Category: बिझनेस महारथी

  • पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी

    पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा. 

    वॉल्ट डिज्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ मध्ये अमेरिकेतील शिकागोमधील हेर्मोसा इथं झाला. वडिलांचं हातावरचं पोट. शेतात मजुरी करून ते कुटुंबाचं पालनपोषण करत होते. वॉल्ट यांना मोठा भाऊ होता रॉय, जो त्यांचा सर्वात जवळचा मित्र होता. वॉल्ट यांना लहानापासून चित्र रेखाटण्याची आवड होती. एकदा तर त्यांनी आपल्या घरची भिंत चित्रांनी भरून काढली आणि वडिलांचा बेदम मार खाल्ला. त्यांनी एकदा आपल्या शेजारी राहणाऱ्यांच्या घोड्याचं सुंदर चित्र काढलं. ते त्या शेजाऱ्यांना इतकं आवडलं की, त्यांनी ते वॉल्टकडून खरेदी केलं. वॉल्टच्या घराजवळ एक सलून होतं. ती जागा म्हणजे वॉल्टची चित्र रेखाटण्याची हक्काची जागा, कारण तिथल्या मालकाला वॉल्टची चित्र खूप आवडायची. तो ती त्याच्याकडून खरेदी करायचा. वॉल्ट त्याला चित्र विकायचा ते पैशासाठी नाही, तर तो मालक ती चित्रं त्याच्या भिंतीवर फ्रेम करून लावायचा आणि याचा वॉल्टला खूप आनंद व्हायचा.

    walt disney 1

    वॉल्टच्या वडिलांची खूप इच्छा होती कि आपली मुलं शिकावीत, पण परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण देणं जमत नव्हतं. मुलांना शिकवलं पाहिजे म्हणून अधिक काम मिळण्यासाठी वॉल्टचं कुटुंब शिकागोला आलं. तिथं तो दिवसा शाळेत जायचा, तर रात्री शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चित्रकला शिकायचा. वडिलांना हातभार लागावा म्हणून वॉल्ट आणि त्याचा भाऊ रॉय वडिलांसोबत सकाळी वर्तमानपत्र टाकायचं काम करत होती. त्यामुळं झालं असं कि वॉल्टचं शिक्षणात लक्ष लागेना, पण काही झालं तरी त्यानं आपली चित्रकला सोडली नाही. आपल्या कल्पनाशक्तीतून तो जे जमेल ते रेखाटायचा.

    म्हणून वॉल्ट यांनी आता ऍनिमेशन मालिका बनवायचं ठरवलं. १९२८ साली मिकी माऊसचा पहिला ॲनिमेटेड बोलपट स्टीमबोट विली प्रदर्शित झाला आणि मिकी जणूकाही सगळ्यांच्या गळ्यातील ताईतच झाला. आता मात्र वॉल्ट डिज्नी हा कलाकार काय आहे, त्याची कल्पनाशक्ती काय आहे हे सगळ्या जगाला कळलं. १९३५ साली मिकीला इंटरनॅशनल सिम्बॉल ऑफ गुडविल म्हणून गौरविण्यात आले. वॉल्टने मिकीला नुसता जन्मच दिला नाही, तर १९४७ पर्यंत त्याला स्वतःचा आवाजही दिला. मिकीमाऊस नंतर त्याची फॅमिली मिनी, डोनाल्ड डक पुढे सिन्ड्रेला, डंबो, बम्पी, हिमपरी आणि सात बुटके यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती वॉल्ट डिज्नी यांनी केली.

    The Story of Walt Disney 1

    वॉल्ट डिज्नी यांनी निर्माता म्हणून ५७६, दिग्दर्शक म्हणून ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची निर्मिती केली. वॉल्ट यांना जगातील कोणत्याही कलाकाराला मिळाले नसतील इतके पुरस्कार मिळाले. आज चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी वॉल्ट यांना ५९ वेळा नामांकन मिळालं. तर यापैकी २२ वेळा त्यांना प्रत्यक्ष पुरस्काराने गौरवण्यात आलं. अशा या महान कलाकाराने १५ डिसेंबर १९६६ रोजी जगाचा निरोप घेतला.

    मुलांना परिवारासह डिज्नी कॅरेक्टर्सला भेटता यावे, अशी जागा वॉल्ट शोधत होते. त्यामुळे मुलांना त्यांच्याबरोबर वेळ देता येईल आणि आनंद घेता येईल. यासाठी 1955 मध्ये पहिले डिज्नीलॅँड थीम पार्क तयार झाले. हेच पॉर्क आंतरराष्‍ट्रीय पर्यटन केंद्र ठरले. पहिल्या पार्कच्या यशानंतर दुसरे पार्क बनविण्याचा निर्णय घेतला गेला. वॉल्टचे 1966 मध्ये निधन झाले. त्यानंतर रॉय यांनी हे काम सुरूच ठेवले. 1971 मध्ये फ्लोरिडात दुसरा पार्क तयार झाला. आज जगात सहा डिज्नी थीम पार्क आहेत.

    walt disney

    अनेक अपयश सोसूनही वॉल्ट खचले नाहीत. नकारात्मकता, निराशा या गोष्टींना त्यांनी आपल्यापासून दूर ठेवले. माणूस कितीही कठीण परिस्थितीतून आला, तरी त्याची कला त्याला जगवते आणि ती योग्य दिशेने जोपासली गेली कि ती त्याला योग्य ती कीर्ती मिळवूनच देते. याच उत्तम उदाहरण त्यांनी प्रस्थापित केले. तुम्हीही आपल्या कला जोपासा, त्याला वाढवा काय माहित तुमच्यातील वॉल्ट डिज्नीसुद्धा असाच आकार घेईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • भारतीयांची घरं आणि दारं सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केलं – अर्देशीर गोदरेज

    भारतीयांची घरं आणि दारं सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केलं – अर्देशीर गोदरेज

    चला तर आजच्या भागात जाणून घेऊ गोदरेजच्या कपाटबंद जन्माची ही कहाणी. 

    अर्देशीर गोदरेज यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1868 मध्ये मुंबई प्रांतात बुरजोरजी आणि दोसीबाई गुठरजी या पारशी दाम्पत्त्याच्या पोटी एका सधन कुटुंबात झाला. त्यांना सहा अपत्ये. अर्देशीर सगळ्यात मोठा मुलगा. बुरजोरजी आणि त्यांच्या वडीलांचा बांधकाम क्षेत्रात व्यवसाय होता. १८७१ साली या कुटुंबाने गोदरेज हे आडनाव स्वीकारले.

    लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या अर्देशीरने पुढे जाऊन वकिलीचा अभ्यास केला. वकिलीची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक खटले लढवले, अनेक केसेस सोडविल्या. मात्र झांझिबार येथील एका खटल्यादरम्यान त्यांनी आपली वकिली सोडली व ते परत मुंबईत आले.  

    ardeshir godrej the lockmaker of india 4

    इतर पारशी उद्योजकांप्रमाणे त्यांनाही व्यवसायात आपले नशीब आजमवायचे होतं. मात्र उपजीविकेसाठी त्यांनी एका फार्मसीत सहाय्यक म्हणून काम करायचे ठरवले. तिथे मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पारशी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व “मेरवानजी कामा” यांच्याकडून त्यांनी व्यवसायासाठी कर्ज मागितले. मेरवानजींनी विचारले, “घरी वडिलांना पैसे मागायचे सोडून माझ्याकडे का आला?”  त्यावर अर्देशीर म्हणाले, “मी घरी पैसे मागितले असते, तर वडिलांनी दिले नसते असे नाही, पण वडिलांनी कर्ज म्हणून पैसे दिले नसते, तर मुलासाठी द्यायचे म्हणून स्वखुशीने  दिले असते आणि अर्देशिर यांच्या स्वाभिमानी मनाला ते काही पटणारे नव्हते. १९१८ साली वडिलांचे निधन झाल्यावर ‘त्यांच्या संपत्तीवर माझा हक्क नाही’ असं सांगताना अर्देशीर यांचा हाच करारीपणा पुन्हा एकदा दिसला.    

    ardeshir-godrej-the-lockmaker-of-india

    गोदरेजची ही गाडी केवळ कुलुपांवरच थांबली नाही, तर तिला खूप मोठा पल्ला गाठायचा होता.  १९०१ साली अर्देशीर यांनी तिजोरी बनवायचा निर्णय घेतला. त्यांना इतकी सुरक्षित तिजोरी बनवायची होती कि, जी फोडता येणार नाही आणि आगीपासूनही ती सुरक्षित असेल. डझनभर डिझाइन्स बनवून झाल्यावर 1902 साली गोदरेजची पहिली तिजोरी बाजारात आली आणि प्रत्येक भारतीयाच्या घरात या तिजोरीच्या रूपाने एक सुरक्षारक्षकच अवतरला. मौल्यवान वस्तूंचा तो दणकट पहारेकरी बनला. 

    १९०५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या इंग्लंडच्या राणीने देखील आपले मौल्यवान सामान सुरक्षित राहण्यासाठी गोदरेजच्या तिजोरीला प्राधान्य दिले आणि ही एक प्रकारे गोदरेजच्या दर्जाला मिळालेली पोचपावतीच ठरली. ही तिजोरी चोरांपासूनच नाही, तर आगीपासूनही सुरक्षित होती. १९४४ साली मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण मुंबई गोदीतील आगीत प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानी झाली, पण गोदरेज कपाटाच्या तिजोरीतील मौल्यवान वस्तू, कागदपत्रं मात्र आगीच्या झळांपासून सहीसलामत वाचले होते आणि ही घटना गोदरेजसाठी निर्णायक टप्पा ठरली. या घटनेनंतर गोदरेज कपाटांनी भारतीयांच्या मनात जे अढळ स्थान प्राप्त केले ते कायमचे. त्यामुळेच आज कपाट म्हटलं कि डोळ्यासमोर उभे राहते ते केवळ गोदरेजचेच. कपाटाला ‘गोदरेज’ हा जणू प्रतिशब्दच तयार झाला.

    ardeshir-godrej-the-lockmaker-of-india

    अर्देशीर गोदरेज यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. पण त्यांचे स्वदेशीबद्दलचे मत लक्षात घेण्याजोगे होते. केवळ वस्तू स्वदेशी आहे म्हणून तिला चांगले म्हणण्याची सक्ती नको. ती दर्जाच्या बाबतीतही उत्तम असली पाहिजे. असे त्यांचे मत होते. भारतीय घराघरांत दाराला गोदरेज कुलूप आणि आत गोदरेज कपाट हे समीकरण अभेद्य होते.

    1910 मध्ये गोदरेजचा हा सगळा डोलारा धाकटा भाऊ पिरोजशा याला सांभाळायला सांगून अर्देशिर युरोप दौऱ्यावर गेले. युरोपातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी गोदरेजमध्ये बदल केले.  1928 साली अर्देशिर यांनी सगळा व्यवसाय धाकट्या पिरोजशाच्या हाती सोपविला आणि ते नाशिकला गेले. 

    भारताच्या इतिहासातील अनेक घडामोडींचा अर्देशिर यांचा गोदरेज ब्रॅण्ड हा साक्षीदार आहे. १९५१ साली स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकशाही निवडणुकांत मतदारांचं बहुमूल्य मत कोणाला मिळाले आहे हे पण सर्वात आधी गोदरेजलाच माहीत होते, कारण ती मते जपून ठेवणाऱ्या मतपेटय़ा गोदरेजच्याच होत्या. या साऱ्याचे रहस्य एकच होते, उत्तम दर्जा. १९५८ साली कंपनीने भारतातील पहिला फ्रिज सुद्धा बनवला होता. 

    ardeshir-godrej-the-lockmaker-of-india

    अर्देशिर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे खूप मोठे होते. स्वदेशी उत्पादनासाठी त्यांनी घेतलेली ठोस भूमिका महत्त्वाची होती. गोदरेजला केवळ कंपनी म्हणून नाही, तर भारतीय ग्राहकांच्या घराघरात नेऊन ठेवण्यापर्यंत विश्वास कमविणारा असा हा ब्रॅंडेड उद्योजक 1936 साली गोदरेजचा बलाढ्य कारभार वयाच्या 68 व्या वर्षी मागे सोडून जगातून निघून गेला. 

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


    आणखी वाचा

  • भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या कुटुंबात दत्तक गेलेले कै. नवल टाटा यांचे ते पुत्र. जे. आर. डी. टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा त्यांच्या समुहाचे प्रमुख बनले. 2002 पर्यंत त्यांनी टाटा सन्स या उद्योगसमुहाचे प्रमुखपद सांभाळताना समुहाच्या कक्षा विस्तारून त्या देशाबाहेरही पसरवल्या.

    ‘टेटली’, जग्वार लँड क्रूझर',कोरस’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या त्यांच्याच पुढाकारामुळे भारतीय मालकीच्या बनल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदावरून निवृत्ती स्वीकारली व सायरस मिस्त्री या 41 वर्षांच्या भाच्याकडे सूत्रं सोपवली.

    पण २०१६ मध्ये त्यांनी टाटा समूहात क्रांती घडवून आणली व मिस्त्रींना बाजूला करून ते पुन्हा समुहाचे अध्यक्ष बनले. त्यामुळे उद्योग जगतात निर्माण झालेली खळबळ अद्याप शमलेली नाही.

    dhirubhai-ambani-and-ratan-tata-birhday-special-indian-business-iconic-two-stars-of-indian-industry

    धीरूभाई मात्र केवळ स्वकष्टाने राखेतून निर्माण झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व होते. गरीब कुटुंबात जन्मलेले धीरूभाई एकेकाळी साड्या विकण्याचे काम करत. त्यातूनच ‘विमल’ हा घराघरात पोहोचलेला साड्यांचा ब्रँड तयार झाला.

    दूर एडनमध्ये एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या धीरूभाईंनी तेव्हा जगातील सर्वात मोठी पेट्रोकेमिकल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वकष्टाने ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कर्तृत्व दाखवले. बँका वा अन्य कंपन्यांकडून कर्जें घेऊन उद्योग उभारण्याऐवजी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांकडून छोट्या-मोठ्या ठेवी भाग भांडवल म्हणून गोळा करून त्यावर उद्योगांची मांडणी करण्याची अभूतपूर्व कल्पना धीरूभाईंनी राबवली व यशस्वीही केली.

    धीरूभाई व टाटा या दोघांच्याही भोवती वादाची वादळे घोंघावत राहिली. पण दोघानीही त्याची पर्वा न करता आपली वाटचाल चालूच ठेवली. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी उमटवलेला ठसा बराच काळ कायम राहील हे नक्की !

    Author : भारतकुमार राऊत

  • Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

    Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

    तोराकुसू यामाहा. २० मे १८५१ साली जपानमधील वाकायामा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील किशू राजघराण्यातील ज्योतिषी होते.  प्रत्येक वडिलांच्या आपल्या मुलाप्रती काही ना काही अपेक्षा या असतातच, आपला मुलगा यशस्वी व्हावा. चार चौघात त्याचं नाव व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी तुमच्या आमच्या आईवडिलांच्याही आपल्याकडून त्याच अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या परीने ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. तोराकुसूच्या वडिलांनाही वाटायचे की, आपल्या मुलाने आपल्याप्रमाणेच ज्योतिषी बनावे. लहानपणापासूनच अभ्यासात हुषार आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा असलेल्या आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. १८६८ साली तो नागसाकीला गेला. तिथे एका इंग्रज अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ दुरुस्तीचे शिक्षण त्याने घेतले. पुढे ओसाका या शहरात जाऊन वैद्यकीय उपकरण दुरुस्ती शिकून घेतली. वयाच्या ३५व्या वर्षी हमामात्सू या शहरात तो व्यवसाय सुरु केला. पण शहर लहान असल्यामुळे म्हणावी तेवढी मिळकत होत नव्हती. त्यामुळे जोडीला घड्याळ रिपेअरिंग आणि रिक्षा ड्रायव्हर म्हणूनसुद्धा त्याने काम केले.

    the-story-of-torakusu-yamaha-the-man-who-founded-yamaha
    the-story-of-torakusu-yamaha-the-man-who-founded-yamaha

    १९०२साली तोराकुसू यांना जपान सरकारचा मेडल ऑफ होनर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९११ साली शहर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 8-ऑगस्ट 1916 रोजी वयाच्या ६५व्या वर्षी तोराकुसू यामाहा यांचे निधन झाले. कंपनीला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी तोराकुसू आयुष्यभर झटत राहिले.

    पुढे १९३०-४० च्या दशकात व्यवसाय तेजीत असतानाच दुसऱ्या महायुध्दास प्रारंभ झाला आणि म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या या कंपनीला आपला व्यवसाय थांबवावा लागला. पण थांबणं यामाहाच्या धोरणांत बसतच नव्हतं. कंपनीने या काळात म्युजीकल इन्स्ट्रुमेंट सोडून शस्त्रास्त्रे बनवायला सुरुवात केली, कारण युद्धामुळे शस्त्रांचा साठा वाढविणे गरजेचे होते. त्यावेळी कंपनीने एअरक्राफ्ट, लढाऊ विमानं, टँक बनवले. कंपनीत त्यावेळेस एकूण तीनशेपेक्षा अधिक कामगार काम करत होते. या कंपनीचे प्रॉडक्ट इतके उत्कृष्ट होते की, विदेशातून देखील मागणी वाढली, अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र कंपनीकडून शस्त्रं घेत होते. पुढे युद्ध संपल्यावर शस्त्रात्रांची मागणी कमी होऊ लागली आणि कंपनी पुन्हा तोट्यात गेली. आता कंपनी टिकवून ठेवण्यासाठी काय करावे म्हणून कंपनीने पुन्हा म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनविण्यावर भर दिला.

    1955 YA 1
    YAMAHA YA-1 (1955)
    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

    होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

    एका लोहाराचा मुलगा ते होंडा मोटर्सचा मालक होण्यासाठी केलेला संघर्ष

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा.

    सोइचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपान मधील शिजूओका भागातील कोमयो गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांचे वडील गिहेई होंडा लोहार होते, तसंच त्यांचं एक सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. लहान सोइचिरो आपल्या वडिलांना कामात मदत करायचे. लहान लहान यंत्रांवर प्रेम करणाऱ्या सोइचिरोंचं अभ्यासात काय मन लागेना. त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि टोकियो गाठलं. तिथं ते ‘आर्ट शोकाई’नावाच्या कंपनीत मेकॅनिक म्हणून रुजू झाले, पण ते वयाने सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांना मेकॅनिकचं काम सोडून इतर छोटीमोठी कामं द्यायचे. यावर सोइचिरोंनी मालकाला विनंती केली आणि मेकॅनिकचं काम द्यायला लावलं. त्यांचं मशीनवरच प्रेम पाहून मालकानं सोइचिरोंना दुसऱ्या शाखेत पाठवलं. त्या शाखेत रेसिंग कार तयार केल्या जात होत्या. सोइचिरो तिथं मन लावून काम करु लागले. शोकाई कंपनीनं जपान कार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत अगदी अनपेक्षितरित्या कंपनीची कार पहिली आली. सोइचिरो त्या पहिल्या आलेल्या कारचे मेकॅनिक होते. यामुळे खुश होऊन कंपनीने एका शाखेची जबाबदारी या २१ वर्षीय पोराच्या खांद्यावर दिली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आलं होतं; परंतु रंगांधळेपणामुळे त्यांना डावलण्यात आलं.

    The Story of Soichiro Honda

    सोइचिरो रेसिंग स्पर्धेतसुद्धा भाग घ्यायचे. ७ जून १९३६ रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची आवड सोडली.

    काम करत असताना सोइचिरोंच्या लक्षात आलं की गाडीसाठी लागणाऱ्या पिस्टनला खूप मागणी आहे,. पण ते बनवणाऱ्या कंपन्या कमी. त्यांनी आपल्या मालकाला ही गोष्ट बोलून दाखवली आणि सुचवलं ही आपणही पिस्टन बनवू. पण मालकाने त्यांना साफ नकार दिला. यावर आता आपण स्वतःच पिस्टन बनवू म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल गाव गाठलं. त्यांनी ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनी उभी केली. या कंपनीनं पिस्टन रिंग बनवून त्या टोयोटा कंपनीला चाचणीसाठी दिल्या. पण त्यांनी पाठवलेल्या ५० रिंग पैकी फक्त ३ रिंग टोयोटा कंपनीच्या चाचण्या पास करू शकल्या. हे होत त्यांच्या आयुष्यातलं पहिलं अपयश.

    दोन वर्षांत त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार करून अधिक उत्कृष्ट पिस्टन रिंग बनवल्या. कंपनी बऱ्यापैकी काम करत होती, तोच दुसरं जागतिक महायुद्ध सुरु झालं आणि यात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या B२९ बॉम्बमध्ये सोइचिरोंची कंपनी उध्वस्त झाली. हा त्यांना बसलेला दुसरा तडाखा.

    युद्ध संपल्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे जळालेले अवशेष साडेचार लाख येनना विकले आणि परत नव्या जोमानं कंपनी उभी केली. तिचंही काम चांगलं चालू होतं. तोच जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यांची कंपनी जमीनदोस्त झाली. दैवाने त्यांची तिसऱ्यांदा परीक्षा बघितली. एक वेळ तर अशी होती की, सोइचिरोंकडे फक्त एका दिवसाचं पेट्रोल भरण्याइतकेच पैसे शिल्लक होते.

    मित्रहो सामान्य माणूस इतक्या अपयशानंतर खचून जातो. प्रयत्न सोडून देतो, पण हे सोइचिरो होंडा होते. ते अपयशाचं भांडवल करत बसले नाहीत. ‘हे माझ्याच सोबत का झालं’ म्हणून त्याला गोंजारत बसले नाहीत. इतक्यांदा पडून देखील ते पुन्हा उभे राहिले. नव्या जोमाने कामाला लागले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि ‘टोयोटा’ व ‘नाकाजिमा एअरक्राफ्ट’ सारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.

    The Story of Soichiro Honda

    हळूहळू जपानची अर्थव्यवस्था सुधारू लागली. तसंच सोइचिरोंनी चारचाकी गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील पाय ठेवला. सोइचिरो नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत. अशा या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अवलियाने ५ ऑगस्ट १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. सर्वसामान्यांना परवडेल अशी गाडी तयार करून लाखो मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करणारे सोइचिरो होंडा आपल्याला हेच सांगतात की “जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।”…

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.

    coca cola story how a failed experiment became a global phenomenon 1

    आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.

    आणि त्यांनंतर  एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला

    या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला

    पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीजा कडाडत होत्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गरोदारपणाच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली होती. अखेरीस दाईच्या सहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यावर दाई म्हणाली की “एवढ्या घनघोर अंधारात जन्मेलेल्या या बाळाच्या आयुष्यात पण अंधार असेल का?” त्यावर आईने उत्तर दिले, “नाही हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल.” १० जुलै १८५६ या दिवशी त्या वेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रोएशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला.

    N.Tesla

    लहानपणी त्याची तब्येत अतिशय नाजूक असे. लहान असताना त्याला प्रकाश तसेच वेगवेगळ्या आकृत्यांचे भास व्हायचे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा हे कळत नसे की आपण जे पाहतो आहे, ते खरं आहे की खोटं! कुठलीही गोष्ट एकदा पहिली की त्याच्या डोक्यात फिट्ट बसायची. त्याला जेव्हा एखादी आकृती दिसायची, तेव्हा ती त्याच्या पूर्णपणे स्मरणात रहायची. ती आकृती कागदावर काढायची सुद्धा त्याला कधी गरज पडली नाही. शिक्षकांनी दिलेली गणितं मुलं उतरवून घेईपर्यंत निकोलाने ती मनातच सोडवूनसुद्धा टाकलेली असायची! वयाच्या नवव्या वर्षी टेस्लानं उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली.

    त्याचे वडील हे चर्चमध्ये धर्मगुरू होते आणि आपल्या मुलानेसुद्धा आपल्यासारखेच काम करावे असं त्यांना वाटायचं. पण मुलाचा विज्ञान आणि गणिताकडे असलेला कल पाहून त्यांनी निकोलाला इलेक्ट्रीकल Engineering ला प्रवेश घेण्यासाठी संमती दिली. गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार असलेल्या निकोलाने १८७५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेऊन ९ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमध्ये असताना टेस्ला फाटे ३ वाजता अभ्यासाला बसायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास अखंड सुरु असायचा. झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो फक्त ४ तास झोपायचा.

    milutin tesla nikola tesla 2

     १८७५ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अतिहुशारपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे तो त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करू शकल नाही. एवढंच नाही तर त्यांने त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले संपर्क पूर्णपणे तोडले. १८८१ मध्ये टेलिग्राफ कंपनीमध्ये काम करून अनेक संप्रेषणात सुधारणा केली. टेलीफोन इम्प्लिफायरची नव्याने रचना केली, मात्र त्यावर स्वतःचे पेटंट घेतले नाही.

    घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, “जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.” मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती, म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, १८-१८ तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर अधिक प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. आणि पैसे द्यायला नकार दिला. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. त्यानंतर मग त्या दोघांमधील कलह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला. 

    त्यानंतर टेस्ला यांचा काही काळ खूप खडतर गेला. पैसे नसल्याने त्यांनी काही दिवस खड्डे खणण्याचे काम केले. त्यात त्यांना दिवसाला २ डॉलर्स मिळायचे. पण काही दिवसांनंतर त्यांचे नशीब पुन्हा उजळणार होते, कारण १८८७ मध्ये टेस्ला यांनी Induction Motor चा शोध लावला, जी AC म्हणजेच Alternating Current System वर काम करायची. ही मोटर इतकी शक्तिशाली होती की Electric मार्केटमध्ये आघाडीवर असलेले उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांचं लक्ष त्याकडे गेलं. टेस्ला यांनी जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्यासोबत Alternating Current सिस्टीमवर चालणारी ही मोटर जगासमोर ठेवली. मात्र त्याही वेळी एडिसन यांनी त्याचा विरोध केला, कारण त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत एडिसन यांची DC म्हणजेच Direct Current System कार्यरत होती. एडिसन टेस्ला वाद इतक्या विकोपाला गेला होता, की जेव्हा रेडियोच्या शोधामुळे मार्कोनी आणि टेस्ला यांच्यात भयंकर वाद निर्माण झाले त्यावेळी एडिसनने मार्कोनीला पाठिंबा दिला.

    d1b55175 709d 4a9b b902 1976e2532cc9

    शेवटी वयाच्या ८६व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या पूर्ण बेजार झालेले निकोला टेस्ला न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात 7 जानेवारी 1943 च्या रात्री झोपेतच कधी जग सोडून गेले हे सकाळपर्यंत कुणाला समजलं सुद्धा नाही! एडिसन, फॅरडे, मार्कोनी, आईनस्टाईन यांना जिवंतपणी जी प्रसिद्धी, जो मानसन्मान मिळाला तो टेस्ला यांना दुर्दैवाने मिळू शकला नाही. नाही म्हणायला या अवलियाच्या कामाची पोचपावती म्हणून, त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने त्यांना front page वर स्थान दिले. यावेळी त्यांना ७० हून अधिक वैज्ञानिकांकडून कौतुकास्पद पत्रं आली. त्यावेळी त्यात आईनस्टाईन यांचेही पत्र होते. पण आज त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेमध्ये १० जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. क्रोएशियातील १३०हून अधिक रस्त्यांना निकोला टेस्ला हे नाव दिले आहे. चंद्रावरील एका २६ किलोमीटर व्यासाच्या विवराला टेस्ला नाव देण्यात आले आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं नाव सुद्धा त्यांच्या नावावरुनच ठेवलं आहे. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण झालेल्या एक लघुग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला

    मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला

    मेहनत करूनही यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देणारे जगात अनेकजण आहेत, पण आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व इतकं महान आहे, की हजारहून अधिक वेळा आपले प्रयत्न चुकले, तरी त्यात सातत्य ठेवून त्याने अखेरीस विजेच्या बल्बचा शोध लावला. लहानपणी ज्याला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण आज त्याच्या नावावर १०९३ पेटंट आहेत अशा त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन.

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.

    अमेरिकेतील ओहियो राज्यामधील मिलान या गावात सॅम्युअल आणि नॅन्सी नावाचे दाम्पत्य राहात होते. सॅम्युअल दुकानात काम करत, तर नॅन्सी घरी शिकवणी घेऊन संसाराला हातभार लावत असे. ११ फेब्रुवारी १८४७ रोजी या दाम्पत्याच्या पोटी एडिसनचा जन्म झ़ाला. लहानपणापासूनच एडिसनला प्रत्येक गोष्टीच कुतूहल होतं. एडिसनने एकदा आपल्या आईला विचारलं कि, ‘पक्षी हवेत का उडतात?’ यावर तिने सांगितलं कि, ‘ते किडे खातात ना, त्यामुळं हवेत उडतात.’ यावर एडिसन बागेत गेला. त्याने अनेक किडे जमा केले, त्याचा घोळ बनवला आणि आपल्या मित्राला म्हणाला की, ‘हे पिलं कि तू हवेत उडशील.’ त्याचा मित्र ते प्याला. तो हवेत काय उडाला नाही, पण एडिसनला दिवसा तारे मात्र नक्की दिसले. आपल्या कुतुहलामुळं असे अनेक वेडेवाकडे प्रश्न एडिसन विचारायचा. त्यामुळं त्याला सगळे निर्बुद्ध आणि मतिमंद म्हणायचे.

    शाळेतून येताना एकदा एडिसन शिक्षकांची एक चिट्ठी घेऊन आला. जी त्याने आपल्या आईला दिली. ती वाचून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. एडिसनने जेव्हा आपल्या आईला विचारलं की यात काय लिहिलंय, तेव्हा त्याची आई म्हणाली, त्यांनी लिहिलेलं आहे की, ‘तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तो एक विद्वान आहे आणि आमची शाळा आणि शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत.’ तेव्हापासून पुढं एडिसनचं घरातच शिक्षण चालू झालं. त्याची आई त्याला अनेक पुस्तक आणून द्यायची आणि एक पुस्तक वाचलं कि त्याला पैसे मिळायचे. एडिसन विज्ञानाची अनेक पुस्तकं वाचू लागला. त्यानं आपल्या घरातच एक लहान प्रयोगशाळा चालू केली. तो तिथं अनेक प्रयोग करू लागला. रसायनं घ्यायला पैसे कमी पडत, म्हणून तो पेपर टाकत असे, रेल्वेमध्ये चॉकलेट गोळ्या विकत असे. घरातील त्याच्या उपद्व्यापामुळे घरचे वैतागले. त्याच्या आईने चिडून त्याची प्रयोगशाळाच बंद केली. नंतर त्यानं रेल्वेच्या एका लहान डब्यात आपले प्रयोग चालू केले. तिथं देखील एक अपघात घडला आणि त्याच्या एका रसायनामुळं डब्याला आग लागली. यावर रेल्वेच्या टिसीने एडिसनच्या इतक्या जोरात कानफटात वाजवली कि, तेव्हापासून एडिसनला कमी ऐकू यायला लागलं. पुढं जेव्हा त्याला यावर प्रश्न विचारला. तेव्हा याकडं देखील सकारात्मक पाहत एडिसन म्हणाले कि, ‘बरं झालं मला कमी ऐकू येतं. त्यामुळे मला वायफळ बडबड ऐकून घ्यावी लागत नाही आणि माझं लक्ष फक्त कामावर असतं.’

    हार न मानता लहान एडिसनने त्याचे प्रयोग चालू ठेवले. अशातच एकदा रेल्वेखाली येणाऱ्या एका लहान मुलाचा जीव एडिसनने वाचवला. तो लहान मुलगा स्टेशनमास्तर मॅकेंझीचा होता. याचं बक्षिस म्हणून त्याने एडिसनला टेलिग्राफ ऑपरेटिंग शिकवले. १५ वर्षाचा एडिसन टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करू लागला आणि सोबतच आपले प्रयोगही. दिवसभर प्रयोगात दंग असल्यामुळे त्याला रात्री झोप येई, म्हणून त्याने टेलिग्राफलाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी.

    घरची परिस्थिती बिघडत चालली होती वडिलांची नोकरी सुटली, आई आजारी. यामुळं घरची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एडिसन बोस्टनला आला आणि वेस्टर्न युनियन कंपणीमध्ये नोकरी करू लागला. १८६९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी तो न्यूयॉर्क मध्ये आला. तिथं त्यानं आपला पहिला यशस्वी प्रयोग केला युनिवर्सल स्टोक प्रिंटर बनवण्याचा. त्याने जेव्हा तो विकायचा ठरवलं तेव्हा त्याची किंमत ४हजार डॉलर्स लावली, पण एडिसनचा तो अविष्कार एक अमेरिकन माणसाने चक्क ४० हजार डॉलर्सला विकत घेतला. आता मात्र एडिसनकडे आपली स्वतःची प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुरेसे पैसे होते.

    या प्रयोगशाळेत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांने ग्रामोफोनचा शोध लावला. त्याकाळी गाणी ऐकण्यासाठी वापरलं जाणारं हे मशीन अल्पावधीतच लोकप्रिय झालं. एडिसनचं पहिलं प्रेम इलेक्ट्रिसिटी होतं. खरंतर इलेक्ट्रिकं बल्बचा शोध वोडवॉर्ड आणि इवान यांनी लावला, पण अपुऱ्या पैशामुळं त्यांना तो पुढं नेता आला नाही. एडिसनने त्यांच्याकडून या साठीचे सगळे हक्क खरेदी केले आणि आपल्या प्रयोगशाळेत तो याचे प्रयोग करू लागला. अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ मध्ये दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास चालणारा बल्ब बनवण्यात एडिसनला यश मिळालं. त्याचा हा अविष्कार पहाण्यासाठी माणसं येऊ लागली.

    त्यांनी नंतर एडिसन एलुमनेटिंग कंपनी चालू केली. जिच्यासाठी फोर्ड यांनी मदत केली आणि ती बनली जनरल इलेक्ट्रिक कंपनी बनली. याच हेन्री फोर्ड यांची माहिती मागील व्हिडीओमध्ये आम्ही सांगितली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.

    एडिसन आपल्या अनेक प्रयोगात यशस्वी होत होते. घरातील कपाट आवरत असताना त्यांना एक पत्र सापडलं. हे ते पत्र होतं, जे त्यांच्या आईला त्यांच्या शिक्षकांनी दिलं होतं. त्यांनी ते उघडलं, तर त्यात लिहिलं होतं की, ‘तुमचा मुलगा मतिमंद आहे, निर्बुद्ध आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे.’ हे पत्र वाचून एडिसन रडू लागले. आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एडिसन यांनी लिहून ठेवलं आहे कि, ‘एका महान आईनं एका मतिमंद मुलाला अजरामर असा संशोधक बनवलं.’ मित्रहो आजकाल आपण पहातो की, आपल्या मुलाने अमुक एवढे मार्क्स मिळवलेच पाहिजेत म्हणून दबाव टाकणारे अनेक पालक आहेत. अशांसाठी एडिसनची आई बरंच काही शिकवून जाते. 

    आपल्याला माहित नसेल, पण मोशन पिक्चर म्हणजेच चलतचित्र, त्याचा शोध लावण्यात देखील एडिसन यांचा खूप मोठा वाटा आहे. फ्लोरोस्कोपी मशीन जे Xरे साठी वापरलं जात,  ट्रान्समीटर, रिचार्जेबल बॅटरी, अनेक प्रकारचे केमिकल्स असे एक ना अनेक शोध एडिसन यांनी लावले आहेत. एडिसन हे संशोधकासोबतच एक गुंतवणूकदारसुद्धा होते. त्यांनी खाणकाम क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. पहिल्या जागतिक युद्धात देखील अमेरिका सरकारला एडिसन यांची खूप मदत झाली.

    जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. एडिसन यांनी पहिल्या बायकोच्या मृत्यनंतर दुसरं लग्न केलं. त्याना एकूण ६ मुलं आणि विशेष म्हणजे सहाही जण शास्त्रज्ञ होती. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चार्ल्स  एडिसन याने त्यांच्या कंपनीची घोडदौड सांभाळली.

    माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. शाळेतून काढलेल्या मुलाबाबत आजकालचे आईवडील, समाज कदाचित मानसिक खच्चीकरण करेल, पण एडिसनच्या आईच्या विश्वासाने याच मतिमंद समजल्या जाणाऱ्या मुलाला १०९३ पेटंट मिळवणारा संशोधक बनवलं. कमी ऐकू येण्याला जीवनातला अडथळा न मानता, उलट त्यामुळे आपण कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकलो, बल्ब बनवण्यात मला १००० वेळा अपयश आलं नाही, तर कोणत्या पद्धतीने बल्ब बनवला, तर तो बनत नाही याचे १००० मार्ग सापडले असा जगावेगळा विचार करणारे एडिसन.


    आणखी वाचा

  • जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

    जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

    आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल! 

    “बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.

    Screenshot Capture 2023 12 17 20 50 43

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष  वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.

    Screenshot Capture 2023 12 17 20 41 59
    Bertha Benz & Karl Benz

    कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.

    कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.

    benz patent motorwagen typ iii 1888 362590
    Benz Patent Motorwagen

    जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का?  इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.

    आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.

    जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले  ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.

    HOLD 306209966 AR 1 JVZGPNLWIQHQ
    Bertha Benz and the first road trip in history

    Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.

    1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे  वेगळं सांगायलाच नको.

    EaYlzN
    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट, पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

    सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट, पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

    २३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला

    00. heading walchand hirachand doshi better india
    Walchand Hirachand Doshi

    तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.

    या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.

    कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.

    काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.

    वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.

    वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

    6658924333 d5ab5bee42 b 1
    SS Loyalty, 5 April 1919
    Screenshot Capture 2023 12 17 20 24 05

    १९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.

    Beautifully restored 1971 Premier Padmini sedan
    Premier Padmini

    आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.

    567734c66e510a6f3a75b73b Ravalgaon 6 1291

    ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.

    शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.

    वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा