Tag: Budget 2024

  • नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

    नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

    संपूर्ण देशासाठी बजेट किंवा अर्थसंकल्प हा एक महत्वाचा भाग ठरतो, आपल्या देशात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत किंवा भारताचे नागरिक म्हणून आपण सरकारला किती टक्क्यांपर्यंत कर भरणार आहोत या बद्दलची किमान माहिती सुजाण नागरिक म्हणून आपल्याजवळ असली पाहिजे. 

    कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त झाल्या?

    कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कर कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. भारतामध्ये अधिकाधिक मध्यवर्गीय लोकं वावरतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी असे आर्थिक चढ-उतार महत्वाचे ठरतात. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कॅन्सरची औषधं, क्रूझचा प्रवास, सी फूड, वस्त्र, X-Ray मशीन,चामड्याच्या वस्तू, मोबाईल, मोबाईल चार्जर व इतर उपकरणं स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्या-चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये ६ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने या मौल्यवान वस्तू देखील आता स्वस्त होतील. महाग वस्तूंबद्दल बोलायचं झाल्यास फ्लेक्स आणि बॅनरच्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्याने जाहिरातींची  ही साधनं महाग होणार आहेत. 

    nitish kumar hails special assistance announced by nirmala sitharaman for bihar 23115970

    अर्थसंकल्प थोडक्यात:

    काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा बऱ्यापैकी तरुणांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी विशेष वरदान ठरला  आहे. देशातील पायाभूत सुविधा मजबूत व्हाव्यात, शेती व्यवसायात वाढ व्हावी, महिलांच्या हातात पैसे खेळात राहावेत म्हणून अर्थमंत्रालयाने धनाची पुंजी खुली केली आहे.भारतातील ग्रामीण भागांचा विकास व्हावा, तसेच आदिवासी वर्गाला आर्थिक मदत मिळावी म्हणून देखील विशेष धनादेश जारी करण्यात आला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार स्थापनेत मैत्रीचा हात पुढे केलेल्या बिहार आणि आंध्र प्रदेशला आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे. एकंदरीतच या अर्थसंकल्पामधून मोदी सरकारचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल अशी आखणी करण्यात आली आहे. 

    अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया:

    निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अनेक राजकीय मंत्र्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या आणि यात सर्वात महत्वाची प्रतिक्रिया ठरली ती म्हणजे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. नरेंद्र मोदी यांच्या मते “हा अर्थसंकल्प देशातील मध्यमवर्गीयांवर लक्ष देणारा आहे. शेतकरी वर्गाला मदत करणारा तसेच तरुण मंडळींना नवीन संधी उपलध करून देणारा आहे.

    अर्थसंकल्पावर राहुल गांधी काय म्हणाले?

    विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देखील अर्थसंकल्पावर मत नोंदवले आहे, त्यांच्या मते “हा खुर्ची बचाओ अर्थसंकल्प आहे. राजकारणात मदत केलेल्या पक्षांना खुश करण्यासाठी त्या-त्या राज्यांच्या नावे  भलामोठा धनादेश जारी करण्यात आला आहे आणि सोबतच अदानी-अंबानींना खुश करण्यात सामान्य जनतेला इथे सपशेलपणे डावलण्यात आले आहे.”

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

    आणखीन वाचा:

  • RBI चं मोठं पाऊल! Paytm Payment Bank वर घातली बंदी, एका क्लिकवर वाचा A to Z प्रश्नांची उत्तरे

    RBI चं मोठं पाऊल! Paytm Payment Bank वर घातली बंदी, एका क्लिकवर वाचा A to Z प्रश्नांची उत्तरे

    paytm payments bank 398300641 sm 1

    आरबीआयने का लावली बंदी?

    आरबीआयने (RBI) आपल्या निवेदनात म्हटले की, पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध (Paytm Payments Bank) केलेली कारवाई बँकिंग विनिमय कायदा, 1949च्या कलम 35A अंतर्गत केली होती. बँकेने असेही म्हटले की, त्यांनी मार्च 2022मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेंला नवीन ग्राहक जोडणे बंद करण्यास सांगितले होते. एका सिस्टम ऑडिट रिपोर्टमध्ये बँकेवर सतत नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, यावर आरबीआयने कोणतेही विशेष भाष्य केलेले नाही.

    paytm 170676488355816 9 1

    काय-काय बदल होतील?

    खरं तर, पेटीएम पेमेंट्स बँक ही भारताची सर्वात मोठी पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) कंपनीचा भाग आहे. याचा वापर लाखो लोक करतात. मात्र, पेटीएमसाठी वाईट बातमी अशी आहे की, आरबीआयने घातलेल्या बंदीनंतर 29 फेब्रुवारीपासून नवीन रक्कम डिपॉझिट करणे, क्रेडिट व्यवहाराच्या सुविधेसह सर्व फंड ट्रान्सफरची सुविधाही बंद होईल.

    केंद्रीय बँकेने निवेदनात म्हटले की, 29 फेब्रुवारी, 2024नंतर कोणत्याही ग्राहकाचे अकाऊंट, प्रीपेड टूल, वॉलेट, FASTags, NCMC कार्ड यामध्ये कोणतेही व्याज, कॅशबॅक किंवा रिफंडव्यतिरिक्त कोणतेही डिपॉझिट, क्रेडिट व्यवहार किंवा टॉपअपची परवानगी दिली जाणार नाही.

    उरलेल्या पैशांचे काय करणार?

    याव्यतिरिक्त हे देखील समोर आले आहे की, जर ग्राहक वापरत असलेल्या प्रीपेड डिव्हाइसेस, Fastags, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादींमध्ये काही रक्कम शिल्लक असेल, तर ते रक्कम संपेपर्यंत कोणत्याही निर्बंधाशिवाय वापरू शकतात. तसेच, जर तुमचे बचत बँक खाते, चालू खात्यात रक्कम शिल्लक असेल, तर ती तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय सहजरीत्या काढू शकता.

    पेटीएमने काय म्हटले?

    पेटीएमने स्पष्टीकरण देताना म्हटले की, ते आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी तातडीने पावले उचलतील. गुरुवारी (दि. १ फेब्रुवारी) एका निवेदनात म्हटले की, वेगवेगळ्या पेमेंट पर्यायासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेसह वेगवेगळ्या बँकांसोबतही काम करते. त्यांनी असेही म्हटले की, आता आम्ही योजनांमध्ये वेग आणू आणि पूर्णपणे इतर बँक भागीदारांकडे जाऊ. म्हणजेच आता ओसीएल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडऐवजी इतर बँकांसोबत काम करेल.

    1534566723351 1

    या बंदीमुळे पेटीएमला मोठे नुकसान होऊ शकते. अशी चर्चा आहे की, आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएमला 500 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, आशा आहे की, आगामी काळात यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

    विशेष म्हणजे, पेटीएम ब्रँड One97 Communications Ltd च्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. सध्या पेटीएमची शेअर प्राईज ही 487.20 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.