Tag: पैसा वसे मनी

  • थेंबे थेंबे तळे साचे

    थेंबे थेंबे तळे साचे

    एक काळ होता जेव्हा भविष्याची तरतूद म्हणून लोक संपत्तीचा संचय करायचे एखाद्या जुन्या पेटीमध्ये धन साठवून ठेवायचे. या सगळ्या धन साठवण्याच्या पद्धतीमध्ये मात्र भलतीच रिस्क असायची, हे धन कधी चोरीला जायचे तर कधी नैसर्गिक कारणामुळे गहाळ व्हायचे. लोकांना या गोष्टी लक्षात आल्यानंतर हळू हळू लोक धन हे वस्तू रूपात साठवू लागले त्यामध्ये जमीन किंवा सोने याचा समावेश असायचा. लोकांना जेव्हा कळायला लागलं की या साठवण म्हणून घेतलेल्या वस्तूंची अथवा संपत्तीची किंमत वेळेनुसार वाढते तेव्हा गुंतवूणक ही पद्धत खऱ्या अर्थाने सुरु झाली. गुंतवणूक आणि बचत या दोन्हींकडे त्या काळात एकच नजरेतून पहिले जायचे. जस जसा काळ बदलत गेला तस तसे लोकांना समजले की बचतीपेक्षा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जास्त आहे. ज्यामुळे गुंतवणूककडे लोकांचा ओढा जास्त वाढला. जेव्हा तुमच्या उत्पन्नाच्या नफ्यातील काही भाग तुम्ही भविष्यातील काही गोष्टींसाठी बाजूला काढून जपून ठेवता तेव्हा ती बचत होते आणि जेव्हा तुम्ही नफ्याचा काही भाग हा एखाद्या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही गुंतवणूक करता. तसे पाहायला गेल्यानंतर दोन्हीमधून फायदाच होतो पण गुंवणूकीतून जास्त फायदा होतो, ज्यामुळे आजकाल गुंतवणुकीचा विचार जास्त करतात बचतीपेक्षा. आता दोन्ही गोष्टींमध्ये नेमका फरक कसा पडतो हे आपण पाहूया.

    ज्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये फायदा जास्त असतो त्याप्रमाणे त्यात जोखीमसुद्धा जास्त असते. गुंतवणुकीचा हा फायदा जेव्हा गुंतवणूक जास्त कालावधीसाठी असते तेव्हा अधिक जास्त होतो. गुंतवणुकीचा विचार करताना आपण म्युचुअल फ़ंड, ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट इ. पर्यायांचा विचार नक्की करू शकतो. हे सर्व करत असताना गुंतवणुकीमध्ये जोखीम जास्त असली तरी वेळेसोबत त्यातून मिळणार नफा फार मोठा आहे. ज्यामुळे भविष्यातील अनेक प्लॅन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळू शकते. भविष्यातील एखादी मोठी कल्पना किंवा तुमचे एखादे मोठे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त बचत हा पर्याय खूपच तोकडा पडू शकतो. त्यामुळे गुंतवणूक या पर्यायाचा विचार करून आपण आपली ही मोठी स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकतो. आता जोखीमबद्दल बोलायचे झाल्यास गुंतवणुकीमध्ये जसा फायदा जास्त तशी जोखीम जास्त आहे तरीसुद्धा सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आणि गुंतवणूक नेमकी कुठे, कधी आणि केव्हा करावी हे समजायला लागले तर ही जोखीम आपण नक्कीच कमी करू शकतो.

  • ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है,
    बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत,
    खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत,
    दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत |

    पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी तो नही |

    तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपातले पैसेच नसतील तर…? अशी कल्पना करुन बघा. खिशात पैसे नाहीत. बँकेत पैसे नाहीत. घरात पैसे नाहीत. तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले नाहीत किंवा तुम्ही कुणाकडे उसने पैसे मागू सुध्दा शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. घरात आहेत त्या जगण्यायोग्य वस्तूंचा साठा संपत चाललाय. एके दिवशी तो संपून गेला. आता काय करणार? पैशाविना जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखी अवस्था होय.

    बऱ्याचवेळा पैशाबाबत अनेक गैरसमज पाळले जातात. पैसा हा आध्यात्मिक मार्गातील अडथळा आहे हा एक त्यातला मुख्य गैरसमज आहे. मात्र ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या आध्यात्माची ओळख करुन देऊन प्रभावीत केले ते विवेकानंद सांगतात की, उपाशीपोटी धर्म शिकवला जाऊ शकत नाही. त्यांनी पैशाचे महत्त्व नमूद केले आहे. पैसा आध्यात्मातील अडथळा आहे असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनावर ताबा नसतो. त्यामुळे ते पैशाला बदनाम करतात. पैशाने अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात. उत्तम शिक्षणासाठी शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी, चांगले रस्ते तयार करण्यासाठी, पुस्तके विकत घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, चांगले व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, लोकांना सुखसोयी चांगल्या मिळवण्यासाठी, दवाखाने व आरोग्य केंद्रांसाठी, व्यायामशाळा उभारण्यासाठी, चांगली शेती पीकवण्यासाठी, संशोधनासाठी, खेळाडूंसाठी, मैदानांसाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अगदी कशाचेही नाव घ्या. ती प्रत्येक गोष्ट साकारण्यासाठी पैसा लागतो. पैशाविना काहीच करता येत नाही.

    the-need-for-money-and-the-journey-to-wealth

    मग आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की, जे लोक पैशाने अमुक गोष्टी खरेदी करता येतील मात्र तमुक गोष्ट खरेदी करता येणार नाहीत याची मोठी यादी सांगत असतात त्यांचे काय? उदाहरण द्यायचे झाल्यास पैशाने पुस्तके खरेदी करता येतील ज्ञान नाही. पैशाने चांगले अंथरुन खरेदी करता येईल, झोप नाही. अशा वाक्यांचा भडीमार करणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुस्तके खरेदी करणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे ते पैशाचे काम आहे. ती पुस्तके वाचणे हे तुमचे काम आहे, पैशाचे नाही. त्यासाठी पैशाला कशाला दोष देता? तो दोष तुमचा आहे. अंथरुन विकत घेणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे. झोप लागणे न लागणे ही तुमच्या कर्मावर किंवा मानसिक शांतीवर अवलंबवून आहे. पैशावर नाही.

    पैशाने माणूस बिघडतो वगैरे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. तसे असते तर सगळी गरीब माणसे चांगली असती किंवा सगळी श्रीमंत माणसे वाईट असली असती. ज्याची वृत्ती वाईट आहे ती माणसे वाईट वागणार. मग त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही. ज्यांची वृत्ती विधायक आहे ती माणसे चांगलीच वागणार. तो संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडे पैसा असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. काहीवेळा पैशामुळे आपापली वृत्ती प्रकट करायला वाव मिळतो. चांगल्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्या समाजाची भरभराट होते. कारण चांगली माणसे पैसा आल्यावर शिक्षणसंस्था, दवाखाने, चांगले रस्ते, संस्कार केंद्रे अशा विधायक गोष्टी सुरु करतील. याउलट वाईट माणसांकडे पैसा आला तर त्या समाजाची अधोगती होते. कारण विध्वंसक माणसे जुगार, दारुचे अड्डे सुरु करतील.

    आणखी वाचा

  • ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    शतकानुशतके माणसामाणसात संपत्तीच्या मोजमापानुसार फरक करण्यात आला आहे. राजा व रंक, सावकार व फकीर, गरीब व श्रीमंत अशी थेट विभागणी होत आलेली आहे. जगाच्या अगदी सर्व कोपऱ्यात हीच व्यवस्था आहे. मानवात व इतर सजीवात अनेक फरक असले तरीही संपत्ती निर्माण करणे, तिची गुंतवणूक करणे, त्या संपत्तीत वाढ करणे ही माणसांनी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गात इतर कोणत्याही घटकात नाही. प्रत्येकाला पैसा हवा आहे. भौतिक व आरामदायी सुखसुविधा पाहिजे आहेत. त्यामुळे प्रत्येकजण गरीबीतून श्रीमंतीकडे किंवा श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करत असतो. म्हणजे काय तर, आता आहे त्या स्थितीतून वरच्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता गरीबी व श्रीमंतीत मुख्य फरक कोणता हा प्रश्न आपल्याला पडतोच.

    गरीबी व श्रीमंतीत अजून काही फरक आहेत. माणसाला गरीब होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. श्रीमंत असणाऱ्या (कोणत्याही बाबतीत) माणसाने त्याचे कार्य सोडले तो आपोआप गरीबीकडे प्रवास करु लागतो. गरीबी ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हातमिळवणी करण्यासाठी आतुरलेली असते. ती आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असते. तिच्या दिशेने वाहवत जायचे की नाही ही निवड प्रत्येक माणसाला स्वतःहून करावी लागते. गरीब होण्याचा प्रवास अत्यंत सोपा आहे. काहीही न करता गरीब होता येते. गरीबी आल्यावर मात्र तिथे टिकून राहण्यासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जीवघेणा ठरतो. हा संघर्ष अतिशय जीवघेणा असतो, इतका की यातून वर उठण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतात. हा संघर्ष सोडून दिला की माणसाचे जगणे संपून जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. एखाद्या मजूराने आठ दिवस काम केले नाही तर त्याच्या जगण्याचे वांधे व्हायला वेळ लागत नाही. मात्र ज्याने पैशाने पैसा कमावायची कला साध्य केली आहे, अशा एखाद्या श्रीमंत माणसाने आठ दिवस काम केले नाही, तर त्याच्या जगण्याचे वांधे होणार नाहीत.

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    श्रीमंती ही अतिशय प्रयत्नानंतर, युक्तीने, बुध्दीचा वापर करुन किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करुन प्राप्त करता येते. श्रीमंतीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती बोलवता येते. ती स्वतःहून चालून आपल्याकडे येत नाही. आपल्याला ती यावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. तिला प्रसन्न करावे लागते, मगच ती आपल्याकडे येते. आल्यावर सुध्दा तिला टिकवून राहण्यासाठी सतर्क राहावे लागते. माणूस तिच्या बाबतीत गाफील झाला की ती त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाते. ती आली की बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन येते. त्या चांगल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वाईट गोष्टींना शिरकाव करु दिला की, तिचा उलट्या दिशेने प्रवास सुरु होतो. म्हणून अशा प्रयत्न प्राप्त केलेल्या श्रीमंतीला किंवा आता ती नसेल तर प्रयत्नांनी प्राप्त कराव्या लागणाऱ्या, टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यात वाढ करण्यासाठी काय करावे? आता नसलेली श्रीमंती प्राप्त कशी करावी? गरीबीला निरोप कसा द्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालिकेत असतील तेव्हा पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल या विषयावर पुढील लेखात जाणून घेऊ.

    आणखी वाचा