचणीला संधी मानून त्यावर काम केलं.

    त्याला एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग होती. चीनच्या कंपन्यांची उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध होती, तर भारतीय ग्राहकांना स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करवून घेणं खूप कठीण होतं. पण सागरने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा लाभ घेत, उत्पादनांची गुणवत्ता वाढवली आणि विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.

    एक्का इलेक्ट्रॉनिक्स – विस्तार आणि यश

    आज ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी एलईडी टीव्ही, स्मार्टवॉच, इअरफोन, हेडफोन, वॉशिंग मशीन यासारखी विविध उत्पादने तयार करते. भारतातील १०० हून अधिक व्यावसायिक या कंपनीकडून उत्पादने घेत आहेत. कंपनीने आपली गुणवत्ता, विश्वसनीयता आणि इतर गुणात्मक वैशिष्ट्यांमुळे बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

    कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सोनीपत, हरियाणा येथे स्थित आहे, जिथे १,००० हून अधिक कुशल कामगार आणि अभियंते कार्यरत आहेत. कंपनीत दर महिन्याला लाखाहून अधिक एलईडी टीव्हीचे उत्पादन केले जाते. २०२२-२३ मध्ये कंपनीने ६०० कोटी रुपयांचा महसूल गाठला, जो त्याच्या व्यवसायातील मोठ्या यशाचं प्रतीक आहे.

    Sagar Gupta started Ekkaa Electronics Industries with his father at the age of 22

    सागर आणि त्याच्या वडिलांनी आता नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरुवातीला ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचे सुधारणा केली जाईल. ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली आहे, आणि आज भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची बनली आहेत. त्यामुळे, त्यांची उत्पादने आता परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहेत.

    मित्रांनो, सागर गुप्ता याचा प्रवास हा केवळ एक व्यवसायिक यशोगाथा नाही, तर तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने सिद्ध केलं आहे की योग्य संधीचा लाभ घेतल्यास आणि कठोर परिश्रम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतं.

    आणखी वाचा:

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    CIBIL Score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited Score होय. हा एक 3-अंकी Score आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा व्यक्तीच्या क्रेडिटच्या  इतिहासावर आणि कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची Credit पात्रता चांगली मानली जाते.

    जर CIBIL 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना अशा व्यक्तीस प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते किंवा उच्च व्याजदर भरावा लागू शकतो.

    CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे आणि अधिक कर्ज किंवा क्रेडिटची गरज न ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

    जास्त Score म्हणजे त्या व्यक्तीची क्रेडिट क्षमता चांगली आहे आणि कमी Score म्हणजे ती व्यक्ती वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेवर करत नाही.

    CIBIL Score ची भूमिका : 

    कर्ज प्रक्रियेत CIBIL Score खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जर हा Score चांगला असेल, तर कर्ज मंजूर होण्यास शक्यतो कोणतीही अडचण येत नाही; पण जर हा Score कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. चांगल्या CIBIL Score सह कमी व्याजावर कर्ज मिळण्याचीही शक्यता असते. 300 ते 550 चा CIBIL Score कमकुवत मानला जातो. तर 550 ते 650 सरासरी, 650 ते 750 चांगला आणि 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो. 

    CIBIL Scoreची मुख्य भूमिका खालीलप्रमाणे आहे :

    1. कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा आधार: जेव्हा तुम्ही गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमचा CIBIL Score  तपासते. चांगला Score असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.

    2. व्याजदर ठरवण्यासाठी: जास्त CIBIL Score असलेल्या व्यक्तींना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, कारण बँकांना अशा व्यक्तींवर जास्त विश्वास असतो की, ते वेळेवर परतफेड करतील.

    3. क्रेडिट कार्ड मंजुरी: क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या देखील तुमचा CIBIL Score पाहून तुमच्यासाठी योग्य कार्ड मंजूर करतात. चांगला स्कोर असल्यास जास्त क्रेडिट Limit मिळते.

    4. Risk Management: कर्ज देणाऱ्या संस्थांना तुमचा CIBIL Score पाहून ठरवता येते की, तुम्ही त्यांच्या दृष्टीने जोखीम आहात की नाही. कमी Score असणाऱ्या व्यक्तींना कर्ज देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांना कर्ज नाकारले जाते किंवा जास्त व्याजदर दिला जातो.

    5. करिअर: काही क्षेत्रांमध्ये, विशेषतः आर्थिक सेवांमध्ये, बहुतांश कंपन्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचा CIBIL Score तपासतात. चांगला Credit Score म्हणजे त्या व्यक्तीची आर्थिक शिस्त आणि जबाबदारी दर्शवत असते. 

    6. इतर फायदे: जास्त CIBIL Score असणाऱ्या व्यक्तींना कधी कधी विशेष ऑफर, जास्त क्रेडिट लिमिट किंवा कमी प्रोसेसिंग फी सारखे अनेक फायदे मिळतात.

    Untitled design 12

    1. तुम्ही तुमचा CIBIL Score कसा तपासू शकता: 

    Step 1: CIBIL वेबसाइटला भेट द्या.

    Step 2: मुख्य पानावर ‘Get Your CIBIL Score’ किंवा ‘Free CIBIL Score’ या पर्यायावर क्लिक करा.

    Step 3: तिथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक असतो.

    Step 4: या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा CIBIL Score दिसेल. सुरुवातीला कदाचित एकदा नोंदणी करावी लागू शकते. काहीवेळा, हे मोफत असते, तर काहीवेळा वार्षिक Subscription

     शुल्क भरावे लागते.

    2. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे CIBIL Score तपासणे

    तुम्ही विविध अ‍ॅप्स वापरून देखील CIBIL Score तपासू शकता :

    Paytm :

    • Paytm अ‍ॅप उघडा आणि Loans & Credit Cards किंवा CIBIL Score पर्यायावर जा.
    • आपले KYC डिटेल्स किंवा पॅन कार्ड नंबर भरून Score तपासा.

    Bajaj Finserv:

    • Bajaj Finserv अ‍ॅपवर नोंदणी करा.
    • Check your CIBIL Score या पर्यायावर जा आणि पॅन कार्ड आणि इतर माहिती भरून तपासणी करा.

    BankBazaar:

    • BankBazaar अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जा.
    • CIBIL Score मोफत तपासण्याचा पर्याय निवडा आणि त्यानुसार आपली माहिती भरा.

    बँक किंवा वित्तीय संस्थांमधून बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्थाही मोफत किंवा सवलतीच्या दरात CIBIL Score तपासण्याची सेवा देतात.

    तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करून देखील काही बँकांच्या सेवा वापरून CIBIL Score तपासू शकता

    उदा.

    • HDFC Bank
    • ICICI Bank
    • SBI (State Bank of India)

    3. विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट्स मिळवण्यासाठी इतर पर्याय :

    • भारतात, तुम्ही TransUnion CIBIL कडून वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. तुम्हाला या अहवालात तुमचा CIBIL Score  तसेच इतर क्रेडिट माहिती दिसेल.
    • CIBIL वेबसाइटवर जा आणि Free Annual Credit Report पर्यायावर क्लिक करा.

    आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि CIBIL Score दिसेल.

    तुमचा CIBIL Score हा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा आणि जबाबदारपणाचा आरसा आहे. तो फक्त कर्ज मिळवण्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर तुमची आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता याचेही प्रतीक आहे. त्यामुळे नियमितपणे क्रेडिट कार्डच्या देयकांचे वेळेवर पेमेंट, कर्जाचे नियोजनबद्ध पुनर्भरण आणि खर्चाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. CIBIL स्कोअर चांगला ठेवणे म्हणजे तुमच्या आर्थिक भवितव्यासाठी उत्तम तरतूद करण्यासारखे आहे.

    आणखी वाचा:

  • Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    असं म्हटलं जातं की, श्रीमंत घरात जन्मलेल्या लोकांना मोठा व्यवसाय उभारण्याची अधिक संधी असते, सर्वसामान्य लोकांना व्यवसाय उभा करणं अवघड जातं. अनेक व्यक्ती स्वप्नं पाहतात, मोठे विचार मनात ठेवतात, पण त्यांच्या वास्तविक गरजांनी ती स्वप्नं धूसर होत जातात. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, जर तुमच्यात स्वप्नं पाहण्याची क्षमता आणि ती पूर्ण करण्याची मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

    देशातील वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरुवात केली इतरांच्या औषधांचा व्यवसाय करून आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वतःचा औषध व्यवसाय सुरू केला. ना त्यांच्यामागे व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, ना त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद होती. पण त्यांचं धाडस आणि जिद्द यामुळेच त्यांनी ‘फार्मा किंग’ म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला.

    प्रारंभिक जीवन

    दिलीप संघवी  यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ रोजी गुजरातमधील अमरेली या छोट्या गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यामुळे व्यापाराची मूलभूत समज त्यांच्याकडे बालपणापासूनच होती. त्यांच्या वडिलांचा एक छोटा औषध विक्रीचा व्यवसाय होता आणि संघवी लहानपणापासूनच वडिलांना या व्यवसायात मदत करत असत. ही मदत त्यांच्यासाठी फक्त कुटुंबाला दिलेला हातभार नव्हता, तर औषध उद्योगातील प्राथमिक अनुभव घेण्याची एक महत्त्वाची संधी होती. वडिलांना व्यवसायात केलेल्या मदतीमुळे औषध विक्रीच्या विविध बाजू समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. 

    संघवी यांनी कोलकात्यातील भवानी पूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. औषध निर्मितीचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता, त्यांनी वडिलांच्या व्यवसायात काम करत करत औषध बाजारातील विविध संधींची जाण मिळवली. औषध विक्रीच्या व्यवसायात असताना संघवींना हे लक्षात आलं की जेनेरिक औषधांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांनी विचार केला, की जर मी इतरांनी तयार केलेली औषधे विकू शकतो, तर मी स्वतःची औषधे का बनवू नये?

    या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून पुढे ‘सन फार्मास्युटिकल्स’ या यशस्वी कंपनीची स्थापना झाली. त्यांच्या लहानपणी घेतलेल्या अनुभवांनी आणि औद्योगिक दृष्टिकोनाने त्यांना औषध उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं

    सन फार्माची सुरुवात आणि विस्तार 

    १९८२ साली वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन सन फार्माची सुरुवात संघवींनी गुजरातमधील वापी येथे केली. सुरुवातीला कंपनीने मनोरुग्ण आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्पादनांची विविधता कमी होती, पण संघवी यांनी नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिलं,  ज्यामुळे कंपनीची औषधं बाजारात लोकप्रिय होऊ लागली.

    १९९७ मध्ये, कंपनीच्या स्थापनेनंतर १५ वर्षांनी, संघवी यांनी अमेरिकेतील कॅराको फार्मास्युटिकल्स नावाची एक फार्मा कंपनी विकत घेतली, ज्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. यानंतर २००७ मध्ये, त्यांनी इस्रायलमधील टारो फार्मा ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान आणखी बळकट झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी रॅनबॅक्सी कंपनी विकत घेतली. हे अधिग्रहण भारतीय औषध उद्योगात एक मोठा टप्पा होता, कारण यामुळे सन फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी बनली. यामुळे जागतिक बाजारातही सन फार्माचे स्थान मजबूत झाले.

    संघवी यांनी केलेली या कंपन्यांची खरेदी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे, तर संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी देखील होती. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर विकसित बाजारांमध्ये विस्तार केला, ज्यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वासार्ह ब्रँड बनली.

    २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय आज आहे २६०००० कोटींची कंपनी 2 1

    यशाच्या शिखरावर 

    दिलीप संघवी यांनी भारतीय औषध उद्योगात केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर औषध निर्मितीची गुणवत्ता वाढवून आणि किफायतशीर औषधांचा पुरवठा करून एक महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं  आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिकतेच्या पलिकडे जातो, जो समाजाभिमुख आहे, त्यांच्या या कार्यामुळे  अनेकांना योग्य आणि परवडणारी औषधे उपलब्ध झाली आहेत.

    संघवी यांनी फार्मास्युटिकल उद्योगाला नवी दिशा दिली, विशेषतः भारतात जेनेरिक औषधांची क्रांती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. औषधांच्या किमती कमी करून त्यांनी केवळ भारतीय ग्राहकांना नाही, तर जागतिक स्तरावरही आरोग्यसेवा परवडणारी बनवली आहे.

    त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी आणि योगदानासाठी दिलीप संघवी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, जो देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय, संघवी हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित झाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांनी अनेक वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून स्थान मिळवलं  आहे. २०१५ मध्ये त्यांना फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं, तेव्हा त्यांची संपत्ती $१७.५ बिलियन इतकी होती. सध्या फोर्ब्सनुसार, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती २९.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २.५० लाख कोटी रुपये इतकी आहे. सन फार्मा जगातील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी असून कंपनीत जवळपास ४१००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

    दिलीप संघवी यांचा जीवनप्रवास हा चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यांचा अद्भुत संगम आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते जागतिक स्तरावरील एक प्रमुख उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे खूप काही आहे – विशेषत: उद्योजकतेत टिकून राहण्यासाठी आणि सातत्याने नवनवीन संधी शोधण्यासाठीची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

    आणखी वाचा

  • बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर व्यवसाय करायला व सर्व आघाड्यावर तोंड द्यायला तयार असणारा आपला व्यावसायिक भागीदार अर्थात आपल्या व्यवसायाचा बिझनेस पार्टनर होय.

    बिझनेस पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी? 

    • व्यवसायात भागीदार असावाच का? 
    • असला तर तो का असावा? 
    • नसला तर तो का नसावा? 

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणे चांगले नसल्याचा सल्ला अनेक अनुभवी लोकांनी दिला आहे. तरीसुध्दा पार्टनर घ्यावाच का? 

    असे अनेक प्रश्न व्यवसायिकाला पडू शकतात. खरंतर बिझनेसमध्ये पार्टनर असणे गरजेचे आहे का, हे बिझनेसच्या प्रकारावर आणि त्याच्या गरजांवर अवलंबून असते; परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची बाब  म्हणजे व्यवसायात पार्टनर न घेता फार मोठे संघटन तुम्हाला उभे करता येत नाही. एकटा व्यक्ती फक्त एक प्रोप्रायटर होऊ शकतो. त्याची मजल पुढे जाऊन एकल व्यक्ती कंपनी (One Person Company – OPC) पर्यंतच जाऊ शकते आणि भारतात कायदा असे सांगतो की, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे.

    प्रोप्रायटर किंवा एकल व्यक्ती कंपनी फार मोठी Growth करू शकत नाही. त्यामुळे मोठा व्यवसाय करायचा असला, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी सुरू करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच बँका व इतर कंपन्या आपल्यासोबत (अर्थात कंपनीसोबत) मोठे व्यवहार करायला तयार होतात. म्हणून आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनर हा घ्यावाच लागेल; कारण ती व्यवसायाची गरज आहे. काहीजण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना घरातील व्यक्तींची (विशेष करून बायको अथवा नवरा, भाऊ, आई, वडील, मुलगा) नावे व्यवसायात सहभागी करतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र अशा कंपनीत केवळ नावालाच असणारे डायरेक्टर (संचालक/पार्टनर) काही काम करू शकत नाहीत किंवा कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना काम कसे करायचे हे माहिती असतेच असे होत नाही. त्यामुळे फायदा जरी घरातच राहिला, तरी कंपनी मोठी होत नाही. त्यामुळे हा फायदा व व्यवसायाचा विस्तार कमी प्रमाणात असतो.

    त्याउलट एखादा अनुभवी काम करणारा संचालक (तो घरातला नसला तरीही) पार्टनर म्हणून घेतला, तर कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण तो प्रत्यक्ष आपल्या कामांनी कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यामुळे फायद्याचे वाटे झाले, तरीसुध्दा चांगले उत्पन्न मिळते. कंपनी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक ग्राहक जोडले जातात. गुणवत्तेचा पार्टनर घ्यायचा की, केवळ नावालाच पार्टनर घेऊन स्वतः काम करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण आपण स्वतः किती काम करू शकतो हे आपल्यालाच चांगले माहिती असते.

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचे काही फायदे:

    1) नवीन कौशल्यं : 

    पार्टनरमुळे तुमच्या जोडीला नवीन कौशल्यं आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने पार पाडले जाऊ शकते.

    2) भांडवल वाढ : 

    पार्टनरमुळे आर्थिक गुंतवणुकीचा भार एकट्याच्या खांद्यावर न येता, तो दोन किंवा अधिक लोकांमध्ये विभागला जातो.

    3) निर्णय घेण्यात मदत : 

    पार्टनरमुळे निर्णय घेण्यात वेगवेगळी मतं आणि दृष्टीकोन मिळतात, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते

    4) Networking :

    प्रत्येक पार्टनरकडे त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक संपर्कांचे जाळे असते, जे बिझनेसला नवीन ग्राहक, सप्लायर्स किंवा इतर व्यवसायिक संधी मिळवून देऊ शकते.

    business agreement handshake hand gesture

    5) जोखीम वाटप :

    पार्टनरमुळे बिझनेसची जोखीम अनेकांमध्ये वाटली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते. आर्थिक नुकसान किंवा बिझनेसच्या अडचणींमध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येऊन त्या समस्येचा, अडथळ्यांचा सामना सोबतीने करू शकतात.

    व्यवसाय मोठा करायचा म्हटलं की, पार्टनर हा घ्यावाच लागतो, कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. मग तो पार्टनर नावापुरताच असावा की, प्रत्यक्ष काम करणारा असावा याबाबत जरी कायद्याने कोणतेही बंधन घातले नसले, तरी पार्टनरला फायद्यातील वाटा हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला द्यावाच लागतो. 

    दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, कंपनीचे मालक म्हणून कंपनीत येणारा सगळा नफा घरी न्यायचा नसतो किंवा कंपनी तोट्यात चालायला लागली म्हणून घरातील सगळ्या गोष्टी दाव्यावर लावून कंपनीबरोबर स्वतःचे वाटोळेदेखील करून घ्यायचे नसते ही पक्की खूणगाठ प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या मनात बांधून ठेवली पाहिजे. तुम्ही जरी कंपनीचे मालक असलात तरी तुमचा पगार आधी ठरवा. तेवढेच पैसे महिन्याच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबर आपल्या घरी न्या. तुमच्या पार्टनरलासुध्दा हेच नियम लागू करा. ही विचारांची स्पष्टता जर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असेल तरंच ही व्यवसायातील भागीदारी दीर्घकाळ टिकेल व व्यवसाय मोठा होईल.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.

    या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष 

    एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले  कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .

    शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता,  त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.

    एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता. 

    व्यवसायाची स्थापना 

    १९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.

    ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या  कपड्यांना चमकदार बनवा”.

    image

    रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

    व्यवसायातील स्पर्धेवर मात 

    व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.

    त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.

    यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.

    विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी

    2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं.  या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि  त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.

    आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.