Tag: आसान है!

  • एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

    एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

    हा लेख लिहिताना आज मी ३९ वर्षांचा आहे.

    तुमचं वय काय आहे?

    पण खरंच तुमचं वय झालं आहे का? तुमच्या शरीराकडे बघा. या शरीराचं वय ३२ वर्ष नाही. तुमच्या डोक्यावरील केस, त्यांचं वय ३२ वर्ष नाही. तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमचे हात, तुमचे पाय यातील कशाचंच वय झालेलं नाही. ते सगळं ठीक आहे, पण मग ३२ वर्ष वय नक्की कशाचं आहे?सांगतो, पण यापुढे कधीही आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो असं समजायचं नाही.

    आपल्या शरीरात रोज काहीतरी बदल घडून येत असतात. शरीरातील पेशींची संख्या रोज बदलत असते. आपल्या मेंदूतील विचार रोज बदलत असतात. या बदलांमुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. तुमच्या मनातील भावभावनासुद्धा कालच्यापेक्षा आज थोड्याफार वेगळ्या असतात.

    याचा अर्थ असाही काढता येईल, की तुमचं वय एक दिवस इतकंही नाही. आयुष्याकडे बघण्याचा हा एक वेगळा दृष्टीकोन मला तुम्हाला द्यायचा आहे.

    आता मी काही प्रश्न विचारतो बघू तुमच्यापैकी किती जणांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत. जर आपण आजचा दिवस आयुष्यातील आपला पहिला दिवस असल्याप्रमाणे जगू लागलात, तर काय होईल?

    आज तुम्ही कोणते नवे निर्णय घ्याल?

    • आज कोणती नवीन स्वप्नं पाहण्याचं धाडस तुम्ही कराल?
    • आजपासून तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी करायला सुरुवात कराल?
    • आजपासून आपलं आयुष्य कसं वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल?

    आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी खालील १० सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.

    1. आपलं वय हा फक्त एक आकडा आहे. त्याबद्दल फार चिंता करू नका.
    2. आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत, नंतर आपल्याला पृथ्वीची आठवण येईल, त्यामुळे आजपासूनच जगणे प्रारंभ करा.
    3. आपले ध्येय ठरवा, आपल्या स्वप्नांची निवड करा आणि आजपासूनच त्यांचा पाठलाग सुरु करा.
    4. नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे, चांगले कपडे वापरायला सुरुवात करा.
    5. निराशावादी आणि आळशी लोकांपासून दूर राहा. जास्त कार्यक्षम आणि उत्साही व्हा.
    6. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काय खायला पाहिजे आणि काय नाही याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
    7. आजपासून चांगले आर्थिक निर्णय घेण्यास प्रारंभ करा.
    8. आपल्याला किती पैसा आणि कधीपर्यंत कमवायचा आहे, याचं नियोजन करा. एक उद्दिष्ट ठरवा आणि आजपासूनच त्यावर काम करायला सुरुवात करा.
    9. मनात स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवून ठेवा.
    10. आशावादी बना. आनंदी बना. उत्साही बना. आजपासूनच…

    आता मला सांगा : तुमचं वय काय आहे?

    • हेन्री फोर्ड यांनी प्रसिद्ध ‘मॉडेल टी कार’ बनवली, तेव्हा त्यांचं वय होतं ४५ वर्ष.
    • चार्ल्स डार्विनने ‘मानवी उत्क्रांती’चा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याचं वय होतं ५० वर्ष.
    • जॉन पेंबरटन यांनी कोका-कोलाचा शोध वयाच्या ५५व्या वर्षी लावला.
    • रे क्रॉकनी मॅकडोनाल्ड विकत घेतली, तेव्हा त्यांचं वय होतं ५९ वर्ष.
    • कर्नल सँडर्स यांनी केफसीची सुरुवात वयाच्या ६२व्या वर्षी केली होती.

    यशस्वी होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका

  • चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    ‘टाइम झोन’ आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं ४०व्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे.

    The Power of Relaxation and Humility

    ओबामा ५५व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने ७०व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या ‘टाईमझोन’ मध्ये काम करत असतो.काही लोक आपल्या ‘किती पुढे गेलेत?’ असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट ‘टाइमझोन’ मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय!पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या ‘टाइम झोन’ मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या!

    आणखी वाचा

  • कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation

    कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation

    मोठे बदल घडवण्याच्या छोट्या सवयी!  

    Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच!

    पण मग यावर करणार काय? प्रत्येक प्रश्नाला जसं उत्तर असतं तसं याही प्रश्नाला उत्तर असेलच की! चला मग शोधूया या उत्तराला!

    आता समजा Twyla यांना Taxi पकडण्यासाठी ३ किलोमीटर चालत जावं लागलं असतं किंवा आपल्याला आज कोणते कपडे घालायचे आहेत याचा विचार करत बसावा लागला असता तर बहुतेक त्या ती taxi पकडूच शकल्या नसत्या कारण सकाळी उठल्या उठल्या ३ किलोमीटर चालणं अवघड आहे. त्यामुळे कोणतीही सवय लावताना ती सुरु करतानाची process ही खूप simple असली पाहिजे. या गोष्टीला आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी आपण पाहूया २ मिनिटांचा नियम.

    आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवात ही नेहमी सोपी झाली पाहिजे. जेव्हा आपण कोणतीही सवय लावायचा किंवा काही बदल करण्याचा विचार करतो तेव्हा आधी आपण खूप excited असतो; कधी एकदा काम करायला घेतो आणि कधी ते संपवतो असं होतं आपल्याला! हे किती दिवस टिकतं तर फक्त १ दिवस. मग दुसरा दिवस उजाडतो आणि परत आपलं रोजचं जगणं सुरु होतं. पण याच गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो २ मिनिटांचा नियम हा नियम काय आहे तर “कोणतीही नवी सवय सुरु करण्यासाठी ती सवय २ मिनिटांत पूर्ण करून झाली पाहिजे” नाही समजलं ना ? सांगतो! 

    समजा तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे. आता तुम्हाला २ मिनिटांचा नियम माहिती आहे तर तुम्ही काय करणार आधी सवय लावणार फक्त १ पान वाचण्याची. दोन मिनिटांत एक पान वाचून झालं की तुम्ही ते पुस्तक ठेऊन द्यायचं. बघा तुमचं target achieve झालं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्ही हीच process follow करणार पाचव्या दिवशी तुम्हाला वाटेल की यार आज १ पान वाचण्यापेक्षा आपण २ पानं वाचूया. मग हळूहळू तुम्ही २ पानावरून ३ पानावर, ३ पानावरून ४ वर, ४ वरून पाच, सहा, दहा, वीस, तीस वर जाल आणि पहा आता तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय लागलीये.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!

    संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’

    तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.

    इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.

    लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.

    बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.

    मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.

    मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    जॉईस चॅपमन या लेखिकेचं एक खूप प्रेरणादायी वाक्य आहे “जर तुमचं स्वप्नं खूप मोठं असेल आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तुम्ही तयार असाल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी करणे हा एकचं मार्ग आहे.” त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका, नेहमी पुढे जात राहा.

    आणखी वाचा