मल्लिका श्रीनिवासन या देशातील दुसरी व जगातील तिसरी सर्वात मोठी एक्सपोर्टर TAFE (ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट) च्या सीईओ आहेत.त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1959 रोजी मद्रास येथे झाला. मद्रास युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्हॉर्टन स्कूल पेनसिल्व्हेनिया येथून एमबीए पूर्ण केलं.त्यानंतर त्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागल्या. त्याच्या कारकिर्दीत कंपनीने ट्रॅक्टर उत्पादनात खूप प्रगती केली आणि टर्न ओव्हर 160 करोड डॉलरच्या घरात गेला. आज कंपनी ट्रॅक्टर, फार्म मशिनरी, डिझेल इंजिन, जनरेटर, अभियांत्रिकी प्लास्टिक, हायड्रोलिक पंप आणि सिलिंडर, वृक्षारोपण यासारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे.मल्लिका श्रीनिवासन यांनी भारतीय उद्योग महासंघ, भारतीय विदेश व्यापार संस्था यांसारख्या संस्थेमध्ये विविध पदे भूषविली आहेत. फोर्ब्स इंडिया ने वूमन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच फोर्ब्स अशिया टॉप 50 अशिया पॉवर बिझनेसवुमन पैकी एक म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. तर भारत सरकारकडून 2014 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला.इतकेच नाही तर कार्पोरेशन AGCO यु एस ए च्या मंडळात त्या सदस्य आहेत. तर युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या जागतिक संचालक मंडळावर देखील त्या सदस्य आहेत.दूरदृष्टी, व्यवसायातील संधी, कार्यक्षमता या अंगच्या गुणांबरोबरच ट्रॅक्टर क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आज “ट्रॅक्टर क्वीन ” म्हणून ओळखले जाते.
गंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया (तिखट शेव) बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता.त्यांचे लग्न चंपादेवींशी झाले होते. सुरुवातीला ते काकूच्या रेसिपीनुसार भुजिया बनवून विकत असत. परंतु नंतर काही कौटुंबिक वादामुळे त्यांनी पत्नीसह घर सोडले.त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने घरीच बनवलेल्या मूग डाळ नमकीनची रस्त्यावर विक्री सुरू केली. केली. १९४६ मध्ये हल्दीराम यांनी बिकानेरमध्ये आपले पहिले दुकान सुरू केले. तेथे त्यांनी आपली आधीची भुजिया अजून बारीक करून डुंगर सेव या नावाने विकायला सुरुवात केली. हे नाव बिकानेरचे राजा डुंगर सिंग यांच्या नावावरून ठेवले होते.१९४०-५०च्या दरम्यान दर आठवड्याला शंभर ते दोनशे किलो भुजिया विकली जाऊ लागली. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो इतकी महागली.एकदा ते लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला गेले असताना सोबत नातेवाईकांसाठी ही भुजिया शेव घेऊन गेले. या नातेवाईकांनी त्यांना थेट कोलकात्याला दुकान सुरू करण्याचा हट्ट धरला. त्यांनी पण तो मान्य केला आणि तिथे शाखा सुरू झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपणही आपली शाखा इतरत्र उघडू शकतो.पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर, नोएडा इथे हा व्यवसाय वाढत गेला. २००३ साली अमेरिकेत त्यांनी आपले प्रॉडक्ट्स पाठविण्यास सुरुवात केली. एकेक करत तब्बल ८० देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले.भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण, दुधापासून बनवलेली उत्पादनं विकायला त्यांनी सुरुवात केली. पुणे, नागपूर, नोएडा, कोलकाता आणि दिल्ली येथे कंपनीची स्वतःची रेस्टॉरंट्स देखील आहेत.कंपनीची आजची उलाढाल ७००० कोटींहून अधिक असून शेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तब्बल ४०० प्रॉडक्ट्सपर्यंत पोहोचला आहे. २०१७ मध्ये इतर सर्व मोठ्या ब्रँड्सना मागे टाकून हल्दीराम भारतातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड बनला.
धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील चोरवाड या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी. त्यांचे वडील हे एक प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी होती.घरची परिस्थिती बेताची होती.त्यामुळे लहान वयातच धीरूभाई गिरनार पर्वताजवळ पर्यटकांना भजी विकायचे. शाळेत जेमतेम असणारे धीरूभाई यांचं शिक्षण १० वी पर्यंतच झालं.वयाच्या १६ व्या वर्षी धीरूभाई आपले जेष्ठ बंधू रमणीकभाई यांच्यासोबत एडनला गेले आणि तेथे ते एका पेट्रोल पंपावर महिना ३०० रुपये पगारावर नोकरी करू लागले. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर अवघ्या २ वर्षांत ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.पण स्वतःचा व्यवसाय करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देईना. येमेनमध्ये स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परत आले. त्यांनी चुलत भावासोबत भागीदारीमध्ये पॉलिएस्टर धागे आणि भारतीय मसाले आयात निर्यातीचा व्यवसाय चालू केला.बचतीचे ५० हजार रुपये गुंतवणूक करून मुंबईतल्या मस्जिद बंदर या ठिकाणी “रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन”ची सुरुवात झाली, तीही ३५० चौ. फूटच्या खोलीमध्ये. ज्यामध्ये २ टेबल, ३ खुर्च्या आणि एक टेलिफोन होता. हे होतं धीरूभाईंचं पहिलं ऑफिस.आयुष्यात नेहमी जोखीम घेत व्यवसाय करणाऱ्या धीरूभाईंनी कापड उद्योगातील सगळे बारकावे शिकत, १९६६ साली अहमदाबादच्या नरोडा येथे एका मिलची सुरुवात केली, जिथे कपडे बनवण्यासाठी पॉलिस्टर धाग्याचा उपयोग व्हायचा. तिथं तयार होणाऱ्या कापडाला त्यांनी विमल नाव दिलं, जे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचं होतं.पाहता पाहता विमलचा डंका संपूर्ण भारतात वाजू लागला. १९७७ मध्ये धीरूभाईंनी आपल्या कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आणि त्या वेळी ५८,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी त्या शेअर्सची खरेदी केली.यानंतर त्यांनी रिलायन्स कंपनीचा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला. रिफायनरी, पेट्रोलियम, टेलीकम्युनिकेशन यांसारख्या क्षेत्रात रिलायन्स आपलं नाव कमवत गेली. रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन म्हणून सुरु झालेली कंपनी पुढे रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशी नावं धारण करत प्रगती करत आली.६ जुलै २००२ साली रोजी धीरूभाई अंबानी यांचा मृत्यू झाला. ‘नेहमी मोठी स्वप्नं पहा’ असं सांगणारे धीरूभाई आजही लाखो गरीब आणि कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रेरित करतात.
डॉक्टर जॉन पेंबरटन हे अमेरिकेच्या सैन्यामध्ये कर्नल होते. सिव्हिल वॉर दरम्यान सेवा बजावत असताना ते जखमी झाले आणि त्याच दरम्यान त्यांना मर्फिन या ड्रग्जचे व्यसन लागले.खूप वर्षानंतर त्यांनी आपलं व्यसन सोडायचं ठरवलं आणि तेव्हा मर्फिन ड्रग्जच्या जागी आपल्याला दुसरं काय घेता येईल याचा विचार करू लागले. पेंबरटन हे रसायन शास्त्रज्ञसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी काही घटकांचा प्रयोग करायचं ठरवलं.त्यांनी कोला नट्स आणि कोकाची पाने एकत्र करून मिश्रण तयार केलं. त्यात अजून काही घटक घालून एक सिरप बनवलं आणि त्यामध्ये कार्बोनेटचं पाणी मिसळलं. त्यांनी तयार केलेल्या पेयामध्ये अल्कोहोल असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत ते बसत नव्हतं. म्हणून पेंबरटन आपले पेय रजिस्टर करू शकले नाहीतपण नंतर त्याच फॉर्म्युलामध्ये काही बदल करून त्यांनी अल्कोहोल विरहित पेय तयार केलं १८८६ मध्ये पेंबरटन यांनी आपले पेय औषधांच्या दुकानांमध्ये विकायला चालू केलं. ते पेय विकताना सांगू लागले की यामुळे अपचनाचा त्रास, डोकेदुखी, मर्फिनचे व्यसन कमी व्हायला मदत होतेयामुळे त्यांचं हे पेय लोकप्रिय होऊ लागलं. नंतर त्यांचे पार्टनर फ्रँक रॉबिन्सन यांनी Cocakola असं नाव सुचवलं, परंतु पेंबरटन यांनी नाव अधिक आकर्षक दिसण्यासाठी kola मधील K काढून तिथं C ठेऊन Cola केलं आणि तयार झाली ती Coca-cola.ही मूळ रेसिपी अजूनही रहस्य आहे. असं म्हटलं जातं की, ही रेसिपी एका वेळेस कोका-कोलाच्या फक्त दोन कर्मचाऱ्यांना माहिती असते आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतरच ती पुढच्या कर्मचाऱ्याला सांगितली जाते.स्वतः बनवलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, मार्केटिंगचे नवनवीन तंत्र, कौशल्य यामुळे अल्पावधीत Coca-cola एक मोठी कंपनी म्हणून उदयाला आली. आज Coca-Colaचे स्वतःचे पाचशेपेक्षा जास्त ब्रँड असून ३५०० पेक्षा जास्त प्रोडक्टस आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 278 अब्ज डॉलर्स आहेपहिल्या वर्षी कोका-कोलाच्या फक्त २५ बॉटल्स विकल्या गेल्या होत्या. सध्या कोका-कोला जगातील जवळपास २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १९० कोटी लोक कोका-कोलाचे पेय पितात.
आज ज्या संगणकामुळे आपलं आयुष्य सुखकर झालं त्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ला लंडनमध्ये झाला.लहानपणासूनच गणितात अत्यंत हुशार असणारे चाल्स बॅबेज हे एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, संशोधक आणि मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी १८१२-१३ मध्ये गणितीय समीकरणे सोडवणारे कॅल्क्युलेटर बनवले होते.आपले गणितीय ज्ञान वापरून चाल्स बॅबेज यांनी एक मशीन बनवलं जे मोठमोठी गणित कमी वेळात सोडवत होतं. १८२२ मध्ये तयार झालेल्या या मशीनचं नाव बॅबेज यांनी डिफरन्स इंजिन असं ठेवलं, पण आणखी संशोधन करण्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे त्यांना हे काम अर्ध्यातच सोडावं लागलं.पुढं आणखी संशोधन करत त्यांनी याच मशीनच पुढचं व्हर्जन १८४२ मध्ये बनवलं. ज्याचं नाव त्यांनी अनॅलिटीकल इंजिन असं ठेवलं. या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे याला इनपुट दिल्यानंतर, त्याच्यावर प्रोसेसिंग करत आणि दिलेल्या माहितीची प्रिंट काढत, ती माहिती स्टोअरसुद्धा करत होते.हेच अनॅलिटीकल इंजिन म्हणजे जगातला पहिला संगणक. हे यंत्र पुर्णपणे मॅकॅनिकल असून त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युतपुरवठा वापरला गेला नव्हता. असे असले तरी आधुनिक संगणकाचे सर्व मुलभूत घटक त्यात समाविष्ट होते.या अनॅलिटीकल इंजिनचा आकार एका खोलीएवढा होता, तर याचं वजन अनेक पटीने जास्त होतं. हे इंजिन वाफेवर चालणार होतं. चार्ल्स बॅबेज यांना हे इंजिन बनवण्यासाठी ब्रिटिश सरकारने फंडिंग केलं होतं.चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे असे म्हटले जाते. म्हणूनच चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात.असे हे व्यक्तिमत्त्व १८ ऑक्टोबर १८७१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचा अर्धा मेंदू The Hunterian Museum इथे व अर्धा Science Museum, London इथे जतन करून ठेवलेला आहे.
तो काळ होता १९४२ चा, जेव्हा भारतातील पेंट्स इंडस्ट्री मध्ये फक्त काही परदेशी कंपन्या होत्या आणि भारतीय अशी शालिमार पेंट्स होती.त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं, ज्यामुळे भारताने बाहेरील देशांकडून रंगाची आयात पूर्णपणे थांबवली होती. आणि हीच संधी होती भारतीय रंग उद्योगांना वर येण्याची.ही संधी ओळखून चंपकलाल चोकसी या व्यापाऱ्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या तीन मित्रांच्या साथीने १९४२ साली मुंबईमधील गिरगावात एका गॅरेजमध्ये Asian Paints ची सुरुवात केली.तो काळ असा होता जेव्हा सगळे पेंट उद्योग औद्योगिक पेंट्स विभागावर लक्ष केंद्रित करत होते आणि ही संधी चोकसी यांच्या सारख्या चाणाक्ष माणसाच्या लक्षात आली.भारतामध्ये सजावटीच्या किरकोळ पेंट विभागात वाढण्याची प्रचंड संधी आहे ही संधी चोकसी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी किरकोळ सजावटीच्या क्षेत्रात शाश्वत असणारी व्यवसायाची वाट निवडली.त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. त्यांना अशा बाजारात आपले स्थान मिळवायचे होते, जिथे मूठभर व्यापाऱ्यांनी संपूर्ण भारताचा बाजार नियंत्रित केला होता.त्यानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी बरेच वेगवेगळे प्रयोग केले जे ग्राहकांना आवडू लागले. ज्यामुळे १९५२ मध्ये त्यांनी २३ करोडचा टर्नओव्हर साध्य केला.आणि पुढे १९६७ मध्ये Asian Paints ही भारतातील क्रमांक १ ची पेंट्स उत्पादक कंपनी बनली आणि आपल्या गुणवत्तेमुळे तसेच अचूक हेरलेल्या संधीमुळे आजही Asian Paints आपले पहिले स्थान टिकवून आहे.आज एशियन पेंट्स भारतातील सर्वात मोठी तर आशियातील तिसरी मोठी पेंट कंपनी आहे. कंपनीची उलाढाल २० हजार कोटींपेक्षा जास्त असून ७६०० हून अधिक कर्मचारी कंपनीत काम करतात.