Tag: बिझनेस स्टोरीज

  • सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात : १९३८ साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षिण कोरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.

    पहिला बदल : १९४० साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    दुसरा बदल : १९५० साली कोरिअन युद्धामुळे व्यवसाय बुडाला. त्यानंतर सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरुवात केली. स्वतःचा साखर कारखाना सुरु केला.                                                                     

    तिसरा बदल : युद्धसमाप्तीनंतर १९५४ साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी लागणारे लोकरीचे कापड बनवणारी कोरियातील सर्वात मोठी कापड गिरणी सुरू केली.

    चौथा बदल : जसजसा कोरिया विकसित होत गेला, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी १९५६ साली सॅमसंगने कापड गिरणी बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटीज विकायच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    पाचवा बदल : १९६० साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ टेलिव्हिजन सेट्स बनवायला सुरुवात केली.

    सहावा बदल : १९८० साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड आणि फॅक्स सिस्टिम्स बनवायला सुरुवात केली.

    सातवा बदल : १९८७ साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यू झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर/टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे चार स्वतंत्र विभाग झाले.

    आठवा बदल : त्याच साली सॅमसंगने जागतिक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

    नववा बदल : १९९० साली सॅमसंगने जागतिक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात प्रवेश केला. मलेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई १०१ आणि दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.

    दहावा बदल : १९९३ साली मोठी मंदी आली. आशियन बाजारात मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बसला. त्यावेळी लीचा मुलगा ली कून ही याने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उपकंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरुवात केली.

    अकरावा बदल : इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल विभागांचे एकत्रीकरण केल्यामुळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.                                                                                                    

    बारावा बदल : मेमरी चिप्सच्या व्यवसायात खूप स्पर्धा निर्माण झाल्यामुळे १९९५ साली सॅमसंगने ‘लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले’च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ १० वर्षातच ‘फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन’ बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.

    तेरावा बदल : २०१० साली लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील १० वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. त्याचवेळी आयफोनसाठी लागणारे अनेक महत्वाचे सुटे भागसुद्धा सॅमसंग पुरवत होती.

    आज 2024 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आयफोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधिक आहे.

    एवढे सगळे बदल होऊनही एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती कोणती? जेव्हा लीने कंपनी सुरु केली होती त्याने कंपनीला नावे दिले होते, ‘सॅमसंग’ कोरियन भाषेत याचा अर्थ होतो ‘तीन तारे’. लीसाठी हे तीन तारे म्हणजे ‘भव्य, असंख्य व शक्तिशाली’ आणि हे तारे अनादी, अनंत असतात. त्याचं ध्येय हेच होतं की कंपनीचा प्रमुख म्हणून तो ज्या कुठल्या क्षेत्रात काम करेल तिथे कंपनीचा स्वतःचा ठसा उमटवायचा.

    याच धोरणामुळे आज सॅमसंगची विक्री २५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे व दक्षिण कोरियाच्या एकूण निर्यातीमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.

    तुमच्या व्यवसायात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तेव्हा असा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आहे? तुमचा व्यवसाय बदलण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे?

    या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात, सॅमसंगचे उदाहरण घ्या. मोठे उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी दीर्घकालीन योजना बनवा आणि छोटे छोटे परिणाम साधण्याचा प्रयत्न करा आणि वेळ पडेल तेव्हा व्यवसाय बदलण्याचं धाडस अंगात असू द्या. योग्य वेळी बदल करत रहा, कधी ना कधीतरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल.

  • भारताच्या ट्रॅक्टर क्वीन मल्लिका श्रीनिवासन यांचा जीवनप्रवास

    भारताच्या ट्रॅक्टर क्वीन मल्लिका श्रीनिवासन यांचा जीवनप्रवास

    Mallika Srinivasan: India's Tractor Queen
    मल्लिका श्रीनिवासन या देशातील दुसरी व जगातील तिसरी सर्वात मोठी एक्सपोर्टर TAFE (ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट) च्या सीईओ आहेत.

    Mallika Srinivasan: India's Tractor Queen
    त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1959 रोजी मद्रास येथे झाला. मद्रास युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्हॉर्टन स्कूल पेनसिल्व्हेनिया येथून एमबीए पूर्ण केलं.

    त्यानंतर त्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागल्या. त्याच्या कारकिर्दीत कंपनीने ट्रॅक्टर उत्पादनात खूप प्रगती केली आणि टर्न ओव्हर 160 करोड डॉलरच्या घरात गेला. आज कंपनी ट्रॅक्टर, फार्म मशिनरी, डिझेल इंजिन, जनरेटर, अभियांत्रिकी प्लास्टिक, हायड्रोलिक पंप आणि सिलिंडर, वृक्षारोपण यासारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे.

    The rise of Mallika Srinivasan: From a family business to a global leader
    मल्लिका श्रीनिवासन यांनी भारतीय उद्योग महासंघ, भारतीय विदेश व्यापार संस्था यांसारख्या संस्थेमध्ये विविध पदे भूषविली आहेत. फोर्ब्स इंडिया ने वूमन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच फोर्ब्स अशिया टॉप 50 अशिया पॉवर बिझनेसवुमन पैकी एक म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. तर भारत सरकारकडून 2014 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला.
    The rise of Mallika Srinivasan: From a family business to a global leader
    इतकेच नाही तर कार्पोरेशन AGCO यु एस ए च्या मंडळात त्या सदस्य आहेत. तर युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या जागतिक संचालक मंडळावर देखील त्या सदस्य आहेत.
    How Mallika Srinivasan transformed TAFE into a global powerhouse
    दूरदृष्टी, व्यवसायातील संधी, कार्यक्षमता या अंगच्या गुणांबरोबरच ट्रॅक्टर क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आज “ट्रॅक्टर क्वीन ” म्हणून ओळखले जाते.
  • शेव आणि फरसाण विकून 9 हजार करोडची कंपनी उभी केली

    शेव आणि फरसाण विकून 9 हजार करोडची कंपनी उभी केली

    how-haldiram-became-a-global-snack-giant
    गंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया (तिखट शेव) बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता.
    how-haldiram-became-a-global-snack-giant
    त्यांचे लग्न चंपादेवींशी झाले होते. सुरुवातीला ते काकूच्या रेसिपीनुसार भुजिया बनवून विकत असत. परंतु नंतर काही कौटुंबिक वादामुळे त्यांनी पत्नीसह घर सोडले.
    Haldiram: A Marwari success story
    त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने घरीच बनवलेल्या मूग डाळ नमकीनची रस्त्यावर विक्री सुरू केली. केली. १९४६ मध्ये हल्दीराम यांनी बिकानेरमध्ये आपले पहिले दुकान सुरू केले. तेथे त्यांनी आपली आधीची भुजिया अजून बारीक करून डुंगर सेव या नावाने विकायला सुरुवात केली. हे नाव बिकानेरचे राजा डुंगर सिंग यांच्या नावावरून ठेवले होते.
    Haldiram: A Marwari success story
    १९४०-५०च्या दरम्यान दर आठवड्याला शंभर ते दोनशे किलो भुजिया विकली जाऊ लागली. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो इतकी महागली.
    Haldiram: A Marwari success story
    एकदा ते लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला गेले असताना सोबत नातेवाईकांसाठी ही भुजिया शेव घेऊन गेले. या नातेवाईकांनी त्यांना थेट कोलकात्याला दुकान सुरू करण्याचा हट्ट धरला. त्यांनी पण तो मान्य केला आणि तिथे शाखा सुरू झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपणही आपली शाखा इतरत्र उघडू शकतो.
    Haldiram: The snack giant that changed the way Indians eat
    पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर, नोएडा इथे हा व्यवसाय वाढत गेला. २००३ साली अमेरिकेत त्यांनी आपले प्रॉडक्ट्स पाठविण्यास सुरुवात केली. एकेक करत तब्बल ८० देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले.
    Haldiram: The snack giant that changed the way Indians eat
    भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण, दुधापासून बनवलेली उत्पादनं विकायला त्यांनी सुरुवात केली. पुणे, नागपूर, नोएडा, कोलकाता आणि दिल्ली येथे कंपनीची स्वतःची रेस्टॉरंट्स देखील आहेत.
    Haldiram: The snack giant that changed the way Indians eat
    कंपनीची आजची उलाढाल ७००० कोटींहून अधिक असून शेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तब्बल ४०० प्रॉडक्ट्सपर्यंत पोहोचला आहे. २०१७ मध्ये इतर सर्व मोठ्या ब्रँड्सना मागे टाकून हल्दीराम भारतातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड बनला.
  • पेट्रोल पंपावर काम ते देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक

    पेट्रोल पंपावर काम ते देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक

    The Rise of Dhirubhai Ambani: A Story of Hard Work and Determination
    धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील चोरवाड या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी.
    त्यांचे वडील हे एक प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी होती.
    Dhirubhai Ambani: The Man Who Built Reliance
    घरची परिस्थिती बेताची होती.त्यामुळे लहान वयातच धीरूभाई गिरनार पर्वताजवळ पर्यटकांना भजी विकायचे.
    शाळेत जेमतेम असणारे धीरूभाई यांचं शिक्षण १० वी पर्यंतच झालं.
    Dhirubhai Ambani: The Man Who Built Reliance
    वयाच्या १६ व्या वर्षी धीरूभाई आपले जेष्ठ बंधू रमणीकभाई यांच्यासोबत एडनला गेले आणि तेथे ते एका पेट्रोल पंपावर महिना ३०० रुपये पगारावर नोकरी करू लागले. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर अवघ्या २ वर्षांत ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.
    Dhirubhai Ambani: The Man Who Built Reliance
    पण स्वतःचा व्यवसाय करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देईना. येमेनमध्ये स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परत आले.
    त्यांनी चुलत भावासोबत भागीदारीमध्ये पॉलिएस्टर धागे आणि भारतीय मसाले आयात निर्यातीचा व्यवसाय चालू केला.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    बचतीचे ५० हजार रुपये गुंतवणूक करून मुंबईतल्या मस्जिद बंदर या ठिकाणी “रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन”ची
    सुरुवात झाली, तीही ३५० चौ. फूटच्या खोलीमध्ये. ज्यामध्ये २ टेबल, ३ खुर्च्या आणि एक टेलिफोन होता. हे होतं धीरूभाईंचं पहिलं ऑफिस.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    आयुष्यात नेहमी जोखीम घेत व्यवसाय करणाऱ्या धीरूभाईंनी कापड उद्योगातील सगळे बारकावे शिकत, १९६६ साली अहमदाबादच्या नरोडा येथे एका मिलची सुरुवात केली, जिथे कपडे बनवण्यासाठी पॉलिस्टर धाग्याचा उपयोग व्हायचा. तिथं तयार होणाऱ्या कापडाला त्यांनी विमल नाव दिलं, जे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचं होतं.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    पाहता पाहता विमलचा डंका संपूर्ण भारतात वाजू लागला. १९७७ मध्ये धीरूभाईंनी आपल्या कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला
    आणि त्या वेळी ५८,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी त्या शेअर्सची खरेदी केली.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    यानंतर त्यांनी रिलायन्स कंपनीचा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला. रिफायनरी, पेट्रोलियम, टेलीकम्युनिकेशन यांसारख्या क्षेत्रात रिलायन्स आपलं नाव कमवत गेली. रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन म्हणून सुरु झालेली कंपनी पुढे रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशी नावं धारण करत प्रगती करत आली.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    ६ जुलै २००२ साली रोजी धीरूभाई अंबानी यांचा मृत्यू झाला. ‘नेहमी मोठी स्वप्नं पहा’ असं सांगणारे धीरूभाई आजही लाखो गरीब आणि
    कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रेरित करतात.
  • Coca Cola ची सुरुवात कशी झाली?

    Coca Cola ची सुरुवात कशी झाली?

    The Rise and Fall of Coca-Cola: A Case Study in Business Success
    डॉक्टर जॉन पेंबरटन हे अमेरिकेच्या सैन्यामध्ये कर्नल होते. सिव्हिल वॉर दरम्यान सेवा बजावत असताना ते जखमी झाले आणि
    त्याच दरम्यान त्यांना मर्फिन या ड्रग्जचे व्यसन लागले.
    The Rise and Fall of Coca-Cola: A Case Study in Business Success
    खूप वर्षानंतर त्यांनी आपलं व्यसन सोडायचं ठरवलं आणि तेव्हा मर्फिन ड्रग्जच्या जागी आपल्याला दुसरं काय घेता येईल याचा विचार करू लागले. पेंबरटन हे रसायन शास्त्रज्ञसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी काही घटकांचा प्रयोग करायचं ठरवलं.
    How Coca-Cola Became the Most Popular Soft Drink in the World
    त्यांनी कोला नट्स आणि कोकाची पाने एकत्र करून मिश्रण तयार केलं. त्यात अजून काही घटक घालून एक सिरप बनवलं आणि त्यामध्ये कार्बोनेटचं पाणी मिसळलं. त्यांनी तयार केलेल्या पेयामध्ये अल्कोहोल असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत ते बसत नव्हतं. म्हणून पेंबरटन आपले पेय रजिस्टर करू शकले नाहीत
    How Coca-Cola Became the Most Popular Soft Drink in the World
    पण नंतर त्याच फॉर्म्युलामध्ये काही बदल करून त्यांनी अल्कोहोल विरहित पेय तयार केलं १८८६ मध्ये पेंबरटन यांनी आपले पेय औषधांच्या दुकानांमध्ये विकायला चालू केलं. ते पेय विकताना सांगू लागले की यामुळे अपचनाचा त्रास, डोकेदुखी, मर्फिनचे व्यसन कमी व्हायला मदत होते
    The Story of Coca-Cola: The Creation of a Cultural Phenomenon
    यामुळे त्यांचं हे पेय लोकप्रिय होऊ लागलं. नंतर त्यांचे पार्टनर फ्रँक रॉबिन्सन यांनी Cocakola असं नाव सुचवलं, परंतु पेंबरटन यांनी नाव अधिक आकर्षक दिसण्यासाठी kola मधील K काढून तिथं C ठेऊन Cola केलं आणि तयार झाली ती Coca-cola.
    The Story of Coca-Cola: The Creation of a Cultural Phenomenon
    ही मूळ रेसिपी अजूनही रहस्य आहे. असं म्हटलं जातं की, ही रेसिपी एका वेळेस कोका-कोलाच्या फक्त दोन कर्मचाऱ्यांना माहिती असते आणि
    त्यांचा मृत्यू झाल्यानंतरच ती पुढच्या कर्मचाऱ्याला सांगितली जाते.
    The Story of Coca-Cola: The Creation of a Cultural Phenomenon
    स्वतः बनवलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, मार्केटिंगचे नवनवीन तंत्र, कौशल्य यामुळे अल्पावधीत Coca-cola एक मोठी कंपनी म्हणून उदयाला आली. आज Coca-Colaचे स्वतःचे पाचशेपेक्षा जास्त ब्रँड असून ३५०० पेक्षा जास्त प्रोडक्टस आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 278 अब्ज डॉलर्स आहे
    The History of Coca-Cola: From a Secret Recipe to a Global Icon
    पहिल्या वर्षी कोका-कोलाच्या फक्त २५ बॉटल्स विकल्या गेल्या होत्या. सध्या कोका-कोला जगातील जवळपास २०० देशांमध्ये
    विकले जाते व रोज सुमारे १९० कोटी लोक कोका-कोलाचे पेय पितात.
  • संगणकाला जन्म देणारे चार्ल्स बॅबेज

    संगणकाला जन्म देणारे चार्ल्स बॅबेज

    the-man-who-invented-the-computer-charles-babbage
    आज ज्या संगणकामुळे आपलं आयुष्य सुखकर झालं त्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ला लंडनमध्ये झाला.
    the-man-who-invented-the-computer-charles-babbage
    लहानपणासूनच गणितात अत्यंत हुशार असणारे चाल्स बॅबेज हे एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, संशोधक आणि मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी १८१२-१३ मध्ये गणितीय समीकरणे सोडवणारे कॅल्क्युलेटर बनवले होते.
    Charles Babbage's Contributions to Computing
    आपले गणितीय ज्ञान वापरून चाल्स बॅबेज यांनी एक मशीन बनवलं जे मोठमोठी गणित कमी वेळात सोडवत होतं. १८२२ मध्ये तयार झालेल्या या मशीनचं नाव बॅबेज यांनी डिफरन्स इंजिन असं ठेवलं, पण आणखी संशोधन करण्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे त्यांना हे काम अर्ध्यातच सोडावं लागलं.
    Charles Babbage's Contributions to Computing
    पुढं आणखी संशोधन करत त्यांनी याच मशीनच पुढचं व्हर्जन १८४२ मध्ये बनवलं. ज्याचं नाव त्यांनी अनॅलिटीकल इंजिन असं ठेवलं. या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे याला इनपुट दिल्यानंतर, त्याच्यावर प्रोसेसिंग करत आणि दिलेल्या माहितीची प्रिंट काढत, ती माहिती स्टोअरसुद्धा करत होते.
    Charles Babbage's Contributions to Computing
    हेच अनॅलिटीकल इंजिन म्हणजे जगातला पहिला संगणक. हे यंत्र पुर्णपणे मॅकॅनिकल असून त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युतपुरवठा वापरला गेला नव्हता. असे असले तरी आधुनिक संगणकाचे सर्व मुलभूत घटक त्यात समाविष्ट होते.
    Charles Babbage's Contributions to Computing
    या अनॅलिटीकल इंजिनचा आकार एका खोलीएवढा होता,
    तर याचं वजन अनेक पटीने जास्त होतं.
    हे इंजिन वाफेवर चालणार होतं. चार्ल्स बॅबेज यांना हे इंजिन बनवण्यासाठी ब्रिटिश सरकारने फंडिंग केलं होतं.
    Charles Babbage's Contributions to Computing
    चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे असे म्हटले जाते. म्हणूनच चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात.
    Charles Babbage's Contributions to Computing
    असे हे व्यक्तिमत्त्व १८ ऑक्टोबर १८७१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचा अर्धा मेंदू The Hunterian Museum इथे व अर्धा
    Science Museum, London इथे जतन करून ठेवलेला आहे.
  • Asian Paints ची सुरुवात कशी झाली

    Asian Paints ची सुरुवात कशी झाली

    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    तो काळ होता १९४२ चा, जेव्हा भारतातील पेंट्स इंडस्ट्री मध्ये फक्त काही परदेशी कंपन्या होत्या आणि भारतीय अशी शालिमार पेंट्स होती.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं, ज्यामुळे भारताने बाहेरील देशांकडून रंगाची आयात पूर्णपणे थांबवली होती. आणि हीच संधी होती भारतीय रंग उद्योगांना वर येण्याची.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    ही संधी ओळखून चंपकलाल चोकसी या व्यापाऱ्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या तीन मित्रांच्या साथीने १९४२ साली मुंबईमधील गिरगावात एका गॅरेजमध्ये Asian Paints ची सुरुवात केली.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    तो काळ असा होता जेव्हा सगळे पेंट उद्योग औद्योगिक पेंट्स विभागावर लक्ष केंद्रित करत होते आणि ही संधी चोकसी यांच्या सारख्या चाणाक्ष माणसाच्या लक्षात आली.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    भारतामध्ये सजावटीच्या किरकोळ पेंट विभागात वाढण्याची प्रचंड संधी आहे ही संधी चोकसी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी
    किरकोळ सजावटीच्या क्षेत्रात शाश्वत असणारी व्यवसायाची वाट निवडली.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. त्यांना अशा बाजारात आपले स्थान मिळवायचे होते, जिथे मूठभर व्यापाऱ्यांनी संपूर्ण भारताचा बाजार नियंत्रित केला होता.
    How Asian Paints Became One of the Largest Paint Companies in the World
    त्यानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी बरेच वेगवेगळे प्रयोग केले जे ग्राहकांना आवडू लागले. ज्यामुळे १९५२ मध्ये त्यांनी २३ करोडचा टर्नओव्हर साध्य केला.
    How Asian Paints Became One of the Largest Paint Companies in the World
    आणि पुढे १९६७ मध्ये Asian Paints ही भारतातील क्रमांक १ ची पेंट्स उत्पादक कंपनी बनली आणि आपल्या गुणवत्तेमुळे तसेच अचूक हेरलेल्या संधीमुळे आजही Asian Paints आपले पहिले स्थान टिकवून आहे.
    How Asian Paints Became One of the Largest Paint Companies in the World
    आज एशियन पेंट्स भारतातील सर्वात मोठी तर आशियातील तिसरी मोठी पेंट कंपनी आहे. कंपनीची उलाढाल २० हजार कोटींपेक्षा जास्त असून ७६०० हून अधिक कर्मचारी कंपनीत काम करतात.