Category: टिप्स

  • अजूनही वेळ गेली नाही! यशाची चव चाखायची असेल, तर वॉरेन बफेंचे ‘हे’ 5 नियम कधीच विसरू नका

    अजूनही वेळ गेली नाही! यशाची चव चाखायची असेल, तर वॉरेन बफेंचे ‘हे’ 5 नियम कधीच विसरू नका

    असे महान गुंतवणूकदार बफेंनी गुंतवणुकीशी संबंधित काही नियम सांगितले आहेत, ते जर प्रत्येक यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाळले, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. कारण, बफेंनी सांगितलेले हे नियम मार्केटची कंडीशन बदलली तरी तितकेच शक्तिशाली राहतात. कोणते आहेत ते नियम जाणून घेऊयात…

    नियम १- पैसे गमावू नका

    वॉरन बफे (Warren Buffett) यांचा ‘पैसे गमावू नका’ हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. खरं तर, बफे हे जोखीम न घेणारे गुंतवणूकदार आहेत. जगातील इतक्या मोठ्या गुंतवणूकदाराविषयी असं म्हणणे कदाचित विचित्र वाटू शकते. मात्र, पोर्टफोलियो सुरक्षा ही संपत्ती कमावण्याच्या मार्गाने टाकलेले पहिले पाऊल आहे.

    American businessman and investor Warren Buffett 5 rules for investing

    नियम २- पहिला नियम विसरू नका

    बफेंनी सांगितलेला दुसरा नियम हाच आहे की, कुठल्याही गुंतवणूकदाराने पहिला नियम विसरायचा नाही. हे कसे करायचे, हेदेखील बफे स्पष्ट करतात. ते असे की, शक्यतो बड्या कंपन्या जेव्हा जास्त सवलतीत ट्रेडिंग करतात, तेव्हा या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ते असाही इशारा देतात की, तुमच्या भांडवलासोबत कधीही अनावश्यक जोखीम घेऊ नका.

    American businessman and investor Warren Buffett 5 rules for investing

    नियम ३- नेहमी सुरक्षा मार्जिन ठेवा

    एका कंपनीची फेअर व्हॅल्यू आणि बाजारातील व्हॅल्यूमध्ये अंतर आहे. जर फेअर व्हॅल्यूपेक्षा बाजार मूल्य कमी असले, तर सुरक्षा मार्जिन हे जास्त असते. हा नियम असे सांगतो की, तुम्हाला मार्केटविषयी कमी समज असेल तर, तुमचं सुरक्षा मार्जिन जास्त असावं.

    American businessman and investor Warren Buffett 5 rules for investing

    नियम ४- चांगल्या वित्तीय कंपन्यांचा शोध घ्या

    कंपनीच्या मूलभूत गोष्टी दाखवताना स्टॉकची किंमत थोडी कमी असू शकते. त्यामुळे बॅलेन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट तसेच नफा आणि तोट्याचे स्टेटमेंट यांसारख्या वित्तीय स्टेटमेंटच्या आधारे कमी मूल्यमापन केलेल्या कंपन्या शोधणे शक्य आहे.

    नियम ५- चांगली कमाई करणाऱ्या कंपन्या शोधा

    वॉरन बफे 5 ते 10 वर्षांच्या कालावधीतील कमाईचा मजबूत इतिहास असलेल्या कंपन्यांचा शोध घेतात. त्यांना तिमाहीत होणाऱ्या कमाईशी काहीही चिंता नाहीये. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, हा अल्पकालीन दृष्टीकोन एक वाईट वृत्ती आहे. कमी नफा आणि थोडीफार कमाई असलेली कंपनी, जी फक्त दोन वर्षांची आहे, ती बफेट यांच्या पोर्टफोलिओमध्ये येऊ शकणार नाही.

    American businessman and investor Warren Buffett 5 rules for investing

    या लेखाचा शेवट करताना तुम्हाला आणखी एक बोनस नियम सांगू की, बफेंच्या गुंतवणूक तत्त्वांतील मुख्य तत्व हे दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तुम्ही जितका जास्त काळ चांगले स्टॉक्स होल्ड करून ठेवाल, तितके तुमचे रिटर्न्स चांगले असतील. हे अल्प-मुदतीच्या अस्थिरतेच्या समस्या दूर करते ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार उच्च पातळीवर खरेदी करतात आणि कमी विक्री करतात.

  • कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे बुध्दी चालायची बंद होते. सगळे लोक पैसे मागत असतात व तुम्हाला मालक असूनही तोंड चुकवून पळावे लागते. कर्मचाऱ्यांना पगार वेळेत न दिल्याने कंपनी बुडणार आहे, अशा अफवा पसरतात, कंपनीचे एकूण वातावरण खूप वाईट होते व बरेच चांगले कर्मचारी नोकरी सोडून जातात. चेक बाऊन्स झाल्याने बिझनेस मार्केटमधून उठला, असा समज होतो.

    १. विक्रेत्यांशी चर्चा करा

    तुमच्याकडे किती पैसे आणि कधी येणार आहेत यावर कदाचित तुमचे नियंत्रण नसेल, परंतु तुमच्याकडून जाणाऱ्या पैशांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता. विक्रेत्यांना/पुरवठादारांना काही कालावधीसाठी थांबवता येईल का ते बघा किंवा एकदम सर्व पैसे देण्याऐवजी टप्प्याटप्याने पैसे देणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. बरेच व्यावसायिक आपल्या विक्रेत्यांशी बोलायला कचरतात. त्यांना वाटते की, आपली ‘इज्जत’ कमी होईल किंवा समोरची व्यक्ती कमी पैसे घ्यायला तयारच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. विक्रेते/पुरवठादार सुद्धा तुमच्यासारखेच व्यावसायिक असतात. त्यांनीसुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलेला असतो. त्यामुळे ते तुमची अडचण समजू शकतात.

    तसेच त्यांनासुद्धा आपला ग्राहक (तुम्ही) टिकवायचा असतो. जर तुमच्यासोबतचा त्यांचा अनुभव चांगला असेल तर ते नक्कीच तुमची मदत करतील. जेणेकरून दोघांचा फायदा होईल. त्यामुळे किती पैसे येणार आहेत याचा अंदाज घ्या. एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत? त्यात कुणाला तातडीने द्यावे लागतील? कुणाला काही कालवधीसाठी थांबवू शकतो? त्यांना फोन करा, चर्चा करा. आणि त्यानुसार नियोजन करा.

    २. अनावश्यक खर्च लांबणीवर टाका

    ‘कडकी’ चालू असताना आपला खर्च कुठे होतोय याचा बारीक विचार करा. त्यातील काही खर्च लांबणीवर टाकता येतात का किंवा पूर्णपणे काढून टाकता येतात का ते पाहा. तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही मालाचा आठवड्याला/महिन्याला जो स्टॉक भरून ठेवता तो कमी भरणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. जेवढा खर्च कमी कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याजवळ खर्चासाठी उपलब्ध होतील.

    ३. निरुपयोगी गोष्टी विकून टाका

    समजा एखादे नवीन उत्पादन करण्यासाठी एखादी मशीन दोन वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतली होती. पण तुमचे नियोजन फसले. ती मशीन तुमच्या कार्यालयात तशीच पडून आहे. ती विकू शकता का? कदाचित तुमच्याबाबतीत मशीन नसेल, एखादा कंप्यूटर, गाडी किंवा इतर काहीही असू शकते. जे तुम्ही विकू शकता. अशा गोष्टींचा अंदाज घ्या. त्यांची किंमत ठरवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रीस ठेवा. विकताना जास्त आढेवेढे न घेता व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच पैसा उपलब्ध होईल. 

    ४. पेमेंटवर सूट द्या.

    आपल्याच पैशांसाठी वाट बघत बसणं जिकिरीचं असतं. अशावेळी तुमच्या सर्व ग्राहकांशी संपर्क साधा आणि पेमेंट बाबत विचारा. काहींची मुदत संपायला (नूतनीकरण) अजून वेळ असेल. अशा लोकांना थोडीफार सूट (विशेष लाभ) देऊ शकता. त्यांना परिस्थितीची कल्पना द्या. ‘जर तुम्ही मुदतपूर्तीच्या आधी पेमेंट केलं, तर तुम्हाला सूट मिळेल’ असं सांगून बघा. अर्थात, सूट देताना कमीत कमी द्या. मुख्य उद्दिष्ट आपल्याला लागणारे पैसे उभे करणं हे असावं. अशाच प्रकारे सर्व ग्राहकांशी बोलून घ्या. कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारे परिणाम मिळतील आणि तुमची पैशांची चिंता मिटेल.

    ५. फ्लॅश सेल सुरु करा

    तुमच्याकडे तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस असेलच. त्यांचे फोन नंबर, ईमेल आयडी असतील. कदाचित त्या ग्राहकांनी कोणत्या वस्तू किंवा सेवा आधी वापरल्या आहेत याची सुद्धा माहिती असेल. याच ग्राहकांसाठी तुमच्या सर्वात लोकप्रिय वस्तू/सेवांवर एखादी ऑफर सुरु करा. किंमत आकर्षक ठेवा. फक्त डिस्काउंट देऊ नका. ऑफर अशी असली पाहिजे की, लोकांचं लक्ष आकर्षून घेईल आणि त्यांना खरेदी करायला भाग पाडेल.

    तसेच ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच ठेवा, कदाचित ४८ तास किंवा पुढील ५ दिवस. त्यानंतर ही ऑफर कधीच असणार नाही असं सांगा. ही माहिती देणारा संदेश तुमच्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना बल्क ईमेल/मेसेज करा. फक्त एकच ईमेल पाठवून थांबू नका. अनेक लोक रोज ईमेल बघत नाहीत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे ईमेल/मेसेज पाठवून वेळ संपत चालल्याची आठवण करून दिली पाहिजे. तुमची सेल्स आणि मार्केटिंग टीम सुद्धा व्यक्तिशः फोन करून जास्तीत जास्त बिझनेस मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.  

    ६. वस्तू/सेवांच्या किंमतीवर पुनर्विचार करा

    किंमत वाढवणे हा सुद्धा व्यवसायाचा एक भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तेव्हा या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. अर्थात वस्तूंचे/सेवांचे दर वाढवण्याआधी पूर्ण विचार करा. तुमचा एकूण खर्च किती आहे? त्याबदल्यात तुम्ही किती रक्कम आकारत आहात? तुम्ही दर वाढवून बराच कालावधी झाला आहे का? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता तुमचे दर कसे आहेत? दर वाढवणे हा कॅश क्रंच मधून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. परंतु, नियोजनबद्धपणे वाढवले पाहिजेत. नाहीतर हा पर्याय अंगलट आला तर, आहेत ते ग्राहक सुद्धा तुम्हाला सोडून जातील.    

    ७. कर्मचारी कमी करा, पगार लांबवा

    हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. कनिष्ठ/नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेनं वरिष्ठ/जुने कर्मचारी कंपनीची परिस्थिती समजून घेऊ शकतात. पुढे अडचण येणार आहे, असे लक्षात येताच आपल्या मुख्य सहकाऱ्यांशी चर्चा करा. यातून बाहेर पडण्यासाठी वर दिलेले पर्याय वापरून काय करता येईल याची योजना बनवा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सहकार्य मागा.

    शेवटी, एवढं सगळं करूनही समस्या सुटली नाही, तर सर्वांचे पगार करण्याइतपत पैसे कंपनीजवळ नसतील. त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत पगार मिळू शकणार नाही, असे सांगा. अर्थात कुठल्याही कर्मचाऱ्याला हे आवडणार नाही. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमची साथ देऊ शकतात. अगदीच गरज पडली तर काही कर्मचारी कामावरून कमी करा.

  • ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

    ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

    हल्ली एका क्लिकवरुन आपण लाखो रुपयांची उलाढाल करू शकतो. १०-१५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. बँकेत दिवसभर रांगेत उभं राहूनही पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती. पण आत्ता सगळं कसं सोयीस्कर झालंय.

    हल्ली क्षणार्धात एका अकाऊंटवरचे पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. पण हे ऑनलाइन पेमेंट करायचं म्हणजे अनेकांना जरा risky च काम वाटतं. हा म्हणजे भीती वाटणं सहाजिकच आहे म्हणा, कारण बऱ्याच ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून फ्रॉडच्या फसवणुकीच्या बातम्या कानावर पडत असतात.

    मग अशावेळी आपण काय केलं पाहिजे. चला तर पाहूया…

    बऱ्याचदा आपण एखाद्या कमी विश्वासार्ह किंवा फेक लिंकवर जाऊन वस्तू खरेदी करतो. अरे हा ड्रेस किती सुंदर आहे आणि स्वस्त पण आहे, चला घेऊन टाकू असं म्हणून लगेच ते प्रॉडक्ट आपण खरेदी करतो. आणि यात महिलावर्गाचे प्रमाण थोडे जास्तच असते. मैत्रिणींनो कपड्यांच्या दुकानात गेलात तरी तुम्ही पारखून कपडे विकत घेता, मग ऑनलाइन कपडे घेताना मात्र कशा फसता बरं? कोणतीही वस्तू ऑनलाइन विकत घेताना जिथून तुम्ही ऑर्डर करणार आहात त्या साईटची आधी माहिती घ्या. तिथले  reviews चेक करा. फेसबुकला कोणीतरी काहीतरी टाकलंय, केवळ insta वर फोटो छान दिसतायत म्हणून ऑर्डर करू नका. त्यांची verified website आहे का ते पहा, त्यांचं app आहे का ते पहा. त्यांच्याकडे cash on delivery हा ऑप्शन आहे का ते पहा. अर्धवट महिती शिवाय कधीच, काहीच बूक करू नका आणि payment तर अजिबातच करू नका.    

    दूसरा मुद्दा म्हणजे

    बऱ्याचदा आपल्या फोन मधील नेट संपल्यावर आपण दुसऱ्यांचं वायफाय घेतो. पण हे असं दुसऱ्यांचं वायफाय वापरण्याच्या नादात कधी तुमचा फोन हॅक होईल सांगता सुद्धा यायचं नाही. दुसऱ्याचं वायफाय किंवा सार्वजनिक कॉम्प्युटर वापरल्यामुळे तुमचे डॉक्युमेंट आणि पासवर्ड चोरले जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर स्वतःची जी काही personal कामं असतील ती फक्त स्वतःच्या वायफाय आणि कॉम्प्युटरवरच करावीत.

    कार्ड सेव्ह करू नका:

    ऑनलाईन खरेदी करताना अनेकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. याचं मुख्य कारण म्हणजे कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफर्स. एखादे प्रॉडक्ट खरेदी करताना Save card for future किंवा save card details अशा प्रकारचे ऑप्शन असणारी टिकमार्क काढून टाकायची विसरतात किंवा next order च्यावेळी कार्डचे डिटेल्स भरायचा त्रास वाचण्यासाठी save करतात. परंतु हे टाळले पाहिजे, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. याचबरोबर ब्राउझरमध्ये असणारी ऑटोफिल सुविधा देखील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत बंद केली पाहिजे. यामुळे कदाचित सगळी माहिती भरण्याचे कष्ट करावे लागतील, परंतु ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होतील.                                                                                                              

    अनेकदा बँक, क्रेडिट कार्ड किंवा इन्शुरन्स कंपनीकडून महत्वाचे मेल येतात. त्यामध्ये एखादी ऑफर किंवा केवायसी संबंधित माहिती विचारली जाते. संबंधित विषयाच्या अधिक माहितीसाठी किंवा ऑफर मिळविण्यासाठी त्यामध्ये एक लिंक दिली जाते. सवलत देणाऱ्या जाहिरातींकडे आपण लगेच attract होतो. पण लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान! हा फिशिंगचा प्रकार असू शकतो. हा मेल फसवा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही मेलमध्ये आलेली लिंक क्लिक करण्यापूर्वी आलेला मेल अधिकृत कंपनीकडून आल्याची खात्री करून घ्या किंवा आलेल्या offer संदर्भात आपल्या बँकेकडे चौकशी करा.                  

    क्यूआर कोड स्कॅन करतानाही आवश्यक ती काळजी घ्या. खात्रीशीर दुकानांमध्येच क्यूआर कोड स्कॅन करा. काहीवेळेस असे देखील घडते की, क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुमच्या बँक खात्याची संपूर्ण history हॅकरकडे जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व संशयित वाटणारा क्यूआर कोड अजिबात स्कॅन करू नका. त्यामुळे एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कमही तुमच्या अकाऊंट मधून कट होऊ शकते.

    तर मग यापुढे ऑनलाईन पेमेंट करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि निश्चिंत राहा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

    Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

    नमस्कार मित्रांनो… आपण नेहमी स्टार्टअप टर्म्स, बिझनेस आयडिया, tech news अशा अनेक विषयांवर बोलत असतो. आज थोडं आपण finance Wedding Insurance विषयावर बोलूया. नुकताच घडलेला एक किस्सा. मागच्या महिन्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं, ती आहे CA. तिचा नवरा देखील CA. आता दोघंही CA म्हणजे बक्कळ पैसा. त्यामुळं लग्नदेखील अगदी धुमधडाक्यात झालं. मात्र लग्नात दुर्दैवाने तिचे ७ लाखांचे दागिने चोरीला गेले. पोलिसांनी चोराला खूप शोधलं, पण अजून काही तो चोर सापडला नाही.

    भरमंडपात 7 लाखांचं नुकसान. बिच्चारी… पण तिला माझ्याइतकं वाटलं नाही. कारण तिने wedding insurance काढला होता. आत्तापर्यंत health insurance, life insurance, home insurance ऐकलं होतं, ही wedding insurance ची नवीन भानगड या चोरीच्या निमित्ताने समजली.

    तर तिच्याशी या विषयावर जरा सविस्तर बोलल्यावर कळलं की, आपण लग्नाचाही insurance काढू शकतो म्हणे. तसं भारतात याचं प्रमाण जास्त नाहीये, मात्र परदेशात जवळपास सगळेच हा Wedding Insurance काढतात.

    साधारणतः लग्नात आपण आधीच वेडिंग हॉलचे, फोटोग्राफरचे, invitation cards, जेवणाचे अशा सगळ्याच गोष्टींचे पैसे आपण आधीच देऊन टाकतो, पण if in case कोणत्यातरी कारणावरून तुमचं लग्न जर postponed झालं तर? किंवा कोणत्यातरी कारणावरून लग्नच cancel झालं तर? देव न करो कोणाच्याही बाबतीत असं न घडो, पण मित्रांनो जरा थोडा डोक्याला ताण द्या आणि विचार करा. जर लग्न cancel झालं, तर तुम्ही आधी दिलेले पैसे तर फुकटच गेले ना. एकदा गेलेले पैसे आपल्याला थोडीच मिळणार आहेत. अशावेळी हा wedding insurance च आपल्याला मदत करतो. तुमचं झालेलं नुकसान हा insurance भरून काढतो.

    Wedding Insurance चं coverage केव्हा आणि कोणत्या निकषांवर मिळू शकतं?

    तर काही गुन्हेगारी घटनांमुळे विवाहस्थळाचे नुकसान झाले असेल किंवा लग्नात दागिने, कपडे किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या असतील, तर त्याची भरपाई हा Insurance भरून काढतो. तसेच जर पाऊस, वादळ किंवा भूकंपामुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द झाला असेल, तर त्याची भरपाईही हा Insurance करतो. आता कंपन्या Wedding Insurance मध्ये वैयक्तिक अपघातांचाही समावेश करत आहेत. आश्चर्य म्हणजे यामध्ये तुम्ही वऱ्हाडी लोकांचाही विमा काढू शकता. मात्र जर तुम्ही स्वतःहून काही कारणास्तव लग्न cancel केलं, तर तुम्हाला Insurance मिळू शकतं नाही. तसेच जर संप, आंदोलन, दहशदवादी हल्ला, नवरा-नवरीचे अपहरण किंवा तुमच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या वस्तूचे नुकसान झाले असेल तरी तुम्हाला insurance covarage मिळू शकणार नाही. त्यामुळे लग्नकार्यात थोडं सांभाळूनच. 

    तर आता पाहूया हा insurance मंजूर होण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत?

    पहिल्यांदा तुम्हाला लग्नासाठीच्या एकूण खर्चाचा आराखडा कंपनीला द्यावा लागतो. कंपनीला म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही Insurance घेतलाय त्यांना. लग्नस्थळाची माहिती किंवा ज्याकाही बुकिंगच्या पावत्या असतील, त्या सगळ्या आधीच कंपनीला द्याव्या लागतात. क्लेमसाठी आगोदरच सर्व documents ची पूर्तता करून अर्ज भरावा लागतो. तसेच सोहळ्यात जर चोरीची घटना घडली, तर पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवावी लागते. FIR ची कॉपी कंपनीला सादर करावी लागते, तसेच लग्नाचा बेत cancel झाला तर कंपनीचे प्रतिनिधी स्वतः येऊन संपूर्ण शहानिशा करूनच Insurance Coverage मंजूर करतात.  

    या insurance चा खर्च हा, तुम्ही कोणती योजना निवडता यावर अवलंबून असतो. Insurance मध्ये जितक्या जास्त गोष्टी कव्हर केल्या जातील, तितका त्याचा हप्ता वाढत जातो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही १० लाख रुपयांचा विवाह विमा घेतला असेल तर यासाठी तुम्हाला ७५०० ते १५ हजार पर्यंतचा प्रीमियम भरावा लागेल. लग्नखर्च अगदी १ लाखांचा असो वा ५० लाखांचा. तुम्ही तुम्हाला हवी ती पॉलिसी घेऊ शकता. कोणतेही नुकसान झाले, तर तुम्हाला १०० टक्के रक्कम परत मिळू शकते. ICICI लोम्बार्ड, बजाज Allianz आणि Oriental Insurance सह अनेक कंपन्या wedding insurance ची सेवा पुरवतात. या कंपन्यांकडे वेगवेगळे पॅकेजेस देखील असतात. काही insurance कंपन्यांकडे लग्नाच्या 15 दिवस आधी सुरु होणाऱ्या पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत, तर काहीकांडे लग्नाच्या २४ तास आधी सुरु होणाऱ्या पॉलिसी देखील उपलब्ध आहेत.

    भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणं चांगलं असतं. त्यामुळे लग्नाचा बार उडवायचा विचार करत असाल; तर आधी विवाह विमा नक्कीच घ्या!

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा