Tag: education

  • शिक्षणात वेगळेपण जपणारी विद्यापीठे

    शिक्षणात वेगळेपण जपणारी विद्यापीठे

    हे खरे आहे की, देशातील शिक्षणाच्या विकासाला अधिक विस्तारावे लागेल. पण गेल्या वर्षात झालेल्या भारतीय शिक्षणाच्या प्रगतीला बेदखलही केले जाऊ शकत नाही. रोचक हे आहे की, जगभरात पहिल्यांदा उघडणारी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. काही विशेष क्षेत्रांमध्ये विशेष (स्पेशलाइझ्ड) शिक्षणाशी जोडलेल्या संस्थादेखील इथे अस्तित्वात आहेत, ज्या शैक्षणिक विकासासाठी
    प्रयत्नरत आहेत.

    👍 पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये

    अशातच झालेल्या सरकारी घोषणेनुसार, गुजरातच्या वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ एमबीए व एमटेक पदवी प्रदान करील. नंतर रेल्वे ऑपरेशन्समध्ये (अभियान) पदविका व बीटेकची पदवीदेखील इथे उपलब्ध असेल.

    • काय विशेष : ही संस्था भारताला रेल्वे अभियांत्रिकी व व्यवस्थापनात संशोधन व विकासाच्या जागतिक केंद्रात परिवर्तित करेल.
    Top Universities Embracing Uniqueness in Education

    👍 गुडगावात पहिले संरक्षण विद्यापीठ

    संरक्षण क्षेत्रात धोरण बनवणाऱ्या विशेषज्ञांपासून ते परदेशाशी संरक्षण संबंधांवर संशोधनासाठी सुरू होणाऱ्या या देशातील पहिल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची निर्मिती गुडगावातील बिनौला गावात सुरूही झाली आहे. इथे लष्करी शिक्षणात प्रशिक्षण आणि शोधासाठी ही एक अशा प्रकारचे अनोखे व पहिले शिक्षण संस्थान असेल.

    • काय विशेष : संरक्षण संशोधनासह युनिव्हर्सिटी डिफेन्स स्टडीज, डिफेन्स मॅनेजमेंट, डिफेन्स सायन्स व टेक्नॉलॉजी क्षेत्रात उच्च शिक्षणाला विकसित करेल.

    👍 मणिपुरात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

    तसे पाहता खेळासाठी देशात अनेक संस्था आहेत. पण आता राष्ट्रीय स्तरावर खेळाच्या विकासासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी बजेट २०१४-१५ मध्ये प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना मणिपुरातील थाऊबल जिल्ह्यामध्ये केली जाईल.

    • काय विशेष : खेळाच्या क्षेत्रात शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर शिक्षण संस्था असतील. बीपीएड, एमपीएड, फिजिओथेरपी, फिटनेस, क्रीडा व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध होतील.
    Top Universities Embracing Uniqueness in Education

    👍 रोचक तथ्य

    • २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांसह बीएचयू आशियातील सर्वात मोठ्या निवासी विद्यापीठांपैकी एक आहे.
    • ७०० हून अधिक विद्यापीठे व ३८,००० महाविद्यालयांसह भारत जगातील सर्वात मोठ्या हायर एज्युकेशन सेक्टर(क्षेत्र) असणाऱ्या देशांपैकी एक आहे.
    • ४० लाखांहून अधिक विद्यार्थी संख्या असणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे.
    • भारतात केवळ भाषांनाच समर्पित वा वाहिलेली हून २० अधिक विद्यापीठे आहेत.

    👍 जगभरात पहिल्यांदा

    • गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, फॉरेन्सिक व इन्व्हेस्टिगेटिव्ह सायन्सला समर्पित जगभरातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
    • जगातील पहिली होमिओपॅथी युनिव्हर्सिटी जयपुरात (साईपुरा) आहे.
    • जगातील पहिली किडनी प्रत्यारोपण युनिव्हर्सिटी अहमदाबादेत आहे.
    • २०१५ मध्ये स्थापन झालेल्या गुजरात युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन संपूर्ण विश्वात ट्रान्सप्लांटेशन व अलाइड सायन्सेसचे हे पहिले विद्यापीठ आहे.
    • देशातील पहिली ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ युनिव्हर्सिटी – इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी बंगळुरूत स्थापन झालेली आहे.

    👍 हेदेखील आहे विशेष

    रॉयल स्कूल ऑफ माइन्स – लंडनच्या धर्तीवर तयार झालेली इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबादला खाण शिक्षणाच्या उद्देशानेच सुरू केले गेले. जे अनेक विभागांसह टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये विकसित झालेले आहे.
    आंध्र प्रदेशची द्रविड युनिव्हर्सिटी – द्रविड भाषा आणि संस्कृतीच्या विकासासाठी स्थापित केली गेली होती. दोन विभागांसह सुरू झालेले हे विद्यापीठ आता जवळजवळ २० शैक्षणिक विभागांसह विस्तारली आहेत.

    👍 देशात प्रथमत:च

    • रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी – भारतात अशा प्रकारातले हे पहिलेच विद्यापीठ आहे. जे पोलिस सायन्स व इंटर्नल सिक्युरिटीमध्ये प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
    • हरियाणास्थित नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर देशातील एकमात्र इन्स्टिट्यूट आहे. जे न्यूूरो सायन्समधील संशोधन व शिक्षणासाठी समर्पित आहे.
    • बीएचयूचे मालवीय सेंटर फॉर पीस रिसर्च भारतीय विद्यापीठाच्या प्रणालीत आपल्या प्रकारातले पहिलेच केंद्र आहे.
    • युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज भारताची पहिली एनर्जी युनिव्हर्सिटी आणि आशियातील पहिली आणि एकमात्र ऊर्जा व कोअर सेक्टर विद्यापीठ आहे.

    👍 केरळात येणार जेंडर रिसर्च युनिव्हर्सिटी

    केरळ सरकार देशातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ कोझिकोडे जिल्ह्यात स्थापन करण्याच्या तयारीत आहे, जे विशेष करून जेंडर(लिंग)शी संबंधित संशोधन अभ्यासासाठी असेल. विद्यापीठाची संकल्पना विदेशी संस्थांच्या नमुन्यानुसार तयार केली जात आहे.

    • काय आहे विशेष : करिकुलम आणि अभ्यासक्रम पारंपरिकऐवजी आंतरराष्ट्रीय मानकानुसार वा त्यावर आधारित असेल.

    👍 झारखंडमध्ये सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटी

    अशातच झालेल्या एका घोषणेच्या अनुसार, रांचीत सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटीची स्थापना होईल, ज्यात देशी आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती व औषधी वनस्पतींवर संशोधनाशिवाय पदवी व पदविका अभ्यासक्रम असेल. छत्तीसगडमध्येही आयुष अँड हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी, छत्तीसगड अस्तित्वात आहे.

    • काय विशेष : याविषयी संबंधित क्षेत्रातील शिक्षणाला अधिक मजबुती मिळेल.
    Top Universities Embracing Uniqueness in Education

    👍 संशोधन व नवकल्पनांचे शिक्षण

    अशातच प्रधानमंत्री कार्यालयात मनुष्यबळ विकास मंत्रालयातून संशोधन व नवकल्पनांसाठी (सर्जनशीलता-नवोन्मेष) १० खासगी स्वायत्त विद्यापीठे स्थापन करण्याच्या योजनेत वेग आणण्यासाठी सांगितले गेले आहे. या प्रकरणी उच्च शिक्षणासाठी जगभरातील खासगी संस्थांचा भारतात येण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल.

    • काय विशेष : ही विद्यापीठे संशोधन व नवकल्पनांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करवतील.

    आणखी वाचा

  • अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी!!!

    अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी!!!

    स्पर्धा परीक्षेची चांगली सुरुवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखे असते. तुम्ही जशी सुरुवात करता तसाचा शेवट होतो. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी शाळा-कॉलेज पासूनच करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग आदी परीक्षा सोपी बनवायची असेल तर इंग्लीशकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षण घेत असतांना बातम्या पहाणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणे आवश्‍यक आहे. विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही शॉर्टकट किंवा फास्ट फॉरवर्ड अभ्यास पद्धतीने मिळत नाही. यामुळे लवकर तयारीला सुरुवात करणे योग्य आहे.

    How to Prepare for Competitive Exams and Succeed

    विविध पॅटर्न्सची आठवी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरेल. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे ती एक प्रकारचा पायाच आहे. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. यासाठी ग्रामरकडे लक्ष दयावे, इंग्लिश वर्तमानपत्र वाचा नंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवावा. इंग्रजी चॅनेल्स वरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.

    प्रत्येक गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इत्यादी बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फेसबुक, ट्‌विट्टर इंटरनेटसारख्या वैज्ञानिक व इतर वेळखाऊ मोहांवर विजय मिळविता यायलाच हवा. बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी गतिमान आकडेमोड करणे, पाढे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असावे. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.

    How to Prepare for Competitive Exams and Succeed

    गणित हा कठीण वाटणारा विषय आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देऊ शकतो. शाळेत असतानाच गणिताचा पाया मजबूत करायला हवा. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात.स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करिअर सापेक्ष विकास फार महत्त्वाचा आहे व तो केल्यास यश सहज साध्य आहे. करिअरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान, करिअरसाठी आवश्‍यक गुणकौशल्ये, करिअरला पूरक अशा वृत्तीत बदल करणे उदा- पोलीस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्‍टिव्ह माइंड, तन्दरुस्त व चपळ शरीर असावे लागते. जर तुम्ही वरील पद्धतीने प्रामाणिपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल.

    आणखी वाचा

  • अनुक्रमणिका

    अनुक्रमणिका

    स्वतःच्या क्षमतावर असणारा विश्वास अधिक दृढ करायचा आहे, न्यूनगंडावर मात करायची आहे, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवायची आहे, विसरभोळेपणा विसरायचा आहे, रागावर नियंत्रण मिळवायचे आहे, जीवनात संयम आणायचा आहे, जोखीम घ्यायची क्षमता वाढवायची आहे व व्यक्तीमत्त्व प्रभावशाली बनवायचे आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ही लेखमालिका महत्त्वाची आहे.

    इंटरनॅशनल शाळा, सीबीएसई, तसेच पब्लिक स्कूल (अर्थात भरपूर पैसे भरुन जिथे शिक्षण विकत घेतले जाते व दर्जेदार शिक्षणाचा फुगा फुगवला जातो अशा खाजगी शाळा) मधून (या प्रकारच्या संस्थाना आपण अ गट म्हणू या.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जिल्हा परिषद शाळा, मुन्सिपालिटीच्या शाळा, सरकारी विद्यालये, बोर्डिंग स्कूल, विनानुदानित शाळांमध्ये (या प्रकारच्या संस्थाना आपण ब गट म्हणू या.) शिक्षण घेणारे विद्यार्थी कुठेच कमी नाहीत याची जाणीव दोन्ही वर्गाला होईल. त्यातून विकासाचा मार्ग पुढे जात राहील. अ गटात ब गटापेक्षा असणारी साधने नक्कीच प्रभावशाली आहेत. मात्र त्या साधनांना वापरण्यासाठी त्याचा योग्य परिणाम साधण्यासाठी करावी लागणारी साधना करण्याची क्षमता दोन्ही गटाकडे सारखीच आहे. या साधनेचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे. 

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक 

    १. शिक्षणाचे महत्त्व 

    २. कल ओळखण्याची कला 

    ३. शिकण्याच्या पध्दती 

    ४. ऐकून शिकण्याचे महत्त्व

    ५. बघून शिकण्याचे महत्त्व 

    ६. अनुभवातून शिकण्याचे महत्त्व 

    भाग २ – शिक्षणाच्या पुढील टप्प्यावर 

    ७. आकलन – वाचनाची गरज 

    १०. लेखन एक देणगी 

    ११. पाठांतराला फाटा देऊन लक्षात ठेवण्याची कला 

    १२. योग्य वेळी योग्य गोष्टी आठवण्याची पध्दती 

    १३. जगताना चालता फिरता शिकण्याचे तंत्र 

    १४. मुल्ये जोपासताना – मुल्यांचे मूल्य 

    १५. शिक्षणातून करिअरकडे जाताना 

    भाग ३ – व्यावहारिक जगात शिक्षणाची सांगड 

    १४. कविता जीवन मधूर करतात 

    १५. गणिताने व्यवहार सुलभ होतात 

    १६. गणिताची भीती घालवण्याची सोपी पध्दत 

    १७. अवघड सुत्रांना मित्र बनवू या 

    १८. इतिहासातील सनावळ्या झाल्या 

    १९. चित्रकलेने आयुष्यात भरले रंग 

    २०. खेळामुळे जीवन बनते आनंदी 

    २१. भूगोल म्हणजे सहलीची मजा 

    २२. मराठी-हिंदी-इंग्रजी भाषा म्हणजे ताई-माई-अक्का 

    २३. नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र म्हणजे मैत्रीचे धडे 

    २४. शब्दकोडी म्हणजे जीवनातला विरंगुळा 

    २५. चर्चेतून शिकू या सारे काही 

    २६. बाजारातील घटकांचे गणित 

    २७. उद्योगशिक्षणासाठी कार्यानुभव 

    २८. शिक्षणातील गमती (मजेशीर अनुभव) 

    २९. अनेक विषय म्हणजे ताण नाही तर मजा 

    भाग ४ – परिक्षा म्हणजे महोत्सव 

    ३०. चुटकीसरशी घालवू परिक्षेची भीती 

    ३१. परिक्षेची वाट पाहताना

    ३२. रोजच पाहिजे शाळा – शिक्षणाची गोडी 

    ३३. विषयाची भीती नको – गंमत जाणून घेऊ 

    ३४. मुलाखती म्हणजे गप्पांचा अड्डा 

    ३५. भाषण माझ्या आवडीचे 

    ३६. स्टेज गाजवायचा – रंगमंचावर रंग भरताना 

    ३७. चला शिक्षकमित्र बनू या

    भाग ५ – व्यक्तिमत्व विकास : सारे काही शिकताना 

    ३८. आत्मविश्वासाला बाहेर काढू, संकटांना भिडू 

    ३९. चार भिंतीतल्या शिक्षणाच्या मर्यादा जुगारताना 

    ४०. नवीन भाषा – संकट नव्हे संधी 

    ४१. आनंदाने समाजात वावरताना 

    ४२. भूतकाळ भूतकाळात जमा 

    ४३. वर्तमानातून भविष्याकडे 

    ४४. न्यूनगंड, भीती, नकारात्मकता हद्दपार 

    ४५. जोखीम नव्हे पराक्रमाचे मैदान 

    ४६. पैसे मिळवण्याची कला 

    ४७. दानातून मिळणारा आनंद 

    ४८. रागावर मात – जीवन आनंदात 

    ४९. जीवनसंगीताचे सूर जुळवताना 

    ५०. नात्यांचे बंध जोडताना 

    उद्यापासून रोज सकाळी दहा वाजता एक लेख प्रकाशित होईल. शिक्षणाच्या निरंतर प्रवासासाठी शुभ यात्रा. 

  • शिकण्यासाठी सारे काही

    शिकण्यासाठी सारे काही

    त्यासाठी प्रत्येक वेळी शाळेत किंवा महाविद्यालयात गेलेच पाहिजे असे काही नाही. माणूस अनुभवातून शिकत जातो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहून माणूस चांगूल पणा शिकतो. तर यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहून माणूस यशस्वी बनायला शिकतो. पैसेवाल्या लोकांच्या संगतीत राहून त्याला आर्थिक मार्गांचे दर्शन होते. जिथे जाईल तिथे माणूस कळत नकळत बरेच काही शिकत असतो. अध्यात्मिक लोकांच्या उपस्थितीत त्याला शांततेचे दर्शन प्राप्त होते. निसर्गाच्या वास्तव्यात त्याला विश्वाची रहस्ये समजू शकतात.

    The Ultimate Guide to Learning

    शिकण्याची ही प्रक्रिया आईच्या पोटात गर्भावस्थेत असल्यापासून सुरु होत असल्याचे विज्ञानाने मान्य केलेले आहे. महाभारतात सुध्दा अभिमन्यू आई द्रौपदीच्या पोटात असताना चक्रव्यूहात कसे जायचे? ही कला शिकला होता अशी कथा आहे. जन्माच्या आधीपासून सुरु झालेली ही शिकण्याची निरंतर प्रक्रिया माणसाचे अस्तित्व आहे तोपर्यंत चालूच राहते. आईच्या पोटात असताना किंवा लहान असताना तो जे काही शिकतो ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते. आपोआप काही गोष्टी तो शिकत जातो. उदा. चालणे, बोलणे, खाणे अशा काही गोष्टी तो स्वतःहून ग्रहण करतो.

    मात्र अक्षरओळख होणे, गणिते, आर्थिक व्यवहार करणे यासारख्या मानवनिर्मित गोष्टी त्याला नैसर्गिक पध्दतीने शिकता येत नाहीत. त्यासाठी त्याला बाहेरुन प्रयत्न करावे लागतात. या गोष्टी आपोआप होत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या प्रयत्नाने साध्य होईल तेवढे यश संपादन करतो. नैसर्गिक गोष्टीत प्रत्येकजण १०० टक्के यश प्राप्त करतो कारण या गोष्टी आपोआप होत असतात. प्रत्येकजण चालायला शिकतो म्हणजे १०० टक्केच चालायला शिकतो. त्यात निसर्ग भेदभाव करत नाही. प्रत्येकाला तो संपूर्ण क्षमता बहाल करतो. मात्र माणसाला वैयक्तिक विकास साध्य करताना त्याच्या प्रयत्नाइतके यश मिळते. 

    The Ultimate Guide to Learning

    एकंदरीतच शिकण्याच्या व ज्ञान आत्मसात करण्याच्या गोष्टींवर आपल्या विकासाचा व प्रगतीचा दर अवलंबून असतो. म्हणून शिकण्यासाठी सोप्या प्रक्रिया कोणत्या? त्या अधिक प्रभावी कशा करता येतील? त्या सर्वसमावेशक कशा असतील? यावर सविस्तर अभ्यास आपण येणाऱ्या नव्या लेखमालिकेत करणार आहोत. प्रत्येकाला स्वतःच्या कलानुसार शिकण्यास मिळाले तर किती चांगले होईल. सचिनला क्रिकेट, लता संगीत, अमिताभला अभिनय, सायनाला बॅडमिंटन शिकताना जेवढे आवड होती तेवढी कदाचित दुसरे विषय शिकताना नसावी. त्यांना त्यांचे कल व कला समजल्या त्यानंतर त्यांची शिकण्याची व त्यातील सर्वोच्चता साध्य करण्याची वाट मिळाली. विद्यार्थ्यापासून नोकरदारांपर्यंत, गृहिणीपासून उद्योजकापर्यंत प्रत्येकाला शिकण्याचे काय फायदे होतात? याविषयीचे कानमंत्र या नव्या लेखमालिकेत दिले आहेत. 

  • ४. शिक्षण – समज व गैरसमज

    ४. शिक्षण – समज व गैरसमज

    * इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा 

    तीन चार वर्षाच्या मुलांना असं काय शिक्षण देत असतील? ज्याची किंमत पन्नास हजार ते एक लाखाच्या घरात जाते. हा एक न उघडलेला प्रश्न आहे. मला एक मराठी माध्यमात शिकवणारे शिक्षक सांगत होते. की त्यांच्या मुलाची पाचवीच्या वर्षाची फी ६० हजार रुपये आहे. पुढे त्यांनी सांगितलेली माहिती त्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होतीच त्याचबरोबर मी विस्मयचकित झालो. ते म्हणाले की त्यांच्या शेजाऱ्याच्या मुलाचे इंजिनियरींग केवळ ४२ हजारात पूर्ण झाले आहे. (चार वर्षाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची एकूण फी ४२००० रुपये होती.) हे एक उदाहरण आहे. 

    भरमसाठ फी घेण्याला माझा विरोध नाहीच. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही विरोध नाही. जे काही घेतलं जातं त्याची किंमत ठरवण्याची एकके काय आहेत? त्याचा विचार कधी होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय तन्मयतेने शिकवणारे शिक्षक असणाऱ्या अशा हजारो शाळा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आहेत. त्यात मिळणाऱ्या इंग्रजी भाषेचा शिक्षणाचा दर्जा म्हणावा तितका चांगला नाही हे मान्य केले पाहिजे.

    मराठी शाळेत अथवा मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांमधून शिक्षण घेत असतानाच इंग्रजी शिकणे उत्तम ठरते. कारण ऑक्सफर्ड, केंम्ब्रिज व हारवर्ड विद्यापीठाने सुध्दा मान्य केले आहे की, मातृभाषेतून शिकणे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मोठमोठे उद्योजक, सिनेअभिनेत, क्रिकेटपटू, राजकारणी, नेते, कलाकारांमधील बरेचजण आपल्या शालेय जीवनात जिथे मिळेल तिथून शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. यशस्वी होणे हा वेगळा घटक आहे. सर्व ठिकाणाचे विद्यार्थी यशस्वी होतात. धीरुभाई अंबानी कोणत्याच मॅनेजमेंट च्या शाळेत गेले नव्हते. अण्णाभाऊ साठे तीन दिवसापेक्षा जास्त शाळेत गेले नव्हते. तरीही त्यांनी यश मिळवलेच. जीवनातील यश व प्रसिध्दी या गोष्टी प्रत्येकाला मिळवता येतात. त्यासाठी लागणारे परिश्रम, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, यशस्वी होण्याची तळमळ या घटकांचा ध्यास घेतलेली माणसे कुठूनही यशस्वी होतात.

    यशस्वी होणे ही कोणत्या एका ठराविक गटाची मक्तेदारी नाहीच. श्रीमंताची मुले यशस्वी होतात तशी गरिबीतून आलेली मुले सुध्दा यशस्वी होतात. शहरातील होतात त्याचप्रमाणे खेड्यातील मुलेसुध्दा यशस्वी होतात. इंग्रजी उत्तम येणारे यशस्वी होतात त्याच प्रमाणे इंग्रजीचा गंध नसणारे सुध्दा यशस्वी होतात. गरिबी-श्रीमंती, वातावरण, ठिकाण, भाषा याचा जेवढा वाटा आपल्या यशात असतो. त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व अनुकुलन क्षमतेचा असतो. तुम्ही कुठेही शिकला असला तरी प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार आहे.

    तुमची मुले कुठेही शिकत असली तर त्यांना सुध्दा यश मिळवणे शक्य आहेच. हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्रात एक करोडहून अधिक विद्यार्थी खेड्यात शिक्षण घेत आहेत. यातूनच उद्याचे नेते, खेळाडू, कलाकार, शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, वक्ते निर्माण होणार आहेत. शहरी भागात शिकणारे विद्यार्थी सुध्दा यशस्वी होतील.

    जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या घटकांमध्ये शालेय शिक्षणाचा वाटा किती? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.

    तुम्ही दहावी, बारावी व पदवी (Graduation) ला असताना केलेल्या अभ्यासात तुम्हाला कितीही मार्क पडलेले असोत. (नापास होण्यापासून १०० टक्क्यांपर्यंत) आज तुम्हाला त्याच प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न परत सोडवता येतील? आजच्या जगण्यात त्या प्रश्नांच्या उत्तरांचा सहभाग किती? या दोन प्रश्नांची उत्तरे म्हणजे आपल्या जीवनात यशस्वी होण्यात असणारा शिक्षणाचा वाटा होय.

  • ३.१ शिकण्याच्या पध्दती

    ३.१ शिकण्याच्या पध्दती

    सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शिक्षकांना प्रत्येक विषयाची सक्ती नको असे सांगितले. आम्ही आम्हाला ज्या विषयात गती आहे त्या विषयात चांगला अभ्यास करु अशी विनवणी केली. मात्र शिक्षकांनी त्यांना तुम्ही नापास व्हाल असे सांगितले. तेव्हा सर्वांचा नाईलाज झाला. त्यांनी इतर विषयाचा अभ्यास चालू ठेवला. 

    त्याचा परिणाम असा झाला की, त्यांना ज्या विषयात चांगली गती होती. तो विषय सोडून इतर विषयांचा अभ्यास करताना त्यांच्या पहिल्या विषयाची सुध्दा हालत बेकार झाली. बदकाला उत्तम पोहता येत होते. मात्र वर्षाअखेरीस जेव्हा निकाल लागला तेव्हा बदक ना चालू शकत होते, ना पोहू शकत होते. जमिनीवर धावण्याच्या विषयात पास होण्यासाठी त्याने पोहण्याची क्षमता पण कमी करुन टाकली. कोकिळा पाण्यात पोहू शकली नाही. वर्षाअखेरीस सगळेजण नापास झाले. गरुडाला कावळा आणि कावळ्याला पोपट करण्याच्या या परिक्षा पध्दतीचे आपल्याला नक्कीच हसू आले असेल. ही गोष्ट आपल्या बाबतीत सुध्दा फारशी वेगळी नाही. आपल्या क्षमता आपल्या पालकांना व शिक्षकांना माहिती नसल्याने त्यांनी आपल्याला सरसकट सर्व विषयांचा अभ्यास करायला लावला. परिणामी आपण आपल्या विषयावरची पकड सुध्दा हरवून बसलो. 

    मी शाळेत असताना मला लिहायला व पाठांतर करायला कधीच आवडले नाही. मी कोणत्याही शिक्षकाचे लिहण्याच्या व पाठांतराच्या बाबतीत कधीही ऐकले नाही. प्रसंगी कित्येक वेळा मार खाल्ला. लिहण्याचा सराव नसल्याने परिक्षेत माझे कितीतरी गुणांचे प्रश्न उत्तरे माहित असूनही लिहायचे राहून जायचे. मला परिक्षेत मार्क कमी पडले असतील. मात्र त्या गोष्टी मला येतच नव्हत्या असे नाही. त्याउलट मला वाचनाची, गणिते व शब्दकोडी सोडवण्याची, भाषणे करण्याची प्रचंड आवड होती. त्यात मी रोखूनही कुणाला थांबत नव्हतो. आता मला माझ्या शाळेतील शिक्षक भेटले की, माझे कौतुक करतात. ज्या विद्यार्थ्याचा कल ज्या क्षेत्रात आहे त्याला त्यातच अभ्यास करु दिला पाहिजे. इंग्रजी ही महत्त्वाची भाषा असली तरी मातृभाषेतून लवकर व चांगले शिकता येते. या गोष्टींचा विचार करुन शिकत गेल्यास माणूस लवकर यशस्वी होण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. या सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर एक प्रश्न आपल्या समोर ‘आ’ वासून उभा राहतो. तो म्हणजे, आपल्याला कोणत्या गोष्टीत गती आहे? ते ओळखायचे कसे? हे एकदा ओळखता आले की, मग त्याच तंत्राचा वापर आपल्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी करुन घेता येईल. 

  • ३. शिकण्याच्या पध्दती

    ३. शिकण्याच्या पध्दती

    या दोन शिक्षण पध्दतीतील उपयुक्त शिक्षण पध्दती कोणती? आपल्याला कोणत्या शिक्षणपध्दतीचा फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. पूर्वापार चालत आलेल्या गुरुकूल शिक्षणपध्दतीत जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात टिकून राहण्याची कला प्राप्त होत असे. अनेक जीवनदायी तत्त्वे त्यातून मिळत असत. सामाजिक जीवनातील दुर्बल व्यक्तित्वाचा अभाव नष्ट करुन चांगला माणूस घडवण्याचे काम या गुरुकूल पध्दती मध्ये केले जात असे. चारित्र्यवान किंवा शीलवान नागरिक गुरुकूल शिक्षणपध्दतीचे फलित होत. शतकानुशतके चालत आलेली ही शिक्षणपध्दती इंग्रजांच्या राजवटीत नामशेष झाली. माणसातील जगण्याची उमेद कमी करणारी नवी शिक्षणपध्दती आपण स्वीकारली. त्यातून उत्तम नोकरदार लोक निर्माण होऊ लागले. नेतृत्वक्षमता लोप पावू लागली, उद्योजकतेचा ऱ्हास होत गेला. (एका आकडेवारीवरुन १७ व्या शतकापर्यंत जगातील एकूण व्यापारी उलाढालीत भारतीयांचा वाटा हा २२ टक्के होता. तो आजघडीला २ ते २.५ टक्क्यापर्यंत घसरला आहे.) अलिकडे जे उद्योजक अथवा नेते तयार झाले त्यात त्यांच्या कर्तृत्वाचा वाटा मोठा आहे. शिक्षणपध्दतीचा वाटा तुलनेने लहान आहे. 

    गुरुकूल पध्दती अतिशय चांगली शिक्षण पध्दती होती. तिचे गुणगान करण्याची मानसिकता खूप लोकांमध्ये आहे. मात्र ती आजच्या काळात वापरात आणणे शक्य आहे का? याचा विचार करणे सुध्दा गरजेचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक मिळण्याची शक्यता जास्त आहे. चांगली पध्दती राबवता येणे शक्य नाही. आहे ती शिक्षणपध्दती जीवनसंग्रामाला लायक बनवू शकत नाही. तर यावर तोडगा काय? असा प्रश्न निश्चितच पडतो. या प्रश्नाचे उत्तर प्राप्त झालेच पाहिजे. या लेखमालिकेतून ते दिले जाईल.

    शिकण्याचा कल लक्षात न घेता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना एकाच पध्दतीचे शिक्षण दिले जाते. हा प्रकार म्हणजे वेळ, अंतर, वस्तुमान अशा अनेक गोष्टी एकाच परिमाणात तोलण्यासारखे आहे. वेळ मोजण्यासाठी तास-मिनिटे-सेकंद, अंतर मोजण्यासाठी मीटर-सेमी-फूट-इंच-किमी तर वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम-तोळा-किलो-टन अशी वेगवेगळी परिमाणे वापरणे गरजेचे आहे. तसे विद्यार्थ्याच्या किंवा स्वतःच्या (स्वतःसाठी ही लेखमालिका वाचणाऱ्या वाचकांसाठी) अभ्यासाच्या पध्दती जाणून घेऊन शिकवणे गरजेचे आहे. ज्याच्या अंगी जी उपजत कौशल्य आहेत त्यात प्राविण्य मिळवण्यास संधी देणे त्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

  • २.1  कल ओळखण्याची कला

    २.1 कल ओळखण्याची कला

    तर काही लोक त्यांच्यातल्या उपजत क्षमता न जाणताच मरुन गेले. मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यात साध्या साध्या गोष्टीसाठी झगडावे लागले, मोठा संघर्ष करावा लागला. मात्र काही लोकांना त्यांच्यातल्या योग्य सुप्त गुणांचा शोध लागला नसला तरी त्यांनी आपल्या क्षमतांवर मात करत जीवनात यश मिळवले.

    एखाद्याला लहानापणापासूनच तबला वाजवण्याची आवड असेल, त्याला तबला वाजवण्याचे चांगले प्रशिक्षण मिळाले, तर तो चांगला तबलावादक बनू शकेल. मात्र त्याला सूरवातीच्या काळात नुसते लिहणे वाचणे इतर गोष्टीचे शिक्षण जबरदस्तीने देत गेले तर तो ना चांगला तबला वाजवू शकेल, ना चांगला विद्यार्थी बनू शकेल. लिहता वाचता येणे गरजेचे आहे. त्याची सुध्दा जीवनात एक महत्त्वाची भूमिका आहे.

    एक मुलगा कधी विहिरीजवळ गेला नाही, पोहण्याचा आणि त्याचा कधीही संबंध आला नाही. आणि आयुष्याची चाळिशी उलटून गेल्यावर (तो एक गृहस्थ बनल्यावर) त्याने एकदा पोहायचा प्रयत्न करुन पाहिला. काही दिवसातच त्याला उत्तम पोहता सुध्दा येऊ लागले. त्याच्यात जन्मतःच पोहण्याची कला होती. मात्र त्या क्षेत्राचा व त्याचा कधीही संबंध न आल्याने त्याला ते योग्य वयात समजले नाही. चाळीस वर्षे उलटून गेल्यावर समजले तेव्हा तो काहीही करु शकला नाही. हेच जर अगदी लहान वयात समजले असते तर तो उत्तम जलतरणपटू होऊ शकला असता. 

    आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीतच असते. मात्र तो मृग संपूर्ण जंगलभर तिच्या शोधात सैरावैरा धावत असतो. विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्याला कोणते विषय आवडतात? शिकण्याची कोणती पध्दती आवडते? शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आपण करु शकतो? आपला खरा आनंद कशात आहे? याचा शोध घेत राहिले पाहिजे. पालकांनी यासाठी मुलांना मदत केली पाहिजे. या क्षमता ओळखण्याच्या काही पध्दती आहेत. त्यासाठी काही चाचण्या आहेत. काही परिक्षा आहेत किंवा काही शास्त्रीय पध्दतीने विकसित केलेली तंत्रज्ञाने बाजारात उपलब्ध आहेत. त्यात आपला कल ओळखून आपला मार्ग निवडला पाहिजे. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, करिअर प्रत्येक क्षेत्रात करता येते. जीवनात आवश्यक असलेली आर्थिक सुबत्ता आपण सर्व क्षेत्रातून प्राप्त करुन घेऊ शकतो. तेव्हा आपला आनंद शोधा. आपल छंद हेच आपले काम असेल तर आपल्याला त्या कामाचा कधीही कंटाळा येणार नाही. 

  • २. कल ओळखण्याची कला

    २. कल ओळखण्याची कला

    त्याला मिळालेल्या काही पायाभूत बाबी समान आहेत. त्याच्या शरीराची रचना व ठेवण एकसारखीच असते. म्हणजेच काय? तर प्रत्येकाच्या धडाच्या वर डोके आहे. डोक्यात मेंदू आहे, पंच ज्ञानेंद्रिये आहेत, हृदय, यकृत, फुफ्फुसे, हात, पाय अशी अंतर्बाह्य इंद्रिये आहेत. त्यांची जागा ठरलेली आहे. प्रत्येकाचा चेहरा सारखा दिसत नाही, प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळ्या कला दडलेल्या आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी प्रतिभा आहे. हे असे आहे हेच उत्तम आहे. 

    एवढ्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला हवी ती गोष्ट प्राप्त करुन घेण्यासाठी लागणारी अमर्याद ऊर्जा प्रत्येकात दडलेली आहे. आपण काहीही करु शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांना आव्हान द्यावे लागते, मानसिकता बनवावी लागते, सराव व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. या गोष्टी वारंवार सिध्द करणारी उदाहरणे आपण आपल्या रोजच्या जीवनात अनुभवत असतो. ज्याला शिक्षक व्हायचे आहे त्याने ठरवून प्रयत्न केले तर तो शिक्षक होतो, ज्याला डॉक्टर व्हायचे आहे तो डॉक्टर होतो. प्रत्येकालाच बिल गेट्स आणि वॉरन बफेट सारखे बनायचे नाही, बिल गेट्स हा बिल गेट्स आहे आणि तुम्ही तुम्ही आहात. दोघांची आपापली वैशिष्टे आहेत. 

    The Art of Recognizing Tomorrow

    आता आपल्याला असे वाटू शकते की आपल्याला हवे ते आपण बनू शकतो मग आपला कल ओळखण्याची व त्याप्रमाणे काम करण्याची गरज काय आहे? प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य आहेच, मात्र काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात, तर काही गोष्टी आपल्याला सहज जमतात. याउलट ज्या गोष्टींसाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतात त्या गोष्टी काहीजण लिलया करुन दाखवतात, तर ज्या गोष्टी आपल्याला अगदी सोप्या वाटतात, त्यात काहीजणांचा कस लागतो. हे असे का होत असावे बरे? तर त्याचे उत्तर आहे की, आपल्याला सर्व गोष्टी साध्य करता येतात, त्यातील काही गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारे उपजत गुण आपल्यात असतात. काहीजणांचा आवाज जन्मताच चांगला असतो, काहीजणांची शरीरयष्टी उत्तम असते, तर काहीजणांची स्मरणशक्ती अफलातून असते, काहीजण सुंदर व रुपवान असतात, तर काहीजण धाडसी असतात. ज्याचा आवाज चांगला आहे त्याने गायनात, ज्याची शरीरयष्टी चांगली आहे त्याने खेळात, जे सुंदर आहेत त्यांनी मॉडेलिंगमध्ये, तर जे धाडसी आहेत त्यांनी धाडस दाखवता येणाऱ्या क्षेत्रात कामगिरी केल्यास लवकर यश मिळणे स्वाभाविक आहे. 

    The Art of Recognizing Tomorrow

    अल्बर्ट आईनस्टाईनला शिक्षणात फार गती नव्हती त्याने पुढे जाऊन जगाला परिवर्तनाचा वेगळा आयाम देणारा सापेक्षतावादाचा सिध्दांत दिला या सारखी कित्येक उदाहरणे आहेत. मात्र यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. त्याउलट सचिनमध्ये उपजतच क्रिकेट होते त्याने क्रिकेट मध्ये करिअर केले तो यशस्वी झाला. विश्वनाथन आनंद बुध्दिबळाचा निर्विवाद बादशहा झाला. हे त्यांच्या योग्य वयात झाले. केएफसीच्या मालकाला त्याच्यातील उद्योजकता माहिती व्हायला वयाची साठ वर्षे उलटून गेली होती. त्यानंतर प्रयत्न करुन त्याने केएफसी नावाचा जगप्रसिध्द ब्रँड बनवला.

  • आकाशी झेप घे रे पाखरा… परदेशी शिक्षण

    आकाशी झेप घे रे पाखरा… परदेशी शिक्षण

    पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडून परदेशगमन करणे हा जणू सध्याचा ट्रेंडच झाला आहे. हे सर्व होत असताना नाण्याची दुसरी बाजूसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे, या आणि अशा ट्रेंडचा फायदा आणि गैरफायदा घेणारेसुद्धा अनेकजण आपल्याला दिसतील त्यासाठी अनेक गोष्टींचा नीट बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.

    सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतातील प्रमाण गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढलेले दिसते. नेमकी अशी काय कारणं आहेत ज्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत आहे. तर याचा थोडा सविस्तर विचार केला असता आपल्या हे लक्षात येईल की भारतातील शिक्षणपद्धती आणि परदेशातील शिक्षणपद्धती यामध्ये असणारा सगळ्यात मोठा फरक. परदेशात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परदेशाबद्दल भारतीय लोकांच्या मनात असलेले आकर्षण. खरंतर फक्त पाठयपुस्तकी ही शिक्षण पद्धत परदेशात मूळातच शिकवली जात नाही.

    संशोधन वृत्तीने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यात आपण आपले मत बनवत ज्ञानार्जन करायचे अशी शिक्षण पद्धत परदेशात पाहायला मिळते. तसेच परदेशात शिक्षण घेत असताना तुम्ही तुम्हाला जो हवा तो कोर्स निवडू शकता आणि त्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला परदेशात मिळते. भारतात अजून अशा प्रकारची स्थिती फार कमी ठिकाणी पाहायला मिळते.

    सर्वसामान्यपणे SAT, MCAT, LSAT, GMAT, GRE, IELTS आणि TOEFL अशा काही प्रवेश परीक्षा आहे ज्या तुम्हाला चांगल्या मार्काने पास करणे गरजेचे आहे. तसेच त्या त्या विद्यापीठाच्या याव्यतिरिक्त जर काही परीक्षा असतील, तर त्या सुद्धा नीट समजून घ्याव्या लागतील. परदेशात शिक्षण म्हणजे पहिला डोळ्यासमोर प्रश्न उभा राहतो तो आर्थिक. अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची ही बाजू आहे. एकदा ठिकाण नक्की झाले की त्या ठिकाणाचे चलन आणि त्याची तुलना भारतीय रुपयासोबत केली असता साधारण अंदाजे खर्च आपण काढू शकतो.

    आर्थिक बाजू फार मोठी वाटत असली, तरी अनेक परदेशी विद्यापीठे यासाठी शिष्यवृत्तीदेखील पुरवतात. हे सर्व करताना आपण मात्र चोखंदळपणे नीट सगळ्याचा अभ्यास करून परदेशी शिक्षणाचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.

    परदेशात शिक्षणासाठी वाढणारी मागणी पाहून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. खूप प्रकारची आमिषं दाखवून फसवणूक केली जाते या सगळ्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. फक्त परदेशात शिक्षण घेणे हा उद्देश न ठेवता त्यासोबतच नोकरीची त्या देशातील संधी पाहणे हे खूप गरजेचे आहे.

    अगदी शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे नक्की करता तेव्हा तुमचे ठिकाण पक्के झाल्यानंतर ज्या देशात आणि ज्या शहरात तुम्ही शिक्षण घेणार आहात, काही वर्षे राहणार आहात; तेव्हा त्या शहराची आणि देशाची संपूर्ण माहिती, कायदे आणि जीवनपद्धतीचा काही प्रमाणात अभ्यास करून जाणे गरजेचे आहे. जेणेकरून तिथे गेल्यानंतर तुम्हाला कमीतकमी अडचणींचा सामना करावा लागेल.

    आणखी वाचा

  • अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

    अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

    प्रिय  गुरुजी,
    
    सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
    नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
    हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
    मात्र त्याला हे देखील शिकवा,
    जगात प्रत्येक बदमाषागणिक      
    असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही
    स्वार्थी राजकारणी असतात जगात,
    तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
     असतात टपलेले वैरी,  तसे जपणारे  मित्रही,
    
    मला माहित आहे !
    सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत......... 
    तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
    घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
    आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
    
    हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा 
    आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला,
    तुमच्यात शक्ती असती तर .........
    
    त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा 
    आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
    गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
    त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
    
    जमेल तेवढं दाखवित चला त्याला,
    ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
    मात्र त्याबरोबरच,
    मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, 
    सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला,
    पाहू दे त्याला, 
    पक्षांची अस्मान भरारी ............
    सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
    आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
    
    शाळेत त्याला हा धडा मिळू दे,
    फसवून  मिळालेल्या यशापेक्षा,
    सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
    आपल्या कल्पना, आपले विचार,
    यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने,
    बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी,
    
    त्याला सांगा ................
    भल्याशी भलाईनं वागावं,
    आणि टग्यांना अद्दल घडवावी .
    माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
    जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
    सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी,
    पुढे हेही सांगा त्याला,
    ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
    पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
    आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
    
    जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
    हसत रहावं उरातल दुःख दाबून,
    आणि म्हणावं त्याला 
    आसवांची लाज वाटू देऊ नको.
    
    त्याला शिकवा .........
    तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला,  
    अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
    त्याला हे पुरेपूर समजवा की,
    करावी कमाल कमाई त्याने, 
    ताकद आणि अक्कल विकून,
    पण कधीही विक्रय करू नये, 
    हृदयाचा आणि आत्म्याचा.
    
    धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
    कानाडोळा करायला शिकवा त्याला.
    आणि ठसवा त्याच्या मनावर,
    जे सत्य आणि न्याय वाटते,
    त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
    त्याला ममतेनं वागवा,
    पण, लाडावून ठेवू नका.
    
    आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय 
    लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
    त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
    अन धरला पाहिजे धीर त्याने,
    जर गाजवायच असेल शौर्य .
    
    आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
    आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
    तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर, 
    
    माफ करा गुरुजी, 
    मी फार बोलतो आहे
    खूप काही मागतो आहे.........
    पण पहा........ 
    जमेल तेवढ अवश्य कराच,
    माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!!
    - अब्राहम लिंकन
    
    
  • १० वी आणि १२ वी नंतर काय?

    १० वी आणि १२ वी नंतर काय?

    करिअर म्हणजे नेमकं काय याच्याशी त्या वयात आपल्यला तसे देणेघेणे नसतेच, पण देणेघेणे असते ते आपल्या पालकांना. हो आपण तर मातीचा गोळा असतो, वाढत्या वयानुसार हा मातीचा गोळा घडत असतो, आपला इंटरेस्ट ठरवत असतो आणि या गोळ्याचे म्हणजेच आपले बारकाईने निरीक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पालकांची असते, जेणेकरून ते आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आकार द्यायला किंवा करिअरसाठी जास्त उपयोगी ठरेल. आयुष्याच्या एका टप्प्यावर करिअर निवडीची वेळ येते, पूर्णवेळ कोणत्या क्षेत्रात राहायचं हे समजण्यासाठी याची खूप मदत होते. याचे आणखी कारण असे आहे की, लहान वयात ग्रास्पिंग क्षमता उत्तम असते. अशा वेळी जे बिंबवले जातं, मुलं त्यानुसार घडत असतात.

    अनेकवेळा अनेक कारणांनी अशा पद्धतीची जडघडण करणं प्रत्येक पालकांना शक्य होत नाही. प्रसंग आणि परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे सगळं जुळून येईलच असे नाही, पण अशात हे काम आपल्या शाळेतील आपले शिक्षक नक्की करू शकतात. किंबहुना त्यांना कोणत्या मुलामध्ये काय क्षमता आहे याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहित असते. पालकांना शाळेनंतर करिअरच्या दृष्टीने त्यांची खूप मदत होऊ शकते.

    पहिल्या टप्प्यातील पालक ठीक आहेत, दुसऱ्या टप्प्यातील पालक तरी बरे म्हणता येतील, पण तिसऱ्या टप्पातील पालकांचा निर्णय म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क किंबहुना आयुष्याची जोखीम असू शकते. मुलांचं भविष्य एकतर उज्ज्वल होऊ शकतं, नाहीतर आयुष्यभर त्यांचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून करिअरची निवड करताना १०वी आणि १२वी च्या टप्प्यावर फार विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.

    मग निर्णय घ्यावा कसा? २१ व्या शतकात संपूर्ण जग एका क्लिकवर तुमच्या हातात आलेले असताना करिअरची अनेक दालनं तुमच्यासमोर आज खुली आहेत. काही वर्षांपूर्वी यासाठी खूप मर्यादा होत्या, पण तो काळ आता नाही राहिला. १०वी आणि १२वी नंतर आपल्या देशातील अलिखित नियमानुसार सर्वजण एकतर पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतात किंवा डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्ससाठी ॲडमिशन घेतात, पण ही मळलेली वाट सोडून काही वेगळं करू पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे. फक्त गरज आहे त्यांना विश्वासात घेण्याची आणि बळ देण्याची.

    आधीच सांगितल्याप्रमाणे कलचाचणी हा एक करिअर निवडीसाठी मदत करणारा पर्याय आहे. मग तुम्ही म्हणाल अहो सगळं समजलं, पण ही रिस्क घेण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या? तर त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण विचार घेतल्या पाहिजेत नक्कीच. त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते, ती त्या मुलाची मानसिक आणि शारीरिक क्षमता आणि इंटरेस्ट काय आहे. दुसरी मूलभूत गोष्ट म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या परिवाराची स्थिती उदा. भविष्यात त्याच्यावर घराची जबाबदारी किती काळात येऊ शकते. तिसरी आणि सगळयात मूलभूत गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती.


    आणखी वाचा

  • भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे. 

    The Importance of Education

    माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. 

    समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला. 

    एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.

    The Importance of Education