Tag: Teacher

  • गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

    गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

    भारतीय शिकवणीनुसार ज्या कुणा सजीव आणि निर्जीव वस्तूचा आपण जगण्यासाठी वापर करतो, त्या वास्तुप्रती कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. सामान्य माणसाला हीच शिकवण समजावी म्हणून पुराणांच्या पानांमध्ये गोष्टींच्या रूपाने त्या व्यक्त केल्या जातात एवढंच. त्यामुळे अश्या एखाद्या खास दिवशी आपण ज्या देवाची किंवा वस्तूची पूजा करतो ती का करतोय याची जाणीव असली पाहिजे, केवळ श्रद्धा आणि भक्ती हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश नसून कृतज्ञतेचा भाव माणसाच्या मनात कायम राहावा हीच त्यामागची खरी शिकवण आहे, त्यामुळे कायम लक्ष्यात ठेवा की भारतीय संस्कृती ही कधीही मागासलेली नव्ह्ती तर कायम पुढारलेलीच होती केवळ आपण त्याचा अर्थ समजायला कमी पडलो एवढंच.

    गुरुपौर्णिमेचे पौराणिक महत्व:

    आज आपण अश्याच एका महत्वाच्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. मनुष्य जन्म घेतल्यानंतर थेट मृत्यू येईपर्यंत माणूस काही ना काही शिकत असतो, त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्यातील अनेकविध घटक त्याला पदोपदी शिकवण देत असतात. मग या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव बाळगला पाहिजे की नाही? नक्कीच हो!! आणि यातच गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं सार दडलेलं आहे. सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो? पुराणांच्या आधारे हा दिवस म्हणजे महर्षी व्यास यांची जन्मदिवस आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. प्रसिद्ध ग्रंथ महाभारताचे रचते आणि चारही वेदांचे विभाजन करणारे वेदव्यासच होते.असं म्हणतात महर्षी व्यासांना दिव्यदृष्टी प्राप्त होती आणि या शक्तीच्या जोरावरच त्यांनी कलयुगातील घटनाक्रम ओळखला होता. व्यासांच्या याच अलौकिक ज्ञानामुळे त्यांना कैक युगानंतरही मानाचं स्थान प्राप्त आहे. ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आजही आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो.

    233084184 25903594 aaf4 48fa bc0f 2b7e2755dfd8

    गुरु म्हणजे कोण?

    असं म्हणतात एका नवजात बालकाचा देखील गुरु असतो आणि ती म्हणजे आई. जिच्या नावातच आत्मा आणि ईश्वर दोन्ही सामावलेले आहेत ती जन्मदात्री आई. आईच तिच्या लेकराला चालायला, बोलायला, जेवायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभं करते. त्यामुळे जन्मापासूनच माणसाचं शिक्षण एकार्थाने सुरु होतं असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. “अंधकार निरोधित्वात गुरुर-इत्यभिधियते” याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करणारा म्हणजे गुरु होय. जीवनाच्या टप्याटप्यावर भेटलेला प्रत्येक माणूस या-ना-त्या प्रकारे आपल्याला शिकवण देऊन जातो, आणि म्हणूनच ही प्रकृती आणि त्यात सामावलेला प्रत्येक घटक हा आपला गुरु आहे. लहान मूल जसजसं मोठं होऊ लागतं तसं त्याला शाळेत भरती करतात आणि पुढे त्याचा शैक्षणिक प्रवास सुरु होतो. शैक्षणिक प्रवासात समोर आलेले शिक्षक आणि मार्गदर्शक आपल्या मनातील गुरु या शब्दाच्या धूसर चित्राला आकार देतात. शैक्षणिक जीवनानंतर माणसाचा खरा प्रवास सुरु होतो, नवीन आव्हानं आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न इथूनच सुरु होतो. अश्या या कठीण काळात भेटणारा प्रत्येक मार्गदर्शक देखील गुरु’च ठरतो नाही?

    आजच्या जगात गुरुचे महत्व काय?

    काळ कितीही बदलत असला तरीही गुरुचं महत्व कधीही कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अश्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञतेचा भाव मनात असणं महत्वाचं आहे. तुम्ही कदाचित आजूबाजूला पाहिलं असेल शाळकरी मुलं किंवा कॉलेजला जाणारे तरुण शिक्षकांची खिल्ली उडवतात, वेळ जाण्यासाठी शिक्षकांच्या नावाने मजा-मस्ती केली जाते. मात्र एकदा स्वतःला विचारून बघा की हे कितपत योय आहे. मित्रपरिवाराच्या आनंदासाठी शिक्षकांची टर उडवणं, त्यांना नावं ठेवणं, नकला करणं हा आपल्या शिकवणीचा भाग नाही. तरुण वयात मजा-मस्ती नक्कीच करावी मात्र त्यात कुणावर शिंतोडे फेकणं योग्य नाही.

    WhatsApp Image 2024 07 20 at 4.24.03 PM

    भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याकडे पिढ्यांपिढ्यांपासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण ज्यांना आपण भगवंताचा परमअवतार मानतो, त्यांचे पूजन करतो त्या भगवंताने देखील गुरुचे शरण मिळवलेच होते. गुरु सांदीपनी असुद्या किंवा गुरु वसिष्ठ भगवंताला देखील गुरुची गरज भासलीच आणि आपण तर क्षुल्लक माणसं आहोत.

    आणखी वाचा:

  • अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    desh bandu lupin

    २६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.

    ‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.

    How Deshbandhu Gupta Turned Rs. 5000 into a Global Pharma Company

    त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.

    डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अ‍ॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.

    The Life and Legacy of Deshbandhu Gupta, Founder of Lupin Pharma

    सौ. लोकसत्ता, व्यक्तिवेध

    आणखी वाचा