Tag: टुरिझम

  • दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    उत्तर कर्नाटकात स्थित असलेलं दांडेली म्हणजे कर्नाटकातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य. फारच कमी माणसांची वर्दळ, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग, लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एखाद-दुसरं हॉटेल अशा वातावरणात असलेलं दांडेली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या झुलत्या कमानी पाहिल्या की, वाटतं दांडेली जणूकाही आपल्या स्वागतासाठीच नटलेली आहे. त्या गर्द झाडीची शहरी लोकांना भीती वाटू शकते पण तिथली स्वच्छ हवा, पक्षांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा किलबिलाट, काळी नदीचा शांत प्रवाह एकूणच सगळं वातावरण पाहिलं की दोन – तीन दिवस तरी तिथून मुक्काम हलवावा नाही वाटत.

    पुण्याहून दांडेलीचा रस्ता जवळपास 442 किलोमीटरचा आहे. पुणे- सातारा हायवेने कोल्हापूर मधून बेळगाव वरुन 2 तासात तुम्ही दांडेलीला पोहोचू शकता. पुण्याहून 8 – 8.30 तासांचा प्रवास करून जरी थकवा आला असेल तरी तिथल्या शांत वातावरणाने हा थकवा अगदी चुटकीसरशी निघून जातो.

    आणखी वाचा

  • तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    जिभी

    हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव म्हणजे जिभी. इथल्या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखळत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच्या पक्षांचा चिवचिवाटही या आनंदात भर घालतो.

    जलोरी पास आणि सिरोलसार लेक

    इथल्या आकर्षणामध्ये ही दोन ठिकाणंसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त ठिकाणंच नाही तर इथपर्यंत पोहोचण्याचे रस्तेही तितकेच मनमोहक आहेत. रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली असल्याचा भास या ठिकाणी जाताना होतो. मध्यभागी गोठलेला तलाव आणि चारही बाजूंनी बर्फच बर्फ. उंचावर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.

    चैहणी गाव

    तीर्थन व्हॅलीतील आणखी एक छोटसं गाव म्हणजे चैहणी. यालाच चैहणी कोठी सुद्धा म्हणतात. इथे एक कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे. या कोठीतच शृंगा ऋषींचं भंडारही आहे. या कोठीपासूनच साधारण एक किमीच्या अंतरावर शृंगा ऋषींचं मंदीर आहे.   

    तीर्थन व्हॅलीला केव्हा जाणार?

    तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.

    कसे जाल?

    आणखी वाचा

  • स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.

    khajjiar-tourism

    खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

    खजियारला जाणार कसं?

    आणखी वाचा

  • महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

    महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

    पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुळे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी इतकं आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं वैभव बघून तुमची गावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल. सतत खळखणाऱ्या नदीचा, पाटबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल.

    आणखी वाचा